अरविंद बरोबर दीड तास!
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.
या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केजुहून प्रभावी व
कारगिल युद्धातल्या शहिद
>>> कारगिल युद्धातल्या शहिद
प्रणवजींनी निवेदन दिले आणि
>>> प्रणवजींनी निवेदन दिले
ज्यांनी भरभरून मते दिली
लेटेस्ट..
आणि इथे नायक २ !
गुड व्हिडीयो..
रिलायन्ससारख्या टग्या कंपनीचे
कैच्याकै
आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि
इंटरव्यू संपल्यावर अर्णब
ओके
(No subject)
>>> India Today Conclave
>>> India Today Conclave २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच झालेलं भाषण मी देखिल संपूर्ण आणि अत्यंत शांतपणे ऐकलंय. पण २.१८ तासांच्या मोदींच्या विडिओत ज्या प्रश्नानं २.१६ व्या मिनीटाला ते कमालीचे अस्वस्थ झालेत तो प्रश्न जर सुरुवातीलाच विचारला गेला असता तर सगळी मुलाखत उधळली गेली असती हे नक्की.१. बारा वर्ष सी बी आय, एस आय टी, कोर्ट इ अनेक गोष्टींचा ससेमिरा लावूनही नंतर आणि एकदाही आरोप सिद्ध झालेला नसताना परत तेच तेच उगाळत बसले तर अस्वस्थ काय त्याबाबत उघड राग आला तरी ते मानवी स्वभावाला धरून होईल असे "संतुलित" विचार केल्यास वाटेल. २. वर उल्लेखलेले एक मिनीट स्वतंत्र उल्लेख करण्याइतके महत्वाचे वाटले पण प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारे एकच मुद्दा (आणि तोही त्या दिवशीच्या सभेच्या विषयाला धरून नसलेला) पकडून अगदी इतर बरेच उपस्थित लोक इरिटेट होईपर्यंत अॅंकरने विचारलेल्या प्रश्नांत जवळजवळ खर्च झालेला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लक्षात आला नाही किंबहुना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले... संतुलित विचार केल्यास हे काही "संतुलित" वाटले नाही. बाकी अंध व्यक्तीपूजेचे राजकारण चालू द्या... हल्ली त्यावर आम्ही अॅड्रिनॅलिन खर्च करून रक्तदाब वाढवायचे सोडून विनोदाचा प्रकार म्हणून मोफतचे मनोरंजन करून घ्यायला शिकलो आहे.अवांतर : मला स्वतःला सुरुवातीला केजरिवालांकडून काही चांगले घडण्याच्या अपेक्षा (अगदी आशा म्हणा) होत्या. पण त्यांच्या गेल्या काही दिवसातील कृतींनी त्याविरूद्ध एक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तेही ठीक. पण अशा नेत्यांपेक्षा जास्त धोका 'अंध व्यक्तीपूजेमुळे' किंवा 'काही एक गुप्त उद्देश मनात धरून' शब्दांचे खेळ करणार्या त्याच्या पाठीराख्यांमुळे होतो... वाईट इतकेच की त्या धोक्याचे परिणाम सर्व देशाला भोगायला लागतात.("नेत्याला देव मानून अंध व्यक्तीपूजा न करणार्या; हाडामासाचा, चुका करू शकणारा माणूस समजणार्या; आणि त्याच्या चुकांना चुका असे म्हणण्याची हिंमत बाळगणार्या देशबांधवांचे क्रिटिकल मास भारतात केव्हा येईल?" असा विचार करणारा) इएइक्काश्री तुम्ही असा विचार करावा?
+१११११११११११११११११११११,हातोडा
नमस्कार नानासाहेब नेफळे उर्फ
गुजरात दंगल
मोदींना लोक किती आणि कसं जस्टीफाय करतात याचं
संजयजी, तुमच्या प्रतिसादाशी
>>> इथे जात हा प्रश्नच नाही.
तुम्ही इतके गोंधळलेले आहात का?
>>> दिलेल्या लिंकमधेच हे सर्व
तुमच्याकडे पुरावे नव्हतेच. ते
हे वाचल्यानंतर मोदींविषयींचे सर्व गैरसमज व पूर्वग्रह
>>> केंद्र सरकारनं ३२ कोटी
मी मोदिंना कुठे जस्टीफाय केलय?
>>> तुमच्या वैयक्तिक मताला मी
>>> चला त्यावरही मला काही
आँ.... आँ.... आणि आँ.... च !
मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.आता कठीण आहे. संतुलित या शब्दाची व्याख्या बदलायला निघालात तर. तसे भारतीय राजकारणात बरेच नवे शब्दकोश लिहिले गेले आहेत त्यात हे नवीन नाही म्हणा... सर्वप्रथम याची नोंद करा की माझे मस्तक कोणत्याही एका माणसाला अथवा पार्टीला वाहिलेले नाही, तो हक्क केवळ माझ्या देशाचा आहे... आणि असे असले तरच या बाबतीत " संतुलित" विचार करता येईल. आता तुमच्या सो कॉल्ड संतुलित विचारातली विसंगती पाहूया: १. विसंगती क्र. १:मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.याला "प्रायव्हेट लॉजिक" म्हणतात. हे वाचून हसू का रडू असं झालं. पण असो. असं होतं खरं वारंवार. पण ते सोडून संतुलित विचार करूया. मुख्य म्हणजे स्वतःचे प्रायव्हेट लॉजिक दुसर्यावर थोपवणे बंद केले आणि दुसरा काय म्हणतो हे "नीट" वाचले तरी "खर्या संतुलित" विचाराच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. मॅसॅकर झालं... अगदी सत्य. ते कोणी केलं हे कोर्टात सिद्ध करून दाखवण्यासाठी बारा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने जंगजंग पछाडूनही त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या माणसाविरुद्ध सरकार (यात सीबीआय, पोलीस, इ सह सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व संस्था येतात) आणि गैरसरकारी संस्था कोर्टाला मान्य होऊन गुन्हा सिद्ध होईल असा पुरावा का जमा देउ शकले नाहीत? का तुम्हाला म्हणायचे आहे की कोर्ट मुद्दामून सरकार विरोधी निकाल देत आहे? का सरकार आणि त्याच्या संस्था इतक्या गलथान आहेत की १२ वर्षातही ते सत्य शोधू शकले नाहीत? की तुमच्या माहितीच्या आणि समजुतीच्या पलीकडे काही आहे? विचार करा. २. विसंगती क्र. २: कलमाडी आणि सद्याच्या चर्चेतल्या मुद्यात काही विसंगती दिसत नाही आणि हे उदाहरण ओढून ताणून इथे आणून चर्चा भरकटावीशी का वाटली ! ही जर विसंगती वाटत नसली तर हे टोलवाटोलवी आणि मूळ मुद्दा भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून नोंद करू ठेवा. तसे खरंच नसल्यास जास्त सिरीयस केस होते, तेव्हा ते राहूद्या. ३. विसंगती क्र. ३:Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were metया मुद्द्यावर मागच्याच प्रतिसादात लिहिणार होतो. पण मूळ मुद्द्याला भरकटवायला नको म्हणून सोडून दिला. पण आता परत हा मुद्दा उपस्थित केला गेला म्हणून त्याबद्दल लिहीत आहे: हा दुवा विकीवरचा आहे... जेथे कोणीही कशीही भर घालू शकतो आणि त्याबाबत जर कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने अथवा संस्थेने तक्रार केली तरच विकीचे अधिकारी ती भर काढून टाकण्याचा विचार करू शकतो... पण काढेलच असे नाही. याचा अर्थ समजला नसल्यास (किंवा प्रायव्हेट लॉजिक वापरून अनर्थ करू नये म्हणून): विकीवरच्या "ज्ञानावर" वाचकाने आपल्या सारासार विवेक बुद्धीचा वापर करून विश्वास ठेवायचा असतो. याचा अर्थ विकीवर आहे ते सगळे खरे आहे असे नाही. त्या लेखनाचा विश्वासूपणा तपासून पाहण्याची जबाबदारी वाचकावर असते, विकीवर नाही. तर मग वरच्या माहितीचा खरेपणा कसा तपासून बघणार ? तो असा... विकीवरच्या तुम्ही कोट केलेल्या या 2002_Gujarat_violence त्या लेखातच त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. तो असा आहे: १८५. "News Analysis: In absolving Modi, SIT mixes up Godhra, post-Godhra perpetrators". The Hindu. 15 May 2012. जर स्वतःचे मत बनवण्यापूर्वी आणि विशेषतः ते पब्लिक फोरमवर टाकण्यापूर्वी हा सहज उपलब्ध असलेला दुवा मुळातून वाचणे हे "संतुलित" मतासाठी आवश्यक होते. कारण... कारण कोट केलेली माहिती "हिंदू" या उघड मोदीविरोधी वृत्तपत्रातील "बातमी" आहे. शिवाय असे असूनही त्याच बातमीत खालील नोंदही आहे: The SIT concludes: “In the light of the aforesaid discussion, the interpretation made on alleged illegal instructions … appear to be without any basis.” Because, “everywhere the genesis and intention was one and the same, i.e., to punish the culprits responsible for the Godhra incident in an exemplary manner, so that such incidents did not recur ever again.” जर बातमी पूर्ण वाचली असलेली असेल तर या प्रकाराला "सिलेक्टीव्ह मेमरी लॉस" असे म्हणतात असे नमूद करू इच्छितो. इन एनी केस (तुम्हाला अश्या इंग्लिश फ्रेजेस लिखाणात पेरायला आवडतात म्हणून ही खास तुमच्यासाठी :) ) एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे कोर्ट, एस आय टी, इ च्या निकालांंना (ज्याना काहीतरी वैधानिकता / कायदेशीरपण आहे) कमी लेखणे हे "संतुलितपणात" काय पण वैचारिकपणात पण बसत नाही :) कदाचित हा कोर्टाचा अवमानही असावा ! एक फार महत्त्वाचे वैयक्तिक मानसशात्रिय निरीक्षण... केजरीवाल समर्थक आणि मोदीविरोधक यांच्या शाब्दिक कोलांट्याउड्या, चर्चा भरकटवणे, आणि विचित्र प्रायव्हेट लॉजिक वाचत आहे. हे दोघे नेते कसे आहेत यापेक्षा या कोलांट्याउड्यांचा सर्वसामान्य विचारी माणसावर होणारा परिणाम केजवालांना भारी पडेल आणि मोदींना फायद्याचे होईल असेच दिसते... कारण नैसर्गिकपणे मानवी स्वभावात हेकटपणे सतत टार्गेट केलेल्या माणसांबद्दल कणव निर्माण होते आणि सतत विदुषकी चाळे व शब्दांचे खेळ करणार्यांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते. बघुया काय होते ते. घोडा मैदान जवळ आहे. आता शेवटी माझ्या देशबांधवांना कळकळीचे आवाहनः आपण भाग्यवान आहोत. कशी का असेना, भारतात लोकशाही आहे. कोणती पार्टी आपली म्हणायची, कोणता नेता आपला म्हणायचा, कोणाला मत द्यायचे याचे आपल्या पूर्ण अधिकार आहेत. त्याचबरोबर या गोष्टी ठरवताना आपले डोळे, कान आणि मेंदू वापरायचा अधिकारही आपल्याला लोकशाहीने दिला आहे... तोही कृपया पूर्णपणे बजावावा. कारण आज आपण दिलेले मत आपले स्वतःचे, आपल्या पुढच्या पिढीचे आणि एकूण देशाचे भवितव्य ठरवत असते... आपण सिस्टिम सिस्टिम म्हणतो तिची सुरुवात आपणच अशी करत असतो. ****** असो. हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद.इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहे
>>> इक्का, विथ ऑल ड्यू
इक्का तुमच्या आणि माझ्या
इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहेते तर आहेच. एकदम सहमत ! १. मी कोणालाही सबळ पुराव्याशिवाय आरोप झाले आणि ते माझ्यासाठी सोईचे आहेत या कारणाने डोळे मिटून कोणालाही दोषी मानत नाही. मग तो माझा मित्र नसला किंवा शत्रू असला तरी. २. कोणावरही आरोप करण्यापूर्वी प्रत्येक पुरावा योग्य तेवढा तपासून त्याच्या विश्वासर्हतेची खात्री पटवणे हि एक सुबुद्ध नागरीक या नात्याने माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. माझ्या मताविरुद्ध सबळ पुरावा कोणी नजरेत आणला तर त्यानुरुप माझे मत बदलायला मला लाज वाटत नाही... किंबहुना तसे केले नाही तर ते मला लाजीरवाणे वाटते. ३. माझा उच्च स्तराच्या भारतिय न्यायसंस्थेवर, राजकारण्यांपेक्षा खूप अधिक विश्वास आहे. इतकेच पुरे आहे नाही का? बादवे, तुमच्याशी सहमती दाखवलीय ;) तेव्हा यावर प्रतिक्रिया अपेक्षित नाही :)संजयजी
सर, विद्यमान नेता आणि प्रभावी उद्योजकाविरुद्ध FIR दाखल करणं
>>> Whose inhibitions are
>>> पण या ओळींनी मी
सर, या ओळींचा अर्थ काय होतो?
>>> On 9 September 2002,
मदत रोखणे एक व बोलने वेगळे..
>>> बोलण्यातुन मानसिकता कळत
व्वा !बरे झाले!! म्हणजे 'मोदी
म्हणजे या एका बालिश
... अरे ग्रेटथुन्कर नान्या.....!!!!
सरांनी मनाच्या व्यापारातु
फक्त जिलबी?
होऊ दे खरच, मिपा आहे घरचं
दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही