Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/10/2015 - 11:54
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
  • Log in or register to post comments
  • 35320 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 18:39

In reply to विद्युत अभियंता झाला आणी by मराठी_माणूस

Permalink

आमच्या सौ चे काका सेलू

आमच्या सौ चे काका सेलू सारख्या मराठवाड्याच्या तालुक्याच्या गावी कष्टाने मारवाड्यांच्या एकाधीकार् शाही विरुद्ध उभे राहून आज खाते आणी कीटकनाशके यांचा व्यवसाय करीत आहेत आणी भरपूर कमवीत आहेत. ( महाराष्ट्राच्या अंतर्भागात शेती विषयक उत्पादनाच्या विक्रीमध्ये मारवाडी लोकांनी येऊन आपली एकाधिकारशाही निर्माण करतात या पेक्षा आमचे करंटेपण अजून काय असेल?) कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना. ते आम्हाला सवलती नाहीत मारवाडी लोक नाडतात अशा तक्रारी करीत बसले नाहीत. तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला कारणे लागत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sun, 12/13/2015 - 16:30

In reply to आमच्या सौ चे काका सेलू by सुबोध खरे

Permalink

तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे

तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला कारणे लागत नाहीत.
बरोबर त्याच चालीवर म्हणायचे तर "ज्याला कष्ट करायचे आहेत तो कुठेही करीतच असतो".
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 14:42

Permalink

Dr. Jichkar concedes that

Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 12/12/2015 - 14:56

Permalink

गैरसोय सहन करणे

मुंबईकर त्यातल्यात्यात सहनशील असतात. बारीकसारीक गैरसोयींबद्दल तक्रार करीत नाहीत. शक्यतो लॉ-अबाय्डिंग असतात. अलीकडे हा गुण कमी होऊ लागला आहे हे खरे. पत्ता सांगणे, बस नंबर सांगणे, कुठून कसे जायचे याचे योग्य मार्गदर्शन करणे वगैरे गोष्टीत चटकन आणि योग्य मदत करतात. (हाही गुण अलीकडे कमी होऊ लागला आहे.) हे फक्त गुजरातमध्ये पाहायला मिळते. बाकी भारतात फारसे नाही. अरे ला कारे सहसा करीत नाहीत. 'यडा' म्हणून सोडून देतात. कष्ट तर करतातच. करावेच लागतात. मुंबईत राहाणे हे 'डिमांडिंग' असते. ते मानसिक-शारीरिक सतर्कतेची अधिक अपेक्षा करते. महिलासुद्धा सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर असू शकतात. पांढरपेशे लोक सोडाच पण मजूरवर्गसुद्धा रविवारी, सुट्टीच्या दिवशी अधिकची कामे करतो. आमच्याकडे एक हरहुन्नरी माणूस अडल्यापडल्याला येतो. तो पेशाने मिस्त्री आहे. ६००-७०० रुपये रोजावर काम करतो. पण प्लंबिंग, टॉय्लेट तुंबणे, दिवाळीगणपतीत घर धुवायला, माळे साफ करायला बोलावले तरी जेवणाची वगैरे वेळ अ‍ॅडजस्ट करून लगेच येतो. अगदी कमोडमध्ये हात घालून साफ करायलाही कांकूं करत नाही. असे बरेच आहेत. कामाला जाण्यापूर्वी सकाळी सहा पासून गाड्या धुण्याचे काम अनेक जण करतात. मुलांना शाळेत नेणे-आणणे, क्लासेसना सोडणे अशी कामे संसाराला भर म्हणून बायका करतात. शिवाय बेबी-सिटिंग, रुग्ण आणि वृद्धांसाठी आया, मेल नर्स असे अनेक विपुल संख्येत असतात. विपुल संख्येत हे महत्त्वाचे. औषधे घरपोच येतात. चक्कीवाला दळण घेऊन जातो आणि पीठ आणून देतो. रद्दीवाला, इस्त्रीवाला, केळेवाला, पाव-अंडीवाला घरपोच नियमित सेवा देतात. ह्या सगळ्या कामकरी आणि विश्वासू लोकांमुळे मुंबई सुसह्य झाली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 18:28

In reply to गैरसोय सहन करणे by राही

Permalink

राही ताई

राही ताई मुलुंडला आमच्या मित्राकडे स्वयंपाक करणाऱ्या बाई पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजे पर्यंत पाच घरी स्वयंपाकाचे काम करतात.सकाळी सहा वाजता पोळी भाजी घेऊन जाणार्या शालेय शिक्षिकेच्या घरी त्या पाच वाजता कामाला जातात. महिन्याला दोन रजा आणी वर्षात इतर ६ रजा मिळून वर्षात ३० दिवस रजा असते. एक महिन्याचा पगार बोनस. परंतु वक्तशीरपणा असल्याने दोन पैसे जास्त देणे परवडते. संध्याकाळी ४ ते ७ तीन तासात तीन घरी त्या काम करतात. अशा आठ घरी काम करून स्वयंपाकाच्या बाई १४-१५ हजार रुपये कमावतात. कष्टाची किमत काय आहे ते मुंबईच्या लोकांना व्यवस्थितपणे समजलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sat, 12/12/2015 - 15:04

Permalink

ते त्यांचे वैयक्तीक मत असु

ते त्यांचे वैयक्तीक मत असु शकेल. धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर वातावरण निर्माण केले आणि त्याला वर्षानुवर्श पाठींबा दीला तर कूठे ही तशी संस्कृती निर्माण होउ शकते. मुंबई मधे सुध्दा बाहेरुन आलेल्यानीच enterprise उभे केले आहेत. कारण तशा पुरक गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत. नाशीक मधील बरेचसे उद्योगधंदे इतरत्र गेले आहेत कारण त्यांना त्याठीकाणी ज्यास्त सवलती देण्यात आल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 18:20

In reply to ते त्यांचे वैयक्तीक मत असु by मराठी_माणूस

Permalink

धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर

धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर वातावरण निर्माण केले मग तुम्ही करा कि कुणी अडवलंय? मुंबई मधे सुध्दा बाहेरुन आलेल्यानीच enterprise उभे केले आहेत. कारण तशा पुरक गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत. या कुणी पुरवल्या? आणि मुंबईत कोणताही tax holiday नसताना उद्योग येथे का येतात याचे कारण आपण लक्षात न घेता फक्त "माज करतात" "टेचात असतात" अशी भाषा वापरता याचे कारण समजेल का? नाशिक चे उद्योगधंदे बाहेर का गेले? याचे कारण तेथे तेथे जास्त सवलती दिल्या गेल्या असे तुमचे म्हणणे आहे तर नाशिकला या सवलती द्यायला कुणी नको म्हटले होते? प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. आमच्या वडिलांच्या मित्राचा (हा मूळ मुंबईचा आहे) नाशिकला रबरी हातमोजे बनवण्याचा( डॉक्टर वापरतात ते)कारखाना होता.नाशिकला मिळणाऱ्या विक्री कर अबकारी आणि इतर सुविधा पाहून त्याने नाशिकला कारखाना टाकला होता. जालाचा फायदा घेऊन त्याने आपली जाहिरात केली आणि त्याला फ्रान्स मधून मागणी आली. पण नाशिक चे कामगार काम करण्यात कुचराई करणारे होते. सकाळी उशिरा येणे आल्यावर तंबाखू मळत राहणे. वेळी अवेळी कामाचा खोळंबा करून चहा प्यायला जाणे. जेवायला घरी जाऊन दोन तास न उगवणे. वेळेत काम न करणे. जास्त कामाचा भत्ता(OVERTIME) देऊनहि काम न करणे. गणपती उत्सव, दिवाळीला दहा दिवस दांड्या मारणे इ इ. त्याबद्दल कोणाला काही विचारले तर युनियनबाजी करणे. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने कारखाना परत मुंबईत हलवला.त्याच्याच शब्दात मुंबईत कामगाराला दुप्पट पगार देणे परवडते कारण पगार जास्त दिला तरी काम चोख असते. चार पैसे जास्त गेले तरी चालतात पण वेळेत काम पूर्ण होते आणि बाजारात पत टिकून राहते. युरोपात निर्यात करण्याचे नियम आणि वक्तशीरपणा कडक आहे तेथे चालढकल चालत नाही. आज त्याने मुंबईत हातमोजे बनवण्याचे तीन कारखाने चालू केले आहेत. जर अशी "वस्तुस्थिती" असेल तर कोण आपला कारखाना मुंबईच्या बाहेर घेऊन जाईल?
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sun, 12/13/2015 - 16:37

In reply to धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर by सुबोध खरे

Permalink

सवलती सरकारने द्यायच्या असतात

सवलती सरकारने द्यायच्या असतात. तुम्ही दिलेले कामचुकार कामगारांचे उदाहरण एखादे उदाहरण बरोबर असेल ह्याचा अर्थ तिथले सर्वच तसे आहेत असे समजणे चुकीचे आहे. अतिशय कष्ट करणारे लोक तिथेही पाहीलेले आहेत आणि कामचुकार लोक मुंबईत ही पाहीलेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 12/14/2015 - 19:22

In reply to सवलती सरकारने द्यायच्या असतात by मराठी_माणूस

Permalink

कदाचित मुंबईत बदली कामगारांची

कदाचित मुंबईत बदली कामगारांची उपलब्धता जास्त असल्याने तिथे तू नही तो कोई और सही हा पर्याय कारखाना मालकाला नेहेमीच उपलब्ध असावा जो कदाचित नाशिक सारख्या शहरात तितकासा नसावा. सोलापूरात ( डॉ.साहेब सोलापूरातलेही एखादे माहीतीतले उदाहरण असले तर होऊन जाऊ दे. ;)) एका फाऊंड्री मध्ये काम करत असताना पाहीले कि स्गळे कामगार हे कन्नडभाषिक व कर्नाटकमधल्या बॉर्डर वर असलेल्या आसपासच्या खेड्यामधले होते. असे का ह्याची चौकशी केली असता समजले कि मूळचे सोलापूरातले कामगार हे पाट्या टाकणारे व शुक्रवारी हमखास भागवत चौकातल्या एखाद्या थिएटरात हजेरी लावणारे असत त्यामुळे मूळ सोलापूरातले कामगार नकोच हा एक अलिखित नियम व्यवस्थापनाने केला. ( चांगली चाललेली शिवाजी फाऊंड्री एकाएकी बंद पडली ह्यामागे असेच काही तत्सम कारण होते असे ऐकण्यात आले.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 12/14/2015 - 19:49

In reply to कदाचित मुंबईत बदली कामगारांची by कानडाऊ योगेशु

Permalink

बरोबर आहे योगेशराव.

बरोबर आहे योगेशराव. शिवशाही (शिवाजी फाऊंड्री) बंद पडली त्याला ते प्रमुख कारण होते. सरसकटीकरण नाही पण सोलापूरांच्या नेहमीच्या बोलण्यात हेच वाक्य येते की कामगारांच्या माजोर्डेपणाने अन नेत्यांच्या कळलावे पणाने कित्येक उद्योग सोलापुरातून उठले. सध्या बर्‍या चाललेल्या उद्योगात सुध्दा आंध्र, कर्नाटक किंवा लातूर उस्मानाबादच्या कामगारांची भरती जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 12/12/2015 - 19:17

Permalink

खरेजी,

खरेजी, तुम्ही जे सारखे जिचकारांचे वक्तव्य इथे चिकटवताय ते तुम्हाला पटते म्हणून. तुम्हाला न पटणारे पण स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असणार्‍या अनेक अभ्यासू व्यक्तींचेही अहवाल आहेत. त्यांच्या बर्‍याच अभ्यासपूर्ण निबंधांचे दाखले देता येतील. जिचकार स्वतंत्र विदर्भवादी असते तर तुम्ही 'ते जिचकारांनी म्हटलंय ना, मग बरोबरच असेल' असे केले असते का? तुमच्या दोन प्रतिसादांमधून तुमची विधाने घेतोय. तुम्हाला मुंबईचा फक्त पैसा दिसतो. मुंबईचे अविरत कष्ट दिसत नाहीत. २६ जुलै च्या महा प्रलयानंतर मुंबई २७ जुलैला परत आपल्या पायावर उभी राहिली. कुणाच्या प्याकेजची वाट न पाहता. वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत. कष्टामुळे मुंबईत पैसा येतो.मुंबईत "भारतभरातून" कष्ट करण्याची तयारी असणारी माणसे येतात यात विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश बिहार सुद्धा येतात. ते कष्ट करतात आणी पैसा कमावतात. हि मुंबईची संस्कृती आहे. त्याचा दुश्वास का? या गोष्टी गेल्या १५-२० वर्षातील आहेत. मुंबईची प्रगती गेल्या १०० वर्षातील आहे. तुम्ही म्हणताय तुम्ही विधान गमतीत केलंय पण तसं भासलं नाही कारण 'मुंबईचा पैसा कोणाला देणार नाही' ही भावना निव्वळ नर्मविनोदातून येऊ शकत नाही असं वाटतं. तसे नसेल तर ठिक आहे. मुंबई कोण व्यक्ती आहे धीरुभाई सारखी? नाही. ते एक अत्यंत दुर्लक्षित ठिकाण होते. मुंबईचा विकास इंग्रजांनी केला. मुंबई एक बंदर म्हणून विकसित केले. तीच्या भौगोलिक ठिकाणाचा आणि नैसर्गिक बंदर असण्याचा फायदा घेत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस उपलब्ध केले. बंदराच्या आसपास सोयीचे म्हणून जवळच राहणार्‍या गुजरात्यांनी कारखाने उभे केले. कारखान्यात लोक लागतात म्हणून भारतातून लोक यायला लागले. मुंबईच्या विकासामागे आधी सुविधा उपलब्ध होत गेल्या हे तुम्ही नाकारू शकणार नाही. भारतातून प्रत्येकजण जेव्हा मुंबईत कर्मभूमी म्हणून पाय ठेवतो तेव्हा त्याला मुंबईची नव्हे, स्वतःची भरभराट करायची असते. त्याला विश्वास असतो मुंबईत 'काही ना काही तर होऊनच जाईल'. त्याला हा विश्वास का आहे? कारण इथे सोयीसुविधा आहेत. इथे उद्योगधंदे आहेत, इथे एक स्वस्थ आणि प्रगतिशील अर्थव्यवस्था आहे. हे सर्व 'आहे.' खास निर्माण केलेलं आहे. तुम्ही जेव्हा भारतातून कष्टाळू लोक मुंबईत येतात ह्याचे उदाहरण देता तेव्हाच दुसर्‍या अर्थाने हे पण कबूल करता की त्यांना त्यांच्या मातीत त्यांची कर्तबगारी सिद्ध करायला वातावरण ते नाही जे मुंबईत सहज उपलब्ध आहे. तुम्ही तुमचे आणी भावाचे उदाहरण दिले. तुमच्या भावाचे तीन कारखाने आहेत म्हणताय. हे तीन कारखाने त्याने तेवढेच कष्ट करून तुमच्या मूळ गावी उभे करणे शक्य होते का? मी तुमच्या भावाचे व तुमच्या कष्टाला अजिबात कमी लेखत नाही, फक्त एक गोष्ट ध्यानात आणून देऊ इच्छितो की नुसते कष्ट उपयोगाचे नाहीत ते तुम्ही कुठे करता आहात तेही महत्त्वाचे. तुम्हाला कष्ट करायला योग्य ते वातावरण मुंबईत मिळाले. तेच वातावरण विदर्भात मिळत असेल तर विदर्भातली जी कष्टकरी, होतकरू, हुशार मंडळी आहेत ती का बरे विदर्भ सोडून इकडे तडमडायला येतील? वाळ्याचे तट्टे लावून संत्री खात पडून असतात हे विधान भलेही पुलंनी गंमतीत लिहले असेल म्हणून विदर्भातले लोक आळशी आहेत असे म्हणण्याचा कोणालाही अधिकार प्राप्त होत नाही. वाळ्याचे तट्टे लावून संत्री आयती तोंडात द्यायला मुंबई कष्ट उपसते का विदर्भासाठी? आपला मुद्दा पडू नये म्हणून काहीही बोलायचे हे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि हजार जागी फिरलेल्या माणसाला शोभत नाही. आपल्याकडून तरी इतक्या हलक्या दर्जाच्या टिप्पणीची अपेक्षा नव्हती. दुसरा मुद्दा पॅकेजबद्दलचा. बहुतेक आपण शेतकर्‍यांच्या दुष्काळी पॅकेजेसबद्दल बोलत आहात. आता त्याचं असं आहे की शेतीसाठी मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात कसूर करणार्‍या राज्यकर्त्यांना त्यांची नामुष्की आणि कामचोरपणा झाकण्यासाठी हे पॅकेज देतात. त्यात शेतकरी/वैदर्भीय आळशी, त्यांना बसून खायला पाहिजे अशी भावना आपण ठेवत असाल तर जरा दोन महिने विदर्भात फिरावे सुटी काढून तेही जून-जुलै महिन्यात अशी विनंती आपणास करतो. तुमच्यापर्यंत बातम्यांतून जे पोचतं वा पोचवलं जातं ह्यापेक्षाही वेगळं जग आहे, त्याला त्याच्या समस्या आहेत. पॅकेजेसमुळे शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाहीत, राज्यकर्त्यांचे सुटतात हे भान आपण बोलत असतांना ठेवायला हवे. मुंबईसारखी शहरे एका दिवसात तयार होत नाहीत. अनेक वर्षांचे, पिढ्यांचे नियोजनबद्ध कष्ट लागतात. इंग्रजांपासून ते सुरू झाले. स्वतंत्र भारतात हैदराबाद, बेन्गलोर सोडले तर असे कुठले शहर आहे काय जे स्वतंत्रपणे विकसित झाले? सव्वाशे कोटीच्या भारतात अशी शहरे इन मीन चार-पाच आहेत जिथे गेल्यावर होतकरूस 'काही ना काही तर होऊनच जाईल' ह्याचा विश्वास असतो. त्यातले विदर्भात एकही नाही. मुंबईच्या बाबतीत मला कधीही आकस नव्हता, नसेल कारण काही वर्षे तीच माझ्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी होती. आजही मी तिथे राहिलो असतो तरी मला कशाचीही ददात नसती. मी नाशिकमधे आलो. मला इथे कोणीही ओळखत नव्हते. पण गेल्या दोन-तीन वर्षात मी बर्‍यापैकी जम बसवला आहे. मला इथे उज्ज्वल भविष्य आहे हे जाणवतंय, त्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट घेतोय. हे का? तर इथे ते वातावरण आहे. काही ना काही तर होऊनच जाईल असा विश्वास आहे. इथे शेती आहे, उद्योगधंदे आहेत, सरकारी आस्थापने आहेत. नाशिक जगातल्या सर्वात प्रगतीशील अशा तीस शहरांमधे गणले जाते. इथे प्रचंड काम आहे, मोबदला देणारेही आहेत. हे सर्व माझ्या मूळ गावी असते तर मी इथे-तिथे कुठेच न थांबता सरळ गावी जाऊन हेच उद्योग केले असते. नाशिकमधे सरकारकडून बर्‍याच गोष्टी पुरवल्या गेल्या. मुंबई जवळ असल्याने अनेक उद्योगधंदे इकडे आले, पाण्याची सोय झाल्याने शेती बहरली, सरकारी आस्थापनांमुळे अनेक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. एक स्वस्थ आणि प्रगतिशील अर्थव्यवस्था इथेही उभी राहते आहे. याला कारण शासकिय स्तरावर घेतले गेलेले अनेक निर्णय व त्यांची यशस्वीपणे झालेली अंमलबजावणी. प्रगती हे एक चक्र आहे. त्याला आधी धक्का द्यावा लागतो, पैशाचा आणि मूलभूत सोयींच्या विकासाचा, शिक्षणाचा, प्रोत्साहनाचा. पुढे लोक ह्या उपलब्ध व्यवस्थेचा फायदा घेऊन अधिक संपत्ती निर्माण करतात, त्यातून अधिक सुविधा निर्माण होतात. हे चक्र चालूच राहते. विदर्भाच्या बाबतीत असे चक्र कधीच फिरले नाही. म्हणून समस्त विदर्भाला आळशी म्हणून हिणवणे हे अतिशय इल्-इन्फॉर्म्ड असण्याचे लक्षण आहे. "because toiling is not in our blood", जिचकारांनी असे म्हटले खरे, पण पुण्या-मुंबईत आणि इतर ठिकाणी असणारी वैदर्भिय लोकांची गर्दी बघता हे कितपत खरे आहे हे सुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. जर आमच्या रक्तातच कष्ट करणे नसेल तर मग हे मुंबै-पुण्यात अविरत कष्ट उपसायला 'लग्जर्‍या' (खाजगी प्रवासी बससाठीचा खास विदर्भातला शब्द) भरभरून येणारी मंडळी कोणत्या रक्ताची आहेत? उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी वा कुठल्याच व्यवसायासाठी विदर्भात काहीच नाही, त्यामुळे लोक स्थलांतर करत आहेत. ह्या स्थलांतराचे आकडे चिंताजनक आहेत. ह्या सगळ्या स्थलांतरीत आळशी लोकांना इतर कष्टकरी असलेली शहरे फुकट पोसत असतील असे वाटत तर नाही. त्यामुळे विधान करण्याआधी आपण (किंवा जिचकारांनी) सारासार विचार करायला हवा होता असे वाटते. मुंबईचा पैसा हा फक्त मुंबईचा पैसा नाही. मुळात 'हे' मुंबईचे, 'ते' विदर्भाचे असे मी तरी कधी करत नाही. कुठलंही उत्पादन हा सगळ्यांचा कलेक्टीव प्रयत्न असतो. त्यात मी मोठा तू छोटा असे काहीच नसते. पण अवघं आयुष्य मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेलेल्यांना असलं काही समजत नाही. त्यांना विदर्भ म्हणजे कुठलातरी अतिमागास, आदिवासी, बुद्धीने आणि पैशाने गरिब असा कुठला तरी प्रांत वाटत असतो. जसा आपल्याला आफ्रिका खंड वैगेरे वाटतो तसा. त्या समजातून मग काहीबाही टोमणे मारले जातात. ते पटत नाहीत. जसा मुंबईचा राज्याच्या साधनसामुग्रीवर अधिकार आहे तसाच राज्याचा मुंबईच्या कमाईवर अधिकार आहे. इथे हृदय रक्तपुरवठा करतं म्हणून जास्त भाव खायची गरज नाही कि आतडं रक्त बनवतं म्हणून ऐट करायची आवश्यकता नाही. मुंबई २७ जुलैला प्याकेजची वाट न पाहता उभी राहीली याचे आपल्याला कौतुक असावे, त्यात गैर काहीच नाही. पण ही मुंबईची दुखणी आहेत. इथे गळेकापू स्पर्धा आहे. इथे तुम्ही उभे राहिला नाहीत तर दुसरा उभा आहेच तुमच्या जागेवर तुमच्यापेक्षा कमी पैशात काम करायला. व्यवसायाच्या संधी आहेत तसे प्रचंड ताणही आहेत. इथे तुम्ही उभे नाही राहिलात तर असे कोसळाल की परत उभे राहायला काहीच राहणार नाही. आज मुंबईचे पाणी मुंबईत नाही. जिथून मुंबईसाठी पाणी येते तिथली गावे तहानलेली आहेत, जिथून वीज येते तिथलेच उद्योगधंदे विजेविना खोळंबलेले आहेत. टँकर आला म्हणून चेंगराचेंगरीतून मरणे, आणि फक्त एक तास लाईट असते तेव्हाच धान्य दळून घेण्यासाठीची तारांबळ हे मुंबईकरांनी अनुभवलेली नसते. साधं प्यायला पाणी नाही. गावागावातून विजेवर चालणार्‍या गिरण्या थंड पडल्यात, लोकांच्या पोटाला वेळेवर घास लाभत नाही. ही परिस्थिती भयानक आहे. विदर्भातले लोक फार सहनशील आहेत. खूप समजून घेतात. म्हणून अनुशेषाचा डोंगर उभा राहिला. आम्ही अजूनही समजूनच घेत आहोत. मार्ग अनेक आहेत, विदर्भाच्या विकासाचे. कोणतेही एक उत्तर बरोबर नाही. सर्व पातळींवर सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. शिक्षणापासून शेती, उद्योगधंद्यापर्यंत आमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. तेवढे झाले तर वेगळ्या विदर्भाची गरज तशी राहणार नाही. एकत्र राहून हे होत नसेल तर वेगळं होण्याशिवाय पर्याय नाही. काही लोक फार भावनिक होऊन 'शिवाजींचा महाराष्ट्र तोडू देणार नाही', किंवा 'देऊन टाका एकदाचा आणि गप्प बसवा' ह्या टैपची विधाने करतात. ह्यातून सरंजामी मानसिकता दिसून येते. जणू विदर्भ ह्या लोकांच्या तुकड्यावर जगतोय. ह्या लोकांनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधाचा उंटावरून शेळ्या हाकलण्याचा उद्योग करण्याऐवजी जरा विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केले तर बरे होईल. विदर्भच कशाला, मराठवाडाही विकसित झाला पाहिजे आणि जव्हार, मोखाडाही. स्वतंत्र भारतात कुणीही वंचित राहू नये असे माझे मत आहे मग ते एकत्र असो वा विभक्त. ही मुंबईची संस्कृती आहे. याला मुंबई पैशाच्या मागे लागली आहे असेही हिणवले जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कामे करतात.ज्यांना जळायचे आहे ते जळत राहतात आणी कामे न करण्याची कारणे देत राहतात. ज्यांना काम करायचे आहे असे अनेक प्रगतीशील शेतकरी, उद्योजक महाराष्ट्रात सर्वत्र दिसतील पण त्यांचा आदर्श ठेवून कष्ट करण्याऐवजी दुसर्याचा मत्सर करणे सोपे आहे. ह्या विधानांमागचा आपला रोख कळला नाही. कोण जळतंय वा मत्सर करतंय? मुंबई-विदर्भाबद्दल बोलतांना आपण तो विकासाच्या असमतोलाचा 'राजकिय' प्रश्न आहे असं विसरून गेलात काय? कारण सगळी उदाहरणे आपण व्यक्तिगत विकासाबद्दल देत आहात. धागा राजकिय दुर्लक्षामुळे विदर्भावर झालेल्या विकासाच्या अनुशेषाबद्दल आहे. आणी विदर्भ ही एक व्यक्ती नसून मुंबईसारखाच एक प्रांत आहे. प्रांताला स्वभाव-गुण असतात काय? मीही नेहमी पोपटराव पवारांचे उदाहरण देतो. की त्यांच्या गावात बारामहिने पाणी आणि आजूबाजूची गावांची पाण्यासाठी भटकंती असते. जर गावांच्या एका मोठ्या विभागासाठी मंजूर झालेली रक्कम, तंत्रज्ञान, शासकिय मदत-प्रशिक्षण पवारांनी फक्त स्वतःच्या गावासाठीच वापरली असती आणि आजुबाजुच्या गावांच्या तोंडाला पाने पुसून वर तुम्हीच आळशी आहात, तुम्हाला कष्ट नकोत म्हणून हिणवले असते तर मी पोपटरावांचे उदाहरण दुसर्‍या कारणासाठी दिले असते. विदर्भाचे कष्ट चालूच आहेत. तिथे लोक बसून कोण संत्री तोंडात टाकेल त्याची वाट बघत उपाशी बसलेले नाहीत. पण त्यांचे कष्ट सध्या सर्वायवलसाठीच चालू आहेत. हे जर राज्यकर्त्यांनी ध्यानात घेतले तर मुंबैला मागे पाडेन असा विदर्भ उभा राहिल. पण आधी समस्या समजून घेतली पाहिजे, मग उपाय. ते तर काही होतांना दिसत नाही. फक्त निरर्थक टोमणेबाजी होतांना दिसते. ती का होते काय माहित? असो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/14/2015 - 17:30

In reply to खरेजी, by संदीप डांगे

Permalink

प्रदीर्घ आणि संयमित प्रतिसाद..

धन्यवाद, डांगेसाहेब.. अत्यंत समतोल, संयमित प्रतिसाद..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 21:08

Permalink

मी भारतभर फिरलो तेंव्हा एक

मी भारतभर फिरलो तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली उत्तरप्रदेशातील भय्ये ज्यांना कष्ट करायचे आहेत तेच मुंबईत येतात नाहीतर खैनी खात राजकारणावर गप्पा हाणत बसलेले भय्ये अख्या उत्तर प्रदेशात दिसून येतात. मुंबईतील माणूस हा सर्व देशातून कष्टाची तयारी असलेलाच येतो अन्यथा मुंबईतून परत जाणारी काम न करण्याची इच्छा असणारी माणसे कमी नाहीत. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हि वृत्ती असलेली माणसे मुंबईत टिकत नाहीत. काही ना काही तर होऊनच जाईल' ह्याचा विश्वास असतो. त्यातले विदर्भात एकही नाही. हेच मी म्हणतो "नागपूर" का नाही? हे जर राज्यकर्त्यांनी ध्यानात घेतले तर मुंबैला मागे पाडेन असा विदर्भ उभा राहिल.कोणत्या राज्यकर्त्याने मुंबईसाठी कधी काही केलं आहे हो? नुसते गहिवर काढता मुंबईतील झोपड्या कमी करण्यासाठी कि लोकल ची गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या राजकारण्याने काही केले आहे? जे काही करायचे आहे ते दुसर्याने आणी (ते सुद्धा राजकारण्यांनी) हा अविर्भाव कशा साठी? "जिथून वीज येते तिथलेच उद्योगधंदे विजेविना खोळंबलेले आहेत".महाराष्ट्रात जेथे जेथे पैसे भरले जातात तेथे उद्योग्धन्द्याला पुरेशी वीज उपलब्ध आहे. एकेकाळी आकडे टाकून फुकट वीज घेणारे शहर भिवंडी येथे आता ९७ % बिलाचे पैसे भरले जातात आणि तेथे २४ तास वीज उपलब्ध आहे. हा भिवंडी प्याटर्न म्हणून ओळखला जातो "जिथून मुंबईसाठी पाणी येते तिथली गावे तहानलेली आहेत" हि वस्तुस्थिती अजिबात नाही. तानसा वैतरणा हि धरणे मुंबई महापालिकेने स्वतःच्या खर्चाने बांधली आहेत तेथिल गावात भरपूर पाणी उपलब्ध आहे किंवा पवई विहार आणि तुळशी हे तलाव (हे तर मुंबईतच आहेत) या च्या काठावरची गावे तहानलेली आहेत हे विधान निखालस खोटे आहे. कोणत्या आधारावर आपण अशी बेजबाबदार विधाने करता? असेच विधान विदर्भाच्या अतिरिक्त विजेबाबत आपण करता. प्रत्यक्षात वस्तुस्थिती निदर्शनास आणली असताना आपण मेगाबायटी प्रतिसाद देता "मुंबईचा राज्याच्या साधनसामुग्रीवर अधिकार आहे" मग मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.हे आपले विधान आणि त्या नन्तर तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना ….हे विधान कशाचे द्योतक आहे. जेंव्हा सज्जड पुराव्यासकट सांगितले कि विदर्भाच्या विजेवाचून मुंबईचे काहीही अडणार नाही तेंव्हा आपण गहिवर काढता. विदर्भात वातावरण निर्मिती करायला पाहिजे. ती कोणी करायची? मुंबईने कि पश्चिम महाराष्ट्र वा कोकणातील माणसांनी? मुंबई कष्ट उपसते का विदर्भासाठी? मुंबई स्वतःसाठी कष्ट उपसते.जगात कोणीही कुणाचे नसते हे समजून घ्या. ऐट करायची, टेचात असायचे, माज दाखवायचा हे शब्द कोणाच्या प्रतिसादात आहेत हे जर परत एकदा वाचून घ्या. जमले तर मी दिलेले सर्व दुवे सुद्धा परत वाचून घ्या. फक्त एक तास लाईट असते तेव्हाच धान्य दळून घेण्यासाठीची तारांबळ हे मुंबईकरांनी अनुभवलेली नसते अशा तर्हेची सारी रडगाणी तुम्ही गाता. मुंबईतील माणूस रोज दोन ते तीन तास लोंबकळत जीव मुठीत धरून लोकलने कामावर जातो ते काय आनंदाने गाणी गात का? थोडी थोडकी नव्हे तर ६५ लाख लोक रोज असे भाकरीसाठी प्रवास करतात त्यांचे कष्ट तुम्हाला दिसत नाहीत? बारा तास घरापासून लांब जातात त्यांचे कष्ट दिसत नाहीत? कि आयुष्यभर कष्ट करून एक डोक्यावर जेमतेम छप्पर असलेले घर मिळवताना काढलेल्या त्याच्या कष्टाची तुम्हाला किंमत नाही? मुंबईकर आपले रडगाणे लोकात रडत राहत नाही कि जालावर गहिवर टाकत नाही. कधी प्याकेजसाठी आंदोलने करीत नाही.तुमच्या सारखे लोक रडारड करताना डोक्यात जातात. स्पष्ट शब्दात सांगतो कष्ट करायची तयारी असेल तर या मुंबईत. नुसती रडारड करायची असेल तर राहा आपल्या गावात. मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी तो झारखंड किंवा बिहार च्याच मार्गावर जाईल यात मला मुळीच शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 12/12/2015 - 21:39

In reply to मी भारतभर फिरलो तेंव्हा एक by सुबोध खरे

Permalink

नीट न वाचताच दिला का प्रतिसाद

नीट न वाचताच दिला का प्रतिसाद..? असो. तुमचे मत बरोबरच आहे. विदर्भातली सगळी जनता आळशीच आहे. धन्यवाद! माझ्याकडून चर्चेस पूर्णविराम.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 07:45

In reply to नीट न वाचताच दिला का प्रतिसाद by संदीप डांगे

Permalink

LOL

LOL
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/13/2015 - 19:26

In reply to LOL by सुबोध खरे

Permalink

ळॉळ करणे सोपे आहे डॉक्टरसाहेब

ळॉळ करणे सोपे आहे डॉक्टरसाहेब, मुद्दा पकडून चर्चा करणे कठिण आहे. विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या राजकिय अन्यायाच्या धाग्यात आपण वैयक्तिक विकासाच्या कारणांचा उहापोह करत आहात, यातच आपल्याला खरोखर चर्चेत रस आहे की वितंडवादात हे लक्षात आले. जमत असेल तर ह्या दुव्यावरची ताजी आकडेवारी बघून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 20:55

In reply to ळॉळ करणे सोपे आहे डॉक्टरसाहेब by संदीप डांगे

Permalink

m.timesofindia.com/india

m.timesofindia.com/india/Wrong-method-used-to-calculate-Vidarbha-Marathwada-backlog/articleshow/46328013.cms
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/13/2015 - 21:26

In reply to m.timesofindia.com/india by सुबोध खरे

Permalink

पेस्टायच्या आधी वाचून तर

पेस्टायच्या आधी वाचून तर घ्यायचं ना डॉक, बातमीत म्हटलंय की समित्यांनी अनुशेषाचे गणित चुकिच्या गृहितकांच्या आधारावर मांडलंय. विदर्भाच्या बाबतीत अन्याय झाला नाही असे त्यांचे म्हणणे नाही. समित्यांनी जे मांडले त्याआधारे विदर्भ मराठवाड्यांचा अनुशेष दूर करणे पुढच्या ६५-७० वर्षात शक्य होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. माझे इंग्रजी कच्चे असेल तर कोणीही जाणत्यांनी खालचा उतारा भाषांतरीत करावा: The use of incorrect methodology to remove backlog was the reason Vidarbha and Marathwada are still backward even after so many years. It was sad that Dandekar, himself being a statistician, had adopted a wrong method, which he realized later. It's not proper to tell the people from backward regions to wait till another 65-70 years for making amends. Their focus on government funds was their biggest drawback," Apte said. Earlier, Deshpande made a detailed presentation on Kelkar report and briefed on its terms of reference and also how they arrived on various recommendations. He further explained how Vidarbha and Marathwada regions remained backward due to various factors like inadequate flow of private investments, low level governance and low human development index (HDI)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 21:28

In reply to m.timesofindia.com/india by सुबोध खरे

Permalink

Agricultural consumers, who

Agricultural consumers, who are charged tariffs largely based on the installed horse power (HP) capacity of their pumps, also account for the largest chunk of the MahaVitaran's Rs 12,000 crore pending dues. They also heavily cross-subsidised by the utility's other classes of consumers like industrial and commercial users.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/13/2015 - 22:06

In reply to Agricultural consumers, who by सुबोध खरे

Permalink

ही वृत्तपत्रीय इंग्रजी समजत

ही वृत्तपत्रीय इंग्रजी समजत नाही हो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 22:19

In reply to ही वृत्तपत्रीय इंग्रजी समजत by संदीप डांगे

Permalink

12000कोटी रुपयै शेती पंपाची

12000कोटी रुपयै शेती पंपाची वीज थकबाकी आहे. 8 कोटी लोलोकसंख्येच्या महाराष्ट्रात माणशी 1500 रुपये शेतीच्या विजेसाठी देउनही यांची रडारड.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/13/2015 - 22:26

In reply to 12000कोटी रुपयै शेती पंपाची by सुबोध खरे

Permalink

सदर आकडेवारी संपूर्ण

सदर आकडेवारी संपूर्ण महाराष्ट्राची आहे. ह्यात विशिष्टपणे विदर्भाच्या शेतकर्‍यांची आकडेवारी आहे काय? तसेच बातमीचा संदर्भही तपासून पाहावा अशी विनंती करतो. कुणावर रडारडीचा आरोप करण्याआधी नक्की परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा जवळ असलेला बरा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 22:57

In reply to सदर आकडेवारी संपूर्ण by संदीप डांगे

Permalink

https://www.google.co.in/url

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.iwmi.cgiar.org/iwmi-tata/PDFs/2012_Highlight-29.pdf&ved=0ahUKEwjil9u6qtnJAhUPkI4KHXTlCbgQFggsMAU&usg=AFQjCNEiFLQk2R8NlzpiRd6a9zqCKspmMQ
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 23:08

In reply to https://www.google.co.in/url by सुबोध खरे

Permalink

सौराष्ट्र पुढे का गेले आणि

सौराष्ट्र पुढे का गेले आणि वैविदर्भ् का मागासलेले दोघांची भौगोलिक परिस्थिती एक असताना याचा तौतौलनिक अभ्यास आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/13/2015 - 23:26

In reply to सौराष्ट्र पुढे का गेले आणि by सुबोध खरे

Permalink

इथेही आपण नीट वाचलेले दिसत

इथेही आपण नीट वाचलेले दिसत नाही. सौराष्ट्र पुढे जाण्यात गुजरात सरकारचा भक्कम पाठिंबा आणि कर्तव्यतत्परता आहे हे ह्या अहवालात स्पष्टपणे लिहिलेले आहे. काश अशीच धडाडी महाराष्ट्र सरकारने दाखवली तर विदर्भ कशाला मागे राहिल? Vidarbha's agrarian stagnation and resultant stress on its farmers showing up in high suicide rates has been explained in terms of six 'growth depressants' which are so hard to change in quick time that Vidarbha's agriculture appeared condemned to stagnation for a long time. The failure of all manner of 'special packages' designed to jumpstart Vidarbha's agriculture gave added credence to this swansong. However, accelerated growth of agriculture in Saurashtra, which suffered even more than Vidarbha from the six 'growth depressants', raises new questions about this received wisdom about what ails Vidarbha's agriculture. This Highlight has argued that Saurashtra's success has been aided by a succession of good monsoons but is crafted by a pragmatic and proactive governance of its agricultural economy. Government actions that have played a strong catalytic role in Saurashtra include: [a] explicit and sensible support to community based water harvesting and groundwater recharge movement; [b] Jyotigram and a policy of supplying an 8 hour ration of quality power supply to agriculture; [c] annual organization of Krishi Mahotsav; [d] allowing private Bt cotton seed producers to flourish even in violation of national policy; [e] controlling Bt cotton seed prices to affordable levels, when central government batted for seed multinationals; [f] later allowing Bt cotton seed prices to rise as Gujarat farmers emerged as major seed suppliers to other states; [g] handing over government dairies to NDDB to operate; and liberalizing the APMC act to free farmers to sell their produce direct to processors. Here was an administration that was pro-farmer in a steadfast and opportunistic way. All these have opened up new economic opportunities in agriculture; and the Saurashtra farmer has responded in full measure. Many of these policy actions are readily replicable in Vidarbha, and there seems no reason to believe that Vidarbha farmer will respond differently from Saurashtra farmer.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 12/14/2015 - 00:18

In reply to इथेही आपण नीट वाचलेले दिसत by संदीप डांगे

Permalink

डांगे साहेब

डांगे साहेब मी डॉक्टर आहे. शेती तज्ञ नाही. राजकारणी हि नाही. पण जी प्रत्यक्ष परिस्थिती पहिली त्याबद्दल मला काही वाटते ते लिहायचे होते. लोकांच्या भावना चेतव्ल्याशिवाय ते तुमच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत. आपण हा तौलनिक अभ्यास केला तर आपल्याला जाणवते कि सौराष्ट्रात हीच किंबहुना विदर्भापेक्षा वाईट परिस्थिती होती. पण तेथील लोकांनी आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या सरकारने काय करून दाखवले ते आपणाला आता लक्षात येत आहे. "अच्छे दिन "हेच आहेत. पण एकदा माणसे द्वेषाने आंधळी झाली कि त्यांना चांगल्या गोष्टी दिसेनाशा होतात. विदर्भातील लोकांची मनोवृत्ती कोन्ग्रेस सरकारने "असेल माझा हरी" अशी करून ठेवलेली आहे. सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत हि मनोवृत्ती जोवर विदर्भातील माणसे सोडत नाहीत तोवर विदर्भाचा विकास होणे कठीण आहे . आपल्या कल्याणकारी सरकारने गेल्या वीस वर्षात काय केले आहे ते या दुव्यात स्पष्ट आहे. "दुर्दैवाची गोष्ट अशी कि विदर्भाचा अनुशेष म्हणजे विजेचे पंप हेच टुमणे धरून आजचेही विदर्भाचे नेते बसले आहेत." पंप नुसते दिले तरी मुळात जमिनीतील पाणी वाढवण्याचे किंवा दुसरी पिके घेण्याचे कोणीच बोलत नाही. शेतकरी/ सहकारी संघ स्थापन करून दुग्धविकास किंवा पूरक जोडधंदे निर्माण करू असे कोणीही म्हणत नाही. ज्या गोष्टी पवार साहेबांनी केल्या उदा. कोरडवाहू जमिनीत डाळिंबे किंवा बोरांची शेती केली किंवा पश्चिम महाराष्ट्रात सहकारी दुध संघ निर्माण केले ( सरकारच्या पाठीम्ब्याविना) असे विदर्भात झाले नाही. त्यामुळे जोवर विदर्भातील माणसे " मी" काहीतरी करून दाखवेन हे म्हणत नाही तोवर त्यांचा विकास होणे नाही. नाव घ्यावे असा एकही नेता विदर्भात आजमितीला( निदान माझ्या अल्प मतीप्रमाणे) नाही.( तुलना मोदी साहेबांशी करण्याचा मोह होतो आहे पण काही लोकांचा पापड मोडेल). या तुलनेत विदर्भातील माणसे थोडीशी आळशी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. तेंव्हा त्यांनी स्वतः उद्योगशीलता दाखविली तर आणि तरच विकास होईल. अन्यथा वेगळा विदर्भ काढा काहीही होणार नाही. आजच्या ऐवजी नवे राज्यकरते येतील आणि तेच गब्बर होतील आणि विदर्भ आहे तसाच राहील. जसे विदर्भाचे प्रश्न आहेत तसेच मुंबईचे हि आहेत. पण मिपा वर मुंबईचे प्रश्न कधीही विचारात घेतले गेले नाहीत कि कोणी पुढे आणले नाहीत. कारण मुंबईच्या माणसाला माहित आहे कि प्रश्न स्वतःला सोडवावे लागतात. जवळून रोज पाहत आल्याने सरकार काहीही करणार नाही हे त्याला माहित असते राहिली गोष्ट-- मी जाणून बुजून दुवे असे दिले कि ज्यातून लोक नीट वाचून प्रश्न समजून घेण्यासाठी पुढे येतील. अन्यथा ज्या दुव्यांमुळे तुमचा मुद्दा कमकुवत होईल असे दुवे देऊ नयेत एवढे व्यवहार ज्ञान मला नक्कीच आहे. ( सरकारशी तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिल्यावर एवढे व्यवहार ज्ञान नक्कीच येते). पण येथे मला माझा मुद्दा सरशी करायचा नव्हता तर वस्तुस्थिती लोकांच्या नजरेस आणायची होती आणि जमले तर त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास सुचवायचे होते. EXCHANGE OF KNOWLEDGE IS DISCUSSION ARGUMENT IS EXCHANGE OF IGNORANCE. हे तत्व मला पक्के माहित आहे. या काथ्याकुटात हि वस्तुस्थिती जर मी लोकांच्या नजरेस आणू शकलो तर येथे टंकनात घालवलेला वेळ सार्थकी लागला असे मी समजेन. भावनेच्या भरात, जाणता किंवा अजाणता कुणाचे मन यात दुखावले गेले असेल तर मनापासून क्षमस्व. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता. मी दिलेल्या सर्व गोष्टी या दुव्यांसकट आहेत जिज्ञास्सुनी जरूर त्या पहाव्यात अशी मी त्याना विनंती करेन . धन्यवाद. इति लेखनसीमा सौराष्टाची परिस्थिती मी स्वतः १९८९ पासून पाहत आलो आहे. गेली पाच वर्षे दर वर्षी मी समाजसेवी वैद्यकीय कॅम्पला जात आहे.मृद्संधारण शेती विषयक जागृती या कित्येक गोष्टी मध्ये होणारी तेथील प्रगती मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 12/13/2015 - 22:14

In reply to Agricultural consumers, who by सुबोध खरे

Permalink

हा मजकूर कुठला आहे

मला पहिले वाटलं वरच्या बातमीच्या दुव्यातला असेल. पण तिथे हा मजकूर नाहीये. मोठ्या प्रमाणावर कृषीपंपांचा वापर उसाच्या पिकासाठी केला जातो. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. त्यामुळे हा मुद्दा विदर्भाच्या शेतीबाबत असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/14/2015 - 17:38

In reply to मी भारतभर फिरलो तेंव्हा एक by सुबोध खरे

Permalink

एवढा उद्वेग?

मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी तो झारखंड किंवा बिहार च्याच मार्गावर जाईल यात मला मुळीच शंका नाही.
एवढा उद्वेग? असोच. तसेही बाहेरच्यांना विदर्भ, त्यातल्या त्यात झाडीपट्टी बिहार-झारखंड किंवा त्यापेक्षाही भयंकर वाटते. 'गडचिरोली-चंद्रपूर में डाल दुंगा' ही वाक्ये धमकीसारखी वापरलेली पाहिली आहेत हिंदी चित्रपटांत.. माझ्यामते बिहार-झारखंड काही कचरा नाहीत. त्यांना दिशा मिळाली तर तेही बदलू शकतात, बदलताहेत.. कृपा करुन 'उपकारी' किंवा ;इमोशनल' न होता विदर्भ वेगळा होऊच द्यावा ना मग महाराष्ट्राने. म्हणताय, तशी लायकीच नसेल सडत मरु पण शिव्या तरी नकोत कुणाच्या.. बाकी जिचकारांचे वाक्य प्रमाण मानून बसायची गरज नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 21:14

Permalink

जाता जाता -- आमचे आजोबा

जाता जाता -- आमचे आजोबा मुंबईतून १९२५ साली म्याट्रीक झाले. ते १९०८( जन्मापासून) मुंबईत होते. आमचे वडीलही मुंबईतच आहेत. आम्ही जन्मजात मुंबईकर आहोत. त्यामुळे मूळ गावी गुहागरला (जे आमच्या पणजोबांनी सोडले आणी जेथे आमचे आडनाव बंधू सोडून काहीच शिल्लक नाही) जाऊन उद्योग काढणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 12/14/2015 - 19:27

In reply to जाता जाता -- आमचे आजोबा by सुबोध खरे

Permalink

खरेसाहेब एकदा तुमच्या

खरेसाहेब एकदा तुमच्या नात्यागोत्यातले कोण कोण काय काय करते आहे ह्यावर एक डिट्टेलवार धागा होऊनच जाऊ द्या.! (कृ.ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 12/12/2015 - 21:43

Permalink

वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ

वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 12/12/2015 - 21:43

In reply to वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ by नितिन थत्ते

Permalink

त्यांना तसा वेगळा विदर्भ

त्यांना तसा वेगळा विदर्भ हवासा वाटतो हे कारण पुरेसे असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/12/2015 - 22:55

In reply to त्यांना तसा वेगळा विदर्भ by नितिन थत्ते

Permalink

काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय

काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 12/12/2015 - 23:17

In reply to काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय by सुबोध खरे

Permalink

प्रामाणिक उत्तर हो असे आहे.

प्रामाणिक उत्तर हो असे आहे. [माझ्या हाती सत्ता आली तर मी तसे करणार नाही]. एखाद्या प्रदेशातील लोकांना स्वतंत्र व्हावे असे खरोखर वाटत असेल तर त्यांना स्वतंत्र होऊ न देणे हा "साम्राज्यवाद" ठरतो. कारण मग त्यांना स्वतंत्र होऊ न देण्याचे कारण त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक आणि इतर संपत्तीचा उपभोग (किंवा केवळ ईगो) हेच असू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Sun, 12/13/2015 - 05:09

In reply to प्रामाणिक उत्तर हो असे आहे. by नितिन थत्ते

Permalink

श्सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 12/14/2015 - 06:22

In reply to काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय by सुबोध खरे

Permalink

वेगळे राज्य व वेगळा देश

कश्मीर हे फुटून एक तर वेगळा देश किंवा पाकिस्तानचा हिस्सा बनू पहात आहे. विदर्भ वेगळा झाला तर काही वेगळा देश होणार नाही. तो भारताचा अविभाज्य भागच रहाणार. कुठलाही भारतीय तिथे जाऊन राहू शकतो, व्यापार उद्योगधंदे काढू शकतो. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/14/2015 - 17:39

In reply to वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ by नितिन थत्ते

Permalink

सहमत..

सहमत.. अवांतरः बरेच दिवसांनी आलात, थत्तेकाका..
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Sat, 12/12/2015 - 22:27

Permalink

+१

+१. मुद्द्याचा प्रतिसाद. बाकी चर्चा गरजेची नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Sat, 12/12/2015 - 22:49

Permalink

विदर्भातील बरीच जनता पुणे ,

विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांच्यावर "परप्रांतीय" हा शिक्का बसु शकतो अशी शंका वाटते आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 12/13/2015 - 22:28

Permalink

डॉ विश्वंभर चौधरी यांचा आजचा लेख

दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला डॉ विश्वंभर चौधरी यांचा विदर्भ विवेक हा लेख या विषयावर चर्चा करणार्‍यांसाठी अत्यंत वाचनीय आहे. लेखाचा मजकूर इथे डकवत आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या मुहूर्तावर राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या एका वक्तव्यावरून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित होऊन राजकीय वातावरण तापलं. चर्चेनं असं वळण घेतलं की, जणू काही विदर्भवासी देशाविरुद्ध विद्रोह करून देशाची फाळणीच करू मागत आहेत! विभाजित झाला, तरी विदर्भ भारतातच असणार आहे, हे लक्षात घेऊनच या प्रश्नाची चर्चा केलेली बरी. आणखी एक छोटा मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो हा की, महाधिवक्ता होण्याच्या आधीपासूनच अणे यांची वेगळ्या विदर्भाबाबत ठाम भूमिका आहे. त्यांचे आजोबा हे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या आद्य नेत्यांपैकी एक आदरणीय नेते होते आणि केवळ श्रीहरी अणे हेच नाही तर त्यांच्या तीन पिढ्या किंवा खरं तर विदर्भाच्या तीन पिढ्या ही मागणी करत आहेत, हेही लक्षात ठेवूनच या प्रश्नाची चर्चा व्हावी. चर्चेची सुरुवात करताना ब्रिजलाल बियाणी या अत्यंत व्यवहारी नेत्याचं स्मरण होणं क्रमप्राप्त आहे. संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत विदर्भाचं वेगळं राज्य होतंच. विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात घेण्याचं घाटलं, तेव्हा कै. यशवंतराव चव्हाणांच्या “संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाचा” राजकीय आशय या नेत्याला पुरेपूर कळला होता! बियाणी यांनी असा प्रस्ताव मांडला होता, की संयुक्त महाराष्ट्रात जाऊ नये, त्या ऐवजी विदर्भ-मराठवाडा या प्रांतांचं एक वेगळं राज्य बनवावं. ब्रिजलाल बियाणींचे न ऐकता विदर्भ-मराठवाड्यातील नेत्यांनी मंगलकलशावर हुरळून जाऊन संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय किती चुकला, हे आजच्या शेतकरी आत्महत्या, विकासाचा अनुशेष, पाण्याचं विषम वाटप आणि एकूणच प्रादेशिक असमतोल, यातून स्पष्टच होतं. वि. म. दांडेकर समितीपासून विजय केळकर समितीपर्यंत प्रत्येक समितीनं हा मुद्दा वेळोवेळी ठळक करून दाखवला; तरीही अनुशेष शिल्लक आहे, नव्हे तो वाढतच आहे. संयुक्त कुटुंबात मोठा भाऊ धाकट्यावर अन्याय करतो, तेव्हा आपण वेगळं निघून आपलं स्वत:चं भविष्य घडवावं, असं धाकट्याला वाटणं स्वाभाविक आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचं अधिष्ठान हे असं आहे. हा मुद्दा भावनिक बनवण्याचा प्रयत्न शिवसेना राजकीय सोयीसाठी करत असली, तरी हा आर्थिक मुद्दा आहे, हे अगदी स्पष्ट आहे. भावनिक राजकारणापुढे एखाद्या विभागाचं जगण्याचं अर्थकारण मारून टाकू नये, एवढा विवेक सेनेला कधीच नव्हता. त्यामुळे सेना काय म्हणते ते महत्त्वाचं नसून विदर्भाचे लोक काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे. विदर्भाच्या अस्वस्थतेची समीक्षा कशी करायची? चंद्रपूरचा माणूस चौदा तासांचा प्रवास करून मुंबईत येतो कशासाठी, तर अगदी छोट्या कामासाठी. आल्यावर त्याला मंत्रालयाची वेळ संपली म्हणून रस्त्यावर राहावं लागतं. व्यवस्थेचं केंद्रीकरण एवढं आहे, की प्रत्येक काम राजधानीत आल्यावरच होतं. माझं काम जर राजधानीशिवाय होणारच नसेल तर निदान राजधानी तरी माझ्याजवळ आणा, अशी ही मागणी आहे. शिवसेनेला एवढा अस्मितेचा अटॅक आला असेल तर आत्मपरीक्षण करून स्वत:ला विचारावं की, उन्हातान्हात मंत्रालयाच्या रांगेत उभं राहण्यासाठी १४ तासांचा प्रवास करून आलेल्या विदर्भातील सामान्य माणसासाठी सेनेनं सत्ता होती तेव्हा आणि आता पुन्हा सत्ता आहे तेव्हा काय केलं? विकेंद्रीकरणासाठी काही प्रयत्न केले का? आजही विकेंद्रीकरण करू, हे तोंडदेखलं आश्वासन तरी द्यायला सेना तयार आहे का? सबब, हा मुद्दा सामान्य माणसाच्या सोयीचा आहे, राजकारणाचा नाही, हे महत्त्वाचं आहे. राज्याला जो केंद्राचा निधी मिळतो, त्याचं विषम वाटप होतं. अनुशेष वाढला म्हणून वैधानिक विकास मंडळं आली. सिंचनाच्या निधीवरून असो की रस्त्यांच्या; रस्सीखेच चालू राहिली. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांवर ढकलून चालणार नाही; त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला. मुद्दा असा आहे की, विदर्भ-मराठवाड्याच्या नेत्यांना वैयक्तिक स्वार्थापुढं प्रदेशाचा स्वार्थ दुय्यम वाटला. आज हा युक्तिवाद समोर येतो आणि तो अगदी रास्तच आहे, की विदर्भ-मराठवाड्याला वर्षानुवर्षे नेतृत्व मिळूनही अनुशेष का राहिला? मुद्दा बरोबर आहे, नेते नाकर्ते निघाले हेही मान्य आहे; पण नेते नाकर्ते निघाले म्हणून जनतेला किती दिवस वेठीस धरायचं, याचाही विवेकानं विचार व्हावा. विदर्भ वेगळा झाला की लगेच त्याचा विकास होईल, या भ्रमात कोणीच नाही. किमान केंद्राच्या निधीचा आमच्या हक्काचा वाटा आम्हाला उपलब्ध होईल आणि आम्ही आमचे नियोजन करू शकू, असा त्यांचा मुद्दा आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विशेषत: वन-संपदा मोठी असल्यानं त्यांचं अर्थकारण ते सांभाळू शकतात, असं त्यांना वाटतं. पुण्या-मुंबईच्या विकासाचं मॉडेल तेच नागपूरचं असावं, असा कोणाचा हट्ट असू नये. छोटी राज्य एकूण विकास नियोजन, संसाधनांचं व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन, व्यवस्था विकेंद्रीकरण या दृष्टीनं हिताची असतात. महाराष्ट्राचा आकारमानाच्या दृष्टीनं पसारा एवढा प्रचंड वाढलाय, की मुंबईच्या एकमेव मंत्रालयातून त्यावर नियंत्रण करणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललंय. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या मोठ्या राज्यांचं विभाजन होऊन अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा या नव्या राज्यांची निर्मिती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं विभाजन होत असेल तर काही पाप घडतंय, असं समजण्याचं कारण नाही. शिवसेना जो १०५ हुतात्म्यांचा मुद्दा पुढे करत आहे, तो मुद्दा दिशाभूल करणारा आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले, हे खरं आहे; पण ते मुंबई महाराष्ट्रात राहावी या कारणासाठी, विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात यावेत, यासाठी नाही! दुसरीकडे बेळगाव महाराष्ट्रात यावं, म्हणून सेना वर्षानुवर्षे बोलत आहे; पण त्यावर केंद्र आणि राज्यात सरकारमध्ये असूनसुद्धा काही कृती करताना दिसत नाही. बेळगाव महाराष्ट्रात आणा नाहीतर आम्ही दोन्हीकडून सत्तेतून बाहेर पडू, असा खास मराठी वगैरे ‘बाणा’ आज सेना का दाखवत नाही? की शिवसेनेला हे मुद्दे फक्त राजकारणासाठी वापरायचे आहेत? महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाच्या गरजा वेगळ्या आणि त्या भागाची आर्थिक गरज भागवण्यासाठी लागणारी तरतूदही वेगवेगळी आहे. प्राधान्यक्रम वेगळे आहेत. पुण्या-मुंबईत वाहतूक हा प्राधान्याचा प्रश्न असेल तर विदर्भात कापूस-सोयाबीनच्या शेतीचा प्रश्न प्राधान्याचा आहे. आजच्या नियोजनात माहिती तंत्रज्ञान पुण्या-मुंबईच्या लोकांना गरजेचं वाटत असेल, तर शेती मालावर प्रक्रिया करणारे औद्योगीकरण हा विदर्भ- मराठवाड्याच्या गरजेचा विकासक्रम आहे. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन विशेषत: खनिज संपत्ती अर्थात, खाणींचं व्यवस्थापन आणि वाटप मुंबईतून कधी आणि कसं झालं, ते स्थानिक जनतेला कळतसुद्धा नाही, इतकी मुंबई त्यांच्यासाठी दूर आहे! छोटं राज्य झालं तर स्थानिक लोकांचा जल, जमीन, जंगल, खनिज यांच्या व्यवस्थापनात सहभाग वाढण्याची शक्यता नक्कीच वाढते. प्रशासन जेवढं स्थानिक होत जाईल, तेवढं लोकाभिमुख आणि लोककेंद्री होत जाईल. केंद्र-राज्य व्यवस्थेत हे दोन्ही घटक सक्षम होऊन राहिलेले असून स्थानिक स्वराज्य संस्था हा घटक पूर्णत: या दोहोंवर अवलंबून आहे, असं चित्र दिसतंय. तशा परिस्थितीत छोटी राज्यं अधिक चांगलं प्रशासन राबवू शकतात. शेवटी प्रश्न व्यवस्था किती केंद्रित करून ठेवायची, हाही आहे. म्हणजे व्यवस्था केंद्रित आणि तरीही लोकसहभागाची अपेक्षा, असा हा उफराटा मामला आहे. व्यवस्था विकेंद्रित असेल तरच ती लोकांना सोयीची असेल. आजची व्यवस्था नेत्यांना सोयीची आहे, लोकांना नाही. डॉ. विश्वंभर चौधरी dr.vishwam@gmail.com ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 12/13/2015 - 23:15

In reply to डॉ विश्वंभर चौधरी यांचा आजचा लेख by श्रीरंग_जोशी

Permalink

विदा द्या. भाभावनिक भाषणे

विदा द्या. भाभावनिक भाषणे सोडा.वरचा अभ्यास वाचून घ्या.टाटा आणि जल व्यवस्थापन यांचा,
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 12/14/2015 - 05:56

Permalink

डॉ सुबोध खरे यांचे प्रतिसाद

डॉ सुबोध खरे यांचे या धाग्यावरील प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटले. त्यांचे अभ्यासपूर्ण व अनुभवसिद्ध प्रतिसाद वाचायला मिळणे ही नेहमीच पर्वणी असते परंतु या विषयाच्या बाबतीत सर्वच उलट दिसत आहे. या विषयावर काहीही लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट करतो की मी लिहीत असलेल्या माहितीत काहीही चूक नसेल याची १००% खात्री मी देऊ शकत नाही. याचे कारण असे आहे की या विषयावर वर्षानुवर्षे इतके अनुभवले अन वाचले आहे की वेगवेगळ्या घडामोडींची वा माहितीची सरमिसळ होत असते. परंतु याचा अर्थ असा नाही की मी ठरवून चुकीची माहिती इथे देईन. सर्वप्रथम माझ्या पार्श्वभूमीविषयी. मी जन्माने नागपूरकर अन तसा अमरावतीकर. वयाची पहिली एकवीस वर्षे अमरावती शहर व त्यातल्या काही तालुक्यांच्या ठिकाणी मी जगलो आहे. त्यानंतर एमसीए करण्यासाठी अडीच वर्षे बारामती अन त्यानंतर शेवटच्या सत्रातले इंडस्ट्रियल ट्रेनिंग पासून पुढे नोकरीनिमित्त पुढची साडेतीन वर्षे मी पुण्यात राहिलो आहे. गेली अनेक वर्षे मी अमेरिकेत राहत आहे. माझे अनुभवविश्व फारसे समृद्ध नसले तरी विविध पार्श्वभूमी असलेल्या माणसांशी माझा संबंध येत गेला आहे. एमसीए करताना महाराष्ट्रातल्या सर्व कोपर्‍यांतील तसेच काश्मीर, पंजाब, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, गुजरात इथले माझे सहाध्यायी होते. नोकरीमध्ये भरपूर प्रमाणात दक्षिण भारतीयांशी संबंध आला व येतो. अमेरिकेतल्या वास्तव्यात तर जगातल्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मंडळींशी संबंध येतो. आजवरच्या आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव येऊनही मी कोणत्याच माणसांच्या बाबतीत सरसकटीकरण करू शकणार नाही. सर्वच माणसांमध्ये चांगले व वाईट गुण दिसतात. मूळच्या पुणेकरांबाबत मराठी आंतरजालावर नेहमीच अप्रिय टिप्पण्या केल्या जातात. पण माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात अन तिथे सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करताना मला कधीच वावगा अनुभव आला नाही. इतर ठिकाणची सर्वसामान्य माणसं जशी असतात तशीच पुण्यातली सर्वसामान्य माणसं वाटली. विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषासाठी वैदर्भीय माणसाच्या आळसाला कारण मानणे हे पूर्णतः चुकीचे आहे. डॉ खरेंनी अविरत कष्ट घेऊन स्वतःचे व्यवसाय यशस्वीपणे उभरणार्‍या व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत. अशीच उदाहरणे माझ्या नातेवाईक व ओळखीच्या मंडळींची विदर्भातलीही आहेतच. शून्यातून सुरुवात करून आज यशस्वी उद्योजक बनले असले तरी आजही परिश्रमात कुठली कमी येत नाही. पूर्वी सह्याद्री वाहिनीवर जिद्द नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्यामध्ये शून्यातून यशस्वीपणे उद्योग उभारणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती दाखवल्या जात असत. बी.जी शिर्के अन अमरावतीच्या घरकूल मटण मसालाचे मालक श्री वरणगावकर यांच्या मुलाखती मला अजूनही आठवतात. २००४ साली लोकसत्ताच्या दिवाळीच्या विदर्भरंग मासिकात विदर्भातल्या तरुण उद्योजकांच्या मुलाखती आल्या होत्या. बहुतेकांनी उद्योगांची सुरुवात करताना उमेदीच्या काळात मुंबईला खेटे मारण्यात किती काळ व श्रम वाया गेले याबाबत सांगितले होते. २००२ साली माझ्या कॉलेजात एका जुन्या विद्यार्थ्यास आम्हाला व्याख्यान देण्यास आमंत्रित केले होते. जो तोवर यशस्वी उद्योजक बनून पंतप्रधानांच्या परदेशदौर्‍यांमध्ये उद्योजकांच्या शिष्टमंडळात सामील होत होता. त्याचीही कहाणी अशीच होती. अमरावतीत मेडिकल वस्तूंचा जसे सिरींज वगैरे कारखाना त्याने सुरू केला होता. मार्केटिंगसाठी केवळ नागपूरमध्ये कार्यालय सुरू करून उपयोग झाला नाही म्हणून एक कार्यालय त्याने दिल्लीतही सुरू केले होते. तेव्हा कुठे त्याच्या उद्योगाने वेगाने प्रगती केली. हे सर्व सांगण्याचे प्रयोजन हेच की अविरत परिश्रम घेणारे अन प्रयत्नवादी लोक इतर ठिकाणांप्रमाणेच विदर्भातही आहेत. स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे वेगळ्या विदर्भाबाबतचे विचार मलाही ठाऊक आहेत. आजवर साडेतीन चार तास उभ्याने कुणाचे व्याख्यान मी ऐकले असेल तर या माणसाचे ( जून २००३ मध्ये). एक माणूस एकाच वेळी इतक्या सार्‍या विषयांवर प्रभुत्व कसे काय मिळवू शकतो हा प्रश्न त्यांचे व्याख्यान अनुभवून मला पडला होता. डॉ. जिचकार अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे होते. कॅन्सरमुळे होणार्‍या मृत्यूच्या दाढेत जाऊन ते यशस्वीरीत्या परतले होते अन पुन्हा कार्यरत झाले होते. तर हा माणूस अत्यंत सकारात्मक विचार करणारा, प्रयत्नवादी व आशावादी होता. त्यांचा अपघाती मृत्यू जून २००४ मध्ये झाला. त्यानंतर पुढची साडेदहा वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. ज्यामध्ये बहुतेक सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे होती. डॉ. जिचकार आज हयात असते तर या सरकारांचा कारभार पाहून वेगळ्या विदर्भाबाबत आपली भूमिका नक्कीच बदलली असती. त्यांनी वैदर्भीय जनतेबाबत परखडपणे नकारात्मक मते मांडली आहेत कारण ते स्वतःही वैदर्भीयच होते. कुणीही स्वतःबद्दल स्वतःच्या भागाबद्दल प्रथम नकारात्मक काय आहे हेच लक्षात घेतो व बोलून दाखवतो. असे मत इतरांबाबत बोलले जात नसते. डॉ. जिचकारांच्या अशा वक्तव्याचे भांडवल केले जाऊ नये. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधल्या लोकांची भारतातून फुटून वेगळा देश बनवण्याची मागणी व वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी यांना डॉ. खरे यांनी एकसारखेच समजले आहे. हेच परिमाण लावले तर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनही चुकीचेच होते असे म्हणावे लागेल. याखेरीज विदर्भाचे राज्य झाल्यास ते झारखंड अन बिहारच्याच मार्गाने जाईल असेही डॉ. खरे यांनी वर लिहिले आहे. मिपाच्या भाषेत हे म्हणजे खरोखरच कैच्याकै विधान आहे. या दोन राज्यांचा सर्वात मोठा नकारात्मक घटक म्हणजे तिथे खोलवर रुजलेला जातीयवाद. अन या परिमाणाच्या बाबतीत विदर्भातली परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा नक्कीच बरी आहे. हे तुलनात्मक वाक्य आहे याचा अर्थ असा नाही की विदर्भात जातीयवाद अजिबात नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्रात काही ठिकाणी मंदिरांत उघडपणे पशुबळी दिले जातात पण विदर्भात हे प्रकार बंद होऊन अनेक दशके लोटली आहेत. नाव घ्यावे असा नेता विदर्भात नाही असाही दावा डॉ. खरे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर जाणे अन महाराष्ट्रातल्या यशस्वीपणे राबवलेल्या योजना इतर राज्यांसाठी अनुकरणीय ठरण्यामध्ये मोठे योगदान आहे दोन मुख्यमंत्र्यांचे. या सर्व गोष्टींची पायाभरणी करणारे स्व. यशवंतराव चव्हाण अन आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात यशस्वीपणे राज्याची घोडदौड करणारे स्व. वसंतराव नाईक. नाईक विदर्भातले होते. त्यांच्या कार्यकाळानंतर राज्याच्या राजकारणाची व सत्ताकारणाची प्रगल्भता कमी होत गेली. गेल्या दोन दशकांतल्या राज्य सरकारांचा विचार केल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितिन गडकरी यांनी केलेल्या कामाच्या जवळपास आजही कुणी पोचू शकले नाही. त्यांनी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांचा अभ्यास करायला इतर राज्यांमधूनच नव्हे तर इतर देशांमधूनही शिष्टमंडळे येत असत. नंतरच्या सरकारांना गडकरींनी सुरू केलेल्या योजना पूर्ण करता करताच नाकी नऊ आले. युतीचे सरकार १९९९ ते २००४ सत्तेत असते तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आणखी पुढे गेले असते हे नक्की. कापूस एकाधिकार योजनेचा उल्लेखही डॉ. खरे यांनी केला आहे. ही योजना बंद होऊन किमान १२-१३ वर्षे झाली असतील. महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम उसाच्या उत्पादनाने केले आहे हे वास्तव दुर्लक्षिले जाऊ नये. मुंबईकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचेही डॉ. खरे यांनी म्हंटले आहे. एका मर्यादेपर्यंत हे योग्यच आहे. पण मुंबई साठी काहीच केले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. युती सरकारच्या काळात मुंबईतल्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्यात आला. त्यांच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना रडतखडत का होईना पुढच्या सरकारांनी पूर्ण केल्या. आघाडी सरकारने राज्यातल्या इतर भागांसाठी फारसे काही केले नसले तरी युती सरकारने सुरू केलेल्या योजना पूर्ण करणे तसेच मेट्रो व मोनो रेल्वेंची पायाभरणी करणे हे नक्कीच केले आहे. हे सर्व असले तरी मुंबईलाही जेवढे सरकारकडून जेवढे मिळायला हवे तेवढे मिळाले नाही हे वास्तवच आहे. पण १९९९ ते २००४ मध्ये सत्तेवर असणार्‍या कुचकामी व दिशाहीन सरकारमुळे संपूर्ण राज्याचेच नुकसान झाले आहे हेच वास्तवाचे मोठे चित्र आहे. आपल्या देशात मुंबई व इतर मोठी शहरे कोट्यावधी लोकांना काम देतात सामावून घेतात या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात. पण यामागचे कटू वास्तव हेच की वेळोवेळच्या केंद्र व राज्य सरकारांनी संधीचे व पायाभूत सुविधांचे विकेंद्रीकरण केले नाही. मुंबईचे शांघाय करण्यापेक्षा इतर रोजगार केंद्रे निर्माण करून मुंबईवरचा ताण कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते. नुकतेच चेन्नई मध्ये पुराचे संकट आले. गेले दशकभर तिथे मा.ता. उद्योगाची अतिरेकी वाढ झाली. तिच वाढ काही प्रमाणात तिथल्या राज्यसरकारने तामिळनाडूतल्या इतर शहरांकडे वळविली असती तर चेन्नईची जी अवस्था झाली ती झाली नसती. यावरून एक वेगळा मुद्दा लक्षात आला. तिथले निवृत्त सनदी अधिकारी एम जी देवसहायम यांनी तिथल्या राज्य सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढताना मुंबईत २६ जुलै २००५च्या पुरानंतरच्या सुधारणांचे कौतुक केले आहे. आपल्या लोकांना मात्र या कामांची दखलही घ्यावीशी वाटत नाही. वर डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या लेखाचा मजकूर असलेल्या माझ्या प्रतिसादावर डॉ. खरे यांनी विदा मागितला आहे. विदर्भाचा अनुशेष अन त्या मागची कारणे जी वेगळ्या विदर्भाच्या समर्थकांकडून दिली जातात ही खोटी असती तर केंद्र सरकारकडून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती अन राज्यपालांना विदर्भाचा अनुशेष कमी करण्याच्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळाला सूचना देण्याचा विशेषाधिकार दिला गेलाच नसता. विविध काळातल्या राज्य व केंद्र सरकारांनी विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल उलट दावा केलेला नाही. अन डॉ. खरे यांनी म्हंटल्याप्रमाणे तो केवळ कृषीपंपाचा तर नक्कीच नाही. डॉ. चौधरी यांनी जे लिहिले आहे ते वास्तव आहे त्यात भावनिक असे मला तरी काहीच जाणवले नाही. याखेरीज विदर्भातले शेतकरी मूळ व्यवसायाला जोडून फारसे काही करत नाहीत असेही डॉ. खरे यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी ज्यांचे शेतीच्या व्यवसायावर जगणेही अवघड आहेत ते जगण्याकरिता शेतीशिवाय काहीच करत नसतील. असे शक्य तरी आहे का? शेतीची कामे नसताना किंवा कमी असताना मोल मजुरीसकट मिळेल ते काम करताना मी अनेक शेतकर्‍यांना पाहिले आहे. आत्महत्या करणार्‍यांच्या तुलनेत पडेल ते काम करून जीवनगाडे हाकणाऱ्या शेतकर्‍यांची संख्या हजारो पटीत असेल. वेगळा विदर्भ झाला तर भारतात एक प्रागतिक राज्य केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही असेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. अन असे झाले तर ते विदर्भाच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचेच असेल. वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्‍या सर्वसामान्य लोकांनी उर्वरित महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य लोकांना दोष दिला आहे असे मला कधीही दिसले नाही. जो काही दोष दिला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सत्ताधार्‍यांना व त्यांच्याबरोबर लॉबिंगमध्ये सामील असणार्‍या नोकरशहांना. या विषयावर पूर्वीही मिपावर चर्चा झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांमध्ये आकस निर्माण होईल असे दावे यापूर्वी कुणी केल्याचे आठवत नाही. मी या प्रतिसादात केवळ न पटलेल्या विचारांचा व दाव्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. यात वैयक्तिकपणे डॉ. खरे यांना दुखवायचे नाही. नकळतपणे तसे घडत असल्यास मी आधीच माफी मागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 12/14/2015 - 11:34

In reply to डॉ सुबोध खरे यांचे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी

Permalink

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधल्या लोकांची भारतातून फुटून वेगळा देश बनवण्याची मागणी व वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी यांना डॉ. खरे यांनी एकसारखेच समजले आहे. हेच परिमाण लावले तर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनही चुकीचेच होते असे म्हणावे लागेल. जोशी साहेब माझा वरील प्रतिसाद थत्ते साहेबांच्या "ज्याला जे पाहिजे ते विचार न करता देऊन टाका" या म्हणण्याला उपहासात्मक प्रतिसाद म्हणून होता. त्याचा आपण असा अर्थ काढलात या बद्द्दल मला सखेद आश्चर्य वाटते आहे. एकीकडे आपण म्हणता विदर्भातील नेते सक्षम होते तर मग माशी कुठे शिंकली? "बहुतेकांनी उद्योगांची सुरुवात करताना उमेदीच्या काळात मुंबईला खेटे मारण्यात किती काळ व श्रम वाया गेले याबाबत सांगितले होते." कोणतही उद्योग सुरु करायचा असेल तर महाराष्ट्रातच काय भारतात हीच परिस्थिती सार्वत्रिक आहे. तेंव्हा आम्ही खेटे घातले हे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. मला दवाखाना सुरु करण्यासाठी मिळणाऱ्या अनुज्ञप्ती साठी सक्षम अधिकारी मिटींगला उशिरा पोहोचला म्हणून मला दवाखाना सुरु करायला दीड महिना उशीर झलक आणी नोकरी सोडली असल्याने मी घरी हरी हरी करीत बसलो उपकरणाचे कर्ज डोक्यावर घेऊन हि स्थिती मुंबईत असून आहे. लोकांना वाटते आम्ही मुंबई बाहेरचे म्हणून आमची कामे होत नाहीत. नुसतेच सुरु नव्हे तर बंद करायचे असतील तरीही सरकारी परवानग्या मिळवण्यासाठी नाकी नउ येतात आणी वेगवेगळ्या ठिकाणी इतके पैसे खायला घालायला लागतात कि लोक उद्योग बंद करण्याऐवजी ते आजारी ठेवणे पसंत करतात. अनुशेषाचा विदा तपासला तर शेतीपम्पाचा सोडून दुसरा कुठला सापडत नाही म्हणून मी तो मागत होतो. केवळ स्वस्तात मिळणाऱ्या विजेवर चालवण्याच्या पंपांचा अनुशेष भरून काढण्यात काय हशील आहे हे कळत नाही. मुळात जमिनीत किंवा सिंचनाचे पाणी आहे का हा विचार ःओएण आवश्यक आहे. बाकी भावनिक मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यात अर्थ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 12/14/2015 - 18:41

In reply to सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे by सुबोध खरे

Permalink

साठी सक्षम अधिकारी मिटींगला

साठी सक्षम अधिकारी मिटींगला उशिरा पोहोचला म्हणून मला दवाखाना सुरु करायला दीड महिना उशीर झलक आणी नोकरी सोडली असल्याने मी घरी हरी हरी करीत बसलो उपकरणाचे कर्ज डोक्यावर घेऊन हि स्थिती मुंबईत असून आहे ते बरोबर आहे डॉक साब, पण समजा तुमची फ़ाइल मंत्रालयात आहे, अन तुम्हाला तिचे स्टेटस पहायचे आहे तर तुम्हाला २४ तास प्रवास करून जायला लागत नसेल/नसावे न? म्हणजे बुआ सकाळी उठले लोकल पकडली मंत्रालयात गेले बाबु न हलकटपणा करून फ़ाइल नाही सांगितले मग तुम्ही संध्याकाळी परत आलात , ह्यात तुमच्या मानसिक त्रास अन थकव्याला कमी लेखण्याची गुस्ताखी मी करणार नाही अजिबात, तरीही एकंदरित प्रवास अन नकारघंटा ऐकायला आपल्याला काही तास पुरेसे न? चंद्रपुरहुन माणुस यायचा म्हणजे एकतर नागपुर ला या मग रेलवे रिजर्वेशन/फ्लाइट बुक करा (एकात वेळ बर्बाद एकात पैसा) आल्यावर मुंबई मधे राहण्या जेवण्याचा खर्च, नंतर २ दिवसांनी नकारघंटा ऐकून पुढली तारीख घेऊन स्वगृही परतणे, विषय "शिंगरु मेलं ओझ्यानं" असा होतो त्याच्यात, म्हणजे आधीच तुम्ही सांगितलेली यथार्थ सरकारी अनास्था अन वरतुन भौगोलिक अंतर असा तो विषय होतो, असे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 12/14/2015 - 21:33

In reply to सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे by सुबोध खरे

Permalink

उपहास?

थत्ते साहेबांनी विचार न करता देऊन टाका असं अजिबात म्हंटलं नाहीये. भारतात गेल्या अनेक वर्षांत नव्या राज्यांची निर्मिती झाली आहे. एकदा तरी ती विचार न करता झाली असणार का? जे (विचार न करता नवे राज्य निर्माण करणे) होऊच शकत नसते तसा प्रस्ताव थत्ते साहेब कशाला मांडतील. त्याखेरीज थत्तेसाहेबांनी जो विचार मांडला तो असा झटक्यात उडवून लावण्यासारखा निश्चितच नाही. एवढे करूनही उपहास करावासा वाटला तर जरूर करावा. पण त्यासाठी काश्मीरच्या फुटीरतावादाशी तुलना. माझ्या मनात हा विचार नकळतही आला असता तर मला स्वतःची लाज वाटली असती. विदर्भातील नेते सक्षम असताना माशी कुठे शिंकली यावर मी पूर्वीच विवेचन केले होते जे या धाग्यावरही पुन्हा डकवले आहेच. नवउद्योजकांची मी जी उदाहरणे दिली ती मी सौम्यपणे मांडली असली तरी ती प्रत्यक्षात अत्यंत तीव्रतेची होती. एवढ्या वर्षांनंतर त्यातले तपशील नेमकेपणाने आठवत नसल्याने मी थोडक्यात लिहिले. शेवटी आशय अधिक महत्वाचा. विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाचे अनेक घटक आहेत. सिंचन त्यात सर्वात महत्वाचे आहे कारण शेतीव्यवसाय. विदर्भातले अनेक धरण व कालवे प्रकल्प काही दशकांपासून प्रलंबित आहेत. युती सरकारच्या काळात प्रथम यावर काम झाले नंतर कृष्णा खोर्‍यातले पाणी २००० सालपर्यंत अडवणे आवश्यक होते म्हणून विदर्भाच्या प्रकल्पांचे निधी तिकडे वळवले गेले. नंतर आघाडी सरकारच्या काळाबाबत तर बोलण्यासारखेच काही नाही. त्याखेरीज संधीचा अनुशेष आर्थिक निकषांत मोजता येत नसतो. संधीचे समान नसले तरी न्याय्य वाटप होणे ही अपेक्षा ठेवणे काही गैर नाही. वर्षानुवर्षे वार्षिक अर्थसंकल्पात विदर्भाच्या योजनांसाठी राखून ठेवलेला निधी प्रत्यक्षात दुसर्‍याच कामांसाठी वापरला गेला. काही वर्षांपूर्वी अनुशेषाची रक्कम (माझ्या आठवणीप्रमाणे) ४० हजार कोटी रुपयांवर गेली होती. आता तर त्यापेक्षा बरीच अधिक असेल. बाकी या संपूर्ण चर्चेत माझ्यातर्फे मी भावनिक मुद्दे अजिबात मांडलेले नाहीत हे नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो. तुम्ही देखील मुंबईवर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिले आहे ज्यास मी देखील अनुमोदन दिले आहे. त्याच धर्तीवर मी विदर्भावर होत राहिलेल्या अन्यायाबाबत लिहिले आहे जे वास्तवाला धरून आहे. एक रचना जी दशकानुदशके उपयुक्त ठरू शकलेली नाही त्याबाबत सोदाहरण लिहिणे हे भावनिक कसे काय असू शकते. भावनिक गोष्टींची उदाहरणे द्यायची झाली तर कसली तरी अस्मिता किंवा इतिहासामधल्या प्रकरणांवरचे वादविवाद या गोष्टी होत. महाराष्ट्राच्या विविध राज्य सरकारांनी जर विदर्भाच्या क्षमतेचा योग्य वापर केला असता तर विदर्भाची प्रगती होऊन त्याचा लाभ संपूर्ण राज्याला झाला असता. राज्याच्या डोक्यावरचे कर्ज इतके वाढले नसते. या रचनेत ते जमणे शक्य दिसत नाही. असे असताना विदर्भ वेगळा झाल्यास त्याची अन तुलनेत नवा महाराष्ट्र अधिक लहान झाल्यामुळे महाराष्ट्राची अधिक वेगाने व सर्वसमावेशक प्रगती होऊ शकते. वेगळा विदर्भ झाल्यास तुम्ही प्रशासकीय खर्चाचा मुद्दा मांडला आहे. नागपूरमध्ये राज भवन, विधान भवन पासून सरकारला लागणारे इन्फ्रा स्ट्रक्चर पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यावर नवा खर्च करण्याची अजिबात गरज नाही हे देखील लक्षात आणून देऊ इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 12/14/2015 - 07:12

Permalink

विदर्भातले लोकप्रतिनिधी

वरच्या चर्चेमध्ये विदर्भातल्या लोकप्रतिनिधींबाबतही नकारात्मक मत व्यक्त केले गेले आहे. पण वेळोवेळी विधिमंडळातल्या मार्गांच अवलंब करून विदर्भातल्या लोकप्रतिनिधींनी त्यावर आवाज उठवला आहे. नितिन गडकरी, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यात आघाडीवर होते. आणखी एक अराजकीय नाव म्हणजे अमरावतीचे प्रा. बी.टी. देशमुख. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांची विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषाबाबतची भाषणे आजही नव्या आमदारांना अभ्यासाला दिली जातात. बहुतांश मुख्यमंत्री मात्र सरांची भाषणे अभ्यासपूर्ण असतात असे अभिप्राय व्यक्त करून मूळ प्रश्नाला बगल देत असत. गेल्या १५ वर्षात विधीमंडळात अनेकदा विदर्भातले व पश्चिम महाराष्ट्रातले प्रतिनिधी असा सामना झाला होता. विदर्भाच्या प्रतिनिधींवर राज्याच्या हिताचा विचार न करता स्वतःच्या प्रदेशाचाच विचार करून संकुचिततेचे प्रदर्शन करतात असे आरोप होतात. हे म्हणजे हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वोह कतल भी करते हैं तो चर्चा नही होता... असा प्रकार आहे. एकंदरीत नेहमी उदारपणे राज्याच्या व्यापक हिताचा विचार करून स्वतःचेच घोडे न दामटणे ही वैदर्भिय लोकांची अन लोकप्रतिनिधींची कमजोरी समजली जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 12/14/2015 - 07:56

Permalink

वेगळे राज्य

वेगळे राज्य मग ते विदर्श असो की इतर कुठे याकडे नेहमीच भावनिक दृष्टीने बघितल्या जाते. असे केले की मग इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या जाते. बऱ्याच वर्षापूर्वी जेंव्हा वेगळ्या विदर्भाची मागणी आली तेंव्हा जांबुवंतराव धोटेंनी त्याला भावनिक किनार दिली होती. या मुद्द्याकडे विदर्भ विरुद्ध मुंबई, किंवा विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठी माणसाचे तुकडे केले वगेरे असे बघू नये. विदर्भाने विज देणे बंद केले म्हणून मुंबईत अंधार होइल हा दावा जितका फोल आणि हास्यास्पद आहे तितकाच की फक्त मुंबईच्याच पैशावर विदर्भ चालतो हा दावा सुद्धा फोल आणि हास्यास्पद आहे. काही मुद्द्यांवर व्यवस्थित विचार व्हायला हवा. भाषावर प्रांतरचना - योग्य कि अयोग्य. आज राज्याराज्यातील समस्येमधे कुठेतरी भाषावर प्रांतरचनाच कारणीभूत आहे असेच वाटते. एक भाषा बोलनाऱ्या लोकांना एकत्र आणने म्हणजे दोन वेगवेगळी भाषा बोलनाऱ्यांना वेगळे करने होय. सीमेच्या भागात दोन्ही भाषा बोलनारे असतात त्यामुळे सीमावाद निर्माण झाले. प्रांतीय अस्मितेचे राजकारण करनाऱ्या पक्षांचे पीक आले. भाषावार प्रांतरचना ही प्रशासकीय दृष्टीने हे सोयीचे नव्हती. मद्रास, मुंबई, भोपाळ या राजधान्या मध्यवर्ती भागात नसून राज्याच्या एका टोकाला आहेत. दुसरे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वाश्रमीचा मध्यप्रदेश. रायपूरवरुन भोपाळ किंवा छिंदवाड्याला जायला रस्ता किंवा रेल्वे ही नागपूरवरुनच जात होती. दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. तेंव्हा कारखानदाराला दोनवेळा कर भरावे लागत होते. ते चुकवायला जंगलातल्या गोटाड रस्त्यतून माल पाठवायचा प्रकार सर्रास व्हायचा. छोटी राज्ये झारखंड हे जरी छोट्या राज्याचे फसलेले उदाहरण असले तरी छत्तीसगड, उत्तरांचल, गोवा इतकेच काय आधीचे पंजाब, हरयाणा हे छोटी राज्ये यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे. जिचकारांची मते योग्य होती. आज त्याला दहा वर्षाच्या वर काळ लोटलाय. जी कारणे विदर्भाच्या विरोधात होती तीच छत्तीसगडच्या विरोधात सुद्धा होती. वेगळे राज्य झाल्यावर मग जोगीेच्या काळात असो की रमणसिंगाच्या काळात विकास आधीपेक्षा वेगात झाला. हे राज्य बऱ्याच मोठ्या राज्यांना विजपुरवठा करते आणि राज्यात विजतुटवडा नाही. जिचकारांनी बारा पंधरा वर्षापूर्वी मांडलेल्या मु्द्द्यावर आज परत अभ्यास करायला हवा कदाचित केंद्र आणि राज्ये यांच्यातील आयवाटणीचे प्रमाण बदलले असेल, करपद्धतीतही बरेच बदल झाले. विदर्भात सुद्धा बरेच बदल झाले. प्रायॉरीटीज मोठ्या राज्यात काही गोष्टी सरकारपर्यंत पोहचत नाही कारण त्याची प्रायॉरीटी कमी असते. मुंबई, जळगाव, आणि सिरोंचा तीनही ठीकाणी विजेची समस्या असेल तर नक्कीच सिरोंचाचा क्रम शेवटी येतो. काही दिवसांपूर्वी विलास मनोहरांचे भामरागड छत्तीसगडला द्या हे वक्तव्य आले होते यामागे हीच भावना होती. छत्तीसगडात सरकार गावागावात पोहचू शकते तर इथे नाही. विकासकामाला लागनारा पैसा फक्त स्थानिक स्वराज्य संस्था, खासदार निधी, आमदार निधी यातून ठोस विकासकामे होत नाही. त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारातून पैसा लागतो. मंत्रीच नाही तर मंत्रालयातल्या बाबूलोकांचाही तितकेच सहकार्य लागते. हे बऱ्याचदा शक्य होत नाही. उद्याोगाला पोषक वातावरण विविध करसवलती देउन उद्योगधंदे बोलवऩे शक्य होते. मोठ्या राज्यात अशा सवलतींची मागणी सर्वत्र होऊ शकते किंवा तशी भिती सतत असते. राजकीय अस्थिरता आणि त्या अनुषंगाने होनारी घोडेबाजी ही छोट्या राज्यांची फार मोठी समस्या आहे. वेगळे राज्य झाले म्हणजे विदर्भ बदलून जाइल, शेतकरी आत्महत्या थांबतील हा आशावाद सुद्धा अनाठायी वाटतो. काही समस्या ह्या छोट्या राज्याने सुटण्या सारख्या नाहीत. नवीन राज्याच्या उभारणीसाठी चांगले नेतृत्व लागते. उत्तम नेतृत्वाशिवाय काहीच साध्य होत नाही . उदासीणतेचे एक उदाहरण म्हणजे अप्पर आणि लोअर वर्धा प्रकल्प आणि त्यातून येनारे कालवे. १९९२ साली कालवे खोदायला आमची जमीन ताब्यात घेतली. नंतर त्याचे पैसेही दिले. कालवा झाला, सारे झाले पण पाणी आले नाही. ते यायला फडणवीसांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसावे लागले, जवळ जवळ बावीस वर्षे लागले. मोेठे धरण बांधून, कालवे बांधून पाणी पुरविणे हे सरकारचेच काम आहे. दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी बदलून फारसे काही साधले नाही. ९८ साली कसलातरी फॉर्म भरताना मी माझे जन्मगाव चंद्रपूर असे लिहिले तर माझ्या बाजूला बसलेला मुंबईचा मुलगा मला म्हणाला. चंद्रपूरला फार गरीबी आहे, तिथे नक्षलवादी आहेत. ते आजही आठवले तर हसायला येते. दोष त्याचा नव्हता. मी चंद्रपूरात खाणीत वेल्डींग इलेक्ट्रोडचे मार्केटींग करायचो, आमचे बहुतेक डिस्ट्रिब्युटर मराठी होते. सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सारेच खाणींमधे भटकत होतो. चंद्रपूरची समस्या आहे तिथले तापमान आणि घाम पुसल्यावर काळा होनार रुमाल ही आहे. त्याच जिल्ह्यात मात्र कोरडवाहू शेती आहे. आज चंद्रपूरसाठी अधिक चांगले दिवस यायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्याचे मूळ गाव मूल चंद्रपूर जिल्ह्यात येते, अर्थमंत्री चंद्रपूरचे, केंद्रात अहीर मंत्री आहेत, हे कमी की काय भागवत सुद्धा चंद्रपूरचे. असो भावनिक मुद्द्यांवर चर्चा करुन प्रतिसादांची संख्या वाढण्याखेरीज फारसे काही साधत नाही तेंव्हा त्यावर न बोललेलेच बरे. वरील मुद्द्याचा जिचकारांसारख्या कुण्या जाणकार व्यक्तीने अभ्यास करुन छोटी राज्ये योग्य की अयोग्य हे सांगायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 12/14/2015 - 09:12

Permalink

श्रीरंग व मित्रहो,

श्रीरंग व मित्रहो, तुमच्या सर्व प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 12/14/2015 - 10:54

In reply to श्रीरंग व मित्रहो, by संदीप डांगे

Permalink

श्रीरंग भाऊ, मित्रहो व डांगे

श्रीरंग भाऊ, मित्रहो व डांगे साहेब, तुमच्या तिघांचे ही आभार
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 12/14/2015 - 11:06

In reply to श्रीरंग भाऊ, मित्रहो व डांगे by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

सोन्याबापू

सोन्याबापू, तुम्ही फारच मुद्देसुद व संदर्भपूर्ण लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com