Skip to main content

कलेवराचा उत्सव?

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 06/10/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही. सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला. त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा. 'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो. उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे. सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही. संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही. आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो. ब्लॉग दुवा हा

वाचने 54501
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत. काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि. पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

In reply to by दत्ता जोशी

माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते. बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

In reply to by दत्ता जोशी

चालणार नाही. पळेल मात्र.

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

In reply to by काळा पहाड

त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

In reply to by काळा पहाड

+१११११११११११११११११११११११११११ हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

In reply to by नीलमोहर

ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर. आवडले. काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते. तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट. मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

In reply to by जातवेद

पहाडी आवाजात कडकड झालाय? सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु. इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले. त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का! कावळा लागला थुईथुई नाच करू तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची... ...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो... धन्यवाद!

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला. एकदम सही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

एकदम सही काला पहाड़ याची प्रतिक्रिया ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, काळा पहाड - Wed, 07/10/2015 - 20:57

माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून? जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते. पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

In reply to by रेवती

वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

In reply to by रेवती

वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

In reply to by तर्राट जोकर

घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

In reply to by रेवती

तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !

In reply to by वेल्लाभट

संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।

त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

In reply to by पैसा

हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

In reply to by वेल्लाभट

माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

In reply to by चतुरंग

>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)

In reply to by चतुरंग

काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

In reply to by चैतन्य ईन्या

ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

In reply to by चतुरंग

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

ग्रँड या शब्दावरून पुन्हा जो विपर्यास झालाय तो हास्यास्पद आहे. Absolutely childish. Ok this has now become a series of baseless arguments. So; I am done. तुमचं चालूदे.

In reply to by वेल्लाभट

ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy

धागालेखकाच्या मूळ उद्देशाचा फालुदा होने मिसळपाववर विशेष नाही असे दिसते. एवढ्यातले काही धागे बघितले तर कळोन आले.

संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

In reply to by टवाळ कार्टा

हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

In reply to by सतिश गावडे

या नाचणार्यांच्या घरचे पालक संस्थळांवर हे सगळे किती वाईट असे टायपत बसलेले असू शकतील :)

In reply to by सतिश गावडे

आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?

In reply to by धर्मराजमुटके

नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

In reply to by मोदक

व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

In reply to by वेल्लाभट

तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

In reply to by रेवती

कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान