|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील.
या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो. तसेच आज आग्र्याच्या किल्ल्यात ती जागा कुठे आहे, ब्रिटिश काळात त्या जागेचे काय झाले हे ही आपल्याला समजते आहे.
औरंगझेब बादशहाचे प्रख्यात रजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग यांचे वकील आणि इतर कर्मचारी हे सतत मोगल बादशहाजवळ असत. दरबारात घडणारी प्रत्येक महत्वाची घटना आपले धनी मिर्झाराजे याना लिहून पाठवणे हे या मंडळींचे काम होते. त्यांनी लिहिलेले अहवाल आणि पत्रे याना वकील रिपोर्ट असे आज म्हणतात. सुदैवाने 1666 सालचे काही वकील रिपोर्ट्स आजही बिकानेर येथे जतन करून ठेवले आहेत. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे कागद प्रथम उजेडात आणले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीविषयी मिर्झाराजा जयसिंग यांच्या पदरी असलेल्या श्री कल्याणदासजी नावाच्या वकिलाने तपशीलवार हकीगत आपल्या धन्यासाठी (म्हणजे मिर्झाराजांसाठी) अकबाराबाद म्हणजे आग्रा इथून लिहून पाठवली आहे, त्या पत्रात आपल्याला भेटीची जागा कोणती होती याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज औरंगझेबाला घुसलखाना इथल्या दरबारात भेटले असे आपल्याला यातून स्पष्ट दिसते.
(अवांतर - हे फार महत्वाचे, भेटीनंतर लगेच लिहिले गेलेले पत्र आहे. त्यातून आपल्याला भेटीत काय घडले ते कळते. हे पत्र इतिहास संशोधकांना माहित असल्याने आजच्या बातमीचा हे पत्र हा विषय नाही. यातला भेट घुसलखान्यात झाली हा उल्लेख इथे फक्त या बातमीत महत्वाचा आहे. हे मूळ पत्र मात्र बहुदा प्रथमच छापले जात असावे.
मूळ पत्रातला हा भाग भेटीचे वर्णन करतो.
मिती जेष्ठ वद्य ५
आदितवार के दिनी सेवोजी और सेवोजी को बेटो बे सिम्बुजी आग्रे आया सु. महाराज कुवरजी (म्हणजे मिर्झाराजा जयसिंग याचा मुलगा रामसिंग) व मुखलिसखानो पादशाहजी हुकम कियो यो सु पातशाही स्यो कोस एक सामहा आय सेवाजीनो ले जय मुलाजमती कराइ.
.....
(नजर दिली त्याचे तपशील)
......
मुलाजमती किया पा छो पातशाहजी पान दिया सेवोजी तसलिम करी लिया तब पातशाहजी बकाय नो फार्मयो पच हजारो कि मिसली मो खडा करो सु खडो कियो तबही शिवाजी राजी हूओ नही दिलगीर बहोत हूओ सु घुसो करी हुजुरी स्यो उठी चालो तब महाराज कुवर (रामसिंग) जी हाथ पकडो कि कहा जावो छो खडा रहो सु सेवे मानो नही आयो बेटा नो ले गुसलखाना कि ओढी नजीक जिना पाय गोधि अंगी वॊठो घुसो बहोत कियो सु. पातसाहजि सयों मालूम हुई सेवो दिलगीर धुवू तब नबाब जाफर खान दिवान व कुवर (रामसिंग) जी व असदखा नो फार्मयो दिलासा करी ले अयो सुवा आगी दिलासा करी समझायो परगी शिवाजी घुसो कियो सुना नाही तब या जाय पादशाहजी सो अर्ज पहुंचायी जु हजरती का बंदा होशीजमती मो अय हो सु हजुरी अवो नाही तब पादशाहजी कुवरजी नो फरमयो डेरो ले जाय .....
…..
)
या उल्लेखातून अनेक प्रश्न उद्भवतात - घुसलखाना याचा शब्दशः अर्थ स्नानगृह. तिथे दरबार का भरवला होता?
शहाजहान बादशाहने आग्र्याच्या किल्ल्यात नवीन इमारती बांधल्या. त्यावेळी बाहेरच्या पटांगणात असणारा दिवाण-इ आम-ओ-खास म्हणजे आम आणि खास या सर्वांसाठी असणारा दिवाणखाना (हॉल), त्याच्या आतल्या चौकातील दिवाण-इ-खास असा दुसरा दिवाणखाना हे दरबारासाठी वापरले जात.
याशिवाय सर्वात आतल्या भागात, जिथे जनानखान्यात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित वावरू शकतील अश्या भागात शहाजहान बादशाहने एक फार सुंदर आणि सुबक असा ऐवान म्हणजे हॉल बांधला असा उल्लेख आपल्याला लाहोरी याच्या बाद्शाहनाम्यात सापडतो. या जागी नवीन वर्षाच्या आरंभी अथवा बादशहाच्या वाढदिवशी खास दरबार भरत असे. त्या वेळी बादशहाची तुला होत असे आणि जनानखान्यातल्या महत्वाच्या स्त्रिया अलंकार, रत्ने, वस्त्रे बादशहाच्या तुलेसाठी देत असत. शिवाजी महाराज औंरंगझेबाला भेटले त्या वेळी बादशहाच्या राज्यारोहणाचा असाच मोठा खास उत्सव चालू होता आणि त्यानिमित्त बादशहाने खास दरबार घुसलखान्यात भरावला होता. इथेच औरंगझेब शिवाजी महाराजांना भेटला.
दुर्दैवाने शिवाजी-औरंगझेब भेटीचे अथवा औरंगझेब बादशहाचे या दरबाराचे असे चित्र उपलग्ध नाही. पण काही दशके अगोदर शहाजहान बादशहाचे अगदी याच हॉल मधले तुला होतानाचे चित्र मात्र लाहोरी याच्या बाद्शाहनामा या ग्रंथात आहे. हे एकमेव असे चित्र सध्या ब्रिटिश राजघराण्याच्या खासगी संग्रहात विंड्सर कासल इथे आहे. या चित्रावरून आपल्याला घुसलखाना इथला दरबार कसा दिसत होता, औरंगझेब बादशाह कुठे बसलाअसावा, सरदार उभे राहण्याची जागा किती दूर होती, छत्रपती शिवाजी महाराज कुठे उभे असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
हा ऎवान हा एका बाजूने घुसलखाना याला लागून होता असा उल्लेख लाहोरी याने केला आहे. त्याने त्या जागेची गजामध्ये मापेही दिलेली आहेत. त्यावरुन आपल्याला आजच्या लाल किल्ल्यातील या हॉलच्या जागेचा चौथरा शोधून काढता येतो. ही जागा आज अशी दिसते.
ही जागा दिवाण-ए-खासच्या अगदी समोर यमुनेच्या काठी असलेल्या गच्चीवर आहे. तिला अगदी लागूनच आजचा घुसलखाना आहे. हीच जागा आणि हा हॉल एका जुन्या नकाशात हमाम म्हणजे घुसलखाना याला लागून असलेली दिसते. या नकाशात मात्र हा हॉल शाबूत असलेला दिसतो.
या सुंदर संगमरवरी हॉलचा पुढील इतिहासही मोठा रोचक आणि शोकजनक आहे. ऑस्ट्रियन संशोधक एब्बा कोक यांनी त्याचे पुढे काय झाले याची माहिती मोठ्या मेहेनतीने जमा केली आहे.
१८०३ साली दौलतराव शिंदे यांच्या पराभवानंतर आग्रा आणि दिल्ली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १८१५ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याच्या हुकुमाने हा संगमरवरी हॉल तोडण्यात आला. त्यातून जे संगमरवर निघाले त्याचा लिलाव झाला. आणि त्यातले सुंदर तुकडे परदेशी इंग्लंडला नेले गेले. तिथे ते काही ठिकाणी प्रदर्शित केले गेल्यावर सध्या कोक यांच्या शोधानुसार आज या हॉलचे काही तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियम या संग्रहालयाच्या तळघरात काही खोक्यांमध्ये ठेवलेले आहेत.
या जुन्या चित्रात आपल्याला हॉल तोडल्यानंतर तिथे बांधलेली झोपडी आणि त्यानंतर तिचे उरलेला मोकळा चौथरा, जो आजही तसाच आहे तो दिसतो. (1876)
नंतर उरलेली रिकामी जागा (1880)
आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!
या उल्लेखातून अनेक प्रश्न उद्भवतात - घुसलखाना याचा शब्दशः अर्थ स्नानगृह. तिथे दरबार का भरवला होता?
शहाजहान बादशाहने आग्र्याच्या किल्ल्यात नवीन इमारती बांधल्या. त्यावेळी बाहेरच्या पटांगणात असणारा दिवाण-इ आम-ओ-खास म्हणजे आम आणि खास या सर्वांसाठी असणारा दिवाणखाना (हॉल), त्याच्या आतल्या चौकातील दिवाण-इ-खास असा दुसरा दिवाणखाना हे दरबारासाठी वापरले जात.
याशिवाय सर्वात आतल्या भागात, जिथे जनानखान्यात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित वावरू शकतील अश्या भागात शहाजहान बादशाहने एक फार सुंदर आणि सुबक असा ऐवान म्हणजे हॉल बांधला असा उल्लेख आपल्याला लाहोरी याच्या बाद्शाहनाम्यात सापडतो. या जागी नवीन वर्षाच्या आरंभी अथवा बादशहाच्या वाढदिवशी खास दरबार भरत असे. त्या वेळी बादशहाची तुला होत असे आणि जनानखान्यातल्या महत्वाच्या स्त्रिया अलंकार, रत्ने, वस्त्रे बादशहाच्या तुलेसाठी देत असत. शिवाजी महाराज औंरंगझेबाला भेटले त्या वेळी बादशहाच्या राज्यारोहणाचा असाच मोठा खास उत्सव चालू होता आणि त्यानिमित्त बादशहाने खास दरबार घुसलखान्यात भरावला होता. इथेच औरंगझेब शिवाजी महाराजांना भेटला.
दुर्दैवाने शिवाजी-औरंगझेब भेटीचे अथवा औरंगझेब बादशहाचे या दरबाराचे असे चित्र उपलग्ध नाही. पण काही दशके अगोदर शहाजहान बादशहाचे अगदी याच हॉल मधले तुला होतानाचे चित्र मात्र लाहोरी याच्या बाद्शाहनामा या ग्रंथात आहे. हे एकमेव असे चित्र सध्या ब्रिटिश राजघराण्याच्या खासगी संग्रहात विंड्सर कासल इथे आहे. या चित्रावरून आपल्याला घुसलखाना इथला दरबार कसा दिसत होता, औरंगझेब बादशाह कुठे बसलाअसावा, सरदार उभे राहण्याची जागा किती दूर होती, छत्रपती शिवाजी महाराज कुठे उभे असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
हा ऎवान हा एका बाजूने घुसलखाना याला लागून होता असा उल्लेख लाहोरी याने केला आहे. त्याने त्या जागेची गजामध्ये मापेही दिलेली आहेत. त्यावरुन आपल्याला आजच्या लाल किल्ल्यातील या हॉलच्या जागेचा चौथरा शोधून काढता येतो. ही जागा आज अशी दिसते.
ही जागा दिवाण-ए-खासच्या अगदी समोर यमुनेच्या काठी असलेल्या गच्चीवर आहे. तिला अगदी लागूनच आजचा घुसलखाना आहे. हीच जागा आणि हा हॉल एका जुन्या नकाशात हमाम म्हणजे घुसलखाना याला लागून असलेली दिसते. या नकाशात मात्र हा हॉल शाबूत असलेला दिसतो.
या सुंदर संगमरवरी हॉलचा पुढील इतिहासही मोठा रोचक आणि शोकजनक आहे. ऑस्ट्रियन संशोधक एब्बा कोक यांनी त्याचे पुढे काय झाले याची माहिती मोठ्या मेहेनतीने जमा केली आहे.
१८०३ साली दौलतराव शिंदे यांच्या पराभवानंतर आग्रा आणि दिल्ली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १८१५ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याच्या हुकुमाने हा संगमरवरी हॉल तोडण्यात आला. त्यातून जे संगमरवर निघाले त्याचा लिलाव झाला. आणि त्यातले सुंदर तुकडे परदेशी इंग्लंडला नेले गेले. तिथे ते काही ठिकाणी प्रदर्शित केले गेल्यावर सध्या कोक यांच्या शोधानुसार आज या हॉलचे काही तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियम या संग्रहालयाच्या तळघरात काही खोक्यांमध्ये ठेवलेले आहेत.
या जुन्या चित्रात आपल्याला हॉल तोडल्यानंतर तिथे बांधलेली झोपडी आणि त्यानंतर तिचे उरलेला मोकळा चौथरा, जो आजही तसाच आहे तो दिसतो. (1876)
नंतर उरलेली रिकामी जागा (1880)
आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख,फोटो आवडले.
औरंगजेबासमोर वाकले नाहीत असे
औरंगझेबासमोर मानाने वागले
कै राम नाईक सरांशी केला होता पत्र व्यवहार
खूप छान लेख
ह्या लेखाची वाटच पाहात होतो.
उत्तम माहिती. धन्यवाद!
उत्तम
ताजमहाल ?
पु ना ओक यांच्या पुस्तकात असे
पुरावा
आठवले सर, एका लाकडी
लाकडी खांब
पुरावे शोधून मग
छान माहितीपुर्ण लेख.
माफ करा...
इतिहास संशोधन आणि इतिहासात
बरोबर आहे...पण
तुमचा मुद्दा रास्त आहे, पण
इतक्या माहितीपूर्ण आणि मेहनत
तुमचा सल्ला
चीलमाडी समीर काका, नका मनाला
मनाला नाही लावले
इतिहासातल्या वांग्याची आणि
आणि चीनबद्दल -
मनो,
समीरसुर सारख्या लोकांच्या अपेक्षेकड़े
समीरसुर साहेब,
इतिहास...
समीरसुर साहेब,
नाव घेतल्याने नव्हे...
समीरसुर साहेब,
समीरसुर साहेब,
जाऊ द्या हो...
चियर्स
मान्य!
मनो यांना
एकाच मुद्द्यावर थोडं जास्त
असली - नकली चा सुळसुळाट!
समर्पक प्रतिसाद
असे म्हणतात कि
विसरायचा नाही; त्यातून शिकून पुढे जायचं
उत्तम माहिती.
मनो, तुम्ही मिसळपाववर एक
* संशोधनाविषयी गम्य नसलेले,
मुळात संशोधनासाठी वेळ पुरत
मनो भाऊ, काही मदत लागली तर
तुम्ही जे संशोधन करता त्याचे
सुंदर मनोजजी
सुंदर लेख. रोचक आणि