Skip to main content

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग २

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 12/10/2021 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा. https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-deci…

वाचने 23129
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

काश्मीर केंद्र शासित झाले ,३७० पण गेले .पण ना तिथे कोणी राष्ट्र प्रेमी मुक्काम ला जात, ना तिथे संपत्ती खरेदी करत. सोशल मीडिया वर वाघ असणारे पण कश्मिर पण स्थायिक होत नाहीत. केंद्र शासित कश्मिर झाले तर सैनिक मरत च आहे त रोज. कसा काय अतिरेकी लोकांना दारूगोळा,मदत मिळत आहे. केंद्र सरकार चे अस्तित्व च कश्मिर मध्ये दिसत नाही.

In reply to by Rajesh188

केंद्र सरकार चे अस्तित्व च कश्मिर मध्ये दिसत नाही.
सहमत आहे. खरं तर केंद्र सरकारचे अस्तित्व काश्मीरमध्येच नाही तर देशात कुठेच दिसत नाही.

नियमानुसार घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांपैकी काहींना कुठल्याही कारवाईच्या वेळी पंच केले जाते. पण फ्लेचर पटेल हा एनसीबीच्या छाप्यांच्या वेळी नेमका तिथं कसा उपस्थित असतो? असे अनेक प्रश्न मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केले आहेत. मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये फ्लेचर पटेलचा एका महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. संबंधित महिलेला त्यानं 'लेडी डॉन' असं म्हटलं आहे. ही 'लेडी डॉन' कोण आहे,' असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nawab-malik-again-…

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : हे सरकार ज्या दिवशी पडेल, तेव्हा समजणारही नाही: फडणवीस दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली.केंद्रीय यंत्रणांचा काँग्रेसनं दुरुपयोग केला, तसा आम्ही करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.मुख्यमंत्र्यांचे फ्रस्ट्रेशन त्यांच्या तोंडून येत होतं, असा टोला फडणवीसांनी लगावला.#DevendraFadnavis #UddhavThackeray #Politics https://maharashtratimes.com/maharashtra/thane/devendra-fadnavis-slams-… हे सरकार भ्रष्ट , मुख्यमन्त्री अकार्यक्शम , असे असताना ३५ वर्शे ह्यांचा पाठिंबा भाजप कशाला घेत होती कुणास ठाऊक !! महाराष्ट्रातील भ्रष्टाचार मोदिजि वाराणशीत बसून शोधणार म्हणे. आणि मग इथले विरोधि पक्शनेते काय करणार ? बंगालात इलेक्शन प्रचार का ? आता युपिच्या इलेक्शनात इथले लोक तिकडच्या ड्युटीवर गेले कि इकडे जरा शांतता नांदेल

चांगली बातमी आहे. आज मुंबईत चिनी व्हायरसमुळे एकही मृत्यूची नोंद झाली नाही. मागच्या वर्षी २४ मार्चच्या रात्री लॉकडाऊन लागला. त्यानंतर २७ मार्च २०२० पासून काल म्हणजे १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चिनी व्हायरसने दररोज मुंबईत बळी घेतले होते. आज १७ ऑक्टोबरला एकही मृत्यू नोंदला गेलेला नाही. दोन डोस घेतलेल्यांना लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यालाही जवळपास २ महिने होत आले. भिती होती त्याप्रमाणे परत एकदा आकडे वाढलेले नाहीत ही पण चांगली गोष्ट आहे.

इकडे मोठे बोर्ड लावलेत पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन उर्फ मनुष्य गौरव दिन हार्दिक शुभेच्छा

पुणे: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून चर्चेत आलेला व फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला फरार किरण गोसावी (Kiran Gosavi) याची सहाय्यक शेरबानो कुरेशी (Sherbano Qureshi) हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गोसावी याच्या विरोधातील फसवणुकीच्या प्रकरणात कुरेशी याचाही सहभाग आहे. शेरबानोच्या अटकेमुळं गोसावी याचा ठावठिकाणा सापडण्यास पोलिसांना मदत होणार आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-police-arrests-…

अमेरिकेचे पहिले आफ्रिकन वंशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व धाकट्या बुशच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या सत्रात सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेले कॉलीन पॉवेल यांचे निधन झाले. https://www.indiatoday.in/world/story/us-secretary-of-state-colin-powel…

In reply to by श्रीगुरुजी

महाहलकट माणूस होता. इराक युध्दाच्या वेळेस सद्दामकडे संहारक रासायनिक हत्यारे आहेत हा खोटारडेपणा करण्यात कॉलीन पॉवेलही बुश आणि डॉनल्ड रम्सफेल्ड इतकाच पुढे होता. बुशबाबाने त्याला दुसर्‍या टर्ममध्ये परराष्ट्रमंत्री न करता कॉन्डोलिझा राईसला परराष्ट्रमंत्री केले. कॉलीन पॉवेल अचानक नंतर इराकयुध्द विरोधी झाला त्यामागे ते कारण होते का कल्पना नाही. मार्च २००३ मध्ये सद्दामकडे अशी रासायनिक हत्यारे आहेत हे कॉलीन पॉवेल यु.एन मध्ये बोलले होते. ते धडधडीत खोटे होते हे त्यांनी नंतर सप्टेंबर २००४ मध्ये अमेरिकन सिनेटपुढे दिलेल्या वक्तव्यात मान्य केले. होते असे की इराक युध्दासाठी बुश आणि रम्सफेल्ड बरोबरच कॉलीन पॉवेलही तितकेच जबाबदार होते. पण आज इराक युध्दाचे नाव आल्यावर सगळा दोष बुश आणि रम्सफेल्डवरच जातो पण कॉलीन पॉवेलना कोणी फारसे दोष देणारे दिसत नाही. त्यामागे काय कारण असावे? नंतरच्या काळात झालेली उपरती की ते कृष्णवर्णीय होते हे सुध्दा? इतकाच त्यांचा इराक युध्दाला विरोध असेल तर इंग्लंडमध्ये टोनी ब्लेअरच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्रमंत्री रॉबिन कुक यांनी इराक युध्द प्रकरणावरून राजीनामा दिला होता तसा राजीनामा द्यायचा ना. नंतर झालेल्या उपरतीला कितपत महत्व द्यावे? आपल्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर 'भारताने संयम पाळावा' असे लेक्चर त्यांनी झोडले होते आणि बुश प्रशासनाच्या वतीने भारतावर दबाव आणला होता. त्यावेळेस कॉलीन पॉवेल हा माणूस भयानक डोक्यात गेला होता. त्या प्रकारासाठी भारतीयांनी तरी कॉलीन पॉवेलला कधीच माफ करू नये. एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे कित्ती कित्ती वाईट झाले' म्हणून खोटे उसासे सोडणे आपण बंद केले पाहिजे असे फार वाटते. कॉलीन पॉवेल नालायक होता आणि ती सत्य परिस्थिती त्यांचे निधन झाल्यानंतर बदलत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे कित्ती कित्ती वाईट झाले' म्हणून खोटे उसासे सोडणे आपण बंद केले पाहिजे असे फार वाटते. >>लोकांनी ते कधीच केले आहे. विलासराव देशमुख जेव्हा वारले तेव्ह्याच्या प्रतिक्रिया पहा.

कथित रासायनिक अस्त्र होती म्हणून एका चांगल्या देशाची राख रांगोळी केली. कोरिया कडे अण्वस्त्र पासून सर्व काही आहे आणि तो देश खुले आम् अमेरिकेची लाज काढत असतो. पण त्या देशाच्या नादाला अमेरिका लागत नाही.आर्थिक अडवणूक करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही.

In reply to by Rajesh188

कोरिया कडे अण्वस्त्र पासून सर्व काही आहे
चार कोरीया आहेत- उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व. तुम्हाला त्यांपैकी कुठला अभिप्रेत आहे?

In reply to by प्रदीप

मी उत्तर कोरिया विषयी lihle आहे. आणि मला दक्षिण कोरिया हे राष्ट्र पण माहीत आहे. प्रदीप सर्व ज्ञानी तुम्ही पूर्व कोरिया ,आणि पश्चिम कोरिया ह्या राष्ट्रांची माहिती तमाम जगास द्यावी . नाही देता आली तर सर्वांची जाहीर माफी मागावी.

ह्यांच्या अफाट किमती मोदी सरकार नी प्रचंड वाढवली आहे त्याचा फायदा मुकेश अंबानी ह्यांना जे कृष्णा गोदावरी खोरे पेट्रोल,डिझेल ,नैसर्गिक वायू संशोधन आणि उत्पादन ह्या साठी दान दिली आहे .त्या रिलायन्स चा ह्या भाव वाढीमुळे किती फायदा झाला ह्या वर कोणी तरी मत व्यक्त करणे गरजेचे आहे एक पण j ब्रँड जागतिक काय देश पातळीवर पण लोकप्रिय नाही अशा कंपनी चा मालक आशिया मधील श्रीमंत व्यक्ती कसा काय होवू शकतो.

In reply to by Rajesh188

कोणी तरी मत व्यक्त करणे गरजेचे आहे. तुम्ही करा की. तेवढीच करमणूक

कर्नाटक काँग्रेसने ट्विट केले होते.. काँग्रेस सरकारने शाळा काढल्या, पण मोदी त्यात गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढ साक्षर वर्ग , रात्रशाळा सुरू केल्या, त्यातही मोदी कधी गेले नाहीत. ते 35 वर्षे भिक्षा मागत राहिले व आता जनताही अडाणी राहून तेच करेल , हे ते पहात आहेत. तक्रार झाल्याने सदर ट्विट हटवले म्हणे.

In reply to by mangya69

काँग्रेस सरकारने शाळा काढल्या, पण मोदी त्यात गेले नाहीत Modi completed his higher secondary education in Vadnagar in 1967. काँग्रेसने प्रौढ साक्षर वर्ग , रात्रशाळा सुरू केल्या, त्यातही मोदी कधी गेले नाहीत इतका कडक माल ? मादक पदार्थ नियंत्रण विभागाने येथे लक्ष देणे आवश्यक आहे.

बांगलादेशमधील हिंदू वरील अन्यायाबद्दल तथाकथित ही हिंदू पक्ष आणि नेते आणि चेले गप्प आहेत. चायना च्या सोबत हे चिल्लर देश सुद्धा आता आवाज चढवायला लागले आहेत.

In reply to by कपिलमुनी

The national leadership does not want to burn bridges with the neighbor or its premier, while the West Bengal CM is ensuring she does not antagonise her vote bank or say something that the BJP may dub anti-Hindu or appeasing the Muslims The Bangladeshi prime minister Sheikh Hasina Wajed promised exemplary punishment for those responsible for the assault on Hindus.since Hasina has already announced strict action against the criminals, any recrimination will be pointless till the time her warnings do not seem to be translating into any concrete action. https://www.indiatoday.in/india-today-insight/story/why-modi-and-mamata… बाकी तुमचं (.....) चालू द्या

In reply to by सुबोध खरे

लिंक वाचात तरी जा , ममता काय हिंदू कैवारी म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करत नाही. मोदी , भाजप हिंदू मतांचा जोगवा मागून सत्तेवर आले आहेत . त्यांनी काय केले ते विचारले तर नेहमी प्रमाणे गोलपोस्ट बदलायचा क्षीण प्रयत्न . काही काँक्रीट उत्तर असेल तरच चर्चेस मज्जा !

In reply to by कपिलमुनी

The Bangladeshi prime minister Sheikh Hasina Wajed promised exemplary punishment for those responsible for the assault on Hindus.since Hasina has already announced strict action against the criminals, any recrimination will be pointless till the time her warnings do not seem to be translating into any concrete action. PM Modi called on to raise matter with Hasina, seek strong action against guilty https://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/pm-modi-called-on-… बाकी श्री मोदींनी तुम्हाला कळवलं नाही हि त्यांची मोठीच चूक आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

मोदी शहा बांगला व पाकच्या गोरगरीब हिंदूंना आयात करून नागरिकत्व देणार आहेत त्याचे काय झाले ? गरीब हिंदू तर आयात आलेच नाहीत , एक श्रीमंत मुसलमान अदनान सामीला मोदींनी नागरिकत्व देऊन 1 वर्षात पदमश्रीपण दिली म्हणे.

In reply to by mangya69

कागलकर, तू फक्त तुझ्या आयडीची काळजी कर. मागील आठवड्यातच तुझे दोन आयडी थडग्यात गेले. आता हा आयडी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कर. बाकी ते नागरिकत्व वगैरे विषय तुझ्या आवाक्यातले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या आवाक्यात आहे , म्हणून तर सांगितले. आणा तिकडून सगळे बांधव इकडे. आमच्या काँग्रेसने इटलीतून होतकरू महिला आणून नागरिकत्व देऊन काँग्रेसचे अध्यक्षपण बनवले. तसे तुम्हीही पाकिस्तानातून होतकरू हिंदू आणून भाजपाचे अध्यक्ष किंवा सरसंघचालक करून दाखवलेत तर थडग्यात गेलेलेही बंधुप्रेमाने सदगदीत होतील.

In reply to by mangya69

तसे तुम्हीही पाकिस्तानातून होतकरू हिंदू आणून भाजपाचे अध्यक्ष किंवा सरसंघचालक करून दाखवलेत तर थडग्यात गेलेलेही बंधुप्रेमाने सदगदीत होतील.
हे सोनिया काँग्रेस अध्यक्ष होण्यापूर्वीच २५ वर्षे झाले आहे- १९७३ मध्ये अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष झाले तेव्हा.

In reply to by mangya69

अडवाणी स्वतंत्र पाकिस्तानचे नागरिक होते का ?
हो पहिला एक महिना. ते सप्टेंबर १९४७ मध्ये भारतात आले. म्हणजे पहिला एक महिना ते पाकिस्तानचे नागरिक होते.

In reply to by mangya69

काय म्हणायचे आहे, तुम्हाला?
मोदी शहा बांगला व पाकच्या गोरगरीब हिंदूंना आयात करून नागरिकत्व देणार आहेत त्याचे काय झाले ?
हे असे "आम्ही तेथून हिंदू 'आयात करू' (तुम्ही वापरलेला शब्द)", व तेही "गरीब (तुमचे विशेषण) हिंदू" --- इत्यादी मोदी- शहा, अथवा त्यांचा पक्ष ह्यांपैकी कुणी, कधी हे म्हटले आहे?

In reply to by प्रदीप

Modi govt wants to give Pakistani Hindus Indian citizenship, but not visa for last rites For years, Hindus living in Pakistan have wanted to immerse the ashes of their loved ones in the Ganga. But their visa applications keep getting rejected. https://theprint.in/diplomacy/modi-govt-wants-to-give-pakistani-hindus-…

In reply to by mangya69

मोदी शहा बांगला व पाकच्या गोरगरीब हिंदूंना आयात करून नागरिकत्व देणार आहेत त्याचे काय झाले ?
सर्वप्रथम, कुणीही बांगला(देश) व पाकच्या हिंदूंना आयात करते आहे, म्हणजे काय? तेथील हिंदू काही कमोडिटी अथवा वस्तू आहेत काय, असा उपमर्दक शब्द वापरायला? आता, तुमच्या
त्याचे काय झाले ?
चे उत्तर इथे आहे. ते संपूर्ण वाचवत नसेल तर थोडक्यात: Citizenship (Amendment) Act, 2019 has been notified on 12.12.2019 and has come into force w.e.f. 10.01.2020. आता, काही पाकिस्तानी हिंदूंना त्यांच्या दिवंगत नातलगांच्या रक्षा गंगेत विसर्जन करण्यासाठी भारत सरकार व्हिसा देत नाही, हे काही मोदी सरकारचे धोरण असावे असे नव्हे. व्हिसा देणे अथवा नाकारणे हे तत्सबंधित सरकारी अधिकारी, केस- बाय- केस अभ्यास करून सर्व शर्ती पूर्ण झाल्या तरच करत असतात. जगांतील कुठल्या देशांत हीच प्रणाली वापरली जाते, व व्हिसा का नाकारला, ह्याविषयी कुठलेही सरकार उत्तरे देण्यास बांधिल नसते. तेव्हा ह्या बातमींत काही अर्थ नाही.

In reply to by सुबोध खरे

भारतात साक्षात हिंदू वादी सरकार सत्तेवर आहे तरी बांग्लादेशात हिंदू वर हल्ले झाले. काय केले हिंदू वादी भारत सरकार नी. फक्त बांगलादेश च्या पंतप्रधान कडे कारवाई करण्याची विनंती आणि हल्ल्याचा निषेध. भारतात कोणतेही सरकार सत्तेवर असते तरी त्यांनी हे केलेच असते. मग हिंदुवादी सरकार नी काय वेगळे केले ह्यांच्यात काय वेगळे पण आहे..

शाहरूखपुत्र आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता त्याचे वकील उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. एकेकाळी बाळ ठाकरेंनी शाहरूखला शिव्या घातल्या होत्या. २०१० मध्ये त्याचा माय नेम इज खान चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी सुरवातीला ठाकरेंनी दिली होती. पण नंतर यू-टर्न घेऊन तो चित्रपट प्रदर्शित करायला शिवसेनेचा विरोध नसेल असे सामनामध्ये लिहून आले होते. त्यावेळी सामनामध्ये लिहून आले होते-- "Let Shah Rukh release the film with the blessings of the Italian woman (Sonia Gandhi) and Yuvraj (Rahul Gandhi) without any protection and let it run in any theatre anywhere in the country. Sena will not oppose it," शाहरूखला देशद्रोहीही म्हणून झाले होते. "Traitors, do whatever you want to do with the blessings of Congress. Sena won`t stop you. Why should the heads of Shiv Sainiks bleed and they be jailed without any reason," https://zeenews.india.com/home/bal-thackeray-calls-shah-rukh-khan-trait… आता शाहरूख आपल्या मुलामागे उभा आहे हे उघड आहे. स्वतः सीनीअर ठाकरेंनी शाहरूखला शिव्या घातलेल्या असताना या प्रकरणात मधे पडायची शिवसेनेला काहीही गरज होती असे वाटत नाही. तरी केंद्र सरकार किंवा केंद्रीय तपासयंत्रणा जे काही करत आहेत त्याला विरोध करायचा हे व्रत घेऊन असे खुळ्यासारखे प्रकार शिवसेना करायला लागली आहे. या प्रकरणानंतर लोकांच्या विस्मृतीत गेलेला तो ११ वर्षांपूर्वीचा लेख व्हॉट्सअ‍ॅपवर फिरायला लागला तर शिवसेनेची अडचण होऊ शकेल. पण बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना अशी शिवसेनेची अवस्था झालेली दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आर्यनच्या अटकेविरूद्ध शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

नुकत्याच जाहीर एका अहवालात देशातील करोना मृत्यूंबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात सर्वाधिक माहिती लपवल्याचा ठपका गुजरातवर ठेवण्यात आलाय. गुजरात राज्यात सरकारी आकडेवारीपेक्षा ५ हजार ७२२ टक्के म्हणजेच ५७ पटीपेक्षा अधिक करोना मृत्यू झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडालीय. गुजरातशिवाय देशातील इतर राज्यांचं देखील या अहवालात विश्लेषण करण्यात आलंय. गुजरातनंतर राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो आहे. या राज्यांमध्ये देखील सरकारने सांगितलेल्या करोना मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. करोना मृत्यूबाबत महत्त्वाचे खुलासे करणारा हा अहवाल ‘जीवन रक्षा’ प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आला. यात मागील ३ महिन्यांचा दरमहा आणि राज्यनिहाय करोना मृत्यू आणि आरोग्य विमा दाव्यांची संख्या यांचा अभ्यास करण्यात आला. यात सार्वजनिक व खासगी दोन्ही विमा कंपन्यांच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ च्या आकडेवारीचा उपयोग करण्यात आला. या अभ्यासात अनेक राज्यांनी करोना मृत्यूंच्या वास्तव आकड्यांपेक्षा खूप कमी मृत्यू नोंदवल्याचं सांगण्यात आलंय. https://www.loksatta.com/desh-videsh/big-claims-about-covid-19-corona-d…

In reply to by mangya69

हा नक्की कुठला प्रकल्प आहे? ह्या प्रकल्पाचा व त्यांतील ह्या 'मोठ्या' बातमीचा दुवा द्याल का?

In reply to by प्रदीप

जरा मोकळा वेळ होता तर सहज म्हणुन खोदाखोद केली तर असले काही सापडले नाही. एक " जीवन रक्षा Voice of the unheard" असले एक ट्वीटर हँडल सापडले जिथे कोरोनाच्या बातम्या आहेत (https://twitter.com/jeevanrakshaa) . बाकी लोकसत्ता ने दिलेला तक्ता मला कुठेही सापडला नाही. लोकसत्तेने एकदम खरे वाटावे म्हणुन "जीवन रक्षा प्रकल्प" असा श्रेय निर्देश केला असला तरी मला त्यात खोटेपणा जाणवतो. त्यामुळे ही एक पेरलेली बातमी आहे असे समजायला वाव आहे. त्यातही सांखिकी द्रुष्टीने विचार केला तर तुलना ही चुकीची आहे .. म्हणजे "जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर" या तीन महिण्यातले कोवीड म्रुत्यु ची तुलना या तीन महिण्यात दाखल केलेले इंशुरंस क्लेम शी केली आहे. म्हणजे माणुस मेला की केला इंशुरंस क्लेम असे होत नाही. त्यामुळे या तक्त्याला / त्यातली आकडेमोड याला काहीही अर्थ नाही. एक पेरलेली बातमी यापलीकडे याला काहीही महत्व द्यायची गरज मला तरी वाटत नाही .. अजुन एक गंमत म्हणजे या तीन महिण्यात "केरळ" मधे सगळ्यात जास्त कोवीड केसेस होत्या परंंतु जास्त केसेस असलेला महाराष्ट्र व केरळ यात ग्रीन झोन मधे आहेत

त्याला कारण आहे केंद्रीय एजन्सी नी राज्यात धुडगूस घातला आहे.त्याचा विरोध करण्यासाठी सेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. महाराष्ट्र मध्ये सत्ता न मिळाल्या मुळे केंद अस्वस्थ झाले आहे. महाराष्ट्र,बंगाल,केरळ ही राज्य त्यांना शत्रू राष्ट्र वाटायला लागली आहेत. आता पर्यंत किती bjp नेत्यांवर,त्यांच्या पाठीराखा असणाऱ्या उद्योगपती वर केंद्रीय एजन्सी नी कारवाई केली आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर bjp समर्थक कधीच देणार नाहीत.

In reply to by Rajesh188

भाजप कधीच स्वत च्या लोकांवर कारवाई करणार नाही, तसेच महाविकास आघाडीही स्वतः च्या लोकांवर कारवाई करणार नाही. ह्या काळात कुठल्याच पक्षाकडून अशी अपेक्षा ठेवण चुकीचेच आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

पक्ष बघून कारवाई भारतात व्हायला लागली तर भारताचे बनाना रिपब्लिक होईल. असे जे घडत आहे तसे पूर्वी कधीच घडत नव्हत.विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नसतो ही समज पहिल्या राज्य कर्त्या मध्ये होती bjp मध्ये ती समज नाही आज सरकारी एजन्सी विरोधी पक्षांच्या लोकांवर आकसाने कारवाई करत आहे उद्या विरोधी पक्षांच्या लोकांचे खून पाडतील.हे भारताला परवडणारे नाही.राजकारण आपल्या जागेवर आणि कायदा सुव्यवस्था आपल्या जागेवर हवी..

In reply to by Rajesh188

उद्या कशाला, कृष्णा देसाई नाव ऐकले आहे काय?

In reply to by अनन्त अवधुत

चाचांच्या काळातील श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय ही नावे सहज आठवली.

In reply to by mangya69

हरेन पंड्यांच्या मारेकऱ्यांवर न्यायालयात आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, लालबहादूर शास्त्री, पानशेत धरणफुटीची चौकशी करणारे न्यायाधीश बावडेकर यांच्या मारेकऱ्यांवर साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कशाला त्या अहिरावण महिरावणाच्या नादाला लागताय? नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे

In reply to by सुबोध खरे

असल्यांना अधूनमधून थपडा मारून भानावर आणावे लागते.

In reply to by श्रीगुरुजी

झोपलेल्या माणसाला जागे करता येते डोके फिरलेल्या माणसाला ताळ्यावर आणता येत नाही तुम्ही तालिबानी माणसाला अहिंसेचे धडे देताय

In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे. परंतु पसरविले जाणारे खोटे आरोप यानिमित्ताने दूर करता येतात, भूतकाळातील दडविलेली पापे चव्हाट्यावर आणता येतात आणि डोके फिरलेल्याला चार थपडाही मारता येतात.

In reply to by Rajesh188

उत्तर प्रदेशात जून १९९५ मध्ये समाजवादी पक्षाच्या गुंडांनी मायावतींचा खून करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भाजप आमदार ब्रह्मदत्त द्विवेदींनी मायावतींना वाचवले होते. त्यामुळे मायावती द्विवेदींना आपल्या भावाप्रमाणे मानायच्या. पुढे मार्च १९९७ मध्ये या ब्रह्मदत्त द्विवेदींचीही हत्या झाली. तुम्ही ज्यांचा उदोउदो करत असता त्या इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणीदरम्यान द्रमुकचे खासदार सी.चिट्टीबाबू यांना ठार मारले होते हे माहित आहे ना? त्यावेळेस पोलिस तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांना मारहाण करत होते तेव्हा त्यांना वाचवायला चिट्टीबाबू मध्ये पडले आणि पोलिसांच्या लाथाबुक्के आपल्या अंगावर घेतले. ते जिव्हारी लागून चिट्टीबाबूंचे निधन झाले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे द्रमुकचे नेते आर्कोट विरास्वामी यांना आयुष्यभराचे पाठीचे दुखणे जडले होते. बरं बिहारचे माजी मुख्यमंत्री कृष्णबल्लभ सहाय यांना कोणी ठार मारले?माजी रेल्वेमंत्री आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री ललितनारायण मिश्रा यांना कोणी ठार मारले? मुंबईत भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा आणि भाजप नेते रामदास नायक, उत्तर प्रदेशातील भाजप आमदार कृष्णानंद राय वगैरेंच्या मृत्यूचे काय? बंगाल आणि केरळमध्ये कम्युनिस्टांनी केलेल्या राजकीय हत्यांचे काय? त्यांच्या बळींमध्ये कोणी आमदार-खासदार नव्हता पण सामान्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर बळी पडले. भारताला असे बनाना रिपब्लिक करायला सुरवात काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी वगैरेंनी आधीच केली आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

राजकीय विरोध हा राजकीय च असावा .त्या मध्ये द्वेष नसावा. गाव पातळीवर पण साध्या ग्रामपंचायती च्या निवडणुकीत लोक दुश्मन असल्या सारखे वागतात. गाव पातळीवर राजकारण मधून एकद्या ला वाळीत टाकणे,त्यांना मारहाण करणे असले प्रकार चालतात. हे सक्ती नी थांबवले च पाहिजे..

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ह्यांची हत्या झाली त्यांची कुणी केली माहीत आहे ना ? असे पानभर लिहून शेवटी तातपर्यात नावे घ्यायची. ह्यातला एक तरी खून काँग्रेसने केला, कम्युनिस्ट पार्टीने केला असे कोर्टात सिद्ध झाले आहे का ? की उगाचच गोडसे , ताशकंद डायरीच्या पटकथा लिहायच्या ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कशाला त्या अहिरावण महिरावणाच्या नादाला लागताय? नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

यूपी आणि बिहार मध्ये पहिल्या पासूनच जंगल राज आहे बाकी देशापेक्षा ही दोन राज्य खूप विचित्र आहेत देशाला सूट होत नाहीत. निवडणुकीत बूथ लुटणे,हिंसा करणे,राजकारणात लोकांचे खून पाडणे ही दोन राज्यांची संस्कृती च आहे.कश्मिर ह्याच्या पुढे खूप शांत राज्य आहे आणि कायद्याने चालणारे राज्य आहे असे म्हणले तरी अतीशोक्ती होणार नाही. शेषन साहेबांनी ह्यांना ह्या दोन राज्यांना चांगलाच हिसका दाखवून जागेवर आणले होते.

In reply to by Rajesh188

निवडणुकीत बूथ लुटणे,हिंसा करणे,राजकारणात लोकांचे खून पाडणे ही दोन राज्यांची संस्कृती च आहे. कश्मिर ह्याच्या पुढे खूप शांत राज्य आहे आणि कायद्याने चालणारे राज्य आहे असे म्हणले तरी अतीशोक्ती होणार नाही. यातल्या कोणत्या राज्यात आपण किती वर्षे राहिला होतात?

In reply to by Rajesh188

जालावर भंपक आणि अतिअतिशयोक्तिचे प्रतिसाद देऊन नाही का काही जण आपलं हसं करून घेत? चालायचंच

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. नार्वेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. गोवा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष असताना मडगावमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्याच्या वेळेस तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इतरही काही आरोप आहेत.अशा माणसाला स्वच्छ राजकारण करण्याची टिमकी वाजविणार्‍या पक्षाने घेतले ही आश्चर्याची गोष्ट आहे. फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये परिस्थिती विचित्र झाली आहे. २०१७ मध्ये काँग्रेसला ४० पैकी १७ जागा मिळाल्या होत्या आणि तो सगळ्यात मोठा पक्ष झाला होता तर भाजपला १३ जागा होत्या. तरीही काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा करायला उशीर केला. दरम्यान भाजपने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांचे प्रत्येकी ३ आमदार आणि अपक्ष यांची मोट बांधून बहुमताची व्यवस्था केली. मग सुरवातीला मनोहर पर्रिकर आणि त्यांचे निधन झाल्यानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. २०१७ मध्येच काँग्रेसचा विश्वजीत राणे हा आमदार फुटला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आणि काँग्रेसचे उरलेले बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले. त्यात पणजीमधून पर्रिकरांच्या जागेवर पोटनिवडणुकीत निवडून गेलेला बाबूश मोन्सेराट हा गुंड आणि बलात्कारीही होता. असल्या घाणेरड्या माणसाला पक्षात घेतलेले मला व्यक्तिशः अजिबात आवडले नव्हते. त्या कारणासाठी भाजपचा २०२२ मध्ये गोव्यात पराभव व्हावा असे फार वाटत होते/आहे. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आता गोव्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाही. काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपने ओरबाडले तर माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये गेले. माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर २०१४ मध्येच काँग्रेसबाहेर गेले होते. आता ते आपमध्ये गेले आहेत. तेव्हा काँग्रेसची अवस्था वाईटच आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने जबरदस्त यश मिळवले होते. त्यावेळीही काँग्रेसला फार यश मिळाले नव्हते. आपला एकच दक्षिण गोव्यातील बाणावलीची जागा मिळाली होती. त्यानंतर कोरोनाची भयानक अशी दुसरी लाट आली. गोव्यातील लाट महाराष्ट्रातील लाटेपेक्षा चौपट मोठी होती. त्याचा खरं तर भाजप सरकारला फटका बसेल अशी परिस्थिती आहे. पण त्या परिस्थितीचा फायदा घेण्याइतका विरोधी पक्ष सक्षम आहे का हा प्रश्न आहे. काँग्रेसची अवस्था वाईटच आहे. आपला जिल्हा परिषदेची एक जागा मिळाली असेल तर त्यावरून राज्यातील ४० पैकी २१ जागा मिळू शकतील इतकी उडी वर्षभरात मारता येईल का हा प्रश्न आहे. तृणमूलला लुईझिनो फालेरोंची नावेळीची जागा जिंकता येऊ शकेल पण त्याव्यतिरिक्त इतर कुठची जागा तृणमूल या नावावर जिंकता येणे अशक्य आहे. आणखी कोणी स्थानिक पातळीवरील लोकप्रिय नेते तृणमूलमध्ये गेले तर गोष्ट वेगळी. उत्तर गोव्यात पेडणे आणि मडकई या दोन जागांवर मगोप बळकट आहे. तिथून त्यांना हरवणे कठीण आहे. गोवा फॉरवर्डला उत्तर गोव्यातील एखादी जागा मिळायला हरकत नसावी. दक्षिण गोव्यात ख्रिश्चन मतांसाठी काँग्रेस, आप आणि काही प्रमाणावर तृणमूल यांच्यात स्पर्धा असेल. त्यापैकी एकही पक्ष पूर्ण फायदा उठविण्याइतका बळकट आहे असे आता तरी वाटत नाही. त्यामुळे गोव्यात इतके सगळे प्रकार करूनही भाजपलाच बहुमत मिळाले तरी आश्चर्य वाटू नये. गोव्याच्या राजकारणात आणखी एक पक्ष आला आहे. आप हा एन.जी.ओ मधून पुढे आलेला पक्ष आहे त्याप्रमाणेच गोव्यात 'रेव्होल्युशनरी गोवा पार्टी' हा एन.जी.ओ मधून पुढे आलेला दुसरा पक्ष यावेळी निवडणुक लढविणार आहे. त्याचा कितपत प्रभाव पडतो ते बघायचे. निदान सोशल मिडियावर तरी त्या पक्षाने भरपूर प्रचार सुरू केला आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे विरोधी पक्षांचे दुर्भाग्य नाही गोव्याच्या जनतेचे दुर्भाग्य आहे त्याची फळं त्यांना नक्कीच भोगायला लागणार आहेत. पोर्तुगीज कडून बाकी लोकांनी ह्यांना मुक्त केले आणि पण स्वकीय कडून ह्यांना मुक्त करायला बाकी लोक जाणार नाहीत. गोवा वासियानी गुलामी स्वीकारायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भ्रष्टाचाराचा आरोप आहे म्हणून अमक्याला आपने घेऊ नये , असेच म्हटले तर भाजप मोकळी पडेल. खुद्द मोदींजींची राष्ट्रीय पातळीवर केलेली पहिली कामगिरी होती , सुखरामशी चर्चा करून युती करणे

ह्याची दहा कारणे पण कोणाला सांगता येणार नाहीत.पण का निवडून देवू नये ह्याची 100 करणे सहज सांगता येतील.

In reply to by Rajesh188

पण गोव्यात भाजप असणे आवश्यक आहे, त्याशिवाय गोव्याच्या गोमातेचे रक्षण कोण करणार ? गोव्यात बीफबंदी आहे की भाजपाने बंद केली ? गोहत्येला विरोध करणाऱ्या टोळ्या फक्त काँग्रेसशासित राज्यातच काम करतात का ?

आज कोरोना लसीकरणात देशाने खूप महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत लसीकरणाला सुरवात झाल्यापासून जवळपास ९ महिन्यांनंतर आज एकूण १०० कोटी डोस देऊन पूर्ण झाले आहेत. मे महिन्यात लसीकरणात अडथळे येत होते तेव्हा भारताला (खरं तर मोदींच्या नेतृत्वाखालील भारताला) लसीकरण कसे जमणार नाही यावर बीबीसीने https://www.bbc.com/news/world-asia-india-57007004 अशाप्रकारचे लेख लिहिले होते. त्या सगळ्या आव्हानांना आपण पुरून उरलो आहोत. मागच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चपासून कोरोनाच्या बातम्या यायला लागल्यावर भारतात ३०-४० कोटी लोकांना कोरोना होणार आणि ४०-५० लाख लोक मरण पावतील अशाप्रकारची भाकिते पाश्चिमात्य विद्यापीठातील विविध प्रकारची गणिती मॉडेल 'कोळून प्यायलेल्या' ढुढ्ढाचार्यांनी केली होती. त्या सगळ्यांना आपण खोटे ठरविले आहे असे म्हणता येईल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाकी 150 देशातही शास्त्रज्ञाच्या आकडेवारीपेक्षा कमीच मेलेत , तेही विश्वगुरूंच्या वरदानाने का ?

100 करोड डोस पूर्ण केले म्हणून ढोल बडवणे सुरू झाले आहे. 100 कोटी डोस असण्याची शक्यता आहे , पण 2 डोस पूर्ण झाले असतील तरच ती व्यक्ती लसीकरण पूर्ण झाले म्हणता येईल , 1 वाले किती , 2 वाले किती ? 20 , 25 कोटी तर पोरंटोर असणार , ती तर 0 डोसवालीच आहेत