अचानक वरती आलेला पाहून खूप छान वाटले. परत एकदा वाचला. परत डोळे भरुन आले.
पुन्हा एकदा काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाहीये. मनातल्या मनात लेखाचा आनंद घोटाघोटाने पीत राहीन दिवसभर!
-रंगा
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा.
सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही.
सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या.
सर असच माझं सुध्हा बालपण गेल.
पण सर तुमच्या सारखे तुम्हीच
८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झली नाही.
रघू सावंत
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा.
सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही.
सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या.
सर असच माझं सुध्हा बालपण गेल.
पण सर तुमच्या सारखे तुम्हीच
८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झाली नाही.
रघू सावंत
बर्याच जणांसारखं बालपण आठवलं..
हे मात्र खर की, प्रसंगी मुलांपेक्षा मुलींची कुचंबणा जास्त व्हायची /होते...आणि adjustment म्हणाल तर बहीणीच जास्त करायच्या...
खरचं सुंदर लेखन.
>>या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?<<
जेव्हा जेव्हा हा लेख वर येतो तेव्हा तेव्हा अधाश्यासारखा वाचलेला आहे. दर वेळी काही तरी नवं उमजत रहातं. रमीच्या डावात एखादं मोक्याचं पान हाताशी मिळालं की आधीचे सेक्वेन्सेस भराभर बदलून भर्र्कन रमी लागावी तसं होतं. छोट्या छोट्या वाक्यांआड लपलेले अनेक अर्धविराम, पूर्णविराम, वळणं, वेलांट्या 'ये, आम्हांला शोध' म्हणून खुणावत रहातात.
गेल्या सहासात वर्षांत यत्किंचितही शिळा न झालेला आणि कायम पुन:प्रत्यय देणारा एक अप्रतिम लेख.
काटेकोरांटीची उदाहरणं बरीच बघितली. पण त्यात काहि चुकल्याची जाणिव, आणि ति चुक पुढे कंटिन्यु न करण्याची सजगता सहसा बघायला मिळत नाहि.
बुवा, तुम्ही नक्की काय मटेरीयल आहात? सुख-दु:खाचे वणवे पचवणारे अनेक पाहिले. प्रचंड साहस, जीद्द, कर्तुत्व असणारी मंडळी देखील सभोवती अनुभवली. पण असं जींदगी वाचता येणं नाहि बघितलं.
__/\__
अप्रतिम. केवळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. माझ्या आईकडून तिच्या लहानपणचे जे काही वर्णन ऐकले आहे ते तंतोतंत इतकं सुंदर शब्दरूप केलंय. अगदी याक्षणी आईला कडकडून भेटावसं वाटतंय.
कदाचित लेखक जितक्या दारिद्र्याच्या वातावरणात वाढला आहे त्याच्या कैकपट गरीब वातावरणात मी वाढलो आहे. पण आमच्याच घरी येऊन असे वागणारा एकही पाहुणा पाहिल्याचे आठवत नाही. माझ्या आत्या, मावशीच्या आठवणी अत्यंत गोड आहेत.
आजच्या पिढीला माहित नसलेला जुना काळ अतिशय वाईट रंगात रंगवायचा, प्रेक्षकांना/वाचकांना भावूक बनवायचं, आपण शहराच्या भाऊगर्दीत कसे सुखी आहोत असे वाटायला लावायचे ही एक वेगळी कलाइंडस्ट्री आहे.
मला अशा कथा वाचून बोर झाले आहे.
राहुलजी, या लेखात व्यक्तिचे चित्रण झालेले आहे, करायचा मानस आहे तोवर ठिक आहे. पण यात जमान्याचे चित्रण झाले आहे ते मला व्यक्तिशः खटकले. स्लमडॉग मिलिएनेरवर अमिताभने जसे ओब्जेक्शन घेतले होते तेच मी घेतोय, फरक इतकाच आहे कि स्लमडॉगवाल्यांनी 'काही' भारतीय मूले स्लमडॉग असतात असे दाखवले, इथे मात्र त्या काळात सुखी मुले नसतच असेच दाखवायचा प्रयत्न वाटला.
अरूणभाव
ललित लेखनाच्या मूल्यमापनाचा नियम "बुद्धीला पटणे" कधीपासून झाला? लेखनशैली, कथा/पात्रं/घटना रंगवण्याची हातोटी ऐसा भी कुछ होता हय ना...
हे म्हणजे "जादूबिदू असलं काही नसतं - त्यामुळे हॅरी पॉटर बोर आहे" असं म्हणण्यासारखं आहे!
हे म्हणजे "जादूबिदू असलं काही नसतं - त्यामुळे हॅरी पॉटर बोर आहे" असं म्हणण्यासारखं आहे!
हा युक्तिवाद मान्य आहे. अर्थातच वाचकांना प्रभावित होण्याचे स्वातंत्र्य आहे. लेखकाला प्रभावित करण्याचे स्वातंत्र्य आहे.
पण मी अलिकडे एक फिनॉमेनन पाहतो आहे. नवी पिढी जुना जमाना नीट जाणत नाही. आजी आजोबा जवळ नाहीत. असलेच तर तेही शहरी असण्याची शक्यता. मग ही पिढी कधीतरी मदर इंडीया पाहते, जब्बार पटेलांचे कोणते नाटक, इ पाहते आणि त्यांना पटून जाते कि आपल्या २-३ पिढ्यांपूर्वी परिस्थिती किती दयनीय होती. अख्ख्या त्या जमान्याशी सहानुभूती. स्त्रीयांवर आणि दलितांवर तर अजूनच. ...
पण ते कल्पो कल्पित तर नाहीये ना?
जे सत्य आहे ते इतक्या हळुवार पणे लिहीलय.. हा काही " बायकांच्या ऑडियन्सला रडवायचा" टाईप प्रकार निश्चित नाही..
हा लेख तुम्हाला "बोर" वाटावा.. रादर कुणालाही बोर वाटावा.. ह्याच सखेद आश्चर्य वाटलं..
'बोर' वाटली असे तुम्ही म्हणता. तुम्ही लेखकापेक्षा अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत वाढले आहात असेही तुमचे म्हणणे आहे. माझ्या मते दोन प्रमुख शक्यता असतात. तुम्ही जेव्हा गरीब परिस्थितीतून वरती येता तेव्हा एकतर तुमच्यात कमालीचा कडवटपणा भरुन राहतो ज्यामुळे तुम्हाला संवेदनशील मनाचा भाग मारुन जगावे लागते परिणामतः स्वभावात एकप्रकारची शुष्कता येऊ शकते. किंवा तुम्ही अतिशय संवेदनशील बनता आणि जगण्यातल्या प्रत्येक अनुभवाची असोशीने ओळख करुन घेता आणि तुमच्यात असलेल्या प्रतिभेने त्या अनुभवांचा पट उलगडता.
तुमच्या आठवणी गोड आहेत तर तुम्ही तसे लेखन करा ना, आवडले तर त्यालाही लोक दाद देतीलच.
वाचकांनी या कथेकडे कसे बघावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे किंबहुना तसे कोणत्याही बाबतीत असतेच. परंतु 'स्लमडॉग' सारख्या सिनेमांची या कथेशी तुलना आणि मारुन मुटकून भावूक बनवण्याची कलाइंडस्ट्री म्हणणे - बात कुछ हजम नहीं हुई!
तसे तर हल्ली बर्याच चांगल्या कलाकृतींना हटकून नावे ठेवणे आणि आम्ही कसे इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवणे यातही चढाओढ असते असे ऐकून आहे! :)
प्रतिक्रिया