Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 10/12/2021 - 20:04
मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा. https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-decide-that-no-capacity-restriction-for-domestic-flights-from-october-18/articleshow/86968306.cms
  • Log in or register to post comments
  • 22739 views

प्रतिक्रिया

Submitted by mangya69 on गुरुवार, 10/14/2021 - 23:40

In reply to २० तारखेला त्याला जामीन by श्रीगुरुजी

Permalink

त्याच्याकडे

त्याच्याकडे सेल्फ युजसाठी किंवा विकण्यासाठी कोणत्याच कारणासाठी काहीही मिळाले नाही. सापडला तेंव्हा पूर्ण शुद्धीत होता , ह्याच्यापेक्षा तर महाजनपुत्र आणि रामदेवबाबाचे नेपाळी पार्टनर अधिक वाईट अवस्थेत सापडले होते. भारताला व्यसन अमेरिका युरोपने लावले म्हणून भाजपावाले व्हाट्सपवर घळाघळा रडत आहेत, पण जगात विकला जाणारा 80% अफू अफगाणिस्तानात उगवतो , 7 % म्यानमारमध्ये उगवतो , म्हणजे शेदोनशे वर्षांपूर्वी जेंव्हा हे देश स्वतंत्र नव्हते , तेंव्हा अखंड हिंदुस्तानच जगाला 87% अफू पुरवत होता का ?
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 10/18/2021 - 14:09

In reply to त्याच्याकडे by mangya69

Permalink

अखंड हिंदुस्थान कधीच अस्तित्वात नव्हता

अखंड हिंदुस्थान कधीच अस्तित्वात नव्हता. जे दावे करत आहेत त्यांनी अखंड हिंदुस्तान वर कोणता हिंदू राजा राज्य करत होता ते सांगावे. राजपूत शुर वीर आणि मराठी शुर वीर ह्यांच्या मुळे काही भाग हिंदुस्तान च भाग होता. आता फक्त हिंदुवादी राजकारण चा फायदा तमाम भारतातील हिंदू ना मिळणार नाही.फक्त यूपी,बिहार सारख्या बकवास राज्यांना हिंदू हिंदू करून पोट भरायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 10/15/2021 - 00:57

Permalink

केंद्र सरकार चे मंत्री

आपले खाते सोडून बाकी सर्व खात्या विषयी का बोलत असतात.. म्हणजे अर्थ मंत्री रेल्वे विषयी बोलणार.रेल्वे मंत्री कृषी खात्या विषयी बोलणार.. पण आपल्या स्वतःच्या खात्या विषयी काहीच बोलणार नाहीत.. .आज च न्यूज वाचली अमित शाह ह्यांनी पाकिस्तान ला अजुन एक surgical strike करू अशी धमकी दिली आहे. पण ते तर गृह मंत्री आहेत ना त्यांनी पर राष्ट्र विषयी काय धोरण असणार ह्या वर का बोलावे. राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत ना ते बोलतील किंवा स्वतः देशाचे पंतप्रधान बोलतील अमित शाह ह्यांचा काय संबंध.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 10/15/2021 - 12:39

Permalink

बळीचा बकरा आर्यन खान का समीर वानखेडे?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rama Ashtakam (Ameya Records) Bhaje Visesha Sundaram!!! श्री रामाष्टकम्
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 10/15/2021 - 22:23

In reply to बळीचा बकरा आर्यन खान का समीर वानखेडे? by मदनबाण

Permalink

सुशांतसिंग

तुमची सुशांतसिंगची शोधपत्रकारिता कुठंवर आली आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 10/17/2021 - 23:13

In reply to सुशांतसिंग by कपिलमुनी

Permalink

बिहार ची निवडणूक संपली

बिहार ची निवडणूक जशी संपली त्याच बरोबर bjp ल सुशांत चे काहीच महत्व वाटेनासे झाले. सीबीआय,bjp चे नेते,यूट्यूब वर सुशांत साठी न्याय मागणारे,कंगना,सर्व गायब झाले. मग मदनबाण तरी कशाला तो विषय उचलून धरतील. अर्णव तर सुशांत ला पूर्ण विसरलाच. तो हल्ली काश्मीर,चीन,अफगाणिस्तान,शेतकरी ह्यांच्या वर च चर्चा करत असतो आरडा ओरडा करत . चार बाजारू टाळकी जमा करून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 10/19/2021 - 11:41

In reply to सुशांतसिंग by कपिलमुनी

Permalink

हे राम.

अजून दोन-पाच व्हीडीयोच्या लिंका आल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही असे दिसते. जवळ पास आमच्या सुत्रांच्या माहितीनुसार सुशांतबद्दल एकून चोपन्न युट्यूबवरच्या लिंका आल्या आहेत. धागे जड झाले पण संशोधनाचा उत्साह जड सॉरी कमी झालेला नाही. ख-या संशोधकामधे चिवटपणा असावा लागतो. आणि तो मिपाकरांमधे ठासून भरलेला आहे. नाय, एक ना एक दिवस, निष्कर्ष निघाला आणि चिवटपणाबद्दल तुम्हालाही कौतुक करावे तर राहीलं काय....(संबंधितांनी ह.घे) :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 10/15/2021 - 18:57

Permalink

लाज वाटण्यासारखी भारताची अवस्था झाली आहे

Global hunger index मध्ये 116 देशात भारत 101 व्य स्थानी आहे.नेपाल,पाकिस्तान,बांगलादेश ची स्थिती पण भारतात पेक्षा चांगली .फक्त 15 देशाची स्थिती च भारता पेक्षा वाईट आहे.ते सर्व गरीब देश आहेत .मोठेपणा पण गाजवत नाहीत. भावी महासत्ता,अमक्या डॉलर ची अर्थ व्यवस्था, स्वयं पूर्ण भारत, ह्या सर्व वल्गना आहेत. देशात अन्न अन्न दशा लोकांची झाली आहे.. ना सरकार ह्यावर कधी बोलत ना मीडिया. फक्त फुकाचा मोठेपणा सरकार सांगण्यात मश्गूल आहे. भारत हा अती गंभीर स्थिती च्या वर्गवारीत आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 10/15/2021 - 19:00

Permalink

भारतात फक्त झिम्मा चालू आहे

ड्रग,आर्यन,मुस्लिम,खलिस्तानी, हिंदू धोक्यात बस इतकेच विषय फक्त चर्चेला जातात आणि सरकार फक्त ह्याच विषयावर बोलते. आपल्या महान गुलाम मीडिया विषयी न बोललेले च उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Fri, 10/15/2021 - 20:40

Permalink

दसरा भाषण

मुंबई:हिंदुत्व आता खऱ्या अर्थाने धोक्यात आहे. हिंदुत्वाची शिडी करून जे वर सत्तेत गेले आहेत ते सत्ता राखण्यासाठी इंग्रजांची निती वापरतील. त्यांचा हेतु साध्य होऊ देऊ नका, असे सांगतानाच मराठी माणसाची भक्कम एकजूट दाखवा आणि त्याचवेळी मराठी अमराठी हा भेद गाडून हिंदुत्वही वाढवा, असे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात केले. 'मराठी तितुका मेळवावा याप्रमाणे हिंदुत्व सुद्धा वाढवा', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत ते इंग्रजांची नीती अवलंबू शकतात. तोडा, फोडा आणि राज्य करा, असा त्यांचा हेतु असेल तर त्यापासून आपल्याला सावध व्हावं लागेल, असे सांगताना, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. घराबाहेर आमच्यासाठी देश प्रथम आहे, असे ठाकरे म्हणाले. तुमची पालखी वाहत नाही म्हणून शिवसैनिकांना तुम्ही आज भ्रष्टाचारी म्हणत आहात पण आम्ही तुमचे नाही तर हिंदुत्वाचे, भारतमातेचे भोई आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर नामर्दपणा आहे, अशी तोफही ठाकरे यांनी भाजपवर डागली. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/uddhav-thackeray-targets-bjp-over-hindutva/articleshow/87043449.cms
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 10/15/2021 - 21:46

In reply to दसरा भाषण by mangya69

Permalink

नेमेची येतो मग पवसाळा . . .

नेमेची येतो मग पवसाळा . . . नवीन सर्व्हे कधी येतोय?
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 10/18/2021 - 14:33

In reply to नेमेची येतो मग पवसाळा . . . by सुक्या

Permalink

कोणत्याच कार्यात सहभाग नाही

Rss असेल किंवा bjp ह्यांचा देशातील कोणत्याच कामात सहभाग नाही. .फक्त एकच काम ह्यांनी केले ते म्हणजे ज्यांना फक्त स्वार्थ समजतो देशाशी काही देणेघेणे नाही अशा गुजराती ,मारवाडी लोकांचे बस्तान मीडिया मध्ये बसवले. ही व्यापारी लोक ह्यांना फायदा महत्वाचा. प्रचार हीच लोक करत आहेत . मोदी प्रेमाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 10/15/2021 - 22:05

In reply to दसरा भाषण by mangya69

Permalink

नेहमीच्याच कोरड्या वांत्या.

नेहमीच्याच कोरड्या वांत्या. आम्ही यांव आहोत, आम्ही त्यांव आहोत, आम्ही यांव करू, आम्ही त्यांव करू . . . नुसतीच तोंडाची पोकळ वाफ. दीड वर्षे घरात लपून बसलेत आणि गप्पा मात्र विश्वभ्रमणाच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Fri, 10/15/2021 - 22:34

In reply to नेहमीच्याच कोरड्या वांत्या. by श्रीगुरुजी

Permalink

विश्वभ्रमण

विश्वभ्रमण करणार्‍यानीपण काय उजेड पाडलाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Fri, 10/15/2021 - 22:41

In reply to नेहमीच्याच कोरड्या वांत्या. by श्रीगुरुजी

Permalink

उसने अवसान आणलेल्या कडून

अजून काय अपेक्षा करणार? म्हणे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटत नाही... कसं वाटणार म्हणा? त्यासाठी लोकांमधून निवडून जावं लागतं...
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 10/15/2021 - 23:07

Permalink

कोणी ही काही ही म्हणा

पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले ठाकरे साहेब ,कसलाच अनुभव नाही तरी उत्तम काम करत आहेत.bjp सोडली तर सर्व सामान्य लोक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर खुश आहेत. बरं झाले युती तुटली ते साखळी तुटली. दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र दोन्ही ही एक नंबर चे फेकाडे. महाराष्ट्र तरी सुटला फेकाड्या लोकांच्या तावडीतून.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 10/15/2021 - 23:07

Permalink

कोणी ही काही ही म्हणा

पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले ठाकरे साहेब ,कसलाच अनुभव नाही तरी उत्तम काम करत आहेत.bjp सोडली तर सर्व सामान्य लोक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर खुश आहेत. बरं झाले युती तुटली ते साखळी तरी तुटली. नाही तर दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र दोन्ही ही एक नंबर चे फेकाडे. महाराष्ट्र तरी सुटला फेकाड्या लोकांच्या तावडीतून.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 10/16/2021 - 11:51

Permalink

दोन गोष्टी नमुद कराव्याश्या

१. कालच श्री. डोभालांशी चर्चा झाली, बोलण्यात त्यांनी मिपावरील एका आयडीचे नाव घेवुन सांगितले की त्यांच्यात खुप पोटेंशियल आहे. राष्ट्रीय (संपुर्ण) सल्लागार म्हणुन केंद्र सरकार त्यांचा सिरीयस्ली विचार करतय. जर कदाचित त्यांना विरोधी पक्षाने उचलले तर मात्र आम्हाला जड जाईल आणी तिकडे पक्षाध्यक्षांच स्थान डळमळीत होईल ही पुस्तीही त्यांनी जाता जाता जोडली २. सर तुम्ही ऑन्लाईन क्लास घेता कां?
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Sat, 10/16/2021 - 12:17

In reply to दोन गोष्टी नमुद कराव्याश्या by इरसाल

Permalink

कसला सल्लागार नेमणार डोवाल ?

अतिरेकी कंधारात कसे सुखरूप सोडायचे ह्याचे सल्लागार का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 10/16/2021 - 14:07

In reply to कसला सल्लागार नेमणार डोवाल ? by mangya69

Permalink

नाही. खांग्रेसला मायनो

नाही. खांग्रेसला मायनो पिल्लावळ सोडून अध्यक्ष कुणाला करावे त्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sat, 10/16/2021 - 14:07

Permalink

काश्मीर केंद्र शासित झाले

काश्मीर केंद्र शासित झाले ,३७० पण गेले .पण ना तिथे कोणी राष्ट्र प्रेमी मुक्काम ला जात, ना तिथे संपत्ती खरेदी करत. सोशल मीडिया वर वाघ असणारे पण कश्मिर पण स्थायिक होत नाहीत. केंद्र शासित कश्मिर झाले तर सैनिक मरत च आहे त रोज. कसा काय अतिरेकी लोकांना दारूगोळा,मदत मिळत आहे. केंद्र सरकार चे अस्तित्व च कश्मिर मध्ये दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 10/16/2021 - 15:02

In reply to काश्मीर केंद्र शासित झाले by Rajesh188

Permalink

सहमत आहे

केंद्र सरकार चे अस्तित्व च कश्मिर मध्ये दिसत नाही.
सहमत आहे. खरं तर केंद्र सरकारचे अस्तित्व काश्मीरमध्येच नाही तर देशात कुठेच दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Sat, 10/16/2021 - 15:01

Permalink

नियमानुसार घटनास्थळी उपस्थित

नियमानुसार घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांपैकी काहींना कुठल्याही कारवाईच्या वेळी पंच केले जाते. पण फ्लेचर पटेल हा एनसीबीच्या छाप्यांच्या वेळी नेमका तिथं कसा उपस्थित असतो? असे अनेक प्रश्न मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केले आहेत. मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये फ्लेचर पटेलचा एका महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. संबंधित महिलेला त्यानं 'लेडी डॉन' असं म्हटलं आहे. ही 'लेडी डॉन' कोण आहे,' असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nawab-malik-again-attack-ncb-questions-identity-of-fletcher-patel-shares-his-photo-with-sameer-wankhede/amp_articleshow/87056325.cms
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Sun, 10/17/2021 - 11:26

Permalink

Uddhav Thackeray Vs Devendra

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : हे सरकार ज्या दिवशी पडेल, तेव्हा समजणारही नाही: फडणवीस दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली.केंद्रीय यंत्रणांचा काँग्रेसनं दुरुपयोग केला, तसा आम्ही करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.मुख्यमंत्र्यांचे फ्रस्ट्रेशन त्यांच्या तोंडून येत होतं, असा टोला फडणवीसांनी लगावला.#DevendraFadnavis #UddhavThackeray #Politics https://maharashtratimes.com/maharashtra/thane/devendra-fadnavis-slams-uddhav-thackeray/videoshow/87060425.cms हे सरकार भ्रष्ट , मुख्यमन्त्री अकार्यक्शम , असे असताना ३५ वर्शे ह्यांचा पाठिंबा भाजप कशाला घेत होती कुणास ठाऊक !! महाराष्ट्रातील भ्रष्टाचार मोदिजि वाराणशीत बसून शोधणार म्हणे. आणि मग इथले विरोधि पक्शनेते काय करणार ? बंगालात इलेक्शन प्रचार का ? आता युपिच्या इलेक्शनात इथले लोक तिकडच्या ड्युटीवर गेले कि इकडे जरा शांतता नांदेल
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 10/17/2021 - 21:07

Permalink

मुंबईत चिनी व्हायरसमुळे आज एकही मृत्यू नाही

चांगली बातमी आहे. आज मुंबईत चिनी व्हायरसमुळे एकही मृत्यूची नोंद झाली नाही. मागच्या वर्षी २४ मार्चच्या रात्री लॉकडाऊन लागला. त्यानंतर २७ मार्च २०२० पासून काल म्हणजे १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चिनी व्हायरसने दररोज मुंबईत बळी घेतले होते. आज १७ ऑक्टोबरला एकही मृत्यू नोंदला गेलेला नाही. दोन डोस घेतलेल्यांना लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यालाही जवळपास २ महिने होत आले. भिती होती त्याप्रमाणे परत एकदा आकडे वाढलेले नाहीत ही पण चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Mon, 10/18/2021 - 14:17

Permalink

शुभेच्छा

इकडे मोठे बोर्ड लावलेत पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन उर्फ मनुष्य गौरव दिन हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Mon, 10/18/2021 - 16:38

Permalink

पुणे: अभिनेता शाहरुख खान याचा

पुणे: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून चर्चेत आलेला व फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला फरार किरण गोसावी (Kiran Gosavi) याची सहाय्यक शेरबानो कुरेशी (Sherbano Qureshi) हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गोसावी याच्या विरोधातील फसवणुकीच्या प्रकरणात कुरेशी याचाही सहभाग आहे. शेरबानोच्या अटकेमुळं गोसावी याचा ठावठिकाणा सापडण्यास पोलिसांना मदत होणार आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-police-arrests-absconding-accused-kiran-gosavis-assistant-sherbano-qureshi/amp_articleshow/87105603.cms
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 10/18/2021 - 23:47

Permalink

अमेरिकेचे पहिले आफ्रिकन

अमेरिकेचे पहिले आफ्रिकन वंशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व धाकट्या बुशच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या सत्रात सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेले कॉलीन पॉवेल यांचे निधन झाले. https://www.indiatoday.in/world/story/us-secretary-of-state-colin-powell-dies-covid-complications-1866201-2021-10-18
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 10/19/2021 - 10:12

In reply to अमेरिकेचे पहिले आफ्रिकन by श्रीगुरुजी

Permalink

महाहलकट माणूस होता

महाहलकट माणूस होता. इराक युध्दाच्या वेळेस सद्दामकडे संहारक रासायनिक हत्यारे आहेत हा खोटारडेपणा करण्यात कॉलीन पॉवेलही बुश आणि डॉनल्ड रम्सफेल्ड इतकाच पुढे होता. बुशबाबाने त्याला दुसर्‍या टर्ममध्ये परराष्ट्रमंत्री न करता कॉन्डोलिझा राईसला परराष्ट्रमंत्री केले. कॉलीन पॉवेल अचानक नंतर इराकयुध्द विरोधी झाला त्यामागे ते कारण होते का कल्पना नाही. मार्च २००३ मध्ये सद्दामकडे अशी रासायनिक हत्यारे आहेत हे कॉलीन पॉवेल यु.एन मध्ये बोलले होते. ते धडधडीत खोटे होते हे त्यांनी नंतर सप्टेंबर २००४ मध्ये अमेरिकन सिनेटपुढे दिलेल्या वक्तव्यात मान्य केले. होते असे की इराक युध्दासाठी बुश आणि रम्सफेल्ड बरोबरच कॉलीन पॉवेलही तितकेच जबाबदार होते. पण आज इराक युध्दाचे नाव आल्यावर सगळा दोष बुश आणि रम्सफेल्डवरच जातो पण कॉलीन पॉवेलना कोणी फारसे दोष देणारे दिसत नाही. त्यामागे काय कारण असावे? नंतरच्या काळात झालेली उपरती की ते कृष्णवर्णीय होते हे सुध्दा? इतकाच त्यांचा इराक युध्दाला विरोध असेल तर इंग्लंडमध्ये टोनी ब्लेअरच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्रमंत्री रॉबिन कुक यांनी इराक युध्द प्रकरणावरून राजीनामा दिला होता तसा राजीनामा द्यायचा ना. नंतर झालेल्या उपरतीला कितपत महत्व द्यावे? आपल्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर 'भारताने संयम पाळावा' असे लेक्चर त्यांनी झोडले होते आणि बुश प्रशासनाच्या वतीने भारतावर दबाव आणला होता. त्यावेळेस कॉलीन पॉवेल हा माणूस भयानक डोक्यात गेला होता. त्या प्रकारासाठी भारतीयांनी तरी कॉलीन पॉवेलला कधीच माफ करू नये. एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे कित्ती कित्ती वाईट झाले' म्हणून खोटे उसासे सोडणे आपण बंद केले पाहिजे असे फार वाटते. कॉलीन पॉवेल नालायक होता आणि ती सत्य परिस्थिती त्यांचे निधन झाल्यानंतर बदलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Wed, 10/20/2021 - 20:45

In reply to महाहलकट माणूस होता by चंद्रसूर्यकुमार

Permalink

एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे

एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे कित्ती कित्ती वाईट झाले' म्हणून खोटे उसासे सोडणे आपण बंद केले पाहिजे असे फार वाटते. >>लोकांनी ते कधीच केले आहे. विलासराव देशमुख जेव्हा वारले तेव्ह्याच्या प्रतिक्रिया पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 10/19/2021 - 12:58

Permalink

इराक कडे

कथित रासायनिक अस्त्र होती म्हणून एका चांगल्या देशाची राख रांगोळी केली. कोरिया कडे अण्वस्त्र पासून सर्व काही आहे आणि तो देश खुले आम् अमेरिकेची लाज काढत असतो. पण त्या देशाच्या नादाला अमेरिका लागत नाही.आर्थिक अडवणूक करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 10/19/2021 - 13:50

In reply to इराक कडे by Rajesh188

Permalink

कुठला

कोरिया कडे अण्वस्त्र पासून सर्व काही आहे
चार कोरीया आहेत- उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व. तुम्हाला त्यांपैकी कुठला अभिप्रेत आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 10/19/2021 - 14:12

In reply to कुठला by प्रदीप

Permalink

प्रदीप सर्व ज्ञानी

मी उत्तर कोरिया विषयी lihle आहे. आणि मला दक्षिण कोरिया हे राष्ट्र पण माहीत आहे. प्रदीप सर्व ज्ञानी तुम्ही पूर्व कोरिया ,आणि पश्चिम कोरिया ह्या राष्ट्रांची माहिती तमाम जगास द्यावी . नाही देता आली तर सर्वांची जाहीर माफी मागावी.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 10/19/2021 - 16:04

Permalink

पेट्रोल ,डिझेल,नैसर्गिक वायू

ह्यांच्या अफाट किमती मोदी सरकार नी प्रचंड वाढवली आहे त्याचा फायदा मुकेश अंबानी ह्यांना जे कृष्णा गोदावरी खोरे पेट्रोल,डिझेल ,नैसर्गिक वायू संशोधन आणि उत्पादन ह्या साठी दान दिली आहे .त्या रिलायन्स चा ह्या भाव वाढीमुळे किती फायदा झाला ह्या वर कोणी तरी मत व्यक्त करणे गरजेचे आहे एक पण j ब्रँड जागतिक काय देश पातळीवर पण लोकप्रिय नाही अशा कंपनी चा मालक आशिया मधील श्रीमंत व्यक्ती कसा काय होवू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/20/2021 - 12:10

In reply to पेट्रोल ,डिझेल,नैसर्गिक वायू by Rajesh188

Permalink

कोणी तरी मत व्यक्त करणे

कोणी तरी मत व्यक्त करणे गरजेचे आहे. तुम्ही करा की. तेवढीच करमणूक
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Tue, 10/19/2021 - 16:46

Permalink

हास्यस्पद

कर्नाटक काँग्रेसने ट्विट केले होते.. काँग्रेस सरकारने शाळा काढल्या, पण मोदी त्यात गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढ साक्षर वर्ग , रात्रशाळा सुरू केल्या, त्यातही मोदी कधी गेले नाहीत. ते 35 वर्षे भिक्षा मागत राहिले व आता जनताही अडाणी राहून तेच करेल , हे ते पहात आहेत. तक्रार झाल्याने सदर ट्विट हटवले म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 10/19/2021 - 21:20

In reply to हास्यस्पद by mangya69

Permalink

योग्य तर होते tweet

का delete केले असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Wed, 10/20/2021 - 11:43

In reply to योग्य तर होते tweet by Rajesh188

Permalink

જય મોદી

મોદીનો જય કરો ते गुजरातीत मोदींनो जय करो आहे , पण ते मोदींनो भय करो असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/20/2021 - 12:16

In reply to हास्यस्पद by mangya69

Permalink

काँग्रेस सरकारने शाळा काढल्या

काँग्रेस सरकारने शाळा काढल्या, पण मोदी त्यात गेले नाहीत Modi completed his higher secondary education in Vadnagar in 1967. काँग्रेसने प्रौढ साक्षर वर्ग , रात्रशाळा सुरू केल्या, त्यातही मोदी कधी गेले नाहीत इतका कडक माल ? मादक पदार्थ नियंत्रण विभागाने येथे लक्ष देणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Wed, 10/20/2021 - 12:31

In reply to काँग्रेस सरकारने शाळा काढल्या by सुबोध खरे

Permalink

हं

https://youtu.be/jZtXie3KH5o
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 10/19/2021 - 21:14

Permalink

हिंदू

बांगलादेशमधील हिंदू वरील अन्यायाबद्दल तथाकथित ही हिंदू पक्ष आणि नेते आणि चेले गप्प आहेत. चायना च्या सोबत हे चिल्लर देश सुद्धा आता आवाज चढवायला लागले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/20/2021 - 12:08

In reply to हिंदू by कपिलमुनी

Permalink

The national leadership does

The national leadership does not want to burn bridges with the neighbor or its premier, while the West Bengal CM is ensuring she does not antagonise her vote bank or say something that the BJP may dub anti-Hindu or appeasing the Muslims The Bangladeshi prime minister Sheikh Hasina Wajed promised exemplary punishment for those responsible for the assault on Hindus.since Hasina has already announced strict action against the criminals, any recrimination will be pointless till the time her warnings do not seem to be translating into any concrete action. https://www.indiatoday.in/india-today-insight/story/why-modi-and-mamata-are-silent-on-the-attack-on-hindu-temples-in-bangladesh-1866273-2021-10-18 बाकी तुमचं (.....) चालू द्या
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 10/20/2021 - 12:22

In reply to The national leadership does by सुबोध खरे

Permalink

कैच्या काय

लिंक वाचात तरी जा , ममता काय हिंदू कैवारी म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करत नाही. मोदी , भाजप हिंदू मतांचा जोगवा मागून सत्तेवर आले आहेत . त्यांनी काय केले ते विचारले तर नेहमी प्रमाणे गोलपोस्ट बदलायचा क्षीण प्रयत्न . काही काँक्रीट उत्तर असेल तरच चर्चेस मज्जा !
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/20/2021 - 12:31

In reply to कैच्या काय by कपिलमुनी

Permalink

The Bangladeshi prime

The Bangladeshi prime minister Sheikh Hasina Wajed promised exemplary punishment for those responsible for the assault on Hindus.since Hasina has already announced strict action against the criminals, any recrimination will be pointless till the time her warnings do not seem to be translating into any concrete action. PM Modi called on to raise matter with Hasina, seek strong action against guilty https://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/pm-modi-called-on-to-raise-matter-with-hasina-seek-strong-action-against-guilty/articleshow/87075830.cms बाकी श्री मोदींनी तुम्हाला कळवलं नाही हि त्यांची मोठीच चूक आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Wed, 10/20/2021 - 13:29

In reply to The Bangladeshi prime by सुबोध खरे

Permalink

मोदी शहा

मोदी शहा बांगला व पाकच्या गोरगरीब हिंदूंना आयात करून नागरिकत्व देणार आहेत त्याचे काय झाले ? गरीब हिंदू तर आयात आलेच नाहीत , एक श्रीमंत मुसलमान अदनान सामीला मोदींनी नागरिकत्व देऊन 1 वर्षात पदमश्रीपण दिली म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/20/2021 - 14:52

In reply to मोदी शहा by mangya69

Permalink

कागलकर,

कागलकर, तू फक्त तुझ्या आयडीची काळजी कर. मागील आठवड्यातच तुझे दोन आयडी थडग्यात गेले. आता हा आयडी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कर. बाकी ते नागरिकत्व वगैरे विषय तुझ्या आवाक्यातले नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Wed, 10/20/2021 - 15:41

In reply to कागलकर, by श्रीगुरुजी

Permalink

हं

तुमच्या आवाक्यात आहे , म्हणून तर सांगितले. आणा तिकडून सगळे बांधव इकडे. आमच्या काँग्रेसने इटलीतून होतकरू महिला आणून नागरिकत्व देऊन काँग्रेसचे अध्यक्षपण बनवले. तसे तुम्हीही पाकिस्तानातून होतकरू हिंदू आणून भाजपाचे अध्यक्ष किंवा सरसंघचालक करून दाखवलेत तर थडग्यात गेलेलेही बंधुप्रेमाने सदगदीत होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 10/20/2021 - 15:53

In reply to हं by mangya69

Permalink

यापूर्वीच झाले आहे

तसे तुम्हीही पाकिस्तानातून होतकरू हिंदू आणून भाजपाचे अध्यक्ष किंवा सरसंघचालक करून दाखवलेत तर थडग्यात गेलेलेही बंधुप्रेमाने सदगदीत होतील.
हे सोनिया काँग्रेस अध्यक्ष होण्यापूर्वीच २५ वर्षे झाले आहे- १९७३ मध्ये अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष झाले तेव्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by mangya69 on Wed, 10/20/2021 - 16:14

In reply to यापूर्वीच झाले आहे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

अडवाणी

अडवाणी स्वतंत्र पाकिस्तानचे नागरिक होते का ?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 10/20/2021 - 16:56

In reply to अडवाणी by mangya69

Permalink

हो

अडवाणी स्वतंत्र पाकिस्तानचे नागरिक होते का ?
हो पहिला एक महिना. ते सप्टेंबर १९४७ मध्ये भारतात आले. म्हणजे पहिला एक महिना ते पाकिस्तानचे नागरिक होते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com