पण टायगरसाहेब, शिवसेनेच्या कथित निलाजरेपणाबद्दल बोलण्याआधी इथे आपण आपल्या खर्या नावानिशी लिहा. टोपणनावाआड लपून एखाद्यावर टीका करणे सोपे असते. आजकाल उठसूठ शिवसेनेवर टीका करण्याची फॅशन आली आहे. :)
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
उद्धव ठाकरेंचा अभ्यास कच्चा दिसतोय. त्यांच्या या अज्ञानमूलकतेचाच फायदा त्यांच्या भोवताली असणाऱ्या कोंडाळ्याने घेतला आहे. युद्धव यांचा इगो पोसून ते आपापली घरे भरताहेत. उद्धव यांना राज यांना हरलेले बघायचे आहे; पण ते काही नियती होऊ देत नाही. कारण केलेली पापे याच जन्मी भोगावी लागतात, असे म्हणतात. उद्धव हा अत्यंत गर्विष्ठ, अपरिपक्व प्रवृत्तीचा माणूस वाटतो. त्यांची विधाने, भाषणे आणि पत्रकार परिषदा यातून त्यांची प्रवृत्ती ठळकपणे डोकावते. राज ठाकरे यांच्याविषयी ते अत्यंत तुच्छतेने बोलतात. अशा प्रकारे बाळासाहेब स्वत:ही कधी राजबद्दल बोललेले नाहीत.
एक प्रसंग आठवतो. वाचण्यात आलेला आहे. दोन तीन वर्षे झाले असावीत...
एका पावसाळ्यात मातोश्रीला पाण्याने वेढले होते. त्यावेळी बाळासाहेबांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. ते स्वत: राज यांच्या घरी मुक्कामास गेले होते. परंतु उद्धव आपल्या वैयक्तिक कुटुंब कबिल्यासह एका पंचतारांकित हॉटेलात वास्तव्यास गेले होते म्हणे. राज यांच्या घरी बाळासाहेब गेले; पण उद्धव गेला नाही. राज यांचे घर उद्धव, त्याची मुले आणि बायको सामावणार नाही इतके छोटे नक्कीच नसेल! तेव्हा तर राज ठाकरे शिवसेनेतच होते. यावरून उद्धव यांच्या मनात राजविषयी किती राग आहे हे उमगते.
आयते मिळालेले राखणे हेही मोठे कष्टाचे काम आहे. एवढे कष्ट उद्धवला करता येणार नाही, हे तितकेच खरे!
अनंतराव,
टोपणनांवाने न लिहिता खर्या नांवाने लिहायला सांगत आहात. पण विचारांचा विरोध वा प्रतिवाद हा मुद्यांनी न करता गुद्द्यांनी करायची शिवसेनेची परंपरा आहे. आठवा, 'सोबतकार' ग. वा. बेहेरे यांना 'सेनापती की शेणापती' हा लेख लिहिल्याबद्दल मुंबईत कसे चोपून काढण्यात आले होते. हाफकिन् च्या येमुल यांच्या तोंडाला कसे काळे फासण्यात आले होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
चुकिचि दुरुस्ति....याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते...बाळासाहेब असे म्हणाले नसुन..बाळासाहेब......."याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या नाकाचा गांधी म्हणाले होते...असे वाचल्याचे स्मरते
बबनराव घोलप आणि महादेव शिवणकर ह्या भ्रष्ट मंत्र्यांना काढुन टाकावे म्हणुन अण्णा हजारे ह्यानी उपोषण केले होते.ह्यावरुन 'रिमोट कंट्रोल ' आणि 'आदरणीय अण्णा' लेख लिहिणारे गडकरी भडकले होते. शेवटी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर दोन्ही मंत्र्यांना हाकलण्यात आले.ह्याचवेळी 'वाकड्या तोंडाचा गांधी' असे ठाकरे हजारेना म्हणाले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मी जर सत्ते वर आलो तर फडतुस धागे काढणार्याला फाशी देणार
=))
=)) =))
=))
आहो तुम्ही णका घाबरू तुम्हाला नाय फाशी .. फडतुस धागे काढणार्याला म्हणालो मी !! बाकी कोणता नेता काय बकवास करतो ह्या कडे आपण दुर्लक्ष करावं .. आपण सुज्ञ असलो की काय बोलणे आणि काय बकवास .. हे लगेच कळते
- टाराज ठाकरे
मिसळपाव नवनिर्माण सेणा
फाशीचा निर्णय हा न्यायालयाचा अधिकार आहे. तो अधिकार न्यायालयाने अजून तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही.
हे बाकी खरंच! उद्धवांचा अंमळ गैरसमज झालेला दिसतो! :)
'आपले सरकार आले म्हणजे आपल्याला एखाद्याला डायरेक्ट फाशी द्यायचा अधिकार पोहोचतो!' हा समज एक तर अज्ञानमूलक तरी आहे किंवा अत्यंत दर्पोक्तियुक्त तरी आहे!
असो..!
सेनेच्या कार्याधक्षांची अज्ञानमूलक वा दर्पोक्तियुक्त विधाने पाहता एकंदरीत सेनेला अखेरची घरघर लागल्याचे समजते!
आपला,
(मनसेप्रेमी) तात्या.
सामान्य माणूस किती बेदरकार झाला आहे. निवडणूक होईपर्यंत आपण त्यांची मजा पाहात राहणार आणि एकदा का ते सत्तेत आले की, ते जनतेची अवस्था दयनीय करून मजा पाहात बसणार, हे आपल्या लक्षात कसे येत नाही. इतका बेजबाबदारपणा करून चालणार नाही, सॅंडी साहेब!
गेली चाळीस वर्षे शिवसेना पक्ष राजकारणात आहे. एकदा सत्ताही त्यांच्याकडे गेली; परंतु मराठी, मराठी असे भजन करण्यापलिकडे त्यांचे रचनात्मक काम काय? दूरगामी विचार करून त्यांनी उभारलेला एखादा प्रकल्प सांगताही येणार नाही आणि दाखविताही येणार नाही.
हे मतदार निगरगट्ट झाल्याचे परिणाम आहेत. माझा व्यक्तिश: उद्धव ठाकरेंना विरोध नसून ते जी बेताल आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत त्याला आहे. उद्धव ठाकरे यांनी काहीही बोलावे आणि जनतेने ते ऐकून घ्यावे, हे चुकीचे आहे. त्यांना जाब विचारालाच गेला पाहिजे. अण्णा हजारेंच्या खुनाची सुपारी देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही फाशी कशी देणार याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे मागितलेच गेले पाहिजे. हे कुणी विचारत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांची भीड चेपली आहे. आता मीडियादेखील इतका स्वस्त (चीप) झालाय की कुणी काहीही बोलेले, तरी त्याचे विधान शंभरवेळा दाखविले जाते. यामुळे सवंग प्रसिद्धी मिळविण्याची सवय राजकीय नेत्यांना लागली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना हा तर नाकर्त्या नेत्यांचा पक्ष आहे. त्यांना तर असली थेरं चांगली जमतात.
इतका बेजबाबदारपणा करून चालणार नाही
चर्चा केल्याने जबाबदार आहोत असे थोडेच आहे टायगरदादा?
हे नेते लोक निवडणुका आल्या की असेच व्यक्तव्य करणार, आणि आपल्यासारख्या लोकांना भरकटवणे हाच तर खरा उद्देश.
आपल्यासारखे मतदार त्याला जास्तच गंभीरपणे घेतात. तरी अशा विधानांची तुर्तास तरी मजा अनुभवा. जबाबदारी मतदान करताना पार पाडा... चर्चा करुन काय बी हाशील नाय.
चर्चा करुन काय बी हाशील नाय.
सॅंडीसाहेब तुम्ही फार सुखवस्तू किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातील दिसताय. चर्चा करून फायदा काय, असा तुमचा सवाल आहे. परंतु कोणतेही मोठे आंदोलन किंवा चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची उर्मी ही चर्चेतून मिळते. समूहात चर्चा होते. वाद झडतात आणि मग एक निर्णय निश्चित केला जातो. त्यानुसार पुढील कार्यवाही होते. हे एखाद्या आंदोलनात भाग घेतलेल्या व्यक्तीला चांगले समजू शकेल. सॅंडीसाहेब तुमची पार्श्वभूमी काय आहे, हे माहीत नाही. चर्चेची जर गरज वाटली नसती, तर मिसळपावचे सभासदही तुम्ही झाला नसता.
भडक वक्त्यव्ये केली की अमाप प्रसिध्दी मिळते असे त्यांना माहीत आहे. म्हणुन उचलली जीभ लावली टाळुला असा प्रकार ते करुन बसलेत. परंतु भारतात लोकशाही नांदते आहे हे ते सोयिस्कर रित्या विसरतात. असो राजकारण करायचे तर भडक वक्त्यव्ये करावी लागतात हे मान्य करुत परंतु त्यात राजकिय व्यवहार कुशलता असावी असे आपणा सर्वांचे एकमत (बारामती नसावे) असावे.....
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
प्रतिक्रिया
शम्भर टक्के सहमत
असो.
बाळासाहेब राजच्या घरी
एका
टीका
चुकिचि
नाही नाही.
आता
मागचे काही
वाकड्या 'तोंडा'चा
बबनराव घोलप
मी जर
मी जर,
फाशीचा
शिवसेना,
या असल्या
बेजबाबदारपणा
इतका
चर्चा हीच आंदोलनाची नांदी
"बाल"बुद्धी
राजकिय व्यवहार कुशलता असावी
च्यायला
बालिश बहु