आपण परीस्थितीचे अगदी सुबक वर्णन केले आहे. तसं पाहीलं तर आज मराठि माणसंच प्रथम या गोश्टींना विरोध करताना दिसतात मग परप्रांतीय का करनार नाहीत? त्यांचा तर विरोध करण्यात फायदाच आहे. कोणि मराठिबद्दल लढायला तयार झाले तर हे लोक अगोदर संशयाने त्याच्याकडे पाहू लागतात. यात त्याचा काय फायदा आहे? त्याचि मुले कुठलि भाषा शिकतायत? मराठी शिकत नाहीत तर मग हा मराठिबद्दल का बोलतोय? हे आणी असे बरेच प्रश्न ऊपस्थीतीत केले जातात आणि लोकांना मुळ मुद्यांपासून दुसरिकडे नेले जाते. खाजगीमधे बरेच लोक या आंदोलनाला मान्यता देतात पण पार्टीचा अजेंडा वेगळा म्हणून विरोध करनारे पन बरेच आहेत. अशा मुद्द्यांवर मला वाट्तं सर्वांनि एकत्र आले तर जनमतामुळे कदाचित परप्रांतीय सुद्धा त्यांचि विचार सरणी बदलतील.
.................अभिजीत
आपल्या मतांशी सहमत. आणि हे चित्र फक्त महाराष्ट्राबाहेर नाही तर पुण्यातही आहे. हापिसातल्या अमराठी लोकांशी बोलून माझं हे मत झालं आहे.
एक सुधारणा:
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, आपल्या भारतात बावीस (२२) मान्यताप्राप्त / राष्ट्रभाषा आहेत आणि त्यांतल्या दोन, इंग्लिश आणि हिंदी, या व्यवहारासाठीच्या / अफिशियल भाषा आहेत. त्यात प्रत्येक राज्य "आपल्या मनाप्रमाणे", म्हणजेच बहुदा जनमताप्रमाणे, राज्याची व्यवहारासाठीची तिसरी भाषा ठरवू शकते.
आपल्या महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा ठरवली आहे. आणि दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात हा कायदा आहे. राज ठाकरे यांची त्यासंदर्भातली मागणी कायद्याबाहेरची नव्हती, ते फक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी याचा उच्चार करत होते.
पण त्यासाठी हिंसा व्हावी असं मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, माझा हिंसेला पाठींबा नाही.
अदिती
आपण घेतलेला आढावा छान आहे. मुख्यतः हिंदी प्रांतात राहून आपण हे अनुभवले आहे आणि लिहिले आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राबाहेर लोकांना काय वाटते आहे ते समजले.
भरत दाभोळकरांसारखे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनी उघडपणे मराठीची बाजू घ्यावी हे फार आनंददायक आहे.
--लिखाळ.
आपण बरोबर लिहिलेले आहे.
वेगवेगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्स वर चाललेली यासंदर्भातली हुल्लडबाजी बघितली तर हे चित्र सहज डोळ्यासमोर उभं राहतं.
पण या चॅनलवाल्यांना एक समजत नाही; ते राज यांची जेवढी बदनामी करतील, त्यांच्याबद्दल चुकीच्या/भडक/अवास्तव बातम्या दाखवतील, त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जरी त्यांची प्रतिमा हिंदीद्वेष्टा (जे ते मुळात नाहीत) अशी तयार झाली तरी मराठी लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत जाईल. अन् त्यामुळे महाराष्ट्रात तरी त्यांना जनाधार भरपूर मिळेल; त्यांची हिंसाचारी पद्धत कितीही नावडली तरीही. हा जो गैरसमज राज यांच्याबद्दल पसरतो आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात तरी फायदाच होणार हे निश्चित.
मुमुक्षु
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय?
अगदि मनातलं बोललात!
यांना सध्या राज सापडला आहे.
काही ना काही चमचमीत हवेच असते. तो कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मीही पाहिला, भरत दाभोळकर हे जेव्हा घटनेचे विश्लेषण उत्तम प्रकारे करु लागले तेव्हा संचालिकेने अनुकुल प्रतिसाद दिला नाही. हिंदी वाहिन्या मराठी आणि मराठी भाषीक यांना फारच नगण्य व क्षूद्र समजतात. शिवाय हिंदी ही देशाची अधिकृत अशी एकमेव भाषा आहे असा अपप्रचारही केला जात आहे.
या सर्व वाहिन्यांना एक आव्हान - चेन्नै मध्ये जाउन गॉगलशेठची हिंदीतुन मुलाखत घ्या आणि तीचे थेट प्रसारण करून दाखवा. वाटल्यास गॉगललशेठ ऐवजी अम्माची घ्या.
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत.
हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो.
उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत.
हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो.
उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
आवडला लेख.
सद्ध्याच्या चॅनेलवाल्यांकडून इतका मुद्देसूद विचार अपेक्षित करता येऊ शकेल का?? रोज प्रत्येक चॅनेलवर बातम्या काय, किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम काय, दोन्हींचा दर्जा बेतास बात हे म्हणण्याच्याही खालचा आहे. शेवटी त्यांचे गणित टीआरपीचे! आपण ज्या प्रकारे बातमी प्रसृत करतोय, त्याचे काय परिणाम होतील हे समजण्याची अक्कल आणि गरज जर त्यांना वाटेल तर मग अजून काय हवे!
पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे.
भोचक गुरुजी,
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख....
अजूनही असेच काही उत्तमोतम लेखन येऊ द्या, ही विनंती..
आपला,
(मराठी) तात्या.
फार पोटतिडीकीने मांडलेले विचार सत्य परिस्थितीला धरून आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मराठीत बोलायचा आग्रह धरावा. मराठी भाषकालाच व्यापारात साथ द्या. मराठी भाषकानेही 'व्यापार' करायला शिकावे. गोड बोलायला शिकावे. मेहनत करायला शिकावे. जिथे काही व्यावसायिक कौशल्याची कामे असतात आणि आपल्या मराठी माणसाकडे ते कौशल्य नसेल तर आणी तरच इतर भाषकांकडून सेवा स्विकारावी.
अरबस्थानात आम्हाला अरबी भाषा येत नसेल तर विचारतात 'किती वर्षे राहतो आहेस इथे?, अजून जुजबी अरबीही बोलता येत नाही?' शाळेत चवथी पर्यत अरबी भाषा अनिवार्य विषय आहे. उत्तीर्ण होण्याची सक्ती नसली तरी प्रयत्न दिसावा लागतो. ते अश प्रकारे त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आम्ही तोडकी मोडकी अरबी शिकतोच.
हे इतर भाषिक महाराष्ट्रात येतात, मुंबई-पुण्यात व्यवसाय करतात. ते किती स्थानिकांना नोकरीत तरी ठेवतात? संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या व्यवसायाला गरज पडणारे सर्व कारागीर उत्तरप्रदेश, बिहारातूनच आणलेले असतात.
राज ठाकरेंनी राजकिय स्वार्थासाठी का होईना जो मुद्दा उचलला आहे त्याला माझा संपूर्ण पाठींबा आहे. हिसा टाळावीच पण हिंसे शिवाय दहशत बसणार नाही आणि दहशती शिवाय 'माज' उतरणार नाही. जया बच्चन ह्यांच्या विधानांच्या विरोधात हजरोंच्या संख्येने त्यांच्या बंगल्यावर मोर्चा न्यायला पाहिजे होता. तो प्रचंड जनसागर बघून त्यांना ताबडतोब माफी मागावी लागली असती. आणि पुढच्या वेळी तोंड उघडताना त्यांनी दहा वेळा विचार केला असता.
आपला लेख आवडला. राजचा मुद्दा बरोबरच आहे. हे इंग्रजी-हिंदी मिडियावाले राज ठाकरेचे चुकीचेच चित्र उभे करीत आहेत. त्यात राजदीप सरदेसाइ सारखा मराठी पत्रकार आय बी एन मधून त्यात भर घालतोय ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे. (एन डी टी वी वर होता तेंव्हा हा आपल्याला पटत होता राव.)
मिडियावाल्यांनी हिंदी/इंग्रजी प्रेमाचे हे असले प्रयोग तमिळनाडू, केरळ, बिहार, आंध्र मधे करून बघावे.. तिथे ह्यांच्या हिंदी/इंग्रजी प्रेमाच्या गप्पाच कोणाला कळणार नाहीत.
लेख चांगला वाटला.
मजा अशी आहे की मिडीया हे त्यांना हवे तेच चित्र समोर उभे करते.. येत्या काहि काळात युद्ध, राजकारण इ. प्रत्येक ठिकाणी मिडीया स्पोकपर्सन (प्रवक्ता) या पदाला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे (येत आहे) ते या मुळेच. उत्तम प्रवक्ता तोच जो मिडीयला आपल्या तालावर नाचवू शकतो.
तुम्ही(आपण सगळेच) 'लालु'ला जे काहि ओळखता त्याची खिल्ली उडवता त्याला बिहारी पत्रकारीता जबाबदार आहे का? मी तरी त्याचं एकही जाहिर भाषण ऐकलेलं नाहि. तरीही त्याची एक इमेज मनात आहे. करुणानिधीच्या सवयी, जयललितांच्या साड्या व चपला, ममताबाईंचा सिंगूरलढा आदी गोष्टी हेच पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यात खरं काय आणि विश्वास किती प्रमाणात ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न होणार आहे (झाला आहे).
राज यांची ही प्रतिमा याच पॅटर्नचा अपरिहार्य भाग आहे. जर तुम्ही म्हणता तशी मराठी बोलण्याची "भिती" इतरेजनांत तयार झाली आहे तर हा राजच्या चाणाक्ष नीतीला यश येतंय असं मला वाटतं
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
राज वर टीका करणारे बहुतेक चॅनेल वाले तथाकथीत पत्रकार हे भैय्ये आहेत किंवा त्यांचे बोलविते धनी भैय्ये आहेत.
श्वान मालकाच्या भाषेतच भुंकते.
हिन्दी भाषीकांची एक गोची असते ..त्याना हिन्दीशिवाय इतर कोणतीच भाषा नीट येत नसते .
ब्यान्के ला बैन्क आणि ग्यास ला गैस म्हणणारे हे लोक त्यांचे उच्चार ही नीट करु शकत नाहीत.
रॉबर्ट्चा उच्चार ते राबर्ट असा करतात पार्टी चा उच्चार पाट्टी कडतात.
त्याना तेच श्रेश्ठ वाटत असते.
आपण मराठी भाषीकानीच जर त्यांच्याशी मराठीत बोलायचा आग्रह धरला तर त्यां श्वानांचे शेपुट सरळहोईल
( पुण्यात मराठी समजत नाही म्हणणारे रीक्षावाले पाहिल्यावर मला धक्का बसला होता)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे.
अगदि बरोबर.
काल म्.टा. मधे प्रसिध्द झालेले एक पत्र
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3510464.cms
हिंदीची कुरघोडी नको आणि या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे - हे दोन्ही मुद्दे पटले. विशेषतः सध्या मीडियाला आलेलं महत्त्व पाहता दुसरा मुद्दा विशेष पटतो.
प्रतिक्रिया
उत्तम लेख
राज ठाकरे आणि मराठी
एक सुधारणा(?)
छान
आपण बरोबर
प्रश्न
प्रसारमाध्यमे
भोचकशेठ
भोचकशेठ
आवडला लेख.
पण
सुंदर लेख...
भोचक जी...
जबरा लेख
सुंदर लेख.
अगदी सहमत
अभ्यासु लेखण
छान उहापोह
श्वान मालकाच्या भाषेतच भुंकते.
प्रश्न
पटले
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी