कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
2754
प्रतिक्रिया
152
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण ठीक आहे
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
आजवर किती केसेस पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात "माझे मानवी हक्क ऑन ड्यूटी हनन झाले आहेत" अशा स्वरूपाची पेटीशंस टाकली आहेत ते सांगून टाका सर जमल्यास.
पोलिसांचं माहिती नाही.पण मीच…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
पोलिसांचं माहिती नाही.
पण मीच टाकला होता मुंबई उच्च न्यायालयात.
मी उच्च न्यायालयात रीट अर्ज केला होता नोकरी सोडण्यासाठी. तीन वेळेला राजीनामा देऊनही सरकार तो मंजूर करत नव्हते म्हणून
सरकारने शपथ पत्र टाकले की लष्करातील माणसाला न्यायालयात जाण्याचा धिकार नही आणि त्याच्या अर्जाची सुनावणी करण्याचा न्यायालयाला अधिकारच नाही.
(This court does not have jurisdiction).
न्यायमूर्तींनी ते ऐकून केंद्र शासनाच्या वकिलाला सांगितले अम्ही ते वाचलंय.
तुम्हाला पुढे काही बोलायचंय का?
त्यांनी गपचूप पुढे प्रतिवाद करण्यास सुरवात केली!
पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेले. तेथे सुद्धा हाच प्रकार झाला होता.
न्यायालये जर लष्कराच्या बाबतीत ढवळाढवळ करू लागली तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे त्यांनी शपथपत्र टाकले होते.
अर्थात न्यायालयाने तेही कानाआड टाकले.
असो हा विषय येथे नको!
राजीनामा? मोदी हरले, देश…
राजीनामा? मोदी हरले, देश जिंकला!
अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ…
अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ बदनामी भाजप आयटी सेल ने केली, पण दिपके झुकले नाहीत! त्यांनी मोदीना झुकवलं नी राजीनामा घ्यायला लावला धर्मेंद्र प्रधानाचा.
मोडेन पण वाकणार नाही, हा ताठा दाखवून दिपकेनी त्यांचा ताठ मराठी कणा दाखवला, नी अक्षरशः हुकुमशाही झुकवली!
दिपके ह्यांनी आंदोलन यशस्वी केले ह्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन! आज दिपके तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, लाठीमार, दहशत हे सगळे निष्प्रभ्र ठरवले. जेन झी लाही मानावे लागेल, कुठल्याही हुकुमशाही , दहशत, लाठीमार ह्याला न घाबरता त्यांनी लढा दिला. एवढ्या दहशतीच्या काळात आंदोलन चालवून यशस्वी करून दाखवणे म्हणजे खरोखर मोठे काम आहे!
आंदोलन यशस्वी झाले.♥️
जय हिंद जय महाराष्ट्र!
पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन ....
In reply to अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे ) ( इंग्रजी लेख ) : https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2025/Mar/17/centre-t…
सध्याच्या बाबतीत धर्मेंद्र प्रधानांच्या जागी जो येईल तो अधिक हिरीरीने नवं शैक्षणिक धोरण राबवणार.
आ.न.,
-गा.पै.
दीपके
In reply to पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन .... by गामा पैलवान
नवीन शिक्षण धोरणाच्या विरुद्ध पेटला होता का पेपर लीक मॅटर वरून धर्मेंद्र प्रधान वर ! ? उगाच काहीही टेप लावत सुटला आहात.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कशासाठी?
In reply to दीपके by वृषभ खोंडे
वृषभ खोंडे,
आजवर असंख्य वेळा काँग्रेसी, बिगर काँग्रेसी आणि भाजपी सरकारांत प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोणीतरी कधीतरी मंत्र्याचा राजीनामा मागितला होता का? मग धर्मेंद्र प्रधानांना असं काय नेमकं सोनं लागलंय की त्यांच्या राजीनाम्यावर विरोधकं हाटून बसलीत?
नवं शैक्षणिक धोरण साम्यवाद्यांना अनुकूल नाही. म्हणून धप्रविरोधी आरडाओरडा चाललाय. उघडपणे बोंबलून दाखवता येत नाही. तिथे ग्यानबाची मेख आहे.
आ.न.,
-गा.पै.
हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य…
In reply to धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कशासाठी? by गामा पैलवान
हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य बलात्कार झाले होते निर्भया केसवेळीच बलात्काऱ्याना शिक्षा द्या म्हणून मोर्चे का काढले असे विचारण्यासारखे आहे.
गुन्हेगार कोण, शिक्षा कोणाला .... ?
In reply to हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
अहो, निर्भयाच्या वेळेस कोणी राजीनामा मागितला होता का सुशीलकुमार शिंद्यांचा?
आ.न.,
-गा.पै.
यावरून पंजाबातल्या तथाकथित…
In reply to पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन .... by गामा पैलवान
यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे >>>>
ते शेतकरीही पुन्हा आंदोलनच्या बेतात आहे, मोदी हुशार असतील हो पण लोक येडे नाहीयेत!
पंजाबी लोकं येडेच आहेत
In reply to यावरून पंजाबातल्या तथाकथित… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
पंजाबी लोकं येडेच आहेत. असं एक पंजाबीच बोलतोय. विजय सरदाना यांनी प्रत्येक वेळेस एकंच प्रश्न विचारला. प्रस्तावित शेतकरी कायद्यांतलं नेमकं कोणतं कलम शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? उत्तर इल्ले. आजही तोच प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. अधिक माहितीसाठी हे २२ मिनिटांचं हिंदी चलचित्र पाहावे : https://www.youtube.com/watch?v=0LKBgvdr3JU
आ.न.,
-गा.पै.
सरकारला शेतकऱ्यांचे हित…
In reply to पंजाबी लोकं येडेच आहेत by गामा पैलवान
सरकारला शेतकऱ्यांचे हित करायचेच आहे आणि विरोधही नको असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी १००% लागू कराव्या. काँग्रेसला तोंडावर पाडण्याची चांगली संधी आहे.