खचलेले शेजारी
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते. त्यांना त्यांच्या परकीय गंगाजळीमध्ये या चोरी मधून मिळालेली रक्कम टाकायची होती, जे तिथे होत होते. खोट्या नोटांच्या जोरावर बांगलादेश, नेपाळ, वगैरे देशांमधून या खोट्या नोटांच्या आधारावर डॉलर्स खरेदी केले गेले. नोव्हेम्बर २०१६ नंतर मात्र पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीला ओहोटी लागली. पाकिस्तानने कितीही काहीही कारणे दिली असली - जसे की स्थानिक चलनाचे डॉलर्सच्या तुलनेने झालेले अवमुल्यन, निर्यात घटली, महागाई वगैरे - त्यांना फुकटचे किंवा चोरी करून मिळालेले डॉलर्स बंद झाल्यावर त्यांची अर्थव्यवस्था डगमगली आहे. वास्तविक नोटबंदीच्या आधी दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टें २०१६ मध्ये पाकिस्तानला जागतिक नाणेनिधीकडून ६.६ मिलियन डॉलर्सची घसघशीत मदत झाली होती. तरी देखील नोटबंदी नंतर त्यांच्या परकीय गंगाजळीला गळती लागली हे त्यांच्याच अनेकानेक आकडेवारीवरून तपासून बघता येते. अर्थात हे त्यांनी आणि नोटबंदीच्या विरोधकांनी मान्य करणे जवळजवळ अशक्य आहे. चारेक वर्षांनी आलेल्या महामारीने आता पाकिस्तानातल्या आगीत तेल ओतले आहे. पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागले आहे. इतके की पाकिस्तानातल्या आर्थिक कंगालीमुळे त्या देशाची चार शकले होऊ शकतील. पाकिस्तानच्या शत्रुला काहीच करावे लागणार नाही.
मे २०१६ पासून भारतात प्रधानमंत्री उज्वला योजेने अंतर्गत दहा कोटी गरजू कुटुंबाना स्वयंपाकासाठी गॅस पुरवला गेला आहे. सुमारे चाळीस कोटी भारतीय या योजनेमुळे लाभार्थी असतील. पण २४ कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानची अन्य अनेक पातळ्यांवर दैना झालेलीच आहे, पण जीवनावश्यक स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणे देखील मुश्किल झाले आहे. दोन दोन तीन तीन आठवडे सलग गॅस शिवाय पाकिस्तानातल्या जनतेला काढावे लागतात. ही समस्या सधन लोकांना देखील सतावते आहे.परिस्थिती इतकी चिघळली आहे की सकाळी नाश्त्याला पाव बिस्किटे खाण्याची सक्ती कराची सारख्या ठिकाणी आता केली जाऊ लागली आहे. अंडी उकडायला गॅस वाया घालवू नका असे सांगितले जाते आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या शेगड्या आणि गिझर्सच्या मागणीमध्ये भयानक वाढ झाली आहे. जनता मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये चोरून गॅस भरून ठेवते आहे. ज्यावेळी गॅस मिळतो तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असतो. लाल रंगाची ज्योत असते, त्याला दुर्गंधी असते आणि भांडी संपूर्ण काळी होऊन जातात. पाकिस्तानातला गॅस पुढल्या वर्षी कदाचित संपूर्ण संपून जाण्याची शक्यता आहे. नवीन गॅसचे साठे शोधण्याचे संशोधन तिथे गेल्या दोन दशकात झालेलेच नाही. युद्धखोरी, लाचलुचपत असल्या भानगडींमुळे उद्योग वाढीवर तिकडे अजिबात लक्ष न दिले गेल्याचे परिणाम आज पाकिस्तान भोगते आहे. बरं स्वतःकडे इंधनाचे साठे नसतील तर एखादा देश काय करेल ? बाहेरच्या देशातून इंधन विकत घेईल. पण पाकिस्तान परकीय गंगाजळीच्या बाबतीत भिकेला लागले आहे. त्यांच्याकडे परकीय चलन जमा करण्याचे स्रोत देखील आता आटले आहेत.
तिकडे चीनचे पितळ देखील आता उघडे पडत आहे. कोरोना भस्मासुराने आता चीनच्याच डोक्यावर हात ठेऊन चीन भस्मसात करायचे कदाचित ठरवले आहे. कोरोनाचा राक्षस उभा केला चीननेच. शांघाय ही चीनची आर्थिक राजधानी आहे. चीनचा विकास शांघायमधूनच सुरु झाला. शांघाय शहरावरच चीनची संपूर्ण आर्थिक भिस्त आहे. जगातल्या सुमारे हजार मल्टिनॅशनल कंपन्यांची मुख्यालये इथे आहेत. चीन व्यतिकरिक्त अन्य देशातल्या सत्तर हजार कंपन्यांची कार्यालये शांघायमध्ये आहेत. चीनच्या विकासाचे शांघाय हेच इंजिन आहे. शांघाय कोसळले तर चीन कोसळेल इतके या शहराला महत्व आहे. आणि शांघाय आज कोसळते आहे.
शांघायमध्ये सत्तर टक्के हुन अधिक जनता कोरोनाच्या लागणीमुळे त्रस्त आहे. कोरोनाच्या थैमानामुळे शांघायमध्ये हाहाकार माजला आहे. पावणे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या या भल्यामोठ्या शहरात दोन कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. चीनच्या भिंती त्या कानाला काही ऐकू येऊ देत नाहीत, त्यामुळे किती लक्ष चिनी लोक मृत्युमुखी पडले आहेत याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तिथली आरोग्य व्यवस्था कोसळली असल्याच्या बातम्या येत आहेत. चिनी लस हे संपूर्णपणे बोगस औषध आहे याची प्रचिती काही देशांना आली आहे. या लसीचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सुमारे नव्वद कोटी जनतेला आगामी वर्षांमध्ये कोरोनाची लागण होण्याची भीती काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याची कुवत चीनच्या आरोग्यव्यवस्थे कडे नाही.
जगभरातल्या देशांनी त्यामुळे चीनमधून प्रवास करून देशात येणाऱ्या - विशेषतः चिनी लोकांची - कसून कोरोना चांचणी सुरु केली आहे. त्यामुळे चीनच्या हुकूमशाहने आता जगाला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे.
शेजारी कटकटे असल्यामुळे ठाण्याच्या माझ्या एका परिचिताने त्याचे बिऱ्हाड विरारला स्थलांतरित केले. देशाला अशी मुभा नाही. शेजारी अस्वस्थ असल्याचे धोके अर्थातच आपले सरकार ओळखून असेल हे नक्की. पण ही आणि अन्य काही देशांची परिस्थिती काळजी पूर्वक अभ्यासल्यावर याची खात्री पटते की आपण भारतीय लय भाग्यवान. आपल्याकडे असली कोणतीच जीवघेणी लफडी नाहीत. महामारी आली तर आपल्या जनतेने, कणखर सरकारच्या मदतीने तिला हरवून टाकले. आपल्याकडे जे सामर्थ्य निर्माण झाले आहे त्याची जाणिव अधिकाधिक भारतीयांना झाली पाहिजे.
- सुधीर मुतालीक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुक्याबरोबर ओलंही जळतो.
मला नोटबंदीबद्दल एक प्रश्न आहे
फायदा देशाचा झाला आहे.
बर्याच वर्षानंतर लिहिते झालात
कॅप = मर्यादीत करुन ठेवले
क्लिंटन भौ धन्यवाद
हम्म...
असाच मेसेज व्हाट्सप वरही फिरत
अतिशय सुंदर लेख!
नोटाबंदीचा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर परिणाम
उत्तम विश्लेषण
+१
आकडेवारीबद्दल माहित नाही
प्रमाण
संपूर्ण लेखच अतिशयोक्त आहे
CBI books former Finance Secretary Arvind Mayaram
खचलेल्या पाकिस्तानात फक्त ३