मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी : जून २०१९

डॉ सुहास म्हात्रे ·

In rare move, Pakistan military agrees to budget cut amid economic woes पाकिस्तानची आर्थिक हालत इतकी खस्ता झाली आहे की, कधी नव्हे ते पाकिस्तानी सैन्याने या वर्षीचे बजेट स्वतःहून कमी करून घेतले आहे.

ट्रम्प Wed, 06/05/2019 - 20:10
जानते राजे त्या दिवशी दिल्हि मध्ये असून सुद्धा मोदींच्या शपथविधि ला हजर राहिले नाही कारण क़ाय तर पाचव्या रांगेत त स्थान देवून अपमान केला गेला . पण आज राष्ट्रपती भवनातून पत्रक प्रसिद्ध करून ठामपणे सांगण्यात आले कि जाणत्या राजा ला पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते . याचा अर्थ सरळ आहे की राष्ट्रपती भवन धडधडित खोट बोलत आहे , कारण उभ्या हयातीति आमचे राजे खोटे कधी बोलले नाहीत , यू टर्न कधीच नाही :)

In reply to by ट्रम्प

चौथा कोनाडा Wed, 06/05/2019 - 21:22
दिल्लीवाल्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की पहिल्या पहिल्या रांगेच्या प्रवेशिकेवर रांग क्रमांक V ( इंग्रजी अक्षर व्ही) असे छापले होते जी पहिली रांग होती ( V= व्हीआयपी असे असेल कदाचित) जा. राजांनी असा समज करून घेतला कि रोमन V हा आकडा म्हणजे पाचवी रांग आहे. अपमान केलाय आपला. अनुपस्थित राहिले. स्पष्टीकरणाचा तर्क पटण्या सारखा आहे. बघा याचं पुरावा उत्खनन करून काही मांडता येते का ! (हे जा. राजा म्हणजे अर्धवट विधानं करून गुल्लाड होतात. ठामपणे राग ही व्यक्त करत नाहीत, ईव्हीएम आरोपांचं पण तसंच, पुरावा देत नाहीत नुसतंच गुगली टाकत राहायचं ... मग अश्यांन मतदारांना विश्वासाहर्ता वाटत नाही ना ... अन मग निवडणुकीत मतदारही गुगली टाकतात, त्यांच्या नातवाला सुद्धा घरी बसवतात !)

In reply to by चौथा कोनाडा

ट्रम्प Wed, 06/05/2019 - 21:55
पुत्री च्या भविष्या मुळे उलट सुलट विधाने करत असतील दूसरे काय ? पण प्रधानानीं पुत्र प्रेमापोटी वेळो वेळी राजाला धोबी पछाड़ दिली आणि हे तमाम जनते ने बघितले .

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे गुरुवार, 06/06/2019 - 10:56
इ व्ही एमचं "अवघड जागी (गुप्त) दुखणं आणि गावातला एकमेव डॉक्टर जावई" अशी स्थिती झाली आहे. इ व्ही एम घोटाळा म्हटलं तर श्रीमती सुप्रिया सुळे कशा निवडून आल्या? आणि बरोबर म्हटलं तर पार्थ पवार कसे पडले? म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.

प्रसाद_१९८२ गुरुवार, 06/06/2019 - 11:09
केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपाने, शिवसेनेला पुन्हा एकदा 'अवजड उद्योग मंत्रालय' देऊन त्यांची बोळवण केली आहे. आता आणखी एक मंत्रीपदासाठी सेनेने भाजपाकडे तकादा लावला आहे. जर भाजपाने आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला न दिल्यास, गेली पाच वर्षे सांभाळून ठेवलेले खिशातले राजीनामे आता तरी बाहेर येतील का ? . . . मला वाटते, ह्या अवजड उद्योग मंत्रालयाची निर्मीती खास शिवसेनेकरताच करण्यात आली आहे. :))

डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 14:03
मोदी सरकार जोमाने कामाला लागलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे मिडीया मध्ये बर्याच लोकांना सशक्त विरोधी पक्षाची गरज वाटत आहे. पण सशक्त विरोधी पक्ष नेमक कोण हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. अर्बन नक्षल ध्रुव राठी याने एक वेगळच तर्कट दिल होत. काँग्रेसला आता सुद्धा विरोधी पक्ष बनण्यासाठी २ सीट कमी पडत आहेत. एन डी ए सरकारने तरी सुद्धा काँग्रेसल विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली पाहिजे. कारण आपने जेंव्हा दिल्ली मध्ये ७० पैकी ६७ जागा पटकावल्या तेंव्हा फक्त ३ जागा भाजपाला मिळालेल्या तरी सुद्धा भाजपाला विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली.

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे Fri, 06/07/2019 - 12:27
विरोधी पक्ष नेता हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याला स्वतंत्र पगार आणि इत्तर भत्ते आणि सरकारी सोयी दिल्या जातात. त्यासाठी विरोधी पक्षाकडे लोकसभेत कमीत कमी ५५ जागा पाहिजेत. त्या नसतील तर असे पद देणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून हे पद अतिरिक्त / तद अर्थ -AD HOC (विना आर्थिक लाभ) दिले जाऊ शकते उगाच कोणी उपटसूंभ म्हणतो म्हणून पद देणे हे चुक ठरेल

डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 14:06
मनेका गांधींना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काय कारण असावे ? काहींच्या मते लोकसभा स्पिकर म्हणुन नेमणुक होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प Sat, 06/08/2019 - 12:40
काल वायनाड मध्ये रागानीं " नफरत को हम प्यार से जवाब देंगे " असे सांगितले . हे वाक्य त्यांनी जनते ला की भाजप ला उद्देशुन केले हे नाही . देशातील मतदार काँग्रेस बरोबर नफरत करतात हे त्यांनी मान्य केले , असा आपण समज केला की मग आता फक्त नफरत का करतात याचा एकदा शोध घेतला की काँग्रेस पवित्र झाली अस समजायच का ?

ट्रम्प Sat, 06/08/2019 - 12:55
काळा ने राकॉ वर चाबुक ओढला .... ज्या संघाची चड्डि वरुन आयुष्य भर हेटाळनी केली त्या संघाच्या कार्यपद्धति चा अभ्यास कार्यकर्त्यांना करायला सांगण्याची वेळ राकॉ च्या सुप्रीमो वर आली .........

प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 11:50
सकाळची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत, संघ कार्यकर्त्यांची बरिच वर्दळ सुरु होती. इतक्यात एक आलिशान फॉर्चुनर गाडी ब्रेक करकचून दाबर शाखेच्या दारावर थांबते. गाडीतून दोन-तीन बाऊंनसर टाईप लोक खाली उतरतात व थोडा वेळ थांबून गाडीचा दरवाजा उघडतात. संपूर्ण पांढरा सदरा, पॅंट, पायत सफेद चपला व डोळ्याला रेबॉनचा गॉगल लावलेला एक इसम गाडीतून बाहेर उतरतो. -- तोंडात भरलेला पानाचा तोबरा एका कोपर्‍यात रिकामा करत, समोर धावपळ करणार्‍या संघ स्वंयसेवकांना तो म्हणाला 'इथ ती चिकाटी- बिकाटी कुठ शिकवली जाते'? आमचा नेता म्हणला की जाऊन संघ स्वंयसेवकांकडून चिकाटी शिका, म्हनुन आलोय, क्लासचे पैशे कुणीकडे भरायचे ? -- फेसबुक वरुन ;

In reply to by प्रसाद_१९८२

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 12:57
जबरदस्त, एकच नंबर किस्सा. मीपण मीपण , सायंशाखेवर ची वर्दळ आताशा कुठे ओसरत आली होती, त्या पॉश उपनगरातील तिनचारशे शिशु आणि कुमार स्वयंसेवकांचा देशभक्तीपर आरव वातावरणाला कसा रोमांचित करून गेला होता. इतक्यात जोरात ब्रेक दाबत एक हिरवट पिवळ्या रंगाची दणकट जीप धूळ उडवत थांबली. आपल्या मजबूत बुटांचा जोरकस आवाज करत तीनचार काटक जवान सावधान अवस्थेत उभे झाले. गर्द हिरव्या रंगाचा कडक गणवेश घातलेला एक अधिकारी ताडताड पावले टाकत सायंशाखेच्या शिक्षकासमोर उभा राहिला. विनम्रतेने हात जोडून तो विनंती करता झाला. " ते ध्वजारोहणाची पद्धत आणि ध्वज प्रणाम म्हणजे काय असते? कुठे आणि किती दिवसात शिकवतात ते?" . बहुतेक कुठूनतरी साभार.

In reply to by अभ्या..

प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 13:21
अभ्या सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दिसता. __ तुमच्या भावना दुखावल्या बद्दल माफी.

In reply to by प्रसाद_१९८२

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 13:35
अरे, आपल्या आपल्यात काय माफी? मी संघाचाच, सहा वर्षे शाखा, एक ओटीसी, मग अभाविप, आधी कार्यालय मंत्री, मग शहरमंत्री. एक वर्ष पूर्णवेळ, दोन अधिवेशने, तीस चाळीस आंदोलने, पाच अटका. त्यानंतर भाजपा, परिवारातील प्रकाशनात काम, त्यासोबत भरपूर जबाबदार्या. . चेक करून पाहा वाटल्यास. गरज असेल देऊ का रेफरणसेस? . आपण?

ट्रम्प Sun, 06/09/2019 - 19:45
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . त्यामुळे आयुष्यभर संघाला हिणवणाऱ्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांनां संघाची महत्ती सांगताना लाज वाटली नसेल का ? तरी बर आहे या वेळेस महाराष्ट्रात तरी भाजप ला मतदान घड़ऊन आणण्यासाठी संघाला धावपळ करण्याची गरज भासली नाही .

In reply to by ट्रम्प

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 23:12
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही अर्धा भाग अगदी परफेक्ट, पूर असो की भुकंप, अवर्षण असो की अतिवर्षा, युध्द असो की दंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्य जनतेस अनेकदा मदतीचा हात दिला आहे आणि त्या मदतीतील शिस्त, निर्व्याजपणा, अचुकता आणि सेवाभाव निष्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि वेळोवेळी त्याचे कौतुक होत आलेले आहे. मुलतः भारतीय मानसिकता अशा संकटाच्या वेळी भांबावुन जाण्याची जास्त आहे. आपत्ती व्यवस्थापन हा विषयच मुळी आजकाल गंभीरपणे घेतला जातोय. पूर्वीपासून एखादी दुर्घटना घडली की सैरावैरा पळणे, कशाचा पायपोस कशात नसणे, कुणी मदत जरी केली तरी ती अव्यवस्थितपणे, बेशिस्त, असमान पध्दतीने वाटली जाणे, वैद्यकीय मदत ही विस्कळीत स्वरुपाची असणे अशाच पध्दतीने हाताळली जाई. सिस्टिमॅटिकली मदत करण्यात प्रथम क्रमांक जाई सैन्यदलाला. कडवी शिस्त, प्लानिंग करुन हुकुमानुसार सर्व अनुयायांनी आचरण करणे, परिस्थितीची, सुखसोयीची तमा न बाळगता युध्दपातळीवर मदत करणे आणि बरीचशी साधने(डॉक्टर्स, यंत्रसामग्री, दळणवळण, पैसा) हाताशी असलेने सैन्यदल अशा परिस्थितीत कायमच प्रभावी ठरलेले आहे. सैन्याच्या ह्या काही गुणांचा समावेश संघाच्या मदतकार्यातदेखील आहे. त्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक करावेच लागेल पण ह्या कार्यापाठीमागे बर्‍याच गोष्टी असतात. संघाचे शहरी उच्च्शिक्षित भागात असलेल्या कार्यामुळे डॉक्टर्स वगैरे लोकांचा समावेश अशा मदतकार्यात नेहमीच राहिला आहे. सोबतच बर्‍याच संघविचारांच्या कार्य्कर्त्यांचे समाजात असलेले निरपेक्ष कार्यकर्ता म्हणून असलेले वजन उपयोगी पडलेले आहे. हे लोक अपहार करणार नाहीत ह्याची खात्री असलेने समाजाने पण वेळोवेळी संघाच्या पाठिमागे मदतीचा हात ठेवलेला आहे. बर्‍याच गावी संघविचाराने स्थापन केलेल्या ब्लड बँका, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पतसंस्था, बँका आदि संस्था अशा वेळी पूर्ण ताकदीने उभ्या राहिलेल्या आहेत. ह्याउलट इतर पक्षांची स्थिती आहे. संघातून जसा भाजपाचा जन्म आहे आणि संघाचा कार्याचा वारसा आहे तसा इतर पक्षांचा नाहिये. त्यामुळे संघ करतो आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस करत नाही अशी तुलनाच चुकीची आहे. काँग्रेस म्हणा कि इतर पक्ष म्हणा त्यांचे कार्यकर्त्यांचे स्वरुप निराळे आहे. त्यांची मदतीची आणि ती शिस्तबध्दपणे करण्याची पध्दत नाहीच आहे. तशी तुलनाच करायची असेल तर आजच्या भाजपाची आणि काँग्रेसची मदतीची करावी. म्हनजेच राजकीय पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची करावी. दुर्घटनेतच नव्हे तर इतर बर्‍याच ठिकाणी म्हणजे देवस्थाने, सण समारंभ, गर्दीचि ठिकाने, समाजातील काही छोट्यामोठ्या गोष्टी अशात मदत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करत असतात पण ते एक्जिनसी संघटनेची मदत ह्या स्वरुपात दिसत नसते. कित्येक सामाजिक कार्यकर्ते मग बाबा आमटे असोत की डॉ बंग दंपती असोत, राजकीय अजेंडा न ठेवता राबत असतात, शिवसेनेसारखे पक्ष आनि त्यांचे शिवसैनिक कित्येक दुर्घटनामध्ये, अपघातांमध्ये स्वतःच्या खिशाला खार लावून नागरिकांना मदत करतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. घरगुती किंवा लोकल आणिबाणीच्या प्रसंगीही ते सगळ्यात आधी धावत येतात. अशा दुर्घटनामध्ये त्यांनीही प्रचंड मदत निरपेक्ष स्वरुपात केलेली असते. शिरडी, तिरुपतीसारखी कित्येक श्रीमंत देवस्थाने, निरंकार बाबा, ब्रह्माकुमारी, पुट्टपर्ती साईबाबासारखी विवाद्य संतस्थानेही अशा वेळी प्रचंड मोठ्या स्वरुपात मदत उभी करतात. अगदी किल्लारी भुकंपातदेखील जिथे संघाचे कौतुक झाले तिथेच सेवादलानेही भरपूर काम केले. एक्सप्रेस ग्रुपला बांधून घेउन भुकंपात आईवडील गमावलेल्या मुलांसाठी खूप मोठी निवासी शाळा आपले घर ह्या नावाने चालु केली. ती अजुनही चालु आहे. टाटा सोशल सायन्सचे काम त्या काळात उभे राहिले. लॉरी बेकरसारखे अभियंता आणि स्थापत्यविषारदांच्या शिष्यमंडळींनी भुकंपरोधक घरे बांधायला मदत केली. परदेशातून मदत मिळवायला शरद पवारांनीही भरपूर प्रयत्न केले, समाजाच्या सर्व थरात मदत करायची भावना असतेच. फक्त पध्दत वेगवेगळी असते. राजकारणी पक्षांनी किती आणि कशी मदत केली हा चर्चेचा किंवा हिणवण्याचा विषय होऊन नये असे वाटते. तेथील लोकप्रतिनिधींनी अवश्य काम केलेच पाहिजे पण कुणा पक्षांने ते काम केलेच नाही असे कधीच नसते. मदतीच्या कार्यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, संस्था जे जीव तोडून मेहनत करतात ते कौतुकास्पद आहे पण त्या मदतीची अशी जाहिरात करुन किंवा मनानेच किस्से लिहुन त्याची किंमत कमी करु नका इतकी प्रार्थना. त्याचा कुणास हिणवण्यासाठी वापर करु नये असे मनापासून वाटते. धन्यवाद

In reply to by अभ्या..

आनन्दा Mon, 06/10/2019 - 10:56
संपूर्णपणे सहमत. दुर्घटनेच्या वेळी सर्व संघटना मदत करत असतात. फरक कुठे नेमका पडलाय ते सांगतो. सर्व माध्यमे नेहमीच आतापर्यंत संघाला जातीयवादी आणि विशेषतः ब्राह्मणी संघटना म्हणून प्रसिद्धी देतात. पण प्रत्यक्ष संघाचे on field काम पाहताना तसे काही दिसत नाही. म्हणजे संघाने कधी आपत्तीमध्ये हा मुसलमान आहे म्हणून कोणाला मदत नाकारल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे जेव्हा आपत्ती येते तेव्हा तिथले सेवाकार्य पाहून लोकांची संघाबद्दलची उत्सुकता चालवली जाते, कारण ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक पडतो तेव्हा ऐकवणाऱ्या माणसावरचा विश्वास उडतो. दुसरी गोष्ट जाहिरातीची - प्रत्येक संस्थेची कार्यपद्धती वेगळी असते. माझया माहितीत कोणीही इतरांचे कार्य कमी लेखल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना आपत्तीमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था उत्तम समन्वयाने काम करत असतात. पण संघाने जर या कामाचा वापर आपल्यावरचे जातीयवादी लेबल हटवण्यासाठी केला तर त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेही संघाचा मूळ उद्देश सेवाकार्य हा नाही, संघटन हा आहे. सेवाकार्य असते तर मग एखादी NGO उघडता आली असती. पण तसे संघाने केले नाही, कारण ते सेवाकार्यापूरते मर्यादित नाही. सेवाकार्य हा संघाच्या कार्याचा एक भाग आहे. आणि त्याची जाहिरात करून ते मूल हेतू, जो आहे संघटन करणे, तो सध्या करू पाहतात. मला तरी यात काही चुकीचे दिसत नाही.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे Mon, 06/10/2019 - 11:22
रा स्व संघाची ७० वर्षे जाणीवपूर्वक केलेली बदनामी आणि अपप्रचार यातून लोकांना सत्य स्थिती काय आहे हे समजावणे हा संघाचा एक हेतू काही वर्षांपासून झाला आहे. हि बदनामी कशी असते ते पहा. अगदी सुरुवातीपासून उदाहरण द्यायचे झाले तर नथुराम गोडसे हे पूर्वी संघात जात असत त्यावरून संघाला गांधीवधात गोवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला गेला. यानंतर सुद्धा एखादा पूर्व संघ स्वयंसेवक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल तर "संघाचा स्वयंसेवक गुन्हेगार" अशी मोठा मथळा असलेली बातमी येते. अशी बातमी पूर्वीचा काँग्रेसी, समाजवादी किंवा कम्युनिस्टांबद्दल आलेली क्वचितच दिसते. सर्व प्रचार माध्यमे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे इतकी वर्षे केलेला अपप्रचार लोकांच्या लक्षात येत नसे परंतु आता सार्वजनिक न्यासावर सत्य फार पटकन उपलब्ध होत असल्याने "पत्रदलाल अन पत्रवारांगनांचे" पितळ उघडे पडत चालले आहे. यात कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांना संघाबद्दल वाटत असलेला द्वेष कारणीभूत आहेच. त्यांनी पण "राष्ट्र सेवा दल" सारख्या संघटना काढल्या होत्या पण त्या चालल्या नाहीत ( याची कारणे वेगवेगळी आहेत). आता रास्व संघ जर आपला प्रचार करत असेल तर त्यात गैर काय आहे? श्री प्रकाश आमटे सुद्धा आपल्या अत्युच्च कार्याला देणग्या मिळवण्यासाठी कार्यक्रम आणि प्रसिद्धी करतच असतात. शेवटी राम कृपे बरोबर दामकृपा पण तितकीच महत्त्वाची

In reply to by अभ्या..

ट्रम्प Mon, 06/10/2019 - 16:33
बाकी समाजकार्यात तुलना करु नये या मताचा मी पण आहे , पण अगदी ठरवून काँग्रेस च्या लोकांनी संघावर केलेले हल्ले आठवल्या वर चीड येते . त्याच प्रमाणे तुम्ही उल्लेखलेल्या सर्व संघटना ( काँग्रेस व रा कॉ वगळून ) निर्व्याजपणे समाजसेवा करतात आणि त्याबद्दल सर्वसमाजा कडून या संघटना चे वेळो वेळी कौतुक केले गेले , पण संघा च्या वाटेला फक्त भाजप व्यतिरिक्त पक्षांकडून व समाजातील इतर घटकाकडून अवहेलनाच आली . अस क़ाय पाप केलय संघाने की काँग्रेस सह पक्ष व तथाकथित पुरोगामी हे सगळे एकत्र येवून धोपटत बसतात !!!!

In reply to by ट्रम्प

भंकस बाबा Mon, 06/10/2019 - 17:59
संघ नेहमीच हिंदुच्या हिताचे बघतो. संघ भगव्या रंगाला प्राधान्य देतो. संघाची प्रार्थना संस्कृतमधे आहे. आपत्तीकाळात मदत करताना संघ ड्रेसकोडमधे असतो. त्यामुळे होते क़ाय की संकटात असलेल्या समुदायाला संघाचे कार्य उठून दिसते. हेच काम पोस्टर व बैनर लावून पण साध्य होत नाही. भाजपमधील बहुसंख्य नेते हे संघाच्या मुशितून आलेले असतात. त्यामुळे भाजपविरोधक नेहमीच संघाच्या विरोधात असतात. अनेक वेळा बंदीची भाषा करुनदेखिल संघ नव्या उमेदिने पुढे येतो. आता हे सर्व मुद्दे आल्यावर सर्वधर्मसमभाववाले, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले, शांतिप्रिय समाजवाले, धर्मांतरण करून पोटाची खळगी भरणारे यांच्या पोटात दुखणारच ना?

डँबिस००७ Mon, 06/10/2019 - 12:16
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . रा स्व संघासारखी संस्था भारतात आहे हेच आपले भाग्य आहे. अन्यथा मदतीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय एन जी ओ करोडो रुपये गोळा करतात, आपल्या आंतरराष्ट्रीय एन जी ओ स्टेटसच्या दबावा खाली लोकल प्रशासनाला मदत कार्यासाठी एकाधीकार मागतात मग जमवलेल्या पैश्याने धर्म परिवर्तन करतात, चर्च बांधतात. अशी अनेक उदाहरणे भारतात घडलेली आहेत. लोकल प्रशासन त्यावेळेला मुग गप्प बसते. सुनामि च्या वेळेला तामिळनाडु सरकारने भारतातल्या इतर सेवाभावी संस्थांना मदत कार्यासाठी परवानगी नाकारली. ती परवानगी त्यांनी वर्ल्ड व्हीजन नावाच्या अमेरीकेतल्या एन जी ओ ला दिली. हिंदुंचे मास धर्म परिवर्तन करण्याची ख्रीश्चन एन जी ओ वर्ल्ड व्हीजनला ही एक मोठी संधी हाती आली आणी त्यांनी त्याचा खुप फायदा करुन घेतला. सुनामीत घर गेलेल्यांना घर देण्याएवजी चर्च बांधुन देण्याची अजब मदत केली गेली. ह्या सर्वांच्या मागे तिथले करुणानिधी सरकार होते. "REMEMBER THIS! I spent months in the tsunami in Nagapatinam district of TN funding Swami Dayananda Saraswati's projects & made documentary. Christian NGOs led by World Vision announced it was a great opportunity to convert. Many Hindus forced to convert. " Rajiv Malhotra Tsunami: The Untold Story by Rajiv Malhotra, 2005 https://youtu.be/MOkWSa69NKA ‏

डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 20:10
सुप्रिम कोर्टाचा भेदभाव पुर्ण व्यवहार !! प्रशांत कनौजीया नावाच्या तद्दन हलकट पुर्व पत्रकाराने उ प्र चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विरुद्ध ट्विटर वर अपमानकारक वाक्य लिहील, त्यावरुन प्रशांत कनौजीया याला तुरुंगात टाकलेले होते. ह्यामुळे डाव्या पत्रकारांना त्रास झाला व त्यांनी प्रदर्शने केली त्याची दखल घेत सुप्रिम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उ प्र सरकारला प्रशांत कनौजीयाला ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले. ह्यावेळी सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी आहे. ह्याच सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी यांचे काही दिवसापुर्वीचे वर्तन बघा !! ममता बॅनर्जीवर दुसर्याने तयार केलेला मीम फेसबुकवर शेअर केला व त्यामुळे मु मं ममता बॅनर्जीचा अपमान झाला म्हणुन भाजपाच्या उमेदवार प्रतिक्षा शर्माला तुरुंगात टाकले ! ह्यावर सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! सुप्रिम कोर्टाचे जज एकाच टाईपच्या केसमध्ये दोन वेगवेगळा न्याय देउन नविन पायंडा पाडत आहे !! भाजपाच्या विरुद्ध काम करण्यात सुप्रिम कोर्टाचे जज सुद्धा मागे नाही हे दाखवत आहे !!

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Tue, 06/11/2019 - 20:54
डँबिस००७, सही पकडे है. माझ्या मते इंदिरा जयसिंग ,तिस्ता सेटलवाड, प्रशांत भूषण वगैरे पुरोगामींचं खरं उद्दिष्ट भारतीय न्यायव्यवस्थेविषयी अविश्वास उत्पन्न करून तिचं खच्चीकरण करणं हे आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by डँबिस००७

प्रसाद_१९८२ Tue, 06/11/2019 - 20:56
सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! -- - मी वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे, सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते. मात्र नंतर शर्मा यांच्या वकिलांने ' माफि मागणे हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे' असा युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर, कोर्टाने प्रतिक्षा शर्मा यांनी माफी मागावी ही शिक्षा काढून टाकली होती.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 21:43
सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते नंतर काय केले त्याने काय फरक पडतो ? पण त्याच बरोबर आता उ प्र सरकारला ताबडतोड प्रशाम्त कनौजीया ला सोडायला सांगीतलेच की पुर्वीच्या केस मध्ये प बंगाल सरकारला सांगीतले नव्हते !!

नगरीनिरंजन Wed, 06/12/2019 - 06:45
२०११ ते २०१७ पर्यंत भारताचा जीडीपी ७% नव्हे तर ४.५% नी वाढला दरवर्षी असा रिसर्च पेपर श्री. अरविंद सुब्रमण्यन यांनी प्रसिद्ध केला आहे. ते मोदी १.० सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. पद सोडल्यावर असा पेपर लिहिण्याचे कारण काय असेल? भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बातमी मूळ पेपर

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 10:33
अरेच्या! कोणी अर्थतज्ज्ञ विश्लेषण करायला तयार नाही? अचानक जगात सर्वात वेगात वाढणारी अर्थव्यवस्था एकदम कशी खालावली? आणि लगेच गर्तेत गेलेल्या अर्थव्यवस्थेला “सावरण्यासाठी” रिझर्व बँकेचा सत्तर वर्षात जमा झालेला ९ लाख ६० हजार कोटींचा साठा सरकारला दिसायला लागला! चमत्कार झाला! https://theprint.in/economy/rbi-to-the-rescue-modi-govt-eyes-banks-rs-9-6-trillion-surplus-to-beat-economy-blues/250245/

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही भलतेच चावट निराशावादी दिसता नगरीनिरंजन! इकडे आमचा प्रतिदिवस परतावा ९.९७ ते १०.०१ % वगैरे असताना आप ऐसा शंखनाद कैसे कर सकते हैं? मार्केटला माहितच असेल ना हे गौडबंगाल. त्याने प्राईस इन केलंच असतं ना. आमच्यासारखी आशावादी माणसंच चालवताहेत हो मार्केट, तुमच्या सारखी डिप्रेस्ड माणसं देखील अस्वली अवतार घेऊन पाडतीलच की ते. माणसं काय, काय ए. आय. थोडीच आहेत? सेन्सेक्स मध्ये सेन्स अंतर्भूत आहे हे तुम्ही विसरला वाट्टं? शिवाय जे ऑब्व्हियस आहे त्याचे विश्लेषण करायला आमचे अर्थतज्ञ काय चीप वाटले काय तुम्हाला?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 11:23
विनोदबुद्धी फारच जोरदार आहे भो तुमची, हण्मंताण्णा! मार्केटला काय हो, लोकांचे पैसे चव्हाट्यावर आले तर बरंच आहे. ह्यात अस्वलीपणा काय नाय हो! मार्केटचे बैल चौखूर उधळणार बघा. पैसा मार्केटात आला की फकीर व्हायचं, झोल्यात बसेल ते घेऊन झोला उचलून चालू पडायचं. रिझर्व बँकेतून सर्कारी बँकेत आला की मग पुढचं बघून घ्यायला मेहुलभाईसारखे लै आहेत मार्केटात. सर्कारी बेलाऊट आवडे सर्वांना! तुम्च्यासारख्या मार्केटप्लेयरांना कसली काळजी?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 11:41
बाकी मूळ प्रश्नाला बरोबर टांग दिली बरं! पुण्याचे काय तुम्ही? निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली? नोटबंदी आणि जीएसटीनंतर तर टॅक्स कलेक्शन लै जोरात वाढत होतं ना म्हणे?

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:39
It is expecting a portion of the central bank’s reserves to be transferred to the treasury by the second quarter of the current financial year, for use in “more productive purposes”, three separate sources told ThePrint. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. the buffer of 28 per cent of gross assets that is held by the central bank is well above the global norm of around 14 per cent. लेखातील च वाक्ये उद्धृत केलेली आहेत. रिझर्व्ह बँक "स्वतः" नक्की काय करते, ज्यामुळे त्यांचे इतके उत्पन्न/ संचित धन निर्माण होते? मिपा वरील अर्थतज्ज्ञ खुलासा करतील काय?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:45
It is also true that it is RBI which failed in discharging its duty to regulate public banks. In seventies and eighties, RBI officials used to inspect branches of various banks and there used to be a fear in the minds of bankers. Since 1991, in the name of freedom, in the name of reformation, in the name of privatisation and liberalization, RBI has left everything free and Bhagwan Bharose. http://www.allbankingsolutions.com/Articles/Articles-DJ-PSU-Banks-Red.html हि २०१६ मधील स्थिती होती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:50
NPAs of public sector banks tripled since June 2014 NPAs have been in the news in recent days, largely because of former RBI governor Raghuram Rajan's written response to a parliamentary panel on the subject. Notably, he said

"a larger number of [the] bad loans originated in the period [of] 2006-2008"

-- during the UPA years, that is. https://www.indiatoday.in/business/story/npas-public-sector-banks-rti-rbi-1343621-2018-09-19

डँबिस००७ Sat, 06/15/2019 - 12:39
Income Tax विभागातल्या १२ 'भ्रष्ट अधिकार्यांना सेवानिवृत्त वयाच्या आधिच सरकारने कठोर निर्णय घेत सेवानिवृत्त करण्यात आल्याची बातमी वाचलेली असेलच !! ह्या १२ अधिकार्यात ११ अधिकारी खरच कुख्यात भ्रष्ट अधिकारी होते व त्यांच्यावर गैरव्यवहाराचे, घेण्याचे आरोप होते पण एक अधिकारी ज्याच्यावर कोणतेही आरोप नसताना त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे !त्याचे नाव आहे A K Srivastav. दोन कार्यालयातील अधिकारी महिलांनी ह्या अधिकार्यावर यौन शोषणाचा आरोप केलेला होता . कार्यालयीन चौकशीत व नंतर कोर्टाने A K Srivastav यांना निर्दोष म्हणुन सोडले ! ह्या अधिकार्याने NDTV च्या 5000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मामला उघडकीस आणला होता. त्यामागची खरी हकिकत अशी की Airtel Maxis च्य़ा केस मध्ये घेतलेले ५००० कोटी पि चीदंबरम ने NDTV मध्ये पार्क केलेले होते . UPA-2 च्या कारकिर्दीतच A K Srivastavने ते उघडकीस आणले. ह्याचा परिणाम म्हणुन ह्या अधिकार्याला बराच त्रास देण्यात आला होता. २०१५ मध्ये PMO ने ह्या अधिकार्याला नोईडा मध्ये कमिशनर नियुक्त केले होते. मे २२ ला फाईनांस मंत्रालयाने ११ लोकांची लिस्ट बनवुन ठेवलेली होती. A K Srivastav ह्यांच नाव घालुन १२ जणांची लिस्ट PMO ला कारवाईसाठी पाठवण्यात आली. ह्यात अरुण जेटलींचा हात असल्याच समोर आलय. अरुण जेटली , प्रणय रॉय व चीदंबरमचे मित्र आहेत त्यामुळे PMO ला १२ जणांच्या लिस्ट पाठवली पण A K Srivastav चे नाव कोर्टाने व आंतरीक चौकशीत क्लिअर झाल्याच लपवुन ठेवल. A K Srivastav वर चुकीची कारवाई करण्यात आलेली आहे ह्याची माहिती मोदीजींच्या लक्षात आणुन देण्यासाठी श्री सुब्रमण्यम स्वामी व ईतर लोकांनी प्रयत्न केला आहे . मोदीजी काय करतात हे येणार्या दिवसात दिसेलच ! प्रणय रॉय वर कारवाई सुरु झालेली आहे !!

ट्रम्प Sat, 06/15/2019 - 21:29
त्या भांडखोर , कजाग बाई ने बंगाल मधील आरोग्यसेवा विस्कळीत केली आहे . ज्या दोन डॉक्टरानां पेशंट च्या नातेवाईकानीं मारहाण केली त्यांची विचारपुस न करता आंदोलक डॉक्टरानां कामावर हजर राहण्याचे आदेश बाईने दिले , त्या मुळे आंदोलन अजुन भडकले . सामान्य जनतेला आरोग्यसेवा न मिळाल्या मुळे खुप त्रास झाला असणार पण यासाठी डॉक्टरानां वेठबिगार समजणारी ती बाईच जबाबदार आहे अस वाटतंय . आता तिने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत पण गर्भित इशारे देवून .

Government compulsorily retires 15 customs officials Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये principal commissioner, commissioner, additional commissioner व deputy commissioner अश्या वरिष्ठ पदांवर असलेल्या पण अकार्यक्षमता आणि/किंवा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या १५ अधिकार्‍यांना सरकारने सक्तीच्या निवृत्तीवर पाठवले आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी सरकारने आयकर विभागातील १२ वरिष्ठ अधिकार्‍यांवर अशीच कारवाई केली होती, हे आठवत असेलच... Centre compulsorily retires 12 senior I-T officers for corruption, misconduct: Sources

म्हणजे, एकंदरीत, स्वच्छ भारत योजनेची जोरदार अंमलबजावणी चालू आहे !!!

हस्तर Tue, 06/18/2019 - 15:54
राधाकृष्ण विखेंच्या मंत्रीपदावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध करत एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावे लागते. पुन्हा निवडून न येता खालच्या किंवा वरच्या सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलं. तर राधाकृष्ण विखे–पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचे सांगत सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

In reply to by हस्तर

विखे विधीमंत्री होते. राजू परुळेकरांचा द्विमुखी परात्पर एलियन होत असण्याच्या काळात ते लोकप्रभेत एक सदर चालवत. विखे-पाटलांवर एक इंट्रेस्टिंग लेख लिहिला होता त्यांनी. त्यामध्ये वाचल्याचं अधूक स्मरतंय. विख्यांना कोणतं खातं सर्वात जास्त आवडतं असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावत त्यांनी 'विधी' असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे बहुतेक यातले बारकावे त्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना माहितच असणार. (पवारांना असं विचारल्यावर 'जलसंपदा' हे उत्तर येईल का हे मात्र एक रोचक गेसवर्क ठरेल. (धरणांमध्ये किती टीएमेसी पाणीसाठा शिल्लक आहे असा प्रतिप्रश्न मात्र करायला जाऊ नये :) ))

Modi govt 2.0: Ministers make it a point to reach office by 9.30am मंत्र्यांनी घरून काम न करता आपापल्या ऑफिसमध्ये वेळेवर (स. ९:३० वा) हजर होऊन तेथूनच काम करावे असा आदेश पंतप्रधानांनी दिल्यामुळे हल्ली केवळ मंत्रीच नाही तर त्याच्या हाताखालील कर्मचारीही वेळेवर कामाला लागल्याचे दृष्य दिसत आहे. त्याचबरोबर, प्रत्येक मंत्र्याला पुढील १०० दिवसांच्या कामाचे नियोजन व अपेक्षित परिणाम (planning & outcome) नेमून देवून, त्याच्या उत्तरदायित्वावर लक्ष ठेवण्याचा प्रयोग, भारताच्या इतिहासात, प्रथमच केला जात आहे. निवडणूका संपल्यावर आता, निदान सुजाण नागरिकांनी तरी, "आता पाच वर्षे नशीबात काय येईल ते भोगू", असा अज्ञानी, गैरलोकशाही किंवा सोईस्कर विचार सोडून, नागरिकांची खालील कर्तव्ये, जबाबदार्‍या व हक्क जाणून त्याप्रमाणे यथाशक्ती कृती करणे आवश्यक आहे: १. सरकार काय करत आहे किंवा काय करत नाही, इकडे लक्ष ठेवून, चुकांचा जाब विचारणे आणि चांगल्या योजनांना सहकार्य करून आपल्याकडून अपेक्षित असलेला हातभार लावणे. २. विरोधी पक्ष काय करत आहेत किंवा काय करत नाहीत, इकडे लक्ष ठेवून, ते चांगल्या सरकारी योजनांना सहकार्य करत नसले (किंवा त्याना खोडा घालत असले) तर त्यांबद्दल जाब विचारणे आणि त्यांच्या विधायक/सकारात्मक सरकार-विरोधाला पाठींबा देणे. असे ज्या लोकशाहीत होते, तिला "सहभागी लोकशाही (participatory democracy) असे म्हणतात व तो लोकशाहीचा सर्वोत्तम प्रकार आहे. हे ज्यांना जमत नसेल किंवा ती आपली जबाबदारी आहे असे वाटत नसेल, त्याना सुजाण नागरिक म्हणवून घ्यायचा आणि/किंवा "देशात लोकशाही धोक्यात आली आहे" किंवा "देशाचे काय खरे नाही" असा फुकटचा दांभीक गळा काढायचा हक्क नाही.

How 20,000 women in Vellore got together to save a dying river "एका बाजूला पाण्याच्या अभावाकडे पाहत दशकानुदशके नशीबाला बोल लावत व दुसरा कोणी आपल्या मदतीला धावून येईल याची वाट पाहत राहणारे" आणि "दुसर्‍या बाजूला स्वतःची लढाई स्वतः लढून, नदीला पुनर्जिवीत करणार्‍या वेल्लोरच्या या लढवय्या २०,००० झाशीच्या राण्या" ! भारत हा अनेक विसंगतींचा देश आहे, यात वाद नाही. मनरेगा (MGNREGA) योजनेच्या मदतीने, या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी, गेल्या चार वर्षांत ३,५०० पुनर्भरण विहिरी (recharge wells, प्रत्येक विहिर, २०' खोल X १५' लांब X ६' रुंद, आहे) आणि पाणी अडवणारे असंख्य दगडी अडथळे निर्माण केले गेले आहेत. त्यामुळे, या भागातील भूजलाचा स्तर लक्षणियरित्या उंचावला आहे. तेथे पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पण गेली १५ वर्षे कोरड्या पडलेल्या या नदीमध्ये आता इतके पाणी साठले आहे की, सद्याच्या अवर्षणाच्या काळातही, ते अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि भातशेतीची गरज भागवत आहे. या उदाहरणावरून बोध घेऊन, देशभरात इतर ठिकाणीही या प्रकारचे प्रकल्प सुरू झाले आहेत.  (सौजन्य : टाईम्स ऑफ इंडीया)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टीपीके Wed, 06/19/2019 - 16:43
अशा बातम्या वाचायला किती आनंद होतो. ह्याचे व्हिडिओ असतील तर बघितले पाहिजेत

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डँबिस००७ Wed, 06/19/2019 - 17:01
या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे ह्या प्रयत्नांना सुरुवात २०१४ साली झाली व आता त्याची फळे वेल्लोर जिल्ह्याला चाखायला मिळत आहेत !!

In reply to by डँबिस००७

टीपीके Wed, 06/19/2019 - 17:30
एक नदी, एक जिल्हा, ५ कोटी. आणि दुष्काळ गायब. शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का?

In reply to by टीपीके

भंकस बाबा Wed, 06/19/2019 - 18:30
फार वर्षापूर्वी 'कार्यरत' हे एक अनिल अवचट लिखित पुस्तक वाचले होते. त्यातील एक अवलिया श्री अरुण देशपांडे हे पुणे सोलापुर रोडवर अंकोली या गावात शेतीचे काही प्रयोग करत आहेत. त्यांच्या बोलण्यानुसार मोठमोठ्या धरणाची काही गरज नाही आहे, पण मोठे धरण म्हणजे मोठा पैसा खाण्याची संधी असे गणित असल्यामुळे देशपांडेविषयी जास्त काही माहिती मिळत नाही. सरकार त्यांना अनुल्लेखाने तर मारत नसतील? किंबहुना त्यांचे कार्य तरी प्रसिद्ध करावे. पुस्तक खरोखरच वाचनीय आहे.

In reply to by टीपीके

शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का? देशव्यापी पाणीप्रश्न असे वरवरचे ढोबळ अंदाज करून समजत नाहीत आणि सुटतही नाहीत ! त्यासाठी, तज्ज्ञांकरवी देशव्यापी विचार करून बनवलेले महत्वाकांक्षी महाप्रकल्प वास्तवात उतरावे लागतात. त्याबद्दल, फारच त्रोटक काही असे... १. वरच्या उदाहरणातील ५ कोटी रुपयांनी फक्त 'एका जिल्ह्याच्या काही स्थानिक भागाचाच' पाणविकास शक्य झाला आहे. पण, भारतात असे दुष्काळी जिल्हे शेकडोंनी आहेत. तेव्हा साधारणपणे "ते जिल्हे X अंदाजे ५ कोटी" हा हिशेब लावा ! हा खर्च केवळ, तुलनेने छोट्या क्षेत्राचा तळागाळातील प्राथमिक विकास करण्यासाठी होईल व तोच काही हजार कोटींमध्ये जाईल. २. त्याचबरोबर, मोठ्या क्षेत्रांसाठी (एक किंवा अनेक जिल्हे/राज्ये) पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: धरणे, तलाव, इ. यापैकी प्रत्येकाला अनेक हजार ते अनेक दशसहस्त्र कोटी लागू शकतात. ३. त्याचबरोबर, देशपातळीवर विचार करून बनवलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: भारतभरचा अजस्त्र नदीजोड प्रकल्प. (अ) दरवर्षी अनेक राज्यांत महापूर येतात आणि त्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. तर, त्याचवेळी इतर अनेक राज्यांच्या मोठ्या भूभागांवर दुष्काळ असतो. (आ) तसेच उत्तरेकडील मोठ्या नद्या पाण्याने बारमाही (पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने आणि इतर काळात हिमालयातील वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याने) भरलेल्या असतात. हा विसंवाद दूर करण्यासाठी विचारपूर्वक अंमलात आणलेला भारतभरचा नदीजोड प्रकल्प, बहुतेक सर्व राज्यांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न लक्षणियरित्या सोडवू शकेल. अश्या प्रकल्पांला अनेक लक्ष कोटी रुपये लागतील. https://www.wikiwand.com/en/Indian_Rivers_Inter-link , इथे या प्रकल्पाबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकेल. हे सर्व काम करायला आणि ते सुरू केल्यापासून त्याचे दृष्य परिणाम दिसायला, अनेक वर्षे लागतात, हे वेगळे सांगायला नकोच. इतर अनेक मुद्दे आहेत, पण इथल्या चर्चेतील मुख्य मुद्दा स्पष्ट करायला इतके पुरे आहे. आता सांगा, भारतभर पाणी समस्या सोडवायला किती खर्च योग्य असेल ते ?! :) हे सर्व प्रकल्प एकाच वेळी सुसुत्रपणे अंमलात आणले तरच भारताच्या पाणी समस्येला आटोक्यात ठेवता येईल आणि/किंवा तिचे दीर्घकालीन निर्मुलन करता येईल. वाजपेयींच्या कारकिर्दीत सुरू झालेला यासंबंधीचा विचार आणि काम, मधली दहा वर्षे ठप्प झाले होते. सुदैवाने, सद्य सरकारने गेल्या पाच वषांपासून त्या प्रकल्पाची परत जोमाने अंमलबजावणी सुरू केली आहे व त्याची फळे आता दिसू लागली आहेत. एक छोटे उदाहरण : क्षिप्रा ही पूर्वी बारमाही असलेल्या नदीत हल्लीच्या काळात पावसाळ्यात फक्त दोन महिने पाणी असते. तिला नर्मदा या मोठ्या बारमाही नदीशी जोडून बारमाही बनविण्याचा प्रकल्प चालू आहे. या नर्मदा-क्षिप्रा नदीजोड प्रकल्पाच्या एका भागाचे नुकतेच उदघाटन झाले, त्याची ही बातमी व चलतचित्र... MP: Narmada-Kshipra link to be channelled for agri, industry असो. यासारख्या दीर्घकालीन महाप्रकल्पांच्या यशासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती तर लागतेच पण संसाधन आणि धन यांच्या गळतीला प्रतिबंध करणारी सबळ इच्छाशक्ती आणि व्यवस्थाही लागते, ज्या आता व्यवहारात उतरल्या आहे आणि म्हणूनच प्रकल्प ठरवलेल्या पैशांत आणि ठरवलेल्या वेळेत पूर्ण होऊ लागले आहेत. जसजसे दिवस पुढे जातील व या महाप्रकल्पाचे अनेक टप्पे पूर्णत्वाला जातील तसतसे त्यांचे परिणाम समोर येतील. मग, त्यांचा प्रभाव पडणार्‍या लोकांना त्यांचा तडक फायदा होईल आणि इतरांनाही ते बातम्यांतून समजतील.

In reply to by भंकस बाबा

जरूर लिहा. हा विषय सर्वांगाने विचार करण्याजोगाच आहे. मात्र, देशभराच्या विकासासाठी केवळ असंख्य छोट्या कारवायांचा पाठपुरावा करणार्‍या अनेक प्रकल्प पुढे आले आहेत आणि वारंवार पुढे येत आहेत. या प्रकल्पांचे जनक आणि पुरस्कर्ते बर्‍याचदा हे विसरतात की... एखाद्याने मोठ्या चिकाटीने चालवलेल्या प्रकल्पाच्या प्रतिकृती देशभर निर्माण करून त्या दीर्घकाळापर्यंत चालू ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी, समर्पितता आणि त्यासाठी सातत्याने लागणारा लागणारा वेळ व खर्च, इ व्यवहारात त्याच्या जनकाशिवाय किती जणांना शक्य होईल ? त्याऐवजी, मोठ्या प्रकल्पांत "एकॉनॉमिज ऑफ स्केल" या तत्वामुळे ती कामे सातत्याने करण्यास मोजके तज्ज्ञ मन्युष्यबळ उपलब्ध करणे आणि तो प्रकल्प योग्य त्या "फायदा-व्यय" गुणोत्तराने दीर्घकाळ चालवणे शक्य होते... इतरांना फक्त आपल्या जरूरीच्या व्यवसायाचे काम करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फायदा घेता येतो. थोडक्यात, मोठ्या लोकसंखेसाठी असलेल्या आणि/किंवा मोठ्या भूभागासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांमध्ये, प्रत्येक तांत्रिक काम त्या त्या विषयांच्या तज्ज्ञाला/तंत्रज्ज्ञाला करू देणे नेहमीच जास्त फायद्याचे व वेगवान सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असते. सायकल एखाद्या माणसाच्या स्थानिक वाहतुकीसाठी योग्य (आणि उदात्तही) असू शकेल. पण, स्थानिक भूभाग सोडून मोठ्या अंतराच्या (उदा : १००, १०००, इ किमी) आणि मोठ्या संख्येने असलेल्या माणसांच्या वाहतुकीसाठी हजारो/लक्षावधी सायकली सोईच्या नाहीत हे सांगायला नकोच... त्यासाठी, मोठे महामार्ग, कार, बस, रेल्वे, विमान अश्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असते. इतरही बरेच मुद्दे आहेत, पण देशाचा विकासाचा विचार करताना, वरचे मुद्दे कळीचे ठरतात. असो. तुमचे विचार ऐकल्यावर विशिष्ट विषयांवर चर्चा करूया.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबा गुरुवार, 06/20/2019 - 18:45
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात टेम्बवली हे माझे आजोळ, या गावात एक नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. डोंगराच्या घळीतुन एक पाण्याचा प्रवाह गावात येतो. पाण्याची चव अमृततुल्य आहे. सांगायचा मुद्दा हा की जऱ या पाण्याला बंदिस्त करून गावात खेळवले तर बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. पण गावकरी त्यात उत्सुक नाहीत. त्यांना शासनाची नळपाणी योजना पाहिजे. दिली. आता गावकरी भरमसाठ पाणी वापरतात. जे देवकृपेने मिळालेले देणे होते ते असेच वाया जात आहे. सरकारी योजनेत पाच मैलावरुन पाणी पंप करून आणले जाते. ज्या दिवशी काही समस्या येते व पाणी येत नाही त्या दिवशी पाटाच्या पाण्यावर मारामारी होते. गावात विंधनविहिरी आहेत. त्यांना पाणी मचुळ येते म्हणून कोणी वापरत नाही. पाटाचे पाणी फक्त विंधनविहिरीत जरी सोडले तरी पाण्याची प्रत सुधारेल. पण सरकार अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. मुंबईत पाणी फार लांबवरुन आणले जाते. महापालिका पाणी देताना उत्तम प्रतीचे पाणी मुंबईकराना पुरवते. मग लोक क़ाय करतात? तर हे उत्तम प्रतीचे पाणी गाड्या धुवायला, सोसायटया धुवायला वापरतात. मुंबईत अनेक उद्याने आहेत. त्यांना हे पिण्याचे पाणी झाडाना म्हणून वापरले जाते. सरकार अजिबात दुसऱ्या मार्गाकडे बघत नाही. जसे अनेक विहिरी मुंबईत बारमाही पाण्याच्या आहेत, पण लोक सर्रास त्यांच्या उपयोग कचरा फेकण्यासाठी करतात. माझे म्हणणे हेच आहे की जे काम थोड्या साधनानी जमू शकते त्यासाठी फाफटपसारा कशाला? भले प्रत्येक ठिकाणी अनुकूल परिस्थिति नसेल पण थोडेफार स्वयंपूर्ण होण्याला काय हरकत आहे. एकदा कार्यरत हे पुस्तक वाचून बघा. देशपांडे हरएक मुद्दा उलगडून सांगतात. कदाचित आपल्यासारख्या शहरी माणसाला हा वेडेपणा वाटेल पण जर हा वेडेपणा असेल तर अशा पुष्कळ वेड्यांची गरज आहे देशाला! धरणाचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, हि सर्व धरणे 60 ते 70 वर्षात गाळ भरून पाणी साठवण्याची क्षमता हरवून बसतात. पण ह्यावर कोणीच बोलायला तयार होत नाही. कित्येक धरणे तर उस कारखाने चालवायला बांधली आहेत असा संशय येतो. संपादित केलेली वरकड जमीन हा एक संशयाचे धुके निर्माण करणारा मुद्दा आहे .

In reply to by भंकस बाबा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/20/2019 - 23:29
ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न जरूर करेन. परंतु, आता थोडासा मूलभूत विचार करायला हरकत नसावी. तो असा... १. तुम्ही आताही एका जागेवरचा अनुभव सांगत आहात. दर जागेवरची माणसे आणि परिस्थिती वेगवेगळी असल्याने, एका जागेवरचे बरे-वाईट अनुभव भारतातल्या/जगातल्या प्रत्येक जागेला लागू पडतीलच असे नाही. तुम्हीच पुस्तकातले आणि तुमच्या गावाचे, अशी दोन उदाहरणे देवून, याला पुरावा दिला आहे. २. (असे व्यवहारात होणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी होईल असे मानले, तरी) प्रत्येक गावाने आपले पाणीव्यवस्थापन स्वतःचे स्वतः केले असे गृहित धरूया. मग, शहरांना (जेथे जगातील सुमारे ५४% आणि भारतातील सुमारे ३३% लोकसंख्या राहते) त्यांना पाणीपुरवठा कोण करेल? ३. एखादा 'यशस्वी लहान प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी गुणले की 'यशस्वी मोठा प्रकल्प' बनत नाही. तसेच, एखादा 'यशस्वी मोठा प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी भागले की 'यशस्वी लहान प्रकल्प' बनत नाही. प्रकल्पाच्या आकार व आवाक्यातील बदलाबरोबर, त्याचे अनेक मापदंड आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे घटक(factors) यांची संख्या आणि प्रकार लक्षणिय प्रमाणात बदलतात. व त्यांच्यासाठी आवश्यक असलेले उपाय लक्षणिय प्रमाणात वेगेवेगळे असतात. ****** "प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे" हा भोळा आदर्शवाद आजचा नाही, फार जुना आहे. तो आजच्या काळात व्यवहारात येणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी तो ठीक आहे असे मानले तरी, जगातला प्रत्येक माणूस आदर्शवादाने भारलेला नसतो हे लक्षात ठेऊन, खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे रोचक ठरेल... अ) प्रत्येक (अपवादात्मक नव्हे) खेडे तेथिल सर्व जनतेला सर्व प्रकारच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरेश्या प्रमाणात निर्माण करू शकेल का? ...नाही. आ) ते पुरेश्या प्रमाणात तयार होत आहे असे मानले तरी, स्थानिक स्तरावर निर्माण होऊ शकलेल्या, अन्न-वस्त्र-निवार्‍याची (नसलेली) प्रत आणि त्याची (नसलेली) विविधता, तेथिल सर्व लोकांना समाधानी ठेऊ शकेल काय? ...नाही. इ) समजा सगळ्या खेड्यांतला प्रत्येक जण वरच्या गोष्टींतही समाधानी आहे. तर मग, शहरांतल्या लोकसंखेचे काय? त्यांनीही आपल्यापुरते अन्न-वस्त्र-निवारा स्वतःच तयार करायचा का? आणि कसा? ...शक्य नाही. ई) समजा तसेही (शक्य नाही पण, कल्पनेत,) मानले तरीही, भारताला वेगाने विकसित होण्यासाठी ज्या आधुनिक सेवा व उत्पादनांची गरज आहे, त्यासाठीची जी शिक्षण-संशोधन-विकसन व्यवस्था आवश्यक आहे, ती कोण करणार??? वरील मार्गाने चालून, सद्या चालू असलेल्या घरोघरी वीज, घरोघरी कुकिंग गॅस, गावोगावी बँक-शिक्षण व्यवस्था इत्यादी आणि नुकतीच जाहीर केलेली घरोघरी नळाने पाणी; असे विकासप्रकल्प कसे व्यवहारात आणता येतील? की, "ज्यांना खेडेगावात रहायचे असले त्यांनी आधुनिक विकासाच्या संसाधनांना विसरा", असे सांगायचे?किंबहुना, आधुनिक प्रकल्पांनी खेडेगावांतले जीवन विकसित झाले, तेथेच कामाची व उत्पन्नाची साधने निर्माण झाली, (आणि पर्यायाने शहर-गावातील विकासाचे अंतर जितके करता येईल तितके कमी केले), तर गावातील लोकांचे जीवन अधिक सुखी होईल व तेथिल लोकांना शहराकडे धाव घेण्याची गरज तुलनेने खूपच कमी होईल, नाही का? यालाच आपण, "विकास देशभर पसरवणे (spreading development across the nation)", किंवा "विकास साखळीतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे", असे म्हणू शकतो. केवळ वरच्या आदर्शवादावर गोष्टींवर आधारीत गोष्टी करण्याचा अट्टाहास केल्यास काय होईल असा जरासा विचार करूया... मानवाने आपली शिकारी-गोळाकरी (हंटर-गॅदरर) जीवनशैली सोडून ---> सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू केलेली शेतीवर अवलंबून असलेली व्यवस्था ---> यंत्रयुगातील अनेक शोध व त्यामुळे निर्माण झालेल्या सुविधा ---> आणि मानवी विकासाची सध्याच्या संगणकयुगापर्यंत झालेली प्रगती; उलट्या गतीने मागे न्यावी लागेल (किंबहुना, ती तशी मागे जाईल), नाही का? यामध्ये, जनुकविज्ञान, औषधविज्ञान, अवकाशविज्ञान, अणुविज्ञान, इ इ इ ना जमेस धरले तर, या उलट चालीच्या परिणितीची झलक अधिक प्रखरतेने डोळ्यासमोर दिसेल. सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मानवी प्रगतीच्या मागची मूलतत्वे अशी आहेत... (अ) मूळ ज्ञान (understanding) असे की, "सगळ्यांनाच सगळे करणे जमणे शक्य नसते" आणि (आ) मूळ तत्व (principle) आहे, "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)". म्हणजेच, ज्याला जे जमेल, ज्या प्रतीचे जमेल, जेवढे जमेल, तसे काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे. यात बरे-वाईट, उच्च-नीच काहीच नाही, तर, प्रत्येकाला त्याच्या कौशल्य आणि कुवतीप्रमाणे विकासाला हातभार लावायची संधी व फायदा देणे सर्वात जास्त महत्वाचे असते. तीच गोष्ट आहे, विकास करताना सुयोग्य प्रकल्प निवडण्यासाठीचा विचार करतानाची. छोट्या भूगावरचे स्थानिक स्तरावर प्रकल्प, मध्यम आकाराचे प्रकल्प आणि देशभरासाठीचे प्रकल्प, या तिन्हींची त्यांच्या, (अ) आवश्यकतेप्रमाणे, (आ) अपेक्षित दूरगामी परिणामांवर अवलंबून, आणि (आ) शक्य तेवढ्या जास्तीत जास्त फायदा-व्यय गुणोत्तराप्रमाणे, सांगड लावणे अत्यावश्यक असते. "सब घोडे बारा टक्के" असा विचार दूरगामी फायदा देत नाही. ही सांगड ज्या देशांत चांगल्या प्रकारे लावली जाते, तो देश उत्तम रितीने आणि वेगाने विकसित होतो. ही कल्पना अजून फार न ताणता, अजून जराशी जास्त समजूत पटवून घ्यायची असेल तर, एकच गोष्ट करून पहावी. खेड्याबाहेरील आधुनिक व्यवस्थेत निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, आजच्या खेड्यातील घरातून वजा करा आणि काय शिल्लक उरते याची यादी बनवा ! ती नक्कीच रोचक असेल ! उ) केवळ चर्चेसाठी, समजा, वर अ) ते ई) मध्ये कल्पिलेल्या सर्व अवास्तव कल्पना वास्तवात आणल्या (???!!!) तर, अश्या (केवळ स्थानिक स्तरावर छोटे छोटे स्वावलंबी भूभाग असलेल्या) देशाची (आणि पर्यायाने आपली), आपल्या शेजारी असलेले-नसलेले देश, काय गत करतील बरे ?! ****** व्यवहारात, खूप उच्च आदर्शवादी विचार जगातल्या फार फार फार थोड्या अपवादात्मक लोकांमध्ये आस्तित्वात असतो आणि त्यापैकी फार फार फार थोड्या लोकांना त्यावर आधारलेले जीवन 'निर्माण करणे व निभावणे' जमते. बाकीच्या सामान्य मातीने बनलेल्या लोकांना, "आपल्याला जमेल ते व जमेल तेवढेच निवडक काम, जमेल तसे करणे आणि त्यातून मिळालेल्या धनाचा इतरांनी शोधलेल्या-बनवलेल्या असंख्य गोष्टींचा आपले जीवन जास्तीत जास्त सुखकारक बनविण्यास करणे", इतपतच जमते. पण, तेही फार वाईट आहे असे नाही. तसे करणे शक्य आहे म्हणूनच त्यातल्याच काही लोकांनी हे जग असामान्य बनविणारे शोध लावले, इतरांनी त्यापासून सेवा-उत्पादने बनवणारे उद्योग उभारले आणि उरलेल्या इतरांना नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या. अर्थातच, या सगळ्याचे फायदे सगळ्यांना मिळत आहेत. देशाच्या सर्वंकश विकासासाठी (म्हणजेच मोठ्या भूभागवरच्या, विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या, मोठ्या लोकसंखेसाठी) आखणी करताना आदर्शावादाला व्यवहारवादाचा मोठ्या डोस देऊन मगच आवश्यक तेथे, आवश्यक तेवढे, छोटे-मोठे प्रकल्प उभारणे जरूरीचे असते... आणि तसे केले तरच ते यशस्वी होऊ शकतात. केवळ आदर्शवाद आणि/किंवा आशावाद व्यवहारात फार काळ तरून नेत नाहीत. तसे नसते तर (केवळ उदाहरणासाठी म्हणून) हेमलकसा, राळेगण सिद्धी, इत्यादींसारखे प्रकल्प दरजागी निर्माण झाले असते आणि शहरे सोडून सर्व लोक मोठ्या आनंदाने तेथे जाऊन राहिले असते. मात्र, तसे झाले असते तरीही, वरचा उ) हा मुद्दा शिल्लक उरतोच, नाही का?! देशात "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)" या तत्वावर देशात जे काही कमी-जास्त प्रतीचे सुरक्षाकवच निर्माण झालेले आहे, त्यांच्याविना उच्च प्रतीच्या आदर्शवादी प्रकल्पांची ही मोजकी बेटे निर्माण होऊ शकली असती का? :) ******

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबा Sun, 06/23/2019 - 17:43
मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या. मुंबईसारख्या शहरात महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमवर एक कायदा केला आहे. नवीन बांधणार असलेल्या इमारतीत ही सिस्टम अनिर्वाय आहे म्हणून. पण हा नियम कोणीच पाळत नाही. गेल्या दोनचार दिवसापूर्वीची बातमी वाचली होती कि आपल्याकडे असलेल्या दुष्काळी परिस्तिथिवर तोडगा म्हणून इस्राएली तंत्रज्ञान आणायचा घाट चालला आहे. प्रश्न असा आहे की आपली समस्या तंत्रज्ञान वापरुन नाही तर सवयी बदलून दूर होणार आहे. मुंबईतील किती घरात कपडे धुतलेले पाणी टॉयलेटमधे वापरले जाते? हे जेव्हा सामान्य माणसाला कळेल तेव्हाच देश प्रगतिपथावर येईल. अन्यथा परदेशी तंत्रज्ञानाने आपण पाणी अधिक साठवू, पाण्यावर प्रक्रिया करू, पण पाण्याची बचत मात्र करणार नाही. कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! असे असेल तर मग रामाशिवागोविंदा! ज्या साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यल्प आहे तीला आम्ही समर्थन मूल्य देणार आणि ते पण जनतेच्या तोंडचे पाणी पळवून, किंवा महागडया तंत्रज्ञानाने पाणी आणून!

In reply to by भंकस बाबा

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 09:23
@ भंकस बाबा "रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम" हा नियम कोणीच पाळत नाही. हि वस्तुस्थिती नाही. कारण मुंबईत मी राहत असलेल्या दोन ( भाड्याच्या घरांमध्ये) आणि माझ्या मालकीचे घर असेलल्या किंवा माझं एवडे आणि माझा भाऊ राहत असलेल्या सर्व सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून बोअर वेल मध्ये ( वडील राहतात तेथे मोठी उघडी विहीर आहे) सोडले जाते आणि हेच बोअरचे पाणी संडास च्या फ्लश साठी वापरले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नव्हे तर प्रत्येक सोसायटीला अग्निशमनासाठी एक वेगळी टाकी बांधावीच लागते आणि महापालिकेचे पाणी प्रथम या टाकीत येते आणि त्या नंतर अतिरिक्त पाणी तुमच्या मूळ टाकीत जाते. ( तीन वर्षांपूर्वी आमची स्थिती अशी होती कि अग्निशमनच्या टाकीत पाणी आहे पण त्याचा सांडवा (ओव्हरफ्लो) कमी असल्याने घरात पाणी नाही. सध्या सदाच्या फांद्या तोडायचं असल्या तरी तुम्हाला महापालिकेची परवानगी घ्यावी लागते अन्यथा फारच कटकट गळ्यात येते. कदाचित मुंबईत जितका कायदा पाळला जातो तितका महाराष्ट्रात कुठेच पाळला जात नाही.

In reply to by सुबोध खरे

भंकस बाबा Tue, 06/25/2019 - 09:15
तुम्ही कुठे राहता हे सांगितलेले नाही. मी मालाडमधील मालवणीत रहातो. इथे असलेल्या mhb कॉलोनित अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेणे फार सामान्य आहे. हे पालिका व पोलिस यांच्या संगमनताने होते. अनधिकृत पाणीच नव्हे तर चार माळ्याच्या झोपड्या देखील इथे पाहायला मिळतात. कितीही पाणीकपात असली तरी येथील गलीगल्लीत असलेल्या अनधिकृत मशिदि धूणे हा रोजचा कार्यक्रम असतो. येथे म्हाडाने काही इमारतीदेखील बांधल्या आहेत. एकाही ईमारतीत वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. करायची ईच्छा देखील नाही. महानगरपालिकेने ओला कचरा व्यवस्थापन अनिर्वाय केले आहे, या गोष्टीचा येथील जनतेला थांगपत्ता नाही. घरातून बाहेर पडून प्लास्टिकच्या पिशवित बाँधलेला कचरा ,आधीच साचलेल्या ढिगावर टाकने म्हणजे स्वच्छता हा येथील लोंकाचा प्रामाणिक समज आहे. एकूण क़ाय तर सगळे कठीण आहे

In reply to by भंकस बाबा

@ भंकस बाबा : पाणी नियोजनात, साठवण, पुरवठा, वापर, पुनर्वापर अश्या अनेक पायर्‍या आहेत. आतापर्यंत फक्त पाणी साठवण व पुरवठा या विषयावर चर्चा चालली होती म्हणून पाणी वापरावर बोलण्याचे टाळले होते. कारण, पाणी वापरातले राजकारणी सत्ये सांगितल्यास, लगेच लेबले लावली जातात. पण आता तुम्ही तो विषय पुढे आणला आहे तर त्याबद्दल काही लिहिणे भाग आहे. या फार महत्वाच्या मुद्द्यावर लिहावे की नाही बाबत, वरच्या परिस्थितीमुळे द्विधा मनस्थितीत होतो. याबाबत काही तथ्ये अशी आहेत... १. पाण्याची उधळपट्टी कोठेही केव्हाही निषेधार्ह आहेच. पण, शहरांना आणि गावांना (पिण्यासाठी व शेतीसाठी) होणारा पाणी पुरवठा (किंवा गरज) पाहता, शहरात पाण्याची उधळपट्टी न झाल्याने त्याचा गावांना फार मोठा फायदा होणार नाही. फक्त, आम्हाला पाणी मिळत नाही, पण दुसरा कोणी उधळपट्टी करत आहे, हे मनात सलणे, मानवी प्रतिक्रिया आहे. २. गावांना केल्या जाण्यार्‍या पाण्याचा मोठा भाग शेतीसाठी वापरला जातो. या पाण्याच्या बाबतीत सर्वांना माहीत असलेले, कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! , हे सत्य मात्र कोणी गावकरी बोलताना दिसत नाही !!! कारण, त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि/किंवा नगदी पिकांच्या सधन शेतकर्‍यांवर टीका केल्यासारखे होते... जे ("आपल्या"च नेत्यांवर टीका कशी करायची या विचाराने) हेतुपुरर्सर किंवा भितीने केले जात नाही. त्याऐवजी, फारसा विरोध करण्यास सबळ नसलेल्या शहरी नागरिकावर राग ओकून त्याला झोडपणे सोपे असते. रेन वॉटर हारवेस्टींगची जबाबदारी सरसकट सर्व शहरी गृहप्रकल्पांवर टाकणे, हे त्यापैकीच एक उदाहरण. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी, तो बनवणारा, स्थापीत करणारा आणि दर दिवशी चालवणारा या सर्वांसाठी कौशक्य-वेळ-श्रम-पैसा या सर्वांच्या दृष्टीने शक्य असला पाहिजे... नाहीतर प्रकल्प फसण्याचीच खात्री असते. अनुभव व कौशल्य नसलेल्या शहरी गृहप्रकल्पांवर ही जबाबदारी टाकली आहे. प्रकल्प कसे चालले आहेत यावर लक्ष ठेवण्याची व फसलेल्या प्रकल्पांना तज्ज्ञांची मदत पुरवण्याची काही तरतूद नसल्याने, काही मोजके प्रकल्प सोडता, आनंदीआनंद आहे. बरे, या योजनेमुळे, शहरस्तरावर काही फायदा होतो आहे की नाही, हे पाहणे जरूरीचे आहे, हे कोणाच्याच 'गावी' नाही ! :) ... हा कोणत्याही प्रकल्पाचे यश मोजण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा, त्या मूळ प्रकल्पात होता की नाही याबद्दल संशय आहे ! जेव्हा मी वर, "देशस्तरावर "लहान-मध्यम-मोठ्या" पाणीप्रकल्पांच्या एकत्रित विचार करण्याबद्दल" लिहिले होते तेव्हा; कोठे-कसे-किती पाणी साठवणे आवश्यक आहे या विचाराबरोबरच साठवलेले पाणी कोठे-कसे-कशासाठी वापर करणे सर्व जनतेच्या सोईचे व फायद्याचे आहे, हे सुद्धा प्रकल्पाच्या आराखड्यात ठरवणे जरूर आहे. तसे होण्याऐवजी, बर्‍याचदा असे प्रकल्प काही ठराविक हितसंबंध नजरेसमोर ठेवून बनवले जातात आणि ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत असे दाखवून, नंतर प्रकल्पाचा फायदा ठराविक हितसंबंधियांकडे फिरविला जातो. काही ठिकाणी तर मूळ आराखड्यापेक्षा वेगळे काहीतरी थातूरमातूर काम करून पैशांचा अपहार केला गेला आहे, हे काही फार मोठे गुपित नाही. हे थांबणे जरूर आहे. पृथ्वीवरची संसाधने, योग्य रितीने वापरल्यास, जनतेच्या गरजेस पुरी पडू शकतील, पण ती काही लोकांच्या असीम हव्यासासाठी नक्कीच अपुरी आहेत.

In reply to by भंकस बाबा

डँबिस००७ Sun, 06/23/2019 - 12:18
प्रत्येक गरजेकडे सरकारकडे हात पसरायचे अशी सवय आपल्याला लावलेली आहे. एक तर जनतेच्या कल्याण कारी योजना फक्त सरकारच करु शकते आणी जनता स्वःताच्या बळावर अशी काम करु शकणार नाही असा एक अलिखित नियम झालेला आहे. त्यामुळे जनतेचा आत्मविश्वास पार खचलेला आहे. गेले कित्येक दशक मराठवाडा, विदर्भ तर सोडाच म हाराष्ट्रातले अनेक जिल्हे आवर्षणाच्या गर्तेत होते. दर वर्षाला टँकरने पाणी पुरवठा केला जायचा. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे लोकांना शेती करता येईना मग अश्या लोकांनी आपली गावे सोडली आणी गावच्या गावे उजाड झाली. महाराष्ट्रात २०१४ सालच्या भाजपा सरकारच्या येण्याने ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. जलयुक्त शिवार योजना आली त्यात लोक सहभागाने योजना सुरु झाली. ह्या योजनेमुळे पाण्याचे स्त्रोत पुन्हा सुरु झाले त्यानंतर पाणी फाऊंडेशन "पाणी कप" सुरु झाला. त्यामुळे गावो गावात शेत तळी, बांधारे, पावसाच्या पाण्याला जमिनीत जिरवुन भुजल पाण्याची पातळी वाढवायचे प्रयत्न सुरु झाले . जलयुक्त शिवार योजना व पाणी फाऊंडेशन "पाणी कप" मुळे परीस्थिती वेगाने बदलत आहे सुधारत आहे. जनतेने स्व:ताच्या महेनतीवर विश्वास ठेवुन काम करायला पाहिजे. दशरथ मांझी सारख्या सामान्य माणसाने अख्खा डोंगर तोडुन रस्ता बनवला फक्त एकट्याच्या बळावर अश्या लोकांचा आदर्श आपल्या समोर ठेवायला पाहिजे.

गामा पैलवान Wed, 06/19/2019 - 12:50
नगरीनिरंजन,
निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली?
राखीव पेढीचा पैसा केंद्रीय शासनाद्वारे प्रत्याभूत केलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटांची हमी केंद्र शासनाने घेतलेली आहे. तसं प्रत्येक नोटेवर लिहिलेलं असतं. यातनं काही गोष्टी स्पष्ट होतात. राखीव पेढीकडून शासनाने अतिरिक्त पैसा मागितला तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखीव पेढीत हा पैसा साचला कुठून ? गेल्या सत्तर वर्षांत कोणी कधीतरी अशी बातमी ऐकलेली होती का? मग अचानक आजच इतका पैसा कुठून उपटला? याचं कारण म्हणजे हे भ्रष्टाचार कमी झाल्याचं लक्षण आहे. हज्जारो कोटी रुपयांचे घोटाळे थांबल्यामुळे इतका पैसा दिसतो आहे. दुसरी गोष्ट अशी की राखीव पेढी कडे शासनाने पैसा मागितला तर तो bail out नसतो. कारण शासनाने पेढीची हमी घेतलेली आहे, पेढीने शासनाची हमी घेतलेली नाही. तिसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्याला bail out म्हणता तो प्रकार शासकीय तिजोरीत खडखडाट असेल तरंच लागू पडतो. याउलट शासन पेढीकडे जास्तीच्या विकासकामांसाठी पैसा मागतंय. दैनदिन व्यवहारांसाठी नव्हे. असो. शासन बुडीतखाती गेलंय आणि पैशासाठी वणवण फिरतंय असा काहीसा अर्थ तुम्ही उद्धृत केलेल्या लेखातनं व्यक्त होतो. हा अर्थात चुकीचा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गब्रिएल Wed, 06/19/2019 - 13:28
आवो गामासायेब, त्ये त्यांच्या परम्पूज्य न्येत्याची कापी मारून र्‍हायलेत- राफेल, राफेल, राफेल, राफेल आशी आरती आठवू र्‍हायले ना? ;) इरोधी पक्षाकडं बगायंचं आनी निसती घोटाळा घोटाळा आशी बोंब मारायची आसली तर त्येला आब्यास, खरं-खोटं, पुरावा आसलं कायबी लागत न्हाय बगा. =)) =)) =))

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 18:20
शाबास! ह्याच समर्थनाची वाट पाहात होतो. जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? आजवर अशी बातमी कोणी ऐकली नाही कारण आजवर कोणत्याही सरकारने त्या पैशावर डल्ला मारलाच नाही. घोटाळे थांबल्रे म्हणून सगळा पैसा गेल्या ५ वर्षात रिझर्व बॅंकेकडे पैसा जमा झाला हे खास भक्त लॉजिक तुमच्या पोराबाळांना सांगा इतके दिवस अर्थव्यवस्थेच्या वाढीवरून टिमकी वाजवल्यानंतर ह्याचं समर्थन करण्याइतका निर्लज्जपणा आहे की नाही हेच पाहायचं होतं. तो दिसला. धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

गामा पैलवान गुरुवार, 06/20/2019 - 12:37
नगरीनिरंजन, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो : जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? घरी दरमहा बचत होत असली तरी महाग वस्तू सुलभ हप्त्यावर घेतातच ना? त्याच धर्तीवर करसंकलन जरी भरपूर झालं तरी ते अतिरिक्त विकासकामासाठी पुरेसं नाही. इथे अतिरिक्त म्हणजे जास्तीची हा शब्द महत्त्वाचा आहे. असो. राखीव पेढीकडे इतका पैसा कुठून साचला? या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माहित नसेल तर तसं सांगा. एकदा का पैशाचा स्रोत कळला की मग आपण ठरवू तो कशासाठी वापरायचा ते. तसंही पाहता तिरुपती बालाजीसारख्या देवळांचं धन ताब्यांत घ्यावं म्हणून बरीच ओरड होता असते. कारण तिथे म्हणे तो पैसा अनुत्पादक अवस्थेत पडून असतो. मग हाच नियम राखीव पेढीस लावायला नको का? राखीव पेढी हे अर्थभक्तांचं एक देऊळच मानायला हरकत नाही. पैसा हा नव्या जगाचा देव आहे. अर्थशास्त्राचे नियम ही स्मृती, The wealth of Nations ही श्रुती, अर्थशास्त्रीय विविध संशोधने हे विविध योगमार्ग, भांडवलशाही म्हणजे पुण्यसंचयिनी व्यष्टीसाधना, तर साम्यवाद ही समष्टीसाधना, राखीव पेढी म्हणजे रिझर्व्ह बँक हे मंदिर, जीडीपी हा भक्तीभाव, करसंकलन हा नैवेद्य, राखीव पेढीतील अतिरिक्त पैसा हे मंदिराचं धान्यकोठार, इत्यादि इत्यादि. मग भंडारा घालायचा ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Sun, 06/23/2019 - 21:12
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो. परंतु, काहीही डेटा वेळच्यावेळी बाहेर पडू न देता आधी अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे भासवले व आता रिझर्बँकेकडून पैसे घ्यायची वेळ आली हे चांगले लक्षण नाही. इथल्या तज्ज्ञ मंडळींना काही वाटत नसले तरी गुंतवणूकदार खुळे नसतात. बाकी घटनात्मकदृष्ट्या ते चूक आहे असं मी म्हटलेलंच नाही त्यामुळे खाली काहींनी नियम वगैरे डकवून ठेवलेत त्यांना माझा मुद्दा डोक्यात शिरला नाही असे वाटतेय. असो. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे; त्याचे इथे समर्थन करणारे तरी त्याचे लाभार्थी असाल अशी आशा!

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 03:32
तुम्ही दिलेल्या लिंक्स मधल्या बातम्या तुम्ही स्वतःच नीट वाचत नाही का? त्यात लिहिलंय - Former chief economic adviser Arvind Subramanian, who has been caught in a storm since he said India’s GDP growth between 2011-12 and 2016-17 may have been over-estimated, had recommended the transfer of a larger chunk of the RBI’s excess capital to the government. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. He also noted that the RBI was one of the most highly-capitalised central banks in the world. इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मराठीत सांगतो - रिझर्व्ह बँकेकडे जमा असलेला अतिरिक्त पैसा भांडवलाची कमतरता असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना द्यायला हरकत नाही. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अशी परिस्थिती का आणि कशी झाली? तर ममोसिंगांच्या काळात अनिर्बंध कर्जे वाटली गेली. हे मी नाही तर पुरोगाम्यांचे लाडके माजी आणि एकमेवाद्वितीय आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले आहेत. इथे आणि इथे वाचा. तुमची अपेक्षा काय आहे? की आरबीआयकडे असलेले अतिरिक्त पैसे तसेच ठेऊन द्यावे आणि मोदींनी कसेही करून जगातले एक नंबरचे अर्थतज्ज्ञ असणाऱ्या ममोसिंगांनी केलेली घाण निस्तरावी? वर १२ वर्षे लांबणीवर पडलेलं राफेल डील करावं, सैन्याला आवश्यक असणारी शस्त्रास्त्रे घ्यावीत, बुलेटप्रूफ जॅकेट्स घ्यावीत, नदी जोड प्रकल्प करावा, नवीन रस्ते बांधावे, रेल्वे सुधारावी आणि हे सगळं करताना टॅक्स मात्र कमी करावा. तुम्हाला मोदी आवडत नाहीत हे ठीक आहे, तो तुमचा चॉईस आहे. पण निदान स्वतःच ज्या लिंक देत आहात त्यातील बातम्या तरी नीट वाचा आणि विश्लेषण तटस्थ राहून करा. साबणाच्या विक्रीत घट झाली? लोकांनी अंघोळ करायचं बंद केलं का? का साबणाशिवाय अंघोळ करतात? नुसता मथळा वाचून किंवा जो डेटा मिळतोय त्याचे नीट विश्लेषण न करता निष्कर्ष काढले की असे विचित्र समज होतात. ही बातमी नीट लक्ष देऊन वाचा. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे, तुम्ही येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 06:30
नमस्कार ट्रेडमार्कसाहेब! अरविंद सुब्रमण्यन यांचे म्हणणे तुम्ही ठळक करून दाखवलेत त्याबद्दल आभार! याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! म्हणजे युपीए व मोदी सरकार दोघांनीही जीडीपीचा चुकीचा डेटा काढला हे मान्य झाले हे बरे झाले. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. ते एक असो. रिझर्व बॅंकेचा पैसा सरकारने वापरणे हे धोरण म्हणून काहीच वाईट नाही. उदाहारणार्थ अमेरिकेत फेडरल रिझर्वचा सरप्लस ठराविक मर्यादेच्या वर गेला की अतिरिक्त पैसा सरकारकडे देण्याचे धोरण आहे आणि प्रेसिडेंट कोणीही असला तरी ते पाळले जाते. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. आपल्याला दिसला असल्यास निदर्शनास आणून द्यावे. एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. २००७-०८ मध्ये युपीएच्या काळात लोन्स दिली व ती पुढे एनपीए झाली ह्यात वाद नाही. पण लोन दिल्या-दिल्या ते एनपीए होत नाही. कंपनीला पुढे मंदीचा सामना करावा लागल्यास परतफेड करणे कठिण जाते व मग ते लोन बँकेला एनपीएत टाकावे लागते. ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. थोडक्यात इतक्या दिवस मारलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतच्या बढाया निव्वळ फेका होत्या हे सिद्ध होते. इथून पुढे भंडारा घातला जाईल व त्याचा लाभ लाभार्थींना होईलच. आम्हाला मात्र सरकारी भंडार्‍याचा उपयोग नाही. आपणच त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद व इत्यलम्.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 08:25
तुम्ही किती सोयीस्कर निष्कर्ष काढता. तुम्हाला हे मान्य असेलच की तुम्ही स्वतःच दिलेल्या बातम्या नीट वाचत नाही. असो. याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! मी फक्त तुम्हीच दिलेल्या लिंक मधील बातमीत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा उद्देश होता. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. बराच फरक आहे, पण तो तुम्हाला सांगूनही उपयोग नाही कारण समजणारच नाही. बाकी मी कधीच कोणासाठी टिमक्या वाजवल्या नाही आणि वाजवत नाही. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. जाहीरनाम्यात असेल तरच फक्त करावे असा काही नियम आहे का? असल्यास दाखवून द्यावे. युपीएने आम्ही घोटाळे करू असे जाहीरनाम्यात लिहिले होते का? एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. तुम्ही फारच विनोदी आहात बुवा. मी बँकिंग मध्ये जवळपास २ दशके काम केले आहे, तरी तुम्हाला वाटत असेल माझे ज्ञान तुटपुंजे आहे तर आम्हाला ज्ञानी करून सोडा की. २००८ साली मंदी आली होती, नंतर मंदी आली का? कुठे आणि कुठल्या क्षेत्रात आली? ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. एनपीए करण्याची संपूर्ण प्रक्रिया इथेच विशद करून सांगा बघू. लोन दिल्यापासून एनपीए कधी होते, ते एनपीए करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे सांगा. एनपीए झाल्यावर काय होते हे सांगा. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. आता तुमचा रघुराम राजन यांच्यावरही विश्वास उरला नाही. आता कोणावर विश्वास ठेवणार बरं? ध्रुव राठी, विनोद दुवा, रागा का अजून कोणी आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 09:27
मोदी द्वेषाचा चष्मा घातला कित्यांच्या सरकारने केलेली कोणतीही गोष्ट चूकच दिसू लागते आणि आपल्याला पाहिजे तसेच आणि तेवढेच दिसू लागते याचे हे उदाहरण आहे

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 11:50
आमचे सरकार हे आत्ताचे सरकार आहे. आणि प्रत्येक सरकारच्या धोरणांवर टीका करणे हे आम्ही आमचे एक नागरिक म्हणून कर्तव्य समजतो. चष्मा कोणी घातला आहे ते आपण उघड केल्याबद्दल धन्यवाद! आपल्याला जी स्वप्ने पडत आहेत गतवैभवाची ते काही खरोखर वैभव नव्हते व ते परत येणार नाही इतके आपल्याला समजले तर बरे होईल आपल्यासाठी.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 11:57
एकांगी प्रतिसाद देताना तुमचा आकस आणि द्वेष दिसून येतो आहे. सरकारवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण तो "संपूर्ण" सत्य स्थितीवर अवलंबून असावा एवढीच अपेक्षा असते. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 12:22
श्री. पटेल यांच्याप्रमाणेच श्री. विरल आचार्य यांनीही कार्यकाल संपायच्या सहा महिने आधीच राजीनामा दिल्याचे वृत्त आजच प्रसिद्ध झाले आहे. रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. रिझर्व बँक, अर्थ सल्लागार पद, राष्ट्रीय सांख्यिकी संस्था यातून लोक धडाधड राजिनामे देत असतील तर प्रश्न मनात यायलाच हवेत. आपल्याला कसली काळजी आहे आणि कोणत्या संपूर्ण सत्याची आपण वाट पाहात आहात हे आपणासच माहित.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 13:04
रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीला सरकारने हात लावू नये असे वाटत असणारे तेथील अर्थतज्ज्ञ राजीनामे देत आहेत. ज्यावेळेस स्वायत्त संस्था आणि सरकारचे जमत नाही तेंव्हा असे परंपरावादी लोक धोरण जमत नसल्यामुळे राजीनामे देतात. सरकारी खात्यात अशा गोष्टी होत राहतात. भारताची आर्थिक शिक्षणाची बाजू भक्कम आहे त्यामुळे त्यांच्या जागी नव्या दमाचे लोक येतीलच. राष्ट्र कुणासाठी थांबत नसतं.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Wed, 06/26/2019 - 06:22
तुम्ही नीट पूर्ण वाचत नाही हे परत सिद्ध केलंत. मी बँकिंगमध्ये २० वर्षे आहे हे मी आधीच सांगितलं आहे. मला तुमच्याकडून शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. पण तुम्हाला माहित नाहीये म्हणून असे प्रतिसाद येत आहेत का? मी सांगितलेल्या एकही मुद्द्यावर आपण प्रतिवाद केला नाही. तुमचा प्रतिवाद काय तर "नागरिक म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करणे हा आमचा हक्क आहे" हे सांगणे आणि माझे ज्ञान वाढवणे ही तुमची जबाबदारी नाही हे सांगणे. तुमचा टीका करायचा हक्क कोणीच हिरावून घेत नाहीये, पण टीका करायचीच आहे म्हणून वस्तुस्थिती बघायचीच नाही हे चुकीचे आहे. काही प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या हुशारीने उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो. १. सार्वजनिक ब्यांकांच्या वाईट परिस्थितीला युपीए सरकार जबाबदार आहे या रघुराम राजन यांच्या विधानावर तुम्हाला आक्षेप आहे का? २. ब्यांकांची परिस्थिती वाईट आहे, त्या ब्यांका डुबल्या तरी चालेल पण आरबीआय कडे पडून असलेले पैसे वापरायचे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ३. उद्या या ब्यांका जर डुबल्या तर सामान्य लोकांचे ब्यांकांमध्ये ठेवलेले पैसे परत नाही मिळाले तरी चालणार आहे का? ४. या ब्यांका डुबल्यावर लोकांनी इतर ब्यांकांवर विश्वास न ठेवता पैसे काढून घ्यायला सुरुवात केली तर काय परिस्थिती होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? ५. आरबीआय हे पैसे स्वतःकडे ठेऊन काय साध्य करणार आहे असं तुम्हाला वाटतं? ६. आरबीआय त्यांचे वार्षिक नफा नुकसान पत्र (profit & loss statement) तयार करते का? ते कधी जाहीर केले आहे का? ७. तुम्हाला आरबीआय बद्दल नक्की कसली काळजी वाटत आहे? ८. या गंगाजळीतला हिस्सा जर सरकारला किंवा आरबीआय सांभाळत असलेल्याच ब्यांकांना गरज असताना दिला तर काय वाईट परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटतं? ९. या रोखीची चणचण असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या ब्यांका वाचवण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय आहे का? किंवा ज्या लोकांनी राजीनामा दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे त्यांनी तरी कुठला उपाय सांगितलं आहे का?

ऋतुराज चित्रे गुरुवार, 06/20/2019 - 13:58
How does RBI builds its reserves? The reserves with the RBI accumulate due to several factors. First is its income from three sources: interest on government bonds held for conducting open market operations; fees from government's market borrowing programme; and income from investment in foreign currency assets. Second source is earnings retained after giving dividends to government. Third source is revaluation of foreign assets and gold. Why does a central bank need capital? There are five main reasons for a central bank to hold capital. First, central banks that have foreign assets need capital to absorb potential losses. The RBI's foreign assets are worth Rs 26.4 lakh crore, up from 23.7 lakh crore in FY17. Second, the RBI needs capital to shield the economy from monetary and financial shocks. Third, in case of unstable governments, monetary authorities carry a bigger burden. A Central bank would need more capital in such a situation. Fourth, a central bank needs reserves to perform functions such as price and exchange stability. Fifth, reserves give independence to a central bank. Low capital will force central bank to turn to government in time of need. This will give government influence over the central bank. विकासकामांसाठी सरकारला निधी अपुरा पडत असेल तर सरकारने हा राखीव निधी वापरायला हरकत नाही, परंतू हे पैसे बिनव्याजी कर्ज म्हणून घेणार की लाभांश स्वरूपात घेणार?

In reply to by ऋतुराज चित्रे

सुबोध खरे गुरुवार, 06/20/2019 - 20:19
यात रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा स्रोत काय हे आलेले नाही. रिझर्व्ह बँक इतर बँकांना पैसे पुरवते त्यावर व्याज आकारते. पैसा छापण्यासाठी / पुरवण्यासाठी असलेला जनादेश (mandate) हा रिझर्व्ह बँकेचा नाही तर सरकारचा आहे. रिझर्व्ह बँक हि सरकारचा एक विभाग आहे, सरकारची मालक नाही. येथे काही लोक सरकार रिझर्व्ह बँकेवर दरोडा मारत आहे अशा थाटात लिहीत आहेत The governor of RBI is not superior to finance minister. If FM insists, I don't see that the governor can refuse, unless he's willing to give up his job.”डॉ मनमोहन सिंह यांनीच आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे. https://www.dnaindia.com/india/report-rbi-governor-not-superior-to-finance-minister-former-pm-manmohan-singh-in-2014-book-2683667

ट्रम्प गुरुवार, 06/20/2019 - 15:49
http://nbt.in/Ior5mb?baa NBT: शांततावादी समाज की ममता बनर्जी से अपील- अपराध में शामिल हमारे समुदाय के लोगों पर लें ऐक्शन http://nbt.in/Ior5mb?baa via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता सत्य बाहेर आले कोलकत्ता च्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरानां मारहाण प्रकरणात शांतता वादी होते . इतक्या दिवस कुठल्याही मीडिया किंवा ममताने त्यांचा धर्म सांगितला नव्हता . आणि ममता शांतीवादी लोकांची पाठराखण करून डॉक्टरनां धमक्या देत होती

डँबिस००७ गुरुवार, 06/20/2019 - 21:45
बर्याच केसेस मध्ये अडकलेले IPS संजीव भट्टला आज कोर्टाने आजिवन कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे . संशयित आरोपीचा पोलिस तुरुंगात अंत झाल्याच्या आरोपावर कस्टोडीयल डेथ कोर्टाने हा निर्णय सुनावलेला आहे ! पुर्वी नांबी नारायणन नावाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञाला खोट्या केसमध्ये अडकवुन आयुष्यातुन उठवण्याच काम ह्याच अधिकार्याने केले होते !! हल्लीच नांबी नारायण ह्यांना कोर्टाने निर्दोष सोडले !! ह्याच संजीव भट्टने ईशरत जहान केस मध्ये खोटी साक्ष दिली होती !!

शाम भागवत Fri, 06/21/2019 - 07:01
संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उदार धोरण अवलंबल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. (सर्व आकडे कोटी रुपयांत) भारताची संरक्षण निर्यात २०१८-१९ १०,७४५ २०१७-१८ ४,६८२ २०१६-१७ १५२१ २०१५-१६ २०५९ २०१४-१५ १९४० निर्यातीचे स्वरूप छोटी शस्त्रे ५००० एव्हिऑनिक्स २५०० इलेक्ट्रॉनिक सिस्टीम १४०० इतर १८४५

गड्डा झब्बू Sat, 06/22/2019 - 12:59
कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यवधींचा चुना चारा, कोळसा, 2 जी असे अनेक घोटाळे आजवर उघडकीस आले. अशाच घोटाळ्यांमध्ये आता २०१० ते २०१४ च्या काळातील अजून एक नवा ‘कंडोम’ घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यात एचएलएल लाईफकेअर आणि टीटीके प्रोटेक्टिव डिव्हायसेस लिमिटेड या दोन सरकारी कंपन्याही सामील होत्या. जय मौनमोहन सिंग !!! UPA ने आणखीन किती क्षेत्रात भ्रष्टाचार केला होता हे पाहणे नजीकच्या भविष्यकाळात रोचक ठरेल. लोकसत्ताने बातमीमध्ये घोटाळ्याच्या कालावधीचा उल्लेख केलाय पण UPA चा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक टाळलाय.

गामा पैलवान Mon, 06/24/2019 - 17:18
नगरीनिरंजन,
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो.
काहीतरी गडबड होतेय का? तुम्ही उल्लेखलेल्या लेखात फिस्कल टारगेट राखता आलं नाही असं म्हंटलंय. पण त्यासाठी सरकारला दोष दिलेला नाहीये. उलट मी म्हणतो की मोदींनी पैशाची गळती थांबवल्याने राखीव पेढीकडे इतका पैसा जमला आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमल्याची बातमी कधी कोणी ऐकली नव्हती यापूर्वी. याचा अर्थ माझ्या मते मोदी योग्य दिशेने चाललेत. ज्याप्रमाणे राखीव पेढीकडे इतका पैसा जमला त्याच प्रकारे सरकारकडेही जमेल. राखीव पेढीची गळती थांबवायला धोरणात्मक कायदे पुरेसे होते, व ती तुलनेने चटकन थांबली. मात्र करसंकलन त्रुटी भरून काढायला प्रशासकीय बदलांचीही जरुरी आहे. त्यासाठी वेळ लागतो. तितका वेळ मोदींना द्यावा असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

Your next passport may have chip inside नजिकच्या भविष्यककाळात भाररतिय पारपत्रामध्ये संगणक चिप् सुरक्षाप्रणाली बसविली जाईल. याचबरोबर, परराष्ट्र आणि संचार मंत्रालयांमधील सहकार्याने, जेथे सद्या पारपत्रसेवा नाही अश्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक "पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र (Post Office Passport Seva Kendra उर्फ POPSK) स्थापन करण्याची मोहीम चालू आहे. त्यापकी ४१२ केंद्रे आजतागायत कार्यरत झालेली आहेत. या दोन सेवांच्या संयोगाने नागरिकांची सोय आणि सुरक्षा यांचा संयोग असलेली व्यवस्था होईल.

Rajesh188 Mon, 06/24/2019 - 17:58
वरती पाण्याची उपलब्धता आणि होणारा वापर ह्या विषयावर काही सदस्यांनी विचार मांडले आहेत . त्यात शहरी लोक जास्त पाण्याचा वापर करतात ,टॉयलेट chya फ्लॅश मुळे खूप सारे पाणी वाया जाते,किंवा गाड्या धूने, नळ बंद न करणे इत्यादी कारणे आहेत , आणि ग्रामीण भागात उसा सारख्या पिकाला जास्त पाणी लागत हा आक्षेप आहे. मुळात शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करणेच चुकीचं आहे .दोन्ही क्षेत्र एकमेकावर अवलंबून आहेत .शहरात राहणारी लोक ही खेडे गावातूनच विस्थापित झालेली लोक आहेत . आणि विस्थपण हाच देशा समोरचा ज्वलंत प्रश्न आहे . गावातून तालुक्यात,तालुक्यातून जिल्ह्यात आणि पुढे असे विस्थापण होत आहे . त्याचे कारण लोकांच्या प्राथमिक गरजा भागात नाहीत त्या मुळे ते शहरात येत आहेत ,त्या मुळे शहर आणि गाव दोघांचे ही आरोग्य बिघडत आहे. शेती किंवा शेती आधारित अर्थ व्यवस्था ग्रामीण भागात मजबुत होणे गरजेच आहे . त्यासाठी पाणी ही मूळ गरज आहे . आपल्या कडे पावूस योग्य पडतो फक्त आपण नियोजन करण्यात कमी पडत आहे . शेती साठी ठिबक सिंचन,किंवा तुषार सिंचन वापरल्या मुळे पाणी वाचवत येईल ,पण ही सुविधा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडली पाहिजे आणि त्या साठी सरकारनी सहाय्य केले पाहिजे. शेती आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत आणि त्यात सुधा सुरवातीला सरकारचा सहभाग गरजेचं आहे . ऊस हे पीक का घेतले जाते त्याच एकच कारण आहे बाकी पीक उत्पादन खर्च सुधा देवू शकत नाहीत .नेमक्या मार्केटिंग मध्ये त्रुटी काय आहेत ह्याचा अभ्यास करून उपाय योजना केल्या तर प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल . ग्रामीण भागात च लोकांच्या गरजा भागल्या तर ते शहराकडे विस्थापित होणार नाहीत . आणि प्रचंड गर्दी,प्रदूषण, गुनेहगारी ह्या पासून शहरांना सुद्धा मुक्ती मिळेल. शहराचे हवामान स्वच्छ राहण्यासाठी मोकळ्या प्रदेशाची गरज असते ती गरज खेडे गाव पूर्ण करतात .मोकळ्या जागेत विशाल वृक्ष रोपण तातडीने करणे गरजेचं आहे. पाणी जमिनीत जिरवणे खूप गरजेचं आहे त्या साठी प्रयत्न चालू आहेत पण ह्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे . प्रधमिक गरजा भागवण्यासाठी गावातून शहरात आणि शहरातून विदेशात जाणे हे काही भूषण निय नाही .

In reply to by Rajesh188

तुमच्या प्रतिसादात, नेहमीचाच, वरवरचा आणि एकेरी सूर आहे. तो काढताना, हे नेहमीच (बर्‍याचदा सोईस्करपणे) विसरले जाते की... १. सर्व प्रकारची शेतीची उत्पादने निर्माण करणे आवश्यक आहेच, पण... २. प्रत्येक उत्पन्न कोठे असावे याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी, त्यासाठी लागणार्‍या पाण्याच्या कमी-जास्त उपलब्धतेचा विचार करणे, अत्यावश्यक आहे... सर्वांना योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा विचार सर्वात महत्वाचा, त्यानंतर उरलेले पाणी जीवनावश्यक शेतीसाठी आणि नंतर नगदी पिके घेण्याइतपत पाणी उरत असेल तेथेच भरपूर पाणी जरूर असलेली नगदी पिके घेणे योग्य असेल. दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याने होणारे दुष्परिणाम आपण पाहत आलो आहोच... काही थोड्या लोकांच्या फायद्याकडे पाहत नगदी पिकांसाठी पाणी वापरणे, आणि त्यामुळे लहान शेतकरी व सर्वसामान्य जनता पाण्याविना तडफडणे ठेवणे, कितपत योग्य आहे?! आणि तसे होते तेव्हा, शहरी जनतेला सज्जड दूषणे देणार्‍यांपकी किती जण तेथिल सधन शेतकरी व राजकारणी लोकांच्या या स्वार्थी कृतीबद्दल ब्र देखील काढताना दिसतात?... आत्ताच या धाग्याच्या प्रतिसादात हा विरोधाभास सहजपणे पाहता येईल. हितसंबंध राखण्यासाठी पाण्याच्या सर्वंकष नियोजनाकडे दुर्लक्ष करणे (पक्षी : दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याचे न थांबवणे आणि मुद्दा भरकटवण्यासाठी केवळ पाणी संवर्धनाची भलावण करणे किंवा शहरी लोकांना दुषणे देत गोलपोस्ट बदलणे) म्हणजे, टाकीला लागलेली मोठी गळती बंद करण्याकडे हेतुपुरर्सर दुर्लक्ष करून वरून चमचा-चमचा पाणी टाकून ती टाकी भरण्याचा देखावा करण्यासारखे आहे, हे सांगायलाच हवे काय ?

Rajesh188 Tue, 06/25/2019 - 12:37
स्वयंपूर्ण खेडी नाही तर स्वयंपूर्ण देश होणे गरजेचं आहे . म्हणजे सर्वांचा समान विकास झाला पाहिजे . शहर केंद्रित विकास देशात बरेच जटिल प्रश्न निर्माण करत आहे . जिथे राहतो तिथे रोजगार निर्मिती झाली तरच देशाचा चौफेर विकास होईल . जगात सुद्धा शहर केंद्रित विकासा मुळे प्रश्न निर्माण झाले असतील .त्याचा अभ्यास होणे गरजेच आहे . न्यूयॉर्क किंवा Washington म्हणजे अमेरिका नक्कीच नाही ग्रामीण अमेरिकन लोक कशा परिस्थिती मध्ये राहत आहेत ह्याची सुद्धा माहिती आपल्याला हवी .आणि ती माहिती सहज नेटवर सुद्धा उपलब्ध नाही . त्यांचा अभ्यास करून आपल्या ला आपली धोरण ठरवता येतील . पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या म्हणी प्रमाणे

गामा पैलवान Tue, 06/25/2019 - 17:16
नगरीनिरंजन,
रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
राखीव पेढीचा म्हणजे रिझर्व्ह बँकेचा लोकशाहीशी कसलाही संबंध नाही. ही घटनेत नमूद केलेली (उदा. : न्यायालय, महालेखापाल) यांच्यासारखी एक स्वायत्त शासकीय संस्था आहे. मात्र हिच्या कारभारात शासन व/वा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाहीत. अगदी असाच प्रकार न्यायालयाच्या बाबतीतही आढळून येतो. न्यायालयाच्या कारभारात कोणीही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाही. राखीव पेढीचा लोकशाहीशी संबंध नसला तरी तुमचा 'शासन व राखीव पेढीत मतभेद का होताहेत' हा प्रश्न रास्त आहे. आ.न., -गा.पै.

Top cops told to file FIRs in cut-money complaints फार पूर्वीपासून, कम्युनिस्ट सरकार असल्यापासून, पश्चिम बंगाल राज्यात एक अत्यंत भ्रष्ट प्रणाली काम करत आली आहे. तिला सर्वसामान्य लोकांत "सिंडीकेट" असे म्हटले जाते. या प्रणालीत, सत्तेत असलेल्या सरकारच्या आशिर्वादाने प्रत्येक मोहल्ला, गाव आणि शहर स्तरावर स्थापन केलेल्या या गटांचा मुख्य स्थानिक बाहुबलींनी असतो. स्वतःसाठी, सत्तेतल्या पक्षासाठी आणि सत्तेतल्या नेत्यांसाठी जनेतेकडून अवैध मार्गांनी पैसे जमवणे (पक्षी : लोकांना लुबाडून पैसे जमवणे) हे या सिंडिकेट्सचे मुख्य काम असते. सर्वसामान्य गरीब/श्रीमंत लोक आणि खाजगी संस्थांचे सर्व स्थानिक निर्णय (उदा : जमीन खरेदी करणे, इमारत बांधणे, व्यवसाय-धंदा करणे, त्यासाठी कच्चा माल विकत घेणे, तयार माल विकणे, इ) या सिंडिकेटच्या सहमतीने आणि त्यांना त्यांनी मागितलेले पैसे देऊनच होऊ शकतात. ही एक फार मोठ्या प्रमाणावरची अवैध समांतर संस्था, सत्तेत असलेल्या सरकारच्या वरदहस्ताखाली चालू असल्याने तिला पोलीस आणि न्यायव्यवस्थाही आत्तापर्यंत हात लावू शकत नव्हती... मग लोक दाद तरी कोणाकडे मागणार? आणि दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्याविरुद्ध दमबाजी पासून ते शारिरीक इजा, यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जात असे. नुकतेच झालेल्या निवडणूकांमध्ये लोकांनी या व्यवस्थेला विरोध सुरू केला आणि त्याला नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाने बळ मिळाले. जुलुमी सत्तेविरुद्ध आवाज उठविता येतो आणि संघटीत असलो तर सरकारला आंदोलन दाबून टाकणे कठीण जाते, ही जाणीव सर्वसामान्य लोकांना झाली. लोकांच्या सिंडिकेट्सच्या विरुद्ध असलेल्या असंतोषाचा उद्रेक झाला तर ते फार महागात पडेल, या अंदाजाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला नेहमीचा गर्व बाजूला ठेवून सिंडिकेट्सच्या अस्तित्वाला उघडपणे मान्य केले आहे आणि स्थानिक बाहुबलींना अवैध रित्या जमा केलेले पैसे परत करण्याचे उघड आदेश दिले आहेत. व त्यासाठी पोलीसांना एफआरआय दाखल करण्यास सांगितले आहे. ही फक्त वेळ सावरण्यासाठी खेळलेली राजकिय चाल असली तरी, लोकांचा प्रतिसाद (पक्षी : वाढलेली हिम्मत) पाहता आणि अश्या रितीने सरकारी आशिर्वादाने लुबाडलेल्या पैशाची व्याप्ती पाहता, त्या चालीचा हिमधोंडा (स्नोबॉल) बनून ममता दीदीच्या डोक्यावर आदळण्याची बरीच शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये, अनेक दशकांनी, जनतेला जनतेच्या आवाजाच्या ताकदीची कल्पना आली आहे. ही, पश्चिम बंगालसाठी आणि भारतिय लोकशाहीसाठी फार महत्वाची सकारात्मक गोष्ट आहे.

Rajesh188 Tue, 06/25/2019 - 20:21
पश्चिम बंगाल हे राज्य बांगलादेश सीमेवर आहे . बांगलादेश आणि बंगाल ह्या दोन्ही देश आणि राज्य ह्यांची भाषा एकच आहे . त्याचा परिणाम म्हणून अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या इथे बऱ्या पैकी आहे . कम्युनिस्ट राजवट ही नेहमीच हिंदू विरोधी राहिली आहे . त्या मुळे हिंदुस्थान पेक्षा बांगलादेश ह्यांना जवळचा वाटतो . त्या मुळे बरेच अनैतिक धंदे इथे चालू असतात . केंद्रातील काँग्रेस सरकारनी बोटचेपे धोरण स्वीकारल्या मुळे ह्यांची हिमत वाढली आहे . आता bjp चे मजबुत सरकार केंद्रात आहे तेव्हा थोडी चलबिचल बंगाल मध्ये आहे

$490 billion in black money stashed abroad by Indians till till 2010: Report भारतातून बाहेर गेलेल्या काळ्या पैशाचा अंदाज घेण्यासाठी, सन २०११ मध्ये युपिए सरकारने प्रायोजित (sponsor) केलेल्या, तीन अभ्यासगटांकडून मिळालेले, पण आत्तापर्यंत उघड न केलेले, निष्कर्ष आता सार्वजनिक्रित्या उघड केले गेले आहेत. हे अहवाल सोमवारी लोकसभेच्या पटलावर ठेवले आहेत. (अ) National Institute of Public Policy and Finance (NIPFP), (आ) National Council of Applied Economic Research (NCAER) आणि (इ) National Institute of Financial Management (NIFM) यांच्या निष्कर्षांप्रमाणे, सन २०१० पर्यंत भारतियांनी भारताबाहेर साठवलेले धन युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी) इतके आहे. यामध्ये भारतात, स्थावर मालमत्ता (जमीन, सदनिका, ऑफिसेस, इमारती, इ), खाणकाम, तंबाखू-गुटका, सोने, चलतचित्र उद्योग, शिक्षणौद्योग, इत्यादींच्या रुपात साठवलेल्या काळ्या पैशांचा समावेश नाही. काही दिवसांपूर्वी, स्विटझर्लंडच्या सरकारने, स्विस बँकात खाते असणार्‍या डझनावारी भारतियांना नोटीसेस बजावल्या आहेत, हे माध्यमात आले होते. याशिवाय, स्विस सरकारशी केलेल्या कराराप्रमाणे, भारत सरकारला, स्विस बँकांतील भारतियांच्या खात्यांचा अहवाल, दर तिमाहीला मिळायला सुरुवात झाली आहे. आता या सर्व माहितीवर आधारीत कोणती कारवाई सुरू केली जाईल, हे पाहणे रोचक होईल.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Wed, 06/26/2019 - 17:50
ओके. ४९० अब्ज. म्हणजे तुल्यबळ समांतर अर्थव्यवस्थाच म्हणायला पाहिजे. आपली डॉलरमधली गंगजळीपण यापेक्षा कमी आहे. बापरे.

In reply to by शाम भागवत

चामुंडराय गुरुवार, 06/27/2019 - 08:10
म्हणजे अगदी एक-पाच लाख (नवीन अंक मापन/उच्चार पद्धती प्रमाणे) नसले तरी तीस / तीन-पाच हजार कुठे नाही गेले !

In reply to by शाम भागवत

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 10:25
युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी). हा आकडा, २०११ मध्ये युपिए सरकारने नेमलेल्या कमिट्यांनी दिलेला आहे व तो अहवाल कॉन्ग्रेसच्या विरप्पा मोईली यांनी, गेल्या सोमवारी (२४ जून २०१९) लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. या अहवालातील मजकूराप्रमाणे, १९९७ ते २००९ या काळात, दरवर्षी देशाच्या सकल उत्पन्नाचा (जीडीपी) ०.२% ते ७.४% भाग काळ्या पैशाच्या स्वरूपात देशाबाहेर गेला आहे. यामध्ये देशात साठवलेल्या काळ्या धनाचा समावेश नाही. सर्वसामान्य माणसाला आपले काळे धन परदेशात पाठवणे सोपे नाही, ते गब्बर आणि पोहोच असलेली मंडळीच करू शकतात. म्हणजे, एकूण काळे धन त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असण्याची शक्यता आहे. :(

India will do what is in its national interest: Jaishankar to Pompeo on S-400 deal "परराष्ट्रसंबंधांच्या बाबतीत जसे अमेरिका तिच्या हितंसंबंधांकडे पाहून निर्णय घेते, तसेच भारत त्याच्या हितसंबंधांकडे पाहून निर्णय घेईल", असे भारतिय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सद्या भारतभेटीवर असलेल्या अमेरिकन परराष्ट्रमंत्री पाँपिओ यांना सांगितले आहे. असे करणे हेच योग्य आहे. परंतू, अमेरिकेसारख्या प्रबळ आणि सद्याची एकुलती एक जागतिक महासत्ता असलेल्या देशाला असे (त्याच्या सांगण्याविरुद्ध निर्णय घेत असताना व विशेषतः त्याच्या sanctionsच्या धमकीला भीक न घालता) सांगणे ही कोणत्याही देशासाठी सर्वसामान्य गोष्ट नाही. गेले काही वर्षे भारत असे करत आहे, हे सद्य सरकारच्या राजकिय इच्छाशक्तीचे आणि ती वापरण्याची धमक असल्याचे लक्षण आहे... अर्थातच, हे भारताच्या जागतिक पटलावर उंचावलेल्या प्रतिमेचे लक्षण आहे. आताचे विधान, "अमेरिकन दबावाला न जुमानता, भारताने रशियाकडून S-400 ही अत्याधुनिक युद्धप्रणाली विकत घेण्यासंदर्भात", होते. हे मत भारताने दीड-एक वर्षांपूर्वी उघडपणे व्यक्त केले आहे आणि अमेरिकेच्या अनेक प्रकारच्या सातत्यपूर्ण दबावाला बळी न पडता, कायम ठेवले आहे, हे भारताच्या प्रतिमेसाठीच नव्हे तर भारताच्या संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत स्पृहणिय आहे, यात वाद नाही. असाच दबाव अमेरिका, नाटो सदस्य असलेल्या तुर्कस्थानावर टाकत आहे आणि बर्‍याच अंशी यशस्वी होत आहे, असे दिसत आहे. या युएस५ बिलियन आकारमानाच्या महाखरेदीविरुद्ध असलेल्या अमेरिकन अमेरिकन दबावामागची मुख्य कारणे अशी आहेत... १. S-400 प्रणाली भारताने विकत घेतल्यास, अमेरिकेने रशियाविरुद्ध घातलेल्या बंधनांचा (सँक्शन्स) भंग होतो... हा एकप्रकारे अमेरिकेच्या जागतिक महत्तेचा अपमान होतो. व अमेरिकन प्रथेप्रमाणे अमेरिका सँक्शन्स भंग करणार्‍या देशाविरुद्धही आपोआप सँक्शन्स व्यवहारात येतात. २. तसेच भारताने, (अ) अमेरिकन प्रणाली विकत घेतल्यास, अमेरिकेन अर्थव्यवस्थेला मदत होईल. अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक वर्चस्वाच्या रणनितिमध्ये शस्त्रांत्रांचा व्यापाराला अतीअतीमहत्व आहे. (आ) त्याविरुद्ध, रशियन प्रणाली विकत घेतल्यास केवळ रशियन अर्थव्यवस्थेला मदत होईल असेच नाही तर, अमेरिकेचा रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रयत्न त्याप्रमाणात अयशस्वी होईल. ३. सद्या, S-400 इतकी अत्याधुनिक दुसरी संरक्षक-आक्रमक युद्धप्रणाली आस्तित्वात नाही. अमेरिकेने त्याबदली भारताला त्यांची सर्वोत्तम प्रणाली देऊ केलेली आहे, पण ती S-400च्या तोडीस येत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. ४. S-400 ही अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या विरुद्ध यशस्वी होईल असे तज्ज्ञांचे खात्रीचे अंदाज आहेत. अमेरिकेची मुख्य काळजी हीच आहे. पाकिस्तानकडे अमेरिकन लढाऊ विमाने आहेत. अगोदरच, भारताच्या स्क्वा लि अभनंदन यांनी ६५वर्षे जुनी प्रणाली असलेले मिग-२१ विमान वापरून अमेरिकेच्या नाकाची भूमिका (आणि उत्पन्नाचे महत्वाचे साधन) असलेले एफ-१६ विमान पाडले. यामुळे एफ-१६च्या अजिंकतेच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता, S-400 वापरून एफ-१६ किंवा दुसरे अत्याधुनिक विमान पाडले तर मग (अ) रशियाने अमेरिकेचे नाक कापले असे होईलच, आणि (आ) त्याचबरोबर, त्या घटनेचा अमेरिकेच्या लढाऊ विमान विक्रिवर लक्षणिय परिणाम होईल. अर्थातच, हा जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांच्या गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ५. भारताचे आणि रशियाचे मैत्री आणि सामरिक संबंध खूप जुने (पक्षी : अमेरिका भारताला धाब्यावर बसवत असल्यापासूनचे) आहेत, रशियाने भारताच्या जरूरीच्या काळात मदत केली आहे (जेव्हा, अमेरिका एकतर भारतविरोधी होती किंवा दुसरीकडे बघत होती). हे संबंध नवीन मैत्रीसंबंधांच्या आड येणार नाही आणि नवीन मैत्रीसंबंधांनीही जुन्या मैत्रीसंबंधांच्या आड येऊ नये, असे भारत अमेरिकेला खंबीरपणे सांगत आहे आणि तिच्या गळी उतरवत आहे... हा एक मोठा राजनैतिक विजय आहे. या सोबतच, भारत अमेरिकेने इराणवर घातलेली सँक्शन्स झुगारून, मागच्या दाराने खनिज तेल विकत घेण्याची प्रणाली, एक राखीव चाल म्हणून ठेवून आहे. ते नको असल्यास अमेरिकेने भारताला इराणच्या (आकारमान आणि प्रत) तोडीचे तेल दुसर्‍या देशाकडून मिळवून देण्याची जबाबदारी अमेरिकेवर टाकून भारत प्रतिक्रिया पाहत आहे. याशिवाय, भारताचे इराणबरोबर असलेले सांस्कृतिक-राजकिय-आर्थिक-सामरिक अनेक दशकांचे संबंध हा मुद्दा आहेच... त्याचे एक महत्वाचे उदाहरण छाबाहार बंदर प्रकल्प आहे, जो अमेरिकेला तिचे अफगाणिस्तानमधील हितसंबंध राखण्यास आवश्यक आहे. याशिवाय, इराणला अमेरिकेच मत समजाऊन देणार्‍या दोन-तीन देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. या दोन्ही प्रकरणात असा निर्णय होईल असे दिसत आहे : भारताला सँक्शन कायद्याच्या "अपवाद यादी"त सामील केले जाईल... या यादीतील देशांना/संस्थांना सँक्शन्स असलेल्या देशांशी व्यापार करायला मुभा असते. वरच्या वस्तुस्थितीची मुख्य कारणे अशी आहेत : (अ) आशिया पॅसिफिक राजकारण-अर्थकारण-समरकारण या सर्वांसाठी अमेरिकेला भारत सोडून इतर पर्याय नाही आणि (आ) त्याचबरोबर, भारताने अमेरिकेच्या दबावाला न झुगारता समर्थपणे उभे राहण्याची राजकिय इच्छाशक्ती आणि धमक दाखवली आहे... आणि ते मानण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव गुरुवार, 06/27/2019 - 05:21
जर पुढील वर्षी तात्यासाहेबांची, पर्यायाने त्यांच्या पॉलीसीची, सफेद घरातुन गच्छंती झाली तर हा सगळा गोंधळ कुठले वळण घेईल. यापुर्वीचे सॅम काका इराणबाबत बरेच अनुकुल होते म्हणतात. तेच मार्ग परत ओपन झाले तर परिस्थीती भारताला आणखी सुसह्य होऊ शकेल का??

In reply to by अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 12:09
अमेरिकेत (किंवा इतर कोणत्याही देशात) सरकार कोणाचेही आले तरी अमेरिका (किंवा तो देश) स्वतःचेच हितसंबंध पाहणार. भारताने आपली राजकिय इच्छाशक्ती व पत वापरून, प्रत्येक वस्तूस्थितीत शक्य असेल त्याप्रमाणे, आपले हितसंबंध राखावेत. यापेक्षा वेगळे सत्य नाही. आंतरराष्ट्रिय राजकारणात, आशाळ्भूतपणे पाहून किंवा भीक मागून फक्त अवहेलनाच मिळते... इतर काहीच नाही. एखादी गोष्ट फुकट मिळते आहे असे दिसले तर वर्तमानात/भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेलच याची १००% खात्री ठेवावी. पूर्णविराम.

सुबोध खरे गुरुवार, 06/27/2019 - 09:28
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि भारत स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी जे काही आवश्यक आहे ते करणारच. https://timesofindia.indiatimes.com/india/india-will-do-what-is-in-its-national-interest-jaishankar-to-pompeo-on-s-400-deal/articleshow/69958233.cms

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 12:13
स्विझर्लंडने नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीचे युएस$६.४ मिलियन असलेले बँक अकाऊंट्स गोठवले आहे. आता रिपब्लिक टिव्हीवर ही बातमी दाखवली जात आहे.

Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 13:29
हायप्रोफाइल केस मध्ये मीडिया सांगते त्या पेक्षा वेगळी परिस्थिती असते . निरव चे अनेक बँकेत स्वतःच्या नावावर किंवा dumy नावा वर बँकेत खाती असतील . जे खाते गोठवल आहे असे सांगत आहेत त्या मधून कधीच मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात transfer झाले असतील. प्रत्येक गैर धंदा करणाऱ्या व्यक्तीला काही खोट्या केस स्वतः chya धंद्या वर घाव्या लागतात संगनमताने पोलिस ना सुद्धा द्याव्या लागतात . त्यामुळे जनतेला दाखवा येते सरकार काम करत आहे तसा प्रकार सुद्धा असू शकतो

In reply to by Rajesh188

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 18:00
मूळ मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला नाही. किंवा, या घटनेची पार्श्वभूमी माहीत करून घेतली असतीत, तर घाई करून केलेली सर्व "काल्पनिक व्हॉटाबाऊटरी" टाळली असतीत. =)) युएस$४.६ मिलियन ही काही फार मोठी रक्कमही नाही. पण, स्विट्झलँड त्याच्या बँकेतील पैशांना पोलादी संरक्षण देत असते. आतापर्यंत अमेरिका (तेही गेल्या एकदोन वर्षांतच) सोडून इतर कोणता देश त्या अकाऊंट्सना हात लावण्यात फारसा यशस्वी झालेला नाही. यापार्श्वभूमीवर, आणि नवीन भारत-स्विट्झरलँड कराराच्या पार्श्वभूमीवर, भारताला मिळालेले हे यश, ही नंतरच्या मोठ्या कारवायांची सुरुवात आहे. यानंतरही, या कराराच्या अन्वये, दर तिमाहीला, भारताला स्विट्झर्लँडमधील भारतिय संपत्तीचा अहवाल मिळणार आहे. (खाली दिलेली संदेसरा गृपसंबंधीची ताजी बातमी वाचल्यास (किंवा आत्ता टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या बातम्या पाहिल्यास), भ्रष्टाचारसंबंधी सरकारच्या जोराने चललेल्या नवीन कारवायांसंबंधी अजून काही कळेल व शंकानिरसन होईल.)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 18:14
EXCLUSIVE | Republic Accesses Document Detailing Properties Worth Rs 9,777 Crores In The Sandesara Scam. Read Here स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात आरोपी असलेल्या संदेसरा भावंडांच्या, जगभरात पसरलेल्या संपत्तीपैकी सुमारे रु ९,७७७ कोटी किंमतीच्या संपत्तीवर Enforcement Directorate (ED) ने टांच आणली (attachment ) आहे. ही संपत्ती अनेक देशांत विखुरलेली आहे... (अ) नायजेरियातील ४ तेलविहिरी आणि OML 143 नावाचे तेलक्षेत्र (आ) पनामामध्ये नोंद केलेल्या Tulja Bhawani, Varinda, Bhavya, Brahmani, इत्यादी बोटी (इ) अमेरिकेत नोंदवलेले 200 Gulfstream विमान (ई) युके मध्ये असलेली सदनिका, इ याशिवाय, याअगोदर सन २०१८मध्ये, ईडीने PMLA कायद्याअंतर्गत संदेसरांच्या सुमारे रु४,७३० कोटींच्या संपत्तीवर टाच आणलेली आहे.

In reply to by कंजूस

"दहशतवाद" आणि "आर्थिक घोटाळे करून देशातून पळणाऱ्यांवर कारवाई" हे दोन विषय मोदी प्रत्येक आंतरराष्ट्रिय मंचावर उपस्थित करत आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जागतिक स्तरावर जाणिव व तिरस्कार निर्माण होऊन कडक कारवाईसाठी आंतरराष्ट्रिय सहकार्याच्या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.

मदनबाण Sun, 06/30/2019 - 12:15
अरारारा आरारारा आरारारारा... [ हे गाणं आहे, खालच्या बातम्या वाचुन हेच शब्द तोंडातुन निघाले ! ] देशात पीएनबीपेक्षाही मोठा 14 हजार 500 कोटींचा घोटाळा – इडी शहाणपणाचे वावडे का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

मदनबाण Sun, 06/30/2019 - 21:45
शुक्रवार २८ जून ला देवळाली रेंजमध्ये मध्ये मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्सची चाचणी घेण्यात आली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

Hong Kong protesters smash up legislature in direct challenge to China अमेरिकेशी व्यापारी संबंधांतील मारामारी, देशातील ढासळणारी अर्थव्यवस्था, दक्षीण चीन समुद्रातील सीमारेखेवरून शेजारी देश व अमेरिकेशी चालू असलेले वाद, इत्यादी चिनी राष्टाध्यक्ष शी यांच्या डोकेदुख्यांत अजून एका मोठ्या समस्येची भर पडली आहे. हाँग काँग मधिल ब्रिटिश वसाहतीची ब्रिटनची ९९ वर्षांची भाडेपट्टी (lease) सन १९९७ साली संपली. त्यावेळेस, तो भूभाग परत घेताना चीनने, "हाँग काँग मध्ये आधीची ९९ वर्षे चालू असलेली मुक्त व्यापारी, लोकशाही आणि न्याय व्यवस्था चालू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. याचे कारण म्हणजे, हाँग काँगचे 'जागतिक स्तरावर महत्वाचे आर्थिक केंद्र' हे महत्व. तसे आश्वास न दिल्यास हाँग काँगची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे चीनला पुरेपूर माहीत होते आणि तो धोका स्विकारणे मूर्खपणाचे झाले असते. असे असले तरी, जसजसा काळ जाऊ लागला तसतसे, चीनी ड्रॅगनने मागच्या दाराने, हाँग काँगला आपल्या विळख्या जखडण्याचे काम सुरु केले. तेथिल निवडणूकीत उभे राहणार्‍या लोकप्रतिनिधींच्या निवडीत हस्तक्षेप, प्रशासनात आणि व्यापारी नियमांत ढवळाढवळ, असे करत करत सद्या तेथिल चीनच्या नीतीला विरोध करणार्‍या नागरिकांच्यावर शेवटचा आघात करणारे विधेयक स्थानिक विधानसभेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विधायकात, विरोधकांवरचे खटले हाँग काँग येथून हलवून, चीनच्या मुख्य भूमीवरील कम्युनिस्ट न्यायालयांत नेण्याची तरतूद आहे. एकदा तेथे खटले नेले की 'निकाल' चीनच्या सरकारच्या बाजूनेच लागेल आणि शिक्षा कडक असेल हे सांगणे काही फार कठीण नाही. अर्थातच, सुरुवातीला अडखळत सुरू झालेल्या विरोधाला गेल्या काही दिवसांत जनतेचा मोठा पाठींबा मिळाला आहे आणि त्याची धार प्रखर झाली आहे. सुरुवातीला शांततापूर्ण असलेले हे आंदोलन सद्या अटीतटीचे आणि हिंसक वळण घेऊ लागले आहे. आंदोलकांनी विधान भवनाचे (Legislative Council) संरक्षक कुंपण तोडून इमारतीत प्रवेश केला आणि आतमध्ये बरीच मोडतोड केली, भिंतींवर अक्षरे आणि चित्रे (ग्राफिती) काढली, चीनने मान्य केलेला ध्वज उलटा लटकावला आणि आंदोलकांचा ध्वज रोवला. या आंदोलनात वेगवेगळ्या अंदाजांप्रमाणे ५ ते १० लाक लोकांनि भाग घेतला आहे... हे अभूतपूर्व आहे. हे प्रकरण सद्या बरेच गरम झाले आहे, त्यात अमेरिका आणि ब्रिटनने राजकिय उडी घेतली नसती तरच आश्चर्य. दोन्ही बाजू नेटाने पाय रोवून उभ्या असल्याने, ते कोणत्या दिशेने जाईल नक्की सांगणे हे सद्या तरी कठीण आहे. मात्र, त्याची दीर्घकालीन दिशा, राष्टाध्यक्ष शी यांचे चीनमधील आणि आंतरराष्ट्रिय महत्वावर लक्षणिय प्रभाव टाकेल, यात वाद नाही.

#MeToNavhech (#मी_तो_नव्हेच) ;)

भारतातिल तथाकथित विचारवंत, विचार स्वातंत्र्याचे दावेदार, "सोईस्कर" खुट्ट वाजले (किंवा कधी कधी ना वाजले तरी) भयभित होणारे चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादी सगळ्याचे ढोंग (हायपोक्रसी), परत एकदा, जगजाहीर झाले आहे. खालील दोन्ही बाबतील काही मोजके अपवाद सोडता, खुट्ट वाजल्यावर जग पेटून ऊठले आहे असा गदारोळ करणारी वर्तमानपत्रे आणि इतर राष्ट्रिय माधमे आणि वरचे सगळे ढोंगी जणु काहीच झाले नाही असे मूग गिळून गप्प आहेत.

१. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या तृणमूल कॉन्ग्रेसच्या खासदार नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून लोकसभेत शपथ घेतली यावरून त्यांच्यावर कर्मठ मुस्लीम मुल्लांकडून टीका झाली आणि सामाजिक माध्यमांत ट्रोलिंग झाले. याबद्दल त्या खमक्या खासदाराने त्यांना परत सुनावले. मात्र, तृणमूलची स्त्री मुखिया किंवा दुसर्‍या कोणी महत्वाच्या राजकारण्याने त्यांच्या बाजून बोलल्याचे माध्यमांत दिसत नाही. २. झाईरा वसीम नावाच्या बक्षिसाने गौरविल्या गेलेल्या सिनेमा अभिनेत्रिला, मुस्लिं कट्टरतावादी आणि सामाजिक माध्यमांतील ट्रोलिंगमुळे, आपले सिनेमा करियर सोडून द्यावे लागले. त्या अभिनेत्रिला चित्रपट सृष्टीत घेऊन येणार्‍या, एका लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमात नाक वर करत (व कधी नक्राश्रूंनी भरलेले नाक पुसत) इतरांच्या नीतीमत्तेवर टीका करणार्‍या, भारतात विचारस्वातंत्र्य उरले नाही म्हणून आपली बायको भयभीत झाली आहे व परदेशात स्थालांतर करू असे सांगते आहे असे ठणकाऊन सांगणार्‍या, एका तथाकथित सुपरस्टारनेही मुका-बहिरा असल्याचा अभिनय करणे योग्य समजले आहे. पुर्वानुभव पाहता, अश्या एखाद्या प्रकारात, इतर धर्माच्या मुलीबद्दल, इतर धर्मगुरूने किंवा राजकिय नेत्याने जरासे अनुद्गार काढले असते तर सगळे आकाश कोसळले असते... व ते एका परीने योग्यच असते. मात्र, आता दातखिळी बसलेल्यांनी तसे करणे ढोंगीपणाची, खोटेपणाची आणि निर्लज्जपणाची परिसीमा ठरते, हे सांगायला नकोच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

mayu4u Wed, 07/03/2019 - 15:41
नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील.

In reply to by mayu4u

नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. हे जगजाहीर आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील. सद्य कायद्याप्रमाणे, त्यांना साडी नेसणे, कुंकू लावणे आणि मंगळसूत्र घालणे यासाठी, अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी अधिकृतरीत्या हिंदू धर्म न स्विकारता, तसे केले तर त्यावरही आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला नाही. ****** तुम्हाला मूळ मुद्दा समजला नाही असे वाटते. "कोणी काय खावे, काय पेहरावे, त्या आमच्या घटनादत्त विचारस्वातंत्र्यावर कोणीच (सरकारसुद्धा) घाला घालू शकत नाही" असा वेळोवेळी सोईस्कर गळा काढणार्‍या चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढू नये, यात त्यांचा सोईस्कर निवडकपणा (उर्फ सिलेक्टिविझम) आणि म्हणूनच निर्लज्ज ढोंगीपणा उघड झाला आहे. या वरच्या गोष्टींत अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द राजधानीतील एका मंदीरावर इतर धर्मियांनी दगडफेक केली आणि आत प्रवेश करून मंदीर भ्रष्ट होईल अश्या कारवाया केल्या. "विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या लिंचींग" बद्दलच्या बातम्या आकांडतांडव करत अनेक महिने चघळत राहणार्‍या माध्यामांनी त्याबाबत आंधळे-बहिरे होणे स्विकारले आहे. तसेच, काही सन्मामनिय अपवाद सोडता, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्याच कारणांनी होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ****** अजून एक... पहलू खान लिंचींग प्रकरण आठवत असेलच. त्या वेळेस, कोणताही पुरावा न देता, पहलू खान "बिचारा निर्दोष" आहे आणि तो एका विशिष्ट धर्माचा असल्यानेच त्याला मारले, असा प्रकरणाला धार्मिक रंग देऊन, वर निर्देशिलेल्या व्यक्ती आणि माध्यमे दुसर्‍या धर्माला झोडपत होत्या, हे आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सद्य कान्ग्रेस सरकारने त्यासंबंधात दाखल केलेल्या एफआरआय मध्ये पहलू खानच्या नावावर "गाईंची अवैध खरेदीविक्री" करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही गुन्ह्याकरिता कोणत्याही नागरिकावर, कायदेशीररित्या सक्षम (competent) नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, प्राणघातक हल्ला करणेच काय, स्वसंरक्षणार्थ आवश्यक असेली कृती सोडून इतर कोणतीही कारवाई करणे, अवैध आणि निषेधार्य आहे. मात्र, त्याचबरोबर, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी त्यावेळी दाखवलेला ढोंगीपणा (परत एकदा) उघड झाला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बिळात लपून राहीले आहेत. ****** तेव्हा, मुख्य मुद्दा ह्या सततच्या निर्लज्ज ढोंगीपणाचा आहे. अवैध कृतीसंबंधी कडक कारवाई व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर, अश्या निर्लज्जपणे हेतुपुरर्सर केल्या जाणार्‍या ढोंगी कारवाया समाजातील सौहार्दाला गंभीत धोका पोचवतात. काही जणांचा हा व्यवसाय/खेळ झाला आहे, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. म्हणून, त्यांच्यावरही (आवश्यक तर नवीन कायदे करून) कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

In rare move, Pakistan military agrees to budget cut amid economic woes पाकिस्तानची आर्थिक हालत इतकी खस्ता झाली आहे की, कधी नव्हे ते पाकिस्तानी सैन्याने या वर्षीचे बजेट स्वतःहून कमी करून घेतले आहे.

ट्रम्प Wed, 06/05/2019 - 20:10
जानते राजे त्या दिवशी दिल्हि मध्ये असून सुद्धा मोदींच्या शपथविधि ला हजर राहिले नाही कारण क़ाय तर पाचव्या रांगेत त स्थान देवून अपमान केला गेला . पण आज राष्ट्रपती भवनातून पत्रक प्रसिद्ध करून ठामपणे सांगण्यात आले कि जाणत्या राजा ला पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते . याचा अर्थ सरळ आहे की राष्ट्रपती भवन धडधडित खोट बोलत आहे , कारण उभ्या हयातीति आमचे राजे खोटे कधी बोलले नाहीत , यू टर्न कधीच नाही :)

In reply to by ट्रम्प

चौथा कोनाडा Wed, 06/05/2019 - 21:22
दिल्लीवाल्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की पहिल्या पहिल्या रांगेच्या प्रवेशिकेवर रांग क्रमांक V ( इंग्रजी अक्षर व्ही) असे छापले होते जी पहिली रांग होती ( V= व्हीआयपी असे असेल कदाचित) जा. राजांनी असा समज करून घेतला कि रोमन V हा आकडा म्हणजे पाचवी रांग आहे. अपमान केलाय आपला. अनुपस्थित राहिले. स्पष्टीकरणाचा तर्क पटण्या सारखा आहे. बघा याचं पुरावा उत्खनन करून काही मांडता येते का ! (हे जा. राजा म्हणजे अर्धवट विधानं करून गुल्लाड होतात. ठामपणे राग ही व्यक्त करत नाहीत, ईव्हीएम आरोपांचं पण तसंच, पुरावा देत नाहीत नुसतंच गुगली टाकत राहायचं ... मग अश्यांन मतदारांना विश्वासाहर्ता वाटत नाही ना ... अन मग निवडणुकीत मतदारही गुगली टाकतात, त्यांच्या नातवाला सुद्धा घरी बसवतात !)

In reply to by चौथा कोनाडा

ट्रम्प Wed, 06/05/2019 - 21:55
पुत्री च्या भविष्या मुळे उलट सुलट विधाने करत असतील दूसरे काय ? पण प्रधानानीं पुत्र प्रेमापोटी वेळो वेळी राजाला धोबी पछाड़ दिली आणि हे तमाम जनते ने बघितले .

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे गुरुवार, 06/06/2019 - 10:56
इ व्ही एमचं "अवघड जागी (गुप्त) दुखणं आणि गावातला एकमेव डॉक्टर जावई" अशी स्थिती झाली आहे. इ व्ही एम घोटाळा म्हटलं तर श्रीमती सुप्रिया सुळे कशा निवडून आल्या? आणि बरोबर म्हटलं तर पार्थ पवार कसे पडले? म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.

प्रसाद_१९८२ गुरुवार, 06/06/2019 - 11:09
केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपाने, शिवसेनेला पुन्हा एकदा 'अवजड उद्योग मंत्रालय' देऊन त्यांची बोळवण केली आहे. आता आणखी एक मंत्रीपदासाठी सेनेने भाजपाकडे तकादा लावला आहे. जर भाजपाने आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला न दिल्यास, गेली पाच वर्षे सांभाळून ठेवलेले खिशातले राजीनामे आता तरी बाहेर येतील का ? . . . मला वाटते, ह्या अवजड उद्योग मंत्रालयाची निर्मीती खास शिवसेनेकरताच करण्यात आली आहे. :))

डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 14:03
मोदी सरकार जोमाने कामाला लागलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे मिडीया मध्ये बर्याच लोकांना सशक्त विरोधी पक्षाची गरज वाटत आहे. पण सशक्त विरोधी पक्ष नेमक कोण हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. अर्बन नक्षल ध्रुव राठी याने एक वेगळच तर्कट दिल होत. काँग्रेसला आता सुद्धा विरोधी पक्ष बनण्यासाठी २ सीट कमी पडत आहेत. एन डी ए सरकारने तरी सुद्धा काँग्रेसल विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली पाहिजे. कारण आपने जेंव्हा दिल्ली मध्ये ७० पैकी ६७ जागा पटकावल्या तेंव्हा फक्त ३ जागा भाजपाला मिळालेल्या तरी सुद्धा भाजपाला विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली.

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे Fri, 06/07/2019 - 12:27
विरोधी पक्ष नेता हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याला स्वतंत्र पगार आणि इत्तर भत्ते आणि सरकारी सोयी दिल्या जातात. त्यासाठी विरोधी पक्षाकडे लोकसभेत कमीत कमी ५५ जागा पाहिजेत. त्या नसतील तर असे पद देणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून हे पद अतिरिक्त / तद अर्थ -AD HOC (विना आर्थिक लाभ) दिले जाऊ शकते उगाच कोणी उपटसूंभ म्हणतो म्हणून पद देणे हे चुक ठरेल

डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 14:06
मनेका गांधींना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काय कारण असावे ? काहींच्या मते लोकसभा स्पिकर म्हणुन नेमणुक होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प Sat, 06/08/2019 - 12:40
काल वायनाड मध्ये रागानीं " नफरत को हम प्यार से जवाब देंगे " असे सांगितले . हे वाक्य त्यांनी जनते ला की भाजप ला उद्देशुन केले हे नाही . देशातील मतदार काँग्रेस बरोबर नफरत करतात हे त्यांनी मान्य केले , असा आपण समज केला की मग आता फक्त नफरत का करतात याचा एकदा शोध घेतला की काँग्रेस पवित्र झाली अस समजायच का ?

ट्रम्प Sat, 06/08/2019 - 12:55
काळा ने राकॉ वर चाबुक ओढला .... ज्या संघाची चड्डि वरुन आयुष्य भर हेटाळनी केली त्या संघाच्या कार्यपद्धति चा अभ्यास कार्यकर्त्यांना करायला सांगण्याची वेळ राकॉ च्या सुप्रीमो वर आली .........

प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 11:50
सकाळची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत, संघ कार्यकर्त्यांची बरिच वर्दळ सुरु होती. इतक्यात एक आलिशान फॉर्चुनर गाडी ब्रेक करकचून दाबर शाखेच्या दारावर थांबते. गाडीतून दोन-तीन बाऊंनसर टाईप लोक खाली उतरतात व थोडा वेळ थांबून गाडीचा दरवाजा उघडतात. संपूर्ण पांढरा सदरा, पॅंट, पायत सफेद चपला व डोळ्याला रेबॉनचा गॉगल लावलेला एक इसम गाडीतून बाहेर उतरतो. -- तोंडात भरलेला पानाचा तोबरा एका कोपर्‍यात रिकामा करत, समोर धावपळ करणार्‍या संघ स्वंयसेवकांना तो म्हणाला 'इथ ती चिकाटी- बिकाटी कुठ शिकवली जाते'? आमचा नेता म्हणला की जाऊन संघ स्वंयसेवकांकडून चिकाटी शिका, म्हनुन आलोय, क्लासचे पैशे कुणीकडे भरायचे ? -- फेसबुक वरुन ;

In reply to by प्रसाद_१९८२

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 12:57
जबरदस्त, एकच नंबर किस्सा. मीपण मीपण , सायंशाखेवर ची वर्दळ आताशा कुठे ओसरत आली होती, त्या पॉश उपनगरातील तिनचारशे शिशु आणि कुमार स्वयंसेवकांचा देशभक्तीपर आरव वातावरणाला कसा रोमांचित करून गेला होता. इतक्यात जोरात ब्रेक दाबत एक हिरवट पिवळ्या रंगाची दणकट जीप धूळ उडवत थांबली. आपल्या मजबूत बुटांचा जोरकस आवाज करत तीनचार काटक जवान सावधान अवस्थेत उभे झाले. गर्द हिरव्या रंगाचा कडक गणवेश घातलेला एक अधिकारी ताडताड पावले टाकत सायंशाखेच्या शिक्षकासमोर उभा राहिला. विनम्रतेने हात जोडून तो विनंती करता झाला. " ते ध्वजारोहणाची पद्धत आणि ध्वज प्रणाम म्हणजे काय असते? कुठे आणि किती दिवसात शिकवतात ते?" . बहुतेक कुठूनतरी साभार.

In reply to by अभ्या..

प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 13:21
अभ्या सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दिसता. __ तुमच्या भावना दुखावल्या बद्दल माफी.

In reply to by प्रसाद_१९८२

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 13:35
अरे, आपल्या आपल्यात काय माफी? मी संघाचाच, सहा वर्षे शाखा, एक ओटीसी, मग अभाविप, आधी कार्यालय मंत्री, मग शहरमंत्री. एक वर्ष पूर्णवेळ, दोन अधिवेशने, तीस चाळीस आंदोलने, पाच अटका. त्यानंतर भाजपा, परिवारातील प्रकाशनात काम, त्यासोबत भरपूर जबाबदार्या. . चेक करून पाहा वाटल्यास. गरज असेल देऊ का रेफरणसेस? . आपण?

ट्रम्प Sun, 06/09/2019 - 19:45
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . त्यामुळे आयुष्यभर संघाला हिणवणाऱ्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांनां संघाची महत्ती सांगताना लाज वाटली नसेल का ? तरी बर आहे या वेळेस महाराष्ट्रात तरी भाजप ला मतदान घड़ऊन आणण्यासाठी संघाला धावपळ करण्याची गरज भासली नाही .

In reply to by ट्रम्प

अभ्या.. Sun, 06/09/2019 - 23:12
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही अर्धा भाग अगदी परफेक्ट, पूर असो की भुकंप, अवर्षण असो की अतिवर्षा, युध्द असो की दंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्य जनतेस अनेकदा मदतीचा हात दिला आहे आणि त्या मदतीतील शिस्त, निर्व्याजपणा, अचुकता आणि सेवाभाव निष्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि वेळोवेळी त्याचे कौतुक होत आलेले आहे. मुलतः भारतीय मानसिकता अशा संकटाच्या वेळी भांबावुन जाण्याची जास्त आहे. आपत्ती व्यवस्थापन हा विषयच मुळी आजकाल गंभीरपणे घेतला जातोय. पूर्वीपासून एखादी दुर्घटना घडली की सैरावैरा पळणे, कशाचा पायपोस कशात नसणे, कुणी मदत जरी केली तरी ती अव्यवस्थितपणे, बेशिस्त, असमान पध्दतीने वाटली जाणे, वैद्यकीय मदत ही विस्कळीत स्वरुपाची असणे अशाच पध्दतीने हाताळली जाई. सिस्टिमॅटिकली मदत करण्यात प्रथम क्रमांक जाई सैन्यदलाला. कडवी शिस्त, प्लानिंग करुन हुकुमानुसार सर्व अनुयायांनी आचरण करणे, परिस्थितीची, सुखसोयीची तमा न बाळगता युध्दपातळीवर मदत करणे आणि बरीचशी साधने(डॉक्टर्स, यंत्रसामग्री, दळणवळण, पैसा) हाताशी असलेने सैन्यदल अशा परिस्थितीत कायमच प्रभावी ठरलेले आहे. सैन्याच्या ह्या काही गुणांचा समावेश संघाच्या मदतकार्यातदेखील आहे. त्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक करावेच लागेल पण ह्या कार्यापाठीमागे बर्‍याच गोष्टी असतात. संघाचे शहरी उच्च्शिक्षित भागात असलेल्या कार्यामुळे डॉक्टर्स वगैरे लोकांचा समावेश अशा मदतकार्यात नेहमीच राहिला आहे. सोबतच बर्‍याच संघविचारांच्या कार्य्कर्त्यांचे समाजात असलेले निरपेक्ष कार्यकर्ता म्हणून असलेले वजन उपयोगी पडलेले आहे. हे लोक अपहार करणार नाहीत ह्याची खात्री असलेने समाजाने पण वेळोवेळी संघाच्या पाठिमागे मदतीचा हात ठेवलेला आहे. बर्‍याच गावी संघविचाराने स्थापन केलेल्या ब्लड बँका, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पतसंस्था, बँका आदि संस्था अशा वेळी पूर्ण ताकदीने उभ्या राहिलेल्या आहेत. ह्याउलट इतर पक्षांची स्थिती आहे. संघातून जसा भाजपाचा जन्म आहे आणि संघाचा कार्याचा वारसा आहे तसा इतर पक्षांचा नाहिये. त्यामुळे संघ करतो आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस करत नाही अशी तुलनाच चुकीची आहे. काँग्रेस म्हणा कि इतर पक्ष म्हणा त्यांचे कार्यकर्त्यांचे स्वरुप निराळे आहे. त्यांची मदतीची आणि ती शिस्तबध्दपणे करण्याची पध्दत नाहीच आहे. तशी तुलनाच करायची असेल तर आजच्या भाजपाची आणि काँग्रेसची मदतीची करावी. म्हनजेच राजकीय पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची करावी. दुर्घटनेतच नव्हे तर इतर बर्‍याच ठिकाणी म्हणजे देवस्थाने, सण समारंभ, गर्दीचि ठिकाने, समाजातील काही छोट्यामोठ्या गोष्टी अशात मदत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करत असतात पण ते एक्जिनसी संघटनेची मदत ह्या स्वरुपात दिसत नसते. कित्येक सामाजिक कार्यकर्ते मग बाबा आमटे असोत की डॉ बंग दंपती असोत, राजकीय अजेंडा न ठेवता राबत असतात, शिवसेनेसारखे पक्ष आनि त्यांचे शिवसैनिक कित्येक दुर्घटनामध्ये, अपघातांमध्ये स्वतःच्या खिशाला खार लावून नागरिकांना मदत करतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. घरगुती किंवा लोकल आणिबाणीच्या प्रसंगीही ते सगळ्यात आधी धावत येतात. अशा दुर्घटनामध्ये त्यांनीही प्रचंड मदत निरपेक्ष स्वरुपात केलेली असते. शिरडी, तिरुपतीसारखी कित्येक श्रीमंत देवस्थाने, निरंकार बाबा, ब्रह्माकुमारी, पुट्टपर्ती साईबाबासारखी विवाद्य संतस्थानेही अशा वेळी प्रचंड मोठ्या स्वरुपात मदत उभी करतात. अगदी किल्लारी भुकंपातदेखील जिथे संघाचे कौतुक झाले तिथेच सेवादलानेही भरपूर काम केले. एक्सप्रेस ग्रुपला बांधून घेउन भुकंपात आईवडील गमावलेल्या मुलांसाठी खूप मोठी निवासी शाळा आपले घर ह्या नावाने चालु केली. ती अजुनही चालु आहे. टाटा सोशल सायन्सचे काम त्या काळात उभे राहिले. लॉरी बेकरसारखे अभियंता आणि स्थापत्यविषारदांच्या शिष्यमंडळींनी भुकंपरोधक घरे बांधायला मदत केली. परदेशातून मदत मिळवायला शरद पवारांनीही भरपूर प्रयत्न केले, समाजाच्या सर्व थरात मदत करायची भावना असतेच. फक्त पध्दत वेगवेगळी असते. राजकारणी पक्षांनी किती आणि कशी मदत केली हा चर्चेचा किंवा हिणवण्याचा विषय होऊन नये असे वाटते. तेथील लोकप्रतिनिधींनी अवश्य काम केलेच पाहिजे पण कुणा पक्षांने ते काम केलेच नाही असे कधीच नसते. मदतीच्या कार्यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, संस्था जे जीव तोडून मेहनत करतात ते कौतुकास्पद आहे पण त्या मदतीची अशी जाहिरात करुन किंवा मनानेच किस्से लिहुन त्याची किंमत कमी करु नका इतकी प्रार्थना. त्याचा कुणास हिणवण्यासाठी वापर करु नये असे मनापासून वाटते. धन्यवाद

In reply to by अभ्या..

आनन्दा Mon, 06/10/2019 - 10:56
संपूर्णपणे सहमत. दुर्घटनेच्या वेळी सर्व संघटना मदत करत असतात. फरक कुठे नेमका पडलाय ते सांगतो. सर्व माध्यमे नेहमीच आतापर्यंत संघाला जातीयवादी आणि विशेषतः ब्राह्मणी संघटना म्हणून प्रसिद्धी देतात. पण प्रत्यक्ष संघाचे on field काम पाहताना तसे काही दिसत नाही. म्हणजे संघाने कधी आपत्तीमध्ये हा मुसलमान आहे म्हणून कोणाला मदत नाकारल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे जेव्हा आपत्ती येते तेव्हा तिथले सेवाकार्य पाहून लोकांची संघाबद्दलची उत्सुकता चालवली जाते, कारण ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक पडतो तेव्हा ऐकवणाऱ्या माणसावरचा विश्वास उडतो. दुसरी गोष्ट जाहिरातीची - प्रत्येक संस्थेची कार्यपद्धती वेगळी असते. माझया माहितीत कोणीही इतरांचे कार्य कमी लेखल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना आपत्तीमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था उत्तम समन्वयाने काम करत असतात. पण संघाने जर या कामाचा वापर आपल्यावरचे जातीयवादी लेबल हटवण्यासाठी केला तर त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेही संघाचा मूळ उद्देश सेवाकार्य हा नाही, संघटन हा आहे. सेवाकार्य असते तर मग एखादी NGO उघडता आली असती. पण तसे संघाने केले नाही, कारण ते सेवाकार्यापूरते मर्यादित नाही. सेवाकार्य हा संघाच्या कार्याचा एक भाग आहे. आणि त्याची जाहिरात करून ते मूल हेतू, जो आहे संघटन करणे, तो सध्या करू पाहतात. मला तरी यात काही चुकीचे दिसत नाही.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे Mon, 06/10/2019 - 11:22
रा स्व संघाची ७० वर्षे जाणीवपूर्वक केलेली बदनामी आणि अपप्रचार यातून लोकांना सत्य स्थिती काय आहे हे समजावणे हा संघाचा एक हेतू काही वर्षांपासून झाला आहे. हि बदनामी कशी असते ते पहा. अगदी सुरुवातीपासून उदाहरण द्यायचे झाले तर नथुराम गोडसे हे पूर्वी संघात जात असत त्यावरून संघाला गांधीवधात गोवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला गेला. यानंतर सुद्धा एखादा पूर्व संघ स्वयंसेवक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल तर "संघाचा स्वयंसेवक गुन्हेगार" अशी मोठा मथळा असलेली बातमी येते. अशी बातमी पूर्वीचा काँग्रेसी, समाजवादी किंवा कम्युनिस्टांबद्दल आलेली क्वचितच दिसते. सर्व प्रचार माध्यमे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे इतकी वर्षे केलेला अपप्रचार लोकांच्या लक्षात येत नसे परंतु आता सार्वजनिक न्यासावर सत्य फार पटकन उपलब्ध होत असल्याने "पत्रदलाल अन पत्रवारांगनांचे" पितळ उघडे पडत चालले आहे. यात कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांना संघाबद्दल वाटत असलेला द्वेष कारणीभूत आहेच. त्यांनी पण "राष्ट्र सेवा दल" सारख्या संघटना काढल्या होत्या पण त्या चालल्या नाहीत ( याची कारणे वेगवेगळी आहेत). आता रास्व संघ जर आपला प्रचार करत असेल तर त्यात गैर काय आहे? श्री प्रकाश आमटे सुद्धा आपल्या अत्युच्च कार्याला देणग्या मिळवण्यासाठी कार्यक्रम आणि प्रसिद्धी करतच असतात. शेवटी राम कृपे बरोबर दामकृपा पण तितकीच महत्त्वाची

In reply to by अभ्या..

ट्रम्प Mon, 06/10/2019 - 16:33
बाकी समाजकार्यात तुलना करु नये या मताचा मी पण आहे , पण अगदी ठरवून काँग्रेस च्या लोकांनी संघावर केलेले हल्ले आठवल्या वर चीड येते . त्याच प्रमाणे तुम्ही उल्लेखलेल्या सर्व संघटना ( काँग्रेस व रा कॉ वगळून ) निर्व्याजपणे समाजसेवा करतात आणि त्याबद्दल सर्वसमाजा कडून या संघटना चे वेळो वेळी कौतुक केले गेले , पण संघा च्या वाटेला फक्त भाजप व्यतिरिक्त पक्षांकडून व समाजातील इतर घटकाकडून अवहेलनाच आली . अस क़ाय पाप केलय संघाने की काँग्रेस सह पक्ष व तथाकथित पुरोगामी हे सगळे एकत्र येवून धोपटत बसतात !!!!

In reply to by ट्रम्प

भंकस बाबा Mon, 06/10/2019 - 17:59
संघ नेहमीच हिंदुच्या हिताचे बघतो. संघ भगव्या रंगाला प्राधान्य देतो. संघाची प्रार्थना संस्कृतमधे आहे. आपत्तीकाळात मदत करताना संघ ड्रेसकोडमधे असतो. त्यामुळे होते क़ाय की संकटात असलेल्या समुदायाला संघाचे कार्य उठून दिसते. हेच काम पोस्टर व बैनर लावून पण साध्य होत नाही. भाजपमधील बहुसंख्य नेते हे संघाच्या मुशितून आलेले असतात. त्यामुळे भाजपविरोधक नेहमीच संघाच्या विरोधात असतात. अनेक वेळा बंदीची भाषा करुनदेखिल संघ नव्या उमेदिने पुढे येतो. आता हे सर्व मुद्दे आल्यावर सर्वधर्मसमभाववाले, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले, शांतिप्रिय समाजवाले, धर्मांतरण करून पोटाची खळगी भरणारे यांच्या पोटात दुखणारच ना?

डँबिस००७ Mon, 06/10/2019 - 12:16
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . रा स्व संघासारखी संस्था भारतात आहे हेच आपले भाग्य आहे. अन्यथा मदतीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय एन जी ओ करोडो रुपये गोळा करतात, आपल्या आंतरराष्ट्रीय एन जी ओ स्टेटसच्या दबावा खाली लोकल प्रशासनाला मदत कार्यासाठी एकाधीकार मागतात मग जमवलेल्या पैश्याने धर्म परिवर्तन करतात, चर्च बांधतात. अशी अनेक उदाहरणे भारतात घडलेली आहेत. लोकल प्रशासन त्यावेळेला मुग गप्प बसते. सुनामि च्या वेळेला तामिळनाडु सरकारने भारतातल्या इतर सेवाभावी संस्थांना मदत कार्यासाठी परवानगी नाकारली. ती परवानगी त्यांनी वर्ल्ड व्हीजन नावाच्या अमेरीकेतल्या एन जी ओ ला दिली. हिंदुंचे मास धर्म परिवर्तन करण्याची ख्रीश्चन एन जी ओ वर्ल्ड व्हीजनला ही एक मोठी संधी हाती आली आणी त्यांनी त्याचा खुप फायदा करुन घेतला. सुनामीत घर गेलेल्यांना घर देण्याएवजी चर्च बांधुन देण्याची अजब मदत केली गेली. ह्या सर्वांच्या मागे तिथले करुणानिधी सरकार होते. "REMEMBER THIS! I spent months in the tsunami in Nagapatinam district of TN funding Swami Dayananda Saraswati's projects & made documentary. Christian NGOs led by World Vision announced it was a great opportunity to convert. Many Hindus forced to convert. " Rajiv Malhotra Tsunami: The Untold Story by Rajiv Malhotra, 2005 https://youtu.be/MOkWSa69NKA ‏

डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 20:10
सुप्रिम कोर्टाचा भेदभाव पुर्ण व्यवहार !! प्रशांत कनौजीया नावाच्या तद्दन हलकट पुर्व पत्रकाराने उ प्र चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विरुद्ध ट्विटर वर अपमानकारक वाक्य लिहील, त्यावरुन प्रशांत कनौजीया याला तुरुंगात टाकलेले होते. ह्यामुळे डाव्या पत्रकारांना त्रास झाला व त्यांनी प्रदर्शने केली त्याची दखल घेत सुप्रिम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उ प्र सरकारला प्रशांत कनौजीयाला ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले. ह्यावेळी सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी आहे. ह्याच सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी यांचे काही दिवसापुर्वीचे वर्तन बघा !! ममता बॅनर्जीवर दुसर्याने तयार केलेला मीम फेसबुकवर शेअर केला व त्यामुळे मु मं ममता बॅनर्जीचा अपमान झाला म्हणुन भाजपाच्या उमेदवार प्रतिक्षा शर्माला तुरुंगात टाकले ! ह्यावर सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! सुप्रिम कोर्टाचे जज एकाच टाईपच्या केसमध्ये दोन वेगवेगळा न्याय देउन नविन पायंडा पाडत आहे !! भाजपाच्या विरुद्ध काम करण्यात सुप्रिम कोर्टाचे जज सुद्धा मागे नाही हे दाखवत आहे !!

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Tue, 06/11/2019 - 20:54
डँबिस००७, सही पकडे है. माझ्या मते इंदिरा जयसिंग ,तिस्ता सेटलवाड, प्रशांत भूषण वगैरे पुरोगामींचं खरं उद्दिष्ट भारतीय न्यायव्यवस्थेविषयी अविश्वास उत्पन्न करून तिचं खच्चीकरण करणं हे आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by डँबिस००७

प्रसाद_१९८२ Tue, 06/11/2019 - 20:56
सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! -- - मी वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे, सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते. मात्र नंतर शर्मा यांच्या वकिलांने ' माफि मागणे हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे' असा युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर, कोर्टाने प्रतिक्षा शर्मा यांनी माफी मागावी ही शिक्षा काढून टाकली होती.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 21:43
सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते नंतर काय केले त्याने काय फरक पडतो ? पण त्याच बरोबर आता उ प्र सरकारला ताबडतोड प्रशाम्त कनौजीया ला सोडायला सांगीतलेच की पुर्वीच्या केस मध्ये प बंगाल सरकारला सांगीतले नव्हते !!

नगरीनिरंजन Wed, 06/12/2019 - 06:45
२०११ ते २०१७ पर्यंत भारताचा जीडीपी ७% नव्हे तर ४.५% नी वाढला दरवर्षी असा रिसर्च पेपर श्री. अरविंद सुब्रमण्यन यांनी प्रसिद्ध केला आहे. ते मोदी १.० सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. पद सोडल्यावर असा पेपर लिहिण्याचे कारण काय असेल? भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बातमी मूळ पेपर

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 10:33
अरेच्या! कोणी अर्थतज्ज्ञ विश्लेषण करायला तयार नाही? अचानक जगात सर्वात वेगात वाढणारी अर्थव्यवस्था एकदम कशी खालावली? आणि लगेच गर्तेत गेलेल्या अर्थव्यवस्थेला “सावरण्यासाठी” रिझर्व बँकेचा सत्तर वर्षात जमा झालेला ९ लाख ६० हजार कोटींचा साठा सरकारला दिसायला लागला! चमत्कार झाला! https://theprint.in/economy/rbi-to-the-rescue-modi-govt-eyes-banks-rs-9-6-trillion-surplus-to-beat-economy-blues/250245/

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही भलतेच चावट निराशावादी दिसता नगरीनिरंजन! इकडे आमचा प्रतिदिवस परतावा ९.९७ ते १०.०१ % वगैरे असताना आप ऐसा शंखनाद कैसे कर सकते हैं? मार्केटला माहितच असेल ना हे गौडबंगाल. त्याने प्राईस इन केलंच असतं ना. आमच्यासारखी आशावादी माणसंच चालवताहेत हो मार्केट, तुमच्या सारखी डिप्रेस्ड माणसं देखील अस्वली अवतार घेऊन पाडतीलच की ते. माणसं काय, काय ए. आय. थोडीच आहेत? सेन्सेक्स मध्ये सेन्स अंतर्भूत आहे हे तुम्ही विसरला वाट्टं? शिवाय जे ऑब्व्हियस आहे त्याचे विश्लेषण करायला आमचे अर्थतज्ञ काय चीप वाटले काय तुम्हाला?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 11:23
विनोदबुद्धी फारच जोरदार आहे भो तुमची, हण्मंताण्णा! मार्केटला काय हो, लोकांचे पैसे चव्हाट्यावर आले तर बरंच आहे. ह्यात अस्वलीपणा काय नाय हो! मार्केटचे बैल चौखूर उधळणार बघा. पैसा मार्केटात आला की फकीर व्हायचं, झोल्यात बसेल ते घेऊन झोला उचलून चालू पडायचं. रिझर्व बँकेतून सर्कारी बँकेत आला की मग पुढचं बघून घ्यायला मेहुलभाईसारखे लै आहेत मार्केटात. सर्कारी बेलाऊट आवडे सर्वांना! तुम्च्यासारख्या मार्केटप्लेयरांना कसली काळजी?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 11:41
बाकी मूळ प्रश्नाला बरोबर टांग दिली बरं! पुण्याचे काय तुम्ही? निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली? नोटबंदी आणि जीएसटीनंतर तर टॅक्स कलेक्शन लै जोरात वाढत होतं ना म्हणे?

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:39
It is expecting a portion of the central bank’s reserves to be transferred to the treasury by the second quarter of the current financial year, for use in “more productive purposes”, three separate sources told ThePrint. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. the buffer of 28 per cent of gross assets that is held by the central bank is well above the global norm of around 14 per cent. लेखातील च वाक्ये उद्धृत केलेली आहेत. रिझर्व्ह बँक "स्वतः" नक्की काय करते, ज्यामुळे त्यांचे इतके उत्पन्न/ संचित धन निर्माण होते? मिपा वरील अर्थतज्ज्ञ खुलासा करतील काय?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:45
It is also true that it is RBI which failed in discharging its duty to regulate public banks. In seventies and eighties, RBI officials used to inspect branches of various banks and there used to be a fear in the minds of bankers. Since 1991, in the name of freedom, in the name of reformation, in the name of privatisation and liberalization, RBI has left everything free and Bhagwan Bharose. http://www.allbankingsolutions.com/Articles/Articles-DJ-PSU-Banks-Red.html हि २०१६ मधील स्थिती होती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 18:50
NPAs of public sector banks tripled since June 2014 NPAs have been in the news in recent days, largely because of former RBI governor Raghuram Rajan's written response to a parliamentary panel on the subject. Notably, he said

"a larger number of [the] bad loans originated in the period [of] 2006-2008"

-- during the UPA years, that is. https://www.indiatoday.in/business/story/npas-public-sector-banks-rti-rbi-1343621-2018-09-19

डँबिस००७ Sat, 06/15/2019 - 12:39
Income Tax विभागातल्या १२ 'भ्रष्ट अधिकार्यांना सेवानिवृत्त वयाच्या आधिच सरकारने कठोर निर्णय घेत सेवानिवृत्त करण्यात आल्याची बातमी वाचलेली असेलच !! ह्या १२ अधिकार्यात ११ अधिकारी खरच कुख्यात भ्रष्ट अधिकारी होते व त्यांच्यावर गैरव्यवहाराचे, घेण्याचे आरोप होते पण एक अधिकारी ज्याच्यावर कोणतेही आरोप नसताना त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे !त्याचे नाव आहे A K Srivastav. दोन कार्यालयातील अधिकारी महिलांनी ह्या अधिकार्यावर यौन शोषणाचा आरोप केलेला होता . कार्यालयीन चौकशीत व नंतर कोर्टाने A K Srivastav यांना निर्दोष म्हणुन सोडले ! ह्या अधिकार्याने NDTV च्या 5000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मामला उघडकीस आणला होता. त्यामागची खरी हकिकत अशी की Airtel Maxis च्य़ा केस मध्ये घेतलेले ५००० कोटी पि चीदंबरम ने NDTV मध्ये पार्क केलेले होते . UPA-2 च्या कारकिर्दीतच A K Srivastavने ते उघडकीस आणले. ह्याचा परिणाम म्हणुन ह्या अधिकार्याला बराच त्रास देण्यात आला होता. २०१५ मध्ये PMO ने ह्या अधिकार्याला नोईडा मध्ये कमिशनर नियुक्त केले होते. मे २२ ला फाईनांस मंत्रालयाने ११ लोकांची लिस्ट बनवुन ठेवलेली होती. A K Srivastav ह्यांच नाव घालुन १२ जणांची लिस्ट PMO ला कारवाईसाठी पाठवण्यात आली. ह्यात अरुण जेटलींचा हात असल्याच समोर आलय. अरुण जेटली , प्रणय रॉय व चीदंबरमचे मित्र आहेत त्यामुळे PMO ला १२ जणांच्या लिस्ट पाठवली पण A K Srivastav चे नाव कोर्टाने व आंतरीक चौकशीत क्लिअर झाल्याच लपवुन ठेवल. A K Srivastav वर चुकीची कारवाई करण्यात आलेली आहे ह्याची माहिती मोदीजींच्या लक्षात आणुन देण्यासाठी श्री सुब्रमण्यम स्वामी व ईतर लोकांनी प्रयत्न केला आहे . मोदीजी काय करतात हे येणार्या दिवसात दिसेलच ! प्रणय रॉय वर कारवाई सुरु झालेली आहे !!

ट्रम्प Sat, 06/15/2019 - 21:29
त्या भांडखोर , कजाग बाई ने बंगाल मधील आरोग्यसेवा विस्कळीत केली आहे . ज्या दोन डॉक्टरानां पेशंट च्या नातेवाईकानीं मारहाण केली त्यांची विचारपुस न करता आंदोलक डॉक्टरानां कामावर हजर राहण्याचे आदेश बाईने दिले , त्या मुळे आंदोलन अजुन भडकले . सामान्य जनतेला आरोग्यसेवा न मिळाल्या मुळे खुप त्रास झाला असणार पण यासाठी डॉक्टरानां वेठबिगार समजणारी ती बाईच जबाबदार आहे अस वाटतंय . आता तिने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत पण गर्भित इशारे देवून .

Government compulsorily retires 15 customs officials Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये principal commissioner, commissioner, additional commissioner व deputy commissioner अश्या वरिष्ठ पदांवर असलेल्या पण अकार्यक्षमता आणि/किंवा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या १५ अधिकार्‍यांना सरकारने सक्तीच्या निवृत्तीवर पाठवले आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी सरकारने आयकर विभागातील १२ वरिष्ठ अधिकार्‍यांवर अशीच कारवाई केली होती, हे आठवत असेलच... Centre compulsorily retires 12 senior I-T officers for corruption, misconduct: Sources

म्हणजे, एकंदरीत, स्वच्छ भारत योजनेची जोरदार अंमलबजावणी चालू आहे !!!

हस्तर Tue, 06/18/2019 - 15:54
राधाकृष्ण विखेंच्या मंत्रीपदावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध करत एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावे लागते. पुन्हा निवडून न येता खालच्या किंवा वरच्या सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलं. तर राधाकृष्ण विखे–पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचे सांगत सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

In reply to by हस्तर

विखे विधीमंत्री होते. राजू परुळेकरांचा द्विमुखी परात्पर एलियन होत असण्याच्या काळात ते लोकप्रभेत एक सदर चालवत. विखे-पाटलांवर एक इंट्रेस्टिंग लेख लिहिला होता त्यांनी. त्यामध्ये वाचल्याचं अधूक स्मरतंय. विख्यांना कोणतं खातं सर्वात जास्त आवडतं असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावत त्यांनी 'विधी' असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे बहुतेक यातले बारकावे त्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना माहितच असणार. (पवारांना असं विचारल्यावर 'जलसंपदा' हे उत्तर येईल का हे मात्र एक रोचक गेसवर्क ठरेल. (धरणांमध्ये किती टीएमेसी पाणीसाठा शिल्लक आहे असा प्रतिप्रश्न मात्र करायला जाऊ नये :) ))

Modi govt 2.0: Ministers make it a point to reach office by 9.30am मंत्र्यांनी घरून काम न करता आपापल्या ऑफिसमध्ये वेळेवर (स. ९:३० वा) हजर होऊन तेथूनच काम करावे असा आदेश पंतप्रधानांनी दिल्यामुळे हल्ली केवळ मंत्रीच नाही तर त्याच्या हाताखालील कर्मचारीही वेळेवर कामाला लागल्याचे दृष्य दिसत आहे. त्याचबरोबर, प्रत्येक मंत्र्याला पुढील १०० दिवसांच्या कामाचे नियोजन व अपेक्षित परिणाम (planning & outcome) नेमून देवून, त्याच्या उत्तरदायित्वावर लक्ष ठेवण्याचा प्रयोग, भारताच्या इतिहासात, प्रथमच केला जात आहे. निवडणूका संपल्यावर आता, निदान सुजाण नागरिकांनी तरी, "आता पाच वर्षे नशीबात काय येईल ते भोगू", असा अज्ञानी, गैरलोकशाही किंवा सोईस्कर विचार सोडून, नागरिकांची खालील कर्तव्ये, जबाबदार्‍या व हक्क जाणून त्याप्रमाणे यथाशक्ती कृती करणे आवश्यक आहे: १. सरकार काय करत आहे किंवा काय करत नाही, इकडे लक्ष ठेवून, चुकांचा जाब विचारणे आणि चांगल्या योजनांना सहकार्य करून आपल्याकडून अपेक्षित असलेला हातभार लावणे. २. विरोधी पक्ष काय करत आहेत किंवा काय करत नाहीत, इकडे लक्ष ठेवून, ते चांगल्या सरकारी योजनांना सहकार्य करत नसले (किंवा त्याना खोडा घालत असले) तर त्यांबद्दल जाब विचारणे आणि त्यांच्या विधायक/सकारात्मक सरकार-विरोधाला पाठींबा देणे. असे ज्या लोकशाहीत होते, तिला "सहभागी लोकशाही (participatory democracy) असे म्हणतात व तो लोकशाहीचा सर्वोत्तम प्रकार आहे. हे ज्यांना जमत नसेल किंवा ती आपली जबाबदारी आहे असे वाटत नसेल, त्याना सुजाण नागरिक म्हणवून घ्यायचा आणि/किंवा "देशात लोकशाही धोक्यात आली आहे" किंवा "देशाचे काय खरे नाही" असा फुकटचा दांभीक गळा काढायचा हक्क नाही.

How 20,000 women in Vellore got together to save a dying river "एका बाजूला पाण्याच्या अभावाकडे पाहत दशकानुदशके नशीबाला बोल लावत व दुसरा कोणी आपल्या मदतीला धावून येईल याची वाट पाहत राहणारे" आणि "दुसर्‍या बाजूला स्वतःची लढाई स्वतः लढून, नदीला पुनर्जिवीत करणार्‍या वेल्लोरच्या या लढवय्या २०,००० झाशीच्या राण्या" ! भारत हा अनेक विसंगतींचा देश आहे, यात वाद नाही. मनरेगा (MGNREGA) योजनेच्या मदतीने, या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी, गेल्या चार वर्षांत ३,५०० पुनर्भरण विहिरी (recharge wells, प्रत्येक विहिर, २०' खोल X १५' लांब X ६' रुंद, आहे) आणि पाणी अडवणारे असंख्य दगडी अडथळे निर्माण केले गेले आहेत. त्यामुळे, या भागातील भूजलाचा स्तर लक्षणियरित्या उंचावला आहे. तेथे पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पण गेली १५ वर्षे कोरड्या पडलेल्या या नदीमध्ये आता इतके पाणी साठले आहे की, सद्याच्या अवर्षणाच्या काळातही, ते अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि भातशेतीची गरज भागवत आहे. या उदाहरणावरून बोध घेऊन, देशभरात इतर ठिकाणीही या प्रकारचे प्रकल्प सुरू झाले आहेत.  (सौजन्य : टाईम्स ऑफ इंडीया)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टीपीके Wed, 06/19/2019 - 16:43
अशा बातम्या वाचायला किती आनंद होतो. ह्याचे व्हिडिओ असतील तर बघितले पाहिजेत

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डँबिस००७ Wed, 06/19/2019 - 17:01
या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे ह्या प्रयत्नांना सुरुवात २०१४ साली झाली व आता त्याची फळे वेल्लोर जिल्ह्याला चाखायला मिळत आहेत !!

In reply to by डँबिस००७

टीपीके Wed, 06/19/2019 - 17:30
एक नदी, एक जिल्हा, ५ कोटी. आणि दुष्काळ गायब. शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का?

In reply to by टीपीके

भंकस बाबा Wed, 06/19/2019 - 18:30
फार वर्षापूर्वी 'कार्यरत' हे एक अनिल अवचट लिखित पुस्तक वाचले होते. त्यातील एक अवलिया श्री अरुण देशपांडे हे पुणे सोलापुर रोडवर अंकोली या गावात शेतीचे काही प्रयोग करत आहेत. त्यांच्या बोलण्यानुसार मोठमोठ्या धरणाची काही गरज नाही आहे, पण मोठे धरण म्हणजे मोठा पैसा खाण्याची संधी असे गणित असल्यामुळे देशपांडेविषयी जास्त काही माहिती मिळत नाही. सरकार त्यांना अनुल्लेखाने तर मारत नसतील? किंबहुना त्यांचे कार्य तरी प्रसिद्ध करावे. पुस्तक खरोखरच वाचनीय आहे.

In reply to by टीपीके

शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का? देशव्यापी पाणीप्रश्न असे वरवरचे ढोबळ अंदाज करून समजत नाहीत आणि सुटतही नाहीत ! त्यासाठी, तज्ज्ञांकरवी देशव्यापी विचार करून बनवलेले महत्वाकांक्षी महाप्रकल्प वास्तवात उतरावे लागतात. त्याबद्दल, फारच त्रोटक काही असे... १. वरच्या उदाहरणातील ५ कोटी रुपयांनी फक्त 'एका जिल्ह्याच्या काही स्थानिक भागाचाच' पाणविकास शक्य झाला आहे. पण, भारतात असे दुष्काळी जिल्हे शेकडोंनी आहेत. तेव्हा साधारणपणे "ते जिल्हे X अंदाजे ५ कोटी" हा हिशेब लावा ! हा खर्च केवळ, तुलनेने छोट्या क्षेत्राचा तळागाळातील प्राथमिक विकास करण्यासाठी होईल व तोच काही हजार कोटींमध्ये जाईल. २. त्याचबरोबर, मोठ्या क्षेत्रांसाठी (एक किंवा अनेक जिल्हे/राज्ये) पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: धरणे, तलाव, इ. यापैकी प्रत्येकाला अनेक हजार ते अनेक दशसहस्त्र कोटी लागू शकतात. ३. त्याचबरोबर, देशपातळीवर विचार करून बनवलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: भारतभरचा अजस्त्र नदीजोड प्रकल्प. (अ) दरवर्षी अनेक राज्यांत महापूर येतात आणि त्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. तर, त्याचवेळी इतर अनेक राज्यांच्या मोठ्या भूभागांवर दुष्काळ असतो. (आ) तसेच उत्तरेकडील मोठ्या नद्या पाण्याने बारमाही (पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने आणि इतर काळात हिमालयातील वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याने) भरलेल्या असतात. हा विसंवाद दूर करण्यासाठी विचारपूर्वक अंमलात आणलेला भारतभरचा नदीजोड प्रकल्प, बहुतेक सर्व राज्यांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न लक्षणियरित्या सोडवू शकेल. अश्या प्रकल्पांला अनेक लक्ष कोटी रुपये लागतील. https://www.wikiwand.com/en/Indian_Rivers_Inter-link , इथे या प्रकल्पाबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकेल. हे सर्व काम करायला आणि ते सुरू केल्यापासून त्याचे दृष्य परिणाम दिसायला, अनेक वर्षे लागतात, हे वेगळे सांगायला नकोच. इतर अनेक मुद्दे आहेत, पण इथल्या चर्चेतील मुख्य मुद्दा स्पष्ट करायला इतके पुरे आहे. आता सांगा, भारतभर पाणी समस्या सोडवायला किती खर्च योग्य असेल ते ?! :) हे सर्व प्रकल्प एकाच वेळी सुसुत्रपणे अंमलात आणले तरच भारताच्या पाणी समस्येला आटोक्यात ठेवता येईल आणि/किंवा तिचे दीर्घकालीन निर्मुलन करता येईल. वाजपेयींच्या कारकिर्दीत सुरू झालेला यासंबंधीचा विचार आणि काम, मधली दहा वर्षे ठप्प झाले होते. सुदैवाने, सद्य सरकारने गेल्या पाच वषांपासून त्या प्रकल्पाची परत जोमाने अंमलबजावणी सुरू केली आहे व त्याची फळे आता दिसू लागली आहेत. एक छोटे उदाहरण : क्षिप्रा ही पूर्वी बारमाही असलेल्या नदीत हल्लीच्या काळात पावसाळ्यात फक्त दोन महिने पाणी असते. तिला नर्मदा या मोठ्या बारमाही नदीशी जोडून बारमाही बनविण्याचा प्रकल्प चालू आहे. या नर्मदा-क्षिप्रा नदीजोड प्रकल्पाच्या एका भागाचे नुकतेच उदघाटन झाले, त्याची ही बातमी व चलतचित्र... MP: Narmada-Kshipra link to be channelled for agri, industry असो. यासारख्या दीर्घकालीन महाप्रकल्पांच्या यशासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती तर लागतेच पण संसाधन आणि धन यांच्या गळतीला प्रतिबंध करणारी सबळ इच्छाशक्ती आणि व्यवस्थाही लागते, ज्या आता व्यवहारात उतरल्या आहे आणि म्हणूनच प्रकल्प ठरवलेल्या पैशांत आणि ठरवलेल्या वेळेत पूर्ण होऊ लागले आहेत. जसजसे दिवस पुढे जातील व या महाप्रकल्पाचे अनेक टप्पे पूर्णत्वाला जातील तसतसे त्यांचे परिणाम समोर येतील. मग, त्यांचा प्रभाव पडणार्‍या लोकांना त्यांचा तडक फायदा होईल आणि इतरांनाही ते बातम्यांतून समजतील.

In reply to by भंकस बाबा

जरूर लिहा. हा विषय सर्वांगाने विचार करण्याजोगाच आहे. मात्र, देशभराच्या विकासासाठी केवळ असंख्य छोट्या कारवायांचा पाठपुरावा करणार्‍या अनेक प्रकल्प पुढे आले आहेत आणि वारंवार पुढे येत आहेत. या प्रकल्पांचे जनक आणि पुरस्कर्ते बर्‍याचदा हे विसरतात की... एखाद्याने मोठ्या चिकाटीने चालवलेल्या प्रकल्पाच्या प्रतिकृती देशभर निर्माण करून त्या दीर्घकाळापर्यंत चालू ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी, समर्पितता आणि त्यासाठी सातत्याने लागणारा लागणारा वेळ व खर्च, इ व्यवहारात त्याच्या जनकाशिवाय किती जणांना शक्य होईल ? त्याऐवजी, मोठ्या प्रकल्पांत "एकॉनॉमिज ऑफ स्केल" या तत्वामुळे ती कामे सातत्याने करण्यास मोजके तज्ज्ञ मन्युष्यबळ उपलब्ध करणे आणि तो प्रकल्प योग्य त्या "फायदा-व्यय" गुणोत्तराने दीर्घकाळ चालवणे शक्य होते... इतरांना फक्त आपल्या जरूरीच्या व्यवसायाचे काम करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फायदा घेता येतो. थोडक्यात, मोठ्या लोकसंखेसाठी असलेल्या आणि/किंवा मोठ्या भूभागासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांमध्ये, प्रत्येक तांत्रिक काम त्या त्या विषयांच्या तज्ज्ञाला/तंत्रज्ज्ञाला करू देणे नेहमीच जास्त फायद्याचे व वेगवान सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असते. सायकल एखाद्या माणसाच्या स्थानिक वाहतुकीसाठी योग्य (आणि उदात्तही) असू शकेल. पण, स्थानिक भूभाग सोडून मोठ्या अंतराच्या (उदा : १००, १०००, इ किमी) आणि मोठ्या संख्येने असलेल्या माणसांच्या वाहतुकीसाठी हजारो/लक्षावधी सायकली सोईच्या नाहीत हे सांगायला नकोच... त्यासाठी, मोठे महामार्ग, कार, बस, रेल्वे, विमान अश्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असते. इतरही बरेच मुद्दे आहेत, पण देशाचा विकासाचा विचार करताना, वरचे मुद्दे कळीचे ठरतात. असो. तुमचे विचार ऐकल्यावर विशिष्ट विषयांवर चर्चा करूया.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबा गुरुवार, 06/20/2019 - 18:45
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात टेम्बवली हे माझे आजोळ, या गावात एक नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. डोंगराच्या घळीतुन एक पाण्याचा प्रवाह गावात येतो. पाण्याची चव अमृततुल्य आहे. सांगायचा मुद्दा हा की जऱ या पाण्याला बंदिस्त करून गावात खेळवले तर बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. पण गावकरी त्यात उत्सुक नाहीत. त्यांना शासनाची नळपाणी योजना पाहिजे. दिली. आता गावकरी भरमसाठ पाणी वापरतात. जे देवकृपेने मिळालेले देणे होते ते असेच वाया जात आहे. सरकारी योजनेत पाच मैलावरुन पाणी पंप करून आणले जाते. ज्या दिवशी काही समस्या येते व पाणी येत नाही त्या दिवशी पाटाच्या पाण्यावर मारामारी होते. गावात विंधनविहिरी आहेत. त्यांना पाणी मचुळ येते म्हणून कोणी वापरत नाही. पाटाचे पाणी फक्त विंधनविहिरीत जरी सोडले तरी पाण्याची प्रत सुधारेल. पण सरकार अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. मुंबईत पाणी फार लांबवरुन आणले जाते. महापालिका पाणी देताना उत्तम प्रतीचे पाणी मुंबईकराना पुरवते. मग लोक क़ाय करतात? तर हे उत्तम प्रतीचे पाणी गाड्या धुवायला, सोसायटया धुवायला वापरतात. मुंबईत अनेक उद्याने आहेत. त्यांना हे पिण्याचे पाणी झाडाना म्हणून वापरले जाते. सरकार अजिबात दुसऱ्या मार्गाकडे बघत नाही. जसे अनेक विहिरी मुंबईत बारमाही पाण्याच्या आहेत, पण लोक सर्रास त्यांच्या उपयोग कचरा फेकण्यासाठी करतात. माझे म्हणणे हेच आहे की जे काम थोड्या साधनानी जमू शकते त्यासाठी फाफटपसारा कशाला? भले प्रत्येक ठिकाणी अनुकूल परिस्थिति नसेल पण थोडेफार स्वयंपूर्ण होण्याला काय हरकत आहे. एकदा कार्यरत हे पुस्तक वाचून बघा. देशपांडे हरएक मुद्दा उलगडून सांगतात. कदाचित आपल्यासारख्या शहरी माणसाला हा वेडेपणा वाटेल पण जर हा वेडेपणा असेल तर अशा पुष्कळ वेड्यांची गरज आहे देशाला! धरणाचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, हि सर्व धरणे 60 ते 70 वर्षात गाळ भरून पाणी साठवण्याची क्षमता हरवून बसतात. पण ह्यावर कोणीच बोलायला तयार होत नाही. कित्येक धरणे तर उस कारखाने चालवायला बांधली आहेत असा संशय येतो. संपादित केलेली वरकड जमीन हा एक संशयाचे धुके निर्माण करणारा मुद्दा आहे .

In reply to by भंकस बाबा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/20/2019 - 23:29
ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न जरूर करेन. परंतु, आता थोडासा मूलभूत विचार करायला हरकत नसावी. तो असा... १. तुम्ही आताही एका जागेवरचा अनुभव सांगत आहात. दर जागेवरची माणसे आणि परिस्थिती वेगवेगळी असल्याने, एका जागेवरचे बरे-वाईट अनुभव भारतातल्या/जगातल्या प्रत्येक जागेला लागू पडतीलच असे नाही. तुम्हीच पुस्तकातले आणि तुमच्या गावाचे, अशी दोन उदाहरणे देवून, याला पुरावा दिला आहे. २. (असे व्यवहारात होणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी होईल असे मानले, तरी) प्रत्येक गावाने आपले पाणीव्यवस्थापन स्वतःचे स्वतः केले असे गृहित धरूया. मग, शहरांना (जेथे जगातील सुमारे ५४% आणि भारतातील सुमारे ३३% लोकसंख्या राहते) त्यांना पाणीपुरवठा कोण करेल? ३. एखादा 'यशस्वी लहान प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी गुणले की 'यशस्वी मोठा प्रकल्प' बनत नाही. तसेच, एखादा 'यशस्वी मोठा प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी भागले की 'यशस्वी लहान प्रकल्प' बनत नाही. प्रकल्पाच्या आकार व आवाक्यातील बदलाबरोबर, त्याचे अनेक मापदंड आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे घटक(factors) यांची संख्या आणि प्रकार लक्षणिय प्रमाणात बदलतात. व त्यांच्यासाठी आवश्यक असलेले उपाय लक्षणिय प्रमाणात वेगेवेगळे असतात. ****** "प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे" हा भोळा आदर्शवाद आजचा नाही, फार जुना आहे. तो आजच्या काळात व्यवहारात येणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी तो ठीक आहे असे मानले तरी, जगातला प्रत्येक माणूस आदर्शवादाने भारलेला नसतो हे लक्षात ठेऊन, खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे रोचक ठरेल... अ) प्रत्येक (अपवादात्मक नव्हे) खेडे तेथिल सर्व जनतेला सर्व प्रकारच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरेश्या प्रमाणात निर्माण करू शकेल का? ...नाही. आ) ते पुरेश्या प्रमाणात तयार होत आहे असे मानले तरी, स्थानिक स्तरावर निर्माण होऊ शकलेल्या, अन्न-वस्त्र-निवार्‍याची (नसलेली) प्रत आणि त्याची (नसलेली) विविधता, तेथिल सर्व लोकांना समाधानी ठेऊ शकेल काय? ...नाही. इ) समजा सगळ्या खेड्यांतला प्रत्येक जण वरच्या गोष्टींतही समाधानी आहे. तर मग, शहरांतल्या लोकसंखेचे काय? त्यांनीही आपल्यापुरते अन्न-वस्त्र-निवारा स्वतःच तयार करायचा का? आणि कसा? ...शक्य नाही. ई) समजा तसेही (शक्य नाही पण, कल्पनेत,) मानले तरीही, भारताला वेगाने विकसित होण्यासाठी ज्या आधुनिक सेवा व उत्पादनांची गरज आहे, त्यासाठीची जी शिक्षण-संशोधन-विकसन व्यवस्था आवश्यक आहे, ती कोण करणार??? वरील मार्गाने चालून, सद्या चालू असलेल्या घरोघरी वीज, घरोघरी कुकिंग गॅस, गावोगावी बँक-शिक्षण व्यवस्था इत्यादी आणि नुकतीच जाहीर केलेली घरोघरी नळाने पाणी; असे विकासप्रकल्प कसे व्यवहारात आणता येतील? की, "ज्यांना खेडेगावात रहायचे असले त्यांनी आधुनिक विकासाच्या संसाधनांना विसरा", असे सांगायचे?किंबहुना, आधुनिक प्रकल्पांनी खेडेगावांतले जीवन विकसित झाले, तेथेच कामाची व उत्पन्नाची साधने निर्माण झाली, (आणि पर्यायाने शहर-गावातील विकासाचे अंतर जितके करता येईल तितके कमी केले), तर गावातील लोकांचे जीवन अधिक सुखी होईल व तेथिल लोकांना शहराकडे धाव घेण्याची गरज तुलनेने खूपच कमी होईल, नाही का? यालाच आपण, "विकास देशभर पसरवणे (spreading development across the nation)", किंवा "विकास साखळीतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे", असे म्हणू शकतो. केवळ वरच्या आदर्शवादावर गोष्टींवर आधारीत गोष्टी करण्याचा अट्टाहास केल्यास काय होईल असा जरासा विचार करूया... मानवाने आपली शिकारी-गोळाकरी (हंटर-गॅदरर) जीवनशैली सोडून ---> सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू केलेली शेतीवर अवलंबून असलेली व्यवस्था ---> यंत्रयुगातील अनेक शोध व त्यामुळे निर्माण झालेल्या सुविधा ---> आणि मानवी विकासाची सध्याच्या संगणकयुगापर्यंत झालेली प्रगती; उलट्या गतीने मागे न्यावी लागेल (किंबहुना, ती तशी मागे जाईल), नाही का? यामध्ये, जनुकविज्ञान, औषधविज्ञान, अवकाशविज्ञान, अणुविज्ञान, इ इ इ ना जमेस धरले तर, या उलट चालीच्या परिणितीची झलक अधिक प्रखरतेने डोळ्यासमोर दिसेल. सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मानवी प्रगतीच्या मागची मूलतत्वे अशी आहेत... (अ) मूळ ज्ञान (understanding) असे की, "सगळ्यांनाच सगळे करणे जमणे शक्य नसते" आणि (आ) मूळ तत्व (principle) आहे, "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)". म्हणजेच, ज्याला जे जमेल, ज्या प्रतीचे जमेल, जेवढे जमेल, तसे काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे. यात बरे-वाईट, उच्च-नीच काहीच नाही, तर, प्रत्येकाला त्याच्या कौशल्य आणि कुवतीप्रमाणे विकासाला हातभार लावायची संधी व फायदा देणे सर्वात जास्त महत्वाचे असते. तीच गोष्ट आहे, विकास करताना सुयोग्य प्रकल्प निवडण्यासाठीचा विचार करतानाची. छोट्या भूगावरचे स्थानिक स्तरावर प्रकल्प, मध्यम आकाराचे प्रकल्प आणि देशभरासाठीचे प्रकल्प, या तिन्हींची त्यांच्या, (अ) आवश्यकतेप्रमाणे, (आ) अपेक्षित दूरगामी परिणामांवर अवलंबून, आणि (आ) शक्य तेवढ्या जास्तीत जास्त फायदा-व्यय गुणोत्तराप्रमाणे, सांगड लावणे अत्यावश्यक असते. "सब घोडे बारा टक्के" असा विचार दूरगामी फायदा देत नाही. ही सांगड ज्या देशांत चांगल्या प्रकारे लावली जाते, तो देश उत्तम रितीने आणि वेगाने विकसित होतो. ही कल्पना अजून फार न ताणता, अजून जराशी जास्त समजूत पटवून घ्यायची असेल तर, एकच गोष्ट करून पहावी. खेड्याबाहेरील आधुनिक व्यवस्थेत निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, आजच्या खेड्यातील घरातून वजा करा आणि काय शिल्लक उरते याची यादी बनवा ! ती नक्कीच रोचक असेल ! उ) केवळ चर्चेसाठी, समजा, वर अ) ते ई) मध्ये कल्पिलेल्या सर्व अवास्तव कल्पना वास्तवात आणल्या (???!!!) तर, अश्या (केवळ स्थानिक स्तरावर छोटे छोटे स्वावलंबी भूभाग असलेल्या) देशाची (आणि पर्यायाने आपली), आपल्या शेजारी असलेले-नसलेले देश, काय गत करतील बरे ?! ****** व्यवहारात, खूप उच्च आदर्शवादी विचार जगातल्या फार फार फार थोड्या अपवादात्मक लोकांमध्ये आस्तित्वात असतो आणि त्यापैकी फार फार फार थोड्या लोकांना त्यावर आधारलेले जीवन 'निर्माण करणे व निभावणे' जमते. बाकीच्या सामान्य मातीने बनलेल्या लोकांना, "आपल्याला जमेल ते व जमेल तेवढेच निवडक काम, जमेल तसे करणे आणि त्यातून मिळालेल्या धनाचा इतरांनी शोधलेल्या-बनवलेल्या असंख्य गोष्टींचा आपले जीवन जास्तीत जास्त सुखकारक बनविण्यास करणे", इतपतच जमते. पण, तेही फार वाईट आहे असे नाही. तसे करणे शक्य आहे म्हणूनच त्यातल्याच काही लोकांनी हे जग असामान्य बनविणारे शोध लावले, इतरांनी त्यापासून सेवा-उत्पादने बनवणारे उद्योग उभारले आणि उरलेल्या इतरांना नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या. अर्थातच, या सगळ्याचे फायदे सगळ्यांना मिळत आहेत. देशाच्या सर्वंकश विकासासाठी (म्हणजेच मोठ्या भूभागवरच्या, विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या, मोठ्या लोकसंखेसाठी) आखणी करताना आदर्शावादाला व्यवहारवादाचा मोठ्या डोस देऊन मगच आवश्यक तेथे, आवश्यक तेवढे, छोटे-मोठे प्रकल्प उभारणे जरूरीचे असते... आणि तसे केले तरच ते यशस्वी होऊ शकतात. केवळ आदर्शवाद आणि/किंवा आशावाद व्यवहारात फार काळ तरून नेत नाहीत. तसे नसते तर (केवळ उदाहरणासाठी म्हणून) हेमलकसा, राळेगण सिद्धी, इत्यादींसारखे प्रकल्प दरजागी निर्माण झाले असते आणि शहरे सोडून सर्व लोक मोठ्या आनंदाने तेथे जाऊन राहिले असते. मात्र, तसे झाले असते तरीही, वरचा उ) हा मुद्दा शिल्लक उरतोच, नाही का?! देशात "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)" या तत्वावर देशात जे काही कमी-जास्त प्रतीचे सुरक्षाकवच निर्माण झालेले आहे, त्यांच्याविना उच्च प्रतीच्या आदर्शवादी प्रकल्पांची ही मोजकी बेटे निर्माण होऊ शकली असती का? :) ******

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबा Sun, 06/23/2019 - 17:43
मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या. मुंबईसारख्या शहरात महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमवर एक कायदा केला आहे. नवीन बांधणार असलेल्या इमारतीत ही सिस्टम अनिर्वाय आहे म्हणून. पण हा नियम कोणीच पाळत नाही. गेल्या दोनचार दिवसापूर्वीची बातमी वाचली होती कि आपल्याकडे असलेल्या दुष्काळी परिस्तिथिवर तोडगा म्हणून इस्राएली तंत्रज्ञान आणायचा घाट चालला आहे. प्रश्न असा आहे की आपली समस्या तंत्रज्ञान वापरुन नाही तर सवयी बदलून दूर होणार आहे. मुंबईतील किती घरात कपडे धुतलेले पाणी टॉयलेटमधे वापरले जाते? हे जेव्हा सामान्य माणसाला कळेल तेव्हाच देश प्रगतिपथावर येईल. अन्यथा परदेशी तंत्रज्ञानाने आपण पाणी अधिक साठवू, पाण्यावर प्रक्रिया करू, पण पाण्याची बचत मात्र करणार नाही. कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! असे असेल तर मग रामाशिवागोविंदा! ज्या साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यल्प आहे तीला आम्ही समर्थन मूल्य देणार आणि ते पण जनतेच्या तोंडचे पाणी पळवून, किंवा महागडया तंत्रज्ञानाने पाणी आणून!

In reply to by भंकस बाबा

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 09:23
@ भंकस बाबा "रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम" हा नियम कोणीच पाळत नाही. हि वस्तुस्थिती नाही. कारण मुंबईत मी राहत असलेल्या दोन ( भाड्याच्या घरांमध्ये) आणि माझ्या मालकीचे घर असेलल्या किंवा माझं एवडे आणि माझा भाऊ राहत असलेल्या सर्व सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून बोअर वेल मध्ये ( वडील राहतात तेथे मोठी उघडी विहीर आहे) सोडले जाते आणि हेच बोअरचे पाणी संडास च्या फ्लश साठी वापरले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नव्हे तर प्रत्येक सोसायटीला अग्निशमनासाठी एक वेगळी टाकी बांधावीच लागते आणि महापालिकेचे पाणी प्रथम या टाकीत येते आणि त्या नंतर अतिरिक्त पाणी तुमच्या मूळ टाकीत जाते. ( तीन वर्षांपूर्वी आमची स्थिती अशी होती कि अग्निशमनच्या टाकीत पाणी आहे पण त्याचा सांडवा (ओव्हरफ्लो) कमी असल्याने घरात पाणी नाही. सध्या सदाच्या फांद्या तोडायचं असल्या तरी तुम्हाला महापालिकेची परवानगी घ्यावी लागते अन्यथा फारच कटकट गळ्यात येते. कदाचित मुंबईत जितका कायदा पाळला जातो तितका महाराष्ट्रात कुठेच पाळला जात नाही.

In reply to by सुबोध खरे

भंकस बाबा Tue, 06/25/2019 - 09:15
तुम्ही कुठे राहता हे सांगितलेले नाही. मी मालाडमधील मालवणीत रहातो. इथे असलेल्या mhb कॉलोनित अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेणे फार सामान्य आहे. हे पालिका व पोलिस यांच्या संगमनताने होते. अनधिकृत पाणीच नव्हे तर चार माळ्याच्या झोपड्या देखील इथे पाहायला मिळतात. कितीही पाणीकपात असली तरी येथील गलीगल्लीत असलेल्या अनधिकृत मशिदि धूणे हा रोजचा कार्यक्रम असतो. येथे म्हाडाने काही इमारतीदेखील बांधल्या आहेत. एकाही ईमारतीत वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. करायची ईच्छा देखील नाही. महानगरपालिकेने ओला कचरा व्यवस्थापन अनिर्वाय केले आहे, या गोष्टीचा येथील जनतेला थांगपत्ता नाही. घरातून बाहेर पडून प्लास्टिकच्या पिशवित बाँधलेला कचरा ,आधीच साचलेल्या ढिगावर टाकने म्हणजे स्वच्छता हा येथील लोंकाचा प्रामाणिक समज आहे. एकूण क़ाय तर सगळे कठीण आहे

In reply to by भंकस बाबा

@ भंकस बाबा : पाणी नियोजनात, साठवण, पुरवठा, वापर, पुनर्वापर अश्या अनेक पायर्‍या आहेत. आतापर्यंत फक्त पाणी साठवण व पुरवठा या विषयावर चर्चा चालली होती म्हणून पाणी वापरावर बोलण्याचे टाळले होते. कारण, पाणी वापरातले राजकारणी सत्ये सांगितल्यास, लगेच लेबले लावली जातात. पण आता तुम्ही तो विषय पुढे आणला आहे तर त्याबद्दल काही लिहिणे भाग आहे. या फार महत्वाच्या मुद्द्यावर लिहावे की नाही बाबत, वरच्या परिस्थितीमुळे द्विधा मनस्थितीत होतो. याबाबत काही तथ्ये अशी आहेत... १. पाण्याची उधळपट्टी कोठेही केव्हाही निषेधार्ह आहेच. पण, शहरांना आणि गावांना (पिण्यासाठी व शेतीसाठी) होणारा पाणी पुरवठा (किंवा गरज) पाहता, शहरात पाण्याची उधळपट्टी न झाल्याने त्याचा गावांना फार मोठा फायदा होणार नाही. फक्त, आम्हाला पाणी मिळत नाही, पण दुसरा कोणी उधळपट्टी करत आहे, हे मनात सलणे, मानवी प्रतिक्रिया आहे. २. गावांना केल्या जाण्यार्‍या पाण्याचा मोठा भाग शेतीसाठी वापरला जातो. या पाण्याच्या बाबतीत सर्वांना माहीत असलेले, कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! , हे सत्य मात्र कोणी गावकरी बोलताना दिसत नाही !!! कारण, त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि/किंवा नगदी पिकांच्या सधन शेतकर्‍यांवर टीका केल्यासारखे होते... जे ("आपल्या"च नेत्यांवर टीका कशी करायची या विचाराने) हेतुपुरर्सर किंवा भितीने केले जात नाही. त्याऐवजी, फारसा विरोध करण्यास सबळ नसलेल्या शहरी नागरिकावर राग ओकून त्याला झोडपणे सोपे असते. रेन वॉटर हारवेस्टींगची जबाबदारी सरसकट सर्व शहरी गृहप्रकल्पांवर टाकणे, हे त्यापैकीच एक उदाहरण. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी, तो बनवणारा, स्थापीत करणारा आणि दर दिवशी चालवणारा या सर्वांसाठी कौशक्य-वेळ-श्रम-पैसा या सर्वांच्या दृष्टीने शक्य असला पाहिजे... नाहीतर प्रकल्प फसण्याचीच खात्री असते. अनुभव व कौशल्य नसलेल्या शहरी गृहप्रकल्पांवर ही जबाबदारी टाकली आहे. प्रकल्प कसे चालले आहेत यावर लक्ष ठेवण्याची व फसलेल्या प्रकल्पांना तज्ज्ञांची मदत पुरवण्याची काही तरतूद नसल्याने, काही मोजके प्रकल्प सोडता, आनंदीआनंद आहे. बरे, या योजनेमुळे, शहरस्तरावर काही फायदा होतो आहे की नाही, हे पाहणे जरूरीचे आहे, हे कोणाच्याच 'गावी' नाही ! :) ... हा कोणत्याही प्रकल्पाचे यश मोजण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा, त्या मूळ प्रकल्पात होता की नाही याबद्दल संशय आहे ! जेव्हा मी वर, "देशस्तरावर "लहान-मध्यम-मोठ्या" पाणीप्रकल्पांच्या एकत्रित विचार करण्याबद्दल" लिहिले होते तेव्हा; कोठे-कसे-किती पाणी साठवणे आवश्यक आहे या विचाराबरोबरच साठवलेले पाणी कोठे-कसे-कशासाठी वापर करणे सर्व जनतेच्या सोईचे व फायद्याचे आहे, हे सुद्धा प्रकल्पाच्या आराखड्यात ठरवणे जरूर आहे. तसे होण्याऐवजी, बर्‍याचदा असे प्रकल्प काही ठराविक हितसंबंध नजरेसमोर ठेवून बनवले जातात आणि ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत असे दाखवून, नंतर प्रकल्पाचा फायदा ठराविक हितसंबंधियांकडे फिरविला जातो. काही ठिकाणी तर मूळ आराखड्यापेक्षा वेगळे काहीतरी थातूरमातूर काम करून पैशांचा अपहार केला गेला आहे, हे काही फार मोठे गुपित नाही. हे थांबणे जरूर आहे. पृथ्वीवरची संसाधने, योग्य रितीने वापरल्यास, जनतेच्या गरजेस पुरी पडू शकतील, पण ती काही लोकांच्या असीम हव्यासासाठी नक्कीच अपुरी आहेत.

In reply to by भंकस बाबा

डँबिस००७ Sun, 06/23/2019 - 12:18
प्रत्येक गरजेकडे सरकारकडे हात पसरायचे अशी सवय आपल्याला लावलेली आहे. एक तर जनतेच्या कल्याण कारी योजना फक्त सरकारच करु शकते आणी जनता स्वःताच्या बळावर अशी काम करु शकणार नाही असा एक अलिखित नियम झालेला आहे. त्यामुळे जनतेचा आत्मविश्वास पार खचलेला आहे. गेले कित्येक दशक मराठवाडा, विदर्भ तर सोडाच म हाराष्ट्रातले अनेक जिल्हे आवर्षणाच्या गर्तेत होते. दर वर्षाला टँकरने पाणी पुरवठा केला जायचा. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे लोकांना शेती करता येईना मग अश्या लोकांनी आपली गावे सोडली आणी गावच्या गावे उजाड झाली. महाराष्ट्रात २०१४ सालच्या भाजपा सरकारच्या येण्याने ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. जलयुक्त शिवार योजना आली त्यात लोक सहभागाने योजना सुरु झाली. ह्या योजनेमुळे पाण्याचे स्त्रोत पुन्हा सुरु झाले त्यानंतर पाणी फाऊंडेशन "पाणी कप" सुरु झाला. त्यामुळे गावो गावात शेत तळी, बांधारे, पावसाच्या पाण्याला जमिनीत जिरवुन भुजल पाण्याची पातळी वाढवायचे प्रयत्न सुरु झाले . जलयुक्त शिवार योजना व पाणी फाऊंडेशन "पाणी कप" मुळे परीस्थिती वेगाने बदलत आहे सुधारत आहे. जनतेने स्व:ताच्या महेनतीवर विश्वास ठेवुन काम करायला पाहिजे. दशरथ मांझी सारख्या सामान्य माणसाने अख्खा डोंगर तोडुन रस्ता बनवला फक्त एकट्याच्या बळावर अश्या लोकांचा आदर्श आपल्या समोर ठेवायला पाहिजे.

गामा पैलवान Wed, 06/19/2019 - 12:50
नगरीनिरंजन,
निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली?
राखीव पेढीचा पैसा केंद्रीय शासनाद्वारे प्रत्याभूत केलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटांची हमी केंद्र शासनाने घेतलेली आहे. तसं प्रत्येक नोटेवर लिहिलेलं असतं. यातनं काही गोष्टी स्पष्ट होतात. राखीव पेढीकडून शासनाने अतिरिक्त पैसा मागितला तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखीव पेढीत हा पैसा साचला कुठून ? गेल्या सत्तर वर्षांत कोणी कधीतरी अशी बातमी ऐकलेली होती का? मग अचानक आजच इतका पैसा कुठून उपटला? याचं कारण म्हणजे हे भ्रष्टाचार कमी झाल्याचं लक्षण आहे. हज्जारो कोटी रुपयांचे घोटाळे थांबल्यामुळे इतका पैसा दिसतो आहे. दुसरी गोष्ट अशी की राखीव पेढी कडे शासनाने पैसा मागितला तर तो bail out नसतो. कारण शासनाने पेढीची हमी घेतलेली आहे, पेढीने शासनाची हमी घेतलेली नाही. तिसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्याला bail out म्हणता तो प्रकार शासकीय तिजोरीत खडखडाट असेल तरंच लागू पडतो. याउलट शासन पेढीकडे जास्तीच्या विकासकामांसाठी पैसा मागतंय. दैनदिन व्यवहारांसाठी नव्हे. असो. शासन बुडीतखाती गेलंय आणि पैशासाठी वणवण फिरतंय असा काहीसा अर्थ तुम्ही उद्धृत केलेल्या लेखातनं व्यक्त होतो. हा अर्थात चुकीचा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गब्रिएल Wed, 06/19/2019 - 13:28
आवो गामासायेब, त्ये त्यांच्या परम्पूज्य न्येत्याची कापी मारून र्‍हायलेत- राफेल, राफेल, राफेल, राफेल आशी आरती आठवू र्‍हायले ना? ;) इरोधी पक्षाकडं बगायंचं आनी निसती घोटाळा घोटाळा आशी बोंब मारायची आसली तर त्येला आब्यास, खरं-खोटं, पुरावा आसलं कायबी लागत न्हाय बगा. =)) =)) =))

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 18:20
शाबास! ह्याच समर्थनाची वाट पाहात होतो. जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? आजवर अशी बातमी कोणी ऐकली नाही कारण आजवर कोणत्याही सरकारने त्या पैशावर डल्ला मारलाच नाही. घोटाळे थांबल्रे म्हणून सगळा पैसा गेल्या ५ वर्षात रिझर्व बॅंकेकडे पैसा जमा झाला हे खास भक्त लॉजिक तुमच्या पोराबाळांना सांगा इतके दिवस अर्थव्यवस्थेच्या वाढीवरून टिमकी वाजवल्यानंतर ह्याचं समर्थन करण्याइतका निर्लज्जपणा आहे की नाही हेच पाहायचं होतं. तो दिसला. धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

गामा पैलवान गुरुवार, 06/20/2019 - 12:37
नगरीनिरंजन, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो : जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? घरी दरमहा बचत होत असली तरी महाग वस्तू सुलभ हप्त्यावर घेतातच ना? त्याच धर्तीवर करसंकलन जरी भरपूर झालं तरी ते अतिरिक्त विकासकामासाठी पुरेसं नाही. इथे अतिरिक्त म्हणजे जास्तीची हा शब्द महत्त्वाचा आहे. असो. राखीव पेढीकडे इतका पैसा कुठून साचला? या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माहित नसेल तर तसं सांगा. एकदा का पैशाचा स्रोत कळला की मग आपण ठरवू तो कशासाठी वापरायचा ते. तसंही पाहता तिरुपती बालाजीसारख्या देवळांचं धन ताब्यांत घ्यावं म्हणून बरीच ओरड होता असते. कारण तिथे म्हणे तो पैसा अनुत्पादक अवस्थेत पडून असतो. मग हाच नियम राखीव पेढीस लावायला नको का? राखीव पेढी हे अर्थभक्तांचं एक देऊळच मानायला हरकत नाही. पैसा हा नव्या जगाचा देव आहे. अर्थशास्त्राचे नियम ही स्मृती, The wealth of Nations ही श्रुती, अर्थशास्त्रीय विविध संशोधने हे विविध योगमार्ग, भांडवलशाही म्हणजे पुण्यसंचयिनी व्यष्टीसाधना, तर साम्यवाद ही समष्टीसाधना, राखीव पेढी म्हणजे रिझर्व्ह बँक हे मंदिर, जीडीपी हा भक्तीभाव, करसंकलन हा नैवेद्य, राखीव पेढीतील अतिरिक्त पैसा हे मंदिराचं धान्यकोठार, इत्यादि इत्यादि. मग भंडारा घालायचा ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Sun, 06/23/2019 - 21:12
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो. परंतु, काहीही डेटा वेळच्यावेळी बाहेर पडू न देता आधी अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे भासवले व आता रिझर्बँकेकडून पैसे घ्यायची वेळ आली हे चांगले लक्षण नाही. इथल्या तज्ज्ञ मंडळींना काही वाटत नसले तरी गुंतवणूकदार खुळे नसतात. बाकी घटनात्मकदृष्ट्या ते चूक आहे असं मी म्हटलेलंच नाही त्यामुळे खाली काहींनी नियम वगैरे डकवून ठेवलेत त्यांना माझा मुद्दा डोक्यात शिरला नाही असे वाटतेय. असो. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे; त्याचे इथे समर्थन करणारे तरी त्याचे लाभार्थी असाल अशी आशा!

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 03:32
तुम्ही दिलेल्या लिंक्स मधल्या बातम्या तुम्ही स्वतःच नीट वाचत नाही का? त्यात लिहिलंय - Former chief economic adviser Arvind Subramanian, who has been caught in a storm since he said India’s GDP growth between 2011-12 and 2016-17 may have been over-estimated, had recommended the transfer of a larger chunk of the RBI’s excess capital to the government. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. He also noted that the RBI was one of the most highly-capitalised central banks in the world. इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मराठीत सांगतो - रिझर्व्ह बँकेकडे जमा असलेला अतिरिक्त पैसा भांडवलाची कमतरता असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना द्यायला हरकत नाही. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अशी परिस्थिती का आणि कशी झाली? तर ममोसिंगांच्या काळात अनिर्बंध कर्जे वाटली गेली. हे मी नाही तर पुरोगाम्यांचे लाडके माजी आणि एकमेवाद्वितीय आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले आहेत. इथे आणि इथे वाचा. तुमची अपेक्षा काय आहे? की आरबीआयकडे असलेले अतिरिक्त पैसे तसेच ठेऊन द्यावे आणि मोदींनी कसेही करून जगातले एक नंबरचे अर्थतज्ज्ञ असणाऱ्या ममोसिंगांनी केलेली घाण निस्तरावी? वर १२ वर्षे लांबणीवर पडलेलं राफेल डील करावं, सैन्याला आवश्यक असणारी शस्त्रास्त्रे घ्यावीत, बुलेटप्रूफ जॅकेट्स घ्यावीत, नदी जोड प्रकल्प करावा, नवीन रस्ते बांधावे, रेल्वे सुधारावी आणि हे सगळं करताना टॅक्स मात्र कमी करावा. तुम्हाला मोदी आवडत नाहीत हे ठीक आहे, तो तुमचा चॉईस आहे. पण निदान स्वतःच ज्या लिंक देत आहात त्यातील बातम्या तरी नीट वाचा आणि विश्लेषण तटस्थ राहून करा. साबणाच्या विक्रीत घट झाली? लोकांनी अंघोळ करायचं बंद केलं का? का साबणाशिवाय अंघोळ करतात? नुसता मथळा वाचून किंवा जो डेटा मिळतोय त्याचे नीट विश्लेषण न करता निष्कर्ष काढले की असे विचित्र समज होतात. ही बातमी नीट लक्ष देऊन वाचा. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे, तुम्ही येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 06:30
नमस्कार ट्रेडमार्कसाहेब! अरविंद सुब्रमण्यन यांचे म्हणणे तुम्ही ठळक करून दाखवलेत त्याबद्दल आभार! याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! म्हणजे युपीए व मोदी सरकार दोघांनीही जीडीपीचा चुकीचा डेटा काढला हे मान्य झाले हे बरे झाले. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. ते एक असो. रिझर्व बॅंकेचा पैसा सरकारने वापरणे हे धोरण म्हणून काहीच वाईट नाही. उदाहारणार्थ अमेरिकेत फेडरल रिझर्वचा सरप्लस ठराविक मर्यादेच्या वर गेला की अतिरिक्त पैसा सरकारकडे देण्याचे धोरण आहे आणि प्रेसिडेंट कोणीही असला तरी ते पाळले जाते. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. आपल्याला दिसला असल्यास निदर्शनास आणून द्यावे. एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. २००७-०८ मध्ये युपीएच्या काळात लोन्स दिली व ती पुढे एनपीए झाली ह्यात वाद नाही. पण लोन दिल्या-दिल्या ते एनपीए होत नाही. कंपनीला पुढे मंदीचा सामना करावा लागल्यास परतफेड करणे कठिण जाते व मग ते लोन बँकेला एनपीएत टाकावे लागते. ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. थोडक्यात इतक्या दिवस मारलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतच्या बढाया निव्वळ फेका होत्या हे सिद्ध होते. इथून पुढे भंडारा घातला जाईल व त्याचा लाभ लाभार्थींना होईलच. आम्हाला मात्र सरकारी भंडार्‍याचा उपयोग नाही. आपणच त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद व इत्यलम्.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 08:25
तुम्ही किती सोयीस्कर निष्कर्ष काढता. तुम्हाला हे मान्य असेलच की तुम्ही स्वतःच दिलेल्या बातम्या नीट वाचत नाही. असो. याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! मी फक्त तुम्हीच दिलेल्या लिंक मधील बातमीत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा उद्देश होता. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. बराच फरक आहे, पण तो तुम्हाला सांगूनही उपयोग नाही कारण समजणारच नाही. बाकी मी कधीच कोणासाठी टिमक्या वाजवल्या नाही आणि वाजवत नाही. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. जाहीरनाम्यात असेल तरच फक्त करावे असा काही नियम आहे का? असल्यास दाखवून द्यावे. युपीएने आम्ही घोटाळे करू असे जाहीरनाम्यात लिहिले होते का? एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. तुम्ही फारच विनोदी आहात बुवा. मी बँकिंग मध्ये जवळपास २ दशके काम केले आहे, तरी तुम्हाला वाटत असेल माझे ज्ञान तुटपुंजे आहे तर आम्हाला ज्ञानी करून सोडा की. २००८ साली मंदी आली होती, नंतर मंदी आली का? कुठे आणि कुठल्या क्षेत्रात आली? ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. एनपीए करण्याची संपूर्ण प्रक्रिया इथेच विशद करून सांगा बघू. लोन दिल्यापासून एनपीए कधी होते, ते एनपीए करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे सांगा. एनपीए झाल्यावर काय होते हे सांगा. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. आता तुमचा रघुराम राजन यांच्यावरही विश्वास उरला नाही. आता कोणावर विश्वास ठेवणार बरं? ध्रुव राठी, विनोद दुवा, रागा का अजून कोणी आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 09:27
मोदी द्वेषाचा चष्मा घातला कित्यांच्या सरकारने केलेली कोणतीही गोष्ट चूकच दिसू लागते आणि आपल्याला पाहिजे तसेच आणि तेवढेच दिसू लागते याचे हे उदाहरण आहे

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 11:50
आमचे सरकार हे आत्ताचे सरकार आहे. आणि प्रत्येक सरकारच्या धोरणांवर टीका करणे हे आम्ही आमचे एक नागरिक म्हणून कर्तव्य समजतो. चष्मा कोणी घातला आहे ते आपण उघड केल्याबद्दल धन्यवाद! आपल्याला जी स्वप्ने पडत आहेत गतवैभवाची ते काही खरोखर वैभव नव्हते व ते परत येणार नाही इतके आपल्याला समजले तर बरे होईल आपल्यासाठी.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 11:57
एकांगी प्रतिसाद देताना तुमचा आकस आणि द्वेष दिसून येतो आहे. सरकारवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण तो "संपूर्ण" सत्य स्थितीवर अवलंबून असावा एवढीच अपेक्षा असते. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 12:22
श्री. पटेल यांच्याप्रमाणेच श्री. विरल आचार्य यांनीही कार्यकाल संपायच्या सहा महिने आधीच राजीनामा दिल्याचे वृत्त आजच प्रसिद्ध झाले आहे. रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. रिझर्व बँक, अर्थ सल्लागार पद, राष्ट्रीय सांख्यिकी संस्था यातून लोक धडाधड राजिनामे देत असतील तर प्रश्न मनात यायलाच हवेत. आपल्याला कसली काळजी आहे आणि कोणत्या संपूर्ण सत्याची आपण वाट पाहात आहात हे आपणासच माहित.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 13:04
रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीला सरकारने हात लावू नये असे वाटत असणारे तेथील अर्थतज्ज्ञ राजीनामे देत आहेत. ज्यावेळेस स्वायत्त संस्था आणि सरकारचे जमत नाही तेंव्हा असे परंपरावादी लोक धोरण जमत नसल्यामुळे राजीनामे देतात. सरकारी खात्यात अशा गोष्टी होत राहतात. भारताची आर्थिक शिक्षणाची बाजू भक्कम आहे त्यामुळे त्यांच्या जागी नव्या दमाचे लोक येतीलच. राष्ट्र कुणासाठी थांबत नसतं.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Wed, 06/26/2019 - 06:22
तुम्ही नीट पूर्ण वाचत नाही हे परत सिद्ध केलंत. मी बँकिंगमध्ये २० वर्षे आहे हे मी आधीच सांगितलं आहे. मला तुमच्याकडून शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. पण तुम्हाला माहित नाहीये म्हणून असे प्रतिसाद येत आहेत का? मी सांगितलेल्या एकही मुद्द्यावर आपण प्रतिवाद केला नाही. तुमचा प्रतिवाद काय तर "नागरिक म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करणे हा आमचा हक्क आहे" हे सांगणे आणि माझे ज्ञान वाढवणे ही तुमची जबाबदारी नाही हे सांगणे. तुमचा टीका करायचा हक्क कोणीच हिरावून घेत नाहीये, पण टीका करायचीच आहे म्हणून वस्तुस्थिती बघायचीच नाही हे चुकीचे आहे. काही प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या हुशारीने उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो. १. सार्वजनिक ब्यांकांच्या वाईट परिस्थितीला युपीए सरकार जबाबदार आहे या रघुराम राजन यांच्या विधानावर तुम्हाला आक्षेप आहे का? २. ब्यांकांची परिस्थिती वाईट आहे, त्या ब्यांका डुबल्या तरी चालेल पण आरबीआय कडे पडून असलेले पैसे वापरायचे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ३. उद्या या ब्यांका जर डुबल्या तर सामान्य लोकांचे ब्यांकांमध्ये ठेवलेले पैसे परत नाही मिळाले तरी चालणार आहे का? ४. या ब्यांका डुबल्यावर लोकांनी इतर ब्यांकांवर विश्वास न ठेवता पैसे काढून घ्यायला सुरुवात केली तर काय परिस्थिती होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? ५. आरबीआय हे पैसे स्वतःकडे ठेऊन काय साध्य करणार आहे असं तुम्हाला वाटतं? ६. आरबीआय त्यांचे वार्षिक नफा नुकसान पत्र (profit & loss statement) तयार करते का? ते कधी जाहीर केले आहे का? ७. तुम्हाला आरबीआय बद्दल नक्की कसली काळजी वाटत आहे? ८. या गंगाजळीतला हिस्सा जर सरकारला किंवा आरबीआय सांभाळत असलेल्याच ब्यांकांना गरज असताना दिला तर काय वाईट परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटतं? ९. या रोखीची चणचण असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या ब्यांका वाचवण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय आहे का? किंवा ज्या लोकांनी राजीनामा दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे त्यांनी तरी कुठला उपाय सांगितलं आहे का?

ऋतुराज चित्रे गुरुवार, 06/20/2019 - 13:58
How does RBI builds its reserves? The reserves with the RBI accumulate due to several factors. First is its income from three sources: interest on government bonds held for conducting open market operations; fees from government's market borrowing programme; and income from investment in foreign currency assets. Second source is earnings retained after giving dividends to government. Third source is revaluation of foreign assets and gold. Why does a central bank need capital? There are five main reasons for a central bank to hold capital. First, central banks that have foreign assets need capital to absorb potential losses. The RBI's foreign assets are worth Rs 26.4 lakh crore, up from 23.7 lakh crore in FY17. Second, the RBI needs capital to shield the economy from monetary and financial shocks. Third, in case of unstable governments, monetary authorities carry a bigger burden. A Central bank would need more capital in such a situation. Fourth, a central bank needs reserves to perform functions such as price and exchange stability. Fifth, reserves give independence to a central bank. Low capital will force central bank to turn to government in time of need. This will give government influence over the central bank. विकासकामांसाठी सरकारला निधी अपुरा पडत असेल तर सरकारने हा राखीव निधी वापरायला हरकत नाही, परंतू हे पैसे बिनव्याजी कर्ज म्हणून घेणार की लाभांश स्वरूपात घेणार?

In reply to by ऋतुराज चित्रे

सुबोध खरे गुरुवार, 06/20/2019 - 20:19
यात रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा स्रोत काय हे आलेले नाही. रिझर्व्ह बँक इतर बँकांना पैसे पुरवते त्यावर व्याज आकारते. पैसा छापण्यासाठी / पुरवण्यासाठी असलेला जनादेश (mandate) हा रिझर्व्ह बँकेचा नाही तर सरकारचा आहे. रिझर्व्ह बँक हि सरकारचा एक विभाग आहे, सरकारची मालक नाही. येथे काही लोक सरकार रिझर्व्ह बँकेवर दरोडा मारत आहे अशा थाटात लिहीत आहेत The governor of RBI is not superior to finance minister. If FM insists, I don't see that the governor can refuse, unless he's willing to give up his job.”डॉ मनमोहन सिंह यांनीच आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे. https://www.dnaindia.com/india/report-rbi-governor-not-superior-to-finance-minister-former-pm-manmohan-singh-in-2014-book-2683667

ट्रम्प गुरुवार, 06/20/2019 - 15:49
http://nbt.in/Ior5mb?baa NBT: शांततावादी समाज की ममता बनर्जी से अपील- अपराध में शामिल हमारे समुदाय के लोगों पर लें ऐक्शन http://nbt.in/Ior5mb?baa via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता सत्य बाहेर आले कोलकत्ता च्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरानां मारहाण प्रकरणात शांतता वादी होते . इतक्या दिवस कुठल्याही मीडिया किंवा ममताने त्यांचा धर्म सांगितला नव्हता . आणि ममता शांतीवादी लोकांची पाठराखण करून डॉक्टरनां धमक्या देत होती

डँबिस००७ गुरुवार, 06/20/2019 - 21:45
बर्याच केसेस मध्ये अडकलेले IPS संजीव भट्टला आज कोर्टाने आजिवन कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे . संशयित आरोपीचा पोलिस तुरुंगात अंत झाल्याच्या आरोपावर कस्टोडीयल डेथ कोर्टाने हा निर्णय सुनावलेला आहे ! पुर्वी नांबी नारायणन नावाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञाला खोट्या केसमध्ये अडकवुन आयुष्यातुन उठवण्याच काम ह्याच अधिकार्याने केले होते !! हल्लीच नांबी नारायण ह्यांना कोर्टाने निर्दोष सोडले !! ह्याच संजीव भट्टने ईशरत जहान केस मध्ये खोटी साक्ष दिली होती !!

शाम भागवत Fri, 06/21/2019 - 07:01
संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उदार धोरण अवलंबल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. (सर्व आकडे कोटी रुपयांत) भारताची संरक्षण निर्यात २०१८-१९ १०,७४५ २०१७-१८ ४,६८२ २०१६-१७ १५२१ २०१५-१६ २०५९ २०१४-१५ १९४० निर्यातीचे स्वरूप छोटी शस्त्रे ५००० एव्हिऑनिक्स २५०० इलेक्ट्रॉनिक सिस्टीम १४०० इतर १८४५

गड्डा झब्बू Sat, 06/22/2019 - 12:59
कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यवधींचा चुना चारा, कोळसा, 2 जी असे अनेक घोटाळे आजवर उघडकीस आले. अशाच घोटाळ्यांमध्ये आता २०१० ते २०१४ च्या काळातील अजून एक नवा ‘कंडोम’ घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यात एचएलएल लाईफकेअर आणि टीटीके प्रोटेक्टिव डिव्हायसेस लिमिटेड या दोन सरकारी कंपन्याही सामील होत्या. जय मौनमोहन सिंग !!! UPA ने आणखीन किती क्षेत्रात भ्रष्टाचार केला होता हे पाहणे नजीकच्या भविष्यकाळात रोचक ठरेल. लोकसत्ताने बातमीमध्ये घोटाळ्याच्या कालावधीचा उल्लेख केलाय पण UPA चा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक टाळलाय.

गामा पैलवान Mon, 06/24/2019 - 17:18
नगरीनिरंजन,
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो.
काहीतरी गडबड होतेय का? तुम्ही उल्लेखलेल्या लेखात फिस्कल टारगेट राखता आलं नाही असं म्हंटलंय. पण त्यासाठी सरकारला दोष दिलेला नाहीये. उलट मी म्हणतो की मोदींनी पैशाची गळती थांबवल्याने राखीव पेढीकडे इतका पैसा जमला आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमल्याची बातमी कधी कोणी ऐकली नव्हती यापूर्वी. याचा अर्थ माझ्या मते मोदी योग्य दिशेने चाललेत. ज्याप्रमाणे राखीव पेढीकडे इतका पैसा जमला त्याच प्रकारे सरकारकडेही जमेल. राखीव पेढीची गळती थांबवायला धोरणात्मक कायदे पुरेसे होते, व ती तुलनेने चटकन थांबली. मात्र करसंकलन त्रुटी भरून काढायला प्रशासकीय बदलांचीही जरुरी आहे. त्यासाठी वेळ लागतो. तितका वेळ मोदींना द्यावा असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

Your next passport may have chip inside नजिकच्या भविष्यककाळात भाररतिय पारपत्रामध्ये संगणक चिप् सुरक्षाप्रणाली बसविली जाईल. याचबरोबर, परराष्ट्र आणि संचार मंत्रालयांमधील सहकार्याने, जेथे सद्या पारपत्रसेवा नाही अश्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक "पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र (Post Office Passport Seva Kendra उर्फ POPSK) स्थापन करण्याची मोहीम चालू आहे. त्यापकी ४१२ केंद्रे आजतागायत कार्यरत झालेली आहेत. या दोन सेवांच्या संयोगाने नागरिकांची सोय आणि सुरक्षा यांचा संयोग असलेली व्यवस्था होईल.

Rajesh188 Mon, 06/24/2019 - 17:58
वरती पाण्याची उपलब्धता आणि होणारा वापर ह्या विषयावर काही सदस्यांनी विचार मांडले आहेत . त्यात शहरी लोक जास्त पाण्याचा वापर करतात ,टॉयलेट chya फ्लॅश मुळे खूप सारे पाणी वाया जाते,किंवा गाड्या धूने, नळ बंद न करणे इत्यादी कारणे आहेत , आणि ग्रामीण भागात उसा सारख्या पिकाला जास्त पाणी लागत हा आक्षेप आहे. मुळात शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करणेच चुकीचं आहे .दोन्ही क्षेत्र एकमेकावर अवलंबून आहेत .शहरात राहणारी लोक ही खेडे गावातूनच विस्थापित झालेली लोक आहेत . आणि विस्थपण हाच देशा समोरचा ज्वलंत प्रश्न आहे . गावातून तालुक्यात,तालुक्यातून जिल्ह्यात आणि पुढे असे विस्थापण होत आहे . त्याचे कारण लोकांच्या प्राथमिक गरजा भागात नाहीत त्या मुळे ते शहरात येत आहेत ,त्या मुळे शहर आणि गाव दोघांचे ही आरोग्य बिघडत आहे. शेती किंवा शेती आधारित अर्थ व्यवस्था ग्रामीण भागात मजबुत होणे गरजेच आहे . त्यासाठी पाणी ही मूळ गरज आहे . आपल्या कडे पावूस योग्य पडतो फक्त आपण नियोजन करण्यात कमी पडत आहे . शेती साठी ठिबक सिंचन,किंवा तुषार सिंचन वापरल्या मुळे पाणी वाचवत येईल ,पण ही सुविधा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडली पाहिजे आणि त्या साठी सरकारनी सहाय्य केले पाहिजे. शेती आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत आणि त्यात सुधा सुरवातीला सरकारचा सहभाग गरजेचं आहे . ऊस हे पीक का घेतले जाते त्याच एकच कारण आहे बाकी पीक उत्पादन खर्च सुधा देवू शकत नाहीत .नेमक्या मार्केटिंग मध्ये त्रुटी काय आहेत ह्याचा अभ्यास करून उपाय योजना केल्या तर प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल . ग्रामीण भागात च लोकांच्या गरजा भागल्या तर ते शहराकडे विस्थापित होणार नाहीत . आणि प्रचंड गर्दी,प्रदूषण, गुनेहगारी ह्या पासून शहरांना सुद्धा मुक्ती मिळेल. शहराचे हवामान स्वच्छ राहण्यासाठी मोकळ्या प्रदेशाची गरज असते ती गरज खेडे गाव पूर्ण करतात .मोकळ्या जागेत विशाल वृक्ष रोपण तातडीने करणे गरजेचं आहे. पाणी जमिनीत जिरवणे खूप गरजेचं आहे त्या साठी प्रयत्न चालू आहेत पण ह्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे . प्रधमिक गरजा भागवण्यासाठी गावातून शहरात आणि शहरातून विदेशात जाणे हे काही भूषण निय नाही .

In reply to by Rajesh188

तुमच्या प्रतिसादात, नेहमीचाच, वरवरचा आणि एकेरी सूर आहे. तो काढताना, हे नेहमीच (बर्‍याचदा सोईस्करपणे) विसरले जाते की... १. सर्व प्रकारची शेतीची उत्पादने निर्माण करणे आवश्यक आहेच, पण... २. प्रत्येक उत्पन्न कोठे असावे याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी, त्यासाठी लागणार्‍या पाण्याच्या कमी-जास्त उपलब्धतेचा विचार करणे, अत्यावश्यक आहे... सर्वांना योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा विचार सर्वात महत्वाचा, त्यानंतर उरलेले पाणी जीवनावश्यक शेतीसाठी आणि नंतर नगदी पिके घेण्याइतपत पाणी उरत असेल तेथेच भरपूर पाणी जरूर असलेली नगदी पिके घेणे योग्य असेल. दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याने होणारे दुष्परिणाम आपण पाहत आलो आहोच... काही थोड्या लोकांच्या फायद्याकडे पाहत नगदी पिकांसाठी पाणी वापरणे, आणि त्यामुळे लहान शेतकरी व सर्वसामान्य जनता पाण्याविना तडफडणे ठेवणे, कितपत योग्य आहे?! आणि तसे होते तेव्हा, शहरी जनतेला सज्जड दूषणे देणार्‍यांपकी किती जण तेथिल सधन शेतकरी व राजकारणी लोकांच्या या स्वार्थी कृतीबद्दल ब्र देखील काढताना दिसतात?... आत्ताच या धाग्याच्या प्रतिसादात हा विरोधाभास सहजपणे पाहता येईल. हितसंबंध राखण्यासाठी पाण्याच्या सर्वंकष नियोजनाकडे दुर्लक्ष करणे (पक्षी : दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याचे न थांबवणे आणि मुद्दा भरकटवण्यासाठी केवळ पाणी संवर्धनाची भलावण करणे किंवा शहरी लोकांना दुषणे देत गोलपोस्ट बदलणे) म्हणजे, टाकीला लागलेली मोठी गळती बंद करण्याकडे हेतुपुरर्सर दुर्लक्ष करून वरून चमचा-चमचा पाणी टाकून ती टाकी भरण्याचा देखावा करण्यासारखे आहे, हे सांगायलाच हवे काय ?

Rajesh188 Tue, 06/25/2019 - 12:37
स्वयंपूर्ण खेडी नाही तर स्वयंपूर्ण देश होणे गरजेचं आहे . म्हणजे सर्वांचा समान विकास झाला पाहिजे . शहर केंद्रित विकास देशात बरेच जटिल प्रश्न निर्माण करत आहे . जिथे राहतो तिथे रोजगार निर्मिती झाली तरच देशाचा चौफेर विकास होईल . जगात सुद्धा शहर केंद्रित विकासा मुळे प्रश्न निर्माण झाले असतील .त्याचा अभ्यास होणे गरजेच आहे . न्यूयॉर्क किंवा Washington म्हणजे अमेरिका नक्कीच नाही ग्रामीण अमेरिकन लोक कशा परिस्थिती मध्ये राहत आहेत ह्याची सुद्धा माहिती आपल्याला हवी .आणि ती माहिती सहज नेटवर सुद्धा उपलब्ध नाही . त्यांचा अभ्यास करून आपल्या ला आपली धोरण ठरवता येतील . पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या म्हणी प्रमाणे

गामा पैलवान Tue, 06/25/2019 - 17:16
नगरीनिरंजन,
रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
राखीव पेढीचा म्हणजे रिझर्व्ह बँकेचा लोकशाहीशी कसलाही संबंध नाही. ही घटनेत नमूद केलेली (उदा. : न्यायालय, महालेखापाल) यांच्यासारखी एक स्वायत्त शासकीय संस्था आहे. मात्र हिच्या कारभारात शासन व/वा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाहीत. अगदी असाच प्रकार न्यायालयाच्या बाबतीतही आढळून येतो. न्यायालयाच्या कारभारात कोणीही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाही. राखीव पेढीचा लोकशाहीशी संबंध नसला तरी तुमचा 'शासन व राखीव पेढीत मतभेद का होताहेत' हा प्रश्न रास्त आहे. आ.न., -गा.पै.

Top cops told to file FIRs in cut-money complaints फार पूर्वीपासून, कम्युनिस्ट सरकार असल्यापासून, पश्चिम बंगाल राज्यात एक अत्यंत भ्रष्ट प्रणाली काम करत आली आहे. तिला सर्वसामान्य लोकांत "सिंडीकेट" असे म्हटले जाते. या प्रणालीत, सत्तेत असलेल्या सरकारच्या आशिर्वादाने प्रत्येक मोहल्ला, गाव आणि शहर स्तरावर स्थापन केलेल्या या गटांचा मुख्य स्थानिक बाहुबलींनी असतो. स्वतःसाठी, सत्तेतल्या पक्षासाठी आणि सत्तेतल्या नेत्यांसाठी जनेतेकडून अवैध मार्गांनी पैसे जमवणे (पक्षी : लोकांना लुबाडून पैसे जमवणे) हे या सिंडिकेट्सचे मुख्य काम असते. सर्वसामान्य गरीब/श्रीमंत लोक आणि खाजगी संस्थांचे सर्व स्थानिक निर्णय (उदा : जमीन खरेदी करणे, इमारत बांधणे, व्यवसाय-धंदा करणे, त्यासाठी कच्चा माल विकत घेणे, तयार माल विकणे, इ) या सिंडिकेटच्या सहमतीने आणि त्यांना त्यांनी मागितलेले पैसे देऊनच होऊ शकतात. ही एक फार मोठ्या प्रमाणावरची अवैध समांतर संस्था, सत्तेत असलेल्या सरकारच्या वरदहस्ताखाली चालू असल्याने तिला पोलीस आणि न्यायव्यवस्थाही आत्तापर्यंत हात लावू शकत नव्हती... मग लोक दाद तरी कोणाकडे मागणार? आणि दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्याविरुद्ध दमबाजी पासून ते शारिरीक इजा, यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जात असे. नुकतेच झालेल्या निवडणूकांमध्ये लोकांनी या व्यवस्थेला विरोध सुरू केला आणि त्याला नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाने बळ मिळाले. जुलुमी सत्तेविरुद्ध आवाज उठविता येतो आणि संघटीत असलो तर सरकारला आंदोलन दाबून टाकणे कठीण जाते, ही जाणीव सर्वसामान्य लोकांना झाली. लोकांच्या सिंडिकेट्सच्या विरुद्ध असलेल्या असंतोषाचा उद्रेक झाला तर ते फार महागात पडेल, या अंदाजाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला नेहमीचा गर्व बाजूला ठेवून सिंडिकेट्सच्या अस्तित्वाला उघडपणे मान्य केले आहे आणि स्थानिक बाहुबलींना अवैध रित्या जमा केलेले पैसे परत करण्याचे उघड आदेश दिले आहेत. व त्यासाठी पोलीसांना एफआरआय दाखल करण्यास सांगितले आहे. ही फक्त वेळ सावरण्यासाठी खेळलेली राजकिय चाल असली तरी, लोकांचा प्रतिसाद (पक्षी : वाढलेली हिम्मत) पाहता आणि अश्या रितीने सरकारी आशिर्वादाने लुबाडलेल्या पैशाची व्याप्ती पाहता, त्या चालीचा हिमधोंडा (स्नोबॉल) बनून ममता दीदीच्या डोक्यावर आदळण्याची बरीच शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये, अनेक दशकांनी, जनतेला जनतेच्या आवाजाच्या ताकदीची कल्पना आली आहे. ही, पश्चिम बंगालसाठी आणि भारतिय लोकशाहीसाठी फार महत्वाची सकारात्मक गोष्ट आहे.

Rajesh188 Tue, 06/25/2019 - 20:21
पश्चिम बंगाल हे राज्य बांगलादेश सीमेवर आहे . बांगलादेश आणि बंगाल ह्या दोन्ही देश आणि राज्य ह्यांची भाषा एकच आहे . त्याचा परिणाम म्हणून अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या इथे बऱ्या पैकी आहे . कम्युनिस्ट राजवट ही नेहमीच हिंदू विरोधी राहिली आहे . त्या मुळे हिंदुस्थान पेक्षा बांगलादेश ह्यांना जवळचा वाटतो . त्या मुळे बरेच अनैतिक धंदे इथे चालू असतात . केंद्रातील काँग्रेस सरकारनी बोटचेपे धोरण स्वीकारल्या मुळे ह्यांची हिमत वाढली आहे . आता bjp चे मजबुत सरकार केंद्रात आहे तेव्हा थोडी चलबिचल बंगाल मध्ये आहे

$490 billion in black money stashed abroad by Indians till till 2010: Report भारतातून बाहेर गेलेल्या काळ्या पैशाचा अंदाज घेण्यासाठी, सन २०११ मध्ये युपिए सरकारने प्रायोजित (sponsor) केलेल्या, तीन अभ्यासगटांकडून मिळालेले, पण आत्तापर्यंत उघड न केलेले, निष्कर्ष आता सार्वजनिक्रित्या उघड केले गेले आहेत. हे अहवाल सोमवारी लोकसभेच्या पटलावर ठेवले आहेत. (अ) National Institute of Public Policy and Finance (NIPFP), (आ) National Council of Applied Economic Research (NCAER) आणि (इ) National Institute of Financial Management (NIFM) यांच्या निष्कर्षांप्रमाणे, सन २०१० पर्यंत भारतियांनी भारताबाहेर साठवलेले धन युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी) इतके आहे. यामध्ये भारतात, स्थावर मालमत्ता (जमीन, सदनिका, ऑफिसेस, इमारती, इ), खाणकाम, तंबाखू-गुटका, सोने, चलतचित्र उद्योग, शिक्षणौद्योग, इत्यादींच्या रुपात साठवलेल्या काळ्या पैशांचा समावेश नाही. काही दिवसांपूर्वी, स्विटझर्लंडच्या सरकारने, स्विस बँकात खाते असणार्‍या डझनावारी भारतियांना नोटीसेस बजावल्या आहेत, हे माध्यमात आले होते. याशिवाय, स्विस सरकारशी केलेल्या कराराप्रमाणे, भारत सरकारला, स्विस बँकांतील भारतियांच्या खात्यांचा अहवाल, दर तिमाहीला मिळायला सुरुवात झाली आहे. आता या सर्व माहितीवर आधारीत कोणती कारवाई सुरू केली जाईल, हे पाहणे रोचक होईल.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Wed, 06/26/2019 - 17:50
ओके. ४९० अब्ज. म्हणजे तुल्यबळ समांतर अर्थव्यवस्थाच म्हणायला पाहिजे. आपली डॉलरमधली गंगजळीपण यापेक्षा कमी आहे. बापरे.

In reply to by शाम भागवत

चामुंडराय गुरुवार, 06/27/2019 - 08:10
म्हणजे अगदी एक-पाच लाख (नवीन अंक मापन/उच्चार पद्धती प्रमाणे) नसले तरी तीस / तीन-पाच हजार कुठे नाही गेले !

In reply to by शाम भागवत

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 10:25
युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी). हा आकडा, २०११ मध्ये युपिए सरकारने नेमलेल्या कमिट्यांनी दिलेला आहे व तो अहवाल कॉन्ग्रेसच्या विरप्पा मोईली यांनी, गेल्या सोमवारी (२४ जून २०१९) लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. या अहवालातील मजकूराप्रमाणे, १९९७ ते २००९ या काळात, दरवर्षी देशाच्या सकल उत्पन्नाचा (जीडीपी) ०.२% ते ७.४% भाग काळ्या पैशाच्या स्वरूपात देशाबाहेर गेला आहे. यामध्ये देशात साठवलेल्या काळ्या धनाचा समावेश नाही. सर्वसामान्य माणसाला आपले काळे धन परदेशात पाठवणे सोपे नाही, ते गब्बर आणि पोहोच असलेली मंडळीच करू शकतात. म्हणजे, एकूण काळे धन त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असण्याची शक्यता आहे. :(

India will do what is in its national interest: Jaishankar to Pompeo on S-400 deal "परराष्ट्रसंबंधांच्या बाबतीत जसे अमेरिका तिच्या हितंसंबंधांकडे पाहून निर्णय घेते, तसेच भारत त्याच्या हितसंबंधांकडे पाहून निर्णय घेईल", असे भारतिय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सद्या भारतभेटीवर असलेल्या अमेरिकन परराष्ट्रमंत्री पाँपिओ यांना सांगितले आहे. असे करणे हेच योग्य आहे. परंतू, अमेरिकेसारख्या प्रबळ आणि सद्याची एकुलती एक जागतिक महासत्ता असलेल्या देशाला असे (त्याच्या सांगण्याविरुद्ध निर्णय घेत असताना व विशेषतः त्याच्या sanctionsच्या धमकीला भीक न घालता) सांगणे ही कोणत्याही देशासाठी सर्वसामान्य गोष्ट नाही. गेले काही वर्षे भारत असे करत आहे, हे सद्य सरकारच्या राजकिय इच्छाशक्तीचे आणि ती वापरण्याची धमक असल्याचे लक्षण आहे... अर्थातच, हे भारताच्या जागतिक पटलावर उंचावलेल्या प्रतिमेचे लक्षण आहे. आताचे विधान, "अमेरिकन दबावाला न जुमानता, भारताने रशियाकडून S-400 ही अत्याधुनिक युद्धप्रणाली विकत घेण्यासंदर्भात", होते. हे मत भारताने दीड-एक वर्षांपूर्वी उघडपणे व्यक्त केले आहे आणि अमेरिकेच्या अनेक प्रकारच्या सातत्यपूर्ण दबावाला बळी न पडता, कायम ठेवले आहे, हे भारताच्या प्रतिमेसाठीच नव्हे तर भारताच्या संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत स्पृहणिय आहे, यात वाद नाही. असाच दबाव अमेरिका, नाटो सदस्य असलेल्या तुर्कस्थानावर टाकत आहे आणि बर्‍याच अंशी यशस्वी होत आहे, असे दिसत आहे. या युएस५ बिलियन आकारमानाच्या महाखरेदीविरुद्ध असलेल्या अमेरिकन अमेरिकन दबावामागची मुख्य कारणे अशी आहेत... १. S-400 प्रणाली भारताने विकत घेतल्यास, अमेरिकेने रशियाविरुद्ध घातलेल्या बंधनांचा (सँक्शन्स) भंग होतो... हा एकप्रकारे अमेरिकेच्या जागतिक महत्तेचा अपमान होतो. व अमेरिकन प्रथेप्रमाणे अमेरिका सँक्शन्स भंग करणार्‍या देशाविरुद्धही आपोआप सँक्शन्स व्यवहारात येतात. २. तसेच भारताने, (अ) अमेरिकन प्रणाली विकत घेतल्यास, अमेरिकेन अर्थव्यवस्थेला मदत होईल. अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक वर्चस्वाच्या रणनितिमध्ये शस्त्रांत्रांचा व्यापाराला अतीअतीमहत्व आहे. (आ) त्याविरुद्ध, रशियन प्रणाली विकत घेतल्यास केवळ रशियन अर्थव्यवस्थेला मदत होईल असेच नाही तर, अमेरिकेचा रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रयत्न त्याप्रमाणात अयशस्वी होईल. ३. सद्या, S-400 इतकी अत्याधुनिक दुसरी संरक्षक-आक्रमक युद्धप्रणाली आस्तित्वात नाही. अमेरिकेने त्याबदली भारताला त्यांची सर्वोत्तम प्रणाली देऊ केलेली आहे, पण ती S-400च्या तोडीस येत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. ४. S-400 ही अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या विरुद्ध यशस्वी होईल असे तज्ज्ञांचे खात्रीचे अंदाज आहेत. अमेरिकेची मुख्य काळजी हीच आहे. पाकिस्तानकडे अमेरिकन लढाऊ विमाने आहेत. अगोदरच, भारताच्या स्क्वा लि अभनंदन यांनी ६५वर्षे जुनी प्रणाली असलेले मिग-२१ विमान वापरून अमेरिकेच्या नाकाची भूमिका (आणि उत्पन्नाचे महत्वाचे साधन) असलेले एफ-१६ विमान पाडले. यामुळे एफ-१६च्या अजिंकतेच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता, S-400 वापरून एफ-१६ किंवा दुसरे अत्याधुनिक विमान पाडले तर मग (अ) रशियाने अमेरिकेचे नाक कापले असे होईलच, आणि (आ) त्याचबरोबर, त्या घटनेचा अमेरिकेच्या लढाऊ विमान विक्रिवर लक्षणिय परिणाम होईल. अर्थातच, हा जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांच्या गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ५. भारताचे आणि रशियाचे मैत्री आणि सामरिक संबंध खूप जुने (पक्षी : अमेरिका भारताला धाब्यावर बसवत असल्यापासूनचे) आहेत, रशियाने भारताच्या जरूरीच्या काळात मदत केली आहे (जेव्हा, अमेरिका एकतर भारतविरोधी होती किंवा दुसरीकडे बघत होती). हे संबंध नवीन मैत्रीसंबंधांच्या आड येणार नाही आणि नवीन मैत्रीसंबंधांनीही जुन्या मैत्रीसंबंधांच्या आड येऊ नये, असे भारत अमेरिकेला खंबीरपणे सांगत आहे आणि तिच्या गळी उतरवत आहे... हा एक मोठा राजनैतिक विजय आहे. या सोबतच, भारत अमेरिकेने इराणवर घातलेली सँक्शन्स झुगारून, मागच्या दाराने खनिज तेल विकत घेण्याची प्रणाली, एक राखीव चाल म्हणून ठेवून आहे. ते नको असल्यास अमेरिकेने भारताला इराणच्या (आकारमान आणि प्रत) तोडीचे तेल दुसर्‍या देशाकडून मिळवून देण्याची जबाबदारी अमेरिकेवर टाकून भारत प्रतिक्रिया पाहत आहे. याशिवाय, भारताचे इराणबरोबर असलेले सांस्कृतिक-राजकिय-आर्थिक-सामरिक अनेक दशकांचे संबंध हा मुद्दा आहेच... त्याचे एक महत्वाचे उदाहरण छाबाहार बंदर प्रकल्प आहे, जो अमेरिकेला तिचे अफगाणिस्तानमधील हितसंबंध राखण्यास आवश्यक आहे. याशिवाय, इराणला अमेरिकेच मत समजाऊन देणार्‍या दोन-तीन देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. या दोन्ही प्रकरणात असा निर्णय होईल असे दिसत आहे : भारताला सँक्शन कायद्याच्या "अपवाद यादी"त सामील केले जाईल... या यादीतील देशांना/संस्थांना सँक्शन्स असलेल्या देशांशी व्यापार करायला मुभा असते. वरच्या वस्तुस्थितीची मुख्य कारणे अशी आहेत : (अ) आशिया पॅसिफिक राजकारण-अर्थकारण-समरकारण या सर्वांसाठी अमेरिकेला भारत सोडून इतर पर्याय नाही आणि (आ) त्याचबरोबर, भारताने अमेरिकेच्या दबावाला न झुगारता समर्थपणे उभे राहण्याची राजकिय इच्छाशक्ती आणि धमक दाखवली आहे... आणि ते मानण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव गुरुवार, 06/27/2019 - 05:21
जर पुढील वर्षी तात्यासाहेबांची, पर्यायाने त्यांच्या पॉलीसीची, सफेद घरातुन गच्छंती झाली तर हा सगळा गोंधळ कुठले वळण घेईल. यापुर्वीचे सॅम काका इराणबाबत बरेच अनुकुल होते म्हणतात. तेच मार्ग परत ओपन झाले तर परिस्थीती भारताला आणखी सुसह्य होऊ शकेल का??

In reply to by अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 12:09
अमेरिकेत (किंवा इतर कोणत्याही देशात) सरकार कोणाचेही आले तरी अमेरिका (किंवा तो देश) स्वतःचेच हितसंबंध पाहणार. भारताने आपली राजकिय इच्छाशक्ती व पत वापरून, प्रत्येक वस्तूस्थितीत शक्य असेल त्याप्रमाणे, आपले हितसंबंध राखावेत. यापेक्षा वेगळे सत्य नाही. आंतरराष्ट्रिय राजकारणात, आशाळ्भूतपणे पाहून किंवा भीक मागून फक्त अवहेलनाच मिळते... इतर काहीच नाही. एखादी गोष्ट फुकट मिळते आहे असे दिसले तर वर्तमानात/भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेलच याची १००% खात्री ठेवावी. पूर्णविराम.

सुबोध खरे गुरुवार, 06/27/2019 - 09:28
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि भारत स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी जे काही आवश्यक आहे ते करणारच. https://timesofindia.indiatimes.com/india/india-will-do-what-is-in-its-national-interest-jaishankar-to-pompeo-on-s-400-deal/articleshow/69958233.cms

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 12:13
स्विझर्लंडने नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीचे युएस$६.४ मिलियन असलेले बँक अकाऊंट्स गोठवले आहे. आता रिपब्लिक टिव्हीवर ही बातमी दाखवली जात आहे.

Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 13:29
हायप्रोफाइल केस मध्ये मीडिया सांगते त्या पेक्षा वेगळी परिस्थिती असते . निरव चे अनेक बँकेत स्वतःच्या नावावर किंवा dumy नावा वर बँकेत खाती असतील . जे खाते गोठवल आहे असे सांगत आहेत त्या मधून कधीच मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात transfer झाले असतील. प्रत्येक गैर धंदा करणाऱ्या व्यक्तीला काही खोट्या केस स्वतः chya धंद्या वर घाव्या लागतात संगनमताने पोलिस ना सुद्धा द्याव्या लागतात . त्यामुळे जनतेला दाखवा येते सरकार काम करत आहे तसा प्रकार सुद्धा असू शकतो

In reply to by Rajesh188

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 18:00
मूळ मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला नाही. किंवा, या घटनेची पार्श्वभूमी माहीत करून घेतली असतीत, तर घाई करून केलेली सर्व "काल्पनिक व्हॉटाबाऊटरी" टाळली असतीत. =)) युएस$४.६ मिलियन ही काही फार मोठी रक्कमही नाही. पण, स्विट्झलँड त्याच्या बँकेतील पैशांना पोलादी संरक्षण देत असते. आतापर्यंत अमेरिका (तेही गेल्या एकदोन वर्षांतच) सोडून इतर कोणता देश त्या अकाऊंट्सना हात लावण्यात फारसा यशस्वी झालेला नाही. यापार्श्वभूमीवर, आणि नवीन भारत-स्विट्झरलँड कराराच्या पार्श्वभूमीवर, भारताला मिळालेले हे यश, ही नंतरच्या मोठ्या कारवायांची सुरुवात आहे. यानंतरही, या कराराच्या अन्वये, दर तिमाहीला, भारताला स्विट्झर्लँडमधील भारतिय संपत्तीचा अहवाल मिळणार आहे. (खाली दिलेली संदेसरा गृपसंबंधीची ताजी बातमी वाचल्यास (किंवा आत्ता टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या बातम्या पाहिल्यास), भ्रष्टाचारसंबंधी सरकारच्या जोराने चललेल्या नवीन कारवायांसंबंधी अजून काही कळेल व शंकानिरसन होईल.)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 18:14
EXCLUSIVE | Republic Accesses Document Detailing Properties Worth Rs 9,777 Crores In The Sandesara Scam. Read Here स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात आरोपी असलेल्या संदेसरा भावंडांच्या, जगभरात पसरलेल्या संपत्तीपैकी सुमारे रु ९,७७७ कोटी किंमतीच्या संपत्तीवर Enforcement Directorate (ED) ने टांच आणली (attachment ) आहे. ही संपत्ती अनेक देशांत विखुरलेली आहे... (अ) नायजेरियातील ४ तेलविहिरी आणि OML 143 नावाचे तेलक्षेत्र (आ) पनामामध्ये नोंद केलेल्या Tulja Bhawani, Varinda, Bhavya, Brahmani, इत्यादी बोटी (इ) अमेरिकेत नोंदवलेले 200 Gulfstream विमान (ई) युके मध्ये असलेली सदनिका, इ याशिवाय, याअगोदर सन २०१८मध्ये, ईडीने PMLA कायद्याअंतर्गत संदेसरांच्या सुमारे रु४,७३० कोटींच्या संपत्तीवर टाच आणलेली आहे.

In reply to by कंजूस

"दहशतवाद" आणि "आर्थिक घोटाळे करून देशातून पळणाऱ्यांवर कारवाई" हे दोन विषय मोदी प्रत्येक आंतरराष्ट्रिय मंचावर उपस्थित करत आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जागतिक स्तरावर जाणिव व तिरस्कार निर्माण होऊन कडक कारवाईसाठी आंतरराष्ट्रिय सहकार्याच्या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.

मदनबाण Sun, 06/30/2019 - 12:15
अरारारा आरारारा आरारारारा... [ हे गाणं आहे, खालच्या बातम्या वाचुन हेच शब्द तोंडातुन निघाले ! ] देशात पीएनबीपेक्षाही मोठा 14 हजार 500 कोटींचा घोटाळा – इडी शहाणपणाचे वावडे का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

मदनबाण Sun, 06/30/2019 - 21:45
शुक्रवार २८ जून ला देवळाली रेंजमध्ये मध्ये मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्सची चाचणी घेण्यात आली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

Hong Kong protesters smash up legislature in direct challenge to China अमेरिकेशी व्यापारी संबंधांतील मारामारी, देशातील ढासळणारी अर्थव्यवस्था, दक्षीण चीन समुद्रातील सीमारेखेवरून शेजारी देश व अमेरिकेशी चालू असलेले वाद, इत्यादी चिनी राष्टाध्यक्ष शी यांच्या डोकेदुख्यांत अजून एका मोठ्या समस्येची भर पडली आहे. हाँग काँग मधिल ब्रिटिश वसाहतीची ब्रिटनची ९९ वर्षांची भाडेपट्टी (lease) सन १९९७ साली संपली. त्यावेळेस, तो भूभाग परत घेताना चीनने, "हाँग काँग मध्ये आधीची ९९ वर्षे चालू असलेली मुक्त व्यापारी, लोकशाही आणि न्याय व्यवस्था चालू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. याचे कारण म्हणजे, हाँग काँगचे 'जागतिक स्तरावर महत्वाचे आर्थिक केंद्र' हे महत्व. तसे आश्वास न दिल्यास हाँग काँगची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे चीनला पुरेपूर माहीत होते आणि तो धोका स्विकारणे मूर्खपणाचे झाले असते. असे असले तरी, जसजसा काळ जाऊ लागला तसतसे, चीनी ड्रॅगनने मागच्या दाराने, हाँग काँगला आपल्या विळख्या जखडण्याचे काम सुरु केले. तेथिल निवडणूकीत उभे राहणार्‍या लोकप्रतिनिधींच्या निवडीत हस्तक्षेप, प्रशासनात आणि व्यापारी नियमांत ढवळाढवळ, असे करत करत सद्या तेथिल चीनच्या नीतीला विरोध करणार्‍या नागरिकांच्यावर शेवटचा आघात करणारे विधेयक स्थानिक विधानसभेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विधायकात, विरोधकांवरचे खटले हाँग काँग येथून हलवून, चीनच्या मुख्य भूमीवरील कम्युनिस्ट न्यायालयांत नेण्याची तरतूद आहे. एकदा तेथे खटले नेले की 'निकाल' चीनच्या सरकारच्या बाजूनेच लागेल आणि शिक्षा कडक असेल हे सांगणे काही फार कठीण नाही. अर्थातच, सुरुवातीला अडखळत सुरू झालेल्या विरोधाला गेल्या काही दिवसांत जनतेचा मोठा पाठींबा मिळाला आहे आणि त्याची धार प्रखर झाली आहे. सुरुवातीला शांततापूर्ण असलेले हे आंदोलन सद्या अटीतटीचे आणि हिंसक वळण घेऊ लागले आहे. आंदोलकांनी विधान भवनाचे (Legislative Council) संरक्षक कुंपण तोडून इमारतीत प्रवेश केला आणि आतमध्ये बरीच मोडतोड केली, भिंतींवर अक्षरे आणि चित्रे (ग्राफिती) काढली, चीनने मान्य केलेला ध्वज उलटा लटकावला आणि आंदोलकांचा ध्वज रोवला. या आंदोलनात वेगवेगळ्या अंदाजांप्रमाणे ५ ते १० लाक लोकांनि भाग घेतला आहे... हे अभूतपूर्व आहे. हे प्रकरण सद्या बरेच गरम झाले आहे, त्यात अमेरिका आणि ब्रिटनने राजकिय उडी घेतली नसती तरच आश्चर्य. दोन्ही बाजू नेटाने पाय रोवून उभ्या असल्याने, ते कोणत्या दिशेने जाईल नक्की सांगणे हे सद्या तरी कठीण आहे. मात्र, त्याची दीर्घकालीन दिशा, राष्टाध्यक्ष शी यांचे चीनमधील आणि आंतरराष्ट्रिय महत्वावर लक्षणिय प्रभाव टाकेल, यात वाद नाही.

#MeToNavhech (#मी_तो_नव्हेच) ;)

भारतातिल तथाकथित विचारवंत, विचार स्वातंत्र्याचे दावेदार, "सोईस्कर" खुट्ट वाजले (किंवा कधी कधी ना वाजले तरी) भयभित होणारे चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादी सगळ्याचे ढोंग (हायपोक्रसी), परत एकदा, जगजाहीर झाले आहे. खालील दोन्ही बाबतील काही मोजके अपवाद सोडता, खुट्ट वाजल्यावर जग पेटून ऊठले आहे असा गदारोळ करणारी वर्तमानपत्रे आणि इतर राष्ट्रिय माधमे आणि वरचे सगळे ढोंगी जणु काहीच झाले नाही असे मूग गिळून गप्प आहेत.

१. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या तृणमूल कॉन्ग्रेसच्या खासदार नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून लोकसभेत शपथ घेतली यावरून त्यांच्यावर कर्मठ मुस्लीम मुल्लांकडून टीका झाली आणि सामाजिक माध्यमांत ट्रोलिंग झाले. याबद्दल त्या खमक्या खासदाराने त्यांना परत सुनावले. मात्र, तृणमूलची स्त्री मुखिया किंवा दुसर्‍या कोणी महत्वाच्या राजकारण्याने त्यांच्या बाजून बोलल्याचे माध्यमांत दिसत नाही. २. झाईरा वसीम नावाच्या बक्षिसाने गौरविल्या गेलेल्या सिनेमा अभिनेत्रिला, मुस्लिं कट्टरतावादी आणि सामाजिक माध्यमांतील ट्रोलिंगमुळे, आपले सिनेमा करियर सोडून द्यावे लागले. त्या अभिनेत्रिला चित्रपट सृष्टीत घेऊन येणार्‍या, एका लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमात नाक वर करत (व कधी नक्राश्रूंनी भरलेले नाक पुसत) इतरांच्या नीतीमत्तेवर टीका करणार्‍या, भारतात विचारस्वातंत्र्य उरले नाही म्हणून आपली बायको भयभीत झाली आहे व परदेशात स्थालांतर करू असे सांगते आहे असे ठणकाऊन सांगणार्‍या, एका तथाकथित सुपरस्टारनेही मुका-बहिरा असल्याचा अभिनय करणे योग्य समजले आहे. पुर्वानुभव पाहता, अश्या एखाद्या प्रकारात, इतर धर्माच्या मुलीबद्दल, इतर धर्मगुरूने किंवा राजकिय नेत्याने जरासे अनुद्गार काढले असते तर सगळे आकाश कोसळले असते... व ते एका परीने योग्यच असते. मात्र, आता दातखिळी बसलेल्यांनी तसे करणे ढोंगीपणाची, खोटेपणाची आणि निर्लज्जपणाची परिसीमा ठरते, हे सांगायला नकोच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

mayu4u Wed, 07/03/2019 - 15:41
नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील.

In reply to by mayu4u

नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. हे जगजाहीर आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील. सद्य कायद्याप्रमाणे, त्यांना साडी नेसणे, कुंकू लावणे आणि मंगळसूत्र घालणे यासाठी, अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी अधिकृतरीत्या हिंदू धर्म न स्विकारता, तसे केले तर त्यावरही आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला नाही. ****** तुम्हाला मूळ मुद्दा समजला नाही असे वाटते. "कोणी काय खावे, काय पेहरावे, त्या आमच्या घटनादत्त विचारस्वातंत्र्यावर कोणीच (सरकारसुद्धा) घाला घालू शकत नाही" असा वेळोवेळी सोईस्कर गळा काढणार्‍या चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढू नये, यात त्यांचा सोईस्कर निवडकपणा (उर्फ सिलेक्टिविझम) आणि म्हणूनच निर्लज्ज ढोंगीपणा उघड झाला आहे. या वरच्या गोष्टींत अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द राजधानीतील एका मंदीरावर इतर धर्मियांनी दगडफेक केली आणि आत प्रवेश करून मंदीर भ्रष्ट होईल अश्या कारवाया केल्या. "विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या लिंचींग" बद्दलच्या बातम्या आकांडतांडव करत अनेक महिने चघळत राहणार्‍या माध्यामांनी त्याबाबत आंधळे-बहिरे होणे स्विकारले आहे. तसेच, काही सन्मामनिय अपवाद सोडता, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्याच कारणांनी होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ****** अजून एक... पहलू खान लिंचींग प्रकरण आठवत असेलच. त्या वेळेस, कोणताही पुरावा न देता, पहलू खान "बिचारा निर्दोष" आहे आणि तो एका विशिष्ट धर्माचा असल्यानेच त्याला मारले, असा प्रकरणाला धार्मिक रंग देऊन, वर निर्देशिलेल्या व्यक्ती आणि माध्यमे दुसर्‍या धर्माला झोडपत होत्या, हे आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सद्य कान्ग्रेस सरकारने त्यासंबंधात दाखल केलेल्या एफआरआय मध्ये पहलू खानच्या नावावर "गाईंची अवैध खरेदीविक्री" करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही गुन्ह्याकरिता कोणत्याही नागरिकावर, कायदेशीररित्या सक्षम (competent) नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, प्राणघातक हल्ला करणेच काय, स्वसंरक्षणार्थ आवश्यक असेली कृती सोडून इतर कोणतीही कारवाई करणे, अवैध आणि निषेधार्य आहे. मात्र, त्याचबरोबर, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी त्यावेळी दाखवलेला ढोंगीपणा (परत एकदा) उघड झाला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बिळात लपून राहीले आहेत. ****** तेव्हा, मुख्य मुद्दा ह्या सततच्या निर्लज्ज ढोंगीपणाचा आहे. अवैध कृतीसंबंधी कडक कारवाई व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर, अश्या निर्लज्जपणे हेतुपुरर्सर केल्या जाणार्‍या ढोंगी कारवाया समाजातील सौहार्दाला गंभीत धोका पोचवतात. काही जणांचा हा व्यवसाय/खेळ झाला आहे, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. म्हणून, त्यांच्यावरही (आवश्यक तर नवीन कायदे करून) कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.

चालू घडामोडी - एप्रिल २०१९

डॉ सुहास म्हात्रे ·

विजुभाऊ Wed, 04/03/2019 - 13:30
निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य मुद्दे मांडत नाहिय्ये. मोदी नी लावलेल्या ट्रॅप मधवोविरोध स्वतःच सापडत आहेत. निवडणूकीत मोदीना जर कोणी परभुत करू शकेल तर ते त्यांचे स्वपक्षीयच. ( उ प्र च्यामुख्यमंत्र्यांनी सेनादलाचा उल्लेख मोदीसेना असा केला) शिवसेना नक्की मुक्ताफळे उधळते त्यांचे त्यानाच समजत नाही. किरीट सोमय्या ना विरोध कशा साठी आहे तेच सेनेला माहित नाहिय्ये. लालु यादवंच्या ओसाड वाडीत बंड झालंय. ( त्याने किती फरक पडेल असे वाटतय) मायवती नी उधळलेली मुक्ताफळे पाहिली तर त्याना त्यांच्याच पुतळ्याच्या मांडीत बसवून कुठेतरी दूर जंगलात सोडून यावे / गंगा नदीत विसर्जन करावे. राहूल गांधीचे २जी स्पेक्ट्र घोटाळ्यात थेट सम्बंध असल्याचे पुरावे दिले जात आहेत.

जानु Wed, 04/03/2019 - 14:47
भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि मोदी यांनी आपसी खेळातून इतर पक्षांना नामोहरम करण्याबद्दल लेख वाचला. (एक ओळी धागा नको, वेगळा धागा म्हणून काढणे आणि त्यावर त्या लेखापेक्षा वेगळे जोडणे आवश्यक नाही, असे वाटल्याने येथे लिहले आहे.) यावर मते वाचायला आवडेल.

In reply to by जानु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2019 - 09:56
भाऊ तोरसकर एककल्ली आणि विद्यमान सरकारचे प्रचारक असल्यासारखे लिहित असतात, त्यांचं लेखन गंभीरपणे घ्यायचे कारण नाही. मी त्यांच्या फेबू भिंतीवर आपलं लेखन पाहता आपणास नवीन सरकारात किमान एखादे महामंडळ वगैरे मिळेल असे लिहून आलो होतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

lakhu risbud गुरुवार, 04/04/2019 - 10:35
सध्याच्या सरकार चे समर्थन करणे किंवा टीका करणे याचे काही परिमाण असेल ......... तर त्याच न्यायाने "समतोल,निष्पक्ष,सामान्य जनतेचा कळवळा" वगैरे वगैरे असणारे काही बुद्धीमंत लोक हे गठबंधन किंवा काँग्रेस च्या होऊ शकणाऱ्या सरकारात मंत्रिपदाचे दावेदार तर नक्की ठरतात !

In reply to by भंकस बाबा

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 13:33
उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर
तर बहुधा भारत पाक सीमेवर त्यांचे उभे केलेले पुतळे पाहून पाक सैन्य माघारी फिरेल , पुतळ्याना अडकून रणगाडे मोडून पडतील. बिहारचे १२वी टॉपर हे एक उदाहरण पुरे ठरेल तळा आणि गाळातील शिक्षण कसे होईल या बाबत सांगायला

In reply to by lakhu risbud

डँबिस००७ गुरुवार, 04/04/2019 - 17:07
काँग्रेसच्या सरकारात पद्म पुरस्कार कसे दिले जातात त्याच बरोबर महामंडळातल महत्वाच्या जागा कश्या वाटल्या जातात हे ह्यां ना चांगलेच माहीती आहे असे दिसते. कदाचीत त्यावेळेला संधी हुकली आणी आता अशी संधी मिळणे नाही हे पाहुन ईव्हळणे चालु आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रम्प गुरुवार, 04/04/2019 - 18:02
बरखा , राजदीप यांचे ग्यान ओसांडून वाहत होते म्हणून त्यांना पद्म डिलेत का ? रोख तुमच्या वर नाही , पण हा प्रश्न मला खूप दिवस त्रास देताय :)

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे गुरुवार, 04/04/2019 - 19:31
प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे आपल्या बाहेच्या अंगणात पाळून ठेवत असतात म्हणजे मग बाहेरून कोणी त्रास देऊ लागला कि आपण काहीही न करताहि तेच भुंकून आपले काम करत असतात. ता क :- याचा वरील कोणत्याही प्रतिसादाशी संबंध नाही

In reply to by कंजूस

बाप्पू Wed, 04/03/2019 - 16:03
सामान्य लोक कधीच म्हणणार नाहीत कि आम्ही समाधानी आहोत. ते 25 वर्ष्यापुर्वी देखील समाधानी नव्हते आणि इथून पुढच्या 25 वर्ष्यानंतर देखील समाधानी नसणार आहेत. कारण त्यांची बुद्धीच सामान्य आहे.

कंजूस Wed, 04/03/2019 - 19:24
खरं म्हणजे राजने निवडणूकीत उतरायला पाहिजे. संसदेत बोलायला मिळणाऱ्या माइक्रोफोनची वट वेगळीच आणि चौकातल्या माइकची वेगळी. उर्मिला मातोंडकर काय जोरदार बोलतेय.

In reply to by कंजूस

सोन्या बागलाणकर गुरुवार, 04/04/2019 - 04:38
माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत जातात? हे मला माहीतच नव्हतं. मी आपला उगाच समजत होतो की लोकांची कामं करायला त्यांना लोक निवडून देतात.

In reply to by तेजस आठवले

बाप्पू Wed, 04/03/2019 - 22:16
उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?
दोन गोष्टी .. 1) उर्मिला मातोंडकर यांनी मोहसीन मिर यांच्याशी काही वर्षांपूर्वी निकाह केला. आणि 2) उर्मिला जी यांनी एका मध्ये प्रवेश केला.. आणि आता निवडणूक लढवत आहेत आता बातमी क्रमांक 1 आणि 2 यांच्यावर विचार केला तर समजेल कि उर्मिला बानो कोणत्या पक्षात जाणार.. उत्तर सोपे आहे.. - आपली तीच.. सेकुलर वादी आणि शांतता धर्मप्रिय खांग्रेस..

In reply to by कंजूस

भंकस बाबा गुरुवार, 04/04/2019 - 08:43
धर्मान्तर केल्यावर साक्षात्कार होतो की आपण इथे एकटे पडतोय, कारण घरात मुक्त वातावरणाला बंदी! मग बोलायचे कशावर घरातील इतराशी? कारण चर्चा करायला गेले तर पवित्र पुस्तकातील दोन तीन श्लोक कानावर पडतील, आणि आपल्या रंगील्या बानो इथे कमी पडतात ना! मग चला बाहेर, आपण या घरात किती सुखी आहोत ते दाखवू, (पक्षी आपला निर्णय चुकला नाही हे पटवून देउ) बाकी कोंग्रेसने जाहिरनामा अगदी थाटात परोसला. काश्मीरला भारतापासुन तोडायची धोरणे आखताना काश्मीरी पण्डिताविषयी चकार शब्द या जाहिरनाम्यात नाही, म्हणजे देशभर तुम्ही टिळा लावून व रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणार पण जिथे हिंदू धर्माविषयी प्रश्न उभा राहिला की घुमजाव करणार! वाह रे खान्ग्रेसी एक प्रश्न , उर्मिलाबाई आपल्या जुन्या नावाने निवडणूक लढवत आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तिला असली नाव प्रचारात वापरायला भाग पाडू शकतो का?

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 10:35
किरीट सोमय्याना सेनेचा इतका कडाडून विरोध कशासाठी होता? कोणी सांगेल का ज्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे त्यावरून असे दिसतेय की भारतापुढे आरोग्य सेवा,पाणी , शिक्षण ,रोजगार औद्योगीक प्रगती वगैरे प्रश्नच शिल्लक नाहिय्येत. हिंदी भाषीक पट्ट्यात तर विकास होऊन गेलेला आहे. लालू , तेजस्वी, मुलायम बुवा बबुवा यांचाच काय तो प्रश्न आहे असे वाटतेय. नदीजोड प्रकल्प हा पुर्ण विस्मरणात गेलाय.

mayu4u गुरुवार, 04/04/2019 - 10:43
निवडणुकांचा प्रचार ही फार मौजेची गोष्ट आहे. कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. तरीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या शासनाने आपापल्या कार्यकाळात केलेली कामं बघून जनता मत देईल अशी आशा करूया.

In reply to by mayu4u

गोंधळी गुरुवार, 04/04/2019 - 16:50
कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. हा विकास कोण आहे? २०१४ ला त्याचा खुपच बोलबाला होता. गुजरात मधिल निवडणुकांच्या वेळी तो वेडा झाला व तो हरवला आहे अस ऐकले होत.

कंजूस गुरुवार, 04/04/2019 - 16:11
नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं, नवीन सरकारला प्रथम BSNL चे पावणे दोन लाख आणि MTNLचे पन्नासेक हजार कर्मचाऱ्यांचं करायचं काय हे सोडवावं लागेल. Bsnl/ mtnl कडे 4G चे वांधे आणि युएस/साउथ कोरिआत 5G सुरु झाले काल. डिसेंबरपर्यंत पन्नासेक शहरांत येणार. ३०० Mbps+ speed.

दुश्यन्त गुरुवार, 04/04/2019 - 16:29
उर्मिला मातोंडकर हेच तिचे असली नाव आहे आणि ती आपल्या असली नावानेच निवडणूक लढत आहे. आपले नाव काय असावे हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे.नियमानुसार त्यासाठी जे काही कागदपत्रे (ओळखपत्र , ऍफिडेव्हिट वगैरे) तिला आयोगाकडे द्यावेच लागते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रिया दत्त, पूनम महाजन, पंकजा मुंडे हि राजकीय क्षेत्रातली काही नावे. राजकीय, फिल्म आणि एकूण सर्वच क्षेत्रात स्त्रिया आपले माहरेचे नाव वापरतात हे काही नवीन नाही . बाकी दोन भिन्न धर्मीय व्यक्तींनी लग्न केले म्हणजे धर्मांतर केलेच पाहिजे असे काही नाही.

In reply to by स्वलिखित

बाप्पू गुरुवार, 04/04/2019 - 19:13
वायनाड मध्ये रोड शो मध्येशांततावादी लोक हिरवे झेंडे घेऊन नाचत होते.. यावरून समजून घ्या कि राहुल यांनी हीच सीट बॅक अप म्हणून का निवडली असेल..

In reply to by तेजस आठवले

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 17:48
ती बातमी त्यांनी एप्रील फूल म्हनून छापली होती. बातमी खाली तसा उल्लेख केलेला आहे.

In reply to by विजुभाऊ

तेजस आठवले गुरुवार, 04/04/2019 - 18:18
कुबेरांनी त्यांची नेहमीची फालतुगिरी चालू ठेवतानाच ही नवी फालतूगिरीपण चालू केली का... चान चान

ट्रम्प गुरुवार, 04/04/2019 - 18:20
या निवडणुकीत भाजप ची कसोटी आहे हे मात्र निश्चित !! तसेच या निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात मध्यमवर्गीय ( टैक्स बेनिफिट ,देश प्रेम मुळे ) भाजप च्या बाजूने तर गरीब व शेतकरी वर्ग ( ज्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही ) काँग्रेस व इतर च्या बाजूने होण्याची शक्यता वाटते . मोदी सरकार ने बदल घडवीण्यास ( इंफ्रास्ट्रक्चर ) सुरवात केली पण गरीबांना अपेक्षित आर्थिक ( भरपूर योजना सुरु करून देखील ) बदल झालेला वाटत नाही . अल्पसंख्यक आणि दलित समाज या वेळी रागा च्या एड्याचाळ्यानां पाठीम्बा देण्याची शक्यता वाटते . बाहेर फिरताना बरेच जण मोदींच्या विरोधात बोलताना आढळतात .

In reply to by ट्रम्प

बाप्पू गुरुवार, 04/04/2019 - 19:38
मला असे वाटतेय कि निरीक्षण चुकतेय आपले. जितक्या लोकांना मी भेटलो त्यांच्यापैकी आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्ग, आणि उच्च वर्ग हे दोन्ही मोदींच्या बाजूने दिसले. यामध्ये बरेचसे लोक हे नोटबंदी ला फासलेला निर्णय मानत असले तरी त्यामध्ये मोदींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत नाहीत. इतर इन्फ्रा स्ट्रक्चर च्या कामामबत, सरंक्षण, कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि स्वछता याबद्दल मोदींची स्तुती आणि पाठराखण करतात. बाकी शेतकर्याबद्दल बोलायचे झाले तर 50-50 आहे. बरेचसे शेतकरी हे मोदींच्या बाजूने दिसतात. याला कारण म्हणजे पाणी आणि वीज याचा वाढलेला आवाका. मला अजूनही आठवतेय कि पुण्यापासून फक्त 20 काम च्या अंतरावर असलेल्या गावी 5 वर्ष्यापुर्वी 18-18 तस लोड शेडींग असायचे. पण आता अगदीच नगण्य प्रमाणात लोड शेडींग आहे. हा आणि असे इतर बरेचसे बदल ज्यांना समजले ते मोदींच्या बाजूने बोलताना दिसतात. जे शेतकरी एका दिवसात कर्जमाफी आणि एका दिवसात जादू होऊन शेतमालाला दुप्पट तिप्पट भाव मिळेल या आशेवर असतात ते मोदींना शिव्या घालतात. आर्थिक दृष्ट्या गरीब, सतत सरकारने काहीतरी फुकट द्यावे अशी अपेक्षा करणारे खूप लोक भारतात आहेत. आणि बरेचसे दलित लोक ज्यांना कितीही केले आणि काहीही झाले तरी आपल्यावर नेहमीच अन्याय होतो असे वाटत राहते. असे लोक यावेळी मोदींच्या विरोधात आहेत. पण ते त्या पक्षाला मतदान करतील जे त्यांच्या ह्या समस्या 65 वर्ष्यात सोडवू शकले नाहीत. या सर्वांना टार्गेट करण्यासाठी तर राहुल गांधी उर्फ खान यांनी महिना 12000 रुपये खैरात देण्याची घोषणा केली आहे. भाजपा च्या थोड्याफार जागा कमी होतील पण पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे वाटते.

In reply to by ट्रम्प

ढब्ब्या गुरुवार, 04/04/2019 - 20:20
नंबर चा विचार केल्यास, ऊप मध्ये भाजपा २५ एक सीट गमवेल पण बंगाल आणि तामिळ्नाडू सारख्या ठिकाणी ह्या भरुन निघतील वाट्टय. गुजरात, महा, राजस्थाह, मप्र ह्या बेल्ट मध्ये भाजपा ला थोडा फटका बसेल पण फार काही नुकसान होइल असे वाटत नाही. त्यामुळे कदाचीत त्यांच्या सीट आहे तेवढ्याच रहतील आसं वाटतय. खांग्रेस मात्र उप्र मध्ये पुर्ण झोपेल अस वाट्टय. पण केरळ आणी बाकी राज्यात स्तिथी बरी असेल. पण एकूण २०-२५ जास्ती सिट मिळ्तील कदचीत. अर्थात हा माझा अंदाज, सद्य स्थिती बघून ... एकूणात भाजपा परत सत्तेत येइल जर खांग्रेस आणी ईतर मध्ये मतविभागणी झाली तर. बाकी खांग्रेस चा मॅनिफेस्टो बघुन कुंपणावरचे काही भाजपा कडे वळले तर बरय.

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क Fri, 04/05/2019 - 02:50
विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुद्दे बघता मतदारांना प्रलोभन दाखवून गळाला लावण्याचा सरळसरळ प्रयत्न दिसून येतो आहे. महिन्याला ६ ते १२ हजार देण्याचे कबूल केलं आहे म्हणजे असे लोक ज्यांना याचा अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे कळत नाही किंवा इतर काही ज्यांना घेणेदेणे नसते अश्या लोकांची मते खिश्यात घालण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारचा प्रयोग दोन लाख कर्ज माफ करण्याचे वचन देऊन मप्र, राजस्थान मध्ये केला आहे आणि त्याला बळी पडल्यामुळे मतांची टक्केवारी कमी न होऊनसुद्धा भाजपला कमी जागा मिळाल्या. AFSPA , १२४ अ रद्द करणे आणि ३७०, ३५ अ रद्द न करणे हे मुस्लिमांना तसेच तुकडे गॅंगला त्यांचे पुढील आयुष्य त्यांचा अजेंडा राबवत सुखाने जगता येईल याचे आश्वासन आहे. याचे परिणाम ज्यांना फारसे समजत नाहीयेत किंवा समजले तरी काही घेणंदेणं नाहीये असे लोक पण काँग्रेसला मतदान करतील. तसेच NRC रद्द करण्याच्या आश्वासनामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सुद्धा चांगली मते मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसला बऱ्यापैकी सीट्स मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बहुमत मिळणे अशक्य आहे पण याचा परिणाम म्हणजे कडबोळ्याचे सरकार येणार. १९७७ आणि १९८९ चा इतिहास परत गिरवला जाणार का हे लवकरच कळेल. मी तर म्हणतो लोकांनी भाजपाला परत २ जागांवर आणून ठेवावं. भारतीय जनतेला फक्त माझा फायदा काय हेच महत्वाचं आहे, त्यामुळे हे इतर पक्ष त्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. बाकी देशाचे तुकडे होउदे, दहशतवादी हल्ले होउदे नाहीतर इस्लामिक स्टेट होउदे आपल्याला कर्जमाफी मिळतेय, पेट्रोल स्वस्त मिळतंय वर १२००० रुपये पण मिळत आहेत. अजून काय पाहिजे?

In reply to by ट्रेड मार्क

ट्रम्प Fri, 04/05/2019 - 14:38
या वेळी खरच भाजप चे सरकार आलेच नाही पाहिजे !! मस्त पैकी सीरिया / येमेन सारखी यादवी , पेट्रोल संपन्न व्हेनझुयेला सारखे खायचे वांदे , पाकिस्तान सारखे अल्पसंख्यक चे धार्मिक उछाद वाढले पाहिजेत . त्याच प्रमाणे जंगला मध्ये हाइना हा प्राणी जसा विचित्र आवाज काढून जीवंत हरिण ला पोटा पासून खायला सुरवात करतो आणि मग थोड्या वेळाने ते हरिण हळू हळू मृत्यु अवस्थे ला पोहोचते तशी अवस्था भारतातील मतदारांची झाली पाहिजे , कारण ग्लानी अवस्थेत वेदना जाणवणार नाही व सुखद मृत्य येईल !! पुढील निवडणुकीत भाजप चा पराभव होणार हे गृहीत धरून आदरणीय बंगाली बानो ,रागा , आदरणीय माया आणि हावेच अंदाज घेवून टोपी फिरवनारे काका यांच्यात पंतप्रधान पदावरुन सूचक इशारे सुरु झाले आहेत . गरीब लोकांचा उद्धार फक्त हीच मंडळी करु शकतील याची गरीबानां खात्री झालेली आहे . त्यामुळे येवूदयाच सर्व पक्षीय सरकार .

In reply to by ट्रम्प

ढब्ब्या Fri, 04/05/2019 - 19:34
उपहास म्हणून तुमचे मत ठीकाय, पण भारताची लोकसंख्या आणी लोकसंखेची घनता बघता, एक काडी पण यादवी सद्रुश्य परीस्थिती आणू शकते. कणखर आणी सक्शम नेत्रुत्वचीच (पण हुकुमशाही नाही) गरज आहे. कुठल्याही प्रकारे देश पोखरला जाउ नये हे महत्वाचे, जे तिसरी आघाडी किंवा खांग्रेस च्या राजवटीत घडू शकते असे वाटते.

In reply to by ढब्ब्या

सुबोध खरे Fri, 04/05/2019 - 19:52
महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात अजिबात पटत नाही. त्यामुळे त्यांचे सरकार आले तरी ते दीड ते दोन वर्ष पेक्षा जास्त चालणार नाही. मोदी साहेबानी मधल्या पातळीवर बरेच ठिकाणी प्रामाणिक अधीकारी आणून बसवलेले आहेत या लोकांना हटवून त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील लोकांना आणण्यासाठी वेळ लागेल. श्री मोदी यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याला हात लावलेला नाही कारण "राजकीय सूडाचा" मोठा अपप्रचार करून सहानुभूती मिळवता येते हे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्रीमती जयललिता यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे श्री मोदी यांनी मोठ्या नेत्यांना हात न लावता त्यांच्या चेल्या चमच्यांचा विरुद्ध मोहीम चालवली आहे. त्या लोकांना वाचवण्यासाठी या महाठगबंधनच्या नेत्यांना कष्ट करावे लागतील. याना वाचवले नाही तर कार्यकर्ते नाराज होतात आणि वाचवायचे तर जास्त कष्ट पडतात. आपण म्हणताय तेवढे महाठगबंधनच्या लोकांना आता पैसे खाणे सोपे जाणार नाही. एक तर सामान्य माणसांना पेड मीडिया बद्दल खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी किती गुणगान केले तरी महाठगबंधनची लायकी लोकांना माहिती आहे. शिवाय सोशियल मीडिया मुळे आजकाल खाबू माणसांना धाक बसला आहे. त्यातून श्री मोदी यांनी अनेक लष्करी कंत्राटे शेवटच्या दोन वर्षात दिलेली आहेत ती पूर्ण होईपर्यंत नवी कंत्राटे देता येणे सहज शक्य होणार नाही. दरमहा ६ हजार रुपये हे २०% गरिबांना देणे हा अशक्य गोष्ट आहे हे सर्वच नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जसे कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा देऊन मध्य प्रदेशात आणि राजस्थान मध्यें काँग्रेस निवडून आली तिथे आता कर्जमाफी प्रत्यक्षात न आल्याने भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे तळागाळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती दोन वर्षांनी फेर निवडणूक झाल्यास होईल. त्यातून आता राज्यसभेत भाजपची गणसंख्य जास्त झाल्याने महाठगबंधनला कोणताही कायदा पास करून घेणे( उदा. AFPSA रद्द करणे) सहज शक्य होणारच नाही. मी तर म्हणतो सध्या भाजप पडली आणि महाठग बंधन निवडून आले तर बरंच होईल. कारण २ वर्षात भ्रमनिरास होऊन भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल निवडणुकीचा खर्च सामान्य माणसांच्या बोडक्यावर बसेल पण जर आपली लायकी तीच असेल तर तसेच सही.

In reply to by सुबोध खरे

ढब्ब्या Fri, 04/05/2019 - 21:09
तरी पण गुजराल, देवेगौडा सरकारचा ईतिहास पाहता, महाठगबंधन नकोच. नंतर च्या सरकार चा अर्धा वेळ घाण निस्तरण्यातच जाणार.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ Fri, 04/05/2019 - 22:33
अंशःत सहमत ! ज्या पद्धतशीर प्रमाणे ठरावीक मिडीया , संघटना व पक्ष, हिंदु समाजा विरुद्ध पब्लिकली गरळ ओकत आहेत त्यावरुन त्यांच्या पार्श्वभागावर चटके बसत आहेत हे स्पष्ट आहे !!

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Sat, 04/06/2019 - 10:53
पक्षीय बलाबल बद्दलची माहिती: http://164.100.47.5/Newmembers/partypositionsummary.aspx. मोदींच्या विरोधाला काहीही किंमत देण्याची कुणाला गरज वाटणार नाही. बाकी मोदी कोणत्या लोकांच्या मागे हात धुवून लागले त्याची माहिती जाणून घ्यायला आवडेल. सदा सर्वकाळ परदेश दौरे, निवडणूक प्रचार, संसदेतदेखील प्रचारकी थाटाची भाषणे या व्यतिरिक्त काही त्यांनी केले असेल तर बरेच आहे. लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल बाधित होणाऱ्या लोकांच्याच मताचा विचार व्हावा असे मला व्यक्तिशः वाटते. अगदी पुण्यात देखील बोपखेल, घोरपडी गावच्या लोकांच्या भावना लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल इतरांच्या भावनांपेक्षा वेगळ्या असतील.

In reply to by सर टोबी

विनोद१८ Wed, 04/10/2019 - 23:13
.......सदा सर्वकाळ परदेश दौरे मोदींच्या मनात आले आता बर्याच दिवसात गोट्या खेळलो नाही कि लगेच चालले अमेरिकेला ट्रुम्प बरोबर, इस्राईल मध्ये नेत्यानाहु बरोबर आणि तिकडे जापानमध्ये तो शिन्जो आबे हे सगळे निरोद्योगी लोक्स अगदी वाटच बघत असतात मोदीची, हा मोदी इकडे आमच्याकडे येतोय कधी आणि आपण त्याच्याबरोबर गोट्या खेळतोय कधी. अर्थात ही मोठी माणसे आपसातच खेळ्नार विरंगुळा म्हणुन. माझातर्फे या गोट्यापंडीताचा णिषेद.

In reply to by कंजूस

ट्रेड मार्क Fri, 04/05/2019 - 03:16
काँग्रेसने दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करायचं म्हणलं तर साधारणपणे २० लाख कोटी लागतील असा अंदाज आहे भारताचं टोटल बजेट २१.५ ते २२ लाख कोटी आहे. म्हणजे सगळी कर्जमाफी, ७२००० रुपये, सबसिड्या वगैरे देऊन सुद्धा जवळपास २ लाख कोटी उरतातच की, मग अजून काय पाहिजे? होऊ द्या खर्च, भरपूर पैसा आहे आपल्याकडे. त्यातूनही वर लागलेच तर मनमोहन सिंगांसारखे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री आहेतच, ते भारी आयड्या काढून बक्कळ पैसे मिळवून देतील. तसा नाईलाजाने का होईना पण इमानेइतबारे आयकर भरणारा मध्यमवर्ग आहेच. एक १०-१५% टॅक्स सहज वाढवता येईल. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सॅम पित्रोदा यांनी सांगितलं आहे की मध्यमवर्गाने स्वार्थी बनू नये. मोठ्या मनाने त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरीब लोकांना वाटण्यासाठी वाढीव कर द्यायला काय हरकत आहे? संपूर्ण चर्चा इथे बघा. जीएसटीची एकच स्लॅब करण्याचे पण रागानी आश्वासन दिले आहे. म्हणजे जर सरसकट सगळ्या वस्तू १२% नी लावल्या तर कितीतरी उत्पन्न वाढेल. आहात कुठे?

डँबिस००७ गुरुवार, 04/04/2019 - 20:57
पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना यु ए ई चा उच्चतम पुरस्कार झायेद मेडल गौरवण्यात आलेल आहे. यु एन ओ, अमेरिका, युरोप मधले देश त्यानंतर मध्य पुर्वेतले देशांवर पंत प्रधान नरेंद्र मोदीजीं नी काय जादु केलेली आहे कोण जाणे की एका पेक्षा एक वरचढ पुरस्कार हे देश मोदीजींना देत सुटलेले आहेत. https://www.khaleejtimes.com/international/india/narendra-modi-responds-after-uae-awards-him-zayed-medal

गामा पैलवान Fri, 04/05/2019 - 01:42
लोकहो, नाहीतरी चौकीदार चोर आहे असं म्हणतोच ना पप्पू, मग मोदी चारसोबीस झाले ना? म्हणजेच मोदींना येत्या निवडणुकीत ४२० जागा मिळणार हे पप्पूच सांगतोय. आ.न., -गा.पै.

ट्रम्प Fri, 04/05/2019 - 22:33
या कलाकरांच्या टोळक्या तील कित्तेकानां कुत्री सुद्धा ओळखत नसतील . नासिररूद्दीन च्या नावा बद्दल अपेक्षा होती पण आश्चर्य वाटले पटवर्धन , देशपांडे , आणि पालेकर चे . सामान्य लोकांना लोकशाहीवरचा धोका आज पर्यन्त दिसला नाही मग यांना कसा क़ाय दिसतो ? vote against bjp: भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन http://mtonline.in/HmsTyZ?

In reply to by ट्रम्प

गामा पैलवान Sat, 04/06/2019 - 14:53
ट्रम्प, बातमीबद्दल धन्यवाद! बातमीत म्हटलंय की कलाकारांच्या मते भाजपमुळे भारतीय संविधान धोक्यात आलंय. पण मग हेच कलाकार नक्षलवाद्यांचा निषेध का करंत नाहीत? जो पक्ष ( म्हणजे मोदी) घटनादत्त मार्गाने राजकारण करतोय त्याच्या विरुद्ध विनाकारण बोंबा ठोकायच्या. आणि त्याच वेळी जे नक्षलवादी भारतीय घटना उघडपणे नाकारून हिंसक मार्ग चोखाळतात त्यांना मात्र पाठींबा द्यायचा. याचा अर्थ असा की उपरोक्त कलाकारांना भारतीय संविधान कोलमडायला पाहिजे. कोण घटनाद्रोही आहे ते कळलं ना? आ.न., -गा.पै.

In reply to by ट्रम्प

विनोद१८ Wed, 04/10/2019 - 23:35
......या फुकट्यांचे विविध पदावर वर्णी लागणे, फुकटचे मिरवणे, दिल्ली दरबारी चापलुसी करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे फुक्कट सरकारी खर्चाने फुक्कट चरणे, झालेच तर सरकारी महामंडळातर्फे परदेशी प्रवास वगैरे चंगळ आता २०१४ नंतर बंद झाली आहे, तेव्हा ते मोदीसरकारला शिव्याशापच देणार, या सर्व फुकट्खाऊंची खरी पोट्दुखी हीच आहे की मोदी यांच्यासमोर चार उष्टेखरकटे दाणेसुद्धा टाकत नाही. दुर्लक्ष करा, यांचे सिनेमे पाहणे बंद करा. असे वाळीत टाकले तरच सरळ होतील.

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 11:51
पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा खोटा - अमेरिकन नियतकालिक https://www.bbc.com/marathi/international-47829521 -- ही बातमी एक अफवा असल्याचे भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे. जर का वरिल बातमी अफवा असेल तर भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही हा एक प्रश्नच आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Sat, 04/06/2019 - 15:07
भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही अस करता येणार नाही कारण भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी एफ १६ पाडल पण ते पाकिस्तानच्याच भुमीत जाऊन पडल . ज्यावेळेला अभिनंदनच्या मिग २१ बायसन ह्या विमानाचा पाठलाग करत होते तेंव्हा पाकिस्तानी एफ १६ च्या मागोमाग मिग २१ बायसन सुद्धा पाकिस्तानी हद्दीत घुसल, ते मिग २१ बायसन विमानाच्या जुन्या तंत्रा मुळे वैमानिकाला समजु शकले नाही. अभिनंदन असेच समजत राहीला की तो भारताच्या हद्दीतच आहे. आता जर पाकिस्तानच्या विमानांचा पा ठलाग करावा लागला तर फारुख अब्दुल्ला सारख्या हलकट नेत्यांना मिग २१ बायसन विमाना च्या टपावर बांधुन घेऊन जावे लागेल. मग भारतीय वायुसेनेने शत्रुचे विमान पाडले की नाही ह्याचा आंखो देखा हाल त्या नेत्यांना उपलब्ध होईल

In reply to by प्रसाद_१९८२

Not aware’: Pentagon on Pak F-16 count after Feb aerial dogfight with IAF एफ-१६ पाडले नाही असे प्रसिद्ध करणारे नियतकालीक अमेरिकन सरकार किंवा पेंटॅगॉनचे अधिकृत मुखपत्र नाही. आपल्याकडे जश्या सोईस्कर बातम्या "छापून आणल्या जातात" त्यातलाच हा अमेरिकन प्रकार आहे. भारतिय वायूसेनेने पेंटॅगॉनकडे, (अ) एफ-१६ची रडारवरची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि (आ) पाकिस्तानी विमानाने सोडलेल्या AIM-120 AMRAAM मिसाईलचे भारतात पडलेले व क्रमांकासह असलेले अवशेष, असे दोन सज्जड पुरावे दिले आहेत आणि ते निर्विवाद आहेत. पेंटॅगॉनने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१६ची मोजणी केली असली तरी त्यासंबंधी माहिती उघडपणे देणे त्यांना फार गैरसोईचे आहे. कारण, आजतागायत जगभरातून अनेक देशांकडून मागणी असूनही, अमेरिका हे विमान फार थोड्या देशांना आणी तेही वापरण्यासाठीच्या अनेक अटींवर देते. असे आधुनिक विमान ६०-६५ वर्षे जुन्या (आणि तेही रशियन) विमानाने पाडणे हे... (अ) अत्यंत मानहानीचे आहे व (आ) भविष्यातल्या एफ-१६च्या विक्रिच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे, एखादे विकाऊ नियतकालीक पकडून अमेरिका दिशाभूल करू शकते. किंवा त्यापेक्षा जास्त शक्यता अशी आहे की, आपले नाक वाचविण्यासाठी पाकिस्तानने ही बातमी छापून आणली असावी. (बालाकोट हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झाले नाही, अशी बातमीही छापून आणली होती हे आठवत असेलच. नंतर परदेशी वार्ताहरांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवू असे सांगून, भेट तीनदा पुढे ढकलून, शेवटी ती भेट बारगळली; आणि सत्य जगासमोर आलेच.) आता, पेंटॅगॉनने (मोजणी केली असली नसली तरी) अशी काही मोजणी केली नाही असे सांगून, त्या नियतकालिकातील बातमी फेक असल्याचे दुरान्वयाने सांगितले आहे. पण, एफ-१६ पडले की नाही याबद्दल मौन पाळले आहे. विमान पाडले असे कबूल केल्यास, ते प्रकरण अमेरिकन काँग्रेससमोर जाऊन अमेरिकेला पाकिस्तानवर बंधने (सँक्शन्स) घालावी लागली असती व ते करणे सद्यस्थितीत अमेरिकेला परवडणारे नाही. कारण, अफगाणिस्तानमधून पाय काढून घेण्यासाठी तालिबानशी चाललेल्या वाटाघाटींसाठी अमेरिकेला अजूनही पाकीस्तानच्या मदतीची गरज आहे... त्यातले महत्वाचे तालिबानी गट पाकिस्तानची अपत्ये आहेत.

In reply to by महेश हतोळकर

त्यांनी मी वरच्या प्रतिसादाच्या तिसर्‍या परिच्छेदात लिहिलेले पुरावे दिले आहेत. हे पुरावे पेंटॅगॉनला, पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी, गोपनियरित्या अगोदरच दिले होते. मात्र, (अ) अमेरिकन नियतकालिकात, "पाकिस्तानमध्ये केलेल्या मोजणीत सर्व एफ१६ विमाने सुरक्षित आहेत असे दिसले", अशी दिशाभूल करणारी फेक न्युज पाकिस्तान (आणि ?पेंटॅगॉनने) छापून आणल्यामुळे आणि (आ) तिचे भारतिय राजकारणी आणि तथाकथित विचारवंत यांनी भांडवल करणे सुरू केल्यामुळे भारताला, अमेरिकेचा रोष झाला तरी त्याला झुगारून, पाकिस्तानला (आणि ?अमेरिकेला) उघडे पाडणे भाग पडले आहे. अमेरिकेला असे उघडे पाडण्यासाठी आणि तसे करताना एफ्१६ची बाजारातली किंमत करण्याचा निर्णय घेण्यासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती व धाडस यांची गरज असते... ते सद्य सरकारने दाखवले, याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटायला हवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महेश हतोळकर Tue, 04/09/2019 - 11:36
विद्यमान शासनाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हाच खरा मुद्दा आहे. विमान पाडलं, कारवाई केली, पुरावे दिले यापेक्षा शासनाचा जनतेला अभिमान वाटतो याचाच अनेकांना मस्तकशूळ आहे. तो वाटू नये यासाठीच हा सगळा गदारोळ सुरू आहे.

In reply to by महेश हतोळकर

आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक हल्ला करून सामर्थ्यवान राष्ट्राला न दुखावता आपले ध्येय साध्य करता येणे", हा सर्वात योग्य आणि जागतिक मान्यतावर्धक मार्ग समजला जातो... कारण, त्यामुळे जिथे जे संदेश पोचायला हवे असतात, ते तिथे पोचतात. :) सद्या भारताने स्विकारलेला मार्ग, शेवटचे सामंजस्यपुर्ण हत्त्यार असते. जेव्हा भारताने बालाकोटवर (पक्षी : पिओकेमध्ये नाही तर पाकिस्तानच्या सार्वभौम भूभागात ८० किलोमीटर आत जाऊन) हल्ला केला, पण तरीही, चीन व मुस्लिम राष्ट्रांसह एकाही देशाने भारताला दोष दिला नाही... तेव्हाच भारताने जागरिक स्तरावर पाकिस्तानवर मुत्सद्दी विजय मिळवला होता. आपले डावपेच उघड करण्याने (आंतरराष्ट्रिय स्तरावर) अधिक काहीच साध्य होणार नव्हते. पण, पाकिस्तानच्या आणि चुकार भारतियांच्या नाठाळपणाला उपाय म्हणून तसे करावे लागले. किंबहुना, ते डावपेच जाणण्याची सर्वात जास्त जिज्ञासा व गरज पाकिस्तानला आहे... व काही मूर्ख भारतीय, स्वार्थी हितसंबंधांसाठी, (व ते पाकिस्तानला कळले तरी बेहत्तर पण) ते उघड व्हावेत यासाठी गदारोळ करत आहेत. युद्धशास्त्रातला एक महत्वाचा नियम असा आहे : "आपल्या 'न केलेल्या' आणि 'यशस्वीरित्या केलेल्याही' कारवायांच्या डावपेचांचा सुगावा शत्रूला न लागू देता, त्याला सतत गोंधळात ठेवणे, म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे."

In reply to by विनोद१८

हे त्यांना चांगले माहीत असते, पण स्वार्थापुढे देश आणि स्वत सोडून इतर सर्व खड्ड्यात गेले तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसते. इतके निर्लज व निर्ढावलेले मन असल्याशिवाय, गरिबांच्या आणि इतर नागरिकांच्या विकासासाठी, इतकेच काय तर गरोदर स्त्रियांसाठी आणि कुपोषित बालकांच्या पोषणासाठी असलेला कराचा, पैसा सहजपणे खाणे कसे शक्य होईल ???!!!

भंकस बाबा Sat, 04/06/2019 - 11:54
पुण्यात एका युवा मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना पप्पू साहेब बरळले की न्याय योजनेला पैसा परदेशी पळालेल्या भगोडयाकडून आणून गरीबाना वाटला जाईल, धन्य त्या कोंग्रेस पक्षाची आणि रागा तर धन्य आहेच. पण कमाल एका गोष्टीची वाटली की पुण्यात तरुण वर्गाने असे भतुले ऐकून घेतले, एकाही श्रोत्याने यावर आक्षेप नोंदवला नाही? कारण नीरव मोदी, माल्या , चोक्षी असे किती पैसे घेऊन पळाले आहेत की या न्याय योजनेच्या अजगराला पूरे पडतील?

मराठी_माणूस Sat, 04/06/2019 - 12:28
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/chai-pe-charcha-village-says-word-not-kept-will-use-nota-to-protest/articleshow/68747434.cms कोणीही आले तरी ह्या लोकांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?

स्वामि १ Sat, 04/06/2019 - 17:19
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या

In reply to by स्वामि १

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 17:53
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या -- हा तर खूप जुना फंडा झाला. आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))

In reply to by स्वामि १

ट्रेड मार्क Sun, 04/07/2019 - 05:57
शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकला होता काय? लोकसभेची निवडणूक देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवते. प्रादेशिक भाषा आणि राज्यासाठी प्रत्येक राज्य विचार करत बसलं तर कसं सरकार येईल याचा काही विचार केला आहे का? प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी विधानसभेच्या निवडणूक आहेत.

स्वामि १ Sat, 04/06/2019 - 17:38
मराठी व महाराष्ट्रा वर परप्रातीयांचे आक्रमक झाले असून मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे म्हणून जो मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा

In reply to by स्वामि १

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 17:56
मराठी भाषा व महाराष्ट्राचे 'नवनिर्माण' करायची प्रतिज्ञा घेतलेला पक्ष यंदा निवडणुकच लढवत नाही आहे ना. नाहितर केले असते त्याला मतदान.

In reply to by प्रसाद_१९८२

बाप्पू Sat, 04/06/2019 - 20:57
हो ना.. मराठी चा ठेका घेतलेले आदरणीय ठाकरे साहेब हे यंदा बारामतीच्या काकांचा प्रचार करणार आहेत. तसें कॉन्ट्रॅक्ट साइन झालेय.. त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत काहीतरी सेटलमेंट करायची असेल.. असो. हेच राज ठाकरे छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे इ विरुद्ध अगदी बेंबी च्या देठापासून बोंबलत होते.. आता त्याच लोकांना निवडून आणण्यासाठी सभा घेणार आहेत म्हणे. मनसे सैनिकांचा ( राज ठाकरे गुंड सेना ) मेंदू तपासून घेतला पाहिजे.. कारण ते अजूनही राज ठाकरे यांच्या माकड उड्यांवर टाळ्या वाजवतायत...

In reply to by बाप्पू

ट्रम्प Sun, 04/07/2019 - 10:22
अहो त्यांच्या सभेला होणारी गर्दी मनसे ला मतदान करत नव्हती तर काँग्रेस आणि चलाख काका ला मतदान करील याची काही शाश्वती नाही. एका परिने राज जितके मोदींच्या नावाने बोम्बलतिल तितके भाजप सेने चे मतदारा वाढतील . कारण राज ठाकरे ला माणनारा वर्ग हा उजव्या विचारांचा , देश व धर्म यांना प्राधान्य देणारा , सुशिक्षित आणि आर्थिक दुष्टचक्रातून बाहर असलेला आहे , त्यामुळे राज नी जरी टोपी फिरवली तर राज ला फिरवायला या वर्गाला वेळ लागणार नाही . राजकारणात वाटचाल करताना जरी त्यांची व्यूवरचना चुकली असली तरी प्रतिमा खराब न होवू देता त्यांनी पुन्हा भरारी घेणे अपेक्षित होते , पण तसे न करता एखाद्या पाळीव प्राण्या सारखे काकांच्या ईशाऱ्या वर मोदिवर ओरडत सुटले आहेत . बर मोदींच्या विरोधात साथ कोणाची देत आहेत तर कुप्रसिद्ध काँग्रेस आणि रा कॉ ची ? या दोन पक्षा बद्दल राग असणारे राज च्या आवाहनावरुन कशा वरुन त्या दोन बदनाम पक्षाला मतदान करतील ? त्यांच्या या दुहेरी व्यक्तिमत्वचा धिक्कार करणारे मनसे चे कार्यकर्ते मनसे सोडून केव्हाच गेले आहेत .

गोंधळी Sat, 04/06/2019 - 18:50
सध्या भरतीय जनतेला २०१४ च्या मानाने कठीण परिस्थिती आहे. कमकुवत व स्क्शम नस्लेला (पुर्विचा भ्रष्टाचारी) विरोधी पक्ष तर दुसरीकडे बहुमत मिळुनही फारस काही करु न शकलेला (जुमलेबाज व फेक)सत्ताधारी पक्ष.

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Sat, 04/06/2019 - 22:22
जुमले परवडले????? सामान्य भारतीय जनतेला नाही परवडनार. तुम्ही असाल हो असामान्य. हिरवळ नको असेल तर त्यांना ग्रुहमंत्री करा पण पंतप्रधान नकोच.

In reply to by गोंधळी

भंकस बाबा Sun, 04/07/2019 - 07:35
15 लाख न मिळाल्याचे दुःख तुमच्या प्रतिसादातून ओसंडून वहात आहे. हिरवळ फोफावण्याचे कारण आपल्या पप्पूच्या पार्टिची धोरण आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला हे ही नसे थोडके! आता जरा रागाच्या जाहिरनामा तपासू. हे जे फुकटचे खैरात वाटायचे चालले आहे ते फार वर्षापूर्वी ग्रीस या देशाने करून बघितलेले आहे. परिणाम आज त्यांची अर्थव्यवस्था गंटागळ्या खात आहे. गोंधळी साहेब तुम्ही आयकर भरत असाल अशी अपेक्षा करून हे बोलन्याची हिम्मत करतो की तुम्हालाच पिळून हे खैरात वाटणार आहेत. राहिली गोष्ट तुम्हाला न मिळालेल्या 15 लाखानी तुमचे माझे काही नुकसान झालेले नाही. ( 15 लाख देणार हे मोदिनी कुठेही म्हटलेले नाही)

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Sun, 04/07/2019 - 11:40
बहुधा तुमचा अभ्यास कमी दिसतो आहे़. जुमले - नोकरर्या देणे,उज्वला योजना,विमुद्रीकरण्,स्वच्छ भारत्,मुद्रा लोन्,मेक इन इंडिया,.......... अर्थव्यवस्थे बद्दल बोलता मग प्र.मं.आ.यो. अंतर्गत २लाख वाटले जातायत त्याचे काय? शेतकर्यांना ६ हजार वाटले त्याच काय? हे तुम्हाला पटते काय? RBI वर पैसे देन्यासठी दबाव का आणावा लागला? खर बोलणार्याला देशद्रोहि ठरवण्यात येत आहे. सरकारच चुका व अपयश दाखवणारर्या माध्यमांवर दबाव आणला जात आहे. सरकारच्या विरुद्ध जाणारी महिती बाहेर येउ दिली जात नाही आहे.खोटी महिती दिली जात आहे. आता ही विकास करनण्याबद्द्ल,.बेरोजगारि बद्द्ल काहीच बोलत नाहि आहेत. मी मान्य करतो की भारतीय जनता जास्त भावनाशील आहे.त्यामुळे आपल जास्त नुकसान झालेल आहे. पण आता फक्त मनाने विचार न करता बुद्धीला पटेल ते केल पाहिजे.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Mon, 04/08/2019 - 07:21
किती गोंधळ घालताय. नोकऱ्या देणे: एकच उदाहरण देतो, तुमच्या लाडक्या राफेल प्रकरणात रिलायन्सला एवढं मोठ्ठ कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यांनी कंपनी स्थापन सुद्धा करून फाल्कन विमानाचे सुटे भाग तयार सुद्धा करायला सुरुवात केली. मग तिथे काय अनिल अंबानी आणि त्याचे कुटुंब स्वतः सगळी कामं करतेय का? नोकऱ्या तयार झाल्या नाहीत? बरं जिथे फॅक्टरी आहे तिथे वाहतूक करणारे, भजी तळून आणि चहा बनवून लोकांच्या खाण्याची व्यवस्था करणारे वगैरेंना रोजगार मिळाला नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... अगदी गंगेतून होणाऱ्या जलवाहतुकीपासून सरदार पटेलांच्या पुतळ्यापर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट रोजगार देण्याचे आश्वासन देता येऊ शकते पण नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन कोणी कसे देऊ शकेल? मोदींनी २ कोटी "नोकऱ्या" देण्याचे आश्वासन दिले होते याचा काही पुरावा द्याल का? प्रधान मंत्री आवास योजना: २ लाख काय खैरातीसारखे वाटले जात नाहीयेत. जर निम्न उत्पन्न गटातील लोकांना जर स्वतःचे घर घ्यायला मदत मिळत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटतंय? संपूर्ण घर फुकट देत नाहीयेत तर थोडी मदत करत आहेत. यात मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांपैकी कोणी घोटाळा केला असेल तर ते सांगा. बादवे प्रगत देशांमध्ये सुद्धा पहिले घर घेणाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारी मदत मिळते. शेतकऱ्यांना ६ हजार: वर्षाला ६ हजार रुपये बीबियाणे आणि इतर खर्चासाठी मिळणार आहेत. हे सुद्धा सरसकट वाटले जात नाहीयेत. यात घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या. कोण कोणाला देशद्रोही ठरवत आहे? खरं बोलणाऱ्याला म्हणजे कोणाला? जे तुम्हाला खरं वाटतंय ते मला नसेल वाटत तर? पण तरीही भाजप किंवा सरकारने असे "खरं" बोलणाऱ्यांवर काही कारवाई केली आहे का? का नुसते सोशल मीडिया वर कोणी तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही ओरडताय? कुठल्या माध्यमांवर कोणी दबाव आणलाय याचे पुरावे तर द्या. उगाच काहीपण टायपायचे. बेरोजगारी वर बोलत नाही म्हणजे काय? विकास होत नसेल तर नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कुठल्या पार्टीचे सरकार आहे ते बाजूला ठेवा, सरकारचे काम संधी तयार करायचे आहे. ते काही तुम्हाला बोटाला धरून नोकरी मिळवून देणार नाहीत. भांडवलाअभावी जे लोक छोटामोठा व्यवसाय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मुद्रा योजना आहे, तर तुम्हाला त्यावरही आक्षेप असेल. नवीन व्यावसायिकांना कुठलीही ब्यांक दारातही उभं करत नाही हे स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा. मग अश्या लोकांना सरकार मदत करत असेल तर ते पण रोजगार निर्माण करणेच नाही का? फुकट दरमहा ६-१२ हजार देण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे. ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी जे स्किल लागते ते मिळवणे, इंटरव्यू पास करणे हे प्रत्येकाला आपलेआपलेच मिळवावे लागणार आहे. त्यात सरकार काय करणार?

In reply to by गोंधळी

भंकस बाबा Mon, 04/08/2019 - 08:56
अहो नीट अभ्यास केला असता ना मी(10वीच्या बोर्डाचा)जाउदे! मुद्द्यावर येउया. स्वच्छ भारत - जरा मुंबईत येऊन फिरा, जागोजागी स्वच्छतागृह उभी राहिली आहेत. पुष्कळ स्वछतागृह ही कोंग्रेसच्या नगरसेवकानी वा आमदारानी उभारली आहेत. ही त्यानी समाजसेवा म्हणून नाही तर मोदींच्या भीतिने उभारली आहेत. ज्या भागात पाच वर्षापूर्वी स्वछतागृहाची निकड नव्हती तिथे अचानक स्वछतेचा का पूळका यावा? तर आपण नाही केले तर मोदी करतील या भीतिने! मग मारे त्यासाठी केंद्राकडून अनुदान घेतले असेल पण नाव मात्र या टिकोजीरावांचे, कोंग्रेसचे आमदार अस्लम शेख हे या बाबतीत आघाडिवर आहेत. नाहीतर या माणसाला फक्त अनधिकृत मशिदि बांधण्यासाठी निवडून दिले आहे असा संशय येतो, बाकी मतदारसंघात काही उल्लेखनीय कामगिरी नाही. गंगा स्वछता अभियान- फार वर्षापूर्वी गंगेचे फोटो यायचे वर्तमानपत्रात छापुन , तटावर जाळले गेलेले मृतदेहाचे अर्धवट जळलेले अवशेष गंगेत वाहत असलेले! अगदी गंगेचे घाट वेगेरे पार्श्वभूमीवर दाखवून. आता असे फोटो का नाही येत? मिशन फेल गेले आहे हे दाखवायला विरोधी पक्षाना बरे नाही का पडणार? बर जलवाहतुक, त्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर वेगेरे गोष्टी चर्चेला घेतल्याच नाहीत. मी ज्या कंपनित काम करतो त्या फ़र्मला मेडिकल ट्रांसक्रिप्टर या पदासाठी उमेदवार पाहिजे आहे, मिळतच नाही आहे. जे येतात ते असा पगार मागतात की आमचा मैनेजर खजिल होतो. कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या तेवढा पगार देतात. ही परिस्थिति सगळीकड़े आहे. कामे आहेत पण योग्य उमेदवार नाही, योग्य उमेदवाराला घेण्यासाठी कंपन्या टपलेल्या आहेतच. तर गोंधळी साहेब डोळे उघडा आणि आजुबाजुला बघा,

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Mon, 04/08/2019 - 11:11
भंकसजी व ट्रेड मार्कजी जरा ही लिंक पहा - https://www.youtube.com/watch?v=wfF5Q17lYy4 मला फक्त एवठेच म्हणायच आहे की जे बरोबर आहे ते आहे पण जे चुक आहे किंवा खोट आहे त्याला चुकिचेच म्हटले पाहिजे. व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल.

In reply to by गोंधळी

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 12:26
व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल. जरा कळ काढा येत्या मे मध्ये कळेलच काय दिखावा आहे आणी व सत्य काय आहे ते समजुन येइलच !!

In reply to by गोंधळी

ट्रम्प Mon, 04/08/2019 - 18:45
मला सुद्धा भाजप चे सरकार आणि मोदी जुमलेबाज वाटतात !!!! अस वाटतं फेकून देवू भाजप ला अडगळीत!!! पण भाजप ला पर्यायी पक्ष लवकर आठवत नाही हो !! बर गठबंधन ला निवडून द्यावे तर किमान 2004 व 2009 सारखी परिस्थिति आता हवी होती , म्हणजे पंतप्रधान पद काँग्रेस ला भेटणार का ? भेटले तर काँग्रेसमध्ये 130 करोड़ लोकांचे नेतृत्व खंबीर / गंभीरपणे करणारा कोणी आहे का ? काँग्रेस ला पंतप्रधान पद देणे इतर पक्षानां मान्य असेल का ? आत्ताच पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात एकमत नाही तर सुशिक्षित असलेल्या भाजपा विरोधकांनीं सत्तेची चावी कोणाला सोपवावी ? पंतप्रधान पदी भाजप व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचा कोणता नेता योग्य वाटतो ? या विषयावर मला आपले विचार वाचायला आवडतील . 2009/ 2014 ला निष्कलंक ममो होते म्हणून ठीक , पण आता कोणत्या पक्षाचा कोणता नेता पंतप्रधान पदी योग्य वाटतो ? कोणते नेते सक्षम / योग्य वाटतात ?

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Tue, 04/09/2019 - 06:22
म्हणजे मोदींचे नाव घेतात म्हणून एबीपी सारख्या मोठ्या न्यूज चॅनेलच्या प्रक्षेपणात अडथळे आणू शकतात पण नंतर पु. प्र. वाजपेयींनी जे ब्लॉग लिहिले किंवा मुलाखती दिल्या व्हिडीओ पब्लिश केले त्यावर मात्र सरकारने काहीच केले नाही? एवढंच नव्हे तर ज्या ध्रुव राठीच्या तूनळी च्यानेलची लिंक तुम्ही दिली आहे त्याच च्यानेलवरून ध्रुव कितीतरी मोदीविरोधी गरळ ओकत असतो. त्यावर किंवा वायर वगैरे च्यानेल्स वर काहीच कारवाई होत नाही? असं कसं होत असेल बरं? अगदी एनडीटीव्ही वरून तसेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष वगैरे सगळे हाय प्रोफाईल पत्रकार तर अगदी २००२ पासून मोदींविरुद्ध बोलत आहेत, नाहीनाही ते आरोप करत आहेत त्यांचे च्यानेल नाही ब्लॉक झाले? मध्यंतरी रवीश कुमारने पण ब्लॅकआउट स्क्रीनचं नाटक केलं होतं हे आठवत असेल. मोदींनी किंवा सरकारने त्यांचे प्रोग्रॅम ब्लॅकआउट केले हे कशावरून? ध्रुव राठी सांगतो म्हणून? काय पुरावा आहे?

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Tue, 04/09/2019 - 11:11
अगदी अपेक्षित प्रतिसाद दिलात. मुळ मुद्दा असा आहे कि त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा. त्यांना पैसे देउन अस बोलायल लावले आहे का?

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Wed, 04/10/2019 - 03:25
कोणाचे काय काय लागेबांधे आहेत, कोणाची कुठे कुठे बोटं किंवा गळे अडकलेत, कोणाचे कसले साटेलोटे आहेत हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? पण मी सगळ्या बाजूची मतं वाचतो/ ऐकतो. उदा. राफेलचा मुद्दा - मोदी, सीतारामन, जेटली यापासून ते रागा, पायलट, सिंदिया, पवन खेडा सगळ्यांची मतं ऐकली. फ्रांस सरकारने दिलेलं प्रेस रिलीझ वाचलं. त्यानंतर कॅग आणि कोर्टाच्या निर्णयानंतर माझं तरी मत असं बनलं आहे की या प्रकरणात घोटाळा झाला नसावा. या विषयावर समस्त पत्रकारांमध्ये फूट पडली आहे. अर्णब आणि काही प्रमाणात टाइम्स नाऊचे पत्रकार घोटाळा नाही म्हणतात तर राजदीप, बरखा ईई घोटाळा आहे हे ठासून सांगतात. त्यात तुम्ही ध्रुव राठीचे व्हिडीओ बघितलेत तर त्याने मांडलेल्या मुद्द्यनमध्ये फारसा दम वाटत नाही. ओढून ताणून संबंध लावणे अर्थाचा अनर्थ करणे हे बऱ्याच प्रमाणात दिसते. तुम्ही वर टाकलेल्या व्हिडीओ मध्ये जे प्रकरण आहे ते राफेलच्या मानाने छोटं आहे. पण राफेलच्या प्रकरणात सरकारविरुद्ध किंवा मोदींविरुद्ध जाहीरपणे बोलणाऱ्या कोणाला कुठल्या कारवाईला तोंड द्यायला लागलं आहे का? किंवा कुठल्या च्यानेलवर काही आडमार्गाने सुद्धा काही कारवाई झाली आहे का? त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा ही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.

In reply to by ट्रेड मार्क

lakhu risbud Wed, 04/10/2019 - 10:20
हा ध्रुव राठी हे काँग्रेस च्या इको सिस्टिम ने मोठे केलेले प्रकरण आहे. ऑर्डर मिळाल्यासारखे याच्या ट्विट ला सागरिका घोष आणि तत्सम पत्रकार रिट्विट करायला लागतात. त्यानंतर लगोलग याला NDTV वर चर्चे बोलावणे येते. मग प्रिंट,वायर सारख्या वेबसाइट्स... ज्यातील बहुतांशी २०१४ नंतर जन्माला आल्यात त्या या ध्रुव राठी ला उचलून धरतात. एका ठराविक काळात त्याचे ट्विटर चे फॉलोवर्स लाखो ने वाढवले जातात. हे घडण्या पेक्षा घडवून आणले जात असते. https://www.youtube.com/watch?v=iMFCes4QDao

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Wed, 04/10/2019 - 14:12
माफ करा ती जाहिरात नाही आहे. पं.प्र प्रत्यक्ष त्या लोकांशी संवाद करत आहेत. अस दाखवण्याचा प्रयत्न आहे कि शेतकर्यांच उत्पन्न वाढल आहे. पण त्याच लोकांना याबद्द्ल विचारल्यास ते तस नसल्याच सांगत आहेत. हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? तुम्हालाही या संबंधी ठोस माहिती नाहि. त्यामुळे माझ त्या व्हिडीओ बद्दलच मत बदलेल नाही. तुम्ही जर त्या व्हिडीओ मधल्या लोकांच खरच उत्पन्न वाढल आहे ह्या संबंधी माहिती दिलीत तर माझ मत बदलेल. मुळ मुद्दा महत्वाचा आहे बाकी हा असाच आहे तो तसाच आहे ह्या वादात मला पडायच नाही आहे. मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Wed, 04/10/2019 - 18:22
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत? हीच स्थिती मोबाईल बद्दल १० वर्षांपूर्वी होती याची आठवण झाली. सध्या भारतात ७३ कोटी लोक भ्रमणध्वनी वापरतात. For 2017 the number of mobile phone users in India is expected to rise to 730.7 million. https://www.google.com/search?q=no+of+mobile+users+in+india&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=no+of+mobiles&aqs=chrome.2.69i57j0l5.7878j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8 The World Health Organization (WHO) had said that IAP was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/17605667.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst .. हा आकडा २०१२ चा आहे. या पाच लाख स्त्रियांच्या आणि बालकांच्या आयुष्याची किंमत काय? दारू पिण्यासाठी पुरुषांच्या खिशात पैसे असतात पण गॅसचा सिलिंडर आणण्यासाठी पैसे नसतात हि भीषण वस्तुस्थिती आहे. आणि जर राहुल गांधी सत्तेत आले तर ६ हजार रुपये दर महिना असेच खात्यात येणार आहेत मग काय चांदीच आहे.

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Wed, 04/10/2019 - 21:10
मी योजनेच्या विरुद्ध नाही आहे. तर साध्यते विषयी शंका आहे. https://www.livemint.com/Politics/oqLQDFKNuMdbmLEVL88krN/Indias-poor-are-not-using-LPG-cylinders-they-got-under-Ujjw.html https://www.thehindu.com/news/national/about-85-of-ujjwala-beneficiaries-in-four-states-still-use-earthen-stoves/article26763409.ece

In reply to by गोंधळी

विनोद१८ गुरुवार, 04/11/2019 - 00:13
मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. याचे उत्तर अगदी सोप्पे आहे, ते फुकट द्यायला सांगू.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क गुरुवार, 04/11/2019 - 06:51
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या OSD आणि इतर जवळच्यांकडे २८१ कोटी रुपये सापडले आहेत अशी बातमी आहे. पण जरा गुगलून बघा किती मुख्य वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन म्हणून आहे. तसेच किती न्यूज चॅनेल्स वर यावर ब्रेकिंग न्यूज म्हणून चर्चासत्र झडत आहेत. राफेल प्रकरणात सगळे मोदींना फक्त प्रश्न विचारात आहेत. पण ६०,००० कोटींच्या व्यवहारात ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिश्यात कसे टाकता येतील याचे स्पष्टीकरण राहुल गांधीला कोणीच विचारत नाही. राफेल वरचीच एक याचिका न्यायालयाने दाखल करून घ्यायला संमती दिली म्हणून सगळे लगेच त्यावर मोदींना मोठा झटका म्हणून ओरडायला लागले. पण राहुल आणि सोनिया ५००० कोटींच्या हेराल्ड प्रकरणात बेलवर बाहेर आहेत पण एकसुद्धा प्रश्न नाही? ध्रुव राठी, विनोद दुआ वगैरे स्वतःला तटस्थ समजणाऱ्यांनी या कुठल्या विषयावर राहुल/ सोनिया/ काँग्रेस/ प्रियंकाला गेलाबाजार काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याला व प्रवक्त्याला प्रश्न विचारणारे व्हिडीओ प्रदर्शित केलेत का? त्या व्हिडीओ संबंधी - त्या महिलेचं पाहिलं व्यक्तव्य होतं - माझं उत्पन्न दुप्पट झालं. मग त्यावर खोदून खोदून परत विचारण्यात आलं - आधी कुठली शेती करत होतात त्यातूनच झालं का? तर तिने नाही सांगितलं. तिथे क्लिप संपली. फक्त शेतीचं उत्पन्नच दुप्पट व्हायला पाहिजे असा आग्रह का? जर शेतीच्या जोडीने, सरकारच्या कुठल्या तरी योजनेमुळे/ साहाय्यामुळे, ती दुसरे व्यवसाय करून उत्पन्न वाढवत असेल तर चालणार नाही? गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी गुरुवार, 04/11/2019 - 15:21
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे.१ ला सिलेंडर वापरल्यानंतर तो परत रिफील करणार्यांच प्रमाण कमी आहे. ही सद्याची वस्तुस्थिती आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील. मुद्दा :- डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. किती ब्लॅक मनी पकडला त्याची आकडेवारी कोण देईल का? फेक नोटा सापड्ल्या पण आता ही २००० च्या फेक नोटा सापडत आहेत. https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-rbi-warned-govt-black-money-fake-currency-claims-medical-tourism/story/289291.html

In reply to by गोंधळी

सुबोध खरे गुरुवार, 04/11/2019 - 20:39
डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती सफल झाला आहे हे राजकीय पक्षांची वक्तव्ये वाचलीत तर ०% पासून १००% पर्यंत एकदा येईल. परंतु लष्कर आणि निमलष्करी दले आणि गुप्तचर खाते याना विचारले तर त्या बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर आल्या नाहीत त्या समजून येतील. माझ्या लषकरी गुप्तहेरखात्यातील मित्राशी सध्याच बोलणे झाले तेंव्हा त्याने सांगितलेली गोष्ट अशी आहे. १) महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगण या लागून असलेल्या नक्षलवादी भागात जे उद्योगधंदे आहेत त्यांच्याकडून नक्षलवादी खंडणी गोळा करतात हे उघड गुपित आहे. शिवाय शहरी नक्षलवादी सुद्धा त्यांना असेच पैसे पुरवत असतात. अधिकारीक तत्वावर कुणीच मान्य करणार नाही परंतु सर्वाना "माहित आहे." हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली. शहरी नक्षलवादी एकदम आरडा ओरडा कोल्हेकुई करू लागले याचे हे कारण आहे. २) विविध जिल्हा बँकांना अन सहकारी पतपेढ्याना पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता परंतु त्यांनि आपल्या संचालक मंडळाचे कोट्यवधी रुपये बदलून दिले आणि हे पैसे त्यांच्या तिजोरीत पडलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे वारंवार खेटे घालूनही बँकेने हे पैसे बदलून देण्यास नकार दिला आहे त्यामुळे एका बँकेत हे पैसे सडू लागल्याची बातमी आली आणि दुसऱ्या बँकेत उंदरांनी पैसे कुरतडल्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचा हिशेब साधा सरळ आहे. हे पैसे घेऊन त्याची विल्हेवाटच लावायची आहे. मग आपण बदलून का द्या? या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. यात एका राजकीय पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्या लोकांची निवडणुकीला उभे राहायची तयारी नाही. दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने आपले काही पैसे (बाकी बरेच पैसे फार मोठी किंमत देऊन बदलून घ्यायला लागले) आपल्याच जातीच्या बँकेतुन बदलून घेतल्याची अफवा आहे. या बँकेची स्थिती यामुळे अजूनच वाईट झालेली आहे. आणि त्यांच्या वर रिझर्व्ह बँकेचे अजूनच निर्बंध आले आहेत. https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/rbi-directs-mumbai-based-bank-to-restrict-withdrawals/articleshow/63819640.cms http://www.uniindia.com/ckp-bank-depositors-forum-urge-buying-of-unauctioned-attached-properties-of-fraudsters/business-economy/news/1202296.html काका मला वाचवा असा टाहो ऐकू आल्याचे काही लोक बोलताना ऐकू आलंय. दुवे काळजीपूर्वकी वाचा

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Fri, 04/12/2019 - 16:34
नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे चांगलेच मोडले होते. आता निवडणुकीदरम्यान त्यांचे हल्ले परत वाढलेत परंतु त्याची कारणे वेगळी आहेत. मधल्या काळात मोदींच्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था चांगलीच वेगात धावायला लागली आहे. त्यामुळे लघु उद्योजक आणि शेतकरी यांच्याकडे चांगलाच पैसा खेळायला लागला आणि नक्षलवाद्यांना जीवदान मिळाले. त्यात अमोल पालेकर वगैरेंनी सत्तरच्या दशकात जो दाबून पैसा मिळवला तो आता त्यांनी शहरी नक्षलवादी म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. पण काळजी नको. नवीन सरकार आल्यावर एक अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक तर होणारच. स्थलसेना प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरेंच्या संपर्कात नसलेला ~ सर टोबी

In reply to by सर टोबी

सुबोध खरे Fri, 04/12/2019 - 20:30
एक गोष्ट लक्षात घ्या नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही. शिवाय काही गोष्टी कुठेच आणि कधीच प्रसार माध्यमात येणार नाहीत. त्या म्हणजे एकाच नंबरच्या दोन नोटा छापल्या गेल्या होत्या आणि हे सर्व सरकार आणि टांकसाळीत तज्ञ लोक यांचे साटेलोटे होते. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि टाकसाळ यांच्या हिशेबात जरी १४ -१५ लाख रुपयांच्या नोटा होत्या तरी वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. म्हणजेच १५. ४ लाख कोटी अधिकारीक नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या त्यापैकी १५.३ लाख कोटी परत आल्या. पण यात या दुहेरी क्रमांकाच्या नोटा पण परत आल्या. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत. अर्थात यावर ज्यांनी या दुहेरी क्रमांकाच्या नोटा जारी केल्या ते हा गोष्ट कदापि मान्य करणार नाहीतच पण उच्च रवाने आरडा ओरडा पण करीत आहेत. निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत तेलगी यांचा असाच बनावट मुद्रांकाचा घोटाळा ३० हजार कोटींचा होता आणि हा घोटाळा ८ वर्षे चालू होता. घोटाळ्यात अनेक पोलीस आणि सरकारी अधिकारी यांचं हात होता आणि तेलगी यांची नार्को टेस्ट झाली त्यात त्यांनी श्री शरद पवार आणि श्री छगन भुजबळ यांचे नावही घेतले होते. पण पुढे एकही आरोपीला शिक्षा झाली नाही. हा इतिहास आहेच. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/telgi-tattles-on-pawar-bhujbal-in-stamp-scam/articleshow/1964402.cms?from=mdr

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 04/16/2019 - 15:21
निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत
काहीही. चक्क काहीही लिहायचे? साचे म्हनजेच आर्टवर्क सिलिंडर फक्त चेंज झाले. फार कष्ट अन खर्च नसतात हो त्यासाठी. असे ना तसे होशंगाबादहुन लागतातच सिलिंडर रेग्युलरली. ते फक्त डिझाइन चेंज झाले. बाकी नोटा चौकोनच आकारातील असल्याने सरळ रेषेतले कटिंग शिवाय दुसरे काही नसते. त्यासाठी कटिंग लेआउट चेंज होतो फक्त. ग्रेव्हीयरचे साचे चेंज करायचा खर्च सरकार रेग्युलरली करते. त्यात काही नवीन नाही. जास्त फरक पडला तो एटीएम मशीन्सना. इव्हन हा नव्या साच्याचा खर्च भारतातले सारे एटीएम मशीन्स कॅलिब्रेट करण्याच्या खर्चासमोर न के बराबर आहे. सो साचे निकामी झाले म्हणण्याला काही अर्थच नाही. यंत्रे निकामी झाली हे तर मोट्ठा विनोद आहे. अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यामुळे जुनी यंत्रे आणि ती प्रोसेस निकामी झाली. ग्रेव्हियर, ईंटिग्लो आणि लिथो ह्या तीन तंत्रानीच नोटा प्रिंट केल्या जात होत्या आणि नव्या नोटाही ह्याच तंत्राने प्रिंट केल्या जातात. लहानसाहान अ‍ॅडऑन्स असतात पण ते रिसर्च आणि डिझाईन करतानाच केलेले असतात. मशीन्समध्ये अन प्रिंटिंगमध्ये मायन्त्युट चेंज करुन होतात ते. त्याने प्रोसेस अन मशीन बदलत नसते. बदल थोडासा कागदात झाला पण तो विषय वेगळा आहे. मशीन त्याच असतात. नोटाबंदीने नवीन मशीन आणल्या हा जोक आहे. नोटाबंदीनंतर फक्त डिमांड्मुळे मशीन लाइन्स वाढवल्या मिंटने. प्रोसेस तीच आहे. सेम असेच आयएसाअयने बसवलेल्या मशीनबाबत आहे. भारताच्या मशीन्स निकामी झाल्या त्यामुळे त्यांच्या मशीन्स निकामी झाल्या असले खोटे दावे करुच कसे वाटतात?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 04/16/2019 - 18:49
माझा शब्द प्रयोग चुकला असेल पण तांत्रिक मुद्द्यावर वाद घालण्यापेक्षा मूळ मुद्दा लक्षात घ्या खालचा दुवा पूर्णपणे वाचून घ्या. The parliamentary panel was informed that the volume of FICN smuggled into India in 2010 was between Rs 1,500 and Rs 1,700 crore, which went up to Rs 2,500 crore in 2012 - a rise of 55 per cent. This year, fake currency worth Rs 1,200 crore has already infected the Indian economy till July. https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2488000/Pakistan-prints-fake-Indian-rupees-NIA-finds-counterfeit-cash-paper-Pakistans-legal-tender.html हे आकडे २०१३ चे काँग्रेसचे सरकार असतानाचे आहेत आणि अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. हे आकडे निश्चलनीकरणाच्या समर्थनार्थ २०१७ नंतरचे किंवा मोदी सरकार आल्यानंतरचे नाहीत अडीच हजार कोटी रुपयात किती मोठ्या प्रमाणावर दंगे आणि अशांतता भडकवता येईल याचा विचार करा.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Mon, 04/15/2019 - 13:15
खरे डॉक्टर, तुमचं म्हणणं खरं दिसतंय. कालंच पुण्यातली बातमी वाचली की निवडणुका असल्या तरी दारू नेहमीसारखी वाहत नाहीये : https://www.loksatta.com/pune-news/alcohol-in-pune-1875688/ हे नोटाबंदीमुळेच झालंय. म्हणून कुणाकुणाच्या पोटात दुखतंय. हा एकमेव फायदा सुद्धा इतर साऱ्या तोट्यांना पुरून उरेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/12/2019 - 06:07
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे हे फारच लवकर निष्कर्ष काढणे नाही का? मुळात योजना चांगली आहे का हे सांगा. योजना नुसती जाहीर करून फायदा किंवा पैसे मात्र दुसऱ्याच जागी असं झालंय का? जर योजना चांगली आहे आणि त्यात भ्रष्टाचार सुद्धा झालेला दिसत नाहीये तर मग ती सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? त्याचं एवढं पोस्टमॉर्टेम करायची काय गरज आहे? तुम्ही आधी जी शेती करत होतात त्याचंच उत्पन्न दुप्पट झालंय का हा प्रश्न कितीसा योग्य आहे? शेती तेवढीच, पीक थोडं दरवर्षी कमीजास्त येणार मग उत्पन्न फक्त दुप्पट त्याच शेतीतून व्हावं अशी अपेक्षा का? म्हणजे जर त्या उत्पादनाचा शेतकऱ्याला मिळणार भाव दुप्पट झाला तर आपल्याला चालेल का? म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील. मुद्दा मला फारसा मान्य नाहीये. माझं म्हणणं आहे की अजूनही हे लोक पारंपरिक इंधन वापरत होते ही गोष्ट चांगली होती का? ते बदलण्याचा तर प्रयत्न होतोय. काही लोक थोडे मागे पडत असतील पण म्हणून सगळ्यांनाच वंचित ठेवायचे हे योग्य आहे का? डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. खरेसाहेबांनी सांगितलंच आहे. मीही एक मुद्दा जोडतो. बेफामपणे कर्ज दिल्याने आणि माफ केल्याने बँकांमध्ये सुद्धा रोखीचा तुटवडा निर्माण झाला होता. युपीए सरकारने २००४ ते २०१३ या काळात ३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले त्यातले बरेच कर्ज माफ केले किंवा रिशेड्युल केले. मोदी आले तेव्हा कदाचित बँकांची स्थिती एवढे वाईट होती की प्रायव्हेटच नव्हे तर सरकारी ब्यांक सुद्धा कधीही बंद पडल्या असत्या. या ब्यांकांत कुठून पैसे ओतायचे? उद्या तुम्ही ब्यांकेत १ लाख रुपये रोख काढायला गेलात आणि ब्यांकेने रोख पैसे नाहीत म्हणून सांगितलं तर? आधी दिलेली बातमी बायस वाटत असेल तर काँग्रेसच्या लाडक्या रघुराम राजन यांनी सांगितलेलं बघा. मी आधी म्हणलंय तसं एक एक कृती व योजना न बघता संपूर्ण चित्र बघायला पाहिजे. अगदी सफल नाही झाली असं म्हणलं तर मग अजून काही ठराविक लोकच का ओरडत आहेत? ज्या गरीब लोकांना त्रास झाला असं म्हणलं जातंय ते लोक तर काहीच ओरडत नाहीयेत. तसेच ३ एक लाख शेल कंपन्यांना बंद केलं, त्याचे डायरेक्टर्स रडारखाली आले. त्याद्वारे चालणारा हवाला बंद झाला. अर्थात याचा अर्थ परत होणारच नाही असं कोणीच छातीठोक पणे सांगू शकत नाही. पण निदान रोखलं तर गेलं, आता असे परत होऊ नये म्हणून बरेच कायदे बदलले गेले, नवीन केले गेले. तसेच फक्त लोकांचे गळे दाबलेत असं नाहीये. तर एनपीए झालेली कर्ज वसूल करण्यासाठी Insolvency and Bankruptcy Code सारखा कायदा लागू केला. यात हजारो कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पण जर भिंगच घेऊन त्रुटी काढायच्या म्हणाल्या तर काढता येतीलच. या कारवायांमुळे दुखावलेले, अडचणीत आलेले लोक असतीलच. पण आपण चोरांनी ठोकलेल्या बोंबा ऐकायच्या का नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/15/2019 - 14:07
अ हो सुबोध सर डिमो. हा मुद्दा ईमोशनली खुप भारी वाटतो. पण तो व्यवहार्य आहे की नाहि हे ही बघितले पाहिजे. हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली. विरोधाभासि प्रतिसाद -एक गोष्ट लक्षात घ्या नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही. हा काही कायमचा उपाय नाही आहे नक्षलवादावरचा. त्याचा परिणाम कही कालावधीसाठी च राहणार आहे. या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. तेच ह्यात सर्वात जास्त नुकसान सामालेला आहे. तुम्हि हा मुद्द का विसरता कीन्य नागरिक्, लघु उद्योजक व कामगार ह्यांना झा बँका आणि पतपेढ्या ह्यात सामान्य नागरिकांचे पैसे असतात व त्या डुबल्या तर त्यात बाकि को नाहीपेक्षा सामान्यांचेच जास्त नुकसान होणार आहे. ह्यात फक्त ब्लॅक मनी वाल्यांची कशी वाट लागली आहे ह्याच मानसिक समाधान मात्र खुप मिळाले पण व्यवहारीक फायदा काय हे ही तपासायला पाहिजे. आकडेवारी बघितली तर सध्यातरी तो नाही झाला आहे असे दिसते. सरकाच्या म्हण्ण्यानुसार ३लाख करोड्च्या नोटा परत येणार नाहीत असा अंदाज होता पण ०.७ म्हणजे जवळ्पास १० हजार करोड्च्या नोटा फक्त परत आल्या नाहीत. परत नव्या नोटांसाठी ७९६५ करोड खर्च आला. GDP जेव्हा १ टक्का वाढतो तेव्हा सधारण अर्थव्यवस्था १लाख करोड ने वाढलेली असते. त्यामुळे डिमो. च्या कळात GDP ची आकडेवारी बघितली तर किती नुकसान झाल आहे हे समजुन येईल. त्यामुळे खुप मानसिक समाधान देणारा परंतु व्यवहारिक नसणारा निर्णय म्हणजे डिमो. असे म्हणता येईल.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Mon, 04/15/2019 - 20:01
वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत. या बद्दल आपण लिहिण्याचे चातुर्याने टाळले आहे असे दिसते आहे. या अतिरिक्त चलन फुगवट्यामुळे महागाई किती भडकली असती हे एखाद्या अर्थ तज्ज्ञाला विचारून घ्या. (२०१४ साली ९ % असलेला महागाईचा दर २०१९ पर्यंत २. ५ % पर्यटन खाली आलेला आहे.)

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Tue, 04/16/2019 - 14:51
वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. दुहेरी क्रमांकाच्या नोटांबद्दलचा रिझर्व्ह बँकेचा कूठला रिपोर्ट आहे का? एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा चलनात येतात आणि रिझर्व्ह बँकेला ते कळुन येत नाही हे कस होऊ शकेल. या दुहेरी क्रमांकाच्या नोटाच बरोबर परत आल्या नाहीत असे जर तुम्ही म्हणता याचा अर्थ ज्याने नोटा निर्माण केल्या त्या त्याच्या जवळच होत्या. त्या चलनात न्हवत्याच. असे कोण का करेल जर त्या नोटांचा फायदा करुन घ्याय्चा असेल तर तो प्रत्यक्ष चलनात आल्यानंतरच होउ शकतो. त्यामुळे ह्या मुद्द्यासंबंधी थोडा संभ्रम आहे.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Tue, 04/16/2019 - 18:52
"अब्दुल करीम लाट साहेब तेलगी" या व्यक्तीने २० हजार कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक कसे आणि कुणाच्या सहयोगाने तयार केले आणि ते किती वर्षे चलनात होते ते त्यांच्या नार्को टेस्ट मध्ये कुणाचे नाव आले होते, एकदा व्यवस्थित वाचून घ्या. मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Wed, 04/17/2019 - 15:22
आता ह्या फेक नोटां मागचे तेलगी जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत निश्चित आकडेवारी क्ळुन येणार नाही. आताही २००० च्या बनावट नोटा बर्र्यापैकी सापडत आहेत. मला ही डिमो. चा निर्णय चांगला आहे असे वाटत होते. पण तो खरच चांगला होता का? हे कळण्यासाठी व्यवहारीक(आकडेवारीतुन- नफा/तोटा) द्य्रुष्ट्याच बघाव लागेल.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क गुरुवार, 04/18/2019 - 07:41
आम्ही एवढे कष्ट घेऊन प्रतिसाद लिहिला आणि तुम्ही चक्क दुर्लक्षच केलंत! त्यात बँकांच्या रोख तरलतेचा एक मुद्दा मी मांडला आहे, त्यावर आपले काही विचार?

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी गुरुवार, 04/18/2019 - 22:39
डिमो. व रोख तरलतेचा किंवा एनपीए हे दोन वेगळे मुद्दे आहेत. डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे. कारण बँकासाठी ते देणे(liability) असते.जर लोन ग्रोथ चांगली असेल तर त्याचा फायदा झाला असे म्हणु शकतो. पण डिमो. च्या नंतची आपल्या अर्थ व्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर त्याचा फार उपयोग झाल्याचे दिसणार नाही. लेसकॅशचा मुद्दा ही नंतर घुसवण्यात आला. आता काय होतय कि तुम्ही सगळे आधिच्या सरकारशी तुलना करत आहात. भ्रष्टाचार नाही होत आहेना,योजना चांगली आहेना बस म्हण्जे सरकार चांगल करत आहे. आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे योजना राबवन ही खुप मोठी अड्चण असते. सध्याची जमीन वास्तविकता(ground reality) पाहीली तर याकडे प्रकर्षाने लक्ष पुर्वले आहे असे दिसत नाही. त्याबद्दल्च्या सरकारच्या जाहिराती म्हणजे window dressing आहेत.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/19/2019 - 03:14
डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे. नोटा बँकेत परत आल्याने डिपॉझिट वाढले नाही पण रोख तरलता वाढली. तुमचा जरा गोंधळ झालेला दिसतोय, तुम्हाला बँकेतल्या अंतर्गत गोष्टी माहित नाही असे गृहीत धरून स्पष्ट करून सांगायचं प्रयत्न करतो. "डिपॉझिट म्हणजे बँकासाठी ते देणे(liability) असते" हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो. उदा. म्हणून समजा तुम्ही बँकेत १००० रुपये ठेव ठेवली आहे, ज्यावर बँकेने ८% व्याज देणे कबूल केले आहे. मी बँकेकडे कर्ज मागितले आणि बँकेने मला ७५० रुपये कर्ज १२% व्याजाने दिले. तर हे ७०० रुपये कुठून आले? तर तुम्हीच ठेवलेल्या ठेवीतून. असे लाखो लोक ठेवी ठेवतात आणि साधारण तेवढेच कर्जही घेतात. साधारण २५-२८% तरलता ठेवली जाते जी ठेवी परत करायला आणि क्लीअरिंग वगैरे इतर व्यवहार करायला वापरली जाते. आता तुमची ठेव ३ वर्षांची आहे आणि माझे कर्ज पण मी ३ वर्षात फेडायचे ठरले आहे. पण तुम्हाला ३ वर्षे झाल्यावर एकदम व्याजासहित पैसे मिळणार आहेत आणि मला मात्र दर महिन्याला ठराविक हप्ता भरायचा आहे. मी १ वर्ष हप्ता भरला पण नंतर मात्र गडबड केली. ३ महिन्यांच्यावर हप्ते थकल्याने बँकेने मला एनपीएमध्ये टाकले, ज्यामुळे मला २-३% अधिक व्याज लागू लागले. आता आधीच मी भरू शकत नव्हतो (किंवा भरायची इच्छा नव्हती) तेव्हा आता तर मला कारणच मिळालं. ७५० चं कर्ज आता ९०० रुपयांवर गेलं. मग एक नवीन म्यानेजर आला आणि त्याने मला एक आयडिया सांगितली. म्हणाला १००० रुपयांचं नवीन कर्ज देतो त्यातून आधीचे ९०० भरून टाका आणि १०० मधले.... मधल्या काळात रिझर्व्ह ब्यांक आणि सरकार तरलता राखण्यासाठी मदत करत राहिले. मी आधीच ७५० चा हप्ता भरत नव्हतो तर १००० चा कुठून भरणार? होताहोता ३ वर्ष झाली माझं कर्ज १२०० च्या वर गेलं आणि एक दिवस तुम्ही ब्यांकेच्या दारात ~ १२६० (१००० + व्याज) घ्यायला उभे राहिलात. आता ब्यांकेने तुम्हाला पैसे कुठून द्यावेत? २-३ मार्ग आहेत, जसे दुसऱ्याकोणीतरी ठेवलेल्या ठेवीतून किंवा रिझर्व्ह ब्यांकेकडून परत कर्ज घेऊन अथवा दुसऱ्या ब्यांकेकडून कर्ज घेऊन. पण हे किती दिवस चालणार? माझ्याकडे पैसे होते पण कर्ज भरायची दानत नव्हती. आणि भारतात असे लोक कल्पनेपेक्षाही जास्त आहेत. मग जर या परिस्थितीत नोटबंदी झाली असती तर मी माझ्याकडचे पैसे बाद होण्यापेक्षा बँकेत भरणे श्रेयस्कर मानले असते का नाही? भले मी माझं कर्ज नाही फेडलं असं समजा. पण कुठल्यातरी मार्गाने ते बँकेकडे द्यायलाच लागले असते ना? आता हीच रक्कम १ लाख करा बघू आणि आता सांगा पैसे काढायला आणि बदलून घ्यायला मर्यादा का ठेवली होती. तेच पैसे खात्यात भरायला मात्र नव्हती. एक केस मी स्वतः बघितलेली आहे. २०००/१ सालातली गोष्ट असेल आमचा एक थकबाकीदार होता, चांगलं ४-५ कोटींचं कर्ज एनपीएमध्ये होतं. राजकीय वर्तुळात उठबस असलेला चांगला गब्बर माणूस होता पण काही केल्या पैसे भरत नव्हता. आम्ही आपले दर महिन्याला वसुलीसाठी भेट देऊन यायचो. एकदा वैतागून आम्हाला घरात एका खोलीकडे घेऊन गेला. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण दार उघडलं तर चक्क खोलीभरून नोटा होत्या. म्हणाला एकरकमी भरू शकतो पण भरणार नाही. का तर पहिली गोष्ट म्हणजे भरायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे समजा ऑडिटमध्ये निघालं तर आयकर विभाग मागे लागू शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर कोट्यवधी रुपयांच्या नोटा बाळगून होता, बँकेकडून कर्जही घेतलं होतं. पण कर्जफेड करणार नाही कारण कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि खरंच ब्यांक काहीच करू शकली नाही. पुढे बँक अडचणीत येऊन बंद पडली. आता नोटबंदी झाली असती तर याच माणसाने काय केलं असतं, तुम्हीच सांगा. अश्याच अजून लोक बँकांना कसे लुबाडतात याच्या बऱ्याच केसेस मी तुम्हाला सांगू शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Fri, 04/19/2019 - 11:40
रोख तरलता वाढली हा मुद्दा मान्य आहे. हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो मला म्हणायच आहे कि नुसती रोख बँकेकडे येउन बँक फायद्यात येणार नाही तर त्या रोख्तेचा उप्योग कर्ज वितरणासाठी केल्यास त्यातुन फायदा होतो. डिमो नंतर कर्ज वितरणा चा वेग मंदावल्याचे कळुन येते. https://www.bloombergquint.com/business/loan-growth-slows-to-a-crawl-in-december https://www.livemint.com/Opinion/j6FWY6uYX5sGxcqW4WR1dN/How-demonetisation-crippled-bank-lending.html

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/19/2019 - 21:04
इथे वाटल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीचे वांधे होते, तिथे अजून कर्ज वाटत का फिरावं? ब्यांकेत ठेवलेल्या स्वतःच्याच ठेवी परत घ्यायला आलेल्या लोकांना द्यायला पैसे नव्हते हा मुद्दा आहे. त्याची सोय कुठून करायची? नुसत्या नोटा छापून? जुन्या नोटा वापरून कर्जफेड करण्यासाठी सरकारने पण मुदत दिली आणि लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. तसेच छोट्या व्यावसायिकांना मुद्रा योजनेद्वारे बरीच कर्जे वाटली गेली. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का? ३ वर्षांचे टॅक्स रिटर्न आणा, गॅरेंटर आणा, कोलॅटरल आणा आणि तरी वर अव्वाच्यासव्वा व्याज भरा अशी परिस्थिती होती. त्याउलट मोठे व्यावसायिक मात्र त्यांच्या कॉन्टॅक्टस आणि वजनाच्या जोरावर पाहिजे तितके कर्ज मिळवून जायचे. तुम्ही जर कोणा बँकेतल्या अनुभवी व्यक्तीला विचारलेत तर छोटे कर्ज घेणारे अगदी नेमाने हप्ते भरतात आणि त्या उलट बहुतेक "मोठे" व्यावसायिक टाळाटाळ करतात. दुसरं म्हणजे एकाच माणसाला १ कोटी कर्ज देण्यापेक्षा १०० लोकांना प्रत्येकी १ लाख कर्ज देणे सोयीस्कर असते. कारण एक कोटीवाला डिफॉल्टर झाला तर सगळे पैसे बुडतील. पण १०० पैकी अगदी ५० लोक डिफॉल्टर झाले तरी ५० लाख तर परत येतील.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Sat, 04/20/2019 - 20:25
आता याबाबत जगभरातील तज्ज्ञांमध्ये एकमत आहे की या घोडचुकीचा नकारात्मक परिणाम छोटे व्यावसायिक, कामगार आणि शेतकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाला आणि श्रीमंतांना मात्र त्याची अजिबात झळ लागली नाही. असे हे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/conflict-of-economy/articleshow/68942423.cms तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का? हा मुद्दाबरोबर आहे. पण बरीच कर्ज वाटली म्हणजे योजना यशस्वी झाली का? तर जेव्हा मुद्रा योजने अंतर्गत जी कर्ज वाटली आहेत. त्याची जास्तीत जास्त परत्फेड होईल तेव्हा यशस्वी झाली अस म्हणता येईल. सध्या बँकर्सचा या बाबत च मत निगेटीव्ह आहे.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Sun, 04/21/2019 - 05:37
तुम्ही दिलेल्या लेखातील पहिलाच परिच्छेद म्हणतोय, "आर्थिक धोरणांतील चुका बहुधा अल्प अथवा मध्यम कालावधीसाठी अडचणी निर्माण करतात. त्याहून मोठी, दीर्घकालीन चिंतेची बाब म्हणजे, काही गट देशात दुही निर्माण करण्यासाठी करत असलेला प्रचार ही आहे..." टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? अनियमित आणि अनियंत्रित उद्योग तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना त्रास तर होणारच होता. बाकी छोटे व्यावसायिक कसे अडचणीत आले? उदा. बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती. सामान्य नागरिकांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी ३ महिने त्रास सहन केला त्याला कोणीच नाही म्हणत नाहीये. पण अजून त्रास आहे का हा मुद्दा आहे. तुम्हीही बडे उद्योगपती नसावेत अशी आशा करतो. तुम्हाला वैयक्तिकरित्या तेव्हा काय त्रास झाला आणि अजून काय त्रास होतोय हे सांगा बघू. तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे. नोटबंदीच्या आधी मोदींचे गोडवे गाणारे इंजिनवाले नेते अचानक नंतर कट्टर विरोधी कसे झाले? बारामतीकरच काय पण झाडून सगळे नेते कसे टोकाचा विरोध करू लागले? मुलायम आणि मायावती मधून विस्तव जात नव्हता ते आता एका स्टेजवर आले. मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे. लोकांना ७२००० रुपये दरवर्षी फुकट वाटणेच बरे असं म्हणायला लागेल.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/22/2019 - 11:55
टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते. बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती ???????? तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे हे बघा डिमो. नंतर आयकरविभागाने धाडी टाकल्या त्यात किती काळा पैसा जप्त केला त्याची आकडेवारी जर कळाली तर बर होईल. म्हणजे जमा/खर्च किती झाला हे बघता येईल. मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे हाच मुद्दा आहे. हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Sat, 04/27/2019 - 05:16
हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते. अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... असो. अंमलबजावणीत गडबड झाली ती मान्य केली आहेच. विश्लेषण आणि त्यामागची कारणे इथेच वर आणि नोटबंदीच्या इतर धाग्यांवर सविस्तरपणे मांडलेली आहेत. पण जर बँकांकडे किती नोटा परत आल्या हाच यशस्वितेचा एकमेव निकष असेल तर मग नोटबंदी फेल झाली असं म्हणावं लागेल. ???????? ???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का???????? हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. बरं राहिलं मग. मुद्दा तुम्हीच काढलात म्हणून पुढे प्रतिसाद आले. तसं फुकटचे मिळणारे ७२००० पण कित्येक लोकांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे हे विसरून चालणार नाही. जे यासाठी पात्र आहेत अश्या गरिबांपेक्षा मधल्यामध्ये पैसे उडवण्याच्या कलेत वाकबगार असणाऱ्यांना (आणि गेल्या ४-५ वर्षात ज्यांना अश्या संधी मिळाल्या नाहीत अश्यांना) कोण निवडून येणार हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कदाचित आत्तापर्यंत विभाग पाडून त्याचा लिलाव सुद्धा झाला असेल. अडीच वर्ष होत आली नोटबंदीला, जे काही परिणाम व्हायचे होते ते बहुतेक होऊन गेले. परत मोदी पंप्र होतील का नाही ते माहित नाही. मला तर वाटायला लागलंय की मोदी नकोच, पण चुकूनमाकून झाले तरी परत नोटबंदी करायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे उगी राहावे.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Sat, 04/27/2019 - 16:44
अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का? ???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का???????? तुमच्या भाजीवाल्याचा reality check व्हायला हवा. सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा. असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही. लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा.

In reply to by गोंधळी

लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा. लोकशाही हीच मुळात राजकारणाची एक पद्धत आहे... तर मग तिच्यासाठी राजकारणविरहित मॉडेल कसे बनवणार ?!

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Mon, 04/29/2019 - 02:26
ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का? दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील. सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा. किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते. बादवे मोदी बालाकोट बद्दल बोलतात पुलवामाबद्दल काँग्रेसी बोलतात. तर मोदी बालाकोटवर पण बोललेच आणि का बोलू नये? गेली काही दशके दहशतवादी कारवाया नुसत्या सीमेवरच नाही तर अगदी राजधानीतसुद्धा झाल्या. कोणी अशी हिम्मत केली होती का? पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इतकी मोठी कारवाई केली आणि त्यातून जगातील दुसरा कुठलाही देश भारताच्या विरुद्ध बोलला नाही. हे राजनीती आणि कूटनीतीचे यश आहेच. असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही. असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार? असो. आमचे मोदी म्हणून तुम्ही गट बनवलेच आहेत. त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/29/2019 - 19:01
किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते. या सगळ्या योजनांचा reality check बघा जरा. तुम्ही फक्त घोषणांवर समधानी आहात. टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? आणि दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील ओ कशाला पलटी मारताय. असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार? क्रुपया चुकीचे मुद्दे आणू नका ओ. कुठली १३० कोटी लोक कचरा रस्त्यांवर टाकतात आणि कोनाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही. बालाकोटच्या कारवाईत नक्की किती दहशतवादी ठार झाले ??? मुद्दा हा आहे की आधीच जे सरकार होत त्यांच्या करभाराला जनता कंटाळली होती. आताच्या सरकारने त्यावेळी मोठी आश्वासन देत जे कॅम्पेन केल होत त्यावरुन जनतेने त्यांना बहुमत दिल. पण ती आश्वासन पुर्ण झालेली दिसत नाहीत. त्याऐवजी जाहीरती करण्यात समाधान मानल. आपल्या देशातील जनता भावनोद्दीपक आहे. त्यामुळे महत्वाचे मुद्दे सोडुन दिले जातात. फक्त भावनीक मुद्द्यांभोवती राजकारण फिरवल जात. म्हणुन लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा असे म्हटले होते.

In reply to by गोंधळी

अर्धवटराव Mon, 04/29/2019 - 19:30
लोकशाही व्यवस्थेत समाजकारणाचे मुद्दे अग्रगण्य असावे अशीच अपेक्षा आहे. पण त्याकरता कायदा/घटनादुरुस्ती वगैरे करुन दुसरं एखादं मॉडेल जोडण्याची गरज नाहि, आणि त्याचा काहि उपयोग देखील नाहि. सचेतन समाज हाच त्यावर उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ Tue, 04/16/2019 - 23:58
डि मो च्या निर्णया विरुद्द बोलणारे एक्सपर्ट्स डि मो शिवाय सरकार कडे दुसरा काय पर्याय होता ह्याची चर्चा करताना कधीही दिसत नाहीत ! डि मो ची परिस्थीती का आली ह्याची सुद्धा चर्चा होत नाही. चर्चा फक्त सरकारला घेरण्यासाठी डि मो च्या अंमलबजावणीत झालेल्या चुकी बद्दल जास्तच बोलले जाते. त्यातही कसे चांगले योजन करता आले असते ह्याची चर्चा नाहीच !! दुसर्याच्या चुकीवर बोट दाखवणे सोप्पे असते. जर सरकारला काहीच कळत नाही मग समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणार्या योजना आखल्या व यशस्वी अंमलबजावणी कशी केली ?

ट्रम्प Sat, 04/06/2019 - 21:20
ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही . चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे . रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन . ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता , भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

ट्रम्प Sat, 04/06/2019 - 21:21
ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही . चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे . रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन . ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता , भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 03:04
"जाकीटा"मागील जळजळ मोदींनी देशाला उद्देशून परवा जी घोषणा केली त्यानंतर नेहरूंच्या किळसवाण्या आरत्या सुरू झाल्या. त्यामुळे नेहरू ह्या नावाची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. अजूनही सुरूच आहे. मोदींनी दाखवलेल्या इच्छाशक्तीला श्रेय नाकारून ते नेहरूंना देण्यात अनेक नमोरुग्णांमध्ये स्पर्धा सुरू झाली.सोशल मीडियावर सुद्धा नेहरूनर्तक कथ्थक करू लागले. त्याच दिवशी रात्री मला एक जुनी गोष्ट समजली जी मी पहिल्यांदा ऐकली होती. आपल्यापैकीही अनेकांना ती बहुधा माहिती नसेल. नव्या पिढीला तर माहीत असणे अशक्य आहे. नेहरू हा माणूस लोकशाहीप्रेमी, पुरोगामी, उदारमतवादी,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. किंबहुना त्यांची तशी प्रतिमा काळजीपूर्वक बनवली गेली. त्यावेळच्या सगळ्या पेंटरबाबूंनी छान काम केले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही घटना त्या प्रतिमेला छेद देऊन जातात. अतिशय अहंकारी,असहिष्णू आणि क्षुद्र मनाचा माणूस अशीही त्यांची एक ओळख आहे. खाली मी एक शेर उद्धृत करतो, मन में जहर डॉलर के बसा के फिरती है भारत की अहिंसा खादी के केंचुल को पहनकर ये केंचुल लहराने न पाए अमन का झंडा इस धरती पर किसने कहा लहराने न पाए ये भी कोई हिटलर का है चेला मार लो साथ जाने न पाए कॉमनवेल्थ का दास है नेहरू मार ले साथी जाने न पाए ही कविता केली आहे विख्यात शायर मजरूह सुलतानपुरी यांनी. त्यांच्या मनात नेहरूंबद्दल किती राग आहे ते वेगळे सांगत नाही. त्या कवितेतील शब्दच पुरेसे आहेत. भारताच्या पंतप्रधानांना हिटलर म्हणून जरा याआधी कुणी संबोधले असेल तर ते मजरुह यांनी. या कवितेबद्दल त्यांना मोरारजी देसाई यांनी अटक करून तुरुंगात टाकले होते.एक वर्ष मशहुर मजरुह गजाआड होते. नेहरूनर्तकांच्या जीव की प्राण असलेल्या, कबुतरे उडवणाऱ्या या नेत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली होती यांचे हे धडधडीत उदाहरण आहे. त्या माणसाला टीका अजिबात सहन होत नसे.ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्याशी ते अतिशय वाईट वागले असे तटस्थ इतिहासतज्ञ सांगतात. त्यांच्या तुलनेत मोदी हे खूपच सहिष्णू आहेत.अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका त्यांनी दुर्लक्षित केली असून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. जर नेहरूंइतकी असहिष्णुता मोदींच्या अंगी असती तर तिहार जेल अशा अनेक मजरूहांनी भरून गेले असते. फसलेली आर्थिक नीती, पराभूत परदेश नीती आणि कायमचा चिघळलेला काश्मीर प्रश्न यांची जबाबदारी नेहरूंवर जाते. त्यांचे प्रमाणाबाहेर आणि वाजवीपेक्षा जास्त कौतुक करण्याचे निलाजरे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी मला पहिल्यांदाच कळली ती लगेच शेअर करावीशी वाटली. अनेकांना ही गोष्ट माहीतही नसेल.विशेषतः तरुण पिढीला नेहरूंची ही काळी बाजू कळावी म्हणून अकाली सुरू झालेल्या पंडितोत्सवात मुद्दामहून विरजण टाकत आहे. मजरुहला नेहरूंनी तुरुंगात टाकले तर किशोरवर इंदिरा गांधी यांनी बॅन घातला. आरडी वाचला... असली ही दळभद्री हुकूमशाही वृत्तीची फॅमिली. ही फॅमिली परत कधीही सत्तेवर येणार नाही असे आत्मविश्वासपूर्ण विधान आज नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ते तुमच्या आमच्या भरवशावर केले आहे. उतरवणार ना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात ? #फिरएकबारमोदीसरकार.. आनंद देवधर २९/०३/२०१९ जगप्रसिद्ध नेहरू जाकीटाआड दडलेली जळजळ जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची असेल तर ही पोस्ट तुम्ही भरपूर शेअर करा.

In reply to by स्वामि १

भंकस बाबा Mon, 04/08/2019 - 16:39
सोइस्कर अर्थ तुम्ही शांतिप्रिय धर्माचे लांगुलचालन, अब्जोचे आर्थिक घोटाळे, तुकडे गैंगला समर्थन, काश्मीरला पाकिस्तानधार्जिनी स्वायतत्ता असा घेतला असे वाटते.

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 10:28
अमर्त्यसेन हा मोदी सरकार विरुद्ध उघड बोलणार्या माणसाच खर बॅकग्राउंड ! Strange saga of Amartya Sen and the Rothschilds _Arvind Kumar_ *The Sunday Guardian* April 6, 2019, 9:05 PM _'Rothschilds & Co funds units of ‘civil society’ in India that control narrative on ‘human rights violations’._ Amartya Sen has become hyperactive in attacking policies that benefit the people of India, but one fact he has been shy of disclosing during his attacks is his apparent conflict of interest by virtue of marrying Emma Rothschild, one of the heiresses of the world’s wealthiest family. The family have made money off India and the Indian government. The assets of the Rothschilds are estimated to be worth at least US$400 billion and the family has a reputation of enriching itself by finding opportunity even on growing misery around the world. The Rothschild family has a history of manipulating stock markets, funding world wars, engineering large scale decisions in their favour, exercising significant control over the banking system, and owning large media outlets to influence public opinion in their favour. Amartya Sen, of course, is the apostle of poverty. The family business of Amartya Sen’s family on wife’s side, NM Rothschild & Sons, is seen as having made tremendous amounts of money during the United Progressive Alliance regime between 2004 and 2014, even as Sen’s blue-eyed-boy, Jean Dreze was a key member of Sonia Gandhi’s National Advisory Council. The connection between Amartya Sen and his family’s business is not merely a tenuous one. On the contrary, Sen’s father-in-law himself, Nathaniel Mayer Victor Rothschild, 3rd Baron Rothschild, was part of the management of NM Rothschild & Sons. Victor’s cousin, Lynn Forester de Rothschild, owns a significant stake in the Economist magazine, which explains the magazine’s constant barbs against the Hindu community even as they support Sonia Gandhi and prop up Amartya Sen’s economic ideas. One deal that is regarded as benefiting NM Rothschild & Sons during the UPA rule involves the e-auction of 3G spectrum. The firm had been chosen to conduct the e-auction even though they had never been known as a computer software firm. The firm pocketed Rs 30.5 crore for conducting the auction and this must be considered as a gift by the UPA government. It is not clear why there was a need for an e-auction when there were only a handful of participants in the bidding process. The most questionable aspect of this whole episode was that the Rothschilds were not a neutral third party, but had been retained by Aircel, which was looking for a buyer for their towers that were eventually sold for $1.8 billion. Of course, none of this has been probed even after 2014. Today, several firms that involved NM Rothschild & Sons to swing deals during the UPA era are embroiled in financial scams. Apart from Aircel, which is caught up in the Aircel-Maxis scam, NM Rothschild was also involved in Vedanta’s purchase of Cairn India, Kingfisher Airlines taking over Air Deccan, and the promoters of Venkateswara Hatcheries acquiring the English Premier League football club, Blackburn Rovers. Each of these firms has come under the scanner of the authorities. Venkateswara Hatcheries was raided by the income tax sleuths after suspicions about transactions related to movements of huge amounts of cash in the wake of demonetisation. For this reason, Amartya Sen’s criticism of demonetisation may contain more than meets the eye. A few months ago, it was determined that Rothschild Bank AG and one of its subsidiaries may have violated money laundering rules in the multi-billion-dollar 1MDB corruption case in Malaysia. This background of Rothschild Bank is combined with the fact that mergers and acquisitions, especially those spanning multiple international jurisdictions, readily lend themselves to allegations of being vehicles for money laundering through arbitrary valuation of the firm being acquired. As a definitive conclusion cannot be reached without a comprehensive inquiry, there is a need to investigate NM Rothschild activities in India and determine whether the unusually high rate of scams among their clientele is a coincidence. The Rothschilds have been active in a number of sectors in India including infrastructure, financial advisory, healthcare, and food processing, and when one Rothschild firm sold its share in a joint venture to Del Monte Pacific, Lynn Forester de Rothschild, CEO of EL Rothschild said, “We are delighted to have brought this company to a point where it has attracted large international players like Del Monte Pacific. This is a positive way for us to participate in the explosive economic growth of India.” Amartya Sen has not extended the same consideration towards the poorer people of India who would also want to participate in the “explosive economic growth of India”. Instead, he has ranted and raved against policies that would allow Indians to participate in their own economy, and along with his protégés in the National Advisory Council of the UPA government, he has ensured that Indians would only qualify as recipients of small amounts of money thrown at them as part of welfare schemes wrapped in the name of “Mahatma Gandhi”, while being prevented from actively participating as productive members of the economy and competing against his family on wife’s side, the Rothschilds. Amartya Sen’s recent salvos on India include demands of non-interference in what he calls the “civil society”, which really translates to foreign and foreign-funded non-governmental organisations that actively interfere in Indian politics. He asks for complete freedom for the Reserve Bank of India with no oversight by the Indian people or their democratically elected representatives even as those who control the RBI take instructions from the International Monetary Fund and the World Bank. These demands may reflect his family’s priorities, as the proposal for setting up the RBI first arose during the hearings before the Indian Currency Committee in 1898 and 1899 from two members of the Rothschild clan—Alfred de Rothschild and his brother Nathan Mayer Rothschild, 1st Baron Rothschild. Both Rothschilds wanted RBI to be controlled from the West, with no oversight from the Delhi government, exactly as Amartya Sen now demands. Indian freedom fighters saw through this game of the British and defeated their efforts to create the Reserve Bank in the 1920s. The Rothschilds’ business in India goes back to a much earlier period. As far back as 1814, Nathan Mayer Rothschild, the grandfather of the two Rothschilds who provided inputs to the Currency Committee, was not only a voting member of the United Company of Merchants of England, Trading to the East Indies (also known as the East India Company), but was also among the few people eligible to be chosen as its director. Today, Rothschild & Co funds units of the so-called “civil society” in India that control the narrative on what constitutes “human rights violations”. (Hint: Anything Hindus do is a violation of human rights unless it benefits those who wield power in America and Europe.) One organisation it funds is Prerana, which lists Asha for Education as a partner on its website. In 2002, the founder of Asha for Education, Sandeep Pandey, attended the party congress of the Naxalite group Communist Party of India (Marxist-Leninist)-Liberation and called for the unity of “revolutionary” organisations. CPI(ML)-L openly advocates an “armed revolution” and its stated objectives include the use of “illegal” methods and raising an army to wage a war against India. At their 2002 meeting, the party also honoured “comrade martyrs” or terrorists killed in action. Like Amartya Sen, some in the UPA were aligned with the group friendly to the Naxalites and had Naxalite supporters on Sonia Gandhi’s National Advisory Council. It is fitting that the government which was based on Amartya Sen’s economic policies ended up with the same track record as his family business—a trail of deals that enriched the wealthiest people in the world at the cost of the poorer people in the country.

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Mon, 04/08/2019 - 15:38
डँबिस००७, अगदी मर्मवेधी लेख! त्याबद्दल धन्यवाद. रॉथशील्ड्सने चेन्नईत एक अनाथालय उघडलं होतं. त्याची शुल्कबद्ध ( behind a paywall )बातमी इथे आहे. मात्र चित्रं सापडलं : https://si.wsj.net/public/resources/images/WO-AL482_ORPHAN_P_20121019174437.jpg म्हणे भारत स्वतंत्र झालाय! जय हो!! आ.न., -गा.पै.

With $79b in 2018, India tops global remittances list: World Bank



सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार कोटी) इतके परकिय चलन भारतात आणले आहे. चर्चा करताना, अनिवासी भारतियांना, अविचारीपणे, देश सोडल्याबद्दल दोष देणार्‍यांनी ही संपूर्ण बातमी मुळातून शांतपणे जरूर वाचावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. Tue, 04/09/2019 - 11:53
सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार) इतके परकिय चलन भारतात आणले आहे.
करोड लिहायचे राहिले ५ लाख ५३ हजार च्या पुढे. नुसते ५ लाख ५३ हजार एखादा वर पोचलेला एक्झिक्युटिव्ह पण आणत असेल.

In reply to by अभ्या..

शाम भागवत Tue, 04/09/2019 - 16:54
हा एक शिस्तबद्ध गुन्हा आहे. ठिकाण केरळ. कोणत्याही घरातील एखादा मुस्लीम अथवा ख्रिश्चन तरुण मजूर पासून कुक पर्यंत किंवा इंजिनियर म्हणून सुद्धा आखाती देशात नोकरी मिळवतो. आत्ता आखाती देशातील नियम बदलले आहेत. अन्यथा पूर्वी फक्त ख्रिश्चन आणि मुस्लीम लोकांनाच तिथे नोकरी करता येत असे. तर या तरुणाला नोकरी लागली कि त्याच्याकडे काही एजन्सी संपर्क साधत. त्या मुलाचा जो धर्म असेल त्याच धर्माची एजन्सी असणार. ते त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगत. तुला गल्फ ला नोकरी मिळाली आहे. तिथे तुला जो पगार मिळेल तो आमच्या एजन्सीचे तिथे ऑफिस आहे तिथे जमा कर. तू जर पोस्टात किंवा बँकेत पैसे भरले तर मिळायला दोन दिवस लागतात. बँक किंवा पोस्ट दिनार ते रुपये चलन बदलण्याचे ३ ते ५ % कमिशन कापून घेते. आम्ही एक रुपया कापणार नाही. ज्या दिवशी तू पैसे भरशील त्या दिवशी जो दिनार चा रेट असेल त्याच दराने संपूर्ण पैसे तुझ्या घरी दोन तासात पोचतील. ( कल्पना करा हा तो कालखंड होता ज्यावेळी ट्रंक call बुक करून फोन लागायची दिवस दिवस वाट पहावी लागायची.) हि एजन्सी दोन तासात पैसे देण्याची हमी देत होती. ही मुख्य सुविधा. जोडीला समजा कधी पगार उशिरा झाला तरी महिन्याला जितके पैसे येत असत तितके पैसे त्याच दिवशी दिले जात. घरातील कोणी आजारी पडले तर दवाखान्यात नेणे, कुटुंबियांच्या कडे पैसे नसतील तर पैसे खर्च करणे. ग्यास संपला असेल तर स्वतःची ओळख वापरून लगेच आणून देणे. मुलांच्या शाळेत अडमिशन साठी मदत करणे. या सगळ्या सेवा कोणतीही अपेक्षा न करता फुकट प्रदान करणे. आता हे सगळे करणारी संतस्वरूप एजन्सीच्या या कामाचा दुसरा भाग सांगतो. हे लोक राजकीय पक्षांच्या कडून आणि नेत्यांचा कडून काळा पैसा रोख स्वरूपात घेत. हा पैसा ते इथे त्या कामगाराच्या कुटुंबियांना देण्याच्या साठी वापरत असत. त्यातील १० % कापून घेत. बाकीची ९० % रक्कम ते लोक या कामगारांच्या कडून आखाती देशात जे पैसे परकीय चलनात वसूल करत असत. ते पैसे राजकीय पक्ष किंवा नेते अन्य देशातील ज्या खात्यात सांगतील त्या खात्यात हस्तांतरित करायचे काम करत असत. थोडक्यात भारतातील काळा पैसा हा फिजिकली भारतातच राहणार. परदेशात त्या कामगारांनी कमावलेला पैसा परकीय चलनात आपल्या देशात येणार नाही. हा परकीय चलनातील पैसा ते थेट बाहेर फिरवणार. हिंदी चित्रपटात दाखवतात तसे कोणीही पैशाने भरलेली bag घेऊन काळा पैसा घेऊन जात नसत. *©सुजीत भोगले* मी फक्त महत्वाचा वाटलेला मुद्दा फक्त इथे चिकटवलाय. ज्यांत कोणत्याच पक्षाची बाजू घेतलेली नाही. बाकी सर्व गाळलंय. हे मला आलेले फॉर्वर्ड आहे व कोणतीच शहानिशा केलेली नाही. डॉ. म्हात्रेंनी दिलेल्या आकडेवारीशी संबंधीत असल्याने हा उद्योग केलाय.

In reply to by शाम भागवत

तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला "हवाला" असे म्हणतात आणि तो बेकायदेशीर/गुन्हा असतो. त्याद्वारे भारतात येणारी रक्कम अधिकृत बँकिंग प्रणालीतून येत नाही. अर्थातच, तो व्यवहार गुप्त (अळीमिळी गुपचिळी) असल्याने त्याचा नक्की आकडा मिळणे कठीण असते... केवळ अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. मात्र, तसे व्यवहार होतात यात संशय नाही. अश्या व्यवहारामुळे देशाला फायदा होत नाही, किंबहुना त्याने निर्माण होणार्‍या काळ्या पैशामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानच होते. खाडी देशातून भारतात येणार्‍या पैशांच्या हवाला व्यवहारात पैसे कापून घेतात हे नवीन वाचले आहे ?! हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. ज्यांना एनआरई अकाऊंट काढण्यात रस नसतो किंवा ज्यांच्याकडे त्यासाठी फार मोठी शिल्लक उरणारी रक्कम नसते, अश्या लोकांमध्ये हवाला जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे तो कमी पगाराची नोकरी असणार्‍या लोकांना जास्त आकर्षित करतो. ज्यांचे उत्पन्न/पगार चांगला असतो, त्यांना अधिकृत बँकिंग प्रणालीतून पैसे भारतात पाठवून, एनआरई एसबी/फिक्स्ड डिपॉझिट अकाऊंटची सोय वापरणे जास्त फायद्याचे असते. कारण, त्या अकाऊंटमधील मुद्दल व व्याज पूर्णपणे आयकरमुक्त असते व त्यांचे व्याजदर आंतरराष्ट्रिय व्याजदरांच्या तुलनेने जास्त असतात. मी दिलेल्या बातमीतला आकडा, अधिकृत बँकिंग प्रणालीतून जाणार्‍या व अर्थातच वैध चलनव्यवहारात झालेल्या उलाढालीचा आहे. हे अधिकृत परकिय चलन देशाला आयातीची किंमत चुकविण्यास उपयोगी पडते. ते देणे चुकवून उरलेले चलन देशाची परकीय चलनाची गंगाजळी (Foreign currency reserve) म्हणून ओळखली जाते... जी, 'देशाची जागतिक अर्थव्यवस्थेतील पत' आणि 'स्थानिक चलनाची ताकद' वाढविण्यास कारणीभूत होते. या दोन (अवैध आणि वैध) व्यवहारांत गल्लत नको.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. म्हणजेच, हवाला व्यवहारात अधिकृत बँकेच्या किंवा मनी चेंजरच्या दराने मिळणार्‍या रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडे... हाच हवाला विरुद्ध दिशेने होतो तेव्हा त्याचे नियम उलटे होतात : भारतात भारतिय रुपये देऊन परदेशात परकिय चलन, स्वतः किंवा अवैध बँक खात्यात (उदा: स्विस बँकेतले "अवैध खात्यात") स्विकारले गेले तर मात्र विनिमयाचा दर अधिकृत दरापेक्षा जास्त असतो. म्हणजेच, दर डॉलरमागे अधिकृत दरापेक्षा जास्त रुपये मोजावे लागतात.

डँबिस००७ Tue, 04/09/2019 - 23:04
काल परवा दोन दिवस रेव्हेन्यु खात्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ , काँग्रेसचे कर्नाटकातील व गोव्यातील आमदारांच्या सहाय्यक, जवळच्या मित्र परिवारातील लो कांच्या घरावर २३ वेगवेगळ्या जागी धाडी घालुन जवळ जवळ ९ कोटी नकद रक्कम जप्त केलेली आहे. ही धाड खुप खोल वर विचार करुन प्लॅन केलेली होती. धाडीच्या अगोदर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सी आर पी एफ च्या सैनीकांच्या कंपनींना मध्य प्रदेश व ईतर ठीकाणी पाठवल होत. त्यावेळेला ह्या सैनिकांच्या प्रवासा बद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली तसेच ह्या प्रवासा बद्दल दुसरेच कारण दाखवले होते. लोकल पोलिसावर लोकल सरकारचे वर्चस्व असते व त्याचा सहभाग, मदत अश्या धाडीत मिळणार नाही झाला तर त्रासच होईल ह्याची खात्री असल्याने केंद्र सरकारच्या हाता खाली असलेल्या सी आर पी एफ सैनिकांना पाठवले होते. ह्या धाडीसाठी कोणत्याही सरकारी वहानांचा वापर करण्यात आलेला नव्हता, डोळ्यात न येता काळजी पुर्वक खासगी रेंटल गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. नेहेमी प्रमाणॅच काँग्रेसने व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खुप मोठ्या प्रमाणावर कॅश सापडल्याने त्यांची बोलती बंद झालेली होती. मोदी विरुद्द मिडीयाने ह्या सर्व बातमीला पाठ दाखवलेली होती. काही मिडीया हाऊसनेच ह्या बातमीला कव्हर केले. आता निवडणुक आयोगाने ह्या धाडीची गंभीर दखल घेत ही रक्कम कुठुन आलेली होती त्याची चौकशी करुन अहवाल सादर करायला केंद्र सरकारच्या खात्याला आदेश दिलेला आहे. EC asks probe agencies to take strong action against those u .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/68799484.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by डँबिस००७

योगेश कोकरे Wed, 04/10/2019 - 20:20
निवडणूक आयोगाने खूपच गंभीर दखल घेतली आहे .डायरेक्ट रेव्हेन्यू सेक्रेटरी ला समन्स बजावले आहे https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commission-summons-cbdt-chairman-revenue-secretary

In reply to by योगेश कोकरे

डँबिस००७ Wed, 04/10/2019 - 23:45
योगेश , समंन्स बजावणे आणी मिटिंग साठी बोलावणे (Summon for meeting) ह्यातला फरक समजवुन घ्या !! The Election Commission has called the revenue secretary and chairman of Central Board of Direct Taxes to discuss ongoing income tax raids. Read more at: https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commission-summons-cbdt-chairman-revenue-secretary Copyright © BloombergQuint

डँबिस००७ Wed, 04/10/2019 - 09:53
आता तर ही रक्कम २८१ कोटी असल्याची बातमी येत आहे !! ह्यात घोट्याळ्यात कॉंग्रेस पुर्णपणे अडकली आहे ! पुरावे व रोख रक्कम हस्तगत झालेली आहे !! https://youtu.be/Az4bg2ASXgU

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Wed, 04/10/2019 - 12:55
डँबिस००७, अबब २८१ कोटींची रोकड? हे म्हणजे पूर्वी क्रांतिकारक लोकं इंग्रज सरकारचा पैसा लुटायचे तसाच दरोडा मोदी घालताहेत. त्याबद्दल मोदींचं अभिनंदन. लुटारुंवर असेच दरोडे पडावेत म्हणून शुभेच्छा. आ.न., -गा.पै. तळटीप : पप्पू म्हणे चौकीदार चारसोबीस. गामा म्हणे मोदींना ४२० पर्यंत पोचवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तेजस आठवले गुरुवार, 04/11/2019 - 15:05
पृथ्वीपासून ५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे (black hole) पहिलेवहिले चित्र आत्ताच का जाहीर केले गेले ? ५ वर्षांपूर्वी आमचे सरकार होते त्यामुळे हा फोटो आमच्या काळातला आहे.राजीव गांधी ब्लॅक होल स्कीम ही आमची स्कीम होती, ह्याने नाव बदलून फोटोपण छापून टाकला आणि श्रेय ढापतोय.,ही इज ट्राईन्ग टू इन्फ्लुएन्स द वोटर्स.... (कोटी हा आकडा मी खाल्ला आहे.)

In reply to by प्रदीप

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/11/2019 - 12:14
गुड वन....! लाईक. आम्हीच करुन दाखवलं, हमनेही कर दिखाया. अशी कुठं बातमी वाचनात आली नै. आमचं सुदैवं दुसरं काय. ;) -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Wed, 04/03/2019 - 13:30
निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य मुद्दे मांडत नाहिय्ये. मोदी नी लावलेल्या ट्रॅप मधवोविरोध स्वतःच सापडत आहेत. निवडणूकीत मोदीना जर कोणी परभुत करू शकेल तर ते त्यांचे स्वपक्षीयच. ( उ प्र च्यामुख्यमंत्र्यांनी सेनादलाचा उल्लेख मोदीसेना असा केला) शिवसेना नक्की मुक्ताफळे उधळते त्यांचे त्यानाच समजत नाही. किरीट सोमय्या ना विरोध कशा साठी आहे तेच सेनेला माहित नाहिय्ये. लालु यादवंच्या ओसाड वाडीत बंड झालंय. ( त्याने किती फरक पडेल असे वाटतय) मायवती नी उधळलेली मुक्ताफळे पाहिली तर त्याना त्यांच्याच पुतळ्याच्या मांडीत बसवून कुठेतरी दूर जंगलात सोडून यावे / गंगा नदीत विसर्जन करावे. राहूल गांधीचे २जी स्पेक्ट्र घोटाळ्यात थेट सम्बंध असल्याचे पुरावे दिले जात आहेत.

जानु Wed, 04/03/2019 - 14:47
भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि मोदी यांनी आपसी खेळातून इतर पक्षांना नामोहरम करण्याबद्दल लेख वाचला. (एक ओळी धागा नको, वेगळा धागा म्हणून काढणे आणि त्यावर त्या लेखापेक्षा वेगळे जोडणे आवश्यक नाही, असे वाटल्याने येथे लिहले आहे.) यावर मते वाचायला आवडेल.

In reply to by जानु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2019 - 09:56
भाऊ तोरसकर एककल्ली आणि विद्यमान सरकारचे प्रचारक असल्यासारखे लिहित असतात, त्यांचं लेखन गंभीरपणे घ्यायचे कारण नाही. मी त्यांच्या फेबू भिंतीवर आपलं लेखन पाहता आपणास नवीन सरकारात किमान एखादे महामंडळ वगैरे मिळेल असे लिहून आलो होतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

lakhu risbud गुरुवार, 04/04/2019 - 10:35
सध्याच्या सरकार चे समर्थन करणे किंवा टीका करणे याचे काही परिमाण असेल ......... तर त्याच न्यायाने "समतोल,निष्पक्ष,सामान्य जनतेचा कळवळा" वगैरे वगैरे असणारे काही बुद्धीमंत लोक हे गठबंधन किंवा काँग्रेस च्या होऊ शकणाऱ्या सरकारात मंत्रिपदाचे दावेदार तर नक्की ठरतात !

In reply to by भंकस बाबा

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 13:33
उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर
तर बहुधा भारत पाक सीमेवर त्यांचे उभे केलेले पुतळे पाहून पाक सैन्य माघारी फिरेल , पुतळ्याना अडकून रणगाडे मोडून पडतील. बिहारचे १२वी टॉपर हे एक उदाहरण पुरे ठरेल तळा आणि गाळातील शिक्षण कसे होईल या बाबत सांगायला

In reply to by lakhu risbud

डँबिस००७ गुरुवार, 04/04/2019 - 17:07
काँग्रेसच्या सरकारात पद्म पुरस्कार कसे दिले जातात त्याच बरोबर महामंडळातल महत्वाच्या जागा कश्या वाटल्या जातात हे ह्यां ना चांगलेच माहीती आहे असे दिसते. कदाचीत त्यावेळेला संधी हुकली आणी आता अशी संधी मिळणे नाही हे पाहुन ईव्हळणे चालु आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रम्प गुरुवार, 04/04/2019 - 18:02
बरखा , राजदीप यांचे ग्यान ओसांडून वाहत होते म्हणून त्यांना पद्म डिलेत का ? रोख तुमच्या वर नाही , पण हा प्रश्न मला खूप दिवस त्रास देताय :)

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे गुरुवार, 04/04/2019 - 19:31
प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे आपल्या बाहेच्या अंगणात पाळून ठेवत असतात म्हणजे मग बाहेरून कोणी त्रास देऊ लागला कि आपण काहीही न करताहि तेच भुंकून आपले काम करत असतात. ता क :- याचा वरील कोणत्याही प्रतिसादाशी संबंध नाही

In reply to by कंजूस

बाप्पू Wed, 04/03/2019 - 16:03
सामान्य लोक कधीच म्हणणार नाहीत कि आम्ही समाधानी आहोत. ते 25 वर्ष्यापुर्वी देखील समाधानी नव्हते आणि इथून पुढच्या 25 वर्ष्यानंतर देखील समाधानी नसणार आहेत. कारण त्यांची बुद्धीच सामान्य आहे.

कंजूस Wed, 04/03/2019 - 19:24
खरं म्हणजे राजने निवडणूकीत उतरायला पाहिजे. संसदेत बोलायला मिळणाऱ्या माइक्रोफोनची वट वेगळीच आणि चौकातल्या माइकची वेगळी. उर्मिला मातोंडकर काय जोरदार बोलतेय.

In reply to by कंजूस

सोन्या बागलाणकर गुरुवार, 04/04/2019 - 04:38
माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत जातात? हे मला माहीतच नव्हतं. मी आपला उगाच समजत होतो की लोकांची कामं करायला त्यांना लोक निवडून देतात.

In reply to by तेजस आठवले

बाप्पू Wed, 04/03/2019 - 22:16
उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?
दोन गोष्टी .. 1) उर्मिला मातोंडकर यांनी मोहसीन मिर यांच्याशी काही वर्षांपूर्वी निकाह केला. आणि 2) उर्मिला जी यांनी एका मध्ये प्रवेश केला.. आणि आता निवडणूक लढवत आहेत आता बातमी क्रमांक 1 आणि 2 यांच्यावर विचार केला तर समजेल कि उर्मिला बानो कोणत्या पक्षात जाणार.. उत्तर सोपे आहे.. - आपली तीच.. सेकुलर वादी आणि शांतता धर्मप्रिय खांग्रेस..

In reply to by कंजूस

भंकस बाबा गुरुवार, 04/04/2019 - 08:43
धर्मान्तर केल्यावर साक्षात्कार होतो की आपण इथे एकटे पडतोय, कारण घरात मुक्त वातावरणाला बंदी! मग बोलायचे कशावर घरातील इतराशी? कारण चर्चा करायला गेले तर पवित्र पुस्तकातील दोन तीन श्लोक कानावर पडतील, आणि आपल्या रंगील्या बानो इथे कमी पडतात ना! मग चला बाहेर, आपण या घरात किती सुखी आहोत ते दाखवू, (पक्षी आपला निर्णय चुकला नाही हे पटवून देउ) बाकी कोंग्रेसने जाहिरनामा अगदी थाटात परोसला. काश्मीरला भारतापासुन तोडायची धोरणे आखताना काश्मीरी पण्डिताविषयी चकार शब्द या जाहिरनाम्यात नाही, म्हणजे देशभर तुम्ही टिळा लावून व रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणार पण जिथे हिंदू धर्माविषयी प्रश्न उभा राहिला की घुमजाव करणार! वाह रे खान्ग्रेसी एक प्रश्न , उर्मिलाबाई आपल्या जुन्या नावाने निवडणूक लढवत आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तिला असली नाव प्रचारात वापरायला भाग पाडू शकतो का?

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 10:35
किरीट सोमय्याना सेनेचा इतका कडाडून विरोध कशासाठी होता? कोणी सांगेल का ज्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे त्यावरून असे दिसतेय की भारतापुढे आरोग्य सेवा,पाणी , शिक्षण ,रोजगार औद्योगीक प्रगती वगैरे प्रश्नच शिल्लक नाहिय्येत. हिंदी भाषीक पट्ट्यात तर विकास होऊन गेलेला आहे. लालू , तेजस्वी, मुलायम बुवा बबुवा यांचाच काय तो प्रश्न आहे असे वाटतेय. नदीजोड प्रकल्प हा पुर्ण विस्मरणात गेलाय.

mayu4u गुरुवार, 04/04/2019 - 10:43
निवडणुकांचा प्रचार ही फार मौजेची गोष्ट आहे. कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. तरीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या शासनाने आपापल्या कार्यकाळात केलेली कामं बघून जनता मत देईल अशी आशा करूया.

In reply to by mayu4u

गोंधळी गुरुवार, 04/04/2019 - 16:50
कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. हा विकास कोण आहे? २०१४ ला त्याचा खुपच बोलबाला होता. गुजरात मधिल निवडणुकांच्या वेळी तो वेडा झाला व तो हरवला आहे अस ऐकले होत.

कंजूस गुरुवार, 04/04/2019 - 16:11
नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं, नवीन सरकारला प्रथम BSNL चे पावणे दोन लाख आणि MTNLचे पन्नासेक हजार कर्मचाऱ्यांचं करायचं काय हे सोडवावं लागेल. Bsnl/ mtnl कडे 4G चे वांधे आणि युएस/साउथ कोरिआत 5G सुरु झाले काल. डिसेंबरपर्यंत पन्नासेक शहरांत येणार. ३०० Mbps+ speed.

दुश्यन्त गुरुवार, 04/04/2019 - 16:29
उर्मिला मातोंडकर हेच तिचे असली नाव आहे आणि ती आपल्या असली नावानेच निवडणूक लढत आहे. आपले नाव काय असावे हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे.नियमानुसार त्यासाठी जे काही कागदपत्रे (ओळखपत्र , ऍफिडेव्हिट वगैरे) तिला आयोगाकडे द्यावेच लागते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रिया दत्त, पूनम महाजन, पंकजा मुंडे हि राजकीय क्षेत्रातली काही नावे. राजकीय, फिल्म आणि एकूण सर्वच क्षेत्रात स्त्रिया आपले माहरेचे नाव वापरतात हे काही नवीन नाही . बाकी दोन भिन्न धर्मीय व्यक्तींनी लग्न केले म्हणजे धर्मांतर केलेच पाहिजे असे काही नाही.

In reply to by स्वलिखित

बाप्पू गुरुवार, 04/04/2019 - 19:13
वायनाड मध्ये रोड शो मध्येशांततावादी लोक हिरवे झेंडे घेऊन नाचत होते.. यावरून समजून घ्या कि राहुल यांनी हीच सीट बॅक अप म्हणून का निवडली असेल..

In reply to by तेजस आठवले

विजुभाऊ गुरुवार, 04/04/2019 - 17:48
ती बातमी त्यांनी एप्रील फूल म्हनून छापली होती. बातमी खाली तसा उल्लेख केलेला आहे.

In reply to by विजुभाऊ

तेजस आठवले गुरुवार, 04/04/2019 - 18:18
कुबेरांनी त्यांची नेहमीची फालतुगिरी चालू ठेवतानाच ही नवी फालतूगिरीपण चालू केली का... चान चान

ट्रम्प गुरुवार, 04/04/2019 - 18:20
या निवडणुकीत भाजप ची कसोटी आहे हे मात्र निश्चित !! तसेच या निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात मध्यमवर्गीय ( टैक्स बेनिफिट ,देश प्रेम मुळे ) भाजप च्या बाजूने तर गरीब व शेतकरी वर्ग ( ज्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही ) काँग्रेस व इतर च्या बाजूने होण्याची शक्यता वाटते . मोदी सरकार ने बदल घडवीण्यास ( इंफ्रास्ट्रक्चर ) सुरवात केली पण गरीबांना अपेक्षित आर्थिक ( भरपूर योजना सुरु करून देखील ) बदल झालेला वाटत नाही . अल्पसंख्यक आणि दलित समाज या वेळी रागा च्या एड्याचाळ्यानां पाठीम्बा देण्याची शक्यता वाटते . बाहेर फिरताना बरेच जण मोदींच्या विरोधात बोलताना आढळतात .

In reply to by ट्रम्प

बाप्पू गुरुवार, 04/04/2019 - 19:38
मला असे वाटतेय कि निरीक्षण चुकतेय आपले. जितक्या लोकांना मी भेटलो त्यांच्यापैकी आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्ग, आणि उच्च वर्ग हे दोन्ही मोदींच्या बाजूने दिसले. यामध्ये बरेचसे लोक हे नोटबंदी ला फासलेला निर्णय मानत असले तरी त्यामध्ये मोदींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत नाहीत. इतर इन्फ्रा स्ट्रक्चर च्या कामामबत, सरंक्षण, कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि स्वछता याबद्दल मोदींची स्तुती आणि पाठराखण करतात. बाकी शेतकर्याबद्दल बोलायचे झाले तर 50-50 आहे. बरेचसे शेतकरी हे मोदींच्या बाजूने दिसतात. याला कारण म्हणजे पाणी आणि वीज याचा वाढलेला आवाका. मला अजूनही आठवतेय कि पुण्यापासून फक्त 20 काम च्या अंतरावर असलेल्या गावी 5 वर्ष्यापुर्वी 18-18 तस लोड शेडींग असायचे. पण आता अगदीच नगण्य प्रमाणात लोड शेडींग आहे. हा आणि असे इतर बरेचसे बदल ज्यांना समजले ते मोदींच्या बाजूने बोलताना दिसतात. जे शेतकरी एका दिवसात कर्जमाफी आणि एका दिवसात जादू होऊन शेतमालाला दुप्पट तिप्पट भाव मिळेल या आशेवर असतात ते मोदींना शिव्या घालतात. आर्थिक दृष्ट्या गरीब, सतत सरकारने काहीतरी फुकट द्यावे अशी अपेक्षा करणारे खूप लोक भारतात आहेत. आणि बरेचसे दलित लोक ज्यांना कितीही केले आणि काहीही झाले तरी आपल्यावर नेहमीच अन्याय होतो असे वाटत राहते. असे लोक यावेळी मोदींच्या विरोधात आहेत. पण ते त्या पक्षाला मतदान करतील जे त्यांच्या ह्या समस्या 65 वर्ष्यात सोडवू शकले नाहीत. या सर्वांना टार्गेट करण्यासाठी तर राहुल गांधी उर्फ खान यांनी महिना 12000 रुपये खैरात देण्याची घोषणा केली आहे. भाजपा च्या थोड्याफार जागा कमी होतील पण पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे वाटते.

In reply to by ट्रम्प

ढब्ब्या गुरुवार, 04/04/2019 - 20:20
नंबर चा विचार केल्यास, ऊप मध्ये भाजपा २५ एक सीट गमवेल पण बंगाल आणि तामिळ्नाडू सारख्या ठिकाणी ह्या भरुन निघतील वाट्टय. गुजरात, महा, राजस्थाह, मप्र ह्या बेल्ट मध्ये भाजपा ला थोडा फटका बसेल पण फार काही नुकसान होइल असे वाटत नाही. त्यामुळे कदाचीत त्यांच्या सीट आहे तेवढ्याच रहतील आसं वाटतय. खांग्रेस मात्र उप्र मध्ये पुर्ण झोपेल अस वाट्टय. पण केरळ आणी बाकी राज्यात स्तिथी बरी असेल. पण एकूण २०-२५ जास्ती सिट मिळ्तील कदचीत. अर्थात हा माझा अंदाज, सद्य स्थिती बघून ... एकूणात भाजपा परत सत्तेत येइल जर खांग्रेस आणी ईतर मध्ये मतविभागणी झाली तर. बाकी खांग्रेस चा मॅनिफेस्टो बघुन कुंपणावरचे काही भाजपा कडे वळले तर बरय.

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क Fri, 04/05/2019 - 02:50
विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुद्दे बघता मतदारांना प्रलोभन दाखवून गळाला लावण्याचा सरळसरळ प्रयत्न दिसून येतो आहे. महिन्याला ६ ते १२ हजार देण्याचे कबूल केलं आहे म्हणजे असे लोक ज्यांना याचा अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे कळत नाही किंवा इतर काही ज्यांना घेणेदेणे नसते अश्या लोकांची मते खिश्यात घालण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारचा प्रयोग दोन लाख कर्ज माफ करण्याचे वचन देऊन मप्र, राजस्थान मध्ये केला आहे आणि त्याला बळी पडल्यामुळे मतांची टक्केवारी कमी न होऊनसुद्धा भाजपला कमी जागा मिळाल्या. AFSPA , १२४ अ रद्द करणे आणि ३७०, ३५ अ रद्द न करणे हे मुस्लिमांना तसेच तुकडे गॅंगला त्यांचे पुढील आयुष्य त्यांचा अजेंडा राबवत सुखाने जगता येईल याचे आश्वासन आहे. याचे परिणाम ज्यांना फारसे समजत नाहीयेत किंवा समजले तरी काही घेणंदेणं नाहीये असे लोक पण काँग्रेसला मतदान करतील. तसेच NRC रद्द करण्याच्या आश्वासनामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सुद्धा चांगली मते मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसला बऱ्यापैकी सीट्स मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बहुमत मिळणे अशक्य आहे पण याचा परिणाम म्हणजे कडबोळ्याचे सरकार येणार. १९७७ आणि १९८९ चा इतिहास परत गिरवला जाणार का हे लवकरच कळेल. मी तर म्हणतो लोकांनी भाजपाला परत २ जागांवर आणून ठेवावं. भारतीय जनतेला फक्त माझा फायदा काय हेच महत्वाचं आहे, त्यामुळे हे इतर पक्ष त्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. बाकी देशाचे तुकडे होउदे, दहशतवादी हल्ले होउदे नाहीतर इस्लामिक स्टेट होउदे आपल्याला कर्जमाफी मिळतेय, पेट्रोल स्वस्त मिळतंय वर १२००० रुपये पण मिळत आहेत. अजून काय पाहिजे?

In reply to by ट्रेड मार्क

ट्रम्प Fri, 04/05/2019 - 14:38
या वेळी खरच भाजप चे सरकार आलेच नाही पाहिजे !! मस्त पैकी सीरिया / येमेन सारखी यादवी , पेट्रोल संपन्न व्हेनझुयेला सारखे खायचे वांदे , पाकिस्तान सारखे अल्पसंख्यक चे धार्मिक उछाद वाढले पाहिजेत . त्याच प्रमाणे जंगला मध्ये हाइना हा प्राणी जसा विचित्र आवाज काढून जीवंत हरिण ला पोटा पासून खायला सुरवात करतो आणि मग थोड्या वेळाने ते हरिण हळू हळू मृत्यु अवस्थे ला पोहोचते तशी अवस्था भारतातील मतदारांची झाली पाहिजे , कारण ग्लानी अवस्थेत वेदना जाणवणार नाही व सुखद मृत्य येईल !! पुढील निवडणुकीत भाजप चा पराभव होणार हे गृहीत धरून आदरणीय बंगाली बानो ,रागा , आदरणीय माया आणि हावेच अंदाज घेवून टोपी फिरवनारे काका यांच्यात पंतप्रधान पदावरुन सूचक इशारे सुरु झाले आहेत . गरीब लोकांचा उद्धार फक्त हीच मंडळी करु शकतील याची गरीबानां खात्री झालेली आहे . त्यामुळे येवूदयाच सर्व पक्षीय सरकार .

In reply to by ट्रम्प

ढब्ब्या Fri, 04/05/2019 - 19:34
उपहास म्हणून तुमचे मत ठीकाय, पण भारताची लोकसंख्या आणी लोकसंखेची घनता बघता, एक काडी पण यादवी सद्रुश्य परीस्थिती आणू शकते. कणखर आणी सक्शम नेत्रुत्वचीच (पण हुकुमशाही नाही) गरज आहे. कुठल्याही प्रकारे देश पोखरला जाउ नये हे महत्वाचे, जे तिसरी आघाडी किंवा खांग्रेस च्या राजवटीत घडू शकते असे वाटते.

In reply to by ढब्ब्या

सुबोध खरे Fri, 04/05/2019 - 19:52
महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात अजिबात पटत नाही. त्यामुळे त्यांचे सरकार आले तरी ते दीड ते दोन वर्ष पेक्षा जास्त चालणार नाही. मोदी साहेबानी मधल्या पातळीवर बरेच ठिकाणी प्रामाणिक अधीकारी आणून बसवलेले आहेत या लोकांना हटवून त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील लोकांना आणण्यासाठी वेळ लागेल. श्री मोदी यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याला हात लावलेला नाही कारण "राजकीय सूडाचा" मोठा अपप्रचार करून सहानुभूती मिळवता येते हे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्रीमती जयललिता यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे श्री मोदी यांनी मोठ्या नेत्यांना हात न लावता त्यांच्या चेल्या चमच्यांचा विरुद्ध मोहीम चालवली आहे. त्या लोकांना वाचवण्यासाठी या महाठगबंधनच्या नेत्यांना कष्ट करावे लागतील. याना वाचवले नाही तर कार्यकर्ते नाराज होतात आणि वाचवायचे तर जास्त कष्ट पडतात. आपण म्हणताय तेवढे महाठगबंधनच्या लोकांना आता पैसे खाणे सोपे जाणार नाही. एक तर सामान्य माणसांना पेड मीडिया बद्दल खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी किती गुणगान केले तरी महाठगबंधनची लायकी लोकांना माहिती आहे. शिवाय सोशियल मीडिया मुळे आजकाल खाबू माणसांना धाक बसला आहे. त्यातून श्री मोदी यांनी अनेक लष्करी कंत्राटे शेवटच्या दोन वर्षात दिलेली आहेत ती पूर्ण होईपर्यंत नवी कंत्राटे देता येणे सहज शक्य होणार नाही. दरमहा ६ हजार रुपये हे २०% गरिबांना देणे हा अशक्य गोष्ट आहे हे सर्वच नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जसे कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा देऊन मध्य प्रदेशात आणि राजस्थान मध्यें काँग्रेस निवडून आली तिथे आता कर्जमाफी प्रत्यक्षात न आल्याने भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे तळागाळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती दोन वर्षांनी फेर निवडणूक झाल्यास होईल. त्यातून आता राज्यसभेत भाजपची गणसंख्य जास्त झाल्याने महाठगबंधनला कोणताही कायदा पास करून घेणे( उदा. AFPSA रद्द करणे) सहज शक्य होणारच नाही. मी तर म्हणतो सध्या भाजप पडली आणि महाठग बंधन निवडून आले तर बरंच होईल. कारण २ वर्षात भ्रमनिरास होऊन भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल निवडणुकीचा खर्च सामान्य माणसांच्या बोडक्यावर बसेल पण जर आपली लायकी तीच असेल तर तसेच सही.

In reply to by सुबोध खरे

ढब्ब्या Fri, 04/05/2019 - 21:09
तरी पण गुजराल, देवेगौडा सरकारचा ईतिहास पाहता, महाठगबंधन नकोच. नंतर च्या सरकार चा अर्धा वेळ घाण निस्तरण्यातच जाणार.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ Fri, 04/05/2019 - 22:33
अंशःत सहमत ! ज्या पद्धतशीर प्रमाणे ठरावीक मिडीया , संघटना व पक्ष, हिंदु समाजा विरुद्ध पब्लिकली गरळ ओकत आहेत त्यावरुन त्यांच्या पार्श्वभागावर चटके बसत आहेत हे स्पष्ट आहे !!

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Sat, 04/06/2019 - 10:53
पक्षीय बलाबल बद्दलची माहिती: http://164.100.47.5/Newmembers/partypositionsummary.aspx. मोदींच्या विरोधाला काहीही किंमत देण्याची कुणाला गरज वाटणार नाही. बाकी मोदी कोणत्या लोकांच्या मागे हात धुवून लागले त्याची माहिती जाणून घ्यायला आवडेल. सदा सर्वकाळ परदेश दौरे, निवडणूक प्रचार, संसदेतदेखील प्रचारकी थाटाची भाषणे या व्यतिरिक्त काही त्यांनी केले असेल तर बरेच आहे. लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल बाधित होणाऱ्या लोकांच्याच मताचा विचार व्हावा असे मला व्यक्तिशः वाटते. अगदी पुण्यात देखील बोपखेल, घोरपडी गावच्या लोकांच्या भावना लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल इतरांच्या भावनांपेक्षा वेगळ्या असतील.

In reply to by सर टोबी

विनोद१८ Wed, 04/10/2019 - 23:13
.......सदा सर्वकाळ परदेश दौरे मोदींच्या मनात आले आता बर्याच दिवसात गोट्या खेळलो नाही कि लगेच चालले अमेरिकेला ट्रुम्प बरोबर, इस्राईल मध्ये नेत्यानाहु बरोबर आणि तिकडे जापानमध्ये तो शिन्जो आबे हे सगळे निरोद्योगी लोक्स अगदी वाटच बघत असतात मोदीची, हा मोदी इकडे आमच्याकडे येतोय कधी आणि आपण त्याच्याबरोबर गोट्या खेळतोय कधी. अर्थात ही मोठी माणसे आपसातच खेळ्नार विरंगुळा म्हणुन. माझातर्फे या गोट्यापंडीताचा णिषेद.

In reply to by कंजूस

ट्रेड मार्क Fri, 04/05/2019 - 03:16
काँग्रेसने दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करायचं म्हणलं तर साधारणपणे २० लाख कोटी लागतील असा अंदाज आहे भारताचं टोटल बजेट २१.५ ते २२ लाख कोटी आहे. म्हणजे सगळी कर्जमाफी, ७२००० रुपये, सबसिड्या वगैरे देऊन सुद्धा जवळपास २ लाख कोटी उरतातच की, मग अजून काय पाहिजे? होऊ द्या खर्च, भरपूर पैसा आहे आपल्याकडे. त्यातूनही वर लागलेच तर मनमोहन सिंगांसारखे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री आहेतच, ते भारी आयड्या काढून बक्कळ पैसे मिळवून देतील. तसा नाईलाजाने का होईना पण इमानेइतबारे आयकर भरणारा मध्यमवर्ग आहेच. एक १०-१५% टॅक्स सहज वाढवता येईल. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सॅम पित्रोदा यांनी सांगितलं आहे की मध्यमवर्गाने स्वार्थी बनू नये. मोठ्या मनाने त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरीब लोकांना वाटण्यासाठी वाढीव कर द्यायला काय हरकत आहे? संपूर्ण चर्चा इथे बघा. जीएसटीची एकच स्लॅब करण्याचे पण रागानी आश्वासन दिले आहे. म्हणजे जर सरसकट सगळ्या वस्तू १२% नी लावल्या तर कितीतरी उत्पन्न वाढेल. आहात कुठे?

डँबिस००७ गुरुवार, 04/04/2019 - 20:57
पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना यु ए ई चा उच्चतम पुरस्कार झायेद मेडल गौरवण्यात आलेल आहे. यु एन ओ, अमेरिका, युरोप मधले देश त्यानंतर मध्य पुर्वेतले देशांवर पंत प्रधान नरेंद्र मोदीजीं नी काय जादु केलेली आहे कोण जाणे की एका पेक्षा एक वरचढ पुरस्कार हे देश मोदीजींना देत सुटलेले आहेत. https://www.khaleejtimes.com/international/india/narendra-modi-responds-after-uae-awards-him-zayed-medal

गामा पैलवान Fri, 04/05/2019 - 01:42
लोकहो, नाहीतरी चौकीदार चोर आहे असं म्हणतोच ना पप्पू, मग मोदी चारसोबीस झाले ना? म्हणजेच मोदींना येत्या निवडणुकीत ४२० जागा मिळणार हे पप्पूच सांगतोय. आ.न., -गा.पै.

ट्रम्प Fri, 04/05/2019 - 22:33
या कलाकरांच्या टोळक्या तील कित्तेकानां कुत्री सुद्धा ओळखत नसतील . नासिररूद्दीन च्या नावा बद्दल अपेक्षा होती पण आश्चर्य वाटले पटवर्धन , देशपांडे , आणि पालेकर चे . सामान्य लोकांना लोकशाहीवरचा धोका आज पर्यन्त दिसला नाही मग यांना कसा क़ाय दिसतो ? vote against bjp: भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन http://mtonline.in/HmsTyZ?

In reply to by ट्रम्प

गामा पैलवान Sat, 04/06/2019 - 14:53
ट्रम्प, बातमीबद्दल धन्यवाद! बातमीत म्हटलंय की कलाकारांच्या मते भाजपमुळे भारतीय संविधान धोक्यात आलंय. पण मग हेच कलाकार नक्षलवाद्यांचा निषेध का करंत नाहीत? जो पक्ष ( म्हणजे मोदी) घटनादत्त मार्गाने राजकारण करतोय त्याच्या विरुद्ध विनाकारण बोंबा ठोकायच्या. आणि त्याच वेळी जे नक्षलवादी भारतीय घटना उघडपणे नाकारून हिंसक मार्ग चोखाळतात त्यांना मात्र पाठींबा द्यायचा. याचा अर्थ असा की उपरोक्त कलाकारांना भारतीय संविधान कोलमडायला पाहिजे. कोण घटनाद्रोही आहे ते कळलं ना? आ.न., -गा.पै.

In reply to by ट्रम्प

विनोद१८ Wed, 04/10/2019 - 23:35
......या फुकट्यांचे विविध पदावर वर्णी लागणे, फुकटचे मिरवणे, दिल्ली दरबारी चापलुसी करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे फुक्कट सरकारी खर्चाने फुक्कट चरणे, झालेच तर सरकारी महामंडळातर्फे परदेशी प्रवास वगैरे चंगळ आता २०१४ नंतर बंद झाली आहे, तेव्हा ते मोदीसरकारला शिव्याशापच देणार, या सर्व फुकट्खाऊंची खरी पोट्दुखी हीच आहे की मोदी यांच्यासमोर चार उष्टेखरकटे दाणेसुद्धा टाकत नाही. दुर्लक्ष करा, यांचे सिनेमे पाहणे बंद करा. असे वाळीत टाकले तरच सरळ होतील.

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 11:51
पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा खोटा - अमेरिकन नियतकालिक https://www.bbc.com/marathi/international-47829521 -- ही बातमी एक अफवा असल्याचे भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे. जर का वरिल बातमी अफवा असेल तर भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही हा एक प्रश्नच आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Sat, 04/06/2019 - 15:07
भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही अस करता येणार नाही कारण भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी एफ १६ पाडल पण ते पाकिस्तानच्याच भुमीत जाऊन पडल . ज्यावेळेला अभिनंदनच्या मिग २१ बायसन ह्या विमानाचा पाठलाग करत होते तेंव्हा पाकिस्तानी एफ १६ च्या मागोमाग मिग २१ बायसन सुद्धा पाकिस्तानी हद्दीत घुसल, ते मिग २१ बायसन विमानाच्या जुन्या तंत्रा मुळे वैमानिकाला समजु शकले नाही. अभिनंदन असेच समजत राहीला की तो भारताच्या हद्दीतच आहे. आता जर पाकिस्तानच्या विमानांचा पा ठलाग करावा लागला तर फारुख अब्दुल्ला सारख्या हलकट नेत्यांना मिग २१ बायसन विमाना च्या टपावर बांधुन घेऊन जावे लागेल. मग भारतीय वायुसेनेने शत्रुचे विमान पाडले की नाही ह्याचा आंखो देखा हाल त्या नेत्यांना उपलब्ध होईल

In reply to by प्रसाद_१९८२

Not aware’: Pentagon on Pak F-16 count after Feb aerial dogfight with IAF एफ-१६ पाडले नाही असे प्रसिद्ध करणारे नियतकालीक अमेरिकन सरकार किंवा पेंटॅगॉनचे अधिकृत मुखपत्र नाही. आपल्याकडे जश्या सोईस्कर बातम्या "छापून आणल्या जातात" त्यातलाच हा अमेरिकन प्रकार आहे. भारतिय वायूसेनेने पेंटॅगॉनकडे, (अ) एफ-१६ची रडारवरची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि (आ) पाकिस्तानी विमानाने सोडलेल्या AIM-120 AMRAAM मिसाईलचे भारतात पडलेले व क्रमांकासह असलेले अवशेष, असे दोन सज्जड पुरावे दिले आहेत आणि ते निर्विवाद आहेत. पेंटॅगॉनने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१६ची मोजणी केली असली तरी त्यासंबंधी माहिती उघडपणे देणे त्यांना फार गैरसोईचे आहे. कारण, आजतागायत जगभरातून अनेक देशांकडून मागणी असूनही, अमेरिका हे विमान फार थोड्या देशांना आणी तेही वापरण्यासाठीच्या अनेक अटींवर देते. असे आधुनिक विमान ६०-६५ वर्षे जुन्या (आणि तेही रशियन) विमानाने पाडणे हे... (अ) अत्यंत मानहानीचे आहे व (आ) भविष्यातल्या एफ-१६च्या विक्रिच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे, एखादे विकाऊ नियतकालीक पकडून अमेरिका दिशाभूल करू शकते. किंवा त्यापेक्षा जास्त शक्यता अशी आहे की, आपले नाक वाचविण्यासाठी पाकिस्तानने ही बातमी छापून आणली असावी. (बालाकोट हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झाले नाही, अशी बातमीही छापून आणली होती हे आठवत असेलच. नंतर परदेशी वार्ताहरांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवू असे सांगून, भेट तीनदा पुढे ढकलून, शेवटी ती भेट बारगळली; आणि सत्य जगासमोर आलेच.) आता, पेंटॅगॉनने (मोजणी केली असली नसली तरी) अशी काही मोजणी केली नाही असे सांगून, त्या नियतकालिकातील बातमी फेक असल्याचे दुरान्वयाने सांगितले आहे. पण, एफ-१६ पडले की नाही याबद्दल मौन पाळले आहे. विमान पाडले असे कबूल केल्यास, ते प्रकरण अमेरिकन काँग्रेससमोर जाऊन अमेरिकेला पाकिस्तानवर बंधने (सँक्शन्स) घालावी लागली असती व ते करणे सद्यस्थितीत अमेरिकेला परवडणारे नाही. कारण, अफगाणिस्तानमधून पाय काढून घेण्यासाठी तालिबानशी चाललेल्या वाटाघाटींसाठी अमेरिकेला अजूनही पाकीस्तानच्या मदतीची गरज आहे... त्यातले महत्वाचे तालिबानी गट पाकिस्तानची अपत्ये आहेत.

In reply to by महेश हतोळकर

त्यांनी मी वरच्या प्रतिसादाच्या तिसर्‍या परिच्छेदात लिहिलेले पुरावे दिले आहेत. हे पुरावे पेंटॅगॉनला, पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी, गोपनियरित्या अगोदरच दिले होते. मात्र, (अ) अमेरिकन नियतकालिकात, "पाकिस्तानमध्ये केलेल्या मोजणीत सर्व एफ१६ विमाने सुरक्षित आहेत असे दिसले", अशी दिशाभूल करणारी फेक न्युज पाकिस्तान (आणि ?पेंटॅगॉनने) छापून आणल्यामुळे आणि (आ) तिचे भारतिय राजकारणी आणि तथाकथित विचारवंत यांनी भांडवल करणे सुरू केल्यामुळे भारताला, अमेरिकेचा रोष झाला तरी त्याला झुगारून, पाकिस्तानला (आणि ?अमेरिकेला) उघडे पाडणे भाग पडले आहे. अमेरिकेला असे उघडे पाडण्यासाठी आणि तसे करताना एफ्१६ची बाजारातली किंमत करण्याचा निर्णय घेण्यासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती व धाडस यांची गरज असते... ते सद्य सरकारने दाखवले, याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटायला हवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महेश हतोळकर Tue, 04/09/2019 - 11:36
विद्यमान शासनाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हाच खरा मुद्दा आहे. विमान पाडलं, कारवाई केली, पुरावे दिले यापेक्षा शासनाचा जनतेला अभिमान वाटतो याचाच अनेकांना मस्तकशूळ आहे. तो वाटू नये यासाठीच हा सगळा गदारोळ सुरू आहे.

In reply to by महेश हतोळकर

आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक हल्ला करून सामर्थ्यवान राष्ट्राला न दुखावता आपले ध्येय साध्य करता येणे", हा सर्वात योग्य आणि जागतिक मान्यतावर्धक मार्ग समजला जातो... कारण, त्यामुळे जिथे जे संदेश पोचायला हवे असतात, ते तिथे पोचतात. :) सद्या भारताने स्विकारलेला मार्ग, शेवटचे सामंजस्यपुर्ण हत्त्यार असते. जेव्हा भारताने बालाकोटवर (पक्षी : पिओकेमध्ये नाही तर पाकिस्तानच्या सार्वभौम भूभागात ८० किलोमीटर आत जाऊन) हल्ला केला, पण तरीही, चीन व मुस्लिम राष्ट्रांसह एकाही देशाने भारताला दोष दिला नाही... तेव्हाच भारताने जागरिक स्तरावर पाकिस्तानवर मुत्सद्दी विजय मिळवला होता. आपले डावपेच उघड करण्याने (आंतरराष्ट्रिय स्तरावर) अधिक काहीच साध्य होणार नव्हते. पण, पाकिस्तानच्या आणि चुकार भारतियांच्या नाठाळपणाला उपाय म्हणून तसे करावे लागले. किंबहुना, ते डावपेच जाणण्याची सर्वात जास्त जिज्ञासा व गरज पाकिस्तानला आहे... व काही मूर्ख भारतीय, स्वार्थी हितसंबंधांसाठी, (व ते पाकिस्तानला कळले तरी बेहत्तर पण) ते उघड व्हावेत यासाठी गदारोळ करत आहेत. युद्धशास्त्रातला एक महत्वाचा नियम असा आहे : "आपल्या 'न केलेल्या' आणि 'यशस्वीरित्या केलेल्याही' कारवायांच्या डावपेचांचा सुगावा शत्रूला न लागू देता, त्याला सतत गोंधळात ठेवणे, म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे."

In reply to by विनोद१८

हे त्यांना चांगले माहीत असते, पण स्वार्थापुढे देश आणि स्वत सोडून इतर सर्व खड्ड्यात गेले तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसते. इतके निर्लज व निर्ढावलेले मन असल्याशिवाय, गरिबांच्या आणि इतर नागरिकांच्या विकासासाठी, इतकेच काय तर गरोदर स्त्रियांसाठी आणि कुपोषित बालकांच्या पोषणासाठी असलेला कराचा, पैसा सहजपणे खाणे कसे शक्य होईल ???!!!

भंकस बाबा Sat, 04/06/2019 - 11:54
पुण्यात एका युवा मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना पप्पू साहेब बरळले की न्याय योजनेला पैसा परदेशी पळालेल्या भगोडयाकडून आणून गरीबाना वाटला जाईल, धन्य त्या कोंग्रेस पक्षाची आणि रागा तर धन्य आहेच. पण कमाल एका गोष्टीची वाटली की पुण्यात तरुण वर्गाने असे भतुले ऐकून घेतले, एकाही श्रोत्याने यावर आक्षेप नोंदवला नाही? कारण नीरव मोदी, माल्या , चोक्षी असे किती पैसे घेऊन पळाले आहेत की या न्याय योजनेच्या अजगराला पूरे पडतील?

मराठी_माणूस Sat, 04/06/2019 - 12:28
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/chai-pe-charcha-village-says-word-not-kept-will-use-nota-to-protest/articleshow/68747434.cms कोणीही आले तरी ह्या लोकांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?

स्वामि १ Sat, 04/06/2019 - 17:19
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या

In reply to by स्वामि १

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 17:53
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या -- हा तर खूप जुना फंडा झाला. आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))

In reply to by स्वामि १

ट्रेड मार्क Sun, 04/07/2019 - 05:57
शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकला होता काय? लोकसभेची निवडणूक देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवते. प्रादेशिक भाषा आणि राज्यासाठी प्रत्येक राज्य विचार करत बसलं तर कसं सरकार येईल याचा काही विचार केला आहे का? प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी विधानसभेच्या निवडणूक आहेत.

स्वामि १ Sat, 04/06/2019 - 17:38
मराठी व महाराष्ट्रा वर परप्रातीयांचे आक्रमक झाले असून मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे म्हणून जो मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा

In reply to by स्वामि १

प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 17:56
मराठी भाषा व महाराष्ट्राचे 'नवनिर्माण' करायची प्रतिज्ञा घेतलेला पक्ष यंदा निवडणुकच लढवत नाही आहे ना. नाहितर केले असते त्याला मतदान.

In reply to by प्रसाद_१९८२

बाप्पू Sat, 04/06/2019 - 20:57
हो ना.. मराठी चा ठेका घेतलेले आदरणीय ठाकरे साहेब हे यंदा बारामतीच्या काकांचा प्रचार करणार आहेत. तसें कॉन्ट्रॅक्ट साइन झालेय.. त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत काहीतरी सेटलमेंट करायची असेल.. असो. हेच राज ठाकरे छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे इ विरुद्ध अगदी बेंबी च्या देठापासून बोंबलत होते.. आता त्याच लोकांना निवडून आणण्यासाठी सभा घेणार आहेत म्हणे. मनसे सैनिकांचा ( राज ठाकरे गुंड सेना ) मेंदू तपासून घेतला पाहिजे.. कारण ते अजूनही राज ठाकरे यांच्या माकड उड्यांवर टाळ्या वाजवतायत...

In reply to by बाप्पू

ट्रम्प Sun, 04/07/2019 - 10:22
अहो त्यांच्या सभेला होणारी गर्दी मनसे ला मतदान करत नव्हती तर काँग्रेस आणि चलाख काका ला मतदान करील याची काही शाश्वती नाही. एका परिने राज जितके मोदींच्या नावाने बोम्बलतिल तितके भाजप सेने चे मतदारा वाढतील . कारण राज ठाकरे ला माणनारा वर्ग हा उजव्या विचारांचा , देश व धर्म यांना प्राधान्य देणारा , सुशिक्षित आणि आर्थिक दुष्टचक्रातून बाहर असलेला आहे , त्यामुळे राज नी जरी टोपी फिरवली तर राज ला फिरवायला या वर्गाला वेळ लागणार नाही . राजकारणात वाटचाल करताना जरी त्यांची व्यूवरचना चुकली असली तरी प्रतिमा खराब न होवू देता त्यांनी पुन्हा भरारी घेणे अपेक्षित होते , पण तसे न करता एखाद्या पाळीव प्राण्या सारखे काकांच्या ईशाऱ्या वर मोदिवर ओरडत सुटले आहेत . बर मोदींच्या विरोधात साथ कोणाची देत आहेत तर कुप्रसिद्ध काँग्रेस आणि रा कॉ ची ? या दोन पक्षा बद्दल राग असणारे राज च्या आवाहनावरुन कशा वरुन त्या दोन बदनाम पक्षाला मतदान करतील ? त्यांच्या या दुहेरी व्यक्तिमत्वचा धिक्कार करणारे मनसे चे कार्यकर्ते मनसे सोडून केव्हाच गेले आहेत .

गोंधळी Sat, 04/06/2019 - 18:50
सध्या भरतीय जनतेला २०१४ च्या मानाने कठीण परिस्थिती आहे. कमकुवत व स्क्शम नस्लेला (पुर्विचा भ्रष्टाचारी) विरोधी पक्ष तर दुसरीकडे बहुमत मिळुनही फारस काही करु न शकलेला (जुमलेबाज व फेक)सत्ताधारी पक्ष.

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Sat, 04/06/2019 - 22:22
जुमले परवडले????? सामान्य भारतीय जनतेला नाही परवडनार. तुम्ही असाल हो असामान्य. हिरवळ नको असेल तर त्यांना ग्रुहमंत्री करा पण पंतप्रधान नकोच.

In reply to by गोंधळी

भंकस बाबा Sun, 04/07/2019 - 07:35
15 लाख न मिळाल्याचे दुःख तुमच्या प्रतिसादातून ओसंडून वहात आहे. हिरवळ फोफावण्याचे कारण आपल्या पप्पूच्या पार्टिची धोरण आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला हे ही नसे थोडके! आता जरा रागाच्या जाहिरनामा तपासू. हे जे फुकटचे खैरात वाटायचे चालले आहे ते फार वर्षापूर्वी ग्रीस या देशाने करून बघितलेले आहे. परिणाम आज त्यांची अर्थव्यवस्था गंटागळ्या खात आहे. गोंधळी साहेब तुम्ही आयकर भरत असाल अशी अपेक्षा करून हे बोलन्याची हिम्मत करतो की तुम्हालाच पिळून हे खैरात वाटणार आहेत. राहिली गोष्ट तुम्हाला न मिळालेल्या 15 लाखानी तुमचे माझे काही नुकसान झालेले नाही. ( 15 लाख देणार हे मोदिनी कुठेही म्हटलेले नाही)

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Sun, 04/07/2019 - 11:40
बहुधा तुमचा अभ्यास कमी दिसतो आहे़. जुमले - नोकरर्या देणे,उज्वला योजना,विमुद्रीकरण्,स्वच्छ भारत्,मुद्रा लोन्,मेक इन इंडिया,.......... अर्थव्यवस्थे बद्दल बोलता मग प्र.मं.आ.यो. अंतर्गत २लाख वाटले जातायत त्याचे काय? शेतकर्यांना ६ हजार वाटले त्याच काय? हे तुम्हाला पटते काय? RBI वर पैसे देन्यासठी दबाव का आणावा लागला? खर बोलणार्याला देशद्रोहि ठरवण्यात येत आहे. सरकारच चुका व अपयश दाखवणारर्या माध्यमांवर दबाव आणला जात आहे. सरकारच्या विरुद्ध जाणारी महिती बाहेर येउ दिली जात नाही आहे.खोटी महिती दिली जात आहे. आता ही विकास करनण्याबद्द्ल,.बेरोजगारि बद्द्ल काहीच बोलत नाहि आहेत. मी मान्य करतो की भारतीय जनता जास्त भावनाशील आहे.त्यामुळे आपल जास्त नुकसान झालेल आहे. पण आता फक्त मनाने विचार न करता बुद्धीला पटेल ते केल पाहिजे.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Mon, 04/08/2019 - 07:21
किती गोंधळ घालताय. नोकऱ्या देणे: एकच उदाहरण देतो, तुमच्या लाडक्या राफेल प्रकरणात रिलायन्सला एवढं मोठ्ठ कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यांनी कंपनी स्थापन सुद्धा करून फाल्कन विमानाचे सुटे भाग तयार सुद्धा करायला सुरुवात केली. मग तिथे काय अनिल अंबानी आणि त्याचे कुटुंब स्वतः सगळी कामं करतेय का? नोकऱ्या तयार झाल्या नाहीत? बरं जिथे फॅक्टरी आहे तिथे वाहतूक करणारे, भजी तळून आणि चहा बनवून लोकांच्या खाण्याची व्यवस्था करणारे वगैरेंना रोजगार मिळाला नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... अगदी गंगेतून होणाऱ्या जलवाहतुकीपासून सरदार पटेलांच्या पुतळ्यापर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट रोजगार देण्याचे आश्वासन देता येऊ शकते पण नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन कोणी कसे देऊ शकेल? मोदींनी २ कोटी "नोकऱ्या" देण्याचे आश्वासन दिले होते याचा काही पुरावा द्याल का? प्रधान मंत्री आवास योजना: २ लाख काय खैरातीसारखे वाटले जात नाहीयेत. जर निम्न उत्पन्न गटातील लोकांना जर स्वतःचे घर घ्यायला मदत मिळत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटतंय? संपूर्ण घर फुकट देत नाहीयेत तर थोडी मदत करत आहेत. यात मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांपैकी कोणी घोटाळा केला असेल तर ते सांगा. बादवे प्रगत देशांमध्ये सुद्धा पहिले घर घेणाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारी मदत मिळते. शेतकऱ्यांना ६ हजार: वर्षाला ६ हजार रुपये बीबियाणे आणि इतर खर्चासाठी मिळणार आहेत. हे सुद्धा सरसकट वाटले जात नाहीयेत. यात घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या. कोण कोणाला देशद्रोही ठरवत आहे? खरं बोलणाऱ्याला म्हणजे कोणाला? जे तुम्हाला खरं वाटतंय ते मला नसेल वाटत तर? पण तरीही भाजप किंवा सरकारने असे "खरं" बोलणाऱ्यांवर काही कारवाई केली आहे का? का नुसते सोशल मीडिया वर कोणी तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही ओरडताय? कुठल्या माध्यमांवर कोणी दबाव आणलाय याचे पुरावे तर द्या. उगाच काहीपण टायपायचे. बेरोजगारी वर बोलत नाही म्हणजे काय? विकास होत नसेल तर नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कुठल्या पार्टीचे सरकार आहे ते बाजूला ठेवा, सरकारचे काम संधी तयार करायचे आहे. ते काही तुम्हाला बोटाला धरून नोकरी मिळवून देणार नाहीत. भांडवलाअभावी जे लोक छोटामोठा व्यवसाय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मुद्रा योजना आहे, तर तुम्हाला त्यावरही आक्षेप असेल. नवीन व्यावसायिकांना कुठलीही ब्यांक दारातही उभं करत नाही हे स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा. मग अश्या लोकांना सरकार मदत करत असेल तर ते पण रोजगार निर्माण करणेच नाही का? फुकट दरमहा ६-१२ हजार देण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे. ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी जे स्किल लागते ते मिळवणे, इंटरव्यू पास करणे हे प्रत्येकाला आपलेआपलेच मिळवावे लागणार आहे. त्यात सरकार काय करणार?

In reply to by गोंधळी

भंकस बाबा Mon, 04/08/2019 - 08:56
अहो नीट अभ्यास केला असता ना मी(10वीच्या बोर्डाचा)जाउदे! मुद्द्यावर येउया. स्वच्छ भारत - जरा मुंबईत येऊन फिरा, जागोजागी स्वच्छतागृह उभी राहिली आहेत. पुष्कळ स्वछतागृह ही कोंग्रेसच्या नगरसेवकानी वा आमदारानी उभारली आहेत. ही त्यानी समाजसेवा म्हणून नाही तर मोदींच्या भीतिने उभारली आहेत. ज्या भागात पाच वर्षापूर्वी स्वछतागृहाची निकड नव्हती तिथे अचानक स्वछतेचा का पूळका यावा? तर आपण नाही केले तर मोदी करतील या भीतिने! मग मारे त्यासाठी केंद्राकडून अनुदान घेतले असेल पण नाव मात्र या टिकोजीरावांचे, कोंग्रेसचे आमदार अस्लम शेख हे या बाबतीत आघाडिवर आहेत. नाहीतर या माणसाला फक्त अनधिकृत मशिदि बांधण्यासाठी निवडून दिले आहे असा संशय येतो, बाकी मतदारसंघात काही उल्लेखनीय कामगिरी नाही. गंगा स्वछता अभियान- फार वर्षापूर्वी गंगेचे फोटो यायचे वर्तमानपत्रात छापुन , तटावर जाळले गेलेले मृतदेहाचे अर्धवट जळलेले अवशेष गंगेत वाहत असलेले! अगदी गंगेचे घाट वेगेरे पार्श्वभूमीवर दाखवून. आता असे फोटो का नाही येत? मिशन फेल गेले आहे हे दाखवायला विरोधी पक्षाना बरे नाही का पडणार? बर जलवाहतुक, त्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर वेगेरे गोष्टी चर्चेला घेतल्याच नाहीत. मी ज्या कंपनित काम करतो त्या फ़र्मला मेडिकल ट्रांसक्रिप्टर या पदासाठी उमेदवार पाहिजे आहे, मिळतच नाही आहे. जे येतात ते असा पगार मागतात की आमचा मैनेजर खजिल होतो. कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या तेवढा पगार देतात. ही परिस्थिति सगळीकड़े आहे. कामे आहेत पण योग्य उमेदवार नाही, योग्य उमेदवाराला घेण्यासाठी कंपन्या टपलेल्या आहेतच. तर गोंधळी साहेब डोळे उघडा आणि आजुबाजुला बघा,

In reply to by भंकस बाबा

गोंधळी Mon, 04/08/2019 - 11:11
भंकसजी व ट्रेड मार्कजी जरा ही लिंक पहा - https://www.youtube.com/watch?v=wfF5Q17lYy4 मला फक्त एवठेच म्हणायच आहे की जे बरोबर आहे ते आहे पण जे चुक आहे किंवा खोट आहे त्याला चुकिचेच म्हटले पाहिजे. व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल.

In reply to by गोंधळी

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 12:26
व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल. जरा कळ काढा येत्या मे मध्ये कळेलच काय दिखावा आहे आणी व सत्य काय आहे ते समजुन येइलच !!

In reply to by गोंधळी

ट्रम्प Mon, 04/08/2019 - 18:45
मला सुद्धा भाजप चे सरकार आणि मोदी जुमलेबाज वाटतात !!!! अस वाटतं फेकून देवू भाजप ला अडगळीत!!! पण भाजप ला पर्यायी पक्ष लवकर आठवत नाही हो !! बर गठबंधन ला निवडून द्यावे तर किमान 2004 व 2009 सारखी परिस्थिति आता हवी होती , म्हणजे पंतप्रधान पद काँग्रेस ला भेटणार का ? भेटले तर काँग्रेसमध्ये 130 करोड़ लोकांचे नेतृत्व खंबीर / गंभीरपणे करणारा कोणी आहे का ? काँग्रेस ला पंतप्रधान पद देणे इतर पक्षानां मान्य असेल का ? आत्ताच पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात एकमत नाही तर सुशिक्षित असलेल्या भाजपा विरोधकांनीं सत्तेची चावी कोणाला सोपवावी ? पंतप्रधान पदी भाजप व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचा कोणता नेता योग्य वाटतो ? या विषयावर मला आपले विचार वाचायला आवडतील . 2009/ 2014 ला निष्कलंक ममो होते म्हणून ठीक , पण आता कोणत्या पक्षाचा कोणता नेता पंतप्रधान पदी योग्य वाटतो ? कोणते नेते सक्षम / योग्य वाटतात ?

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Tue, 04/09/2019 - 06:22
म्हणजे मोदींचे नाव घेतात म्हणून एबीपी सारख्या मोठ्या न्यूज चॅनेलच्या प्रक्षेपणात अडथळे आणू शकतात पण नंतर पु. प्र. वाजपेयींनी जे ब्लॉग लिहिले किंवा मुलाखती दिल्या व्हिडीओ पब्लिश केले त्यावर मात्र सरकारने काहीच केले नाही? एवढंच नव्हे तर ज्या ध्रुव राठीच्या तूनळी च्यानेलची लिंक तुम्ही दिली आहे त्याच च्यानेलवरून ध्रुव कितीतरी मोदीविरोधी गरळ ओकत असतो. त्यावर किंवा वायर वगैरे च्यानेल्स वर काहीच कारवाई होत नाही? असं कसं होत असेल बरं? अगदी एनडीटीव्ही वरून तसेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष वगैरे सगळे हाय प्रोफाईल पत्रकार तर अगदी २००२ पासून मोदींविरुद्ध बोलत आहेत, नाहीनाही ते आरोप करत आहेत त्यांचे च्यानेल नाही ब्लॉक झाले? मध्यंतरी रवीश कुमारने पण ब्लॅकआउट स्क्रीनचं नाटक केलं होतं हे आठवत असेल. मोदींनी किंवा सरकारने त्यांचे प्रोग्रॅम ब्लॅकआउट केले हे कशावरून? ध्रुव राठी सांगतो म्हणून? काय पुरावा आहे?

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Tue, 04/09/2019 - 11:11
अगदी अपेक्षित प्रतिसाद दिलात. मुळ मुद्दा असा आहे कि त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा. त्यांना पैसे देउन अस बोलायल लावले आहे का?

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Wed, 04/10/2019 - 03:25
कोणाचे काय काय लागेबांधे आहेत, कोणाची कुठे कुठे बोटं किंवा गळे अडकलेत, कोणाचे कसले साटेलोटे आहेत हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? पण मी सगळ्या बाजूची मतं वाचतो/ ऐकतो. उदा. राफेलचा मुद्दा - मोदी, सीतारामन, जेटली यापासून ते रागा, पायलट, सिंदिया, पवन खेडा सगळ्यांची मतं ऐकली. फ्रांस सरकारने दिलेलं प्रेस रिलीझ वाचलं. त्यानंतर कॅग आणि कोर्टाच्या निर्णयानंतर माझं तरी मत असं बनलं आहे की या प्रकरणात घोटाळा झाला नसावा. या विषयावर समस्त पत्रकारांमध्ये फूट पडली आहे. अर्णब आणि काही प्रमाणात टाइम्स नाऊचे पत्रकार घोटाळा नाही म्हणतात तर राजदीप, बरखा ईई घोटाळा आहे हे ठासून सांगतात. त्यात तुम्ही ध्रुव राठीचे व्हिडीओ बघितलेत तर त्याने मांडलेल्या मुद्द्यनमध्ये फारसा दम वाटत नाही. ओढून ताणून संबंध लावणे अर्थाचा अनर्थ करणे हे बऱ्याच प्रमाणात दिसते. तुम्ही वर टाकलेल्या व्हिडीओ मध्ये जे प्रकरण आहे ते राफेलच्या मानाने छोटं आहे. पण राफेलच्या प्रकरणात सरकारविरुद्ध किंवा मोदींविरुद्ध जाहीरपणे बोलणाऱ्या कोणाला कुठल्या कारवाईला तोंड द्यायला लागलं आहे का? किंवा कुठल्या च्यानेलवर काही आडमार्गाने सुद्धा काही कारवाई झाली आहे का? त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा ही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.

In reply to by ट्रेड मार्क

lakhu risbud Wed, 04/10/2019 - 10:20
हा ध्रुव राठी हे काँग्रेस च्या इको सिस्टिम ने मोठे केलेले प्रकरण आहे. ऑर्डर मिळाल्यासारखे याच्या ट्विट ला सागरिका घोष आणि तत्सम पत्रकार रिट्विट करायला लागतात. त्यानंतर लगोलग याला NDTV वर चर्चे बोलावणे येते. मग प्रिंट,वायर सारख्या वेबसाइट्स... ज्यातील बहुतांशी २०१४ नंतर जन्माला आल्यात त्या या ध्रुव राठी ला उचलून धरतात. एका ठराविक काळात त्याचे ट्विटर चे फॉलोवर्स लाखो ने वाढवले जातात. हे घडण्या पेक्षा घडवून आणले जात असते. https://www.youtube.com/watch?v=iMFCes4QDao

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Wed, 04/10/2019 - 14:12
माफ करा ती जाहिरात नाही आहे. पं.प्र प्रत्यक्ष त्या लोकांशी संवाद करत आहेत. अस दाखवण्याचा प्रयत्न आहे कि शेतकर्यांच उत्पन्न वाढल आहे. पण त्याच लोकांना याबद्द्ल विचारल्यास ते तस नसल्याच सांगत आहेत. हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? तुम्हालाही या संबंधी ठोस माहिती नाहि. त्यामुळे माझ त्या व्हिडीओ बद्दलच मत बदलेल नाही. तुम्ही जर त्या व्हिडीओ मधल्या लोकांच खरच उत्पन्न वाढल आहे ह्या संबंधी माहिती दिलीत तर माझ मत बदलेल. मुळ मुद्दा महत्वाचा आहे बाकी हा असाच आहे तो तसाच आहे ह्या वादात मला पडायच नाही आहे. मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Wed, 04/10/2019 - 18:22
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत? हीच स्थिती मोबाईल बद्दल १० वर्षांपूर्वी होती याची आठवण झाली. सध्या भारतात ७३ कोटी लोक भ्रमणध्वनी वापरतात. For 2017 the number of mobile phone users in India is expected to rise to 730.7 million. https://www.google.com/search?q=no+of+mobile+users+in+india&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=no+of+mobiles&aqs=chrome.2.69i57j0l5.7878j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8 The World Health Organization (WHO) had said that IAP was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/17605667.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst .. हा आकडा २०१२ चा आहे. या पाच लाख स्त्रियांच्या आणि बालकांच्या आयुष्याची किंमत काय? दारू पिण्यासाठी पुरुषांच्या खिशात पैसे असतात पण गॅसचा सिलिंडर आणण्यासाठी पैसे नसतात हि भीषण वस्तुस्थिती आहे. आणि जर राहुल गांधी सत्तेत आले तर ६ हजार रुपये दर महिना असेच खात्यात येणार आहेत मग काय चांदीच आहे.

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Wed, 04/10/2019 - 21:10
मी योजनेच्या विरुद्ध नाही आहे. तर साध्यते विषयी शंका आहे. https://www.livemint.com/Politics/oqLQDFKNuMdbmLEVL88krN/Indias-poor-are-not-using-LPG-cylinders-they-got-under-Ujjw.html https://www.thehindu.com/news/national/about-85-of-ujjwala-beneficiaries-in-four-states-still-use-earthen-stoves/article26763409.ece

In reply to by गोंधळी

विनोद१८ गुरुवार, 04/11/2019 - 00:13
मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. याचे उत्तर अगदी सोप्पे आहे, ते फुकट द्यायला सांगू.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क गुरुवार, 04/11/2019 - 06:51
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या OSD आणि इतर जवळच्यांकडे २८१ कोटी रुपये सापडले आहेत अशी बातमी आहे. पण जरा गुगलून बघा किती मुख्य वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन म्हणून आहे. तसेच किती न्यूज चॅनेल्स वर यावर ब्रेकिंग न्यूज म्हणून चर्चासत्र झडत आहेत. राफेल प्रकरणात सगळे मोदींना फक्त प्रश्न विचारात आहेत. पण ६०,००० कोटींच्या व्यवहारात ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिश्यात कसे टाकता येतील याचे स्पष्टीकरण राहुल गांधीला कोणीच विचारत नाही. राफेल वरचीच एक याचिका न्यायालयाने दाखल करून घ्यायला संमती दिली म्हणून सगळे लगेच त्यावर मोदींना मोठा झटका म्हणून ओरडायला लागले. पण राहुल आणि सोनिया ५००० कोटींच्या हेराल्ड प्रकरणात बेलवर बाहेर आहेत पण एकसुद्धा प्रश्न नाही? ध्रुव राठी, विनोद दुआ वगैरे स्वतःला तटस्थ समजणाऱ्यांनी या कुठल्या विषयावर राहुल/ सोनिया/ काँग्रेस/ प्रियंकाला गेलाबाजार काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याला व प्रवक्त्याला प्रश्न विचारणारे व्हिडीओ प्रदर्शित केलेत का? त्या व्हिडीओ संबंधी - त्या महिलेचं पाहिलं व्यक्तव्य होतं - माझं उत्पन्न दुप्पट झालं. मग त्यावर खोदून खोदून परत विचारण्यात आलं - आधी कुठली शेती करत होतात त्यातूनच झालं का? तर तिने नाही सांगितलं. तिथे क्लिप संपली. फक्त शेतीचं उत्पन्नच दुप्पट व्हायला पाहिजे असा आग्रह का? जर शेतीच्या जोडीने, सरकारच्या कुठल्या तरी योजनेमुळे/ साहाय्यामुळे, ती दुसरे व्यवसाय करून उत्पन्न वाढवत असेल तर चालणार नाही? गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी गुरुवार, 04/11/2019 - 15:21
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे.१ ला सिलेंडर वापरल्यानंतर तो परत रिफील करणार्यांच प्रमाण कमी आहे. ही सद्याची वस्तुस्थिती आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील. मुद्दा :- डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. किती ब्लॅक मनी पकडला त्याची आकडेवारी कोण देईल का? फेक नोटा सापड्ल्या पण आता ही २००० च्या फेक नोटा सापडत आहेत. https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-rbi-warned-govt-black-money-fake-currency-claims-medical-tourism/story/289291.html

In reply to by गोंधळी

सुबोध खरे गुरुवार, 04/11/2019 - 20:39
डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती सफल झाला आहे हे राजकीय पक्षांची वक्तव्ये वाचलीत तर ०% पासून १००% पर्यंत एकदा येईल. परंतु लष्कर आणि निमलष्करी दले आणि गुप्तचर खाते याना विचारले तर त्या बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर आल्या नाहीत त्या समजून येतील. माझ्या लषकरी गुप्तहेरखात्यातील मित्राशी सध्याच बोलणे झाले तेंव्हा त्याने सांगितलेली गोष्ट अशी आहे. १) महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगण या लागून असलेल्या नक्षलवादी भागात जे उद्योगधंदे आहेत त्यांच्याकडून नक्षलवादी खंडणी गोळा करतात हे उघड गुपित आहे. शिवाय शहरी नक्षलवादी सुद्धा त्यांना असेच पैसे पुरवत असतात. अधिकारीक तत्वावर कुणीच मान्य करणार नाही परंतु सर्वाना "माहित आहे." हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली. शहरी नक्षलवादी एकदम आरडा ओरडा कोल्हेकुई करू लागले याचे हे कारण आहे. २) विविध जिल्हा बँकांना अन सहकारी पतपेढ्याना पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता परंतु त्यांनि आपल्या संचालक मंडळाचे कोट्यवधी रुपये बदलून दिले आणि हे पैसे त्यांच्या तिजोरीत पडलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे वारंवार खेटे घालूनही बँकेने हे पैसे बदलून देण्यास नकार दिला आहे त्यामुळे एका बँकेत हे पैसे सडू लागल्याची बातमी आली आणि दुसऱ्या बँकेत उंदरांनी पैसे कुरतडल्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचा हिशेब साधा सरळ आहे. हे पैसे घेऊन त्याची विल्हेवाटच लावायची आहे. मग आपण बदलून का द्या? या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. यात एका राजकीय पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्या लोकांची निवडणुकीला उभे राहायची तयारी नाही. दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने आपले काही पैसे (बाकी बरेच पैसे फार मोठी किंमत देऊन बदलून घ्यायला लागले) आपल्याच जातीच्या बँकेतुन बदलून घेतल्याची अफवा आहे. या बँकेची स्थिती यामुळे अजूनच वाईट झालेली आहे. आणि त्यांच्या वर रिझर्व्ह बँकेचे अजूनच निर्बंध आले आहेत. https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/rbi-directs-mumbai-based-bank-to-restrict-withdrawals/articleshow/63819640.cms http://www.uniindia.com/ckp-bank-depositors-forum-urge-buying-of-unauctioned-attached-properties-of-fraudsters/business-economy/news/1202296.html काका मला वाचवा असा टाहो ऐकू आल्याचे काही लोक बोलताना ऐकू आलंय. दुवे काळजीपूर्वकी वाचा

In reply to by सुबोध खरे

सर टोबी Fri, 04/12/2019 - 16:34
नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे चांगलेच मोडले होते. आता निवडणुकीदरम्यान त्यांचे हल्ले परत वाढलेत परंतु त्याची कारणे वेगळी आहेत. मधल्या काळात मोदींच्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था चांगलीच वेगात धावायला लागली आहे. त्यामुळे लघु उद्योजक आणि शेतकरी यांच्याकडे चांगलाच पैसा खेळायला लागला आणि नक्षलवाद्यांना जीवदान मिळाले. त्यात अमोल पालेकर वगैरेंनी सत्तरच्या दशकात जो दाबून पैसा मिळवला तो आता त्यांनी शहरी नक्षलवादी म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. पण काळजी नको. नवीन सरकार आल्यावर एक अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक तर होणारच. स्थलसेना प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरेंच्या संपर्कात नसलेला ~ सर टोबी

In reply to by सर टोबी

सुबोध खरे Fri, 04/12/2019 - 20:30
एक गोष्ट लक्षात घ्या नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही. शिवाय काही गोष्टी कुठेच आणि कधीच प्रसार माध्यमात येणार नाहीत. त्या म्हणजे एकाच नंबरच्या दोन नोटा छापल्या गेल्या होत्या आणि हे सर्व सरकार आणि टांकसाळीत तज्ञ लोक यांचे साटेलोटे होते. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि टाकसाळ यांच्या हिशेबात जरी १४ -१५ लाख रुपयांच्या नोटा होत्या तरी वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. म्हणजेच १५. ४ लाख कोटी अधिकारीक नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या त्यापैकी १५.३ लाख कोटी परत आल्या. पण यात या दुहेरी क्रमांकाच्या नोटा पण परत आल्या. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत. अर्थात यावर ज्यांनी या दुहेरी क्रमांकाच्या नोटा जारी केल्या ते हा गोष्ट कदापि मान्य करणार नाहीतच पण उच्च रवाने आरडा ओरडा पण करीत आहेत. निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत तेलगी यांचा असाच बनावट मुद्रांकाचा घोटाळा ३० हजार कोटींचा होता आणि हा घोटाळा ८ वर्षे चालू होता. घोटाळ्यात अनेक पोलीस आणि सरकारी अधिकारी यांचं हात होता आणि तेलगी यांची नार्को टेस्ट झाली त्यात त्यांनी श्री शरद पवार आणि श्री छगन भुजबळ यांचे नावही घेतले होते. पण पुढे एकही आरोपीला शिक्षा झाली नाही. हा इतिहास आहेच. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/telgi-tattles-on-pawar-bhujbal-in-stamp-scam/articleshow/1964402.cms?from=mdr

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 04/16/2019 - 15:21
निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत
काहीही. चक्क काहीही लिहायचे? साचे म्हनजेच आर्टवर्क सिलिंडर फक्त चेंज झाले. फार कष्ट अन खर्च नसतात हो त्यासाठी. असे ना तसे होशंगाबादहुन लागतातच सिलिंडर रेग्युलरली. ते फक्त डिझाइन चेंज झाले. बाकी नोटा चौकोनच आकारातील असल्याने सरळ रेषेतले कटिंग शिवाय दुसरे काही नसते. त्यासाठी कटिंग लेआउट चेंज होतो फक्त. ग्रेव्हीयरचे साचे चेंज करायचा खर्च सरकार रेग्युलरली करते. त्यात काही नवीन नाही. जास्त फरक पडला तो एटीएम मशीन्सना. इव्हन हा नव्या साच्याचा खर्च भारतातले सारे एटीएम मशीन्स कॅलिब्रेट करण्याच्या खर्चासमोर न के बराबर आहे. सो साचे निकामी झाले म्हणण्याला काही अर्थच नाही. यंत्रे निकामी झाली हे तर मोट्ठा विनोद आहे. अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यामुळे जुनी यंत्रे आणि ती प्रोसेस निकामी झाली. ग्रेव्हियर, ईंटिग्लो आणि लिथो ह्या तीन तंत्रानीच नोटा प्रिंट केल्या जात होत्या आणि नव्या नोटाही ह्याच तंत्राने प्रिंट केल्या जातात. लहानसाहान अ‍ॅडऑन्स असतात पण ते रिसर्च आणि डिझाईन करतानाच केलेले असतात. मशीन्समध्ये अन प्रिंटिंगमध्ये मायन्त्युट चेंज करुन होतात ते. त्याने प्रोसेस अन मशीन बदलत नसते. बदल थोडासा कागदात झाला पण तो विषय वेगळा आहे. मशीन त्याच असतात. नोटाबंदीने नवीन मशीन आणल्या हा जोक आहे. नोटाबंदीनंतर फक्त डिमांड्मुळे मशीन लाइन्स वाढवल्या मिंटने. प्रोसेस तीच आहे. सेम असेच आयएसाअयने बसवलेल्या मशीनबाबत आहे. भारताच्या मशीन्स निकामी झाल्या त्यामुळे त्यांच्या मशीन्स निकामी झाल्या असले खोटे दावे करुच कसे वाटतात?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 04/16/2019 - 18:49
माझा शब्द प्रयोग चुकला असेल पण तांत्रिक मुद्द्यावर वाद घालण्यापेक्षा मूळ मुद्दा लक्षात घ्या खालचा दुवा पूर्णपणे वाचून घ्या. The parliamentary panel was informed that the volume of FICN smuggled into India in 2010 was between Rs 1,500 and Rs 1,700 crore, which went up to Rs 2,500 crore in 2012 - a rise of 55 per cent. This year, fake currency worth Rs 1,200 crore has already infected the Indian economy till July. https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2488000/Pakistan-prints-fake-Indian-rupees-NIA-finds-counterfeit-cash-paper-Pakistans-legal-tender.html हे आकडे २०१३ चे काँग्रेसचे सरकार असतानाचे आहेत आणि अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. हे आकडे निश्चलनीकरणाच्या समर्थनार्थ २०१७ नंतरचे किंवा मोदी सरकार आल्यानंतरचे नाहीत अडीच हजार कोटी रुपयात किती मोठ्या प्रमाणावर दंगे आणि अशांतता भडकवता येईल याचा विचार करा.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Mon, 04/15/2019 - 13:15
खरे डॉक्टर, तुमचं म्हणणं खरं दिसतंय. कालंच पुण्यातली बातमी वाचली की निवडणुका असल्या तरी दारू नेहमीसारखी वाहत नाहीये : https://www.loksatta.com/pune-news/alcohol-in-pune-1875688/ हे नोटाबंदीमुळेच झालंय. म्हणून कुणाकुणाच्या पोटात दुखतंय. हा एकमेव फायदा सुद्धा इतर साऱ्या तोट्यांना पुरून उरेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/12/2019 - 06:07
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे हे फारच लवकर निष्कर्ष काढणे नाही का? मुळात योजना चांगली आहे का हे सांगा. योजना नुसती जाहीर करून फायदा किंवा पैसे मात्र दुसऱ्याच जागी असं झालंय का? जर योजना चांगली आहे आणि त्यात भ्रष्टाचार सुद्धा झालेला दिसत नाहीये तर मग ती सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? त्याचं एवढं पोस्टमॉर्टेम करायची काय गरज आहे? तुम्ही आधी जी शेती करत होतात त्याचंच उत्पन्न दुप्पट झालंय का हा प्रश्न कितीसा योग्य आहे? शेती तेवढीच, पीक थोडं दरवर्षी कमीजास्त येणार मग उत्पन्न फक्त दुप्पट त्याच शेतीतून व्हावं अशी अपेक्षा का? म्हणजे जर त्या उत्पादनाचा शेतकऱ्याला मिळणार भाव दुप्पट झाला तर आपल्याला चालेल का? म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील. मुद्दा मला फारसा मान्य नाहीये. माझं म्हणणं आहे की अजूनही हे लोक पारंपरिक इंधन वापरत होते ही गोष्ट चांगली होती का? ते बदलण्याचा तर प्रयत्न होतोय. काही लोक थोडे मागे पडत असतील पण म्हणून सगळ्यांनाच वंचित ठेवायचे हे योग्य आहे का? डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. खरेसाहेबांनी सांगितलंच आहे. मीही एक मुद्दा जोडतो. बेफामपणे कर्ज दिल्याने आणि माफ केल्याने बँकांमध्ये सुद्धा रोखीचा तुटवडा निर्माण झाला होता. युपीए सरकारने २००४ ते २०१३ या काळात ३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले त्यातले बरेच कर्ज माफ केले किंवा रिशेड्युल केले. मोदी आले तेव्हा कदाचित बँकांची स्थिती एवढे वाईट होती की प्रायव्हेटच नव्हे तर सरकारी ब्यांक सुद्धा कधीही बंद पडल्या असत्या. या ब्यांकांत कुठून पैसे ओतायचे? उद्या तुम्ही ब्यांकेत १ लाख रुपये रोख काढायला गेलात आणि ब्यांकेने रोख पैसे नाहीत म्हणून सांगितलं तर? आधी दिलेली बातमी बायस वाटत असेल तर काँग्रेसच्या लाडक्या रघुराम राजन यांनी सांगितलेलं बघा. मी आधी म्हणलंय तसं एक एक कृती व योजना न बघता संपूर्ण चित्र बघायला पाहिजे. अगदी सफल नाही झाली असं म्हणलं तर मग अजून काही ठराविक लोकच का ओरडत आहेत? ज्या गरीब लोकांना त्रास झाला असं म्हणलं जातंय ते लोक तर काहीच ओरडत नाहीयेत. तसेच ३ एक लाख शेल कंपन्यांना बंद केलं, त्याचे डायरेक्टर्स रडारखाली आले. त्याद्वारे चालणारा हवाला बंद झाला. अर्थात याचा अर्थ परत होणारच नाही असं कोणीच छातीठोक पणे सांगू शकत नाही. पण निदान रोखलं तर गेलं, आता असे परत होऊ नये म्हणून बरेच कायदे बदलले गेले, नवीन केले गेले. तसेच फक्त लोकांचे गळे दाबलेत असं नाहीये. तर एनपीए झालेली कर्ज वसूल करण्यासाठी Insolvency and Bankruptcy Code सारखा कायदा लागू केला. यात हजारो कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पण जर भिंगच घेऊन त्रुटी काढायच्या म्हणाल्या तर काढता येतीलच. या कारवायांमुळे दुखावलेले, अडचणीत आलेले लोक असतीलच. पण आपण चोरांनी ठोकलेल्या बोंबा ऐकायच्या का नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/15/2019 - 14:07
अ हो सुबोध सर डिमो. हा मुद्दा ईमोशनली खुप भारी वाटतो. पण तो व्यवहार्य आहे की नाहि हे ही बघितले पाहिजे. हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली. विरोधाभासि प्रतिसाद -एक गोष्ट लक्षात घ्या नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही. हा काही कायमचा उपाय नाही आहे नक्षलवादावरचा. त्याचा परिणाम कही कालावधीसाठी च राहणार आहे. या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. तेच ह्यात सर्वात जास्त नुकसान सामालेला आहे. तुम्हि हा मुद्द का विसरता कीन्य नागरिक्, लघु उद्योजक व कामगार ह्यांना झा बँका आणि पतपेढ्या ह्यात सामान्य नागरिकांचे पैसे असतात व त्या डुबल्या तर त्यात बाकि को नाहीपेक्षा सामान्यांचेच जास्त नुकसान होणार आहे. ह्यात फक्त ब्लॅक मनी वाल्यांची कशी वाट लागली आहे ह्याच मानसिक समाधान मात्र खुप मिळाले पण व्यवहारीक फायदा काय हे ही तपासायला पाहिजे. आकडेवारी बघितली तर सध्यातरी तो नाही झाला आहे असे दिसते. सरकाच्या म्हण्ण्यानुसार ३लाख करोड्च्या नोटा परत येणार नाहीत असा अंदाज होता पण ०.७ म्हणजे जवळ्पास १० हजार करोड्च्या नोटा फक्त परत आल्या नाहीत. परत नव्या नोटांसाठी ७९६५ करोड खर्च आला. GDP जेव्हा १ टक्का वाढतो तेव्हा सधारण अर्थव्यवस्था १लाख करोड ने वाढलेली असते. त्यामुळे डिमो. च्या कळात GDP ची आकडेवारी बघितली तर किती नुकसान झाल आहे हे समजुन येईल. त्यामुळे खुप मानसिक समाधान देणारा परंतु व्यवहारिक नसणारा निर्णय म्हणजे डिमो. असे म्हणता येईल.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Mon, 04/15/2019 - 20:01
वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत. या बद्दल आपण लिहिण्याचे चातुर्याने टाळले आहे असे दिसते आहे. या अतिरिक्त चलन फुगवट्यामुळे महागाई किती भडकली असती हे एखाद्या अर्थ तज्ज्ञाला विचारून घ्या. (२०१४ साली ९ % असलेला महागाईचा दर २०१९ पर्यंत २. ५ % पर्यटन खाली आलेला आहे.)

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Tue, 04/16/2019 - 14:51
वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. दुहेरी क्रमांकाच्या नोटांबद्दलचा रिझर्व्ह बँकेचा कूठला रिपोर्ट आहे का? एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा चलनात येतात आणि रिझर्व्ह बँकेला ते कळुन येत नाही हे कस होऊ शकेल. या दुहेरी क्रमांकाच्या नोटाच बरोबर परत आल्या नाहीत असे जर तुम्ही म्हणता याचा अर्थ ज्याने नोटा निर्माण केल्या त्या त्याच्या जवळच होत्या. त्या चलनात न्हवत्याच. असे कोण का करेल जर त्या नोटांचा फायदा करुन घ्याय्चा असेल तर तो प्रत्यक्ष चलनात आल्यानंतरच होउ शकतो. त्यामुळे ह्या मुद्द्यासंबंधी थोडा संभ्रम आहे.

In reply to by गोंधळी

सुबोध खरे Tue, 04/16/2019 - 18:52
"अब्दुल करीम लाट साहेब तेलगी" या व्यक्तीने २० हजार कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक कसे आणि कुणाच्या सहयोगाने तयार केले आणि ते किती वर्षे चलनात होते ते त्यांच्या नार्को टेस्ट मध्ये कुणाचे नाव आले होते, एकदा व्यवस्थित वाचून घ्या. मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

गोंधळी Wed, 04/17/2019 - 15:22
आता ह्या फेक नोटां मागचे तेलगी जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत निश्चित आकडेवारी क्ळुन येणार नाही. आताही २००० च्या बनावट नोटा बर्र्यापैकी सापडत आहेत. मला ही डिमो. चा निर्णय चांगला आहे असे वाटत होते. पण तो खरच चांगला होता का? हे कळण्यासाठी व्यवहारीक(आकडेवारीतुन- नफा/तोटा) द्य्रुष्ट्याच बघाव लागेल.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क गुरुवार, 04/18/2019 - 07:41
आम्ही एवढे कष्ट घेऊन प्रतिसाद लिहिला आणि तुम्ही चक्क दुर्लक्षच केलंत! त्यात बँकांच्या रोख तरलतेचा एक मुद्दा मी मांडला आहे, त्यावर आपले काही विचार?

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी गुरुवार, 04/18/2019 - 22:39
डिमो. व रोख तरलतेचा किंवा एनपीए हे दोन वेगळे मुद्दे आहेत. डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे. कारण बँकासाठी ते देणे(liability) असते.जर लोन ग्रोथ चांगली असेल तर त्याचा फायदा झाला असे म्हणु शकतो. पण डिमो. च्या नंतची आपल्या अर्थ व्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर त्याचा फार उपयोग झाल्याचे दिसणार नाही. लेसकॅशचा मुद्दा ही नंतर घुसवण्यात आला. आता काय होतय कि तुम्ही सगळे आधिच्या सरकारशी तुलना करत आहात. भ्रष्टाचार नाही होत आहेना,योजना चांगली आहेना बस म्हण्जे सरकार चांगल करत आहे. आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे योजना राबवन ही खुप मोठी अड्चण असते. सध्याची जमीन वास्तविकता(ground reality) पाहीली तर याकडे प्रकर्षाने लक्ष पुर्वले आहे असे दिसत नाही. त्याबद्दल्च्या सरकारच्या जाहिराती म्हणजे window dressing आहेत.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/19/2019 - 03:14
डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे. नोटा बँकेत परत आल्याने डिपॉझिट वाढले नाही पण रोख तरलता वाढली. तुमचा जरा गोंधळ झालेला दिसतोय, तुम्हाला बँकेतल्या अंतर्गत गोष्टी माहित नाही असे गृहीत धरून स्पष्ट करून सांगायचं प्रयत्न करतो. "डिपॉझिट म्हणजे बँकासाठी ते देणे(liability) असते" हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो. उदा. म्हणून समजा तुम्ही बँकेत १००० रुपये ठेव ठेवली आहे, ज्यावर बँकेने ८% व्याज देणे कबूल केले आहे. मी बँकेकडे कर्ज मागितले आणि बँकेने मला ७५० रुपये कर्ज १२% व्याजाने दिले. तर हे ७०० रुपये कुठून आले? तर तुम्हीच ठेवलेल्या ठेवीतून. असे लाखो लोक ठेवी ठेवतात आणि साधारण तेवढेच कर्जही घेतात. साधारण २५-२८% तरलता ठेवली जाते जी ठेवी परत करायला आणि क्लीअरिंग वगैरे इतर व्यवहार करायला वापरली जाते. आता तुमची ठेव ३ वर्षांची आहे आणि माझे कर्ज पण मी ३ वर्षात फेडायचे ठरले आहे. पण तुम्हाला ३ वर्षे झाल्यावर एकदम व्याजासहित पैसे मिळणार आहेत आणि मला मात्र दर महिन्याला ठराविक हप्ता भरायचा आहे. मी १ वर्ष हप्ता भरला पण नंतर मात्र गडबड केली. ३ महिन्यांच्यावर हप्ते थकल्याने बँकेने मला एनपीएमध्ये टाकले, ज्यामुळे मला २-३% अधिक व्याज लागू लागले. आता आधीच मी भरू शकत नव्हतो (किंवा भरायची इच्छा नव्हती) तेव्हा आता तर मला कारणच मिळालं. ७५० चं कर्ज आता ९०० रुपयांवर गेलं. मग एक नवीन म्यानेजर आला आणि त्याने मला एक आयडिया सांगितली. म्हणाला १००० रुपयांचं नवीन कर्ज देतो त्यातून आधीचे ९०० भरून टाका आणि १०० मधले.... मधल्या काळात रिझर्व्ह ब्यांक आणि सरकार तरलता राखण्यासाठी मदत करत राहिले. मी आधीच ७५० चा हप्ता भरत नव्हतो तर १००० चा कुठून भरणार? होताहोता ३ वर्ष झाली माझं कर्ज १२०० च्या वर गेलं आणि एक दिवस तुम्ही ब्यांकेच्या दारात ~ १२६० (१००० + व्याज) घ्यायला उभे राहिलात. आता ब्यांकेने तुम्हाला पैसे कुठून द्यावेत? २-३ मार्ग आहेत, जसे दुसऱ्याकोणीतरी ठेवलेल्या ठेवीतून किंवा रिझर्व्ह ब्यांकेकडून परत कर्ज घेऊन अथवा दुसऱ्या ब्यांकेकडून कर्ज घेऊन. पण हे किती दिवस चालणार? माझ्याकडे पैसे होते पण कर्ज भरायची दानत नव्हती. आणि भारतात असे लोक कल्पनेपेक्षाही जास्त आहेत. मग जर या परिस्थितीत नोटबंदी झाली असती तर मी माझ्याकडचे पैसे बाद होण्यापेक्षा बँकेत भरणे श्रेयस्कर मानले असते का नाही? भले मी माझं कर्ज नाही फेडलं असं समजा. पण कुठल्यातरी मार्गाने ते बँकेकडे द्यायलाच लागले असते ना? आता हीच रक्कम १ लाख करा बघू आणि आता सांगा पैसे काढायला आणि बदलून घ्यायला मर्यादा का ठेवली होती. तेच पैसे खात्यात भरायला मात्र नव्हती. एक केस मी स्वतः बघितलेली आहे. २०००/१ सालातली गोष्ट असेल आमचा एक थकबाकीदार होता, चांगलं ४-५ कोटींचं कर्ज एनपीएमध्ये होतं. राजकीय वर्तुळात उठबस असलेला चांगला गब्बर माणूस होता पण काही केल्या पैसे भरत नव्हता. आम्ही आपले दर महिन्याला वसुलीसाठी भेट देऊन यायचो. एकदा वैतागून आम्हाला घरात एका खोलीकडे घेऊन गेला. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण दार उघडलं तर चक्क खोलीभरून नोटा होत्या. म्हणाला एकरकमी भरू शकतो पण भरणार नाही. का तर पहिली गोष्ट म्हणजे भरायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे समजा ऑडिटमध्ये निघालं तर आयकर विभाग मागे लागू शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर कोट्यवधी रुपयांच्या नोटा बाळगून होता, बँकेकडून कर्जही घेतलं होतं. पण कर्जफेड करणार नाही कारण कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि खरंच ब्यांक काहीच करू शकली नाही. पुढे बँक अडचणीत येऊन बंद पडली. आता नोटबंदी झाली असती तर याच माणसाने काय केलं असतं, तुम्हीच सांगा. अश्याच अजून लोक बँकांना कसे लुबाडतात याच्या बऱ्याच केसेस मी तुम्हाला सांगू शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Fri, 04/19/2019 - 11:40
रोख तरलता वाढली हा मुद्दा मान्य आहे. हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो मला म्हणायच आहे कि नुसती रोख बँकेकडे येउन बँक फायद्यात येणार नाही तर त्या रोख्तेचा उप्योग कर्ज वितरणासाठी केल्यास त्यातुन फायदा होतो. डिमो नंतर कर्ज वितरणा चा वेग मंदावल्याचे कळुन येते. https://www.bloombergquint.com/business/loan-growth-slows-to-a-crawl-in-december https://www.livemint.com/Opinion/j6FWY6uYX5sGxcqW4WR1dN/How-demonetisation-crippled-bank-lending.html

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Fri, 04/19/2019 - 21:04
इथे वाटल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीचे वांधे होते, तिथे अजून कर्ज वाटत का फिरावं? ब्यांकेत ठेवलेल्या स्वतःच्याच ठेवी परत घ्यायला आलेल्या लोकांना द्यायला पैसे नव्हते हा मुद्दा आहे. त्याची सोय कुठून करायची? नुसत्या नोटा छापून? जुन्या नोटा वापरून कर्जफेड करण्यासाठी सरकारने पण मुदत दिली आणि लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. तसेच छोट्या व्यावसायिकांना मुद्रा योजनेद्वारे बरीच कर्जे वाटली गेली. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का? ३ वर्षांचे टॅक्स रिटर्न आणा, गॅरेंटर आणा, कोलॅटरल आणा आणि तरी वर अव्वाच्यासव्वा व्याज भरा अशी परिस्थिती होती. त्याउलट मोठे व्यावसायिक मात्र त्यांच्या कॉन्टॅक्टस आणि वजनाच्या जोरावर पाहिजे तितके कर्ज मिळवून जायचे. तुम्ही जर कोणा बँकेतल्या अनुभवी व्यक्तीला विचारलेत तर छोटे कर्ज घेणारे अगदी नेमाने हप्ते भरतात आणि त्या उलट बहुतेक "मोठे" व्यावसायिक टाळाटाळ करतात. दुसरं म्हणजे एकाच माणसाला १ कोटी कर्ज देण्यापेक्षा १०० लोकांना प्रत्येकी १ लाख कर्ज देणे सोयीस्कर असते. कारण एक कोटीवाला डिफॉल्टर झाला तर सगळे पैसे बुडतील. पण १०० पैकी अगदी ५० लोक डिफॉल्टर झाले तरी ५० लाख तर परत येतील.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Sat, 04/20/2019 - 20:25
आता याबाबत जगभरातील तज्ज्ञांमध्ये एकमत आहे की या घोडचुकीचा नकारात्मक परिणाम छोटे व्यावसायिक, कामगार आणि शेतकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाला आणि श्रीमंतांना मात्र त्याची अजिबात झळ लागली नाही. असे हे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/conflict-of-economy/articleshow/68942423.cms तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का? हा मुद्दाबरोबर आहे. पण बरीच कर्ज वाटली म्हणजे योजना यशस्वी झाली का? तर जेव्हा मुद्रा योजने अंतर्गत जी कर्ज वाटली आहेत. त्याची जास्तीत जास्त परत्फेड होईल तेव्हा यशस्वी झाली अस म्हणता येईल. सध्या बँकर्सचा या बाबत च मत निगेटीव्ह आहे.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Sun, 04/21/2019 - 05:37
तुम्ही दिलेल्या लेखातील पहिलाच परिच्छेद म्हणतोय, "आर्थिक धोरणांतील चुका बहुधा अल्प अथवा मध्यम कालावधीसाठी अडचणी निर्माण करतात. त्याहून मोठी, दीर्घकालीन चिंतेची बाब म्हणजे, काही गट देशात दुही निर्माण करण्यासाठी करत असलेला प्रचार ही आहे..." टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? अनियमित आणि अनियंत्रित उद्योग तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना त्रास तर होणारच होता. बाकी छोटे व्यावसायिक कसे अडचणीत आले? उदा. बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती. सामान्य नागरिकांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी ३ महिने त्रास सहन केला त्याला कोणीच नाही म्हणत नाहीये. पण अजून त्रास आहे का हा मुद्दा आहे. तुम्हीही बडे उद्योगपती नसावेत अशी आशा करतो. तुम्हाला वैयक्तिकरित्या तेव्हा काय त्रास झाला आणि अजून काय त्रास होतोय हे सांगा बघू. तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे. नोटबंदीच्या आधी मोदींचे गोडवे गाणारे इंजिनवाले नेते अचानक नंतर कट्टर विरोधी कसे झाले? बारामतीकरच काय पण झाडून सगळे नेते कसे टोकाचा विरोध करू लागले? मुलायम आणि मायावती मधून विस्तव जात नव्हता ते आता एका स्टेजवर आले. मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे. लोकांना ७२००० रुपये दरवर्षी फुकट वाटणेच बरे असं म्हणायला लागेल.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/22/2019 - 11:55
टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते. बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती ???????? तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे हे बघा डिमो. नंतर आयकरविभागाने धाडी टाकल्या त्यात किती काळा पैसा जप्त केला त्याची आकडेवारी जर कळाली तर बर होईल. म्हणजे जमा/खर्च किती झाला हे बघता येईल. मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे हाच मुद्दा आहे. हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Sat, 04/27/2019 - 05:16
हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते. अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... असो. अंमलबजावणीत गडबड झाली ती मान्य केली आहेच. विश्लेषण आणि त्यामागची कारणे इथेच वर आणि नोटबंदीच्या इतर धाग्यांवर सविस्तरपणे मांडलेली आहेत. पण जर बँकांकडे किती नोटा परत आल्या हाच यशस्वितेचा एकमेव निकष असेल तर मग नोटबंदी फेल झाली असं म्हणावं लागेल. ???????? ???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का???????? हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. बरं राहिलं मग. मुद्दा तुम्हीच काढलात म्हणून पुढे प्रतिसाद आले. तसं फुकटचे मिळणारे ७२००० पण कित्येक लोकांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे हे विसरून चालणार नाही. जे यासाठी पात्र आहेत अश्या गरिबांपेक्षा मधल्यामध्ये पैसे उडवण्याच्या कलेत वाकबगार असणाऱ्यांना (आणि गेल्या ४-५ वर्षात ज्यांना अश्या संधी मिळाल्या नाहीत अश्यांना) कोण निवडून येणार हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कदाचित आत्तापर्यंत विभाग पाडून त्याचा लिलाव सुद्धा झाला असेल. अडीच वर्ष होत आली नोटबंदीला, जे काही परिणाम व्हायचे होते ते बहुतेक होऊन गेले. परत मोदी पंप्र होतील का नाही ते माहित नाही. मला तर वाटायला लागलंय की मोदी नकोच, पण चुकूनमाकून झाले तरी परत नोटबंदी करायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे उगी राहावे.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Sat, 04/27/2019 - 16:44
अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का? ???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का???????? तुमच्या भाजीवाल्याचा reality check व्हायला हवा. सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा. असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही. लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा.

In reply to by गोंधळी

लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा. लोकशाही हीच मुळात राजकारणाची एक पद्धत आहे... तर मग तिच्यासाठी राजकारणविरहित मॉडेल कसे बनवणार ?!

In reply to by गोंधळी

ट्रेड मार्क Mon, 04/29/2019 - 02:26
ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का? दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील. सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा. किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते. बादवे मोदी बालाकोट बद्दल बोलतात पुलवामाबद्दल काँग्रेसी बोलतात. तर मोदी बालाकोटवर पण बोललेच आणि का बोलू नये? गेली काही दशके दहशतवादी कारवाया नुसत्या सीमेवरच नाही तर अगदी राजधानीतसुद्धा झाल्या. कोणी अशी हिम्मत केली होती का? पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इतकी मोठी कारवाई केली आणि त्यातून जगातील दुसरा कुठलाही देश भारताच्या विरुद्ध बोलला नाही. हे राजनीती आणि कूटनीतीचे यश आहेच. असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही. असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार? असो. आमचे मोदी म्हणून तुम्ही गट बनवलेच आहेत. त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही.

In reply to by ट्रेड मार्क

गोंधळी Mon, 04/29/2019 - 19:01
किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते. या सगळ्या योजनांचा reality check बघा जरा. तुम्ही फक्त घोषणांवर समधानी आहात. टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय? आणि दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील ओ कशाला पलटी मारताय. असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार? क्रुपया चुकीचे मुद्दे आणू नका ओ. कुठली १३० कोटी लोक कचरा रस्त्यांवर टाकतात आणि कोनाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही. बालाकोटच्या कारवाईत नक्की किती दहशतवादी ठार झाले ??? मुद्दा हा आहे की आधीच जे सरकार होत त्यांच्या करभाराला जनता कंटाळली होती. आताच्या सरकारने त्यावेळी मोठी आश्वासन देत जे कॅम्पेन केल होत त्यावरुन जनतेने त्यांना बहुमत दिल. पण ती आश्वासन पुर्ण झालेली दिसत नाहीत. त्याऐवजी जाहीरती करण्यात समाधान मानल. आपल्या देशातील जनता भावनोद्दीपक आहे. त्यामुळे महत्वाचे मुद्दे सोडुन दिले जातात. फक्त भावनीक मुद्द्यांभोवती राजकारण फिरवल जात. म्हणुन लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा असे म्हटले होते.

In reply to by गोंधळी

अर्धवटराव Mon, 04/29/2019 - 19:30
लोकशाही व्यवस्थेत समाजकारणाचे मुद्दे अग्रगण्य असावे अशीच अपेक्षा आहे. पण त्याकरता कायदा/घटनादुरुस्ती वगैरे करुन दुसरं एखादं मॉडेल जोडण्याची गरज नाहि, आणि त्याचा काहि उपयोग देखील नाहि. सचेतन समाज हाच त्यावर उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ Tue, 04/16/2019 - 23:58
डि मो च्या निर्णया विरुद्द बोलणारे एक्सपर्ट्स डि मो शिवाय सरकार कडे दुसरा काय पर्याय होता ह्याची चर्चा करताना कधीही दिसत नाहीत ! डि मो ची परिस्थीती का आली ह्याची सुद्धा चर्चा होत नाही. चर्चा फक्त सरकारला घेरण्यासाठी डि मो च्या अंमलबजावणीत झालेल्या चुकी बद्दल जास्तच बोलले जाते. त्यातही कसे चांगले योजन करता आले असते ह्याची चर्चा नाहीच !! दुसर्याच्या चुकीवर बोट दाखवणे सोप्पे असते. जर सरकारला काहीच कळत नाही मग समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणार्या योजना आखल्या व यशस्वी अंमलबजावणी कशी केली ?

ट्रम्प Sat, 04/06/2019 - 21:20
ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही . चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे . रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन . ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता , भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

ट्रम्प Sat, 04/06/2019 - 21:21
ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही . चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे . रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन . ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता , भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 03:04
"जाकीटा"मागील जळजळ मोदींनी देशाला उद्देशून परवा जी घोषणा केली त्यानंतर नेहरूंच्या किळसवाण्या आरत्या सुरू झाल्या. त्यामुळे नेहरू ह्या नावाची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. अजूनही सुरूच आहे. मोदींनी दाखवलेल्या इच्छाशक्तीला श्रेय नाकारून ते नेहरूंना देण्यात अनेक नमोरुग्णांमध्ये स्पर्धा सुरू झाली.सोशल मीडियावर सुद्धा नेहरूनर्तक कथ्थक करू लागले. त्याच दिवशी रात्री मला एक जुनी गोष्ट समजली जी मी पहिल्यांदा ऐकली होती. आपल्यापैकीही अनेकांना ती बहुधा माहिती नसेल. नव्या पिढीला तर माहीत असणे अशक्य आहे. नेहरू हा माणूस लोकशाहीप्रेमी, पुरोगामी, उदारमतवादी,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. किंबहुना त्यांची तशी प्रतिमा काळजीपूर्वक बनवली गेली. त्यावेळच्या सगळ्या पेंटरबाबूंनी छान काम केले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही घटना त्या प्रतिमेला छेद देऊन जातात. अतिशय अहंकारी,असहिष्णू आणि क्षुद्र मनाचा माणूस अशीही त्यांची एक ओळख आहे. खाली मी एक शेर उद्धृत करतो, मन में जहर डॉलर के बसा के फिरती है भारत की अहिंसा खादी के केंचुल को पहनकर ये केंचुल लहराने न पाए अमन का झंडा इस धरती पर किसने कहा लहराने न पाए ये भी कोई हिटलर का है चेला मार लो साथ जाने न पाए कॉमनवेल्थ का दास है नेहरू मार ले साथी जाने न पाए ही कविता केली आहे विख्यात शायर मजरूह सुलतानपुरी यांनी. त्यांच्या मनात नेहरूंबद्दल किती राग आहे ते वेगळे सांगत नाही. त्या कवितेतील शब्दच पुरेसे आहेत. भारताच्या पंतप्रधानांना हिटलर म्हणून जरा याआधी कुणी संबोधले असेल तर ते मजरुह यांनी. या कवितेबद्दल त्यांना मोरारजी देसाई यांनी अटक करून तुरुंगात टाकले होते.एक वर्ष मशहुर मजरुह गजाआड होते. नेहरूनर्तकांच्या जीव की प्राण असलेल्या, कबुतरे उडवणाऱ्या या नेत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली होती यांचे हे धडधडीत उदाहरण आहे. त्या माणसाला टीका अजिबात सहन होत नसे.ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्याशी ते अतिशय वाईट वागले असे तटस्थ इतिहासतज्ञ सांगतात. त्यांच्या तुलनेत मोदी हे खूपच सहिष्णू आहेत.अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका त्यांनी दुर्लक्षित केली असून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. जर नेहरूंइतकी असहिष्णुता मोदींच्या अंगी असती तर तिहार जेल अशा अनेक मजरूहांनी भरून गेले असते. फसलेली आर्थिक नीती, पराभूत परदेश नीती आणि कायमचा चिघळलेला काश्मीर प्रश्न यांची जबाबदारी नेहरूंवर जाते. त्यांचे प्रमाणाबाहेर आणि वाजवीपेक्षा जास्त कौतुक करण्याचे निलाजरे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी मला पहिल्यांदाच कळली ती लगेच शेअर करावीशी वाटली. अनेकांना ही गोष्ट माहीतही नसेल.विशेषतः तरुण पिढीला नेहरूंची ही काळी बाजू कळावी म्हणून अकाली सुरू झालेल्या पंडितोत्सवात मुद्दामहून विरजण टाकत आहे. मजरुहला नेहरूंनी तुरुंगात टाकले तर किशोरवर इंदिरा गांधी यांनी बॅन घातला. आरडी वाचला... असली ही दळभद्री हुकूमशाही वृत्तीची फॅमिली. ही फॅमिली परत कधीही सत्तेवर येणार नाही असे आत्मविश्वासपूर्ण विधान आज नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ते तुमच्या आमच्या भरवशावर केले आहे. उतरवणार ना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात ? #फिरएकबारमोदीसरकार.. आनंद देवधर २९/०३/२०१९ जगप्रसिद्ध नेहरू जाकीटाआड दडलेली जळजळ जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची असेल तर ही पोस्ट तुम्ही भरपूर शेअर करा.

In reply to by स्वामि १

भंकस बाबा Mon, 04/08/2019 - 16:39
सोइस्कर अर्थ तुम्ही शांतिप्रिय धर्माचे लांगुलचालन, अब्जोचे आर्थिक घोटाळे, तुकडे गैंगला समर्थन, काश्मीरला पाकिस्तानधार्जिनी स्वायतत्ता असा घेतला असे वाटते.

डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 10:28
अमर्त्यसेन हा मोदी सरकार विरुद्ध उघड बोलणार्या माणसाच खर बॅकग्राउंड ! Strange saga of Amartya Sen and the Rothschilds _Arvind Kumar_ *The Sunday Guardian* April 6, 2019, 9:05 PM _'Rothschilds & Co funds units of ‘civil society’ in India that control narrative on ‘human rights violations’._ Amartya Sen has become hyperactive in attacking policies that benefit the people of India, but one fact he has been shy of disclosing during his attacks is his apparent conflict of interest by virtue of marrying Emma Rothschild, one of the heiresses of the world’s wealthiest family. The family have made money off India and the Indian government. The assets of the Rothschilds are estimated to be worth at least US$400 billion and the family has a reputation of enriching itself by finding opportunity even on growing misery around the world. The Rothschild family has a history of manipulating stock markets, funding world wars, engineering large scale decisions in their favour, exercising significant control over the banking system, and owning large media outlets to influence public opinion in their favour. Amartya Sen, of course, is the apostle of poverty. The family business of Amartya Sen’s family on wife’s side, NM Rothschild & Sons, is seen as having made tremendous amounts of money during the United Progressive Alliance regime between 2004 and 2014, even as Sen’s blue-eyed-boy, Jean Dreze was a key member of Sonia Gandhi’s National Advisory Council. The connection between Amartya Sen and his family’s business is not merely a tenuous one. On the contrary, Sen’s father-in-law himself, Nathaniel Mayer Victor Rothschild, 3rd Baron Rothschild, was part of the management of NM Rothschild & Sons. Victor’s cousin, Lynn Forester de Rothschild, owns a significant stake in the Economist magazine, which explains the magazine’s constant barbs against the Hindu community even as they support Sonia Gandhi and prop up Amartya Sen’s economic ideas. One deal that is regarded as benefiting NM Rothschild & Sons during the UPA rule involves the e-auction of 3G spectrum. The firm had been chosen to conduct the e-auction even though they had never been known as a computer software firm. The firm pocketed Rs 30.5 crore for conducting the auction and this must be considered as a gift by the UPA government. It is not clear why there was a need for an e-auction when there were only a handful of participants in the bidding process. The most questionable aspect of this whole episode was that the Rothschilds were not a neutral third party, but had been retained by Aircel, which was looking for a buyer for their towers that were eventually sold for $1.8 billion. Of course, none of this has been probed even after 2014. Today, several firms that involved NM Rothschild & Sons to swing deals during the UPA era are embroiled in financial scams. Apart from Aircel, which is caught up in the Aircel-Maxis scam, NM Rothschild was also involved in Vedanta’s purchase of Cairn India, Kingfisher Airlines taking over Air Deccan, and the promoters of Venkateswara Hatcheries acquiring the English Premier League football club, Blackburn Rovers. Each of these firms has come under the scanner of the authorities. Venkateswara Hatcheries was raided by the income tax sleuths after suspicions about transactions related to movements of huge amounts of cash in the wake of demonetisation. For this reason, Amartya Sen’s criticism of demonetisation may contain more than meets the eye. A few months ago, it was determined that Rothschild Bank AG and one of its subsidiaries may have violated money laundering rules in the multi-billion-dollar 1MDB corruption case in Malaysia. This background of Rothschild Bank is combined with the fact that mergers and acquisitions, especially those spanning multiple international jurisdictions, readily lend themselves to allegations of being vehicles for money laundering through arbitrary valuation of the firm being acquired. As a definitive conclusion cannot be reached without a comprehensive inquiry, there is a need to investigate NM Rothschild activities in India and determine whether the unusually high rate of scams among their clientele is a coincidence. The Rothschilds have been active in a number of sectors in India including infrastructure, financial advisory, healthcare, and food processing, and when one Rothschild firm sold its share in a joint venture to Del Monte Pacific, Lynn Forester de Rothschild, CEO of EL Rothschild said, “We are delighted to have brought this company to a point where it has attracted large international players like Del Monte Pacific. This is a positive way for us to participate in the explosive economic growth of India.” Amartya Sen has not extended the same consideration towards the poorer people of India who would also want to participate in the “explosive economic growth of India”. Instead, he has ranted and raved against policies that would allow Indians to participate in their own economy, and along with his protégés in the National Advisory Council of the UPA government, he has ensured that Indians would only qualify as recipients of small amounts of money thrown at them as part of welfare schemes wrapped in the name of “Mahatma Gandhi”, while being prevented from actively participating as productive members of the economy and competing against his family on wife’s side, the Rothschilds. Amartya Sen’s recent salvos on India include demands of non-interference in what he calls the “civil society”, which really translates to foreign and foreign-funded non-governmental organisations that actively interfere in Indian politics. He asks for complete freedom for the Reserve Bank of India with no oversight by the Indian people or their democratically elected representatives even as those who control the RBI take instructions from the International Monetary Fund and the World Bank. These demands may reflect his family’s priorities, as the proposal for setting up the RBI first arose during the hearings before the Indian Currency Committee in 1898 and 1899 from two members of the Rothschild clan—Alfred de Rothschild and his brother Nathan Mayer Rothschild, 1st Baron Rothschild. Both Rothschilds wanted RBI to be controlled from the West, with no oversight from the Delhi government, exactly as Amartya Sen now demands. Indian freedom fighters saw through this game of the British and defeated their efforts to create the Reserve Bank in the 1920s. The Rothschilds’ business in India goes back to a much earlier period. As far back as 1814, Nathan Mayer Rothschild, the grandfather of the two Rothschilds who provided inputs to the Currency Committee, was not only a voting member of the United Company of Merchants of England, Trading to the East Indies (also known as the East India Company), but was also among the few people eligible to be chosen as its director. Today, Rothschild & Co funds units of the so-called “civil society” in India that control the narrative on what constitutes “human rights violations”. (Hint: Anything Hindus do is a violation of human rights unless it benefits those who wield power in America and Europe.) One organisation it funds is Prerana, which lists Asha for Education as a partner on its website. In 2002, the founder of Asha for Education, Sandeep Pandey, attended the party congress of the Naxalite group Communist Party of India (Marxist-Leninist)-Liberation and called for the unity of “revolutionary” organisations. CPI(ML)-L openly advocates an “armed revolution” and its stated objectives include the use of “illegal” methods and raising an army to wage a war against India. At their 2002 meeting, the party also honoured “comrade martyrs” or terrorists killed in action. Like Amartya Sen, some in the UPA were aligned with the group friendly to the Naxalites and had Naxalite supporters on Sonia Gandhi’s National Advisory Council. It is fitting that the government which was based on Amartya Sen’s economic policies ended up with the same track record as his family business—a trail of deals that enriched the wealthiest people in the world at the cost of the poorer people in the country.

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Mon, 04/08/2019 - 15:38
डँबिस००७, अगदी मर्मवेधी लेख! त्याबद्दल धन्यवाद. रॉथशील्ड्सने चेन्नईत एक अनाथालय उघडलं होतं. त्याची शुल्कबद्ध ( behind a paywall )बातमी इथे आहे. मात्र चित्रं सापडलं : https://si.wsj.net/public/resources/images/WO-AL482_ORPHAN_P_20121019174437.jpg म्हणे भारत स्वतंत्र झालाय! जय हो!! आ.न., -गा.पै.

With $79b in 2018, India tops global remittances list: World Bank



सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार कोटी) इतके परकिय चलन भारतात आणले आहे. चर्चा करताना, अनिवासी भारतियांना, अविचारीपणे, देश सोडल्याबद्दल दोष देणार्‍यांनी ही संपूर्ण बातमी मुळातून शांतपणे जरूर वाचावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. Tue, 04/09/2019 - 11:53
सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार) इतके परकिय चलन भारतात आणले आहे.
करोड लिहायचे राहिले ५ लाख ५३ हजार च्या पुढे. नुसते ५ लाख ५३ हजार एखादा वर पोचलेला एक्झिक्युटिव्ह पण आणत असेल.

In reply to by अभ्या..

शाम भागवत Tue, 04/09/2019 - 16:54
हा एक शिस्तबद्ध गुन्हा आहे. ठिकाण केरळ. कोणत्याही घरातील एखादा मुस्लीम अथवा ख्रिश्चन तरुण मजूर पासून कुक पर्यंत किंवा इंजिनियर म्हणून सुद्धा आखाती देशात नोकरी मिळवतो. आत्ता आखाती देशातील नियम बदलले आहेत. अन्यथा पूर्वी फक्त ख्रिश्चन आणि मुस्लीम लोकांनाच तिथे नोकरी करता येत असे. तर या तरुणाला नोकरी लागली कि त्याच्याकडे काही एजन्सी संपर्क साधत. त्या मुलाचा जो धर्म असेल त्याच धर्माची एजन्सी असणार. ते त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगत. तुला गल्फ ला नोकरी मिळाली आहे. तिथे तुला जो पगार मिळेल तो आमच्या एजन्सीचे तिथे ऑफिस आहे तिथे जमा कर. तू जर पोस्टात किंवा बँकेत पैसे भरले तर मिळायला दोन दिवस लागतात. बँक किंवा पोस्ट दिनार ते रुपये चलन बदलण्याचे ३ ते ५ % कमिशन कापून घेते. आम्ही एक रुपया कापणार नाही. ज्या दिवशी तू पैसे भरशील त्या दिवशी जो दिनार चा रेट असेल त्याच दराने संपूर्ण पैसे तुझ्या घरी दोन तासात पोचतील. ( कल्पना करा हा तो कालखंड होता ज्यावेळी ट्रंक call बुक करून फोन लागायची दिवस दिवस वाट पहावी लागायची.) हि एजन्सी दोन तासात पैसे देण्याची हमी देत होती. ही मुख्य सुविधा. जोडीला समजा कधी पगार उशिरा झाला तरी महिन्याला जितके पैसे येत असत तितके पैसे त्याच दिवशी दिले जात. घरातील कोणी आजारी पडले तर दवाखान्यात नेणे, कुटुंबियांच्या कडे पैसे नसतील तर पैसे खर्च करणे. ग्यास संपला असेल तर स्वतःची ओळख वापरून लगेच आणून देणे. मुलांच्या शाळेत अडमिशन साठी मदत करणे. या सगळ्या सेवा कोणतीही अपेक्षा न करता फुकट प्रदान करणे. आता हे सगळे करणारी संतस्वरूप एजन्सीच्या या कामाचा दुसरा भाग सांगतो. हे लोक राजकीय पक्षांच्या कडून आणि नेत्यांचा कडून काळा पैसा रोख स्वरूपात घेत. हा पैसा ते इथे त्या कामगाराच्या कुटुंबियांना देण्याच्या साठी वापरत असत. त्यातील १० % कापून घेत. बाकीची ९० % रक्कम ते लोक या कामगारांच्या कडून आखाती देशात जे पैसे परकीय चलनात वसूल करत असत. ते पैसे राजकीय पक्ष किंवा नेते अन्य देशातील ज्या खात्यात सांगतील त्या खात्यात हस्तांतरित करायचे काम करत असत. थोडक्यात भारतातील काळा पैसा हा फिजिकली भारतातच राहणार. परदेशात त्या कामगारांनी कमावलेला पैसा परकीय चलनात आपल्या देशात येणार नाही. हा परकीय चलनातील पैसा ते थेट बाहेर फिरवणार. हिंदी चित्रपटात दाखवतात तसे कोणीही पैशाने भरलेली bag घेऊन काळा पैसा घेऊन जात नसत. *©सुजीत भोगले* मी फक्त महत्वाचा वाटलेला मुद्दा फक्त इथे चिकटवलाय. ज्यांत कोणत्याच पक्षाची बाजू घेतलेली नाही. बाकी सर्व गाळलंय. हे मला आलेले फॉर्वर्ड आहे व कोणतीच शहानिशा केलेली नाही. डॉ. म्हात्रेंनी दिलेल्या आकडेवारीशी संबंधीत असल्याने हा उद्योग केलाय.

In reply to by शाम भागवत

तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला "हवाला" असे म्हणतात आणि तो बेकायदेशीर/गुन्हा असतो. त्याद्वारे भारतात येणारी रक्कम अधिकृत बँकिंग प्रणालीतून येत नाही. अर्थातच, तो व्यवहार गुप्त (अळीमिळी गुपचिळी) असल्याने त्याचा नक्की आकडा मिळणे कठीण असते... केवळ अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. मात्र, तसे व्यवहार होतात यात संशय नाही. अश्या व्यवहारामुळे देशाला फायदा होत नाही, किंबहुना त्याने निर्माण होणार्‍या काळ्या पैशामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानच होते. खाडी देशातून भारतात येणार्‍या पैशांच्या हवाला व्यवहारात पैसे कापून घेतात हे नवीन वाचले आहे ?! हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. ज्यांना एनआरई अकाऊंट काढण्यात रस नसतो किंवा ज्यांच्याकडे त्यासाठी फार मोठी शिल्लक उरणारी रक्कम नसते, अश्या लोकांमध्ये हवाला जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे तो कमी पगाराची नोकरी असणार्‍या लोकांना जास्त आकर्षित करतो. ज्यांचे उत्पन्न/पगार चांगला असतो, त्यांना अधिकृत बँकिंग प्रणालीतून पैसे भारतात पाठवून, एनआरई एसबी/फिक्स्ड डिपॉझिट अकाऊंटची सोय वापरणे जास्त फायद्याचे असते. कारण, त्या अकाऊंटमधील मुद्दल व व्याज पूर्णपणे आयकरमुक्त असते व त्यांचे व्याजदर आंतरराष्ट्रिय व्याजदरांच्या तुलनेने जास्त असतात. मी दिलेल्या बातमीतला आकडा, अधिकृत बँकिंग प्रणालीतून जाणार्‍या व अर्थातच वैध चलनव्यवहारात झालेल्या उलाढालीचा आहे. हे अधिकृत परकिय चलन देशाला आयातीची किंमत चुकविण्यास उपयोगी पडते. ते देणे चुकवून उरलेले चलन देशाची परकीय चलनाची गंगाजळी (Foreign currency reserve) म्हणून ओळखली जाते... जी, 'देशाची जागतिक अर्थव्यवस्थेतील पत' आणि 'स्थानिक चलनाची ताकद' वाढविण्यास कारणीभूत होते. या दोन (अवैध आणि वैध) व्यवहारांत गल्लत नको.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. म्हणजेच, हवाला व्यवहारात अधिकृत बँकेच्या किंवा मनी चेंजरच्या दराने मिळणार्‍या रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडे... हाच हवाला विरुद्ध दिशेने होतो तेव्हा त्याचे नियम उलटे होतात : भारतात भारतिय रुपये देऊन परदेशात परकिय चलन, स्वतः किंवा अवैध बँक खात्यात (उदा: स्विस बँकेतले "अवैध खात्यात") स्विकारले गेले तर मात्र विनिमयाचा दर अधिकृत दरापेक्षा जास्त असतो. म्हणजेच, दर डॉलरमागे अधिकृत दरापेक्षा जास्त रुपये मोजावे लागतात.

डँबिस००७ Tue, 04/09/2019 - 23:04
काल परवा दोन दिवस रेव्हेन्यु खात्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ , काँग्रेसचे कर्नाटकातील व गोव्यातील आमदारांच्या सहाय्यक, जवळच्या मित्र परिवारातील लो कांच्या घरावर २३ वेगवेगळ्या जागी धाडी घालुन जवळ जवळ ९ कोटी नकद रक्कम जप्त केलेली आहे. ही धाड खुप खोल वर विचार करुन प्लॅन केलेली होती. धाडीच्या अगोदर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सी आर पी एफ च्या सैनीकांच्या कंपनींना मध्य प्रदेश व ईतर ठीकाणी पाठवल होत. त्यावेळेला ह्या सैनिकांच्या प्रवासा बद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली तसेच ह्या प्रवासा बद्दल दुसरेच कारण दाखवले होते. लोकल पोलिसावर लोकल सरकारचे वर्चस्व असते व त्याचा सहभाग, मदत अश्या धाडीत मिळणार नाही झाला तर त्रासच होईल ह्याची खात्री असल्याने केंद्र सरकारच्या हाता खाली असलेल्या सी आर पी एफ सैनिकांना पाठवले होते. ह्या धाडीसाठी कोणत्याही सरकारी वहानांचा वापर करण्यात आलेला नव्हता, डोळ्यात न येता काळजी पुर्वक खासगी रेंटल गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. नेहेमी प्रमाणॅच काँग्रेसने व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खुप मोठ्या प्रमाणावर कॅश सापडल्याने त्यांची बोलती बंद झालेली होती. मोदी विरुद्द मिडीयाने ह्या सर्व बातमीला पाठ दाखवलेली होती. काही मिडीया हाऊसनेच ह्या बातमीला कव्हर केले. आता निवडणुक आयोगाने ह्या धाडीची गंभीर दखल घेत ही रक्कम कुठुन आलेली होती त्याची चौकशी करुन अहवाल सादर करायला केंद्र सरकारच्या खात्याला आदेश दिलेला आहे. EC asks probe agencies to take strong action against those u .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/68799484.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by डँबिस००७

योगेश कोकरे Wed, 04/10/2019 - 20:20
निवडणूक आयोगाने खूपच गंभीर दखल घेतली आहे .डायरेक्ट रेव्हेन्यू सेक्रेटरी ला समन्स बजावले आहे https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commission-summons-cbdt-chairman-revenue-secretary

In reply to by योगेश कोकरे

डँबिस००७ Wed, 04/10/2019 - 23:45
योगेश , समंन्स बजावणे आणी मिटिंग साठी बोलावणे (Summon for meeting) ह्यातला फरक समजवुन घ्या !! The Election Commission has called the revenue secretary and chairman of Central Board of Direct Taxes to discuss ongoing income tax raids. Read more at: https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commission-summons-cbdt-chairman-revenue-secretary Copyright © BloombergQuint

डँबिस००७ Wed, 04/10/2019 - 09:53
आता तर ही रक्कम २८१ कोटी असल्याची बातमी येत आहे !! ह्यात घोट्याळ्यात कॉंग्रेस पुर्णपणे अडकली आहे ! पुरावे व रोख रक्कम हस्तगत झालेली आहे !! https://youtu.be/Az4bg2ASXgU

In reply to by डँबिस००७

गामा पैलवान Wed, 04/10/2019 - 12:55
डँबिस००७, अबब २८१ कोटींची रोकड? हे म्हणजे पूर्वी क्रांतिकारक लोकं इंग्रज सरकारचा पैसा लुटायचे तसाच दरोडा मोदी घालताहेत. त्याबद्दल मोदींचं अभिनंदन. लुटारुंवर असेच दरोडे पडावेत म्हणून शुभेच्छा. आ.न., -गा.पै. तळटीप : पप्पू म्हणे चौकीदार चारसोबीस. गामा म्हणे मोदींना ४२० पर्यंत पोचवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तेजस आठवले गुरुवार, 04/11/2019 - 15:05
पृथ्वीपासून ५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे (black hole) पहिलेवहिले चित्र आत्ताच का जाहीर केले गेले ? ५ वर्षांपूर्वी आमचे सरकार होते त्यामुळे हा फोटो आमच्या काळातला आहे.राजीव गांधी ब्लॅक होल स्कीम ही आमची स्कीम होती, ह्याने नाव बदलून फोटोपण छापून टाकला आणि श्रेय ढापतोय.,ही इज ट्राईन्ग टू इन्फ्लुएन्स द वोटर्स.... (कोटी हा आकडा मी खाल्ला आहे.)

In reply to by प्रदीप

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/11/2019 - 12:14
गुड वन....! लाईक. आम्हीच करुन दाखवलं, हमनेही कर दिखाया. अशी कुठं बातमी वाचनात आली नै. आमचं सुदैवं दुसरं काय. ;) -दिलीप बिरुटे
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता.

लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद

धर्मराजमुटके ·

rahul ghate Sun, 09/18/2016 - 14:03
झालेला हल्ला अतिशय दुर्दैवी असून , हे प्रकार वाढत आहेत . असे किती जवान शाहिद करायचे व कडी निंदा करून गप्प बसायचा ह्याचा आता सरकार ने विचार करावा . राहुल

तेजस आठवले Sun, 09/18/2016 - 15:19
अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना. ही घटना दुर्दैवी आहे हे खरेच आहे. पण मला असे वाटते की अशा घटनांवरचे धागे काढू नयेत(हे माझे वैयक्तिक मत आहे). होतं काय की एक तर ह्या धाग्यांवर आपण श्रद्धांजली वाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. मुख्य मुद्दा म्हणजे काही डूआयडींना गरळ ओकायला हाच धागा मिळेल आणि इतक्या संवेदनशील विषयावर अतिशय दुर्दैवी आणि संताप येणाऱ्या प्रतिक्रिया येतील. शेळी जाते जीवानिशी अन खाणारा म्हणतो वातड अशी एक म्हण आहे. आपल्या सर्वांसाठी जे लोक आयुष्य पणाला लावून आपले रक्षण करतात त्यांच्या प्रति आदरांजली आणि जिव्हाळा राहिला दूरच पण कुठल्याही संवेदनशील माणसाला संताप येईल अश्या प्रतिक्रिया इथे येऊ शकतात. काही धाग्यांवर असे झालेले आपण बघतोच. बऱ्याच संवेदनशील विषयांवर मिपा वर ह्यापूर्वी मेगाबायटी चर्चा झालेल्या आहेत.साधक बाधक विचार, परस्परविरोधी, अगदी टोकाचे वाटणारे विचार मांडले गेले आहेत.त्यामुळे काही मजकुराचे संपादन आणि काही आयडींवर बंदी असेही झाले आहे. पण माझ्या मते हे सगळे एका अदृश्य मर्यादेत चालत होते. सध्या मात्र काही डुआयडीनी ठरवून कहर केला आहे. काहीच्या काही प्रतिक्रिया द्याव्यात आणि लोकांनी चिडून जाऊन त्यांना उत्तर द्यावे ह्यासाठी ते आपल्याला भाग पडत आहेत. असो. फारच अवांतर झाले. पण ह्या दुर्दैवी घटनेला आपल्या मिपा कडून गालबोट लागू नये म्हणून हे लिहावे असे वाटले.मिपाचे सदस्य नसलेले पण मिपा वाचणारे असे हजारो, कदाचित लाखो लोक असतील. त्यांना डुआयडी आणि इतर गोष्टी माहित नसणार, पण ह्या डुआयडींच्या आणि त्याला उत्तर म्हणून आलेल्या प्रतिक्रिया वाचून एकूणच मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 15:53
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली ! :(

नितिन थत्ते Sun, 09/18/2016 - 19:55
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध. सरकार या बाबतीत योग्य असेल तो निर्णय घेईलच. जो योग्य त्या माहितीवर आणि सर्व प्रो आणि कॉन यांच्यावर आधारित असेल.

प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 20:29
इथे श्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला फक्त सज्जड दम देऊन थांबायला नको असे वाटते, निवडणूक प्रचारा दरम्यान 'एक सर के बदले हम दुष्मन के दस सर लेके आयेंगे' हे श्री नरेंद्र मोदी यांनी बोललेले वाक्य आता खरे करुन दाखवायची वेळ आली आहे. या आधी देशात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यावर कडी से कडी निंदा तर कॉंग्रेस सरकार देखिल करत होती, मात्र अशी निंदा न करता काहीतरी ठोस कारवाई करुन आपण कॉंग्रेस पेक्षा वेगळे आहोत हे तमाम भारतीय जनतेला दाखवून द्यायची चांगली संधी त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी सोडू नये असे वाटते.

मनिमौ Sun, 09/18/2016 - 21:30
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या विचार सोडुन हातात शस्त्र धारण करायची वेळ आली आहे सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 07:40
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे? दासबोध.कॉम यांनी सुरु केलेल्या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद इथंही उद्धृत करणे गरजेचे वाटत आहे. --- सध्या भारत पाकिस्तान मध्ये एकतर्फी व्यापार करार आहे. म्हणजे आपण Most Favored Nation या तहा प्रमाणे पाकिस्तान ला तेथून येणाऱ्या मालावर जकात सवलती देतो .पण जगात बाकी देश एकमेकांना तीच सवलत देण्याचे बंधन पाळतात तसे पाकिस्तान करत नाही.पाकिस्तान ही सवलत भारतातून पाठवल्या जाणाऱ्या मालावर देत नाही. सबंध इतके बिघडल्या नन्तर तरी हे पाकिस्तान धार्जिणे एकतर्फी धोरण बंद करायला हवे. भारताने पाकिस्तानला MFN सवलत १९९६ साली दिली .पाकिस्तानने अजून तरी तसे केलेले नाही.महात्मा गांधी यांनी शत्रूने एका गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असे म्हटले होते. ते धोरण आजही पुढे चालवले जात आहे असे वाटते .

साहना Mon, 09/19/2016 - 07:57
आपले नाक कापून पाकिस्तानला अवलक्षण करून काय फायदा ? पाकिस्तान ने भारताला MFN दर्जा नाही दिला ह्यांत पाकिस्तानचेच जास्त नुकसान आहे. पाकिस्तानी आर्मीला चीन आणि अमेरिका कडून भरपूर पैसे मिळतात. त्यांना विशेष फरक पडत नाही.

In reply to by साहना

रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 09:56
कसे काय ? पाकिस्तान भारतातून आयात होणाऱ्या मालावर जकात शुल्क आकारतो . पण आपण पाकिस्तान मधून आयात होणाऱ्या मालावर जकातीच्या सवलती देतो. त्या सवलती आपण बंद करण्याने भारताचे नाक कसे कापले जाईल हे जरा समजावून सांगा. http://www.thehindu.com/news/international/south-asia/pakistan-in-no-mood-to-grant-mfn-status-to-india-yet/article7903550.ece

In reply to by रमेश आठवले

साहना Tue, 09/20/2016 - 01:26
इकोन १०१: Import duties hurt importing population भारतीय जनतेला पाकिस्तान माल स्वस्तांत मिळतो आहे आहे पण पाकिस्तानी जनतेला भारतीय माल महागात पडतो ह्यांत आमचा फायदा आणि पाकिस्तानी जनतेचे नुकसान आहे.

In reply to by साहना

रमेश आठवले Tue, 09/20/2016 - 01:59
समजले नाही पाकिस्तान भारताकडून १५० च्या आसपास वस्तु आयात करतो आणि त्या पाकिस्तानच्या नागरिकांना मुद्दाम जास्त किमतीने विकतो असे आपणाला म्हणायचे आहे काय ? बहुतेक देशात हा दर्जा एकमेकांना दिला जातो

In reply to by नावातकायआहे

सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 09:40
आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते तसे आम्ही प्रति हल्ला शत्रूला पाहिजे तसा नव्हे तर आम्हाला पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तसा करण्याचा पर्याय खुला ठेवतो. आणि ते त्यांनी करून दाखविले. . सवंग लोकप्रियतेच्या मागे जाण्याऐवजी थंड डोक्याने सर्व गणिते करून प्रतिहल्ला केला जाईल. श्री नरेंद्र मोदी यांच्या कडून अशी अपेक्षा आहे. जनतेला हिंदी चित्रपटासारखे "अगर तुमने अपनी मां का दूध पिया है तो सामने आओ" सारखे खटकेबाज संवाद पसंत असतात. त्याला बळी न पडल्यास "तुमचे मोदी' काय करत आहेत. डॉ मनमोहनपेक्षा वेगळे काय केले म्हणून येथेही प्रतिसाद येतीलच. असो

In reply to by सुबोध खरे

फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 10:19
बाकी सगळे बरोबर आहे, फक्त असल्या बातमीवर राजकीय धुळवड मोदी मनमोहन वगैरे आणायचे पाप करून काय साधले तुम्ही? जर 'अपनी माँ का दूध" वगैरे फिल्मी संवाद आहेत तर "एका मुंडक्याच्या बदली 10 मुंडकी" हा फिल्मी संवाद नसेल का? त्या संदर्भात जर मोदींना प्रश्न विचारले गेले किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले तर तुम्हाला खुपण्याचे काहीही कारण नाही

In reply to by सुबोध खरे

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 11:49
आणि सर्वंकष युद्ध आर्थिक दृष्ट्या दोघांनाही परवडणारं नाही. जी काही कृती होईल ती ही गणितं डोळ्यांसमोर ठेवून होईल. पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित Mon, 09/19/2016 - 12:07
म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील निवडणुकीवर डोळा ठेवूनच निर्णय होईल ?? जग जिंकायला निघालेल्या अलेक्सझांडर सारखा शेवट मोदींचा होईल यात शंका वाटत नाही.

In reply to by विशुमित

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 14:55
रच्याकने ' फक्त ' उत्तर प्रदेशातील निवडणुकींवर डोळा ठेवून निर्णय होईल असं कुठे म्हटलंय ते दाखवा. स्वतःला वाटेल तो अर्थ काढायला तुम्ही स्वतंत्र आहात पण दुसरेही तसंच म्हणताहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करु नका.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित Mon, 09/19/2016 - 15:05
तुम्हीच म्हणताय, "पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत" म्हणजे निवडणूक नसती तर नेहमी सारखीच गुळमुळीत प्रतिक्रिया दिली असती, असाच अर्थ लागतो ना.

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 12:53
कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.
देजा वू? २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही दोन महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत्या आणि त्यावेळी केंद्रात वाजपेयींचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात भाजपचे राजनाथ सिंगांचे.तेव्हा सीमेवर अगदी "आयबॉल टू आयबॉल" परिस्थितीत सैन्य नेलेही होते.पण त्यातून पुढे युध्द वगैरे काहीच झाले नाही. मे २००२ कालच्या उरी हल्ल्याप्रमाणे जम्मूजवळ कालूचक येथे सैनिक छावणीवर हल्ला झाला होता. त्यानंतर वाजपेयी कुपवाडाला गेले होते आणि "मेरा यहा आना अपने आप मै एक प्रतिक है. इसे हमारा पडोसी समजे ना समजे दुनियावाले समजे ना समजे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" असेही बोलले होते.पण पुढे काहीच झाले नाही. अर्थातच धसमुसळेपणाने वाजपेयींनी हल्ला केला नाही हे चांगलेच झाले.आजही परिस्थिती फार वेगळी आहे असे अजिबात् नाही. आणि आताही मोदी काही वेगळा निर्णय घेतील असे वाटतही नाही. सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.याविषयी माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे "उंदीर मारायच्या विभागात नोकरीला असून...." यापेक्षा काही वेगळे नाही. तरीही एक गोष्ट नक्कीच लिहितो की जो काही निर्णय होईल त्यात उत्तर प्रदेशातील निवडणुका हा घटक नसावा/नसेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विशुमित Mon, 09/19/2016 - 13:02
सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.>>>>>>>>>> फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे? असे व्यक्ती प्रेम किती दिवस बाळगणार आहोत आपण?

In reply to by विशुमित

गंम्बा Mon, 09/19/2016 - 15:05
फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे?
डोवाल नक्कीच थोर असणार, पण लष्करी छावणी वर हातबाँम्ब टाकता येतील इतक्या जवळ अतिरेकी येत असतील म्हणजे अश्या छावण्यांच्या सुरक्षीतते साठी पेट्रोलिंग वगैरे नसते का? बाप्पु कींवा डॉक्टर खरे सांगु शकतील पण विचित्र वाटले इतके नक्की. भारतीय सैन्य खुप अंडरस्टाफ्फ्ड आहे किंवा प्रचंड स्ट्रेचड आहे असा ही अर्थ निघतो.

In reply to by गंम्बा

सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 20:31
लष्करात एक म्हण नेहमी सांगितली जाते. "जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैन्याला कोणतीही तटबंदी अभेद्य नसते." जेंव्हा एक दहशतवादी तटबंदी भेदून आत शिरतो तेंव्हा त्याच्या अगोदरचे शंभर दहशतवादी मारले गेलेले असतात/ किंवा त्यांची घुसखोरी नाकाम झालेली असते. हि वस्तुस्थिती जगाच्या समोर मांडण्याची गरज नसते. दुर्दैवाने दहशतवादयांचे धर्मयोद्धा म्हणून मानसिक ध्रुवीकरण झालेले आहे आणि ते अशा मरणाला भीत नाहीत तेंव्हा "निर्भय" माणूस हा जास्त धोकादायक असतो. उडी हे गाव एखाद्या सुळक्यासारखे पाकिस्तानच्या सरहद्दीच्या घुसलेले आहे त्यामुळे तेथील लष्करी तळ हा तीन बाजूनी पाकिस्तानी भूमीने घेरलेला आहे. एका बाजूला तर ते अंतर केवळ ६ किमी इतके कमी आहे. पूर्णपणे सशस्त्र असे दहशतवादी जेंव्हा आत घुसतात तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचा जोरदार गोळीबार चालू होतो. आपले सैनिक त्यांना प्रत्युत्तर देतात. या धुमश्चक्रीत काही लोक आत घुसतात आणि काही मारले जातात. मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंगावर पेलेटने पाकिस्तानी भडीमार करतात आणि हि प्रेते तुमच्या हद्दीत "लष्कराने कृत्रिम चकमकीत मारलेले नागरिक" म्हणून उभे केले जातात याला अर्थात काश्मीर मधील फुटीरांची फूस असतेच. जगाची पाहण्याची दृष्टी अशीच आहे कि हा एक दहशतवादी तरी आत घुसलाच कसा? काश्मीर मध्ये दर शंभर मीटर वर एक सैनिक उभा आहे तर हे दहशतवादी घुसतातच कसे? ( पाकिस्तान बरोबर आपली सीमा २९०० किमी आहे. तेही नुसती गस्त घालण्यासाठी ८ तासाला एक आणि एक सुटी साठी असे ४ सैनिक प्रत्येक १०० मीटर साठी उभे केले तर १लाख १६ हजार सैनिक "फक्त" गस्त घालण्यासाठी उभे ठेवावे लागतील हा विचार केलेलाच नाही) आम्ही कर भरतो त्यावरच लष्कराचे पोट भरते मग असा हलगर्जी पणा कसा होतो. अशा तर्हेचे प्रश्न मिपावरच विचारले गेले आहेत. यातील बरेच प्रश्न हे शुद्ध अज्ञानापोटी विचारले गेले आहेत आणि काही आकसापोटी. म्हणून त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचा मी प्रयत्न केला नाही कि करतही नाही. इथे मूळ मुद्दा दहशतवादी हा नसून त्याला मिळणारी पाकिस्तानी लष्कराची छुपी मदत हा मुद्दा आहे. ती मदत नसती तर १००० पैकी एखादा दहशतवादी आत घुसला असता. सिमी किंवा आय एस आय एस सारख्या संघटनांचे "निद्रिस्त सेल" भारतातील शहरातही आहेत. तेंव्हा केवळ तटबंदी नव्हे तर सगळा देश सुरक्षित करणे आवश्यक आहे. पण आपली जनता फुकट मिळणार्या वीज आणि पाण्यासाठी मत देते किंवा जातीच्या नावावर मत देते किंवा याकूब मेमन सारख्या देशद्रोहाच्या गुन्हेगाराला हुतात्मा म्हणते. स्वतःचे पाच पैसे वाचावेत किंवा स्वतःच्या आरामात कोणताही फरक होऊ नये म्हणून काहीही करायला तयार असते.आपली जनता १००० रुपये दिले तर दाऊद इब्राहिम ला मते द्यायला तयार होईल हे मला खेदाने म्हणावेसे वाटते. छप्पन लप्पन करून कर चुकवण्याला "हुशारी" मानते अशा जनतेने हे समजून घेणे आवश्यक आहे कि युद्ध हे शस्त्राने किंवा लष्करी सामर्थ्याने जिंकता येत नाही तर त्या लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या जनतेच्या अतुलनीय धैर्याने जिंकता येते. मी माझे कर्तव्य करतो आहे का? शेजारचा माणूस एकही तरी संशयास्पद गोष्टी करतो आहे ते पोलिसांना कळवायच्या ऐवजी कोण त्या लफड्यात पडणार म्हणत असाल तर लष्कराला हे दहशतवादी आत घुसलेच कसे हे विचारण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला आहे हे समजून घ्या. दोन वेळेस ध्वजाला सलाम केला आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जय हिंद म्हणले कि आपली देशभक्ती जाहीर झाली असे चालणार नाही. असो बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सही रे सई Tue, 09/20/2016 - 02:53
किती संयमीत शब्दात एकेकाला हाणलत हो तुम्ही. अश्या अभ्यासपुर्ण तरीही प्रत्येकाची जागा दाखवून देणार्‍या तुमच्या या लिखाणाची पंखा झाले आहे. मुजरा घ्यावा महाराजा.

In reply to by सुबोध खरे

गंम्बा Tue, 09/20/2016 - 10:02
डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद मला उद्देशुन असला तर पूर्णपणे हुकला आहे. मीच लिहीले होते की असे हल्ले होऊ शकतात ह्याचा एक अर्थ असा निघतो की भारतीय सैन्य अंडरस्टाफ्फ् आहे. आणि जे आहे ते सुद्धा स्ट्रेच्ड आहे म्हणजे त्यांच्या कपॅसिटी पेक्षा जास्त जबाबदारी निभावायला लागते आहे. त्या बद्दल तुमचे मत विचारले तर तुम्ही मला देशभक्ती आणि नैतिकता शिकवायला लागलात. सैन्याचा पगार सरकारी नागरी नोकरापेक्षा कमीतकमी दीडपट असावा असे माझे मत आहे. तुम्ही म्हणता तसे लाखो सैनिक गस्त घालायला लागत असतील तर तसे ते असायला पाहिजेत. त्याचा खर्च बाकीच्या नागरीकांनी केलाच पाहिजे. त्याही पुढे जाउन असे म्हणीन की , भारतीय सैन्याला जर दिल्लीतले सरकार पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा आणि मनुष्यबळ देत नसेल तर सैन्यानी काश्मीर मधे काम करणे बंद करावे. काश्मीर कशाला सर्वत्र.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 13:24
ममो पंप्र होते तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता म्हणता? का "एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" म्हणले गेले तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता?

In reply to by फेदरवेट साहेब

प्रसाद_१९८२ Mon, 09/19/2016 - 14:00
"एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" हा प्रधान सेवकांचा चुनावी 'जुमला' होता जसे १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतील तसाच हा एक, त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. आणि निवडणुकीत दरम्यान दिलेल्या प्रत्येक घोषणा खर्‍या(च) असतात व त्या राजकारण्याकडून पूर्ण केल्याच जातील हि अपेक्षा ठेवली तर या देशातून गरिबी तर १९७१ सालीच हटायला हवी होती.

In reply to by प्रसाद_१९८२

कलंत्री Mon, 09/19/2016 - 14:20
वो दुध मांगेंगे खीर देंगे, काश्मिर मांगेंगे तो चीर देंगे. अशा घोषनानी नकळतच सर्वांचे डोके भडकावले जातात. पंतप्रधान, सेन्याधिकारी आणि सबळ पक्ष असताना सर्वसामान्य लोकांनी सीमा पार करा, फडशा पाडा असे विचार करणे गैर आहे.

In reply to by सुबोध खरे

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 15:08
हल्ला झाला तर आपलं कसं अन कायं काय नुस्कान होइल अन युद्धखोरीविरोधी प्रवचन वगैरे करण्यात बिजी आहेत.

कलंत्री Mon, 09/19/2016 - 13:54
भारत आणि पुरस्कृत हल्ले यात देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मागे पडतात. चिथावणीखोर विचाराने काहीच साध्य होत नाही. भारत आणि पाकिस्तान यात चांगले संबंध निर्माण व्हायला हवेत.

संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 13:58
जवानांना श्रद्धांजली! नेहमी हेच लिहीत राहण्याची वेळ येते याबद्दल अतीव संताप आणि चीड आहे, त्यापेक्षा जास्त व्यक्तिगत तऱ्हेने मला काहीच करता येत नाही याचीही खंत आहे, राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे, धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 14:19
राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
राजकीय चिखलफेकीसाठी वेगळा धागा असावा याला सहमती आहे. पण संभाव्य टिकेच्या भितीने मोदी समर्थक व्यथित झाले असतील तर त्याला फाट्यावर मारायला हवे.कुठेतरी लॅप्स असल्याशिवाय अशी घटना घडायची नाही आणि चूक असेल तर टिकाही जरूर व्हावी.हा हल्ला आपल्या सैनिकांवर म्हणजे आपल्या देशावर झालेला आहे.तेव्हा या हल्ल्याविषयी खुलासा मागायचा अधिकार प्रत्येक भारतीयाचा आहे--मग तो/ती मोदी समर्थक असो की नसो.अर्थात यालाही अपवाद आहेतच.ज्यांनी ज्यांनी "भारत देशाचे तुकडे तुकडे व्हावेत--इन्शाल्ला" असल्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन केले होते किंवा त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गोंडस रूप दिले होते त्यांना भारताचे सैनिक मारले गेले याचा आनंदच होईल. तेव्हा असल्या लोकांनी कुठलेही खुलासे मागितले तर ते ढोंग असेल. असे लोक सोडून इतर सर्वांना सरकारकडे खुलासा (नव्हे जाब) मागायचा अधिकार आहे याविषयी शंका नसावी.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 14:58
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत
कुठे दिसले तुम्हाला हे व्यथित समर्थक? मिपावर?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 15:04
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
इतरांचं माहित नाही, निदान मी तरी टीकेच्या भितीने व्यथित झालेलो नसून माझ्या देशातील २० सैनिकांच्या मॄत्युने व माझ्या देशाच्या हतबलतेने व्यथित झालो आहे. कोणालाही चाहूल लागून न देता सीमा पार करून मोजकेच हल्लेखोर येतात व आपल्या संख्येच्या पाचपट सैनिकांना मारतात व माझा देश अशा सतत होणार्‍या हल्ल्यांविरूद्ध काहीही करू शकत नाही या निराशेतून व संतापातून मी व्यथित झालो आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 15:28
या सैनिकांच्या शहीद होण्याबद्दल दु:ख होणं स्वाभाविक आहे पण देश हतबल झालाय असं समजणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अशा एका हल्ल्याने डगमगणारा देश अशी ओळख आपल्या देशाची नाहीये आणि होऊही नये. गुप्तचर यंत्रणा असे अनेक हल्ले परतवून लावत असतात,सैनिकही अशा अनेक हल्ल्यांना तोंड देत असतात. एक फिदायीन हल्ला यशस्वी होणं हे सिस्टिमचं अपयश मानणं मला पटत नाही. आपण त्या परिस्थितीला कधीही तोंड दिलेलं नसल्यामुळे कुणाचं चुकलं आणि काय हे आपण ठरवू शकत नाही कारण कशा परिस्थितीत लोक आपलं काम करत आहेत हे आपल्याला माहित नाही. शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होणं ही एक गोष्ट झाली, पण त्यामुळे व्यथित होणं म्हणजे एकप्रकारे शत्रूचा हेतू साध्य व्हायला मदत करणंच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 14:40
कोठेतरी, काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकत आहे. हा हल्ला सरकारचं व सैन्याचं नक्कीच अपयश आहे. उरी सीमेपासून २० किमी आत आहे असं वाचनात येतंय. सीमेपासून इतक्या आत सशस्त्र हल्लेखोर निर्धास्त येऊ शकतात व फक्त ४ जण २० सैनिकांना मारू शकतात ही अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे. सैन्य बेसावध होते, गुत्पचर यंत्रणा बेसावध होत्या व दिल्लीतील राज्यकर्तेसुद्धा बेसावध होते हे कटु सत्य मान्य करायला हवे. पाकिस्तानच्या बाबतीत आजवर अवलंबलेली सर्व धोरणे संपूर्ण अपयशी ठरली आहेत. मैत्रीचा हात, शांततेची चर्चा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, सीमेवरील मेणबत्त्या, पाकिस्तानी कलाकारांना देशात पायघड्या, पाकिस्तानला ट्रेन व बसने जोडणे, मोदींची सरप्राईझ व्हिसिट, वाजपेयींचा बसने प्रवास, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, २००२ व २००३ मध्ये भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध, एकमेकांना आंबे व साड्यांची भेट, पाकिस्तानच्या तथाकथित बुद्धिजिवी विचारवंताबरोबरचा तथाकथित भारतीय बुद्धिजिवी विचारवंतांचा संवाद, भारताचे तथाकथित कठोर इशारे . . . काहीही केले तरी पाकिस्तानचे हल्ले थांबत नाहीत व त्यामुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी थांबत नाही. पा़किस्तान हा भारताचा शत्रू असून भारत नष्ट करणे हेच या देशाचे ध्येय आहे हे अजूनही भारत मान्य करायला तयार नाही. भारताने झोपेचे सोंग घेतले आहे व ते अत्यंत घातक आहे. ही सर्व परिस्थिती अत्यंत निराशाजनक व अत्यंत संतापजनक आहे. कालच्या हल्ल्यानंतर लगेच, "भारताने घाईघाईत कारवाईचा निर्णय घेऊ नये, युद्ध झाले तर ते दोन्ही देशांना परवडणार नाही, पाकिस्तान अण्वस्त्रे वापरू शकतो, हल्ला झाला तरी शांतता चर्चा सुरू रहायलाच हवी" अशा प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीच आहे. आजवर जे जे केले ते व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे आता जुनेच मार्ग पुन्हा एकदा नव्याने चोखाळून काहीही साध्य होणार नाही. सद्यपरिस्थितीत लष्करी कारवाई हा एकमेव उपाय शिल्लक आहे असं दिसतंय. हा उपाय कसा करायचा हे लष्करालाच ठरवावे लागेल. हा उपाय कितीही कटु व महागडा वाटत असला तरी हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी दुसरा कोणताही उपाय शिल्लक नाही. भारत आजपर्यंत हा उपाय टाळत आलेला आहे. परंतु हा अंतिम उपाय वापरायचा नसेल तर जैसे थे परिस्थिती सुरू राहील. पाकिस्तानी दहशतवादी, हल्लेखोर हल्ले करतच राहतील, आपण निषेध करतच राहू, चर्चा वगैरे मार्गाने प्रश्न सुटतील या भ्रमातच राहू.

शाम भागवत Mon, 09/19/2016 - 19:30
आपल्या Deep Asset ची काही पंप्रच्या कारकिर्दीत (मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंग व गुजराल) पुरती वाट लावून टाकली होती. मला वाटते की त्या बाबत खूप काही प्रगती साधली गेली असावी व आता लवकरच त्याचा उपयोग सुरू होईल.

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 21:08
पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहे. १) पाकिस्तानी लष्कर - सातत्याने सीमेवर गोळीबार, भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांवर हल्ले, दहशतवादी संघटनांना व आत्मघातकी हल्लेखोरांना शस्त्रे, प्रशिक्षण व इतर सर्व प्रकारची मदत देणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया सुरू ठेवते. २) लष्करे तोयबा, जैशे महंमद सारख्या दहशतवादी संघटना - या संघटना धार्मिक ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी तयार करतात, प्रशिक्षण देतात, आत्मघातकी हल्ल्याचे नियोजन करून प्रत्यक्ष हल्ले घडवून आणतात, भारतात दहशतवादी घुसवून बॉम्फस्फोट, गोळीबार इ. मार्गाने दहशत निर्माण करतात. ३) पाकिस्तानी राज्यकर्ते - भारताबरोबर चर्चेचे नाटक करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरूद्ध मोहीम चालविणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शस्त्रे विकत घेऊन ती भारताविरूद्ध वापरणे, अण्वस्त्रे कार्यक्रम, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, भारतविरोधी कारवाया करणार्‍या भारतीय व पाकिस्तानी दहशतवाद्यांना राजकीय, आर्थिक इ. सर्व प्रकारचा पाठिंबा देणे इ. मार्गाने पाकिस्तानी राज्यकर्ते भारतविरोधी मोहीम सुरू ठेवतात. ४) तथाकथित पाकिस्तानी बुद्धिवंत, कलाकार - यांचे काम म्हणजे भारतातील पाकिस्तानविरोधाची धार बोथट करणे. हे करण्यासाठी स्वतः वारंवार भारताला भेटी देऊन आम्ही ट्रॅक २ डिप्लोमसी करीत आहोत, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत असा आव आणणे; भारत-पाकिस्तान प्रश्न हा राजकारण्यांनी निर्माण केला असून सामान्य जनतेला यात रस नाही, सामान्य जनतेला मैत्री हवी आहे असा भ्रम पसरविणे; पाकिस्तानप्रेमी तथाकथित भारतीय बुद्दिजिवींना पाकिस्तानात बोलावून त्यांचा पाहुणचार करणे जेणेकरून ते भारतात परत गेल्यावर पाकिस्तानविषयी चांगले बोलतील, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटात काम करणे व गाणी म्हणणे, गुलाम अली सारख्यांनी सातत्याने भारतात मैफिली आयोजित करून पाकिस्तान विरोधाची धार बोथट करणे इ. मार्गाने हे भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. दुर्दैवाने भारतीय जनता, भारतीय माध्यमे आणि तथाकथित भारतीय विचारवंत यांचा पवित्रा ओळखू शकलेले नाहीत. १८५७ चा उठाव, १८७१ मधील वासुदेत बळवंत फडके यांचा सशस्त्र लढा इ. हिंसक लढ्यामुळे पोळलेल्या ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्‍या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली. अगदी तसेच पाकिस्तान करीत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू होते, भारतातील तथाकथित विचारवंत लष्करी कारवाईला विरोध करून चर्चेच्या माध्यमाने प्रश्न सोडवावा, युद्ध परवडणारे नाही, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, दोन्ही देशातील जनतेचा संपर्क वाढल्यास प्रश्न सुटेल इ. मागण्या पुढे करून कारवाईच्या विरोधात वातावरण निर्माण करतात. दुर्दैवाने भारत या सर्व स्तरांवर फसलेला आहे. भारत कधी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चर्चा करू पाहतो, तर कधी पाकिस्तानवर निर्बंध घालू पाहतो, तर कधी दहशतवाद्यांविरूद्ध कडक पावले उचलू पाहतो. यातील कोणत्याही धोरणात सातत्य नाही. सद्यपरिस्थितीत युद्ध हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Mon, 09/19/2016 - 21:25
अगदी लोलियत प्रतिसाद.
हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्‍या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली.
:) #मिसिंगलोळणारीस्मायली
सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.
हहपोदु. गेलाबाजार पाकिस्तानचे सर्वात मोठे मदतगार जे की अमेरिका आणि चीन यांच्या विरोधात अमेरिकन रेष्टारंटे आणि चायनीज ठेल्यावर खाणेही बंद करण्याचा प्रस्ताव मी मांडतो. (गंभीर विषयावरील वरचा हास्यास्पद प्रतिसाद वाचल्याने राहवले नाही याबद्दल क्षमस्व.)

In reply to by अनुप ढेरे

साहना Wed, 09/21/2016 - 07:18
चिनी गळ्याचा शर्ट/कोट घालणे मोदींनी आणि पर्रीकरांनी राष्ट्रहित लक्षांत घेऊन तात्काळ बंद करावे असाही कडक इशारा आम्ही मोदींना देत आहोत.

In reply to by श्रीगुरुजी

साहना Wed, 09/21/2016 - 07:20
> ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. पण आज काल प्रयत्नांत संघाने काँग्रेसला चारी मुंड्या चिट केले आहे. आमचे सजेशन : वेदिक विद्यापीठ काढून आपली जुनी ब्रम्हास्त्र, पराजन्यस्त्र इत्यादी पुन्हा शोधून काढावीत.

In reply to by श्रीगुरुजी

अशोक पतिल Wed, 09/21/2016 - 22:27
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन ! तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल . परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.

In reply to by अशोक पतिल

अशोक पतिल Wed, 09/21/2016 - 22:28
@ श्री गुरुजी अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन ! तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल . परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.

विशाल व्यास: सैनिक म्हणजे नाटकातला समरधुरंधर आम्हा दिसतो लीलेने भवपाश तोडूनी जो गनिमांच्या फळीत घुसतो पीळ मिशीला भरून म्हणतो – या या सारे माय कुणाची व्याली – वगैरे उडवुनी चटणी शत शत्रूंची ( पिटाकडे पाहून जरासा गाली हसतो ) आणि रेल्वेमध्ये जेधवा विटकी खाकी पेहरणारे तुटक्या द्रोणातील वड्यांचे दही पिणारे दोहे अथवा अभंग ओवी गुणगुणणारे असे शिपाई सहज भेटती देत जांभया त्रस्त स्वराने आम्हा म्हणती – भली नोकरी कारकुनाची पगार घ्यावा मेजावरती दिवस रजेचे किती तयाला नाही गणती या फौजेचा कठीण पेशा शिस्तीचे वरवंटे माथा सदैव फिरती मुलामाणसांपासून लागे दूर जावया आणिक हे म्हणताना डोळे किंचित भिजती वीररूप हे असले पाहून पांढरपेशा श्रद्धा आमुच्या ( थिएटरातील बनावटीच्या ) विचलीत होती व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो काय शिपाई असेच असती ! होय शिपाई असेच असती, परंतू आम्हा उपजत नाही ते हे - नाटकातल्या त्या शूराला नसते तेथे मरावयाचे असते केवळ टाळीसाठी विरात्वाने स्फुरावयाचे पायदिवे विझल्यावर आणिक घरी जाउनी दुलईमध्ये शिरावयाचे ! रेलवेतला सैनिक पण हा – करांत त्याच्या दहीवड्याचा द्रोण असु द्या स्वरात त्याच्या तक्रारीचा भाव दिसु द्या मुलेमाणसे म्हणता त्याचे नेत्र भिजुद्या जेव्हा आपुली (टिनोपालची) मुलकी दुनिया सोडूनी जातो रणगाडे, तोफा, तंबुंच्या जगात अपुली जागा घेतो गळुनी पडती सर्व जांभया तक्रारीचा स्वरही विरतो दुरस्थातील आप्तजनाचा आठव तेथे विद्ध न करतो मळकट कवचे (रेलवेतली) फुटून पडती आणि सनातन पुरुषार्थाचा सोलीव गाभा युद्धतळावर उभा राहतो. तोच रेलवेतला शिपाई अग्नीचे घन लोळ भोवती बरसत असता अविचल दृष्टी समोर बांधून गोळे भरतो, खंदकातल्या भाईसाठी घास आपुला दूर सारतो, शरीर पिंजून गेले तरीही हात उभारून अशरण वरती या भूमीवर कोसळणारे गगनाचे छत रोखुनी धरतो - कुसुमाग्रज

अर्धवटराव Tue, 09/20/2016 - 03:30
शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली. इतर कोणि इतर आठवण करो वा न करो, जेंव्हा केंव्हा युद्धभूमीवर आपले सैन्य शत्रुशी भिडेल तेंव्हा प्रत्येक जवान अशाच वीरमरण पत्करलेल्या आपल्या बांधवांची आठवण काढुन चवताळुन हात चालवेल. एरवी काडिची किंमत देण्याचा लायकीचा नसलेला आपला शेजारी देश अशा प्रसंगी भारताला आपल्या पातळीवर आणुन उभा करतो व त्याची दखल घ्यायला भाग पाडतो... इतकी कि आपले आपले सर्व व्यवहार, चिंता, प्रॉब्लेम्स बाजुला सरतात व या शेजार्‍याचा खात्मा करायचा एकमेव उद्देश भारतीयांच्या दिवास्वप्नात चमकुन जातो. असो. सरकार व इतर संबंधीत यंत्रणा काय योग्य ते करेलच. असे जीव जाणं मानाला चटका लाऊन जातं मात्रं.

आनन्दिता Tue, 09/20/2016 - 09:26
प्रचंड दु:ख देणारी बातमी. जीव अगदी तळमळून गेला. अशा अजुन किती विरांना आपल्या अमुल्य प्राणांची आहुती द्यावी लागणार आहे काय माहीत! :'(

मदनबाण Tue, 09/20/2016 - 15:53
शहिदांना आदरांजली ! आपल्या देशाच्या आत येउन आपल्याच देशाच्या जवांना ठार मारण्याचे भ्याड कॄत्य पाकिस्तान त्याच्या प्रॉक्सीवॉरच्या माध्यमातुन करु शकला आहे ! या प्रॉक्सीवॉरला आपण अजुनही उत्तर देउ शकलो नाही ही दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे ! डोंन्ट टॉक, जस्ट रिटालिएट... या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा. यावर अधिक इथे :- Mending Pakistan’s behaviour Securing the Indus treaty रशियाकडुन शस्त्रे घ्या आणि ती बलुचिस्तान मध्ये पसरवा...हा उपाय पण चांगला आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 09/20/2016 - 17:05
I wish to ask the Prime Minister, are you not weak? If indeed you are a strong government, the country needs proof of that.Narendra Modi (@narendramodi) May 4, 2009 माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण मनपोहन सिंग व्हर्जन २ आहात काय ? आता जर मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला नाही तर भाजपाचे "बुरे दिन" मात्र नक्कीच सुरु होतील ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी Wed, 09/21/2016 - 00:07
पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच हा एक नवीन हल्ला होता. पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच यावेळीही लष्कर काही प्रमाणात गाफील होते असं वाटतंय. पूर्वीच्या अनेक हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांचं प्रमाण हल्लेखोरांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होतं. आणि ज्याप्रमाणे पूर्वीच्या असंख्य हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारला फारसं काहीच करता आलं नव्हतं, तसंच यावेळीही मोदी, पर्रीकर काहीही करू शकणार नाहीत हे नक्की (कडक इशारे, निषेध इ. नेहमीप्रमाणे होईलच). जर नेहमी देण्यात येणारे कडक इशारे, निषेधाचे ठराव, पुतळे/झेंडे जाळणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या वल्गना इ. व्यतिरिक्त काही भरीव कृती झाली तरच मोदींचं वेगळेपण दिसून येईल आणि निदान याबाबतीत तरी असे होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

In reply to by मदनबाण

अमितदादा Wed, 09/21/2016 - 00:55
पूर्ण सहमत. Indus Water Treaty हा भारताच्या हातात असणारे हुकमी पत्ता आहे पण राज्यकर्ते किती निर्भीड आहेत त्यावर अवलंबून आहे . आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव हटविण्यासाठी हे गुपचूप व्हायला हवं .

John McClain Tue, 09/20/2016 - 23:40
परिस्थिती भरपूर complex वाटतेय... हा एक ब्लॉग वाचण्यात आला. चांगलं वाटतंय(खरं खोट खात्री नाही... पण practical वाटतंय) खालचे काही comments पण चांगले आहेत... एकाच म्हणणं आहे कि चीन ने पैसे देऊन भीती पसरवणे चालू केले आहे ☺ http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

पैसा Wed, 09/21/2016 - 10:11
अजून किती? का सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार? आता सकाळी परवेझ मुशर्रफची मुलाखत बघताना टीव्हीवर चप्पल फेकून मारावीशी वाटत होती.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन Wed, 09/21/2016 - 11:40
सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार?
सगळे जग शांततेच्या धर्माच्या वाटेवर गेले तरीही हे प्रकार संपायचे नाहीत.कारण सतत इतर कोणाचा द्वेष करणारे लोक शत्रू संपले की आपापासतातच द्वेष करायला लागतात-- पाकड्यांनी बांगलादेशात जे केले तेच ते आज बलुचिस्तानात करत आहेत. तरीही शांतताप्रिय लोकांचा भळभळती हृदये असलेल्या सर्वांनाच कळवळा आहेच. तेव्हा कधीनाकधी हे होणारच आहे आणि त्या वाटेवर जगाला लवकरात लवकर घेऊन जाण्यात मदत करायला मानवतावादाचा कळवळा आलेले युरोपिअन्स बसले आहेतच. मेर्केलबाईंनी कोणाला घरात घेतले आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे समोर दिसतच आहे.आजही अती मानवतावादी ओबामा दुप्पट शरणार्थी घ्यायची भाषा करतच आहेत.

गॅरी ट्रुमन Wed, 09/21/2016 - 11:33
एकंदरीत पाकड्यांबरोबर डिल करताना आपण विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आलो होतोच आणि काही प्रमाणात त्यांचे नशीबही चांगले होते. १९७७ मध्ये झियांनी सत्ता काबीज केल्यानंतर झिया आणि पाकिस्तानही जगाच्या दृष्टीने pariah झाले होते.अशावेळी जनता सरकार झियांच्या प्रेमात पडल्याप्रमाणे वागू लागले. फेब्रुवारी १९७८ मध्ये परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते आणि "यापुढे भारत पाकिस्तानला हरवेल केवळ हॉकीच्या मैदानात" असे काहीसे बोलले होते.पुढे भारत-पाकिस्तान हॉकीचे सामनेही झाले.महिन्याभरातच भारत सरकारच्या निमंत्रणावरून झियांचे मार्शल लॉ अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आमीर मोहम्मद भारत दौर्‍यावर आले होते. झियांशी फोनवर बोलताना मोरारजी देसाईंनी भोळसटपणे रॉच्या पाकिस्तानातील कारवायांसंबंधी माहिती दिली होती आणि त्यानंतर झियांनी ताबडतोब त्यावर कारवाई केली असेही म्हटले जाते. म्हणजे जगाच्या दृष्टीने झिया pariah ठरलेले असताना आपण मात्र त्यांना एका अर्थी लेजिटिमसी देत होतो. पुढे १९७९ मध्ये रशिया अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तान आणि झिया "दहशतवादविरोधी" लढाईत अगदीच महत्वाची प्यादी ठरली. झियांचा pariah पणा त्यांच्या नशिबाने आपोआप नाहिसा झाला. १९९९ मध्ये मुशर्रफांनी सत्ता काबीज केल्यानंतरही मुशर्रफ आणि पाकिस्तान जगाच्या दृष्टीने pariah ठरले होते. २००० साली अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानला ४-५ तासांसाठी गेले होते.त्यावेळी मुशर्रफ यांच्याशी जाहिरपणे हस्तांदोलन करणेही बिल क्लिंटन यांनी टाळायचा प्रयत्न केला होता.अशावेळी आपणच पुढाकार घेऊन मुशर्रफना आग्रा परिषदेसाठी बोलावले.त्यापूर्वी मुशर्रफ पाकिस्तानात सत्ताधारी असले तरी त्यांचे पद "अध्यक्ष" असे नव्हते तर "चीफ एक्झेक्युटिव्ह" असे होते आणि नामधारी अध्यक्ष म्हणून रफिक महंमद तरार होते. अशावेळी प्रोटोकॉलचा प्रश्न येऊ नये म्हणून मुशर्रफनी तरारला हटवून स्वतः अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. एका अर्थी सगळे जग मुशर्रफला टाळत असताना मुशर्रफला लिजिटिमसी आपण मिळवून देण्यात वाटा उचलला. पुढे ९/११ झाले आणि परत एकदा पाकिस्तान आणि मुशर्रफ पाश्चिमात्य सरकारांच्या गळ्यातले ताईत बनले. आताही जग पाकिस्तानला टाळत आहे अशा बातम्या येत आहेत.अशावेळी फालतूचे मानवतावादाचे भरते येऊन जी चूक जनता आणि वाजपेयी सरकारने केली होती ती परत मोदी सरकार करणार नाही ही अपेक्षा. आणि हो-- अफगाणिस्तानमध्ये रशिया घुसणे किंवा ९/११ सारखी आणखी एखादी घटना घडून परत पाकिस्तान फ्रंटलाईन स्टेट बनणार नाही अशीही इच्छा.

In reply to by गॅरी ट्रुमन

पैसा Wed, 09/21/2016 - 13:00
मोस्ट फेवर्ड नेशनचा घोळ वाचून हाताची बोटे काय अख्खा हात तोंडात घातला आहे. पाकिस्तान जर बदल्यात काही सवलती देत नसेल तर पाकिस्तानातून माल आयात करणे आणि सवलती अशी दुहेरी मदत कशाला चालू आहे? त्या पैशांवर पोसलेले अतिरेकी आपल्याकडे येऊन वाट्टेल तो गोंधळ घालतात. म्हणजे हा दहशतवाद पोसायला अंतिमतः आपलाही हातभार लागतोच आहे. प्रत्यक्ष लढाई करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांची आर्थिक नाकेबंदी का करायचा प्रयत्न होत नाही?

In reply to by पैसा

संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 14:16
हे आर्थिक नाकबंदीबद्दल मी मागेही बरेचदा बोललो आहे पण कुणी उत्तर दिलं नाही अजून पर्यन्त, काय मजबुरी आहे नक्की?

In reply to by अनुप ढेरे

पैसा Wed, 09/21/2016 - 14:26
त्यांची तेवढी निर्यात होते आणि त्याना पैसे मिळतात. ते एका फटक्यात बंद होईल ना. सडू दे त्यांचा माल तिकडे. ते नको असेल तर तिथल्या लोकानी त्यांच्या सरकारला शिव्या द्याव्यात.

In reply to by पैसा

अनुप ढेरे गुरुवार, 09/22/2016 - 14:59
पाकला त्रास द्यायला आपण का त्रास करून घ्यायचा? हे वाचा. http://www.livemint.com/Opinion/AJyJYJD4vnAvyCysxxphTN/Mending-Pakistans-behaviour.html हा उपाय छान वाटतो आहे.

मदनबाण Wed, 09/21/2016 - 13:11
हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयाच्या संकुलाजवळ असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये लपून संपूर्ण परिसराची नीट टेहळणी केली होती. एनआयएच्या सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यादरम्यान मुख्यालयातील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वाधिक जवानांचा मृत्यू झाला. मुख्यालयाच्या परिसरात दोन इमारती आहेत. हल्ल्याच्यावेळी आग लागल्यानंतर कोणालाही पळून जाता येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. यावरून दहशतवाद्यांना याठिकाणची सखोल माहिती असल्याचे सिद्ध होत आहे. थोडक्यात आपल्या तरुण कोवळ्या जवानांना या अतिरेक्यांनी जाळुन मारले ! :( हे जवान कुठल्या लढाईत मारले गेले नाहीत किंवा गोळ्या झाडतानाही ते शहिद झाले नाहीत.दहशदवादी खानावळीत आत पर्यंत पोहचले होते ! यावरुन आपण काय बोध घेतला पाहिजे ? संदर्भ :- Uri attack probe : दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांना स्वयंपाकघरात कोंडले मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

In reply to by मदनबाण

संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 14:29
ह्याचाच तीव्र संताप आहे बाणराव, प्रतिकाराची संधी ना मिळता संपून जाणे कसे असते ते शब्दात नाही वर्णू शकत, काही लोक युद्धच्या विरुद्ध आहेत पण यारो, मरणारे सैनिक आपल्याच रक्ताचे नातेवाईक आहेत. भावनेच्या भरात काही करू नये, गप्प बसावे हे चीड आणणारे आहे, ह्या तमाम जगात फक्त आपल्याच देशाला सारासार विचार करण्याची काय गरज पडते नेहमी नेहमी हेच माझ्या आकलनाच्या बाहेर आहे, प्रतिकार करायचा नसेल तर ती शस्त्रसज्ज सेना, आयुधे, यंत्रे का काचेच्या कपाटात सजवून ठेवायला आहे काय? असेच हकनाक मरत राहण्यापेक्षा त्यांनाहि घरी पाठवा, आपण सगळे आपल्या मुलंबाळं सोबत घेऊन मरून जाऊ, ते जे काही अणुबॉम्ब मिसाईल बनवले आहेत ते आपल्याच देशावर टाकून संपवून टाका हा शेळपट देश, काही गरज नाही अशा अवस्थेत जगायची,

मदनबाण Wed, 09/21/2016 - 14:08
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा. यावर अधिक इथे :- Mending Pakistan’s behaviour Securing the Indus treaty काल या संबंधात टिपण्णी केली होती आणि ब्रह्मा चेलानी यांच्या लेखाचे दुवे दिले आहेत, याच आशया वरचा लेख आत्ताच दिसला तो खाली देत आहे. ‘उरी’नंतर उरलेली मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

जेसीना Wed, 09/21/2016 - 14:17
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे. तिथे रशिया, फ्रान्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ने आपल्याला पाठिंबा देऊन , आपण जे पाऊल उचलू त्यात ते सहकार्य असल्याचा दर्शवलंय. हळू हळू पुन्हा एकदा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखे दोन गट पडण्यास सुरवात झाली आहे. भारताने अजून पर्यंत कधीच कोणत्याच देशात आपले सैन्य घुसवले नाही हा अजून पर्यंतचा इतिहास आहे, उरी ची घटना अशा वेळी घडली आहे कि पठाणकोट ची जखम ताजी असतानाच परत पाकिस्तान ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारताला खूप विचार करून पुढची पावला उचलायची आहेत. आपले एक चुकीचा पाऊल उचलायची पाकिस्तान खूप वर्षांपासून वाट बघतो आहे, एक चुकीचा पाऊल उचलण्याच्या लगेच दोन किंवा तीन देशांमध्ये सरळ सरळ युद्ध भडकू शकते. आणि हे युद्ध कदाचित सरळ सरळ अणुयुद्ध असू शकते. कदाचित तिसऱ्या महायुद्धाची नांदीच सुरु होऊ शकते. खूप कठीण काळ चालू आहे, अमेरिका खूपच भयानक अशा आर्थिक स्थितीतून जात आहे, रशिया आणि चीन दोघांना पण सुपर पॉवर बनण्याची घाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत भारत नक्की कोणता पाऊल उचलतोय तिथे मला वाटते सगळ्या जगाचे आणि आपल्या सगळ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे. मला वाटते हा प्रश्न फक्त आणि फक्त पाकिस्तानची आर्थिक कोंडी , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सर्व बाजूने कोंडी करून त्यांना एकाकी पडूनच सुटू शकतो असा वाटते. कदाचित मोदी आणि त्यांचे सहकारी येणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सभे पर्यंत वाट बघतील त्यात पाकिस्तान ची सर्व बाजूने कोंडी करता येईल असा प्रयत्न करतील आणि नंतरच योग्य तो निर्णय घेतील. म्हणून कदाचित अजून पर्यंत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत (फक्त बैठकांशिवाय). मी तरी सध्या फक्त काहीतरी चांगल्या निर्णयाची वाट बघते आहे, बस माझ्या भारत मातेला आणि तिच्या रक्षण कर्त्यांना अजून इजा पोहोचू नये ह्यासाठी प्रार्थना करतेय. तरी सुद्धा खूप खूप दुःखद मानाने माझ्या शहीद झालेल्या भारत रत्नांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारत माता कि जय ....... जय हिंद

In reply to by जेसीना

श्रीगुरुजी Wed, 09/21/2016 - 15:01
प्रत्येक वेळी असा हल्ला झाला की लगेच भारताने युद्ध सुरू करावे, सीमा ओलांडून दुश्मनांचा खात्मा करावा अशी भाषा सुरू होते. त्याबरोबर लगेच अशीही भाषा सुरू होते की युद्धाची तयारी करायला अजून काही महिने लागतील, आताच युद्ध सुरू केले तर ते आत्मघातकी ठरेल. त्यामुळे बराच काळ काहीच न करता निघून जातो. तोपर्यंत आधीच्या हल्ल्याच्या स्मृती क्षीण होतात आणि मग पुन्हा एक नवीन हल्ला होऊन पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती येते. अगदी अल्प सूचनेवरून युद्ध सुरू करता येईल अशी स्थिती भारताला आणता येईल का?

मदनबाण Wed, 09/21/2016 - 14:28
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे. पाकिस्तानने आपल्याला घाबरले पाहिजे कि आपण पाकिस्तानला ? लष्कराने पाकव्याप्त काश्मिर सरळ काबीज करावे कारण तो आपलाच भाग आहे, मग आपण कशाला मागे-पुढे पहायचे ? पाकिस्ताने कंबरडे चांगले मोडले की चीन सुद्धा १० वेळा विचार करेल ! घी जब सीधी उंगली से ना निकले, तो उंगली तेढी करनी पडती है | पाकिस्तान अतिरेकी पाठवत राहणार आपल्या सैनिकांची मुंडकी छाटणार, त्यांना जाळुन मारणार तरी आपण गप्पच बसायचे ? का ?आत्ता पर्यंत फक्त रशिया आणि फ्रान्स आपल्या बाजुने बोलताना आणि प्रत्यक्ष कॄती करताना लगेच दिसले. चीन काय करेल किंवा दुसरा क्ष देश आपल्या मदत करेल असे विचार कशासाठी ? देश आपला आहे, काश्मिर आपले आहे, पाक व्याप्त काशिमर सुद्धा आपलेच आहे असं असताना सरळ सैन्याला मोकळीक ध्या. युद्ध आपल्यावर लादले जात असेल तर त्याला आपण तोंड दिलेच पाहिजे, इतके मिसाइल्स आपण टेस्ट करतो त्या काय फक्त नावासाठीच आहेत काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

In reply to by मदनबाण

नितिन थत्ते Wed, 09/21/2016 - 23:39
>>जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... ही गुंतवणूक मे २०१४ नंतर झाली आहे का?

अर्धवटराव गुरुवार, 09/22/2016 - 00:08
तो धोंडा भारताच्या पायाला बांधुन भारताला जखडुन ठेवावं, शक्य असल्यास बुडवावं हे ड्रॅगनचं तत्व. अंकल सॅम भारत-चीन संबंधी हेच स्वप्न बघत असणार. भारताने आता पाकिस्तानवरुन लक्ष्य पूर्णपणे काढुन सगळा जोर ड्रॅगन विरुद्ध लावावा. आपली फायनल लढाई, बँकेत आणि झालच तर रणांगणावर, ड्रॅगनशीच होणार आहे. मालकाचा हात पिळला तर तो आपोआप आपलं कुत्रं आवरेल.

पिलीयन रायडर गुरुवार, 09/22/2016 - 07:44
मला इथली चर्चा वाचुन अजुन वाईट वाटायला लागलंय. १८ जण तर गेलेच, पण अजुनही आपण इतके ढिम्म कसे??? ... युद्ध करा असेही म्हणवत नाही पण काही तरी कराच राव आता.. खुपच झालंय... :(

चौकटराजा गुरुवार, 09/22/2016 - 07:56
आजची बातमी वर्मानपत्रात अशी आहे की पर्रीकराना आपल्या सैन्यात काही गफलत झाली असावी अशी शंका आली आहे. आपण हुतात्मा मेणबत्ती यांच्या नादाला लागून वास्तवाचे भान ठेवत नाही. संतापापेक्षा शरमेची भावना अधिक आली पाहिजे. एक एक ने दस दस मारे हे काव्यात लिहिणे ठीक असते. पण तसे होते का ? गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या. मुठभर दहशतवादी एका सैन्याला भारी पडतात वर्षानुवर्षे हे कसे काय..... ? सैनिक हो तुमच्यासाठी .. ही भावना आपली आहेच पण सामरिक हालचालीत आपण काही कमी पडत तर नाही ना याचा गंभीर विचार झाला पाहिजे. कृपया - सैनिकांचे मनोधैर्य खचविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असे तारे कृपया कोणी तोडू नयेत ही नम्र विनंति.

पाटीलभाऊ गुरुवार, 09/22/2016 - 14:27
हा एक लेख वाचनात आला होता. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. http://kiranasis.blogspot.co.za/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

In reply to by पाटीलभाऊ

टवाळ कार्टा गुरुवार, 09/22/2016 - 15:26
येस्स...हाच लेख शोधत होतो...यात जे लिहिले आहे ते वाचून इथे कोणी म्हणणार नाही की चला युद्ध करायला...याच बरोबर हे पण बघा

In reply to by पाटीलभाऊ

John McClain गुरुवार, 09/22/2016 - 16:32
मी 2 दिवसां पूर्वी दिला होते ना हेच आर्टिकल वर ☺... असो, चांगलं लिहिलंय त्याने,पण कोणीतरी त्याची authenticity कन्फर्म करायला हवी... बलुचिस्तान चे photos आणि चीन ची इन्व्हेस्टमेंट.. रशिया बद्दल काही विशेष टिप्पणी नाही आहे. तो पण मोठा प्लेअर आहे

In reply to by पाटीलभाऊ

मार्मिक गोडसे गुरुवार, 09/22/2016 - 18:53
भारत-पाक युद्ध झाले तर चीन अमेरिकेला त्यांच्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रियकरणाची धमकी देऊ शकतो?

गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/22/2016 - 15:45
सर्व चर्चेला आणखी एक अ‍ॅन्करींग पॉईंट देत आहे. हा लेख मी मनोगतवर ११ जुलै २००६ चे मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट झाल्यानंतर लिहिला होता.त्यावेळी मनोगतवर बरीच चर्चाही झाली होती (आपल्यासारखे लोक चर्चा सोडून इतर काय करू शकणार आहेत म्हणा :( ). त्यावेळी मी असे मत मांडले होते की पाकिस्तानशी युध्द हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पुढे १० वर्षे उलटली आहेत.तरीही परिस्थिती फार बदललेली आहे असे वाटत नाही. तेव्हाचा लेख इथे जसाच्या तसा चिकटवत आहे. आजच वर्तमानपत्रात वाचले की मुंबईत अँटॉप हिल मध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले‌. शक्यता आहे की तो अतिरेकी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत घातपात घडविण्यासाठी आला होता आणि तसे जर का असेल तर तो मेला याचे आपल्या देशातील ढोंगी मानवतावादाची झूल पांघरलेले लोक आणि त्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष साथिदार यांना सोडून इतर कोणालाच दुःख वाटू नये. पाकिस्तानकडून भारताला असलेल्या धोक्याचे कटू सत्य मुंबई रेल्वे बाँबस्फोटापासून अधिक तीव्रतेने अधोरेखित झाले आहे.त्याचाच हा एक भाग आहे. या पार्श्वभूमीवर भारतापुढील पर्याय काय असे राहून राहून वाटते. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अशी मागणी केली की भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. इतरही अनेकांचे तेच म्हणणे आहे.पण पाकिस्तानवर हल्ला करून प्रश्न सुटणार आहे का? पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.प्रस्तावित युध्दात पाकिस्तानने जर दिल्ली,मुंबई किंवा इतर कुठेही अणुबाँब टाकला तर आपले लाखो नागरीक मृत्युमुखी पडतील.त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही अणुबाँब पाकिस्तानवर टाकू आणि पाकिस्तानमधील कराची,लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांचे नामोनिशाण मिटवू. पण आपले नुकसान झालेले असेल ते फारच भयानक असेल.अणुयुध्दात कोणीही जिंकणार नाही.आपल्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजतील.कदाचित एका अणुबाँब हल्ल्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला आपल्याला अनेक दशके लागतील.आणि युध्द सुरू झाले तर पाकिस्तान अणुबाँब हल्ला करणार ही गोष्ट तर निश्चित आहे.तेव्हा ती किंमत चुकवणे योग्य आहे का?कारण कोणत्याही युध्दात शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्याबरोबरच आपले नुकसान कमितकमी होईल याची काळजी धुरंधर सेनानी घेत असतात. क्षणभर असे समजून चालू की भारत-पाकिस्तान युध्द हे अणुयुध्द होणार नाही तर ते पारंपारीक शस्त्रांनीच लढले जाईल.२००४ मध्ये अमेरीकेने पाकिस्तानला 'Major non-NATO ally' हा दर्जा दिला आहे.तेव्हा अमेरीका पाकिस्तानला मदत करणार हे उघड आहे.त्याचप्रमाणे चीननेही पाकिस्तानला आजपर्य़ंत भरपूर मदत केली आहे.चीनला महासत्ता बनायचे होते आणि चीनी राज्यकर्त्यांना माहित होते की भारत आपल्याला त्या मार्गात प्रतिस्पर्धी बनायची क्षमता बाळगून असलेला देश आहे.म्हणून चीनने जाणिवपूर्वक पाकिस्तानला बलिष्ठ केले कारण बलिष्ठ पाकिस्तान भारताला कायमच्या कटकटी निर्माण करेल आणि भारताची शक्ती त्याला उत्तर देण्यात खर्ची पडेल, याची चीनला खात्री होती.आणि झालेही तसेच.तेव्हा प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्दात चीन पाकिस्तानला मदत करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया सारखे श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीला धावतील ते वेगळेच.भारताने बांगलादेशाला जगातील जवळपास २/३ पेक्षा जास्त देशांचे वैर पत्करून स्वतंत्र केले.इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यातही महत्वाची भूमिका बजावली. पण आजपर्यंत किती वेळा काश्मिर प्रश्नावर त्या दोन देशांनी भारताचे समर्थन केले? शून्य.आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी इस्लामच्या नावावर सर्व मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी येतील किंवा उघडउघड पाकिस्तानचे समर्थन जरी केले नाही तरी तेलाने समृध्द मुस्लिम देश भारताला तेलपुरवठा बंद करून कोंडित पकडतील याचीच शक्यता जास्त. आता क्षणभर असे समजुया की प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे पूर्णपणे इतर शक्तींच्या हस्तक्षेपाविना लढले जाईल.डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यावर एन.डी.टी.व्ही. वर एक चर्चा झाली होती.त्यात दिलेली माहिती खरी असेल तर भारत आणि पाकिस्तान यामधला 'Strategic superiority ratio' सुमारे १.३ ते १.४ आहे. याचा अर्थ भारताची लष्करी ताकद पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपेक्षा १.३ ते १.४ पटीने अधिक आहे.ही ताकद पाकिस्तानविरूध्दचे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी आहे का?वाटत नाही.ती कमितकमी २.५ ते ३ पटींनी अधिक असती तर कदाचित युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी झाली असती.त्यातून भारताचे सैन्य केवळ पाकिस्तान सीमेवर नाही तर चीनबरोबरच्या सीमेवरदेखील आहे.तेव्हा आपल्याला सर्व सैन्यक्षमता पाकिस्तानविरूध्द एकवटता येणार नाही.त्यातून पाकिस्तानच्या सैन्याला युध्दात जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा सारख्या अतिरेकी संघटनांकडून जी मदत होईल ती वेगळीच.त्या मदतीचा अंतर्भाव 'Strategic superiority ratio' मध्ये केला असेल असे वाटत नाही.तेव्हा शक्यता आहे की पाकिस्तानविरूध्दचे युध्द आपल्याला वाटते तितके सोपे जाणार नाही. आता आपण क्षणभर तिसरी कल्पना करू की आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू!तरीही पुढे काय हा प्रश्न राहतोच.इतिहासाचा धडा आहे की परकिय देशातील (अथवा आपल्याच देशातील एखाद्या भागातील) जनतेला त्यांच्या इच्छेविरूध्द केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दावणीला धरता येत नाही.युध्द जिंकल्यावर काही काळ तरी आपल्या सैन्याला पाकिस्तानमध्ये राहावे लागेलच.आणि पाकिस्तानातील लोक ते कदापि मान्य करणार नाहीत हे तर उघडच आहे. लक्षात घ्या की दुसऱ्या महायुध्दात अजोड धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर रशियन सैन्याने पराभवाच्या खाईतून वर येत जर्मन सैन्यावर विजय मिळवला. रशियन सैन्याचे धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती याविषयी कोणालाही शंका नाही. तरीही त्याच रशियन सैन्याचे अफगाणिस्तानात काय झाले?कारण अफगाण जनतेला रशियन सैन्याचे त्यांच्या देशातील अस्तित्व मान्य नव्हते.१९९१ मध्ये विघटन झाल्यावरही रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या ५ पट मोठा आहे.तर चेचेन्या हा भारतातील दिल्ली शहराइतका क्षेत्रफळाने आहे.चेचेन्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कमी आहे.तरी रशियन सैन्याला एवढया लहानशा प्रदेशातूनही माघार घ्यावीच लागली ना?कारण चेचेन लोकांना रशियाबरोबर राहायचे नव्हते.जगातील सर्वात शक्तीशाली अशा अमेरीकन सैन्याची इराकमध्ये कशी ससेहोलपट होत आहे ते तर अगदी स्पष्ट आहे.कारण इराकी जनतेला अमेरीकन सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य नाही.आपल्या सैन्याचीही तीच गत पाकिस्तानात होणार याविषयी अजिबात शंका नाही कारण पाकिस्तानी जनतेला आपल्या सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य होणार नाही. आणि आपले सैन्य माघारी आल्यावर तरी काय?सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे एक महिन्याहून जास्त काळ चालणे शक्य नाही.पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १५ कोटी आहे. दुसरे महायुध्द ६ वर्षे चालूनही त्यात सुमारे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.तेव्हा एका महिन्याच्या युध्दात आपण पाकिस्तानातील सर्व १५ कोटी लोकांना नक्कीच ठार मारू शकत नाही.अर्थात पाकिस्तानातले सर्व लोक काही दहशतवादी विचारसरणीचे नक्कीच नाहीत. पण युध्द झाले तर पूर्वी शांतताप्रिय असलेल्या पाकिस्तानी लोकांना आपल्या गोटात सामील करणे जिहादी विचारसरणीचे लोकांना अधिक सोपे जाईल. आपले सैन्य माघारी येताच कटकटी मोठया प्रमाणावर वाढतील.एका महिन्याच्या युध्दामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नायनाट होईल असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.आणि त्यातून पाकिस्तान आपला शेजारीच आहे.अमेरीकन सैन्य इराकमधून परत गेल्यावर अमेरीकन लोकांना इराकमधील दहशतवाद्यांचा अंतरामुळे त्रास होणार नाही. आपली परिस्थिती तशी नक्कीच नाही. आणि या सर्व कल्पनाविलासामागे किती गृहितके आहेत हे लक्षात घ्या.पहिले म्हणजे युध्द अणुयुध्द न होता पारंपारीक युध्द होईल.दुसरे म्हणजे अमेरीका,चीन आणि मुस्लिम देश त्या युध्दात हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिसरे म्हणजे आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू.या सर्व गोष्टी होऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला शक्य होणार नाही हे उघडच आहे. तेव्हा मला तरी वाटते की पाकिस्तानविरूध्द आपल्याला एकच गोष्ट करता येईल.आणि ती म्हणजे जशास तसे आणि दुसरे म्हणजे भारतात दहशतवाद्यांचे पाठिराखे आहेत त्यांना दयामाया न दाखवता यमसदनी धाडणे.त्यात शस्त्रास्त्रे पोचवणारे, कटाची आखणी आणि अंमलबजावणी करणारे यासारखे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले लोक यांचा प्रामुख्याने समावेश होईल. आपले काय मत आहे?

बबन ताम्बे गुरुवार, 09/22/2016 - 20:07
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ? त्याचाच गैरफायदा पाकडे घेताहेत असे नाही का वाटत? मुंबई बॉम्बस्फोट, दाउदला आश्रय, संसदेवरचा हल्ला, २६/११ चा मुम्बैवरचा हल्ला, लोकलमधले बॉम्बस्फोट , उघडउघड काश्मीरींना चिथावले, काही भारतीय सैनिकांना विद्रुप करून मारले, पठाणकोट हल्ला आणि आता उरी हल्ला. कीती घटना ? पाकडयांचे धारीष्टय आपलया अशा पडखाऊ धोरणांमुळे वाढलेय असे नाही का दिसत ? (हे होइल, ते होइल, आंतरराष्ट्रिय दबाव, मग नको असे करायला वगैरे ...) . कीती दिवस हे छुपे युद्ध आहे म्हणून आपण हात चोळत बसणार ? मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती. त्यातूनही भारत बाहेर आला. त्यानंतर बाबरी मस्जीद पडल्यानंतरचे दंगे वगैरेनीही प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन वेळा मध्यावधी निवडणूका झाल्या. त्याचा प्रचंड आर्थिक भार भारताने सोसला. तरीही भारत त्यातुन तावून सुलाखून बाहेर पडला. आज आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. मग शिकवला पाकिस्तानला धडा आणि झाले आपले आर्थिक नुकसान - आपण परत एकदा आपली आर्थिक परिस्थीती सुधरवायला सक्षम आहोत असे मला वाटते.

In reply to by बबन ताम्बे

गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 10:17
मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती.
जर अणुयुध्द झाले तर भारताचे होणारे नुकसान आणि १९९१ साली भारताची असलेली परिस्थिती यात जमिन-अस्मानाचा नाही तर पाताळ-स्वर्गाचा फरक असेल.
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ?
मला वाटते की आपण पाकिस्तानला इतके बलिष्ठ होऊ दिले तिथेच चूक झाली आणि यापुढे कुठलीही पावले अतिशय जपून आणि काळजीपूर्वकच उचलावी लागणार आहेत. इस्राएलने इराकच्या अणुभट्ट्या जाऊन उडविल्या तसे करणे आपल्याला शक्य नव्हते आणि त्यामुळे आपण ते केले नाही.मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या "मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन" या आत्मचरित्रात उल्लेख आहे की जे.एन.दिक्षित भारताचे पाकिस्तानातील हायकमिशनर असताना रॉबर्ट ओकली हे अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत होते.दिक्षित आणि ओकली यांच्या बोलण्यातून युध्द झाल्यास पाकिस्तान अणुबॉम्ब हा "लास्ट रिजॉर्ट" म्हणून नाही तर "फर्स्ट वेपन" म्हणून वापरेल असा उल्लेख होता. ही गोष्ट जवळपास २६-२८ वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर पाकड्यांनी नक्कीच अजून प्रगती केली आहे. जर का युध्द झाले तर आपणच पाकड्यांवर पहिल्यांदा दोन-तीन किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकावेत. पाकडे पहिल्यांदा आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण त्यांच्यावर हल्ला करणार याची वाट न बघता पाकड्यांचे कंबरडे आधीच मोडावे आणि त्यांना उठायची संधीच देऊ नये.पाकिस्तान शेजारीच असल्यामुळे किरणोत्सर्जनाचा आपल्याला त्रास होईलच. पण प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा सेकंडरी नुकसान झालेले कधीही परवडले. अर्थात तसे काही करायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया जी काही होईल त्याला तोंड द्यायच्या स्थितीत आपण सध्या नाही-- आपली ताकद तेवढी नाही हे अगदी समोरच दिसत आहे.तेव्हा सद्य परिस्थितीत आपण फार काही करू शकू असे वाटत नाही. आणि तसेही कन्हैय्या कुमार सारख्या हरामखोराचे समर्थन करणारे लोक इथे अगदी मिपावरही आहेत.कन्हैय्या कुमार तर सोडूनच द्या या असल्या अस्तनीतल्या निखार्‍यांनाही आपण काही करू शकत नाही.समजा भारताने पाकड्यांचे पाणी बंद केले (असे केल्यास त्याचे नक्की काय परिणाम होतील याविषयी मला स्वतःला काहीही माहिती नाही तेव्हा याविषयी मतप्रदर्शन करत नाही) तर आपल्याच इथल्या अनेकांना मानवतावादाचे भरते येईल आणि "पाकिस्तानातल्या निरपराध लोकांचे पाणी तोडणे अयोग्य आहे" वगैरे कोल्हेकुई इथलेच बुबुडाविपुमाधवि सुरू करतील. अशांविरूध्दही आपण काहीही करत नाही. तेव्हा युध्द झाल्यास वाटेल त्या त्यागाला तयार आहोत वगैरे भारतीय जनतेने बोलणे ही नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे.त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. खरोखरच त्याग करायची वेळ आली तर बोलणारे बहुसंख्य लोक गलपाटतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 10:57
मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही.
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला. आणि आता भारतासाठी अण्वस्त्रधारी पाक हा पाचर रुतल्यासारखा झाला आहे.

In reply to by बबन ताम्बे

गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 11:50
आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला.
नाही १९९८ मध्ये आपण अणुचाचण्या पहिल्यांदा केल्या म्हणून पाकड्यांनी पण केल्या असे म्हणता येईल.पाकड्यांचे अणुबॉम्ब बनवायचे प्लॅन १९७१ मध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच चालू झाले. १९८७ पर्यंत त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवायची क्षमता आलीही होती असे वाचल्याचे आठवते. काळेकाकांनी मिपावरच याविषयी एक लेखमाला लिहिली होती. तसेही भारताच्या अणुचाचण्या ११ आणि १३ मे १९९८ रोजी झाल्यानंतर १५ दिवसातच पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. याचा अर्थ त्यांची तयारी आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा जर आपल्याकडे काही करण्यासारखे होते तर तो कालावधी १९८७ पूर्वीचा होता.त्यातून वाजपेयींनी "नो फर्स्ट युज" चे आश्वासन देऊन आपण अणुबॉम्ब पहिल्यांदा वापरू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.पाकड्यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.जर आपण पहिल्यांदा वापरणार नसू तर त्या गुळाच्या गणपतींचा उपयोग काय? कारण समजा शत्रूने आपल्यावर पहिला हल्ला केला तर त्याला तोंड देऊन उठायची ताकद राहिली तरच आपण त्याला प्रत्युत्तर देणार ना.ती असेल का हा प्रश्न आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 12:37
स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला आमची इमेज जपायची आहे..... भारत एक जबाबदार राष्ट्र आहे म्हणून. मग काय, आम्ही पहीला अणुबॉम्ब कसा टाकणार. अणुबॉम्ब जाऊ द्या, आम्ही पहील्यांदा आक्रमण देखील करणार नाही. जग काय म्हणेल. आमची माणसे मेली तरी चालतील. पाकडयांनी भारतीयांचा हाच गाढवपणा पुरेपूर ओळखला आहे. ते काही इमेज जपायच्या भानगडीत पडत नाहीत. वर परत अमेरीकेकडून दहशतवाद विरोधी साथीदार असल्याचे सोंग आणून अब्जावधी डॉलरची मदत ओढून आणतात. निवडणूक प्रचारातील वक्तव्ये सोडून देवू या. पण इमेज अशी केली होती की "तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे दुबळेपणा समजू नये" या ठरावीक भारतीय प्रतिक्रीयांपलीकडे जाऊन काही तरी ठोस करतील. पण तसे काही दिसत नाही. कालच पेपर मधे वाचले की सरकारने आता पाकीस्तानला असा इशारा दिला आहे की परत असा हल्ला करा, मग बघू आम्ही तुमच्याकडे. :-(

धर्मराजमुटके गुरुवार, 09/22/2016 - 22:10
इथे अनेकांना अपेक्षित असलेला निर्णय बहुतेक भारत सरकार लवकरच घेईल असे वाटतेय. भारत पाकीस्तानदरम्यान झालेला सिंधू नदीच्या पाण्याचा वापराचा करार बहुतेक भारताकडून मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. ही बातमी

मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 11:42
भारताने सिन्धु करार मोडल्यास चीनबरोबर ब्रम्हपुत्रा करार केला आहे त्यावर परिणाम होणार नाही का? सिन्धु नदीवरची एक झडप बंद केली व केला पाण्याच प्रवाह बंद इतके सोपे आहे का? त्यासाठी पुर्वनियोजन लागते, जसे प्रवाहात धरण बांधणे, कालवे काढणे. ही सगळी तयारी एका दिवसात करणार का? करार केल्यामुळे असे करता येत नाही.

सुबोध खरे Fri, 09/23/2016 - 12:26
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ झे डाँग यांच्या म्हणण्या प्रमाणे अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे. भारताने अणुबॉम्बचा प्रथम वापर करणार नाही असे स्वतःच जाहीरकेले आहे याचा अर्थ काहीच नाही पाकिस्तान आमच्यावर अणुहल्ला करणार हि आमच्याकडे पक्की माहिती होती म्हणून आम्ही त्यांच्या अणुभट्ट्या आणि अणुआस्थापनांवर हल्ला चढवला असे सांगून तुम्ही पाकिस्तानवर अणुहल्ला केलात तर जग तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुमच्या कडे असणारी शास्त्रे आणि अस्त्रे पाकिस्तानचे कंबरडे पहिल्या झट्क्यातच मोडू शकतील अशी स्थिती आहे आणि तसे झाले नाही तरीही दुसऱ्या हल्ल्यात( प्रथम पाकिस्तानने हल्ला केला तरी) तुमची बरीच अणु शस्त्रे सुरक्षित राहून तुम्ही केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान नष्ट होईल इतकी शस्त्रास्त्रे आपल्याकडे आहेत. आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवलेली आणि दक्षिण भारतातून डागू शकणाऱ्या अग्नी ५ आणि अग्नी ६ क्षेपणास्त्रांमुळे तुमचा सज्जड असा दुसऱ्या हल्ल्याचा पर्याय नेहमीच खुला राहतो. फरक एवढाच आहे कि पाकिस्तान हे फ़िदायिन राष्ट्र आहे आणि ते स्वतः समूळ नष्ट झालो तरी चालेल पण भारताची मोठ्या प्रमाणावर हानी करू अशा केवळ सूडाच्या राजकारणाने पेटलेले आहे. पण उद्या जर सर्वकष युद्ध झाले तर आपण पहिला अणुबॉम्ब टाकणारच नाही असे नाही. रशियाशी अनाक्रमणाचा करार करूनही हिटलरने त्यावर हल्ला चढवला होताच. इथे तर भारताने कुणाशीच करार केलेला नाही तर स्वतःच स्वतःवर संयम ठेवला आहे. राहिली गोष्ट सिंधू नदीच्या पाण्याची. ते पाणी आपल्याकडे आपण वळवायला सुरुवात केली आहेच. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच. मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे. एका काश्मीरी पत्रकाराच्या नजरेतून वस्तुस्थिती वाचून पहा. http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/ https://en.wikipedia.org/wiki/Kishanganga_Hydroelectric_Plant

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 17:23
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच.
तो पर्यत नाही ना करार मोडता येणार. करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही, पाकिस्तानप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात कालव्यांचे जाळे विणलेले नाही. उद्या जरी आपण करार मोडायचा ठरवले तर ह्या अतिरिक्त पाण्याने पंजाबात पूर येईल व निसर्गाचीही हानी होईल. हेच चीनही ब्रम्हपुत्रेच्या बाबतीत करू शकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

अमितदादा Fri, 09/23/2016 - 22:32
करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही
भारत ह्या पाण्याचा वापर कृषी, विद्युतनिर्मिती तसेच पाणी साठवण्यासाठी एका मर्यादेमध्ये करू शकतो. खालील दुव्यात तज्ञांची मते वाचा दुवा

In reply to by सुबोध खरे

अमितदादा Fri, 09/23/2016 - 22:29
मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे.
हे खर नाही, भारत पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करू शकतो पण सर्व पाणी अडवणे निव्वळ अश्यक्य आहे. असा कोणता दुवा असेल तर वाचाय आवडेल. हि बातमी पहा, यात तज्ञांनी लिहिलंय कि भारत पाकिस्तान च पूर्ण पाणी आडवू शकत नाही कारण आपल्या काही शहरे पुरमय होतील. उरलेल्या प्रतिसादाशी सहमत.

९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच. फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्‍यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत. हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती. भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते. शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्‍यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्‍यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे ! मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही. केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बबन ताम्बे Mon, 09/26/2016 - 12:56
दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच.
तुमच्या मताशी सहमत. अणूबॉम्ब काही आठवडयात्/महीन्यांत तयार होत नाही .आपण देखील ७४ साली पोखरणपासून सुरवात केली. मला एव्ह्ढेच म्हणायचे होते की १९९९८ नंतर घडलेल्या घटना पहाता पाकीस्तानचे धारीष्टय खूपच वाढले आहे. भारताला जेरीस आणायचे आणि भारताने प्रत्त्युत्तर द्यायची भाषा केली की अणुबॉम्ब टाकायची धमकी दयायची की अमेरिकेसकट सगळे भारताला सबुरीचा सल्ला देतात हे त्यांनी ओळखले आहे.

धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 16:10
भारत फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल करार अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमान मिळणार असून या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
जोक ऑफ द डे ! आता ही विमाने दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फक्त संचलनात उडवायची ना ? एक हतबल नागरिक

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे Sat, 09/24/2016 - 00:35
मुटके साहेब तुम्ही बंगल्यात डॉबरमन कुत्रा का ठेवता? त्याने एकही चोर पकडला नाही तर त्याचा उपयोग झाला नाही असे म्हणाल काय ? लष्करी सामग्रीचे असेच असते. ती वापरावी लागू नये अशीच इच्छा असते. त्याचे प्रतिबंधक मूल्य हे महत्त्वाचे असते. 15 अॉगस्ट 26 जानेवारी ला काही जनतेसाठी उडवत नाहीत. ते शत्रूला तुमची सामरिक तयारी दाखविणे आणि गर्भित धमकी देणे हा हेतू असतो.

In reply to by सुबोध खरे

धर्मराजमुटके Sat, 09/24/2016 - 10:48
वर बातमीत म्हटल्याप्रमाणे ह्या खरेदीमुळे चीन आणि पाकिस्तान वर वचक बसेल असे म्हटले आहे पण अजुनतरी वचक बसताना दिसत नाहिये. तुमचं म्हणणं सगळं खरयं साहेब, पण अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे मनात हतबलता निर्माण होते व त्याचे रुपांतर चिडीत होते आणि मग असा उपहास बाहेर पडतो. खरे तर राग ना लष्करावर आहे ना सरकारवर ( ना यापुर्वीच्या सरकारांवर होता). कधी कधी वाटते की सरकारचे हात आंतरराष्ट्रीय नियमांमुळे बांधलेले आहेत, लष्कराचे हात सरकारने बांधले आहेत. म्हणजे तुर्तास चरफडण्याव्यतीरीक्त उघडपणे काहीच करता येऊ शकत नाही. मग शिवसेना आणि मनसे ला नावे ठेवण्यात काय हशील आहे ? कमीत कमी त्यांना जे करणे शक्य आहे ते म्हणजे पाकीस्तानी कलाकारांना लक्ष्य करणे जे ते नेहमीच करतात. इझी टार्गेट तर इझी टार्गेट. जर हार्ड टार्गेट अचीव्ह नाही होत तर इझी ही सही. असो. प्रतिसाद फारच विस्कळीत आहे पण तो मनातील विमनस्कपणामुळे आहे असे समजुन माफ करा. अवांतर : माझ्याकडे बंगला नाही, डॉबरमन कुत्राही नाही. :) टीप : तुमचा मुद्दा कळलेला आहे पण या मनस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी केलेला क्षीण विनोद समजुन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा.

मदनबाण Fri, 09/23/2016 - 22:24
मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. हवा तेव्हढा वेळ घ्या... पण या पिसाळलेल्या कुत्र्याला कायमचा ठार करा ! आता संयम ठेवणे कठीण झाले आहे. अजुन किती स्त्रिया विधवा होतील ? अजुन किती मुलं आपले वडिल गमावतील ? अजुन किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना गमवावे ? बस्स झाले आता, सहन करण्यापलिकडे झाले आहे... आपल्या देशाचे रक्त पिणारा हा देश जगाच्या नकाशावरुनच नष्ट व्हावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.”Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Rifles

धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 22:59
च्यामारी, युद्ध करायचे तर भारताचेच नुकसान होणार, जागतिक स्तरावर नालस्ती होणार, इतर देश भारताशी संबंध तोडणार, सिंधू नदीचा करार तोडायचे तरी भारतातच पुर येणार, शहरे बुडणार , चीन नाराज होणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर पाकीस्तान अजुनच आक्रमक हल्ले करणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर चीन भारताला मिळणारे सतलज आणि ब्रह्मपुत्रा चे पाणी तोडू शकतो. काय चाललेय हे ? एकही शक्यता भारताच्या आवाक्यातली नाहीये ? म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय आयुष्यभर पर्याय नाही तर ??

In reply to by धर्मराजमुटके

अमितदादा Fri, 09/23/2016 - 23:33
अस नहिये. भारत सुधा बर्याच प्रमाणात गुप्त कारवाया पाकिस्तान मध्ये करत असतो. बलुचिस्तान आणि कराची मधील असंतोषास भारतास जबाबदार मानल जात. RAW आणि NDS यांची युती आहे असे बोलल जात, अफगानिस्तान मध्ये भारताची १ embassy आणि ४ consulate आहेत, हे कशासाठी असावेत याचा अंदाज आपण बाळगू शकता. मध्यंतरी UPA सरकारच्या काळात भारतीय सैनिकाच मुंडक कापून विटंबना करण्यात आलेली त्याची मोठी चर्चा झालेली, परंतु नंतर भारतीय लष्कराने त्याचा बदला घेतला होता ज्याची चर्चा झाली नवती. (त्यावेळचे लष्कर प्रमुख बिक्रम सिंघ याचं statement गूगल करावे). तसेच काश्मीर मध्ये खूप वर्षापूर्वी शिखांच हत्याकांड केल होत त्याचाही भारताने बदला घेतला होता (याची लिंक आता सापडत नाही). अश्या अनेक घटनांचे बदले घेतले गेलेत तरीही पाकिस्तानची शेपटी वाकडी आहे. तसेच पाकिस्तानच्या ISI ने नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात मोठ network उभारलं होत ते भारतान मोढून काडलं. (नेपाल राजकारणी आणि ISI agent मिर्झा बेग बद्दल वाचा). भारताने पाकिस्तान ला अंतराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी isolate केल आहे, याचा direct नसला तरी indirect भरपूर परिणाम होतो. काश्मीर प्रश्नावरून भारत मध्यंतरी backfoot गेलेला मात्र आता पाकिस्तान कोंडीत सापडलेला दिसतो. सिंधू नदीचे पाणी पिकांच्या season कमी जास्त करून भारत पाकिस्तान च्या अर्थव्यवस्थेच मोठ नुकसान करू शकतो. एवड करून सुद्धा पाकिस्तान ला अक्कल येत नाही कारण आपल कितीही नुकसान झाल तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे अशी त्यांची strategy आहे\ आपली तशी धोरणे नाहीत कारण आपल्याला आपले उज्ज्वल भविष्य महत्वाचे आहे. आणि काश्मीर हि भारताची दुखरी नस असल्याने भारतास खूप काही direct करता येत नाही. असो भविष्यात परस्थिती बदलेल, येणारी तसेच सध्याचे सरकार योग्य धोरण राबवतील अशी आशा करू कारण भारतीय आता अश्या हल्याना कंटाळलेत हे सरकार ला कळले आहे.

In reply to by अमितदादा

अमितदादा Sat, 09/24/2016 - 00:16
वरील प्रतिक्रियेस support करणारे काही दुवे १. Both active and effective: A short history of Indian Special Ops हि बातमी मस्त आहे. कप्तान सौरभ कालिया यांच्या मृत्यूचा सुधा बदला घेतला होता. २.Army takes revenge, kills top Pakistani ultra on LoC ३. Dawood's Man In Nepal हि बातमी जुनी आहे नंतर तो मारला गेला.

थॉर माणूस Fri, 09/23/2016 - 23:53
यात सगळ्यात जास्त वात आणलाय न्यूज चॅनल्सनी. उन्मादी वातावरण तयार करायची सुपारी घेतल्यासारखे वागतायत हे लोक. गेल्या 3-4 दिवसातल्या काही बातम्या तर खोट्या आहेत की काय अशी शंका येण्यासारख्या होत्या.

In reply to by संदीप डांगे

थॉर माणूस Sat, 09/24/2016 - 01:01
अगदी खरं आहे... ते times now वगैरे पाहिल्यावर तर आत्ता पंतप्रधान इस्लामाबाद वर तिरंगा फडकवणार किंवा पाकिस्तान आपल्यावरच अणूबाॅब टाकणार असं वाटतं. :)

सचु कुळकर्णी Sat, 09/24/2016 - 20:16
aadatan tum ne kar diye waade aadatan ham ne aitbaar kiyaa बुंद से गयी वो हौद से नहि आती....जोशपूर्ण भाषण निवडणुकीपर्यंत ठीक असतात. एक सामान्य भारतीय नागरीक म्हणुन मला पहिले बदला हवाय..बकर करने के लीये ३ साल और है.

गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/29/2016 - 12:55
काही वेळापूर्वी आपल्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक्स' केले आहेत असे जाहिर केले आहे.http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/ या हरामखोर पाकड्यांविरूध्द अशी कडक कारवाई करून ते शेवटपर्यंत निभावायची तयारी आपण दाखवलीच पाहिजे. मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे त्यामागे ही तयारी नक्कीच असेल असा विश्वास मोदी आणि अजित डोवालविषयी नक्कीच आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मदनबाण गुरुवार, 09/29/2016 - 13:48
आपल्या सैन्य दलाचे आणि सरकारचे अभिनंदन ! पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी ! भारत माता की जय ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

In reply to by मोदक

नाखु गुरुवार, 09/29/2016 - 16:29
अर्थात पण ही गेम सुमडीतच करावी असे माझे मत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 15:15
सैन्यदलाचे अन सरकारचे हार्दीक अभिनंदन.
पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी !
अगदी अगदी.

rahul ghate Sun, 09/18/2016 - 14:03
झालेला हल्ला अतिशय दुर्दैवी असून , हे प्रकार वाढत आहेत . असे किती जवान शाहिद करायचे व कडी निंदा करून गप्प बसायचा ह्याचा आता सरकार ने विचार करावा . राहुल

तेजस आठवले Sun, 09/18/2016 - 15:19
अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना. ही घटना दुर्दैवी आहे हे खरेच आहे. पण मला असे वाटते की अशा घटनांवरचे धागे काढू नयेत(हे माझे वैयक्तिक मत आहे). होतं काय की एक तर ह्या धाग्यांवर आपण श्रद्धांजली वाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. मुख्य मुद्दा म्हणजे काही डूआयडींना गरळ ओकायला हाच धागा मिळेल आणि इतक्या संवेदनशील विषयावर अतिशय दुर्दैवी आणि संताप येणाऱ्या प्रतिक्रिया येतील. शेळी जाते जीवानिशी अन खाणारा म्हणतो वातड अशी एक म्हण आहे. आपल्या सर्वांसाठी जे लोक आयुष्य पणाला लावून आपले रक्षण करतात त्यांच्या प्रति आदरांजली आणि जिव्हाळा राहिला दूरच पण कुठल्याही संवेदनशील माणसाला संताप येईल अश्या प्रतिक्रिया इथे येऊ शकतात. काही धाग्यांवर असे झालेले आपण बघतोच. बऱ्याच संवेदनशील विषयांवर मिपा वर ह्यापूर्वी मेगाबायटी चर्चा झालेल्या आहेत.साधक बाधक विचार, परस्परविरोधी, अगदी टोकाचे वाटणारे विचार मांडले गेले आहेत.त्यामुळे काही मजकुराचे संपादन आणि काही आयडींवर बंदी असेही झाले आहे. पण माझ्या मते हे सगळे एका अदृश्य मर्यादेत चालत होते. सध्या मात्र काही डुआयडीनी ठरवून कहर केला आहे. काहीच्या काही प्रतिक्रिया द्याव्यात आणि लोकांनी चिडून जाऊन त्यांना उत्तर द्यावे ह्यासाठी ते आपल्याला भाग पडत आहेत. असो. फारच अवांतर झाले. पण ह्या दुर्दैवी घटनेला आपल्या मिपा कडून गालबोट लागू नये म्हणून हे लिहावे असे वाटले.मिपाचे सदस्य नसलेले पण मिपा वाचणारे असे हजारो, कदाचित लाखो लोक असतील. त्यांना डुआयडी आणि इतर गोष्टी माहित नसणार, पण ह्या डुआयडींच्या आणि त्याला उत्तर म्हणून आलेल्या प्रतिक्रिया वाचून एकूणच मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 15:53
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली ! :(

नितिन थत्ते Sun, 09/18/2016 - 19:55
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध. सरकार या बाबतीत योग्य असेल तो निर्णय घेईलच. जो योग्य त्या माहितीवर आणि सर्व प्रो आणि कॉन यांच्यावर आधारित असेल.

प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 20:29
इथे श्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला फक्त सज्जड दम देऊन थांबायला नको असे वाटते, निवडणूक प्रचारा दरम्यान 'एक सर के बदले हम दुष्मन के दस सर लेके आयेंगे' हे श्री नरेंद्र मोदी यांनी बोललेले वाक्य आता खरे करुन दाखवायची वेळ आली आहे. या आधी देशात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यावर कडी से कडी निंदा तर कॉंग्रेस सरकार देखिल करत होती, मात्र अशी निंदा न करता काहीतरी ठोस कारवाई करुन आपण कॉंग्रेस पेक्षा वेगळे आहोत हे तमाम भारतीय जनतेला दाखवून द्यायची चांगली संधी त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी सोडू नये असे वाटते.

मनिमौ Sun, 09/18/2016 - 21:30
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या विचार सोडुन हातात शस्त्र धारण करायची वेळ आली आहे सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 07:40
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे? दासबोध.कॉम यांनी सुरु केलेल्या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद इथंही उद्धृत करणे गरजेचे वाटत आहे. --- सध्या भारत पाकिस्तान मध्ये एकतर्फी व्यापार करार आहे. म्हणजे आपण Most Favored Nation या तहा प्रमाणे पाकिस्तान ला तेथून येणाऱ्या मालावर जकात सवलती देतो .पण जगात बाकी देश एकमेकांना तीच सवलत देण्याचे बंधन पाळतात तसे पाकिस्तान करत नाही.पाकिस्तान ही सवलत भारतातून पाठवल्या जाणाऱ्या मालावर देत नाही. सबंध इतके बिघडल्या नन्तर तरी हे पाकिस्तान धार्जिणे एकतर्फी धोरण बंद करायला हवे. भारताने पाकिस्तानला MFN सवलत १९९६ साली दिली .पाकिस्तानने अजून तरी तसे केलेले नाही.महात्मा गांधी यांनी शत्रूने एका गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असे म्हटले होते. ते धोरण आजही पुढे चालवले जात आहे असे वाटते .

साहना Mon, 09/19/2016 - 07:57
आपले नाक कापून पाकिस्तानला अवलक्षण करून काय फायदा ? पाकिस्तान ने भारताला MFN दर्जा नाही दिला ह्यांत पाकिस्तानचेच जास्त नुकसान आहे. पाकिस्तानी आर्मीला चीन आणि अमेरिका कडून भरपूर पैसे मिळतात. त्यांना विशेष फरक पडत नाही.

In reply to by साहना

रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 09:56
कसे काय ? पाकिस्तान भारतातून आयात होणाऱ्या मालावर जकात शुल्क आकारतो . पण आपण पाकिस्तान मधून आयात होणाऱ्या मालावर जकातीच्या सवलती देतो. त्या सवलती आपण बंद करण्याने भारताचे नाक कसे कापले जाईल हे जरा समजावून सांगा. http://www.thehindu.com/news/international/south-asia/pakistan-in-no-mood-to-grant-mfn-status-to-india-yet/article7903550.ece

In reply to by रमेश आठवले

साहना Tue, 09/20/2016 - 01:26
इकोन १०१: Import duties hurt importing population भारतीय जनतेला पाकिस्तान माल स्वस्तांत मिळतो आहे आहे पण पाकिस्तानी जनतेला भारतीय माल महागात पडतो ह्यांत आमचा फायदा आणि पाकिस्तानी जनतेचे नुकसान आहे.

In reply to by साहना

रमेश आठवले Tue, 09/20/2016 - 01:59
समजले नाही पाकिस्तान भारताकडून १५० च्या आसपास वस्तु आयात करतो आणि त्या पाकिस्तानच्या नागरिकांना मुद्दाम जास्त किमतीने विकतो असे आपणाला म्हणायचे आहे काय ? बहुतेक देशात हा दर्जा एकमेकांना दिला जातो

In reply to by नावातकायआहे

सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 09:40
आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते तसे आम्ही प्रति हल्ला शत्रूला पाहिजे तसा नव्हे तर आम्हाला पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तसा करण्याचा पर्याय खुला ठेवतो. आणि ते त्यांनी करून दाखविले. . सवंग लोकप्रियतेच्या मागे जाण्याऐवजी थंड डोक्याने सर्व गणिते करून प्रतिहल्ला केला जाईल. श्री नरेंद्र मोदी यांच्या कडून अशी अपेक्षा आहे. जनतेला हिंदी चित्रपटासारखे "अगर तुमने अपनी मां का दूध पिया है तो सामने आओ" सारखे खटकेबाज संवाद पसंत असतात. त्याला बळी न पडल्यास "तुमचे मोदी' काय करत आहेत. डॉ मनमोहनपेक्षा वेगळे काय केले म्हणून येथेही प्रतिसाद येतीलच. असो

In reply to by सुबोध खरे

फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 10:19
बाकी सगळे बरोबर आहे, फक्त असल्या बातमीवर राजकीय धुळवड मोदी मनमोहन वगैरे आणायचे पाप करून काय साधले तुम्ही? जर 'अपनी माँ का दूध" वगैरे फिल्मी संवाद आहेत तर "एका मुंडक्याच्या बदली 10 मुंडकी" हा फिल्मी संवाद नसेल का? त्या संदर्भात जर मोदींना प्रश्न विचारले गेले किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले तर तुम्हाला खुपण्याचे काहीही कारण नाही

In reply to by सुबोध खरे

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 11:49
आणि सर्वंकष युद्ध आर्थिक दृष्ट्या दोघांनाही परवडणारं नाही. जी काही कृती होईल ती ही गणितं डोळ्यांसमोर ठेवून होईल. पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित Mon, 09/19/2016 - 12:07
म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील निवडणुकीवर डोळा ठेवूनच निर्णय होईल ?? जग जिंकायला निघालेल्या अलेक्सझांडर सारखा शेवट मोदींचा होईल यात शंका वाटत नाही.

In reply to by विशुमित

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 14:55
रच्याकने ' फक्त ' उत्तर प्रदेशातील निवडणुकींवर डोळा ठेवून निर्णय होईल असं कुठे म्हटलंय ते दाखवा. स्वतःला वाटेल तो अर्थ काढायला तुम्ही स्वतंत्र आहात पण दुसरेही तसंच म्हणताहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करु नका.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित Mon, 09/19/2016 - 15:05
तुम्हीच म्हणताय, "पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत" म्हणजे निवडणूक नसती तर नेहमी सारखीच गुळमुळीत प्रतिक्रिया दिली असती, असाच अर्थ लागतो ना.

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 12:53
कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.
देजा वू? २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही दोन महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत्या आणि त्यावेळी केंद्रात वाजपेयींचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात भाजपचे राजनाथ सिंगांचे.तेव्हा सीमेवर अगदी "आयबॉल टू आयबॉल" परिस्थितीत सैन्य नेलेही होते.पण त्यातून पुढे युध्द वगैरे काहीच झाले नाही. मे २००२ कालच्या उरी हल्ल्याप्रमाणे जम्मूजवळ कालूचक येथे सैनिक छावणीवर हल्ला झाला होता. त्यानंतर वाजपेयी कुपवाडाला गेले होते आणि "मेरा यहा आना अपने आप मै एक प्रतिक है. इसे हमारा पडोसी समजे ना समजे दुनियावाले समजे ना समजे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" असेही बोलले होते.पण पुढे काहीच झाले नाही. अर्थातच धसमुसळेपणाने वाजपेयींनी हल्ला केला नाही हे चांगलेच झाले.आजही परिस्थिती फार वेगळी आहे असे अजिबात् नाही. आणि आताही मोदी काही वेगळा निर्णय घेतील असे वाटतही नाही. सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.याविषयी माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे "उंदीर मारायच्या विभागात नोकरीला असून...." यापेक्षा काही वेगळे नाही. तरीही एक गोष्ट नक्कीच लिहितो की जो काही निर्णय होईल त्यात उत्तर प्रदेशातील निवडणुका हा घटक नसावा/नसेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विशुमित Mon, 09/19/2016 - 13:02
सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.>>>>>>>>>> फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे? असे व्यक्ती प्रेम किती दिवस बाळगणार आहोत आपण?

In reply to by विशुमित

गंम्बा Mon, 09/19/2016 - 15:05
फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे?
डोवाल नक्कीच थोर असणार, पण लष्करी छावणी वर हातबाँम्ब टाकता येतील इतक्या जवळ अतिरेकी येत असतील म्हणजे अश्या छावण्यांच्या सुरक्षीतते साठी पेट्रोलिंग वगैरे नसते का? बाप्पु कींवा डॉक्टर खरे सांगु शकतील पण विचित्र वाटले इतके नक्की. भारतीय सैन्य खुप अंडरस्टाफ्फ्ड आहे किंवा प्रचंड स्ट्रेचड आहे असा ही अर्थ निघतो.

In reply to by गंम्बा

सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 20:31
लष्करात एक म्हण नेहमी सांगितली जाते. "जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैन्याला कोणतीही तटबंदी अभेद्य नसते." जेंव्हा एक दहशतवादी तटबंदी भेदून आत शिरतो तेंव्हा त्याच्या अगोदरचे शंभर दहशतवादी मारले गेलेले असतात/ किंवा त्यांची घुसखोरी नाकाम झालेली असते. हि वस्तुस्थिती जगाच्या समोर मांडण्याची गरज नसते. दुर्दैवाने दहशतवादयांचे धर्मयोद्धा म्हणून मानसिक ध्रुवीकरण झालेले आहे आणि ते अशा मरणाला भीत नाहीत तेंव्हा "निर्भय" माणूस हा जास्त धोकादायक असतो. उडी हे गाव एखाद्या सुळक्यासारखे पाकिस्तानच्या सरहद्दीच्या घुसलेले आहे त्यामुळे तेथील लष्करी तळ हा तीन बाजूनी पाकिस्तानी भूमीने घेरलेला आहे. एका बाजूला तर ते अंतर केवळ ६ किमी इतके कमी आहे. पूर्णपणे सशस्त्र असे दहशतवादी जेंव्हा आत घुसतात तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचा जोरदार गोळीबार चालू होतो. आपले सैनिक त्यांना प्रत्युत्तर देतात. या धुमश्चक्रीत काही लोक आत घुसतात आणि काही मारले जातात. मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंगावर पेलेटने पाकिस्तानी भडीमार करतात आणि हि प्रेते तुमच्या हद्दीत "लष्कराने कृत्रिम चकमकीत मारलेले नागरिक" म्हणून उभे केले जातात याला अर्थात काश्मीर मधील फुटीरांची फूस असतेच. जगाची पाहण्याची दृष्टी अशीच आहे कि हा एक दहशतवादी तरी आत घुसलाच कसा? काश्मीर मध्ये दर शंभर मीटर वर एक सैनिक उभा आहे तर हे दहशतवादी घुसतातच कसे? ( पाकिस्तान बरोबर आपली सीमा २९०० किमी आहे. तेही नुसती गस्त घालण्यासाठी ८ तासाला एक आणि एक सुटी साठी असे ४ सैनिक प्रत्येक १०० मीटर साठी उभे केले तर १लाख १६ हजार सैनिक "फक्त" गस्त घालण्यासाठी उभे ठेवावे लागतील हा विचार केलेलाच नाही) आम्ही कर भरतो त्यावरच लष्कराचे पोट भरते मग असा हलगर्जी पणा कसा होतो. अशा तर्हेचे प्रश्न मिपावरच विचारले गेले आहेत. यातील बरेच प्रश्न हे शुद्ध अज्ञानापोटी विचारले गेले आहेत आणि काही आकसापोटी. म्हणून त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचा मी प्रयत्न केला नाही कि करतही नाही. इथे मूळ मुद्दा दहशतवादी हा नसून त्याला मिळणारी पाकिस्तानी लष्कराची छुपी मदत हा मुद्दा आहे. ती मदत नसती तर १००० पैकी एखादा दहशतवादी आत घुसला असता. सिमी किंवा आय एस आय एस सारख्या संघटनांचे "निद्रिस्त सेल" भारतातील शहरातही आहेत. तेंव्हा केवळ तटबंदी नव्हे तर सगळा देश सुरक्षित करणे आवश्यक आहे. पण आपली जनता फुकट मिळणार्या वीज आणि पाण्यासाठी मत देते किंवा जातीच्या नावावर मत देते किंवा याकूब मेमन सारख्या देशद्रोहाच्या गुन्हेगाराला हुतात्मा म्हणते. स्वतःचे पाच पैसे वाचावेत किंवा स्वतःच्या आरामात कोणताही फरक होऊ नये म्हणून काहीही करायला तयार असते.आपली जनता १००० रुपये दिले तर दाऊद इब्राहिम ला मते द्यायला तयार होईल हे मला खेदाने म्हणावेसे वाटते. छप्पन लप्पन करून कर चुकवण्याला "हुशारी" मानते अशा जनतेने हे समजून घेणे आवश्यक आहे कि युद्ध हे शस्त्राने किंवा लष्करी सामर्थ्याने जिंकता येत नाही तर त्या लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या जनतेच्या अतुलनीय धैर्याने जिंकता येते. मी माझे कर्तव्य करतो आहे का? शेजारचा माणूस एकही तरी संशयास्पद गोष्टी करतो आहे ते पोलिसांना कळवायच्या ऐवजी कोण त्या लफड्यात पडणार म्हणत असाल तर लष्कराला हे दहशतवादी आत घुसलेच कसे हे विचारण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला आहे हे समजून घ्या. दोन वेळेस ध्वजाला सलाम केला आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जय हिंद म्हणले कि आपली देशभक्ती जाहीर झाली असे चालणार नाही. असो बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सही रे सई Tue, 09/20/2016 - 02:53
किती संयमीत शब्दात एकेकाला हाणलत हो तुम्ही. अश्या अभ्यासपुर्ण तरीही प्रत्येकाची जागा दाखवून देणार्‍या तुमच्या या लिखाणाची पंखा झाले आहे. मुजरा घ्यावा महाराजा.

In reply to by सुबोध खरे

गंम्बा Tue, 09/20/2016 - 10:02
डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद मला उद्देशुन असला तर पूर्णपणे हुकला आहे. मीच लिहीले होते की असे हल्ले होऊ शकतात ह्याचा एक अर्थ असा निघतो की भारतीय सैन्य अंडरस्टाफ्फ् आहे. आणि जे आहे ते सुद्धा स्ट्रेच्ड आहे म्हणजे त्यांच्या कपॅसिटी पेक्षा जास्त जबाबदारी निभावायला लागते आहे. त्या बद्दल तुमचे मत विचारले तर तुम्ही मला देशभक्ती आणि नैतिकता शिकवायला लागलात. सैन्याचा पगार सरकारी नागरी नोकरापेक्षा कमीतकमी दीडपट असावा असे माझे मत आहे. तुम्ही म्हणता तसे लाखो सैनिक गस्त घालायला लागत असतील तर तसे ते असायला पाहिजेत. त्याचा खर्च बाकीच्या नागरीकांनी केलाच पाहिजे. त्याही पुढे जाउन असे म्हणीन की , भारतीय सैन्याला जर दिल्लीतले सरकार पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा आणि मनुष्यबळ देत नसेल तर सैन्यानी काश्मीर मधे काम करणे बंद करावे. काश्मीर कशाला सर्वत्र.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 13:24
ममो पंप्र होते तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता म्हणता? का "एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" म्हणले गेले तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता?

In reply to by फेदरवेट साहेब

प्रसाद_१९८२ Mon, 09/19/2016 - 14:00
"एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" हा प्रधान सेवकांचा चुनावी 'जुमला' होता जसे १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतील तसाच हा एक, त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. आणि निवडणुकीत दरम्यान दिलेल्या प्रत्येक घोषणा खर्‍या(च) असतात व त्या राजकारण्याकडून पूर्ण केल्याच जातील हि अपेक्षा ठेवली तर या देशातून गरिबी तर १९७१ सालीच हटायला हवी होती.

In reply to by प्रसाद_१९८२

कलंत्री Mon, 09/19/2016 - 14:20
वो दुध मांगेंगे खीर देंगे, काश्मिर मांगेंगे तो चीर देंगे. अशा घोषनानी नकळतच सर्वांचे डोके भडकावले जातात. पंतप्रधान, सेन्याधिकारी आणि सबळ पक्ष असताना सर्वसामान्य लोकांनी सीमा पार करा, फडशा पाडा असे विचार करणे गैर आहे.

In reply to by सुबोध खरे

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 15:08
हल्ला झाला तर आपलं कसं अन कायं काय नुस्कान होइल अन युद्धखोरीविरोधी प्रवचन वगैरे करण्यात बिजी आहेत.

कलंत्री Mon, 09/19/2016 - 13:54
भारत आणि पुरस्कृत हल्ले यात देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मागे पडतात. चिथावणीखोर विचाराने काहीच साध्य होत नाही. भारत आणि पाकिस्तान यात चांगले संबंध निर्माण व्हायला हवेत.

संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 13:58
जवानांना श्रद्धांजली! नेहमी हेच लिहीत राहण्याची वेळ येते याबद्दल अतीव संताप आणि चीड आहे, त्यापेक्षा जास्त व्यक्तिगत तऱ्हेने मला काहीच करता येत नाही याचीही खंत आहे, राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे, धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 14:19
राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
राजकीय चिखलफेकीसाठी वेगळा धागा असावा याला सहमती आहे. पण संभाव्य टिकेच्या भितीने मोदी समर्थक व्यथित झाले असतील तर त्याला फाट्यावर मारायला हवे.कुठेतरी लॅप्स असल्याशिवाय अशी घटना घडायची नाही आणि चूक असेल तर टिकाही जरूर व्हावी.हा हल्ला आपल्या सैनिकांवर म्हणजे आपल्या देशावर झालेला आहे.तेव्हा या हल्ल्याविषयी खुलासा मागायचा अधिकार प्रत्येक भारतीयाचा आहे--मग तो/ती मोदी समर्थक असो की नसो.अर्थात यालाही अपवाद आहेतच.ज्यांनी ज्यांनी "भारत देशाचे तुकडे तुकडे व्हावेत--इन्शाल्ला" असल्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन केले होते किंवा त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गोंडस रूप दिले होते त्यांना भारताचे सैनिक मारले गेले याचा आनंदच होईल. तेव्हा असल्या लोकांनी कुठलेही खुलासे मागितले तर ते ढोंग असेल. असे लोक सोडून इतर सर्वांना सरकारकडे खुलासा (नव्हे जाब) मागायचा अधिकार आहे याविषयी शंका नसावी.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 14:58
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत
कुठे दिसले तुम्हाला हे व्यथित समर्थक? मिपावर?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 15:04
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
इतरांचं माहित नाही, निदान मी तरी टीकेच्या भितीने व्यथित झालेलो नसून माझ्या देशातील २० सैनिकांच्या मॄत्युने व माझ्या देशाच्या हतबलतेने व्यथित झालो आहे. कोणालाही चाहूल लागून न देता सीमा पार करून मोजकेच हल्लेखोर येतात व आपल्या संख्येच्या पाचपट सैनिकांना मारतात व माझा देश अशा सतत होणार्‍या हल्ल्यांविरूद्ध काहीही करू शकत नाही या निराशेतून व संतापातून मी व्यथित झालो आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 15:28
या सैनिकांच्या शहीद होण्याबद्दल दु:ख होणं स्वाभाविक आहे पण देश हतबल झालाय असं समजणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अशा एका हल्ल्याने डगमगणारा देश अशी ओळख आपल्या देशाची नाहीये आणि होऊही नये. गुप्तचर यंत्रणा असे अनेक हल्ले परतवून लावत असतात,सैनिकही अशा अनेक हल्ल्यांना तोंड देत असतात. एक फिदायीन हल्ला यशस्वी होणं हे सिस्टिमचं अपयश मानणं मला पटत नाही. आपण त्या परिस्थितीला कधीही तोंड दिलेलं नसल्यामुळे कुणाचं चुकलं आणि काय हे आपण ठरवू शकत नाही कारण कशा परिस्थितीत लोक आपलं काम करत आहेत हे आपल्याला माहित नाही. शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होणं ही एक गोष्ट झाली, पण त्यामुळे व्यथित होणं म्हणजे एकप्रकारे शत्रूचा हेतू साध्य व्हायला मदत करणंच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 14:40
कोठेतरी, काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकत आहे. हा हल्ला सरकारचं व सैन्याचं नक्कीच अपयश आहे. उरी सीमेपासून २० किमी आत आहे असं वाचनात येतंय. सीमेपासून इतक्या आत सशस्त्र हल्लेखोर निर्धास्त येऊ शकतात व फक्त ४ जण २० सैनिकांना मारू शकतात ही अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे. सैन्य बेसावध होते, गुत्पचर यंत्रणा बेसावध होत्या व दिल्लीतील राज्यकर्तेसुद्धा बेसावध होते हे कटु सत्य मान्य करायला हवे. पाकिस्तानच्या बाबतीत आजवर अवलंबलेली सर्व धोरणे संपूर्ण अपयशी ठरली आहेत. मैत्रीचा हात, शांततेची चर्चा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, सीमेवरील मेणबत्त्या, पाकिस्तानी कलाकारांना देशात पायघड्या, पाकिस्तानला ट्रेन व बसने जोडणे, मोदींची सरप्राईझ व्हिसिट, वाजपेयींचा बसने प्रवास, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, २००२ व २००३ मध्ये भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध, एकमेकांना आंबे व साड्यांची भेट, पाकिस्तानच्या तथाकथित बुद्धिजिवी विचारवंताबरोबरचा तथाकथित भारतीय बुद्धिजिवी विचारवंतांचा संवाद, भारताचे तथाकथित कठोर इशारे . . . काहीही केले तरी पाकिस्तानचे हल्ले थांबत नाहीत व त्यामुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी थांबत नाही. पा़किस्तान हा भारताचा शत्रू असून भारत नष्ट करणे हेच या देशाचे ध्येय आहे हे अजूनही भारत मान्य करायला तयार नाही. भारताने झोपेचे सोंग घेतले आहे व ते अत्यंत घातक आहे. ही सर्व परिस्थिती अत्यंत निराशाजनक व अत्यंत संतापजनक आहे. कालच्या हल्ल्यानंतर लगेच, "भारताने घाईघाईत कारवाईचा निर्णय घेऊ नये, युद्ध झाले तर ते दोन्ही देशांना परवडणार नाही, पाकिस्तान अण्वस्त्रे वापरू शकतो, हल्ला झाला तरी शांतता चर्चा सुरू रहायलाच हवी" अशा प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीच आहे. आजवर जे जे केले ते व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे आता जुनेच मार्ग पुन्हा एकदा नव्याने चोखाळून काहीही साध्य होणार नाही. सद्यपरिस्थितीत लष्करी कारवाई हा एकमेव उपाय शिल्लक आहे असं दिसतंय. हा उपाय कसा करायचा हे लष्करालाच ठरवावे लागेल. हा उपाय कितीही कटु व महागडा वाटत असला तरी हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी दुसरा कोणताही उपाय शिल्लक नाही. भारत आजपर्यंत हा उपाय टाळत आलेला आहे. परंतु हा अंतिम उपाय वापरायचा नसेल तर जैसे थे परिस्थिती सुरू राहील. पाकिस्तानी दहशतवादी, हल्लेखोर हल्ले करतच राहतील, आपण निषेध करतच राहू, चर्चा वगैरे मार्गाने प्रश्न सुटतील या भ्रमातच राहू.

शाम भागवत Mon, 09/19/2016 - 19:30
आपल्या Deep Asset ची काही पंप्रच्या कारकिर्दीत (मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंग व गुजराल) पुरती वाट लावून टाकली होती. मला वाटते की त्या बाबत खूप काही प्रगती साधली गेली असावी व आता लवकरच त्याचा उपयोग सुरू होईल.

श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 21:08
पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहे. १) पाकिस्तानी लष्कर - सातत्याने सीमेवर गोळीबार, भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांवर हल्ले, दहशतवादी संघटनांना व आत्मघातकी हल्लेखोरांना शस्त्रे, प्रशिक्षण व इतर सर्व प्रकारची मदत देणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया सुरू ठेवते. २) लष्करे तोयबा, जैशे महंमद सारख्या दहशतवादी संघटना - या संघटना धार्मिक ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी तयार करतात, प्रशिक्षण देतात, आत्मघातकी हल्ल्याचे नियोजन करून प्रत्यक्ष हल्ले घडवून आणतात, भारतात दहशतवादी घुसवून बॉम्फस्फोट, गोळीबार इ. मार्गाने दहशत निर्माण करतात. ३) पाकिस्तानी राज्यकर्ते - भारताबरोबर चर्चेचे नाटक करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरूद्ध मोहीम चालविणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शस्त्रे विकत घेऊन ती भारताविरूद्ध वापरणे, अण्वस्त्रे कार्यक्रम, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, भारतविरोधी कारवाया करणार्‍या भारतीय व पाकिस्तानी दहशतवाद्यांना राजकीय, आर्थिक इ. सर्व प्रकारचा पाठिंबा देणे इ. मार्गाने पाकिस्तानी राज्यकर्ते भारतविरोधी मोहीम सुरू ठेवतात. ४) तथाकथित पाकिस्तानी बुद्धिवंत, कलाकार - यांचे काम म्हणजे भारतातील पाकिस्तानविरोधाची धार बोथट करणे. हे करण्यासाठी स्वतः वारंवार भारताला भेटी देऊन आम्ही ट्रॅक २ डिप्लोमसी करीत आहोत, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत असा आव आणणे; भारत-पाकिस्तान प्रश्न हा राजकारण्यांनी निर्माण केला असून सामान्य जनतेला यात रस नाही, सामान्य जनतेला मैत्री हवी आहे असा भ्रम पसरविणे; पाकिस्तानप्रेमी तथाकथित भारतीय बुद्दिजिवींना पाकिस्तानात बोलावून त्यांचा पाहुणचार करणे जेणेकरून ते भारतात परत गेल्यावर पाकिस्तानविषयी चांगले बोलतील, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटात काम करणे व गाणी म्हणणे, गुलाम अली सारख्यांनी सातत्याने भारतात मैफिली आयोजित करून पाकिस्तान विरोधाची धार बोथट करणे इ. मार्गाने हे भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. दुर्दैवाने भारतीय जनता, भारतीय माध्यमे आणि तथाकथित भारतीय विचारवंत यांचा पवित्रा ओळखू शकलेले नाहीत. १८५७ चा उठाव, १८७१ मधील वासुदेत बळवंत फडके यांचा सशस्त्र लढा इ. हिंसक लढ्यामुळे पोळलेल्या ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्‍या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली. अगदी तसेच पाकिस्तान करीत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू होते, भारतातील तथाकथित विचारवंत लष्करी कारवाईला विरोध करून चर्चेच्या माध्यमाने प्रश्न सोडवावा, युद्ध परवडणारे नाही, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, दोन्ही देशातील जनतेचा संपर्क वाढल्यास प्रश्न सुटेल इ. मागण्या पुढे करून कारवाईच्या विरोधात वातावरण निर्माण करतात. दुर्दैवाने भारत या सर्व स्तरांवर फसलेला आहे. भारत कधी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चर्चा करू पाहतो, तर कधी पाकिस्तानवर निर्बंध घालू पाहतो, तर कधी दहशतवाद्यांविरूद्ध कडक पावले उचलू पाहतो. यातील कोणत्याही धोरणात सातत्य नाही. सद्यपरिस्थितीत युद्ध हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Mon, 09/19/2016 - 21:25
अगदी लोलियत प्रतिसाद.
हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्‍या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली.
:) #मिसिंगलोळणारीस्मायली
सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.
हहपोदु. गेलाबाजार पाकिस्तानचे सर्वात मोठे मदतगार जे की अमेरिका आणि चीन यांच्या विरोधात अमेरिकन रेष्टारंटे आणि चायनीज ठेल्यावर खाणेही बंद करण्याचा प्रस्ताव मी मांडतो. (गंभीर विषयावरील वरचा हास्यास्पद प्रतिसाद वाचल्याने राहवले नाही याबद्दल क्षमस्व.)

In reply to by अनुप ढेरे

साहना Wed, 09/21/2016 - 07:18
चिनी गळ्याचा शर्ट/कोट घालणे मोदींनी आणि पर्रीकरांनी राष्ट्रहित लक्षांत घेऊन तात्काळ बंद करावे असाही कडक इशारा आम्ही मोदींना देत आहोत.

In reply to by श्रीगुरुजी

साहना Wed, 09/21/2016 - 07:20
> ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. पण आज काल प्रयत्नांत संघाने काँग्रेसला चारी मुंड्या चिट केले आहे. आमचे सजेशन : वेदिक विद्यापीठ काढून आपली जुनी ब्रम्हास्त्र, पराजन्यस्त्र इत्यादी पुन्हा शोधून काढावीत.

In reply to by श्रीगुरुजी

अशोक पतिल Wed, 09/21/2016 - 22:27
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन ! तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल . परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.

In reply to by अशोक पतिल

अशोक पतिल Wed, 09/21/2016 - 22:28
@ श्री गुरुजी अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन ! तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल . परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.

विशाल व्यास: सैनिक म्हणजे नाटकातला समरधुरंधर आम्हा दिसतो लीलेने भवपाश तोडूनी जो गनिमांच्या फळीत घुसतो पीळ मिशीला भरून म्हणतो – या या सारे माय कुणाची व्याली – वगैरे उडवुनी चटणी शत शत्रूंची ( पिटाकडे पाहून जरासा गाली हसतो ) आणि रेल्वेमध्ये जेधवा विटकी खाकी पेहरणारे तुटक्या द्रोणातील वड्यांचे दही पिणारे दोहे अथवा अभंग ओवी गुणगुणणारे असे शिपाई सहज भेटती देत जांभया त्रस्त स्वराने आम्हा म्हणती – भली नोकरी कारकुनाची पगार घ्यावा मेजावरती दिवस रजेचे किती तयाला नाही गणती या फौजेचा कठीण पेशा शिस्तीचे वरवंटे माथा सदैव फिरती मुलामाणसांपासून लागे दूर जावया आणिक हे म्हणताना डोळे किंचित भिजती वीररूप हे असले पाहून पांढरपेशा श्रद्धा आमुच्या ( थिएटरातील बनावटीच्या ) विचलीत होती व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो काय शिपाई असेच असती ! होय शिपाई असेच असती, परंतू आम्हा उपजत नाही ते हे - नाटकातल्या त्या शूराला नसते तेथे मरावयाचे असते केवळ टाळीसाठी विरात्वाने स्फुरावयाचे पायदिवे विझल्यावर आणिक घरी जाउनी दुलईमध्ये शिरावयाचे ! रेलवेतला सैनिक पण हा – करांत त्याच्या दहीवड्याचा द्रोण असु द्या स्वरात त्याच्या तक्रारीचा भाव दिसु द्या मुलेमाणसे म्हणता त्याचे नेत्र भिजुद्या जेव्हा आपुली (टिनोपालची) मुलकी दुनिया सोडूनी जातो रणगाडे, तोफा, तंबुंच्या जगात अपुली जागा घेतो गळुनी पडती सर्व जांभया तक्रारीचा स्वरही विरतो दुरस्थातील आप्तजनाचा आठव तेथे विद्ध न करतो मळकट कवचे (रेलवेतली) फुटून पडती आणि सनातन पुरुषार्थाचा सोलीव गाभा युद्धतळावर उभा राहतो. तोच रेलवेतला शिपाई अग्नीचे घन लोळ भोवती बरसत असता अविचल दृष्टी समोर बांधून गोळे भरतो, खंदकातल्या भाईसाठी घास आपुला दूर सारतो, शरीर पिंजून गेले तरीही हात उभारून अशरण वरती या भूमीवर कोसळणारे गगनाचे छत रोखुनी धरतो - कुसुमाग्रज

अर्धवटराव Tue, 09/20/2016 - 03:30
शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली. इतर कोणि इतर आठवण करो वा न करो, जेंव्हा केंव्हा युद्धभूमीवर आपले सैन्य शत्रुशी भिडेल तेंव्हा प्रत्येक जवान अशाच वीरमरण पत्करलेल्या आपल्या बांधवांची आठवण काढुन चवताळुन हात चालवेल. एरवी काडिची किंमत देण्याचा लायकीचा नसलेला आपला शेजारी देश अशा प्रसंगी भारताला आपल्या पातळीवर आणुन उभा करतो व त्याची दखल घ्यायला भाग पाडतो... इतकी कि आपले आपले सर्व व्यवहार, चिंता, प्रॉब्लेम्स बाजुला सरतात व या शेजार्‍याचा खात्मा करायचा एकमेव उद्देश भारतीयांच्या दिवास्वप्नात चमकुन जातो. असो. सरकार व इतर संबंधीत यंत्रणा काय योग्य ते करेलच. असे जीव जाणं मानाला चटका लाऊन जातं मात्रं.

आनन्दिता Tue, 09/20/2016 - 09:26
प्रचंड दु:ख देणारी बातमी. जीव अगदी तळमळून गेला. अशा अजुन किती विरांना आपल्या अमुल्य प्राणांची आहुती द्यावी लागणार आहे काय माहीत! :'(

मदनबाण Tue, 09/20/2016 - 15:53
शहिदांना आदरांजली ! आपल्या देशाच्या आत येउन आपल्याच देशाच्या जवांना ठार मारण्याचे भ्याड कॄत्य पाकिस्तान त्याच्या प्रॉक्सीवॉरच्या माध्यमातुन करु शकला आहे ! या प्रॉक्सीवॉरला आपण अजुनही उत्तर देउ शकलो नाही ही दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे ! डोंन्ट टॉक, जस्ट रिटालिएट... या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा. यावर अधिक इथे :- Mending Pakistan’s behaviour Securing the Indus treaty रशियाकडुन शस्त्रे घ्या आणि ती बलुचिस्तान मध्ये पसरवा...हा उपाय पण चांगला आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 09/20/2016 - 17:05
I wish to ask the Prime Minister, are you not weak? If indeed you are a strong government, the country needs proof of that.Narendra Modi (@narendramodi) May 4, 2009 माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण मनपोहन सिंग व्हर्जन २ आहात काय ? आता जर मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला नाही तर भाजपाचे "बुरे दिन" मात्र नक्कीच सुरु होतील ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी Wed, 09/21/2016 - 00:07
पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच हा एक नवीन हल्ला होता. पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच यावेळीही लष्कर काही प्रमाणात गाफील होते असं वाटतंय. पूर्वीच्या अनेक हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांचं प्रमाण हल्लेखोरांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होतं. आणि ज्याप्रमाणे पूर्वीच्या असंख्य हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारला फारसं काहीच करता आलं नव्हतं, तसंच यावेळीही मोदी, पर्रीकर काहीही करू शकणार नाहीत हे नक्की (कडक इशारे, निषेध इ. नेहमीप्रमाणे होईलच). जर नेहमी देण्यात येणारे कडक इशारे, निषेधाचे ठराव, पुतळे/झेंडे जाळणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या वल्गना इ. व्यतिरिक्त काही भरीव कृती झाली तरच मोदींचं वेगळेपण दिसून येईल आणि निदान याबाबतीत तरी असे होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

In reply to by मदनबाण

अमितदादा Wed, 09/21/2016 - 00:55
पूर्ण सहमत. Indus Water Treaty हा भारताच्या हातात असणारे हुकमी पत्ता आहे पण राज्यकर्ते किती निर्भीड आहेत त्यावर अवलंबून आहे . आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव हटविण्यासाठी हे गुपचूप व्हायला हवं .

John McClain Tue, 09/20/2016 - 23:40
परिस्थिती भरपूर complex वाटतेय... हा एक ब्लॉग वाचण्यात आला. चांगलं वाटतंय(खरं खोट खात्री नाही... पण practical वाटतंय) खालचे काही comments पण चांगले आहेत... एकाच म्हणणं आहे कि चीन ने पैसे देऊन भीती पसरवणे चालू केले आहे ☺ http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

पैसा Wed, 09/21/2016 - 10:11
अजून किती? का सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार? आता सकाळी परवेझ मुशर्रफची मुलाखत बघताना टीव्हीवर चप्पल फेकून मारावीशी वाटत होती.

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन Wed, 09/21/2016 - 11:40
सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार?
सगळे जग शांततेच्या धर्माच्या वाटेवर गेले तरीही हे प्रकार संपायचे नाहीत.कारण सतत इतर कोणाचा द्वेष करणारे लोक शत्रू संपले की आपापासतातच द्वेष करायला लागतात-- पाकड्यांनी बांगलादेशात जे केले तेच ते आज बलुचिस्तानात करत आहेत. तरीही शांतताप्रिय लोकांचा भळभळती हृदये असलेल्या सर्वांनाच कळवळा आहेच. तेव्हा कधीनाकधी हे होणारच आहे आणि त्या वाटेवर जगाला लवकरात लवकर घेऊन जाण्यात मदत करायला मानवतावादाचा कळवळा आलेले युरोपिअन्स बसले आहेतच. मेर्केलबाईंनी कोणाला घरात घेतले आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे समोर दिसतच आहे.आजही अती मानवतावादी ओबामा दुप्पट शरणार्थी घ्यायची भाषा करतच आहेत.

गॅरी ट्रुमन Wed, 09/21/2016 - 11:33
एकंदरीत पाकड्यांबरोबर डिल करताना आपण विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आलो होतोच आणि काही प्रमाणात त्यांचे नशीबही चांगले होते. १९७७ मध्ये झियांनी सत्ता काबीज केल्यानंतर झिया आणि पाकिस्तानही जगाच्या दृष्टीने pariah झाले होते.अशावेळी जनता सरकार झियांच्या प्रेमात पडल्याप्रमाणे वागू लागले. फेब्रुवारी १९७८ मध्ये परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते आणि "यापुढे भारत पाकिस्तानला हरवेल केवळ हॉकीच्या मैदानात" असे काहीसे बोलले होते.पुढे भारत-पाकिस्तान हॉकीचे सामनेही झाले.महिन्याभरातच भारत सरकारच्या निमंत्रणावरून झियांचे मार्शल लॉ अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आमीर मोहम्मद भारत दौर्‍यावर आले होते. झियांशी फोनवर बोलताना मोरारजी देसाईंनी भोळसटपणे रॉच्या पाकिस्तानातील कारवायांसंबंधी माहिती दिली होती आणि त्यानंतर झियांनी ताबडतोब त्यावर कारवाई केली असेही म्हटले जाते. म्हणजे जगाच्या दृष्टीने झिया pariah ठरलेले असताना आपण मात्र त्यांना एका अर्थी लेजिटिमसी देत होतो. पुढे १९७९ मध्ये रशिया अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तान आणि झिया "दहशतवादविरोधी" लढाईत अगदीच महत्वाची प्यादी ठरली. झियांचा pariah पणा त्यांच्या नशिबाने आपोआप नाहिसा झाला. १९९९ मध्ये मुशर्रफांनी सत्ता काबीज केल्यानंतरही मुशर्रफ आणि पाकिस्तान जगाच्या दृष्टीने pariah ठरले होते. २००० साली अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानला ४-५ तासांसाठी गेले होते.त्यावेळी मुशर्रफ यांच्याशी जाहिरपणे हस्तांदोलन करणेही बिल क्लिंटन यांनी टाळायचा प्रयत्न केला होता.अशावेळी आपणच पुढाकार घेऊन मुशर्रफना आग्रा परिषदेसाठी बोलावले.त्यापूर्वी मुशर्रफ पाकिस्तानात सत्ताधारी असले तरी त्यांचे पद "अध्यक्ष" असे नव्हते तर "चीफ एक्झेक्युटिव्ह" असे होते आणि नामधारी अध्यक्ष म्हणून रफिक महंमद तरार होते. अशावेळी प्रोटोकॉलचा प्रश्न येऊ नये म्हणून मुशर्रफनी तरारला हटवून स्वतः अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. एका अर्थी सगळे जग मुशर्रफला टाळत असताना मुशर्रफला लिजिटिमसी आपण मिळवून देण्यात वाटा उचलला. पुढे ९/११ झाले आणि परत एकदा पाकिस्तान आणि मुशर्रफ पाश्चिमात्य सरकारांच्या गळ्यातले ताईत बनले. आताही जग पाकिस्तानला टाळत आहे अशा बातम्या येत आहेत.अशावेळी फालतूचे मानवतावादाचे भरते येऊन जी चूक जनता आणि वाजपेयी सरकारने केली होती ती परत मोदी सरकार करणार नाही ही अपेक्षा. आणि हो-- अफगाणिस्तानमध्ये रशिया घुसणे किंवा ९/११ सारखी आणखी एखादी घटना घडून परत पाकिस्तान फ्रंटलाईन स्टेट बनणार नाही अशीही इच्छा.

In reply to by गॅरी ट्रुमन

पैसा Wed, 09/21/2016 - 13:00
मोस्ट फेवर्ड नेशनचा घोळ वाचून हाताची बोटे काय अख्खा हात तोंडात घातला आहे. पाकिस्तान जर बदल्यात काही सवलती देत नसेल तर पाकिस्तानातून माल आयात करणे आणि सवलती अशी दुहेरी मदत कशाला चालू आहे? त्या पैशांवर पोसलेले अतिरेकी आपल्याकडे येऊन वाट्टेल तो गोंधळ घालतात. म्हणजे हा दहशतवाद पोसायला अंतिमतः आपलाही हातभार लागतोच आहे. प्रत्यक्ष लढाई करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांची आर्थिक नाकेबंदी का करायचा प्रयत्न होत नाही?

In reply to by पैसा

संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 14:16
हे आर्थिक नाकबंदीबद्दल मी मागेही बरेचदा बोललो आहे पण कुणी उत्तर दिलं नाही अजून पर्यन्त, काय मजबुरी आहे नक्की?

In reply to by अनुप ढेरे

पैसा Wed, 09/21/2016 - 14:26
त्यांची तेवढी निर्यात होते आणि त्याना पैसे मिळतात. ते एका फटक्यात बंद होईल ना. सडू दे त्यांचा माल तिकडे. ते नको असेल तर तिथल्या लोकानी त्यांच्या सरकारला शिव्या द्याव्यात.

In reply to by पैसा

अनुप ढेरे गुरुवार, 09/22/2016 - 14:59
पाकला त्रास द्यायला आपण का त्रास करून घ्यायचा? हे वाचा. http://www.livemint.com/Opinion/AJyJYJD4vnAvyCysxxphTN/Mending-Pakistans-behaviour.html हा उपाय छान वाटतो आहे.

मदनबाण Wed, 09/21/2016 - 13:11
हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयाच्या संकुलाजवळ असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये लपून संपूर्ण परिसराची नीट टेहळणी केली होती. एनआयएच्या सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यादरम्यान मुख्यालयातील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वाधिक जवानांचा मृत्यू झाला. मुख्यालयाच्या परिसरात दोन इमारती आहेत. हल्ल्याच्यावेळी आग लागल्यानंतर कोणालाही पळून जाता येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. यावरून दहशतवाद्यांना याठिकाणची सखोल माहिती असल्याचे सिद्ध होत आहे. थोडक्यात आपल्या तरुण कोवळ्या जवानांना या अतिरेक्यांनी जाळुन मारले ! :( हे जवान कुठल्या लढाईत मारले गेले नाहीत किंवा गोळ्या झाडतानाही ते शहिद झाले नाहीत.दहशदवादी खानावळीत आत पर्यंत पोहचले होते ! यावरुन आपण काय बोध घेतला पाहिजे ? संदर्भ :- Uri attack probe : दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांना स्वयंपाकघरात कोंडले मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

In reply to by मदनबाण

संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 14:29
ह्याचाच तीव्र संताप आहे बाणराव, प्रतिकाराची संधी ना मिळता संपून जाणे कसे असते ते शब्दात नाही वर्णू शकत, काही लोक युद्धच्या विरुद्ध आहेत पण यारो, मरणारे सैनिक आपल्याच रक्ताचे नातेवाईक आहेत. भावनेच्या भरात काही करू नये, गप्प बसावे हे चीड आणणारे आहे, ह्या तमाम जगात फक्त आपल्याच देशाला सारासार विचार करण्याची काय गरज पडते नेहमी नेहमी हेच माझ्या आकलनाच्या बाहेर आहे, प्रतिकार करायचा नसेल तर ती शस्त्रसज्ज सेना, आयुधे, यंत्रे का काचेच्या कपाटात सजवून ठेवायला आहे काय? असेच हकनाक मरत राहण्यापेक्षा त्यांनाहि घरी पाठवा, आपण सगळे आपल्या मुलंबाळं सोबत घेऊन मरून जाऊ, ते जे काही अणुबॉम्ब मिसाईल बनवले आहेत ते आपल्याच देशावर टाकून संपवून टाका हा शेळपट देश, काही गरज नाही अशा अवस्थेत जगायची,

मदनबाण Wed, 09/21/2016 - 14:08
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा. यावर अधिक इथे :- Mending Pakistan’s behaviour Securing the Indus treaty काल या संबंधात टिपण्णी केली होती आणि ब्रह्मा चेलानी यांच्या लेखाचे दुवे दिले आहेत, याच आशया वरचा लेख आत्ताच दिसला तो खाली देत आहे. ‘उरी’नंतर उरलेली मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

जेसीना Wed, 09/21/2016 - 14:17
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे. तिथे रशिया, फ्रान्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ने आपल्याला पाठिंबा देऊन , आपण जे पाऊल उचलू त्यात ते सहकार्य असल्याचा दर्शवलंय. हळू हळू पुन्हा एकदा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखे दोन गट पडण्यास सुरवात झाली आहे. भारताने अजून पर्यंत कधीच कोणत्याच देशात आपले सैन्य घुसवले नाही हा अजून पर्यंतचा इतिहास आहे, उरी ची घटना अशा वेळी घडली आहे कि पठाणकोट ची जखम ताजी असतानाच परत पाकिस्तान ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारताला खूप विचार करून पुढची पावला उचलायची आहेत. आपले एक चुकीचा पाऊल उचलायची पाकिस्तान खूप वर्षांपासून वाट बघतो आहे, एक चुकीचा पाऊल उचलण्याच्या लगेच दोन किंवा तीन देशांमध्ये सरळ सरळ युद्ध भडकू शकते. आणि हे युद्ध कदाचित सरळ सरळ अणुयुद्ध असू शकते. कदाचित तिसऱ्या महायुद्धाची नांदीच सुरु होऊ शकते. खूप कठीण काळ चालू आहे, अमेरिका खूपच भयानक अशा आर्थिक स्थितीतून जात आहे, रशिया आणि चीन दोघांना पण सुपर पॉवर बनण्याची घाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत भारत नक्की कोणता पाऊल उचलतोय तिथे मला वाटते सगळ्या जगाचे आणि आपल्या सगळ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे. मला वाटते हा प्रश्न फक्त आणि फक्त पाकिस्तानची आर्थिक कोंडी , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सर्व बाजूने कोंडी करून त्यांना एकाकी पडूनच सुटू शकतो असा वाटते. कदाचित मोदी आणि त्यांचे सहकारी येणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सभे पर्यंत वाट बघतील त्यात पाकिस्तान ची सर्व बाजूने कोंडी करता येईल असा प्रयत्न करतील आणि नंतरच योग्य तो निर्णय घेतील. म्हणून कदाचित अजून पर्यंत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत (फक्त बैठकांशिवाय). मी तरी सध्या फक्त काहीतरी चांगल्या निर्णयाची वाट बघते आहे, बस माझ्या भारत मातेला आणि तिच्या रक्षण कर्त्यांना अजून इजा पोहोचू नये ह्यासाठी प्रार्थना करतेय. तरी सुद्धा खूप खूप दुःखद मानाने माझ्या शहीद झालेल्या भारत रत्नांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारत माता कि जय ....... जय हिंद

In reply to by जेसीना

श्रीगुरुजी Wed, 09/21/2016 - 15:01
प्रत्येक वेळी असा हल्ला झाला की लगेच भारताने युद्ध सुरू करावे, सीमा ओलांडून दुश्मनांचा खात्मा करावा अशी भाषा सुरू होते. त्याबरोबर लगेच अशीही भाषा सुरू होते की युद्धाची तयारी करायला अजून काही महिने लागतील, आताच युद्ध सुरू केले तर ते आत्मघातकी ठरेल. त्यामुळे बराच काळ काहीच न करता निघून जातो. तोपर्यंत आधीच्या हल्ल्याच्या स्मृती क्षीण होतात आणि मग पुन्हा एक नवीन हल्ला होऊन पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती येते. अगदी अल्प सूचनेवरून युद्ध सुरू करता येईल अशी स्थिती भारताला आणता येईल का?

मदनबाण Wed, 09/21/2016 - 14:28
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे. पाकिस्तानने आपल्याला घाबरले पाहिजे कि आपण पाकिस्तानला ? लष्कराने पाकव्याप्त काश्मिर सरळ काबीज करावे कारण तो आपलाच भाग आहे, मग आपण कशाला मागे-पुढे पहायचे ? पाकिस्ताने कंबरडे चांगले मोडले की चीन सुद्धा १० वेळा विचार करेल ! घी जब सीधी उंगली से ना निकले, तो उंगली तेढी करनी पडती है | पाकिस्तान अतिरेकी पाठवत राहणार आपल्या सैनिकांची मुंडकी छाटणार, त्यांना जाळुन मारणार तरी आपण गप्पच बसायचे ? का ?आत्ता पर्यंत फक्त रशिया आणि फ्रान्स आपल्या बाजुने बोलताना आणि प्रत्यक्ष कॄती करताना लगेच दिसले. चीन काय करेल किंवा दुसरा क्ष देश आपल्या मदत करेल असे विचार कशासाठी ? देश आपला आहे, काश्मिर आपले आहे, पाक व्याप्त काशिमर सुद्धा आपलेच आहे असं असताना सरळ सैन्याला मोकळीक ध्या. युद्ध आपल्यावर लादले जात असेल तर त्याला आपण तोंड दिलेच पाहिजे, इतके मिसाइल्स आपण टेस्ट करतो त्या काय फक्त नावासाठीच आहेत काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism

In reply to by मदनबाण

नितिन थत्ते Wed, 09/21/2016 - 23:39
>>जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... ही गुंतवणूक मे २०१४ नंतर झाली आहे का?

अर्धवटराव गुरुवार, 09/22/2016 - 00:08
तो धोंडा भारताच्या पायाला बांधुन भारताला जखडुन ठेवावं, शक्य असल्यास बुडवावं हे ड्रॅगनचं तत्व. अंकल सॅम भारत-चीन संबंधी हेच स्वप्न बघत असणार. भारताने आता पाकिस्तानवरुन लक्ष्य पूर्णपणे काढुन सगळा जोर ड्रॅगन विरुद्ध लावावा. आपली फायनल लढाई, बँकेत आणि झालच तर रणांगणावर, ड्रॅगनशीच होणार आहे. मालकाचा हात पिळला तर तो आपोआप आपलं कुत्रं आवरेल.

पिलीयन रायडर गुरुवार, 09/22/2016 - 07:44
मला इथली चर्चा वाचुन अजुन वाईट वाटायला लागलंय. १८ जण तर गेलेच, पण अजुनही आपण इतके ढिम्म कसे??? ... युद्ध करा असेही म्हणवत नाही पण काही तरी कराच राव आता.. खुपच झालंय... :(

चौकटराजा गुरुवार, 09/22/2016 - 07:56
आजची बातमी वर्मानपत्रात अशी आहे की पर्रीकराना आपल्या सैन्यात काही गफलत झाली असावी अशी शंका आली आहे. आपण हुतात्मा मेणबत्ती यांच्या नादाला लागून वास्तवाचे भान ठेवत नाही. संतापापेक्षा शरमेची भावना अधिक आली पाहिजे. एक एक ने दस दस मारे हे काव्यात लिहिणे ठीक असते. पण तसे होते का ? गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या. मुठभर दहशतवादी एका सैन्याला भारी पडतात वर्षानुवर्षे हे कसे काय..... ? सैनिक हो तुमच्यासाठी .. ही भावना आपली आहेच पण सामरिक हालचालीत आपण काही कमी पडत तर नाही ना याचा गंभीर विचार झाला पाहिजे. कृपया - सैनिकांचे मनोधैर्य खचविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असे तारे कृपया कोणी तोडू नयेत ही नम्र विनंति.

पाटीलभाऊ गुरुवार, 09/22/2016 - 14:27
हा एक लेख वाचनात आला होता. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. http://kiranasis.blogspot.co.za/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

In reply to by पाटीलभाऊ

टवाळ कार्टा गुरुवार, 09/22/2016 - 15:26
येस्स...हाच लेख शोधत होतो...यात जे लिहिले आहे ते वाचून इथे कोणी म्हणणार नाही की चला युद्ध करायला...याच बरोबर हे पण बघा

In reply to by पाटीलभाऊ

John McClain गुरुवार, 09/22/2016 - 16:32
मी 2 दिवसां पूर्वी दिला होते ना हेच आर्टिकल वर ☺... असो, चांगलं लिहिलंय त्याने,पण कोणीतरी त्याची authenticity कन्फर्म करायला हवी... बलुचिस्तान चे photos आणि चीन ची इन्व्हेस्टमेंट.. रशिया बद्दल काही विशेष टिप्पणी नाही आहे. तो पण मोठा प्लेअर आहे

In reply to by पाटीलभाऊ

मार्मिक गोडसे गुरुवार, 09/22/2016 - 18:53
भारत-पाक युद्ध झाले तर चीन अमेरिकेला त्यांच्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रियकरणाची धमकी देऊ शकतो?

गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/22/2016 - 15:45
सर्व चर्चेला आणखी एक अ‍ॅन्करींग पॉईंट देत आहे. हा लेख मी मनोगतवर ११ जुलै २००६ चे मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट झाल्यानंतर लिहिला होता.त्यावेळी मनोगतवर बरीच चर्चाही झाली होती (आपल्यासारखे लोक चर्चा सोडून इतर काय करू शकणार आहेत म्हणा :( ). त्यावेळी मी असे मत मांडले होते की पाकिस्तानशी युध्द हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पुढे १० वर्षे उलटली आहेत.तरीही परिस्थिती फार बदललेली आहे असे वाटत नाही. तेव्हाचा लेख इथे जसाच्या तसा चिकटवत आहे. आजच वर्तमानपत्रात वाचले की मुंबईत अँटॉप हिल मध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले‌. शक्यता आहे की तो अतिरेकी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत घातपात घडविण्यासाठी आला होता आणि तसे जर का असेल तर तो मेला याचे आपल्या देशातील ढोंगी मानवतावादाची झूल पांघरलेले लोक आणि त्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष साथिदार यांना सोडून इतर कोणालाच दुःख वाटू नये. पाकिस्तानकडून भारताला असलेल्या धोक्याचे कटू सत्य मुंबई रेल्वे बाँबस्फोटापासून अधिक तीव्रतेने अधोरेखित झाले आहे.त्याचाच हा एक भाग आहे. या पार्श्वभूमीवर भारतापुढील पर्याय काय असे राहून राहून वाटते. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अशी मागणी केली की भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. इतरही अनेकांचे तेच म्हणणे आहे.पण पाकिस्तानवर हल्ला करून प्रश्न सुटणार आहे का? पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.प्रस्तावित युध्दात पाकिस्तानने जर दिल्ली,मुंबई किंवा इतर कुठेही अणुबाँब टाकला तर आपले लाखो नागरीक मृत्युमुखी पडतील.त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही अणुबाँब पाकिस्तानवर टाकू आणि पाकिस्तानमधील कराची,लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांचे नामोनिशाण मिटवू. पण आपले नुकसान झालेले असेल ते फारच भयानक असेल.अणुयुध्दात कोणीही जिंकणार नाही.आपल्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजतील.कदाचित एका अणुबाँब हल्ल्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला आपल्याला अनेक दशके लागतील.आणि युध्द सुरू झाले तर पाकिस्तान अणुबाँब हल्ला करणार ही गोष्ट तर निश्चित आहे.तेव्हा ती किंमत चुकवणे योग्य आहे का?कारण कोणत्याही युध्दात शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्याबरोबरच आपले नुकसान कमितकमी होईल याची काळजी धुरंधर सेनानी घेत असतात. क्षणभर असे समजून चालू की भारत-पाकिस्तान युध्द हे अणुयुध्द होणार नाही तर ते पारंपारीक शस्त्रांनीच लढले जाईल.२००४ मध्ये अमेरीकेने पाकिस्तानला 'Major non-NATO ally' हा दर्जा दिला आहे.तेव्हा अमेरीका पाकिस्तानला मदत करणार हे उघड आहे.त्याचप्रमाणे चीननेही पाकिस्तानला आजपर्य़ंत भरपूर मदत केली आहे.चीनला महासत्ता बनायचे होते आणि चीनी राज्यकर्त्यांना माहित होते की भारत आपल्याला त्या मार्गात प्रतिस्पर्धी बनायची क्षमता बाळगून असलेला देश आहे.म्हणून चीनने जाणिवपूर्वक पाकिस्तानला बलिष्ठ केले कारण बलिष्ठ पाकिस्तान भारताला कायमच्या कटकटी निर्माण करेल आणि भारताची शक्ती त्याला उत्तर देण्यात खर्ची पडेल, याची चीनला खात्री होती.आणि झालेही तसेच.तेव्हा प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्दात चीन पाकिस्तानला मदत करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया सारखे श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीला धावतील ते वेगळेच.भारताने बांगलादेशाला जगातील जवळपास २/३ पेक्षा जास्त देशांचे वैर पत्करून स्वतंत्र केले.इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यातही महत्वाची भूमिका बजावली. पण आजपर्यंत किती वेळा काश्मिर प्रश्नावर त्या दोन देशांनी भारताचे समर्थन केले? शून्य.आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी इस्लामच्या नावावर सर्व मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी येतील किंवा उघडउघड पाकिस्तानचे समर्थन जरी केले नाही तरी तेलाने समृध्द मुस्लिम देश भारताला तेलपुरवठा बंद करून कोंडित पकडतील याचीच शक्यता जास्त. आता क्षणभर असे समजुया की प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे पूर्णपणे इतर शक्तींच्या हस्तक्षेपाविना लढले जाईल.डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यावर एन.डी.टी.व्ही. वर एक चर्चा झाली होती.त्यात दिलेली माहिती खरी असेल तर भारत आणि पाकिस्तान यामधला 'Strategic superiority ratio' सुमारे १.३ ते १.४ आहे. याचा अर्थ भारताची लष्करी ताकद पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपेक्षा १.३ ते १.४ पटीने अधिक आहे.ही ताकद पाकिस्तानविरूध्दचे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी आहे का?वाटत नाही.ती कमितकमी २.५ ते ३ पटींनी अधिक असती तर कदाचित युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी झाली असती.त्यातून भारताचे सैन्य केवळ पाकिस्तान सीमेवर नाही तर चीनबरोबरच्या सीमेवरदेखील आहे.तेव्हा आपल्याला सर्व सैन्यक्षमता पाकिस्तानविरूध्द एकवटता येणार नाही.त्यातून पाकिस्तानच्या सैन्याला युध्दात जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा सारख्या अतिरेकी संघटनांकडून जी मदत होईल ती वेगळीच.त्या मदतीचा अंतर्भाव 'Strategic superiority ratio' मध्ये केला असेल असे वाटत नाही.तेव्हा शक्यता आहे की पाकिस्तानविरूध्दचे युध्द आपल्याला वाटते तितके सोपे जाणार नाही. आता आपण क्षणभर तिसरी कल्पना करू की आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू!तरीही पुढे काय हा प्रश्न राहतोच.इतिहासाचा धडा आहे की परकिय देशातील (अथवा आपल्याच देशातील एखाद्या भागातील) जनतेला त्यांच्या इच्छेविरूध्द केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दावणीला धरता येत नाही.युध्द जिंकल्यावर काही काळ तरी आपल्या सैन्याला पाकिस्तानमध्ये राहावे लागेलच.आणि पाकिस्तानातील लोक ते कदापि मान्य करणार नाहीत हे तर उघडच आहे. लक्षात घ्या की दुसऱ्या महायुध्दात अजोड धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर रशियन सैन्याने पराभवाच्या खाईतून वर येत जर्मन सैन्यावर विजय मिळवला. रशियन सैन्याचे धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती याविषयी कोणालाही शंका नाही. तरीही त्याच रशियन सैन्याचे अफगाणिस्तानात काय झाले?कारण अफगाण जनतेला रशियन सैन्याचे त्यांच्या देशातील अस्तित्व मान्य नव्हते.१९९१ मध्ये विघटन झाल्यावरही रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या ५ पट मोठा आहे.तर चेचेन्या हा भारतातील दिल्ली शहराइतका क्षेत्रफळाने आहे.चेचेन्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कमी आहे.तरी रशियन सैन्याला एवढया लहानशा प्रदेशातूनही माघार घ्यावीच लागली ना?कारण चेचेन लोकांना रशियाबरोबर राहायचे नव्हते.जगातील सर्वात शक्तीशाली अशा अमेरीकन सैन्याची इराकमध्ये कशी ससेहोलपट होत आहे ते तर अगदी स्पष्ट आहे.कारण इराकी जनतेला अमेरीकन सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य नाही.आपल्या सैन्याचीही तीच गत पाकिस्तानात होणार याविषयी अजिबात शंका नाही कारण पाकिस्तानी जनतेला आपल्या सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य होणार नाही. आणि आपले सैन्य माघारी आल्यावर तरी काय?सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे एक महिन्याहून जास्त काळ चालणे शक्य नाही.पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १५ कोटी आहे. दुसरे महायुध्द ६ वर्षे चालूनही त्यात सुमारे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.तेव्हा एका महिन्याच्या युध्दात आपण पाकिस्तानातील सर्व १५ कोटी लोकांना नक्कीच ठार मारू शकत नाही.अर्थात पाकिस्तानातले सर्व लोक काही दहशतवादी विचारसरणीचे नक्कीच नाहीत. पण युध्द झाले तर पूर्वी शांतताप्रिय असलेल्या पाकिस्तानी लोकांना आपल्या गोटात सामील करणे जिहादी विचारसरणीचे लोकांना अधिक सोपे जाईल. आपले सैन्य माघारी येताच कटकटी मोठया प्रमाणावर वाढतील.एका महिन्याच्या युध्दामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नायनाट होईल असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.आणि त्यातून पाकिस्तान आपला शेजारीच आहे.अमेरीकन सैन्य इराकमधून परत गेल्यावर अमेरीकन लोकांना इराकमधील दहशतवाद्यांचा अंतरामुळे त्रास होणार नाही. आपली परिस्थिती तशी नक्कीच नाही. आणि या सर्व कल्पनाविलासामागे किती गृहितके आहेत हे लक्षात घ्या.पहिले म्हणजे युध्द अणुयुध्द न होता पारंपारीक युध्द होईल.दुसरे म्हणजे अमेरीका,चीन आणि मुस्लिम देश त्या युध्दात हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिसरे म्हणजे आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू.या सर्व गोष्टी होऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला शक्य होणार नाही हे उघडच आहे. तेव्हा मला तरी वाटते की पाकिस्तानविरूध्द आपल्याला एकच गोष्ट करता येईल.आणि ती म्हणजे जशास तसे आणि दुसरे म्हणजे भारतात दहशतवाद्यांचे पाठिराखे आहेत त्यांना दयामाया न दाखवता यमसदनी धाडणे.त्यात शस्त्रास्त्रे पोचवणारे, कटाची आखणी आणि अंमलबजावणी करणारे यासारखे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले लोक यांचा प्रामुख्याने समावेश होईल. आपले काय मत आहे?

बबन ताम्बे गुरुवार, 09/22/2016 - 20:07
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ? त्याचाच गैरफायदा पाकडे घेताहेत असे नाही का वाटत? मुंबई बॉम्बस्फोट, दाउदला आश्रय, संसदेवरचा हल्ला, २६/११ चा मुम्बैवरचा हल्ला, लोकलमधले बॉम्बस्फोट , उघडउघड काश्मीरींना चिथावले, काही भारतीय सैनिकांना विद्रुप करून मारले, पठाणकोट हल्ला आणि आता उरी हल्ला. कीती घटना ? पाकडयांचे धारीष्टय आपलया अशा पडखाऊ धोरणांमुळे वाढलेय असे नाही का दिसत ? (हे होइल, ते होइल, आंतरराष्ट्रिय दबाव, मग नको असे करायला वगैरे ...) . कीती दिवस हे छुपे युद्ध आहे म्हणून आपण हात चोळत बसणार ? मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती. त्यातूनही भारत बाहेर आला. त्यानंतर बाबरी मस्जीद पडल्यानंतरचे दंगे वगैरेनीही प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन वेळा मध्यावधी निवडणूका झाल्या. त्याचा प्रचंड आर्थिक भार भारताने सोसला. तरीही भारत त्यातुन तावून सुलाखून बाहेर पडला. आज आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. मग शिकवला पाकिस्तानला धडा आणि झाले आपले आर्थिक नुकसान - आपण परत एकदा आपली आर्थिक परिस्थीती सुधरवायला सक्षम आहोत असे मला वाटते.

In reply to by बबन ताम्बे

गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 10:17
मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती.
जर अणुयुध्द झाले तर भारताचे होणारे नुकसान आणि १९९१ साली भारताची असलेली परिस्थिती यात जमिन-अस्मानाचा नाही तर पाताळ-स्वर्गाचा फरक असेल.
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ?
मला वाटते की आपण पाकिस्तानला इतके बलिष्ठ होऊ दिले तिथेच चूक झाली आणि यापुढे कुठलीही पावले अतिशय जपून आणि काळजीपूर्वकच उचलावी लागणार आहेत. इस्राएलने इराकच्या अणुभट्ट्या जाऊन उडविल्या तसे करणे आपल्याला शक्य नव्हते आणि त्यामुळे आपण ते केले नाही.मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या "मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन" या आत्मचरित्रात उल्लेख आहे की जे.एन.दिक्षित भारताचे पाकिस्तानातील हायकमिशनर असताना रॉबर्ट ओकली हे अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत होते.दिक्षित आणि ओकली यांच्या बोलण्यातून युध्द झाल्यास पाकिस्तान अणुबॉम्ब हा "लास्ट रिजॉर्ट" म्हणून नाही तर "फर्स्ट वेपन" म्हणून वापरेल असा उल्लेख होता. ही गोष्ट जवळपास २६-२८ वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर पाकड्यांनी नक्कीच अजून प्रगती केली आहे. जर का युध्द झाले तर आपणच पाकड्यांवर पहिल्यांदा दोन-तीन किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकावेत. पाकडे पहिल्यांदा आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण त्यांच्यावर हल्ला करणार याची वाट न बघता पाकड्यांचे कंबरडे आधीच मोडावे आणि त्यांना उठायची संधीच देऊ नये.पाकिस्तान शेजारीच असल्यामुळे किरणोत्सर्जनाचा आपल्याला त्रास होईलच. पण प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा सेकंडरी नुकसान झालेले कधीही परवडले. अर्थात तसे काही करायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया जी काही होईल त्याला तोंड द्यायच्या स्थितीत आपण सध्या नाही-- आपली ताकद तेवढी नाही हे अगदी समोरच दिसत आहे.तेव्हा सद्य परिस्थितीत आपण फार काही करू शकू असे वाटत नाही. आणि तसेही कन्हैय्या कुमार सारख्या हरामखोराचे समर्थन करणारे लोक इथे अगदी मिपावरही आहेत.कन्हैय्या कुमार तर सोडूनच द्या या असल्या अस्तनीतल्या निखार्‍यांनाही आपण काही करू शकत नाही.समजा भारताने पाकड्यांचे पाणी बंद केले (असे केल्यास त्याचे नक्की काय परिणाम होतील याविषयी मला स्वतःला काहीही माहिती नाही तेव्हा याविषयी मतप्रदर्शन करत नाही) तर आपल्याच इथल्या अनेकांना मानवतावादाचे भरते येईल आणि "पाकिस्तानातल्या निरपराध लोकांचे पाणी तोडणे अयोग्य आहे" वगैरे कोल्हेकुई इथलेच बुबुडाविपुमाधवि सुरू करतील. अशांविरूध्दही आपण काहीही करत नाही. तेव्हा युध्द झाल्यास वाटेल त्या त्यागाला तयार आहोत वगैरे भारतीय जनतेने बोलणे ही नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे.त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. खरोखरच त्याग करायची वेळ आली तर बोलणारे बहुसंख्य लोक गलपाटतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 10:57
मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही.
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला. आणि आता भारतासाठी अण्वस्त्रधारी पाक हा पाचर रुतल्यासारखा झाला आहे.

In reply to by बबन ताम्बे

गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 11:50
आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला.
नाही १९९८ मध्ये आपण अणुचाचण्या पहिल्यांदा केल्या म्हणून पाकड्यांनी पण केल्या असे म्हणता येईल.पाकड्यांचे अणुबॉम्ब बनवायचे प्लॅन १९७१ मध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच चालू झाले. १९८७ पर्यंत त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवायची क्षमता आलीही होती असे वाचल्याचे आठवते. काळेकाकांनी मिपावरच याविषयी एक लेखमाला लिहिली होती. तसेही भारताच्या अणुचाचण्या ११ आणि १३ मे १९९८ रोजी झाल्यानंतर १५ दिवसातच पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. याचा अर्थ त्यांची तयारी आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा जर आपल्याकडे काही करण्यासारखे होते तर तो कालावधी १९८७ पूर्वीचा होता.त्यातून वाजपेयींनी "नो फर्स्ट युज" चे आश्वासन देऊन आपण अणुबॉम्ब पहिल्यांदा वापरू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.पाकड्यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.जर आपण पहिल्यांदा वापरणार नसू तर त्या गुळाच्या गणपतींचा उपयोग काय? कारण समजा शत्रूने आपल्यावर पहिला हल्ला केला तर त्याला तोंड देऊन उठायची ताकद राहिली तरच आपण त्याला प्रत्युत्तर देणार ना.ती असेल का हा प्रश्न आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 12:37
स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला आमची इमेज जपायची आहे..... भारत एक जबाबदार राष्ट्र आहे म्हणून. मग काय, आम्ही पहीला अणुबॉम्ब कसा टाकणार. अणुबॉम्ब जाऊ द्या, आम्ही पहील्यांदा आक्रमण देखील करणार नाही. जग काय म्हणेल. आमची माणसे मेली तरी चालतील. पाकडयांनी भारतीयांचा हाच गाढवपणा पुरेपूर ओळखला आहे. ते काही इमेज जपायच्या भानगडीत पडत नाहीत. वर परत अमेरीकेकडून दहशतवाद विरोधी साथीदार असल्याचे सोंग आणून अब्जावधी डॉलरची मदत ओढून आणतात. निवडणूक प्रचारातील वक्तव्ये सोडून देवू या. पण इमेज अशी केली होती की "तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे दुबळेपणा समजू नये" या ठरावीक भारतीय प्रतिक्रीयांपलीकडे जाऊन काही तरी ठोस करतील. पण तसे काही दिसत नाही. कालच पेपर मधे वाचले की सरकारने आता पाकीस्तानला असा इशारा दिला आहे की परत असा हल्ला करा, मग बघू आम्ही तुमच्याकडे. :-(

धर्मराजमुटके गुरुवार, 09/22/2016 - 22:10
इथे अनेकांना अपेक्षित असलेला निर्णय बहुतेक भारत सरकार लवकरच घेईल असे वाटतेय. भारत पाकीस्तानदरम्यान झालेला सिंधू नदीच्या पाण्याचा वापराचा करार बहुतेक भारताकडून मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. ही बातमी

मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 11:42
भारताने सिन्धु करार मोडल्यास चीनबरोबर ब्रम्हपुत्रा करार केला आहे त्यावर परिणाम होणार नाही का? सिन्धु नदीवरची एक झडप बंद केली व केला पाण्याच प्रवाह बंद इतके सोपे आहे का? त्यासाठी पुर्वनियोजन लागते, जसे प्रवाहात धरण बांधणे, कालवे काढणे. ही सगळी तयारी एका दिवसात करणार का? करार केल्यामुळे असे करता येत नाही.

सुबोध खरे Fri, 09/23/2016 - 12:26
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ झे डाँग यांच्या म्हणण्या प्रमाणे अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे. भारताने अणुबॉम्बचा प्रथम वापर करणार नाही असे स्वतःच जाहीरकेले आहे याचा अर्थ काहीच नाही पाकिस्तान आमच्यावर अणुहल्ला करणार हि आमच्याकडे पक्की माहिती होती म्हणून आम्ही त्यांच्या अणुभट्ट्या आणि अणुआस्थापनांवर हल्ला चढवला असे सांगून तुम्ही पाकिस्तानवर अणुहल्ला केलात तर जग तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुमच्या कडे असणारी शास्त्रे आणि अस्त्रे पाकिस्तानचे कंबरडे पहिल्या झट्क्यातच मोडू शकतील अशी स्थिती आहे आणि तसे झाले नाही तरीही दुसऱ्या हल्ल्यात( प्रथम पाकिस्तानने हल्ला केला तरी) तुमची बरीच अणु शस्त्रे सुरक्षित राहून तुम्ही केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान नष्ट होईल इतकी शस्त्रास्त्रे आपल्याकडे आहेत. आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवलेली आणि दक्षिण भारतातून डागू शकणाऱ्या अग्नी ५ आणि अग्नी ६ क्षेपणास्त्रांमुळे तुमचा सज्जड असा दुसऱ्या हल्ल्याचा पर्याय नेहमीच खुला राहतो. फरक एवढाच आहे कि पाकिस्तान हे फ़िदायिन राष्ट्र आहे आणि ते स्वतः समूळ नष्ट झालो तरी चालेल पण भारताची मोठ्या प्रमाणावर हानी करू अशा केवळ सूडाच्या राजकारणाने पेटलेले आहे. पण उद्या जर सर्वकष युद्ध झाले तर आपण पहिला अणुबॉम्ब टाकणारच नाही असे नाही. रशियाशी अनाक्रमणाचा करार करूनही हिटलरने त्यावर हल्ला चढवला होताच. इथे तर भारताने कुणाशीच करार केलेला नाही तर स्वतःच स्वतःवर संयम ठेवला आहे. राहिली गोष्ट सिंधू नदीच्या पाण्याची. ते पाणी आपल्याकडे आपण वळवायला सुरुवात केली आहेच. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच. मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे. एका काश्मीरी पत्रकाराच्या नजरेतून वस्तुस्थिती वाचून पहा. http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/ https://en.wikipedia.org/wiki/Kishanganga_Hydroelectric_Plant

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 17:23
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच.
तो पर्यत नाही ना करार मोडता येणार. करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही, पाकिस्तानप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात कालव्यांचे जाळे विणलेले नाही. उद्या जरी आपण करार मोडायचा ठरवले तर ह्या अतिरिक्त पाण्याने पंजाबात पूर येईल व निसर्गाचीही हानी होईल. हेच चीनही ब्रम्हपुत्रेच्या बाबतीत करू शकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

अमितदादा Fri, 09/23/2016 - 22:32
करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही
भारत ह्या पाण्याचा वापर कृषी, विद्युतनिर्मिती तसेच पाणी साठवण्यासाठी एका मर्यादेमध्ये करू शकतो. खालील दुव्यात तज्ञांची मते वाचा दुवा

In reply to by सुबोध खरे

अमितदादा Fri, 09/23/2016 - 22:29
मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे.
हे खर नाही, भारत पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करू शकतो पण सर्व पाणी अडवणे निव्वळ अश्यक्य आहे. असा कोणता दुवा असेल तर वाचाय आवडेल. हि बातमी पहा, यात तज्ञांनी लिहिलंय कि भारत पाकिस्तान च पूर्ण पाणी आडवू शकत नाही कारण आपल्या काही शहरे पुरमय होतील. उरलेल्या प्रतिसादाशी सहमत.

९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच. फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्‍यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत. हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती. भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते. शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्‍यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्‍यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे ! मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही. केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बबन ताम्बे Mon, 09/26/2016 - 12:56
दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच.
तुमच्या मताशी सहमत. अणूबॉम्ब काही आठवडयात्/महीन्यांत तयार होत नाही .आपण देखील ७४ साली पोखरणपासून सुरवात केली. मला एव्ह्ढेच म्हणायचे होते की १९९९८ नंतर घडलेल्या घटना पहाता पाकीस्तानचे धारीष्टय खूपच वाढले आहे. भारताला जेरीस आणायचे आणि भारताने प्रत्त्युत्तर द्यायची भाषा केली की अणुबॉम्ब टाकायची धमकी दयायची की अमेरिकेसकट सगळे भारताला सबुरीचा सल्ला देतात हे त्यांनी ओळखले आहे.

धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 16:10
भारत फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल करार अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमान मिळणार असून या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
जोक ऑफ द डे ! आता ही विमाने दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फक्त संचलनात उडवायची ना ? एक हतबल नागरिक

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे Sat, 09/24/2016 - 00:35
मुटके साहेब तुम्ही बंगल्यात डॉबरमन कुत्रा का ठेवता? त्याने एकही चोर पकडला नाही तर त्याचा उपयोग झाला नाही असे म्हणाल काय ? लष्करी सामग्रीचे असेच असते. ती वापरावी लागू नये अशीच इच्छा असते. त्याचे प्रतिबंधक मूल्य हे महत्त्वाचे असते. 15 अॉगस्ट 26 जानेवारी ला काही जनतेसाठी उडवत नाहीत. ते शत्रूला तुमची सामरिक तयारी दाखविणे आणि गर्भित धमकी देणे हा हेतू असतो.

In reply to by सुबोध खरे

धर्मराजमुटके Sat, 09/24/2016 - 10:48
वर बातमीत म्हटल्याप्रमाणे ह्या खरेदीमुळे चीन आणि पाकिस्तान वर वचक बसेल असे म्हटले आहे पण अजुनतरी वचक बसताना दिसत नाहिये. तुमचं म्हणणं सगळं खरयं साहेब, पण अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे मनात हतबलता निर्माण होते व त्याचे रुपांतर चिडीत होते आणि मग असा उपहास बाहेर पडतो. खरे तर राग ना लष्करावर आहे ना सरकारवर ( ना यापुर्वीच्या सरकारांवर होता). कधी कधी वाटते की सरकारचे हात आंतरराष्ट्रीय नियमांमुळे बांधलेले आहेत, लष्कराचे हात सरकारने बांधले आहेत. म्हणजे तुर्तास चरफडण्याव्यतीरीक्त उघडपणे काहीच करता येऊ शकत नाही. मग शिवसेना आणि मनसे ला नावे ठेवण्यात काय हशील आहे ? कमीत कमी त्यांना जे करणे शक्य आहे ते म्हणजे पाकीस्तानी कलाकारांना लक्ष्य करणे जे ते नेहमीच करतात. इझी टार्गेट तर इझी टार्गेट. जर हार्ड टार्गेट अचीव्ह नाही होत तर इझी ही सही. असो. प्रतिसाद फारच विस्कळीत आहे पण तो मनातील विमनस्कपणामुळे आहे असे समजुन माफ करा. अवांतर : माझ्याकडे बंगला नाही, डॉबरमन कुत्राही नाही. :) टीप : तुमचा मुद्दा कळलेला आहे पण या मनस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी केलेला क्षीण विनोद समजुन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा.

मदनबाण Fri, 09/23/2016 - 22:24
मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. हवा तेव्हढा वेळ घ्या... पण या पिसाळलेल्या कुत्र्याला कायमचा ठार करा ! आता संयम ठेवणे कठीण झाले आहे. अजुन किती स्त्रिया विधवा होतील ? अजुन किती मुलं आपले वडिल गमावतील ? अजुन किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना गमवावे ? बस्स झाले आता, सहन करण्यापलिकडे झाले आहे... आपल्या देशाचे रक्त पिणारा हा देश जगाच्या नकाशावरुनच नष्ट व्हावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.”Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Rifles

धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 22:59
च्यामारी, युद्ध करायचे तर भारताचेच नुकसान होणार, जागतिक स्तरावर नालस्ती होणार, इतर देश भारताशी संबंध तोडणार, सिंधू नदीचा करार तोडायचे तरी भारतातच पुर येणार, शहरे बुडणार , चीन नाराज होणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर पाकीस्तान अजुनच आक्रमक हल्ले करणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर चीन भारताला मिळणारे सतलज आणि ब्रह्मपुत्रा चे पाणी तोडू शकतो. काय चाललेय हे ? एकही शक्यता भारताच्या आवाक्यातली नाहीये ? म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय आयुष्यभर पर्याय नाही तर ??

In reply to by धर्मराजमुटके

अमितदादा Fri, 09/23/2016 - 23:33
अस नहिये. भारत सुधा बर्याच प्रमाणात गुप्त कारवाया पाकिस्तान मध्ये करत असतो. बलुचिस्तान आणि कराची मधील असंतोषास भारतास जबाबदार मानल जात. RAW आणि NDS यांची युती आहे असे बोलल जात, अफगानिस्तान मध्ये भारताची १ embassy आणि ४ consulate आहेत, हे कशासाठी असावेत याचा अंदाज आपण बाळगू शकता. मध्यंतरी UPA सरकारच्या काळात भारतीय सैनिकाच मुंडक कापून विटंबना करण्यात आलेली त्याची मोठी चर्चा झालेली, परंतु नंतर भारतीय लष्कराने त्याचा बदला घेतला होता ज्याची चर्चा झाली नवती. (त्यावेळचे लष्कर प्रमुख बिक्रम सिंघ याचं statement गूगल करावे). तसेच काश्मीर मध्ये खूप वर्षापूर्वी शिखांच हत्याकांड केल होत त्याचाही भारताने बदला घेतला होता (याची लिंक आता सापडत नाही). अश्या अनेक घटनांचे बदले घेतले गेलेत तरीही पाकिस्तानची शेपटी वाकडी आहे. तसेच पाकिस्तानच्या ISI ने नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात मोठ network उभारलं होत ते भारतान मोढून काडलं. (नेपाल राजकारणी आणि ISI agent मिर्झा बेग बद्दल वाचा). भारताने पाकिस्तान ला अंतराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी isolate केल आहे, याचा direct नसला तरी indirect भरपूर परिणाम होतो. काश्मीर प्रश्नावरून भारत मध्यंतरी backfoot गेलेला मात्र आता पाकिस्तान कोंडीत सापडलेला दिसतो. सिंधू नदीचे पाणी पिकांच्या season कमी जास्त करून भारत पाकिस्तान च्या अर्थव्यवस्थेच मोठ नुकसान करू शकतो. एवड करून सुद्धा पाकिस्तान ला अक्कल येत नाही कारण आपल कितीही नुकसान झाल तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे अशी त्यांची strategy आहे\ आपली तशी धोरणे नाहीत कारण आपल्याला आपले उज्ज्वल भविष्य महत्वाचे आहे. आणि काश्मीर हि भारताची दुखरी नस असल्याने भारतास खूप काही direct करता येत नाही. असो भविष्यात परस्थिती बदलेल, येणारी तसेच सध्याचे सरकार योग्य धोरण राबवतील अशी आशा करू कारण भारतीय आता अश्या हल्याना कंटाळलेत हे सरकार ला कळले आहे.

In reply to by अमितदादा

अमितदादा Sat, 09/24/2016 - 00:16
वरील प्रतिक्रियेस support करणारे काही दुवे १. Both active and effective: A short history of Indian Special Ops हि बातमी मस्त आहे. कप्तान सौरभ कालिया यांच्या मृत्यूचा सुधा बदला घेतला होता. २.Army takes revenge, kills top Pakistani ultra on LoC ३. Dawood's Man In Nepal हि बातमी जुनी आहे नंतर तो मारला गेला.

थॉर माणूस Fri, 09/23/2016 - 23:53
यात सगळ्यात जास्त वात आणलाय न्यूज चॅनल्सनी. उन्मादी वातावरण तयार करायची सुपारी घेतल्यासारखे वागतायत हे लोक. गेल्या 3-4 दिवसातल्या काही बातम्या तर खोट्या आहेत की काय अशी शंका येण्यासारख्या होत्या.

In reply to by संदीप डांगे

थॉर माणूस Sat, 09/24/2016 - 01:01
अगदी खरं आहे... ते times now वगैरे पाहिल्यावर तर आत्ता पंतप्रधान इस्लामाबाद वर तिरंगा फडकवणार किंवा पाकिस्तान आपल्यावरच अणूबाॅब टाकणार असं वाटतं. :)

सचु कुळकर्णी Sat, 09/24/2016 - 20:16
aadatan tum ne kar diye waade aadatan ham ne aitbaar kiyaa बुंद से गयी वो हौद से नहि आती....जोशपूर्ण भाषण निवडणुकीपर्यंत ठीक असतात. एक सामान्य भारतीय नागरीक म्हणुन मला पहिले बदला हवाय..बकर करने के लीये ३ साल और है.

गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/29/2016 - 12:55
काही वेळापूर्वी आपल्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक्स' केले आहेत असे जाहिर केले आहे.http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/ या हरामखोर पाकड्यांविरूध्द अशी कडक कारवाई करून ते शेवटपर्यंत निभावायची तयारी आपण दाखवलीच पाहिजे. मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे त्यामागे ही तयारी नक्कीच असेल असा विश्वास मोदी आणि अजित डोवालविषयी नक्कीच आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मदनबाण गुरुवार, 09/29/2016 - 13:48
आपल्या सैन्य दलाचे आणि सरकारचे अभिनंदन ! पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी ! भारत माता की जय ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

In reply to by मोदक

नाखु गुरुवार, 09/29/2016 - 16:29
अर्थात पण ही गेम सुमडीतच करावी असे माझे मत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 15:15
सैन्यदलाचे अन सरकारचे हार्दीक अभिनंदन.
पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी !
अगदी अगदी.
ही बातमी. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय.

ताज्या घडामोडी - १

श्रीगुरुजी ·

श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2016 - 20:37
धाग्याची सुरुवात खालील बातमीने करीत आहे. उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेश मध्ये जानेवारी-फेब्रुवारी २०१७ या महिन्यात विधानसभेची निवडणुक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजिस्ट म्हणून नेमणुक केली आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास काँगेसला मोठा फायदा होईल असे त्यांनी सुचविले आहे. परंतु काँग्रेस अजूनही राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास उत्सुक नाही. काँग्रेसने कोणालाही पुढे केले तरी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २०२ जागा मिळणे अशक्य आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष होणे सुद्धा अशक्य आहे. मागील ३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे ४०३ पैकी २५, २२ व २८ इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या. अलिकडच्या काळात २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८० पैकी २० जागा ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्ग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. प्रियांकाचे नाव पुढे करून जर पुन्हा एकदा दारूण पराभव झाला (असेच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे) तर पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाप्रमाणे प्रियांकावर पदार्पणातच अपयशाचा शिक्का बसेल. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल गांधींनी आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या. अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात प्रियांकाने जोरदार प्रचार करूनसुद्धा कॉंग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रियांकाचे नाव पुढे केले तरी काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणूनच बळीचा बकरा या न्यायाने काँग्रेसने शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे ठरविले आहे. शीला दिक्षित ब्राह्मण असल्याने उ.प्र. मधील १०% अधिक असलेली ब्राह्मण मते आपल्याकडे वळतील असा काँग्रेसचा भोळा आशावाद आहे. अर्थात शीला दिक्षित केवळ लग्नानंतर ब्राह्मण झाल्या आहेत. लग्नापूर्वी त्या खत्री समाजातल्या होत्या हे आता माध्यमातून येईलच. त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे डागळलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे करूनही फार फायदा होणार नाही. जर काँग्रेसची परिस्थिती सुधारली तर श्रेय प्रियांकाच्या प्रचाराला व जर काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला तर दोष शीला दिक्षितांच्या माथी असेच काँग्रेसचे धोरण असणार आहे.

वटवट गुरुवार, 07/14/2016 - 20:44
विनाशकाले विपरीतबुद्धी.. दुसरं काय?.... स्वतःच्या हाताने स्वतःच्या सरणाची व्यवस्था लावणे हा काँग्रेसचा पण दिसत आहे अशात...

बोका-ए-आझम गुरुवार, 07/14/2016 - 21:05
काँग्रेसने ब्राम्हण उमेदवार देणार ही अटकळ बरोबर ठरवलेली आहे. शीला दीक्षित यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे असं मला वाटतंय. हा काँग्रेसचा नकारात्मक पवित्रा आहे पण एका म्हणीनुसार ' नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं काँग्रेसचं धोरण आहे, विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून. गुरुजी - शीला दीक्षित या माहेरहून खत्री समाजाच्या आहेत याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींच्या जन्माने विदेशी असण्याचा मुद्दा कोणालाही फायदेशीर ठरला नव्हता. उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ब्राम्हण बहू हा काँग्रेसचा मुद्दा असेल असे वाटते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2016 - 21:16
सपचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती आणि आता काँग्रेसच्या शीला दिक्षित. फक्त भाजपने अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल असे वाटत नाही कारण भाजपकडे मायावती व अखिलेश यांच्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर तगडा असेल तरच आधी त्याचे नाव जाहीर करून फायदा असतो. अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त.

खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 07/14/2016 - 21:40
"अरूणाचल मध्ये काँग्रेस सरकार बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य" --------सुप्रिम कोर्ट _____________________________________ अखलाक च्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!!! प्राण्यांमध्ये भेदभाव नकोच,गायीचे मांस बाळगले म्हणून लोकांनी मारले. मुळात कोणत्याच प्राण्याचे मांस खाऊ नये. आणि आता त्याच्या कुटूंबियांना छळत आहेत.

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत Fri, 07/15/2016 - 17:49
उत्तर प्रदेशात गौवध बंदी कायदा आहे. त्यानुसार कार्रवाई होणारच. बाकी तिथे कुणी मारायला गेले नव्हते, कुणाही जवळ तलवारी किंवा कट्टे इत्यादी नव्हते. तो जर मेला नसता तर गौ. हत्याची FIR तेंव्हाच दायर झाली असती.

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई Fri, 07/15/2016 - 18:08
तलवार कट्टा न घेता जाणे हे निर्दोषत्वाचे लक्षण का ? वा वा ! फोरेन्सिकच्या बुकात ३०२ व ३०४ आय पी सी पुन्हा पहावा लागेल.

सत्याचे प्रयोग गुरुवार, 07/14/2016 - 22:51
काळ्या पैसा शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी ) तीन लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे . शिवाय, एखाद्या व्यक्तीकडे 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवण्यास मनाई करण्याचीही शिफारस केली आहे .

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील डे परेड पाहायला आलेल्या गर्दीवर ट्रक चढवून एक दहशतवादी हल्ला झाला आहे, ट्रक मध्ये ग्रेनेड आणि इतर स्वयंचलित हत्यारे सापडली आहेत, राष्ट्राध्यक्ष फ्रांझवा ओलांद ह्यांनी इमर्जन्सी अजून पुढे पर्यंत सुरु ठेवायचे सूतोवाच केले आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सदर हल्ल्यात ८० निष्पाप लोकांनी प्राण गमावले असून इतर १०० लोकं जखमी झाल्याचे वृत्त कळते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पद्मावति Sat, 07/16/2016 - 20:42
बळी पडलेल्या लोकांमधे लहान मुलांचा समावेश बराच होता. बिचारे मुलं fire works बघायला आली असतील:( या अतिरेक्यांचा पापाचा घडा आहे का अक्षय पात्र काही कळेना ....भरतच नाहीये:(

हुप्प्या Fri, 07/15/2016 - 10:35
ह्या भीषण प्रसंग घडल्यावर लोकसत्तामधे अशी बातमी होती की फ्रान्समधे ट्रक अपघातात ७६ ठार! (आता ती काढून टाकली आहे) ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल.

In reply to by हुप्प्या

मुक्त विहारि Fri, 07/15/2016 - 17:56
....हे भयंकर घडले असेल." छे हो. उलट ती लोकच ट्र्कच्या मार्गा-मध्ये आली असतील.

बोलबोलेरो Fri, 07/15/2016 - 11:55
"ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल." उत्तम उपहास! हहपुवा. फ्रान्सच्या निसमधील हत्याकांडाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली! परंतु यातून युरोप काही शिकणार का? की परत एखादा "अयलान कुर्दी" झाल्यानंतर भावनिक अविचार करायला प्रवृत्त होणार? दुवा http://qz.com/554555/france-has-doubled-down-on-its-promise-to-syrian-refugees-after-the-paris-attacks/

शिद Fri, 07/15/2016 - 16:23
a शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

In reply to by शिद

चंपाबाई Fri, 07/15/2016 - 20:55
कलियुग सुरु होण्यापुर्बी कलिने जनमेजयाकडे आश्रयाची याचना केली होती. त्याने कलिला सोन्यात रहायला सांगितले होते. अंगभर सोने घालुन राजकारण करताना अपमृत्यू झाल्याचे हे दुसरे उदाहरण. ... इति श्री हिंदु पुराणम.

विवेकपटाईत Fri, 07/15/2016 - 17:56

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/15/2016 - 23:16
This is the second reduction in rates this month. Petrol price was cut by 89 paise a litre and diesel by 49 paise on July 1. Petrol price was on Friday cut by Rs. 2.25 a litre and diesel by 42 paise a litre, the second reduction in rates this month on global cues.

In reply to by भंकस बाबा

खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला कधी स्वधर्माची चिकित्सा करताना पाहिलं नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा Sun, 07/17/2016 - 10:26
टक्केवारी द्या ना स्वधर्माची चिकिस्या करायला, आपण नक्की करु, कशाला मी आमच्या घरात पितृपक्ष, नागपंचमी अशा प्रथा हट्टाने बंद केल्या आहेत. देवळात जाणे बंद केले आहे, आता तुम्ही एक मशिद दाखवा की ज्यात भोंगे वाजत नाहीत, मंदिरे मी दाखवायला तयार आहे. हां सर्वधर्मसम्भाव सोडा, हिन्दुमधील पुष्कळानी कट्टरवाद सोडला आहे. मुस्लिमानी सोडला असला तरि जाहिर करण्याचे धाडस फार् कमी लोकांनी केले आहे. रच्याकने झाक्याचे प्रवचन फ़ॉर द चेंज कॉमेडी शो म्हणुन बघायला हरकत नाही

In reply to by भंकस बाबा

चेक आणि मेट Sun, 07/17/2016 - 18:19
खरं आहे, मुस्लिम धर्मात कट्टरतावाद अधिक आहे, ते कधीही धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत,त्यामानाने हिंदू आणि ख्रिश्चनांच्यात नास्तिकता जास्त आहे.देवाविरूद्ध बोलणे हाच जगन्य अपराध आहे असे मानतात ते.

In reply to by भंकस बाबा

चंपाबाई Sun, 07/17/2016 - 19:32
एकदा दत्तगुरु मॉर्निंग वॉकला चालले होते... समोरुन एक मिरवणुक वाद्ये वाजवत जात होती.. पण रस्त्याच्या कडेला बसलेला एक चांभार एकाग्रतेने त्याचे काम करत होता. त्याला तो कोलाहल ऐकु येत नव्हता. दत्तगुरुनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. तात्पर्य : हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा असुनही मशिदीचे भोंगे ऐकू येत असतील तर आपली एकाग्रता कमी पडत आहे... कृप्या एकाग्रता व श्रद्धा वाढवावी. होमवर्क : दत्ताने केलेले इतर २३ गुरु कोणते ?

In reply to by चंपाबाई

भंकस बाबा Sun, 07/17/2016 - 20:27
एकाग्रतेने मशिदिचा भोंगा वाजत असताना अभ्यास कसा करावा हे शिकवा, आमच्या घरातील आबालवृद्धाना सकाळी पाच वाजता भोंगा वाजल्यावर साखरझोप न मोड़ता स्थितप्रज्ञ रहायला शिकवा,

In reply to by भंकस बाबा

भोंगा किती वेळ वाजतो ओ. सकाळी दोन मिनटं,आणि पाच वाजता दोन मिनटं! झालं कि, पारायणे आठवडाभर चालतात भोंगे लावून ते चालतं का?? आणि किती पारायणे/कार्यक्रम होतात,,,तुकाराम बीज,रामनवमी,गणेश चतुर्थी,रामदास नवमी,एकादशी,संकष्टी,षष्ठी,हनुमान जयंती,काकड आरती,फाकड आरती,गोंधळ,शिमगा,धुळवड,रंगपंचमी,म्हसोबा,खंडोबा, ज्योतिबा,मरगूबाई,यल्लमा,इइइइइ आणि शिमग्याला तर किती ते ध्वनीप्रदूषण?? कोणी मेलं नसलं तरीही ठ्ठो ठ्ठो ?? कशाला फुक्कटचा पुरोगामित्वाचा आव आणताय?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा Mon, 07/18/2016 - 01:51
अहो आजकाल मदरशावर देखिल भोंगे लावुन लाखो सलाम घातले जातात, ते पण सकाळच्या पारी, तुम्ही फारच त्रासलेले दिसताय, कानाजवळ एक भोंगा ठेऊन वाजवा , बहिरेपणा आला की सगळे त्रास दूर होतील, बायको बड़बडु देत की सासरा बोम्ब ठोकु दे

viraj thale Sat, 07/16/2016 - 08:42
काश्मीरमध्ये चकमकित मारला गेलेला आतंकवादी बुरहान वाणी पकिस्तान कडून हुतात्मा म्हणून घोषित .

बोका-ए-आझम Sat, 07/16/2016 - 08:55
NEET च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देताना राज्यांना त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घ्यायला परवानगी दिली. ९ मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने NEET ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा असेल असं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. २४ मे या दिवशी केंद्र शासनाने एक वटहुकूम काढून राज्यांनाही त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घेण्याची परवानगी दिली. काही राज्यांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षा ९ मेच्या आधीच घेतलेल्या असल्यामुळे हा इतर राज्यांवर अन्याय होईल अशी भूमिका केंद्राने घेतली. केंद्र सरकारच्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक आदेश (stay) आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला. आणि आता त्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यांचा स्वतःच्या परीक्षा असण्याचा मार्ग सुकर केलेला आहे.

श्रीगुरुजी Sat, 07/16/2016 - 11:27
नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल तुरुंगाबाहेर
देशद्रोहाच्या आरोपाखाली ९ महिने तुरूंगात राहून जामीनावर सुटल्यानंतरसुद्धा अजूनही हार्दिकची खुमखुमी कायम आहे. त्याला ६ महिने गुजरातबाहेर रहावे लागणार आहे. देशद्रोहाचा आरोप अजूनही कायम आहे. द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का? _________________________________________________________________________________ पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला. पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले. हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/hardik-patel-released-from-jail-1268273/

In reply to by श्रीगुरुजी

द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का?
ऑ तसं तर काहींनी मंत्री होण्याचा पण नैतिक अधिकार नाही.आणि मंत्रीपद देण्याचा पण.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/16/2016 - 21:19
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/16/2016 - 22:02
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

श्रीगुरुजी Sat, 07/16/2016 - 15:08
पाकिस्तानची पूनम पांडे http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4615728673501636712&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160716&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sun, 07/17/2016 - 00:27
कंदील बलोच च्या मर्डर नंतर युट्युबवर प्रतिक्रिया भारी आहेत. . नाव मात्र भारिय राव. कंदील, आहाहाहा

संदीप डांगे Sun, 07/17/2016 - 00:19
मोदी सरकारने तूर डाळ उत्पादनाचा मेक इन आफ्रिका कार्यक्रम सुरु केलाय म्हणे! कांदाप्रश्नाबद्दल शेतकरी आधीच भाजप सरकारवर उखडलाय. त्यात आणि हे.... https://furtherafrica.com/2016/06/27/india-hopeful-of-long-term-tur-dal-supply-from-mozambique/

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 07/17/2016 - 14:42
जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. Under pressure to control pulses prices, the Centre is hopeful of clinching a long-term deal with Mozambique for assured supply of lentils after the two countries had positive talks last week. Indian delegations last week visited pulses growing nations, Mozambique and Myanmar, to explore government-to- government arrangement for assured supply of lentils, especially tur, on a long term basis. तूर व इतर डाळीचे देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. खात्रीशीर आयातीसाठी आफ्रिकेतील देशांशी करार करणे हे एक चांगले पाऊल आहे. त्यावर टीका करण्यासारखे काय आहे? काही जणांना मोदी सरकारचे मीठ कायमच अळणी लागते. त्यात मीठाचा दोष आहे का खाणार्‍याच्या जीभेचा दोष आहे?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sun, 07/17/2016 - 18:14
काँग्रेसच्या काळातही डाळ आयात करुन दर १०० रु होता... आता अचानक २०० व्हायला आणि अजुन आयात करायला आणखी काय कारण घडले?

In reply to by चंपाबाई

विकास Wed, 08/31/2016 - 21:31
तूरडाळीच्या दरघसरणीस सुरुवात या बातमीतील खालील भाग (त्यातही बोल्ड केलेला भाग) वाचण्यासारखा आहे... जाणकारांनी प्रकाश टाकावा! ;)
केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे डाळीची मुबलक उपलब्धता आहे.
असो.

In reply to by विकास

संदीप डांगे Wed, 08/31/2016 - 23:12
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय, डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही, दालप्रकरण काही अजरामर राहणार नव्हते, आता पुढची कमोडिटी कोणती ते बघणे आले,

In reply to by संदीप डांगे

विकास गुरुवार, 09/01/2016 - 01:27
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय अगदी मनातलं बोललात, युपिएच्या दहा वर्षांमधे जे काही नुकसान होयचे होते ते झाले हे खरेच आहे! डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही ह्या सरकारने डॅमेज कंट्रोल केलेला नसून आत्तापर्यंत जी काही, काहीजणांसाठींची (पक्षी: व्यापार्‍यांच्या स्वार्थासाठी) व्यवस्था होती, तीलाच शह देत त्यात बदल घडवून आणला. आता त्याचे परीणाम लगेच दिसत नव्हते हे देखील खरेच. पण नुसताच डॅमेज कंट्रोल करायचा असता तर काही तरी तात्पुरती पलमपट्टी लावली असती, दोन चार व्यापार्‍यांना - मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे काहीसे करून मोकळे झाले असते. असो.

In reply to by संदीप डांगे

मोदक गुरुवार, 09/01/2016 - 14:16
कांही लोकांबद्दल सार्वकालीक असेल.. काही लोकांसाठी मोदींचे फॅसीस्ट आणि हुकूमशाही सरकार पडून प्रतिभावान आणि समंजस राहुलचंद्ररावजी गांधींचे काँग्रेस रामराज्य येईपर्यंत असेल.. कांही लोकांसाठी आजादी येईपर्यंत असेल...

In reply to by मोदक

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/01/2016 - 14:23
सर्वलोकांसाठी सार्वकालिक असणे अन हे सत्य समजणे ह्यातच माझेतरी भारतीयत्व वसते :) जय हिंद :)

In reply to by विकास

श्रीगुरुजी गुरुवार, 09/01/2016 - 14:21
डाळीचे भाव वाढले होते तेव्हा प्रॉब्लेम होता आणि काही जण सरकारला नावे ठेवीत होते. आणि आता भाव घसरले आहेत तेव्हाही प्रॉब्लेम आहेच आणि आताही सरकारला नावे ठेवणे सुरूच आहे.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी गुरुवार, 09/01/2016 - 14:33
जानेवारी-फेब्रुवारी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तरांचल व पंजाब राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. याच काळात महाराष्ट्रातील १० महानगरपालिकेची निवडणुक आहे. त्यामुळे निधर्मांधांचे पुरस्कार परतीचे दुसरे सत्र डिसेंबर २०१६/जानेवारी २०१७ या कालखंडात सुरू होईल व मतदानाच्या शेवटच्या दिवशी ते थांबून परत नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये तिसरे सत्र सुरू होईल. .

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 07/17/2016 - 21:05
जंप कसली? तुम्ही दिलेल्या बातमीच्या आधारेच मी प्रतिसाद लिहिलाय. त्यातलेच काही परिच्छेद मी दिलेत. स्वतःच्या मनाचे त्यात काहीही टाकलेले नाही.

In reply to by संदीप डांगे

जेपी Mon, 07/18/2016 - 20:44
काय डांगे साब, कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by जेपी

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 22:23
काय जेपी भौ..? कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुम्हीच सांगा. तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. टोमणा आहे असं दिसतंय. असो. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी. तुम्ही तुमचे मत कसे बनवता याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाही.

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 00:42
श्रीगुरुजी. थोडं थांबा म्हणलो होतो. अधिकचे बोललात, आता पंचाईत होईल बघा. प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती. दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का? मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट! १. दुवा क्रमांक एकः India and Mozambique on Thursday signed an agreement where New Delhi will buy pulses from the southern African nation. The agreement, one of the three, was signed in Maputo. Prime Minister Narendra Modi, currently on a four-nation Africa visit, said: "India's commitment to buy pulses from Mozambique would help meet India's requirement. It will also facilitate long-term investments in commercial farming, generation of farm employment and raise farmers' incomes in this country (Mozambique)," he said. According to the agreement, India will encourage greater production of pulses in Mozambique with an assurance that it will be purchased by India at a mutually-agreed price. While India generally has a shortfall of pulses leading to price rise, Mozambique grows the commodity without much consumption locally, officials said, adding the agreement will be a "win-win" for the two countries. Last month, the Union Cabinet cleared a proposal to enter into an agreement with Mozambique for importing 100,000 tonnes of pulses in 2016-17 with an option to scale it up to 200,000 tonnes by 2020-2021. The agreement will promote production of pigeon peas or tur in Mozambique. These would be imported either through private channels or through nominated state agencies, an official statement issued after the Cabinet meeting said. २. दुवा क्रमांक दोन प्रस्तुत दुवा मुळातून वाचावा. दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे? (रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव Mon, 07/18/2016 - 11:36
पण अफ्रिकन देशांत ऊस आणि इतर नगदी पिकं हमी भावात मिळवण्याची कॉर्पोरेट लेव्हल शेती करावी हि योजना बारामतीकर काकांची. कदाचीत त्यांनीही कुठुन तरी उचलली असेल, कोण जाणे. इथेनॉल व तत्सम जैवइंधनाची सोय म्हणुन मोठ्या पेट्रोलियम कंपन्या अगोदरच अफ्रिकन देशांवर डोळा ठेऊन आहेत. चीन ने देखील अफ्रीकन देशांत मुसंडी मारली आहे. भारताने याअगोदर बहुतेक कांगो वगैरे देशांशी असले करार करायचे प्रयत्न केले होते. थोडक्यात काय, कि अफ्रिकन देशांशी हमी भावातली शेती हि केवळ आपली भोजनाची सोय नसुन त्यामागे बरेच आंतरराष्ट्रीय आराखडे आहेत.
(रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)
तसं वाटणं सहाजीक आहे. पवारांसारखा कृषीमंत्री मिळणं अवघड आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 18:39
प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का?
अहो, तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये तेच लिहिलेले आहे. मी स्वतःच्या मनाचे काहीही लिहिलेले नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये जे आहे तेच मी फक्त मराठीत लिहिले आहे.
मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट!
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड! आता दुसर्‍या लिंकबद्दल . . .
दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे?
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 19:20
१.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. आता मी दिलेल्या बातमीत आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही असे कुठे लिहिले आहे ते दाखवाल काय? तसेच मोझाम्बिक जर आफ्रिकेतच आहे तर 'आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही' असे तुम्ही का म्हणालात? २.
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड!
कसंय गुरुजी, मला तूरडाळीवर मोठाच प्रतिसाद लिहायचा होता. पण रात्रीचे साडेबारा वाजल्याने व दुसर्‍या दिवशी पहाटेच घराबाहेर पडावे लागत असल्याने हा अर्धवट लिहून टाकला. लिन्क्स चेक करुन वाचून अभ्यासून नीट टाकाव्या ह्या मताचा मी असल्याने उर्वरित काम उद्या करु असे ठरवून सोडून दिले. तसेच आजकाल मी खेड्यापाड्यांमधे फिरत असल्याने इंटरनेट मिळत नाही. मिळाले तरी फोनवरुन जुजबी चेक करतो, तेही वेळ असल्यास. थेट संध्याकाळीच लॅपटॉप व ब्रॉडबॅण्ड मिळत असल्याने दिर्घ प्रतिसाद संध्याकाळनंतरच देता येतात. त्यामुळे चौदा काय चोविसतासांनी जरी लिंक आली असती तरी काही फरक पडावयास नको किंवा प्रतिसाद अर्धवट असला तरी बोंबाबोंब व्हावयास नको. कारण बातमी काही माझ्या घरातली नाही. तूरडाळीच्या आफ्रिका-भारत करारावर चिक्कार लिन्का पडलेल्या आहेत. मी दिली नाही ह्याचा अर्थ तुम्हीही अभ्यास केला नाही असे दिसते. तुम्हाला 'वेट वेट' म्हणालो ते मोबाईलवरुन टायपले होते. तुमच्या उतावळेपणाने तुम्हीच अडकलात, वरुन अमुक तासांत लिन्का आल्या नाहीत चा फुकाचा कांगावा करत आहात. ह्याला काय म्हणावे बरे? मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल. ३.
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता. हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.

In reply to by संदीप डांगे

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 19:42
आज जी तूर खातो ती गेल्या वर्षी पिकलेली असते... मग अचानक पाउस कमी / जास्त झाला म्हणुन यावर्षीची तूर का महाग होते ? आयत्या वेळेची क्याजुअल्टी म्हणुन डाळ आयात करणे व दुसर्‍या देशाला आर्थिक मदत आधीच देउन तिथे तूर पिकवणे हे दोन्ही भिन्न आहेत व हे म्हणजे घरातलं नागडं व शेजारणीला लुगडं असा प्रकार आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Mon, 07/18/2016 - 19:48
राजकारण राजकारण्यांसाठी सोडून द्या. प्रत्यक्ष भारतात डाळींचे उत्पादन होणे आणि डाळींची टंचाई दूर होण्याला काही काळ जावा लागेल आफ्रिकेत( मोझाम्बिक) किंवा म्यानमारमध्ये मनुष्यबळ बरंच स्वस्त आहे आणि तेथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे तेथून डाळ उत्पादन करून आयात करणे हे आपले उत्पादन वाढेपर्यंत नक्कीच आवश्यक आहे. उगीच आयात केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल हे अरण्यरुदन आहे आणि विरोधी पक्ष ते राजकीय फायद्यासाठी करणारच. मुळात आपले डाळींचे उत्पादन हे लोकसंख्या वाढीप्रमाणे वाढलेलेच नाही. त्याशिवाय पोषणासाठी अतिरिक्त लागणारी डाळ कुठून आणणार हा अधिकच प्रश्न आहे. खालील दुवा वाचून पाहावा. The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries. India, being the largest producer as well as consumer of pulses, thus needs to tap the domestic potential of raising the production. The productivity of pulses in the country is very low because of several reasons. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. India has reached a stage where cereals will continue to be important to sustain the present level of nutrition. However, the reduction in hunger and the improvement in nutrition require more of pulses. Going forward, the future production targets should involve much higher growth in pulses than in cereals. http://www.thehindu.com/opinion/op-ed/consumption-of-pulses-and-nutrition/article8816406.ece

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Mon, 07/18/2016 - 20:04
हा लेख नीती आयोगाच्या( नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेला) तज्ज्ञांनी लिहिलेला आहे आणि या लोकांचा राजकारणाचा आज तरी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 20:08
The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries.
वरील परीच्छेदात परिस्थितीचे योग्य ते वर्णन आहे. त्यामुळेच मोझांबिक, म्यानमार इ. देशांबरोबर जी कराराची बोलणी सुरू आहेत ते एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 20:18
डॉक्टरसाहेब. प्रस्तुत दुवा मी आधीच वाचलेला, आता तुम्ही दिलाच आहे तर ह्यातलीही गंमत सांगतो. जर भारताने ४६ देशांमधे फिरुनही पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत तर काय करावे? दुव्यातच म्हटले आहे की आपलेच उत्पादन वाढवा. ओके? पण आपल्याकडे उत्पादन वाढवण्याच्या मर्यादा आहेत असेही म्हटले आहे. ह्या मर्यादा कोणत्या? १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. का झाल्या नाहीत आजवर? किंवा आता होऊ शकत नाहीत असेही नाही. नवीन जाती शोधायला किमान पाच ते सहा वर्षे जातात. चला मान्य करु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग जगातून दुसरीकडून आणून आपल्या भूमीत सुधारित जाती लावू शकतोच की. ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल. २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. डाळीस योग्य असे वातावरण ह्या विस्तीर्ण भारतात मिळूच नये हे अशक्य आहे. प्रश्न निर्माण झाला तो पारंपरिक डाळ-उत्पादक पट्ट्याचा. तिथे पाणी नसेल तर पाणी उपलब्ध करा. जिथे पाणी आहे तिथे डाळ घ्या. आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना. ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. वातावरणीय बदल व बुरशी-किडीला दाद देणार्‍या नवीन जाती शोधून काढणे हा उपाय आहे. बुरशी किडी ह्या अगदी काटेकोरपणे वनस्पती-केंद्रीत नसतात. ९० टक्के रोग जवळपास सारखेच असतात. मुख्य मुद्दा आहे तो डाळीच्या पिकावर शेतकर्‍याने खर्च किती करावा कारण खर्चाला साजेसे भाव नसतील तर कोण कशाला औषधांचा खर्च करेल. आज इथे जुन्नरात वीस किलो टोमॅटोला हजार बाराशे भाव मिळतोय तर शेतकरी औषधे किती महाग आहेत ह्याचा अजिबात विचार करत नाही आहे. दोनशे रुपये सोडा अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार? ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे. ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे? प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे. ॑.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव Tue, 07/19/2016 - 07:00
१) ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल.
सगळी ट्रायल-बॅलन्स टोटल लाऊन सुधारीत बियाणं पुरेशा प्रमाणात वाटायला किमान ३ वर्षे लागतील. त्यातला सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे कुठल्या पिकाच्या खिशातुन डाळींचे भाव वधारायचे. अजुनपर्यंत डाळी आणि तेलबियांच्याबाबतीत आपण सतत भिजतं घोंगडं ठेवलय. आणल्या डाळीच्या बिया वाटल्या फुकट शेतकर्‍यांना इतकं सहज नसावं ते काम.
२) आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना.
अफ्रिका किंवा अन्य गरीब देशांत शेतकी विषयांत पैसा गुंतवायचे एक कारण म्हणजे यात बड्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या सोयी-सुवीधांचं पाठबळ असतं. गरीब देशांत शेती-उद्योगधंद्यांना प्रोत्साहन म्हणुन बरेच प्रोग्राम राबवले जातात व ते गॅरेण्टर म्हणुन काम करतात. काहि कारणाने उद्या आपल्या शेतकर्‍यांनी डाळींचं उत्पादन म्हणावं तेव्हढं नाहि घेतलं तर सरकारचा पैसा बुडाला. अफ्रिकेतुन आयातीची हमी आणि नुकसान भरपायीची देखील.
३) अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार?
थेरॉटीकली हे खरं आहे. शेती उत्पादनाचा खर्च आणि उपभोक्त्याला मोजायला लागणारे दाम याचं अजव गणीत आहे. पण एक नक्की, कि या समीकरणातुन डाळी अशा वेगळ्या काढता येणार नाहित. हे गणीत सामायीक पद्धतीनेच सोडवायला लागेल.
४) हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे.
भारत सरकारने हे करावच. केवळ डाळींच्या बाबतीत नव्हे तर अगदी सरप्लस होणार्‍या उत्पादनात देखील. सगळी अंडी एकाच बास्केटमधे ठेऊ नये म्हणतात ना, त्यातला प्रकार. अर्थात, आपल्या लोकांच्या हातातोंडाची काळजी घेऊनच हे प्रकार करायला लागतील.
ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे?
नागरीकांच्या भुकेचा प्रश्न मिटवायचा असेल तर हे काम प्रत्येक राज्यकर्त्याला करावेच लागेल. शेती किफायतशीर बनवायला त्यात गुंतलेलं मनुष्यबळ आणि थ्रोपुट याची योग्य सांगड घालुन अनेक वेगळे मार्ग शोधावे लागतील. या फार मोठ्या सुधारणा आहेत. पण सगळं सुरळीत झालं तरी दुसर्‍या देशांत शेती करुन आपल्या लोकांचं पोट भरायचा मार्ग कधिही बंद होता कामा नये.
प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे.
निश्चीत त्यात व्यापारीवर्गाचं हित आहे. तसं ते प्रत्येक बाबतीत असतच. पण हि पॉलिसी केवळ व्यापारीवर्गाच्या हितासाठी म्हणुन राबवली जात नाहि.

In reply to by संदीप डांगे

हेमन्त वाघे Tue, 07/19/2016 - 09:27
आफ्रिकेत धान्य पिकवणे - आणि ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात - नियोजन करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उप्योयोग करून - ही नवीन गोष्ट नाही ओलाम हे कंपनी याचे ऐक उदाहरण आहे http://olamgroup.com/ आणि ती एक भारतीयाने नायजेरियातून भारतात काजू निर्यात करण्यासाठी स्थापन केली होती https://en.wikipedia.org/wiki/Olam_InternationaL होय नायजेरियातून भारतात काजू निर्यात ! आफ्रिकेत शेती व शेतकरी मागासलेले असल्याने तेथील सरकारे मोठ्या प्रमाण जमिनी उपलब्ध करून अतिमोठ्या प्रमाणात धंदेवाईक शेती ( large scale commercial farming ) करण्यास प्रोत्साहन देतात.. http://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/largescale-commercial-farming-in-africa/article2910459.ece http://africaworks.nl/en/farming-as-a-business मोठ्या प्रमाणात चिनी लोक जमिनी खरेदी करत आहेत http://www.forbes.com/sites/danalexander/2015/07/09/the-biggest-opportunity-in-agriculture-may-be-in-africa-and-china-is-seizing-it/#7f40c2f35c33 पण भारतीय लोक पण यात मागे नाहीत http://www.africa-business.com/features/indians-africa-farmlands.html http://scroll.in/article/729328/one-map-that-shows-indians-are-buying-large-farmlands-abroad-as-we-debate-land-acquisition-at-home शेवटच्या लेखाचे शीर्षकच सांगते - as we debate land acquisition at home भारतात मोठ्या प्रमाणात सलग जमीन उपलबध नाही , शेतमजूर अनेक ठिकाणी काम करीत नाहीत , या व्यवसायात बाहेरच्या लोकांना प्रवेशाचा नाही ( शेतजमीन घायला अनेक राज्यात तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाण पात्र लागते ) त्यामळे मोठ्या प्रमाणात planned शेती ही अतिशय कठीण आहे किंवा ज्वलजल अषयकच आहे . http://web.worldbank.org/WBSITE/EXTERNAL/COUNTRIES/AFRICAEXT/0,,contentMDK:21730621~menuPK:4900969~pagePK:146736~piPK:146830~theSitePK:258644,00.html

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 20:01
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे.
या विधानांचा अर्थ मोझांबिक हे आफ्रिकेत नाही असा होतो का? तुम्हाला इभू मध्ये किती गुण मिळाले याचा इथे काय संदर्भ होता?
मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल.
स्वतःच दिलेली लिंक जरा नीट वाचा हो. मोझांबिकशी केलेला करार, शेतकर्‍यांच्या पोटावर पाय, मध्यमवर्गीय व्यापार्‍यांचा खिसा भरणे इ. गोष्टी कोठून आल्या ते जरा सांगता का?
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता.
ज्या गोष्टीची दरवर्षीच वेगवेगळ्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते त्या गोष्टीच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन उपाययोजना करणे हे एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. हे लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.
मला यातले काही समजत नसेल असे वाटत असेल तर देऊ नका प्रतिसाद.

In reply to by संदीप डांगे

रघुनाथ.केरकर गुरुवार, 09/01/2016 - 13:45
सध्या दक्षीण आफ्रीकेमधला चिनचा वावर बघता, भारताला तेथे हालचाली करणे आवश्यक आहे असे मल वाटते. मोझांबीकचं भौगोलीक महत्व त्याद्रुष्टीने नाकारता येत नाही. जास्त बोलत नाही, समजुन जा.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Tue, 07/19/2016 - 02:02
आणि तीसुद्धा दोन्हीही बाजूंनी. मला स्वतःला या विषयातलं काहीही कळत नाही हे सुरूवातीलाच सांगतो. काही प्रश्न आहेत - १. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. यात काहीही sarcastic किंवा prejudicial नाही. मला शेतीची अजिबात पार्श्वभूमी नाही. त्याच्या अर्थशास्त्रात जरुर रस आहे आणि त्याच अनुषंगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. जर यात काही राजकीय bias आहे असं वाटत असेल तर मी हा पूर्वग्रह आहे असं म्हणेन. मग निदान माहिती असल्याचा आणि सांगण्याचा आव तरी आणू नका अशी माझी प्रतिक्रिया असेल आणि तीही दोन्ही बाजूंना. हा प्रश्न फक्त जिज्ञासा म्हणून विचारलेला आहे. उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

१. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? खाली खरे सरांना दिलेले उत्तर वाचावेत, शंका असल्यास विचाराव्यात, यथामती उत्तरे देईन, माझे काही हुकले असल्यास ते दुरुस्त करेल. २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. होय, हे बरोबरच आहे भाऊ, नाही कोण म्हणू राहिला, फक्त पुरवठा कमी का आहे हा कळीचा मुद्दा आहे, अन तो मुद्दा येऊन जाऊन आपल्या नाखु काकांच्या दलाल अडते समीकरणापाशी जाऊन थांबतो बघा ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??, बरं खरे सरांच्या उत्तरात लिहिल्या प्रमाणे आपल्या देशातल्या इंनोवशनला बासनात गुंडाळून परक्या देशात जमीन घेऊन काम करणे हा सुद्धा शहाणपणा म्हणवत नाही! ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो, तरीही व्यापारी बंधूंचा फायदा होणे हे चूक नाहीच, पण तो फायदा होण्यात समतोल हवा न? म्हणजे गव्हर्नमेंट स्पॉन्सर अनफेर ट्रेड प्रॅक्टिस मधून मिळवलेला फायदा नसावा, शिवाय व्यापाऱ्यांचा असला फायदा आपण जस्टिफाय करत असू तर मग 200/किलोलाच का रडावे? घेऊयात की डाळ 200 ची शेरभर अन म्हणू 200 रुपये असली तरी 'चतुर व्यापारी त्याचा फायदा काढणारच' ;), हे असले हेजिंग जस्टिफाय होणार असेल तर ह्या चर्चेचा कार्यकारणभावच आटोपतो असे वाटते बुआ ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. मी कॉन्स आधी पाहतो, ते मी मांडले आहेत, प्रोज संबंधी सध्या अभ्यास सुरु आहे, जे काही दिसतील ते नक्की मांडेल मी , सकृतदर्शनी तरी हा निर्णय अनफेर अन व्यस्तप्रमाणात व्यापारी हित जपणारा आहे असे मत पडते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम Tue, 07/19/2016 - 11:12
१. मुळात मोझांबिकमध्ये डाळ उत्पादन केलं जाणार आहे याचा अर्थ भारतात ते उत्पादन बंद किंवा कमी केलं जाणार आहे असं नाहीये, बरोबर? २.
दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??,
नक्कीच नाही देता येणार, पण ती subsidized दरांवर सरकार विकू शकतं. ही शक्यता नाकारता येणार नाही, बरोबर? शिवाय तुमच्याच प्रतिसादात म्हटल्यानुसार डाळीला मिळणारी MSP (किमान समर्थन मूल्य) वाढवलेलं आहे. याचा अर्थ समजा या मोझांबिकमधून आलेल्या डाळींमुळे भाव पडले तरीही भारतातल्या शेतकऱ्यांना किमान एक किंमत सरकारकडून मिळणारच आहे. ३. अशी किती डाळ मोझांबिककडून मिळणार आहे भारताला? मोझांबिक हा छोटा देश आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांएवढा असेल फारतर. तिथली सगळी शेतजमीन तर तूरडाळ किंवा इतर डाळींच्या उत्पादनासाठी वापरली जाणार नाही. याचा अर्थ मोझांबिकमधलं डाळींचं उत्पादन हे भारतीय बाजारपेठेत प्रचंड फेरफार करु शकणारं नक्कीच नसावं. ४. मोझांबिकमधल्या शेतकऱ्यांची उत्पादकता भारतीय बाजारपेठेत बदल घडवून आणण्याएवढी आहे का? अमेरिका किंवा युरोपीय देश असते तर मी मान्य केलं असतं. अमेरिकेतील जेमतेम २% लोकसंख्या शेती करत असली तरी त्यांची उत्पादकता (productivity) ही खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथल्या शेतमालाला भारतात विकू दिलं तर इथले भाव कोसळतील आणि इथला शेतकरी भरडला जाईल हे १००% मान्य. पण मोझांबिकच्या शेतकऱ्यांची उत्पादकता एवढी आहे का? ५. या करारात reciprocity असायला हरकत नाही, म्हणजे भारताने मोझांबिक किंवा इतर आफ्रिकन देशांकडून घेतलेल्या शेतमालाच्या मोबदल्यात त्या देशांची बाजारपेठ भारतीय उत्पादकांना मिळेल. अशा वेळी या आफ्रिकन देशांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली (भारतात त्यांचा शेतमाल विकला गेल्यामुळे)तर भारतीय वस्तू विकत घेतल्या जातील आणि त्याचा फायदा भारतातील लोकांना होईल. जशी मागणी वाढेल, तसं उत्पादन वाढेल आणि नोक-याही वाढतील. अर्थात हा फारच long term चा विचार आहे, पण चीन असंच करतोय, विशेषतः झांबियामध्ये आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये. ६.
भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो
Exactly my point बापू. जीवनावश्यक गोष्ट आहे म्हणूनच तर त्याचा व्यापार करणाऱ्या लोकांना फायदा व्हायला हवा, म्हणजे ते तो व्यापार पुढेही करत राहतील. शिवाय तुम्ही फक्त व्यापारी हा एक व्यापक शब्द वापरलात. पण इथे वेगवेगळ्या पातळ्या असतील ना? Stockist - Distributor - Wholesaler - Retailer अशा. तुम्हाला व्यापारी म्हणजे नक्की कुठल्या पातळीवरचा व्यापारी अभिप्रेत आहे?

मितभाषी Mon, 07/18/2016 - 12:24
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगरमधील कर्जतमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. ‘सरकार सुस्त असून मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला वेळ नाही.’ अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जो पर्यंत राजीनामा देत नाही, तो पर्यंत विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवू देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान, कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कुठल्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जत बलात्कार प्रकरणाचा तपास जातीय गतिरोधात अडखळत असल्याची सोशल मीडियावर टीका होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान कर्जत बलात्काराप्रकरणी दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मितभाषी Mon, 07/18/2016 - 12:26
Marathi News > Maharashtra > नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर By: पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर | Last Updated: Saturday, 16 July 2016 4:56 PM Share 17 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी कर्जत परिसरातले नागरिक आक्रमक झाले आहेत. कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत आज कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधला रास्ता रोको 5 तासांनी मागे घेण्यात आला. बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष भवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

(तुम्ही दिलेला रिपोर्ट प्लॅनिंग कमिशनने देणे, ते लोक राजकीय नसणे ह्या दोन्ही सत्य असलेल्या फॅक्टस मुळे त्यांना शेतातले सगळे कळते हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो) १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. साफ चूक, अश्या जाती विकसित होत असतात किंबहुना झाल्या आहेत, पण त्यांच्या विस्तार अन लोकप्रियकरणासाठी आवश्यक सरकारी आस्था पूर्ण गायब आहे, ती फक्त ह्या शासनात आहे असे नाही तर कायम होतीच, बीडीएन-१ हे वाण फक्त आंतरपीक म्हणून लावायला उत्तम असे विकसित केले गेले आहे, मध्यप्रदेश ते महाराष्ट्र वातावरणातील टोकाचे बदल ग्राह्य धरून त्यांच्यात टिकून राहतील अशी एरिया स्पेसिफिक वाणं सुद्धा विकसित आहेत, उदा मरी रोग प्रतिकारक अन खास वैदर्भ वातावरणासाठी विकसित टी-विशाखा १ हे वाण, एकेटी-८८११ हे खास मध्य अन दक्षिण भारतीय वाण, आता अजून एक गंमत सांगतो, ही तर वाणं झाली आधुनिक लॅबोरेटरी अन परिस्थितीत विकसित केलेली, तर ही लिंक सुद्धा जरा बघा , ही लिंक आहे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान उर्फ नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनची, अन ह्या लिंकमधले नायक आहेत वाराणसीचे श्रीयुत जयप्रकाश सिंग, ह्याचा जरूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती, इतकं सगळं असताना जर प्लॅनिंग कमिशन असे म्हणत असेल तर तो त्यांचा सरकारी अनास्था रिपोर्टमध्ये लपवायचा दुर्दैवी प्रयत्न मी का म्हणू नये?? २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. अहो ही डाळ पिकाची (प्रश्नात तूर आहे त्याची) नैसर्गिक मागणी आहे हो, ते एनविरोन्मेण्ट पुअर नसतं तर स्केन्टी रेनफॉल एरिया असतं, मी स्वतः वरकड पाणी न देता तूर आंतरपीक म्हणून ओढली आहे कैक वेळा, हरबरा तर फक्त दवाच्या ओलाव्यावर (फ्रॉस्टिंगवर) येतो रब्बीतला, तेव्हा वातावरण हा इशू नाही तर वरती मी जो मुद्दा सांगितलाय ती खरी ज्ञानबाची मेख आहे असे वाटते, जास्त उत्पादन करणारी वाणं विकसित झाली/होत आहेतच फक्त त्यांचा पुरस्कार सरकार स्वतःच करत नाहीये आधीपासूनच ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. मला वाटतंय हा मुद्दा मी माझ्या पहिल्या उत्तरात कव्हर केलाय, तस्मात पुनरुक्ती टाळतो आहे :) ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. सरकारने बहुतेक मागच्या नोव्हेंबर मध्ये डाळींचे समर्थनमूल्य वाढवले आहे, टू एनकरेज मोर प्रोडक्शन, ही एक अभिनंदनीय बाब आहे, पण मग हे काय मधेच मोजांबीकचं सूरु केलंय ? लिंक स्पष्ट म्हणते की शेती मोझमबीक मध्ये होणार, त्याची गरज काही नाही खरेतर, अगदी कॉर्पोरेट फार्मिंग म्हणले तरी जमीन मशागत करून कंपनीफार्म सुरु करायला जितका वेळ लागेल तितक्यावेळात जय प्रकाश सिंगाची वाणं व्यावसायिक निर्मिती मध्ये आणून आपल्याच कडले प्रोडक्शन वाढेल की नाही? हा फायदा डायरेक्ट शेतकरी/ग्राहक सगळ्यांचा आहे, मोझमबीक मध्ये शुद्ध व्यापारी फायदा आहे, हे सुस्पष्ट आहेच की, तुम्ही करार केलात पण शेती करायला कंत्राट पद्धतीने सरकार जाणार नाहीये कंपनीच जाणार आहेत, धंद्याचे मूळ तत्व नफा, मग त्यांना तिकडे स्वस्त मनुष्यबळ ते जमीन मिळूनसुद्धा अन सरकारने त्यांना उत्पादन एका ठराविक किमतीत विकायचे बंधन केले तरी सुद्धा ते लोक आपली लागवड मशागत अन वाहतूक खर्च + नफा सोडून विकतील डाळ हा भाबडा आशावाद असेल नाही तर काय असेल? त्यामुळे हा निर्णय व्यापारी धार्जिणा आहे असे म्हणालास गैर ते काय? बरं सरकार म्हणाली अन ह्यांनी विकले इतके साधे व्यापारी कसे असणार? तूर डाळ पेरा ते पुढे असे विवेचन मी मागे 'एका वर्षानंतर' ह्यावर केले होते, तिथे साठेबाजी सप्रमाण दाखवली होती, मोझमबीक मध्ये उत्पादन झाले 'क' ते दाखवले गेले 'ख' (कमी दाखवणे सहज शक्य आहे अन अटळ आहे माझ्यामते) अन वरील प्रमाणे किंमत 'घ' दाबलेली डाळ इंटरनॅशनल मार्केट मध्ये नफा काढायला विकली जाणार नाही ह्याची काय हमी असणार आहे? तेव्हा हा निर्णय व्यापारीहिताचाच आहे सर.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री Wed, 07/20/2016 - 20:06
>>हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो बाकी चर्चा राहूद्या पण 'मुटेछाप अभिनिवेश' ही टर्म कॉईन केल्याबद्दल रॉल्फ थँक्स ! =))

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 08:52
http://m.rediff.com/news/report/navjot-singh-sidhu-quits-rajya-sabha-could-join-aap-ranks-in-punjab/20160718.htm नवजोतसिंग सिधूने भाजपचा व राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो आआप मध्ये जाण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 14:36
सिधूने भाजप सोडून आआपमध्ये जाण्याचा भाजपला किती तोटा होईल व आआपला किती फायदा होईल हे सांगता येणे अवघड आहे. सिधू तसाही गेली काही वर्षे राजकारणात सक्रीय नव्हता. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो, आयपीएल सामन्यांचे समालोचन यातच तो गर्क होता (त्याचे व विवेक राजदानचे समालोचन ऐकणे ही शिक्षा होती. त्यांची अत्यंत संदर्भहीन व नळ गळल्यासारखी अखंड बेताल बडबड ऐकणे असह्य होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात एखाद्या महान गायकाचे सुरेल गायन ऐकल्यानंतर लगेच 'रिक्षावाला' किंवा 'शांताबाई' ऐकल्यावर जसे वाटेल, तसेच इतरांचे समालोचन ऐकल्यानंतर सिधू व राजदानचे समालोचन ऐकताना वाटायचे.). त्याच्या जाण्याने भाजपला फारसा तोटा होणार नाही व आआपला फारसा फायदा होणार नाही असा माझा अंदाज आहे. आआपने त्याला बहुतेक पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन दिले असावे.

गॅरी ट्रुमन Tue, 07/19/2016 - 13:48
राहुल गांधींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभेत भिवंडीत बोलताना रा.स्व.संघाने गांधीजींचा खून केला असा आरोप केला. त्याविरूध्द संघाने न्यायालयात धाव घेतली.त्याविषयी राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै रोजी आहे. मला वाटते की यावेळी रा.स्व.संघाने राहुल गांधींना अजिबात सोडायला नको. फेब्रुवारी १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी कोईम्बतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये रा.स्व.संघाचा हात असून आपल्याकडे त्याविषयीचा पुरावाही आहे असे विधान केले होते.त्याविरूध्द संघाने केसरींवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. पण नंतर केसरींचे वय झाले आहे आणि त्यांना म्हातारचळ लागले आहे म्हणून ते काहीतरी बरळत आहेत असे वाटल्यामुळे असेल कदाचित पण संघाने तो खटला मागे घेतला. राहुल गांधींना मात्र अजिबात सोडायला नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 13:57
संघ व मोदी गांधीजींना प्रातःस्मरणीय मानतात .. त्यांच्या पावलावर चालून माफ करुन सोडुन द्यावे. तसेही राहुल गांधीना शासन झाले, न झाले, संघाबाबत जनतेच्या मनात जी संशयास्पद प्रतिमा आहे, ती तर तशीच रहाणार ना?

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 14:39
NEW DELHI: The Supreme Court on Tuesday asked Congress vice-president Rahul Gandhi to express regret for his comments holding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) responsible for Mahatma Gandhi's assassination or be ready to face a defamation trial. "Why did you make a sweeping statement against the RSS branding everyone associated with the organization in the same brush," the Supreme Court asked Rahul Gandhi while hearing a defamation case filed against him. " You can't make wholesale denunciation of an organization," the SC bench observed. Rahul Gandhi's counsel tried to justify his remarks saying these are historical facts and even part of the government records. The apex court said that Rahul needed to prove what was the public good in his statement against the RSS and hence it was a matter of trial. The SC said that if Rahul Gandhi wanted to defend himself and was not ready to express his regret, than it will be better that he faced trial. A bench of Justices Dipak Misra and R F Nariman refused Rahul's request for two-week adjournment and posted the matter for hearing on July 27. Rahul wanted two-week's time saying his counsel Kapil Sibal is not free before that. The SC said this is no ground for adjournment and posted the matter for July 27, saying no further postponement of hearing would be allowed. http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-killed-Gandhi-Express-regret-or-face-trial-Supreme-Court-tells-Rahul-Gandhi/articleshow/53279452.cms

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 14:53
संघावरील आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. हे खरेच आहे. पण गोपाळ गोडसेंच्या स्टेटमेंट्समुळे आम लोकांचा गोंधळ उडतो. https://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Hindu_Rashtra/nathuram.html shortly after releasing Nathuram’s book, Why I Assassinated Mahatma Gandhi, in December 1993, Gopal Godse in an interview with Frontline magazine stated: “All the [Godse] brothers were in the RSS. Nathuram, Dattatreya, myself and Govind. You can say we grew up in the RSS rather than in our home. It was like a family to us. Nathuram had become a baudhik karyavah [intellectual worker] in the RSS. He has said in his statement that he left the RSS. He said it because [Madhav Sadashiv] Golwalkar and the RSS were in a lot of trouble after the murder of Gandhi. But he did not leave the RSS.” [See issue of 28 January 1994] असो. ज असेल ते असो. पण राहुलजीनी असा उघ्ड आरोप कराउला नको होता.

In reply to by श्रीगुरुजी

दिगोचि Fri, 08/05/2016 - 09:17
मला वाटते राहुल गान्धीला या वेळी सन्घाने सोडुच नये. कारण त्याला जितके दिस्क्रेदित करता येइल तेव्हढे करावे त्यामुळे कॉन्ग्रेस्पक्षाला काय करावे ते व काय करु नये अशी त्यान्ची अवस्था होईल याचा भाजपाला २०१९च्या निवडणुकीत झाला तर फयदाच होइल.

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 13:54
मेलेल्या गायीचे कातडी काढायला दलिताना बोलावुन त्यानीच गाय मारली असा खोटा आरोप ठेऊन दलिताना मोदींच्या गुजरातेत मारहाण .. कट्टर हिंदुत्ववाद्यांचे खोडसाळ कृत्य

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 15:02
तो अवतार माझा नव्हता http://m.economictimes.com/news/politics-and-nation/dalits-unload-cow-carcass-in-front-of-collectorate-in-gujarat/articleshow/53273931.cms इंग्लिशमधी नाई कळत तर मराठीत सांगू काय ? http://m.maharashtratimes.com/nation/dalits-flogging-in-una-sparks-angry-protests-in-saurashtra/articleshow/53281324.cms

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Wed, 07/20/2016 - 02:54
Such incidents of violent interventions by the Sangh Parivar activists have been a regular occurance in Gujarat for the last two decades since the BJP came to power in the state in 1995. However, their numbers are increasing day by day. These incidents are also getting reported more often or 'recorded' due to the proliferation of video cameras and mobile phones. http://googleweblight.com/?lite_url=http://www.catchnews.com/india-news/gujarat-s-cow-vigilantes-don-t-love-their-gau-mata-they-just-hate-dalits-1468419334.html/fullview&lc=en-IN&s=1&m=956&host=www.google.co.in&ts=1468918873&sig=AKOVD65CGrUuPBdOYm1ftFebfoXY08WiXw ......

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Wed, 07/20/2016 - 02:56
ते गोंदवले काळे की गोरे मी स्वप्नातही पाहिलेले नाही. तिथे कधी जाणेही झालेले नाही. त्यामुळे तिथे काय करतात , याबाबत मी कधी लिहिले नाही.. आमच्या आजारपणाच्या काळात गोंदवलेकर प्रवचनांची दोन चार पुस्तके माझ्या समोर टाकली होती.. दोन चार पाने चघळुन , हे जीवन दु:खमय आहे , प्रभू रामाचे नाव घेऊन भवसागर तरुन जावे , इ जुजबी ब्रह्मज्ञान घेउन त्या प्रवचनास ( कायमचे ) रामराम म्हटले होते.

गामा पैलवान Wed, 07/20/2016 - 23:40
लोकहो, गेला आठवडा युरोपास ज्याम गडबडीचा गेला. १. शनिवारी १६ जुलैच्या सकाळी (वा आदल्या रात्री) आर्दोगानने तुर्कस्थानात माजलेली बंडाळी मोडून काढल्याचं जाहीर केलं. ही खरोखरची बंडाळी होती का? कोणी प्रमुख नेता तर दिसंत नाही. लगेचंच त्याने ८८०० पोलीस, ६००० सैनिक, २७५० न्यायाधीश आणि १५००० शिक्षण कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. आपल्या हातात सत्तासूत्रे एकवटावी म्हणून त्याने खोटं बंड उभारलेलं दिसतंय. बंडाळीचं खापर फोडायला फतेउल्ला गुलेनचं कपाळ सापडलंय. पण आपल्या हाती सत्ता एकवटण्याचा प्रयत्न कशासाठी? २. माझ्या मते याचं कारण की दोनंच दिवसांपूर्वी १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी आणीबाणी ३ महिन्यांसाठी वाढवली. निमित्त अर्थातंच नीस येथील आक्रमणाचं होतं. याचीही जबाबदारी कोण्या संघटनेने उचलली नव्हती. दुसऱ्या दिवशी नीसच्या बळींना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात ओलाँची हुर्यो उडवण्यात आली. कुठेतरी पाणी मुरतंय याचा फ्रेंच नागरिकांना सुगावा लागलेला आहे. पण ओलाँ यांना घाई करून आणीबाणी वाढवायची गरज का पडावी? त्यासाठी तत्पूर्वी दोनतीन दिवस ब्रिटनमध्ये काय घडलं ते बघावं लागेल. ३. सोमवारी ११ जुलैला आपण ताबडतोब पायउतार होणार म्हणून क्यामेरन यांनी जाहीर केलं. आणि बुधवारी १३ तारखेला निघाले देखील. अचानकपणे लेडसमबाईंनी माघार घेतली आणि घाईघाईने तेरेसा मे यांची नियुक्ती झाली. नंतरच्या चारपाच दिवसांतल्या घटनांनंतर तेरेसाबाई लई प्येटल्या. वेळ आली तर अणुबॉम्ब फोडेन म्हणाल्या. एकमेकांची पाठ खाजावायचा प्रकार तर चालला नाहीये? पण क्यामेरन तर दोन तीन महिन्यांनंतर पायउतार होणार होते. ऑक्टोबरपर्यंत पदावर राहायचा विचार होता साहेबांचा. अचानक जुलैच्या मध्यावर का निघाले? दोनतीन महिन्यांनी असा काय फरक पडणार होता? की तोवर नवं नेतृत्व पूर्णपणे सुस्थापित व्हावं अशी योजना होती? येत्या दोन तीन महिन्यांत काही धमाका उडणार आहे का? असल्यास कारण काय? इथे एक गोष्ट विचारांत घ्यायला हवी. ४. ती म्हणजे मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पुतीन यांनी संपूर्ण बाल्टिक नौदल ताफा बडतर्फ केला. आता प्रश्न असा आहे की बाल्टिक ताफ्याने पाश्चात्य (म्हणजे नाटोच्या) हालचालींना प्रत्युत्तर द्यायचं का नाकारलं? रशियात काही गडबड होण्याची शक्यता आहे का? की नाटोने बाल्टिक मधल्या हालचाली वाढवल्या? येत्या दोन तीन महिन्यांत काहीतरी घडणारसं दिसतंय खरं. ५. या सर्व घडामोडी होत असतांना अमेरिकेचं मौन मात्र अगदीच आश्चर्यजनक आहे. ओबामा निघालाय. त्याला काही पडली नाहीये. ट्रंप बुवा निवडून आल्यातंच जमा आहेत (निदान वागताहेत तरी तसंच). त्यांनीही तोंड उघडलं नाहीये. युरोपापासून अमेरिका अलग पडंत चाललीये का? असो. या सर्व घडामोडींना लाभलेली ब्रेक्झिटची पार्श्वभूमी देखील लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पद्मावति गुरुवार, 07/21/2016 - 23:24
गामा पैलवान उत्तम आढावा.पुढचे काही महिने बर्‍याच घडामोडी होणार असे दिसतंय खरं... मला वाटतं अमेरिका सध्या मौन आहे कारण निवडणुका डोक्यावर आहेत. वेट आणि वॉच चाललंय त्यांचं.

चंपाबाई गुरुवार, 07/21/2016 - 11:42
1) give it up योजनांमुळे झालेली बचत प्रत्यक्षात 2000 कोटी इतकीच आहे, पंतप्रधान हा आकडा 22000 कोटी सांगत आहेत. उरलेली बचत आंतर्राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्याने झाली आहे. 2) ग्रामीण विद्युतीकरण योजनेत alotted रकमेच्या केवळ 3% रक्कम वापरण्यात आली आहे. केवळ 3%रकमेत जर जवळपास सर्व काम केले गेले आहे . मग बाकीची 97% का sanction केली http://www.dnaindia.com/india/report-modi-government-s-flagship-scheme-deendayal-upadhyay-gram-jyoti-yojna-remains-largely-on-paper-2236194

आकाश कंदील गुरुवार, 07/21/2016 - 16:23
गामाजी, तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे. माझ्यामते जरी पुढील ३, ४ महिन्यात खूपच क्रातिकारक / विस्मयकारी काही होणार नसले तरी तुमचे मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

गामा पैलवान गुरुवार, 07/21/2016 - 23:06
लोकहो, १३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्यारी (पॅरिस) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी १४ जुलै रोजी आणीबाणी २६ जुलैपर्यंतच लागू राहील असे वक्तव्य केले. राष्ट्राध्यक्षांचा या वचनानंतर अवघ्या काही तासांत नीस येथे दहशतवाद्याने शेकडो लोकांना ट्रकखाली चिरडले. त्यामुळे ओलाँ यांनी आगोदरच्या वाचनाकडे दुर्लक्ष करंत आणीबाणी ६ महिन्यांसाठी वाढवली. काय गडबड चाललीये? कुठेतरी पाणी मुरतंय खास. तुर्कस्थानाचे अध्यक्ष आर्दोगान यांनीही ३ महिन्यांसाठी आणीबाणी कालंच घोषित केली. फ्रान्सच्या आणीबाणीविस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बाब लक्षणीय वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा Wed, 07/27/2016 - 22:28
उत्तम आढावा, यूरोपमधे शेयर मार्केट दोलायमान स्थितीत असताना अमेरिकेत नवीन उचांक करत आहे, हे पण दुर्लक्षुन चालणार नाही

चंपाबाई Wed, 07/27/2016 - 22:05
बाल कामगार कायद्यात काही बदल घडलेत म्हणे. पूर्वी फक्त आई बापाच्या घरच्या कामात मुलानी काम करणे चालत होते. आता लांबच्या जवळच्या कोणत्याही नात्याची व्यक्ती बालकाला कामगार म्हण्य्न नेमु शकते. पुर्वीच्या सरकारला हझार्डस वाटणारे अनेक उद्योग आता सेफ आहेतम्हणे. तिथे बालके जॉब करु शकतात. आनंद आहे !

चंपाबाई Fri, 07/29/2016 - 13:21
केंद्रात सत्ताधारी झालेल्या भाजपानं निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार करण्याचा चंग बांधला आहे. लोकपालात प्रस्तावित असलेले बदल हेच दाखवतात. केंद्रातलं महाढोंगी सरकार कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडून आलं. लोकपालाला या पक्षानं बिनशर्त, एकमुखी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसवर त्या काळात या पक्षाचे ढोंगी नेते मानभावीपणानं उच्चरवात टीका करत असत. आता त्याच लोकपाल कायद्याला हा पक्ष सुरूंग लावत आहे. लोकपालाच्या कक्षेतून आता राजकारणी आणि अधिकारी यांच्या नातेवाईकांना बाहेर काढलं जाणार आहे. भारतातील कोणताही नेता, अधिकारी स्वत:च्या नावावर संपत्ती ठेवण्याएवढा मूर्ख नसतो, म्हणून तर जवळच्या नातेवाईकांची मालमत्ता पण चौकशीच्या दायर्यात यावी अशी तरतूद लोकपालात आणली गेली. आता मोदींनी कावेबाजपणा करून ती तरतूद हटवण्याचा घाट घातलाय. वरवर हे महाशय भ्रष्टाचाराचा बिमोड करू वगैरे प्रचारी थाटाची दणकेबाज विधानं करतात आणि आतून भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देतात. कायद्यात बंधनकारक असूनही लोकपाल गेली दोन वर्ष नेमण्यातंच आला नाही! मोदी लोकपालाला एवढे का घाबरतात? कोणाच्या कुलंगड्या बाहेर पडण्याची ही भीती त्यांना वाटते? एकीकडे राजकारणी आणि अधिकार्यांना सोडून देत असतांनाच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांच्या नातेवाईकांचे उत्पन्न जाहीर करण्याची मात्र सक्ती असणार आहे! मोदी स्वयंसेवी संस्थांचा सूड घेण्यासाठी लोकपाल कायद्याचा वापर करणार आहेत. त्यांनी ते करावं पण सगळ्यांच्याच नातेवाईकांची संपत्ती जाहीर व्हावी, भाजपा आणि त्यांची पितृसंस्था रा स्व संघ यांनी लोकपाल आंदोलनाचा दुरूपयोग केवळ स्वत:ची सत्ता आणण्यासाठी केला हे आता पुरेसं स्पष्ट झालंय. तसं नसतं तर अण्णांच्या लोकपालाला रामलीला मैदानावर येऊन लेखी पाठिंबा देणारा संघ आज मूग गिळून गप्प बसला नसता

श्रीगुरुजी Fri, 07/29/2016 - 14:51
हरितपत्र मिळविण्याचा एक नवीन सोपा उपाय - For the rich who want to be American citizens, here is the quickest way to have a Green Card. What one needs to do is to invest $500,000 to $1 million, depending on the U.S. government rules, in an employment-generating Regional Centre Program or have a direct investment to get a permanent residence Visa within 15 months under the EB-5 program. This is as compared to 7 to 10 years taken in employment-based and 15 to 20 years in family-based Green Cards. http://www.thehindu.com/news/national/short-route-to-green-card/article8912439.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/30/2016 - 15:39
http://www.thequint.com/india/2016/03/16/lalit-modi-is-now-a-citizen-of-malta-but-ed-still-wants-him-back The Republic of Malta, an archipelago in the central Mediterranean between Sicily and the North African coast, is known for historic sites. As per the law of the land, a person can get Malta citizenship by making investments in the country. The Malta Individual Investor Programme rules provide for affluent persons of impeccable standing and repute to be naturalised and to receive Maltese citizenship on the basis of a contribution to and investment in Malta. इस्ट इंडिया कंपनी स्थापन करुन दुसर्‍या देशात व्यापार करा व पैसे मिळवा . त्यापेक्षा नवा मॉडर्न ऑप्शन चांगला आहे. त्या देशात फ्रॉड करुन पैसे घेउन येणार्‍या माणसाला सिटिजनशिप द्या व ते पैसे गुंतवुन घ्या. छान

In reply to by मार्मिक गोडसे

प्रदीप Mon, 08/01/2016 - 16:14
दुनियेतील अनेक विकसीत देशात असली स्कीम सुरू असते. त्यात अजिबात काही नवीन नाही. 'नवीन' आता फक्त मोदी सरकार आहे, तेव्हा चंपाबाईंना ते सगळे नव्याने दिसत आहे. चालायचंच !

In reply to by श्रीगुरुजी

हेमन्त वाघे Mon, 08/01/2016 - 12:27
हे अनेक वर्ष पासून चालू आहे माझ्या एका मित्राने - ज्याची भारतात ऐक सॉफ्टवेर कंपनी होती - जी त्याला विकावी लागली - अशा तर्हेने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे यात तुम्हाला पैसे आदीकृतरित्या न्यावे लागतात , तसेच बऱ्यापैकी टॅक्स पडतो . आणि यात ग्रीन कार्ड नाही ( जे दुय्यम नागरिकत्व असते ) तर नागरिकत्व मिळते ..

श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2016 - 20:37
धाग्याची सुरुवात खालील बातमीने करीत आहे. उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेश मध्ये जानेवारी-फेब्रुवारी २०१७ या महिन्यात विधानसभेची निवडणुक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजिस्ट म्हणून नेमणुक केली आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास काँगेसला मोठा फायदा होईल असे त्यांनी सुचविले आहे. परंतु काँग्रेस अजूनही राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास उत्सुक नाही. काँग्रेसने कोणालाही पुढे केले तरी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २०२ जागा मिळणे अशक्य आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष होणे सुद्धा अशक्य आहे. मागील ३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे ४०३ पैकी २५, २२ व २८ इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या. अलिकडच्या काळात २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८० पैकी २० जागा ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्ग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. प्रियांकाचे नाव पुढे करून जर पुन्हा एकदा दारूण पराभव झाला (असेच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे) तर पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाप्रमाणे प्रियांकावर पदार्पणातच अपयशाचा शिक्का बसेल. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल गांधींनी आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या. अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात प्रियांकाने जोरदार प्रचार करूनसुद्धा कॉंग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रियांकाचे नाव पुढे केले तरी काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणूनच बळीचा बकरा या न्यायाने काँग्रेसने शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे ठरविले आहे. शीला दिक्षित ब्राह्मण असल्याने उ.प्र. मधील १०% अधिक असलेली ब्राह्मण मते आपल्याकडे वळतील असा काँग्रेसचा भोळा आशावाद आहे. अर्थात शीला दिक्षित केवळ लग्नानंतर ब्राह्मण झाल्या आहेत. लग्नापूर्वी त्या खत्री समाजातल्या होत्या हे आता माध्यमातून येईलच. त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे डागळलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे करूनही फार फायदा होणार नाही. जर काँग्रेसची परिस्थिती सुधारली तर श्रेय प्रियांकाच्या प्रचाराला व जर काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला तर दोष शीला दिक्षितांच्या माथी असेच काँग्रेसचे धोरण असणार आहे.

वटवट गुरुवार, 07/14/2016 - 20:44
विनाशकाले विपरीतबुद्धी.. दुसरं काय?.... स्वतःच्या हाताने स्वतःच्या सरणाची व्यवस्था लावणे हा काँग्रेसचा पण दिसत आहे अशात...

बोका-ए-आझम गुरुवार, 07/14/2016 - 21:05
काँग्रेसने ब्राम्हण उमेदवार देणार ही अटकळ बरोबर ठरवलेली आहे. शीला दीक्षित यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे असं मला वाटतंय. हा काँग्रेसचा नकारात्मक पवित्रा आहे पण एका म्हणीनुसार ' नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं काँग्रेसचं धोरण आहे, विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून. गुरुजी - शीला दीक्षित या माहेरहून खत्री समाजाच्या आहेत याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींच्या जन्माने विदेशी असण्याचा मुद्दा कोणालाही फायदेशीर ठरला नव्हता. उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ब्राम्हण बहू हा काँग्रेसचा मुद्दा असेल असे वाटते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2016 - 21:16
सपचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती आणि आता काँग्रेसच्या शीला दिक्षित. फक्त भाजपने अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल असे वाटत नाही कारण भाजपकडे मायावती व अखिलेश यांच्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर तगडा असेल तरच आधी त्याचे नाव जाहीर करून फायदा असतो. अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त.

खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 07/14/2016 - 21:40
"अरूणाचल मध्ये काँग्रेस सरकार बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य" --------सुप्रिम कोर्ट _____________________________________ अखलाक च्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!!! प्राण्यांमध्ये भेदभाव नकोच,गायीचे मांस बाळगले म्हणून लोकांनी मारले. मुळात कोणत्याच प्राण्याचे मांस खाऊ नये. आणि आता त्याच्या कुटूंबियांना छळत आहेत.

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत Fri, 07/15/2016 - 17:49
उत्तर प्रदेशात गौवध बंदी कायदा आहे. त्यानुसार कार्रवाई होणारच. बाकी तिथे कुणी मारायला गेले नव्हते, कुणाही जवळ तलवारी किंवा कट्टे इत्यादी नव्हते. तो जर मेला नसता तर गौ. हत्याची FIR तेंव्हाच दायर झाली असती.

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई Fri, 07/15/2016 - 18:08
तलवार कट्टा न घेता जाणे हे निर्दोषत्वाचे लक्षण का ? वा वा ! फोरेन्सिकच्या बुकात ३०२ व ३०४ आय पी सी पुन्हा पहावा लागेल.

सत्याचे प्रयोग गुरुवार, 07/14/2016 - 22:51
काळ्या पैसा शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी ) तीन लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे . शिवाय, एखाद्या व्यक्तीकडे 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवण्यास मनाई करण्याचीही शिफारस केली आहे .

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील डे परेड पाहायला आलेल्या गर्दीवर ट्रक चढवून एक दहशतवादी हल्ला झाला आहे, ट्रक मध्ये ग्रेनेड आणि इतर स्वयंचलित हत्यारे सापडली आहेत, राष्ट्राध्यक्ष फ्रांझवा ओलांद ह्यांनी इमर्जन्सी अजून पुढे पर्यंत सुरु ठेवायचे सूतोवाच केले आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सदर हल्ल्यात ८० निष्पाप लोकांनी प्राण गमावले असून इतर १०० लोकं जखमी झाल्याचे वृत्त कळते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पद्मावति Sat, 07/16/2016 - 20:42
बळी पडलेल्या लोकांमधे लहान मुलांचा समावेश बराच होता. बिचारे मुलं fire works बघायला आली असतील:( या अतिरेक्यांचा पापाचा घडा आहे का अक्षय पात्र काही कळेना ....भरतच नाहीये:(

हुप्प्या Fri, 07/15/2016 - 10:35
ह्या भीषण प्रसंग घडल्यावर लोकसत्तामधे अशी बातमी होती की फ्रान्समधे ट्रक अपघातात ७६ ठार! (आता ती काढून टाकली आहे) ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल.

In reply to by हुप्प्या

मुक्त विहारि Fri, 07/15/2016 - 17:56
....हे भयंकर घडले असेल." छे हो. उलट ती लोकच ट्र्कच्या मार्गा-मध्ये आली असतील.

बोलबोलेरो Fri, 07/15/2016 - 11:55
"ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल." उत्तम उपहास! हहपुवा. फ्रान्सच्या निसमधील हत्याकांडाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली! परंतु यातून युरोप काही शिकणार का? की परत एखादा "अयलान कुर्दी" झाल्यानंतर भावनिक अविचार करायला प्रवृत्त होणार? दुवा http://qz.com/554555/france-has-doubled-down-on-its-promise-to-syrian-refugees-after-the-paris-attacks/

शिद Fri, 07/15/2016 - 16:23
a शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

In reply to by शिद

चंपाबाई Fri, 07/15/2016 - 20:55
कलियुग सुरु होण्यापुर्बी कलिने जनमेजयाकडे आश्रयाची याचना केली होती. त्याने कलिला सोन्यात रहायला सांगितले होते. अंगभर सोने घालुन राजकारण करताना अपमृत्यू झाल्याचे हे दुसरे उदाहरण. ... इति श्री हिंदु पुराणम.

विवेकपटाईत Fri, 07/15/2016 - 17:56

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/15/2016 - 23:16
This is the second reduction in rates this month. Petrol price was cut by 89 paise a litre and diesel by 49 paise on July 1. Petrol price was on Friday cut by Rs. 2.25 a litre and diesel by 42 paise a litre, the second reduction in rates this month on global cues.

In reply to by भंकस बाबा

खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला कधी स्वधर्माची चिकित्सा करताना पाहिलं नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा Sun, 07/17/2016 - 10:26
टक्केवारी द्या ना स्वधर्माची चिकिस्या करायला, आपण नक्की करु, कशाला मी आमच्या घरात पितृपक्ष, नागपंचमी अशा प्रथा हट्टाने बंद केल्या आहेत. देवळात जाणे बंद केले आहे, आता तुम्ही एक मशिद दाखवा की ज्यात भोंगे वाजत नाहीत, मंदिरे मी दाखवायला तयार आहे. हां सर्वधर्मसम्भाव सोडा, हिन्दुमधील पुष्कळानी कट्टरवाद सोडला आहे. मुस्लिमानी सोडला असला तरि जाहिर करण्याचे धाडस फार् कमी लोकांनी केले आहे. रच्याकने झाक्याचे प्रवचन फ़ॉर द चेंज कॉमेडी शो म्हणुन बघायला हरकत नाही

In reply to by भंकस बाबा

चेक आणि मेट Sun, 07/17/2016 - 18:19
खरं आहे, मुस्लिम धर्मात कट्टरतावाद अधिक आहे, ते कधीही धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत,त्यामानाने हिंदू आणि ख्रिश्चनांच्यात नास्तिकता जास्त आहे.देवाविरूद्ध बोलणे हाच जगन्य अपराध आहे असे मानतात ते.

In reply to by भंकस बाबा

चंपाबाई Sun, 07/17/2016 - 19:32
एकदा दत्तगुरु मॉर्निंग वॉकला चालले होते... समोरुन एक मिरवणुक वाद्ये वाजवत जात होती.. पण रस्त्याच्या कडेला बसलेला एक चांभार एकाग्रतेने त्याचे काम करत होता. त्याला तो कोलाहल ऐकु येत नव्हता. दत्तगुरुनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. तात्पर्य : हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा असुनही मशिदीचे भोंगे ऐकू येत असतील तर आपली एकाग्रता कमी पडत आहे... कृप्या एकाग्रता व श्रद्धा वाढवावी. होमवर्क : दत्ताने केलेले इतर २३ गुरु कोणते ?

In reply to by चंपाबाई

भंकस बाबा Sun, 07/17/2016 - 20:27
एकाग्रतेने मशिदिचा भोंगा वाजत असताना अभ्यास कसा करावा हे शिकवा, आमच्या घरातील आबालवृद्धाना सकाळी पाच वाजता भोंगा वाजल्यावर साखरझोप न मोड़ता स्थितप्रज्ञ रहायला शिकवा,

In reply to by भंकस बाबा

भोंगा किती वेळ वाजतो ओ. सकाळी दोन मिनटं,आणि पाच वाजता दोन मिनटं! झालं कि, पारायणे आठवडाभर चालतात भोंगे लावून ते चालतं का?? आणि किती पारायणे/कार्यक्रम होतात,,,तुकाराम बीज,रामनवमी,गणेश चतुर्थी,रामदास नवमी,एकादशी,संकष्टी,षष्ठी,हनुमान जयंती,काकड आरती,फाकड आरती,गोंधळ,शिमगा,धुळवड,रंगपंचमी,म्हसोबा,खंडोबा, ज्योतिबा,मरगूबाई,यल्लमा,इइइइइ आणि शिमग्याला तर किती ते ध्वनीप्रदूषण?? कोणी मेलं नसलं तरीही ठ्ठो ठ्ठो ?? कशाला फुक्कटचा पुरोगामित्वाचा आव आणताय?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा Mon, 07/18/2016 - 01:51
अहो आजकाल मदरशावर देखिल भोंगे लावुन लाखो सलाम घातले जातात, ते पण सकाळच्या पारी, तुम्ही फारच त्रासलेले दिसताय, कानाजवळ एक भोंगा ठेऊन वाजवा , बहिरेपणा आला की सगळे त्रास दूर होतील, बायको बड़बडु देत की सासरा बोम्ब ठोकु दे

viraj thale Sat, 07/16/2016 - 08:42
काश्मीरमध्ये चकमकित मारला गेलेला आतंकवादी बुरहान वाणी पकिस्तान कडून हुतात्मा म्हणून घोषित .

बोका-ए-आझम Sat, 07/16/2016 - 08:55
NEET च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देताना राज्यांना त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घ्यायला परवानगी दिली. ९ मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने NEET ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा असेल असं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. २४ मे या दिवशी केंद्र शासनाने एक वटहुकूम काढून राज्यांनाही त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घेण्याची परवानगी दिली. काही राज्यांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षा ९ मेच्या आधीच घेतलेल्या असल्यामुळे हा इतर राज्यांवर अन्याय होईल अशी भूमिका केंद्राने घेतली. केंद्र सरकारच्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक आदेश (stay) आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला. आणि आता त्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यांचा स्वतःच्या परीक्षा असण्याचा मार्ग सुकर केलेला आहे.

श्रीगुरुजी Sat, 07/16/2016 - 11:27
नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल तुरुंगाबाहेर
देशद्रोहाच्या आरोपाखाली ९ महिने तुरूंगात राहून जामीनावर सुटल्यानंतरसुद्धा अजूनही हार्दिकची खुमखुमी कायम आहे. त्याला ६ महिने गुजरातबाहेर रहावे लागणार आहे. देशद्रोहाचा आरोप अजूनही कायम आहे. द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का? _________________________________________________________________________________ पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला. पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले. हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/hardik-patel-released-from-jail-1268273/

In reply to by श्रीगुरुजी

द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का?
ऑ तसं तर काहींनी मंत्री होण्याचा पण नैतिक अधिकार नाही.आणि मंत्रीपद देण्याचा पण.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/16/2016 - 21:19
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/16/2016 - 22:02
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

श्रीगुरुजी Sat, 07/16/2016 - 15:08
पाकिस्तानची पूनम पांडे http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4615728673501636712&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160716&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sun, 07/17/2016 - 00:27
कंदील बलोच च्या मर्डर नंतर युट्युबवर प्रतिक्रिया भारी आहेत. . नाव मात्र भारिय राव. कंदील, आहाहाहा

संदीप डांगे Sun, 07/17/2016 - 00:19
मोदी सरकारने तूर डाळ उत्पादनाचा मेक इन आफ्रिका कार्यक्रम सुरु केलाय म्हणे! कांदाप्रश्नाबद्दल शेतकरी आधीच भाजप सरकारवर उखडलाय. त्यात आणि हे.... https://furtherafrica.com/2016/06/27/india-hopeful-of-long-term-tur-dal-supply-from-mozambique/

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 07/17/2016 - 14:42
जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. Under pressure to control pulses prices, the Centre is hopeful of clinching a long-term deal with Mozambique for assured supply of lentils after the two countries had positive talks last week. Indian delegations last week visited pulses growing nations, Mozambique and Myanmar, to explore government-to- government arrangement for assured supply of lentils, especially tur, on a long term basis. तूर व इतर डाळीचे देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. खात्रीशीर आयातीसाठी आफ्रिकेतील देशांशी करार करणे हे एक चांगले पाऊल आहे. त्यावर टीका करण्यासारखे काय आहे? काही जणांना मोदी सरकारचे मीठ कायमच अळणी लागते. त्यात मीठाचा दोष आहे का खाणार्‍याच्या जीभेचा दोष आहे?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sun, 07/17/2016 - 18:14
काँग्रेसच्या काळातही डाळ आयात करुन दर १०० रु होता... आता अचानक २०० व्हायला आणि अजुन आयात करायला आणखी काय कारण घडले?

In reply to by चंपाबाई

विकास Wed, 08/31/2016 - 21:31
तूरडाळीच्या दरघसरणीस सुरुवात या बातमीतील खालील भाग (त्यातही बोल्ड केलेला भाग) वाचण्यासारखा आहे... जाणकारांनी प्रकाश टाकावा! ;)
केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे डाळीची मुबलक उपलब्धता आहे.
असो.

In reply to by विकास

संदीप डांगे Wed, 08/31/2016 - 23:12
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय, डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही, दालप्रकरण काही अजरामर राहणार नव्हते, आता पुढची कमोडिटी कोणती ते बघणे आले,

In reply to by संदीप डांगे

विकास गुरुवार, 09/01/2016 - 01:27
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय अगदी मनातलं बोललात, युपिएच्या दहा वर्षांमधे जे काही नुकसान होयचे होते ते झाले हे खरेच आहे! डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही ह्या सरकारने डॅमेज कंट्रोल केलेला नसून आत्तापर्यंत जी काही, काहीजणांसाठींची (पक्षी: व्यापार्‍यांच्या स्वार्थासाठी) व्यवस्था होती, तीलाच शह देत त्यात बदल घडवून आणला. आता त्याचे परीणाम लगेच दिसत नव्हते हे देखील खरेच. पण नुसताच डॅमेज कंट्रोल करायचा असता तर काही तरी तात्पुरती पलमपट्टी लावली असती, दोन चार व्यापार्‍यांना - मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे काहीसे करून मोकळे झाले असते. असो.

In reply to by संदीप डांगे

मोदक गुरुवार, 09/01/2016 - 14:16
कांही लोकांबद्दल सार्वकालीक असेल.. काही लोकांसाठी मोदींचे फॅसीस्ट आणि हुकूमशाही सरकार पडून प्रतिभावान आणि समंजस राहुलचंद्ररावजी गांधींचे काँग्रेस रामराज्य येईपर्यंत असेल.. कांही लोकांसाठी आजादी येईपर्यंत असेल...

In reply to by मोदक

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/01/2016 - 14:23
सर्वलोकांसाठी सार्वकालिक असणे अन हे सत्य समजणे ह्यातच माझेतरी भारतीयत्व वसते :) जय हिंद :)

In reply to by विकास

श्रीगुरुजी गुरुवार, 09/01/2016 - 14:21
डाळीचे भाव वाढले होते तेव्हा प्रॉब्लेम होता आणि काही जण सरकारला नावे ठेवीत होते. आणि आता भाव घसरले आहेत तेव्हाही प्रॉब्लेम आहेच आणि आताही सरकारला नावे ठेवणे सुरूच आहे.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी गुरुवार, 09/01/2016 - 14:33
जानेवारी-फेब्रुवारी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तरांचल व पंजाब राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. याच काळात महाराष्ट्रातील १० महानगरपालिकेची निवडणुक आहे. त्यामुळे निधर्मांधांचे पुरस्कार परतीचे दुसरे सत्र डिसेंबर २०१६/जानेवारी २०१७ या कालखंडात सुरू होईल व मतदानाच्या शेवटच्या दिवशी ते थांबून परत नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये तिसरे सत्र सुरू होईल. .

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 07/17/2016 - 21:05
जंप कसली? तुम्ही दिलेल्या बातमीच्या आधारेच मी प्रतिसाद लिहिलाय. त्यातलेच काही परिच्छेद मी दिलेत. स्वतःच्या मनाचे त्यात काहीही टाकलेले नाही.

In reply to by संदीप डांगे

जेपी Mon, 07/18/2016 - 20:44
काय डांगे साब, कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by जेपी

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 22:23
काय जेपी भौ..? कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुम्हीच सांगा. तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. टोमणा आहे असं दिसतंय. असो. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी. तुम्ही तुमचे मत कसे बनवता याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाही.

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 00:42
श्रीगुरुजी. थोडं थांबा म्हणलो होतो. अधिकचे बोललात, आता पंचाईत होईल बघा. प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती. दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का? मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट! १. दुवा क्रमांक एकः India and Mozambique on Thursday signed an agreement where New Delhi will buy pulses from the southern African nation. The agreement, one of the three, was signed in Maputo. Prime Minister Narendra Modi, currently on a four-nation Africa visit, said: "India's commitment to buy pulses from Mozambique would help meet India's requirement. It will also facilitate long-term investments in commercial farming, generation of farm employment and raise farmers' incomes in this country (Mozambique)," he said. According to the agreement, India will encourage greater production of pulses in Mozambique with an assurance that it will be purchased by India at a mutually-agreed price. While India generally has a shortfall of pulses leading to price rise, Mozambique grows the commodity without much consumption locally, officials said, adding the agreement will be a "win-win" for the two countries. Last month, the Union Cabinet cleared a proposal to enter into an agreement with Mozambique for importing 100,000 tonnes of pulses in 2016-17 with an option to scale it up to 200,000 tonnes by 2020-2021. The agreement will promote production of pigeon peas or tur in Mozambique. These would be imported either through private channels or through nominated state agencies, an official statement issued after the Cabinet meeting said. २. दुवा क्रमांक दोन प्रस्तुत दुवा मुळातून वाचावा. दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे? (रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव Mon, 07/18/2016 - 11:36
पण अफ्रिकन देशांत ऊस आणि इतर नगदी पिकं हमी भावात मिळवण्याची कॉर्पोरेट लेव्हल शेती करावी हि योजना बारामतीकर काकांची. कदाचीत त्यांनीही कुठुन तरी उचलली असेल, कोण जाणे. इथेनॉल व तत्सम जैवइंधनाची सोय म्हणुन मोठ्या पेट्रोलियम कंपन्या अगोदरच अफ्रिकन देशांवर डोळा ठेऊन आहेत. चीन ने देखील अफ्रीकन देशांत मुसंडी मारली आहे. भारताने याअगोदर बहुतेक कांगो वगैरे देशांशी असले करार करायचे प्रयत्न केले होते. थोडक्यात काय, कि अफ्रिकन देशांशी हमी भावातली शेती हि केवळ आपली भोजनाची सोय नसुन त्यामागे बरेच आंतरराष्ट्रीय आराखडे आहेत.
(रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)
तसं वाटणं सहाजीक आहे. पवारांसारखा कृषीमंत्री मिळणं अवघड आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 18:39
प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का?
अहो, तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये तेच लिहिलेले आहे. मी स्वतःच्या मनाचे काहीही लिहिलेले नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये जे आहे तेच मी फक्त मराठीत लिहिले आहे.
मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट!
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड! आता दुसर्‍या लिंकबद्दल . . .
दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे?
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 19:20
१.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. आता मी दिलेल्या बातमीत आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही असे कुठे लिहिले आहे ते दाखवाल काय? तसेच मोझाम्बिक जर आफ्रिकेतच आहे तर 'आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही' असे तुम्ही का म्हणालात? २.
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड!
कसंय गुरुजी, मला तूरडाळीवर मोठाच प्रतिसाद लिहायचा होता. पण रात्रीचे साडेबारा वाजल्याने व दुसर्‍या दिवशी पहाटेच घराबाहेर पडावे लागत असल्याने हा अर्धवट लिहून टाकला. लिन्क्स चेक करुन वाचून अभ्यासून नीट टाकाव्या ह्या मताचा मी असल्याने उर्वरित काम उद्या करु असे ठरवून सोडून दिले. तसेच आजकाल मी खेड्यापाड्यांमधे फिरत असल्याने इंटरनेट मिळत नाही. मिळाले तरी फोनवरुन जुजबी चेक करतो, तेही वेळ असल्यास. थेट संध्याकाळीच लॅपटॉप व ब्रॉडबॅण्ड मिळत असल्याने दिर्घ प्रतिसाद संध्याकाळनंतरच देता येतात. त्यामुळे चौदा काय चोविसतासांनी जरी लिंक आली असती तरी काही फरक पडावयास नको किंवा प्रतिसाद अर्धवट असला तरी बोंबाबोंब व्हावयास नको. कारण बातमी काही माझ्या घरातली नाही. तूरडाळीच्या आफ्रिका-भारत करारावर चिक्कार लिन्का पडलेल्या आहेत. मी दिली नाही ह्याचा अर्थ तुम्हीही अभ्यास केला नाही असे दिसते. तुम्हाला 'वेट वेट' म्हणालो ते मोबाईलवरुन टायपले होते. तुमच्या उतावळेपणाने तुम्हीच अडकलात, वरुन अमुक तासांत लिन्का आल्या नाहीत चा फुकाचा कांगावा करत आहात. ह्याला काय म्हणावे बरे? मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल. ३.
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता. हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.

In reply to by संदीप डांगे

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 19:42
आज जी तूर खातो ती गेल्या वर्षी पिकलेली असते... मग अचानक पाउस कमी / जास्त झाला म्हणुन यावर्षीची तूर का महाग होते ? आयत्या वेळेची क्याजुअल्टी म्हणुन डाळ आयात करणे व दुसर्‍या देशाला आर्थिक मदत आधीच देउन तिथे तूर पिकवणे हे दोन्ही भिन्न आहेत व हे म्हणजे घरातलं नागडं व शेजारणीला लुगडं असा प्रकार आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Mon, 07/18/2016 - 19:48
राजकारण राजकारण्यांसाठी सोडून द्या. प्रत्यक्ष भारतात डाळींचे उत्पादन होणे आणि डाळींची टंचाई दूर होण्याला काही काळ जावा लागेल आफ्रिकेत( मोझाम्बिक) किंवा म्यानमारमध्ये मनुष्यबळ बरंच स्वस्त आहे आणि तेथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे तेथून डाळ उत्पादन करून आयात करणे हे आपले उत्पादन वाढेपर्यंत नक्कीच आवश्यक आहे. उगीच आयात केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल हे अरण्यरुदन आहे आणि विरोधी पक्ष ते राजकीय फायद्यासाठी करणारच. मुळात आपले डाळींचे उत्पादन हे लोकसंख्या वाढीप्रमाणे वाढलेलेच नाही. त्याशिवाय पोषणासाठी अतिरिक्त लागणारी डाळ कुठून आणणार हा अधिकच प्रश्न आहे. खालील दुवा वाचून पाहावा. The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries. India, being the largest producer as well as consumer of pulses, thus needs to tap the domestic potential of raising the production. The productivity of pulses in the country is very low because of several reasons. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. India has reached a stage where cereals will continue to be important to sustain the present level of nutrition. However, the reduction in hunger and the improvement in nutrition require more of pulses. Going forward, the future production targets should involve much higher growth in pulses than in cereals. http://www.thehindu.com/opinion/op-ed/consumption-of-pulses-and-nutrition/article8816406.ece

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Mon, 07/18/2016 - 20:04
हा लेख नीती आयोगाच्या( नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेला) तज्ज्ञांनी लिहिलेला आहे आणि या लोकांचा राजकारणाचा आज तरी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 20:08
The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries.
वरील परीच्छेदात परिस्थितीचे योग्य ते वर्णन आहे. त्यामुळेच मोझांबिक, म्यानमार इ. देशांबरोबर जी कराराची बोलणी सुरू आहेत ते एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे Mon, 07/18/2016 - 20:18
डॉक्टरसाहेब. प्रस्तुत दुवा मी आधीच वाचलेला, आता तुम्ही दिलाच आहे तर ह्यातलीही गंमत सांगतो. जर भारताने ४६ देशांमधे फिरुनही पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत तर काय करावे? दुव्यातच म्हटले आहे की आपलेच उत्पादन वाढवा. ओके? पण आपल्याकडे उत्पादन वाढवण्याच्या मर्यादा आहेत असेही म्हटले आहे. ह्या मर्यादा कोणत्या? १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. का झाल्या नाहीत आजवर? किंवा आता होऊ शकत नाहीत असेही नाही. नवीन जाती शोधायला किमान पाच ते सहा वर्षे जातात. चला मान्य करु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग जगातून दुसरीकडून आणून आपल्या भूमीत सुधारित जाती लावू शकतोच की. ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल. २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. डाळीस योग्य असे वातावरण ह्या विस्तीर्ण भारतात मिळूच नये हे अशक्य आहे. प्रश्न निर्माण झाला तो पारंपरिक डाळ-उत्पादक पट्ट्याचा. तिथे पाणी नसेल तर पाणी उपलब्ध करा. जिथे पाणी आहे तिथे डाळ घ्या. आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना. ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. वातावरणीय बदल व बुरशी-किडीला दाद देणार्‍या नवीन जाती शोधून काढणे हा उपाय आहे. बुरशी किडी ह्या अगदी काटेकोरपणे वनस्पती-केंद्रीत नसतात. ९० टक्के रोग जवळपास सारखेच असतात. मुख्य मुद्दा आहे तो डाळीच्या पिकावर शेतकर्‍याने खर्च किती करावा कारण खर्चाला साजेसे भाव नसतील तर कोण कशाला औषधांचा खर्च करेल. आज इथे जुन्नरात वीस किलो टोमॅटोला हजार बाराशे भाव मिळतोय तर शेतकरी औषधे किती महाग आहेत ह्याचा अजिबात विचार करत नाही आहे. दोनशे रुपये सोडा अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार? ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे. ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे? प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे. ॑.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव Tue, 07/19/2016 - 07:00
१) ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल.
सगळी ट्रायल-बॅलन्स टोटल लाऊन सुधारीत बियाणं पुरेशा प्रमाणात वाटायला किमान ३ वर्षे लागतील. त्यातला सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे कुठल्या पिकाच्या खिशातुन डाळींचे भाव वधारायचे. अजुनपर्यंत डाळी आणि तेलबियांच्याबाबतीत आपण सतत भिजतं घोंगडं ठेवलय. आणल्या डाळीच्या बिया वाटल्या फुकट शेतकर्‍यांना इतकं सहज नसावं ते काम.
२) आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना.
अफ्रिका किंवा अन्य गरीब देशांत शेतकी विषयांत पैसा गुंतवायचे एक कारण म्हणजे यात बड्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या सोयी-सुवीधांचं पाठबळ असतं. गरीब देशांत शेती-उद्योगधंद्यांना प्रोत्साहन म्हणुन बरेच प्रोग्राम राबवले जातात व ते गॅरेण्टर म्हणुन काम करतात. काहि कारणाने उद्या आपल्या शेतकर्‍यांनी डाळींचं उत्पादन म्हणावं तेव्हढं नाहि घेतलं तर सरकारचा पैसा बुडाला. अफ्रिकेतुन आयातीची हमी आणि नुकसान भरपायीची देखील.
३) अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार?
थेरॉटीकली हे खरं आहे. शेती उत्पादनाचा खर्च आणि उपभोक्त्याला मोजायला लागणारे दाम याचं अजव गणीत आहे. पण एक नक्की, कि या समीकरणातुन डाळी अशा वेगळ्या काढता येणार नाहित. हे गणीत सामायीक पद्धतीनेच सोडवायला लागेल.
४) हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे.
भारत सरकारने हे करावच. केवळ डाळींच्या बाबतीत नव्हे तर अगदी सरप्लस होणार्‍या उत्पादनात देखील. सगळी अंडी एकाच बास्केटमधे ठेऊ नये म्हणतात ना, त्यातला प्रकार. अर्थात, आपल्या लोकांच्या हातातोंडाची काळजी घेऊनच हे प्रकार करायला लागतील.
ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे?
नागरीकांच्या भुकेचा प्रश्न मिटवायचा असेल तर हे काम प्रत्येक राज्यकर्त्याला करावेच लागेल. शेती किफायतशीर बनवायला त्यात गुंतलेलं मनुष्यबळ आणि थ्रोपुट याची योग्य सांगड घालुन अनेक वेगळे मार्ग शोधावे लागतील. या फार मोठ्या सुधारणा आहेत. पण सगळं सुरळीत झालं तरी दुसर्‍या देशांत शेती करुन आपल्या लोकांचं पोट भरायचा मार्ग कधिही बंद होता कामा नये.
प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे.
निश्चीत त्यात व्यापारीवर्गाचं हित आहे. तसं ते प्रत्येक बाबतीत असतच. पण हि पॉलिसी केवळ व्यापारीवर्गाच्या हितासाठी म्हणुन राबवली जात नाहि.

In reply to by संदीप डांगे

हेमन्त वाघे Tue, 07/19/2016 - 09:27
आफ्रिकेत धान्य पिकवणे - आणि ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात - नियोजन करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उप्योयोग करून - ही नवीन गोष्ट नाही ओलाम हे कंपनी याचे ऐक उदाहरण आहे http://olamgroup.com/ आणि ती एक भारतीयाने नायजेरियातून भारतात काजू निर्यात करण्यासाठी स्थापन केली होती https://en.wikipedia.org/wiki/Olam_InternationaL होय नायजेरियातून भारतात काजू निर्यात ! आफ्रिकेत शेती व शेतकरी मागासलेले असल्याने तेथील सरकारे मोठ्या प्रमाण जमिनी उपलब्ध करून अतिमोठ्या प्रमाणात धंदेवाईक शेती ( large scale commercial farming ) करण्यास प्रोत्साहन देतात.. http://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/largescale-commercial-farming-in-africa/article2910459.ece http://africaworks.nl/en/farming-as-a-business मोठ्या प्रमाणात चिनी लोक जमिनी खरेदी करत आहेत http://www.forbes.com/sites/danalexander/2015/07/09/the-biggest-opportunity-in-agriculture-may-be-in-africa-and-china-is-seizing-it/#7f40c2f35c33 पण भारतीय लोक पण यात मागे नाहीत http://www.africa-business.com/features/indians-africa-farmlands.html http://scroll.in/article/729328/one-map-that-shows-indians-are-buying-large-farmlands-abroad-as-we-debate-land-acquisition-at-home शेवटच्या लेखाचे शीर्षकच सांगते - as we debate land acquisition at home भारतात मोठ्या प्रमाणात सलग जमीन उपलबध नाही , शेतमजूर अनेक ठिकाणी काम करीत नाहीत , या व्यवसायात बाहेरच्या लोकांना प्रवेशाचा नाही ( शेतजमीन घायला अनेक राज्यात तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाण पात्र लागते ) त्यामळे मोठ्या प्रमाणात planned शेती ही अतिशय कठीण आहे किंवा ज्वलजल अषयकच आहे . http://web.worldbank.org/WBSITE/EXTERNAL/COUNTRIES/AFRICAEXT/0,,contentMDK:21730621~menuPK:4900969~pagePK:146736~piPK:146830~theSitePK:258644,00.html

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 07/18/2016 - 20:01
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे.
या विधानांचा अर्थ मोझांबिक हे आफ्रिकेत नाही असा होतो का? तुम्हाला इभू मध्ये किती गुण मिळाले याचा इथे काय संदर्भ होता?
मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल.
स्वतःच दिलेली लिंक जरा नीट वाचा हो. मोझांबिकशी केलेला करार, शेतकर्‍यांच्या पोटावर पाय, मध्यमवर्गीय व्यापार्‍यांचा खिसा भरणे इ. गोष्टी कोठून आल्या ते जरा सांगता का?
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता.
ज्या गोष्टीची दरवर्षीच वेगवेगळ्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते त्या गोष्टीच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन उपाययोजना करणे हे एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. हे लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.
मला यातले काही समजत नसेल असे वाटत असेल तर देऊ नका प्रतिसाद.

In reply to by संदीप डांगे

रघुनाथ.केरकर गुरुवार, 09/01/2016 - 13:45
सध्या दक्षीण आफ्रीकेमधला चिनचा वावर बघता, भारताला तेथे हालचाली करणे आवश्यक आहे असे मल वाटते. मोझांबीकचं भौगोलीक महत्व त्याद्रुष्टीने नाकारता येत नाही. जास्त बोलत नाही, समजुन जा.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Tue, 07/19/2016 - 02:02
आणि तीसुद्धा दोन्हीही बाजूंनी. मला स्वतःला या विषयातलं काहीही कळत नाही हे सुरूवातीलाच सांगतो. काही प्रश्न आहेत - १. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. यात काहीही sarcastic किंवा prejudicial नाही. मला शेतीची अजिबात पार्श्वभूमी नाही. त्याच्या अर्थशास्त्रात जरुर रस आहे आणि त्याच अनुषंगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. जर यात काही राजकीय bias आहे असं वाटत असेल तर मी हा पूर्वग्रह आहे असं म्हणेन. मग निदान माहिती असल्याचा आणि सांगण्याचा आव तरी आणू नका अशी माझी प्रतिक्रिया असेल आणि तीही दोन्ही बाजूंना. हा प्रश्न फक्त जिज्ञासा म्हणून विचारलेला आहे. उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

१. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? खाली खरे सरांना दिलेले उत्तर वाचावेत, शंका असल्यास विचाराव्यात, यथामती उत्तरे देईन, माझे काही हुकले असल्यास ते दुरुस्त करेल. २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. होय, हे बरोबरच आहे भाऊ, नाही कोण म्हणू राहिला, फक्त पुरवठा कमी का आहे हा कळीचा मुद्दा आहे, अन तो मुद्दा येऊन जाऊन आपल्या नाखु काकांच्या दलाल अडते समीकरणापाशी जाऊन थांबतो बघा ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??, बरं खरे सरांच्या उत्तरात लिहिल्या प्रमाणे आपल्या देशातल्या इंनोवशनला बासनात गुंडाळून परक्या देशात जमीन घेऊन काम करणे हा सुद्धा शहाणपणा म्हणवत नाही! ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो, तरीही व्यापारी बंधूंचा फायदा होणे हे चूक नाहीच, पण तो फायदा होण्यात समतोल हवा न? म्हणजे गव्हर्नमेंट स्पॉन्सर अनफेर ट्रेड प्रॅक्टिस मधून मिळवलेला फायदा नसावा, शिवाय व्यापाऱ्यांचा असला फायदा आपण जस्टिफाय करत असू तर मग 200/किलोलाच का रडावे? घेऊयात की डाळ 200 ची शेरभर अन म्हणू 200 रुपये असली तरी 'चतुर व्यापारी त्याचा फायदा काढणारच' ;), हे असले हेजिंग जस्टिफाय होणार असेल तर ह्या चर्चेचा कार्यकारणभावच आटोपतो असे वाटते बुआ ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. मी कॉन्स आधी पाहतो, ते मी मांडले आहेत, प्रोज संबंधी सध्या अभ्यास सुरु आहे, जे काही दिसतील ते नक्की मांडेल मी , सकृतदर्शनी तरी हा निर्णय अनफेर अन व्यस्तप्रमाणात व्यापारी हित जपणारा आहे असे मत पडते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम Tue, 07/19/2016 - 11:12
१. मुळात मोझांबिकमध्ये डाळ उत्पादन केलं जाणार आहे याचा अर्थ भारतात ते उत्पादन बंद किंवा कमी केलं जाणार आहे असं नाहीये, बरोबर? २.
दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??,
नक्कीच नाही देता येणार, पण ती subsidized दरांवर सरकार विकू शकतं. ही शक्यता नाकारता येणार नाही, बरोबर? शिवाय तुमच्याच प्रतिसादात म्हटल्यानुसार डाळीला मिळणारी MSP (किमान समर्थन मूल्य) वाढवलेलं आहे. याचा अर्थ समजा या मोझांबिकमधून आलेल्या डाळींमुळे भाव पडले तरीही भारतातल्या शेतकऱ्यांना किमान एक किंमत सरकारकडून मिळणारच आहे. ३. अशी किती डाळ मोझांबिककडून मिळणार आहे भारताला? मोझांबिक हा छोटा देश आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांएवढा असेल फारतर. तिथली सगळी शेतजमीन तर तूरडाळ किंवा इतर डाळींच्या उत्पादनासाठी वापरली जाणार नाही. याचा अर्थ मोझांबिकमधलं डाळींचं उत्पादन हे भारतीय बाजारपेठेत प्रचंड फेरफार करु शकणारं नक्कीच नसावं. ४. मोझांबिकमधल्या शेतकऱ्यांची उत्पादकता भारतीय बाजारपेठेत बदल घडवून आणण्याएवढी आहे का? अमेरिका किंवा युरोपीय देश असते तर मी मान्य केलं असतं. अमेरिकेतील जेमतेम २% लोकसंख्या शेती करत असली तरी त्यांची उत्पादकता (productivity) ही खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथल्या शेतमालाला भारतात विकू दिलं तर इथले भाव कोसळतील आणि इथला शेतकरी भरडला जाईल हे १००% मान्य. पण मोझांबिकच्या शेतकऱ्यांची उत्पादकता एवढी आहे का? ५. या करारात reciprocity असायला हरकत नाही, म्हणजे भारताने मोझांबिक किंवा इतर आफ्रिकन देशांकडून घेतलेल्या शेतमालाच्या मोबदल्यात त्या देशांची बाजारपेठ भारतीय उत्पादकांना मिळेल. अशा वेळी या आफ्रिकन देशांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली (भारतात त्यांचा शेतमाल विकला गेल्यामुळे)तर भारतीय वस्तू विकत घेतल्या जातील आणि त्याचा फायदा भारतातील लोकांना होईल. जशी मागणी वाढेल, तसं उत्पादन वाढेल आणि नोक-याही वाढतील. अर्थात हा फारच long term चा विचार आहे, पण चीन असंच करतोय, विशेषतः झांबियामध्ये आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये. ६.
भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो
Exactly my point बापू. जीवनावश्यक गोष्ट आहे म्हणूनच तर त्याचा व्यापार करणाऱ्या लोकांना फायदा व्हायला हवा, म्हणजे ते तो व्यापार पुढेही करत राहतील. शिवाय तुम्ही फक्त व्यापारी हा एक व्यापक शब्द वापरलात. पण इथे वेगवेगळ्या पातळ्या असतील ना? Stockist - Distributor - Wholesaler - Retailer अशा. तुम्हाला व्यापारी म्हणजे नक्की कुठल्या पातळीवरचा व्यापारी अभिप्रेत आहे?

मितभाषी Mon, 07/18/2016 - 12:24
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगरमधील कर्जतमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. ‘सरकार सुस्त असून मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला वेळ नाही.’ अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जो पर्यंत राजीनामा देत नाही, तो पर्यंत विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवू देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान, कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कुठल्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जत बलात्कार प्रकरणाचा तपास जातीय गतिरोधात अडखळत असल्याची सोशल मीडियावर टीका होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान कर्जत बलात्काराप्रकरणी दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मितभाषी Mon, 07/18/2016 - 12:26
Marathi News > Maharashtra > नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर By: पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर | Last Updated: Saturday, 16 July 2016 4:56 PM Share 17 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी कर्जत परिसरातले नागरिक आक्रमक झाले आहेत. कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत आज कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधला रास्ता रोको 5 तासांनी मागे घेण्यात आला. बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष भवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

चंपाबाई Mon, 07/18/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

(तुम्ही दिलेला रिपोर्ट प्लॅनिंग कमिशनने देणे, ते लोक राजकीय नसणे ह्या दोन्ही सत्य असलेल्या फॅक्टस मुळे त्यांना शेतातले सगळे कळते हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो) १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. साफ चूक, अश्या जाती विकसित होत असतात किंबहुना झाल्या आहेत, पण त्यांच्या विस्तार अन लोकप्रियकरणासाठी आवश्यक सरकारी आस्था पूर्ण गायब आहे, ती फक्त ह्या शासनात आहे असे नाही तर कायम होतीच, बीडीएन-१ हे वाण फक्त आंतरपीक म्हणून लावायला उत्तम असे विकसित केले गेले आहे, मध्यप्रदेश ते महाराष्ट्र वातावरणातील टोकाचे बदल ग्राह्य धरून त्यांच्यात टिकून राहतील अशी एरिया स्पेसिफिक वाणं सुद्धा विकसित आहेत, उदा मरी रोग प्रतिकारक अन खास वैदर्भ वातावरणासाठी विकसित टी-विशाखा १ हे वाण, एकेटी-८८११ हे खास मध्य अन दक्षिण भारतीय वाण, आता अजून एक गंमत सांगतो, ही तर वाणं झाली आधुनिक लॅबोरेटरी अन परिस्थितीत विकसित केलेली, तर ही लिंक सुद्धा जरा बघा , ही लिंक आहे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान उर्फ नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनची, अन ह्या लिंकमधले नायक आहेत वाराणसीचे श्रीयुत जयप्रकाश सिंग, ह्याचा जरूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती, इतकं सगळं असताना जर प्लॅनिंग कमिशन असे म्हणत असेल तर तो त्यांचा सरकारी अनास्था रिपोर्टमध्ये लपवायचा दुर्दैवी प्रयत्न मी का म्हणू नये?? २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. अहो ही डाळ पिकाची (प्रश्नात तूर आहे त्याची) नैसर्गिक मागणी आहे हो, ते एनविरोन्मेण्ट पुअर नसतं तर स्केन्टी रेनफॉल एरिया असतं, मी स्वतः वरकड पाणी न देता तूर आंतरपीक म्हणून ओढली आहे कैक वेळा, हरबरा तर फक्त दवाच्या ओलाव्यावर (फ्रॉस्टिंगवर) येतो रब्बीतला, तेव्हा वातावरण हा इशू नाही तर वरती मी जो मुद्दा सांगितलाय ती खरी ज्ञानबाची मेख आहे असे वाटते, जास्त उत्पादन करणारी वाणं विकसित झाली/होत आहेतच फक्त त्यांचा पुरस्कार सरकार स्वतःच करत नाहीये आधीपासूनच ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. मला वाटतंय हा मुद्दा मी माझ्या पहिल्या उत्तरात कव्हर केलाय, तस्मात पुनरुक्ती टाळतो आहे :) ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. सरकारने बहुतेक मागच्या नोव्हेंबर मध्ये डाळींचे समर्थनमूल्य वाढवले आहे, टू एनकरेज मोर प्रोडक्शन, ही एक अभिनंदनीय बाब आहे, पण मग हे काय मधेच मोजांबीकचं सूरु केलंय ? लिंक स्पष्ट म्हणते की शेती मोझमबीक मध्ये होणार, त्याची गरज काही नाही खरेतर, अगदी कॉर्पोरेट फार्मिंग म्हणले तरी जमीन मशागत करून कंपनीफार्म सुरु करायला जितका वेळ लागेल तितक्यावेळात जय प्रकाश सिंगाची वाणं व्यावसायिक निर्मिती मध्ये आणून आपल्याच कडले प्रोडक्शन वाढेल की नाही? हा फायदा डायरेक्ट शेतकरी/ग्राहक सगळ्यांचा आहे, मोझमबीक मध्ये शुद्ध व्यापारी फायदा आहे, हे सुस्पष्ट आहेच की, तुम्ही करार केलात पण शेती करायला कंत्राट पद्धतीने सरकार जाणार नाहीये कंपनीच जाणार आहेत, धंद्याचे मूळ तत्व नफा, मग त्यांना तिकडे स्वस्त मनुष्यबळ ते जमीन मिळूनसुद्धा अन सरकारने त्यांना उत्पादन एका ठराविक किमतीत विकायचे बंधन केले तरी सुद्धा ते लोक आपली लागवड मशागत अन वाहतूक खर्च + नफा सोडून विकतील डाळ हा भाबडा आशावाद असेल नाही तर काय असेल? त्यामुळे हा निर्णय व्यापारी धार्जिणा आहे असे म्हणालास गैर ते काय? बरं सरकार म्हणाली अन ह्यांनी विकले इतके साधे व्यापारी कसे असणार? तूर डाळ पेरा ते पुढे असे विवेचन मी मागे 'एका वर्षानंतर' ह्यावर केले होते, तिथे साठेबाजी सप्रमाण दाखवली होती, मोझमबीक मध्ये उत्पादन झाले 'क' ते दाखवले गेले 'ख' (कमी दाखवणे सहज शक्य आहे अन अटळ आहे माझ्यामते) अन वरील प्रमाणे किंमत 'घ' दाबलेली डाळ इंटरनॅशनल मार्केट मध्ये नफा काढायला विकली जाणार नाही ह्याची काय हमी असणार आहे? तेव्हा हा निर्णय व्यापारीहिताचाच आहे सर.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री Wed, 07/20/2016 - 20:06
>>हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो बाकी चर्चा राहूद्या पण 'मुटेछाप अभिनिवेश' ही टर्म कॉईन केल्याबद्दल रॉल्फ थँक्स ! =))

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 08:52
http://m.rediff.com/news/report/navjot-singh-sidhu-quits-rajya-sabha-could-join-aap-ranks-in-punjab/20160718.htm नवजोतसिंग सिधूने भाजपचा व राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो आआप मध्ये जाण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 14:36
सिधूने भाजप सोडून आआपमध्ये जाण्याचा भाजपला किती तोटा होईल व आआपला किती फायदा होईल हे सांगता येणे अवघड आहे. सिधू तसाही गेली काही वर्षे राजकारणात सक्रीय नव्हता. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो, आयपीएल सामन्यांचे समालोचन यातच तो गर्क होता (त्याचे व विवेक राजदानचे समालोचन ऐकणे ही शिक्षा होती. त्यांची अत्यंत संदर्भहीन व नळ गळल्यासारखी अखंड बेताल बडबड ऐकणे असह्य होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात एखाद्या महान गायकाचे सुरेल गायन ऐकल्यानंतर लगेच 'रिक्षावाला' किंवा 'शांताबाई' ऐकल्यावर जसे वाटेल, तसेच इतरांचे समालोचन ऐकल्यानंतर सिधू व राजदानचे समालोचन ऐकताना वाटायचे.). त्याच्या जाण्याने भाजपला फारसा तोटा होणार नाही व आआपला फारसा फायदा होणार नाही असा माझा अंदाज आहे. आआपने त्याला बहुतेक पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन दिले असावे.

गॅरी ट्रुमन Tue, 07/19/2016 - 13:48
राहुल गांधींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभेत भिवंडीत बोलताना रा.स्व.संघाने गांधीजींचा खून केला असा आरोप केला. त्याविरूध्द संघाने न्यायालयात धाव घेतली.त्याविषयी राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै रोजी आहे. मला वाटते की यावेळी रा.स्व.संघाने राहुल गांधींना अजिबात सोडायला नको. फेब्रुवारी १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी कोईम्बतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये रा.स्व.संघाचा हात असून आपल्याकडे त्याविषयीचा पुरावाही आहे असे विधान केले होते.त्याविरूध्द संघाने केसरींवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. पण नंतर केसरींचे वय झाले आहे आणि त्यांना म्हातारचळ लागले आहे म्हणून ते काहीतरी बरळत आहेत असे वाटल्यामुळे असेल कदाचित पण संघाने तो खटला मागे घेतला. राहुल गांधींना मात्र अजिबात सोडायला नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 13:57
संघ व मोदी गांधीजींना प्रातःस्मरणीय मानतात .. त्यांच्या पावलावर चालून माफ करुन सोडुन द्यावे. तसेही राहुल गांधीना शासन झाले, न झाले, संघाबाबत जनतेच्या मनात जी संशयास्पद प्रतिमा आहे, ती तर तशीच रहाणार ना?

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Tue, 07/19/2016 - 14:39
NEW DELHI: The Supreme Court on Tuesday asked Congress vice-president Rahul Gandhi to express regret for his comments holding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) responsible for Mahatma Gandhi's assassination or be ready to face a defamation trial. "Why did you make a sweeping statement against the RSS branding everyone associated with the organization in the same brush," the Supreme Court asked Rahul Gandhi while hearing a defamation case filed against him. " You can't make wholesale denunciation of an organization," the SC bench observed. Rahul Gandhi's counsel tried to justify his remarks saying these are historical facts and even part of the government records. The apex court said that Rahul needed to prove what was the public good in his statement against the RSS and hence it was a matter of trial. The SC said that if Rahul Gandhi wanted to defend himself and was not ready to express his regret, than it will be better that he faced trial. A bench of Justices Dipak Misra and R F Nariman refused Rahul's request for two-week adjournment and posted the matter for hearing on July 27. Rahul wanted two-week's time saying his counsel Kapil Sibal is not free before that. The SC said this is no ground for adjournment and posted the matter for July 27, saying no further postponement of hearing would be allowed. http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-killed-Gandhi-Express-regret-or-face-trial-Supreme-Court-tells-Rahul-Gandhi/articleshow/53279452.cms

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 14:53
संघावरील आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. हे खरेच आहे. पण गोपाळ गोडसेंच्या स्टेटमेंट्समुळे आम लोकांचा गोंधळ उडतो. https://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Hindu_Rashtra/nathuram.html shortly after releasing Nathuram’s book, Why I Assassinated Mahatma Gandhi, in December 1993, Gopal Godse in an interview with Frontline magazine stated: “All the [Godse] brothers were in the RSS. Nathuram, Dattatreya, myself and Govind. You can say we grew up in the RSS rather than in our home. It was like a family to us. Nathuram had become a baudhik karyavah [intellectual worker] in the RSS. He has said in his statement that he left the RSS. He said it because [Madhav Sadashiv] Golwalkar and the RSS were in a lot of trouble after the murder of Gandhi. But he did not leave the RSS.” [See issue of 28 January 1994] असो. ज असेल ते असो. पण राहुलजीनी असा उघ्ड आरोप कराउला नको होता.

In reply to by श्रीगुरुजी

दिगोचि Fri, 08/05/2016 - 09:17
मला वाटते राहुल गान्धीला या वेळी सन्घाने सोडुच नये. कारण त्याला जितके दिस्क्रेदित करता येइल तेव्हढे करावे त्यामुळे कॉन्ग्रेस्पक्षाला काय करावे ते व काय करु नये अशी त्यान्ची अवस्था होईल याचा भाजपाला २०१९च्या निवडणुकीत झाला तर फयदाच होइल.

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 13:54
मेलेल्या गायीचे कातडी काढायला दलिताना बोलावुन त्यानीच गाय मारली असा खोटा आरोप ठेऊन दलिताना मोदींच्या गुजरातेत मारहाण .. कट्टर हिंदुत्ववाद्यांचे खोडसाळ कृत्य

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Tue, 07/19/2016 - 15:02
तो अवतार माझा नव्हता http://m.economictimes.com/news/politics-and-nation/dalits-unload-cow-carcass-in-front-of-collectorate-in-gujarat/articleshow/53273931.cms इंग्लिशमधी नाई कळत तर मराठीत सांगू काय ? http://m.maharashtratimes.com/nation/dalits-flogging-in-una-sparks-angry-protests-in-saurashtra/articleshow/53281324.cms

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Wed, 07/20/2016 - 02:54
Such incidents of violent interventions by the Sangh Parivar activists have been a regular occurance in Gujarat for the last two decades since the BJP came to power in the state in 1995. However, their numbers are increasing day by day. These incidents are also getting reported more often or 'recorded' due to the proliferation of video cameras and mobile phones. http://googleweblight.com/?lite_url=http://www.catchnews.com/india-news/gujarat-s-cow-vigilantes-don-t-love-their-gau-mata-they-just-hate-dalits-1468419334.html/fullview&lc=en-IN&s=1&m=956&host=www.google.co.in&ts=1468918873&sig=AKOVD65CGrUuPBdOYm1ftFebfoXY08WiXw ......

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई Wed, 07/20/2016 - 02:56
ते गोंदवले काळे की गोरे मी स्वप्नातही पाहिलेले नाही. तिथे कधी जाणेही झालेले नाही. त्यामुळे तिथे काय करतात , याबाबत मी कधी लिहिले नाही.. आमच्या आजारपणाच्या काळात गोंदवलेकर प्रवचनांची दोन चार पुस्तके माझ्या समोर टाकली होती.. दोन चार पाने चघळुन , हे जीवन दु:खमय आहे , प्रभू रामाचे नाव घेऊन भवसागर तरुन जावे , इ जुजबी ब्रह्मज्ञान घेउन त्या प्रवचनास ( कायमचे ) रामराम म्हटले होते.

गामा पैलवान Wed, 07/20/2016 - 23:40
लोकहो, गेला आठवडा युरोपास ज्याम गडबडीचा गेला. १. शनिवारी १६ जुलैच्या सकाळी (वा आदल्या रात्री) आर्दोगानने तुर्कस्थानात माजलेली बंडाळी मोडून काढल्याचं जाहीर केलं. ही खरोखरची बंडाळी होती का? कोणी प्रमुख नेता तर दिसंत नाही. लगेचंच त्याने ८८०० पोलीस, ६००० सैनिक, २७५० न्यायाधीश आणि १५००० शिक्षण कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. आपल्या हातात सत्तासूत्रे एकवटावी म्हणून त्याने खोटं बंड उभारलेलं दिसतंय. बंडाळीचं खापर फोडायला फतेउल्ला गुलेनचं कपाळ सापडलंय. पण आपल्या हाती सत्ता एकवटण्याचा प्रयत्न कशासाठी? २. माझ्या मते याचं कारण की दोनंच दिवसांपूर्वी १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी आणीबाणी ३ महिन्यांसाठी वाढवली. निमित्त अर्थातंच नीस येथील आक्रमणाचं होतं. याचीही जबाबदारी कोण्या संघटनेने उचलली नव्हती. दुसऱ्या दिवशी नीसच्या बळींना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात ओलाँची हुर्यो उडवण्यात आली. कुठेतरी पाणी मुरतंय याचा फ्रेंच नागरिकांना सुगावा लागलेला आहे. पण ओलाँ यांना घाई करून आणीबाणी वाढवायची गरज का पडावी? त्यासाठी तत्पूर्वी दोनतीन दिवस ब्रिटनमध्ये काय घडलं ते बघावं लागेल. ३. सोमवारी ११ जुलैला आपण ताबडतोब पायउतार होणार म्हणून क्यामेरन यांनी जाहीर केलं. आणि बुधवारी १३ तारखेला निघाले देखील. अचानकपणे लेडसमबाईंनी माघार घेतली आणि घाईघाईने तेरेसा मे यांची नियुक्ती झाली. नंतरच्या चारपाच दिवसांतल्या घटनांनंतर तेरेसाबाई लई प्येटल्या. वेळ आली तर अणुबॉम्ब फोडेन म्हणाल्या. एकमेकांची पाठ खाजावायचा प्रकार तर चालला नाहीये? पण क्यामेरन तर दोन तीन महिन्यांनंतर पायउतार होणार होते. ऑक्टोबरपर्यंत पदावर राहायचा विचार होता साहेबांचा. अचानक जुलैच्या मध्यावर का निघाले? दोनतीन महिन्यांनी असा काय फरक पडणार होता? की तोवर नवं नेतृत्व पूर्णपणे सुस्थापित व्हावं अशी योजना होती? येत्या दोन तीन महिन्यांत काही धमाका उडणार आहे का? असल्यास कारण काय? इथे एक गोष्ट विचारांत घ्यायला हवी. ४. ती म्हणजे मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पुतीन यांनी संपूर्ण बाल्टिक नौदल ताफा बडतर्फ केला. आता प्रश्न असा आहे की बाल्टिक ताफ्याने पाश्चात्य (म्हणजे नाटोच्या) हालचालींना प्रत्युत्तर द्यायचं का नाकारलं? रशियात काही गडबड होण्याची शक्यता आहे का? की नाटोने बाल्टिक मधल्या हालचाली वाढवल्या? येत्या दोन तीन महिन्यांत काहीतरी घडणारसं दिसतंय खरं. ५. या सर्व घडामोडी होत असतांना अमेरिकेचं मौन मात्र अगदीच आश्चर्यजनक आहे. ओबामा निघालाय. त्याला काही पडली नाहीये. ट्रंप बुवा निवडून आल्यातंच जमा आहेत (निदान वागताहेत तरी तसंच). त्यांनीही तोंड उघडलं नाहीये. युरोपापासून अमेरिका अलग पडंत चाललीये का? असो. या सर्व घडामोडींना लाभलेली ब्रेक्झिटची पार्श्वभूमी देखील लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पद्मावति गुरुवार, 07/21/2016 - 23:24
गामा पैलवान उत्तम आढावा.पुढचे काही महिने बर्‍याच घडामोडी होणार असे दिसतंय खरं... मला वाटतं अमेरिका सध्या मौन आहे कारण निवडणुका डोक्यावर आहेत. वेट आणि वॉच चाललंय त्यांचं.

चंपाबाई गुरुवार, 07/21/2016 - 11:42
1) give it up योजनांमुळे झालेली बचत प्रत्यक्षात 2000 कोटी इतकीच आहे, पंतप्रधान हा आकडा 22000 कोटी सांगत आहेत. उरलेली बचत आंतर्राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्याने झाली आहे. 2) ग्रामीण विद्युतीकरण योजनेत alotted रकमेच्या केवळ 3% रक्कम वापरण्यात आली आहे. केवळ 3%रकमेत जर जवळपास सर्व काम केले गेले आहे . मग बाकीची 97% का sanction केली http://www.dnaindia.com/india/report-modi-government-s-flagship-scheme-deendayal-upadhyay-gram-jyoti-yojna-remains-largely-on-paper-2236194

आकाश कंदील गुरुवार, 07/21/2016 - 16:23
गामाजी, तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे. माझ्यामते जरी पुढील ३, ४ महिन्यात खूपच क्रातिकारक / विस्मयकारी काही होणार नसले तरी तुमचे मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

गामा पैलवान गुरुवार, 07/21/2016 - 23:06
लोकहो, १३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्यारी (पॅरिस) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी १४ जुलै रोजी आणीबाणी २६ जुलैपर्यंतच लागू राहील असे वक्तव्य केले. राष्ट्राध्यक्षांचा या वचनानंतर अवघ्या काही तासांत नीस येथे दहशतवाद्याने शेकडो लोकांना ट्रकखाली चिरडले. त्यामुळे ओलाँ यांनी आगोदरच्या वाचनाकडे दुर्लक्ष करंत आणीबाणी ६ महिन्यांसाठी वाढवली. काय गडबड चाललीये? कुठेतरी पाणी मुरतंय खास. तुर्कस्थानाचे अध्यक्ष आर्दोगान यांनीही ३ महिन्यांसाठी आणीबाणी कालंच घोषित केली. फ्रान्सच्या आणीबाणीविस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बाब लक्षणीय वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा Wed, 07/27/2016 - 22:28
उत्तम आढावा, यूरोपमधे शेयर मार्केट दोलायमान स्थितीत असताना अमेरिकेत नवीन उचांक करत आहे, हे पण दुर्लक्षुन चालणार नाही

चंपाबाई Wed, 07/27/2016 - 22:05
बाल कामगार कायद्यात काही बदल घडलेत म्हणे. पूर्वी फक्त आई बापाच्या घरच्या कामात मुलानी काम करणे चालत होते. आता लांबच्या जवळच्या कोणत्याही नात्याची व्यक्ती बालकाला कामगार म्हण्य्न नेमु शकते. पुर्वीच्या सरकारला हझार्डस वाटणारे अनेक उद्योग आता सेफ आहेतम्हणे. तिथे बालके जॉब करु शकतात. आनंद आहे !

चंपाबाई Fri, 07/29/2016 - 13:21
केंद्रात सत्ताधारी झालेल्या भाजपानं निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार करण्याचा चंग बांधला आहे. लोकपालात प्रस्तावित असलेले बदल हेच दाखवतात. केंद्रातलं महाढोंगी सरकार कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडून आलं. लोकपालाला या पक्षानं बिनशर्त, एकमुखी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसवर त्या काळात या पक्षाचे ढोंगी नेते मानभावीपणानं उच्चरवात टीका करत असत. आता त्याच लोकपाल कायद्याला हा पक्ष सुरूंग लावत आहे. लोकपालाच्या कक्षेतून आता राजकारणी आणि अधिकारी यांच्या नातेवाईकांना बाहेर काढलं जाणार आहे. भारतातील कोणताही नेता, अधिकारी स्वत:च्या नावावर संपत्ती ठेवण्याएवढा मूर्ख नसतो, म्हणून तर जवळच्या नातेवाईकांची मालमत्ता पण चौकशीच्या दायर्यात यावी अशी तरतूद लोकपालात आणली गेली. आता मोदींनी कावेबाजपणा करून ती तरतूद हटवण्याचा घाट घातलाय. वरवर हे महाशय भ्रष्टाचाराचा बिमोड करू वगैरे प्रचारी थाटाची दणकेबाज विधानं करतात आणि आतून भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देतात. कायद्यात बंधनकारक असूनही लोकपाल गेली दोन वर्ष नेमण्यातंच आला नाही! मोदी लोकपालाला एवढे का घाबरतात? कोणाच्या कुलंगड्या बाहेर पडण्याची ही भीती त्यांना वाटते? एकीकडे राजकारणी आणि अधिकार्यांना सोडून देत असतांनाच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांच्या नातेवाईकांचे उत्पन्न जाहीर करण्याची मात्र सक्ती असणार आहे! मोदी स्वयंसेवी संस्थांचा सूड घेण्यासाठी लोकपाल कायद्याचा वापर करणार आहेत. त्यांनी ते करावं पण सगळ्यांच्याच नातेवाईकांची संपत्ती जाहीर व्हावी, भाजपा आणि त्यांची पितृसंस्था रा स्व संघ यांनी लोकपाल आंदोलनाचा दुरूपयोग केवळ स्वत:ची सत्ता आणण्यासाठी केला हे आता पुरेसं स्पष्ट झालंय. तसं नसतं तर अण्णांच्या लोकपालाला रामलीला मैदानावर येऊन लेखी पाठिंबा देणारा संघ आज मूग गिळून गप्प बसला नसता

श्रीगुरुजी Fri, 07/29/2016 - 14:51
हरितपत्र मिळविण्याचा एक नवीन सोपा उपाय - For the rich who want to be American citizens, here is the quickest way to have a Green Card. What one needs to do is to invest $500,000 to $1 million, depending on the U.S. government rules, in an employment-generating Regional Centre Program or have a direct investment to get a permanent residence Visa within 15 months under the EB-5 program. This is as compared to 7 to 10 years taken in employment-based and 15 to 20 years in family-based Green Cards. http://www.thehindu.com/news/national/short-route-to-green-card/article8912439.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Sat, 07/30/2016 - 15:39
http://www.thequint.com/india/2016/03/16/lalit-modi-is-now-a-citizen-of-malta-but-ed-still-wants-him-back The Republic of Malta, an archipelago in the central Mediterranean between Sicily and the North African coast, is known for historic sites. As per the law of the land, a person can get Malta citizenship by making investments in the country. The Malta Individual Investor Programme rules provide for affluent persons of impeccable standing and repute to be naturalised and to receive Maltese citizenship on the basis of a contribution to and investment in Malta. इस्ट इंडिया कंपनी स्थापन करुन दुसर्‍या देशात व्यापार करा व पैसे मिळवा . त्यापेक्षा नवा मॉडर्न ऑप्शन चांगला आहे. त्या देशात फ्रॉड करुन पैसे घेउन येणार्‍या माणसाला सिटिजनशिप द्या व ते पैसे गुंतवुन घ्या. छान

In reply to by मार्मिक गोडसे

प्रदीप Mon, 08/01/2016 - 16:14
दुनियेतील अनेक विकसीत देशात असली स्कीम सुरू असते. त्यात अजिबात काही नवीन नाही. 'नवीन' आता फक्त मोदी सरकार आहे, तेव्हा चंपाबाईंना ते सगळे नव्याने दिसत आहे. चालायचंच !

In reply to by श्रीगुरुजी

हेमन्त वाघे Mon, 08/01/2016 - 12:27
हे अनेक वर्ष पासून चालू आहे माझ्या एका मित्राने - ज्याची भारतात ऐक सॉफ्टवेर कंपनी होती - जी त्याला विकावी लागली - अशा तर्हेने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे यात तुम्हाला पैसे आदीकृतरित्या न्यावे लागतात , तसेच बऱ्यापैकी टॅक्स पडतो . आणि यात ग्रीन कार्ड नाही ( जे दुय्यम नागरिकत्व असते ) तर नागरिकत्व मिळते ..
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

डोंबिवलीच्या स्फोटाच्या निमित्ताने

हुप्प्या ·

गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 03:00
लोकहो, थोडी चिकित्सा करतो. ज्याअर्थी स्फोट होऊन मोठा खड्डा पडला, त्याअर्थी तो जमिनीखाली झाला आहे. आजूबाजूंच्या इमारतींच्या काचा फुटल्या. म्हणजे हवेतून वायुघाव (= शॉकवेव्ह) गेला. तसेच छप्परांची हानी झाली व भिंतींनाही तडे गेले. याचा अर्थ जमिनीतून देखील घनघाव (= मेकॅनिकल शॉकवेव्ह) गेला. दोन्ही प्रकारचे घाव उत्पन्न होणे साध्यासुध्या स्फोटात दुर्मिळ मानले जाते. वृत्तपत्रांत माहिती (वा अफवा) आलीये की बंब (= बॉयलर) फुटला नसून प्रक्रियक (= रीअॅक्टर) फुटला आहे. तर या आस्थापनात असा कोणता प्रक्रियक होता, जो फुटल्याने दुहेरी घाव उत्पन्न होईल? आस्थापनाचे मालक आणि त्यांचे मुलगा व सून असे जवळचे नातेवाईक ठार झाले आहेत. जर मालकाने सुरक्षानियम धाब्यावर बसवून उत्पादन चालवलेले असते तर त्या वेळेस स्वत: इमारतीत राहण्याचा धोका पत्करला नसता. एकंदरीत असे वाटते की हा मुद्दाम घडवून आणलेला घातपाती स्फोट तर नव्हे? कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 06/30/2016 - 08:30
आपण प्रमाणपत्र प्राप्त स्फोटपश्चात तपासनीस (पोस्ट ब्लास्ट इन्वेस्टीगेटर) आहात काय सर??

हुप्प्या Mon, 05/30/2016 - 08:59
भारतातील सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना कुणाच्या जिवाची पर्वा करत नाहीत. काही पैसे खिशात घालण्याकरता ते कुठल्या थराला जातील ह्याला काही सीमा नाही. कारण अशा लोकांवर कुठली कारवाई झालेली नाही, होत नाही आणि होणार नाही. ही एक व्यवस्थित पोसलेली समांतर व्यवस्था आहे. पार वरपर्यंत मलिदा पोचत असल्यामुळे कुणी ही व्यवस्था उध्वस्त करू इच्छित नाही. त्यामुळे हा घातपात नसून सुरक्षा व्यवस्थेतली अक्षम्य हेळसांड आहे असे माझे मत आहे. अगदी भाजपा/शिवसेना सत्तेवर असली तरी ह्यात काही बदल होईल असे वाटत नाही. आणि माझे हे भाकित चुकीचे निघाले तर मला आनंदच होईल!

In reply to by हुप्प्या

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 06/30/2016 - 08:32
हे पटण्यासारखे आहे! एकंदरीत जर भारतात आज अतिशय कायदेशीरपणे सिक्युरिटी ऑडिट केल्यास बहुतांशी SME युनिट्स बंद पडतील!

तिमा Mon, 05/30/2016 - 10:12
डोंबिवलीत झालेला स्फोट अक्षम्य निष्काळजीपणामुळे झालेला आहे असे वाटते. नायट्रेशन वा नायट्रो रसायनांच्या रिअ‍ॅक्शन करताना तापमान व त्यामुळे प्रेशर वाढले तर अशा प्रकारचे स्फोट होऊ शकतात.अशा रिअ‍ॅक्शनमधे बाहेरुन थंड करण्यासाठी सर्क्युलेशनची व्यवस्था असते, ती कधी काम करेनाशी होते, अशा अनेक शक्यता आहेत. परन्तु, नक्की काय केमिकल्स वापरत होते, ते कळल्याशिवाय त्यावर मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाही. हे झाले अपघाताबद्दल. पण मूळ प्रश्न असा आहे की जेंव्हा एखादी रासायनिक प्रक्रिया करणारी औद्योगिक वसाहत बसवली जाते तेंव्हा त्याच्या आसपास काही किलोमीटरपर्यंत कोणातीही मनुष्यवस्ती करायला परवानगी नसते. पण आपल्या भ्र्ष्ट देशांत हे नियम पायदळी तुडवून अशा वस्त्यांना पैसे खाऊन परवानगी दिली जाते. हे काम राजकारण्यांच्या आशीर्वादानेच होते. त्यानंतर अशा दुर्घटना झाल्यावर, उद्योग व ते उद्योजक यांच्या नांवे ओरडा सुरु होतो, लोकांच्या भावना भडकावून दिल्या जातात आणि त्या उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरु लागते. महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी एम.आय.डी.सी.चे गळे शासनानेच, याप्रकारे घोटले आहेत. एखाद्याने आपल्या आयुष्याची कमाई लावून उद्योग उभारायचा, सतराशेसाठ सरकारी इन्स्पेक्टर्सचे लाड पुरवायचे, अनेकांना रोजगार पुरवायचा आणि जवळपास अशी एखादी घटना झाली की आता इथून पुन्हा हलावे लागते की काय, याची चिंता करायची. मग कोणाला उद्योजक व्हावेसे वाटेल ?

रघुनाथ.केरकर Mon, 05/30/2016 - 10:53
सुमारे १९६५ ७० च्या दरम्यान डोंबीवली मध्ये सेट अप झाली. आणी डोंबीवली नीवासी हा रहीवासी भाग हल्लीच्या १० १५ वर्षात वसवला गेला. अशीच एक घटना आमच्या अम्बरनाथ मध्ये २००८ ला झाली. डिएनसी कंपनीतल्या प्रक्रीये मुळे आजुबाजुच्या लोकांना त्रास होउ लागला. त्यानी त्यबद्दल न्यायलयात धाव घेतली. पण न्यायलयाने डिएनसीकंपनी हि अम्बरनाथ वसायच्या आधीपासुन तेथे आहे. अस काहीसं सांगुन नीकाल डिएनसी च्या बजुने दीला. जाता जाता डोंबीवली एम आय डी सी गुजराथ ला गेली तर नवल वाटुन घेउ नये.

हुप्प्या Mon, 05/30/2016 - 11:20
काही वर्षांपूर्वी एक प्रकरण उघडकीस आले होते की गुजराथमधील काही रासायनिक उद्योग (बहुधा वापी व आसपासच्या भागातील) आपल्या कारखान्यातील टाकून द्यायची घातक रसायने टँकरने डोंबिवली एम आय डी सी भागात पाठवायची. अत्यंत अपरात्री पहाटे २ ते ३ च्या आसपास टँकरवाले ही रसायने तिथल्या नाल्यात सोडून देत असत. पहाटे त्या भागात भयानक घाणेरडा वास सुटायचा. लोक एम आय डी सीच्या कंपनीच्या नावाने खडे फोडायची. अनेक वर्षे हा प्रकार चालत होता. पोलिस व अन्य यंत्रणांचे हात ओले केले जात असणार याबद्दल मला शंकाच नाही. नंतर कधीतरी तो उघडकीस आला. तेव्हा गुजराथच्या विकासात डोंबिवलीचा असाही हातभार लागलेला आहे! (अर्थात ते करत असताना डोंबिवलीकरांनी श्वसनाचे, त्वचेचे अनेक विकार सहन केले ते अलाहिदा!).

अत्रन्गि पाउस Mon, 05/30/2016 - 12:11
-करकचून हात पाय आवळनारे नियम -प्रत्येक नियम / कायद्यातून शोधली जाणारी पळवाट -४ आणे वाचवण्यासाठी वाट्टेल त्या क्लृपत्या योजण्याची असोशी -संपूर्णपाने मूल्यरहित होत जाणारी सामाजिक/कौटुंबिक/शैक्षणिक व्यवस्था त्यामुळे आपल्याकडे काहीही शक्य आहे

कंजूस Mon, 05/30/2016 - 13:30
मालकापैकी एकजण केमिकल एंजिनिअर आहे त्याने प्रॅाडक्शन वाढवण्यासाठी काही प्रयोग थेट मेन लेवलि केले असतील आणि तिथेच चुकलं. केमिकल फॅक्ट्यय्रांत बरेच तंत्रज्ञान मागवून कारखाना सुरू करतात त्यात दोष नसतो कारण टाइम टेस्टेड रचना दिलेली असते.पण नंतर फेरफार करणे धोकयाचे असते. आणखी एक मुद्दा अर्धवट ज्ञानी मालक प्रॅाफिट वाढवण्यासाठी कामकाजात जबाबदार असणाय्रा पगारी माणसास बाजूस सारून ढवळाढवळ करतात.एखादी टेस्ट करण्याची प्रथा टंगवून घाई करून प्रोसेस सुरू करायला लावतात. हायड्रोकार्बन्सच्या टाक्या वेल्डिंगचे काम आल्यास आठ दिवसच्यावर प्राडक्शन बंद राहाते.ती रिकामी करणे ,हवेने फ्लश करणे चार चार तासाने आतला वायु स्फोटक आहे का हे हे एका डिवाइसने तपासणे,ते डिवाइस माहित असलेल्या स्फोटक मिश्रणाला टेस्ट करून खात्री करणे पुन्हा पाहाणे वगैरे .टाकीच्या आत हवेचे गॅसचे मिश्रण फारच स्फडटक असतं.वेल्डिंगचा आर्क / ठिणगी झाली कि स्फोट होतो.परंतू या पद्धतीत घाई करून चालत नाही.पगारी इंजिनेर व्यवस्थित काम करत असतो.त्याच्या डोक्यात सुरक्षितता हा एकच विचार असतो.मालकाच्या डोसक्याततला प्रॅाफिट त्या प्रोसिजरची वाट लावतो.ते टेस्टिंग डिवाइस टेसट्टच्या अगोदर आणि नंतर स्टँडर्ड मिक्शरने टेस्ट केल्यावरच विश्वास ठेवायचा असतो.

गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 13:39
लोकहो, दैनिक सकाळमधल्या या वृत्तानुसार मालकांच्या सुनेचा मृतदेह शंभर फूट दूरवर उडालेला आहे. यावरून १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांची आठवण झाली. प्रभादेवीस सेंच्युरी बाजाराजवळ झालेल्या स्फोटात एक दुमजली बसच्या पूर्णपणे ठिकऱ्याठिकऱ्या उडाल्या. चालकाचा मृतदेह असाच बाजूच्या सहामजली इमारतीच्या छपरावर फेकला गेला होता. तसेच प्रभादेवी परिसरातल्या इतर वास्तूंचे डोंबिवलीप्रमाणेच नुकसान (भिंतींना तडे, काचा फुटणे, इत्यादि) झाले होते. शिवाय प्रभादेवीच्या मुख्य रस्त्यावर खड्डाही पडला होता. यावरून प्रभादेवी आणि डोंबिवलीच्या स्फोटांत तिहेरी साम्य दिसतं. प्रभादेवीचा स्फोट दहशतवादी कृत्य होतं. डोंबिवली स्फोटही असाच मुद्दाम घडवून आणला गेला असेल काय? आ.न., -गा.पै.

mandarbsnl Mon, 05/30/2016 - 13:40
खट्टा मीठा चित्रपटातील एक दृश्य आठवले की ज्यात टीनु आनंद ला बळीचा बकरा बनवले जाते...ज्याचा काशाशीही काहीही संबंध नाही अशा माणसाला पकडून मारले जाते...असेच काहिसे पाहायला मिळेल आता..कोणाला तरी पकडून उभे केले जाईल आणि त्यालाच दोषी मानून कारवाईचे नाटक केले जाईल..

राही Mon, 05/30/2016 - 14:04
अत्यंत दुर्दैवी घटना. आता संपूर्ण एमायडीसीच हलवा अशी मागणी सुरू होईल. इकडे दक्षिण मुंबईत ससून डॉक्सचे मासळीबंदर हलवा (लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.) मुंबई बंदरातले कामकाज हलवा (ती जागा लोकांच्या स्वास्थ्यासाठी वापरा-उदा. यॉट क्लब, बोट रेसिन्ग, स्कूबा डाय्विन्ग इ. आणि शेपूट किंवा मधाचे बोट म्हणून 'परवडणारी' घरेनिर्मिती आहेच.) राणीच्या बागेतली जनावरे हलवा, अख्खी राणीची बागच हलवा, आरे कॉलनीतल्या गायी हलवा, आरे कॉलनीच हलवा, कृष्णगिरी उपवनातले बिबटे हलवा किंवा नॅशनल पार्कच हलवा, समुद्रकिनारे हलवा म्हणजे दूर न्या, मिठागरे हटवा, आणि सगळीकडे सेंट्रल पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्ट्स, अम्यूझ्मेंट पार्क्स, साहसक्रीडा आणि मधाचे बोट म्हणजे परवडणारी घरे बांधा. अगदी विमानतळाची जागासुद्धा 'परवडणार्‍या' गृहनिर्मितीसाठी वापरा. वेड पांघरून पेडगावला चाललेत सगळे.

नितीनचंद्र Wed, 06/29/2016 - 22:01
वाढते उद्योग, फॅक्टरी लायसन्स ला परवानगी दिल्याशिवाय होणारा विद्युत पुरवठा किंवा सेल्स टॅक्स इत्यादी चे मिळणारे रजिस्ट्रेशन आदी ची नियमावली यामुळे आज महाराष्ट्रात काय अनेक राज्यात अनेक कारखाने त्याच्या तपासणी व परवानगी शिवाय कार्यरत आहेत. फॅक्टरी नियमात असलेले अनेक क्लॉज, फॅक्टरी निरीक्षकांची अपुरी संख्या, तंत्र सुधार आणि अनेक कारणे आहेत जसे एम आय डी सी नसलेल्या भागात फॅक्ट्री उभी रहाते. याला इमारतीची परवानगी ग्रामपंचायत देते तर बांघकाम गोडाऊन म्हणुन केले जाते इत्यादी. थोडक्यात या कारखान्यात कोनती रसायने आणि कोणती प्रक्रिया केली जाते व त्यावर सुरक्षीतता कशी द्यावी या बाबत कारखाने निरीक्षक यांचे नियंत्रण फारसे नाही. त्यांची कारवाई अपघातानंतरच होते. बरेच वेळा निरीक्षण आणि परवानगी ही प्रक्रिया त्याच्या कागदपत्रात अडकुन तंत्रीक बाबीकडे दुर्लक्ष होते आणि असे अपघात होतात.

गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 03:00
लोकहो, थोडी चिकित्सा करतो. ज्याअर्थी स्फोट होऊन मोठा खड्डा पडला, त्याअर्थी तो जमिनीखाली झाला आहे. आजूबाजूंच्या इमारतींच्या काचा फुटल्या. म्हणजे हवेतून वायुघाव (= शॉकवेव्ह) गेला. तसेच छप्परांची हानी झाली व भिंतींनाही तडे गेले. याचा अर्थ जमिनीतून देखील घनघाव (= मेकॅनिकल शॉकवेव्ह) गेला. दोन्ही प्रकारचे घाव उत्पन्न होणे साध्यासुध्या स्फोटात दुर्मिळ मानले जाते. वृत्तपत्रांत माहिती (वा अफवा) आलीये की बंब (= बॉयलर) फुटला नसून प्रक्रियक (= रीअॅक्टर) फुटला आहे. तर या आस्थापनात असा कोणता प्रक्रियक होता, जो फुटल्याने दुहेरी घाव उत्पन्न होईल? आस्थापनाचे मालक आणि त्यांचे मुलगा व सून असे जवळचे नातेवाईक ठार झाले आहेत. जर मालकाने सुरक्षानियम धाब्यावर बसवून उत्पादन चालवलेले असते तर त्या वेळेस स्वत: इमारतीत राहण्याचा धोका पत्करला नसता. एकंदरीत असे वाटते की हा मुद्दाम घडवून आणलेला घातपाती स्फोट तर नव्हे? कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 06/30/2016 - 08:30
आपण प्रमाणपत्र प्राप्त स्फोटपश्चात तपासनीस (पोस्ट ब्लास्ट इन्वेस्टीगेटर) आहात काय सर??

हुप्प्या Mon, 05/30/2016 - 08:59
भारतातील सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना कुणाच्या जिवाची पर्वा करत नाहीत. काही पैसे खिशात घालण्याकरता ते कुठल्या थराला जातील ह्याला काही सीमा नाही. कारण अशा लोकांवर कुठली कारवाई झालेली नाही, होत नाही आणि होणार नाही. ही एक व्यवस्थित पोसलेली समांतर व्यवस्था आहे. पार वरपर्यंत मलिदा पोचत असल्यामुळे कुणी ही व्यवस्था उध्वस्त करू इच्छित नाही. त्यामुळे हा घातपात नसून सुरक्षा व्यवस्थेतली अक्षम्य हेळसांड आहे असे माझे मत आहे. अगदी भाजपा/शिवसेना सत्तेवर असली तरी ह्यात काही बदल होईल असे वाटत नाही. आणि माझे हे भाकित चुकीचे निघाले तर मला आनंदच होईल!

In reply to by हुप्प्या

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 06/30/2016 - 08:32
हे पटण्यासारखे आहे! एकंदरीत जर भारतात आज अतिशय कायदेशीरपणे सिक्युरिटी ऑडिट केल्यास बहुतांशी SME युनिट्स बंद पडतील!

तिमा Mon, 05/30/2016 - 10:12
डोंबिवलीत झालेला स्फोट अक्षम्य निष्काळजीपणामुळे झालेला आहे असे वाटते. नायट्रेशन वा नायट्रो रसायनांच्या रिअ‍ॅक्शन करताना तापमान व त्यामुळे प्रेशर वाढले तर अशा प्रकारचे स्फोट होऊ शकतात.अशा रिअ‍ॅक्शनमधे बाहेरुन थंड करण्यासाठी सर्क्युलेशनची व्यवस्था असते, ती कधी काम करेनाशी होते, अशा अनेक शक्यता आहेत. परन्तु, नक्की काय केमिकल्स वापरत होते, ते कळल्याशिवाय त्यावर मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाही. हे झाले अपघाताबद्दल. पण मूळ प्रश्न असा आहे की जेंव्हा एखादी रासायनिक प्रक्रिया करणारी औद्योगिक वसाहत बसवली जाते तेंव्हा त्याच्या आसपास काही किलोमीटरपर्यंत कोणातीही मनुष्यवस्ती करायला परवानगी नसते. पण आपल्या भ्र्ष्ट देशांत हे नियम पायदळी तुडवून अशा वस्त्यांना पैसे खाऊन परवानगी दिली जाते. हे काम राजकारण्यांच्या आशीर्वादानेच होते. त्यानंतर अशा दुर्घटना झाल्यावर, उद्योग व ते उद्योजक यांच्या नांवे ओरडा सुरु होतो, लोकांच्या भावना भडकावून दिल्या जातात आणि त्या उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरु लागते. महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी एम.आय.डी.सी.चे गळे शासनानेच, याप्रकारे घोटले आहेत. एखाद्याने आपल्या आयुष्याची कमाई लावून उद्योग उभारायचा, सतराशेसाठ सरकारी इन्स्पेक्टर्सचे लाड पुरवायचे, अनेकांना रोजगार पुरवायचा आणि जवळपास अशी एखादी घटना झाली की आता इथून पुन्हा हलावे लागते की काय, याची चिंता करायची. मग कोणाला उद्योजक व्हावेसे वाटेल ?

रघुनाथ.केरकर Mon, 05/30/2016 - 10:53
सुमारे १९६५ ७० च्या दरम्यान डोंबीवली मध्ये सेट अप झाली. आणी डोंबीवली नीवासी हा रहीवासी भाग हल्लीच्या १० १५ वर्षात वसवला गेला. अशीच एक घटना आमच्या अम्बरनाथ मध्ये २००८ ला झाली. डिएनसी कंपनीतल्या प्रक्रीये मुळे आजुबाजुच्या लोकांना त्रास होउ लागला. त्यानी त्यबद्दल न्यायलयात धाव घेतली. पण न्यायलयाने डिएनसीकंपनी हि अम्बरनाथ वसायच्या आधीपासुन तेथे आहे. अस काहीसं सांगुन नीकाल डिएनसी च्या बजुने दीला. जाता जाता डोंबीवली एम आय डी सी गुजराथ ला गेली तर नवल वाटुन घेउ नये.

हुप्प्या Mon, 05/30/2016 - 11:20
काही वर्षांपूर्वी एक प्रकरण उघडकीस आले होते की गुजराथमधील काही रासायनिक उद्योग (बहुधा वापी व आसपासच्या भागातील) आपल्या कारखान्यातील टाकून द्यायची घातक रसायने टँकरने डोंबिवली एम आय डी सी भागात पाठवायची. अत्यंत अपरात्री पहाटे २ ते ३ च्या आसपास टँकरवाले ही रसायने तिथल्या नाल्यात सोडून देत असत. पहाटे त्या भागात भयानक घाणेरडा वास सुटायचा. लोक एम आय डी सीच्या कंपनीच्या नावाने खडे फोडायची. अनेक वर्षे हा प्रकार चालत होता. पोलिस व अन्य यंत्रणांचे हात ओले केले जात असणार याबद्दल मला शंकाच नाही. नंतर कधीतरी तो उघडकीस आला. तेव्हा गुजराथच्या विकासात डोंबिवलीचा असाही हातभार लागलेला आहे! (अर्थात ते करत असताना डोंबिवलीकरांनी श्वसनाचे, त्वचेचे अनेक विकार सहन केले ते अलाहिदा!).

अत्रन्गि पाउस Mon, 05/30/2016 - 12:11
-करकचून हात पाय आवळनारे नियम -प्रत्येक नियम / कायद्यातून शोधली जाणारी पळवाट -४ आणे वाचवण्यासाठी वाट्टेल त्या क्लृपत्या योजण्याची असोशी -संपूर्णपाने मूल्यरहित होत जाणारी सामाजिक/कौटुंबिक/शैक्षणिक व्यवस्था त्यामुळे आपल्याकडे काहीही शक्य आहे

कंजूस Mon, 05/30/2016 - 13:30
मालकापैकी एकजण केमिकल एंजिनिअर आहे त्याने प्रॅाडक्शन वाढवण्यासाठी काही प्रयोग थेट मेन लेवलि केले असतील आणि तिथेच चुकलं. केमिकल फॅक्ट्यय्रांत बरेच तंत्रज्ञान मागवून कारखाना सुरू करतात त्यात दोष नसतो कारण टाइम टेस्टेड रचना दिलेली असते.पण नंतर फेरफार करणे धोकयाचे असते. आणखी एक मुद्दा अर्धवट ज्ञानी मालक प्रॅाफिट वाढवण्यासाठी कामकाजात जबाबदार असणाय्रा पगारी माणसास बाजूस सारून ढवळाढवळ करतात.एखादी टेस्ट करण्याची प्रथा टंगवून घाई करून प्रोसेस सुरू करायला लावतात. हायड्रोकार्बन्सच्या टाक्या वेल्डिंगचे काम आल्यास आठ दिवसच्यावर प्राडक्शन बंद राहाते.ती रिकामी करणे ,हवेने फ्लश करणे चार चार तासाने आतला वायु स्फोटक आहे का हे हे एका डिवाइसने तपासणे,ते डिवाइस माहित असलेल्या स्फोटक मिश्रणाला टेस्ट करून खात्री करणे पुन्हा पाहाणे वगैरे .टाकीच्या आत हवेचे गॅसचे मिश्रण फारच स्फडटक असतं.वेल्डिंगचा आर्क / ठिणगी झाली कि स्फोट होतो.परंतू या पद्धतीत घाई करून चालत नाही.पगारी इंजिनेर व्यवस्थित काम करत असतो.त्याच्या डोक्यात सुरक्षितता हा एकच विचार असतो.मालकाच्या डोसक्याततला प्रॅाफिट त्या प्रोसिजरची वाट लावतो.ते टेस्टिंग डिवाइस टेसट्टच्या अगोदर आणि नंतर स्टँडर्ड मिक्शरने टेस्ट केल्यावरच विश्वास ठेवायचा असतो.

गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 13:39
लोकहो, दैनिक सकाळमधल्या या वृत्तानुसार मालकांच्या सुनेचा मृतदेह शंभर फूट दूरवर उडालेला आहे. यावरून १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांची आठवण झाली. प्रभादेवीस सेंच्युरी बाजाराजवळ झालेल्या स्फोटात एक दुमजली बसच्या पूर्णपणे ठिकऱ्याठिकऱ्या उडाल्या. चालकाचा मृतदेह असाच बाजूच्या सहामजली इमारतीच्या छपरावर फेकला गेला होता. तसेच प्रभादेवी परिसरातल्या इतर वास्तूंचे डोंबिवलीप्रमाणेच नुकसान (भिंतींना तडे, काचा फुटणे, इत्यादि) झाले होते. शिवाय प्रभादेवीच्या मुख्य रस्त्यावर खड्डाही पडला होता. यावरून प्रभादेवी आणि डोंबिवलीच्या स्फोटांत तिहेरी साम्य दिसतं. प्रभादेवीचा स्फोट दहशतवादी कृत्य होतं. डोंबिवली स्फोटही असाच मुद्दाम घडवून आणला गेला असेल काय? आ.न., -गा.पै.

mandarbsnl Mon, 05/30/2016 - 13:40
खट्टा मीठा चित्रपटातील एक दृश्य आठवले की ज्यात टीनु आनंद ला बळीचा बकरा बनवले जाते...ज्याचा काशाशीही काहीही संबंध नाही अशा माणसाला पकडून मारले जाते...असेच काहिसे पाहायला मिळेल आता..कोणाला तरी पकडून उभे केले जाईल आणि त्यालाच दोषी मानून कारवाईचे नाटक केले जाईल..

राही Mon, 05/30/2016 - 14:04
अत्यंत दुर्दैवी घटना. आता संपूर्ण एमायडीसीच हलवा अशी मागणी सुरू होईल. इकडे दक्षिण मुंबईत ससून डॉक्सचे मासळीबंदर हलवा (लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.) मुंबई बंदरातले कामकाज हलवा (ती जागा लोकांच्या स्वास्थ्यासाठी वापरा-उदा. यॉट क्लब, बोट रेसिन्ग, स्कूबा डाय्विन्ग इ. आणि शेपूट किंवा मधाचे बोट म्हणून 'परवडणारी' घरेनिर्मिती आहेच.) राणीच्या बागेतली जनावरे हलवा, अख्खी राणीची बागच हलवा, आरे कॉलनीतल्या गायी हलवा, आरे कॉलनीच हलवा, कृष्णगिरी उपवनातले बिबटे हलवा किंवा नॅशनल पार्कच हलवा, समुद्रकिनारे हलवा म्हणजे दूर न्या, मिठागरे हटवा, आणि सगळीकडे सेंट्रल पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्ट्स, अम्यूझ्मेंट पार्क्स, साहसक्रीडा आणि मधाचे बोट म्हणजे परवडणारी घरे बांधा. अगदी विमानतळाची जागासुद्धा 'परवडणार्‍या' गृहनिर्मितीसाठी वापरा. वेड पांघरून पेडगावला चाललेत सगळे.

नितीनचंद्र Wed, 06/29/2016 - 22:01
वाढते उद्योग, फॅक्टरी लायसन्स ला परवानगी दिल्याशिवाय होणारा विद्युत पुरवठा किंवा सेल्स टॅक्स इत्यादी चे मिळणारे रजिस्ट्रेशन आदी ची नियमावली यामुळे आज महाराष्ट्रात काय अनेक राज्यात अनेक कारखाने त्याच्या तपासणी व परवानगी शिवाय कार्यरत आहेत. फॅक्टरी नियमात असलेले अनेक क्लॉज, फॅक्टरी निरीक्षकांची अपुरी संख्या, तंत्र सुधार आणि अनेक कारणे आहेत जसे एम आय डी सी नसलेल्या भागात फॅक्ट्री उभी रहाते. याला इमारतीची परवानगी ग्रामपंचायत देते तर बांघकाम गोडाऊन म्हणुन केले जाते इत्यादी. थोडक्यात या कारखान्यात कोनती रसायने आणि कोणती प्रक्रिया केली जाते व त्यावर सुरक्षीतता कशी द्यावी या बाबत कारखाने निरीक्षक यांचे नियंत्रण फारसे नाही. त्यांची कारवाई अपघातानंतरच होते. बरेच वेळा निरीक्षण आणि परवानगी ही प्रक्रिया त्याच्या कागदपत्रात अडकुन तंत्रीक बाबीकडे दुर्लक्ष होते आणि असे अपघात होतात.
नुकताच डोंबिवलीच्या एम आय डी सी च्या क्षेत्रातील एका कारखान्यात प्रचंड स्फोट होऊन डझनभर लोक मरण पावले आणि शेकडो जखमी झाले. शिवाय अनेक इमारतींना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे. एकेकाळचे रम्य, सुसंस्कृत शहर आज रासायनिक ज्वालामुखीच्या जवळ जाऊन बसले आहे. खुद्द एम आय डी सीत पाहिले तर घरांच्या आसपास कारखाने आहेत का कारखान्यांच्या आसपास घरे आहेत ते कळत नाही. घातक रसायने, वायु वगैरे वापरले जातात अशा कारखान्यांकरता कडक नियम असतात. त्यांच्या आसपास पुरेशी मोकळी जागा, प्रशिक्षित कामगार असणे वगैरे. पण डोंबिवलीची एम आय डी सी केवळ पैसे खाऊन हवी ती कागदपत्रे बनवते.

मांगी तुंगी, स्टॅच्यू ऑफ अहिंसा, धर्मवाद, निसर्ग आणि आपण

वेल्लाभट ·

चैतन्य ईन्या Wed, 01/27/2016 - 17:52
शासकीय अल्पसंख्य आहेत ते आता. जास्त बोलू नका. शिवाय तसेही आपल्याला निसर्ग वगैरे ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाहीये. आपण बुवा स्वर्गात पोहोचाल्याशी कारण बाकी काय का होऊ देत हो

एस Wed, 01/27/2016 - 18:18
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर म्हणून, मला त्या निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडलेल्या, पोखरलेल्या रूपाने विषण्ण केलं.
अगदी सहमत. :-(

सायकलस्वार Wed, 01/27/2016 - 18:38
ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या मध्यभागी बांधलेलं देऊळसुद्धा हिडीस आहे. त्याने तळ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचं विद्रुपीकरण करण्यापलिकडे काहीही साध्य झालेलं नाही. पण सांगता कोणाला?...

सामान्यनागरिक Wed, 01/27/2016 - 21:06
आपल्या देशात धर्म म्हंटलं म्हणजे काही बोलता येत नाही. या धाग्यावर जास्त चर्चा केली तरी चर्चा करणाऱ्या लोकांच्या घरावर येण्याची शक्यता आहे. अनेक हिंदू देवळांना सुद्धा अत्यंत हिडीस पद्धतीने रंग देऊन विद्रुप केलेलं आहे. त्यांचं मूळ दगडातील सौंदर्य हरवून गेलेलं आहे.

अन्नू गुरुवार, 01/28/2016 - 00:47
रोचक आणि तितकाच वादग्रस्त विषय.
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
याच्याशी १०० नव्हे.. १००००००००००+++++++ सहमत.
रस्ते, पाणी यांची कामं होण्यासाठी या पुतळ्याचं निमित्तच हवं होतं का?
नाही. या सामाजिक सुधारणा वगैरेंसाठी कुठलाही पुतळा किंवा स्मारक उभारले जात नाही. यामागे श्रद्धेचे कारण असते- थोडक्यात- पुतळा उभारण्यासाठी श्रद्धेचे निमित्त असते. इट्स वोर्स्ट, बट डॅम ट्रूथ!! आता पुतळा का आणि कशासाठी उभारायचा? आणि त्याचे फायदे काय? तर- जसे मी वर सांगितले, पुतळा सामाजिक सेवेसाठी नाही तर त्यातून मिळणार्‍या फायद्यासाठी उभारला जातो. त्यातून होणारे फायदे म्हणजे- रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, वीज- वाहतुक- पाण्याच्या सोयी, जागेचे सुशोभिकरण आणि नैसर्गिक देखावे, भक्त, अनुयायी आणि इतर पर्यटकांसाठी जागेच्या आणि इतर सोयी. म्हणजेच, रेंटवर रहाण्याची सोयी करणारे गेस्टहाऊस- वस्तीगृहे- हॉटेल्स, खाण्यापिण्याच्या सोयी वगैरे-वगैरे! आणि इतर बरेच काही. अर्थात हे याचे खरे फायदे नाहीत, फक्त लोकांना दाखवण्याचे फायदे आहेत. मग याचे खरे फायदे आहेत तरी काय? आणि ते कोणाचे आहेत? हाच सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न आहे. तर याचे फायदे जे कधीच दाखवले जात नाहीत ते म्हणजे, त्या संबंधीत असणार्‍या अधिकारी उद्योगपती आणि संस्थानिकांचे! बघा म्हणजे आता- भक्तांच्या(?) मागणीनुसार पुतळा तयार करणे निश्चित झाले तर तो कोण उभारणार? मग एक नेता (पैशाच्या कारभाराची) सगळी जबाबदारी आपल्यावर घेतो आणि होणार्‍या खर्चाच्या दुप्पट-तिप्पट खर्च दाखवून तो अमाप पैसे आणि नंतर पुतळा बनवल्याचे श्रेयही घेतो! झाला फायदा त्याचा? नंतर नंबर उद्योगतीचा! (जो अगोदरपासूनच लायनीत उभा असतो!!) आता पुतळा उभारणार म्हणजे त्याचे काम एखाद्या उद्योगपतीच करणार. मग इथे एक उद्योगपतीवर ते काम सोपविले जाते. यात त्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो. कारण कित्येक वर्ष आपले 'पैसे कव्हर झाले नाहीत' च्या नावावर तो तेथे वेगवेगळ्या युक्त्यांनी मिळकत करतच राहतो. याशिवाय तेथील अधिकारी, संस्थानिक त्यांचे फायदे असतात ते वेगळेच!

वाह्यात कार्ट गुरुवार, 01/28/2016 - 12:05
या पुतळ्याच्या उभारणीला मान्यता देणारे स्वतः माननीय मुख्यमंत्री आहेत
नक्की कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेय यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, कारण मी ४ वर्षापूर्वी मांगी- तुंगी ट्रेक केला होता तेव्हा सुद्धा मूर्तीसाठी डोंगर कापण्याचं काम चालूच होतं. पर्यावरणाचा ऱ्हास पाहून मन विषण्ण झालं. आणि आता एकदा ही प्रथा पडली कि सर्व धर्मीय आता आपापल्या हिश्श्यात्ला सह्याद्री तोडायला सरसावणार.

In reply to by वाह्यात कार्ट

वेल्लाभट गुरुवार, 01/28/2016 - 12:56
माफ करा माझं वाक्य पुरेसं स्पष्ट झालं नाही. पुतळ्याला मान्यता अर्थातच तत्कालीन सरकारने दिली असावी. पण सद्य सरकारही अप्रत्यक्षपणे त्यास पाठिंबाच देत आहे. खालील दुवे बघा अशी विनंती करतो. http://www.dnaindia.com/mumbai/report-rs185-crore-state-nod-for-infra-work-at-nashik-hills-2158992 http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/70-crore-plan-for-idol-installation-at-Mangi-Tungi/articleshow/50037188.cms

नाखु गुरुवार, 01/28/2016 - 15:45
आता उरलो पुतळ्यापुरता !!! घरीच बसलेला (टा़ळ न कुटणारा) वारकरी

शरद Mon, 02/01/2016 - 16:52
हे परमकृपालु दयाघना, या पर्यावरण संरक्षकांना सहाव्या शतकात जन्माला न घातल्याबद्दल तुझे किती आभार मानू ? नाही तर मला वेरूळचे कैलास लेणे पहावयास तरी मिळाले असते कां ? शरद

मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगरे ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो. मध्येच कुठली ही सूचना न देता येणाऱ्या स्पीड ब्रेकर मुळे दोन वेळा गाडी ला दणके बसले, रफड्रायव्हिंग करतो म्हनुन वडील ओरडायला लागले आणि भावाने मला स्टेरिंग वरून उतरवून स्वत गाडीचा ताबा घेतला. गाडीची वेगवान 80 ते 100 च्या स्पीड वाली घोडदौड थांबली आणी 40 ते 70 च्या मध्ये गाडी चालू लागली. पिंपळनेर सटाणा रस्त्याचे ही काम चालू असल्याने हळुहळु साडे 9 च्या आसपास उजव्या बाजूला turn घेऊन मांगीतुंगी पोहोचलो. इतक्या लवकर कुठल्याही हॉटेलात काहीच नाश्त्यासाठी तयार झालेले नसल्यामुळें parle g चा पुडा पाण्यात बुडवून खाऊन मांगी तुंगी च्या पायथ्याशी पोहोचलो. मांगीतुंगी हे दिंगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी वर डोंगरावर बऱ्याच जुन्या जैन लेण्या कोरल्या आहेत, जगातील सर्वात उंच 108 फुटी ऋषभदेव ह्यांचा पुतळा मांगी तुंगी वर बऱ्याच वर डोंगर फोडून( की बाहेरून दगड आणून?) बनवलाय. खाली भक्तांची रहाण्याची सोय देखील आहे. अनेक जैन धर्मिय दुरवरून ईथे भेट देण्यासाठी येतात. पायथ्याला भिलवाडी म्हणून गाव आहे. सर्व सुचना फलक हिंदीत होते. (मराठी ईथेही डावललेली होती) 2016 पासून थेट पुतळ्या पर्यंत 100 रूपये तिकिटात गाडी सोडते. ( हे आधी माहीत नव्हतं 2018 ला खालून पायी चढत गेलो होतो) बोलता बोलता ड्रायवर कडून कळले की गाडी 4 व्हील ड्राइव्ह आहे. प्रायव्हेट गाडी इतका तीव्र चढ चढेल ह्याची शक्यता कमी आहे. खाली अल्टो पार्क करून 100 रुपये प्रत्येकी तिकीट घेऊन (ज्यात वर लिफ्ट लावलीय पुतळ्याजवळ त्याचेही तिकीट असते) गाडीत जाऊन बसलो. एक आठ लोकांच जैन कुटुंब विजापूर (कर्नाटक) वरून आलं होतं. ते आणि आम्ही निघालो 20 मिनिटांत गाडी वर पोहोचली. लिफ्ट चालू करायला वेळ लागत होता म्हणून आम्ही जिन्याने चढू लागलो तर माकडांनी प्रचंड त्रास देणं सुरू केलं. ते माकड माणसांची सवय झाल्याने आजिबात घाबरत नव्हते. माझ्या बॅग मधून एकाने बिसलेरी ओढली पण वजन न पेलल्याने सोडून दिली. मग बॉटल आत बॅग मध्ये घातल्या. तरी बॅगची ओढाताण चालूच होती. शेवटी एक पार्ले जी दूर फेकला सगळे तिकडे पळाले आणी आम्ही मोकळे झालो. पुतळा पाहिला. तिथल्या एका कर्मचाऱ्याने आत (तिथल्या शेड च्या ऑफिस मध्ये ) मुर्त्या आहेत त्यांचं दर्शन घ्या म्हणून सांगितले. पण आत कुठुन आलात वगैरे कोणता समाज, काय करतात वगैरे चौकश्या सुरू झाल्या त्या देणगी देणार की नाही देतील तर कीती निघेल ह्या साठी होत्या हे लक्षात आल्याने आत गेलो नाही. मंग मांगी आणि तुंगी ह्या सुळक्याकडे जायचे ठरले. भाऊ आणि वडील पायर्या असूनही ती उभी चढ पाहून येण्यास नकार देऊ लागले. मग व एकटा निघालो. वर एक माकड पिच्छा करू लागल. मग बरोबर आणलेल्या छत्रीची ढाल करून त्याच्या पासून सुटका करून मांगी ह्या सुळक्यावर पोहोचलो. तिथे एक परभणी आणी एक नाशिक हुन आलेला ग्रुप होता दोन्ही ग्रुप माकडांच्या भीतीने बरोबर फिरत होते. मग मीही त्यांना जॉईन होऊन निघालो. पायथ्याहून एका कुत्र्याने त्यांची सोबत केली होती. त्याला घाबरून माकडे येत नव्हती. पाठीवर माकडानी केलेल्या असंख्य जखमा घेऊन ते कुत्र वावरत होतं. मांगी आणी तुंगी दोन्ही सुळक्यांवर लेण्या कोरलेल्या आहेत. मांगी च्या बाजूलाच एक किल्ला आहे. वर चढलेल्या मधील कुणीतरी त्याला मुल्हेर घोषीत केले आणी इतरांनी ही त्यात होकार भरला. पण आपल्या समूहातील जिरगे सरानी सांगितल्यावर तो न्हाविगड उर्फ तांबोळ्या आहे हे कळाले. तिथून मग तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा घालून खाली उतरलो. गाडीने खाली ड्रॉप केले. तो पर्यन्त दुपारचा एक वाजला होता. वर लिंबू सरबत विकनारे स्थानीक बसलेले होते. २० रूपयात ग्लास. फिरताना वेळ लक्षात आला नाही. मग तिथून निघालो रस्त्यात खालप गाव लागतं तिथे आपला समुह सदस्य शशीराज राहतो. त्याला फोन केला. पण त्या बहीर्याला माझा आवाज आला नाही. त्या दिवशी ग्रामपंचायत ईलेक्शन चा रिजल्ट असल्याने रस्त्यात भेटनारी गावेच्या गावे गुलालाने ओसंडून वाहत होती. मग मांगीतुंगी~ सटाणा~देवळा~ चांदवड~लासलगाव~विंचूर~येवला~कोपरंगाव~नगर करत पुण्यात रात्री दहा ला पोहोचलो.

चैतन्य ईन्या Wed, 01/27/2016 - 17:52
शासकीय अल्पसंख्य आहेत ते आता. जास्त बोलू नका. शिवाय तसेही आपल्याला निसर्ग वगैरे ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाहीये. आपण बुवा स्वर्गात पोहोचाल्याशी कारण बाकी काय का होऊ देत हो

एस Wed, 01/27/2016 - 18:18
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर म्हणून, मला त्या निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडलेल्या, पोखरलेल्या रूपाने विषण्ण केलं.
अगदी सहमत. :-(

सायकलस्वार Wed, 01/27/2016 - 18:38
ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या मध्यभागी बांधलेलं देऊळसुद्धा हिडीस आहे. त्याने तळ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचं विद्रुपीकरण करण्यापलिकडे काहीही साध्य झालेलं नाही. पण सांगता कोणाला?...

सामान्यनागरिक Wed, 01/27/2016 - 21:06
आपल्या देशात धर्म म्हंटलं म्हणजे काही बोलता येत नाही. या धाग्यावर जास्त चर्चा केली तरी चर्चा करणाऱ्या लोकांच्या घरावर येण्याची शक्यता आहे. अनेक हिंदू देवळांना सुद्धा अत्यंत हिडीस पद्धतीने रंग देऊन विद्रुप केलेलं आहे. त्यांचं मूळ दगडातील सौंदर्य हरवून गेलेलं आहे.

अन्नू गुरुवार, 01/28/2016 - 00:47
रोचक आणि तितकाच वादग्रस्त विषय.
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
याच्याशी १०० नव्हे.. १००००००००००+++++++ सहमत.
रस्ते, पाणी यांची कामं होण्यासाठी या पुतळ्याचं निमित्तच हवं होतं का?
नाही. या सामाजिक सुधारणा वगैरेंसाठी कुठलाही पुतळा किंवा स्मारक उभारले जात नाही. यामागे श्रद्धेचे कारण असते- थोडक्यात- पुतळा उभारण्यासाठी श्रद्धेचे निमित्त असते. इट्स वोर्स्ट, बट डॅम ट्रूथ!! आता पुतळा का आणि कशासाठी उभारायचा? आणि त्याचे फायदे काय? तर- जसे मी वर सांगितले, पुतळा सामाजिक सेवेसाठी नाही तर त्यातून मिळणार्‍या फायद्यासाठी उभारला जातो. त्यातून होणारे फायदे म्हणजे- रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, वीज- वाहतुक- पाण्याच्या सोयी, जागेचे सुशोभिकरण आणि नैसर्गिक देखावे, भक्त, अनुयायी आणि इतर पर्यटकांसाठी जागेच्या आणि इतर सोयी. म्हणजेच, रेंटवर रहाण्याची सोयी करणारे गेस्टहाऊस- वस्तीगृहे- हॉटेल्स, खाण्यापिण्याच्या सोयी वगैरे-वगैरे! आणि इतर बरेच काही. अर्थात हे याचे खरे फायदे नाहीत, फक्त लोकांना दाखवण्याचे फायदे आहेत. मग याचे खरे फायदे आहेत तरी काय? आणि ते कोणाचे आहेत? हाच सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न आहे. तर याचे फायदे जे कधीच दाखवले जात नाहीत ते म्हणजे, त्या संबंधीत असणार्‍या अधिकारी उद्योगपती आणि संस्थानिकांचे! बघा म्हणजे आता- भक्तांच्या(?) मागणीनुसार पुतळा तयार करणे निश्चित झाले तर तो कोण उभारणार? मग एक नेता (पैशाच्या कारभाराची) सगळी जबाबदारी आपल्यावर घेतो आणि होणार्‍या खर्चाच्या दुप्पट-तिप्पट खर्च दाखवून तो अमाप पैसे आणि नंतर पुतळा बनवल्याचे श्रेयही घेतो! झाला फायदा त्याचा? नंतर नंबर उद्योगतीचा! (जो अगोदरपासूनच लायनीत उभा असतो!!) आता पुतळा उभारणार म्हणजे त्याचे काम एखाद्या उद्योगपतीच करणार. मग इथे एक उद्योगपतीवर ते काम सोपविले जाते. यात त्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो. कारण कित्येक वर्ष आपले 'पैसे कव्हर झाले नाहीत' च्या नावावर तो तेथे वेगवेगळ्या युक्त्यांनी मिळकत करतच राहतो. याशिवाय तेथील अधिकारी, संस्थानिक त्यांचे फायदे असतात ते वेगळेच!

वाह्यात कार्ट गुरुवार, 01/28/2016 - 12:05
या पुतळ्याच्या उभारणीला मान्यता देणारे स्वतः माननीय मुख्यमंत्री आहेत
नक्की कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेय यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, कारण मी ४ वर्षापूर्वी मांगी- तुंगी ट्रेक केला होता तेव्हा सुद्धा मूर्तीसाठी डोंगर कापण्याचं काम चालूच होतं. पर्यावरणाचा ऱ्हास पाहून मन विषण्ण झालं. आणि आता एकदा ही प्रथा पडली कि सर्व धर्मीय आता आपापल्या हिश्श्यात्ला सह्याद्री तोडायला सरसावणार.

In reply to by वाह्यात कार्ट

वेल्लाभट गुरुवार, 01/28/2016 - 12:56
माफ करा माझं वाक्य पुरेसं स्पष्ट झालं नाही. पुतळ्याला मान्यता अर्थातच तत्कालीन सरकारने दिली असावी. पण सद्य सरकारही अप्रत्यक्षपणे त्यास पाठिंबाच देत आहे. खालील दुवे बघा अशी विनंती करतो. http://www.dnaindia.com/mumbai/report-rs185-crore-state-nod-for-infra-work-at-nashik-hills-2158992 http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/70-crore-plan-for-idol-installation-at-Mangi-Tungi/articleshow/50037188.cms

नाखु गुरुवार, 01/28/2016 - 15:45
आता उरलो पुतळ्यापुरता !!! घरीच बसलेला (टा़ळ न कुटणारा) वारकरी

शरद Mon, 02/01/2016 - 16:52
हे परमकृपालु दयाघना, या पर्यावरण संरक्षकांना सहाव्या शतकात जन्माला न घातल्याबद्दल तुझे किती आभार मानू ? नाही तर मला वेरूळचे कैलास लेणे पहावयास तरी मिळाले असते कां ? शरद

मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगरे ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो. मध्येच कुठली ही सूचना न देता येणाऱ्या स्पीड ब्रेकर मुळे दोन वेळा गाडी ला दणके बसले, रफड्रायव्हिंग करतो म्हनुन वडील ओरडायला लागले आणि भावाने मला स्टेरिंग वरून उतरवून स्वत गाडीचा ताबा घेतला. गाडीची वेगवान 80 ते 100 च्या स्पीड वाली घोडदौड थांबली आणी 40 ते 70 च्या मध्ये गाडी चालू लागली. पिंपळनेर सटाणा रस्त्याचे ही काम चालू असल्याने हळुहळु साडे 9 च्या आसपास उजव्या बाजूला turn घेऊन मांगीतुंगी पोहोचलो. इतक्या लवकर कुठल्याही हॉटेलात काहीच नाश्त्यासाठी तयार झालेले नसल्यामुळें parle g चा पुडा पाण्यात बुडवून खाऊन मांगी तुंगी च्या पायथ्याशी पोहोचलो. मांगीतुंगी हे दिंगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी वर डोंगरावर बऱ्याच जुन्या जैन लेण्या कोरल्या आहेत, जगातील सर्वात उंच 108 फुटी ऋषभदेव ह्यांचा पुतळा मांगी तुंगी वर बऱ्याच वर डोंगर फोडून( की बाहेरून दगड आणून?) बनवलाय. खाली भक्तांची रहाण्याची सोय देखील आहे. अनेक जैन धर्मिय दुरवरून ईथे भेट देण्यासाठी येतात. पायथ्याला भिलवाडी म्हणून गाव आहे. सर्व सुचना फलक हिंदीत होते. (मराठी ईथेही डावललेली होती) 2016 पासून थेट पुतळ्या पर्यंत 100 रूपये तिकिटात गाडी सोडते. ( हे आधी माहीत नव्हतं 2018 ला खालून पायी चढत गेलो होतो) बोलता बोलता ड्रायवर कडून कळले की गाडी 4 व्हील ड्राइव्ह आहे. प्रायव्हेट गाडी इतका तीव्र चढ चढेल ह्याची शक्यता कमी आहे. खाली अल्टो पार्क करून 100 रुपये प्रत्येकी तिकीट घेऊन (ज्यात वर लिफ्ट लावलीय पुतळ्याजवळ त्याचेही तिकीट असते) गाडीत जाऊन बसलो. एक आठ लोकांच जैन कुटुंब विजापूर (कर्नाटक) वरून आलं होतं. ते आणि आम्ही निघालो 20 मिनिटांत गाडी वर पोहोचली. लिफ्ट चालू करायला वेळ लागत होता म्हणून आम्ही जिन्याने चढू लागलो तर माकडांनी प्रचंड त्रास देणं सुरू केलं. ते माकड माणसांची सवय झाल्याने आजिबात घाबरत नव्हते. माझ्या बॅग मधून एकाने बिसलेरी ओढली पण वजन न पेलल्याने सोडून दिली. मग बॉटल आत बॅग मध्ये घातल्या. तरी बॅगची ओढाताण चालूच होती. शेवटी एक पार्ले जी दूर फेकला सगळे तिकडे पळाले आणी आम्ही मोकळे झालो. पुतळा पाहिला. तिथल्या एका कर्मचाऱ्याने आत (तिथल्या शेड च्या ऑफिस मध्ये ) मुर्त्या आहेत त्यांचं दर्शन घ्या म्हणून सांगितले. पण आत कुठुन आलात वगैरे कोणता समाज, काय करतात वगैरे चौकश्या सुरू झाल्या त्या देणगी देणार की नाही देतील तर कीती निघेल ह्या साठी होत्या हे लक्षात आल्याने आत गेलो नाही. मंग मांगी आणि तुंगी ह्या सुळक्याकडे जायचे ठरले. भाऊ आणि वडील पायर्या असूनही ती उभी चढ पाहून येण्यास नकार देऊ लागले. मग व एकटा निघालो. वर एक माकड पिच्छा करू लागल. मग बरोबर आणलेल्या छत्रीची ढाल करून त्याच्या पासून सुटका करून मांगी ह्या सुळक्यावर पोहोचलो. तिथे एक परभणी आणी एक नाशिक हुन आलेला ग्रुप होता दोन्ही ग्रुप माकडांच्या भीतीने बरोबर फिरत होते. मग मीही त्यांना जॉईन होऊन निघालो. पायथ्याहून एका कुत्र्याने त्यांची सोबत केली होती. त्याला घाबरून माकडे येत नव्हती. पाठीवर माकडानी केलेल्या असंख्य जखमा घेऊन ते कुत्र वावरत होतं. मांगी आणी तुंगी दोन्ही सुळक्यांवर लेण्या कोरलेल्या आहेत. मांगी च्या बाजूलाच एक किल्ला आहे. वर चढलेल्या मधील कुणीतरी त्याला मुल्हेर घोषीत केले आणी इतरांनी ही त्यात होकार भरला. पण आपल्या समूहातील जिरगे सरानी सांगितल्यावर तो न्हाविगड उर्फ तांबोळ्या आहे हे कळाले. तिथून मग तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा घालून खाली उतरलो. गाडीने खाली ड्रॉप केले. तो पर्यन्त दुपारचा एक वाजला होता. वर लिंबू सरबत विकनारे स्थानीक बसलेले होते. २० रूपयात ग्लास. फिरताना वेळ लक्षात आला नाही. मग तिथून निघालो रस्त्यात खालप गाव लागतं तिथे आपला समुह सदस्य शशीराज राहतो. त्याला फोन केला. पण त्या बहीर्याला माझा आवाज आला नाही. त्या दिवशी ग्रामपंचायत ईलेक्शन चा रिजल्ट असल्याने रस्त्यात भेटनारी गावेच्या गावे गुलालाने ओसंडून वाहत होती. मग मांगीतुंगी~ सटाणा~देवळा~ चांदवड~लासलगाव~विंचूर~येवला~कोपरंगाव~नगर करत पुण्यात रात्री दहा ला पोहोचलो.
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही. अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे.

पुन्हा इशरत जहान

हुप्प्या ·

भंकस बाबा Sun, 12/13/2015 - 07:51
विश्वास कोणावर ठेवावा? ज्याला अतिरेकि म्हणुन पकडले आहे त्याच्यावर वा जितुभाईवर जे मुस्लिमाचे कैवारी म्हणुन वावरतात? जनता दल वैगेरेचे बोलू नका हो, कोणतेही जनता दल बाय डिफ़ॉल्ट मुस्लिमाचे कैवारीच असते. स्पष्टीकरण अशी असतील. १) हेडली हा एक अतिरेकी आहे.त्याची साक्ष ग्राह्य मानली जाऊ नये. २) हे एक मुस्लिमाविरुद्ध कारस्थान आहे. ३) हेडली अमेरिकेचा अंडर कवर एजेंट होता त्यामुळे तो अमेरिकेच्या मुस्लिमविरोधी योजनेचा एक प्यादा आहे. ४) उगाचच शरद पवार, आव्हाड ,नितेश कुमार, ओवेसी, आज़म खान ,अबु आझमी यांच्या देशभक्तिवर संशय घेऊ नये. ५) आणि शेवटचा , हे कॉपी पेस्ट आहे. यात आरएसएसचा हाथ आहे. ( हाथ असेच वाचावे, मग कसं कास्मोपलिटिन् असल्याप्रमाणे वाटते.)

हुप्प्या Mon, 12/14/2015 - 05:48
हेडली हा एक अतिरेकी आहे हे खरे. पण त्याला माफीचा साक्षीदार केले आहे त्यामुळे ज्या माहितीमुळे तो गोत्यात येणार नाही अशी माहिती तो देईल. तसे वचन दिल्यावरच त्याला माफीचा साक्षीदार केले गेले असेल. नाहीतर जास्त गंभीर गुन्ह्याच्या खटल्याकरता त्याला हस्तांतरित करायचा तगादा भारत सरकारने लावला असता. त्यामुळे तो जे सांगतो ते खोटेच असे म्हणणे ठीक नाही. तशात हा हेडली सी आय ए चा एजंट होता पण नंतर फितूर होऊन शत्रूला मिळाला त्यामुळे त्याच्यावर अमेरिकन सरकारचा दबाव असेल की काहीतरी माहिती दे. आणि इशरत जहान हा काही मोठी महत्त्वाची असामी नाही आणि आता ती मेलेली आहे त्यामुळे ती माहिती देणे तितकेसे धोकादायक नाही असा हा हिशेब असावा. ही माहिती जुनी असली तरी थेट दिव्य मराठीपासून अन्य माध्यमातून ही बातमी अचानक झळकली हे आश्चर्य आहे.

योगी९०० Mon, 12/14/2015 - 09:34
वसंत पुरकेंनी पण तिला खुप सपोर्ट केले होते. काही लाखांची मदत पण तिच्या घरच्यांना केली होती..

In reply to by योगी९००

योगी९०० Tue, 12/15/2015 - 10:29
वसंत पुरकेंनी नाही तर डावखरेंनी मदत केली होती.....!! श्रीरंग जोशी धन्यवाद ..!! त्यांनी सांगितले नसते तर माझी चूक झाली हे कळलंच नसते.

नुकतेच ओबामांकडून मोदींचे झालेले कौतुक्,नंतर जपानच्या पंतप्रधानांनी केलेली तारीफ व आता हे प्रकरण... ह्या तिन्ही घटना योगायोगानेच घडल्या आहेत असे समजून चालूया.

In reply to by अनुप ढेरे

वृंदा करात होय!! असो असो त्या बाई अन एकंदरित त्यांच्यापक्षाच्या बेसिक मधेच लोच्या आहे! विघ्नसंतोषी गँग आहे ती एक महत्वाची

भंकस बाबा Sun, 12/13/2015 - 07:51
विश्वास कोणावर ठेवावा? ज्याला अतिरेकि म्हणुन पकडले आहे त्याच्यावर वा जितुभाईवर जे मुस्लिमाचे कैवारी म्हणुन वावरतात? जनता दल वैगेरेचे बोलू नका हो, कोणतेही जनता दल बाय डिफ़ॉल्ट मुस्लिमाचे कैवारीच असते. स्पष्टीकरण अशी असतील. १) हेडली हा एक अतिरेकी आहे.त्याची साक्ष ग्राह्य मानली जाऊ नये. २) हे एक मुस्लिमाविरुद्ध कारस्थान आहे. ३) हेडली अमेरिकेचा अंडर कवर एजेंट होता त्यामुळे तो अमेरिकेच्या मुस्लिमविरोधी योजनेचा एक प्यादा आहे. ४) उगाचच शरद पवार, आव्हाड ,नितेश कुमार, ओवेसी, आज़म खान ,अबु आझमी यांच्या देशभक्तिवर संशय घेऊ नये. ५) आणि शेवटचा , हे कॉपी पेस्ट आहे. यात आरएसएसचा हाथ आहे. ( हाथ असेच वाचावे, मग कसं कास्मोपलिटिन् असल्याप्रमाणे वाटते.)

हुप्प्या Mon, 12/14/2015 - 05:48
हेडली हा एक अतिरेकी आहे हे खरे. पण त्याला माफीचा साक्षीदार केले आहे त्यामुळे ज्या माहितीमुळे तो गोत्यात येणार नाही अशी माहिती तो देईल. तसे वचन दिल्यावरच त्याला माफीचा साक्षीदार केले गेले असेल. नाहीतर जास्त गंभीर गुन्ह्याच्या खटल्याकरता त्याला हस्तांतरित करायचा तगादा भारत सरकारने लावला असता. त्यामुळे तो जे सांगतो ते खोटेच असे म्हणणे ठीक नाही. तशात हा हेडली सी आय ए चा एजंट होता पण नंतर फितूर होऊन शत्रूला मिळाला त्यामुळे त्याच्यावर अमेरिकन सरकारचा दबाव असेल की काहीतरी माहिती दे. आणि इशरत जहान हा काही मोठी महत्त्वाची असामी नाही आणि आता ती मेलेली आहे त्यामुळे ती माहिती देणे तितकेसे धोकादायक नाही असा हा हिशेब असावा. ही माहिती जुनी असली तरी थेट दिव्य मराठीपासून अन्य माध्यमातून ही बातमी अचानक झळकली हे आश्चर्य आहे.

योगी९०० Mon, 12/14/2015 - 09:34
वसंत पुरकेंनी पण तिला खुप सपोर्ट केले होते. काही लाखांची मदत पण तिच्या घरच्यांना केली होती..

In reply to by योगी९००

योगी९०० Tue, 12/15/2015 - 10:29
वसंत पुरकेंनी नाही तर डावखरेंनी मदत केली होती.....!! श्रीरंग जोशी धन्यवाद ..!! त्यांनी सांगितले नसते तर माझी चूक झाली हे कळलंच नसते.

नुकतेच ओबामांकडून मोदींचे झालेले कौतुक्,नंतर जपानच्या पंतप्रधानांनी केलेली तारीफ व आता हे प्रकरण... ह्या तिन्ही घटना योगायोगानेच घडल्या आहेत असे समजून चालूया.

In reply to by अनुप ढेरे

वृंदा करात होय!! असो असो त्या बाई अन एकंदरित त्यांच्यापक्षाच्या बेसिक मधेच लोच्या आहे! विघ्नसंतोषी गँग आहे ती एक महत्वाची
जगप्रसिद्ध दहशतवादी डेव्हिड हेडली हा अमेरिकेत कैदेत आहे. हा अतिरेकी २६/११ च्या भारतीय हल्ल्याचा आयोजक समजला जातो. हल्ल्याच्या आधी तो दोन तीन वेळा त्या त्या हॉटेलात येऊन टेह्ळणी करुन गेला होता. त्या माहितीचा उपयोग करुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपला हल्ल्याचा बेत आखला. अमेरिकन सरकार ह्या माणसाचे हस्तांतरण करु इच्छित नाही. भारतीय न्यायालयाने ह्याला माफीचा साक्षीदार बनवले आहे. त्याने असे म्हटल्याचे सांगितले जाते की इशरत जहान ही तरुणी आमच्या आत्मघातकी पथकाची (अर्थात सुसाईड स्क्वॉडमधली) एक बाई होती.

देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं

वेल्लाभट ·

अत्रे Tue, 12/01/2015 - 12:24
तिसरी घटना - त्या टकलू माणसाला कोणालाही थापड मारायचा अधिकार कोणी दिला? माझ्या मते त्याच्यावर intimidation, assault असा गुन्हा दाखल करायला हवा.

अत्रे Tue, 12/01/2015 - 12:32
कायद्यानुसार उभे राहणे बंधनकारक नाही.. पहा http://qr.ae/RbyGzx
Legally no. You are only required to show respect. That is all that is asked of Indian citizens. You are not required to even sing. But yes, you are expected to respect. Which basically means that you are not supposed to do anything that shows your disrespect. That is all. This issue came up in a case before the Supreme Court in Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors (Citation here - Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors on 11 August, 1986) All the cases where people were arrested for not standing, if you read the facts carefully, you will see that they were also doing acts to show their disrespect. In some cases, they were found booing the National anthem or otherwise making gestures of disrespect. They were arrested for that. It is the habit of Indian newspapers and media in general to not write complete facts and show the Indian law enforcement agencies in bad light.

साधा मुलगा Tue, 12/01/2015 - 15:39
हि तर धक्कादायकच होती, मी रोज लोकलने प्रवास करतो त्यामुळे ज्यास्तच जिव्हारी लागली. लोकांना त्या मुलाला सांभाळून घेता आले असते. मी सुद्धा कधी घाई गर्दीच्या वेळी उशीर झाल्यामुळे म्हणा,असा राम भरोसे प्रवास केला आहे, हे कबुल करतो पण हे फारच धोकादायक आहे, गर्दीच्या वेळी मी तर गाडी सोडूनच देतो असला जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा. विडिओ काढणार्याचा काय उद्देश होता समजला नाही, खरे तर खिशात हात घालायला देखील जागा नसताना हा शुटींग कशासाठी होता?

In reply to by साधा मुलगा

गामा पैलवान Wed, 12/02/2015 - 02:29
साधा मुलगा, भावेशचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे लोकांनी सांभाळून घेणे जमले नसते. त्या चलच्चित्रात बघितल्याप्रमाणे बाकीचे लोकंही लटकूनच प्रवास करंत होते. कोणी सांभाळून घ्यायचं ठरवलं असतं तर एकाऐवजी दोन जीव गेले असते. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे भावेशने दोन्ही हातांनी मिळेल तो भाग घट्ट पकडून ठेवला होता. मधल्या उभ्या दांड्यावर त्याच्या डाव्या हाताची पकड अगदी मजबूत बसलेली दिसते आहे. ती त्याने कशाला सोडली हे गूढच आहे. बहुतेक ती चुकून सुटली असावी. उजव्या हाताने त्याने मागील हँडल पकडायचा प्रयत्न चालवला असावा. मात्र तो सफल झाल्याखेरीज डावा हात सोडायला नको होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरून तो संकटात आहे असं वाटंत नाही. हा फाजील आत्मविश्वासाचा बळी दिसतो आहे. तरीही अर्थात समस्येचं गांभीर्य कमी होत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 10:56
माझ्या अनुभवाने सांगतो दारातल्या माणसाचा जरा जरी तोल जात असेल तर लोक सावध करतात, अर्थात त्यावेळी खूप गर्दी असल्याने लोकांना दुसर्याकडे लक्ष देत आले नसेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक लोकांचा अपघात होण्याची शक्यता होतीच.त्याने दांड्याला पकडलेला हात का सोडला हे देखील गूढ आहेच. खरेतर अश्या अवस्थेत त्याने दोन्ही हात घट्टपणे पकडायला हवे होते आणि पुढील स्टेशन आल्यानंतर जितके जाता येईल तितके आत जाणे. या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे, उशीर होऊन फास्ट गाडी पकडायची वेळ आली तर तर आतमध्ये शिरता येईल अश्याच गाड्यामधून प्रवास करणे.रेल्वे गाड्यांची संख्या आणि वारंवारता एका मर्यादेपर्यंत वाढवू शकते त्याला आपण काही करू शकत नाही. लोकांकडूनही शिस्त आणि संयमाची अपेक्षा आहे. मेट्रोप्रमाणे इथेही सुरक्षा रक्षक नेमून रांगेने आत चढायची शिस्त लोकांना लावली पाहिजे अशी वेळ आली आहे. आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करणे हेच आपल्या हातात आहे.

In reply to by साधा मुलगा

टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:44
लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे
हल्ली सकाळी १०:३० नंतरच हे करता येउ शकते

प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 11:00
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे,
ह्या पेक्षा मुंबई सोडुन दुसर्‍या छोट्या शहरात ( पुणे सोडुन ) कमी पैसे मिळत असतील तर तिथे स्थानांतर का करत नाहीत. एकुण नोकरी करणार्‍या लोकांपैकी ५-१० टक्के लोकांना हे शक्य असावे नक्कीच.

साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 11:41
ते झालच हो साहेब, पण आमच्यासारख्या जन्मजात मुंबई/ठाणेकराला गाडी परवडत नसल्याने दुसरा पर्याय नाही हो. मुंबई बाहेरच्या लोकांना मुम्बैची सोलिड क्रेझ असते , त्यामुळे सगळे मुंबईला यायला बघतात, खरे पहिले तर छोट्या शहरात सर्व सुविधा आणि प्रगतीच्या संधी असतील तर मुंबईत यायची गरज नाही, जाऊदे यावर एक स्वतंत्र धागा निघू शकतो, उगाच विषयांतर नको.

वेल्लाभट Wed, 12/02/2015 - 12:00
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला आहे, त्याबद्दल माझं मत, पत्राद्वारे. ▼ Wednesday, December 2, 2015 Re: बिनडोकांची राष्ट्रभक्ती लोकसत्ता अग्रलेख http://www.loksatta.com/aghralekh-news/national-anthem-in-multiplex-1165590/ त्याबद्दल माझे विचार, पत्ररूपात. नमस्कार महोदय, लोकसत्ताच्या २-१२-२०१५ रोजीच्या अंकातील आपला अग्रलेख, 'बिनडोकांची राष्ट्रभक्ती' वाचला. त्याबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच. दिवसागणिक घडणा-या असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात बघ्याची भूमिका घेणारे १० असतील तर एखादाच असतो जो झाला प्रसंग निस्तरायचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहतो. बाकी बहुतांश लोक 'मला काय फरक पडतो?' मानसिकतेच्या प्रभावाखाली असतात. सिनेमागृहातल्या घटनेत दोन गोष्टी आशादायी आहेत. एक म्हणजे अर्थातच तिथे उपस्थित असलेले ते' ४-५ जण वगळता सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले, आणि बहुतांश जण नेहमीच राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे समोर घडणारी एखादी घटना चूक वाटल्यावर तिच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवला गेला. देशातील वाढता बेदरकारपणा रोखायचा असेल तर माझ्या मते अशी एकी वेळोवेळी दिसायला हवी. कायद्याच्या मुद्द्याकडे येतो. कायद्याने राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही. तुम्ही देशभक्तीची सक्ती करू शकत नाही. पण त्या नात्याने तुम्ही सहिष्णुतेचीही सक्ती करू शकत नाही. तुम्हीच म्हटलेल्या मुद्द्यांनुसार, सिनेमागृहात फोन न घेणे, मोठ्याने न बोलणे, इत्यादी गोष्टीही कायद्याने निषिद्ध नाहीत. परंतु एखादी व्यक्ती मोठ्याने फोन वर बोलत असेल तर तिला दटावणारे दहा लोक असतातच. तसाच प्रकार इथे झाला. कायद्यावर बोट ठेवणे हा सदर घटनेच्या भावनिक चौकटीला दिलेला छेद आहे. कायद्यात निषिद्ध नसलेल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण रीत म्हणून, पद्धत म्हणून, सगळे करतात वा करत नाहीत म्हणून पाळतो. सिनेमागृहात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याची प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झाल्या प्रसंगासारखे प्रसंग आधीही नक्कीच झाले असतील. पण कसं आहे की सद्ध्याच्या काळात मुद्द्यांना मोठं रूप देऊन देशाची असहिष्णू म्हणून प्रसिद्धी करण्याचाही ट्रेंड आला आहे, ट्रेंड; जसा ध्वनिचित्रफीत काढण्याचा आला आहे तसाच. पुढे जाऊन मी असं म्हणेन की असाच एकत्रित विरोध जर कचरा टाकणे, थुंकणे, उगाच हॉर्न वाजवणे, आणि तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रत्येक उदाहरणाबाबत झाला, तर प्रगतिपथावर देशाची गती वाढेल, समाजाला आपोआप शिस्त येईल, नियम मोडण्याची वृत्ती कमी होईल आणि सर्वांचंच कल्याण होईल. तेंव्हा राष्ट्रगीत सिनेमागृहात का? आणि उभं रहायचा नियम नाही वगैरे मुद्द्यांपेक्षा खरं तर याच दरम्यान झालेल्या लोकल अपघातात लोकांनी एकत्रित होऊन लोकलमधे लटकणा-या त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न जास्त त्रास देणारा असायला हवा. आमिर खान असो, शाहरुख खान असो, किंवा सिनेमागृहातलं राष्ट्रगीत प्रकरण असो; देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशभक्तीच्या भावनेतून होणारं हे सामाजिक एकीकरण हे चांगलं लक्षण आहे. कदाचित थोडं अतिरेकी वाटेलही ते अनेकांना, पण प्रत्येक रूढ गोष्ट ही कधीकाळी अतिरेकी ठरवलेली असते. तेंव्हा ही सार्वजनिक देशभक्ती पुढे जाऊन एका सकारात्मक ऊर्जेचं रूप घेईल, अशी मी आशा करतो. अपूर्व ओक

अत्रे Tue, 12/01/2015 - 12:24
तिसरी घटना - त्या टकलू माणसाला कोणालाही थापड मारायचा अधिकार कोणी दिला? माझ्या मते त्याच्यावर intimidation, assault असा गुन्हा दाखल करायला हवा.

अत्रे Tue, 12/01/2015 - 12:32
कायद्यानुसार उभे राहणे बंधनकारक नाही.. पहा http://qr.ae/RbyGzx
Legally no. You are only required to show respect. That is all that is asked of Indian citizens. You are not required to even sing. But yes, you are expected to respect. Which basically means that you are not supposed to do anything that shows your disrespect. That is all. This issue came up in a case before the Supreme Court in Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors (Citation here - Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors on 11 August, 1986) All the cases where people were arrested for not standing, if you read the facts carefully, you will see that they were also doing acts to show their disrespect. In some cases, they were found booing the National anthem or otherwise making gestures of disrespect. They were arrested for that. It is the habit of Indian newspapers and media in general to not write complete facts and show the Indian law enforcement agencies in bad light.

साधा मुलगा Tue, 12/01/2015 - 15:39
हि तर धक्कादायकच होती, मी रोज लोकलने प्रवास करतो त्यामुळे ज्यास्तच जिव्हारी लागली. लोकांना त्या मुलाला सांभाळून घेता आले असते. मी सुद्धा कधी घाई गर्दीच्या वेळी उशीर झाल्यामुळे म्हणा,असा राम भरोसे प्रवास केला आहे, हे कबुल करतो पण हे फारच धोकादायक आहे, गर्दीच्या वेळी मी तर गाडी सोडूनच देतो असला जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा. विडिओ काढणार्याचा काय उद्देश होता समजला नाही, खरे तर खिशात हात घालायला देखील जागा नसताना हा शुटींग कशासाठी होता?

In reply to by साधा मुलगा

गामा पैलवान Wed, 12/02/2015 - 02:29
साधा मुलगा, भावेशचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे लोकांनी सांभाळून घेणे जमले नसते. त्या चलच्चित्रात बघितल्याप्रमाणे बाकीचे लोकंही लटकूनच प्रवास करंत होते. कोणी सांभाळून घ्यायचं ठरवलं असतं तर एकाऐवजी दोन जीव गेले असते. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे भावेशने दोन्ही हातांनी मिळेल तो भाग घट्ट पकडून ठेवला होता. मधल्या उभ्या दांड्यावर त्याच्या डाव्या हाताची पकड अगदी मजबूत बसलेली दिसते आहे. ती त्याने कशाला सोडली हे गूढच आहे. बहुतेक ती चुकून सुटली असावी. उजव्या हाताने त्याने मागील हँडल पकडायचा प्रयत्न चालवला असावा. मात्र तो सफल झाल्याखेरीज डावा हात सोडायला नको होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरून तो संकटात आहे असं वाटंत नाही. हा फाजील आत्मविश्वासाचा बळी दिसतो आहे. तरीही अर्थात समस्येचं गांभीर्य कमी होत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 10:56
माझ्या अनुभवाने सांगतो दारातल्या माणसाचा जरा जरी तोल जात असेल तर लोक सावध करतात, अर्थात त्यावेळी खूप गर्दी असल्याने लोकांना दुसर्याकडे लक्ष देत आले नसेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक लोकांचा अपघात होण्याची शक्यता होतीच.त्याने दांड्याला पकडलेला हात का सोडला हे देखील गूढ आहेच. खरेतर अश्या अवस्थेत त्याने दोन्ही हात घट्टपणे पकडायला हवे होते आणि पुढील स्टेशन आल्यानंतर जितके जाता येईल तितके आत जाणे. या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे, उशीर होऊन फास्ट गाडी पकडायची वेळ आली तर तर आतमध्ये शिरता येईल अश्याच गाड्यामधून प्रवास करणे.रेल्वे गाड्यांची संख्या आणि वारंवारता एका मर्यादेपर्यंत वाढवू शकते त्याला आपण काही करू शकत नाही. लोकांकडूनही शिस्त आणि संयमाची अपेक्षा आहे. मेट्रोप्रमाणे इथेही सुरक्षा रक्षक नेमून रांगेने आत चढायची शिस्त लोकांना लावली पाहिजे अशी वेळ आली आहे. आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करणे हेच आपल्या हातात आहे.

In reply to by साधा मुलगा

टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:44
लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे
हल्ली सकाळी १०:३० नंतरच हे करता येउ शकते

प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 11:00
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे,
ह्या पेक्षा मुंबई सोडुन दुसर्‍या छोट्या शहरात ( पुणे सोडुन ) कमी पैसे मिळत असतील तर तिथे स्थानांतर का करत नाहीत. एकुण नोकरी करणार्‍या लोकांपैकी ५-१० टक्के लोकांना हे शक्य असावे नक्कीच.

साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 11:41
ते झालच हो साहेब, पण आमच्यासारख्या जन्मजात मुंबई/ठाणेकराला गाडी परवडत नसल्याने दुसरा पर्याय नाही हो. मुंबई बाहेरच्या लोकांना मुम्बैची सोलिड क्रेझ असते , त्यामुळे सगळे मुंबईला यायला बघतात, खरे पहिले तर छोट्या शहरात सर्व सुविधा आणि प्रगतीच्या संधी असतील तर मुंबईत यायची गरज नाही, जाऊदे यावर एक स्वतंत्र धागा निघू शकतो, उगाच विषयांतर नको.

वेल्लाभट Wed, 12/02/2015 - 12:00
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला आहे, त्याबद्दल माझं मत, पत्राद्वारे. ▼ Wednesday, December 2, 2015 Re: बिनडोकांची राष्ट्रभक्ती लोकसत्ता अग्रलेख http://www.loksatta.com/aghralekh-news/national-anthem-in-multiplex-1165590/ त्याबद्दल माझे विचार, पत्ररूपात. नमस्कार महोदय, लोकसत्ताच्या २-१२-२०१५ रोजीच्या अंकातील आपला अग्रलेख, 'बिनडोकांची राष्ट्रभक्ती' वाचला. त्याबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच. दिवसागणिक घडणा-या असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात बघ्याची भूमिका घेणारे १० असतील तर एखादाच असतो जो झाला प्रसंग निस्तरायचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहतो. बाकी बहुतांश लोक 'मला काय फरक पडतो?' मानसिकतेच्या प्रभावाखाली असतात. सिनेमागृहातल्या घटनेत दोन गोष्टी आशादायी आहेत. एक म्हणजे अर्थातच तिथे उपस्थित असलेले ते' ४-५ जण वगळता सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले, आणि बहुतांश जण नेहमीच राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे समोर घडणारी एखादी घटना चूक वाटल्यावर तिच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवला गेला. देशातील वाढता बेदरकारपणा रोखायचा असेल तर माझ्या मते अशी एकी वेळोवेळी दिसायला हवी. कायद्याच्या मुद्द्याकडे येतो. कायद्याने राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही. तुम्ही देशभक्तीची सक्ती करू शकत नाही. पण त्या नात्याने तुम्ही सहिष्णुतेचीही सक्ती करू शकत नाही. तुम्हीच म्हटलेल्या मुद्द्यांनुसार, सिनेमागृहात फोन न घेणे, मोठ्याने न बोलणे, इत्यादी गोष्टीही कायद्याने निषिद्ध नाहीत. परंतु एखादी व्यक्ती मोठ्याने फोन वर बोलत असेल तर तिला दटावणारे दहा लोक असतातच. तसाच प्रकार इथे झाला. कायद्यावर बोट ठेवणे हा सदर घटनेच्या भावनिक चौकटीला दिलेला छेद आहे. कायद्यात निषिद्ध नसलेल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण रीत म्हणून, पद्धत म्हणून, सगळे करतात वा करत नाहीत म्हणून पाळतो. सिनेमागृहात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याची प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झाल्या प्रसंगासारखे प्रसंग आधीही नक्कीच झाले असतील. पण कसं आहे की सद्ध्याच्या काळात मुद्द्यांना मोठं रूप देऊन देशाची असहिष्णू म्हणून प्रसिद्धी करण्याचाही ट्रेंड आला आहे, ट्रेंड; जसा ध्वनिचित्रफीत काढण्याचा आला आहे तसाच. पुढे जाऊन मी असं म्हणेन की असाच एकत्रित विरोध जर कचरा टाकणे, थुंकणे, उगाच हॉर्न वाजवणे, आणि तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रत्येक उदाहरणाबाबत झाला, तर प्रगतिपथावर देशाची गती वाढेल, समाजाला आपोआप शिस्त येईल, नियम मोडण्याची वृत्ती कमी होईल आणि सर्वांचंच कल्याण होईल. तेंव्हा राष्ट्रगीत सिनेमागृहात का? आणि उभं रहायचा नियम नाही वगैरे मुद्द्यांपेक्षा खरं तर याच दरम्यान झालेल्या लोकल अपघातात लोकांनी एकत्रित होऊन लोकलमधे लटकणा-या त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न जास्त त्रास देणारा असायला हवा. आमिर खान असो, शाहरुख खान असो, किंवा सिनेमागृहातलं राष्ट्रगीत प्रकरण असो; देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशभक्तीच्या भावनेतून होणारं हे सामाजिक एकीकरण हे चांगलं लक्षण आहे. कदाचित थोडं अतिरेकी वाटेलही ते अनेकांना, पण प्रत्येक रूढ गोष्ट ही कधीकाळी अतिरेकी ठरवलेली असते. तेंव्हा ही सार्वजनिक देशभक्ती पुढे जाऊन एका सकारात्मक ऊर्जेचं रूप घेईल, अशी मी आशा करतो. अपूर्व ओक
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय. रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार. शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

कलेवराचा उत्सव?

वेल्लाभट ·

अन्या दातार Tue, 10/06/2015 - 18:48
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही? वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.

In reply to by अन्या दातार

मांत्रिक Tue, 10/13/2015 - 19:23
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Tue, 10/13/2015 - 19:25
पब वगैरेविषयी टिपणी नाही. कारण ती मला आवडणारी गोष्ट नाही. साहजिकच त्याबाबत मौनच पाळतो.

तर्राट जोकर Tue, 10/06/2015 - 19:11
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार. लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.

दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 19:14
"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे." +१००० अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.

दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 19:21
अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).

सौंदाळा Tue, 10/06/2015 - 19:27
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत १. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे. २. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे. ३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत. ४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.

बोका-ए-आझम Wed, 10/07/2015 - 01:25
यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.

भाकरी Wed, 10/07/2015 - 02:52
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत? ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:32
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे. बरं... आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे. आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते. आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.

In reply to by वेल्लाभट

भाकरी Wed, 10/07/2015 - 17:02
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे. ----------------------------------------------
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.
हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे! आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.
जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.
ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.
खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का? एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 17:17
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" काहीही हं भाकरी म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही. आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय? मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा. एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!! अगेन, व्हेरी फनी. प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:33
आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
तुम्हीच म्हणालात !

मदनबाण Wed, 10/07/2015 - 03:26
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 09:48
मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे. स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे. स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं. आता मूळ लेखावर... छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं ’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".
त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.
कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.
निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.
हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

In reply to by अंतरा आनंद

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:45
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.
वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.
मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.
शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये
मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं. असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.

In reply to by अंतरा आनंद

+१०००० संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!

अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 10:50
पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.
यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:48
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 12:19
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे

In reply to by वेल्लाभट

अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 12:28
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का? चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 14:35
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?
टोकाचा निष्कर्ष. असो.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 14:40
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)

लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार? दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा. यावर लेखकाने मत मान्डावे... (अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..) आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा एक सामान्य मानव... (अक्षराला हसू नये)

सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 12:42
माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.

तर्राट जोकर Wed, 10/07/2015 - 12:54
---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ---- साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 13:28
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य. बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.) अंतरा ताई, बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार अरे बापरे ! ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते. समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.

In reply to by दत्ता जोशी

सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 13:39
अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे. सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.
अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
+१

In reply to by दत्ता जोशी

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 14:38
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.
पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.
नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)

In reply to by दत्ता जोशी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 14:39
अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच
तो उन्माद नसतो हो.... उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.

सर्वसाक्षी Wed, 10/07/2015 - 13:46
मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो. कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले. अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का? बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच. जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

प्यारे१ Wed, 10/07/2015 - 14:00
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/sandip/articleshow/49249967.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms

In reply to by धोणी

चैतन्य ईन्या Wed, 10/07/2015 - 15:14
हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?

राही Wed, 10/07/2015 - 15:05
शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत. शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 15:34
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही. "माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "... काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 15:44
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे. बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 16:01
मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.
हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.
पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.

सुनील Wed, 10/07/2015 - 16:04
बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही
हे अनावश्यक महापुरुष कोणते???

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 16:20
"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही." बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. "अनावश्यक महापुरुष" नाही.

In reply to by तर्राट जोकर

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 16:30
अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके). आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 16:59
लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:15
किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 17:46
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्‍यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:07
अहो ताई, आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला? शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:59
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय! मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते. काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 18:02
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.

In reply to by दत्ता जोशी

राही Wed, 10/07/2015 - 18:19
सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर? कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 18:10
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत. काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 18:34
विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि. पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 19:26
माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते. बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

काळा पहाड Wed, 10/07/2015 - 20:57
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 21:45
त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

In reply to by काळा पहाड

नीलमोहर Wed, 10/07/2015 - 22:18
+१११११११११११११११११११११११११११ हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

In reply to by नीलमोहर

अभ्या.. गुरुवार, 10/08/2015 - 00:37
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर. आवडले. काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते. तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट. मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

In reply to by जातवेद

नाखु Sun, 09/16/2018 - 20:52
पहाडी आवाजात कडकड झालाय? सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु. इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले. त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

चांदणे संदीप Wed, 10/07/2015 - 23:12
या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का! कावळा लागला थुईथुई नाच करू तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची... ...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो... धन्यवाद!

दिवाकर कुलकर्णी गुरुवार, 10/08/2015 - 00:31
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला. एकदम सही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

सह्यमित्र गुरुवार, 10/08/2015 - 13:44
एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

रेवती गुरुवार, 10/08/2015 - 02:24
माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून? जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते. पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

In reply to by रेवती

भाकरी गुरुवार, 10/08/2015 - 04:51
वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 12:27
वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 08:38
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 10:09
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

In reply to by तर्राट जोकर

रेवती गुरुवार, 10/08/2015 - 19:25
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

In reply to by रेवती

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 19:37
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 14:37
एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !

In reply to by वेल्लाभट

प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 14:40
संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

भीमराव गुरुवार, 10/08/2015 - 15:58
पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।

पैसा गुरुवार, 10/08/2015 - 16:16
त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

In reply to by पैसा

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 16:54
हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

In reply to by वेल्लाभट

पैसा गुरुवार, 10/08/2015 - 19:41
माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

चतुरंग गुरुवार, 10/08/2015 - 17:52
खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

In reply to by चतुरंग

प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 18:17
>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)

In reply to by चतुरंग

चैतन्य ईन्या गुरुवार, 10/08/2015 - 19:02
काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

In reply to by चैतन्य ईन्या

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 23:00
ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

In reply to by चतुरंग

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

_मनश्री_ गुरुवार, 10/08/2015 - 20:11
त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

In reply to by वेल्लाभट

चांदणे संदीप Fri, 10/09/2015 - 00:07
ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy

टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:46
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे Fri, 10/09/2015 - 11:05
हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 14:27
आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 15:44
मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

अत्रन्गि पाउस Fri, 10/09/2015 - 11:35
कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

श्रीगुरुजी Fri, 10/09/2015 - 13:55
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धर्मराजमुटके Fri, 10/09/2015 - 16:26
धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्राट जोकर Sat, 10/10/2015 - 16:37
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

मोदक Tue, 10/13/2015 - 12:18
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

In reply to by मोदक

वेल्लाभट Tue, 10/13/2015 - 13:42
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

In reply to by वेल्लाभट

रेवती Tue, 10/13/2015 - 18:00
तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 10/13/2015 - 18:05
कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान

In reply to by मोदक

पिलीयन रायडर Tue, 10/13/2015 - 14:16
अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. Tue, 10/13/2015 - 14:28
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

In reply to by पिलीयन रायडर

मोदक Tue, 10/13/2015 - 15:07
मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.

अन्या दातार Tue, 10/06/2015 - 18:48
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही? वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.

In reply to by अन्या दातार

मांत्रिक Tue, 10/13/2015 - 19:23
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Tue, 10/13/2015 - 19:25
पब वगैरेविषयी टिपणी नाही. कारण ती मला आवडणारी गोष्ट नाही. साहजिकच त्याबाबत मौनच पाळतो.

तर्राट जोकर Tue, 10/06/2015 - 19:11
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार. लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.

दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 19:14
"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे." +१००० अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.

दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 19:21
अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).

सौंदाळा Tue, 10/06/2015 - 19:27
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत १. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे. २. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे. ३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत. ४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.

बोका-ए-आझम Wed, 10/07/2015 - 01:25
यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.

भाकरी Wed, 10/07/2015 - 02:52
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत? ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:32
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे. बरं... आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे. आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते. आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.

In reply to by वेल्लाभट

भाकरी Wed, 10/07/2015 - 17:02
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे. ----------------------------------------------
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.
हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे! आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.
जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.
ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.
खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का? एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 17:17
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" काहीही हं भाकरी म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही. आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय? मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा. एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!! अगेन, व्हेरी फनी. प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.

In reply to by भाकरी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:33
आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
तुम्हीच म्हणालात !

मदनबाण Wed, 10/07/2015 - 03:26
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 09:48
मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे. स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे. स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं. आता मूळ लेखावर... छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं ’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".
त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.
कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.
निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.
हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

In reply to by अंतरा आनंद

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:45
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.
वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.
मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.
शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये
मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं. असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.

In reply to by अंतरा आनंद

+१०००० संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!

अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 10:50
पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.
यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:48
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 12:19
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे

In reply to by वेल्लाभट

अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 12:28
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का? चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 14:35
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?
टोकाचा निष्कर्ष. असो.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 14:40
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)

लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार? दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा. यावर लेखकाने मत मान्डावे... (अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..) आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा एक सामान्य मानव... (अक्षराला हसू नये)

सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 12:42
माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.

तर्राट जोकर Wed, 10/07/2015 - 12:54
---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ---- साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 13:28
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य. बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.) अंतरा ताई, बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार अरे बापरे ! ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते. समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.

In reply to by दत्ता जोशी

सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 13:39
अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे. सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.
अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
+१

In reply to by दत्ता जोशी

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 14:38
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.
पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.
नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)

In reply to by दत्ता जोशी

वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 14:39
अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच
तो उन्माद नसतो हो.... उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.

सर्वसाक्षी Wed, 10/07/2015 - 13:46
मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो. कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले. अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का? बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच. जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

प्यारे१ Wed, 10/07/2015 - 14:00
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/sandip/articleshow/49249967.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms

In reply to by धोणी

चैतन्य ईन्या Wed, 10/07/2015 - 15:14
हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?

राही Wed, 10/07/2015 - 15:05
शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत. शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 15:34
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही. "माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "... काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 15:44
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे. बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 16:01
मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.
हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.
पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.

सुनील Wed, 10/07/2015 - 16:04
बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही
हे अनावश्यक महापुरुष कोणते???

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 16:20
"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही." बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. "अनावश्यक महापुरुष" नाही.

In reply to by तर्राट जोकर

अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 16:30
अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके). आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 16:59
लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:15
किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 17:46
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्‍यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:07
अहो ताई, आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला? शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 17:59
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय! मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते. काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 18:02
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.

In reply to by दत्ता जोशी

राही Wed, 10/07/2015 - 18:19
सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर? कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 18:10
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत. काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 18:34
विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि. पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 19:26
माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते. बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

काळा पहाड Wed, 10/07/2015 - 20:57
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन Wed, 10/07/2015 - 21:45
त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

In reply to by काळा पहाड

नीलमोहर Wed, 10/07/2015 - 22:18
+१११११११११११११११११११११११११११ हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

In reply to by नीलमोहर

अभ्या.. गुरुवार, 10/08/2015 - 00:37
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर. आवडले. काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते. तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट. मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

In reply to by जातवेद

नाखु Sun, 09/16/2018 - 20:52
पहाडी आवाजात कडकड झालाय? सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु. इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले. त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

चांदणे संदीप Wed, 10/07/2015 - 23:12
या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का! कावळा लागला थुईथुई नाच करू तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची... ...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो... धन्यवाद!

दिवाकर कुलकर्णी गुरुवार, 10/08/2015 - 00:31
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला. एकदम सही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

सह्यमित्र गुरुवार, 10/08/2015 - 13:44
एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

रेवती गुरुवार, 10/08/2015 - 02:24
माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून? जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते. पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

In reply to by रेवती

भाकरी गुरुवार, 10/08/2015 - 04:51
वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 12:27
वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 08:38
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 10:09
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

In reply to by तर्राट जोकर

रेवती गुरुवार, 10/08/2015 - 19:25
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

In reply to by रेवती

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 19:37
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 14:37
एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !

In reply to by वेल्लाभट

प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 14:40
संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

भीमराव गुरुवार, 10/08/2015 - 15:58
पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।

पैसा गुरुवार, 10/08/2015 - 16:16
त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

In reply to by पैसा

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 16:54
हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

In reply to by वेल्लाभट

पैसा गुरुवार, 10/08/2015 - 19:41
माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

चतुरंग गुरुवार, 10/08/2015 - 17:52
खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

In reply to by चतुरंग

प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 18:17
>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)

In reply to by चतुरंग

चैतन्य ईन्या गुरुवार, 10/08/2015 - 19:02
काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

In reply to by चैतन्य ईन्या

वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 23:00
ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

In reply to by चतुरंग

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

_मनश्री_ गुरुवार, 10/08/2015 - 20:11
त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

In reply to by वेल्लाभट

चांदणे संदीप Fri, 10/09/2015 - 00:07
ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy

टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:46
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे Fri, 10/09/2015 - 11:05
हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 14:27
आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 15:44
मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

अत्रन्गि पाउस Fri, 10/09/2015 - 11:35
कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

श्रीगुरुजी Fri, 10/09/2015 - 13:55
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धर्मराजमुटके Fri, 10/09/2015 - 16:26
धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्राट जोकर Sat, 10/10/2015 - 16:37
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

मोदक Tue, 10/13/2015 - 12:18
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

In reply to by मोदक

वेल्लाभट Tue, 10/13/2015 - 13:42
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

In reply to by वेल्लाभट

रेवती Tue, 10/13/2015 - 18:00
तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 10/13/2015 - 18:05
कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान

In reply to by मोदक

पिलीयन रायडर Tue, 10/13/2015 - 14:16
अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. Tue, 10/13/2015 - 14:28
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

In reply to by पिलीयन रायडर

मोदक Tue, 10/13/2015 - 15:07
मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे.

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग २

धर्मराजमुटके ·

गवि Mon, 06/29/2015 - 13:46
अशा वेळी फोटो काढणं / व्हिडीओ काढणं याला नेमकं काय म्हणावं किंवा त्याविषयी कसा प्रतिसाद द्यावा ते कळेनासं झालंय. अगदी मृतदेहांचे नव्हे, पण अपघातस्थळाचे किंवा नेहमी जे दिसत नाही ते (उदा ट्रेन घसरणे, ट्रक उलटणे) याचे फोटो शक्य असतील तेव्हा काढणं हा ह्युमन नेचरचा एक भाग झाला असणार. पण ते सर्व अपघात होऊन गेल्यावर काही काळाने तिथे पोचणार्‍यांबाबत समजून घेता येईल. इथे या केसमधे निरुत्तर व्हायला होत आहे.

संदीप डांगे Mon, 06/29/2015 - 16:01
माझ्या मते चित्रपट-मालिकांमधून धक्कादायक चित्रणे वारंवार बघितल्याने मनुष्याची मानसिकता प्रभावित होऊन अशा प्रत्यक्ष घटनांवर खोट्या घटनांप्रमाणेच रीअ‍ॅक्ट होण्याचे अजाणतेपणी घडते. म्हणजे खून-बलात्कार-अपघात-रक्त इतकेवेळा बघून त्याबद्दलची फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन पार डीफयुज झाली असावी. त्यात आता वृत्तवाहिन्यांनी 'सबसे पेहले आणि सिर्फ इसी चॅनेलपर 'ची जोरदार प्रमोशन्स सुरू केल्यापासून प्रथम बघायला मिळणे आणि ते इतरांना आपण सांगणे हे काहीतरी ग्लॅमरस-एक्सायटींग आहे हे मानल्यामुळे तेच मानवी मनात प्राधान्यक्रम झाले असावेत. त्याचेच पुरावे देता यावे म्हणून विडीओ किंवा फोटो काढून शेअर करणे घडते. अशा घटनांमधे पुष्कळदा समाज बघ्याची भुमिकाच घेतो याचे कारण आता तो कायम बघ्याच्याच भुमिकेत असतो. पुढे घडत असलेले खरे आहे हे त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचत नसावे त्या विवक्षित क्षणी. परत त्यावर कसे रीअ‍ॅक्ट व्हावे याचेही कुणी प्रशिक्षण देत नाही. अशा घटनांपासून शक्यतो दूरच राहावे -इजा टाळण्यासाठी व पोलिसांचा झमेला टाळण्यासाठी- अशी शिकवण घराघरांतून दिली जाते. अशा दोन प्रखर मानसिक प्रभावांमधे असलेल्या माणसांकडून योग्य प्रतिक्रीयेची अपेक्षा फोल आहे. यावर उपाय म्हणजे शाळेपासूनच मुलांना आपात्कालिन परिस्थितीचे शिक्षण देणे. त्याचा नियमित सराव कंपल्सरी करणे. त्यातून खर्‍या घटनांमधे अंतर्मनाकडून फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन आपोआप अजाणता घडेल आणि मनुष्य पहिल्या प्रतिक्षिप्त क्रियेने मदतकार्यात ओढला जाऊन ते मदत कार्य पुर्ण करेल. (निराशाजनक टीप्पणी: आपल्याकडे साधं 'स्वत:ला कसं वाचवावं' याचंही प्रशिक्षण कुणी मुलांना देत नाही. इतरांना मदत करण्याचं तर सोडाच) (आशादायक चित्रः हे आपण आपल्या घरापासून सुरू करून परिस्थिती बदलण्यास मदत करू शकतो)

रेस अ‍क्रॉस अमेरीका (RAAM) ह्या प्रतीष्ठेच्या आणी अत्यंत खडतर अश्या सायकलींग रेस मध्ये नाशीकच्या महाजन बंधूंनी बाजी मारली आहे. विशेष उल्लेखाची बाब म्हणजे रेसच्या ईतीहासात भारताचे पहील्यांदाच प्रतीनीधीत्व असण्यार्‍या ह्या रेस मधे ह्या डॉक्टर बंधूंनी पहील्यांदाच भाग घेऊन १८-५० वयोगटाती टिम कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी एकूण ३००० माईल्स एवढे अंतर (वेस्ट कोस्ट ते ईस्ट कोस्ट) ८ दि. १४ ता. आणी ५५ मी. हा भीम पराक्रम केला आहे.. साष्टांग दंडवत _/\_

गवि Mon, 06/29/2015 - 13:46
अशा वेळी फोटो काढणं / व्हिडीओ काढणं याला नेमकं काय म्हणावं किंवा त्याविषयी कसा प्रतिसाद द्यावा ते कळेनासं झालंय. अगदी मृतदेहांचे नव्हे, पण अपघातस्थळाचे किंवा नेहमी जे दिसत नाही ते (उदा ट्रेन घसरणे, ट्रक उलटणे) याचे फोटो शक्य असतील तेव्हा काढणं हा ह्युमन नेचरचा एक भाग झाला असणार. पण ते सर्व अपघात होऊन गेल्यावर काही काळाने तिथे पोचणार्‍यांबाबत समजून घेता येईल. इथे या केसमधे निरुत्तर व्हायला होत आहे.

संदीप डांगे Mon, 06/29/2015 - 16:01
माझ्या मते चित्रपट-मालिकांमधून धक्कादायक चित्रणे वारंवार बघितल्याने मनुष्याची मानसिकता प्रभावित होऊन अशा प्रत्यक्ष घटनांवर खोट्या घटनांप्रमाणेच रीअ‍ॅक्ट होण्याचे अजाणतेपणी घडते. म्हणजे खून-बलात्कार-अपघात-रक्त इतकेवेळा बघून त्याबद्दलची फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन पार डीफयुज झाली असावी. त्यात आता वृत्तवाहिन्यांनी 'सबसे पेहले आणि सिर्फ इसी चॅनेलपर 'ची जोरदार प्रमोशन्स सुरू केल्यापासून प्रथम बघायला मिळणे आणि ते इतरांना आपण सांगणे हे काहीतरी ग्लॅमरस-एक्सायटींग आहे हे मानल्यामुळे तेच मानवी मनात प्राधान्यक्रम झाले असावेत. त्याचेच पुरावे देता यावे म्हणून विडीओ किंवा फोटो काढून शेअर करणे घडते. अशा घटनांमधे पुष्कळदा समाज बघ्याची भुमिकाच घेतो याचे कारण आता तो कायम बघ्याच्याच भुमिकेत असतो. पुढे घडत असलेले खरे आहे हे त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचत नसावे त्या विवक्षित क्षणी. परत त्यावर कसे रीअ‍ॅक्ट व्हावे याचेही कुणी प्रशिक्षण देत नाही. अशा घटनांपासून शक्यतो दूरच राहावे -इजा टाळण्यासाठी व पोलिसांचा झमेला टाळण्यासाठी- अशी शिकवण घराघरांतून दिली जाते. अशा दोन प्रखर मानसिक प्रभावांमधे असलेल्या माणसांकडून योग्य प्रतिक्रीयेची अपेक्षा फोल आहे. यावर उपाय म्हणजे शाळेपासूनच मुलांना आपात्कालिन परिस्थितीचे शिक्षण देणे. त्याचा नियमित सराव कंपल्सरी करणे. त्यातून खर्‍या घटनांमधे अंतर्मनाकडून फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन आपोआप अजाणता घडेल आणि मनुष्य पहिल्या प्रतिक्षिप्त क्रियेने मदतकार्यात ओढला जाऊन ते मदत कार्य पुर्ण करेल. (निराशाजनक टीप्पणी: आपल्याकडे साधं 'स्वत:ला कसं वाचवावं' याचंही प्रशिक्षण कुणी मुलांना देत नाही. इतरांना मदत करण्याचं तर सोडाच) (आशादायक चित्रः हे आपण आपल्या घरापासून सुरू करून परिस्थिती बदलण्यास मदत करू शकतो)

रेस अ‍क्रॉस अमेरीका (RAAM) ह्या प्रतीष्ठेच्या आणी अत्यंत खडतर अश्या सायकलींग रेस मध्ये नाशीकच्या महाजन बंधूंनी बाजी मारली आहे. विशेष उल्लेखाची बाब म्हणजे रेसच्या ईतीहासात भारताचे पहील्यांदाच प्रतीनीधीत्व असण्यार्‍या ह्या रेस मधे ह्या डॉक्टर बंधूंनी पहील्यांदाच भाग घेऊन १८-५० वयोगटाती टिम कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी एकूण ३००० माईल्स एवढे अंतर (वेस्ट कोस्ट ते ईस्ट कोस्ट) ८ दि. १४ ता. आणी ५५ मी. हा भीम पराक्रम केला आहे.. साष्टांग दंडवत _/\_
आधीच्या धाग्यावर प्रतिक्रिया शंभरच्या आसपास पोहोचल्याने नवीन धागा तिथल्या नव्या बातमीच्या प्रतिसादापासून वेगळा काढून नव्याने सुरु करत आहोत. - संपादक मंडळ जेव्हा संवेदना मृत्यू पावतात… बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना...