आपला लेख आवडला उत्तम मान्डणी केली आहे.
परन्तु एक वाक्य खटकले.......
शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या
छ. शिवराय महाराष्ट्राची अस्मिता आहेत तरी छ. शिवराय यान्चा एकेरी उल्लेख क्रुपया करु नये.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
आम्हाघरीधन,
आपण चूक दाखवल्या बद्दल आभार.
शिवाजी महाराजांबद्दल मला अत्यंत आदर आहे.ह्या लेखाच्या लेखनाच्या विचाराच्या गर्दीत महारज हे लिहायचं चुकून राहिलं.पण हे समर्थन करीत नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंत काका,
सुरेख लेख. किती सुंदर प्रकटन केलं आहे.
खरंच आई रडते आहे...मला वाचवा म्हणून नव्हे तर माझ्या मुलांना वाचवा म्हणून. आणि मुलं अशी किड्यामुग्यांसारखी मारली जात आहेत..
तुमचा लेख खरंच खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
गणा मास्तर,
"खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत"
हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही.
"आज मात्र खुप भिडला...."
निदान हा लेख आपल्या मनाला भिडेल असा मी लिहू शकलो ह्याची कल्पना करून मला खूप आनंद झाला.
मी आपल्याला आवडतील असे लेख लिहिण्याचा अवश्य प्रयत्न करीन.नव्हेतर आपल्या सकट माझ्या सर्व वाचकाना माझे लेख आवडावे म्हणून लिहिण्याच्या मी प्रयत्नात असतो.
ह्यावर मला एक किस्सा आठवतो.
मला माझ्या आईचं जेवण खूप आवडायचं.विषेश करून ती करायची ती तूरीच्या डाळीची आमटी.
जेवताना मी तिला मुद्दाम म्हाणायचो.
"आई तुझं जेवण मला आवडत नाही."
असं बोलून मी तिच्या चेहर्याकडे बघायचो.
बिचारी हिरमुसली व्हायची.मला म्हणायची,
"अरे कुणाल आवडूं नये म्हणून का कुणी जेवण करतं?.तुला माझं जेवण आवडायला मी कसं करूं ते सांग."
हे ऐकून मी तिला म्हणायचो,
"ही तुझी डाळीची आमटी मला खूप आवडली"
त्यावर ती म्हणायची,
"चल, निदान मी केलेला एक तर पदार्थ आवडला ना?मला खूप आनंद झाला"
हे ऐकून मी तिला म्हणायचो,
"नाही गं आई! मी तुझी गंमत केली."
गणा मास्तर, तसं तर तुम्ही करत नसाल ना?
(गणा मास्तर, खोटं का असेना हो म्हणा.मला बरं वाटेल)
मग ती मला म्हणायची
"एक चीनी म्हण आहे,"खरं बोलावं खरं ओकू नये"
By the way,
"खरं बोलावं खरं ओकू नये म्हणजे रे काय...भाऊ?"
ह्यावर मी एक लेख लिहिला आहे.लवकरच मिपावर पोस्ट करीन तो तरी निदान आपण अवश्य वाचावा ही विनंती.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
"खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत"हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही.
काका, मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. प्रत्येक वाचकाला प्रत्येक लेख आवडेल हे थोडं कठीणच आहे. मला स्वतःला साहित्यिक भाषेत शब्दांचे मनोरे चढवले आणि आतमधे काहीच (मॅटर) नसलं की लेखन अजिबात आवडत नाही; (उदाहरण देण्याचा मोह आवरत आहे, नाहीतर पुन्हा एक भांडण सुरु व्हायचं.) पण काही लोकांना तसं आणि त्या प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं. प्रत्येकाची आवडनिवड असं समजून सोडून द्यावंत अशी विनंती.
दंगे धोपे ही कसे बदलत गेले ते पहा...
<<रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे.
त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या. त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. >>
आणि आता पहा एके ४७ शिवाय अतिरेकी कशाला हात म्हणून लावत नाहीत. सगळीकडे प्रगती झाली आणि आइ मात्र रडत राहिली.
सामंत काका- सुंदर प्रकटन
हे असे मोठे मोठे अत्याचार आणि जखमा परके लोक येऊन करतात तेंव्हा आपल्याला संताप, चिड येते.
आपल्याच देशात, आपले लोक काय काय करतात ते पहायला हवे.
जातीय दंगे, भाईगिरी ( वा! काय शब्द आहे), धमक्या, दांडगाई हे तर मोठे प्रकार झाले.
आपण हे असलं काही करत नाही, करणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी किती आहेत ते ही पहायला हवे.
आपल्याला बरेच जण दिसतील धरणीमातेच्या अंगावर थुंकण्यात धन्यता मानणारे, कचरा रस्त्यावर फेकणारे,
लाल ट्रॅफीक सिग्नल तोडून गाड्या दामटणारे. असच खूप काही करणारे. आपणच असे वागतो तर इतरांना काय बोलणार?
याचा अर्थ परकीयांनी येऊन काहीही करावं असा मुळीच नव्हे, पण आपल्याच आईची काळजी अजून चांगल्या प्रकारे
घेण्यास भरपूर वाव आहे.
रेवती
प्रतिक्रिया
चांगला लेख
+१
आवडला, व लगेच समजला
+१
आपला लेख
कधी कधी अशी चूक होते.
सुंदर
चांगला
व्वा!
खोट कशाला
काय हो हे गणामास्तर?इतकं स्पष्ट?
"खोट कशाला
सहमत
दंगे धोपे
लेख आवडला.
आभार
छान लिहिलय
आवडला लेख.
आभार
खुप आवडला लेख