Skip to main content

पापा की परी

लेखक साहना यांनी बुधवार, 24/05/2023 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. ४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले. आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू : १. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते. २. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य. ३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत. ४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली. हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते. १. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत. २. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत. ३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे. ४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते. ५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली. ६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे. -- हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे. -- घटस्फोट बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता. नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते. काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो. हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.

वाचने 26658
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;) पापाच्या परीने एकतर नोकरी करून सगळ्या कामांना मदतनीस लावावी , मस्त शांती मिळेल.नोकरी नसेल करायची तर कोणत्याही एका कामाची मदतनीस कमी करावी (हाकानाका).

In reply to by Bhakti

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;) हो, बहुसंख्य विवाह ठरवून होतात. या लेखात बहुतांशी मुलींना दोष दिला असून मुले पापभीरू दाखविली आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजू समसमान आहेत. मुलीने विवाह करण्यापूर्वी खालील मुद्दे पहावे. १) मुलगा किमान आपल्याएवढा तरी शिक्षित असावा व किमान आपल्याएवढा तरी कमावता असावा. अन्यथा मुलीला भविष्यात न्यूनगंडातून निर्माण झालेल्या पुरूषी अहंकाराचा त्रास होऊ शकतो. २) मुलगा पूर्ण निर्व्यसनी असावा. नेहमी नाही, कधीतरीच मित्रांबरोबर अपेयपान करतो असे सांगितले असल्यास विवाह टाळावा कारण कधीतरीची वारंवारता भविष्यात (विशेषतः चाळीशीनंतर मोठ्या प्रमाणात वाढते). ३) लग्न न करणारी किंवा घटस्फोट होऊन माहेरी आलेली किंवा नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी राहणारी बहीण मुलास असल्यास विवाह टाळावा कारण अशी बहीण असूयेतून किंवा नैराश्यातून भावाच्या प्रपंचात हस्तक्षेप करते. ४) आपली गुंतवणूक किती, आईवडीलांकडे किती संपत्ती आहे, आईवडीलांनी आपल्या नावावर काय ठेवले आहे याची माहिती मुलीनं विवाहानंतर काही वर्षे तरी नवऱ्यास देऊ नये. नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतरच आवश्यक वाटल्यास सांगावे. ५) मुलीने आपले आर्थिक व्यवहार स्वत:च करावे. सर्व काही नवऱ्याच्या हातात देऊ नये. ६) विवाह ठरल्यानंतर विवाहापूर्वगच्या काळात नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा. तो धरसोड वृत्तीचा आहे का, व्यसने लपविली आहेत का, काही भानगडी होत्या/आहेत का, पैशामागे आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यातील काही गोष्टी आढळल्यास विवाह टाळावा. हे सर्व मुद्दे मुलांकरिता सुद्धा लागू आहेत. अजून एक - लग्नानंतर लगेच किंवा लग्नापूर्वीच शक्य असल्यास मुलाच्या आईवडीलांनी आपल्या मुलाचा संसार वेगळा थाटून द्यावा. भविष्यात मतभेद होऊन कटु मनाने वेगळे होण्यापेक्षा लग्न होतानाच आनंदाने वेगळे राहिल्यास कटुता निर्माण होण्याची शक्यता कमी असते व दोन्ही जोडप्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते. तसेच लग्नानंतर दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी मुलामुलीच्या प्रपंचात हस्तक्षेप टाळावा.

मिपा म्हणजे फ्रस्टेेटेड म्हाताऱ्यांंचे विरंगुळा केंद्र झाले आहे. मालक,चालक, पालक मिपा मधे जरा नवचैतन्य इंफ्युस करा.

बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत.
हा सगळ्यात हलकट प्रकार असतो. एक प्रकार ओळखीत बघितला आहे. संबंधित स्त्रीचे वय आता ६० च्या आसपास असावे. १५ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ५-७ वर्षात कॅनडातील एका विधुर मराठी माणसाला तिने गटवले. आम्हा सगळ्यांना तिने सांगितले की तिला कॅनडाचे इमिग्रेशन मिळाले आहे म्हणून ती तिथे जात आहे. तेव्हाच प्रश्न पडला होता वयाच्या पन्नाशीनंतर इमिग्रेशनसाठीचे पॉईंट्स तिला मिळालेच कुठून? नवरा अनेक वर्षे कॅनडात वास्तव्याला आणि कॅनडाचा नागरिक होता. कॅनडाच्या नागरिकाशी लग्न केले म्हणून तिला बहुदा व्हिसा मिळायला काही अडचण आली नसावी. तिथे गेल्यानंतर तिने त्याला अगदी ठरवून त्रास द्यायला सुरवात केली. डोमेस्टिक हिंसेची खोटी तक्रार दाखल करेन अशी धमकी देऊन त्याला अगदी आपल्या तालावर नाचवले. शेवटी नवरा मानसिक छळ करतो या नावावर त्याच्याकडून घटस्फोट मिळवला. मला वाटते कॅनडातील कायद्याप्रमाणे घटस्फोट झाल्यास नवर्‍याने बायकोला घर देणे बंधनकारक असते (चुभूदेघे). तसे घर तिने त्याच्याकडून उकळले. पोटगी म्हणूनही बरीच रक्कम तिला मिळत आहे आणि ती आता कॅनडात काहीही न करता आरामात राहात आहे. तिचा भाऊ पण कॅनडात असतो. त्याच्याकडून हे सगळे कळले. म्हणजे किती नालायकपणा आहे हा. अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली. मग त्याची पाचावर धारण बसली. असली तक्रार केली असती तर नुसती नोकरीच गेली असती असे नाही तर तुरूंगात जावे लागले असते. समाजात नाचक्की झाली असती ती गोष्ट वेगळीच. मग ती कधी एकदा सोडून जाते याची वाट बघत राहिला. तिचे काम चांगले नसूनही तो तिला चांगले रेटिंग द्यायचा आणि तिला कधीही भेटायचाही नाही. Appraisal चे बोलणे कसे काय व्हायचे काय माहित. शेवटी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी १५-२० दिवस ती बया एकदाची सोडून गेली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत त्याचा सरळसरळ गैरफायदा घेणे झाले. फेसबुकवर दिपीका नारायण भारद्वाज अशा मुलींच्या हलकटपणाविषयी लिहित असते. अनेकदा कोणत्या कोणत्या लॉजमध्ये जाऊन वेगवेगळे प्रकार करायचे आणि मग बलात्काराची तक्रार दाखल करेन म्हणून सरळ ब्लॅकमेल करायचे असले प्रकारही अनेक होतात. त्याविषयीही दिपीका नारायण भारद्वाज लिहिते. असल्या नालायक मुली स्त्रियांचेच जास्त नुकसान करत असतात. असे प्रकार अधिक प्रमाणात व्हायला लागले तर ज्या ठिकाणी स्त्रियांना खरोखरच अशा प्रकारांना सामोरे जावे लागते ते प्रकारही असेच खोटे आहेत असे वाटायला लागायचा संभव जास्त आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं. केवळ एक मुलगी म्हणतीये म्हणून पुरुषाला कंपनीतून काढून नाही टाकणार. कंपन्यांमध्ये POSH कमिटी असते. त्यांच्याकडे केस गेली तर सर्व पुरावे असतील तरच इतकी कडक कारवाई केली जाते. हां, आता तो पुरुष सहकारी जर का खूप मोकळेपणे(म्हणजे साधारणपणे ऐतराज मधल्या अक्षय कुमार च्या पात्रासारखा) स्त्री कर्मचाऱ्यांशी वागत असेल तर हा मुद्दा कोण कसा उचलून धरेल सांगता येत नाही.

In reply to by नचिकेत जवखेडकर

हे बोलणे तांत्रिकदृष्ट्या मान्य आहे. पण अशी धमकी मिळाल्यावर त्याची मानसिक अवस्था नक्की काय झाली असेल याची कल्पना अशा प्रसंगातून न गेलेल्या कोणाला करता येणार नाही. अशा वेळेस तर्कशुध्द किंवा लॉजिकल वर्तणुक होईलच याची खात्री कशी देता येईल?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अर्थातच, मानसिकदृष्ट्या खचून जाणं स्वाभाविक आहे आणि इथे त्या स्त्री कर्मचाऱ्याला अनुमोदन नाहीचे. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by नचिकेत जवखेडकर

अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली
दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं.
बरेचदा अश्या गोष्टींचे पुरावे नसतात. आणि एच आर आणि व्यवस्थापन नेहमी तटस्थ असेलच असे नाही. (ते अंतर्गत राजकारणावर अवलंबुन असेल.), त्यामुली कडे काही पुरावे नसले तरी, तीला साथ देणारे कोणी (स्त्री असेल तर अधिकच उत्तम) असेल त्या पुरुषाची सद्दी संपलीच असे समजायचे. एच आर आणि व्यवस्थापनाची बांधिलकी ही कंपनीबरोबर असते, एकदा त्यांना समजले की त्या पुरुषाला साथ देऊन कंपनीचे नुकसान होईल तर ते लगेच त्या पुरुषाची साथ सोडतील. भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे लोक संशयाने बघतात, एकादा पापभिरु असेल तर त्याचे जगणे मुश्कील होत जाते.

In reply to by Trump

आता तर तो कोणा मुलीला/स्त्रीला इंटरव्ह्यूसाठी पण बोलावत नाही. आपल्या टीममध्ये एकही मुलगी/स्त्री नको असे त्याला वाटायला लागले असेल तर त्यात त्याचे काय चुकले? जोपर्यंत सगळे कायदे स्त्रियांच्याच बाजूचे आहेत आणि असा गैरफायदा घ्यायचे प्रकार चालू आहेत तोपर्यंत अशी दुसरी टोकाची प्रतिक्रिया आली तर नवल वाटू नये.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हीच गोष्ट दुर्दैवाने SC/ST ची आहे. SC/ST कायद्यामुळे बहुसंख्य छोटे उद्योग ह्या लोकांना दूरच ठेवत आहेत. हल्ली हाऊसिंग सोसायटी मध्ये सुद्धा शांतताप्रिय समाजाप्रमाणे ह्यांना जागा न देण्याची परंपरा सुरु होत आहे. चुकीच्या पार्किंग मध्ये ठेवलेली गाडी हलवायला सांगितली म्हणून Sc/ST कायद्याची धमकी दिली, आपल्या गॅलरीतून केबल नेण्याची परवानगी नाकारली म्हणून कायद्याची धमकी दिली असल्या गोष्टी सर्रास घडत आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार... हा प्रकार अगदी जवळून बघितलेला आहे. माझ्या मित्राचा मुलगा, जो माझ्या मुलाचा वर्गमित्र देखील आहे. त्याच्या बाबतीत घडलेला हा किस्सा. तो आणि त्याची एक स्त्री सहकर्मचारी कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. राहण्याची व्यवस्था कंपनीनेच चांगल्या हॉटेलमध्ये केलेली होती. ही स्त्री सह कर्मचारी कंपनीने दिलेले काम कारण्याऐवजी भटकण्यात आणि शॉपिंग करण्यात वेळ घालवत होती. मित्राचा मुलगा थोडासा सेवाज्येष्ठ असल्याने त्याने तिला हटकले. तिथून परतण्याच्या आदल्या दिवशी ती मुलगी त्या मुलाला म्हणाली ,'आज मी तुला ट्रीट देते'. ते दोघे हॉटेलात एकत्र जेवायला गेले. त्या मुलीने मित्राच्या मुलाला बियर किंवा ड्रिंक घेण्याचा आग्रह केला, तो मुलगा काही घेत नसल्याने त्याने सौम्य शब्दात नकार दिला. ती मुलगी मात्र बियर प्याली. हॉटेलवर परतल्यावर ती म्हणाली,'अरे, दोन मिनिटे माझ्या रूमवर येतोस का'? ते रूममध्ये शिरल्यावर ती मूलगीच त्याच्या अंगचटीस येऊ लागली. त्यावर सावध होऊन तो मुलगा तिच्या रूमवरून निघून आपल्या रूम मध्ये गेला. परत आल्यावर त्या मुलीने सह कर्मचाऱ्याबद्दल लैंगिक आत्याचाराची तक्रार केली. त्या सर्व प्रकरणात त्या मुलाला अतिशय मानसिक त्रास झाला. अखेर कोणताही धब्बा न लागता तो सुटला. त्या मुलाचा मानसिक त्रास अगदी जवळून बघितला आहे. त्याने लवकरच ती नोकरी बदलली.

In reply to by Nitin Palkar

एका मित्राची पत्नी कुटुंबियांच्या चिथवण्यावरून त्याला सोडून गेली. पार येण्यासाठी पैसे मागू लागली. त्याने साफ नकार दिला. मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली. सुदैवाने हा मुलगा चतुर होता त्याने तिला सरळ घराबाहेर हाकलले. मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते. मुलगा जर बळी पडला असता तर ताबडतोप सरकारी दवाखान्यात तपासणीची वगैरे व्यवस्था वकिलांनी करून ठेवली होती.

In reply to by साहना

मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते
मॅरिटल रेपचा कायदा कधी झाला भारतात ?

In reply to by साहना

मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली.
सेक्स = शरीरसबंध, संभोग, प्रणयराधना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबंध ठेवणे हा पुरुषाचा हक्क आहे. त्यामुळे तो गुन्हा होऊ शकत नाही.

In reply to by Trump

मग ते बच्चन साहेबांनी नो मीन्स नो असे गुरगुरत म्हटले ते कशाबद्दल होते?

In reply to by कानडाऊ योगेशु

The Supreme Court of India is set to hear petitions about the constitutionality of the ‘marital rape exemption’ on May 9, 2023. As of 2019, marital rape has been criminalized in 150 countries, but marital rape under the Indian Penal Code (IPC) only applies in the situation of “non-consensual intercourse with a wife who is aged between 12 and 15 years”. Where the exception does not apply, the IPC (Section 375) states that “sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape.
https://www.equalitynow.org/news_and_insights/a-ruling-on-marital-rape-… -------------------
https://www.indiatoday.in/law/story/law-that-says-sexual-intercourse-be… Law that says sexual intercourse between man and wife isn't rape even if by force Chhattisgarh High Court today held that sexual intercourse by a man with his wife is not rape, even if it was by force or against her wish. The High Court, on the basis of this reasoning, discharged a man for the offence of rape while at the same time upholding the charges against him for unnatural sex.

आमच्या अत्यंत जवळच्या मित्राची गोष्ट आहे. अत्यंत गरीब परिस्थितून वर आला, IIT शिक्षण, अत्यंत बुद्धीमान इत्यादी. घराची परिस्थिती इतकी गरीब कि साधारण एकूण नेट वर्थ १,००,००० पेक्षा कमी असावे. मी साधारण त्याच्याच वयाची आणि त्याच्यासोबत फिरणे वगैरे होत असे. (दूरचे रिलेशन असल्याने आमचे नाते शक्य नव्हते). एका आंटीने माझ्यावर दबाव टाकला कि ह्या पोराला आत्ताच अमुक मुली सोबत साखरपुडा करायला सांग. त्याने फक्त हो म्हणावे मी १० दिवसात सर्व करते. ५ रुपये खर्च करण्याची गरज नाही. मी म्हटले कि मुलगी कोण ? तर एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची (डायरेक्टर ऑफ समथिंग) एकुलती एक पोरगी. मी म्हटले मग तो ह्याला कशाला देईल पोरगी ? पण आंटी मानेना. मी सहज मित्राला म्हटले. त्याला इंटरेस्त नव्हता कारण त्याला इंग्लंड मध्ये शिष्यवृत्ती मिळत होती पण तारुण्य सुलभ कुतूहलाने आम्ही म्हटले हि मुलगी पाहून तरी घेऊया. त्यामुळे आम्ही पत्ता काढला आणि त्या सरकारी अधिकाऱ्याच्या भल्या मोठया बंगल्यापुढे गाडी पार्क करून नजर ठेवली. हि मुलगी फेसबुक वगैरेवर नव्हती. शेवटी आम्हाला दिसली. साधारण म्हस आणि रानडुक्कर ह्यांच्या सारखी दिसणारी आणि किमान ३०० पाऊंड तरी वजन असेल. म्हणजे हि रिक्षा वैगैरेत मावणे शक्यच नव्हते. मी माझ्या आंटीला बरेच फैलावर घेतले. ती वरून म्हणते कि बापाने जावयासाठी बंगला, गाडी आणि इतर अनेक असेट्स ठेवले आहेत. शेवटी माझ्या मित्रानेही थेट हिच्या सोबत लग्न करण्यापेक्षा मी सन्यास घेईन असे सांगून अँटीचें तोंड बंद केले. नंतर ह्या मुलीचे लग्न झाले आणि २ महिन्यात मुलगी घरी परत. मी मुद्दाम आंटीला फोन करून कारण विचारले. तर म्हणजे जावयाला सासर्याने ह्युंदाई वेर्णा गाडी दिली. एक दिवस गर्दीतून गाडी चालवत असताना कुठे तरी लागली. त्यावर मुलीने पतीला सुनावले, माझ्या बापाची गाडी आहे, सांभाळून चालाव इत्यादी. गाडी आणि पापा कि परी ह्या दोन्हांची रवानगी पतीने घरी केली.

धाग्याचा मुख्य विषय हुंडा हा नाही. पण त्यावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी काही मत मांडतो. हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत. पण दुसरीकडे असे बघा की एखादा बीए वा बी कॉम उत्तीर्ण झालेला, कुठेतरी साधीशी-कमी पगाराची नोकरी करणारा मुलगा आणि उच्चशिक्षित, सुंदर , चांगली नोकरी करणारी मुलगी यांचा विवाह ( त्यातही नियोजनपूर्वक / अ‍ॅरेंज्ड) होवू शकतो काय ? अगदी हजारांत एखादा अपवाद असेल तर तो बाजूला ठेवून ढोबळ मानाने सांगा ... पण तेच सामन्य रुपाची किंबहूना कुरुप सुद्धा , साधारण शिक्षण असलेली मुलगी व उच्चशिक्षित / उत्तम नोकरी असणारा मुलगा यांचा विवाह ही फार सामान्य गोष्ट आहे. हे शक्य होते ते हुंड्यामुळेच ना ? याला हुंडा न म्हणता खरे तर तडजोड मुल्य म्हणायला हवे. तडजोड कोणत्याही स्वरुपात असू शकते. हुंडा हा त्यातला एक रोखठोक प्रकार. पुर्वी साटेलोटे (मुलाच्या बहिणीचे लग्न मुलीच्या भावासोबत जुळवणे) पद्धत होती, ती ही बहुधा अशा प्रकारच्या तडजोडीचे एक स्वरुप असावे. "दम लगा के हाएशा" हा चित्रपट आपण पाहिला असेल तर त्यात दहावी अनुत्तीर्ण , फारसे उत्पन्न नसलेला पण रुपाने देखणा कनिष्ठ मध्यमवर्गीय नायक (आयुष्मान खुराणा) अभ्यासात हुशार, स्पर्धा परिक्षेची तयारी करत करिअर घडवू पाहणारी पण आकाराने अवाढव्य व त्यामुळे रुपाच्या खात्यात शून्य (की उणे ) गुण असलेली नायिका (भूमी पेडणेकर) यांचा विवाह होतो. माझ्या आठवणीप्रमाणे यात हुंड्याची देवाणघेवाण दाखवलेली नाही. पण नायकाचे शिक्षण / करिअर /उत्पन्न याबाबतीत नायिकेने केलेली तडजोड हा एक प्रकारचा हुंडाच आहे. आपण आयुष्यात तडजोडी करुन जगू नये असे प्रत्येकालाच वाटते. पण अशा विविध तडजोडी होतात हे सत्य आहे. उच्चशिक्षित मुलाने घेतलेला हुंडा म्हणजे भीक वा खंडणी नव्हे पण त्याने स्वीकारलेल्या तडजोडीचे ते मुल्य आहे. ते मुल्य म्हणजे १०-१५-२५ लाख वगैरे रुपये हे पैशाच्या स्वरुपात उघड दिसून येते. पण मुलाने केलेली तडजोड काय / त्याचे मुल्य काय ते नेहमीच उघडपणे दिसून येत नाही. (ज्या मुलाला तडजोड स्वीकारुन मन मारत जगायचे नाही तो हुंड्याची अपेक्षा करत नाही, किंबहूना वधुपित्याने स्वेच्छेने दिलेल्या भेटीसुद्धा स्वाभिमानाने नाकारतो.) मुलाच्या पालकांनी मिळणार्‍या हुंड्याकरिता मुलाला त्याचे मन मारायला लावणे (त्याला आवडेल अशा मुलीशी त्याचे लग्न न लावता केवळ अधिक हुंडा देणार्‍या मुलीशी त्याचे लग्न लावून देणे) चुकीचे. तसेच मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिकडृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरिता प्रयत्न करणे, स्वतःच्या आरोग्याची, फिटनेसची तिने काळजी घ्यावी अशी तिला सवय लावणे हे न करता पैशाच्या जोरावर जो मुलगा केवळ तडजोड म्हणून मुलीला स्वीकारायला तयार झाला आहे त्याच्या गळ्यात बांधणे हेसुद्धा चुक. त्यामुळे दोघांच्या जीवनात प्रेम, ओढ न राहता केवळ तडजोड्/व्यवहार शिल्ल्लक राहतो (बहुधा). मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे तसेच आपल्या अपत्याचे लग्न झालेच पाहिजे हा अट्टहास मनातून काढून टाकायला हवा. एखादी मुलगी सुशिक्षित / स्वावलंबी असूनही तिच्या रुपामुळे तिचे लग्न होत नसेल तर ते सत्य स्वीकारावे. एखाद्या मुलाने तडजोड म्हणून तिला स्वीकारावे यापेक्षा तिचे लग्न नाही झाले हे वास्तव कमी क्लेषकारक असेल. मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही. एक प्रसिद्ध वाक्य इथे उद्धृत करतो "You don’t marry someone you can live with, you marry the person who you cannot live without.” "

In reply to by तर्कवादी

> हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत. बरोबर. हुंडा आहे ह्याचा अर्थ ह्या प्रकारचं निंदनीय घटना घडतीलच असे नाही. आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात पण ह्या निंदनीय गोष्टी घडत नाहीत. हुंड्यासाठी छळ मांडणारे कुटुंबीय कायद्याला घाबरत नाहीत, कायदा काहीही असू अश्या घरात पोरगी लोटणे म्हणजे तिला संकटात फेकण्यासारखेच आहे. पण अशामुळे संपूर्ण हुंडा प्रथेला अनैतिक ठरविणे चुकीचे आहे. सरकारी नोकरी असलेल्या अधू मुलीने बेरोजगार तरुणाकडे लग्न करावे हा सुद्धा हुंडाच आहे, इथे चेक आधीच फाडला जात नाही तर हप्त्या हप्त्याने फाडला जातो.

In reply to by साहना

आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात
नाही त्या वरदक्षिणा म्हणातात.

In reply to by तर्कवादी

हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो

In reply to by तर्कवादी

हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो

एकंदरीतच मौज आहे. एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. बाकी, बाकी म्हणाल तर धागाकर्ती/कर्ते जरा माणसांत मिसळल्या/ले तर सँपल सेट अजून वास्तविक झाला असता. बाकी काय, तालेब बिलेब वाचीत राहा, उधळण्या ज्ञानकण साठवित राहा, घेतला वसा टाकू नका एवढी माफक अपेक्षा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. मीनव्हाईल लग्नाळू मुले ;) https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. मीनव्हाईल लग्नाळू मुले ;) https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही. अ‍ॅरेंज मॅरेज मधे बर्‍याच गोष्टी लग्नानंतरच समजुन येतात. १०-२० वर्षात जे समजत नाही ते १०-२० दिवसात कसे समजणार? शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात. नवरा/नवरीला तेव्हा तितकीशी अक्कल नसते.(मरतंय आता :) पळा). अजुन एक म्हणजे पहीले काही दिवस नखरे करुन "हे नको/ते नको" केल्यावर थोडी अक्कल येऊन अपेक्षा कमी कमी होत जातात आणि "काहीही चालेल" पर्यंत मजल जाते. जन्मभर एकटे रहाण्याची तयारी असणारे थोडेच असतात, मग तडजोड्च पर्याय उरतो. अजुन एक म्हणजे या सगळ्यात आपण वर/वधू शिकलेले, हातीपायी धड(अव्यंग) वगैरे अध्याह्रुत धरले आहे. तसे नसल्यास तडजोड करावीच लागणार ना? आमच्या नात्यात एक पायाने अधू, पण सरकारी नोकरी असणारी मुलगी होती. चाळीशी आली पण लग्न जमेना. मग एक कमी शिकलेला मुलगा मिळाला, स्थिर नोकरी नाही. पण सामोपचाराने लग्न झाले, संसार झाला, मुलगा झाला. मुलाचे शिक्षण वगैरेही झाले. सगळे घर जन्मभर तिनेच चालवले. अर्थात सगळे काही आलबेल नव्हते, पण पार पडले. म्हातारपणी तिने आई वडीलांनाही नवर्याच्या मदतीने सांभाळले. त्यानी सुखाने डोळे मिटले. तडजोड न करता हे झाले असते का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण पार पडले
पार पडणं हेच एकमेव उद्दिष्ट होवून जातं आयुष्याचं... तडजोड न करता हे झाले असते का? आयुष्यात सगळं काही असेल पण जोडीदारबद्दल प्रेम / ओढ नसेल तर अशी तडजोड असू नये इतकंच मला वाटतं.. बाकी शिक्षण, उंची , पगार ई तडजोडी दुय्यम आहेत..अर्थात ज्याचा त्याचा विचार आणि दृष्टीकोन.. पण तडजोडी होतात हे वास्तव आहेच...तडजोडी झाल्याच नसत्या तर कदाचित हा प्रतिसाद लिहायला मी अस्तित्वात नसतो किंवा वाचायला तुम्ही (कृपया व्यक्तिशः घेवु नका)
शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात
अ‍ॅरेंज मॅरेज ही संकल्पना मोडीत काढायला हवी.. किमानपक्षी पहिली पायरी म्हणून घरच्यांनी बाळासाठी/बेबीसाठी स्थळ बघणे, पारखणे, छाननी करणे व निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणे हे तरी बंद करावं. (वरच्या एका प्रतिसादात मी हेच म्हंटलंय)

In reply to by तर्कवादी

+१ तडजोडीचा पाया जर शारीरिक व्यंग ,रंग,वजन,उंची,अधूपणा,काही स्किन इश्यु,हेअर इश्यु इत्यादी असेल तर त्यातून ही तडजोड न्यूनगंड म्हणून कायम राहणार नाही का? शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे. एक मुलगी आहे.ती कमालीची हुशार आहे.पण एक शुल्लक समस्या आहे.पण मुलगी म्हणून तिला तिचा न्यूनगंड नाही.करीयरच्या बाबतीत तिने काही चुका केल्या आहेत.त्या सुधारणा करूनच लग्न करेन असं ठरवलं आहे.कोणी आपल्यावर उपकार करू नये ,प्रेमानेच स्वीकार करावा असा मानस आहे (finger r crossed :))

In reply to by Bhakti

शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे. अगदी. आणि त्याबरोबर लनाआधी शरीरसंबंध असणे हे काही पाप नाही.

आवडला व त्यांतील विचार पटले. लेखांत तुम्ही घटस्फोटाचा उल्लेख केला आहे. भारतीय समाजातील काही प्रकरणे ह्याहून पुढे गेलेली आहेत. म्हणजे, ह्या 'पापा क्या पर्‍या' पैशासाठी पुरूषांशी॑ संबंध ठेवतात अथवा लग्न करतात. मग त्या पुरुषावर व घरांतील इतर पुरूषांवर बलात्काराचे आरोप ठेवतात. आपल्या येथील ह्यासंबंधातील कायदा नक्की काय आहे हे मला ठाऊक नाही, पण एखाद्या स्त्रीने हे आरोप केल्यावर त्या पुरुषाला तात्काळ अटक केली जाते. त्याचे स्वतःचे व त्याच्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त होऊन जाते. अनेकदा पैसे देऊन ह्यांतून सुटका करून घेणे हा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे रहातो. तसे केले तरीही डाग रहातोच! ट्वीटरवर दीपिका नारायण भारद्वाज @DeepikaBhardwaj ही स्त्री अशा अनेक केसेसचा स्वतःहून पाठपुरावा करते. ह्या प्रत्येक केसची सविस्तर माहिती ती तिच्या ट्वीट्सवरून देत असते. ह्यांत, केवळ पैशासाठी श्रीमंत व्यक्तिशी लग्न करून मग त्या व्यक्तिवर तसेच त्याच्या वडिलांवरही घृणास्पद आरोप केले जातात. -- इथपासून, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेऊन नंतर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप करणे-- इथपर्यंत अनेक केसेस त्यांनी रीपोर्ट केल्या आहेत. त्या स्वतः ह्यांतील शक्यतो बर्‍याच केसेसचा पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करतात. ह्या दुसर्‍या प्रकारांतील काही केसेस थक्क करणार्‍या आहेत-- उदा. एका स्त्रीने दोनेक वर्षांत ६ ते ७ पुरुषांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करणे!! हे सर्व करतांना, अर्थात, त्यांना अनेक, तथाकथित स्त्रीवादी 'अ‍ॅक्टिव्हिस्टां"कडून शिव्या खाव्या लागतात. पण त्यांनी आपले कार्य नेटाने सुरू ठेवलेले आहे. त्यांना ट्वीटरवर 'फॉलो' केल्यास थक्क करणार्‍या केसेस दिसून येतात.

In reply to by प्रदीप

दीपीका भारद्वाज ह्यांच्या प्रयत्नांमुळे गुरगांव पोलिसांनी काही स्त्रीयांना अटक केलेली आहे. ह्या स्त्रीया, अनेक पुरुषांवर, बलात्काराच्या एकाहून अधिक केसेस दाखल करीत होत्या.

ती मटार सोलले की आईला फोन करते "काय करू ह्याचे?" "फ्रीज मध्ये ठेव हवाबंद डब्यात" असा प्रतिसाद आला की ओके होतो मग कार्यक्रम. अजून राजाराणी सुखात आहेत पण हे लैच विचित्र वाटले होते. असो, बरे व्हावे बिचाऱ्यांचे हीच सदिच्छा. पाश्चात्य संस्कृती म्हणजे वीकेंड कल्चर आत्मसात करायचे आहे लोकांना. श्रमप्रतिष्ठा वगैरे नाही. असे काहीसे वाटते.

सामाजिक प्रश्न आहे तुम्ही मांडलेला त्यामुळे मी त्यावर विचारलेला प्रश्न पण सामाजिक दृष्टीने पहावा असा डिस्क्लेमर आधीच देतो. तर प्रश्न असा की १. आपली जात काय ?? विचारण्याचे कारण - आपण जात न मानण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असेल तर हिंदुहितार्थ आपले अभिनंदन आहे, पण समाजात एकंदरीत अजूनही जात चालते. तुम्ही जे सांगितले आहे की "मी अमुक क्ष क्ष (आकड्यात) घटस्फोट जवळच्या नातलगत बघितले आहेत म्हणून हा प्रश्न पडला. आणि अर्थात माझ्याकडे सध्या विदा उपलब्ध नाही पण घटस्फोट होण्यात आर्थिक स्थिती, पोरी (अन् पोरांचे पण) पालनपोषण, शिक्षण यांच्यासोबत जात सुद्धा महत्वाची असावी. काही जातींत घटस्फोट जास्त होतात असा आपला माझा एक समज होय. त्यामागची कारणमीमांसा मला समजून घ्यायची आहे जर माझे परसेपशन बरोबर असले तर ??

In reply to by इपित्तर इतिहासकार

> १. आपली जात काय ?? गौड सारस्वत ब्राह्मण ! मी जातीभेद मानत नाही पण स्वतःची जात आणि जाती विषयक कार्यक्रम तसेच एकीकरणात भाग घेते. घटस्फोटांत जात महत्वाची आहे का ? ह्याचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. कारण आकडेवारीत १००% तुम्हाला जात आणि घटस्फोट ह्यांच्यात कोरिलेशन सापडेल पण ते थेट असण्यापेक्षा इतर घटकांवर अवलंबून आहेत जे सुद्धा जातीवर अवलंबून असू शकतात. आकडे पाहू. मी स्वतः GSB असल्याने माझे नातलग सुद्धा तसेच असतात आणि त्यामुळे तो बायस इथे आढळेल. १. घटस्फोट १ - दोन्ही GSB, मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षित, मुलगा श्रीमंत मुलगी मध्यमवर्गीय. चूक : मुलीची ! २. घटस्फोट २ : मुलगा लिंगायत, मुलगी मराठा - दोन्ही उच्चशिक्षित आणि श्रीमंत - चूक : ५०-५० ३. घटस्फोट ३ : दोन्ही GSB , दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित चूक १००% मुलीची. ४. घटस्फोट ४: दोन्ही GSB, मुलगी घटस्फोट ३ मधलीच. दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित. चूक १००% मुलीची. ५. घटस्फोट ५: मुलगी GSB, मुलगा बंगाली ब्राम्हण - मुलगी उच्चमध्यम, मुलगा अतिश्रीमंत दोन्ही उच्चशिक्षित - चूक १००% मुलाची. ६. घटस्फोट ६: मुलगी तामिळ ब्राह्मण, मुलगा तामिळ ब्राम्हण - दोन्ही मध्यम उच्चशिक्षित - चूक मुलीची १००%. ६. घटस्फोट ६: दोन्ही कोकणस्थ मध्यम वर्गीय उच्चशिक्षित - चूक ५०-५०. ७. घटस्फोट ७ : दोन्ही गरीब, जातींने साधारण कोळी जातीचे. चूक ठाऊक नाही. शिक्षण दहावी पास. ८. घटस्फोट ८: तांत्रिक दृष्ट्या घटस्फोट नाही कारण पतीला पत्नी आपल्या प्रियकरासोबत ओयो मध्ये सापडली. हिंसा झाली. (जास्त बोलत नाही कारण प्रकरण कोर्टांत आहे) दोन्ही उच्चशिक्षित ९. घटस्फोट ८: GSB मुलगी, मराठा अमेरिकन स्थायिक मुलगा. मुलीला मारहाण झाली त्यामुळे माझ्या मदतीने पळून भारतात परत आली. उच्चशिक्षित १०. घटस्फोट १०: दोन्ही GSB मध्यम वर्गीय, मुलगी डोक्याने ठीक नाही. उच्चशिक्षित ११. घटस्फोट ११: मुलगी GSB, मुलगा चित्पावन. - डिटेल्स ठाऊक नाही. उच्चशिक्षित १२: घटस्फोट १२ : दोन्ही एकुलते एक अति श्रीमंत GSB दोन्ही सुमार शिक्षण माझ्या मते प्रमुख घटक : १. मुलगी एकुलती एक असणे किंवा घरची परिस्थिती भक्कम असणे. २. दोघांपैकी एक उच्च शिक्षित असणे (पदवीधर व्यावसायिक किंवा पदव्युत्तर). ३. अन्याय/जाच सहन करण्याची क्षमता कमी असणे. ४. मुलीच्या आईवडिलांचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप. ५. सासू सासर्यांनी बरोबर राहणे. ६. अति धार्मिकता. ७. हिंसा. - बहुतेक वेळा स्त्री जास्त हिंसा करते असे ऐकून आहे. जात हे मूळ कारण कुठेही असेल असे जाणवत नाही. पण जात आणि आर्थिक व्यवस्था, शिक्षण आणि आई वडिलांची मुलीला घरी बोलवून घेण्याची आर्थिक क्षमता ह्याचा संबंध आहे असे असू शकते. जात आणि घरगुती हिंसा ह्यांच्यावर डेटा उपलब्ध आहे : तथाकथित दलित महिलांना सर्वाधिक हिंसेला सामोरे जावे लागते. पण दलित समाजांत लग्नविस्च्छेद जास्त होत असेल वाटत नाही. कारण हिंसेचे समर्थन सुद्धा दलित समाजांत जास्त आहे.

श्री युसुत्सु यांनी यासंदर्भात मिपावर बरेच लेखन केले आहे. या छ्ळवाद्यांचे काय करायचे? https://www.misalpav.com/node/18319 पुरुषांचा छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी https://www.misalpav.com/node/14624 कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात? https://www.misalpav.com/node/14287 अजुन खुप काही लिहिले आहे, अभ्यासु लोकांनी येथे उत्खनन करावे. https://www.misalpav.com/user/425/track

बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे सार - १) सद्यकालातील मुली अत्यंत लाडावलेल्या असून त्यांच्या अपेक्षा अतोनात आहेत. २) लग्नानंतर विवाह मोडण्यास मुलीच उत्तरदायी आहेत. ३) मुलांना स्वत:चे मत नाही व निर्णयक्षमता नाही. ४) हुंडा घेणे/देणे योग्य आहे. ५) लग्नापूर्वी शरीरसंबंध असले तरी चालले पाहिजे. ६) आईवडीलांनी मुला-मुलीचे लग्न ठरविण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचे त्यांना ठरवू दे. __________________________________ माझे मत - १) सर्वच मुली लाडावलेल्या नाहीत व अतोनात अपेक्षा असलेल्या नाहीत. काही मुली अपवाद आहेत. लाडावलेली व अतोनात अपेक्षा असलेली अनेक मुले सुद्धा पाहिली आहेत व पाय जमिनीवर असलेली मुले सुद्धा पाहण्यात आहेत. २) फसवणूक दोन्ही बाजूंकडून झालेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. विवाह मोडण्यात मुले सुद्धा उत्तरदायी आहेत. ३) स्वतःची मते व निर्णयक्षमता असलेली व नसलैली सुद्धा अनेक मुले-मुली पाहण्यात आहेत. ४) हुंडा देणे/घेणे पूर्णपणे अयोग्य असून अकायदेशीर आहे. ५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे. ६) जर अनुरूप सारख्या संस्थेतून ठरवून लग्न करायचं असेल किंवा अगदी प्रेमविवाह असेल तरीही आईवडीलांचा अनुभव व मत महत्त्वाचे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्री श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद व्यवहारिक आणि समतोल आहे.
५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे.
अतिशय सहमत, त्यामुळे लग्नासाठीची इच्छा, जोडीदारा/रीणीविषयीची उत्सुकता, एकमेकांविषयी असलेला प्रामाणिकपणा हेच संपुन जाते. माझ्या पहाण्यात अशी काही जोडपी आहेत की ज्यांचे एकमेकाबरोबर पटत नाही, पण ते एकमेकांना फसवणार नाहीत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे मतभेद काही दिवसांच्या अबोल्यानंतर संपतात. पण अशी एकमेकाबद्दल आदर आणि खात्री असलेली जोडपी तयार होणे जास्त आवश्यक आहे. जर सगळ्या गरजा बाहेर भागायला लागल्या तर लग्नाची गरज काय असे वाटणे सहाजिकच आहे. -- नोकरी, धंदा सगळे चांगले चालले आहे, कोणाला मोठा आजार नाही, आव्हानात्मक असे काही करायचे नाही, फक्त मौजमज्जा करायची आहे, कोणतीही बंधने नकोत, ओरडणे नको अश्या वेळी लग्न म्हणजे एक अडगळ वाटु शकते. लग्न म्हणजे एक प्रकारची सुख दु:खातील भागिदारी, कशात अडले-दुखले तर कोणी तरी काळजी घेणारे, विश्वासाचे असावे, भावनिक आधार देण्यासाठी घरी कोणी तरी आहे. कोणतेही मोठे अवघड काम हाती घेताना माझ्या पाठीमागे कोणीतरी खंबीरपणे आहे ही भावना खुप आश्वासक ठरते आणि पाठबळ देते. जेव्हा कोणत्याही आव्हाणात्मक परिस्थितीमध्ये अशा माणसांचे मुल्य आणि महती दिसुन येते. आई - बाप कितीही चांगले आणि प्रेमळ असले तरी ते काही आयुष्यभर मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याबरोबर जिवाला जीव देणार्‍या, प्रसंगी चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे आप्त, मित्र आणि कुटुंबिय मिळणे खुप मोठी गोष्ट आहे.

बरेच प्रतिसाद वाचलेत . एकूण असं जाणवतं कि ; १. घटस्फोट जास्त होतात आणि प्रामुख्याने मुलींच्या चुकीने . २. मुलींचा फार लाड होतो आणि त्या financially काहीही काँट्रीब्युट नाही करत ३. मुलींना नवरा त्याच्या पेक्षा चांगलाच लागतो . उंच , जास्त शिकलेला आणि जास्त कमावणारा वैगेरे ४. लग्नात आई वडिलांची भूमिका काय असावी ५. हुंडा कधी अयोग्य / योग्य आहे मला असं वाटतं कि : १. घटस्फोट होणं हि काही वाईट नाही . घटस्फोट खूप सोपे नाही अजूनही . जर पटत नसेल तर वेगळे होणे बरे . लग्नाच्या कालावधी मध्ये दोघांनी मिळून कमावलेली संपत्ती दोघांना समप्रमाणात वाटून घ्यावे. माझ्या बघण्यात मुलींना फार काही हिस्सा मिळत नाही . बरेचदा प्रॉपर्टी आई वडील भाऊ मित्र आदी च्या नाव करून मुलींचा हिस्सा टाळला जातो . २. आपल्याकडे मुलं २५-३० वर्ष्याच्ये होत पर्यन्त पालकांकडे राहतात. काहीही न कमवता सुद्धा . अशा मुलांना नेगेटिव्ह टॅक्स क्रेडिट्स किंवा inheritance टॅक्स लावला पाहिजे . ३. Generally arrange marraige मध्ये फार जास्त ऑपशन्स असल्यामुळे हे सुरु झाले आहे . स्वतः जर शोधायला गेलं कि बरोबर कळतं कि आपली "औकात " काय आहे :-D ४. पालकांनी मदत करावी , आणि चॉईस आणि decision घेण्याची क्षमता बिल्ड करावी . दबाव टाकू नये. ५. हुंडा बेकायदा आहे , फार चर्चा करण्यात अर्थ नाही . विशेष म्हणजे आमची आई marriage bureau मध्ये होती - २०-२५ वर्ष . बरेच जुडवले , त्यापेक्षा जास्त नकार कळवले . अजूनही घटस्फोटाचा टक्का ५% पण नाही . जवळपास सर्व घटस्फोटाच्या केसेस मध्ये छळ हेच एक कारण आहे . महार असल्यामुळे हुंडा फार कमी - म्हणजे नाहीच . जवळपास सर्व उच्चशिक्षित - private नौकरी वाले. काही केसेस मध्ये डिप्रेशन , मानसिक प्रॉब्लेम्स मुळे पण . पण मुलीच्या लालसे मुले घटस्फोट क्वचित. बऱ्याच खळखळ करणाऱ्या मुली / मुले चे लग्नाचं जुळत नाही आणि वय वाढले कि मग कुना सोबत पण settle होतात.

किंवा लग्नानंतर भांडणं होऊन वेगळे होत असतील तर त्यांचे ते दुर्दैवी किंवा दोषी असतील. त्यांचे पालकही दुर्दैवी. वाद घालून काही साध्य होणार नाही.

ह्या मुलीच्या कॅज्युअल मूर्खपणामुळे बंगलूरमध्ये, एका फूड- डिलीव्हरी करणार्‍या गरीब माणसावर आफत ओढवली. ती मुलगी, तिचे आईवडील घरांत नसतांना, स्वतः घराच्या गच्चीवर खेळावयास गेली होती. तितक्यांत पालक घरी परतले, व त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती गच्चीवर एकटीच खेळतांना सापडली. बिल्डींगमधे फूड- डिलीव्हरी करण्यास आलेल्या एका तरूणाने आपणांस खेचून गच्चीवर नेले, असा आरोप तिने केला. तिने त्या व्यक्तिचा निर्देशही केला. अशा परिस्थितीत, इतर कुठलीही शहानिशा न करतां त्या पालकांनी व आजूबाजूच्या इतरांनी त्या डिलीव्हरी माणसास भरपूर बदडले, कोंडून ठेवले व पोलिसांना बोलावले. पोलीस चौकशीत तेथील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत ती मुलगी स्वतःहून, एकटीच गच्चीवर जातांना आढळली. अर्थात पोलिसांनी त्या माणसास सोडून दिले, व त्यास हवे तर त तो मुलीव्र्फ उलटी तक्रार दाखल करू शकतो असे सांगितले. पण आता तो तरूण त्या शहरांत रहाण्यास तयार नव्हता. 'आपण आता, आपल्या घराकडे, आसामांत परतत आहोत' असे त्याने पोलिसांना सांगितले. एक तरूण आयुष्य संपूर्ण उध्वस्त होताहोता वाचले. पण त्याच्या आयुष्याची उलथापालथ झालीच, वास्तविक, पोलीसांनी अशा केसमधे स्वतःहून केस दाखल केली पाहिजे. कायदा प्रक्रिया तशी नसेल तर ती बदलली पाहिजे.

In reply to by प्रदीप

आई वडील क्लासच्या वेळेत गच्चीत खेळायला गेल्यावरुन रागावतील या भीतीने तिने त्या माणसाचे नाव घेतल्याचे कबूल केले असे बातमीत आहे. CCTV नसता तर त्या डिलिव्हरी बॉयचे आयुष्य पुरते उध्वस्त झाले असते.

In reply to by गवि

... तरी आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य आहे. मुले खोटे कारण सांगतात तेव्हा त्यांना इतर अनेक साधे ऑप्शन्स असतात की.

In reply to by गवि

आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य
लहान मुले भवताली असताना टीव्ही (विशेषतः क्राईम पॅट्रॉलादि) बघणे हे एक कारण असू शकते. अनेक घरात हे होत असेल. लहान वयात नको त्या गोष्टी बघणे, कानावर पडणे याचा खोल परिणाम होत असतो.

श्री दर्शना पवार आणि पापाकी परी यांच्यामधील कहानी: श्री ज्योती मौर्या यांना त्याच्या नवर्‍याने स्वतःचे पैसे खर्च करुन, कर्ज काढुन नागरी अधिकारी बनवले. त्यांनी अधिकारी होताच दुसर्या माणसाबरोबर अनैतिक संबध प्रस्तापित केले. नवर्याला सुगावा लागल्याच्या लक्षात आल्यावर त्याच्यवर पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. https://www.indiatoday.in/india/story/jyoti-maurya-viral-video-sdm-utta…