एकदा तरी पहावा असा.
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
- वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
- उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतला नाही
- करूण्/भावस्पर्शी प्रसंग आटोपशीर ठेऊन "मेलो ड्रामा" टाळल्याबद्दल विशेष आनंद
- नक्षल्ग्रस्थ भागातील सरकारी अनास्था/एकूण समाजाचा अदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण यावर तटस्थ पण सूचक भाष्य
- मुळात हयात असलेल्या सेवाव्रती व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट बनवताना योग्य ती काळजी आणि स्वातंत्र्य मर्यादा घेतली आहे (एतीहासीक चित्रपटात जे कल्पना स्वातंत्र्य मिळते,ते ईथे नाही याचे भान ठेवले आहे
- चित्रपटात कुठेही गाणी नाहीत. आहेत तीही पार्श्वसंगीत स्वरूपात त्यामुळे रसभंग होत नाही
- चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही) कार्य पट असल्याने अडचणी आणि त्याचे निवारण जास्त सहज स्वाभावीक (अकृत्रीम) वाटतात
- लहान-सहान प्रसंगातून कथा फुलवली आहे.त्यामुळे परीस्थीती निर्मित हलके फुलके हास्य प्रसंग चित्रपट (आशयाला धक्का न लावता)अगदीच गंभीर होण्यापासून वाचवतात
- एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा
- खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही
- पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल)
- सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो
- जरा चित्रपट चांगला चालला कि दर वाढवतात हे मल्तीप्लेक्स वाले, यांना पण एक पडदा सारखे कायम दर ठेवण्याचा कायदा करावा
- टॅक्स फ्री असूनही १५० रुपये प्रती माणशी द्यावे लागले आणि स्क्रीन ची (आसन क्षमता) वसंत पेक्षा पण कमी त्यामुळे जास्तीच वाईट वाटले बाकी मी काही समीक्षक नाही (मिपा नामवंत तर नाहीच नाही) तेव्हा जाणकारांच्या प्रतीक्रिया अपेक्षीत वि.सू.प्रतिसाद व्यतिरीक्त लेखनाची पहिलीच वेळ आहे तेव्हा व्याकरण व मांडणी चुका संभाळून घेणे.(अक्षरास हासू नये या शालेय निबंध लेखन चालीवर वाचले तरी चालेल)
-
मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे.
नमन झाल्यावर आता मुळ विषयः
डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला.
सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पहिल्याच लेखनाचे स्वागत.
चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ
वाटच बघत होतो या चित्रपटाच्या
@ तिरकी रेघ थोड्याच पण
एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली
चित्रपट खरच खूप छान आहे .
छान परिक्षण. चित्रपटाच्या
छान परीक्षण
छान परिक्षण ! बहुतेक मुद्दे
हे
चित्रपट खरेच छान आहे, आणि
चित्रपट - डॉ. प्रकाश बाबा