त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही डेस्क जॉब असलेला
असो.. तुम्ही तुमचं एखादं
त्यांना शिकावी वाटत नसल्यास
पण हिंदी येत नाही म्हणजे तो
थोडे स्पष्ट केले तर बरं होईल
गुरुजी तुम्ही आणि श्रीगुरुजी
तो काही धाग्यांचा विषय नाही
वोक्के सार :)
वाह जी वा
ज्यांना हिंदीबद्दल द्वेष
जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले
मग? आता काय करायचे?
तेच तर सांगत आहे
वा! सुनिलजी
संपर्क भाषा काय असावी ह्या वर लोकसभेत व्यक्त होणे.नेमका प्रतिसाद!स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे
+१
भाषेच्या जोरावर भारतात
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.भाषेच्या जोरावर भारतात
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते..
कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच
कुठे लादलीये हिंदी ?तुम्हीच तर म्हणताय हिंदी लादा राष्ट्रभाषा बनवून.ऑ? हे कधी झालं !
का पण? ईंग्रजी का नको?
:०
हिंदी जास्त लोक बोलतात हा
तुम्ही फालतू फालतू नुसतं
तुम्ही थांबा. बर्याच हवेत
शेवटी व्यक्तिगत झालेच :)
म्हणून भारतात अहिंदी भाषकांवर
पुन्हा एकदा
स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे.नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही. नागपूर महाराष्ट्रात येऊन किती वर्षे झाली.साहेब
थोडे खोदकाम करता
ही बातमी
अहो साहेब
नागपूर आणि औरंगाबाद
नक्कीच गरज आहे
ता.क.
कटू पण सत्य
छान चर्चा.
@ प्रा. डॉ. सर,
हिंदी भाषा : लिटील चाइल्ड इन
इंग्रजीत बोलताना भारतीय
¶ आणि राज ठाकरे कुणाचीतरी
मातृ भाषेत शिक्षण
या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा
:))
स्पष्टपणे विनोदी आणि
का किंमत द्यायची हिंदीला? या अन्यायासाठी?
मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात.
छान संदर्भ. वाखु साठवली आहे.
महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही