✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

म
मराठमोळा यांनी
Wed, 06/13/2012 - 21:07  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात. २. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात. ३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार. ४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते. ५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अ‍ॅक्शन घेणार आहेत. अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच. बरं एमएनसी मधे काम करणारे.. १.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अ‍ॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्‍याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे. २. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय. आई-बाप, काका-मामा १. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो. २. मुलगी आयटीतली पाहिजे. ३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना) ईतर १. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का? २. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको.. ३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का? आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे? पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून.. आपला, मराठमोळा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22813 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

हाssण तेझ्याsss!

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/13/2012 - 22:49 नवीन
हाssण तेझ्याsss!
  • Log in or register to post comments

कसले उत्तर आणि

मुक्त विहारि
Wed, 06/13/2012 - 21:33 नवीन
कसले काय? कलयूग आले आहे , असे म्हणायचे आणि गप्प बसायचे.
  • Log in or register to post comments

असे लोकं पाहीलेत बॉ! महीना -

शिल्पा ब
Wed, 06/13/2012 - 21:35 नवीन
:) असे लोकं पाहीलेत बॉ! महीना - सहा महीने येउन गेले की भारतात अगदी आम्ही कसे हाय फाय, मधुनच चुकीचं का होईना इंग्रजी बोलणे, सारखं इकडे - तिकडे तुलना (जसं काही हे भारताबाहेरच जन्मलेत अन मोठे झालेत) वगैरे हास्यास्पद प्रकार पाहीलेत. कीव येते दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

विकास
Wed, 06/13/2012 - 21:43 नवीन
Image removed. (*) Image removed.
  • Log in or register to post comments

आयडी हॅक झाला का?

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/13/2012 - 21:46 नवीन
आयडी हॅक झाला का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

फारीन रिटर्न्ड

विकास
Wed, 06/13/2012 - 21:47 नवीन
फारीन रिटर्न्ड आयडी हाय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

डिलाईट कॉर्नरबद्दल अजून जाणून

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/13/2012 - 21:44 नवीन
डिलाईट कॉर्नरबद्दल अजून जाणून घ्यायला उत्सुक आहे! - आपला (उत्सुक)
  • Log in or register to post comments

हे

चिरोटा
Wed, 06/13/2012 - 22:45 नवीन
आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे?
हे आपण मध्ये कोण कोण येतात? बाकी सफाईदार इंग्रजी वरून व्यक्ती हाय्-फाय आहे की नाही हे ठरवायची पद्धत ब्रिटिश काळापासून आहे.तीच गोष्ट विलायतेत जावून परत येणार्‍यांची. प्रश्न- भारतिय प्रशासकिय सेवा,भारतिय विदेश सेवा,मोठ्या भारतिय्/बहुतांशी एम्.एन्.सी.ज मधील मुख्य कार्यकारी अधिकारी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात.ह्या बद्दल मराठमोळा ह्यांचे मत काय?
  • Log in or register to post comments

हे

चिरोटा
Wed, 06/13/2012 - 22:45 नवीन
.
  • Log in or register to post comments

थोडी असहमती

श्रीरंग_जोशी
Wed, 06/13/2012 - 23:48 नवीन
या विषयावर पूर्वीही अनेक चर्चांमधून हे मुद्दे मांडले गेले आहे व सरकत्या विपत्रांतून बरीच विनोदनिर्मितीही झाली आहे.परंतु माझ्या निरीक्षणात तरी आपण उल्लेखलेल्या प्रवृत्तींची उदाहरणे फारच कमी आहेत. या विषयावरची मते अतिरंजितच का असतात हे मोठे कोडे आहे. कदाचित २५-३० वर्षांपूर्वी परदेशी जाणे खरंच विशेष बाब असायची. गेल्या १२-१५वर्षात यात विशेष असे काहीच राहिले नाहीये.
  • Log in or register to post comments

ममो, काय हे? कितीवेळा तेच

रेवती
गुरुवार, 06/14/2012 - 00:38 नवीन
ममो, काय हे? ;) कितीवेळा तेच ते! आता इथे आलेच आहे तर जरा देतेच प्रतिसाद. ;) मी तर बै, येताजाता माझा हिरवेपणा सिद्ध केल्याशिवाय रहात नाही. आम्ही कस्से ग्रेट आहोत हे सांगत फिरते. जे लोक अमेरिकेशिवाय इतर देशात आहेत त्यांना कमी लेखते (तेही लोक मला कमी लेखतात हे विसरून जाते). गेल्या काही वर्षात झालय काय, भारतात डर्टी वाटत असतानाही येते आणि सगळ्या वस्तू, पदार्थ, कपडा महाग असल्याबद्दल नाक मुरडते. आजूबाजूच्या लोकांचा श्वास अडकतो, क्काय? तुला हे महाग वाटतं? आम्हाला नै ब्वॉ वाटत असं म्हणतात. काय करावे कळत नाही. घरी रोज भाजी पोळी, भात आमटी खाण्यापेक्षा पौष्टिक पिझ्झा आणि बर्गर याशिवाय काह्ही म्हणता काह्ही खात नाही. ;) चला, जरावेळ खोडसाळपणा करून झाला. :)
  • Log in or register to post comments

रेवती तै, १ नंबर प्रतिसाद,

मराठमोळा
गुरुवार, 06/14/2012 - 09:10 नवीन
रेवती तै, १ नंबर प्रतिसाद, खुप हसवलत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा हा

jaypal
Fri, 06/15/2012 - 11:02 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थोडि माझिहि असहमति अहे

सुजित पवार
गुरुवार, 06/14/2012 - 00:39 नवीन
थोडि माझिहि असहमति अहे. हे सर्व आधि होते आता फार कमि आहे. आम्च्या कार्यलयातिल ३ मराठी मुलि एकमेकिअन्शि हिन्दि मधे बोलतात, का ते कलत नहि. आनि जेव्हा मि स्वता मराठि बोलतो तेव्हा मराठीत बोलतात
  • Log in or register to post comments

अनिवासी भारतीय

गावरान
गुरुवार, 06/14/2012 - 01:19 नवीन
या बाबत माझा अनुभव. मी गेली ४५ वर्षॅ अमेरिकेत स्थायीक आहे. घर आहे, दोन गाड्या आहेत, वगैरे वगैरे. जेव्हा जेव्हा मी भारतात भेटीला जातो त्यावेळी माझ्या बोलण्या, चालण्या, वागण्यावरून घरचे म्हणतात की तू अमेरीकेत रहातोस हे खरे वाटत नाही. (गमतीने उलट मीच विचारतो की मी काय केल्याने तुमची खात्री पटेल?) आता बोला. त्यामुळे असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
गुरुवार, 06/14/2012 - 01:29 नवीन
फक्त आंतरजालावर काय करावं हे सांगतो. पटल्यास बाकिचं बघू. :) १. ताबडतोब सगळ्या मराठी संकेतस्थळावर वावर वाढवावा. नाहितर तिकडे जाउन मराठी अभिव्यक्तीची खाज भावण्यासाठी दिडक्या खर्च करून संकेतस्थळं कशाला काढलियेत? लवकरच संपादक पदावर वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता आहे. २. मधनं मधनं नॉस्टेल्जिक व्हावं ३. आपण इथल्या व्यवस्थेला कंटाळून आपली माणसं सोडून जरी तिकडे गेला असला तरी "भारताची प्रगती" यावर लेख प्रसवावा. इथं राहणार्‍या लोकांना पटणार नाही पण कुंथुन कुंथून विदा द्यावा आणि लोकांना पटवावं. :) आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गावरान

काळजी नसावी

विकास
गुरुवार, 06/14/2012 - 01:53 नवीन
आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो. जालावरील मार "virtual" च असतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते.........

बन्या बापु
गुरुवार, 06/14/2012 - 05:37 नवीन
मराठमोळा साहेब, आपल्या काही विचारांशी असहमत आहे.. तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते. १. अनिवासी भारतीय : अनिवासी भारतीय म्हणजे जो भारताबाहेर वर्षातून १८०+ दिवस राहतो आणि परदेश मध्ये आपला आयकर भरतो तो. आपण उगीच गोड गैरसमज करून घेतला आहे कि परदेशात जाऊन आलेला अनिवासी भारतीय !! असे अतिशहाणे ( म्हणजे परदेश वारी करून आलेले , अनिवासी नाही ) यांना मराठी बोलता येत नाही असे नसून आपण त्यांच्याशी फाजील इंग्रजी बोलतो.असे लोक्स जर काही वेडेवाकडे बोलत असतील तर त्यांच्या सरळ सरळ श्रीमुखात देण्याची तयारी असावी. २. एमएनसी मधे काम करणारे: आपल्याला भेटलेले नमुने असतील तुम्ही म्हणता तसे ( सगळे अपवाद तुम्हालाच का येऊन भेटले हा चर्चेचा विषय ठरेल ).. पण ह्या अपवादांना प्रमाण ठरवून असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते. विचार वाचून पडलेले काही प्रश्न: १. किती वेळा आपण मुलांना घेऊन कावरे / गणु शिंदे / तत्सम मराठी माणसाच्या दुकानात icecream घेऊन दिला आहे ? देताना बघितला आहे ? आपल्याला सोस वाडीलाल, Naturals चा. Mc donalds चा burger चांगला आणि आमचा वडापाव तेवढा unhygenic ठरतो !! २. आई बाप कौतुक करतात म्हणता ? मग तुम्ही बाप म्हणून काय असा म्हणणार का कि माझा मुलगा वाया गेला. भारतात शिकला आणि आता गोर्या साहेबाची चड्डी धूत बसला आहे ? ३. मराठी माणूस सल्ला देताना कायम आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकून दुसर्याला असे का सांगत बसतो कि सरकारी शाळा उत्तम ? ४. आपल्याला ठराविक विषयात ब्रह्मज्ञान आहे अशी समजूत करून ठिकठिकाणी अक्षता वाटणारे पुण्यात , मुंबईत, भारतात नाहीत ? ( जे तुमच्या लेखी अनिवासी भारतीय / एमएनसी मधे काम करणारे वैगेरे वैगेरे नाहीत असे ) ५. माझ्या बघण्यात पुण्यनगरीत एक जोशी आहेत. त्यांचा घोषा एकच.. "शिक्षक व्हा.. शाखेत जा.. देशाचे भले करा.." त्यांचा बाळ्या मात्र परदेशात जाऊन संडास घासतो त्याचे काय ? स्वतः जोशी काका कर्जतच्या पुढे कधी गेलेले ऐकले नाही.. ६. अमुक अमुक मराठी कादंबरी / पुस्तक / चित्रपट / नाटक भिक्कार कसा हे भरभरून लिहिणारे आणि रा-one कसा महान चित्रपट आहे, शाहारूक कसा क्लास आहे सांगणारे अनेक दिसतात ? त्यांचे श्राद्ध कोण घालणार ? ( कुठलेही मराठी दैनिक उघडा आणि वाचा भरभरून ही मुक्ताफळे ).. मुळात प्रश्न असा विचारा की असे काय आहे कि ज्यामुळे अनिवासी भारतीयांना भारतामधील त्रूटी दिसतात ? आणि आपण काय करू शकू की ज्याने परिस्थिती सुधारेल ? १. नागरिक समज ( सिविक sense ) नसलेली जनता ? २. आपल्या तुंबड्या भरणारे राजकारणी लोक्स ? ३. पायाभूत सुविधांचा अभाव ? ४. नको तिथे पिंका टाकत बसलेले विचारवंत ( स्वयंघोषित !! लोकमान्य न्हवे ! ) ५. ... जेथे खायला नाही २ घास तेथे सुग्रास अन्नाची स्वप्ने कसली दाखवताय ? ( खाणे प्रतीकात्मात म्हंटले आहे, उगाच शब्दछल नको.. ) अवांतर : नाना पाटेकरने मध्ये कुठेतरी एक किस्सा सांगितला होता कि पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता. आजुबाजूला किती लोक मूर्चित झाले आणि किती लोक्स हसले ह्याला पुरावा नाही. पण हे उदाहरण आपण दार्शनिक मानून आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते. असो.. मला आपले जे दिसते ते लिहिले हो.. हलके घ्या आणि रागाऊ नका. बन्या बापू
  • Log in or register to post comments

तुम्ही लैच सिरियसली घेतलं

मराठमोळा
गुरुवार, 06/14/2012 - 09:09 नवीन
तुम्ही लैच सिरियसली घेतलं बुवा.. तुमच्या विचारांचा आदर आहे, मला हे जनरलाईझ करायचं नाहीये. पण काही नमुने भेटतात त्यांची कीव येते. म्हणून गंमत केली थोडीशी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

ममो, धागा शतकी करण्याची उत्तम

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 06/14/2012 - 10:45 नवीन
ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

हं?

Nile
गुरुवार, 06/14/2012 - 10:49 नवीन
फुलटॉस नाही, इट वॉज अ गूड लेंथ डिलीव्हरी. डोंट यू सी, ही इज ऑन बॅकफूट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हॅ हॅ हॅ

रमताराम
गुरुवार, 06/14/2012 - 10:51 नवीन
निळोबा, तुझ्या इंग्रजीवरून तुम्ही यनाराय वाटंत नाही बरं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

निदान

Nile
गुरुवार, 06/14/2012 - 11:07 नवीन
यमयनशी वाला तरी वाटतो का नाय वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

>>ममो, धागा शतकी करण्याची

मराठमोळा
Fri, 06/15/2012 - 06:45 नवीन
>>ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!! हाहाहा.. नको बुवा, आजकाल फुल्टॉस उचलून मारले की सिक्सरच्या ऐवजी कॅच जातात चुकुन. आपले ग्राऊंड शॉट्स खेळलेले बरे, म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो" :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मान गये. अलगद सचिनला चर्चेत

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 06/15/2012 - 10:10 नवीन
मान गये. अलगद सचिनला चर्चेत आणला. क्या बात है, क्या बात है !!!! शतक नक्की. इतके कमी म्हणून की काय, खाली हुंड्याचा विषय पण आहेच. वा वा !! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

>>म्हण्जे सचिनसारखं मलाही

टवाळ कार्टा
Fri, 06/15/2012 - 10:36 नवीन
>>म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो" अछ्छा...मग देशासाठी खेळणार्यांची नावे सांगा द्रविड आणि कुंबळेपण .... हे दोघे * सोडुन आणखी कोण आहे?? *मी अझरच्याकाळानंतर बद्दल बोलत आहे...त्या आधीचे मला माहीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

.

आदिजोशी
गुरुवार, 06/14/2012 - 17:43 नवीन
पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता. ह्यात मूर्च्छीत होण्यासारखे काही नाही. 'रामदास स्वामी धोतर का नेसत नव्हते' हा प्रश्न चौथीत असताना मलाही पडला नव्हता. मोठ्या मुलीने असा प्रश्न विचारला असेल तर नक्कीच ती भारतात राहणारी नसावी. अथवा ब्राह्मण घरातल्या मुलांना असे प्रश्न कधीच पडू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

काही लोकांना "जेन्युइन"

शुचि
गुरुवार, 06/14/2012 - 06:50 नवीन
काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये. _______________________ आई-वडीलांचे म्हणाल तर प्रत्येक आई-वडीलांना मुलांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान असतो. त्यात वावगे ते काय? _________________________ बाकी राहणीमानावरून "सो चीप/सो गुड" वगैरे ठरविणे, उथळपणाच वाटतो. राहणीमानापेक्षा अधिक अर्थपूर्ण निकषांवर मैत्री आधारीत हवी हे नक्की. ___________________________ बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत ;), त्यांना आपल्या नातेवाईकांची व भारताची आठवण येते, भारतात घाण आहे वगैरे बोलण्यापेक्षा भारतात चांगले काय, हेच आता आठवले जाते कारण "दुर्मीळता"
  • Log in or register to post comments

है शाब्बास

रमताराम
गुरुवार, 06/14/2012 - 10:52 नवीन
पहिल्या वाक्यात 'डायवर्शन' चा बोर्ड लागलाय. आता शंभरी काय दोनशे नक्की. नेहमीच्या मल्लांना पाचारण करतो आहे. :) (म्हणजे त्यांना पाचारण करण्याची गरज नाहीच, गुगल अ‍ॅलर्ट लावलेले असतातच त्यांनी. मी आपलं फुकटचं श्रेय उपटतोय इतकंच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सहमत

चावटमेला
गुरुवार, 06/14/2012 - 11:13 नवीन
काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये. सहमत!! बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत इथे तर डबल सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला

ऋषिकेश
गुरुवार, 06/14/2012 - 09:29 नवीन
नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला जाताना आम्ही इथून गव्हाचं पीठ तिथे घेऊन जातो आणि मऊसूत पोळ्या खातो आणि भारतात आल्यावर मात्र (इथल्यासारखं) पिझ्झा-बर्गर खातो.. :) :P
  • Log in or register to post comments

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना

प्यारे१
गुरुवार, 06/14/2012 - 11:05 नवीन
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन पुन्हा सहर्ष सादर करीत आहोत.... अगणित अंकी नाटक.... बाब्या नि कार्टं. कलाकार : नेहमीचेच यशस्वी . लेखनः / दिग्दर्शन : आपापले. . . . . .
  • Log in or register to post comments

इट्स माय व्ह्यू, यू नो.....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/14/2012 - 12:07 नवीन
अमराठी माणसाने मोडकंतोडकं मराठी बोललं तरी आपण कौतुक करतो. पण कोणी चुकीचे इंग्रजी बोलला की नेमक्या चुकीवर बोट ठेऊन आपण त्याचे सर्व व्यक्तिमत्त्वच डागाळून टाकतो. इंग्रजी भाषेला एवढ्या उच्चपदावर कोणी आणि का नेऊन बसविले? आपणच. विचारांपेक्षा भाषेला आपण जास्त मान देतो आहोत. विदेशात राहून, काही निमित्ताने, भारतास भेट दिल्यावर खुप गोष्टींवर टिका केली जाते. भारतात राहून काही सोयीसुविधा, सामाजिक भान ह्या गोष्टी आपण कधी तरी नुसत्याच ऐकलेल्या आणि पुस्तकांमधून वाचलेल्या असतात. पण, परदेशात त्या प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांचे महत्त्व जाणवून आणि त्या अनुषंगाने आयुष्यात येणार्‍या सहजतेने भारावून माणूस अशी टिका करतो. त्या मागे ह्या सुधारणा करणे शक्य असूनही भारतात त्यांना ना राजकारण्यांकडून महत्त्व दिले जाते ना समाजाकडून, ह्या बद्दलचे वैषम्य असते. भारताबद्दल प्रचंड अभिमान असतो. भारतियांच्या हुशारीबद्दल, उपलब्ध कौशल्याबद्दल असणार्‍या रास्त अभिमानातून जन्मलेल्या काही अपेक्षा असतात. प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेल्या भारताबद्दल बोलताना असा विचार असतो की राजकारणी पैसे खातात तर खा पण त्याच बरोबर आवश्यक त्या सुधारणाही करा. १० रुपयातील १ रुपया खाऊन ९ रुपये समाजकारणासाठी वापरले तर लोकं तक्रार करणार नाहीत. पण आपल्या कडे १० तील ६-७ रुपये खाण्याकडे कल दिसून येतो. तसाच मुद्दा आरक्षणाबद्दल आणि सामाजिक स्वच्छतेबद्दल. मुंबईतच (आता नक्की विभाग आठवत नाही, पण कुर्ला-मानखुर्द असावा) एका १५ फुट खोल नाल्याच्या काठी झोपडपट्टी आहे. त्या नाल्याची भिंत सिमेंटने बांधलेली आहे. ह्या भिंतीला लागून सार्वजनिक संडास बांधलेले आहेत. त्या संडासातून मैला भिंतीवरून ओघळून थेट त्या नाल्यात पडतो. जेवायला बसले असताना 'ते', अगणित जुलाब वाहून तयार झालेले, भिंतीवरील पिवळ्या रंगाचे, रोगण कधी आठवले तर माणूस जेवणही अर्धे सोडून उठून जाईल. अशा 'देखाव्यातूनच' स्लम डॉग मिलेनियर सारख्या हॉलीवूड चित्रपटांना 'ते' दृश्य सुचतं. पण आपले 'कलाकार' स्वत्व विसरून ऑस्कर स्विकारायला धावतात. भारत तो चित्रपट भारतात सर्वत्र अभिमानाने प्रदर्शित करतो. भारतिय सेन्सॉर बोर्डही त्यात गैर मानत नाही. एवढी नजर मेलेली आहे. फक्त अमिताभ बच्चनने त्या सीनला आक्षेप घेतला होता. असो. तर वरील झोपडपट्टीची 'ती' भिंत स्थानिक पालिकेस, पोलीसांस, नगरसेवकांस दिसत नाही का? ह्यावर जर एखाद्या अनिवासी भारतियाने काही भाष्य केले किंवा किळस व्यक्त केली तर ती त्या अनिवासी भारतियाची चुक आहे का? अनिवासी किंवा निवासी भारतियांनी अशा गोष्टी पाहूनही अभिमानच बाळगावा का? हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अस्वच्छतेची अनेक उदाहरणे देता येतील. गुंडगिरी, अन्याय्य राजकिय हस्तक्षेप, असुरक्षितता, रहदारीतील बेशिस्तता, सामाजिक असंवेदनशिलता ह्यांचे परिणाम आता हळू हळू आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. भारतात चांगले काही नाहीच का? तर तसे नाही. कित्येक चांगल्या गोष्टी जाणवतात. परदेशात त्या पासून आपण वंचित राहतो हे सतत जाणवत असतं. जसं, रुक्ष व्यावहारिकता. (इथे आखातात) निसर्ग, काही अंशी अजूनही उरलेला आपलेपणा, धान्य-भाज्यांची चव, ताजेपणा आणि सर्वात मुख्य हवेतील परिचित सुगंध, मातीशी जोडलेलं नातं. सार्वजनिक सेवा पुरवताना आकारलेला स्वस्त सेवाकर (तो वाढवून चांगली सेवा द्यावी), रेल्वे, एस्टीची स्वस्त आणि सर्वदूर पुरविली जाणारी सेवा. बरीच मोठी यादी देता येईल. मी तर रजेवर येतो तेंव्हा रस्त्याने चालताना शेजारच्या इमारतीतून येणारे जेवणाचे सुगंध, कुकरच्या शिट्ट्या, दुध तापवलेला खरपुस वास, पोळ्या करतानाचा खमंग वास, मोठ्याने लावलेला रेडिओ (हल्ली नाही ऐकू येत), चट्टेरी लेहेंगा घातलेले आजोबा, गॅलरीत कपडे वाळत गालणारी गृहिणी, इमारतिच्या खाली उभी राहून चवथ्या मजल्यावरील आपल्या मैत्रीणीला 'ए मालविकाSSSSSSSS' अशी साद घालणारी चिमुरडी किंवा हातात क्रिकेटची बॅट घेऊन मैदानावर निघालेला कोणी 'सचिन', कॉलनीच्या रस्त्यात भेटलेल्या कोणा बाईला 'काकू, 'सौरव' आहे घरी?' असा प्रश्न करतो ते पाहूनही परदेशात मी काहीतरी 'मिस' करतोय हे जाणवतं. असो. काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत. माझे भारतावर प्रेम आहे आणि जे जे देश मी पाहीले तिथल्या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी भारताय याव्यात सर्व निवासींनाही त्याचा लाभ व्हावा, समाजाचे प्रबोधन होऊन सामाजिक स्वच्छता, समन्वय नांदावा असे मनापासून वाटते. परदेशात का गेलो? तर एक संधी मिळाली म्हणून. भारतात राहूनही आपण अधिक आर्थिक लाभ देणार्‍या वेगवेगळ्या नोकर्‍या बदलतो तसेच अधिक आर्थिक लाभ दिसल्याने 'नोकरी' बदलली इतकेच. भारत घाणेरडा आहे म्हणून देश सोडून बाहेर पडलो असे अजिबात नाही. जय हिन्द.
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंतचा सर्वांत भारी

बॅटमॅन
गुरुवार, 06/14/2012 - 12:30 नवीन
आत्तापर्यंतचा सर्वांत भारी प्रतिसाद. जियो काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उत्तम प्रतिसाद!

मोहनराव
गुरुवार, 06/14/2012 - 13:03 नवीन
उत्तम प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

काका, स्लमडॉग शिनेमा पाहून

रेवती
गुरुवार, 06/14/2012 - 19:18 नवीन
काका, स्लमडॉग शिनेमा पाहून आलेल्या आमच्या हिरव्या मित्राला व त्यांच्या पत्नीला (दोघांचे वय ६५ च्या आसपास) माझ्या मुलाच्या मुंजीला भारतात यायची इच्छा होती पण त्यांनी स्लमडॉगमधल्या गोष्टी कितपत खर्‍या आहेत असे घाबरून विचारायला का सुरुवात केली ते आता समजले. मी तो चित्रपट पाहिला नाही. शेवटी ते आले नाहीतच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकर काका, ऑनेस्ट आणि

मराठमोळा
Fri, 06/15/2012 - 06:49 नवीन
पेठकर काका, ऑनेस्ट आणि विचारपुर्वक प्रतिसाद आवडला आणि तुमचे म्हणणे पुर्णपणे पटले :) पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ममो, असे लोक असतील, आहेतही...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/15/2012 - 11:58 नवीन
ममो, असे लोक असतील, आहेतही... मान्य. पण कितीसे असतात रे असे लोक? साधारण टक्केवारी काय असेल? माझ्या अनुभवावरून सांगतो... मला बाहेर असताना भेटलेले एनाराय आणि इथे असताना भेटलेले एनाराय यांच्यावरून... बहुतेक लोकांना ओढ असते इथली. संस्कार, स्मृती काही विसरू म्हणता विसरत नाही. सुरूवातीला गफ्फा मारणारे लोकही ५ / ६ वर्षं झाली की मऊ होतात. बरेचसे लोक इथल्या मातीशी, लोकांशी संपर्क ठेवून असतात. इथे आंजावरच असे लोक सापडतील की आपल्याला. त्यामुळे काही लोकांच्या वागण्यामुळे, (त्यातही बोलणारे सगळेच नाक वर करून बोलणारे नसतात काही खर्‍या पोटतिडिकिनेही बोलणारे असतात), सगळ्याच एनाराय लोकांवर ठप्पा मारणे योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

असतात काही काही जणं....

प्रभाकर पेठकर
Fri, 06/15/2012 - 12:23 नवीन
पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं? श्री. मराठमोळासाहेब, माझ्या प्रतिसादातच तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तरिपण, तुमच्या संदर्भासाठी तेच इथे पुन्हा उदघृत करतो: काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात, स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

जोरदार!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/15/2012 - 11:53 नवीन
जोरदार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेटत्या होळीत आमची २ लाकडं

कवटी
गुरुवार, 06/14/2012 - 12:11 नवीन
तसही अता भारतात काय ठेवलय? सगळीकडे नुसती अनागोंदी, लूटमार, भ्रष्टाचार... काहीही धड करत नाहीत... करायला गेलं तर पैसे खायचे साधन म्हणून बघतात.... दर पावसाळ्यात सगळीकडच्या रस्त्यांची बोंब... तिकडे अगदी खेडेगावातही चकाचक रस्ते असतात.... हे आपल्याकडे साध मुंबै-दिल्ली-बंगळूर मधे पण दिसत नाही. लोक पण किती घाण करतात इंडियात... पचापचा थुंकतायत काय, रोडच्या कडेलाच काय बसतात, घरातला कचरा रोड वर फेकतात... गाड्या चालवताना शिस्त नाही... वर माजुर्डेपणा करणार... मुंबै चे शांघाय, कोकण चे कॅलिफोर्निया करायला ब्रह्मदेव जरी खाली आला तरी त्याच्या बापालाही ते शक्य होणार नाही. कारण हे करायला जी शिस्त आणि इच्छाशक्ती लोकांच्यात लागती ती काडीचीही नाही इकडच्या लोकांत... उलट हे लोक शांघायचे मुम्बै आणि कॅलिफोर्निया चे कोकण करतील तिकडे नेउन सोडले तर.... लोक नाक मुरडणार नाय तर काय करणार असल्या लोकांना आणि पर्यायाने देशाला... तुम्ही उगच त्यांचे फालतू पुळके घेउ नका .
  • Log in or register to post comments

चालू द्या !!

नाना चेंगट
गुरुवार, 06/14/2012 - 12:31 नवीन
चालू द्या !!
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 06/14/2012 - 17:55 नवीन
असेच म्हणतो. आम्ही फॉरेन रिटर्न (की रिटर्न्ड?) नसल्याने आमचा पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

लोकं जर त्याच त्याच चर्चेला

गणपा
गुरुवार, 06/14/2012 - 13:36 नवीन
लोकं जर त्याच त्याच चर्चेला कंटाळली नसतील तर शतकी - त्रीशतकी होण्यासाठी बरंच पोटेंशियल ठासुन भरलय या धाग्यात. ;) निवासी अनिवासी, मराठी-हिंदी व्हाया इंग्रजी, आयटी विरुद्ध सर्व, वरण-भात विरुद्ध पिझ्झा. चालुद्या आपला पास. मनीच्या बातां : गण्या चणे-फुटाणे आणायला हवेत. दोन घटका मज्जा घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments

चणे फुटाणे? अरे, आता तू

रेवती
गुरुवार, 06/14/2012 - 19:09 नवीन
चणे फुटाणे? अरे, आता तू पॉपकॉर्न खायला हवेस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/14/2012 - 19:10 नवीन
कालच एका काकांनी 'वैदिक पॉपकॉर्न'ची रेसिपी शोधली आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत आहे. लवकरच त्याची पाकृ

नाना चेंगट
गुरुवार, 06/14/2012 - 19:13 नवीन
सहमत आहे. लवकरच त्याची पाकृ पण टाकणार आहेत असे समजते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला वाटतं टाकलीही होती, पण ती

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/14/2012 - 19:17 नवीन
मला वाटतं टाकलीही होती, पण ती उडाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं

नाना चेंगट
गुरुवार, 06/14/2012 - 19:19 नवीन
पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं ? असेल असेल आम्ही काय पुराणमतवादी, तुम्हा आधुनिक लोकांचं काय चालतं ते आम्हाला काय माहित? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वैदिक

पैसा
गुरुवार, 06/14/2012 - 19:20 नवीन
या वैदिक काड्या का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा