Skip to main content

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/08/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर. जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं. सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे. पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत. मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं. या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्‍या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक. मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक. मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्‍या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो. मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात. आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे. जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती. हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती. !जय श्री राम!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43835
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

काळाची गती अगाध असते. ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले.

In reply to by प्रचेतस

अलगद ? श्री रामजन्मभुमी आंदोलनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा सक्रिय सहभाग होता. आदरणीय लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या जी रथयात्रा काढली होती त्याचे सारथ्य व नियोजन श्री मोदींनी केले होते. सुप्रिम कोर्टात राम मंदिर सुनावणी दररोज व्हावी म्हणून मोदींनी व योगी आदित्यनाथ यांनी सातत्याने प्रयत्न केले. या शिवाय राम मंदिर भुमीपुजनासाठी केंद्रात भाजपा सरकार यावे लागले नाहीतर या केसची सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस सातत्याने होती.

In reply to by प्रसाद_१९८२

तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग असेलही/नसेलही पण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक करसेवक ह्यांचा खूपच जास्त प्रमाणात सहभाग होता.

In reply to by प्रचेतस

अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक कारसेवकांचा सहभाग कुणी नाकारल्याचे वाचण्यात/ऐकण्यात आजवर तरी आले नाही. -- तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे ?

In reply to by प्रसाद_१९८२

ह्यापैकी हयात असलेली कोणीच मंडळी आज अयोध्येत नाहीत किंवा भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही. इतकेच.

In reply to by प्रचेतस

सोने की थाली में जोना परोसा अरे खाए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे... अरे लौंगा इलायची का बीड़ा लगाया चाबे गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ... अरे बेला चमेली का सेज बिछाया हाँ बेला चमेली का सेज बिछाया सोए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ... l

In reply to by प्रचेतस

तुम्ही उल्लेख केलेल्या व हयात असणार्‍या मंडळीना या समारंभासाठी बोलावले असते तर मोदी विरोधी म्हटले असते की जे हयात नाहीत त्यांना का नाही बोलावले. आता अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे वय पाहाता त्यांना आमंत्रण नसेल दिले. शिवाय भुमीपुजन मोदींच्या हस्ते होऊ नये असे ज्यांना वाटते ते काहीही तर्क लावू शकतात.

In reply to by प्रसाद_१९८२

या सोहळ्याला सुमारे १७६ निमंत्रित व्यक्ती यांचे सरासरी वय सुमारे ७५ वर्षे असावे. त्यामुळे वयोमानानुसार आमंत्रण, हा दावा मोदी भक्तांचा बिनडोकपणा वाटतो.

In reply to by प्रचेतस

'....भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही' काही करून येन केन प्रकाराने खुसपट काढायचं ते हेच... तुम्हाला कधी पासून अडवाणींचा कळवळा ? हे म्हणजे कसं माहिती का... वाजपेयी वारले तेव्हा हीच कोलेकुई चालू झाली होती तसेच त्यावेळी काय काय तारे तोडले ... ... "आम्हाला ( बिगर भाजपावाले) वाजपेईई कसे वंदनीय होते ( खरा अर्थ हा कि या मोंदींपेक्षा वाजपेयी चंगले वैगरे..) कोण लक्ष देतो तुमचयकडे ...बसा ठणाणा करत... खुलासा( मंदिर हे केवळ एक प्रतीक आहे ,,,मुख्य हे आहे कि हिमतीने देशाच्या आणि बहुसंख्यांच्या अपेक्षांकडे वर्षनुवर्षे काँग्रेस ने जे मुद्दामून दुर्लक्ष केले ते बाजूला सारून काही खंबीर निर्णय घेणारे सरकार मिळाले म्हणून माझ्यासारखा निधर्मी पण या विचारांना साथ देतो )

In reply to by चौकस२१२

ज्याप्रमाणे मॅच चालू असताना अर्धनग्न चिअरगर्ल्स नाचत असतात. त्यांचा मॅचशी संबंध फक्त टणाटण उद्या मारणे याकडेच असतो, कोण आउट झाला कोण चौके मारतो याचे त्यांना घेणंदेणं नसतं... त्याचप्रमाणे, परदेशात राहून , भारतीयांना शहाणपण शिकवणाऱ्या वैचारिक अर्धनग्न चिअरगर्ल्स टनाटना नाचू लागल्यात .

In reply to by mrcoolguynice

"थंड" डोक्याचं माणसा अरे काय ते एक ठरव तुझ्या म्हण्याप्रमाणे मी दोन्ही एकाच वेळी करणे अवघड आहे रे बाबा .."परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसू आणि अर्धनग्न नर्तकी सारखे पण नाचू" असो एकूण तुझी एकूण सटकलेली दिसते.. तुझ्यआ सारखे "नग्न " प्रतिसाद तशाच भाषेत देता येतील मला पण ( परदेशात असून सुद्धा) पण त्या पातळीवर जाण्याची इच्छाच नाही.. तू मात्र सावर रे रे बाबा

In reply to by चौकस२१२

दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियेतील गोष्टी एकत्र करण्याचा चौकसपणा करू नका. आणि वर्ष्यानुवर्षं त्याचं त्याचं घासून गुळगुळीत झालेल्या चिपळ्या आता तरी वाजवत बसू नका. आवरा ...

In reply to by प्रचेतस

ते येणारच प्रचेतस भावु त्यांचा तोच तर अजेंडा तोच आहे आणि तोच राहणार. हे तेच ते दमामी, फिलॉसॉफर, वगैरे वगैरे अणि अगणित आयडी बॅन होवुन सुध्दा परत परत फिरुन नव्याने कुठल्याही कारणाने का होईना फुकाचे खुसपट काढाणारे.

In reply to by प्रचेतस

अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक करसेवक ह्यांचा खूपच जास्त प्रमाणात सहभाग होता.
सहमत आहे.

In reply to by प्रचेतस

आणि सहमत आहे. लॉटरी म्हणतात, लागली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले. असंच कलम ३७०, तीन तलाक, उडी आणि बालाकोट बद्दल पण म्हणून टाका

In reply to by सुबोध खरे

कुठून कुठं नेताय तुम्ही प्रकरण? माझ्या प्रतिसादात मोदींवर टीका केल्याचा एकतरी शब्द आहे का? ज्या धाग्याशी संबंधित प्रतिसाद आहे त्याविषयीच बोला. तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढल्यास राममंदिरापायी इतर लोकांनी केलेल्या कष्टांचे, त्यांच्या बलिदानाचे मोल तुमच्या लेखी काहीच नाही ते दिसते. तुम्हाला राममंदिर होतेय म्हणून नव्हे तर तर मोदींच्या हातून त्याचे भूमिपूजन होतेय याचाच आनंद होतोय असे एकूण तुमच्या प्रतिसादावरून दिसते.

त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले. लोकांचे कष्ट असतातच पण श्री मोदींच काहीच कर्तृत्व नाही? १९९३ सालापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुनावणीसाठी येते तेथे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणीसाठी घेते मग पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ हाच खटला सुनावणीसाठी घेतो. यामागे असलेली कायदेशीर प्रक्रिया समजावून घेतली असती तर असे

सवंग विधान केले नसते


In reply to by सुबोध खरे

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी प्रक्रियेत सरकार किंवा नेत्यांचा हस्तक्षेप असतो असे तुमचे म्हणणे आहे का ?

In reply to by कपिलमुनी

सुनावणी प्रकरणात नव्हे तर कोणती केस बोर्डावर येईल. कोणत्या खंडपीठापुढे येईल, कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे कुणाचा नंबर रांगेत परत परत मागे जातो. इ इ असे बरेच किस्से आहेत. त्याची चर्चा करण्याचा हा धागा नाही.

In reply to by कपिलमुनी

तीन तलाक प्रकरणात हा (bias) पूर्वग्रह येऊ नये म्हणून पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ होते. त्यात एक हिंदू, एक शीख, एक पारशी, एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान न्यायाधीश होते न्यायालयात सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून काही वेळेस लायक नसलेल्या न्यायाधीशांना पण "चढवले" जाते. न्या सीरियाक जोसेफ नावाच्या न्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयात १०५ खटले सुनावणीकरून निकाल महिनोन्महिने राखून ठेवला आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयात चढवले गेले तेंव्हा हे सर्व खटले पुन्हा सुरुवातीपासून दुसऱ्या पिठापुढे सुनावणीस घ्यावे लागले. सर्वोच्च न्यायालयात साडे तीन वर्षे काम केलेल्या या महाशयांनी फक्त ७ निवाडे लिहिले होते आणि आपल्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत त्यांनी १०० सुद्धा निकाल लिहिले नाहीत. केवळ ख्रिश्चन म्हणून त्यांना बढती मिळत गेली. https://thewire.in/law/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-c… न्यायालयात निकाल मिळतो. न्याय मिळेलच असे नाही

तुम्ही म्हणाल असे असेल तर मग तसे सगळ्या पं.प्र. च्या बाबतीत बोलता येईल की कारण ते ५ वर्षे सत्तेवर येण्या आधी कोणीतरी खुप अनन्वित कष्ट केलेलेच असतात. पण जो पं.प्र. सत्तेवर असतो त्याच्या नावे तर इतिहास लिहला जातो. आता बोलायचं झालं तर चला तर मग पं. नेहरुं पासुन सुरुवात करु.

In reply to by प्रमोद देर्देकर

अर्थातच. एकटा माणूस हे करूच शकत नाही पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत असा जो सार्वत्रिक समज करून दिला जातोय तो चुकीचा आहे हे फक्त सांगू इच्छितो.

In reply to by प्रचेतस

फळ अलगद हातात पडलं

याचा साध्या मराठीत अर्थ असा निघतो कि काहीही कष्ट न करता त्याचे फळ मिळालं. दुसरा अर्थ असेल तर मला समजावून सांगा

In reply to by सुबोध खरे

न्यायालयीन प्रक्रिया पण एकदा समजावून घ्या आणि तिला चालना देण्यात मोदींचा सहभाग काय तेही समजून घ्या. बाकी चालू द्या

In reply to by प्रचेतस

शोधा कि जालावर. भरपूर साहित्य सापडेल. श्री मोदींनी झक्कू लावला नसता तर या केसेस अजून १५-२० वर्षे सुनावणीसाठी आल्या नसत्या.

In reply to by सुबोध खरे

मला जालावर शोध घेण्यात वेळ नाही आणि स्वारस्य तर अजिबात नाही तेव्हा तुम्हाला समजावून सांगता येत असेल तर सांगा नाहीतर सोडून द्या.

In reply to by प्रचेतस

आपला पूर्वग्रह दूर करावा यासाठी वेळ खर्च करण्याची माझी तयारी नाही. तसा मला वेळ भरपूर असतो

In reply to by प्रचेतस

"पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत" असं कोणी म्हणत नाहीये... आणि संघाला तर हे पटणार पण नाही मोदी आणि योगिनीं कदाचित त्याचा पाठपुरावा जोर धरून केला एवढेच...

जवळपास ५०० वर्षांच्या दमनातुन / वनवासातुन हिंदूंची आज खर्‍या अर्थाने मुक्तता झाली असे मला वाटते ! या गोष्टीसाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सहभागी झाले त्या सर्व लोकांना नमन ! बोलो सियावर रामचंद्र की जय। पवनसुत हनुमान की जय। धर्म की विजय हो, अधर्म का नाश हो। Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan LIVE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ॥ राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

अगदी .. पिढ्या पिढ्या ज्या रामनामाने समृद्ध झाल्या त्या रामाला जन्मभूमीपासून इतके दिवस तिष्ठत राहावे लागले.जय श्रीराम!! कल्याण करी रामराया हो देवराया!!

अडवाणींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातील एक पिढी दोन्ही करसेवेला गेलेले. त्यांच्या हयातीत हा दिवस त्यांना पाहायला मिळाला. कोठारी बंधू, विनय कटियार, साध्वी हृतंबरा, उमा भारती, जोशिजी, बाळासाहेब, अशोक सिंहल अशा सगळ्या नावांची आठवण येत राहील.

In reply to by अभ्या..

बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर त्यांच्या चिरंजीवांनी आणि नातवाने सगळे मुसळ केरात टाकलय. आमंत्रण मागात फिरायचे. आणि मिळाले की जाणार नाही म्हणायचे ( बारामतीच्या काकांच्या धाकामुळे). इकडे राउताने रडायचे आणि तिकडे यांनी खडे फोडायचे. ( मुख्यमंत्री साहेब बहुतेक शीबीआय चौकशीत काय बोलायचे याची प्रॅक्टीस करत असावेत)

In reply to by विजुभाऊ

चिरंजीवांनी सगळे मुसळ केरात टाकलय. १००% बारामतीच्या काकांच्या धाकामुळे ! ... लै हस्लो

चला मंदिर झालं ... आतातरी पायभूत सुविधा, अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या ..

In reply to by mrcoolguynice

पायभूत सुविधा, ! थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना... तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..

In reply to by mrcoolguynice

पायभूत सुविधा, ! थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना... तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..

In reply to by चौकस२१२

परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसून , दुसऱ्या हाताने मोबाईलवरून भारतीयांना अक्कल शिकवू नये. शिवाय पप्पूला पण तुमच्या सोबत घेऊन जावे.

आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी जरूर गोडधोड खाऊन हा दिवस साजरा करावा. ज्या साऱ्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचे अभिनंदन ! आता काशी मथुरा इथल्या मंदिरांचे कायदेशीर पुनर्स्थापन करण्याकडे लक्ष द्यावे. २६/११ चा बदला अजून बाकी आहे. फोंड्यातल्या मशिदीला सुद्धा कायदेशीर पुनर्निर्माणाची गरज आहेच. हे सगळं करायला मोदी आणि कंपनीचीच गरज आहे. देर्देकर साहेब, ढुशक्लेमर टाकायची काही गरज नव्हती. दुसऱ्यांच्या दु:खात आनंद मानणारा आपला हिंदू धर्म नाही. अर्थात ज्यांच्या बुडाला आग लागली आहे त्यांच्या दु:खाला आता पारावार राहिला नाही आणि आपण ते दूर करायचा प्रयास करण्याची काहीच गरज नाही. आजचे अग्रलेख पाहिलेत तरी कल्पना येईल. एकतर्फी निर्णयाने हा सोहळा चालू आहे वगैरे दिवे डावरे नक्षली कुबेरांनी पाजळले आहेतच. काही वाकड्या तोंडाच्या लोकांनी जमेल तेवढा काड्याघालू पाचकळपणा करायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे केलाच. असो. समाजकंटकांकडे दुर्लक्ष करावे. रावण सीतेला पळवून नेत असताना चिऊसैनिकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला होता ; ब्रिज बांधायला माकडे पण आम्हीच पुरवली होती ई. ई. असंही म्हणायला काही लोक कमी करायचे नाहीत. श्रेय उपटायला हे लोक काहीही करतील. आपण मज्जा बघावी.

In reply to by तेजस आठवले

तुमचे वय माहिती नाही पण त्याकाळी जाणत्या असणाऱ्या लोकांना विचारा, बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" म्हणत असताना फक्त ठाकरे च होते ज्यांनी होय आम्ही पाडली म्हणाले

In reply to by कपिलमुनी

बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" म्हणत असताना फक्त ठाकरे च होते ज्यांनी होय आम्ही पाडली म्हणाले
ठाकरे यांनी थेट आम्ही पाडली असे न म्हणता ' पाडणारात शिवसैनीक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटेल असा नरो वा कुंजरोवा पावित्रा घेतला होता. त्या बोलण्याचा विपर्यास केलाय लोकांनी आणि अर्थातच सेना त्याचे श्रेय परस्पर घेतेय

In reply to by विजुभाऊ

याचे कारण श्री अडवाणी यांच्यावर खटला भरला तसा आपल्यावर येऊ नये म्हणून हि पळवाट शोधली. त्यांना स्पष्ट विचारले होते कि आपण शिवसैनिकांना पाठवले होते का? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले होते. हि मुलाखत मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. अर्थात मशीद पाडल्याचा आपल्याला आनंद झाला एवढे मात्र ते स्पष्टपणे म्हणाले हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यांनी उगाच सर्वधर्म समभाव, फुरोगामी पणा वगैरे दाखवला नाही

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, माझ्या मते वादग्रस्त वास्तू पाडणं नियोजित नसून उत्स्फूर्त होतं. त्यामुळे बाळासाहेबच काय कोणीही असा दावा करू शकंत नाही की मी माणसं पाठवलेली. आ.न., -गा.पै.

In reply to by Gk

जि के, मुळात हि वेळ का आली ( जमावाने मशीद पडण्याची) याचा विचार केलाय कधी? स्वान्त्र्यापासून "सर्वधर्मसमभाव " या शब्दाचा बरोबर उलट अर्थ काँग्रेस ने राबवला (मुस्लिम आक्रमकांनी सत्ता स्थापन करताना स्थानिक धर्म कसा नेस्तनाबूत करता येईल हे पहिले .. हा इतिहास पण जणू घडलाच नाही !) अल्पकसंख्याकांचे "टोकाचे" लांगुनचालन केले आणि केवळ म्हणून आज लोक :"काँग्रेस इतर " पर्याय स्वीकारू लागले ते सुद्धा लोकशाही मार्गाने . तरी तुम्ही मात्त्र फक्त विरोध आणि असले फुकाचे वाद घालत राहा... मंदिर झाले त्याने काही देशाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत... हे भाजपसमर्थकांना हि कळते बरं अजून एक सांगा.. असे सक्तीचे प्रार्थनास्थळ बदलणे जर तुम्हाला आक्षेपार्थ वाटते ना तर मग "हया सोफिया" चे परत सक्तीने मशिदीत रूपांतर केले तेव्हा ख्रिस्ती लोकांनां दुख्ख वाटले तेव्हा त्यांना साथ दिलीत का? तेव्हा मूग गिळून गप्प.. ( आणि वरती हि मखलाशी करू नका " कि हा भारताचा प्रश्न नाही!")

In reply to by Gk

मी तुम्हास जेवण पाठवले नाही, म्हणजे तुम्ही उपाशी आहात , असे ठरवायचे का ? ठरवा कि तुम्ही मुखत्यार आहात. त्यात काय अयोध्येत पूर्वेकडच्या मक्का आणि काबा पण आहे म्हणा कि. फक्त उघड पणे असं (मक्का आणि काबा) म्हणून नका. नाही तर सैतान म्हणून तुम्हाला दगड पण मारतील. ))=((