Skip to main content

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

वाचने 9724
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

केंद्र सरकारने पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक त्यांच्याविरोधातील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) केलेली कारवाई रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जोधपूर कारागृहातून शनिवारी दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. लडाखला राज्याचा दर्जा आणि घटनेच्या सहाव्या अनुसूचीत त्याचा समावेश करण्यासाठी लेहमधील विविध संघटना आणि 'कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स'ने केलेल्या आंदोलनानंतर ५९ वर्षीय वांगचुक यांना २६ सप्टेंबर २०२५ रोजी रासुकाअंतर्गत अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांतर याच सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे गुन्हे मागे घेतले आणि त्यांची सुटका झाली. लोकांचा जनक्षोभ भड़कू नये म्हणून सरकार ब्याकफुटवर आलं. एखादं सरकार किती नालायकपणा करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण हे आहे, आमच्या विरोधात भूमिका घेतो ना ? मग तुला जेलात घातले पाहिजे. असे कितीतरी लोक ज्यांची माहिती नाही पण ते जेल मधे असावेत. सोनम वांगचुक जर भाजप समर्थक असते तर त्यांना पद्मश्री पद्मभूषण दिलं असतं सरकारने. व्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरलात तर सरकार आपली सरकारी ताकद कशी वापरते त्याचं उत्तम उदाहरण. जरा लाज धरा रे.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहा. चांगली बातमी. १७० दिवस तुरुंगात ठेवून सुटका केली. जनक्षोभ भडकू नये म्हणून सुटका केली म्हणे. भलीच काळजी ब्वा ह्यांना लोकांची. रासुकाचे गुन्ही मागे घेतले म्हणताहेत. असे गुन्हे मागे घेता येतात? ठेवता आले नाही म्हणावे की सरळ.... मोक्याच्या वेळी अटक करुन, सोशल मिडीयावर पुरेसे चारित्र्यहनन करुन, त्रास देऊन तुरुंगात डांबून परत सोडायचे तेही असेच....

सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर बऱ्याच news चॅनेल्सनी आणि youtuber ने तो कसा लदाखी जनतेला भारताविरुद्ध भाडंकावत होता सांगायला सुरवात केली. त्यांच्या भाषांनातील एखादा शब्द सारखा दाखवून वातावरण निर्मिती केली गेली. आज सहा महिन्यानंतर त्याची सुटका झाली. खरतर तो लादखी लोकांसाठीच बोलत होता. आज सोनम वांगचुक आहे उदया आपल्या भागातील एखादा सामाजिक कार्यकर्ता जो पाण्यासाठी म्हणा नाहीतर ट्राफिक साठी आंदोलन करत असेल तो ही असू शकेल. सुटका झाल्यानंतर तो पूर्वी सारखी आंदोलन करेल का ते माहिती नाही. केजरीवालाही असचं निवडणुकीपूर्वी उचलले होते. प्रचारासाठी कोर्टाने जमीन दिलेला पण व्हायचं ते नुकसान झालंच.

In reply to by रात्रीचे चांदणे

म्हणजे अघोषित आणीबाणी आहे असे विरोधक बोलत होते ते खोटे नाही, काही पट्टीचे गोबरभक्त त्या विरोधकांवर डाफरायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अघोषित आणीबाणी
कार्टूनिस्ट सतीश आचार्य ह्यांना एक्स कॉर्प तर्फे कळवण्यात आले की माहीती व प्रसारणखात्याने दोन वेळा नोटीस पाठवून व्यंगचित्रे हटवण्यास सांगितली आहेत.

बुंद से गयी वो हौद से नही आती! हे सत्य आहेच. उगाच मेगाबायटी प्रतिसाद दळले काय गिगा/टेरा बायटी प्रतिसाद दळले तरी अंधभक्त काही सुधारणार नाहित, त्यामुळे सत्य आणि तथ्य फार लांब राहीले. काही बेसिक प्रश्न मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला ( सत्य ). लिहिलेल्या प्रतिसादावरुन विचारतो रॉ आणि रॉ टीम फक्त आणि फक्त पंतप्रधान कार्यालयालाच रिपोर्ट करतात (मला) मान्य. अंधभक्त मान्य करतात, मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला ( सत्य ), (मला) मान्य. अंधभक्त मान्य करतात, एक तार्किक प्रश्न रॉ टिम काहुटा जर पंतप्रधान कार्यालयालाच रिपोर्ट करत होती तर मी असे का म्हणु नये की रॉ टिम काहुटा पंतप्रधान कार्यालयाला कीवा पंतप्रधानांनी नियुक्त केली नव्हती ??? (पंतप्रधान कार्यालयाल जर सगळे करते तर रॉ कार्यालयाची गरज काय ) मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला, ती टिम कोणत्या पंतप्रधानांनी (अथवा कोणाच्या पंतप्रधान कार्यालयाने ) नियुक्त केली ??? मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने नियुक्त केलेली (रॉ टिम काहुटा) टिमचा जर मोदे (मोरारजी देसाई ) सरकारनेच बळी दिला तर याला मी विक्रुती म्हणायला तयार आहे. पण जर दुसर्या पंतप्रधानांनी ( पंतप्रधान कार्यालयाने ) नियुक्त केलेली टिमचा जर सरकारनेच हकनाक बळी दिला तर मी त्याला राष्ट्रद्रोहि विक्रुती का म्हणु नये... अशा राष्ट्रद्रोहि विक्रुती मोदे (मोरारजी देसाई ) सरकारला पाठींबा देणारे त्यावेळचे जनसंघ आताचे भाजपा कसे जबाबदार नाहीत. बर ते जाऊ दे, मला तर हातात "गरम बटाटा" दिला म्हणुन ओरड्णार्‍या ( ते पण निव्रुत्तीनंतर ) लेखक लष्करप्रमुखापेक्षा, सरकारला कोर्टात धारेवर धरणारे (ते पण सेवेत असताना) लष्करप्रमुख (व्ही के सिंग) चांगले लष्करप्रमुख वाटतात. मला तर हातात "गरम बटाटा" दिला म्हणुन ओरड्णार्‍या ( ते पण निव्रुत्तीनंतर ) लेखक लष्करप्रमुखाला काय म्हणावे ज्याने सरकारला अडचणीत टाकले ( ते पण संसदेत ) असा प्रश्न पडतो. एवढे गिगा/टेरा बायटी दळण का दळले. अंधभक्त काय सत्य परिस्थिती स्विकारणार नाहीत, त्यांमुळे तार्किक प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाला बेताल लेखन बोलले जाईल आणि लोक हसतील.

भारतात एखादा पक्ष वरचढ होतो, लोकशाहीची पायमल्ली करतो, जनताही ते स्विकारते, न्यायव्यवस्था, मिडीया, लोकशाहीचे आधारस्तंभ त्यास मान्यता देते यात आपल्या संविधानाचा फोलपणा मुख्यतः कारणीभूत आहे. पण संविधान हे "होली काऊ" असल्याने त्याविरूद्ध कोणी बोलावयास धजावत नाहीत. संविधानात अनेक तृटी आहेत त्या दुरूस्त करण्यास वाव आहे. उदा. आपली निवडणूक पद्धत, निवडणूक आयोगाचे पंख कापणे, आमदार, खासदार यांना घरी परत बसवणे, त्यांचे विरूद्ध काहीतरी कारवाई करणे, त्यांना धाक बसेल अशा उपाययोजना, कायदे करणे, भ्रष्टाचारास शिक्षा देणे इत्यादी इत्यादी.

सध्या देशात, गॅस टंचाईच्या बातम्या आहेत. सध्या व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या सरासरी गरजेच्या केवळ 20% गॅस पुरवठा करण्याचे आदेश आहेत. हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्रासाठी हा पुरवठा मर्यादित केला असून, अनेक हॉटेल्स बंद तर, विद्यार्थी वसतीग्रुहावर अनेक ठिकाणी परिणाम झाल्याच्या बातम्या आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका बसतोच आहे, खाद्यतेलाचे सोयाबीन पामतेल सूर्यफूल तेलाच्या किमती दहा ते सोळा टक्के वाढल्या आहेत, या गोष्टींपेक्षा सरकारला संसदेच्या पायरीवर बसलेला चहा बिस्कीट्स वाला महत्वाचा वाटत आहे. संसदेच्या पायरीवर बसून विरोधी पक्ष नेत्याने समोसा खाल्ला चहा पिला यामुळे संसदेच्या गरिमा जपली गेली नाही यावर भाजपेयीकडून आंदोलन करण्यात आले. सध्या हाच जीवनमरणाचा प्रश्न आहे असे मंद लोकांचं मत असावे. दुसरीकडे २०४ निवृत्त सैन्य अधिका-यांनी राहुल गांधी यांना खुले पत्र लिहून संसद परिसरात प्रदर्शन करतेवेळी निर्बंध असतानाही चहा बिस्कीट खाल्ली यामुळे संसदेच्या मर्यांदांचे उल्लंघन झाल्याचे लिहिले, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. ( दुव्यावर बातमी आहे आणि पत्रही आहे. ) सैन्य अधिकारी अधून-मधून जागे होतात हे बरं आहे. गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात नवल वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्ताधारी गांधी, नेहरू, इंदिरा गांधींवर जेव्हा टीका किंवा दोष देतात तेव्हा समजून जायचे की हे न्यूनगंडाने पछाडले आहेत. त्यांनी गाठलेली उंची ह्यांना कधीच गाठता येणार नाही हे ते जाणून आहेत. सध्या राहुल गांधींना लक्ष करत आहेत म्हणजे राहुल गांधी योग्य त्या मार्गावर वाटचाल करत आहेत ह्याची खात्री आहे. विरोधी पक्षनेता झाल्यापासून फारच घाबरत आहेत. भीती हवीच, पण इतकीही नको की खुद्द विश्वगुरुला संसदेत हजर राहण्याची भीती वाटावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात नवल वाटत नाही. +१ गोबारयुगाची स्तुती करणारे अनेक सिलेंडरच्या रांगेत लागलेत कडक उन्हात! त्यांच्या नावाचा सिलेंडर आधीच बुक होऊन काळ्या बाजारात जेल सुद्धा, गोबरयुगात भ्रष्टाचाराला सीमा राहिलेली नाही, पोलीस कारवाईही होत नाही, कारण गोबरयुगीन सत्ताधारी नेतेच हे करा असतात. सगळ्याना गोबारयुगाच्या शुभेच्छा! गोबरयुग चिरायू होवो.

सध्या (डॉक, खरे सोडून) १५ सदस्य हजर आहेत. मुक्त विहारि ताजे प्रेत अमरेंद्र बाहुबली चंद्रसूर्यकुमार धर्मराजमुटके गवि श्वेता व्यास मदनबाण रात्रीचे चांदणे संदिप एस कपिलमुनी आंबट गोड chetanahirao दुर्गविहारी A.N.Bapat मुविकका आले, आता संदेशखालीला कुणी वाली मिळाला. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की राजनीति का आईना है https://www.aajtak.in/opinion-analysis-/story/sadeshkhali-case-witness-…

In reply to by मुक्त विहारि

मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा गृहमंत्री हवे होते. अश्या घटना घडल्याच नसत्या, काय म्हणता?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमची इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता जन्मजात आहे, की ह्या साठी तुम्ही काही वेगळे काही शिक्षण घेतले आहे? इत्यलम, बाय द वे, तुमचे प्रतिसाद, कितीही मनोरंजक असले तरी, ते प्रतिसाद, मला विचार करायला भाग पाडतात, हे मात्र नाकारता येत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला तर काही काळा करता, प्रवेश बंदी केली होती.... अर्थात्, कुणी किती स्वाभिमान बाळगायचा? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न... मला वेळ मिळाला तर मी इथे येतो...

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून सात परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये सहा युक्रेनियन आणि एक अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे.हे आरोपी वैध व्हिसावर भारतात आले होते, परंतु त्यांनी अनिवार्य असलेल्या रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट (RAP) शिवाय मिझोराममध्ये प्रवेश केला. NIA च्या मते, हे आरोपी त्यांच्या कारवायांसाठी युरोपमधून मिझोराममार्गे म्यानमारला मोठ्या प्रमाणात ड्रोनची बेकायदेशीर आयात करण्यात गुंतले होते.हे गट काही प्रतिबंधित "भारतीय बंडखोर गटांना" शस्त्रे आणि इतर दहशतवादी साहित्य पुरवून तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन मदत करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणा संबंधी अधिक माहितीसाठी Sputnik च्या पोर्टलवर किंवा त्यांच्या एक्स हँडलवर जावे. विशेष : सुमारे २,००० युक्रेन युद्धातील व्हेटरन्स मिझोरम मार्गे म्यानमार मध्ये बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी गेल्याची माहिती सध्या समोर येत आहे. संंदर्भः NIA arrests six Ukrainians, one from US for plotting terror activities in India American mercenary Matthew VanDyke, 6 Ukrainians arrested in India by NIA यातील मॅथ्यू व्हॅनडाईक (Matthew VanDyke) हा विशेष चर्चेत आहे,त्याचे मुख्य कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाचे एक्स अकाउंट आणि केरळ भाजपाचे स्टेट प्रेसिडेंट राजीव चंद्रशेखर यांचे एक्स अकाउंट Matthew VanDyke या व्यक्तीला (जो CIA mercenary - भाडोत्री सैनिक आहे असे म्हंटले जात आहे.) एक्सवर हा घटनाक्रम चर्चेत येण्याआधी पर्यंत फॉलो करत होते! P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Dil Lagana Mana Tha (Official MV) Krish & Kishore Mondal | Kunaal V, Devv S | Sanam Johar Ashi Singh

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर शोक करायला सहा दिवस लागल्यानंतर आता इस्त्रायल अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. या मदतीबद्दलही इराणने ट्वीट केले आणि डिलीट केले अशीही बातमी होती. मानवता वादी दृष्टीकोनातून अशी मदत वाटत असली तरी, आतंराष्ट्रीय राजकारणाचे शहाणपण आहे, अर्थात आता हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असे वाटते. इस्त्रायल कडून संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मदत होईल भविष्यात कधी पाकिस्तानशी ऑपरेशन सिंदूर सारख्या छोट्या-मोठ्या संघर्षात इस्त्रायलच्या अत्याधुनिक शस्त्रे मिळावीत हा आपला हेतु असावा. इस्त्रायलची बाजू घेतल्यास इराणला थेट गमावणे परवडणारे नाही, त्यामुळेच राजकीय पाठींबा किंवा युद्धातील सहभागापेक्षा किंवा गंभीर चिंता व्यक्त करण्यापेक्षा मानवतावादी मदतीच्या निमित्ताने इराणसोबत आपले संबंध जिवंत ठेवू इच्छितो, अशी एक निती दिसत आहे. इराणला सोडले तर, जी इस्लामिक सहकार्य संघटना आहे, जी जगातील मुस्लीम बहुसंख्य राष्ट्रांची संघटना आहे, तर त्यांच्यातही भारताबद्दल नकारात्मक किंवा नाराजी राहिली असती. त्या संघटनेचा सदस्य होण्याच्या अडचणीमुळे आणि आपली धर्मनिरपेक्ष असे चित्र असल्यामुळे त्या गटातील देशांशी द्वीराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यावर आपला भर आहे, त्यामुळे ही मदत करण्याच्या प्रयत्न असावा. पुढे काय काय होते पाहात राहू या. -दिलीप बिरुटे