शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.
अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.
असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता.
ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.'
खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती.
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
--------------------------------------------------------------------------
(राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.)
संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता चौथ्यांदा झाले..
इस्लामिक अत्याचार सर्वत्रच
चांगली माहिती
पयले ह्ये सांगा की परब कोन?
मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो
खतर्नाक प्रतिसाद!
सावधान
नाव काय ठेवायचं म्हणे मग ?
हम्म्म
गप्प
मुळात अटकेपार भारतावर अंमल
गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते ना.
ऐतिहासिक अज्ञानाचा कळस
आता तुम्हीच जात काढली हाये
व्हय व्हय. ते बाजीप्रभू
पेशवे साहेब तुमच्या बोलन्याचा
बघा तिसरा पॅरग्रॅफ पहिली ओळ,
शंका निरसन
राज्याभिषेक हा शब्द चुकीचा
राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी
च्यायला लिंका गंडल्या वाटतं.
च्यायला लिंका गंडल्या वाटतं.
संमंला विनंती, दुवे प्लीज
खूप आभारी हाये बॅटमॅन सर
बाजीप्रभु ब्राह्मण नव्हते ,ते
उकरून काढणे
शमत आहे !
मनोरंजक धागा !!
नाही तर काय...
भारीच मेलो
युगपुरुषांना जातीपातीमध्ये बांधणे चुकीचे
लयी टंकावं लागेल....जावूदे
ब्रिगेडने अनेक मुद्दे
सहमत आहे
च्यायला !
खरंच आहे. आता उद्या
सहमत.. १००० %
परीकथेतील राजकुमारच्या मताशी सहमत.. १००० %
आहो
>>महाराजांविषयी येवढी चर्चा
सापेक्षतावादाचा सिद्धांत - एक
निखळ सत्य
च्यामारी मी तरी का मागे राहू???
सुंदर
आज्ञापत्रामागील प्रेरणा पंचतंत्राची?
खूपच सुंदर व माहितीपूर्ण धागा