मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )
पुनर्प्रसारणाबद्दल :
सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.
प्रस्तावना :
स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.
परीक्षण :
बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.
मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.
त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.
आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.
त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)
अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!
महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.
सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.
कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:
भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.
मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.
अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat
वाचने
27916
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
''एकलव्य निषाद देशाचा होता.
In reply to कुठला प्रश्न by प्रचेतस
ह्यात मी प्रश्न विचारलेला
In reply to ''एकलव्य निषाद देशाचा होता. by आनंदमयी
1.He was son of Vyatraj
In reply to ह्यात मी प्रश्न विचारलेला by प्रचेतस
संहितेतच जर नाही --
In reply to 1.He was son of Vyatraj by आनंदमयी
विकिपीडीयात ससंदर्भ माहिती
In reply to संहितेतच जर नाही -- by प्रचेतस
ओके.
In reply to हा केवळ माहितीपट नव्हे by आनंदमयी
महाभारतकालीन भारताचा नकाशा
In reply to आजचा एपिसोड पाहिला का? (द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य) by निमिष सोनार
@धागाकर्ते ! जाउदे हो झालं गेलं गंगेला मिळाले.
मान्य !!!
कौसव पांडव
एकलव्य कुठल्या राज्याचा होता
ज्याने direct हाता मधेच बाल प्रगट होत असेल.
In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस
द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन
In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस
म्हैस ठरवून मनोरंज करताय की
In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस
एकलव्य डावखुरा होता
शक्यता नाकारता येत नाही...
In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त
***
In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त
माझे बाबा मेघालयात गेले होते
In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त
पांडूची व्याधी
असू शकते
In reply to पांडूची व्याधी by चित्रगुप्त
पांडुचा पंडुरोग
'वस्तुस्थिती दडवण्यासाठी'
In reply to पांडुचा पंडुरोग by चित्रगुप्त
आपण एस एल भैरप्पा यांच्या
In reply to पांडुचा पंडुरोग by चित्रगुप्त
पर्व नाही
In reply to आपण एस एल भैरप्पा यांच्या by आनंदमयी
हायला ! खर्या महाभारतापेक्षा
माझे बाबा मेघालयात गेले होते
प्रतियोगिता, प्रदर्शन, "मैत्री" बद्दल "सं(वाद)" & "कल देखिये" !!
रजनीअण्णांचे बाप
डोक्याला जे शॉट लागले.. काय
In reply to रजनीअण्णांचे बाप by चित्रगुप्त
=))
In reply to रजनीअण्णांचे बाप by चित्रगुप्त
हम्म
कार्टून आणि महाभारताची स्पर्धा
In reply to हम्म by पैसा
अभिनंदन!!!
अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे
अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे
तस्मात एकच ...
युटूबवर पीटर ब्रूकचे महाभारत
म्हैसतै, तुम्ही नेहमीच
सहम्त आहे.
In reply to म्हैसतै, तुम्ही नेहमीच by म्हैस
आणी मुळ म्हंजे कुठलं ते
In reply to सहम्त आहे. by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to आणी मुळ म्हंजे कुठलं ते by यसवायजी
चित्रगुप्ताच्या मताशी सहमत .
महाभारत नियमितपणे पहाताय की नाही मिसळपावकर मंडळी ?