काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन.
या क्रांतिकारकांना माझे पण कोटी कोटी प्रणाम!
साक्षी साहेब,
आजकाला आम्हा सर्वांना आमच्या स्वार्थाचेच पडलेले आहे. अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
काकोरीचे धाडस या क्रांतिकारकांनी पेलले हे सूर्यप्रकाशायेवढे सत्य आहे. त्यावर ज्याला शोभेल तो तसा कीस पाडेल. माझ्या दृष्टीने असा कीस पाडणे आता गौण आहे. आपल्याला स्वांतंत्र्य हे अनेकानेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदाणाने मिळालेले आहे व त्याचा आपण योग्य तो आदर व रक्षण केले पाहिजे ही जाणीवच जास्त महत्वाची. ती जाणीव करुन देण्याचे कार्य आपला लेख बजावतो आहे हे नक्की. अभिनंदन!
आपला,
(नतमस्तक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
भारताच्या स्वातंत्रासाठी आयुष्य, प्राण वेचलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन. क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद.
बर्याच गोष्टी काल-परिस्थीती सापेक्ष म्हणता येतील. गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी.
गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी.
सहजराव, एक स्पष्टीकरण. मी कट्टर बिट्टर विरोधक नाही. स्वतः गांधीजीं बद्दल माझ्याही मनात अथांग आदर आहे. पण चीड येते ती त्यांच्या "वादा"चा अतिरेक करणार्यांची. जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते. पण "केवळ आणी केवळ गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले", "गांधींनी केले ते सर्वच बरोबरच" , "दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल", "अहिंसा व गांधीवाद हाच सर्व प्रश्नांवरील एकमेव उपाय" या असल्या वल्गनांनी डोके खराब होते. माझ्या अतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांतून हेच म्हणने आहे.
पाच हजार वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणार्या राष्ट्राचा "पिता" काल परवा कसा काय होऊन गेला हेही मला न उमगलेले कोडे आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणार्यांनी स्वतः विधायक असे काही न करता हे असले टिमटिमे वाजवत राहिल्याने त्यांच्या बद्दल डोक्यात तिडीक आहे. स्वतः गांधींबद्दल नाही.
आपला,
(सर्वच थोर नेत्यांसमोर नतमस्तक असणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते.
सहज आता जुने प्रतिसाद चाळायला हवे. नव्या प्रतिसादांवर लक्ष ठेवायला हवे.
(मसण्याऊद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
राष्ट्रपिता या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. "राष्ट्रपिता महात्मा गांधी" या पूर्ण वाक्प्रयोगाचा अर्थ राष्ट्र पित असताना(ही) गांधी महात्मा होते असा आहे.
किंबहुना अशोक नायगावकरांनी देशाचे भारत हे नाव बदलून बारत करावे असे म्हटलेच आहे.
आपला
(प्रोप्रायटर) आजानुकर्ण
झमझम बार
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन!
माझेही या सगळ्यांना विनम्र अभिवादन.
मुमुक्षु
आपल्या क्रांतीकार्याला लागलेली फितुरीची कीड शेवटपर्यंत सुटली नाही. इतके मोठे लोक नाहक अशा हरामखोर लोकांमुळे मारल्या गेलेत. बहुतांश सगळे असेच फासावर गेलेत. कितीतरी मोठी कामे त्यांच्याकडून आणिक झाली असती. फार वाईट वाटते असे आठवले की. या फितुर लोकांना काहीच वाटत नसेल का हो? थोडाही पश्चात्ताप होत नसेल? १८५७ च्या लढ्यातही हेच झालेले दिसते. रायगडावरचे सूर्याजी पिसाळ सर्वत्र पसरले असे वाटायला लागते.
काकोरीपर्वातील ह्या हुतात्मांना विनम्र अभिवादन!
बाकी, मुमुक्षु ह्यांच्याशी पुर्णतः सहमत!
शाप आहे हो हा आपल्या भारतमातेला.... फितुरीशिवाय कोणतंही काम जमतच नाही आपल्याकडे!
चालायचंच.
सर्वसाक्षीजी, विस्मृतीत जाणार्या क्रांतिकार्याबद्दल सातत्याने लेख लिहित आहात त्या बद्दल तुमचे खूपच कौतुक करावेसे वाटते. असेच लिहित राहा. खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे. या निमित्ताने ही नावे आणि घटना परत जाग्या होत आहेत.
वर, बरेच आक्षेप वगैरे आले आहेत. मला वाटते की अश्या घटनांबद्दल लिहिताना थोडे नाट्यमय लिहावेच लागते. अर्थात् ते एकांगी होता कामा नये हे पण खरेच.
बिपिन कार्यकर्ते
सर्वासाक्षीजी,
आपले लेख कालोचित असतातच पण नकळतच आपण रसभंग करुन टाकतात.
उदा.
हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’
अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही हे माहित असूनही अथवा १ वर्षात स्वातंत्र्य मिळनार नाही हे मान्य करुनही १९२७ नंतर जवळजवळ २० वर्ष थांबावे लागलेच. सशस्त्र लड्याची प्रेरणा म्हणून गांधीच्या आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेला का दिले जाऊ नये?
असो. स्वातंत्र्यासाठी लढणार्या सर्वच लोकांबद्दल आदर आणि अभिमानच असायला हवा.
संदर्भ ग्रंथाची यादी / नावे दिली तर सामान्य लोकांना त्यात अजूनही भर टाकता येईल. शेवटी किती दिवस आपण एकहाती हे काम करणार आहात? कोणालातरी यात पारंगत करा तर.
द्वारकानाथजी,
कुणाला पारंगत करणारा मी कोण? मला स्वतःला असे काय मोठे ज्ञान आहे तर मी काय कुणाला पारंगत करणार. ज्याच्याकडे एखादी गोष्ट करण्याची ईच्छा असेल तो स्वत: त्या विषयावरील माहिती शोधुन काढतो. आपण स्वतः व्यासंगी आहात, आपल्याला ईच्छा असेल तर क्रांतिकारकांवरील भरपूर माहिती आपल्याला वा ज्या कुणाला हवी असेल त्याला पुस्तके व जाल या स्वरुपात सहज मिळवता येइल.
बाकी माझे काम एकहाती नाही. अनेकांचे हात माझ्या मस्तकावर व पाठीवर आहेत. आणि मी जिवंत असे पर्यंत ज्यांनी या देशासाठी काही केले आहे आणि जे आजपर्यंत अप्रसिद्ध ठेवले गेले आहेत, उपेक्षिले गेले आहेत त्यांची माहिती जिथे व जशी देता येईल तिथे व तशी मी देतच राहीन. ते महान हुतात्मे काल दिव्य करुन गेले म्हणुन आपण आज आहोत या कृतज्ञतेने त्यांचे ऋण अत्यल्प का होईना पण फेडण्याचा एक प्रामणिक प्रयत्न मी सातत्याने करीत राहीन. कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही.
कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही.
केलेल्या संकल्पांना तडीस नेण्याचा बाणा फार कमी लोकांत असतो. तो तुमच्यात दिसत आहे हे पाहून आनंद झाला. आपल्या सारख्यांच्या कष्टाने आम्हा पामरांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या उपेक्षित पानांची ओळख होत आहे हे आमचे भाग्य.
आपला,
(कृतज्ञ) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रिय सर्वसाक्षीजी,
आपला प्रतिसाद आवडला. खरेतर आपणाकडुन एक भारतीय म्हणून माझी बरीच अपेक्षा आहे. क्रांतिकारकाचे समग्र वाड्मय प्रसिद्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या विचारधारेची ओळख जगाला व्हावी. दुर्दैवाने हे मात्र घडत नाही.
आपण हे करण्यासाठी पूर्ण सक्षम आहात. आपण नकळतच गांधीमधे अडकत जातात आणि अकारणच धुरळा उडत जातो.
खरेतर हे दैवी असे कार्य आहे आणि माझ्याकडुन तन-मन-धनाने मदत करण्याचे मी आश्वासन देतो.
आम्ही तुमच्याकडुन स्नेहाची अपेक्षा करतो आणि आपल्या कार्याचेही महत्व जाणतो. २००९ मध्ये याबाबतीत आपल्याकडुन भरीव असे कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
आपला,
द्वारकानाथ कलंत्री
सर्वार्थाने समयोचित असा हा लेख आला आहे. आत्ता काल परवाच अतिरेक्यांचे थैमान होऊन गेले आहे. तरीही आपण गांधीवादच कुरवाळत बसलो आहोत. या समयी असे काहीतरी जाज्वल्य, स्वाभिमान जागवेल असे, मरगळ झटकणारे विचार प्रेरणादायी नक्कीच आहेत. आम्ही स्वतः क्रांतिकारी विचार करू शकत नाही, कृती उक्ती हे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. निदान अगदी नजिकच्या ऐतिहासिक कालखंडाचा थोडा उहापोह करूनही खूप परिणाम साधेल, साधला आहे.
शूराला शूराचे मरण प्रिय असते म्हणतात. शूराला शूराकडून कौतुक झाले तर सर्वाधिक समाधान होते. सर्वसाक्षी, तुम्ही लिहिल्यामुळे, त्या हुतात्म्याना ही समाधान होईल, की आपली चेतना आजही जागृत आहे. तुम्हाला, तुमच्या अंतःप्रेरणेला, आणि ती शक्य तितक्या लोकात जागवण्याच्या तुमच्या उद्योगाला शुभेछा!
एक मनस्वी.
सर्वसाक्षीजी, आपल्या इतर क्रांतिकार्यावरील लेखाप्रमाणेच हा ही सुंदर लेख. धन्यवाद.
काकोरी क्रांतिकार्यात सहभागी झालेल्या सर्व सुपूत्रांना त्रिवार अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा सर्व क्रांतिकारकांचे कार्य सध्याच्या काळात स्फूर्तिदायक ठरो.
शब्दांचा किस पाडणारे कितीही किस पाडोत त्याने क्रांतिकारकांच्या कार्याला यत्किंचितही कमीपणा येत नाही. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून हसतमुखाने फासावर जाणे ही काही सोपी गोष्ट नव्हे.
मला हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना या संघटनेच्या विचारसरणीबद्दल आणखी जाणून घ्यायचे आहे.
प्रश्न:
हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना ही हिंदुत्ववादी किंवा सावरकरवादी किंवा संघिष्ट संघटना होती काय?
(त्यांची विचारसरणी थोडक्यात सांगावी. डावी की उजवी?)
ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधींना व मुसुलमानांना हेटाळत असत काय?
ते ज्यूंची संख्या रॅशनलाइझ करणार्या हिटलरची तारीफ करीत असत काय?
अशी हेटाळणी केल्यावर त्यांना त्यांच्या ऑडियन्सकडून टाळ्या आणि शिट्या मिळायच्या का?
तूर्तास एवढेच!
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हिचे रुपांतर पुढे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत झाले; ही लढाऊ बाजु तर जनसंपर्क व प्रसारासाठी हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघटना ही नागरी बाजु.
ते कुणालाच हेटाळत नसत. हुतात्मा अशफाकऊल्लांवरुन दिसलेच आहे की मुस्लिमविरोधी नव्हते. गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
यांचा कार्यकाल १९२३ ते १९३२ हाच प्रामुख्याने. या काळात हिटलरचा उदय झाला नव्हता. हिटलर जर्मनीचा राष्ट्रप्रपुख झाला १९३३ साली
ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता. आयुष्य असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास अससलेल्या क्रांतिकारकांच्या डोक्यावर सतत मृत्युची तलवार सरकारच्या रुपाने टांगलेली होती त्यांना सभा - अधिवेशने भरवायला स्वास्थ्य आणि वेळ दोन्ही नव्हते. विशीत वा फरतर तिशीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना कुणाचा द्वेष करायला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. त्यांनी फक्त मातृभूमिवर अपार प्रेम केले.
धन्यवाद
ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता.
अरे पण साक्षी, तु का अश्या फालतू अन् हेटाळणीपूर्वक प्रश्नांची उत्तरे देत बसल आहेस?
गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का? दुसर्याला कमी लेखुन मगच एकाचे मोठेपणा सिद्ध करता यावा इतके हलके आपले क्रांतीकारक नव्हते. तुमच्या सारख्या आंधळ्या भक्ती करणार्या लोकांमुळे असा मेसेज दिला जातो. स्वातंत्र मिळवुन देण्यार्या सर्वांचेच आपण ॠणी राहिले पाहिजे.
गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
गांधी द्वेष करायचे?? एखाद्या व्यक्तिचे विचार पटले नाहीत म्हणून काहीही??? वर तुमच्या ह्या बालकथा शोभणार्या लिखाणाना कसलेही संदर्भ तुम्हाला द्यायचे नाहीत, ते मागीतले तर हे लिखाण खुशाल खोटे आहे समजावे अशी मल्लीनाथी तुम्हीच करता. मग तुम्ह्याल विनाकारण एका महापुरुषावर असे गरळ ओकायचा काय हक्क आहे
जी आपण करीत आहात.
गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही .
क्रांतिवाद आणि गांधीवाद याच हाच तर फरक आहे. जे जे देशासाठी हौतात्म्य पावले ते सर्व आम्हाला वंद्य त्यांनी महनिय, वंदनिय अशी असामान्य दिव्ये केली म्हणुन ते वंद्य. तुम्हाला गांधी प्रिय म्हणुन त्यांनी केले तेच बरोबर बाकी सगळे चूक हा तुमचा खाक्या.
इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला. मात्र <गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का?> असे लिहुन तुम्ही तुमचा सत्यावर व सहिष्णुतेवर कितपत विश्वास आहे ते दाखवुन दिलेत.
क्रांतिकारकांचे मोठेपण हे वादातित आहे त्याला कसल्या तुलनेची गरज नाही. गांधी हे क्रांतिकारकांचा मनापासून तिरस्कार करीत होते हे सत्य आहे आणि ते सांगितले तर गांधीभक्तांना झोंबते हेही सत्य आहे.
इथे होणार्या टिकेमुळे संतापुन जाऊन तुमचा तोल ढळायला लागला आहे. इथे कुणीतरी क्रांतीकारकांना चोर दरोडेखोर म्हंटले आहे का? जी काही टीका आहे ती तुमच्या लेखाविषयी काढलेल्या शंका आहेत. क्रांतीकारकांच्या देशभक्तिविषयी इथे कुणाचेच दुमत नाही.
इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला.
कशाला ताकाला जाउन भांडे लपवताय? तुमचा गांधींवरचा आकस सुर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे, कुणीही प्रश्न विचारायच्याआधी तो तुमच्या प्रत्येक लेखात डोकावत असतो. आणि डोळ्यावरची झापडे बाजुला केलीत तर असे म्हणणारा मी एकटा नाही हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.
गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही .
हा चुकीचा सल्ला तर नव्हे. लोक आपल्याला सातत्याने त्या चार पुस्तकांची नावे द्या असेच सांगत असतात आणि आपण काही पोरकट कारणे काढून ती देण्याचे नाकारता. याचे मुख्य कारण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांबाहेरचा इतिहास माहित नसलेले लोक डोळ्यांत पाणी आणून नतमस्तक होणार नाहीत हे असावे. चार पुस्तके लोकांनी वाचली तर गोष्टीतील सत्यासत्यता त्यांच्या लक्षात यावी तेव्हा असे सल्ले देण्यापूर्वी कृपया, विचार करावा.
आता मूळ लेखाविषयी -
काकोरी खटल्याबद्दल नेटावर मला जी जी माहिती मिळाली त्यात एक समान सूत्र सापडते. ते असे की काकोरी खटला सुमारे दिड वर्षे चालला आणि काँग्रेसी नेत्यांनी हा खटला क्रांतिकारकांतर्फे लढवला. त्या माहितीपैकी मला सर्वात विश्वासार्ह वाटलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणातील काही मुद्दे बघा -
The Kakori case trial brought the entire nation together to defend Ashfaqulla and his revolutionary companions. A Defence Committee was formed consisting of eminent Congress leaders like Pandit Motilal Nehru, Ganesh Shankar Vidyarthi, Govind Ballabh Pant and Mohanlal Saxena. Lala Lajpat Rai came to the forefront in expressing his sympathy with the revolutionaries. Many important Congress leaders such as Jawaharlal Nehru and Acharya Narendra Dev remained in touch with the revolutionaries in jail.
संदर्भः http://pib.myiris.com/speech/article.php3?fl=010526181829
विकिवरील संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Kakori_train_robbery#Trial_and_Reaction
इतर: http://www.liveindia.com/freedomfighters/kakori.html
आपल्या लेखात हा महत्त्वाचा संदर्भ का गाळला गेला ते जाणून घ्यायला आवडेल.
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.
एचआरएने भारतातील डाव्या विचारसरणीला चांगलाच आधार दिलेला आहे. भगतसिंग आणि मित्रमंडळी हे भारतातील आद्य "साथी" आहेत असाही दावा केला जातो. असो... इच्छुकांनी भगतसिंगांचे लिखाण मुळातून वाचावे. दाखला म्हणून एक नमुना येथे देत आहे.
असेंब्लिमध्ये स्वतःला अटक करवून घेणार्या शहिदांनी उधळलेले खालील पत्रक इच्छुकांनी थोडा वेळ काढून वाचावे. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे काय संघटना होती याचा थोडा अंदाज येईल. ही तरुण मंडळी म्हणजे नुसते दरोडे/ खून करणारी भडक डोक्याचे तरुण हा प्रपोगंडा दूर होण्यास थोडी मदत होईल. तालिबान, दरोडेखोर आणि एचआरए यांतील तुलनेतील फोलपणा लक्षात येईल.
Leaflet thrown in the Central Assembly Hall, New Delhi at the time of the throwing voice bombs.
On the 8th April, 1929, the Viceroy's proclamation, enacting the two Bills, was to be made, despite the fact that the majority of members were opposed to it, and had rather rejected in earlier.
THE HINDUSTAN SOCIALIST REPUBLICAN ARMY
(NOTICE)
"It takes a loud voice to make the deaf hear, with these immortal words uttered on a similar occasion by Valiant, a French anarchist martyr, do we strongly justify this action of ours."
"Without repeating the humiliating history of the past ten years of the working of the reforms (Montague-Chelmsford Reforms) and without mentioning the insults hurled at the Indian nation through this House-the so-called Indian Parliament-we want to point out that, while the people expecting some more crumbs of reforms from the Simon Commission, and are ever quarrelling over the distribution of the expected bones, the Government is thrusting upon us new repressive measures like the Public Safety and the Trade Disputes Bill, while reserving the Press Sedition Bill for the next session. The indiscriminate arrests of labour leaders working in the open field clearly indicate whither the wind blows."
"In these extremely provocative circumstances, the Hindustan Socialist Republican Association, in all seriousness, realizing their full responsibility, had decided and ordered its army to do this particular action, so that a stop be put to this humiliating farce and to let the alien bureaucratic exploiters do what they wish, but they must be made to come before the public eve in their naked form."
"Let the representatives of the people return to their constituencies and prepare the masses for the coming revolution, and let the Government know that while protesting against the Public Safety and Trade Disputes Bills and the callous murder of Lala Lajpat Rai, on behalf of the helpless Indian masses, we want to emphasize the lesson often repeated by history, that it is easy to kill individuals but you connot kill the ideas Great empires crumbled while the ideas survived. Bourbons and Czars fell. While the revaluation marched ahead triumphantly."
"We are sorry to admit that we who attach so great a sanctity to human life, who dream of a glorious future, when man will be enjoying perfect peace and full liberty, have been forced to shed human blood. But the sacrifice of individuals at the altar of the 'Great Revolution' that will bring freedom to all, rendering the exploitation of man by man impossible, is inevitable."
"Long Live the Revolution."15
Sd/-
Balraj16
Commander-in-Chief
- एकलव्य
पत्रक वाचले. त्यात गांधीजींना शिव्या घालणारा, गांधीजींच्या नावाने खडे फोडणारा किंवा गांधीजींची हेटाळणी करणारा एक शब्दही नाही. (खुद्द भगतसिंहांनी सुद्धा आपल्या उभ्या आयुष्यात असे काही केल्याचे ऐकिवात नाही.)
भगतसिंहांचे नाव पुढेपुढे करण्यात आपले मोठेपण मानणारे भगतसिंहांचा हा आदर्श का पाळू शकत नाहीत हे एक कोडेच आहे.
मुद्दामहून हलकट
हम्म्म्म्...
भगतसिंहांच्या शब्दकोशात हे शब्द नसावेतच किंवा भगतसिंहांना हे शब्द ऐकून माहीत नसावेतच असे म्हणता येणार नाही, परंतु आपल्या विरोधकांबद्दल निदान जाहीररीत्या तरी बोलताना त्यांनी या प्रकारचे शब्द वापरल्याचे ऐकिवात नाही. कदाचित त्यांचे कार्य मोठे असावे आणि त्यांना आपले मोठेपण सिद्ध करत बसण्याची (आणि त्यासाठी दुसर्याला हलकट वगैरे म्हणण्याची) गरज नसावी.
"मरणारे मरून गेले, आता फक्त (त्यांच्या नावावर) नस्ती ट्यँव ट्यँव करणारे उरले आहेत" हेच खरे वाटू लागले आहे. ("मग ते कोणासाठी मेले" या प्रश्नाचे उत्तर "त्यांचे नाव पुढे करण्यात स्वतःचा मोठेपणा मानणार्यांच्या सोयीसाठी" असे असावे की काय ते कळत नाही. आपल्या पश्चात आपल्या स्मृतीचा असा उपयोग होईल हे जर त्या थोर हुतात्म्यांना आधी कळते, तर "त्यापेक्षा आपले बलिदान विस्मृतीत गेलेले बरे" असे त्यांना निश्चित वाटते! असा दुरुपयोग होणार असेल तर आपले बलिदान खरोखरच "वर्थ" आहे काय / "व्यर्थ" तर नाही ना, याचा फेरविचार त्यांनी निश्चितच केला असता, असे वाटते*. [गांधीजींचेही तेच झाले म्हणा! त्यांच्या पश्चात भलत्यांनी त्यांच्या नावावर आपली पोळी भाजून घेतली.])
*पण नसता केला. कारण क्रांतिकारक काय किंवा गांधीजी काय, आपापल्या तत्त्वांसाठी लढत होते. आपल्या पश्चात आपल्या नावाचा / स्मृतीचा भलतेच दुरुपयोग करतील याची त्यांना पर्वा नसावी.
मुद्दामहून हलकट
टग्यादादा - धम्मकलाडूंचे प्रश्न मुद्दामहून हलकट याच प्रकारात येतात. त्याला दुसरे काय संबोधन देणार ते सांगावे. (हे प्रामाणिकपणे विचारतो आहे. मनात आकस न ठेवता विश्वास ठेवावा.) माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे. एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच.
असो...आपण कोणाची भलामण करतो आहोत की कोणाच्या हाती खेळविलो जात आहोत याचा सूज्ञांनी क्षणभर विचार करावा.
माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे.
धन्यवाद.
एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच.
तुम्ही चर्चेला पुन्हा एक विनोदी वळण देत आहात!
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.
इति एकलव्य
गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
इति सर्वसाक्षी.
एकलव्य,
क्रांतिकारकांचा विषय निघाला सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे कधीच सोडून दिले आहे. कृपया, आपण आपल्या प्रतिसादांतून नाही नाही त्या खोटारडेपणावर पांघरूण घालू नये ही विनंती.
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. (मी कोण काय म्हणणार?) पण आपल्यासारखे डोळस लोक याला बळी पडतात ते पाहून खेद झाला.
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही.
खरेच. सैंया भये कोतवाल तो डर काहे का?
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
< दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. >
इथे नकी वाह्यात काय लिहिले गेले आहे? निदान माझ्या लेखात तरी असे काही नाही. मात्र हे सांगताना क्रांतिकारकांना तालिबानी अतिरेकी म्हणणे वा दरोडेखोर म्हणणे कुठल्या संकेतस्थळाची शोभा वाढवते का तेही सांगा.
इथे गांधींनी क्रांतिकारकांचा द्वेष केला असे लिहिलेले आहे आणि यात गांधीद्वेष कुठे आला? अगदी हुतात्मा मदनलाल धिंग्रांपासुन ते नेताजींपर्यंत प्रत्येकाचा तिरस्कार गांधींनी केली हे सत्य आहे. ज्यांना बहुमताने निवड्ले आहे त्या नेताजींना गांधींनी आपल्या अहंकारापायी हाकललेच ना?
तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.
तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.
मला गांधीही प्रिय आहेत आणि क्रांतिकारीही. त्यापैकी कोणासाठीही द्वेषबुद्धी मी पाळलेली नाही. द्वेषबुद्धीने प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, लेख लिहिलेले नाहीत आणि प्रतिसादही लिहिलेले नाहीत. मात्र आपल्याबद्दल असेच म्हणावेसे मला वाटत नाही. राहीली गोष्ट धमकीची तर मी वरचेच वाक्य पुन्हा लिहिते -
क्रांतिकारकांचा विषय निघाला की सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे मी सोडून दिले आहे.
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही.
यात धमकी नेमकी कोठे आहे हे समजले नाही. 'या कर्माचे हे फलित आहे' अशा प्रकारच्या विधानात्मक वाक्यात मला तरी काही धमकीवजा दिसत नाही.
('गांधीजींबद्दल काही वाह्यात लिहिलेत तर मीच मिसळपावाची प्रसिद्धी गांधीद्वेषाचे मुखपत्र म्हणून करीन' असे जर विधान असते तर ती धमकी झाली असती. तसे विधान केल्याचे आढळले नाही. 'गांधींबद्दल वाह्यात लिहिलेले खपून जाते, इतके की मिसळपाव हे गांधीद्वेषाचे मुखपत्र म्हणून सहज खपून जावे' हे वैयक्तिक मतप्रदर्शन झाले, धमकी नव्हे. आणि 'हीच इच्छा असल्यास माझे काहीच म्हणणे नाही' यात तरी धमकी कोठे आली हेही कळत नाही.)
प्रतिवाद्याने न केलेल्या कृतींचे आरोप हे गैरसमजातून येतात की तत्त्वांतून हे कळत नाही.
तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.
(उलटपक्षी हीच भाषा धमकीवजा आहे असा प्रतिवाद केला जाऊ शकतो. असो.)
इथे गांधींनी क्रांतिकारकांचा द्वेष केला असे लिहिलेले आहे आणि यात गांधीद्वेष कुठे आला?
प्रस्तुत क्रांतिकारक किंवा प्रस्तुत क्रांतिकारी घटनेबद्दलची माहिती देताना या वाक्याचे काहीही महत्त्व अथवा त्याची कोणतीही गरज वाटत नाही. (या वाक्याशिवाय प्रस्तुत लेख लिहिल्यास क्रांतिकारकांविषयीच्या अथवा त्या घटनेविषयीच्या माहितीत तसूभरही फरक पडत नाही.) परंतु अशा प्रत्येक लेखात अशी वाक्ये समान धागा म्हणून येऊ लागली तर लेखनाच्या हेतूबद्दल शंका निश्चित निर्माण होतात.
'गांधींचे कार्य केवळ कोणत्याही क्रांतिकार्यात मोडता घालणे एवढेच होते' असे समान सूत्र जर प्रत्येक लेखातून प्रतीत होऊ लागले तर या आख्ख्या लेखमालेची प्रेरणा क्रांतिकारकांबद्दल आदर किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती देणे ही नसून निव्वळ गांधीद्वेष ही आहे हे मानण्यास भरपूर जागा राहते.
इथे नकी वाह्यात काय लिहिले गेले आहे? निदान माझ्या लेखात तरी असे काही नाही.
आपल्या लेखांत गांधींबद्दल प्रत्यक्षपणे वाह्यात असे काहीही लिहिलेले नसले तरी वर म्हटल्याप्रमाणे गांधीद्वेषाचे एक समान सूत्र तरी निश्चितच प्रतीत होते. आणि त्यावर येणारे गांधीविषयक बरेचसे प्रतिसाद (किंवा गांधींवर किंवा गांधीवादावर लिहिण्यात येणार्या कोणत्याही लेखावरचे बरेचसे प्रतिसाद - एकंदरीतच 'गांधी' या विषयावर मिसळपावावर येणारे बरेच प्रतिसाद) हे वाह्यात असतात.
अर्थात (द्वेषपूर्ण वाटण्यासारखे असले तरी) स्वतः वाह्यात न लिहिण्यामुळे वाह्यात लिहिण्याचा आरोप व्यक्तिशः आपल्याला कदाचित लागू होत नाही, परंतु 'दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते' हे विधान (१) मिसळपावावरील बर्याच गांधीविषयक प्रतिसादांबद्दल एक सामान्य निरीक्षण म्हणून सत्य आहे, आणि (२) या विधानातून आपल्यावर वाह्यात लिखाणाचा व्यक्तिगत आरोप झाल्याचे दिसत नाही.
मात्र क्रांतिकारकांवरील प्रत्येक लेखात गांधींबद्दल ओढूनताणून एखादे विधान आणणे हा नेमका खोडसाळपणा होतो की वाह्यातपणा हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल. (हे माझे वैयक्तिक मत. प्रियालीताईंच्या किंवा इतर कोणाच्याही विधानांशी याचा काहीही संबंध नाही.)
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.
मुळात प्रश्न विचारण्यार्याची भुमिका अल्लड किंवा हलकट असेल तर उत्तर देण्यात काय हशील आहे? आणि तरिही उत्तर देण्याइतके हे प्रश्न रास्त वाटले ना? मग अनावश्यक हलकट्/अल्लड इ.इ. शब्दांचे डोलारे कशाला?
आपला तो सभ्यपणा दुसर्याचा मात्र हलकटपणा! :)
मुळात प्रश्न विचारण्यार्याची भुमिका अल्लड किंवा हलकट असेल तर उत्तर देण्यात काय हशील आहे? आणि तरिही उत्तर देण्याइतके हे प्रश्न रास्त वाटले ना? मग अनावश्यक हलकट्/अल्लड इ.इ. शब्दांचे डोलारे कशाला?
ज्या हलकटपणे धम्मकलाडूंनी क्रांतिकारकांच्या हेतूंना नको नको ते संदर्भ लावले त्याने मला वेदना झाल्या आणि उत्तर द्यावेसे वाटले. त्याचा अर्थ ते प्रश्न रास्त होते असे होत नाही. क्रांतिकारकांवर टीका मी ही केलेल्या आहेत आणि इतरजण जेव्हा प्रश्न उभे करतात त्यामागे हलकटपणाच काय पण हलगर्जीही असावी असे माझ्या मनातही येत नाही.
आपण माझ्या थेट उल्लेखाला डोलारे म्हणत असाल तर जरूर म्हणा. आपली मर्जी!
तुम्हाला वेदना होतात तर ऐका हे वेदनाशमक गाणे ढगाला लागली कळ.... यूट्यूबवर
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धम्मकलाडू - आपल्या प्रश्नांमागील भावना लक्षात आल्याने आपली संभावना "हलकट" अशी केली होती. तसे असले तरीही प्रश्नांची उत्तरे(१) मात्र तारतम्य सांभाळूनच दिलेली होती. क्रांतिकारकांविषयी जाणूनबुजून घाणेरडे बोलायचे आणि त्यावर आउट ऑफ द वे जाऊन दादा कोंडकेंचे गाणे सुचवायचे ह्याने आमचे डोके बिलकुल फिरत नाही. आपल्या विकृत पण प्रेमळ सल्ल्याबद्दल आभार. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो ह्या म्हणीला जागून फक्त आपली ही असली विकृती आम्ही निव्वळ विनोद म्हणून सोडून देत नाही इतकेच.
अवांतर -
(१) सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली नाहीत कारण काहींची सर्वसाक्षींनी त्यांच्या प्रतिसादात दिलेली होती.
(२) विचारलेल्या मूर्ख प्रश्नांना उत्तरे देण्याचे बंधन त्यांनी बाळगले नसते तरी चालले असते. मात्र स्वतः दिलेल्या उत्तराबद्दल बळकटी देण्यासाठी दाखले देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे मला वाटते.
(३) हा म्हटले तर स्वतंत्र आणि म्हटले तर संलग्न विषय असल्याने अवांतरात टाकले आहे. प्रतिसादांची जवळजवळ शंभरी भरलेली असल्याने स्वतंत्र प्रतिसाद न देता येथेच अवांतरात समारोप करतो आहे.
क्रांतिकारकांबद्दल कुणीही वाईट बोललेले नाही. एकंदरच तुम्हाला भाषेची, भाषेच्या अलंकारांची काहीच समज नाही किंवा/शिवाय/आणि तुम्ही अत्यंत खोटारडे व ढोंगी आहात (क्रांतिकारकांविषयी जाणूनबुजून घाणेरडे बोलायचे या तुमच्या वाक्यामुळे) यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. असो. (अंडरविअर न घातलेल्या) एखाद्याची चड्डी (अर्धी हं) चारचौघांत कोणी खाली खेचली तर त्याला राग येणारच म्हणा. अशा माणसाने "हलकट" म्हणून संभावना केलीच तर ती अत्यंत आनंददायक बाब आहे. मम तपाला फळ मिळाल्याचीच ही पावती आहे. तुम्ही वारंवार अशा पावत्या देऊन धन्य करताहात. धन्यवाद.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विशीत वा फरतर तिशीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना कुणाचा द्वेष करायला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. त्यांनी फक्त मातृभूमिवर अपार प्रेम केले.
हेच खरे! मात्र त्यांचे नाव पुढेपुढे करण्यात स्वतःचा मोठेपणा मानणार्यांना (आणि तसे करताना ज्यांचे [ज्या नेत्यांचे] विचार पटत नाहीत त्यांच्या नावाने खडे फोडण्यातच मातृभूमीवर प्रेम मानणार्यांना) द्वेष करायला भरपूर वेळही आहे आणि इच्छाही आहे असे दिसून येते. कदाचित स्वतः हौतात्म्य पत्करावे न लागल्यामुळे हा वेळ मिळत असावा आणि इच्छाही होत असावी असे वाटते.
तसे करताना ज्यांचे [ज्या नेत्यांचे] विचार पटत नाहीत त्यांच्या नावाने खडे फोडण्यातच मातृभूमीवर प्रेम मानणार्यांना) द्वेष करायला भरपूर वेळही आहे आणि इच्छाही आहे असे दिसून येते.
टग्यादादा देशभक्तांवर लेख लिहून द्वेष करतात का काहींचा? गांधींना मोठे करण्यासाठी क्रांतिकारक किंवा संघाबद्दल खोटे नाटे लिहितात का? मी वाचलेले नाही जरा दुवे द्या ना. वाचायची उत्सुकता आहे.
बाकी, खरडाखरडी करायला वेळ काय हो त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. :)
प्रतिक्रिया
आवडला लेख.
सहमत
मेहनत
क्रांतिकारकांसमोर नतमस्तक
असेच म्हणतो
कट्टर विरोधक
जुने प्रतिसाद चाळायला हवे
राष्ट्रपिता
काकोरी
धन्यवाद साक्षीजी.
असेच म्हणतो!
पटेश रे
मस्तच, अगदी
छान...
मनातले बोललात!
अतिशय
रसभंग.
पारंगत वगैरे
बाणा
सहमत.
समयोचित!
श्रध्दांजलि
सर्वसाक्ष
काही प्रश्न
हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना
ही संघटना
गांधींना
आंधळी भक्ती
इथे
चुकीचा सल्ला(?)
थोडी भर
हम्म्म्म्......
टग्यादादा
चर्चेला पुन्हा एक विनोदी वळण
क्रांतिकारकांबद्दल प्रेम म्हणजे गांधींचा दुस्वास
प्रियालीताई
सहमत
सैंया भये कोतवाल तो डर काहे का?
ही धमकी कशाला?
द्वेष
तारतम्याची अपेक्षा
धमकी???
धम्मकलाडू
समीर
मुद्दामहून हलकट !
विषयास धरून...
मम तपाला फळ मिळाल्याचीच ही पावती
हेच खरे!
टग्या भाऊ,
जरा दुवे देता का?