केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे.
http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o
इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे.
मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा.
जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो धारण करतो
तोच पिता साक्षात मानावा
जन्म देतो निमित्त केवळ
हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले. विनीलविषयी.
लक्षवेधी असल्याने हा धागा थोड्या वाचनांनंतर उडवला किंवा वाचनमात्र केला तरी चालेल. चर्चा श्रामोंच्याच धाग्यावर चालली तर उत्तम आहे.
वाचने
27699
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
भुरटे चोर
In reply to +१ by नितिन थत्ते
त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद
In reply to +१ by नितिन थत्ते
शोषित जनतेच्या मनात
In reply to अजुनही... by प्रसन्न केसकर
धन्यवाद आ.रा. साहेब...
In reply to शोषित जनतेच्या मनात by आळश्यांचा राजा
एक प्रश्न
In reply to धन्यवाद आ.रा. साहेब... by प्रसन्न केसकर
या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात...
In reply to एक प्रश्न by विकास
>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे
In reply to या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात... by प्रसन्न केसकर
कदाचित...
In reply to >>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे by नितिन थत्ते
वाह वा. पुन्हा एकदा छान पोस्ट.
In reply to या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात... by प्रसन्न केसकर
+१
In reply to वाह वा. पुन्हा एकदा छान पोस्ट. by चिंतामणी
फॅक्ट्स
In reply to धन्यवाद आ.रा. साहेब... by प्रसन्न केसकर
फारच छान
In reply to अजुनही... by प्रसन्न केसकर
सलाम प्रसनदा !
उत्तम चर्चा!
छान चर्चा.
+१
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१११११
In reply to +१ by धमाल मुलगा
कृपया
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेधा पाटकर म्हणतात...
In reply to कृपया by चित्रा
अजून सुटका नाही
मेधा पाटकर
धन्यवाद!
In reply to मेधा पाटकर by श्रावण मोडक
स्वतंत्र लेख
In reply to मेधा पाटकर by श्रावण मोडक
वेगळ्या धाग्याची गरज...!!
In reply to स्वतंत्र लेख by आळश्यांचा राजा
मागण्या आणि सरकारी प्रतिसाद
- काही घटकांचे इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण करणे.
(ओरीसा सरकारने २००७ सालीच ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे. परत केला जाईल).
- गोदावरीवरील ओरीसा-तेलंगणा भागातील पोलावरम प्रकल्प थांबवा.
(ह्या प्रकल्पाला ओरीसा सरकारचाच विरोध आहे आणि त्या विरोधात सरकारने आंध्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.)
- काही आदीवासींच्या जमिनी या बेकायदेशीररीत्या घेतल्या आहेत त्या त्यांना मिळाव्यात.
(या संदर्भात काही नक्की करायची गरज आहे कारण आदीवासींसंदर्भात काही कायदे वर्षानुवर्षे धाब्यावर बसवले गेले होते. नंतर झालेल्या विरोधात दोन आदीवासी मारले गेले होते, वगैरे.... सरकारने लक्ष घालायचे मान्य केले आहे)
- कोटापडी ते मानेगुडा कालवा (डेव्हलपमेंट?) हवा आहे.
(सरकारने मान्य केले आहे आणि रु. ५० लाखांची सर्वेक्षण आणि सुरवातीच्या कामासाठी तजवीज केली आहे.)
- तुरूंगात मरण पावलेल्या काही कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला भरपाई.
(सरकारचे म्हणणे आहे की ते इस्पितळात मरण पावले. त्या विरुद्ध खटला आहे. पण सरकार तो त्यांच्या बाजूने पुढे ढकलणार नाही...)
- शीला दी या माओ कमिटी सभासदेस तब्येतीच्या कारणानिमित्त सोडावे.
(त्यांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना सरकार सोडणार आहे.)
- दोन एकत्रीत मागण्या - खाणकाम थांबवावे आणि आंतर्राष्ट्रीय कंपन्यांशी असलेले त्या संदर्भातील व्यवहार तोडावेत.
(सरकारने म्हणले आहे की सर्व कायदे काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही ते बघितले जाईल, पुढे असे करार कसे करायचे ते बघितले जाईल, पुर्नवसन नीट केले जाईल पण असलेले करार राहतील. माओवाद्यांनी असलेले करार ठेवायला मान्यता दिली आहे.) (माझी टिपण्णी: म्हणजे याच कंपन्यांकडून हेच माओवादी परत पैसे घेण्यास मोकळे असे समजायचे का? नक्की काय साध्य झाले?)
- सीताण्णा नामक आदीवासीस अटक झाली आहे त्याला सोडावे.
(पोलीस रेकॉर्डप्रमाणे झालेली नाही, तरी देखील चौकशी केली जाईल).
- बालीमारा धरणासंदर्भात पुर्नवसनासाठी शेतकर्यांना भरपाई.
(सरकारचे म्हणणे आहे की आजपर्यंत काही तक्रारी आल्या नाहीत की भरपाई मिळाली नाही म्हणून. तरी देखील लक्ष घातले जाईल).
- नाल्को प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना न्याय दिला जावा.
(दिला जाईल)
- ऑपरेशन ग्रीन हंट थांबवा.
(जो पर्यंत तुमच्याकडून बेकायदेशीर कृत्ये होत नाहीत, शस्त्रे घेतली जात नाहीत, तो पर्यंत आमच्याकडूनही घेतली जाणार नाहीत).
- तुरूंगात असलेल्या अनेक आदीवासींना सोडावे.
(लहान कारणांसाठी पकडल्या गेलेल्यांना तात्काळ सोडले जाईल. माओ चळवळीशी संबंधीतांबद्दल १५ दिवसांत रिव्ह्यू चालू केले जातील.)
- सेंट्रल कमिटी मेंबर्सना सोडून द्या.
(यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रीया चालू केली गेली आहे.)
अतिरेक्यांशी वाटाघाटी कराव्यात का वेगळा मुद्दा आहे. पण वरील वाटाघाटींतून स्वतःची माणसे सोडवणे आणि ज्या खाणींना विरोध केला त्यांना एका अर्थी तसेच ठेवायची "परवानगी" देऊन स्वतःचे खंडणी उत्पन्न चालू ठेवायची तजवीज सोडल्यास यातून नक्की ठोस असे काय मिळाले? त्याचा तेथील आदीवासींना नक्की काय फायदा मिळाला?विषय वेगळा आहे...!
In reply to मागण्या आणि सरकारी प्रतिसाद by विकास
नवीन धागा
In reply to विषय वेगळा आहे...! by इन्द्र्राज पवार