सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं
प्रतिक्रिया
18 Jan 2015 - 5:09 pm | विभावरी
वा सुचेता आवडली कविता ..
18 Jan 2015 - 9:33 pm | पैसा
कविता आवडली. साधी सरळ.
18 Jan 2015 - 9:50 pm | सस्नेह
सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण.
19 Jan 2015 - 6:14 pm | आरोही
+१ ,कविता आवडली..
18 Jan 2015 - 10:56 pm | खटपट्या
आवडली !!
19 Jan 2015 - 3:41 am | स्पंदना
छान लिहीतेस!!
19 Jan 2015 - 1:51 pm | अजया
आवडली कविता.
19 Jan 2015 - 6:17 pm | अनुप ढेरे
आत्मु गुरुजींनी ही ओळ
अशी लिहिली असती का असा विचार करतोय.
21 Jan 2015 - 1:07 pm | सुचेता
मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे
21 Jan 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा
यावर १ तांब्या काव्य लिहायला हात शिवशिवत आहेत =))
21 Jan 2015 - 2:41 pm | सस्नेह
प्रतिभेच्या नळाला पाणी यायची वाट पाहताय का ? *lol*
21 Jan 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा
पहिला मान मठाधीपतींचा ;)
21 Jan 2015 - 3:56 pm | नाखु
बुवांचा तो तांब्या!!
इतरांचा तो ठोंब्या !!
टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)
21 Jan 2015 - 1:55 pm | सविता००१
आवडली कविता
21 Jan 2015 - 4:01 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर कविता..
22 Jan 2015 - 7:18 am | मदनबाण
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }