आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:
'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका. थोडा वेळ चौर्यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वाचने
58041
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकालाही प्रतिवाद करता येत
In reply to मग प्रमाण काय ? by मुक्त विहारि
काय बोलणार?
In reply to एकालाही प्रतिवाद करता येत by ग्रेटथिन्कर
तूमीपण हे वाचा फायदा होईल
बरं ते मूढमतीला जगतवंद्य का
लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान',
इतके हताश नका होवू....
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
@ (हताश झालेला) सोकाजी>>>
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
असे काही वेगळे ऐकू यायला लागले की,,,,
In reply to @ (हताश झालेला) सोकाजी>>> by अत्रुप्त आत्मा
@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि
In reply to असे काही वेगळे ऐकू यायला लागले की,,,, by मुक्त विहारि
टीआरपी
In reply to लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', by सोत्रि
'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही!
गीतेतील श्लोक
ते पत्र मी इथे जसंच्या तसं
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
अगदी बरोबर!!! या गोष्टी
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ...
In reply to गीतेतील श्लोक by यनावाला
+११११. अगदी अगदी.
In reply to तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ... by संजय क्षीरसागर
पूर्ण सहमत. (चक्क)
In reply to तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ... by संजय क्षीरसागर
तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत
+११११
In reply to तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत by संजय क्षीरसागर
`स्व'चा उलगडा
In reply to तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत by संजय क्षीरसागर
तुमच्या युक्तीवाद अयोग्य आहे
In reply to `स्व'चा उलगडा by बाळ सप्रे
यनावालांचं रीव्हर्स लॉजिक
In reply to तुमच्या युक्तीवाद अयोग्य आहे by संजय क्षीरसागर
साहेब थोडंस्सं मी सांगू?
In reply to यनावालांचं रीव्हर्स लॉजिक by बाळ सप्रे
+१११११
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
_/\_
In reply to साहेब थोडंस्सं मी सांगू? by प्यारे१
ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट!
In reply to यनावालांचं रीव्हर्स लॉजिक by बाळ सप्रे
नागाचं विषारी असणं माहिती
In reply to ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट! by संजय क्षीरसागर
जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं?
In reply to नागाचं विषारी असणं माहिती by धन्या
तुम्हाला एकतर अध्यात्म काय
In reply to जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं? by संजय क्षीरसागर
व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं ...
In reply to तुम्हाला एकतर अध्यात्म काय by धन्या
तुमच्याशी चर्चा करण्याचा
In reply to व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं ... by संजय क्षीरसागर
किंवा
In reply to तुमच्याशी चर्चा करण्याचा by धन्या
तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे....
In reply to किंवा by बॅटमॅन
सगळ्या गोष्टी अध्यात्मिक
In reply to ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट! by संजय क्षीरसागर
विषय अध्यात्मिक आहे हे तुम्ही विसरतायं!
In reply to सगळ्या गोष्टी अध्यात्मिक by बाळ सप्रे
अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत
In reply to विषय अध्यात्मिक आहे हे तुम्ही विसरतायं! by संजय क्षीरसागर
ह्म्म्म!
In reply to अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत by बाळ सप्रे
+१
In reply to ह्म्म्म! by सोत्रि
बाळ सप्रे आणि सोत्रि
In reply to ह्म्म्म! by सोत्रि
ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट
In reply to बाळ सप्रे आणि सोत्रि by संजय क्षीरसागर
यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे..
In reply to ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट by बाळ सप्रे
गीतेच्या काळात शास्त्रज्ञ'
In reply to यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे.. by संजय क्षीरसागर
भाषेच्या मर्यादा तुम्ही फार ताणतायं
In reply to गीतेच्या काळात शास्त्रज्ञ' by बाळ सप्रे
जो शब्दांचा अर्थ आहे तोच
In reply to भाषेच्या मर्यादा तुम्ही फार ताणतायं by संजय क्षीरसागर
तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं!
In reply to जो शब्दांचा अर्थ आहे तोच by बाळ सप्रे
तुम्ही पुन्हा तोच मुद्दा
In reply to तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं! by संजय क्षीरसागर
गीतेतल्या एखाद्या श्लोकाचा हवा तसा अर्थ काढून
In reply to तुम्ही पुन्हा तोच मुद्दा by बाळ सप्रे
संपूर्ण गीता चुकीची कोण
In reply to गीतेतल्या एखाद्या श्लोकाचा हवा तसा अर्थ काढून by संजय क्षीरसागर
सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो?
In reply to संपूर्ण गीता चुकीची कोण by बाळ सप्रे
हो, आणि लेखकाच्या पत्राचा
In reply to सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो? by संजय क्षीरसागर
माझ्या कुठल्याही प्रतिसादात
In reply to सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो? by संजय क्षीरसागर
.
मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल?
In reply to . by उद्दाम
झाली बॅटींग सुरु ?
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
.
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
ते ज्ञान आम्हाला असतं तर आम्ही
In reply to . by उद्दाम
संजय, बाबा ऐनवेळी माती खाणे सोडना मित्रा!
In reply to मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल? by संजय क्षीरसागर
मराठीत एक म्हण आहे, लोका
In reply to संजय, बाबा ऐनवेळी माती खाणे सोडना मित्रा! by अग्निकोल्हा
सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिल
In reply to . by उद्दाम
.
In reply to सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिल by अनिरुद्ध प
भारिच विनोदी
In reply to . by उद्दाम
.
In reply to भारिच विनोदी by अनिरुद्ध प
साहेब
In reply to . by उद्दाम
अवघड आहे.
In reply to साहेब by अनिरुद्ध प
औ तूमाला ठावं नाय काय,
In reply to . by उद्दाम
बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता
In reply to औ तूमाला ठावं नाय काय, by ग्रेटथिन्कर
असंही म्हणतात की ब्रम्हदेवान
In reply to बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता by अनिरुद्ध प
त्या कहाण्यांचा कै संबंध नै.
In reply to असंही म्हणतात की ब्रम्हदेवान by धन्या
होय.
In reply to त्या कहाण्यांचा कै संबंध नै. by प्रचेतस