आपणास माहिती आहे १५ मे रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनी समाज माध्यमांवर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंग्यात्मक सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. भारतात या चळवळीची तरुणांमधे खूप चर्चा आहे, व्यवस्थेविरुद्ध तरुण एकत्र होऊन आपली भूमिका मांडायला एकत्र झाले आहेत. सामाजिक माध्यमांवर या विविध विषयांचा, मिम्ससहित सध्या बोलबाला आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही, आमच्या या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी असे आवाहन आंदोलकांनी केले, सरकारने तरुणांच्या मागण्यांवर विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांना आहे.
सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर बोलण्यासारखं तसं नवं काही नाही. परीक्षांचे पेपर फुटणे, मंदिर गळणे, मंदिरातील पैशांचा अपहार करणे, युवकांची बेरोजगारी, वाढती महागाई या विषयांवर सरकारकडे फारशी समाधानकारक उत्तरं नाहीत. भारतीयांची ससेहोलपट सुरु आहेच. सध्या, दिल्लीतील जंतरमंतरवर सध्या सुरु असलेले आंदोलन प्रामुख्याने NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरुद्ध सुरू आहे, सदरील आंदोलनात आंदोलक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत आहेत, अशा वेळी सरकार या आंदोलनाकडे अजूनही गांभीर्याने पाहात नाही, सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज सतरा दिवसानंतर त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे आंदोलन चर्चेत राहिले. यातील एका पत्राद्वारे 'सीजेपी'ने राजकीय नेत्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली, तर दुसऱ्या पत्रात देशभरातील १,८०० मान्यवरांनी गेल्या १७दिवसांपासून उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
आंदोलनात विविद्य विद्यार्थी त्यांचे पालक या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता सरकार या आंदोलकांच्या मागण्यांकडे चर्चा अथवा उपायांबाबत कोणीही चर्चा करायला आलेले नाही. काही मोजक्याच राजकीय पक्षांनी पेपरफूटीबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे, आजचे तरुण काहीच करीत नाही, व्यवस्थेविरुद्ध लिहित अथवा बोलत नाही. अशा वेळी तरुण आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत असतील तर, अशा वेळी सरकारची जवाबदारी काही असेल की नाही ? या आंदोलनाचं पुढे काय होईल ? या आणि विविध प्रश्न आणि संभाव्य उत्तरासाठी चर्चेसाठी हा धागा. आपण आपली मतं मांडत राहूया....
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या एका…
सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता.
बिरुटे मास्तर
मुदलातच खोट आहे.
एक न्यायाधीश नव्हे तर भारताचे सरन्यायाधीश
Chief Justice of India (CJI) Surya Kant remarked
"There are youngsters like cockroaches, who don’t get any employment and don’t have any place in the profession... they start attacking everyone."
हे मूळ वाक्य आहे त्यांनी भंपक अर्ज केलेल्या एका वकीला वर टिप्पणी करताना म्हटले होते
his comments were aimed specifically at individuals holding fake and bogus degrees who enter professions like law and media to attack institutions, and were not a criticism of the nation's youth.
मास्तर जरा नीट वाचत चला हो.
पहिलंच वाक्य अर्धवट सत्यावर आधारित आहे.
विनंती
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या एका… by सुबोध खरे
सुबोध खरे,
आपला उल्लेख सर्वजण नेहमी आदरपूर्वक 'डॉक्टर' असा करतात. मते बहुतेकवेळा पटत नसली तरी आपल्याविषयी आदर आहेच. बिरुटे सर हे प्राध्यापक व डॉक्टरही आहेत. आपण त्यांचा उल्लेख नेहमी 'मास्तर' असा का करता? कुठेतरी ते तुच्छतादर्शक वाटते.
आता 'मास्तर' हेही आदरार्थीच आहे असे कृपया सिध्द न करता आपणही त्यांचा आणि सर्व सभासदांचा उल्लेख आदरपूर्वक करावा, ही विनंती. शेवटी तुमच्यावर आहे.
Swara Bhasker joins…
Swara Bhasker joins Cockroach Janta Party stir at Jantar Mantar, backs Sonam Wangchuk & Abhijit Dipke
Read more at: https://www.deccanherald.com/entertainment/swara-bhasker-joins-cockroach...
आले
सगळॆ संधीसाधू वाममार्गी फुरोगामी आपली पोळी भाजून घ्यायला.
The Manifesto.Read it once…
The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.
01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.
02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.
03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.
04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.
05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.
हा झुरळांचा जाहीरनामा.
इतका भंपक कुठला जाहीरनामा नसेल
हा तरी वाचलाय का
पडा झुरळांनो निपचित आणि तसेच पडून राहा.
२०११ मधील अण्णा हजारेंचे उपोषण ११-१२ दिवस चालले होते. लोकशाही पध्दतीत उपोषण करणे या प्रकारालाच माझा पूर्ण विरोध आहे- कारण कोणतेही असो. हे मी त्यावेळेस मिपावर लिहिलेही होते. मला कितीही आवडत नसले तरी अण्णांच्या उपोषणामुळे देशातील वातावरण बऱ्यापैकी ढवळून निघाले होते हे मी पण नाकारत नाही. कदाचित तसे काहीतरी होईल अशी या मंडळींची अपेक्षा असावी. २०११ मध्ये अण्णा हे बुजगावणे उपोषणाला बसविले होते आणि आता सोनम वांगचुक. त्यावेळेस अण्णांना देशात जितके लोक ओळखत होते त्यापेक्षा सोनम वांगचुकला अधिक लोक ओळखतात असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अण्णांच्या उमेदीच्या काळात सोशल मिडिया नव्हता तर आता आहे त्याचा तसेच थ्री इडिअट्स मध्ये सोनम वांगचूकवर आधारीत पात्र आहे त्याचाही फायदा सोनम वांगचूकला नक्कीच झाला असावा असे म्हणायला जागा आहे.
काहीही असले तरी २०११ मध्ये अण्णांच्या उपोषणाच्या काळात जसे वातावरण ढवळून निघाले होते त्याच्या चतकोरही वातावरण आता नाही. खरं तर त्यावेळेस आंदोलन भ्रष्टाचाराविरोधात होते- आणि आंदोलन एकूणच भ्रष्टाचाराविरोधात असले तरी रस्त्यावरचा मामा चिरीमिरी घेतो तसल्या भ्रष्टाचाराविरोधात नाही तर सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात अधिक होते. लोकपाल त्यासाठीच हवा होता. सरकारमधील भ्रष्टाचाराचा समाजाला त्रास होत असला तरी प्रत्यक्ष वैयक्तिक त्रास झालेले लोक दाखवता येणे कठीण आहे. त्याउलट आता नीट परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाचा फटका बसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या घरचे आपल्या आजूबाजूला पण दिसतील. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की त्यावेळेस होता त्यापेक्षा आताचा मुद्दा अधिक लोकांना वैयक्तिकपणे त्रासदायक होता. तरीही तेव्हाच्या तुलनेत आता या उपोषणाची फारशी कोणी दखलही घेत नाहीये हे कोडे कसे सोडवायचे?
मला वाटते परिस्थितीत फरक मोठा आहे. सगळ्यात मोठा फरक हा की नरेंद्र मोदींची अगदी टेफलॉन कोटेड असल्यासारखी प्रतिमा आहे. या प्रकरणी शिक्षणमंत्री चुकले नाहीत असे म्हणणारे फार लोक नसतील तरीही मोदींच्या नावावर लोकांचा विश्वास असल्याने लोक रस्त्यावर उतरले नाहीत असे मला वाटते. ४० वर्षांपूर्वी सोशल मिडिया नसतानाही राजीव गांधींची प्रतिमा बोफोर्स प्रकरणामुळे डागाळली होतीच- इतकी की कोणी कसले कांड केले तर त्याने बोफोर्स केले हा शब्दप्रयोग अनेक वर्षे वापरात होता. आता त्यापैकी काहीही होताना दिसत नाहीये. असे का होत आहे? विरोधक याचा विचार न करता नुसत्या नव्या नव्या मुद्द्यांवरून मोदींविरोधात वातावरण होईल, लोक रस्त्यावर उतरतील, नेपाळमध्ये झाले तसे आपल्याकडे होईल वगैरे स्वप्ने बघत असतील तर ती दिवास्वप्नेच राहतील. आतापर्यंत २०१५ मध्ये सूटबूटकी सरकारपासून कित्येक मुद्दे विरोधकांनी आणले. तेवढ्यापुरते काही मुद्द्यांना यश मिळाले- उदाहरणार्थ शेतकरी आंदोलनात सरकारला माघार घ्यायला लागली, २०२४ च्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी गोट अती आत्मविश्वासात गेला त्यावेळेसच संविधान बदलणार हा अपप्रचार चालू होता त्याला बऱ्यापैकी यश आले वगैरे. पण गेल्या १२ वर्षात मोदी सरकार चांगलेच कोंडीत पकडले गेले आहे असे काही झालेले नाही. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कधीतरी येतोच- प्रत्येक नव्या मुद्द्यावरून तेच तेच यशस्वी कलाकार (केंद्रात राहुल गांधींपासून महाराष्ट्रात उध्दव ठाकरे- इतकेच काय तर मिपावर बिरूटे मास्तर) रान उठवायला गेल्यावर- या लोकांचा पूर्वीप्रमाणेच फुसका बार असणार असे लोकांना वाटले तर ती चूक कोणाची? मोदींची?
दुसरे म्हणजे उपोषण या मार्गाला माझा विरोध असला तरी सोनम वांगचुकचा (वरकरणी दाखविला गेलेला) मुद्दा चुकीचा आहे असे मला तरी वाटत नाही. वेगवेगळ्या परीक्षांच्या आयोजनात मोदी सरकारने अक्षम्य घोळ घालून ठेवला आहे हे नक्कीच. पण लगेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला कोण कोण धावून गेले? तर अरूंधती रॉय सारखे लोक- हो तीच अरूंधती रॉय जिने आपल्या हवाई दलाच्या जवानांना आणि काश्मीरात हिंदूंना ठार मारणाऱ्या, (किमान) एका काश्मीरी स्त्रीवर बलात्कार करून तिला करवतीने चिरायच्या घृणास्पद प्रकारात हात असलेल्या यासिन मलिकवर स्तुतीसुमने उधळली होती आणि तुकडे तुकडे वाल्यांना पाठिंबा दिला होता. दुसरा तो सगळ्या शाद्यांमध्ये दिवाना होणारा अब्दुल्ला- योगेन्द्र सलीम यादव. असले लोक जर कोणत्याही आंदोलनात सामील झाले तर त्या आंदोलनापासून दूर राहावे- भले वरकरणी दाखविला गेलेला मुद्दा योग्य असला तरी- असेच बहुसंख्यांना वाटले तर त्यात त्यांचे काय चुकले? केंद्रात राहुल गांधींपासून मिपावरील बिरूटे मास्तरांना काहीही वाटले तरी देशातील सामान्य लोकांचे देशावर प्रेम असते त्यामुळे असले लोक (ज्यांना देशातील सामान्य लोक देशद्रोहीच मानतात) असतील तर त्यापासून सामान्य लोक चार हात दूर राहतात. तसेही नेहमीचे डापु गॅंगमधील विचारजंत सोडल्यास अरूंधती रॉय वगैरे लोकांची कोणाला काही पडली आहे असे वाटत नाही. अवांतर- अण्णांच्या उपोषणाच्या वेळेस कोणीही बोलावले नसतानाही स्टेजवर पुढेपुढे करून स्वत:चा उदो उदो करत तिरंगे नाचविणाऱ्या त्या मेधा पाटकर अजून कशा त्यात आल्या नाहीत?
आणि तिसरे म्हणजे- हा मुद्दा मी अगदी केजरूके गुलाममध्ये पण मांडला होता. त्यापुढे आता ११ वर्षे उलटली आहेत आणि मधल्या काळात तो मुद्दा अधिकच दृगोच्चर झाला आहे. अण्णांचे आंदोलन हायजॅक करून केजरीवाल या लुच्च्या लबाड लफंग्याने स्वत:ही स्वार्थाची पोळी कशी भाजून घेतली हे सगळ्यांनीच बघितले. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन, भ्रष्टाचार विरोध वगैरे वगैरे किंवा तत्सम मुद्दे मांडून कोणी मोठे आंदोलन उभे करू बघत असेल तर त्यातून नवा कोणता केजरीवाल येऊन लोकांना यडं बनवून स्वत:ची स्वार्थाची पोळी भाजून घेणार हा भयावह विचार आला की ते आंदोलन बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा. बिहारमध्ये प्रशांत किशोरचा पचका का झाला? त्याचे कारणही केजरीवालच आहे असे मला वाटते. कारण तो पण साधारण तसेच मुद्दे घेऊन निवडणुक लढवत होता आणि तो दुसरा केजरीवाल होणार का ही भीती लोकांना वाटली असेल तर त्यात त्यांची काही चूक आहे असे वाटत नाही. अशा प्रकारच्या आंदोलनांचे कधी न भरून येणारे नुकसान केजरीवाल टोळीने केले आहे हे नक्की.
झुरळांच्या या आंदोलनाला आणि उपोषणाकडे सरकारने अजूनपर्यंत ढुंकूनही बघितलेले नाही हे चांगलेच झाले. समजा सोनम वांगचुक मरायला टेकला म्हणून त्याच्या मागण्या मान्य केल्या तर मग उपोषणे केल्यास सरकार झुकते हा चुकीचा संदेश जाईल. मग ३७० परत आणा, सीएए रद्द करा वगैरे वगैरे नवे नवे मुद्दे घेऊन वेगवेगळ्या बुजगावण्यांना उपोषणाला बसवून त्यामागचे बोलविते धनी कचोऱ्या हाणत आपला स्वार्थ साधायचा आणि सरकारला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील हे नक्की.
तेव्हा.. पडा झुरळांनो निपचित आणि तसेच पडून राहा.
नव्या बाटलीत जुनी दारू
In reply to पडा झुरळांनो निपचित आणि तसेच पडून राहा. by चंद्रसूर्यकुमार
दुसरे म्हणजे अभिजीत दीपकेने भारतात आल्यानंतर व्होटचोरी वगैरे तेच तेच घिसेपिटे मुद्दे मांडले तेव्हाच हे आंदोलन म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याच्याशी त्या आंदोलनाचा काडीमात्र संबंध नाही तर खरा अजेंडा वेगळाच आहे हे लोकांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही.
मी शिक्षणक्षेत्राशी निगडीत असल्याने परीक्षांमध्ये चाललेले घोळ बघून मनस्वी दु:ख होते. मोदी सरकारने आणलेल्या एन.टी.ए या संस्थेने इतके म्हणजे इतके घोळ घातले आहेत की काही विचारूच नका. या सगळ्या प्रकारांमध्ये सुधारणा व्हावी असे मलाही वाटते. त्यामुळे झुरळांचे आंदोलन फुसके ठरत असेल तर त्यामुळे मला आनंद झाला आहे असे मी तरी म्हणणार नाही. जर का या आंदोलनात अरूंधती रॉय वगैरे घृणास्पद मंडळी उतरली नसती, कोणतेही राजकारणी त्यात आले नसते, आंदोलनात केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे असते तर कदाचित त्या आंदोलनाला अधिक समर्थन मिळाले असते.
मी बरेच दिवस वाचन मात्र होतो…
In reply to नव्या बाटलीत जुनी दारू by चंद्रसूर्यकुमार
मी बरेच दिवस वाचन मात्र होतो
दीपक ने जेव्हा नीट परीक्षेच्या दिवशी नवीन आंदोलन ठेवले तेव्हाच हे स्पष्ट होतेकी याला परीक्षेशी काहीही देणेघेणे नाही याला राजकारण हवे आहे . खरे विद्यार्थी त्याच दिवशी आंदोलनाून बाहेर पडले असणार
बाकी तो मफलरलाल च्या मार्गावर जात आहे हे सांगायला तज्ञाची गरज नाही
त्याने वांगचुकचा अण्णा केला . फरक इतकाय की अण्णांना आपला वापर होतोय हे माहीत नव्हते . याला माहीत आहे
विद्यमान शिक्षण मंत्र्यांचे महान योगदान
In reply to पडा झुरळांनो निपचित आणि तसेच पडून राहा. by चंद्रसूर्यकुमार
चंसूकु,
तुंम्ही तर बिरुटे सरांच्या मूळ धाग्यापेक्षाही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात बहुतांशी झुरळ जनता पार्टी व सोनम वांगचुक यांचे प्रतिमा हनन आहे. ते अपेक्षित आणि ठीक. परंतु महत्त्वाचा मुद्दा तुंंम्ही सोयीस्करपणे बाजूला ठेवला आहे, तेही अपेक्षितच. पण सगळेच तुमच्या लिखाणाबरोबर वहात नाही ना जाऊ शकत. म्हणून...
क्षणभर मान्य करू की ज्यांना परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याबद्दल वाईट वाटते, ते सगळे चूक आहेत. पण विद्यमान शिक्षण मंत्र्यां च्या महान गुणवत्तेबद्दल आणि तेच अजूनही शिक्षणमंत्रीपदी रहावेत याची कोणती महत्वाची कारणे आहेत, हा मुद्दा तुमचा राहून गेला आहे. त्यामुळे आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊन आंम्हाला उपकृत करावे ही विनंती आहे.
- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणपध्दतीत कोणते महत्वाचे बदल केले आहेत, ज्याचा भारतातील करोडो विद्यार्थ्यांना काय अतुलनीय फायदा झाला?
- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण खाते सांभाळल्यामुळे देशात विद्यार्थ्यांना कोणते नवीन अभ्यासक्रम मिळाले, त्यांचा कसा कौशल्यविकास झाला?
- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून काय केले?
- त्यांनी कोणत्या जुन्या टाकाऊ गोष्टी बदलून नव्या आधुनिक गोष्टी आणल्या?
- एकूण भारतीय शिक्षण पध्दतीची गुणवत्ता किती व कशी वाढली?
हे जर आपण सांगितले तर झुरळ जनता पार्टीच्या आंदोलनातील हवाच निघून जाईल. विद्यमान शिक्षणमंत्री हेच आंम्हाला शिक्षण मंत्रीपदी हवेत असे नवे आंदोलनही विद्यार्थी करतील; पण हे जर नाही सांगितले तर तुंम्ही लिहिलेल्या प्रतिसादातील हवाच निघून जाईल. तेंव्हा कृपया थोडा वेळ काढून विद्यमान शिक्षण मंत्र्यांची ही माहिती आंम्हाला द्यावी अशी नम्र विनंती आहे.
राम मंदिर अदानी उद्योग आणि लाइट बिल
राम मंदिर लूट पकडली गेली. त्याआधी असेच पद्मनाभ मंदिर उघडले होते. तेव्हा Teflon coated PM म्हणाले होते की आपल्या देशात पुढील सात पिढ्या पुरेल एवढे धन उपलब्ध झाले आहे.. पुढे बरेच स्टंटबाजी झाली, पक्ष फोडणे त्यासाठी यंत्रणेला खिशात घालून फिरणे अणि साध्या देश भिकेला लागला आहे. राम मंदिर लूट . आता काय तर गेले तीन चार महिन्यांत येणारे वीज बील. अनुक्रमे 14k, 9 k, 8.5k लेटेस्ट बील. आता बोला. Teflon coat कधी तरी समोर येतील आणि जनतेच्या भावना समजून घेऊन पदच्युत होतील याची वाट पाहणारा, एक साधक