भूकंपामागची कारणे
भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही. ८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल.
पण आजच्या घडीलाही विविध मंडळी भूकंपामागची कारणमीमांसा सांगत आहेत ते मोठे मनोरंजक आहे. कुणी बाब म्हणतात की बीफ खाल्ल्यामुळे देवाने ही शिक्षा दिली आहे. आता उरलेले जग हजारो वर्षे बीफ चापत आहे त्यांना शिक्षा का बरे नाही?
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
असो. हिंदू वगैरे धर्म आहेतच रानटी. पण ख्रिस्ती लोकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तातडीने १ लाख कागदी बांधणीतील बायबले पाठवली आहेत. बहुधा थंडीत सरपण म्हणून वापरता येतील!
असो. कधीतरी विज्ञान भूकंप ओळखण्यात प्रवीण होईल अशी आशा. पण तोपर्यंत अशा लोकांच्या अकलेचे तारे ऐकून वाचून मनोरंजन करून घ्यावे.
http://www.mkgandhi.org/articles/mg_causation.htm
http://thenortheasttoday.com/vhp-leader-links-nepal-earthquake-to-beef-eating/
http://www.firstpost.com/politics/rahuls-impure-visit-to-kedarnath-caused-nepal-earthquake-says-sakshi-maharaj-2215456.html
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाकी काही असू द्या...
+१००
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling reportकुणी म्हणते राहुलगांधी
देव "रागवेलच" हे सामान्य
हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच
१००, २००, ३००, ४००, ....१०००+
७८६
शिव शिव शिव!!
कुणाला?
नशीब.. "कुणला" म्हणून
हा हा हा, अगदी अगदी!!!!
ओ पहाड
नै हो. आमचा देव तसं बघत असता
छान...माणसात देव शोधणे याचा
पापं वाढली हो!
ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला
डॉ. कल्याण गंगवाल यांनीही
सगळा केजरीवाल चा दोष आहे.
सद्या "आप" स्वतः
सगळा केजरीवाल चा दोष आहे.
पूर्वी मोदींचे नाव असायचे,
नौटंकी कुणाची आणि जीव कुणाचा
खरच टि.व्हि. वर जे पाहतोय
हम्म
अरे वा!
ओ तै...म्हैत नै कै...त्या
वा
ते न्हवते ना तेव्हा
आठवत कसं नाही? बाबराच्या पुढे
मायडे गं मायडे
आमाला कै म्हैत नै. सांगा बघू पटकन!
कुणी म्हणते राहुलगांधी
ही घ्या कारणे
.
याची
ही घ्या लिंक
धन्यवाद!
भूकंपात
तुमच्या काळात पण असं
हो तर!
कैलासावर...
पुण्याने प्राप्त व्हायला
पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू
ओक्के, हल्ली पुण्यातला आणि
बाकी पुणे त्रेतायूगापासून
टी जॉन आणी एम गांधी कमंडलू?
...
...
नाही बुवा
पतंजली, संघ आणि डेरा सच्चा