मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोबती

सुचेता · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सुखाला मिळतील सोबती खूप सहायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी कडेने पोहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं भोगावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी केला अट्टाहास दैवात लिहलेलं टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य पाठ फिरवून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं

वाचने 3388 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अनुप ढेरे Mon, 01/19/2015 - 18:17
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
आत्मु गुरुजींनी ही ओळ
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा त्रिफळा घेणं योग्य असतं
अशी लिहिली असती का असा विचार करतोय.

सुचेता Wed, 01/21/2015 - 13:07
मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे

In reply to by टवाळ कार्टा

नाखु Wed, 01/21/2015 - 15:56
बुवांचा तो तांब्या!! इतरांचा तो ठोंब्या !! टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)