देवाचं नांव कुणी ठेवलं ?
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येस ! मलाही त्यांचा लॉजिकसेन्स
धन्यवाद
जे नाही हे सिद्ध करता येत
एखादी गोष्ट खरी आहे की नाही
@ कोहंसोहं१० : तुमचं लॉजिक पार गंडलंय हो
लोकांना नाक वर करुन सांगता...
सोहंकोहं
संजय क्षीरसागर यांच्या काही विधानांवर भाष्य
@ गामा पैलवान : तुमची काही विधानं रोचक वाटली
इतर कुणालाही न दिसणारी काली
कोहंसोहं१० : काय बोल्ता ?
कारण ती फक्त ज्याला भ्रम
अवांतर : उत्क्रांती म्हणजे काय
उत्क्रांती
उत्क्रांती
सिम्पल सेल
देवाचा नाव कोणी ठेवला
कोहंसोहम
अगदी बरोबर. पण त्यासाठी
कोहंसोहम
तूर्तास आपण देव धर्म बाजूला ठेवू
श्रद्धा...
आज सुद्धा
(No subject)
जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती
प्राजक्ता
@ Prajakta२१ : त्यामुळे मनातून घाबरलेल्या मानवाने....
संक्षी, तुम्हाला नैतिक अधिकार नाही हे विधान करण्याचा
आतापर्यंत २३५६ वाचनं आणि १३६ प्रतिसाद झाले, पण इतकी साधी आणि उघ
हा खूप जुना युक्तिवाद आहे
नॅशनल geography
एलिअन = एलिअन
संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद
@ गामा पैलवान : इलेक्ट्रॉन !
आणि
संजय क्षीरसागर
ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच
मुख्य अडचण !!
धागाकर्त्याची कपोलकल्पित
ईश्वर ही विरोधाभासाने भरलेली
२-३ गोष्टी बद्दल खालील मतं
@ वीणा३ : इट्स जस्ट बिझनेस !
तुम्ही फार म्हणजे फारच
देव व आधुनिक प्रगती
@ गामा पैलवान : आधुनिक तंत्रज्ञान हे
थोडक्यात, जी केवळ कल्पना आहे तिच्यावर सूज्ञ व्यक्ती कधीही भरोसा
@ Rajesh188 : किंवा 5 ते 10 वर्षात पण लोक सूज्ञ होतील.
Stephan sir सांगून गेलेत
माणसाचं सुज्ञत्व
गामा पैलवान : आत्मा नामक कोणीही कधीही न पाहिलेल्या...