कविता आवडली. केवळ अनिवासी भारतीयाची संवेदनशीलतेचा मी भाग असल्यामुळेच नव्हे तर त्यातील मर्मामुळे.
तुम्ही ब्राह्मण असाल तर तुम्हाला दलित पँथरच्या अपयशाबद्दल बोलता येणार नाही - जरी तुम्ही त्या पक्षाकरता काम केलेले असले तरी. तुम्ही मुस्लिम असाल तर हिंदू लोकांच्या हातून कधी काही चुकीचे घडले तरी बोलता येणार नाही - जरी तुम्ही एक प्रागतिक , सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारे मुस्लिम असलात तरी.
तोच न्याय इथेही लागू केला जातो. तुमचे तुमच्या मायभूमीवर प्रेम असले , त्या प्रेमापोटी तुम्ही तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून काही सुचविले तर ती ब्रह्महत्या. तुम्हाला जी काय मदत बिदत पाठवायची असेल , मायभूमीतल्या गोष्टींबद्दल रस , प्रेम दाखवायचे असेल ते जरूर दाखवा. मात्र कुठलेही सकारात्मक सुधारणा सुचवणारे विधान करण्यास तुम्हाला बंदी आहे.
यात कुणाचा दोष आहे असेही मला आता म्हणवत नाही. उपरेपणा हा संक्रमणशील समाजातल्या ठराविक वर्गाचे भागधेयच आहे.
परदेशस्थांनी स्मरणरंजन करावे पण ते रंजकच असले पाहिजे ! असा संकेत झाला आहे. म्हणजे सणाच्या आठवणींनी गळा दाटून येणे इत्यादी. पण विमानतळावर ऑफिसरांनी त्रास दिला हे रंजक नाही. त्यामुळे ते बोलू नये :)
-- लिखाळ.
परदेशस्थांनी स्मरणरंजन करावे पण ते रंजकच असले पाहिजे ! असा संकेत झाला आहे. म्हणजे सणाच्या आठवणींनी गळा दाटून येणे इत्यादी. पण विमानतळावर ऑफिसरांनी त्रास दिला हे रंजक नाही. त्यामुळे ते बोलू नये
निरीक्षणाशी सहमत आहे.
आपला
(निरीक्षक) आजानुकर्ण
कोलबेर पंत,
मस्तच.
मुक्तसुनित यांचा प्रतिसादहि क्लास. "पान खाऊन, बिनधास्तपणे रस्त्यावर थुंकणार्यांना" चांगलाच लागू पडावा. आपल्या घरात काही सुधारणा कराव्या वाटल्यास त्या घरातल्या इतर मंडळिंना सांगणे म्हणजे "अतिशहाणपणा" ..! आणि अभिमान कसला तर आम्ही पानखाऊन मस्तपैकी रस्त्यावर, भिंतींवर थुंकतो याचा!
कसं दिसायचं घर सुंदर?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुमचे तुमच्या मायभूमीवर प्रेम असले , त्या प्रेमापोटी तुम्ही तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून काही सुचविले तर ती ब्रह्महत्या. तुम्हाला जी काय मदत बिदत पाठवायची असेल , मायभूमीतल्या गोष्टींबद्दल रस , प्रेम दाखवायचे असेल ते जरूर दाखवा. मात्र कुठलेही सकारात्मक सुधारणा सुचवणारे विधान करण्यास तुम्हाला बंदी आहे.
मुक्तसुनीत - आपल्या भावना पोहचल्या. पण बोलणारे मातृभूमीतल्या गोष्टींबद्दल प्रेम दाखविले तरीही बोलतील हे लक्षात घ्या. मदत केल्यास उगाच उपकार सांगू नका (तसे ते सांगूही नयेत) असे ऐकायला मिळेल.
तसेच सगळेच जण सर्वकाळ असेच असतील आणि असतात असे मात्र नाही.
- एकलव्य
हाभिनंदन कोलबेर साहेब!
अगदी मोजके, बोलके व प्रभावशाली प्रकटन. वाह, क्या टायमिंग है! आपण आता तुमचा पण पंखा. वर मुक्तसुनितांनी त्यावर टिपण्णी केली आहेच. त्यांच्याशी १००% सहमत.
(स्वगत - मी हे हाभिनंदन का म्हणतो आहे. त्या टारुचे लेखन जास्त वाचल्याचे परिणाम की त्याचे लेखनच परिणामकारक?)
आपला,
(प्रभावीत) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मी हे हाभिनंदन का म्हणतो आहे. त्या टारुचे लेखन जास्त वाचल्याचे परिणाम की त्याचे लेखनच परिणामकारक?
मालक त्ये "हाबिणंदण" हाय .. बिनचुक आसुद लिवाचं .. :)
बाकी कोलबेर भौ .. हे काव्य 'जनातलं मनातलं' या सदरात टाकलं या व्यतिरिक्त यात काय बी चुकीचं नाय बा ! मुसू भौ पण एकदम जोर्यात, प्राजु तै ने कोल्हापुरी मिरचीची कँडी चॉकलेटच्या वेष्टणात वाटायचं ठरवंलय ..
बाकी आता निवासी-अनिवासी यांच्यात शंख फूंकला गेलाय म्हणायला हरकत नाही.
-(हस्तिनापुर नरेश गदाधारी)
टुर्योधन
(सद्ध्या ना निवासी ... ना अनिवासी... आम्ही तर भटके, आज इथे उद्या तिथे, आम्हाला पण एस.टी./एन.टी. च्या जागांच आरक्षण मिळायला पाहिजे)
वा ! वा ! कोलबेरसेठ, तुम्ही जिंकलात !
साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..
कवितेतील आशय आवडला. मराठी आंतरजालावर हा विषय लैदा चघळून झाला आहे. पण नवा पैलु सापडला अस्सेल तर शप्पथ आहे. परदेशात राहून सतत चकचकीत गप्पा आणि इकडे सतत भूकबळीच्या गप्पा. राजे बदलतात, सरकारे बदलतात, पण समाज मात्र आपल्या गतीने बदलत असतो असे म्हणतात. तेव्हा सकारात्मक चर्चेने बदल होईल की माहीत नाही, पण एक ठिणगी मोठी आग लावू शकते यावर आमचा विश्वास आहे. म्हणून कितीही कंटाळा येऊ दे, चर्चा मात्र रंगल्या पाहिजे असे वाटते.
शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.
या ओळींशी सहमत आहे, आणि याच ओळी आवडल्या...:)
-दिलीप बिरुटे
कोलबेरसाहेब . .
कविता आवडली. बघायला गेलं तर बर्याच निवासी लोकांच्या भावना या अशाच आहेत. परदेशात गेलेले सारे एनआरआइ बसुन फक्त मजा मारतात, तिथले गोडवे गाउन मायभुमीला नावं ठेवणं हाच त्यांचा धंदा आहे वगेरे वगेरे. परंतु हेच लोक कार्यालयात मान मोडेपर्यंत मेहेनत करतात हे मात्र लोक विसरतात. जास्त काय लिहिणे .. मुक्तसुनीत रावांचा प्रतिसाद सगळे काही सांगुन जातो. बदलण्यासाठी इच्छाशक्ती हवी, चुका मान्य करण्याची हिम्मत हवी. झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेनार्याला नाही तेच इथेही. आम्ही असेच राहु म्हणनार्यांना कोण बदलणार?
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.
ह्या ओळी वाचून तर अतिशय आनंदाने इथल्या खिडकीतून खालच्या हिरवळीवर एक जोरदार पिंक टाकायची इच्छा झाली पण थंडीमुळे खिडक्या बंद आहेत आणी मी पानही खात नाही ह्या दोन्ही गोष्टी जरा उशिराने लक्षात आल्या त्यामुळे धावत खिडकीशी गेलेला निमूट येऊन बसलो ;) !
(अनिवासी भामटा)
चतुरंग
साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..
हा हा हा! अगदी खरं! :)
शिवाय तिकडच्या स्वच्छतेच्या अन् टापटीपेच्या गप्पा ही मंडळी आम्हाला जातायेता शिकवतात तेव्हा तर फारच मौज वाटते बुवा! :)
मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला
हा हा हा! हे बाकी मस्त बोललात कोलबेरराव..
जणू काही उपकारच करतात साले वनवासी कल्याण आश्रमावर!
त्यासोबत एक सल्ला सार्या निवासी जनतेला
"दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.."
निवासी जनतेला न विचारता(!) दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद! :)
शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
खरं आहे..! आहेतच आमचे बाबा आमटे हजारात एक!
वा कोलबेरराव, कविता बाकी सुरेखच हो! :)
आपला,
(कुणा गोर्या माकडांच्या दारात आशाळभूतपणे हुजरेगिरी करत तुकडे न मोडता स्वत:च्याच मातृभूमीत दोन वेळची स्वाभिमानाची भाकरी खाऊन गोर्या माकडांना फाट्यावर मारणारा!) तात्या.
मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला
बाय द वे, दानाचा उच्चार केला की त्याचं महत्व संपतं असं ऐकून आहे!
शिल्लक राहतो तो फक्त डॉलर्सचा माज!
तात्या.
कुळकर्णी नावाचे आमचे स्नेही देखील "हिरव्या नोटांचा माज" अशी शब्दरचना करून अनिवासी भारतीयांना हाणत असत. त्यांचे विचार आपल्याशी किती जुळतात, हे वाटून हर्ष झाला.
परंतु हिरव्या नोटांचा माज असलेले माझ्या पाहण्यातले काही लोक, कुणी यमन गात असताना दुसर्यांशी गप्पा मारत नाहीत, हा त्यांचा गुण जमेस धरण्यात यावा.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
कुळकर्णी नावाचे आमचे स्नेही देखील "हिरव्या नोटांचा माज" अशी शब्दरचना करून अनिवासी भारतीयांना हाणत असत.
तो मी नव्हेच, गैरसमज नसावा!!!!
(खुद के साथ बातां: काय तिच्यायला आमच्या पूर्वजांनी आडनांव पण निवडलंय!!! जरा काही भांडारकर, पटवर्धन वगैरे निवडलं असतं तर निदान विद्वत्तेचा मान तरी मिळाला असता!!! पण "कुळकर्णी"? आमच्या कुळांसकट सगळे काड्याघालूच समजतात!!!! भें**, एखाद्याचं नशीबच तसलं!!!!)
:)
डांबिस कुळकर्णीडाक्टर,
तुमच्या (एक सोडून) इतर सर्व कुळकर्ण्यांच्या दुख्खात मी सहभागी आहे.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
उल्लेख केल्यानं महत्व संपतही असेल, पण मूळात दान केलं ही वस्तुस्थिती मात्र शिल्लक राहतेच. ती नाकारता येतच नाही.
आणि इथे मिपावर पण माझ्या माहितीत असे एनाराय आहेत जे असं दान करत असतात. कधी उल्लेख झालाच तर काही अवांतर कारणाने होतो प्रौढी मिरवायची म्हणून नव्हे.
बिपिन कार्यकर्ते
उल्लेख केल्यानं महत्व संपतही असेल, पण मूळात दान केलं ही वस्तुस्थिती मात्र शिल्लक राहतेच. ती नाकारता येतच नाही.
बरं बरं! साला, दान केलं, ती वस्तुस्थितीच आहे!, इत्यादी डंक्यांकरता खरं तर दिवेच ओवाळले पाहिजेत आता! आलोच हां पंचारती घेऊन! :)
तात्या.
तात्या तुला मुद्याला मुद्दा देउन वाद घालायचा नाहिये हे कळतंय मला. उगाच असे चिडवणारे अवांतर प्रतिसाद देऊन समोरच्याला गरम करायचं आणि आपण मजा बघायची हा एक शास्त्रमान्य डावपेच आहे वादतंत्रातला. काळजी नसावी. मी इथे काहीही अवांतर लिहिणार नाही कारण हा एक चांगला विषय आहे. मूळ विषय टवाळ असता तर केली असती टवाळकी. :)
बिपिन कार्यकर्ते, वा. द. शास्त्री उच्च माधमिक शाळा, इयत्ता ५वी अ, (५० मार्कांचं संस्कृत)
समोरच्याला गरम करायचं आणि आपण मजा बघायची हा एक शास्त्रमान्य (???)
जगदंब जगदंब ... जॉर्ज मायकलच युग आलं ... :)
-शॉन मायकल
(रॉ , डब्लू.डब्लू.ई.)
अवांतर : परदेशात जाउन भारतीयांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार केला पाहिजे. तेथील लोकांना रोडवर पच्चाआआक्क्कन थुंकण्याच्या परमाणंदाची जाणिव करून दिली पाहिजे, चार भिंतीत हागणे झुट आहे, वावरात जी मजा आहे ती कुठेही नाही. त्यांना हे "आर्ट ऑफ लिव्हींग" शिकवलं पाहिजे. म्हणजे उद्या ते उघड्या हातांनी आपली संस्कृती आपणावतील. मी पण "पान्टपरी" सुरू करतोय. दान फिन करण्यापेक्षा, "जाऊ तिथं असंच वागु" चा नारा बुलंद झाला पाहिजे. थुंकश्री, थुंककेसरी,थुंकसम्राट असे पुरस्कार काढून ही प्रवृत्ती वाढवली पाहीजे.
अफ्रिकाना जंगली पानाची गादी
प्रो.प्रा. टारझन (४२० स्पे. पान)
"आमचे येथे खाजगी मालकीच्या रोड वर केवळ २$ मधे पच्चाआआअक्क्कन थुंकायची सुविधा आहे. "
लोकसभा राज्यसभेच्या ऑर्डरी स्विकारतो.
बाकीच्या गोष्टी अवांतर या सदरात मोडतात. आम्ही फक्त मुद्द्याला धरून प्रतिसाद लिहीतो .
बाकी तसं म्हंटलं तर बाकीच्या महान गोष्टी आधीच पसरल्यात. ज्या मागे राहिल्यात त्याच पसरवायची मोहिम हाती घ्यावी. मातृ-पितृभत्ती, सण-वार , मोठ्यांचा आदर वगैरे गोष्टी चाउन चोथा झाल्यात.
(मुद्देसुद) आजानुटार्ण
भारतीय संस्कृती ही वावरात हागणे आणि रस्त्यावर थुंकणे इतपतच असल्याचे वाचून आनंद झाला.
हेच म्हणतो..!
अर्थात, भारतीय संस्कृतीची तितपतच माहिती असेल तर प्रश्नच मिटला! :)
तात्या.
नेहमीप्रमाणे मुक्तसुनीतनी नेमक्या शब्दात व्यक्त केलंय, पूर्णपणे सहमत.
ऑलटाईम फेवरिट विषय आहे हा, सगळ्यांचाच. हा विषय निघाला रे निघाला दोन्ही बाजूंकडून उड्या पडतात. पण नीट साधक बाधक विचार करून बोलणारे अंमळ विरळाच. यात 'मूळात परदेशात जायची गरजच काय', 'आता गेलाच आहात तर बसा चूपचाप, तुमचा इथे काही अधिकार नाही राहिला' इथपासून ते 'शी: किती धूळ, घाण', 'हरामखोर लेकाचे, माजलेत, काही शिस्तच नाही, किती करप्शन' इथपर्यंत सगळे नमुने बघायला मिळतात. थोडक्यात काय तर अतिरेकी दोन्ही बाजूला असतात.
माझ्या पुरतं बोलायचं तर, कमी वेळात जास्त पैसा कमवायचा म्हणून गेलो परदेशात हा मुख्य हेतू होताच. पण 'केल्याने देशाटन...' या उक्तिवर माझा ठाम विश्वास आहे. मला फायदा झालाही. मला आजपर्यंत भारताबाहेर राहून नुसता माज करणारे एनाराय फार म्हणजे फारच कमी बघायला मिळाले आहेत. असे बरेच लोक आहेत, जे पैसा कमवत आहेतच पण त्या पैश्याचा एक मोठा हिस्सा काहीही गरज नसताना, वैयक्तिक स्वार्थ नसताना केवळ खाज म्हणून अनेक चांगल्या कामांना मदत म्हणून देतात. मग त्यांना माज आहे असे कसे म्हणणार? त्याच बरोबर बरेचसे निवासी भारतिय पण बघितले आहेत जे भेटले रे भेटले की अनिवासी काय घालतील एवढ्या वाईट शिव्या घालतात आपल्या पवित्र इ. इ. मायभूला... मग त्यांचा माज कशाच्या जोरावर चालू शकतो? त्यांनी तर आयुष्यात कधी एक दमडा दिला नसेल कोणाला. आमच्या आजीच्या भाषेत सांगायचे तर, कापल्या करंगळीवर मुतणार पण नाहीत असले लोक. ते बोलू शकतात कारण फक्त ते तिथे आहेत!!!! (आणि बरेच वेळा ते तिथे असण्याचे कारण केवळ बाहेर जायला मिळालं नाही असं असतं, मला जायचंच नाहिये जायला मिळत असून सुद्धा असे किती असतील?) बरं हे लोक टॅक्स वगैरे भरत असतील म्हणून त्यांना अधिकार आहे असे जरी क्षणभर मानले तरी हा प्रश्न उरतोच की सगळेच टॅक्स भरतात का? आणि एनाराय लोक परदेशी चलनाच्या गंगाजळीत भर घालतात, खूपसा पैसा त्यांच्या माध्यामातून देशात येतो त्याचे काय?
अजून एक गंमत म्हणजे, की हा विषय मूळात फक्त महाराष्ट्रिय लोकांतच चघळला जातो. गुजराथी, तमिळ, तेलगू, मल्याळी इत्यादी भाषिकांत अशी भावना मला तरी आढळली नाही. उगाच नाही ते कोळणीच्या टोपलीतल्या खेकड्याची उपमा देत (आपणच) आपल्याला!!!
There is nothing Black or White in this world, everything is Grey. Only the shades differ, but its Grey.
(काही वर्षे बाहेर काढून (परत यायची काही बळजबरी नसताना) परत भारतात येऊन परत काही वर्षं बाहेर आलेला बदनाम) बिपिन कार्यकर्ते
माना अथवा न माना, उपकार नाही पण मदत तर निश्चितच आहे. सोन्याला आपण सोनं नाही म्हणलं तरी जग थोडीच म्हणायचं थांबणार आहे. :)
परकिय चलनसाठ्याचा भारतासारख्या अर्थव्यवस्थेला किती फायदा झाला हे मी काय सांगू. अर्थशास्त्र माझा प्रांत नाही. खूप मोठे लोक आहेत इथेच मिपावर. एके काळी निवासी लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनीच सोनं गहाण ठेवायची पाळी आणली होती हे विसरून कसं चालेल? आणि सरकारला नको असेल परकिय चलन तर मग त्यावर कर आकारणी का नाही होत? सवलती का मिळतात?
(सोनार) बिपिन कार्यकर्ते
सोन्याला आपण सोनं नाही म्हणलं तरी जग थोडीच म्हणायचं थांबणार आहे.
हो पण सोन्याने स्वत:लाच सोनं म्हणवून घेऊ नये! ते जगानं म्हटलं तर ठीक! ;)
आपला,
(दाता, दाता म्हणून ऊर बडवणारा!) तात्या.
मि सुद्धा " बिपिन कार्यकर्ते" तुम्च्याच सारखा एक बदनाम अनिवासि भारतीय आहे.
अनिवासि भारतिय व्यक्तिन बद्दल वाइट मत असलेल्या माझ्या प्रिय बान्धवाना मि एकच सान्गु एछितो कि , जे लोक भारतात राहून आपल्याच बान्धवान्शि ( इतर जातिय, धार्मिय, परप्रान्तिय.......) झगड्त राह्तात. त्यापेक्शा परदेशात राहणारे अनिवासि ( भारतिय बदनाम) सर्व जात पात , धर्म , प्रान्त विसरून फक्त भारतिय बनून अधिक गुण्यागोविन्दाने राहतात.
आणि मुळातच बेरोजगारिचा आकडा वाढ्वत देश प्रेम सिद्ध करत बसण्यापे़क्षा , जर काहि लोक हा आकडा कमि करण्यात हातभार लावत असतिल तर यात गैर काय?
परदेशात राहून देशप्रेम कमि होत नसत, याउलट ते अधिक वाढत असत.
एकाच घरात राहणार्या दोन व्यक्ति जर अधिक काळ दूर राहत अस्तिल तर त्यान्च्यातील आपुलकि वाढत असते. आणि जर त्याच दुर राहणार्या माणसाला जर कोणी छेडत असेल तर त्यान्च्यात
द्वेश निर्माण होतो.
त्यामुळे एकमेकान्च्या तन्गड्या ओढत राह्ण्यापेक्षा , सामुयीकता बाळ्ग्ल्यास देशप्रेम सिध्ध करत बसाव लागणार नाही.
( हा सल्ला नाही......., फक्त मत मान्डण्याचा प्रयन्त आहे. ( कारण अनिवासी भारतीयाना मत मान्डण्याचा कायदेशीर अधिकार नसेलच.....) अन्कित...
बिकाशी सहमत !उगा भारतात बसून अनिवासी लोकांना शिव्या घालायची फॅशन आली आहे. भारतात राहूनही जे आयटी मध्ये काम करतात ते हिरव्या नोटा वाल्यांचीच चाकरी करतात. तेव्हा देशात राहिल्याची उगी मिजास मारू नये.
प्रश्न मदतीचा:
आशा फॉर एज्युकेशन, एड सारख्या संस्था वर्षभर राबून २००,०००$ जमवतात? तो काय हिरवा माज म्हणून का? आदिवासी भागांमध्ये शाळा चालवल्या जातात आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या पाड्यांमध्ये सौर दिवे बसवले जउपकार्?याला उपकार केले असे तुच्छ लेखण्याचा अधिकार बाकीच्यांना कुणी दिला?
नाटकी अनिवास्यांना फोकाने हाणले पाहिजे पण कोणी करतृत्वशून्य माणसाने अनिवास्यांना शिव्या घालण्या आधी स्वतः काय केल आहे याचे आत्मपरिक्षण करावे.
कोलबेर कविता ,आशय सुंदर.. ज्यांना समजुन घ्यायची इच्छा असेल त्यांना आवडेलच! ज्यांना स्वतःचाच डंका पेटवायचाय त्यांना कितीही लिहीलं,सांगितलं तरी पटणार नाही!!! झोपी गेलेल्याला जागं करता येतं... सोंग घेतलेल्या माणसाला नाही.. हेच खरं!
डिस्क्लेमर : (या माझ्या खुदके साथ बाता आहेत.. कुणालाही उपदेश केलेला नाही. कोणाला तसा वाटला तर तो माझा प्रश्न नाही!)
(आमचं तुमचं न करणारी!) भाग्यश्री..
http://bhagyashreee.blogspot.com/
श्रीरामाला रावणाविरुद्ध युद्धात मदत केल्याबद्दल त्याने माकडांना वरदान दिले होते, की एक दिवशी तुम्ही जगावर राज्य कराल. एका निवासी भारतीयानेच ह्या गोर्या माकडांना राज्य करण्याचे उत्तेजन दिल्याबद्दल, आम्ही निषेध व्यक्त करतो आहोत, ह्याची नोंद घ्यावी.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
अजून एक.
प.पू. भाईकाकांच्या रावसाहेब मधे 'घरी चांगलं जेवायला मिळालं तर कशाला कोण बाहेर खाणावळीत जाईल जेवायला' अशा अर्थाचं काही तरी तत्वज्ञान मांडलेलं आहे असं माझी अधू स्मृति मला सांगते आहे. कदाचित मी चुकत असेन, तसं असेल तर जाहिर माफी. आणि मी चुकत असेन तरी हे तत्वज्ञान बर्याच बाबतीत लागू पडतं (सगळ्या बाबतीत नाही हे जिज्ञासूंनी ध्यानी घ्यावे. ;) )
बिपिन कार्यकर्ते
मध्यंतरी, काही अनिवासी भारतीयांनी मिपाला अर्थिक मदत देऊ केली होती त्याबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना आहे!
परंतु बरं झालं, कुणाकडून मदत घेतली नाही!
नीलकांत म्हणतो त्याप्रमाणे वर्चुअल सर्व्हर का काय म्हणतात ते प्रकरण बरंच महाग आहे. जो पर्यंत खिशाला परवडेल तोवर ठीक, पण कुणा अनिवासी भारतीयाकडून एका नव्या पैशाचीही मदत नक्को रे बाबा!
नायतर तिच्यायला वनवासी कल्याण आश्रमानंतर मिपाचाच उद्धार व्हायचा!
आपला,
(स्वाभिमानी निवासी भारतीय!) तात्या.
असा जप करत आपण 'आपले-बाहेरचे' हा दुराभिमान मात्र खच्चून जोपासतो आहोत हे जेव्हा लक्षात येईल तो सुदिन!
बाकी कोयनेचे धरणविस्थापित हे चाळीस वर्षांनंतरही 'आपल्याच' मायभूमीत 'परके' म्हणून जिथे तिथे हिणवले जातात, हाकलले जातात त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने, मला आज पुन्हा प्रकर्षाने झाली हे सांगायला खेद वाटतो!!
चतुरंग
ह्याची अंशात्मक का होईना जाणीव, अनिवासी-निवासी ह्या नाहक वादाने,
निवासींच्या तृटी, निवासींचे दोष कधीही नाकारण्यात आलेले नाहीत. आहेत, निवासींच्यात दोष आहेत, अगदी ढळढळीतपणे आहेत..! त्यात सुधारण केली पाहिजे, पान खाऊन रस्त्यात थुंकले नाही पाहिजे, हेही मान्य!
मुद्दा फक्त इतकाच की बहुतांशी वेळेस अनिवासीयांकडून निवासींचे केवळ दोषच काढले जातात/दाखवले जातात ते मला व्यक्तिश: अत्यंत चुकीचे वाटते आणि मग नाहक/आवश्यक अश्या वादाला तोंड फुटते..! इकडच्या अक्षरश: हजारो समस्या, प्रचंड लोकसंख्या, इत्यादी गोष्टी अनिवासींनीही बरेच वर्ष इथे राहून पाहिलेल्या असतात.. परंतु अनिवासी झाल्यावर अवघ्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीतच बरेचसे अनिवासी कंप्लीट परकेपणाने तिकडचे गोडवे गात निवासींचे दोष काढतात, त्यांची खिल्ली उडवतात असे माझ्या पाहण्यात आहे आणि हे माझ्या मते अत्यंत गैर आहे/संतापजनक आहे...
असो, प्रत्येक वादाला काही अंत हवा या न्यायाने मी माझ्याकडून हा विषय संपवत आहे..
कळत-नकळत कुणा अनिवासीला वैयक्तिकरित्या दुखावले असल्यास मन:पूर्वक क्षमा मागतो आणि सरसकट, येताजाता, कळत-नकळत डॉलर्सच्या नशेत निवासींचे केवळ दोष काढणार्यांना क्षमा करतो..!
चतुरंगरावाचा प्रतिसाद सर्वांनीच विचार करण्याजोगा आहे अशी मनमोकळी टिप्पणी करून हा विषय निदान माझ्याकडून तरी इथेच संपवतो..
आपला,
(निवासी) तात्या.
प्रतिक्रिया
टाळ्या
कविता
परदेशस्था
हे मात्र खरं आहे.
सहमत
वा!
टिपण्णी
मूळ विषयामुळे
खल्लास मार्मिक
णमस्कार्स
+१
संवाद
क्या बात है !!!
वा वा वा... कोलबेरपंत
व्यत्यास
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कविता आवडली . .
कोलबेरशेठ कविता आवडली!
शेवटी
वा वा वा !!!
कविता आवडली.
साले
मग
आमचे एक स्नेही
तो मी नव्हेच!!!
सहमत
उल्लेख
उल्लेख
तात्या
समोरच्याल
भारतीय संस्कृती
होय होय होय
भारतीय
माझ्या मते
सौ सुनार की, एक कोलबेर की...
आणि एनाराय
माना अथवा
सोन्याला
अनिवासि आणि निवासि यान्च्यातिल फरक......
+१
सहमत
आई शप्पथ
कोलबेर
गोरी माकडे
अजून
मध्यंतरी,
स्वाभिमान, स्वाभिमान!
सहमत... अजून
सहमत
ह्याची