काळेसाहेब, अहो तुम्ही त्या तरुणाच्या भाबड्या भाषणात वाहून गेलात ह्याचे आश्चर्य वाटते. अहो तो पुढला गर्भ जो कुणी आईनस्टाईन किंवा संत असू शकतो तो कधी? जेव्हा त्याला नीट खायलाप्यायला असेल, तो/ती शिकू शकेल, व्यवस्थित विचार करून जगू शकेल तेव्हाच ना?
आणि असा लाखात एखादा निघणार बाकी सार्या पिलावळीचे काय?
संतती वाढती ठेवून आम्हाला कामाला जास्ती हात मिळतात हाही त्यातलाच एक विचार! अरे कामाला मिळणारे हात हे कामाजोगे होईपर्यंतच्या काळाचा विचार करा! जन्मापासून मधली १८ वर्षे ते जीव कोण वाढवणार, कसे वाढवणार? प्रश्नचप्रश्न.
अशा भोळ्या समजुतीत अडकल्यानेच आपण लोकसंख्येचे नियंत्रण करु शकलो नाही आहोत.
एक क्षणिक भावनिक आवाहन ह्यापलीकडे माझ्या दॄष्टीने ह्याला किंमत नाही.
(सज्जड)चतुरंग
अगदी हेच म्हणते...
>>आणि असा लाखात एखादा निघणार बाकी सार्या पिलावळीचे काय? हा प्रश्न ही अगदी खरा...मग पोसता येत नाही म्हणून पडेल ती कामं करणे आहेच त्यांच्या नशिबी मग झोपडपट्टी, आतंकवादी हे सगळं तिकडूनच येतं पण खरंतर काळेकाका त्याला काही ज्ञान देण्याच्या फंदात नाही पडले तेच बरं...गाढवापूढे वाचली गीता...असं आहे त्या अजनबीचं...
अवांतरः पण ये कथा बोले तो चालू होते ही खतम हो गयी... :D
दिपाली :)
त्यातून एक आईनस्टाईन आणी १०० कसाब निघणार असतील तर???? :?
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
कसली पाण्चट पाण्चट लोकं भेटतात हो काका तुम्हाला ? आणि त्यांचे पाण्चट अनुभव तुम्ही अगदी लक्षात ठेऊन तुम्ही लेख ही लिहीता ? कमाल आहे !!
असो .. पुढील अनुभव लेखणास शुभेच्छा !!
--(सहि विडंबण फार प्रयत्न करून टाळलं आहे) टारझन
सहमत आहे!
निवांत बागेत बसलेलो असताना मला प्रश्न विचारायला आलं कुणीतरी. आधीच कामानं थकलेलो त्यात ह्यांचे प्रश्न. दिलं तिच्यायला जे मनात आले ते ठोकून.
असा लेख त्यानेही लिहिला असेल कुठल्यातरी पाकिस्तानी साईटवर?
टारझन-जी,
खरं सांगायचं तर संधी मिळाल्यास अशा (पांचट) लोकांशी मी आवर्जून बोलतो. इथं इंडोनेशयातही कमी मिळकतीच्या माणसांशी - माझे कामगार, माझा ड्रायव्हर, बाजारात भेटणारे व थोडेसे ओळखीचे झालेले - मी आवर्जून व मुद्दाम बोलतो, खास करून राजकारण/समाजकारण या विषयांवर, कारण त्यांचं मत "पाचामुखी परमेश्वर" असतं व ते जे होईल असं वर्तवतात ते हमखास होतं.
थोडक्यात काय कीं "कोण" बोलतो यापेक्षा तो "काय" बोलतो याला मी महत्व देतो.
आमचे एकेकाळचे हुकुमशहा सुहार्तो यांच्याबद्दल ही गरीब माणसं जितकं प्रेमानं बोलतात ते ऐकून आश्चर्य वाटतं. कारण या माणसाचं अद्याप एकही स्मारक या देशात झालेलं नाही! पण गरीब लोक मनापासून बोलतात, कारण त्याकाळी किमती कमी व परवडणार्या होत्या. रस्त्यावर गुन्हेगारी शून्य होती. म्हणून त्याच्याबद्दल अशा भावना आहेत. ते त्यांच्या मनतलं बोलतात मला जे ऐकायला आवडेल ते नाहीं बोलत. व मी ते बोलणे एंजॉय करतो.
एलीट लोक वेगळं बोलतात!
पण एकूण प्रतिसादांचा रोख पाहून व "पाचामुखी परमेश्वर" हे तत्व वापरून हा लेख चुकीच्या जागी पोस्ट केला (परी तू जागा चुकलासी) याची जाणीव झाली व तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावी लिखाणात मी जास्त सारासार विचार करून योग्य लेख पोस्ट करीन. सकारात्मक सल्ल्याबद्दल धन्यवाद!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
काळे काका ... "पाचामुखी परमेश्वर" =)) प्लिज !!
आहो .. काही तरी *त्त्यासारख्याच्या बडबडीचा लेख बनवलाय तुम्ही !! आणि हा काय विचार आहे होय ? मग आम्ही तर अशा विचारांवर १०० लेख बनवू आणि टाकू !! हा विचार पोचवण्यात हाशील ते काय ? काहीही विचार आहेत .. आणि त्यामुळे लेखही काहीही झालाय !!! तुम्ही नको त्या गोष्टीचा विचार पार किस पाडेपर्यंत करता असं अनुमान निघतंय आता !
असो, स्वांतसुखाय लेखनास बंदी नसते :) चालू द्या !!
एखाद विडंबण लिहीण्याबाबद विचार करतोय आता .
- (अल्ला के घर धीर है लेकिन सुधीर नही) टारझन
चतुरंग-जी,
हे माझं मत म्हणून नाहीं सांगितलं. माझा या संभाषणावर विश्वास बसला असं कुठलं वाक्य दिसलं तुम्हाला? मी म्हटलं की संततिनियमाविरुद्ध मी अनेक मुद्दे ऐकले होते, पण हा मुद्दा कधी ऐकला नव्हता!
या माणसांना ही मतं उपजत फुटत नाहींत, तर त्यांना कुणीतरी शिकवण देऊन असली मतं पटवून देतात व प्रजाजनन चालू रहातं! तर अशा मतांचा उगम पाहून त्याच्यावर उपाय केला पाहिजे.
माझ्या मते याला एकच प्रभावी उपाय आहे-स्त्री शिक्षण! जे आज ग्रामीण पाकिस्तानात (व ग्रामीण भारतातही) खूप कमी आहे.
मी केवळ यांचे शिक्षक काय-काय विचार या भोळ्या लोकांच्या डोक्यात इतक्या यशस्वीपणे भिनवितात त्याने थक्क झालो. सांगणारा अगदी मनापासून बोलत होता.
मलाही हे माहीत आहे की यातली जास्त बहुसंख्य मुलं न शिकता-सवरता पोट भरण्यासाठी कसाबच बनणार!
असो.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
त्याला विचारायचे ना की "भावा, तू कैसे सायंटीस्ट नही बना "
सायंटीस्ट हा सायंटीस्टचा बिल्ला हातात घेऊन जन्माला येत नाही हे त्याला पटवून द्यायला हवे होते.
पाकिस्तान हा मुद्दा धरला तर योग्य विचार आहेत....... आइन्स्टाईन, प्रेशित हे असले करोडो मुले जन्माला घातली की एक एक होणार... मग हिशोब बराबरच आहे...
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
त्यापेक्षा, २१ अपेक्षित प्रतिसादांचा संच दिल्यास, आम्हाला चॉइस करणे सोपे जाईल!! ;)
(अवांतर - आमच्या काळी हे २१ अपेक्षित प्रश्नसंचांचे फॅड होते. हल्लीचे ठाऊक नाही)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
त्यापेक्षा, २१ अपेक्षित प्रतिसादांचा संच दिल्यास, आम्हाला चॉइस करणे सोपे जाईल!!
१. व्यनि पहा
२. ***-जी (अनुकूल) लेख/प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
३. अमाहासउ
४. या विषयावर मी फलाण्या वर्तमानपत्रात अमुक एक दिवशी पत्रं लिहीलं होतं.
५. हे 'प्रकाटाआ' म्हणजे काय असतं? कोणी सांगणार का?
इ.इ.
अदिती
आपापसांत गप्पांसाठी तात्यांनी खरडवहीची सोय केली आहे, तिचा वापर करावा. प्रत्येकच धाग्यावर अवांतर लिहू नये.
-- आणिबाणीचा नोटीसकर्ता
(ही सही टार्याला सादर समर्पण)
श्री. परिकथेतील राजकुमार-जी, तुम्ही माझ्या धाग्याची लिंक इथे दिलीत त्याबद्दल आभार. अर्थातच मी तेव्हा प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तो लेख सर्वसमावेशक नव्हता. त्यामुळे इथे जे उदाहरण आहे, त्याचं विवेचन त्या पाकृमधे नव्हतं. पण सोदाहरण शिकवल्यास शिकणं सोपं पडतं, हे याच उदाहरणावरून लक्षात येईल. लंडनचे प्रा. ब्राऊन यांनी मला विहीरीवर फिरायला गेल्यावर हेच सांगितलं होतं.
अदिती
श्री. परिकथेतील राजकुमार-जी, तुम्ही माझ्या धाग्याची लिंक इथे दिलीत त्याबद्दल आभार. अर्थातच मी तेव्हा प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तो लेख सर्वसमावेशक नव्हता. त्यामुळे इथे जे उदाहरण आहे, त्याचं विवेचन त्या पाकृमधे नव्हतं. पण सोदाहरण शिकवल्यास शिकणं सोपं पडतं, हे याच उदाहरणावरून लक्षात येईल. लंडनचे प्रा. ब्राऊन यांनी मला विहीरीवर फिरायला गेल्यावर हेच सांगितलं होतं.
अदिती
गरीबी मुळे बिचार्याला फक्त दोनच लग्ने करता आली.काका त्याला ज्यादा पैशे कमावण्याच्या टिप्स दिल्या असत्या तर त्याने अजुन दोन-चार बायका केल्या असत्याना.तेवढेच प्रेशित व सायंटिस्ट निपज काम वेगाने वाढले असते.तुमचा जाहिर निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
वेताळ
अहो वेता़ळ-जी, माझा निषेध कशाला? मी नाहीं दोन लग्नं केली. मी फक्त आमच्यात झालेलं संभाषण सांगितलं. त्याने असा एक अजब मुद्दा सांगितला जो मलाही हास्यास्पद वाटला तरी त्याला पूर्णपणे पटला होता व तो अगदी मनापासून, प्रामाणिकपणे सांगत होता. तो आर्थिक परिस्थितीने गरीब नसेलही, शिंप्याचा धंदा करत होता व मिळकत विचारण्यापर्यंत आमची मजल गेली नाहीं. पण परवडेल तर करेलही आणखी लग्नं.
मुद्दा हा आहे कीं पाकिस्तान नाहींसा झाला तर अशाच माणसांशी गाठ पडायची आहे?
सुधीर
अवांतर: अशी बहुपत्निकत्वाची चाल उटा (Utah) राज्यातल्या मॉर्मॉन जमातीतही आहे. घराला जितकी धुराडी तितक्या बायकाशी त्या पुरुषाने लग्न केलेले असते असे एकदा Grand Canyon ला जाताना आमच्या वाटड्याने सांगितले होते. एक मॉर्मॉन माझा जकार्तात colleagueही होता, त्यानेही तेच सांगितले होते. असो.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
ह्या लोकांना एव्हढ्या बायका लग्नाला मिळतातच कशा असा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे.
बहूपत्नीत्व शक्य असेल तर ह्याचाच अर्थ स्त्री-भ्रुण हत्या व त्याच्या बरोबरीने दिलेला डाटा खोटा आहे असे म्हणता येईल का?
विजय आणि अमोल,
या अशिक्षित/अर्धशिक्षित पाकिस्तान्यांचे विचार कसे चालतात हे दाखविण्यासाठी व त्याबाबतीत सर्वांना अद्ययावत राखण्यासाठी मी हा लेख लिहिला. पण असं वाटतंय कीं माझा मुद्दा मी वाचकांना समजावून सांगण्यात कमी पडलो. त्या माणसाने दोन लग्ने केली हे ऐकल्यावर मी विचारलेले "आप ऐसे कैसे कर सकते हो?" हे वाक्य कुणाला भिडले नाही किवा "अपनी अमदनीमें अगर हम बच्चोंकी परवरिश अच्छी तरहसे नहीं कर सकते तो आप फॅमिली-प्लानिंग क्यूँ नहीं करते? क्यूँ उसके खिलाफ हैं?" हेही वाक्य असंच वाया गेलं असं वाटतंय. असो. मी वाचकांना दोष देत नाहीं, माझा मुद्दा मांडण्यात मीच कमी पडलो!
पण जे कांहीं मी लिहिलंय त्याबद्दल मला पूर्ण खात्री, पूर्ण श्रद्धा आहे. हे असं शेजारच्या राष्ट्रात (किंवा आपल्याही राष्ट्रात) होत असेल तर त्याबाबत आपण कांहीं करू शकलो तर फारच छान, पण कमीतकमी अज्ञानी तरी असू नये हे माझे ठाम मत आहे.
असो. जनतेला आवडलं नाहीं हे खरं.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
आपण जस घडल तस लिहिलत. आपण कुठे कमी पडला असे वाटले नाही. हे प्रासंगिक लेखन आहे. वाचकांचे आकलन हे व्यक्तिसापेक्ष असते. त्यात पुर्वदुषित/पोषित ग्रह असु शकतात. इथला वाचक हा वेगवेगळ्या वयोगटाचा, वेगवेगळ्या वातावरणातुन आलेला आहे. त्यामुळे मतमतांतर असु शकतात. प्रतिसाद हे फार विचारपुर्वक दिलेले असतात अशातला अजिबात भाग नसतो. केसरीचे संपादक अरविंद गोखले हे पाकिस्तान भेटीत गेल्यावर जे अनुभवाला आले त्यावर त्यांचे एक पुस्तक आहे. त्यांना सामान्य पाकिस्तानी हा लता मंगेशकर मोहमद्द रफि सह भारतीय हिंदि गाण्यांवर प्रेम करणारा आढळला. अजुन कुणाल वेगळा आढळला असेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
माझ्या ऑफिसात अनेक पाकिस्तानी आहेत.
*त्यापैकी एकाला भारताविशयी प्रचन्ड प्रेम आढ्ळ्ले. तो मुम्बै आधी कधीतरी येउन गेला आहे. त्याची अशी आशा आहे कि परत सलोखा होउन तो परत मुम्बैत येउ शकेल. कसाबबद्द्ल बोलताना तो म्हणाला कि काही नतद्रष्ट नादी लावतात व असे होते. त्याला सगळी हिन्दी गाणी आवडतात. माझे 'आपुन बोला' स्टाइल हिन्दि त्याला खुप आवडते(बॉलीवुड विशयी अधिक प्रेम).
*एकाला उगिचच पाकिस्तानचा प्रचन्द अभिमान दिसुन आला. पण माणुसकीचा माणुस वाटला (रोज एकत्र काम करतो म्हणुन हा अन्दाज).
*एक एवढा मदत करतो त्याला चुकुन मी बरेचदा भारतियच संबोधते.
सो मला आलेला अनुभव हा चान्गला आहे. कितिहि मुले जन्माला येतात ति अल्ला ताला चा आशिर्वाद म्हणुनच, आता हा त्यान्चा गैर्-समज मी दुर करत बसत नाही कारण शेवटी हे खुपच वैयक्तिक आहे.
बाकी काळेकाका इथला वाचक हा वेगवेगळ्या वयोगटाचा, वेगवेगळ्या वातावरणातुन आलेला आहे. त्यामुळे मतमतांतर असु शकतात हेच खरे. तुम्ही लिहित राहा, नविन नविन विषय हाताळले जातात.
चुचु बानो मक्तुम मराठे
त्यापैकी एकाला भारताविशयी प्रचन्ड प्रेम आढ्ळ्ले. तो मुम्बै आधी कधीतरी येउन गेला आहे. त्याची अशी आशा आहे कि परत सलोखा होउन तो परत मुम्बैत येउ शकेल.
कोणत्या बॉम्बस्फोटासाठी तो मुंबईमध्ये आला होता? कारण भारताविशयी असलेल्या प्रचन्ड प्रेमापोटी ते मुंबई येवुन बॉम्बस्फोट करतात.जरा त्याच्या पासुन सावध रहा. आणि तो परत कधी मुंबईमध्ये येवु नये हिच आमची अल्लातालाला प्रार्थना आहे.
वेताळ
घाटपांडेसाहेब व चुचु,
तुम्ही सांगितलेला मुद्दा मीही अनुभवला आहे. पाकिस्तानी सरकार व जनता यात गल्लत मी तरी कधीच करत नाहीं. म्हणून तर बागेतल्या त्या पाकिस्तानी पोराला मी "चल, भटकून येऊ" म्हटलं.
एकदा इटलीत मी ज्या हॉटेलमध्ये रहात होतो त्याच हॉटेलमध्ये एक अब्बास अकबर अली नावाचे एक स्टील प्लांटचे मालक उतरले होते. मी भारतीय व त्याच धंद्यातला म्हटल्यावर आमची बर्यापैकी गट्टी बनली ती आजतागायत. ते मला नेहमी कराचीला बोलवायचे. मी गमतीत म्हणायचो "हिंमत नहीं होती". "अरे साहब, आप हमारे मेहमान हैं| आपके बालकोभी धक्का लगने नहीं देंगे वगैरे." उर्दू गझल हा एक कॉमन दुवाही निघाला. आम्ही एकमेकांना बर्याच टेप्सही दिल्या. ती मैत्री आजतागायत चालू आहे.
युरोपीय एअरलाईनवर प्रवास करताना विमानात किती तरी पाकिस्तानी माझ्या शेजारी येऊन बसलेत व ८-८ तास आमच्या गप्पा झाल्यात. फक्त काश्मीर वगैरे विषय टाळायचे.
इथे जकार्तातही मित्र म्हणता येणार नाहीं पण खूप परिचित असे पाकिस्तानी माहीत आहेत. ज्यांच्याकडून मी विमानतिकिटे घ्यायचो त्या कंपनीतही एक पाकिस्तानी होता, त्याच्या आईने मला ए व ई चा अर्थ सांगायचा प्रयत्न केला होता.
खरं तर पाकिस्तानी लोक आपल्यापेक्षा त्यांच्या सरकारला जास्त किटलेत. आपण बोलून तरी दाखवतो, त्यांना तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतो. दुबईला रहाणारी व मिपाची सदस्य असलेली एक सभासद आहे ती तर एकदा म्हणाली कीं पाकिस्तानी तर परत देशात जायला घाबरतात कारण पैसेवाले म्हणून त्यांना लुटलं जातं.
अमेरिकन लोक व सरकार जसे "वेगळे" तसेच पाकिस्तानी लोक व सरकार "वेगळे". पाकिस्तानात लष्करी सत्ता खूप दिवस राबवली गेली असल्यामुळे समीकरण बरेच वेगळे आहे.
असो. धागा सुरुवातीला जरा लडखडला, पण आता रंगलाय्. धन्यू!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
दुबईतील ८-९ वर्षांच्या वास्तव्यात माला ही बरेच चांगले अनुभव आले. ज्या कंपनीत कामाला होतो ,त्यात ४५ % भारतीय, ३५ % पाकिस्तानी, १० % लंकेचे तर १०% इतर देशीय होते. त्यामुळे कामाच्या संदर्भात नेहमीच पाकिस्तानी लोकांशी संबंध यायचे.
आमची क्रिकेटची टीम पण जबर्दस्त होती. सगळी आशियायी भेळ.
पण कधी भांडण झाली नाहीत, सलग तिन वर्ष शिपींग ट्रॉफी पटकावली आमच्या टीम ने.
वाद व्हायचे नाही अस नाही पण भांडण कधी झाली नाहित. आम्ही आमच्या सणांत त्याना सहभागी करायचो ते त्याच्या सणांत आग्रहाने बोलवायचे.
त्यांच्या बोलण्यातुन नेहमी जाणवायच की तिकडचे लोक सरकारला कंटाळले आहेत. आपल्या सरकारच कौतुक करयचे. द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम न राबवता तुम्ही कशी प्रगती केली आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्यांचे सरकार लोकांना कसे आपल्या तालावर हवे तसे नाचवते हे त्यांच्या बोलण्यातुन बरेच वेळा यायच.
>>धागा सुरुवातीला जरा लडखडला, पण आता रंगलाय्
काळे काकांशी सहमत
छान प्रतिसाद.
फक्त "सामान्य पाकिस्तानी हा लता मंगेशकर मोहमद्द रफि सह भारतीय हिंदि गाण्यांवर प्रेम करणारा आढळल"" इथे थोडा अडखळलो. 'लता मंगेशकर' हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतेय, पण हे 'मोहमद रफि' कोण क्रिकेटपटू होते, त्यांचे नाव कधी कानावरून गेलेले नाही.
पाकिस्तानी लोकांची डोकी अशीच विचित्र चालतात. मी पण अशी काही उदाहरणे ऐकली आहेत ( लंडनमध्ये जे पाकिस्तानी आहेत टॅक्सी ड्रायव्हर वगैरे ) ते कसे बोलतात ह्यावर. फक्त होतं काय की हे सर्व आपल्याला नवीन असल्याने विचित्र वाटतं. जास्त माहिती बिपिनदा देऊ शकतील. त्यांचा अनेक पाकिस्तानी लोकांशी संबंध आला आहे असे ते पुर्वी एका लेखात म्हणाले होते.
काका,
तुमचा मुद्दा बरोबर मांडलात.
पण दगडावर डोक आपटल तर आपलाच कपाळ्मोक्ष होतो म्हणुन सावधान केले.
एका नाटकातला संवाद काहीसा असा होता
||जो गलती करता है वो इन्सान.||
||कभी गलती ना करे वो भगवान.||
||गलती करके ना माने वो शैतान||
||और बार बार गलती करे वो पकिस्तान||.
तात्पर्यः तुमच्यासारख्या विचारवंताने पाकड्यांना कितीही सल्ला देण्याचा प्रयन्त केलात तरी गाढवापुढे वाचली गीता असच होणार बर का.
यापुढे तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात भ्रमंती करीत असतांना या हिरव्या पिलावळीवर जास्त विश्वास ठेवू नये असे वाटले म्हणुन म्हटले. राग नसावा.
एक अजनबी (?)..एक अनोळखी का नाही?
योग्य पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असताना हिंदी शब्द वापरल्याबद्दल तुमचा निषेध..!!! (ह.घ्या)
बाकी लेख आवडला.
(गोपनीय -: एखाद्या ललित लेखाप्रमाणे ह्या लेखाला जर थोडा विद्वत्ताप्रचुर, थोडा तत्वज्ञानाचा मुलामा दिला असता तर हि&हि प्रतिसादाच्या इतक्या लेंड्या पडल्याच नसत्या.
उदा. अंधारही पडू लागला होता. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. हेच वाक्य तुम्ही असेही लिहु शकला असतात.
सूर्ये पश्चिमेकडे झुकु लागला होता.तो तरुण मग आपली हातभर वाढलेली दाढी खाजवत खाजवत चालु लागला.मी ही मावळत्या सूर्याकडे पाहत त्याचा निरोप घेतला.बराच वेळ त्याच्या दाढी खाजवण्याचा आवाज मला येत होता.आजही जेव्हा तो तरुण माझ्या मनःचक्षु (निषेध.निषेध..किती अवघड शब्द.) येतो तेव्हा अचानकच मला कुठुनतरी दाढी खाजवण्याचा आवाज येऊ लागतो.
)
------------------------------------------------
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com .
एक अजनबी (?)..एक अनोळखी का नाही? (दिलगीर आहे)
बराच वेळ त्याच्या दाढी खाजवण्याचा आवाज मला येत होता.आजही जेव्हा तो तरुण माझ्या मनःचक्षु (निषेध.निषेध..किती अवघड शब्द.) येतो तेव्हा अचानकच मला कुठुनतरी दाढी खाजवण्याचा आवाज येऊ लागतो. (हाहाहा. जीते रहो! पण त्याला चक्क दाढी नव्हती!! या घटनेला १०-१२ वर्षे झाली व दाढी हा अद्याप "गणवेश" झाला नव्हता!)
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
जगात व्यक्ती तितके विचार आहेत हेच खरे...
कालच डीएनए मधे फोटोसहीत बातमी होती की पाकिस्तानात एका सामाजिक संस्थेतील माणसे काहि मौलवींना संततीनियमनावर प्रेसेंटेशन दाखवत होते(!!!!).. वातावरण तंग झालं .. त्या संस्थेच्या पदाधिकार्यांना वाटलं झालं आपल्याविरुद्ध फतवा निघणार
मात्र संपूर्ण प्रेसेंटेशननंतर त्यापैकी एकच मौलवी थोडं बोलला तेही चक्क "यामुळे जर आपल्या पुढल्या पिढ्या चांगल्या बनु शकणार असतील, त्यांना सुविधा मिळणार असतील तर यावर विचार करायला हवा. आम्ही आजपर्यंत तर हे म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या कमी करण्याचा ख्रिश्चननांचा डाव म्हणून बघत होतो"
आशा करूया विचार सकारात्मक असेल
:)
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
(आशा करू या विचार सकारात्मक असेल) पूर्णपणे सहमत.
संततिनियमनाच्या बाबतीत शहरी व ग्रामीण भागांत खूप फरक असू शकतो जसा भारतातही आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
+१
+२
कसली
+१
संधी मिळाल्यास अशा लोकांशी मी आवर्जून बोलतो
कैच्याकैच !!
मग आम्ही
अगदी सहमत!
हं..
एक क्षणिक
बीथोव्हन
यातली बहुसंख्य मुलं उपाशी पोट भरण्यासाठी कसाबच बनणार!
त्याला
पाकिस्तान
चला, एक तरी प्रतिसाद बरा आला!
:-)
२१ अपेक्षित
काही पर्याय .. ह.च घ्या!
बस, आपकीही कमी थी|
आपापसांत
'आपापसात
हबिणंडण
खत्रुड
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
श्री. परिकथेतील राजकुमार-जी
श्री.
:)
हि हि हि
बिचारा गरीब पाकिस्तानी....किव येते हो त्याची.
अहो माझा निषेध कशाला?
ह्या
अरे क्या
काका...
माझा मुद्दा मी वाचकांना समजावून सांगण्यात कमी पडलो!
रिपोर्ताज
माझ्या
काय सांगता काय चुचु तै....
घाटपांडेसाहेब व चुचु
दुबईतील
धन्यवाद!
नेहमीसारखा
पण ही फॅक्टच आहे........
काका, तुमचा
चांगला आहे लेख
एक अजनबी
मला
दिलगीर आहे
हं
पूर्णपणे सहमत.