Skip to main content

चिंब

लेखक अर्व यांनी बुधवार, 20/05/2015 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही नेईल काळजासी तो तुझा हात नाही एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही ईथे श्रावणाला आता धार नाही किती सरी जळाल्या वणवा वादळात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे... कमरेत वाकलेला वड उभा अंगणात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2842
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आवडली कविता. आधीच्या पेक्षा सुगम आणि घट्ट बांधणीची. ......मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे........ हे खासच.

या निमित्ताने कवितेतील सुबोधता आणि निर्बोधता, गेयता आणि अगेयता, परंपरा आणि नवता, विस्कळितपण आणि नेटकेपण, छंदबद्ध आणि मुक्तछंद वगैरेंचा सौंदर्यानुभूतीशी कसा काय संबंध असू शकतो, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो.

वाह..

अजुन एक सुंदर रचना..

सुरेख!!!!!!!