आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
बिनपाण्याने हजामत
राजा! ही तुझी बदमाषी आहे
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.
आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!
शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.
हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.
बिनपाण्याने हजामत
या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.
यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.
राजा! ही तुझी बदमाषी आहे
विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.
मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
85891
प्रतिक्रिया
246
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेतकर्यांना कुणीही वाली
अजून काही माहिती हवी आहे.....
७०००/- प्रति क्विंटल भाव
In reply to अजून काही माहिती हवी आहे..... by आयुर्हित
लेख वाचला...
करण्यासारखे काहीच नाही हे खरे आहे.
In reply to लेख वाचला... by मुक्त विहारि
एक प्रश्न
बोक्या, दक्षिणेतील
In reply to एक प्रश्न by बोका-ए-आझम
धन्यवाद पिंगूजी
In reply to बोक्या, दक्षिणेतील by पिंगू
हे कोणी केलं यापेक्षा कशाला
हाडकोराव
In reply to हे कोणी केलं यापेक्षा कशाला by हाडक्या
अमच्या नव्हे आपल्या.. आमीपण
In reply to हाडकोराव by गंगाधर मुटे
दुष्काळात नेंत्याना भलताच
दयावानांना दया
In reply to दुष्काळात नेंत्याना भलताच by जेपी
उत्तम लेख. थोडक्यात, सरकार
शतप्रतिशत सत्य.
In reply to उत्तम लेख. थोडक्यात, सरकार by विशाखा पाटील
सरकारने शेतकऱ्यांसाठी काही न
सहमत
In reply to सरकारने शेतकऱ्यांसाठी काही न by विवेकपटाईत
देशोन्नती-१६/११/१४
खूपच वाईट बातमी आहे. किंबहुना
इतका विचार करतोय कोण?
In reply to खूपच वाईट बातमी आहे. किंबहुना by एस
जागतीक व्यापार संदर्भाने होऊ
आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक
In reply to जागतीक व्यापार संदर्भाने होऊ by माहितगार
शासनाचे धोरण दुटप्पीपणाचे
In reply to जागतीक व्यापार संदर्भाने होऊ by माहितगार
साहेब, आंतरराष्ट्रीय
In reply to शासनाचे धोरण दुटप्पीपणाचे by गंगाधर मुटे
संकुचित धोरन
In reply to साहेब, आंतरराष्ट्रीय by माहितगार
आम्ही मुक्तार्थव्यवस्थेचे
In reply to संकुचित धोरन by गंगाधर मुटे
सबसिडी कुठाय?
In reply to आम्ही मुक्तार्थव्यवस्थेचे by माहितगार
(No subject)
मला जरा वेगळे मत मांडायचे आहे
नाविण्यपुर्ण मत नाही
In reply to मला जरा वेगळे मत मांडायचे आहे by प्रसाद१९७१
योग्य प्रतिसाद. स्मायल्या
In reply to नाविण्यपुर्ण मत नाही by गंगाधर मुटे
एका मुलीच्या हत्त्येवर आकाश
समाजाची संवेदनाशीलता मेली काय
In reply to एका मुलीच्या हत्त्येवर आकाश by प्रसाद१९७१
जबरदस्ती आणि स्वताचा चॉइस
In reply to एका मुलीच्या हत्त्येवर आकाश by प्रसाद१९७१
बलात्काराला देखील त्या
In reply to जबरदस्ती आणि स्वताचा चॉइस by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }असे "नग" आहेत
In reply to बलात्काराला देखील त्या by मदनबाण
नग एखादाच असतो "हजारो" नाही..
In reply to असे "नग" आहेत by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }आपल्या समोर असे लोक येत नाहीत
In reply to नग एखादाच असतो "हजारो" नाही.. by मदनबाण
आपल्या समोर असे लोक येत नाहीत
In reply to आपल्या समोर असे लोक येत नाहीत by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }मदनबानजी
In reply to आपल्या समोर असे लोक येत नाहीत by मदनबाण
एकतर्फी...
एकतर्फी कळवळा
In reply to एकतर्फी... by प्रभाकर पेठकर
खोबरं...
In reply to एकतर्फी कळवळा by गंगाधर मुटे
>>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे
In reply to खोबरं... by प्रभाकर पेठकर
खोबरं
In reply to >>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे by सूड
त्यासाठी पॅकेज बनलं की कळेल.
In reply to खोबरं by प्रसाद गोडबोले
हे 'खोबरं'च आहे
In reply to >>मुळात, हे 'खोबरं'च आहे, हे by सूड
शेतकरी बंधूंनी डोळे उघडे
एक्कासाहेब,
In reply to शेतकरी बंधूंनी डोळे उघडे by डॉ सुहास म्हात्रे
'दारिद्र्य हे एक दुष्टचक्र
In reply to एक्कासाहेब, by एस
'दारिद्र्य हे एक दुष्टचक्र आहे...'हे दुष्टचक्र का व कसे निर्माण होते याच्या कार्यकारणभावाचा विचार केला तर मला काय म्हणायचे हे बरेच स्पष्ट होईल. यात इतरांबरोबर शेतकर्यांचे स्वतःचे काय बरे वाईट योगदान आहे याचाही प्रामाणिकपणे विचार करण्याची जरूरी आहे... म्हणजे शेतकर्यांनी आपले हितसंबंद्ध सुरक्षित रहावे म्हणून काय केले अथवा केले नाही याचीही मिमांसा करणे जरूर आहे. या जगात आपले हितसंबंद्ध दुसर्या कोणी राखावे अश्या कल्पनेने त्यांची जबाबदारी दुसर्यावर डोळे मिटून सोपवल्यास फसवणू़कीचीच जास्त शक्यता आहे, शिवाय त्याचे मिंधेपण येते ते वेगळेच. यासंदर्भात सतिश गावडे यांचा हा प्रतिसाद काही पैलूंबद्दल बरेच सांगून जातो.शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ
In reply to शेतकरी बंधूंनी डोळे उघडे by डॉ सुहास म्हात्रे
सबसिडीबद्दल सर्वसाधारण मत
In reply to शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ by गंगाधर मुटे
काहिच कळत नाहि...
तुम्हाला बोचून काय उपयोग?
In reply to काहिच कळत नाहि... by अर्धवटराव
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्
विदर्भात "कदाचित" पाऊस हा
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण
In reply to विदर्भात "कदाचित" पाऊस हा by टवाळ कार्टा
कठीण आहे पण शक्य आहे हे
In reply to शेतीसाठी अवर्षण आणि अतिवर्षण by डॉ सुहास म्हात्रे
कमीत कमी कोकणातल्या शेतकर्
In reply to कठीण आहे पण शक्य आहे हे by टवाळ कार्टा
उत्तम मुद्दा!!
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
मी शेतकरी कुटुंबातली नाही. पण
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
विदर्भातील दुष्काळ ते शेतकर्
In reply to विदर्भातील दुष्काळ ते शेतकर् by सतिश गावडे
शेतकर्यांना निर्यात बंदी नको
शेतकरी मुक्त आयात-निर्यात धोरणाचाच समर्थक आहे.
In reply to शेतकर्यांना निर्यात बंदी नको by प्रसाद१९७१
खरंखोटं ठाऊक नाही पण त्या
विदर्भाचे सर्वात जास्त शोषण
In reply to खरंखोटं ठाऊक नाही पण त्या by प्यारे१
वेगळा विदर्भ झाल्यास हा
In reply to विदर्भाचे सर्वात जास्त शोषण by गंगाधर मुटे
काही अंशी
In reply to वेगळा विदर्भ झाल्यास हा by प्रकाश घाटपांडे
मुटेसाहेब !! सिरीयसली एक
In reply to काही अंशी by गंगाधर मुटे
प्रश्नच उद्भवत नाही.
In reply to मुटेसाहेब !! सिरीयसली एक by खटपट्या