कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
2756
प्रतिक्रिया
152
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभ्याशेठ भारी.
In reply to वा... by अभ्या..
सर्वच प्रतिसाद भारी आहे. नंबर एक.
बाकी ते 'परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी' हेच सध्या लय डोक्यात जात आहेत.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
शाहीनबाग आंदोलन, शेतकरी…
शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहिले तर केंद्र सरकारला म्हणजे मोदी/शहांना आंदोलने नीट हाताळता येत नाहीत असं दिसतंय. प्रारंभी संपूर्ण दुर्लक्ष, समाजमाध्यमातून आंदोलन देशविरोधी/परदेशी निधी घेऊन चालविले जात आहे असा सातत्याने भडिमार व शेवटी माघार अशी प्रमाणित कार्यपद्धती ते वापरतात.
त्या तुलनेत विलासराव देशमुख व फडणवीस, अण्णा हजारे, शेतकरी आंदोलन, मराठा राखीव जागा आंदोलन इ. बऱ्यापैकी चांगले हाताळून आंदोलनकर्त्यांना काहीतरी किरकोळ देऊन थंड करायचे.
पूर्वी इंदिरा गांधी प्रत्येक आंदोलनात सीआयए, संघ इ.चा हात आहे व त्यांना भारत अस्थिर करायचाय अशी हाकाटी करायच्या. आताही मोदी सरकार तेच करीत आहे, पण आंतरजाल व समाजमाध्यमांमुळे हे आरोप जनता मान्य करीत नाही.
मोदी हागला तरी गु छान लागतो…
मोदी हागला तरी गु छान लागतो म्हणणारी मंडळी आहेत, त्यामुळे इथे वांझोटा चर्चा करून फरक पडत नाही. देव करो यांच्यापैकी कोणावर वाईट वेळ न येवो. यातला भुर्जी तिकडे अडकला होता तेव्हा सरकारला शिव्या घालत होता, आता बुडाला स्थिरता आल्यावर पुन्हा चालू झालाय. असो. आयडी देवाला वाहिला आहे. उडाला तर उडाला.
गपा ओ
In reply to मोदी हागला तरी गु छान लागतो… by कपिलमुनी
अजुन खूप पाने उरलीत सैरभैर डायरीची
फेटीश ? हाहाहा ....
अभ्या..,
तुम जिसे फेटीश कहते हो उसको पच्चास करोड हिंदू जनता सुकूनका छुटकारा ( = सुटकेचा नि:श्वास ) मानती है.
आ.न.,
-गा.पै.
पन्नास कोटी हिंदूंचे हे असले…
In reply to फेटीश ? हाहाहा .... by गामा पैलवान
पन्नास कोटी हिंदूंचे हे असले प्रतिनिधी असणे म्हणजे जरा लैच झाले !
प्रतिनिधी कशाला हवेत !
In reply to पन्नास कोटी हिंदूंचे हे असले… by वृषभ खोंडे
करेक्ट. अहो, मी सुटकेचा नि:श्वास टाकणारे म्हणतोय. प्रतिनिधी नव्हे.
-आ.न.,
-गा.पै.
देशी शिक्षणाला महत्व द्यायचे…
देशी शिक्षणाला महत्व द्यायचे तर हि आपल्या नेत्यांचे झाडून सगळे मुले परदेशी शिकायली जातात का??
नक्की विचार करा मराठे काका रॉक्स
सरकारला जेनझी ने नागडं केलं.
नीट परीक्षा घोटाळा विषयावर आंदोलन करणा-या तरुण मुला मुलींवर अमानुष लाठीमारा नंतर या तरुण पीढ़ीने मात्र दुस-या दिवसापासुन सरकारला नागडं केलं. पूरा बदला घेतला.
पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी' 'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ, 'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन' 'बीवी नही है तो देश की मारोगे क्या' 'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते' पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया'
सरकारने पोरांच्या नादी एक तर नादी लागायला नको होतं. लागले तर, त्यांचे मन जिंकून घ्यायला पाहिजे होतं. लाठीमार केला आंदोलन दाबून पाहिलं नंतर या पोरांच्या नादी लागून स्वत:ची चेष्टा करुन घेतली. धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही माहिती नाही. पण पोरांनी आंदोलन गाजवले हे मात्र खरं आहे.
-दिलीप बिरुटे
जेनझी खूप प्रगल्भ आहेत…
In reply to सरकारला जेनझी ने नागडं केलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेनझी खूप प्रगल्भ आहेत. त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी सरकारमध्ये एकही लायक व्यक्ती नाही.
करावं काय ? हे कळत नाही.
In reply to जेनझी खूप प्रगल्भ आहेत… by आग्या१९९०
आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला' ही एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे. मूळ समस्या किंवा त्रास एका ठिकाणी असताना, उपाय मात्र पूर्णपणे चुकीच्या किंवा वेगळ्याच ठिकाणी केला जाणे, या अर्थाने. सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काय आहे ? विद्यार्थी म्हणतात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. सरकार काय करीत आहे, वेळ काढू धोरण अवलंबून दुसया मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही अशा परिक्षा लीक करणा-याविरुद्ध कडक कार्यवाही करु, काल नीट प्रकरणी ४७ अधिका-यांना बडतर्फ केले. पुढील आठवड्यात नीट आणि तत्त्सम परिक्षेतील गुन्हेगारांना व्यक्तीगत आणि सामुहिक घोळ केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड वगैरे विधेयक येणार आहे. हे सर्व आंदोलन सुरु झाल्यावर सरकारला हे शहाणपण सुचले तो वर आंदोलन दाबण्यासाठी पॅलेट गनचा वापर आणि मारहाण करायची महाराष्ट्र टाइम्सला पहिल्याच पानावर राहूल गांधी पॅलेटगनने दंडावर जखमा झालेल्या तरुणाचे छायाचित्र दाखवत आहे, असे चित्र आले आहे, अशा पद्धतीने आंदोलन हाताळतात ? जनतेला चीड येणार आणि लोक प्रश्न विचारतीलच ना ! आता सीजेपीच्या दोन मागण्या मान्य तत्त्वत: मान्य करण्यात आल्या. नीट आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि चलो संसद मोर्चातील विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत या कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन मागण्या केंद्र सरकारने शुक्रवारी तत्त्वत: मान्य केल्या. विद्यार्थ्यांच्या पाच प्रस्तावारही सरकारने सकारत्मकत दाखवली. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत सरकारचं मौन आहे, त्याबाबत एक दिवसाचा वेळ मागून घेण्यात आला आहे. (संदर्भ- मटा) काल मुंबई आणि पुण्यात तरुणांचे मोठे वादळ घोंघावले आहे. आज आषाढी एकादशी, विठ्ठला सरकारला सुबुद्धी दे आणि हे विद्यार्थ्यांचे आंदोलन त्यांच्या मागण्यासहित मिटू दे, देशावरील अरिष्ट जाऊ दे एवढीच प्रार्थना.... -दिलीप बिरुटे
पोरींच्या हातातील बॅनर…
In reply to सरकारला जेनझी ने नागडं केलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'
'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'
पूर्वी पुरुषाचा कमाल अपमान करायचा असला की त्याला बाईसारखं म्हणायचे. बांगड्या भर.. गरोदर आहेस का. वगैरे.. बाई म्हणजे सर्वात लागणारी शिवी..
आणि आता त्या ऐवजी छातीला ब्रा मिळेल का असे म्हणत आहेत. जेन झी स्मार्ट झाले तरी ही वृत्ती अजून मनातून बाहेर पडली नाही. जेंडर न्यूट्रल पिढी असे ऐकून होतो.
अजून एक. बांगड्या भर म्हणणाऱ्या बायकाच जास्त असत. आताही जेन झी "पोरींच्या" हातात हे फलक आहेत असे दिसतेय.
त्यांनी एक नवीन पातळी गाठली आहे. बीवी नही है तो देश की मारोगे क्या?
म्हणजे हक्काची बायको असेल तर तिची हक्काने मारणे गृहीत आलेच.. ती नसली तर कोणाचीतरी मारलीच पाहिजे. हेही जेन झी पोरींच्या हाती..
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते..
जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.
गर्दीत शिरून लुंगी वर केली की समोरचे अनेक जण डोळे बंद करून घेतात आणि उरलेले काही निर्लज्ज हसतात.
अशा वेळी लुंगी वर केलेल्याने समोरच्यांना कसा दणका दिला म्हणून स्वतःच हसणे.. जोक इज ऑन व्हूम?
आमची आई कोकणातली एक म्हण…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
आमची आई कोकणातली एक म्हण सांगायची.
हगत्याला लाज
कि
बघत्याला
द्वेषाची पातळी किती खाली जाऊ शकते याचे नवेनवे आयाम पाहायला मिळत आहेत.
चालायचंच
हा हा
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
आपल्या मताचा आदर आहेच. सध्या, जुन्या वळणांच्या विचारांच्या माणसाला अशा पोरा पोरींच्या पोष्टरचा त्रास होणे अगदी साहजिकच आहे, नवल वाटत नाही. कपडे कसे घातले, कशी बोलतेस, संस्कारी राहीली पाहिजेस, चारचौघात खाली मान घालून चालली पाहिजे असे संस्काराची अपेक्षा असणारी जुनी खोडं आपल्या आजुबाजूला दिसत असतात. पण, जेव्हा त्या युवती आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या तेव्हा विनाकारण युवतीस झापड मारणारा अधिकारी अशा लोकांना दिसत नाही, उचलून फरफटत नेणा-या मूली त्यांना दिसल्या नाहीत, रडणा-या ओरडणा-या मुलींचा अक्रोश दिसत नाहीत, हीच माणसं अमानुष लाठीमाराचा निषेध करताना दिसत नाहीत. पण, युवती कशा वागल्या हे सांगणारे सध्या खूप दिसत आहेत.
आधीच्या पिढ्यांनी 'सभ्यतेच्या' आणि 'मर्यादेच्या' चौकटीत राहून आंदोलने केली. पण जेन झी पिढीला हा खोटेपणा मान्य नाही. जेव्हा देशात खऱ्या अर्थाने स्त्रियांवर अत्याचार होतात, तेव्हा समाज आणि प्रस्थापित गप्प बसतात. पण आंदोलकांनी संतापून दोन शब्द लिहिले की मात्र समाजाला 'संस्कृती' आणि 'सभ्यतेची' आठवण येते. या मुलींचा संताप त्यातून बाहेर आला आहे, त्यांना माहीत आहे की गोड शब्दांत कोणीही त्यांचे ऐकणार नाही. सत्ताधाऱ्यांना आणि समाजाला अस्वस्थ करणे हाच त्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. आणि तो हेतू या बॅनर्सनी शंभर टक्के साध्य केला असावा असे वाटते.
या मुली गर्दीत स्वतःचे हसे करून घेत नाहीत. त्या अत्यंत निर्भयपणे एका महाकाय आणि शक्तिशाली सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगत आहेत की, "आम्ही तुम्हाला आणि तुमच्या खोट्या पुरुषार्थाला घाबरत नाही. आम्ही आपला आदर करतो पण आपण आमचा राग संताप जेव्हा बाहेर येतो तेव्हा आमची पिढी कोणाचेही ऐकणार नाही, आणि अभिव्यक्तीसाठी आम्हाला कशाचेही बंधन नाही, असा तो संदेश आहे असे वाटते, हे व्यक्तीगत मत आहे कोणाला पटले पाहिजे असा आग्रह नाही.
-दिलीप बिरुटे
सहमत आहे. पुरुषाचा पोशाख…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
सहमत आहे. पुरुषाचा पोशाख स्त्रीने घातला तर ते स्त्रीवादी, पण स्त्रीचा पोशाख पुरुषाने घालणे म्हणजे त्याला खिजवणे. पुरुषाला स्त्रीयांच्या वस्तूंवरून चिडवून आपण स्त्री म्हणजे दुय्यम हेच नकळतपणे बिंबवतोय हे बोल्डपणाच्या नादात समजत नाहीये.
आपल्या देशाच्या स्त्री…
In reply to सहमत आहे. पुरुषाचा पोशाख… by श्वेता व्यास
आपल्या देशाच्या स्त्री राष्ट्रपतीला एखाद्या सरकारी सोहळ्याला दूर ठेवणे हा त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का?
संसदेत सत्ताधारी पक्षाचा खासदार एखाद्या अल्पसंख्याक खासदाराला अश्लील भाषेत शिवी देतो हे त्याच्या परिपकत्वेचे लक्षण मानायचे का? जेनझी जेव्हा हिच भाषा वापरतो तेव्हा त्यांना येथील अंकल अपरिपक्व समजतात.
माझा मुद्दा स्त्रीला इतर…
In reply to आपल्या देशाच्या स्त्री… by आग्या१९९०
माझा मुद्दा स्त्रीला इतर पुरुष किंवा समाज काय वागणूक देतो हा नसून स्त्री स्वतःच स्वतःला दुय्यम कशी करून ठेवते हा आहे. आणि तो विषयाशी अवांतर असल्याने प्रतिसाद दिले नाहीत तरी चालेल.
प्रतिसाद तुम्हाला दिला…
In reply to माझा मुद्दा स्त्रीला इतर… by श्वेता व्यास
प्रतिसाद तुम्हाला दिला नव्हता.
जेनझी हि ज्या मुद्यावर आंदोलन करत आहे ते सोडून त्यांच्याकडे काय उपाय आहेत ते कोणाबद्दल आणि कशी भाषा वापरतात ह्यावर लिहीणाऱ्यांसाठी आहे.
संसदेत आणि बाहेर आपले नेते काय भाषा बोलतात ह्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर हे विद्यार्थी देत आहेत. " " दीदी ओ दीदी " बोलणाऱ्याला इथे कोणी आणि किती विरोध केला आहे हे माहीत आहे. उगाच कोणाचे वकीलपत्र घेवून येवू नका. हो , नंतर सारवासारव करून विश्रांती घ्यावी लागते .
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय…
In reply to प्रतिसाद तुम्हाला दिला… by आग्या१९९०
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय…
In reply to हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय… by श्वेता व्यास
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.
हो , हा प्रतिसाद तुम्हालाच दिलाय आणि अगोदरचा चुकून झाला . प्रतिसादाची खिडकी उघडली गेली आणि लिहिताना लक्षात आले नाही. माफ करा , गैरसमज नसावा .
त्या स्त्रीचा सन्मान समजायचा…
In reply to आपल्या देशाच्या स्त्री… by आग्या१९९०
त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का?
परिपकत्वेचे लक्षण मानायचे का?
विषयाला फाटे कसे फोडायचे ते यांच्या कडून शिका.
गवि काय लिहीत आहेत ते सोडून उगाच बीटींग अराउंड द बुश चालवलंय.
स्त्रीला दुय्यम दर्जा देण्याची चूक आंदोलनातील मुलीच करत आहेत त्याबद्दल लिहिलेले आहे.
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते..
जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.
नेहमीप्रमाणेच हे आंदोलन सुद्धा मूळ मुद्दे सोडून असभ्य व्यक्तिगत हल्ले करून मोदींनाच सहानुभूती मिळवून देणार.
यापूर्वी सुद्धा मोदींवर व्यक्तिगत हल्ले करून मूळ मुद्दे भरकटल्याची अनेक उदाहरणे आहेत. निश्चलनीकरण, देशर संचारप्रतिबंध असे महत्त्वाचे मुद्दे हातात असूनही मोदींंची पत्नी, बायकोला सोडून पळालेला, चौथी नापास, निरक्षर, इंग्लिशचा गंध नाही, मोदींचे उच्चार, मोदींचा स्मृती इराणी, कंगना, मेलनी, सुषमा स्वराज यांच्याशी संबंध जोडून घाणेरडी टिंगल, १५ लाखांचे आश्वासन, मोदींचे लहानण . . . . यातून मूळ मुद्दे केव्हाच मागे पडले व व्यक्तिगत वारांमुळे मोदींनाच सहानुभूती मिळून लाभ झाला. यातील बहुसंख्य व्यक्तिगत आरोपात शून्य तथ्य होते (उदा. त्यांची पदवी, त्यांचे इंग्लिश, १५ लाखांचे आश्वासन, महिलांशी लावलेले संबंध इ.) व बहुसंख्य जनतेचा या कोणत्याही आरोपांवर शष्प विश्वास बसला नाही.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कळस अशा भक्ती परंपरेने ज्या महाराष्ट्राला जातीधर्म पंथ प्रांत सगळ्या बंधनातून मुक्त करून विष्णुदास केले मेणासारखा मऊ स्वभाव आणि प्रसंगी वज्राचा निर्धार दिला त्याच परंपरेने सकल महाराष्ट्राला विठुराय बरोबर गोष्टीला बरोबर आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची सुबुद्धी देऊ देत हीच प्रार्थना.
जेन झीच्या फलकांविषयी:"हे…
जेन झीच्या फलकांविषयी:
"हे बोलायचं नाही, तसं वागायचं नाही" अशा भीतीच्या चौकटीला जेन झीने एका आठवड्यातच सुरुंग लावला. जे शब्द अश्लील किंवा अर्वाच्य म्हणून मागच्या पिढ्या दाबून ठेवत होत्या, त्याच पिढ्या अनेक कटू वास्तवांवर मात्र सोयीस्कर मौन बाळगत होत्या. जेन झीने हा दुटप्पीपणा उघडपणे नाकारला.
त्यांच्या फलकांची भाषा टोकदार, स्पष्ट आणि कोणताही आडपडदा न ठेवणारी आहे. त्यांनी कथित सभ्यतेचा आणि संस्कृतीच्या नावाखाली उभारलेल्या दिखाऊ मुखवट्याचा भंग केला आहे.
या सगळ्यातून एक गोष्ट ठळकपणे दिसते या पिढीची स्पष्टता हेवा वाटावी अशी आहे. आधीच्या अनेक पिढ्यांनी भावना, अन्याय आणि वेदना मनातच दडपून ठेवल्या; जेन झी तसं करत नाही. विशेषतः महिलांनी मुकाटपणे सहन करायचं, अन्याय गिळून गप्प राहायचं, यातच कर्तव्य समजायचं, ही अनेक पिढ्यांची मानसिकता या पिढीने मोडून काढ आहे असे दिसले.
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.
तुम्ही स्वैराचार शब्द वापरला म्हणून
In reply to जेन झीच्या फलकांविषयी:"हे… by गणेशा
एक मजेशीर माहिती द्यायचा मोह टाळत नाही, इथे मोदींना गुप्तांग इत्यादी पोस्टर दाखवणारी ही पिढी शिव्या देणारी ही पिढी सेक्सुअली आजवरची सगळ्यात उदासीन पिढी आहे ! असे हल्लीच एका ठिकाणी वाचले होते ! त्यामुळे ही पोरे एखाद्याला xxड्या म्हणण्यात त्या अवयवाचा वर्णनोद्भाव अश्लील भाव आहे का फक्त एक टारगट नॉन कन्फर्मिस्ट अभिव्यक्ती आहे ही रेखा आपल्यासारख्या ढळलेल्या पिढीला कळण्यास खूपच पुसट आहे असे वाटते
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी…
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.
अगदी बरोबर .
हि मुले अपेक्षेपेक्षा हुषार निघाली हे बऱ्याच पालकांच्याही पचनी पडले नाही. येथील अंकल पार्टीने तर सरकारपेक्षा अधिक धसका घेतला आहे. ह्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रत्येक समस्थेकडे उत्तर आहे असा दावा केलेला नाही हे अंकल पार्टीला माहीत नाही का? उगाच फाटे फोडत आहेत.
अखेर धर्मेंद्र प्रधानांनी…
अखेर धर्मेंद्र प्रधानांनी मंत्रीपदत्याग केला. खूप उशीर केला, पण मोदी-शहांना अंदाज आला की परिस्थिती हाताबाहेर जात आहे व त्यातून त्यांना मंत्रीपदत्याग करण्यास सांगितले असावे. योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.
ओ काय पण काय ?
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.
ही योग्य वेळ आहे ? इतकी नाचक्की होऊन जगभरात ! ? पोरांची डोकी फोडून बदनामी होऊन ?? पहिल्या दोन दिवसात तिथे फक्त दिपके अन् वांगचुक असताना डाव्या विद्यार्थी संघटना पूर्ण ताकदीने तिथे जमा होण्याच्या अगोदर काही केले असते तर वेगळे, हे असे आठवडाभर आय माय शिव्या खाऊन स्वतःच्या अन् संलग्न व्यक्तींच्या अवयवांच्या (ह्यात इटालियन पीएम सुद्धा आल्या) चर्चा होऊन गेल्यावर राजीनामा घेतला अन् म्हणे योग्य वेळ ?
दिल्ली सीमेवरील शेतकरी…
In reply to ओ काय पण काय ? by वृषभ खोंडे
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन किंवा भूमी अधिग्रहण विधेयके यातून कधी माघार घेतली व त्याचा पुढे कसा लाभ मिळाला तो इतिहास पहा.
कोणी लिहिलेला ?
In reply to दिल्ली सीमेवरील शेतकरी… by श्रीगुरुजी
तथ्याधारित का तुम्ही मिसळपाव वर लिहून हौस पुरवून घेतलेला? 😂😂😂😂😂
स्वतः शोध घ्या.
In reply to कोणी लिहिलेला ? by वृषभ खोंडे
स्वतः शोध घ्या.
जसा विकास सापडत नाही तसा
In reply to स्वतः शोध घ्या. by श्रीगुरुजी
जसा विकास सापडत नाही तसा
घेतला की !
In reply to स्वतः शोध घ्या. by श्रीगुरुजी
प्रज्ञाचक्षु + तर्कचक्षु दोन्ही लावून शोधला , काहीच सापडले नाही !
भक्तिचक्षु नाहीयेत मोकळे, आमचे तरी भक्तीचक्षु आज अन् कायम पांडुरंगावर भिस्त ठेवून आहेत अन् त्याच्यापुढे काही बघत नाहीत, त्याच्यावर गंडांतर आले तर समाचार घ्यायला आम्ही पुरेसे खंबीर आहे त्यासाठी आम्हाला संस्थात्मक किंवा सरकारी ओंजळीने धर्माच्या गायीचे दूध प्यायची गरज नाही, शिक्षण नावाचे वाघिणीचे दूध पुरेसे आहे.
रच्याकने , रामलला पुढील दानपेटीतील भक्तीच्या परिसीमेतून भोळ्या हिंदूंनी टाकलेल्या चवली पावलीच्या समुच्चयाचा अपहार करून भ्रष्टाचाराच्या कमाई ने बंगले बांधल्याबद्दल तर रामलला ने ही शिक्षा केली नाहीये ? ह्यावर पुढील बौद्धिकात एक सेशन घ्या !
आणि तुमच्या प्रतिसादाचा एकंदरीत सूर
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
😂😂😂😂😂
सेल बी लाईक
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
पांडू तुम्हारी एक महिने की तनखा कट.
अर्थात यातून मूळ समस्या…
अर्थात यातून मूळ समस्या सुटलेली नाही, परंतु आंदोलन आता थंड होईल असे वाटते.
आता " चंदा चोर गद्दी छोड़ "…
In reply to अर्थात यातून मूळ समस्या… by श्रीगुरुजी
आता " चंदा चोर गद्दी छोड़ " बाकी आहे. अर्थात हे आता भक्तच करतील .
आंदोलन थंड झाले.
In reply to अर्थात यातून मूळ समस्या… by श्रीगुरुजी
आंदोलन थंड झाले.
राजकारण रीड करणे शिका
In reply to आंदोलन थंड झाले. by श्रीगुरुजी
जमेल तुम्हाला नीटच !
पोरं जिंकली, genz रॉक्स 👍
पोरं जिंकली, genz रॉक्स 👍
"विठ्ठल पावला हो genz ला"…
In reply to पोरं जिंकली, genz रॉक्स 👍 by Bhakti
"विठ्ठल पावला हो genz ला"
-इति Genx
खरंच जिंकली का हे…
In reply to पोरं जिंकली, genz रॉक्स 👍 by Bhakti
खरंच जिंकली का हे समजण्यासाठी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागेल. Won a battle, but lost the war असेही होऊ शकते.
गेल्या बारा वर्षांत…
गेल्या बारा वर्षांत सरकारकडून एकतरी काम नीट झाले.
जंतर मांतर येथे पोलिसांनी…
जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.दादरच्या दोन मूुलीना identify करून समज दिली आहे असे त्या मूुलीनी सांंगीतल्या चे व्हिडिओ होते. उत्तराखांडच्या गावातल्या काही जणांना सुद्धा detain केले. राहत्य ठिकाणी आजूबाजूला कुठेही गुंन्हा घडला,riot सदृश काही झाले की पोलिस ह्या रिेकॉर्ड वरच्या लोकांना आधी आत घेतात. त्यावेळी पोलिसांना आम्ही जेन झी आहोत, आम्ही कोणाला घाबरत नाही असे सांगायचे की आंदोलन करणाऱ्या नेत्यांना फोन करून आम्हाला सोडवा म्हणून विनवण्या कारायच्या हा विचार सुद्धा आंदोलकांनी आताच करून ठेवावा. राजकीय कार्यकर्ते सुद्धा हे प्रकार झेलतात, पाश्चात्ताप करतात पण त्यांना निदान आयुष्यभर आंदोलने, पोलिस केस,माोर्चा हेच कारायचं असते. इथे आंदोलक स्वतः विद्यार्थी म्हणूवून घेत आहेत त्यांना हे झेपेल का नाही माहिती नाही. कंदाचित ह्या समस्येवर सुद्धा जेन झी la काहीही जमू शकते असे सांगितले जाईल.
Fear mongering करू नये !
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
तुम्ही पोलिस स्टेशन वर भरपूर चकरा मारल्या असत्या तर हे असले तर्कट न लिहिते आप्पा ! ह्यात स्टेप बाय स्टेप चिरफाड होऊ शकते, पण ती थोड्या वेळाने !
तूर्तास गुरुजी काय ज्ञान पेटी उघडतात ते पाहतो.
रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना…
In reply to Fear mongering करू नये ! by वृषभ खोंडे
रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना ही भीती नाहीये.
थोडीशी कायदेशीर अक्कल असल्यास
In reply to रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना… by अप्पा जोगळेकर
ही भीती कोणालाच असणार नाही ! त्यासाठी सगळेच रेकॉर्डवर जाणे गरजेचे नसते, परत सांगतो fear mongering करू नये.
अरे बापरे! मग त्यातून…
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
अरे बापरे! मग त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याहूनही मोठं आंदोलन व्हायचं.
जंतर मांतर येथे पोलिसांनी…
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.
FRS system कशी काम करते हे सांगा अगोदर. फेस मॅच करायला आधी फेस डेटाबेसेस मध्ये असायला हवा. तो असतो पोलिसांकडे हिस्टरी शीटर जनतेचा. त्यांना शा* काय फरक पडत नाही.
IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही.
माहिती नाही/ verified नाही ते मांडून भीती पसरवण्याचे पाप का डोक्यावर घेता ? किमान IMSI catcher काम कसे करते त्याची माहिती गुगलून तरी पाहायची राजे. IMSI खूप cliche तंत्रज्ञान असून ते असे लॉ अँड ऑर्डरला सुद्धा वाटेल तसे वापरत नाहीत.
पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल.
कसा ? तो सांगा , राजे तुमच्या आमच्या देशात फुटपाथ वर छत्र्या लावून सिमकार्ड विकणारी एअरटेल अन् जियोची पोरे बायोमेट्रिक verification करू शकतात पण पोलिसांना ते allowed नाहीये, आधार ऍक्टचा अभ्यास करा
म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.
FIR, non-cognizable offence (अदखलपात्र गुन्हा), बाँड, स्टेटमेंट इतकी माहिती घ्या. तूर्तास तुमच्या वकुबात ह्याची गरज आहे 😂🙏🏾
अंगाशी येणार सरकारच्या …
अंगाशी येणार सरकारच्या .
आता चंद्राबाबू आणि निरतांश कुमार टेंशन मध्ये आले आहेत.
तृणमूल (२०) व शिल्लक…
In reply to अंगाशी येणार सरकारच्या … by आग्या१९९०
तृणमूल (२०) व शिल्लक शिउबाठा (६) विभागातून आधीच तरतूद करून ठेवली आहे. गरज भासल्यास ट्रोजन अश्व (८) हाताशी आहेतच जे परवाच मोदींची भेट घेऊन आले. चंद्राबाबू व नितीशचे २८ गेले तर ३४ ची तरतूद आहे.
हार्दिक पटेल, कन्हैया कुमार…
हार्दिक पटेल, कन्हैया कुमार प्रमाणे आता अभिजीत दिपकेला सुद्धा विविध पक्षांकडून आमंत्रण येईल. यातून रागा व प्रिव काहिसे मागे पडल्यासारखे भासतात. श्रीराम मंदिर देणग्या चौर्य प्रकरणही मागील शेगडीवर गेल्यासारखे भासतेय.
कोणाला कशाचं बोडकीला केसाचं
In reply to हार्दिक पटेल, कन्हैया कुमार… by श्रीगुरुजी
कोणाला कशाचं बोडकीला केसाचं
हार्दिक पटेल ?
In reply to हार्दिक पटेल, कन्हैया कुमार… by श्रीगुरुजी
म्हणजे ज्याची ती सीडी वगैरे लीक झाली होती (मायला इथे बी लीक) त्यो काय ? अर्र भारतीय जनता पार्टी चे तरुण तुर्क आमदार आहेत नाही का आता ते विरमगाम मतदारसंघातून ?
प्रश्न हा आहे विविध पक्षांकडून आमंत्रण आलेला अन् त्यातील एक आमंत्रण स्वीकारून काँग्रेस मध्ये गेलेला हार्दिक पटेल गुजरात भाजपने पक्षात घेऊन आमदार केला कसा ? का इतर पक्षांनी आमंत्रण देणे चुकीचे अन् तुमच्या पक्षात आले की पवित्र का काय? भाजपने वेगळेपणाचा अंगरखा तर झुलवूच नये आता जनता टर टर फाडणार तो ! काँग्रेसने उष्टावून सोडलेला विरोधात असणारा पाटीदार आंदोलन प्रणेता पण चालतो ह्यांना सत्तेत रहायसाठी

सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद…
In reply to हार्दिक पटेल ? by वृषभ खोंडे
सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद वगळता).
मखलाशी करू नका
In reply to सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद… by श्रीगुरुजी
माझा प्रश्न अतिशय स्पष्ट आहे, अपवाद सोडता सर्व विक्रीस उपलब्ध आहेत वगैरे ठीक आहे घेणाऱ्या मध्ये तुमचा जीव का प्राण असणारी पार्टी का आहे ? त्याचे उत्तर द्या !
नुसतं श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय असली फर्लांग भर लांबडी नावे घेऊन काही होत नसते पार्टी विथ ए डिफरन्स इत्यादी धूळफेक डोळ्यात करणे बंद करा, ये पब्लिक है ये सब जानती है
नवीन शिक्षणमंत्री कदाचित…
नवीन शिक्षणमंत्री कदाचित फडणवीस असतील. कळेलच लवकर.
मराठी माणूस वर जावा म्हणून शुभेच्छा
In reply to नवीन शिक्षणमंत्री कदाचित… by श्रीगुरुजी
बाकी बामनाचा माणूस वर जातोय म्हणून कैक लोकांच्या पोटात पण दुखेलच! 😂
व्वा
In reply to नवीन शिक्षणमंत्री कदाचित… by श्रीगुरुजी
फ्रांडअंकल नी स्वतः कडे ठेवावे खाते अशी फार इच्छा आहे.
एकतर त्यांना आवड आहे. रोज वर्ग भरेल. लोक सर म्हणतील.
गुरुपद आधीपासून घेतले आहे. बाकी सगळे सोडावे जेन झी आणि अल्फा शिक्षणाचे व्रत घ्यावे.
.
महत्वाचे म्हणजे आगामी आंदोलन सोयीचे होईल.
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
- राहत इंदोरी साहब का शेर अर्ज है
अगर ख़िलाफ़ हैं होने दो, जान थोड़ी है
यह सब धुआँ है, कोई आसमान थोड़ी है।
लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है।
सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!
पोरं लढली, पोरं जिंकली खूपच आनंद झाला.
आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.
नवे मंत्री, नवे कायदे काय काय बदल होतील ते कळेलच.
येतो आता निवांत.....लोकशाही जिंदाबाद, युवाशक्ती जिंदाबाद...
-दिलीप बिरुटे
चला बरं झालं
चला बरं झालं आंदोलन एकदाचं संपलं.
नुसतं आंदोलन नाही . गोदी…
In reply to चला बरं झालं by धर्मराजमुटके
नुसतं आंदोलन नाही . गोदी मिडीया , आयटी सेल आणि येथील अंकल पार्टी सुद्धा संपली. आणि हो सामान्य माणसाला सरकाराची दहशतीही भीती वाटत होती ती पण संपली. कंगनाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज देशाला स्वातंत्र्य मिळाले.
आता पोरांवरचे सर्व गुन्हे…
आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.
ज्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली त्यांचे पण गुन्हे मागे घ्यायचे का?
पोलिसांना मूलभूत हक्क मानवी हक्क वगैरे नाहीत का?
एखादद्या पोलिसाने आपल्या मानवी हक्काबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर काय करायचं?
शांत गदाधारी अंकल शांत…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
शांत गदाधारी अंकल शांत. दिर्घ श्वास घ्या बरं .
नानामाझ्या प्रश्नांची उत्तर…
In reply to शांत गदाधारी अंकल शांत… by आग्या१९९०
नाना
माझ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्या कडे?
मी शांतच आहे आणि थंडही आहे.
चिडून उगाच कुणाच्यावर पातळी सोडून टीका वगैरे करत नाही.
नाही.पण निकाल तुमच्या…
In reply to नानामाझ्या प्रश्नांची उत्तर… by सुबोध खरे
नाही.
पण निकाल तुमच्या मनासारखे लागतील.
आंदोलन समाप्त झाले आहे. आता…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
आंदोलन समाप्त झाले आहे. आता कोणत्याही मागणीला सरकार शष्प किंमत देणार नाही. गुन्हे मागे घ्या, आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला एक कोटी द्या, मोदींनी माफी मागितली पाहिजे इ. मागण्यासुद्धा संपल्या. आंदोलनातील मूळ महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षून केवळ प्रधानांच्या मंत्रीपद त्यागावर संपूर्ण लक्ष दिल्याने ते वगळता काहीही हातात आले नाही.
अभिजीत दिपकेला व्यक्तिगत लाभ मिळेल. अमेरिकेत नोकरी मिळत नव्हती. पण आता विविध पक्षांकडून आमंत्रण येईल व हार्दिक पटेल, कन्हैया कुमार यांच्यासारखा अल्पकालीन लाभ मिळेल.
हार्दिक पटेल
In reply to आंदोलन समाप्त झाले आहे. आता… by श्रीगुरुजी
सिटिंग आमदार आहे, शॉर्ट टर्म फायदा हा ? तुमच्या करावर काँग्रेसने उष्टा करून सोडलेला अन् भाजपने फक्त सत्तलोलूप होऊन आमदार केलेला हा गडी जन्मभर पेन्शन खाणार !
गुन्हे मागे घेणे मान्य केलेच आहे
In reply to आंदोलन समाप्त झाले आहे. आता… by श्रीगुरुजी
गुन्हे मागे घेणे तर मान्य केलेच आहे आणि यापुढेही या आंदोलनाशी संबंधित कोणतेही नवीन गुन्हे नोंदले जाणार नाहीत हे ही मान्य केलंय असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सरकारने सांगितलं
तसेच आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला नियमांप्रमणे जास्तीत जास्त रक्कम देण्याचेही मान्य केले आहे.
हे लगेच हरखून गेले पण तिकडे सरकारने मान्य केल्याच सर्व तीन मागण्या
सोयीस्कर पोझिशनिंग
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
कायदेशीर रित्या ज्यांच्यावरचे खटले मागे घेतले जाऊ शकतात ते स्पष्ट असते, जे लोक नॉन - काँग्निझॅबल ओफेन्स मध्ये आहेत ते सरळ सरळ सी समरी (क्लास सी समरी) करून टेबलावर सोडले जातात, कैक लोक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बसल्या जागी सोडले जातात. ज्यांनी मारहाण इत्यादी बीएनएस २०२३ अंतर्गत नॉन बेलेबल ओफेन्स केले आहेत त्यांचे मात्र तपास रिपोर्ट, पंचनामे, अटक मेमो, जप्ती पंचनामे इत्यादी कारवाई सुरू होईल, पुढेमागे त्यांना पण सरकार पॉलिटिकल consideration मध्ये सी समरी फाईल करण्याचा आदेश देईल दिल्ली पोलिस कमिशनरला आणि ते पण सुटतील. आता इतकी सरळ ढळढळीत न्यायिक प्रक्रिया तुम्हाला माहिती नव्हती असे तर म्हणू नका सुबोध सर.