✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

ध
धन्या यांनी
Fri, 10/18/2013 - 16:49  ·  लेख
लेख
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57913 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं ...

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 09:56 नवीन
परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.
पुन्हा पुन्हा तोंडघशी पडण्याची तुम्हाला दांडगी हौस दिसते. म्हणजे मुळात म्हैस आणि रेडा इतपत विषय हाताळण्याची क्षमता आणि अध्यात्मावर लिहीण्याचा सोस!
जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.
या वाक्याला तुम्ही अर्थहिन म्हणतायं यातच तुमचं आकलन उघड होतं. कारण `नैनं च्छिंदंती शस्त्राणी' या दुसर्‍या अध्यायातल्या श्लोकाचा तो वास्तविक अर्थ आहे. आणि शून्य अध्यात्मिक आकलनामुळे तुम्हाला तो कळणं अशक्य आहे. तुमच्या कंपूतल्या मंदबुद्धी मित्रांना (हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत), आता तुमच्यासारखेच निरर्थक प्रतिसाद द्यायची सवय तुम्ही लावली आहे. तस्मात त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत चला आणि म्हैस वगैरे (तुमच्या हातखंडा) विषयावर लिहीत राहा.
तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.
तुमच्या `सच्चिदानंदबाबांसारखा' विनोदी लेख मला लिहीता येत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमच्याशी चर्चा करण्याचा

धन्या
Tue, 10/22/2013 - 12:40 नवीन
तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जंगलामध्ये काळवीटाने गेंडयाच्या कातडीवर टकरा देण्यासारखं आहे. काळ्वीटाची शिंगं मोडतील पण गेंडयाच्या कातडीवर साधा ओरखडाही उमटणार नाही. तुमचं चालू दया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

किंवा

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 12:45 नवीन
पालथ्या घड्यावर पाणी पाडण्यासारखं. किंवा महिषावर पाऊस पाडण्यासारखं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे....

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 13:12 नवीन
मला हे एकदम बेस्ट वाटतं. स्वतःला काहीएक समज नाही आणि मुद्दा मांडता आला नाही की `नार्सिसिझम' वगैरे लेख टाकायचे! दुसर्‍याला `मीच शहाणा' म्हणायचं आणि स्वतःवर बेतलं की चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणायचं! ते सप्रे आणि सोत्रिंचे प्रतिसाद वाचा. आकलन कसं असावं, चर्चा कशी करावी आणि विषय कसा पुढे न्यावा कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सगळ्या गोष्टी अध्यात्मिक

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 10:23 नवीन
सगळ्या गोष्टी अध्यात्मिक पातळीवर न्यायची गरजच काय??
नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय?
हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' असं सूचित करतय..
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे
तर हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' नव्हे (म्हणजेच अज्ञान) असं सूचित करतय.. तुम्ही आडवळणं घेउन थेट उत्तर द्यायचं टाळताय.. मी दिलेलं उदाहरण फार स्पष्ट आहे.. नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' की 'अज्ञान' ?? - एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे.. (निखिल वागळे टोनमध्ये :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

विषय अध्यात्मिक आहे हे तुम्ही विसरतायं!

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 11:15 नवीन
त्यात पुन्हा शीर्षक नीट वाचा : "शाश्वत ज्ञान" (नुसतं ज्ञान नाही). "शाश्वत ज्ञान" हा शब्द नाही. ती कायम स्थिती आहे. तुम्ही ज्ञान आणि अज्ञानाची वेगवेगळी उदाहरणं देऊन ज्या प्रकारे विषयाकडे पाहता आहात तो अध्यात्मिक दृष्टीकोन नव्हे. तुम्हाला कळेल किंवा नाही (कारण तुम्ही आडवळणं, पळवाट अशा शब्दयोजना करतायं) पण `कायम स्थिती' किंवा स्वरुप हे अपरिवर्तनीय आहे. इट इज अ‍ॅबसल्यूट! खरं तर त्या स्थितीचा भाषेशी काहीही संबंध नाही. कारण शब्द केवळ निर्देश आहे. नाग विषारी आहे हे माहीत असलं काय की नसलं काय तो व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यानं स्थितीला काहीएक फरक पडत नाही. कारण ती व्यक्तिगत ज्ञानावर किंवा अज्ञानावर अवलंबून नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मला पळवाट काढणं किंवा आडवळणाची काहीएक गरज नाही. अध्यात्म काय, भाषा काय की विज्ञानाची सार्थकता काय सगळ्या गोष्टींचं यथार्थ आकलन आहे. तस्मात, तशी शब्दयोजना करु नका आणि गैरसमज काढा तर तुम्हाला समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 11:56 नवीन
अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे .. पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे.. जे गीतेच्या श्लोकाच्या अर्थातून प्रतीत होतय.. तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ह्म्म्म!

सोत्रि
Tue, 10/22/2013 - 12:14 नवीन
संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा. इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते. - (कसलेच ज्ञान नसलेला, अज्ञानी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

+१

अनिरुद्ध प
Tue, 10/22/2013 - 12:48 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बाळ सप्रे आणि सोत्रि

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 13:01 नवीन
अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे ..
धन्यवाद! आता उत्तर देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे..तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..
ते तर मी सुरुवातीला अगदी पहिल्याच प्रतिसादात म्हटलंय. जगायला विज्ञान (किंवा सोप्या शब्दात माहिती) उपयोगी आणि अनिवार्य आहे. डॉक्टरचा शारीरिकस्वास्थ्य बर्करार ठेवायला उपयोग आहे. आणि म्हणून रुढार्थानं ज्याला ज्ञान म्हटलंय (किंवा मी ज्याला विज्ञान अथवा विषेशज्ञान म्हणतो) ते उपयोगी आहे. नोबेल लॉरेटस व्यर्थ काम करत नाहीत. ते मानवतेला उपकारक आहेत. पण अ‍ॅट द सेम टाइम `शाश्वत ज्ञान' (गीतेतला श्लोक) सार्थ आहे कारण विषेश ज्ञान `स्व' ची उकल करु शकत नाही हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. आता शाश्वत ज्ञान हा प्रस्तुत चर्चेचा विषय नसून यनावालांचा "शाश्वत ज्ञानाचा उपहास" हा विषय आहे त्यामुळे चर्चा इथे संपन्न होते. थोडक्यात लेखकाचा उपहास अयोग्य आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत. आय थिंक आय हॅव मेड द पॉइंट.
संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा.
दॅटस द पॉइंट आणि पूर्वग्रह सोडून माझं लेखन वाचलं तर तो कुणाच्याही लक्षात येईल.
इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते.
शाश्वत ज्ञान (किंवा स्थिती) सिंग्युलर आहे ते कुणाच्या विरोधात नाही. उदा. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं ज्ञानी (स्व समजलेला) काय की अज्ञानी ( स्व न समजलेला) काय दोघेही बद्ध आहेत. त्यामुळे शाश्वत ज्ञान ऐहिक ज्ञानाचा फोलपणा दर्शवत नाही. असा फोलपणा ज्यांना यथार्थ अध्यात्मिक आकलन नाही त्यांना वाटतो. म्हणजे एकतर त्यांना ऐहिक ज्ञान व्यर्थ वाटतं किंवा अध्यात्मिक ज्ञान ऐहिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ वाटतं. पण वस्तुस्थिती तशी नाही जगायला ऐहिक ज्ञान हवं आणि मजेत किंवा स्वच्छंद जगायला स्व गवसायला हवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 13:50 नवीन
ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट अज्ञान ठरवत नाही .. पण गीतेच्या श्लोकाचा खालील अन्वयार्थ तर स्पष्ट "अज्ञान" हा शब्द वापरुन सांगत आहे. की बाकीचे अज्ञान आहे म्हणून..
अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे. यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).
यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे.. पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल . अर्थात वरील अन्वयार्थ बरोबर आहे हे गृहीत धरुन.. मिपावरील संस्कृत पंडीतांनी यनावालांनी लावलेला अन्वयार्थ एकदा तपासावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे..

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 16:00 नवीन
तेवढंच तर म्हणायचंय
पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल .
अजिबात नाही. एकतर गीतेच्या काळात `शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी असण्याची शक्यता नाही त्यामुळे त्या श्लोकाचा अनुरोध विज्ञानाकडे नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे `एवरिथिंग मर्जेस अ‍ॅट अ सिंगल पॉइंट ऑफ टाईम : दॅट इज नाऊ!' त्यामुळे या घडीला योग्य संदर्भ आणि समतोल विचारसरणीनं पाहिलं तर अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आणि आपापल्या जागी उपयुक्त आहे. अँड वेन वन कॅन हॅव बोथ वाय चूज वन? आणि तो सूज्ञपणा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

गीतेच्या काळात शास्त्रज्ञ'

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 16:15 नवीन
गीतेच्या काळात शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी नसली, अनुरोध विज्ञानाकडे नसला तरी बाकी सगळं (अध्यात्म सोडुन जे काही असेल ते) अज्ञान म्हणणे हे अतिशयोक्तच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भाषेच्या मर्यादा तुम्ही फार ताणतायं

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 16:20 नवीन
एका श्लोकात किती डिस्क्लेमर बसवणार? अर्थात, तुम्हाला अर्थाशी कर्तव्य की शब्दाशी हे आता तुम्ही पाहा. माझा मुद्दा मी निर्विवादपणे मांडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

जो शब्दांचा अर्थ आहे तोच

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 16:31 नवीन
जो शब्दांचा अर्थ आहे तोच घेतला जाणार.. गीतेतला आहे म्हणून चांगला अर्थ शोधुन तो याचा अर्थ आहे असे करणे योग्य नव्हे.. असे बेधडक विधान असेल तर डिसक्लेमर हवच.. नाहीतर अर्थ शब्दांचा अर्थ घेतला जाणारच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं!

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 16:48 नवीन
यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).
अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते. याचा अर्थ ते व्यर्थ आहे असा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

तुम्ही पुन्हा तोच मुद्दा

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 17:05 नवीन
तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं
कारण तोच मुद्दा आहे. व्यर्थ की उपयुक्त हा मुद्दा नाहीच आहे.. ज्ञान की अज्ञान हा आहे.. तुम्हीही याप्रत आलात
अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते
एखाद्या गोष्टीला अज्ञान म्हणण ही हेटाळणी झाली.. मग "पण ते व्यर्थ नाही" ही सारवासारव झाली!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गीतेतल्या एखाद्या श्लोकाचा हवा तसा अर्थ काढून

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 18:29 नवीन
संपूर्ण गीता चुकीची आहे म्हणणं चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

संपूर्ण गीता चुकीची कोण

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 18:44 नवीन
संपूर्ण गीता चुकीची कोण म्हणतय??? आणि हवा तसा अर्थ काढुन नव्हे.. जो अर्थ शब्दातुन सरळ निघतोय तोच पहाता हा श्लोक नक्कीच अतिशयोक्त आहे.. (अर्थात हा अर्थ बरोबर असल्यास!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सारवासारव हा तुमचा शब्द काय दर्शवतो?

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 18:56 नवीन
एका श्लोकावरुन तुम्ही गीतेविषयी पराकोटीचा अर्थ काढतायं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हो, आणि लेखकाच्या पत्राचा

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 18:57 नवीन
तसाच अर्थ निघतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या कुठल्याही प्रतिसादात

बाळ सप्रे
Tue, 10/22/2013 - 19:35 नवीन
माझ्या कुठल्याही प्रतिसादात गीतेवर सरसकट भाष्य नाही त्यामुळे.. सगळा आक्षेप त्या श्लोकाच्या अर्थावर आहे..
गीतेविषयी पराकोटीचा अर्थ काढतायं
याला काहीही आधार नाही.. सारवासारव हा शब्द - त्या श्लोकाचा चांगला अर्थ शोधुन काढुन दाखवण्याच्या तुमच्या प्रयत्नांसाठी होता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

.

उद्दाम
Mon, 10/21/2013 - 13:02 नवीन
मोक्षाला गेलेल्यांच्या यादीत हिंदु लोक जास्त असतील तर आनंदच आहे. एकदा गांधीजींना लेप्रसी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलावले होते. ते म्हणाले, लेप्रसी हॉस्पिटल सुरु करणे यापेक्षा ते बंद करताना मला जास्त आनंद होईल. हिंदु धर्माचेही तसेच आहे. सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिला की कुणाला जन्मच घ्यायची गरज लागणार नाही आणि मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल. केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल?

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 13:49 नवीन
केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा
तुम्हाला मोक्ष म्हणजे काय ते माहिती नाही आणि धर्म म्हणजे काय ते ही माहिती नाही. उगीच प्रतिसादातून फ्रस्ट्रेशन दाखवण्याला काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

झाली बॅटींग सुरु ?

प्रसाद गोडबोले
Mon, 10/21/2013 - 14:05 नवीन
झाली बॅटींग सुरु ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

.

उद्दाम
Mon, 10/21/2013 - 14:12 नवीन
ते ज्ञान आम्हाला असतं तर आम्ही क्षीरसागरात झोपायला नसतो का गेलो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते ज्ञान आम्हाला असतं तर आम्ही

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 14:54 नवीन
क्षीरसागरात झोपायला नसतो का गेलो?
सहमताये! पांघरुणात झोपणं सगळ्यात बेस्ट! :smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

संजय, बाबा ऐनवेळी माती खाणे सोडना मित्रा!

अग्निकोल्हा
Mon, 10/21/2013 - 15:03 नवीन
विषेशतः अज्ञान म्हणजे काय हे इतक निट लिहल्यावर आता कशाला समोरच्यांवर असा अकाली चढतोस (चढाइ करतोस). कशाला समोरच्याला ही अक्कल नाही ती अक्कल नाही म्हणायलाच हवे काय ? त्यापेक्षा जे तुला जे माहित आहे ते विषद कर. समोरच्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव आपोआप होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मराठीत एक म्हण आहे, लोका

धन्या
Mon, 10/21/2013 - 15:06 नवीन
मराठीत एक म्हण आहे, लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिल

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 14:04 नवीन
साहेब, हे एव्हडे सहजशक्य नाही असे वाटते,माझ्या वाचनानुसार ला़खात एखाद्याला मोक्ष मिळतो ईतके व्यस्त प्रमाण आहे,बाकी जाणकार त्यावर भाष्य करतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Mon, 10/21/2013 - 14:28 नवीन
पण ज्याने ही यादी बनवली तोही मोक्ष पावलेलाच असेल का? मग जर तो मोक्ष पावला आहे, तर त्याच्या वाट्याला 'यादी करणे' हे कर्म कसे आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

भारिच विनोदी

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 14:36 नवीन
ब्वा तुम्ही,यात "जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित."यात ही यादी कोणी केली आहे याचा उल्लेखही नाही तर तो मोक्षाला पावला किवा नाही हे कोण आणि कसे ठरवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Mon, 10/21/2013 - 14:43 नवीन
पण तुमच्या वाक्यातील ते जे 'निश्चित' आहे, ते, जोवर अशी यादी प्रत्यक्ष कुणी काढून समोर ठेवत नाही, तोवर अर्थहीन ठरते. आधी अशी यादी काढा. आणि ती दाखवा. बरं, मोक्षाला गेलेला आत्मा भारतीय की अमेरिकन हे कसे ठरवणार? म्हणजे या जन्मात भारतीय असलेला मनुष्य गेल्या जन्मात अम्रेरिकेत कुत्रा असू शकतो, अँड वाइस वर्सा. भारतीय , अमेरिकन ही ओळख शरीराला असते, आत्म्याला नाही, शरीर तर मेलं, मग आता आत्म्यांचे भौगोलिक स्थानाण्मुसार वर्गीकरण कसे काय करणार बुवा? मग त्या यादीत भारतीय किती आणि अमेरिकन किती हा वादच मूर्खपणाचा नाही का? का, मोक्षाला जाणारा त्याचे सगळे जन्म भारतातच काढतो आणि भोगवादी आत्मा त्याचे सगळे जन्म अमेरिकेतच काढतो की काय? ---------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

साहेब

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 14:51 नवीन
धन्यवाद्,पण माझ्या वरिल उत्तरातिल वाक्य हे मी लिहिलेले नसुन हे धागा कर्त्याने डकवलेल्या लेखातील आहे ते मी फक्त डकवुन बोल्ड केले आहे,तर याचे उत्तर एक तर लेखक किंवा फक्त धागाकर्ताच देवु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

अवघड आहे.

धन्या
Mon, 10/21/2013 - 14:56 नवीन
अवघड आहे. :) ते पत्र श्री. य. ना. वालावलकर यांचं आहे. त्यामुळे याचं उत्तर तेच देऊ शकतील. मिपा आयडी यनावाला यांनी या धाग्यावर जरी प्रतिसाद दिला असला तरी पत्रलेखक श्री. य. ना. वालावलकर म्हणजे मिपावरचे यनावाला आहेत का ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

औ तूमाला ठावं नाय काय,

ग्रेटथिन्कर
Mon, 10/21/2013 - 17:31 नवीन
औ तूमाला ठावं नाय काय, बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता, समद्या जीवांचा जल्म भारतातच झाल्यालाय... समदं जीव भारतीय हायती,कायबी आरडत जौ नगासा... (मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 17:43 नवीन
काय म्हन्ता खरं की क्काय्,बरं जालं तुमी सान्गितलाव ते नायतर आमी अडानी हाव आमाला कोनी बी येतं आनी टपलीत मारुन जातय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

असंही म्हणतात की ब्रम्हदेवान

धन्या
Mon, 10/21/2013 - 18:09 नवीन
असंही म्हणतात की ब्रम्हदेवान स्वतःच्या मुलीशी काहीतरी गडबड केली होती. त्यामुळे त्याची पुजा केली जात नाही किंवा पुर्ण जगभरात दोन तीन ठीकाणे सोडली तर इतर कुठेही ब्रम्हदेवाचे मंदीर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

त्या कहाण्यांचा कै संबंध नै.

प्रचेतस
Mon, 10/21/2013 - 19:22 नवीन
त्या कहाण्यांचा कै संबंध नै. ब्रह्मा मूळची वैदिक देवता. प्रजापती. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, अश्विनीकुमार यांबरोबर प्रजापतीची पण वेदांत सूक्ते आहेत. कालांतराने वैदिक देवता हळूहळू मागे पडत जाऊन त्यांची जागा विष्णू, इंद्र, देवी आदी दैवतांनी घेतली. मूर्तीपूजेच्या प्रसारामुळे साहजिकच त्यांची मंदिरे उभी राहिली व मूळच्या वैदिक देवतांचे पूजन थांबले. ब्रह्माबरोबरच इंद्र, वायु, अग्नी आदी देवतांची पण मंदिरे नाहीतच. अगदी क्वचितच एखादे आढळेल. बाकी विष्णू, शिव आदींच्या मध्ययुगीन मंदिरांमध्ये वैदिक देवतांच्या मूर्ती लै दिसतात. बाकी ग्रेटथिन्कर यांच्या कंसातल्या वाक्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

होय.

धन्या
Mon, 10/21/2013 - 19:27 नवीन
ही सारी माहिती देवांची जन्मकथा या पुस्तकात विस्ताराने दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दे की रे वाचायला.

प्रचेतस
Mon, 10/21/2013 - 19:29 नवीन
दे की रे वाचायला. उगा शेल्फात नै ठेवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+०.००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००१

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 21:14 नवीन
"(मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)" चला नगु चा फायदा होत आहे असे वाटते.तरी पण ट्रोलिंगची सवय काही जात नाही.असो भारतात राहून प्रुथ्वी कशी काय बनवणार? हा प्रश्र्न आहेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

मागे एका लेखावर धन्या

म्हैस
Mon, 10/21/2013 - 15:13 नवीन
मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे. परंतु त्यांना ती समजलेली नहि. ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे. बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल. माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे . शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि. एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं
  • Log in or register to post comments

मागे एका लेखावर धन्या ह्यांनी

धन्या
Mon, 10/21/2013 - 15:24 नवीन
मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे.
हो.
परंतु त्यांना ती समजलेली नहि.
हे तुम्हाला कसं कळलं हे माहिती नाही. परंतू उत्तर हो असंच आहे. ज्ञानेश्वरी हा महासागर आहे. मज पामराच्यात तो महासागर पिण्याईतकी ताकद नाही. या महासागरातले जे काही थेंब माझ्या वाटयाला आले त्यात मी समाधानी आहे.
ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे.
मी अध्यात्मावर लेख लिहिलेला नसून अध्यात्माच्या नावाखाली आततायी मतांचा विरोध करणारा लेख लिहिला आहे.
बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल.
सहमत आहे.
माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे .
अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टीचं आपल्याला जर आकलन नसेल तर ते अज्ञानच नाही का?
शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि.
हो. शास्त्रज्ञ निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करतात आणि ती माहिती जगासमोर ठेवतात. ते नविन असं काही निर्माण करत नाहीत.
एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

यासाठी ...

चौकटराजा
Mon, 10/21/2013 - 17:44 नवीन
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा. यासाठी आसाराम बापू यांच्या अध्यक्षते खाली एक खास अध्यात्म सेमिनार होणार आहे. त्यासाठी दिगीराजा स्वागताध्यक्ष असणार आहेत. गरीबी ही मानसिकता आहे याचीही उकल होणार आहे. हातात जादूची काठी नसलेला जिनियस म्हणजे काय याची उकल होणार आहे. कळावे....ओ बो बो बो बो ..... आमच्या मते अध्यात्माने तीन गोष्टी नव्याने कळतात. १. मी शाणा असून बाकी गाढव आहेत. २. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं ) ३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

१. मी शाणा असून बाकी गाढव

धन्या
Mon, 10/21/2013 - 18:03 नवीन
१. मी शाणा असून बाकी गाढव आहेत.
तुम्ही आयटीत असता तर गाढव शब्दाच्या जागी एक वेगळा शब्द वापरला असता.
२. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं )
विश्वात ठसवलेला तो विठ्ठल असं एक निरुपद्रवी संप्रदाय म्हणतो.
३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.
याच्याशी लै वेळा सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आंग आश्शी, आता कसें धाग्याला

सोत्रि
Mon, 10/21/2013 - 21:51 नवीन
आंग आश्शी, आता कसें धाग्याला 'वजन' आले! - (ह्या धाग्यावर आज 'संक्षी'प्त झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

तुमच्या मनासारखं झालं.

धन्या
Mon, 10/21/2013 - 23:13 नवीन
आता आपल्याला कोपा कबानामदी पार्टी पायज्येल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

@कोपा कबानामदी पार्टी >>> B

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/22/2013 - 00:00 नवीन
@कोपा कबानामदी पार्टी >>> B-) को पा??? कब आना??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते यनावाला ते हेच का? तुम्ही

शिल्पा ब
Mon, 10/21/2013 - 23:18 नवीन
ते यनावाला ते हेच का? तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा