विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे
केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे.
http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o
इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे.
मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा.
जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो धारण करतो
तोच पिता साक्षात मानावा
जन्म देतो निमित्त केवळ
हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले. विनीलविषयी.
लक्षवेधी असल्याने हा धागा थोड्या वाचनांनंतर उडवला किंवा वाचनमात्र केला तरी चालेल. चर्चा श्रामोंच्याच धाग्यावर चालली तर उत्तम आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आधार....!!
@ काळे काका
उदात्तीकरण
सुटका...!!
आनंद झाला
वाचतो आहे
नक्षलवाद फोफावतो तो
तेजगड
वर्तुळ
माझे मत
नकाशा बनवला कुणी?
मी व्याख्येत जातच नाही. कारण
व्याख्या न करता निषेध कश्याचा करणार?
वेल,
अजुनही...
ग्रेट! अभ्यासपूर्ण आणि नेमके
+१
+ १
अस्तित्वाचा प्रश्न....!!
+ १/ - १
भुरटे चोर
त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद
शोषित जनतेच्या मनात
धन्यवाद आ.रा. साहेब...
एक प्रश्न
या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात...
>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे
कदाचित...
वाह वा. पुन्हा एकदा छान पोस्ट.
+१
फॅक्ट्स
फारच छान
सलाम प्रसनदा !
उत्तम चर्चा!
छान चर्चा.
+१
+१११११
कृपया
मेधा पाटकर म्हणतात...
अजून सुटका नाही
मेधा पाटकर
धन्यवाद!
स्वतंत्र लेख
वेगळ्या धाग्याची गरज...!!
मागण्या आणि सरकारी प्रतिसाद
- काही घटकांचे इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण करणे.
(ओरीसा सरकारने २००७ सालीच ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे. परत केला जाईल).
- गोदावरीवरील ओरीसा-तेलंगणा भागातील पोलावरम प्रकल्प थांबवा.
(ह्या प्रकल्पाला ओरीसा सरकारचाच विरोध आहे आणि त्या विरोधात सरकारने आंध्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.)
- काही आदीवासींच्या जमिनी या बेकायदेशीररीत्या घेतल्या आहेत त्या त्यांना मिळाव्यात.
(या संदर्भात काही नक्की करायची गरज आहे कारण आदीवासींसंदर्भात काही कायदे वर्षानुवर्षे धाब्यावर बसवले गेले होते. नंतर झालेल्या विरोधात दोन आदीवासी मारले गेले होते, वगैरे.... सरकारने लक्ष घालायचे मान्य केले आहे)
- कोटापडी ते मानेगुडा कालवा (डेव्हलपमेंट?) हवा आहे.
(सरकारने मान्य केले आहे आणि रु. ५० लाखांची सर्वेक्षण आणि सुरवातीच्या कामासाठी तजवीज केली आहे.)
- तुरूंगात मरण पावलेल्या काही कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला भरपाई.
(सरकारचे म्हणणे आहे की ते इस्पितळात मरण पावले. त्या विरुद्ध खटला आहे. पण सरकार तो त्यांच्या बाजूने पुढे ढकलणार नाही...)
- शीला दी या माओ कमिटी सभासदेस तब्येतीच्या कारणानिमित्त सोडावे.
(त्यांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना सरकार सोडणार आहे.)
- दोन एकत्रीत मागण्या - खाणकाम थांबवावे आणि आंतर्राष्ट्रीय कंपन्यांशी असलेले त्या संदर्भातील व्यवहार तोडावेत.
(सरकारने म्हणले आहे की सर्व कायदे काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही ते बघितले जाईल, पुढे असे करार कसे करायचे ते बघितले जाईल, पुर्नवसन नीट केले जाईल पण असलेले करार राहतील. माओवाद्यांनी असलेले करार ठेवायला मान्यता दिली आहे.) (माझी टिपण्णी: म्हणजे याच कंपन्यांकडून हेच माओवादी परत पैसे घेण्यास मोकळे असे समजायचे का? नक्की काय साध्य झाले?)
- सीताण्णा नामक आदीवासीस अटक झाली आहे त्याला सोडावे.
(पोलीस रेकॉर्डप्रमाणे झालेली नाही, तरी देखील चौकशी केली जाईल).
- बालीमारा धरणासंदर्भात पुर्नवसनासाठी शेतकर्यांना भरपाई.
(सरकारचे म्हणणे आहे की आजपर्यंत काही तक्रारी आल्या नाहीत की भरपाई मिळाली नाही म्हणून. तरी देखील लक्ष घातले जाईल).
- नाल्को प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना न्याय दिला जावा.
(दिला जाईल)
- ऑपरेशन ग्रीन हंट थांबवा.
(जो पर्यंत तुमच्याकडून बेकायदेशीर कृत्ये होत नाहीत, शस्त्रे घेतली जात नाहीत, तो पर्यंत आमच्याकडूनही घेतली जाणार नाहीत).
- तुरूंगात असलेल्या अनेक आदीवासींना सोडावे.
(लहान कारणांसाठी पकडल्या गेलेल्यांना तात्काळ सोडले जाईल. माओ चळवळीशी संबंधीतांबद्दल १५ दिवसांत रिव्ह्यू चालू केले जातील.)
- सेंट्रल कमिटी मेंबर्सना सोडून द्या.
(यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रीया चालू केली गेली आहे.)
अतिरेक्यांशी वाटाघाटी कराव्यात का वेगळा मुद्दा आहे. पण वरील वाटाघाटींतून स्वतःची माणसे सोडवणे आणि ज्या खाणींना विरोध केला त्यांना एका अर्थी तसेच ठेवायची "परवानगी" देऊन स्वतःचे खंडणी उत्पन्न चालू ठेवायची तजवीज सोडल्यास यातून नक्की ठोस असे काय मिळाले? त्याचा तेथील आदीवासींना नक्की काय फायदा मिळाला?विषय वेगळा आहे...!
नवीन धागा