मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज कुणी का राम व्हावे

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या

वाचने 3011 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by सांजसंध्या

पक पक पक 14/03/2012 - 19:30
चालतय हो काळ्जी नसावी... एकदम भन्नाट ..जब्बरद्दस्त्..कातिल्...अन काय अन काय ......शब्द संपले... :) खुप खुप आवड्ले... :)

यकु 14/03/2012 - 19:29
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त पडलेले असतात तसे वाटले. एकेका फोटोकडे पाहून एकएक शब्द लिहून गप्प राहात फोटोंकडे पहात मध्‍येच बोलावं तशी धृवपदं आलीत.. चौरा सही बोल्या था.

सांजसंध्या 15/03/2012 - 06:10
धन्यवाद सर्वांचे आयुष्यभर इतरांसाठी खस्ता खाल्लेल्या, इतरांच्या आनंदासाठी झिजलेल्या पण आता थकलेल्या कित्येकांच्या वाटेला जे काही येतं ते मांडण्याचा हा प्रयत्न. ज्यांच्यासाठी जीवन उधळले त्यांच्या हातून शेवटचे दोन थेंबही मिळण्याचं भाग्य लाभत नाही. शपथा, वचने यांना मोल नसलेल्या या जगात शिळा बनून आयुष्य संपण्याची वाट पहावी लागते. आता कुणी रामही उद्धार करायला येणार नसतो आणि राम तरी आजच्या जगात का यावा जेव्हां भरत देखील तितका निर्मळ राहीलेला नाही असा काहीसा आशय आहे. अर्थात एकदा कविता पोस्ट केल्यानंतर वाचकांना काय वाटतं हे माझ्या लेखी महत्वाचं.. कविता आवडल्याचं कळवणा-या प्रतिक्रियांसोबतच परखड अभिप्राय देखील तितकेच महत्वाचे !!

चौकटराजा 15/03/2012 - 09:18
शब्द 'दाह" शब्द " वाह" शब्द घन रास्त ते शब्द फुले, मनी झुले रेशमीही वस्त्र ते शब्द तारे शब्द वारे भासते जादूगिरी शब्दांच्या टोचणीने जखम होतसे उरी यातील शब्द दाह शब्द वाह ही कामगिरी फक्त माझी बाकी कविता उसनी आहे. व १९७२ च्या दरम्यान लिहिली गेली आहे. कवितेची ही एक पटकथा असली पाहिजे. तशी इथे ती दिसत नाही. दुसरे असे की अस्ताई व अंतरा यांचे वृत्त एक नाही असे दिसते . ही रचना का कवयित्रीने केली असावी ? सहजच आठवण आली . भावार्थ असा नागरिकाने संशयिली, सीता अग्नित प्रवेशली धरती माता आसावली, कन्येला पोटी घेती झाली आजची नारी अशीच परिक्षा देत असते पोटात घ्यायला हजर धरती माता मात्र नसते ! वरील अर्थाची मूळ कविता बहुदा इंदिरा संत यानी लिहिली असावी.

चौकटराजा 15/03/2012 - 09:25
परी की परि ( प्रमाणे ) यात माझा जरा गोंधळ होतोय. पण कवियित्रीचा एक गोंधळ मला कळलेला नाही. कोणत्या मृगासवे तू गेलीस ? तुला मृगाप्रमाणे मी सुगंध वाटीत गेले तरीही माझ्या वाट्याला..... असे म्हणायचे असेल तर मृगापरि असे शब्दयोजन हवे . नको का?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 15/03/2012 - 09:40
कवियित्री का कवयित्री यात आमचाही जरा गोंधळच होतो आहे. शब्दाचे योग्य रूप हे कवयित्री असावे असेच शब्द योजन हवे, नाही का?

In reply to by प्रचेतस

यकु 15/03/2012 - 09:43
अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत चौरांना, हे विसरु नका. इतर शब्द एवढे अचूक तेही स्वतः कॉम्प्युटर टाईप केले आहेत त्याबद्दल धन्यवाद द्या. ;-) एखादी वेलांटी पडली असेल चुकून.

In reply to by यकु

प्रचेतस 15/03/2012 - 09:46
अहो यकुशेठ, चौकटराजांना धन्यवाद आणि त्यांच्या शुद्धलेखनाबद्दल कौतुक आहेच. पण त्यांचा जसा परि का परी असा गोंधळ झाला तसाच आमचाही कवियित्री का कवयित्री यावरून झाला इतकेच. ;)

In reply to by प्रचेतस

परि का परी
साला मी इथे हजर असताना ह्या शब्दावरती चर्चा करण्याचा अधिकार तुम्हा लोकांना दिलाच कोणी ? त्वरीत खुलासा करावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 15/03/2012 - 20:10
काय बरोबर ते सांगून टाक बघू!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 15/03/2012 - 13:09
काय आहे नक्कि , कवयित्रि कि कवियित्रि?>>> सांगा हो अता लवकर कुणीतरी
कवयित्रि पण नाही आणि कवियित्रि पण नाही. कवयित्री म्हणा. :P

खुप छान रचना:
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|
हे कडवे फाराच आवडले.

चौकटराजा 15/03/2012 - 15:54
हमारा जरा चुक्याच ! घाईत चौका मारताना चौ.का. च्या बोट फळी का बाहरका किनारा ट़ंक़कळीला लागला. पहिल्या स्लीपमधे वल्ली दुसरीत आमचा खोंड नातू येशू मग आजा आउट !