Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

In reply to by चौथा कोनाडा

इंग्रजीत बोलताना भारतीय शब्दांचे इंग्रजांसारखे उच्चार करायलाच हवेत का ? टॅमल असा तामिळचा उच्चार पहिल्यांदाच ऐकतोय. आणि राज ठाकरे कुणाचीतरी मिमिक्री करणार हे समजल्यावर आडियन्स कसा ओरडतो तसं हिंदीला चड्डीतलं मूल म्हणल्यावर आडियन्स ओरडतोय xD

In reply to by कॉमी

¶ आणि राज ठाकरे कुणाचीतरी मिमिक्री करणार हे समजल्यावर आडियन्स कसा ओरडतो तसं हिंदीला चड्डीतलं मूल म्हणल्यावर आडियन्स ओरडतोय ¶ सवांगता! वाटताहेत इंग्रजाळलेले उच्चार. तमिळ चा उच्चार टॅमिझ असाही ऐकण्यात आलाय. नक्की बरोबर उच्चार तज्ज्ञांना विचारावे लागतील.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असेल तर खूप प्रभिवित पने मुल कोणताही विषय आत्मसात करू शकतात. त्या मुळे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत च हवं असा हट्ट सर्व च तज्ञ लोक धरतात. मातृभाषेचा गमंत च वेगळी आहे. ना लिपी,ना पाठांतर,ना व्याकरण काही ही न शिकता माणूस भाषा शिकतो. ते पण अतिशय कमी दिवसात. भाषेतील सर्व खाचाखोचा सहित. जेव्हा मुल पूर्ण बोलायला शिकत म्हणजे वयाच्या तीन चार वर्षात च. तेच मातृभाषा सोडून बाकी कोणती ही भाषा शिकायची झाली तर किती तरी वर्ष जातात. तरी त्या भाषेतील खाचाखोचा समजत नाहीत. अगदी उच्च शिक्षण,व्यावसायिक शिक्षण,विज्ञान हे पण मातृभाषेत च शिकवले तर. त्याचा खूप चांगला परिणाम होईल . ते व्यवहारिक ठरणारं नाही ती गोष्ट वेगळी

In reply to by उपयोजक

विनोदी चित्रफीत मुद्दाम रेकॉर्ड केल्याचे लक्षात येते पण इतर हिंदीकर आपल्या हिंदीचे अधिक विनोदी किस्से सांगू शकतात. सहसा मराठी भाषिकांना हिंदी विनासायास समजते पण हिंदीतून बोलणे कठीण जाते. नागपूर अधिक संघात असल्याने हिंदीचा गडकरी फडणविसांचा सराव पवारांपेक्षा अधिक असूनही मराठी ढब अ‍ॅक्सेंट शिल्लक राहतेच. अगदी लोकमान्य टिळकांनी देवनागरी लिपीचा पुरस्कार करणारे भाषण हिंदीतून बोलणे कठीण जाते म्हणून स्पष्ट सांगून इंग्रजीतून केले होते. अर्थात विदर्भ, मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणकरांना अधिक अवघड जात असावे त्यात पश्चिम महाराष्ट्रीय पूर्ण अशिक्षीत मराठी महिलांना हिंदी समजणे सुद्धा कठीण जाताना पाहिले आहे. .

In reply to by उपयोजक

छान संदर्भ. वाखु साठवली आहे. धन्यु. कोणते मराठी चित्रपट मल्याळम मध्ये ध्वनीबद्ध केलेले आहेत का ?

हिंदी भाषा म्हणून वाईट आहे ,बोली भाषा आहे,चड्डीत च असलेलं मुल आहे ही भाषेवर आलेली टीका वर वर वाटत असली तरी .तसे नाही. हिंदी भाषा डोक्यात जाते ह्याचा अर्थ जी लोक ही भाषा बोलतात त्या लोकांची वृत्ती बाकी देशातील लोकांपेक्षा वेगळी असल्या मुळे ती भाषा डोक्यात जाते बेशिस्त,सार्वजनिक ठिकाणी,सार्वजनिक वाहनात कसे ही वागणे. कोणाचं च ऐकून घेणे नाही, मीच शहाणा,आम्हीच श्रेष्ठ, हे आणि अनेक वाईट गुण हिंदी भाषिक लोकात हमखास असतात. कायदे न पाळणे,बेकायदेशीर कृत्य करणे,स्त्रिया न विषयी संकुचित मत. असे अनेक गुण हिंदी भाषा आणाऱ्या लोकात उर्वरित भाषा असणाऱ्या लोक पेक्षा जास्त असतात

एक मुद्दा अजुन कुणी मांडला नाहीये किंवा माझ्या नजरेतुन सुटला असावा. अमित्भै स्वतः गुजराथी असुन सुध्दा त्यांनी हिंदीचा वापर करावा अशी फक्त विनंती केली आहे. तस्मात अमितभैंचा भारतीयांमधले संभाषण सोपे व्हावे असे वाटण्याव्यतिरिक तसा काही स्वार्थी हेतु नसावा. तसा असला असता तर त्यांनी गुजराथीला आडुन आडुन प्राधान्य दिले असावे. ह्याचा अर्थ हा निघतो कि अमितभैंना गुजराथी समाजाबद्दल आत्मविश्वास असावा कि बाहेरची भाषा कुठलीही असो गुजराथी परस्परांतील संवाद गुजराथीमधुन्च करतील. अमितभंच्या ह्या विधानाचा गुजरातम्ध्ये काय परिणाम झाला आहे ह्याची कुणाला काही माहीती आहे का?

मुघल राज्यकर्त्यांनी,ब्रिटिश राज्य कर्त्यानी. महाराष्ट्र मधील सर्व किल्ले हल्ला करून उध्वस्त केले पण राजस्थान मधील केले नाहीत. का?. स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी शील,अभिमान,विचार ह्यांचे ते लिलाव करत होते . पण महाराष्ट्र तसे करत नव्हता. गुजरात ची मानसिकता तीच आहे. फायद्यासाठी काही ही करतील . त्या मुळे अमित shah ना गुजराती लोकांची चिंता वाटत नाही

आणि देशाच्या एकतेला धोकादायक असणारे घटक. १) हिंदी भाषा २) हिंदी मीडिया. ३) धार्मिक वाद. ४) जातीय वाद. ५) व्यापारी स्वार्थी जमात आसाम,ओरिसा,पंजाब, हिमाचल, अती पूर्वेतील सात राज्य, दक्षिण भारतातील राज्य,कश्मिर.हिमाचल . ह्या भाग विषयी महाराष्ट्र सहित बाकी प्रगत राज्यांना राग नाही,द्वेष पण नाही.अखण्ड यूपी,अखंड बिहार,अखंड mp. ही राज्य आणि त्या राज्यातील लोक ह्या विषयी मात्र तीव्र संताप आहे. बंगाल,राजस्थान,गुजरात ही थोडी ठीक आहेत पण तिरस्कार करण्या इतकी वाईट नशित्म

हिंदी भाषा असणाऱ्या लोकांनी मराठी,गुजराती किंवा कोणती ही दक्षिण भारतीय भाषा शिकावी..जेव्हा त्यांना कायम स्वरुपी त्यांचे राज्य सोडून उदर निर्वाह करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाणे गरजेचे असते.. तात्पुरतं फिरायला जायचे असेल तर गरज नाही.

हा प्रश्न सोडवणे सरळ नाही . याची खेचाखेच , मग टोकाची विधाने / राजकीय पोळी भा जने हे तर दिसतयच आता प्रश्न असा आह एकी जरी हिंदी हि काही राष्ट्रभाषा नसली आणि तिची सक्ती करेन अयोग्य असले तरी हे हि खरे नाही का कि अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल . अनके भाषा जय लिप्या वापरतात त्याचेही हिंदीची देवनागरी लिपी साधर्म्य दर्शवते ( गुजराथी , बंगाली आणि अर्हताःत मराठी कदाचित गुरुमुखी ? हरयाणवी कोणती लिपी वापर माहित नाही तशी कोणती दक्षिणी भाषा आहे का ? यूरोपात फ्रेंच इटालियन आणि जर्मन आपापल्या भाषेहूतून वयहार करताट आणि यूरोपीन संसदेत? आणि जरी समाज त्यांनी तिसरी भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारली असली तरी इंग्रजी हि फ्रेंच इटालियन आणि जर्मन यांचं जवळ आहे .. तोच तर्क हिंदी साठी हिंदी ची सक्ती नको पण प्रेमाने चुचकारत जर हिंदी राष्ट्रीय संसदेत वाढवली तर एवढा कडवा विरोध पण नको

In reply to by चौकस२१२

अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल . आपल्या वरील विधानास पुरावा काय ? हिंदी ही हिंदी पट्ट्यात (पर्यायाने लोकसंख्या स्फोट झालेल्या) प्रदेशात बोलली जाते म्हणुन ती इतर "अनेक" भाषांच्या जवळ कशी ??