डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित !
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा
मरणान्तिनि वैराणि>>>>>>>>> हा
हा शुद्ध दांभिकपणा आहे.
कदाचित आपण म्हणता ते सत्यही
मिपावर सुध्धा राजकिय रंग :(..
दाभोळकरांच्या मतांविषयी अनेक
+१
>>> सरकार बदललं की मारेकरी
दाभोळकरांची मते न पटणारे लोक
+१११११११११११११
+१११११११११११११
कायदा होण्या पुर्वी असा सुर
आता पाच वर्षे होत आली तरीही
दाभोलकरांची हत्या
>>> आता पाच वर्षे होत आली
कैच्या कै
तपास केव्हाच पूर्ण झाला आहे.
तपास पूर्ण झाला असेल तर मग
तपास पूर्ण झाला असेल तर मग
तपास पूर्ण झाला असेल तर मग खटला का सुरू करत नाहीत?खटला सुरू होत नाही कारण निधर्मांधांच्या दबावामुळे पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना पकडले आहे. त्यांच्याविरूद्ध पुरेसे पुरावे नसल्याने खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व पोलिसांचे पितळ उघडे पडेल. म्हणून आरोपींना जामीन न देता वर्षानुवर्षे तुरूंगात डांबून ठेवायचे, खटला सुरूच करायचा नाही व दरम्यानच्या काळात सनातन संस्थेवर दोषारोप करीत रहायचे अशी योजना आहे. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर काही मिनिटातच "ज्या धर्मांध शक्तींनी गांधीजींना मारले, त्यांनीच दाभोळकरांना मारले आहे" अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी देऊन तपासाला एक विशिष्ट दिशा दिली होती. दाभोळकर व सनातन संस्था यांच्यातील संघर्ष अनेक दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे खून झाल्याक्षणी तपासाची सुई सनातनकडे वळविण्यात आली. हे अजाणतेपणे केले होते का खर्या खुन्यांना निसटून जाण्यास व पुरावे नष्ट करण्यात पुरेसा वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आले होते हे सांगता येणे अवघड आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी इतर कोणत्याही शक्यतांचा विचार न करता पुढील १४-१५ दिवस सनातनच्या साधकांची चौकशी करण्यात अक्षरश: वाया घालविले. त्यामुळे त्या वेळात खर्या खुन्यांना निसटून जाण्यासाठी व सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. सलग १४-१५ दिवसांच्या चौकशीनंतर खुनात सनातनचा हात असल्याचे पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी दुसर्या शक्यतांचा विचार सुरू केला. परंतु तेव्हा खूपच उशीर झाला होता. दरम्यानच्या काळात माध्यमांनी सनातनला लक्ष्य करून या खुनामागे सनातनच आहे असा निष्कर्ष काढला होता. दाभोळकरांनी धर्मचिकित्सा केल्याने सनातननेच त्यांचा खून केला हे निधर्मांधांनी व माध्यमांनी ठरवूनच टाकले होते. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवरून सनातनवर टीकेचा भडीमार सुरू होता. अर्थात सनातनच्या पदाधिकार्यांची मूर्खासारखी उधळलेली मुक्ताफळे सुद्धा त्यासाठी कारणीभूत होती. दाभोळकरांच्या खुनानंतर दुसर्या दिवशी सनातनच्या संकेतस्थळावर दाभोळकरांच्या चित्रावर लाल फुली मारून प्रसिद्ध केलेल्या चित्रामुळे सनातनविरूद्ध संशय जास्तच वाढला होता. श्रीपाल सबनीस यांच्यासारखा आचरटशिरोमणी सुद्धा सनातनमुळे प्रसिद्धीस पावला कारण सनातनच्या संजीव पुनाळीकरने ट्विटरवर "रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात रहा, सबनीस" असे ट्विट करून आपल्यावरील संशय अधिक वाढविला. दरम्यानच्या काळात पानसरेंचा खून झाला. त्याचे खापरही सनातनवर फोडण्यात आले. परंतु सनातनाच्या एकाही साधकाविरूद्ध पुरावे मिळत नव्हते. पानसरेंच्या खुनानंतर ६ महिन्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या साधकाला खुनाच्या आरोपावरून पकडण्यात आले. पकडल्याक्षणी माध्यमांनी त्याच्याविषयी कंड्या पिकवायला सुरूवात केली. समीर रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन सापडले, त्याने मैत्रिणीकडे खुनांची कबुली दिली अशा बातम्या पसरविण्यात आल्या. प्रत्यक्षात पूर्वायुष्यात त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. मोबाईल दुरूस्तीचे त्याचे दुकान असल्याने त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन असणे स्वाभाविक होते. त्याने म्हणे मैत्रिणीला सांगितले त्याने दोन पापे केली आहेत. पोलिसांनी ही दोन पापे म्हणजे दोन खून असा बादरायण संबंध लावला. त्याची ओळखपरेड झाली तेव्हा पानसरेंचा खून होताना त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या उमा पानसरेंना सुद्धा त्याला ओळखता आले नाही. खुनाच्या दिवशी त्याच्या मोबाईल फोन लोकेशननुसार तो ठाण्यात होता. पानसरेंच्या गल्लीतील ३-४ जणांची त्याला ओळखपरेडमध्ये ओळखले नाही. खुनात वापरलेली मोटारसायकल त्याच्याकडे किंवा इतरत्र मिळालेली नाही. खुनात वापरलेले पिस्तूल मिळालेले नाही. खुनामागचा हेतू अजूनही समजलेला नाही (अर्थात धर्मचिकित्सा केल्याने दाभोळ्कर व पानसरेंना सनातनने मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी पूर्वीच काढलेला आहे. म्हणजे खून कोणी केला व का केला हे त्यांनी आधीच ठरविलेले आहे.). एकंदरीत पोलिसांनी संशयावरून चुकीच्या माणसाला पकडले हे निश्चित आहे. समीरला पकडून एक वर्ष विनाजामीन तुरूंगात ठेवल्यावर सुद्धा त्याला जामीन द्यायला पानसरे कुटुंबियांचा विरोध होता. त्याच्याविरूद्ध खटला सुरू करण्याचे ठरायला लागल्यावर इतक्यात खटला सुरू करु नये यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात मागणी केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व खटलाही सुरू करायचा नाही. कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटणार हे नक्की. तो तसा सुटला तर सनातनवर आरोप करणे बंद करावे लागणार. शेवटी २१ महिने विनाजामीन तुरूंगात काढल्यानंतर समीर गायकवाडला नुकतेच जामिनावर सोडण्यात आले आहे. समीरप्रमाणेच सनातनच्या विरेंद्र तावडेला जून २०१६ मध्ये दाभोळारांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करून आजतगायत विनाजामीन तुरूंगात डांबले आहे. त्याच्या बाबतीतही अनेक कंड्या पिकविण्यात आल्या. त्याला म्हणे भारतात हिंदुराष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी तो म्हणे १५००० सैनिकांची फौज उभारणार होता. अशा हास्यास्पद गोष्टी माध्यमातून पसरविल्या गेल्या. १५००० सैनिकांची फौज उभारणे हे काय लाडू खायचं काम आहे का? इतक्या लोकांना पगार, शस्त्रे, घरे कोठून देणार? त्यासाठी कितीतरी अब्ज रूपये लागतील. आणि हे सगळं तो पोलिस, माध्यमे इ. च्या नकळ्त करणार होता. १५००० सैनिकांना काय पाताळात दडवून ठेवणार होता का तो? त्याला पकडल्यावर त्याची प्राथमिक सुनावणी सुरू असताना रोज पोलिसांऐवजी मुक्ता दाभोळकरच पत्रकारांसमोर येऊन तपासातल्या प्रगतीची माहिती देत होत्या. काही दिवस हा तमाशा सुरु राहिल्यानंतर शेवटी न्यायाधीशांनी पोलिसांना झापल्यानंतर हे प्रकार बंद झाले. विरेंद्र तावडेच्या बाबतीतही पोलिसांना कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. तरीसुद्धा त्याला विनाजामीन १३ महिने तुरूंगात ठेवले आहे व खटला सुरू केला जात नाही. सगळ्यात आश्चर्य म्हणजे 'पोलिसांनी अजूनही खर्या खुन्यांना पकडलेले नाही' असे पानसरे व दाभोळकर कुटुंबीय दर महिन्याला सांगत असतात. जर खरे खुनी बाहेर असतील तर समीर गायकवाड व विरेंद्र तावडेला का पकडले? ते खरे खुनी नसतील तर त्यांना सोडून द्यायला हवे. परंतु त्यांना सोडायला यांचा विरोध आहे. त्यांना सोडायचे नसेल तर त्यांच्याविरूद्ध खटला सुरू करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. परंतु खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व त्यामुळे सनातनविरूद्ध आगपाखड करणे थांबवावे लागेल या भीतिने त्यांना जामीन मिळू दिला जात नाही व खटलाही सुरू करून दिला जात नाही.पोलिसांना आणि इतर
या धाग्यावर नको चर्चा करायला.
श्रीगुरुजींना धन्यवाद