Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 06/18/2022 - 17:26
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale
  • Log in or register to post comments
  • 45475 views

प्रतिक्रिया

Submitted by कानडाऊ योगेशु on गुरुवार, 06/23/2022 - 12:37

Permalink

ह्या सगळ्या प्रकारात काका

ह्या सगळ्या प्रकारात काका पूर्णपणे विजयी झाले आहेत. शिवसेनेची पूर्णपणे वाताह्त करुन ठेवली व त्यासाठी बदनाम भाजप होणार व आयते लोणी काकांच्या पारड्यात पडणार. दोन बोक्यांने आणला हो आणला चोरुन लोण्याचा गोळा ह्या कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 06/23/2022 - 12:50

In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु

Permalink

समजले नाही

शिवसेनेची पूर्णपणे वाताह्त करुन ठेवली व त्यासाठी बदनाम भाजप होणार
शिवसेनेची वाताहत झाली तर त्यासाठी भाजप कसा काय बदनाम होणार बुवा?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on गुरुवार, 06/23/2022 - 12:57

In reply to समजले नाही by क्लिंटन

Permalink

शिवसेने कडुन काकांनीच भाजपची

शिवसेने कडुन काकांनीच भाजपची बदनामी करुन घेतलीये.अमुक झाले तमुक झाले म्हणुन युती तोडावी लागली हेच पालुपद गेल्या दोन अडीच वर्षात शिवसेनेच्या नेतृत्वाकडुन ऐकले आहे. काकांनी प्रसंगानुसार त्यात तेल ओतले. काकांना मत देण्याबद्दल संदिग्धता असली तर राजकारण कसे करावे ह्याचे एक क्लासिक उदाहरण काकांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 06/23/2022 - 13:04

In reply to शिवसेने कडुन काकांनीच भाजपची by कानडाऊ योगेशु

Permalink

त्यात नवीन काय?

तशी भाजपची बदनामी काँग्रेससमर्थक आणि मोठे मोठे विचारवंत अगदी जनसंघाच्या दिवसांपासून करत आले आहेत. त्यात नवीन काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 06/23/2022 - 12:56

In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु

Permalink

खर आहे.

खर आहे. राष्ट्रवादीची सतत घटत असलेली मतदान टक्केवारी यावेळेस कदाचित थांबेल. पण ती वाढणार नाही. ही टक्केवारी न वाढण्याचे कारण एकच. या अडीच वर्षांच्या कालावधीत जनतेचा खूप फायदा झाला आहे, त्यांचे जीवन अधिक सुखकाराक झाले आहे असे जनतेला वाटत नसावे. या सरकारमुळे खूप काही वेगळे झाले आहे असे काहीही जाणवत नाही आहे. मात्र जर आता जे नवीन सरकार येईल त्याने तुलनात्मक दृष्ट्या पुढील अडीच वर्षात धडाक्यात काम केले आणि ते काम जनतेपर्यंत पोहोचवले तर मात्र राष्ट्रवादीला सध्या मिळालेला फायदा शून्यवत होईल. उठा यांच्या करिषम्याला आणखीनच उतरती कळा लागेल. पण हे सर्व नवीन सरकारच्या कारभारावर अवलंबून असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 06/23/2022 - 13:10

Permalink

सरकार चे काम

सरकार चे काम हा मुद्धा असेल तर ह्या सरकार नी उत्तम काम केले आहे. किती ही द्वेष केला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची मुळ ग्रामीण महारष्ट्र मुरलेली आहेत .त्यांच्या कडे अनेक संस्था आहेत आणि ग्रामीण भागातील प्रश्न माहीत आहेत.... हे सत्य कृपया डोळ्यावर पट्टी बांधून नाकारू नका. सेना पण ठीक आहे पण bjp हा शहरी पक्ष आहे .आर्थिक आणि सामाजिक उच्च गटातील लोकांचा पक्ष आहे.. हिंदुत्व हे हत्यार आहे हिंदुत्व आणि हिंदू हीत ह्याचा काडी चा संबंध नाही. सेना महाराष्ट्र प्रेमी आहे राज्य विरोधी कोणतीच भूमिका ते घेणार नाहीत. Bjp आनी काँग्रेस लं महाराष्ट्र शी काही देणे घेणे नाही. काही ही झाले तरी सेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष महाराष्ट्र मध्ये चांगल्या स्थिती मध्ये हवेत च. राज्य हीत हेच सर्वोच्च हीत.. बहुतेक लोकांना त्याची जाणीव आहे.. म्हणून bjp लाचार होवून सेने ला जवळ करते. Bjp हा काही हिंदू हीत वादी नाही आणि ह्या राज्याची अस्मिता जपणारा तर बिलकुल नाही. उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच लाभार्थी असणार यांच्या राज्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 06/23/2022 - 13:45

In reply to सरकार चे काम by sunil kachure

Permalink

उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच

उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच लाभार्थी असणार यांच्या राज्यात. आली गाडी परत जातीयत्यावर तरी बर ना मोदी ना शहा ना योगी हे जाणेउधारी या उलट समस्त नेहरू परिवार अगदी ममता पण जाणेउधारी
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 06/23/2022 - 14:20

Permalink

शिंदे गटाला मान्यता देण्याचे

शिंदे गटाला मान्यता देण्याचे उपसभापती नरहरी झिरवळ नाकारू शकतात. शिंदे गटातील सेनेच्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून झिरवळ त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना विश्वासदर्शक ठरावावर मत देण्यास प्रतिबंध करू शकतात. अशा परिस्थितीत ही लढाई न्यायालयात जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 06/23/2022 - 14:54

In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी

Permalink

२/३ पेक्षा जास्त आमदार असले

२/३ पेक्षा जास्त आमदार असले तरी? अवघड वाटतंय. कोर्टात असला प्रकार टिकणार नाही. आठवडाभरात कोर्ट निर्णय येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 06/23/2022 - 15:10

In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by शाम भागवत

Permalink

२/३ पेक्षा जास्त आमदार असले

२/३ पेक्षा जास्त आमदार असले तरी उपसभापती मान्यता न देता अडवणूक करून वेळ काढण्याचा प्रयत्न करतील.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 06/23/2022 - 15:17

In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by श्रीगुरुजी

Permalink

तेच म्हणतोय. फार वेळ काढता

तेच म्हणतोय. फार वेळ काढता येणार नाही. कायद्याच्या तरतूदी स्पष्ट असल्याने फार झटकन कोर्टाचा निर्णय येईल. कारण प्रश्न विश्वासदर्शक ठरावाचा असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 06/23/2022 - 19:55

In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी

Permalink

झिरवळ त्यांची आमदारकी रद्द करून . . .

म्हणजे त्यांचेही करिअर डागाळून घेतील?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 06/23/2022 - 14:28

Permalink

भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे

देश अनेक संकटाला तोंड देत आहे. प्रचंड गरिबी प्रचंड बेरोजगारी. प्रचंड महागाई. भ्रष्ट प्रशासन. हे मुद्दे कोणाला महत्वाचे वाटत नाहीत. आज २३ जून तरी पावूस नाही धरणातील पाण्याच्या साठ्याची लेव्हल कमी होत आहे. असाच पावूस लांबला तर देशाचे power स्टेशन असणारी शहर प्रचंड पाणी टंचाई मध्ये सापडतील..भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल. आणि .अपरिपक्व भारतीय सरकार,मीडिया,जनता शिंदे सारख्या अतिशय फालतू मुद्द्याला महत्व देत आहेत... संकट दारावर उभ आहे ह्याची जाणीव कोणाला नाहीं
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 06/23/2022 - 19:56

In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure

Permalink

भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल.

म्हणजे पाणी आयात करणार किंवा दुसऱ्या देशांचा पाऊस भारताकडे वळवणार?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/23/2022 - 20:11

In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure

Permalink

संकट दारावर उभ आहे

संकट दारावर उभ आहे मग दार बंद करून खिडकितुन ये जा करा राहू द्या संकटाला दारातच उभं हा का ना का
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 06/23/2022 - 20:53

Permalink

आत्ता जे कचुरे साहेब बोलत

आत्ता जे कचुरे साहेब बोलत आहेत त्यात तथ्य आहे. मिडीया कुठल्याही बातम्यांचे रतीब लावुन जीवनावश्यक गोष्टींविषयी बातम्याच देत नाही. मी या आधीही लिहलं होतं की आता अमीर खान चा कार्यक्रम बंद झाला म्हणजे सगळ्या गावांना पाणी मिळालं का? त्या च्या कार्यक्रमात निदान परिस्थिती काय आहे हे समजत तरी होतं. राज्यात पक्षीय भुकंप झालाय हे मिडीयावाले वारंवार नको त्या चर्चा करुन आपल्या माथी मारतेय. काही झाले तरी महगाई कमी होणार नाहीये, पाऊस नाही पडला तर ३ ते ४ कि.मी. वरुन पाणी आणणार्या जनतेचे हाल अधिक गहन होणार आहेत हे कोणी पाहत नाहीये. ज्याने आपल्या सारख्या सामान्य माणसांना काडीचा फायदा नाही तरी लोक टीव्ही वर २४ तास नजर लावुन बसलेत. अफगाणीस्तानात खरोखर चा ७ रिश्टर स्केलचा भुकंप होवुन एक हजार लोक मरण पावले त्या विषयी परिस्तीथीची काहीच बातमी येत नाहीये. निदान भारताकडून काय मदत केली गेली किंवा आपले भारतीय तिथे अडकेलेले आहेत का नाही याची काही खबरबात नाहीच आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com