माझं गाव-हरिहरेश्वर.-२
भाग-१ http://www.misalpav.com/node/21739#
दुपार झाली की आमचा मोर्चा वाडिकडे वळायचा....
मग आधि सुरु व्हायचं ते देऊळ बांधणं.हा आमचा दर चारेक दिवसांनंतरचा कार्यक्रम होता. (कारण शेजारचा दुसरा मोठ्ठा कंपू येऊन देऊळ उध्वस्त करायचा,मग आंम्ही त्यांच्या बांधलेल्या किल्ल्यांना भूसुरुंग लाऊन यायचो ;-) )
ही आमची देऊळ करायची परमनंट जागा
आंम्ही खास गवंडीकाम केल्यासारख्या विटा वगैरे पाडून भिंती बांधायचो,चार बाजुनी भिंती बांधुन झाल्या की मग वहिच्या पुठ्याचं मातिच्या पल्पमधे लडबडवुन वाळवलेलं चौकोनी छप्पर,नंतर त्याच पल्पमधे लडबडवलेली नारळाची शेंडीच्या भागाकडची करवंटी कळस म्हणुन लावायची..आणी तयार व्हायचं देऊळ,मग त्यात आत एखादा गणपतिचा लहानसा फोटू लावायचा आणी रात्री उजेडासाठी भुतलपांड्या केशराच्या छोट्या डबिची पणती...ही पणती संध्याकाळी लाऊन आल्यावर रात्री जर का कुणी तिथुन गेलं,तर लांबुनच त्या छोट्याश्या देवळाच्या भिंतिंच्या होलातुन आणी छताच्या पुठ्याच्या फटितून येणारा पणतिचा प्रकाश लांबुन असा दिसायचा,की भुतभूत भुताटकी म्हणत तो पळून यावा!
तोपर्यंत मामा वाडिला शिपण लावायला यायचा,मग आजुबाजुच्या नारळपोफळीच्या आळ्यांमधे त्याचं पाणी साठायला लागलं,की आंम्ही त्यात सुपारिच्या विरि पासुन ही अशी होडी करुन वहात सोडायचो.
मग एकामेकाच्या होड्यांमधे दगड टाकुन आरमार बुडवण्याचं युद्ध चालायचं,त्यात आळंबिळं तुटलं की मामा ''थांबा हो तुमच्या अता..'' म्हणुन काठी घेऊन मागे लागायचा.त्याला चुकवुन परत शेजारच्या वाडित जायचो.मग तिथे पहिली होडि कुणी बुडवली? यावरुन थोरल्या भावंडांची कमिटि बसून बरेचदा माझा व माझा तसल्या कारवायंमधला तेंव्हाचा राइट हँड,मामेभाऊ-धन्या असं दोघांच्या शिक्षेचं फर्मान निघायचं.मग थोरली भावंड आमच्या कपाळावर पिचकि ची फळं फोडायची...शिक्षा म्हणुन!
हे आतलं मऊ फळं...ते कपाळावर फोडलं की त्यातला चिकट गर पचकन सगळिकडे तोंडावर उडायचा
मग ४ वाजत आले की घरी जाऊन चहा बट्रर/टोश्टं खाऊन पुन्हा वाडित यायचो कधि पत्ते खेळले जायचे,तर कधी मागच्या शेतातल्या वडावर सूरपारंब्या..हो पण अजुन एक दोन मज्जा दाखवायच्या र्हातील... वाडितल्या मातित हे शंकूच्या आकाराचे छोटेसे खळगे पडलेले असायचे
त्यात काडी गोल गोल फिरवत ''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!'' असा मंत्र म्हटला की त्यातुन एक ढेकणा सारखा बारिक किटक बाहेर यायचा,पकडायला जाईपर्यंत परत मातित गाडुन घ्यायचा... त्याला मोर का म्हणायचे मला आजही माहित नाही,काडीनी गोल गोल फिरवत वन्स-मोर दिल्यावर बाहेर येतो...म्हणुन असेल कदाचित..! ---''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!''
बाहेर आलेला वन्स-मोर... ;-)
मग मी कधी कधी मूड आला तर त्याच माझ्या राइटहँडला,धन्याला घेऊन वाडित पानाचं दुकान लावायचो, पुना बनारस आणी कलकत्ता असे तिनही ब्रँड अॅव्हलेबल असायचे. त्या पानातले जिन्नस म्हणुन- भिंतिला फासायच्या चुनखडीतला चुना/मातिच्या पल्पचा कात/लाकडाच्या भुग्याची सुपारी/आणी पानपाचोळ्याच्या चुर्याचा तंबाखू..अशी अजोड तयारी असायची.
पूना सादा
हे कलकत्ता..
आणी हे बनारस..
हे दुकान अवरता अवरता...म्हणजे मावशीच्या कश्टमची-नरवेलाची लय बेक्कार लागणारी शिमटी घेऊन दुकानावर धाड पडली की मुद्देमाल तस्साच सोडून,आंम्ही समुद्रावर धूम ठोकायचो...
हरेश्वरला आमच्या घरामागेच समुद्र आहे... चला जाऊ तिकडे---
मग तिथे तर काय...आहाहा...पाण्यात पार संध्याकाळ होईपर्यंत अशी काही चंगळ चालायची की त्याला जगातल्या कुठल्याही पार्क-केलेल्या-वॉटरची सर येणार नाही..त्यातच वाळुचे किल्ले,बीच क्रिकेट हे ओल्या कपड्यांनीच चालायचं...वाळलं,,,की पुन्हा पाण्यात!
हरेश्वरचा समुद्र किनारा...
हा समोर मोरेश्वराचा डोंगर
केवड्याचं बन
आणी अता या दोन पूर्ण नॅचरल स्मायल्या---ओळखा पाहू...?
समुद्रावरनं कपडे वाळवुन गपचुप घरी यायचो...(वाटेत कुणाच्यातरी व्हिरी वर ते धुतलेले असायचे,पण दुसर्या दिवशी अंघोळीच्या वेळी केसात अडकलेली समिंदराची वाळू -घाण- करायची. किंवा प्यांटिच्या खिशात अडकलेली कपडे धुताना कळायची..आणी ते मावशिला कळ्ळं की पुन्हा बुकलले जायचो..)
घरी आलो की मग झोपाळ्यावरची सवारी सुरु व्हायची...
-झोपाळा हा कोकणच्या घरांचा आत्मा आहे.आजही एखाद्या माणसानी कोकणात,भलंमोठ्ठं घर बांधुन ते अख्खं एसी केलं.तरी जर त्याच्या घरात ओटिवर झोपाळा नसेल तर तो माणुस कोकण संस्कृतीच्या हिशोबी ''बाद खात्यात'' लागेल. अश्या घराच्या वास्तुशांतीला गावातली लोकं आली तर ती घरमालकाला,काय ह्हो... झोपाळा नाय बांधलात---एवढं घर बांधून..!? असं जागेवर प्रेझेंट देतील.नंतर मागुन गावभर,''हा बंss..असांss कांssय तोंss...!झोपाळाच नाय केलान, येवढं घर बांदुन!'' असा त्याच्या नावानी गुलाल उधळत फिरतील ते वेगळच.
''झोपाळा''..
याच झोपाळ्यावर मी.. सुट्टीत आलेल्या माझ्या मावस/मामे भावंडांबरोबर मराठी/हिंदितली यच्चयावत गाणी म्हणत जवळ जवळ सुट्टितली प्रत्येक संध्याकाळ घालवलेली आहे. साधारण संध्याकाळी ६नंतर ,बाहेरून गाव उंडारुन आल्यावर-''हातपाय धुवुन,जरा देवापुढे बसा रे...रामरक्षा म्हणत(नस्ता व्याप तो सुट्टितला) '' असं झालं ,की कशिबशी ती रामरक्षा म्हणुन सगळेजणं ह्या झोपाळ्यावर झाशिची राणी जशी घोड्यावर बसली तसे आरुढ व्हायचो..आणी झोपाळा अख्खा फ्रंट-बॅक लोड झालेला असायचा. मग आम्ची पायानी झोके काढत गाणी सुरु व्हायची. प्रांत कोकण असल्यामुळे सुरवात नेहमी नाट्यसंगितानी व्हायची,''रम्य ही स्वर्गाहुनी लंकाss'' नंतर पुढच्या गाण्याला, ''शंकर डमरुडम बोलेss...आss आss'' असा मधेच कोरस लागायचा आणी नंतर लगेच गाडी,'' माझे माहेर पंढरी''वर यायची..त्यातच अचानक कुणितरी''पर्बतों से आज मै टकराss गया--हे झोपाळा वर जाताना--आणी खाली येऊन परत वर मागे जाई पर्यंत मागुन कोरस--''तुमने दी आवाज लो मै आss गयाss...'' हे गाणं म्हणायचा.पण का कोण जाणे या गाण्याचं एकही कडवं त्यावेळी कधिही कुणालाही अठवायच नाही... मग विसरल्या सारखं झालं कि लगेच ''शूर आम्ही-सरदाssर आंम्हाला काय कुणाची भीssती'' हे चालु व्हायचं... तो पर्यंत ''एss,बास झाले तुमचे झोपाळे, जे(य*)वाला चला रेss'' अशी मामाची करडी हाक यायची. (*या हकेतलं वैशिष्ठ्य म्हण्जे जेवाला हा उच्चारी शब्द.! संपूर्ण रायगड जिल्ह्याला य हे अक्षर बर्याचश्या ठिकाणी सायलंट आहे...म्हणजे-कराला,मराला, असं तिकडे सगळ चालत... )
मग आंम्ही दिवसभर कारवाया करुन दमलेले वीर, समोर आलेल्या जेवणावर अडवा हात मारुन,बाकिच्यांची जेवणं होइपर्यंत,कुणी अंगणातल्या बाजेवर,कुणी झोपाळ्यावर ,कुणी तसेच जमिनीवर,असे अंथरुणं लागेपर्यंत धाराशाई व्हायचो...मग मामा/आई/मावशी असे आंम्हाला तिथुन ओढत...''उट..उट..उट..चल हातरुणावर..'' ''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' असे उद्गार काढत अंथरुणावर आणुन टाकायचे.... आणी रात्रीच्या सरत्या वेळेत मी आई आणी मावशीच्या मधे,गावातल्या उलाढालीं विषयी चाललेल्या दबक्या अवाजातल्या गप्पा ऐकत ऐकत कधी गाढ झोपायचो ते मला कळायचंही नाही... ही आईच्या कुशितली गप्पांच्या नादात मिळणारी झोपेची गोळी दुसरिकडे कुठ्ठेही मिळणार नाही... यावेळी हरेश्वरला माझ्या जवळ ही गोळी नव्हती,पण आठवणींच्या गोळिने ते माझं काम बरचसं सुकर केलं,असं मात्र मला खात्रिने म्हणता येइल...
मग आधि सुरु व्हायचं ते देऊळ बांधणं.हा आमचा दर चारेक दिवसांनंतरचा कार्यक्रम होता. (कारण शेजारचा दुसरा मोठ्ठा कंपू येऊन देऊळ उध्वस्त करायचा,मग आंम्ही त्यांच्या बांधलेल्या किल्ल्यांना भूसुरुंग लाऊन यायचो ;-) )
ही आमची देऊळ करायची परमनंट जागा
आंम्ही खास गवंडीकाम केल्यासारख्या विटा वगैरे पाडून भिंती बांधायचो,चार बाजुनी भिंती बांधुन झाल्या की मग वहिच्या पुठ्याचं मातिच्या पल्पमधे लडबडवुन वाळवलेलं चौकोनी छप्पर,नंतर त्याच पल्पमधे लडबडवलेली नारळाची शेंडीच्या भागाकडची करवंटी कळस म्हणुन लावायची..आणी तयार व्हायचं देऊळ,मग त्यात आत एखादा गणपतिचा लहानसा फोटू लावायचा आणी रात्री उजेडासाठी भुतलपांड्या केशराच्या छोट्या डबिची पणती...ही पणती संध्याकाळी लाऊन आल्यावर रात्री जर का कुणी तिथुन गेलं,तर लांबुनच त्या छोट्याश्या देवळाच्या भिंतिंच्या होलातुन आणी छताच्या पुठ्याच्या फटितून येणारा पणतिचा प्रकाश लांबुन असा दिसायचा,की भुतभूत भुताटकी म्हणत तो पळून यावा!
तोपर्यंत मामा वाडिला शिपण लावायला यायचा,मग आजुबाजुच्या नारळपोफळीच्या आळ्यांमधे त्याचं पाणी साठायला लागलं,की आंम्ही त्यात सुपारिच्या विरि पासुन ही अशी होडी करुन वहात सोडायचो.
मग एकामेकाच्या होड्यांमधे दगड टाकुन आरमार बुडवण्याचं युद्ध चालायचं,त्यात आळंबिळं तुटलं की मामा ''थांबा हो तुमच्या अता..'' म्हणुन काठी घेऊन मागे लागायचा.त्याला चुकवुन परत शेजारच्या वाडित जायचो.मग तिथे पहिली होडि कुणी बुडवली? यावरुन थोरल्या भावंडांची कमिटि बसून बरेचदा माझा व माझा तसल्या कारवायंमधला तेंव्हाचा राइट हँड,मामेभाऊ-धन्या असं दोघांच्या शिक्षेचं फर्मान निघायचं.मग थोरली भावंड आमच्या कपाळावर पिचकि ची फळं फोडायची...शिक्षा म्हणुन!
हे आतलं मऊ फळं...ते कपाळावर फोडलं की त्यातला चिकट गर पचकन सगळिकडे तोंडावर उडायचा
मग ४ वाजत आले की घरी जाऊन चहा बट्रर/टोश्टं खाऊन पुन्हा वाडित यायचो कधि पत्ते खेळले जायचे,तर कधी मागच्या शेतातल्या वडावर सूरपारंब्या..हो पण अजुन एक दोन मज्जा दाखवायच्या र्हातील... वाडितल्या मातित हे शंकूच्या आकाराचे छोटेसे खळगे पडलेले असायचे
त्यात काडी गोल गोल फिरवत ''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!'' असा मंत्र म्हटला की त्यातुन एक ढेकणा सारखा बारिक किटक बाहेर यायचा,पकडायला जाईपर्यंत परत मातित गाडुन घ्यायचा... त्याला मोर का म्हणायचे मला आजही माहित नाही,काडीनी गोल गोल फिरवत वन्स-मोर दिल्यावर बाहेर येतो...म्हणुन असेल कदाचित..! ---''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!''
बाहेर आलेला वन्स-मोर... ;-)
मग मी कधी कधी मूड आला तर त्याच माझ्या राइटहँडला,धन्याला घेऊन वाडित पानाचं दुकान लावायचो, पुना बनारस आणी कलकत्ता असे तिनही ब्रँड अॅव्हलेबल असायचे. त्या पानातले जिन्नस म्हणुन- भिंतिला फासायच्या चुनखडीतला चुना/मातिच्या पल्पचा कात/लाकडाच्या भुग्याची सुपारी/आणी पानपाचोळ्याच्या चुर्याचा तंबाखू..अशी अजोड तयारी असायची.
पूना सादा
हे कलकत्ता..
आणी हे बनारस..
हे दुकान अवरता अवरता...म्हणजे मावशीच्या कश्टमची-नरवेलाची लय बेक्कार लागणारी शिमटी घेऊन दुकानावर धाड पडली की मुद्देमाल तस्साच सोडून,आंम्ही समुद्रावर धूम ठोकायचो...
हरेश्वरला आमच्या घरामागेच समुद्र आहे... चला जाऊ तिकडे---
मग तिथे तर काय...आहाहा...पाण्यात पार संध्याकाळ होईपर्यंत अशी काही चंगळ चालायची की त्याला जगातल्या कुठल्याही पार्क-केलेल्या-वॉटरची सर येणार नाही..त्यातच वाळुचे किल्ले,बीच क्रिकेट हे ओल्या कपड्यांनीच चालायचं...वाळलं,,,की पुन्हा पाण्यात!
हरेश्वरचा समुद्र किनारा...
हा समोर मोरेश्वराचा डोंगर
केवड्याचं बन
आणी अता या दोन पूर्ण नॅचरल स्मायल्या---ओळखा पाहू...?
समुद्रावरनं कपडे वाळवुन गपचुप घरी यायचो...(वाटेत कुणाच्यातरी व्हिरी वर ते धुतलेले असायचे,पण दुसर्या दिवशी अंघोळीच्या वेळी केसात अडकलेली समिंदराची वाळू -घाण- करायची. किंवा प्यांटिच्या खिशात अडकलेली कपडे धुताना कळायची..आणी ते मावशिला कळ्ळं की पुन्हा बुकलले जायचो..)
घरी आलो की मग झोपाळ्यावरची सवारी सुरु व्हायची...
-झोपाळा हा कोकणच्या घरांचा आत्मा आहे.आजही एखाद्या माणसानी कोकणात,भलंमोठ्ठं घर बांधुन ते अख्खं एसी केलं.तरी जर त्याच्या घरात ओटिवर झोपाळा नसेल तर तो माणुस कोकण संस्कृतीच्या हिशोबी ''बाद खात्यात'' लागेल. अश्या घराच्या वास्तुशांतीला गावातली लोकं आली तर ती घरमालकाला,काय ह्हो... झोपाळा नाय बांधलात---एवढं घर बांधून..!? असं जागेवर प्रेझेंट देतील.नंतर मागुन गावभर,''हा बंss..असांss कांssय तोंss...!झोपाळाच नाय केलान, येवढं घर बांदुन!'' असा त्याच्या नावानी गुलाल उधळत फिरतील ते वेगळच.
''झोपाळा''..
याच झोपाळ्यावर मी.. सुट्टीत आलेल्या माझ्या मावस/मामे भावंडांबरोबर मराठी/हिंदितली यच्चयावत गाणी म्हणत जवळ जवळ सुट्टितली प्रत्येक संध्याकाळ घालवलेली आहे. साधारण संध्याकाळी ६नंतर ,बाहेरून गाव उंडारुन आल्यावर-''हातपाय धुवुन,जरा देवापुढे बसा रे...रामरक्षा म्हणत(नस्ता व्याप तो सुट्टितला) '' असं झालं ,की कशिबशी ती रामरक्षा म्हणुन सगळेजणं ह्या झोपाळ्यावर झाशिची राणी जशी घोड्यावर बसली तसे आरुढ व्हायचो..आणी झोपाळा अख्खा फ्रंट-बॅक लोड झालेला असायचा. मग आम्ची पायानी झोके काढत गाणी सुरु व्हायची. प्रांत कोकण असल्यामुळे सुरवात नेहमी नाट्यसंगितानी व्हायची,''रम्य ही स्वर्गाहुनी लंकाss'' नंतर पुढच्या गाण्याला, ''शंकर डमरुडम बोलेss...आss आss'' असा मधेच कोरस लागायचा आणी नंतर लगेच गाडी,'' माझे माहेर पंढरी''वर यायची..त्यातच अचानक कुणितरी''पर्बतों से आज मै टकराss गया--हे झोपाळा वर जाताना--आणी खाली येऊन परत वर मागे जाई पर्यंत मागुन कोरस--''तुमने दी आवाज लो मै आss गयाss...'' हे गाणं म्हणायचा.पण का कोण जाणे या गाण्याचं एकही कडवं त्यावेळी कधिही कुणालाही अठवायच नाही... मग विसरल्या सारखं झालं कि लगेच ''शूर आम्ही-सरदाssर आंम्हाला काय कुणाची भीssती'' हे चालु व्हायचं... तो पर्यंत ''एss,बास झाले तुमचे झोपाळे, जे(य*)वाला चला रेss'' अशी मामाची करडी हाक यायची. (*या हकेतलं वैशिष्ठ्य म्हण्जे जेवाला हा उच्चारी शब्द.! संपूर्ण रायगड जिल्ह्याला य हे अक्षर बर्याचश्या ठिकाणी सायलंट आहे...म्हणजे-कराला,मराला, असं तिकडे सगळ चालत... )
मग आंम्ही दिवसभर कारवाया करुन दमलेले वीर, समोर आलेल्या जेवणावर अडवा हात मारुन,बाकिच्यांची जेवणं होइपर्यंत,कुणी अंगणातल्या बाजेवर,कुणी झोपाळ्यावर ,कुणी तसेच जमिनीवर,असे अंथरुणं लागेपर्यंत धाराशाई व्हायचो...मग मामा/आई/मावशी असे आंम्हाला तिथुन ओढत...''उट..उट..उट..चल हातरुणावर..'' ''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' असे उद्गार काढत अंथरुणावर आणुन टाकायचे.... आणी रात्रीच्या सरत्या वेळेत मी आई आणी मावशीच्या मधे,गावातल्या उलाढालीं विषयी चाललेल्या दबक्या अवाजातल्या गप्पा ऐकत ऐकत कधी गाढ झोपायचो ते मला कळायचंही नाही... ही आईच्या कुशितली गप्पांच्या नादात मिळणारी झोपेची गोळी दुसरिकडे कुठ्ठेही मिळणार नाही... यावेळी हरेश्वरला माझ्या जवळ ही गोळी नव्हती,पण आठवणींच्या गोळिने ते माझं काम बरचसं सुकर केलं,असं मात्र मला खात्रिने म्हणता येइल...
Book traversal links for माझं गाव-हरिहरेश्वर.-२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडेश ,आवडेश अगदी त्रिवार
मस्त मस्त मस्त!!.. लयी भारी
पहिला भाग सुंदर होताच पण हा
सुपर लाईक हो भटजी!
अत्रुप्त आत्मा साहेब , निव्वळ लाजवाब, अप्रतिम, सुंदर, मस्त...
डोळ्यासमोर जसंच्या तसं चित्र
लय भारी भटजीबुवा.. आता एकदा
\m/
व्वा भटजीबुवा लै भारी. यु इज
लय भारी भटजीबुवा.. आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे.
वा भटजी!
+१
तुमचं लेखन आणि फोटू बघून तिथे
गुर्जि ..खरच सुंदर आहे
झकास...
छान आहे आजोळ तुमचं, फोटो
मस्त मस्त मस्त
फारच सुंदर लिखाण, खूप धन्यवाद :)
@तुमच्या आत्मिक अशांततेमुळे
बालपणीचा काळ सुखाचा.
व्वा व्वा बुवा व्वा काय बोलू ......
काय लिहु? काय वाचु काय बघु?
चांगलं लिहिलं आहे. खूप छान
ज ळ व णे, बाकी काही नाही,
झोपाळ्यावर बसुन झोका खाण्याची
हुच्च आणी हुच्च....
गुरूजी
सुरेख!!
खुपच छान लेख!!मला माझ्या
वा!!!
वा छानच लिहीले आहे. तुम्ही
@स्माईली एक खेकड्याची आहे एक
मूळ धाग्यात गर्दी झाली
अप्रतिम !!! कोकण आणि आजोळ
मस्त! गावातल्या नाटकांबद्दल
अतिशय सुंदर!
लेख आणि सग्गळे फोटू क्लास्स !
मस्त मस्त!
हम्म , आ आ सुटलेयत भन्नाट
निखालस निरागस आणि अतीव सुंदर.
छान
म्हणवता अत्रुप्त पण केलेत
सुंदर लेख आणि फोटोसुद्धा!
अप्रतिम - लेख आणि फोटो
आत्मु, संपवू नका हो. अजून
गुरुजी ,
गुरुजी ,
(No subject)
हा तो रस्ता
अजून एक फोटो या रस्त्याचा...