✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

|| चिरन्जीवी परशुराम ||

म
मृगनयनी यांनी
Mon, 05/14/2012 - 15:25  ·  लेख
लेख
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले. म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असेही म्हटले जाई. तेव्हा दत्तगुरुंनी त्यास उपदेश केला, की 'कार्तवीर्यार्जुन हा क्षत्रियांचा स्वामी होईल, तिन्ही लोकांत समर्थ्यवान होईल. पण लोभीपणा व दु:संगतीमुळे जर देव, गुरु, सन्त इ.चा अपमान, अव्हेर जर कार्तवीर्यार्जुनाकडून होईल.. तर त्याचा स्वतःचा तर नाश होईलच पण सार्‍या क्षत्रियकुलाचा विध्वंस होऊन तो अपकीर्तीला पात्र ठरेल." कार्तवीर्यार्जुन खूपच शक्तिशाली होता. त्याने लन्केचा राजा- रावण यासही बन्दीवान बनवून ठेवले होते. रावणाच्या वडिलांनी- पौलस्तिऋषींनी मध्यस्थी करून गोड बोलून रावणाची सुटका करवून घेतली. पण यामुळेच कार्तवीर्यार्जुनाचा मद दिवसेंदिवस वाढीस लागला. दत्तगुरुंनी सांगितलेल्या गोष्टी, नम्रपणा इ. तो विसरू लागला. ते पाहून नारद मुनींनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फल ठरला. सहस्त्रार्जुनाच्या राज्यात सज्जन, ऋषीमुनी यांचा छळ होऊ लागला होता. दत्तगुरुंच्या आशीर्वादामुळे आपल्या सहस्त्र बाहूंच्या शक्तीने तो इन्द्रलोकीची सम्पत्ती हिरावू इच्छित होता. त्यामुळे सर्व देवांनी शंकर आणि आदिमायेची प्रार्थना केली. व सहस्त्रार्जुनाचा नाश करण्याची भावना व्यक्त केली. शिवपार्वतीने 'तथास्तु' म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण करन्याचे आश्वासन दिले. रेणुक राजा व भोगावती राणी यांनी 'त्रिवेणीसंगम' येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजेच "रेणुका" होय. जी साक्षात आदिमायेचे- पार्वतीचे रुप होती. अश्विनीकुमारांच्या कृपेने नवतारुण्य-आरोग्य प्राप्त झालेल्या, भृगुवन्शीय च्यवनऋषींचा पुत्र ऋचिक व गाधिराजाची कन्या सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले "जमदग्नि" ऋषी हे साक्षात शंकराचे अंश होते. अगस्त्यमुनींच्या सांगण्याप्रमाणे पूर्वसन्केतानुसार ब्राह्मण जमदग्नीमुनी व क्षत्रिय रेणुकादेवी यांचा विवाह झाला. रेणुकेस वसु, विश्ववसु, बृहदभानु, बृहतकण्व असे चार पुत्र झाले. त्यानन्तर जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला. त्यायोगे भगवान विष्णु पुत्ररुपाने जमदग्नि-रेणुका मातेच्या पोटी जन्माला आले. तो दिवस- अक्षयतृतीया. त्या समयी एकाएकी कार्तवीर्यार्जुनाच्या राजधानीचे शिखर फुटुन चुराडा झाले. क्षत्रिय बायकांच्या मन्गळसूत्राला हिसका बसला. हाच महाविष्णुचा सहावा अवतार! - 'परशुराम' इकडे नवीन बालकाचे नाव- "रामभद्र" असे ठेव्ले गेले. तेव्हापासून जमदग्नि ऋषी व इतर शिष्यांचे वसतिस्थान असणार्‍या 'सिद्धाचल पर्वता'स 'रामशृन्ग पर्वत' असे म्हटले जाऊ लागले. आठव्या वर्षी रामभद्राचा व्रतबन्ध झाल्यावर जमदग्निऋषींनी त्याच्याकडून अध्यायनही करवून घेतले. मातापित्याच्या सेवेत रामभद्र तत्पर असताना एके दिवशी क्षत्रियांच्या छळामुळे त्रासून गेलेले गालव, मातन्ग, शांडिल्य, कौंडिण्य इ महर्षि रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रयास आले. ऋषी-महर्षिंना क्षत्रियांपासून होणार्‍या त्रासाचे वर्तमान कळताच त्या ऋषींना जमदग्निंनी आपल्या आश्रमात ठेवुन घेतले. रामभद्रा'ला धनुर्विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले. व क्षत्रियांची मस्ती उतरवण्यासाठी जमदग्नींनी उग्र तपाला प्रारम्भ केला.. त्यामुळे 'क्रोधदेवता' त्यांना प्रसन्न झाली. त्यांचे तप चालू असताना ते भन्ग करण्यासाठी कार्तवीर्यार्जुनाने अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले. तिकडे "रामभद्र" कैलासपर्वतावर साक्षात शिवाकडून धनुर्विद्या शिकला. पार्वतीमातेकडून त्याने "अंबिकास्त्र" मिळवले. कार्तवीर्याकडून व इतर राजांकडून होत असलेला ऋषेमुनींचा छळ वाढतच होता. त्यामुळे जमदग्निंच्या आज्ञेनुसार रामभद्राने कैलासपर्वतावरील आपली साधना अधिक वाढवली. सासरच्या रीतीप्रमाणे लग्न झाल्यानन्तर रेणुकामाता रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूची घागर बनवून त्यात पाणी भरून डोक्यावर सापाची चुम्बळ करून त्यावर घागर घेऊन शिवपूजेसाठी पाणी येत असे. परन्तु जमदग्नि ऋशींची तपस्या चालू असताना एके दिवशी पाण्यास रेणुकामाता गेली असता चित्ररथ नावाच्या गन्धर्वाची व त्याच्या पत्नीची जलक्रीडा तिच्या दृष्टीस पडली. ते पाहून आपल्यालाही आपल्या पतीसह अशीच क्रीडा करता आली असती तर!.. असा स्त्रीसुलभ विचार तिच्या मनात डोकावला. पण दुसार्‍याच क्षणाला मनाच्या चन्चलपणाचा धिक्कार करून तिने आपले मन पाणी भरण्याकडे केन्द्रित केले. पण त्यावेळी तिला रोजच्यासारखी वाळूची घागर बनवता नाही आली. सापाची चुम्बळ बनवताना साप हातातून निसटून गेला. व पाण्याशिवाय घरी यावे लागले. शिवपूजेला पाणी न मिळाल्याने क्रोधायमान झालेल्या जमदग्नि ऋषींनी तिला पाणी न आणण्याचे कारण विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. त्यामुळे ते जास्तच चिडले व रेणुकेस चालते होण्यास सांगितले व तिस शाप दिला, की तुझे तोन्ड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल. व तसे खरोखर झाले. बाहेर पडलेल्या रेणुकेला दु:ख अनावर होत होते. अश्या वेळी तिला "एकनाथ व जोगिनाथ" हे २ शिवयोगी भेटले. तिने त्यांना वन्दन केले. तेव्हा तिचे मनोगत जाणून शिवयोग्यांनी तिला सांगिअले, की "समोरील सरोवरात रोज स्नान करून शिवलिन्गाची पूजा कर. व पाच घरी भिक्षा मागून अर्धी भिक्षा आम्हास दे व अर्धी तू खा. तुझे शरीर व मन पुन्हा पूर्ववत होईल" त्याप्रमाणे रेणुका देवी वागल्यानन्तर ती पुन्हा गौरवर्णीय व स्थिरमनाची बनली. शिवयोग्यांचा निरोप घेण्यासाठी ती गेली असता ते म्हणाले,' अजून काही दिवसांनी तुला तीन घटका वैधव्य प्राप्त होईल. त्यानतर मात्र तुझे सौभाग्य अखंडित राहील." दुसर्‍या दिवशी शिवगुरुंचा आशीर्वाद घेऊन रेणुकादेवी आपल्या आश्रमाकडे निघाले. ती तिथे पोचताच जमदग्निंच्या वर प्रसन्न झालेल्या क्रोधदेवतेमुळे ते रेणुकेवर प्रचन्ड चिडले व क्रोधायमान होऊन म्हणाले," ज्याअर्थी तू इतके दिवस आश्रमाबाहेर होतीस.. त्या अर्थी तुला इथे थारा नाही. तू चालती हो!" त्यामुळे वारंवार माफी मागून रेणुकादेवीने त्यांना विनवले. जमदग्नि ऋषींचा सन्ताप अनावर होऊन त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना बोलावले व रेणुकेकडे बोट दाखवून सांगितले, की "तुमच्यापैकी कोणी हिचा वध करू शकत असेल.. तर करा." तेव्हा "पित्यापेक्षा माता हजार पटींनी श्रेष्ठ असते, त्यामुळे आम्ही हे अविचारी पापकृत्य करणार नाही." असे चारी पुत्रांनी पित्यास स्पष्ट सान्गितले. त्यामुळे जमगग्निंमधल्या क्रोधदेवतेने चौघा पुत्रांना "मृत व्हा" असा शाप दिला. व क्षणार्धात ते चारी जण मृत्यू पावले. रेणुकामाता ते पाहून शोक करू लागली. त्यावर जमदग्नींनी रामभद्राला हाक मारली. तोच रामभद्र कैलासपर्वतावरून आला. चारही पुत्रांप्रमाणे जमदग्निंनी त्यालाही मातेचा वध करायची आज्ञा केली. नाहीतर चौघा भावांप्रमाणेच त्याचाही वध करण्याची जमदग्निंनी तयारी होती. वडिलांवर प्रसन्न झालेली क्रोधदेवता रामभद्रास माहित होती. ऋषी-मुनी सज्जनांना छळणार्‍या कार्तवीर्यार्जुनादि क्षत्रियांच्या नाशासाठी प्रसन्न करून घेतलेल्या या क्रोधदेवतेचा उपयोग अ‍ॅक्चुली अनुचित कारणासाठी होतोय.. हे रामभद्राने जाणले. त्यामुळे नाईलाजाने मातेचा वध करण्यापलीकडे उपाय नाही, हेही रामभद्रास कळून चुकले. परन्तु मातेचा वध केल्यानंतर शान्त झालेल्या क्रोधदेवतेकडून जमदग्नि पुनश्च रेणुकामातेस जिवन्त करू शकतील.. असा विश्वासही त्यास होता. त्यामुळे सारासार विवेक बुद्धी वापरून रामभद्राने रेणुकामातेचा वध केला. व पित्याची आज्ञा अमलात आणली. साहजिकच खूष झालेल्या जमदग्निंनी रामभद्रास वर मागायला सांगितले. तेव्हा रामभद्राने " मातेस व चौघा बन्धुंस पुनः जिवन्त करावे आणि त्यांना मृत्यूचे स्मरणही राहू नये, असे करावे. तसेक्ष या सर्व गोष्टींना काराणीभूत असलेली जी क्रोधदेवता, तिचा त्याग करावा" असे सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून त्या पाचही जणांना जमदग्नि ऋषींनी उठवले. व क्रोधदेवतेला त्यांना जाण्याची आज्ञा केली. अणि त्यावर ते पूर्ववत् संसार करू लागले. परन्तु या सगळ्यामुळे रामभद्राला मातृहत्येचे पातक लागले. त्यामुळे या पापातून कसे मुक्त व्हावे, असा प्रश्न त्यांनी पित्याला विचारला. तेव्हा जमदग्नींनी त्यास मन्त्रोपदेश करून भागीरथीतीरी शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राने शन्करास प्रसन्न करून घेतले. शन्कराने रामभद्रास कैलास पर्वतावर बोलावून नेले. तिथेच षण्मुखस्वामींपासून रामभद्रास चौदा विद्या, चौसष्ठ कलांचे ज्ञान अवगत झाले. पुढे श्रीगणेशाला रामभद्रास "परशु" दिला. आणि रामभराचे "परशुराम" असे नामाभिधान केले. व मातापित्यांना भेटून येण्यास सांगितले. तेव्हा 'परशुराम' पुन्हा रामशृन्ग पर्वतावर येऊन मातापित्यांच्या सेवेत रत राहू लागले. परशुरामाने प्राप्त केलेल्या शस्त्रास्त्र विद्येमुळे, दिव्य परशुमुळे, शिवपार्वती व गणेशाच्या आशीर्वादामुळे जमदग्नि ऋषींनी सर्व ऋषीमुनींना निविघ्नपणे यज्ञयागादि करण्यास सांगितले. त्यावर काही कारणास्तव परशुराम पुन्हा कैलासावर गेले. इकडे नारदमुनी रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रमात आले, तेव्हा जमदग्नि-रेणुकेचा इन्द्रदेवाने लग्नात भेट दिलेल्या कामधेनूच्या सहाय्याने चाललेला संसार पाहून त्यांना आनन्द झाला. आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजे विष्णुच्या सहाव्या अवताराची-परशुरामाची व शन्कराची आठवण त्यावर ते कैलासावर गेले. शिवाने नारदांसमोर परशुरामाचे व त्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून कार्तवीर्यार्जुनाचा नाश होण्याची वेळ जवळ आल्याचे नारदांनी ओळ्खले व त्यांना आनन्द झाला. त्या आनंदाच्या भरात ते कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगराकडे वळले. व त्याचा अतिथीउपचार स्वीकारल्यावर त्यास जमदग्निंकडच्या कामधेनूबद्दल सांगून अशी दिव्य गोमाता सहस्त्रार्जुनाकडे असावयास हवी असेही आमिष त्याच्या मनात निर्माण केले. तसेच जमदग्निमुनींनी क्रोधदेवतेचा त्याग केल्यामुळे आता त्यांच्यापासून कार्तवीर्यास कोणताही धोका नसल्याचेही नारदांनी त्यास सांगितले. त्यावर नारदांच्या सांगण्यानुसार कार्तवीर्यार्जुन ७०० सैन्य व सातशे घोड्यांसह राम्शृन्ग पर्वतावर गेला. तेव्हा जमदग्नि-रेणुकामातेने त्यांचे उचित स्वागत करून सर्वांना पन्चपक्वान्नाचे जेवण दिले. तेव्हा कार्तवीर्यार्जुनाला जमदग्निंकडे असलेल्या 'कामधेनू'बद्दल खात्री पटली. व त्याने जमदग्निंकडे कामधेनू'ची मागणी केली. तेव्हा जमदग्नि म्हणाले," हे राजन, तुझ्याजवळ अलोट सम्पत्ती, हजारो दास-दासी व सेवक आहेत. तेव्हा तुला कामधेनू काय कामाची? आम्हा ऋषीमुनींकडे कामधेनू असल्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी, तसेच वातावरण पवित्र ठेवण्यासाठी यज्ञ याग करायला व हरिस्मरणाला आम्हाला भरपूर वेळ मिळत आहे. त्यामुळे ही कामधेनू आमच्याकडेच राहू देत." तेव्हा त्यांचे बोलणे न ऐकता कार्तवीर्यार्जुनाने बलात्काराने कामधेनू हरण करायचा प्रयत्न केला. तिचे चारी पाय दोरीने आवळून बान्धताच कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. त्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा अत्यंत सन्ताप झाला. व तो जमदग्निंना ठार मारण्यासाठी पुढे सरसावला. तोच कामधेनू त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पुढे एखाद्या पहाडासारखी उभी राहिली. पण जमदग्नि तिला उद्देशून म्हणाएल," हे नदिनी, जे विधिलिखित आहे, ते तू पुसू नकोस. या राजाची इच्छा पुरी होऊ देत." त्यावर कामधेनू नाईलाजाने दूर झाली. व कार्तवेर्यार्जुनाने जमदग्निऋषींचा शिरच्छेद केला. तो दिवस म्हणजे- मार्गशीर्ष शुद्ध १४, कृत्तिका नक्षत्र व रात्रीचा पहिला प्रहर होता. त्यावर कार्तवीर्यार्जुन पुन्हा कामधेनूस धरायला गेला असता ती अदृश्य झाली. ते पाहून कार्तवीर्यार्जुन भयभीत झाला आणि आपल्या राजधानीस गेला. अश्याप्रकारे शिवयोगींनी रेणुकेस सांगितलेले भवितव्यही खरे ठरले. त्यामुळे रेणुका वैधव्यदु:ख असह्य होऊन "परशुरामा"स हाका मारू लागली. तोच परशुराम कैलासावरून क्षणार्धात आश्रमात आले. व त्यांनी मातेला धीर दिला, की " तू काळजी करू नकोस, सूर्योदय होताच स्थिती पालटुन्न जाईल." त्यावर ऋचिक, वसिष्ठ, अगस्त्य, विठोब, शिरशृन्ग इ. ऋषींनी रेणेकेस बोध केला. तोपर्यन्त अरुणोदय झाला. तेव्हा अगस्त्यमुनींनी वसिष्ठांच्या कमंडलूतील पाणी (जमदग्निंच्या वडिलांच्या)ऋचिक्मुनींच्या हातावर घातले. ऋचिकमुनींनी ते पाणी सन्जीवनी मन्त्राने अभिमन्त्रित करून जमदग्निंच्या मृत शरीरावर शिम्पडले. आणि भविष्यवाणीनुसार जमदग्नि पुन्हा शिवस्मरण करीत उठून बसले. तोच स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. नाना वाद्ये वाजू लागली. आनन्दोत्सव साजरा झाला. अगस्त्यमुनी व ऋचिक मुनींनी शिव-पार्वती-गणेशाची स्तुती करून परशुरामास सर्व देवांना शान्त करन्यासाठी शान्तीहोम करण्यास सांगितले. व ज्या कारणास्तव परशुरामाने आत्तापर्यन्त इतके सामर्थ्य मिळवले.. त्या कार्यास आरम्भ करण्यास सांगितले. म्हणजेच सर्वांचा छळ करणार्‍या कार्तवीर्यार्जुनाचा आणि इतर तत्सम क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीवरील भार हलका करण्यास सांगितले. पितामहांकडून आलेली आज्ञा घेऊन परशुरामकार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगरीत आला व सामर्थ्याच्या बळाने मदोन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाकडे युद्धभिक्षा मागितली. कार्तवीर्यार्जुन परशुरामाला प्रथमच बघत होता. तोपर्यन्त त्याने परशुरामाबद्दल ऐकलेल्या गोष्टीची व त्याच्या पसरलेल्या कीर्तीची खात्री पटली. जरी कार्तवीर्यार्जुन युद्धाला उभा राहिला.. तरी त्याच्या दुष्कर्माचा अन्त जवळ आल्यामुळे मनातून तो अत्यन्त भयभीत झाला होता. "गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या इ. पाप करण्याबद्दल नेहमी सावध रहा." हा दत्तगुरुंनी दिलेला उपदेश कार्तवीर्यार्जुनाने पालान केला नाही. त्यामुळे त्याच्याकडून गुरुआज्ञेचा भन्ग झाल्याचेही पाप घडले. परशुरामाने आधी शस्त्रास्त्रेकरून सहस्त्रार्जुनाचे सैन्य मारून टाकले. नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते. तोच आकाशवाणी झाली, की "अर्जुनाच्या पोटातील अमृताची कुपी काढलीस तर खचित विजयी होशील!" त्याप्रमाणे परशुरामाने केल्यावर सहस्त्रार्जुनाचा वध तो करू शकला. व स्वार्थी, क्षत्रियधर्म विसरलेल्या, ऋषीमुनींचा छळ करून अत्याचार करणार्‍या दुराचारी क्षत्रियांपासून पृथ्वीला मुक्त केले. त्यानन्तर परशुरामाने मातापित्यांस वन्दन करून सर्वांना अभयदान दिले. त्यावर अगस्तिमुनींनी सर्वांना याची आठवण करून दिली, की ""दुष्टांचा संहार करण्यासाठी व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी इन्द्रादि देवांनी प्रार्थना केल्यावरून देवमाता अदितीने दीर्घ तपश्चर्या करून शन्कराकडून वर मिळवला आणि र्णुक राजाच्या यज्ञ कुन्डात ती प्रकट झाली. तिने शिवस्वरूप असणार्‍या जमदग्निंना वरून परशुरामाला जन्म दिला. परशुराम भगवान विष्णुचा सहावा अवतार. त्याच्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. त्यामुळे महापतिव्रता रेणुकामातेला कुणी कधीही विसरू नका."" परशुरामाने दुश्ट क्षत्रियांचा संहार करताना जे चांगले सद्धर्मी क्षत्रिय होते.. ते वाचले व परशुरामाला शरण आले. त्या सर्वांना परशुरामाने माता रेणुकेचे दर्शन घडविले. व माता रेणुकेने त्या सर्वांना जोगिन्दर तीर्थात स्नान करून गोरग्रीबांना अन्नदान करन्यास सांगितले. त्यानतर चिरन्जीवी परशुराम पुन्हा हिमालयात निघून गेला. मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसन्धान करून अरबी समुद्रास मागे हटवले. व तिथे कोंकणभूमी वसविली. तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र 'गोकर्ण' क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे 'लोटे परशुराम' हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळकोकणातील परशुराम मन्दिर प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे. परशुरामाची आई- माता रेणुका हिचे अस्तित्व 'माहूर गडा'वर असून ते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुकामाता देखील महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुम्बांची कुलदेवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
धर्म
वाङ्मय
इतिहास
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती
वाद

प्रतिक्रिया द्या
35145 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

@ जयपाल,मुळात "रमताराम"

मृगनयनी
Tue, 05/15/2012 - 13:44 नवीन
@ जयपाल, मुळात "रमताराम" यांनी ते स्वतः जमदग्नि कुळातले आहेत.. असे एका प्रतिसादात सांगितलेले आहे ( कारण त्यांना त्यांचे कुळगोत्र माहित आहे. ;) ) तर परशुरामाच्या वडिलांबद्दल -पक्षी : जमदग्निंबद्दल बोलताना आपण आपल्या प्रतिसादात नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता. असे काहीसे टंकलेले आहे. त्यामुळे एकन्दर परशुरामाबद्दल, जमदग्निंबद्दलचा (ब्रिगेडी) द्वेष तुमच्या प्रतिसादातून दिसत होता. मी कुणाचेही कुळ-गोत्र वगैरे काढलेले नाही. व ते जाणून घ्यायची माझी इच्छाही नाही.. त्यामुळे आपले एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची हे तर्क वितर्क सपशेल फोल ठरतात. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? मला हे विचारणारे तुम्ही कोण? :) बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. हेच वाक्य मी तुमच्याबद्दलही बोलू शकते! :) तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा Smile. जिचा वाढदिवस आहे.. तिला शुभेच्छा दिल्यात.. तर सत्कारणी लागतील!! :) मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. Smile हे तुम्ही कन्फेशन देत आहात का?.. तसं असेल तर आनन्दच आहे.. :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

II दुधाची घुसळण II

lakhu risbud
Tue, 05/15/2012 - 16:56 नवीन
चला आता दुधाची घुसळण सुरु झाली आहे,त्यातून क्रमाक्रमाने ताक,लोणी,तूप असे "शेलके"(??) पदार्थ वेगळे निघणार आहेत आणि "जड" "अशुद्ध" (??) असे पदार्थ खाली राहणार. आता प्रत्येक बाजूने त्यांचे "मानबिंदू" COPYRIGHT( © ), REGISTER ( ® ), TRADEMARK ( ™ ) वगैरे करावीत म्हणजे अनाठायी वाद होणार नाही . अवांतर: सध्या CALCIUM CARBONATE टाकून आंबे पिकवले जातात अशी खबर आहे तेव्हा खरेदी करणार्यांनी काळजी घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

कॅल्शियम कार्बोनेट नव्हे,

गवि
Tue, 05/15/2012 - 17:00 नवीन
कॅल्शियम कार्बोनेट नव्हे, कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बोनेट आंबे अति खाऊन अ‍ॅसिडिटी झाली तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

गावि चा प्वाइन्ट

lakhu risbud
Tue, 05/15/2012 - 17:12 नवीन
गावि चा प्वाइन्ट बरोबर ! कॅल्शियम कार्बाईड. वाचा की राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक दुरुस्ती...

आगाऊ कार्टा
Tue, 05/15/2012 - 10:58 नवीन
मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला लावण्यात येणारी दोरी.. त्यामुळे ती मोडण्याचा प्रश्नच येत नाही. ही प्रत्यंचा केवळ युद्धाच्या वेळीच धनुष्यावर चढवण्यात येत असे भगवान परशुरामांनी जनकराजाला सांगितले की या शिवधुन्याष्यावर जो प्रत्यंचा चढवील त्याच्याशीच तू सीतेचा विवाह कर. मुळात धनुष्याची काठी सरळ असते. प्रत्यंचा चढविण्यासाठी ती काठी वाकवावी लागते. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला. एकदा धनुष्यावर चढवलेला बाण लक्ष्यभेद केल्याशिवाय परत घेत येत नसल्यामुळे श्रीरामांनी परशुरामांना विचारले की हा बाण कुठे सोडू? तेव्हा परशुराम म्हणाले की माझे शिवधनुष्य तू ज्याअर्थी पेललेस त्याअर्थी माझे अवतार कार्य पूर्ण झाले, तेव्हा तू हा बाण माझ्यावरच सोड. परंतू श्रीरामांनी तसे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. तेव्हा श्रीरामांनी भगवान परशुरामाच्या आज्ञेप्रमाणे तो बाण सोडला. त्यानंतर भगवान परशुराम आपले शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांच्या हाती सुपूर्द करुन तेथून निघून गेले.
  • Log in or register to post comments

काहीच कळलं नाही.म्हणजे

किचेन
Fri, 05/18/2012 - 14:58 नवीन
काहीच कळलं नाही.म्हणजे परशुरामांनी स्वत:च स्वत:साठी नरक मागून घेतला? दुसरी गोष्ट म्हणजे परशुराम आणि राम हे दोन्ही विष्णूचे अवतार.जर एक अवतार आधीच पृथ्वीवर आहे तर दुसर्या अवताराने पृथ्वीवर यायची घाई का करावी.( साई बाबांचे अवतार आणि विश्नुचे अवतारात फरक असणारच न )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा

काहीच कळलं नाही.म्हणजे

किचेन
Fri, 05/18/2012 - 15:09 नवीन
दोनदा प्रकशित झाल्यामुळे प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा

दोन वेळा कसे मोडले? प्रभू

आनंदी गोपाळ
Fri, 05/18/2012 - 14:58 नवीन
दोन वेळा कसे मोडले? प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला. आधी पण पूर्ण करताना मोडले, मग परत परशुरामास मारण्यासाठी परत प्रत्यंचा कशी काय चढली? मोडक्या धनुष्याने बाण कसा मारता येईल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा

<<<तेव्हा परशुराम म्हणाले की

शिल्पा ब
Tue, 05/15/2012 - 11:05 नवीन
<<<तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. म्हणजे नेमका कुठे बाण सोडला अन काय नष्ट केलं असं समजायचं? प्रतिकात्मक किंवा रुपकात्मक असा विचार केला तरी नेमकं काय केलं असावं?
  • Log in or register to post comments

मारला असेल बाण योग्य जागी

गवि
Tue, 05/15/2012 - 11:16 नवीन
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद.. आमचा हपीसचा रस्ताही ठामपाने अनेक शस्त्रांच्या साहाय्याने बंद करुन टाकला आहे गेला महिनाभर. तुम्हाला उगाच नसत्या शंका.. भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हा हा...

दादा कोंडके
Tue, 05/15/2012 - 11:49 नवीन
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद
सहमत! पुराणात एव्हडे चिमीत्कार होतात, तसच रामाने स्वर्गात अप-डाउन करणार्‍या पुष्पक इमानाचं टायर बाणाने पम्पचर केलं असेल. व्हॉट इज अँड व्हॉट नॉट! :)
भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि अन दादा तुम्हा दोघांचाही

शिल्पा ब
Tue, 05/15/2012 - 12:01 नवीन
गवि अन दादा तुम्हा दोघांचाही निषेध. मी माझं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करतेय तर तुम्ही त्यात असा खोडा घालु नये ही विनंती. आमच्या पुराणाविषयीच्या इतिहासाच्या शंकांना भोचक म्हणुन तुम्ही या भारतभुमीच्या इतिहासाचा अपमान करीत आहात हे लक्षात घ्यावे ही अजुन एक विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

बाबो ;-( म्हनताना पोटात दुखतय व्हय

jaypal
Tue, 05/15/2012 - 12:05 नवीन
>>>मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद. Image removed. मेलो गवि मेलो . गेंद स्टेडीयम के बाहर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मग नाय तर काय, असेल राम

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 12:36 नवीन
मग नाय तर काय, असेल राम त्याकाळच्या संस्थळावरचा संपादक, असतील त्याच्याकडे अ‍ॅडमिनचे राईट, एखाद्या प्रतिसादाला बुच मारलं असेल अन झालं,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

बाण कुठे मारला?

मृत्युन्जय
Tue, 05/15/2012 - 12:46 नवीन
जी गोष्ट व्यासांना नाही माहिती ती त्या नैनीला काय विचारता बे? Then unto Dasaratha's son who said so, Rama of Bhrigu's line replied, 'A truce to all crafty speech, O king! Take this bow.' At this, Rama the son of Dasaratha, took in anger from the hands of Rama of Bhrigu's line that celestial bow that had dealt death to the foremost of Kshatriyas. And, O Bharata, the mighty hero smilingly strung that bow without the least exertion, and with its twang loud as the thunder-rattle, affrighted all creatures. And Rama, the son of Dasaratha, then, addressing Rama of Bhrigu's said, 'Here, I have strung this bow. What else, O Brahmana, shall I do for thee?' Then Rama, the son of Jamadagni, gave unto the illustrious son of Dasaratha a celestial arrow and said, 'Placing this on the bow-string, draw to thy ear, O hero!' "Lomasa continued, 'Hearing this, Dasaratha's son blazed up in wrath and said, 'I have heard what thou hast said, and even pardoned thee. O son of Bhrigu's race, thou art full of vanity. Through the Grandsire's grace thou hast obtained energy that is superior to that of the Kshatriyas. And it is for this that thou insultest me. Behold me now in my native form: I give thee sight.' Then Rama of Bhrigu's race beheld in the body of Dasaratha's son the Adityas with the Vasus, the Rudras, the Sadhyas with the Marutas, the Pitris, Hutasana, the stellar constellations and the planets, the Gandharvas, the Rakshasas, the Yakshas, the Rivers, the tirthas, those eternal Rishis identified with Brahma and called the Valkhilyas, the celestial Rishis, the Seas and Mountains, the Vedas with the Upanishads and Vashats and the sacrifices, the Samans in their living form, the Science of weapons, O Bharata, and the Clouds with rain and lightning, O Yudhishthira! And the illustrious Vishnu then shot that shaft. And at this the earth was filled with sounds of thunder, and burning meteors. O Bharata, began to flash through the welkin. And showers of dust and rain fell upon the surface of the earth. And whirlwinds and frightful sounds convulsed everything, and the earth herself began to quake. And shot by the hand of Rama, that shalt, confounding by its energy the other Rama, came back blazing into Rama's hands. And Bhargava, who had thus been deprived of his senses, regaining consciousness and life, bowed unto Rama--that manifestation of Vishnu's power. And commanded by Vishnu, he proceeded to the mountains of Mahendra. And thenceforth that great ascetic began to dwell there, in terror and shame. And after the expiration of a year, the Pitris, beholding Rama dwelling there deprived of energy, his pride quelled, and himself sunk in affliction, said unto him, 'O son, having approached Vishnu, thy behaviour towards him was not proper. He deserveth for aye worship and respect in the three worlds. Go, O son, to that sacred river which goeth by name of Vadhusara! Bathing in all the tirthas of that stream, thou wilt regain thy energy! There in that river is the tirthas called Diptoda where thy grandsire Bhrigu, O Rama, in the celestial age had practised ascetic penances of great merit.' Thus addressed by them, Rama, O son of Kunti, did what the Pitris bade him, and obtained back at this tirtha, O son of Pandu, the energy he had lost.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे नक्की काय चालू आहे?

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 05/15/2012 - 11:32 नवीन
हे नक्की काय चालू आहे?
  • Log in or register to post comments

ख्रिशचनांच्यात अवतार नसतात हे

JAGOMOHANPYARE
Tue, 05/15/2012 - 12:30 नवीन
ख्रिशचनांच्यात अवतार नसतात हे किती चांगलं आहे नै? नाही तर ज्यु लोक अत्याचार करत होते, म्हणून देवाने हिटलरचा अवतार घेऊन त्यांचा नायनाट केला. असेही एखादे पुराण निघाले असते.
  • Log in or register to post comments

३ डि अवतार ख्रिश्चनांनीच

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 12:37 नवीन
३ डि अवतार ख्रिश्चनांनीच काढला होता ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

तो षिणेमा होता, पुराण नव्हे

JAGOMOHANPYARE
Tue, 05/15/2012 - 13:33 नवीन
तो षिणेमा होता, पुराण नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आपली भुर्जपत्रावर लिहिली ती

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 15:18 नवीन
आपली भुर्जपत्रावर लिहिली ती पुराणं अन त्यांनी काढला तो सिनेमा, हा भेदभाव कधी मिटणार कुणास ठाउक ? अजुन एक ५-५० शे वर्षांनी त्याचंही पुराण होईलच की,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

मुळात येशू ख्रिस्त हेच

किचेन
Fri, 05/18/2012 - 15:02 नवीन
मुळात येशू ख्रिस्त हेच 'देवाचे पुत्र' अर्थात अवतार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

ब्वॉर्र...

चिगो
Tue, 05/15/2012 - 13:44 नवीन
परशुरामाचा माझ्यापुरतं महत्त्व : परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आणि मला त्याचं उत्तर आल्याने चांगले इंप्रेशन पडले असावे कदाचित.. परशुरामांबद्दल मला असलेली माहिती.. त्यांच्या आई-वडीलांचे नाव, व बापाच्या ऑर्डरवरुन आईची हत्या केली, हे पुराण.. जोगवामधील "लल्लाटी भंडार" ह्या गाण्यावरुन पुनर्जिवित झालेल्या रेणूकामातेलाच "यल्लम्मा" मानतात, हेही कळलं. अरुणाचल प्रदेशमधे एक "परशुराम कुंड" आहे. परशुरामाने मातृहत्या करुन त्याचा परशु इथे धुतला, असे मानतात. इथुनच जवळून "लोहीत" नदी वाहते (लोहीत म्हणजे रक्त), जी पुढे जावून ब्रम्हपुत्रेला मिळते.. ह्या मातृहत्याकारकशस्त्रप्राक्षलणामुळे ब्रम्हपुत्रेचे पाणी गढूळ असुन, हा नद पुजनीय नाही, असे माननारे मानतात..
  • Log in or register to post comments

कोणती कंपनी?

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 05/15/2012 - 13:51 नवीन
परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता
कुठच्या कंपनीत हो? नाही म्हणजे माहिती असलेले बरे कारण उद्या मला पण तिथेच इंटरव्ह्यूला जायचे असेल तर परशुराम वाचायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

कंपनीत नाय हो..

चिगो
Tue, 05/15/2012 - 14:37 नवीन
संघ लोक सेवा आयोगाच्या इंटरव्युत विचारला होता.. आता आधीच्या चार-पाच जणांना इंटेलेक्चुअल टायपातले प्रश्न इचारुन बोर्डाचा चेअरमॅन पिकला होता, की तो टैमपास करत होता, की आमचं थोबाड पाहून त्याने हा प्रश्न विचारला हे त्याचं त्याला माहीत.. :D असं म्हणतात की ह्या इंटरव्युत "सूर्याखालच्या कुठल्याही विषयावर" (Anything under the Sun चा स्वैर अनुवाद) प्रश्न विचारला जाऊ शकतो.. त्याचंच उदाहरण समजा.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

चिगो, आमच्या क्रर्नाट्कात

बालगंधर्व
गुरुवार, 05/17/2012 - 15:25 नवीन
चिगो, आमच्या क्रर्नाट्कात रेणुका देवीची २ रुपे मानतत. एक यल्लम्मा आणि दुसरी मरिअम्मा. परशुराम्ने रेणुका देवीबरोबरच तिच्या एका मेइत्रिणीचे पण डोके उडवले. अणि नन्तर चुकुन त्या दोन्ही मुंडक्याची अदलाबदली झाली व रेणुका देवीचे डोके तिच्या मएत्रीनीला आणि मेत्रिनीचे डोके रेनुकादेवीला बसवले गेले. ज्यला रेणुकादेवीचे डोके ते- यल्लम्मा आणि ज्याला तिच्या मेइत्रिणीचे डोके ती मरिअम्मा असे मानतात. अनि दोन्हीची पुजा करतात. आमच्या कडे सोउन्दत्ती या गावाला यल्लम्माचे खुप महतत्व आहे. पोत्तुराज मरीअम्माच्या नावाने स्वत>च्या अंगावर फट्के मरुन घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अरे होतं ते फॅमिली सोप कमि

५० फक्त
Fri, 05/18/2012 - 15:18 नवीन
अरे होतं ते फॅमिली सोप कमि होतं का अजुन एक मैत्रिण आणता त्यामध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

मृगनयनीने सांगितलेली

प्रचेतस
Tue, 05/15/2012 - 14:20 नवीन
मृगनयनीने सांगितलेली परशुरामाची कथा दत्तगुरु, एकनाथ व जोगिनाथ यांवरून तर नाथपंथीच आहे हे सिद्ध होते. कल्की पुराण, विष्णू पुराण, गरूड पुराण आदी पुराणे अलीकडच्या काळात म्हणजे चौथ्या, पाचव्या शतकात आकारास आली, साहजिकच त्यात दत्तांचे उल्लेख आढळतात. दत्त ही वैदिक देवता नव्हे. महाभारतातही दत्ताचा उल्लेख एकदाच येतो तो सुद्धा परशुराम उपाख्यानातच. त्यामुळे हा भाग प्रक्षिप्त असावा असे मानायला पुरेसा वाव आहे. महाभारतात आरण्यक पर्वात परशुराम उपाख्यान आले आहे. जमदग्नी शीघ्रकोपी होते इतकाच उल्लेख आहे. क्रोधदेवता प्रसन्न होण्याचा काहीही उल्लेख नाही. आख्यानानुसार सहस्त्रार्जुन जमदग्नींच्या धेनूचे बळजबरीने हरण करून नेतो. इथे ही धेनू कामधेनू दाखवलेली नाही. ती तर गरीब बिचारी हतबल गाय दाखवलीय. (गाईच्या शरीरातून सैनिक बाहेर पडण्याचा प्रसंग वसिष्ठ-विश्वामित्राच्या आख्यानात आहे. राजा विश्वामित्र नंदिनीचे हरण करण्यासाठी येतात तेव्हा हतबल वसिष्ठ नंदिनीलाच सांगतात की तूच आता स्वतःला वाचव तेव्हा नंदिनीच्या मुखातून, शेपटातून विविध सैनिक उत्त्पन्न होऊन विश्वामित्राचा पराभव करतात.) परशुरामाला धेनूचे हरण झाल्याचे जमदग्नींकडून समजते तेव्हा तो कार्तवीर्याचा वध करतो. हजार हात पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असे महाभारतात काहीही नाही. पित्याचा वध पाहून चिडलेली सहस्त्रार्जुनाची मुले जमदग्नींच्या आश्रमात घुसून जमदग्नींचा वध करतात. शोकाकूल परशूराम पृथ्वी नि:क्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा करून सहस्त्रार्जुनाचा निर्वंश करतो व पुन्हा पुन्हा अशी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करतो. आणि काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात. बाकी परशुराम जरी चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याचाही मृत्यु अटळ आहे असे महाभारतात म्हटले आहे. द्रोणपर्वात अभिमन्यू वधानंतर शोकाकुल झालेल्या युधिष्ठिराला समजावण्यासाठी नारद त्याला षोडशराजकीय आख्यान ऐकवतात. त्यात मांधाता, दाशरथी राम इत्यादी राजांबरोबरच परशुरामाचेही छोटेसे आख्यान आहे. नारद म्हणतात-....हे सृंजया !, चार श्रेष्ठ गोष्टींमुळे तुझ्या पुत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ असलेला परशुरामही मृत्यु पावणार आहे. तेव्हा यज्ञ न करणार्‍या आणि दान न देणार्‍या तुझ्या पुत्राविषयी तू शोक करू नकोस. सृंजया हे तुझ्यापेक्षाही कित्येक पटीने श्रेष्ठ असलेले आधी मेलेले आहेत आणि पुढेही मरतील.
  • Log in or register to post comments

अभिमन्यू युधिष्ठिराचा

गवि
Tue, 05/15/2012 - 14:25 नवीन
अभिमन्यू युधिष्ठिराचा पुत्र?? आँ.. महाभारतात काय काय झालेय कोण जाणे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुतण्या हा पुत्रासमान असतो.

प्रचेतस
Tue, 05/15/2012 - 14:29 नवीन
पुतण्या हा पुत्रासमान असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कानीन पुत्र

दिगम्भा
Tue, 05/15/2012 - 18:57 नवीन
आपल्या पत्नीच्या पोटीचा कोणाहीपासून झालेला पुत्र (कानीन पुत्र) हा बीजक्षेत्रन्यायाने (पक्ष्याच्या द्वारे शेतात पडलेल्या बीजापासून उत्पन्न झालेले धान्य हे शेतकर्‍याच्या मालकीचे असते) औरस पुत्राच्या इतक्याच योग्यतेचा मानावा असा शास्त्रनियम आहे. याच न्यायाने युधिष्ठिर व अन्य पांडव हे पांडूचे पुत्र मानले गेले. तेव्हा पुतण्याचे नाते आणले नाही तरी अभिमन्यु युधिष्ठिराचा पुत्र होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/15/2012 - 19:48 नवीन
दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? --- धागा आवडला. प्रतिसाद तेवढे रंजक नाहीत. गवि, परा, ५० फक्त, शिल्पा ब इत्यादी सर्व होतकरू लोकांनी पुराणातून रंजकता शिकावी अशी नम्र विनंती. बेटर लक नेक्स्ट टाईम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा

JAGOMOHANPYARE
Tue, 05/15/2012 - 19:54 नवीन
दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? ----------- हेच विचारायचे होते ......... प्रजा ही राजाचा जणू पुत्र असते.. या न्यायानेही नागरीक अभिमन्यु राजा युधिष्ठीराचा पुत्र होतो, असेही मग उत्तर येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 15:23 नवीन
काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात - जी पृथ्वी परशुरामाने दान केली, त्याच पृथ्विवरच्या महेंद्र पर्वतावर त्याला जायला सांगण्यामागं काय उद्देश असावा, याबद्द्ल कुणी सांगेल का ? की महेंद्र पर्वत हा पृथ्बी अनेक्स मध्ये होता /आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक कथा

पैसा
Tue, 05/15/2012 - 19:35 नवीन
काश्यप ऋषींना पृथ्वी दान केल्यानंतर दान केलेल्या जमिनीवर कसं राहणार? म्हणून परशुरामाने समुद्र हटवून नवीन अशी कोकण भूमी (कुमारी भूमी) तयार केली आणि काही लोकांना तिथे नेऊन वसाहती केल्या अशी एक कथा आहे. त्यामुळे कोकणात परशुरामाची देवळे आढळतात. तसंच जोगेश्वरी (जोगुळांबा) म्हणजेच रेणुका असल्यामुळे कोकणातल्या अनेक लोकांची कुलदेवता जोगेश्वरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बर

सहज
Tue, 05/15/2012 - 14:33 नवीन
सध्या श्री भगवान परशुराम (व सप्त चिरंजीव मंडळातले अन्य) कुठे असतात व काय करतात? कोणी सांगू शकेल काय?
  • Log in or register to post comments

मी तरी नोकरी करतो मुम्बैत.

गवि
Tue, 05/15/2012 - 14:35 नवीन
मी तरी नोकरी करतो मुम्बैत. बाकीच्या सहाजणांशी फारसा टच राहिलेला नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खरय गवि. आपण भेटल पाहिजे...

कवटी
Tue, 05/15/2012 - 15:15 नवीन
खरय गवि. आपण भेटल पाहिजे... टचमधे राहिले पाहिजे... ऐनवेळी कोण कुठय विचारल तर पत्ता लागत नाही. मी पन नवीमुंबैत नोकरी करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तरी म्हणलं होतं तुम्हाला पुणे

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 15:20 नवीन
तरी म्हणलं होतं तुम्हाला पुणे गेटच्या कट्ट्याला मला तुमच्या फेसबुकात अ‍ॅड करुन घ्या, टच मध्ये राहु, पण तुम्हाला पटलंच नाही, असो आता तरी करा अ‍ॅड. बाकी ऑर्कुटवर सगळे एकत्र होतं ना आपण, ते ऑर्कुट बंद झालं अन मग फार अवघड झालं आहे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असे काय बोलता? हल्लीच तर

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/15/2012 - 20:11 नवीन
असे काय बोलता? हल्लीच तर भेटलो की मी तुम्हाला, पॉप टेट्स मध्ये !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरंच एक कट्टा करायला हवा राव,

सूड
Wed, 05/16/2012 - 00:52 नवीन
खरंच एक कट्टा करायला हवा राव, म्हणजे भेट तरी होईल. जाहीर धागा काढला तर कदाचित पंचपतिव्रता, सोळा मातृका, चौसष्ट योगिनी, देवकन्या, नागकन्या आसरांच्या स्वार्‍यांसह हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मजाच म्हणायची

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 05/15/2012 - 15:05 नवीन
त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले.
मजाच म्हणायची. असे हजार हात उत्पन्न व्हायला दत्तकृपा व्हायला हवी हे समजले. पण अशी दत्तकृपा व्हायला काय क्वालिफिकेशन लागते हो? आणि हजार हातांबरोबर हजार खांदे पण होते का की दोन खांद्यांवर प्रत्येकी ५०० असे हजार हात होते? कितीही प्रयत्न केले तरी असे चित्र डोळ्यासमोर आणता आले नाही.
  • Log in or register to post comments

तेज्यायला !

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/15/2012 - 16:04 नवीन
कुणीतरी परशुरामांना बोलावणे धाडा रे. हे साले काही मिपासदस्य फार माजले आहेत. २१ वेळा मिपासुद्धा नि:सदस्य करा म्हणावं !
  • Log in or register to post comments

बादवे, परशुरामाच्या इथली

गवि
Tue, 05/15/2012 - 16:20 नवीन
बादवे, परशुरामाच्या इथली प्रसादाची खिचडी कोणी खाल्ली आहे का? डाळतांदुळाच्या गरमागरम अत्यंत स्वादिष्ट खिचडीसोबत लोणचं इतकाच प्रसाद असतो पण चटक लागावी इतका चवदार प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे गवि म्हणजे फारच अवघड

प्यारे१
Tue, 05/15/2012 - 17:06 नवीन
हे गवि म्हणजे फारच अवघड ब्वा! बारसे ते बारावे आणि इतर सगळ्याच ठिकाणच्या सगळ्याच पाककृतींमध्ये गविंना फारच रस ! बाकी सगळंच जाऊ दे कुठंही, कधीही नी कसंही खाद्यपदार्थ आठवतात ह्यांना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/15/2012 - 20:20 नवीन
नालायक माणसा, हसवून हसवून मारतो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कानीन पुत्र

दिगम्भा
Tue, 05/15/2012 - 18:55 नवीन
वर
  • Log in or register to post comments

म्रुगनयनी तै

राजघराणं
Tue, 05/15/2012 - 19:43 नवीन
१) मनापासून सांगा. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटते ? २) लेखाचे नाव चिरंजीव परशुराम हवे. चिरंजिवी हा एक नट आहे. चिरंजीवी हे चिरंजीव चे विभक्ती प्र्त्यय लावलेले रूप म्ह्णून लिहिले असेल तर व्याकरण चुकले आहे. परशुरामाला आवडायच नाही हं हे :प) Image removed.
  • Log in or register to post comments

राजघराणं'जी... मी अर्थातच

मृगनयनी
Tue, 05/15/2012 - 23:18 नवीन
राजघराणं'जी... मी अर्थातच माझ्या विधानांशी आणि लेखाशी सहमत आहे. कारण परशुरामाची कथा कुणाला कितीही काल्पनिक वाटली, तरी ते त्यांच्या द्रुष्टीने बरोबर असू शकते. कारण सध्याच्या कलीयुगाच्या प्रभावानुसार आणि नियमांनुसार शस्त्र-अस्त्र विद्या, त्यांची साधना, मन्त्रविद्या इ. शक्ती प्राप्त होण्यासाठी अनुकुल परिस्थिती नाही. व तितकेसे पावित्र्यही नाही. त्यामुळे बर्‍याच जणांना या गोष्टी परिचितही नाहीत. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" हा नियम या ठिकाणीदेखील वापरून बर्‍याच लोकांना असे वाटते, की या शस्त्र अस्त्र विद्या, सिद्धी, मेलेला माणूस पुन्हा जिवन्त करणे.. वगैरे गोष्टी आमच्या समोर घडल्या तरच आम्ही विश्वास ठेऊ.. साहजिकच या "विद्या" म्हणजे काही जादूचे प्रयोग नाहीत.. की लोकांच्या फर्माईशीवरून करून दाखवले. या शक्तीवर श्रद्धा असणार्‍या व तिची साधना करणार्‍यांना या उपासनेअंती व साधनेअन्ती साश्य होतात, हेही तितकेच खरे! असो.. वर काही ठिकाणी प्रतिसादांमध्ये "कामधेनू" या गायीबद्दल आक्षेप घेतला गेला आहे... मुळात ती जर एखादी साधी गाय असती, तर कार्तवीर्याजुनाने ती जमदग्निंकडे मागितलीच नसती. ही "कामधेनू" इन्द्राने जमदग्नि आणि रेणुकेच्या विवाहप्रसन्गी त्यांना भेट म्हणून दिली होती. तिच्यामुळेच रोज जमदग्नि आणि रेणुकेला रोज सर्वांसाठी उत्तम स्वयंपाक बनवून देऊ शकत होते. कार्तवीर्यार्जुनाच्या अत्याचाराला कन्टाळलेले ऋषीमुनी (लेखामध्ये यांचा उल्लेख आहे) आणि त्यांचे शिष्यगण हे रामशृंग पर्वतावर जमदग्निंकडे आश्रयास आलेले होते. परशुरामाने पितृआज्ञेनुसार केलेल्या मातृहत्येनन्तर.. त्याच्या आज्ञापालनामुळे जमदग्नि प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी परशुरामाकडे वर मागण्यास सांगितले तेव्हा परशुरामाने माता रेणुका व चारी भाऊ यांना पुनः जिवन्त करण्याची विनन्ती करुन जमदग्निंना क्रोधदेवतेचा त्याग करण्यास सांगितले त्यामुळे एकदा क्रोधदेवतेचा त्याग केल्यानन्तर जमदग्नि ऋषींकडे जेव्हा आश्रमात आलेल्या कार्तवीर्यार्जुनाने कामधेनू मागितली, तेव्हा जमदग्नि ऋषी त्याच्यावर क्रोधित होऊ शकत नव्हते. कार्तवीर्यार्जुनाकडे अफाट ऐश्वर्य होते, तरी नारदांनी केलेल्या कामधेनूच्या दैवी वर्णनामुळे तो आपल्या सैन्यासह रामशृंगावर गेला. तेव्हा काही वेळातच अतिथीधर्मानुसार जमदग्नि-रेणुकेने कामधेनूच्या सहय्याने त्यास व त्याच्या सैन्यास (घोड्यासकट सर्वांना) उत्तम भोजन दिले. त्यामुळे कार्तवेर्यास कामधेनूचा अधिकच मोह पडला.. व जमदग्निंनी ती त्यास न दिल्याने तो चिडला तसेच परशुराम तेव्हा कैलास पर्वतावर असल्यामुळे जमदग्निंचा वध करणे कार्तवीर्यास सोपे झाले. अर्थात विधिलिखितानुसार जमदग्निंचा मृत्यू काही काळाच टिकला. पुन्हा सन्जीवनीमन्त्राच्या साहाय्याने ते जिवन्त झाले. व नन्तर परशुरामाने कार्तवीर्याचा आणि तत्सम क्षत्रियांचा वध केला.. वाल्मिकींनी याचे वर्णन करताना "क्षात्रविमर्दन" असे न म्हणता "राजविमर्दन" असे म्हटले आहे. हेही तितकेच खरे, की कलीयुगात देवावरील किन्वा गुरुवरील असीम श्रद्धेशिवाय या गोष्टी शक्य नाही. महाराष्ट्रात काही सन्तांच्या बाबतीत मात्र या गोष्टी खर्‍या झालेल्याही आहेत. विठ्ठलभक्तीत निमग्न झालेल्या गोर्‍या कुम्भाराने माती तुडवता तुडवता आपल्या रांगत आलेल्या बाळाला चुकून तुडवले व ते बाळ मृत्यू पावले. त्याच्या बायकोने प्रचन्ड आक्रोश केला.. तेव्हा विठ्ठ्लाची करूणा भाकल्यावर गोर्‍या कुम्भारास त्याचे बाळ पुन्हा जसेच्या तसे जिवन्त मिळाले. रामदास स्वामींनी देखील कुलकर्णी नावाच्या एका पुत्रहीन अग्निहोत्री ब्राह्मणास तिरडीवरून उठवले होते.. या कुलकर्णीची बायको जेव्हा समर्थांच्या पाया पडली,तेव्हा त्यांनी तिस "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद देऊन तिच्या नवर्‍यास जिवन्त केले होते. सन्त तुकारामांचा भक्त असलेल्या एका तेल्याचा पाच वर्षाचा मुलगा मरणासन्न अवस्थेत असतानादेखील आणि बायको घरी शिव्या घालत असताना देखील तो तेली श्रद्धेपोटी तुकारामांच्या कीर्तनास आला होता. इकडे घरी मुलगा मरण पावल्यावर त्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनाच्या ठिकाणी आली. व तुकारामांसमोर ते टाकून अत्यंत आक्रोशाने तिने टाहो फोडला.. तेव्हा तुकोबांनी सर्वांना विठ्ठलनामाचा गजर करण्यास सांगितला.. व तो मृत मुलगा हसत उठून बसला.... अर्थात या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत होतातच असे नाही... मनाचे आणि शरीराचे पावित्र्य, मानलेल्या गुरुवरील, देवावरील एकनिष्ठता आणि श्रद्धा या गोष्टी असणार्‍या ल्कांना याची प्रचिती येते. ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी मग कदाचित या सगळ्या गोष्टी भाकडकथा बनून राहतात... आणि त्या तश्या राहिल्या.. तरी कुणालाच काहीच फरक पडत नाही.. कारण ज्याला जे मिळायचे आहे.. ते मिळतेच्च!!! __________________________________ अवांतर :- राजघराणं'जी... तुमची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. पण तुमच्याकडे ... आयमीन तुमच्या फोटोकडे पाहून तसे वाटत नाही!.. सन. २००७ पासून ऑर्कुटवरती आणि सन. २०१० पासून चे.पु. वरती तुमचा एकच फोटो आहे म्हणून म्हटलं!! ;) ;) त्या फोटोत तुम्ही खूप शान्त, गम्भीर वाटता!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

हे एवढे प्रतिसाद

चित्रा
Wed, 05/16/2012 - 03:04 नवीन
झाल्यानंतर आता प्रतिसाद देणे म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचे प्रयत्न आहेत असे समजल्यास त्याबद्दल मी जबाबदार नाही. ह. घ्या. असो. क्ष घराण्याचे कुळदैवत परशुराम आहे. अशा परशुरामाबद्दल आदर बाळगण्याची गरज क्ष घराण्याखेरीज इतरांना भासत नाही याबद्दल क्ष घराण्यातल्या व्यक्तीला वैषम्य वाटणे साहजिक आहे. त्याउलट आईला मारणार्‍या आज्ञाधारक वृत्तीचे, वडिलांना प्रश्न न करण्याच्या वृत्तीचे कौतुक होऊ नये असे वाटणार्‍यांनी परशुरामाच्या प्रचलित कथेवरून परशुरामाबद्दल काही उद्गार काढले तर तेही गैर नाही असे वाटते. >>मी अर्थातच माझ्या विधानांशी आणि लेखाशी सहमत आहे. कारण परशुरामाची कथा कुणाला कितीही काल्पनिक वाटली, तरी ते त्यांच्या द्रुष्टीने बरोबर असू शकते. कारण सध्याच्या कलीयुगाच्या प्रभावानुसार आणि नियमांनुसार शस्त्र-अस्त्र विद्या, त्यांची साधना, मन्त्रविद्या इ. शक्ती प्राप्त होण्यासाठी अनुकुल परिस्थिती नाही. व तितकेसे पावित्र्यही नाही. ...हेही तितकेच खरे, की कलीयुगात देवावरील किन्वा गुरुवरील असीम श्रद्धेशिवाय या गोष्टी शक्य नाही. मृगनयनी लिहीतात त्यावर त्यांचा गाढ विश्वास असल्याप्रमाणे वाटते. पण ऐकीव, चमत्काराने भरलेल्या कहाण्या ऐकून साधेभोळे, कोणावरही विश्वास टाकणारे, निरागस लहानपण मागे टाकून अनेक वर्षे झाल्यानंतरही गाढ विश्वास कसा काय बसू शकतो, याचे आश्चर्य वाटते. याला श्रद्धा हे उत्तर पुरेसे नाही. कोणाच्यातरी कपोलकल्पित चमत्काराने भरलेल्या कहाण्या ऐकून आज जर कोणी आपल्या बाळाला तुडवले तर अशांनी तुरुंगवासात काय करायचे ह्याचा प्रश्न नको. बाळ श्रद्धेमुळे परत जिवंत होण्याची वाट बघत बसणे हे खूपच मोठे वेळकाढू काम झाले. आत्ता तुडवून मग मूल परत जिवंत होत नाही ही कलियुगाची किमया ठरवली तर ही स्वतःची किंवा इतरांची फसवणूक ठरेल.. आज इतिहासात त्या कुंभाराच्या मुलाच्या तुडवल्या जाण्याने झालेल्या मृत्यूची कसलीही नोंद आहे का? गोर्‍या कुंभाराचे एखादे पद म्हटले तर चटकन आठवत नाही, पण ही गोष्ट मात्र सर्वांना आठवते कारण तशी ती आठवावी म्हणूनच कोणीतरी तयार केलेली आहे. समर्पणाने लोक लक्षात राहतात - म्हणून अशा काही तरी कथा रचण्याची पद्धत आहे. (अवांतर - आठवा 'एक दूजे के लिये' . ती रती अग्निहोत्री-कमल हसन लक्षात राहतात. पण आयुष्याची होळी न करता आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करून एकमेकांना तरी सुखी करणारे कोणाच्याही आठवणीत नसतात. ) कोणाचे भक्त किंवा प्रेमिक म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा कोणाच्या तरी जीवनाचे समर्पण हा एकमेव मार्ग नाही. इतरही बरेच मार्ग आहेत आणि असावेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+१

स्पंदना
Wed, 05/16/2012 - 05:09 नवीन
अतिशय विचार करुन लिहिलेला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा