राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३)
सॅम माणेकशॉ भाग-१
सॅम माणेकशॉ भाग-२
अशा निधड्या छातीच्या फिल्ड मार्शलला पुढे पुढे (इंदिरा युगानंतर) मात्र उपेक्षेचे, मत्सराचे, असूयेचे धनी व्हावे लागले. अर्थात त्याची प्रत्यक्षात सुरूवात झाली होती ती १९६२ च्या चीन आक्रमणादरम्यान.
[हे थोडे विस्ताराने सांगितले पाहिजे. तसेच यात ज्या सेनाधिकार्यांची, ज्या राजकारण्यांची, नोकरशाहीतील पदाधिकार्यांची नावे/उल्लेख येतील ते सर्व देशाच्या जडणघडणीत सामील होतेच, पण शेवटी माणूस वैयक्तिक पातळीवर घसरला की, त्याच्या वर्तणूकीची सीमा कुठपर्यंत जाते ते पाहिले तर या लोकांना मोठे म्हणायचे तरी कशासाठी हा विचार सर्वसामान्यांच्या मनी येतोच....असो]
(१९६० ते १९६२ ~~ मेनन, नेहरू, थिमय्या)
१९५६-५७ च्या सुमारास स्वतंत्र भारताला थोडीशी स्थिरता येऊन देशाचे लक्ष हळुहळू कृषि आणि उद्योगधंद्याच्या प्रगतीकडे वळले. तशातच दुसरीकडे 'हिंदी-चिनी भाईभाई' या चीनच्या कावेबाज प्रचाराला शांतिप्रिय पंडित नेहरूही चकले आणि नेमक्या याच क्षणी व्ही.के.कृष्ण मेनन यांची संरक्षणमंत्री पदी निवड झाली. श्री.मेनन हे अत्यंत बुद्धीमान असल्याचे मानले जात होते पण त्याहीपेक्षा ते नेहरूंच्या गळ्यातील ताईत होते. श्री.मेनन यांना कोणत्याही गोष्टीत विरोध केला गेला तर नेहरू अस्वस्थ होत असत. श्री.मेनन यांनी सैन्यदळाचा आढावा घेतला, त्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी 'चीनी आक्रमणाचा वाढता धोका' ओळखून वेळीच सैन्याच्या आधुनिकीकरणाची गरज आहे असे प्रतिपादन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले [हा एक वेगळा विषय होईल...]. काहीतरी करत आहे हे दाखविण्यासाठी १९५८ मध्ये डेहराडून येथे सैनिकांसाठी युद्धशिक्षणाकरीता 'जंगल वॉरफेअर स्कूल' व 'कॉलेज ऑफ इन्फंट्री, महु येथे दुसरी संस्था चालू करण्यात आली. झाली तयारी श्री.मेनन यांच्या नजरेतून. १९६० उजाडले आणि त्यावेळचे चीफ ऑफ आर्मी जनरल थिमय्या हे इटलीला जाऊन "माऊंटेनरींग वॉरफेअर अँड स्ट्रटेजी" करून आल्यानंतर त्यांनी संरक्षण खात्याला आपल्याकडे आता तातडीने सैन्यात एक 'माऊंटेनरींग डिव्हीजन' सुरू करण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची लिखित स्वरूपाची सूचना केली. तिला श्री.मेनन यांनी केराची टोपली दाखवली, इतकेच नव्हे तर पं.नेहरू यांच्याकडून "असे केले तर आम्ही युध्दखोर आहोत असे चीनला वाटण्याची शक्यता आहे, मग दोन देशात तणावाचे वातावरण निर्माण होईल," असा जन.थिमय्या यांना निरोप दिला गेला. जनरल थिमय्या अस्वस्थ होणे स्वाभाविकच होते आणि ते मेनन यांचा विरोध जाणून होते. त्याला कारण म्हणजे जनरल ब्रिज मोहन कौल. [जे नेहरू परिवारातील तसेच काश्मिरमधील असल्याने मेनन यांच्या मर्जीतील.] मिलिटरीत 'क्वार्टरमास्टर जनरल' नावाचे एक मोठे पद असते जिचा अर्थखात्याशी संबंध असतो. सुप्रीम कमांडर या नात्याने त्या पदावर जनरल थिमय्या यांनी १९५९ मध्ये मेजर जनरल पी.एस.ग्यानी यांच्या नावाचे शिफारस केली होती....तिली मेनन यांनी मोडता घातला आणि संरक्षण मंत्री या हक्काने त्या जागी मे.जनरल बी.एम.कौल यांना नियुक्त केले. ही अपमानस्पद घटना मनी ठेवूनच जन.थिमय्या इटलीला गेले होते व परत आल्यानंतर पर्वतदलाच्या प्रस्तावाला दिलेली नामंजुरी याबद्दल ऑगस्ट १९६० मध्ये थेट मेनन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मेनन यांना मनातून ते नको होतेच. पण जनरल थिमय्यांची ही अस्वस्थता तोपर्यंत संसद सदस्यांपर्यंत पोचली असल्याने मेनननी थिमय्यांना नेहरूंच्याकडे पाठविले; नेहरूंनी मेनन यांची बाजू घेतली व नागरी प्रशासन आणि लष्कर यांच्यात ताण नको म्हणून थिमय्यांना पदाचा राजिनामा देण्यास सांगितला, तो त्यांनी लागलीच दिला. थिमय्यांनी राजिनामा तर दिलाच पण आपल्या राजिनाम्या मागील कारण संसदेपुढे सांगितले जावे अशी नेहरुंच्याकडे विनंती केली, ती त्यांनी मानली. मात्र धक्कादायक काय असेल ते हे की, संसदेत सांगताना, नेहरू म्हणाले, (त्यांच्याच भाषणातील वाक्य) : "“Gen.Thimayyaa’s action (Resigning the Post) is peculiarly unwise and most extraordinary thing to do." इतकेच काय पण संरक्षण मंत्री मेनन आणि जन.थिमय्या यांच्यात लष्करी व्यूहरचनेवरून काही वाद चालू होते याचाही त्यांनी साफ इन्कार केला. हा थिमय्या यांना मोठा धक्का होता....तसाच त्यांना मानणार्या त्यांच्या ज्युनिअर अधिकार्यांनादेखील ~ यात होते तीन प्रमुख अधिकारी (१) ले.जनरल एस.पी.पी.थोरात (२) ले.जनरल चौधरी आणि (३) मे.जनरल सॅम माणेकशॉ.
~~ आर्मीच्या सीनिऑरिटीच्या लिस्टमध्ये आता ले.जनरल एस.पी.पी.थोरात यांचे नाव अग्रभागी होते, त्यामुळे त्यांच्या सहकार्यांची उद्या थोरातसाहेबांच्या नावाची 'भारताचे नवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा होणार अशी अटकळ होती. पण इथेही 'मेनन मॅजिक ऑन नेहरू' कामी आली आणि एका रात्रीत एस.पी.पी.थोरातांच्या जागी त्यावेळचे पश्चिम कमांडचे प्रमुख ले.जनरल पी.एन.थापर (जे जन.कौल यांचे निकटचे स्नेही होते) यांच्या नावाची 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा दिल्लीतून झाली. इतकेच नव्हे तर दुसर्याच दिवशी बी.एम.कौल यांनाही प्रमोशन देऊन लेफ्ट्नंट जनरल करण्यात आले....आणि त्यांना खाते दिले "चीफ ऑफ जनरल स्टाफ"; म्हणजे ही जागा जनरलपदाच्या तोडीचीच व देशातील सर्व प्रमुख लष्करी ठाणे आणि संस्था यातील प्रमुखांच्या हालचालीवर नजर ठेवणारी. या निवडीला एकजात लष्करी अधिकारी वर्गाने विरोध केला पण मेनन पुढे काहीही चालत नव्हते. याच काळात मे.जनरल सॅम माणेकशॉ इंडियन मिलिटरी अॅकेडमीचे कमांडंट होते. ते आपले दोन गुरु १. जन.थिमय्या आणि २. जन.थोरात यांच्या अपमानस्पद कारकिर्द समाप्तीमुळे कमालीचे अस्वस्थ झाले होते आणि नेहरूंशी असलेली त्यांची सलगी मेनन आणि कौल यांना खटकत असल्याने या दोघांनी "सॅम माणेकशॉ हे वरिष्ठांविषयी परदेशात गैरसमजूत पसरवितात आणि त्यांना भारतापेक्षा इंग्लंड प्रिय आहे.." असली काहीतरी बेताल वक्तव्ये करून सॅमविरूध्द "कोर्ट ऑफ इन्क्वायरी" स्थापन केले. (त्याला दुसरेही एक सुडाचे राजकारण होतेच. 'थिमय्या' प्रकरणाचा संसदेत थोडा गाजावाजा होणार असे दिसताच 'थिमय्या कसे इन्कॉम्पिट्न्ट जनरल आहेत' असे त्यांच्या नजदिकच्या अधिकार्यांनी वेळ आल्यास सांगावे असे मेनन यांनी ज्यांना सुचविले आणि ज्यानी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला त्यात अग्रभागी सॅम माणेकशॉ होते, ही चीडदेखील मेनन यांच्या मनात ठसठसत होतीच.)
[मिपा वाचकांचा इथे थोडासा गोंधळ उडेल....कारण नागरी व लष्करी अधिकार्यांच्या विरुद्ध माणेकशॉ यांनी ओपनली उदगार काढल्याचे एकवेळ समजेल पण 'इंग्लंड' चा इथे काय संबंध? तर तोही एक हास्यास्पद आरोप होता. आयएमआयच्या माणेकशॉ यांच्या ऑफिसमधील टेबलवर जे काही दोनचार व्यक्तिगत फोटो होते, त्यात एक होता क्वीन व्हिक्टोरियाचा जी एकेकाळी इंग्लंडची महाराणी होती....ही बाब स्वतंत्र भारतातील नोकरशाहीला खटकत होती आणि त्याबाबतचा रिपोर्ट खुद्द नेहरूंपर्यंत पोचला होता. पण नेहरूंना त्या फोटोचे काही वाटले नव्हते.]
१९६१ च्या मध्यावधीस कामकाज सुरू केलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीमधून अर्थातच काही निष्प्णण झाले नाही आणि तिने सॅमना सर्व आरोपातून मुक्त केले. मेनन आणि कौल यांच्या अंगाचे तीळपापड झाले आणि तशातच चीनचा ड्रॅगन इकडे चालून आल्यानंतर या दोघांची लायकी काय आहे हे सार्या देशाला समजले. मग याक्षणी नूतन जनरल पी.एल.थापर कुठे होते? तर ते फिरत होते आपली कागदपत्रे घेऊन ले.जन.कौल यांच्या पाठीमागे. संरक्षण मंत्र्याने देशाच्या सुप्रीम कमांडरला, थापरना अगदी हरकाम्या (त्यांना खाजगीत errand boy असे म्हणत) करून सोडले होते.
जन.थापर हे मेनन यांच्यादृष्टीने कसे एक खेळणे होते याचे वर्णन सुप्रसिद्ध पत्रकार श्री.डी.आर.मंकेकर (ज्यांचे कृष्ण मेनन यांच्याशी अगदी 'अरेतुरे' चे संबंध होते) यांनी त्यांच्या "The Guilty Men of 1962" या गाजलेल्या पुस्तकात केले आहे. तो खास उतारा इंग्रजीमधूनच वाचण्यासारखा आहे : "it was apparent that General Thapar's greatest qualification for the post of the chief of army staff was his malleability-unlike Thorat whom Menon considered 'uppity'. Menon hoped that a man (i.e. Gen.P.L.Thapar) with such unspectacular service record would be beholden to him for being made the army chief and eat out of his hands." During his tenure, Thapar is said to have deliberately and instructions from Menon-sidelined Manekshaw. But even Menon found Thapar useless. So much so that once Menon remarked to Mankekar that Thapar did not even know the places in NEFA.
१९६२ च्या नामुष्कीच्या पराभवानंतर या सगळ्या कचर्याची नेहरूंनी हकालपट्टी केली आणि त्यांनी माणेकशॉ यांना सन्मानाने दिल्लीला परत बोलाविले (खरं तर नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या मनात त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनाच थापर यांच्यानंतर 'चीफ ऑफ आर्मी' करायचे होते, पण त्याला खुद्द माणेकशॉ यानीच नकार दिला कारण ते सीनिऑरिटीला मानत होते आणि त्यांच्या दृष्टीने त्यावेळी प्रथम जन.चौधरी व नंतर जन.कुमारमंगलम हे त्यांना सीनिअर होते. मग खरेच या दोन जनरल्स नंतरच माणेकशॉ यांनी चीफची जबाबदारी स्वीकारली) व नेफा आघाडीवर जाण्यास सांगून अधिकार्यांच्यात व सैनिकांत मनोधैर्य कायम करण्याची जबाबदारी सोपविली. माणेकशॉ यांनी सैनिकांसमोर केलेले भाषण तर प्रसिध्द आहेच (जे लेखमालेच्या या अगोदरच्या भागात दिले आहेच) पण त्या अगोदर त्यांनी नेफा आघाडीवर असलेल्या लष्काराच्या सर्व तुकड्यांच्या अधिकार्यांची सभा घेतली. त्यांचे कनिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणे सभेची तयारी करीत होते...सर्व अधिकारी एकेक करून तिथे आले, जमले, सभेसाठी सज्ज झाले....आणि दुसरीकडून जनरल माणेकशॉ यांची हसरी पण तितकीच जरब वाटणारी आकृती त्या ठि़काणी आली. खाड्कन उठून सर्व अधिकार्यांनी त्याना रितसर सलामी ठोकली आणि ते आता खुर्चिवर टेकतात न टेकतात तोच....माणेकशॉ यांनी भाषण केले :
"मित्रांनो, मी आलोय...चला काम सुरू करू या..."
बस्स....संपले भाषण आणि सॅमबहादूर तंबूच्या बाहेर !
"जनरल माणेकशॉ आणि त्यांचे लाडके सैनिक"
मागील दोन भागात १९७३ पर्यंतचा आढावा घेतलेला आहेच. त्यामुळे तो काळ परत इथे न आणता त्यांच्या निवृत्तीच्यावेळी झालेल्या अन्यायावर येतो.
आपली अशी कल्पना असते की असूया, मत्सर नागरी सेवेतच असतो. पण लष्करातही तो कुठल्या पातळीपर्यंत जातो हे समजले तर सर्वसामान्य नागरिकांना त्यावर विश्वास ठेवणे जड जाते. जनरल सॅम माणेकशॉ यांची सेवा काहीच महिने राहिले असता इंदिराजींना त्यांना "स्वतंत्र भारताचे प्रथम फिल्ड मार्शल" या मानद किताबाने गौरविण्यात यावे असे वाटले व त्यानुसार त्यांचे त्यावेळचे सचिव पी.एन.हक्सर यांच्यामार्फत संरक्षण खात्यास तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्याअगोदर बांगला देश युद्ध विजय, बॅन्कांचे राष्ट्रीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद आदी विक्रमी कामगिरीमुळे इंदिरा गांधी देशभरात "हीरो" झाल्याच होत्या त्यामुळे संरक्षण खात्यानेही त्यांच्या या सुचनेची तातडीने अंमलबजावणी करून प्रस्ताव राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी (तिन्ही दलाचे सरसेनापती या नात्याने) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
१९६९ ते १९७३ या काळात श्री.आय.राममोहन राव हे आयएएस अधिकारी मिलिटरीचे पब्लिक रिलेशन्स ऑफीसर होते. त्यांनी 'सॅम माणेकशॉ - जनरल ते फिल्ड मार्शल' घडामोडी पाहिल्या. त्यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. प्रक्रिया तर सुरू झाली पण इथे आता अडचण अशी आली की; 'फिल्ड मार्शल' या पदाबरोबर 'बाय डिफॉल्ट' नेव्ही आणि एअर फोर्स यांचे प्रमुखपददेखील माणेकशॉ यांच्याकडे जाणार आणि साहजिकच उच्चपदस्थांत असूयेने जन्म घेतला. डिफेन्स मिनिस्ट्रीने नेव्ही आणि एअर फोर्स प्रमुखांकडे हे पद माणेकशॉ यांना देण्याबाबत विचारणा केली असता अॅडमिरल एस.एम.नंदा यांनी कागदपत्रावर सही केली मात्र हवाई दल प्रमुख पी.सी.लाल यांनी माणेकशॉ याना "फिल्ड मार्शल" हे पद देणास विरोध केला. त्यांनी आपला विरोध लेखी स्वरुपात नोंदविला जो श्री.राममोहन राव यांच्याकडे आला. एसीएम लाल म्हणतात, "The three Services had operated as equal partners in the Bangladesh war, and they had demonstrated their ability to work effectively together without having a Super Chief sitting over them....I saw in the proposed arrangement a positive danger to the frank and free discussion, particularly if the CDS [Chief of Defence Staff] happened to be excessively assertive and intolerant of the ideas of others." परत थांबली ती फाईल....लष्करातून मंत्रालयात..मंत्रालयातून हक्सर,...हक्सरकडून इंदिराजी. इतका वेळ की....आता कायद्यानुसार माणेकशॉ यांची सेवा दोन आठवडे उरली होती....शेवटी बाईंनी आपल्या अधिकारात त्यावर शेरा मारला आणि मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनकडे फाईल गेली. त्यावर त्यावेळचे राष्ट्रपती गिरी यांनी संमतीदर्शक सही केली. म्हणजे सेवा संपण्यास फक्त १३ दिवस राहील होते.
"फिल्ड मार्शल पदाचे बॅटन" जे राष्ट्रपतींनी प्रदान केले.
(~~~~ पण दुर्दैवाने या पदाला ना पगार होता, ना भत्ते.....ना कुठे जाण्यासाठी एखादी कार.)
इन्द्रा
(पुढील भागात > पेन्शन प्रकरण, निवृत्तीनंतरचे जीवन, कुटुंबिय)
अशा निधड्या छातीच्या फिल्ड मार्शलला पुढे पुढे (इंदिरा युगानंतर) मात्र उपेक्षेचे, मत्सराचे, असूयेचे धनी व्हावे लागले. अर्थात त्याची प्रत्यक्षात सुरूवात झाली होती ती १९६२ च्या चीन आक्रमणादरम्यान.
[हे थोडे विस्ताराने सांगितले पाहिजे. तसेच यात ज्या सेनाधिकार्यांची, ज्या राजकारण्यांची, नोकरशाहीतील पदाधिकार्यांची नावे/उल्लेख येतील ते सर्व देशाच्या जडणघडणीत सामील होतेच, पण शेवटी माणूस वैयक्तिक पातळीवर घसरला की, त्याच्या वर्तणूकीची सीमा कुठपर्यंत जाते ते पाहिले तर या लोकांना मोठे म्हणायचे तरी कशासाठी हा विचार सर्वसामान्यांच्या मनी येतोच....असो]
(१९६० ते १९६२ ~~ मेनन, नेहरू, थिमय्या)
१९५६-५७ च्या सुमारास स्वतंत्र भारताला थोडीशी स्थिरता येऊन देशाचे लक्ष हळुहळू कृषि आणि उद्योगधंद्याच्या प्रगतीकडे वळले. तशातच दुसरीकडे 'हिंदी-चिनी भाईभाई' या चीनच्या कावेबाज प्रचाराला शांतिप्रिय पंडित नेहरूही चकले आणि नेमक्या याच क्षणी व्ही.के.कृष्ण मेनन यांची संरक्षणमंत्री पदी निवड झाली. श्री.मेनन हे अत्यंत बुद्धीमान असल्याचे मानले जात होते पण त्याहीपेक्षा ते नेहरूंच्या गळ्यातील ताईत होते. श्री.मेनन यांना कोणत्याही गोष्टीत विरोध केला गेला तर नेहरू अस्वस्थ होत असत. श्री.मेनन यांनी सैन्यदळाचा आढावा घेतला, त्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी 'चीनी आक्रमणाचा वाढता धोका' ओळखून वेळीच सैन्याच्या आधुनिकीकरणाची गरज आहे असे प्रतिपादन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले [हा एक वेगळा विषय होईल...]. काहीतरी करत आहे हे दाखविण्यासाठी १९५८ मध्ये डेहराडून येथे सैनिकांसाठी युद्धशिक्षणाकरीता 'जंगल वॉरफेअर स्कूल' व 'कॉलेज ऑफ इन्फंट्री, महु येथे दुसरी संस्था चालू करण्यात आली. झाली तयारी श्री.मेनन यांच्या नजरेतून. १९६० उजाडले आणि त्यावेळचे चीफ ऑफ आर्मी जनरल थिमय्या हे इटलीला जाऊन "माऊंटेनरींग वॉरफेअर अँड स्ट्रटेजी" करून आल्यानंतर त्यांनी संरक्षण खात्याला आपल्याकडे आता तातडीने सैन्यात एक 'माऊंटेनरींग डिव्हीजन' सुरू करण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची लिखित स्वरूपाची सूचना केली. तिला श्री.मेनन यांनी केराची टोपली दाखवली, इतकेच नव्हे तर पं.नेहरू यांच्याकडून "असे केले तर आम्ही युध्दखोर आहोत असे चीनला वाटण्याची शक्यता आहे, मग दोन देशात तणावाचे वातावरण निर्माण होईल," असा जन.थिमय्या यांना निरोप दिला गेला. जनरल थिमय्या अस्वस्थ होणे स्वाभाविकच होते आणि ते मेनन यांचा विरोध जाणून होते. त्याला कारण म्हणजे जनरल ब्रिज मोहन कौल. [जे नेहरू परिवारातील तसेच काश्मिरमधील असल्याने मेनन यांच्या मर्जीतील.] मिलिटरीत 'क्वार्टरमास्टर जनरल' नावाचे एक मोठे पद असते जिचा अर्थखात्याशी संबंध असतो. सुप्रीम कमांडर या नात्याने त्या पदावर जनरल थिमय्या यांनी १९५९ मध्ये मेजर जनरल पी.एस.ग्यानी यांच्या नावाचे शिफारस केली होती....तिली मेनन यांनी मोडता घातला आणि संरक्षण मंत्री या हक्काने त्या जागी मे.जनरल बी.एम.कौल यांना नियुक्त केले. ही अपमानस्पद घटना मनी ठेवूनच जन.थिमय्या इटलीला गेले होते व परत आल्यानंतर पर्वतदलाच्या प्रस्तावाला दिलेली नामंजुरी याबद्दल ऑगस्ट १९६० मध्ये थेट मेनन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मेनन यांना मनातून ते नको होतेच. पण जनरल थिमय्यांची ही अस्वस्थता तोपर्यंत संसद सदस्यांपर्यंत पोचली असल्याने मेनननी थिमय्यांना नेहरूंच्याकडे पाठविले; नेहरूंनी मेनन यांची बाजू घेतली व नागरी प्रशासन आणि लष्कर यांच्यात ताण नको म्हणून थिमय्यांना पदाचा राजिनामा देण्यास सांगितला, तो त्यांनी लागलीच दिला. थिमय्यांनी राजिनामा तर दिलाच पण आपल्या राजिनाम्या मागील कारण संसदेपुढे सांगितले जावे अशी नेहरुंच्याकडे विनंती केली, ती त्यांनी मानली. मात्र धक्कादायक काय असेल ते हे की, संसदेत सांगताना, नेहरू म्हणाले, (त्यांच्याच भाषणातील वाक्य) : "“Gen.Thimayyaa’s action (Resigning the Post) is peculiarly unwise and most extraordinary thing to do." इतकेच काय पण संरक्षण मंत्री मेनन आणि जन.थिमय्या यांच्यात लष्करी व्यूहरचनेवरून काही वाद चालू होते याचाही त्यांनी साफ इन्कार केला. हा थिमय्या यांना मोठा धक्का होता....तसाच त्यांना मानणार्या त्यांच्या ज्युनिअर अधिकार्यांनादेखील ~ यात होते तीन प्रमुख अधिकारी (१) ले.जनरल एस.पी.पी.थोरात (२) ले.जनरल चौधरी आणि (३) मे.जनरल सॅम माणेकशॉ.
~~ आर्मीच्या सीनिऑरिटीच्या लिस्टमध्ये आता ले.जनरल एस.पी.पी.थोरात यांचे नाव अग्रभागी होते, त्यामुळे त्यांच्या सहकार्यांची उद्या थोरातसाहेबांच्या नावाची 'भारताचे नवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा होणार अशी अटकळ होती. पण इथेही 'मेनन मॅजिक ऑन नेहरू' कामी आली आणि एका रात्रीत एस.पी.पी.थोरातांच्या जागी त्यावेळचे पश्चिम कमांडचे प्रमुख ले.जनरल पी.एन.थापर (जे जन.कौल यांचे निकटचे स्नेही होते) यांच्या नावाची 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा दिल्लीतून झाली. इतकेच नव्हे तर दुसर्याच दिवशी बी.एम.कौल यांनाही प्रमोशन देऊन लेफ्ट्नंट जनरल करण्यात आले....आणि त्यांना खाते दिले "चीफ ऑफ जनरल स्टाफ"; म्हणजे ही जागा जनरलपदाच्या तोडीचीच व देशातील सर्व प्रमुख लष्करी ठाणे आणि संस्था यातील प्रमुखांच्या हालचालीवर नजर ठेवणारी. या निवडीला एकजात लष्करी अधिकारी वर्गाने विरोध केला पण मेनन पुढे काहीही चालत नव्हते. याच काळात मे.जनरल सॅम माणेकशॉ इंडियन मिलिटरी अॅकेडमीचे कमांडंट होते. ते आपले दोन गुरु १. जन.थिमय्या आणि २. जन.थोरात यांच्या अपमानस्पद कारकिर्द समाप्तीमुळे कमालीचे अस्वस्थ झाले होते आणि नेहरूंशी असलेली त्यांची सलगी मेनन आणि कौल यांना खटकत असल्याने या दोघांनी "सॅम माणेकशॉ हे वरिष्ठांविषयी परदेशात गैरसमजूत पसरवितात आणि त्यांना भारतापेक्षा इंग्लंड प्रिय आहे.." असली काहीतरी बेताल वक्तव्ये करून सॅमविरूध्द "कोर्ट ऑफ इन्क्वायरी" स्थापन केले. (त्याला दुसरेही एक सुडाचे राजकारण होतेच. 'थिमय्या' प्रकरणाचा संसदेत थोडा गाजावाजा होणार असे दिसताच 'थिमय्या कसे इन्कॉम्पिट्न्ट जनरल आहेत' असे त्यांच्या नजदिकच्या अधिकार्यांनी वेळ आल्यास सांगावे असे मेनन यांनी ज्यांना सुचविले आणि ज्यानी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला त्यात अग्रभागी सॅम माणेकशॉ होते, ही चीडदेखील मेनन यांच्या मनात ठसठसत होतीच.)
[मिपा वाचकांचा इथे थोडासा गोंधळ उडेल....कारण नागरी व लष्करी अधिकार्यांच्या विरुद्ध माणेकशॉ यांनी ओपनली उदगार काढल्याचे एकवेळ समजेल पण 'इंग्लंड' चा इथे काय संबंध? तर तोही एक हास्यास्पद आरोप होता. आयएमआयच्या माणेकशॉ यांच्या ऑफिसमधील टेबलवर जे काही दोनचार व्यक्तिगत फोटो होते, त्यात एक होता क्वीन व्हिक्टोरियाचा जी एकेकाळी इंग्लंडची महाराणी होती....ही बाब स्वतंत्र भारतातील नोकरशाहीला खटकत होती आणि त्याबाबतचा रिपोर्ट खुद्द नेहरूंपर्यंत पोचला होता. पण नेहरूंना त्या फोटोचे काही वाटले नव्हते.]
१९६१ च्या मध्यावधीस कामकाज सुरू केलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीमधून अर्थातच काही निष्प्णण झाले नाही आणि तिने सॅमना सर्व आरोपातून मुक्त केले. मेनन आणि कौल यांच्या अंगाचे तीळपापड झाले आणि तशातच चीनचा ड्रॅगन इकडे चालून आल्यानंतर या दोघांची लायकी काय आहे हे सार्या देशाला समजले. मग याक्षणी नूतन जनरल पी.एल.थापर कुठे होते? तर ते फिरत होते आपली कागदपत्रे घेऊन ले.जन.कौल यांच्या पाठीमागे. संरक्षण मंत्र्याने देशाच्या सुप्रीम कमांडरला, थापरना अगदी हरकाम्या (त्यांना खाजगीत errand boy असे म्हणत) करून सोडले होते.
जन.थापर हे मेनन यांच्यादृष्टीने कसे एक खेळणे होते याचे वर्णन सुप्रसिद्ध पत्रकार श्री.डी.आर.मंकेकर (ज्यांचे कृष्ण मेनन यांच्याशी अगदी 'अरेतुरे' चे संबंध होते) यांनी त्यांच्या "The Guilty Men of 1962" या गाजलेल्या पुस्तकात केले आहे. तो खास उतारा इंग्रजीमधूनच वाचण्यासारखा आहे : "it was apparent that General Thapar's greatest qualification for the post of the chief of army staff was his malleability-unlike Thorat whom Menon considered 'uppity'. Menon hoped that a man (i.e. Gen.P.L.Thapar) with such unspectacular service record would be beholden to him for being made the army chief and eat out of his hands." During his tenure, Thapar is said to have deliberately and instructions from Menon-sidelined Manekshaw. But even Menon found Thapar useless. So much so that once Menon remarked to Mankekar that Thapar did not even know the places in NEFA.
१९६२ च्या नामुष्कीच्या पराभवानंतर या सगळ्या कचर्याची नेहरूंनी हकालपट्टी केली आणि त्यांनी माणेकशॉ यांना सन्मानाने दिल्लीला परत बोलाविले (खरं तर नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या मनात त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनाच थापर यांच्यानंतर 'चीफ ऑफ आर्मी' करायचे होते, पण त्याला खुद्द माणेकशॉ यानीच नकार दिला कारण ते सीनिऑरिटीला मानत होते आणि त्यांच्या दृष्टीने त्यावेळी प्रथम जन.चौधरी व नंतर जन.कुमारमंगलम हे त्यांना सीनिअर होते. मग खरेच या दोन जनरल्स नंतरच माणेकशॉ यांनी चीफची जबाबदारी स्वीकारली) व नेफा आघाडीवर जाण्यास सांगून अधिकार्यांच्यात व सैनिकांत मनोधैर्य कायम करण्याची जबाबदारी सोपविली. माणेकशॉ यांनी सैनिकांसमोर केलेले भाषण तर प्रसिध्द आहेच (जे लेखमालेच्या या अगोदरच्या भागात दिले आहेच) पण त्या अगोदर त्यांनी नेफा आघाडीवर असलेल्या लष्काराच्या सर्व तुकड्यांच्या अधिकार्यांची सभा घेतली. त्यांचे कनिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणे सभेची तयारी करीत होते...सर्व अधिकारी एकेक करून तिथे आले, जमले, सभेसाठी सज्ज झाले....आणि दुसरीकडून जनरल माणेकशॉ यांची हसरी पण तितकीच जरब वाटणारी आकृती त्या ठि़काणी आली. खाड्कन उठून सर्व अधिकार्यांनी त्याना रितसर सलामी ठोकली आणि ते आता खुर्चिवर टेकतात न टेकतात तोच....माणेकशॉ यांनी भाषण केले :
"मित्रांनो, मी आलोय...चला काम सुरू करू या..."
बस्स....संपले भाषण आणि सॅमबहादूर तंबूच्या बाहेर !
"जनरल माणेकशॉ आणि त्यांचे लाडके सैनिक"
मागील दोन भागात १९७३ पर्यंतचा आढावा घेतलेला आहेच. त्यामुळे तो काळ परत इथे न आणता त्यांच्या निवृत्तीच्यावेळी झालेल्या अन्यायावर येतो.
आपली अशी कल्पना असते की असूया, मत्सर नागरी सेवेतच असतो. पण लष्करातही तो कुठल्या पातळीपर्यंत जातो हे समजले तर सर्वसामान्य नागरिकांना त्यावर विश्वास ठेवणे जड जाते. जनरल सॅम माणेकशॉ यांची सेवा काहीच महिने राहिले असता इंदिराजींना त्यांना "स्वतंत्र भारताचे प्रथम फिल्ड मार्शल" या मानद किताबाने गौरविण्यात यावे असे वाटले व त्यानुसार त्यांचे त्यावेळचे सचिव पी.एन.हक्सर यांच्यामार्फत संरक्षण खात्यास तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्याअगोदर बांगला देश युद्ध विजय, बॅन्कांचे राष्ट्रीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद आदी विक्रमी कामगिरीमुळे इंदिरा गांधी देशभरात "हीरो" झाल्याच होत्या त्यामुळे संरक्षण खात्यानेही त्यांच्या या सुचनेची तातडीने अंमलबजावणी करून प्रस्ताव राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी (तिन्ही दलाचे सरसेनापती या नात्याने) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
१९६९ ते १९७३ या काळात श्री.आय.राममोहन राव हे आयएएस अधिकारी मिलिटरीचे पब्लिक रिलेशन्स ऑफीसर होते. त्यांनी 'सॅम माणेकशॉ - जनरल ते फिल्ड मार्शल' घडामोडी पाहिल्या. त्यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. प्रक्रिया तर सुरू झाली पण इथे आता अडचण अशी आली की; 'फिल्ड मार्शल' या पदाबरोबर 'बाय डिफॉल्ट' नेव्ही आणि एअर फोर्स यांचे प्रमुखपददेखील माणेकशॉ यांच्याकडे जाणार आणि साहजिकच उच्चपदस्थांत असूयेने जन्म घेतला. डिफेन्स मिनिस्ट्रीने नेव्ही आणि एअर फोर्स प्रमुखांकडे हे पद माणेकशॉ यांना देण्याबाबत विचारणा केली असता अॅडमिरल एस.एम.नंदा यांनी कागदपत्रावर सही केली मात्र हवाई दल प्रमुख पी.सी.लाल यांनी माणेकशॉ याना "फिल्ड मार्शल" हे पद देणास विरोध केला. त्यांनी आपला विरोध लेखी स्वरुपात नोंदविला जो श्री.राममोहन राव यांच्याकडे आला. एसीएम लाल म्हणतात, "The three Services had operated as equal partners in the Bangladesh war, and they had demonstrated their ability to work effectively together without having a Super Chief sitting over them....I saw in the proposed arrangement a positive danger to the frank and free discussion, particularly if the CDS [Chief of Defence Staff] happened to be excessively assertive and intolerant of the ideas of others." परत थांबली ती फाईल....लष्करातून मंत्रालयात..मंत्रालयातून हक्सर,...हक्सरकडून इंदिराजी. इतका वेळ की....आता कायद्यानुसार माणेकशॉ यांची सेवा दोन आठवडे उरली होती....शेवटी बाईंनी आपल्या अधिकारात त्यावर शेरा मारला आणि मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनकडे फाईल गेली. त्यावर त्यावेळचे राष्ट्रपती गिरी यांनी संमतीदर्शक सही केली. म्हणजे सेवा संपण्यास फक्त १३ दिवस राहील होते.
"फिल्ड मार्शल पदाचे बॅटन" जे राष्ट्रपतींनी प्रदान केले.
(~~~~ पण दुर्दैवाने या पदाला ना पगार होता, ना भत्ते.....ना कुठे जाण्यासाठी एखादी कार.)
इन्द्रा
(पुढील भागात > पेन्शन प्रकरण, निवृत्तीनंतरचे जीवन, कुटुंबिय)Book traversal links for राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच
वाचनीय.
टेक्निकली फिल्ड मार्शल ह्या
पे फिक्सेशन
१३०० रू. हे ही सेवानिवृत्ती
जनरल जेकब
कोण बॉ?
या भागात अपेक्षित नावांवर
अगदी अगदी!
जनरल थोरात यांचे आत्मचरित्र ...
भाषेचे महत्व
दंडवत..
हे आपल्याकडून अपेक्षित नाही.
त्यांच्याकडे उत्तर नसते
?
थत्ते काका, टापरे लावलेला
अजून एक या काळातली
स्पष्टवक्ते
शांतिप्रिय (?) नेहरू
होय. ते शांतिप्रिय नव्हते तर
सुरेख लेखमाला
व्ही.के.कृष्ण मेनन...!
पण थोडक्यात इतका बुद्धीमान
माहितीपूर्ण लेखमाला!
लेखमाला
लेखमाला
अतिशय वाचनीय.. पुढच्या
शांतिप्रिय नेहरू....
'फॉरवर्ड पॉलिसी'
स्वतंत्र लेखमाला
दुसरं महायुद्ध
वाचनीय
हेच म्हणतो
वाचतोय...
इथे नेहरू आणि चीन पॉलिसी यावर
नेहरु
असेच काहीसे वाचले होते
वाचतो आहे...
संदर्भ
अडचण नाही
सोशल अॅन्थ्रॉपॉलीजी
सिंगल बुलेट बॅरेल
मशिनगन
एनफिल्ड .३०३
बंदुकींविषयी थोडे
विचार आणि माहितीपूर्ण प्रतिसाद
अभ्यासपूर्ण माहिती
आराचा अप्रतिम प्रतिसाद आणि
+१
एके ४७ बरीच जुनी आहे...