सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……!
टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी ::
१६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता. परंतु उल्केच्या छोट्या ठिकऱ्या होऊन, त्यांचा छर्रेरूपाने पृथ्वीवर वर्षाव झाला आणि त्यामुळे असंख्य छोट्या अणुस्फोटासारखा प्रभाव निर्माण होऊन, पृथ्वीवरची बहुतांश सृष्टी नष्ट झाली, त्यावेळच्या मानवाने, तोपर्यंत आपली सर्व संस्कृतीक-साहित्यिक-वैज्ञानिक-ऐतिहासिक माहिती ही डिजिटली, संपादित व संग्रहित केलेली होती, तीही स्फोटांमुळे उद्भवलेल्या तीव्र चुंबकीय विकिरणांमुळे नष्ट झाली. उरलेल्या मानवीसमूहाने आपल्या स्मृतीतील सांस्कृतिक गोष्टी मौखिक रूपाने पुढच्या पिढीकडे जतनासाठी सोपवल्या. त्यामुळे २२८० पासून नवीन सिविल इतिहासच नवीन मानवास माहिती राहिला. बाकी सर्व विस्मृतीत गेलं.)
*****************************************************************************
पृथ्वीचा इतिहास आणि संस्कृती अतिप्राचीन आहे. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक व्यक्ती आणि घटना वादग्रस्त आहेत. त्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उदा. जय, बिरू , ठाकूर, बसंती, गब्बरसिंग, धन्नो यासारख्या अनेक व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटना. गेल्या दोन-अडीचशे वर्षापासून असे अनेक वाद चालू आहेत. अशा वादांना मुख्त: परग्रहवासियांनी खतपाणी घातले. पण तरीही कित्येक एतद्देशी विद्वानांनी वस्तुनिष्ठ पुरावंच्या आधारे त्यांना समर्पक उत्तरे दिली. पण असे असले तरी या अनेक व्यक्ती आणि घटना, ह्या ऐतिहासिक सत्ये आहेत की केवळ दंतकथा आहेत, याविषयी समाजाचा संभ्रम कायम आहे.
'शोले' हे आर्ष महाकाव्य प्राचीन असून ते मानवाच्या इतिहास आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. समस्त समाजाच्या मनामध्ये आजही या महाकाव्यांविषयी अत्यंत आदर व पूज्यबुद्धीची भावना आहे. आपल्या दलनेत्याच्यामते 'शोले' हा सत्य इतिहासच आहे. तरीही पुरातत्त्वशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाहता हा ‘इतिहासपूर्वकाळ’ ठरतो. याचे कारण फिल्मी या प्राचीन भाषेतील आपल्या पूर्वजोक्त साधनांमधून या काळाविषयी वेगवेगळ्या प्रकारची बरीच माहिती मिळत असली तरी या काळातील मानवाने बनविलेल्या निरनिराळ्या वस्तू आणि त्याने निर्मिलेल्या वास्तू उत्खननांमधून दिसत नाहीत. अर्थात ‘शोले’ या सालीम्जावेदबाबा रचित ग्रंथावर भाष्य करणारे ग्रंथ अनेक विद्वान संशोधकांनी लिहून प्रसिद्ध केले आहेत. या महाकाव्यांमधून उल्लेख केलेल्या व्यक्ती व घटना खरोखरच ऐतिहासिक आहेत की त्या निव्वळ दंतकथा आहेत, याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. त्यासाठी या संशोधकांनी पुरातत्त्वशास्त्राबरोबरच, भूगोल, खगोलशास्त्र, गणित इत्यादी काही शास्त्रांची मदत घेतली आहे.
शोलेतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे जय. युद्धकांडामध्ये जयबद्दल माहिती आलेली आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध प्रकांडपंडित सिबुब्लेव म्याबा यांनी त्यांच्या ‘प्राचीन विकी-चरित्र कोश’ या ग्रंथात त्याबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर सांबा, कालिया यांच्याबद्दल माहिती आली आहे. जय याचे वास्तव्य आजच्या सेक्टर २ मधील स्लाविक परिसरात होते. शोलेनुसार बसंतीचा शोध घेण्यासाठी बिरू जयबरोबर दक्षिण दिशेला गेला होता. जय या जमातीतील सर्वश्रेष्ठ योद्धा होता. तत्कालीन समाजात त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. 'बिरू - गब्बर' युद्धात एक योद्धा या नात्याने त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. बिरूने जयला आपला पार्श्वरक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली होती. सांबा, कालिया आणि बागी या गब्बरपक्षी राक्षसांशी त्याने युद्ध केले होते. बिरूने त्याच्यासह बसंतीला युद्धक्षेत्रा पासून सुरक्षित दूर नेण्याची कळकळीची विनंती त्यानेच बिरूला केली होती. परंतु गब्बरपतनानंतर ठाकूर पक्षाचा विजय झाल्याची आनंदवार्ता ऐकण्यापूर्वीच त्याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. असा हा जय, देवांच्या आशीर्वादाने पुढील जन्मात दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावला, गरजूंना केवळ नाममात्र १०-१२ प्रश्न विचारून, उत्तराचे पर्याय सुद्धा देत असे, गरजूलोकांनी जेवढी योग्य उत्तरे दिली तेवढे मोठे दान तो त्यांच्या झोळीत टाकत असे, काही ऐतिहासिक लेखात आढळले आहे. या काव्यात अनेक व्यक्ती, घटना, कथा यांची सरमिसळ त्यामध्ये झाली आहे. अर्थात सालीम्जावेदबाबानी लिहिलेल्या मूळ शोलेचा विस्तार किती आहे, तसेच त्यामध्ये कोणत्या कथा वा घटनांची भर घातली गेली आहे, हे नीरक्षीरविवेकाने लक्षात येते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जय, बिरू, बसंती ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या हे निर्विवाद आहे. याच्याचसाठीच्या संशोधनपरंपरेचे एक ठळक उदाहरण सांगतो. नाबू या उद्योगपतीच्या वाचनात एकदा हे महाकाव्य आले. तो मार्सवरून सेक्टर २ मधे आला आणि सालीम्जावेदबाबानी आपल्या महाकाव्यात उल्लेखिलेली ठिकाणे प्रत्यक्षात अस्तित्वात होती की नाही, तसेच महाकाव्यात उल्लेख केलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या की नाही याचा शोध घेण्याचे त्याने ठरविले. तोपर्यंत शोले म्हणजे केवळ दंतकथाच आहेत असा समज संपूर्ण पृथ्वीतलावर होता. तो सेक्टर २ मधील हिस्सारलिक या ठिकाणी आला आणि त्याने पुरातत्त्वज्ञाच्या भूमिकेत शिरून तेथे उत्खननास सुरूवात केली. जवळजवळ 20 वर्षे उत्खनन केल्यानंतर त्याने तेथील वसाहतींचे अभ्यासांती नऊ कालखंड पाडले आणि त्यातला सहावा कालखंड शोलेचा आहे हे सिद्ध केले. २४०० च्या सुमाराला त्याचे निधन झाले.
पण लेखाच्या सुरूवातीलाच म्हटलप्रमाणे जय-बिरू आदींचे ऐतिहासिकत्व अजूनही वादाच्या भोवर्यात अडकले आहे. ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की केवळ एक दंतकथा अथवा सालीम्जावेदबाबानी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेली पात्रे होती, असा वाद गेली शे-दोनशे वर्षे चालूच आहे. यांचे ऐतिहासिकत्व सिद्ध करायचे असेल तर त्यापूर्वी 'शोले' खरोखरच घडले की नाही आणि जर घडले असेल तर त्याचा काळ निश्चित ठरविता आला पाहिजे. अंत:स्थ आणि बहि:स्थ प्रमाणे पाहता शोलेचा काळ २३ व्या शतकापूर्वीचा असला पाहिजे. हे निश्चित आहे. वर्तमानयुगाचा प्रारंभकाळ हा वर्ष २२८० असा ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शोलेत वर्णन केलेल्या घटना साधारणपणे २१ व्या शतकापूर्वी घडल्या असल्या पाहिजेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बिरूने जयला आपला पार्श्वरक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली होती
२१ व्या शतकातील म्हणजे आजच्या वाचकांसाठी ….
ठाकूरपक्षाचा अध्वर्यू बलदेव
ठाकूरपक्षाचा अध्वर्यू बलदेव
'शेणसार' ऋषी =))
;)
_/\_ शिष्य करुन घेतोस का _/\_
_/\_ चमत्कारी प्रतिसाद...
आवडलं आपल्याला !!
गजोधरवा
आजच्या आंग्लमय युगात ( पक्षी: २१वे शतक)
तारीख-ए-गब्बरी या फारसी
लै भारी राव.
+११११११११११११
याशिवाय बलदेवकथा, जयवीरभारत,
"शोले च्या इतिहासाची साधने"
बहुत धन्यवाद!
फिफ्टी शेड्स ऑफ गब्बर
शिवाय
शोलेविच-आताबास्की
=))
रथचालक बसन्तीदेवी
पूर्वजोक्त साधनांमधून मिळालेल्या माहितीनुसारच....
क्लिंटन ज्यों आप पर
मालक, दंडवत घ्या.
हा हा
अशक्य आहे हे सगळं
:)
=))))
मस्त .. मजा आली वाचून .. :)
मस्त
काही नव्या
ठ्ठो =)) =)) =))
___/\___
फार काही बोलत नाही..पण लेख
प्राचीन विद्वान शैरीश कंनेकर यांच्या ग्रंथानुसार...
भन्नाट धागा अन त्यावरचे सुपर
एकदम जबराट !!!!