मंत्रयोग - जपयोग
मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्वासावर लक्ष केंद्रित
@ हवाबाण!
कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा
उगीच भंकस करण्यापेक्षा
आधी तुम्ही गीता न-वाचता
उगी काय भंकस लावलीये?
@@नामस्मरणानं एकसंध आणि
जो विषय तिथल्या तिथे संपवत
धन्य आहे. आतापर्यंत बुवा तेथे
आता आलात लाईनवर!
असा एकरुप होण्यासाठी कुणीही
हवाबाण!
जिलबी बाबा तुम्हालाच फक्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो!
सतत कल्पना विलास करणारा
समोरचं स्वच्छ दिसणं आणि अजूबाजूचं नीट ऐकू येणं
>>> जिलबी बाबा तुम्हालाच फक्त
स्वानुभवाधीष्ठित माहिती
त्यातून अहोरात्र गायत्री
त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो.ते मशीन आणि त्यातून होणार्या शब्दगळीचे चित्र एकदम डोळ्यासमोर उभे केलेत ! =))अगदी अगदी
त्यातून अहोरात्र गायत्री
खरं तर स्त्रीयांना गायंत्री
गायत्री
प्राचीन काळी उपनयन झालेल्या
जन्मना जायते शुद्रः संस्कारात
बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे
त्यांची
वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज
बाकी मुंज न होता गायत्री
त्यामुळे जर कुणाला मुंज न
मी
मुळ बेस लाईन इतकीच आहे की
जाऊ दे रे ब्याटमाना !
तुम्ही
वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त
चला काहीही कारणाने का होईना .
वेद पुराणांच्या बाबतीत एका
वेद पुराणांच्या बाबतीत एका
चालेल ,कुठे करायचा....
हेच
अवश्य.
तसं नाही
चार ओळीचा मंत्र म्हटल्याने
१००% सहमत.....
तुम्हाला काय वाटतं ....
या असल्या बिनबुडाच्या
इतर धर्मांत काहीही का असेना,
एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच
आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त
कन्क्लुडींग