मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प्रमोद देर्देकर · · जनातलं, मनातलं
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.

वाचने 67125 वाचनखूण प्रतिक्रिया 231

In reply to by तर्राट जोकर

याॅर्कर Tue, 05/03/2016 - 22:29
त्रुटी म्हणजे जातीय चष्मा बाजूला सारून चित्रपट पाहता येत नाही,कितीही प्रयत्न केला तरी. बाकि चित्रपट मस्तच आहे,
बाकी तुमचं ग्रामिण भागातल्या प्रेमाबद्दलचं मत वाचुन अंमळ करमणुक झाली.
100 % खात्री देवू शकणार नाही,पण 70 % प्रेमप्रकरणं फेल गेली आहेत गावात.रोजरास धुडगूस चालू आहे नुस्ता.
>> तुम्हीच बनवा ना तो चित्रपट. त्याची कशाला वाट बघताय?
हे काय बरोबर नाही,तुम्ही अभ्यासू आहात,उच्चभ्रूंना जातीय उन्माद आहे,तसा राजकिय उन्मादही आहे आणि भगवा उन्माद आहे तसाच निळा उन्मादही आहेच, हे कोणीही अभ्यासू माणूस नकारू शकत नाही.पण नागराज त्यावर चित्रपट बनवणार नाही याची गॅरंटी मी देतो,नाईलाजाने तो मलाच बनवावा लागेल पण तो प्रदर्शित होऊ दिला जाईल कि नाही याची गॅरंटी मी देवू शकत नाही.

In reply to by याॅर्कर

तर्राट जोकर Tue, 05/03/2016 - 23:30
मला तरी कोण्या एका जातीबद्दलच आहे असे वाटले नाही. पार्श्वभूमी बघितली तर पुरुषप्रधान, सरंजामीवृत्ती, स्त्रियांना मालमत्ता ठरवणारी मानसिकता अशी आहे. हॉनर किलिंग हा प्रकार फक्त भारतात होत नाही किंवा भारतातल्या एखाद्याच समाजात होत नाही. जगभरात दर साल सुमारे ५ हजार हत्या होतात. त्यातल्या हजारेक भारतात होतात. प्रत्येक जातीत प्रेमसंबंध, आंतरजातीय लग्न टबू आहेत. तुम्ही चष्मा घालताय हा तुमचा चॉइस आहे. ग्रामिण काय की शहर काय प्रेमप्रकरणे ९० टक्के फेल जातात हो. शहर्/ग्रामिन असा काही भेद नै त्यात. वरचा मी दिलेला सॅम्पलगृपचा निष्कर्ष सर्वमिश्रित आहे. तुम्ही बनवा हो, प्रदर्शित होऊ दिला जाईल / नाही ह्याची चिंता करु नये. नागराज पिस्तुल्या बनवण्याआधी कोण होता हे बघून घ्या. जिगरात आग असेल तर पुचाट कारणं द्यावी लागत नाही. माणुस करुन दाखवतो. बाकी, जातायेता उगाच खोचक टिप्पणी करायला फार काही लागत नाही.

आनंदराव Wed, 05/04/2016 - 00:17
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.

आनंदराव Wed, 05/04/2016 - 00:18
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.

आनंदराव Wed, 05/04/2016 - 00:18
तजो लयच फारमात आलेत. जाऊ द्या. जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं. बाकी आपल्याला सैराट आवडला. गाणी तर लयच ब्येष्ट.

गणेशा Wed, 05/04/2016 - 11:32
सैराट रविवारी पाहिला .. एकदा पाहण्यासारखा नक्कीच .. अभिनय छान .. सांगित लाजवाब .. कथा मात्र जास्त मोठी .. पण रिअल्यास्टीक गोष्टी बरोबर दाखवल्या आहेत.. फक्त सिनेमा म्हनुन काहीही कथेत मिसळवलेले नाही.. वयक्तीक रित्या मला सैराट झाल जी हे गाणे खुप आवडले ..

गामा पैलवान Wed, 05/04/2016 - 12:53
लोकहो, मला चित्रपटांतलं फारकाही कळंत नाही. पण जे दाखवलंय त्याचा लोकांवर परिणाम मात्र खोलवर होतो एव्हढंच माहितीये. सैराटच्या निमित्ताने भाऊ तोरसेकरांचा हा लेख आठवला : http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_5.html सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प. पण जेव्हा कोणी एखाददुसरा वाहवत जातो तेव्हा बळी कोणाचा जातो? माझ्या आजच्या मनोरंजनासाठी भविष्यात संभाव्य बळी गेलेला चालेल का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 13:01
तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या गोष्टी वापरत असल्यामुळे कुणाचाही बळी जात नाही ह्याची खात्री करुन जगत आहात काय? जसे नॉनव्हेज, वेज, कागद, कपडे, इमारती, इमारती बांधतांनाच कित्येक बळी जातात, तुम्हाला भविष्यात राहायला मिलावं म्हणुन आत्ताच कितीतरी लोकांचे बळी जातात, काय करताव त्येंसाठी?

In reply to by गामा पैलवान

खटपट्या Wed, 05/04/2016 - 21:24
सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प.
सहमत पुर्ण चित्रपट पाहुन सर्वांनी मते द्यावीत असे वाटते. मी हा चित्रपट पाहीला. जी मुले हा चित्रपट पहातील त्यांना वास्तवाचे भान येण्याची जास्त शक्यता आहे. प्रेमविवाहानंतरची कुत्तरओढ जबरद्स्त दाखवली आहे. क्रुपया कोणी चित्रपटाचा शेवट विचारुन नागराज मंजूळेचे कष्ट वाया घालवू नयेत. खाली कोणीतरी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपट पाहील्यावरच शेवट परीणामकारक वाटतो. आधीच शेवट माहीत असेल तर मजा नाही. थोडक्यात - पहावाच असा चित्रपट...संस्क्रुतीच्या नावाने बोंबा मारणार्‍यांनी तर पहावाच पहावा...

In reply to by गामा पैलवान

बोका-ए-आझम Sat, 05/07/2016 - 00:42
अपेक्षा नव्हती. रिंकू पाटील हत्याकांड - ४ एप्रिल १९९० बाजीगर प्रदर्शित झाला - ७ आॅगस्ट १९९३ डर प्रदर्शित झाला - २४ डिसेंबर १९९३ अंजाम प्रदर्शित झाला - १७ एप्रिल १९९४ हरेश पटेल जिवंत असताना मैने प्यार किया release झाला होता. त्यातला हीरो स्वतःची कमाई करुन नायिकेच्या वडिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. ते का नाही पाहिलं त्याने? चित्रपटात दाखवली जाते त्याच्या १०० पटीने हिंसाचार आज बातम्यांमध्ये दाखवला जातो, तोही खराखुरा. पण बातम्यांवर कोणी टीकेची झोड उडवलेली पाहिली नाहीये.

In reply to by बोका-ए-आझम

गामा पैलवान Sat, 05/07/2016 - 11:39
बोका-ए-आझम, तपशीलात चूक नाहीये. कृपया हे वाक्य पाहावे : >> पण दोनतीन वर्षांनी शहारुखने तोच हरीश पटेल आपल्या तीन लोकप्रिय चित्रपटातून अप्रतिम रंगवला आणि >> त्याचा भिन्न नावाने रंगवलेला हरीश पटेल लोकांनी डोक्यावर घेतला. त् प्रत्यक्षातला घृणास्पद माणूस सिनेमातून नायकासारखा दाखवला तर लोकप्रिय होतो. चित्रपटाचा समाजावरील परिणाम बराच खोलवर जात असावा. त्यास अनेक आयामही असावेत. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 13:05
बाकी, गा.पै. एखाद्या चित्रपटामुळे भविष्यात केल्या जाणार्‍या दहा प्रतिष्ठा-हत्या टळल्या तरी हेतू सिद्ध होईल असे नाही वाटले? नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले? तेही चित्रपट न बघता सांगोवांगीच्या गोष्टीवरुन?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 05/04/2016 - 19:57
तजो, >> नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले? मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय. रिंकू पाटीलला जाळणाऱ्या हरीश पटेलला नकारात्मक बाजूकडेच का वळावंसं वाटलं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 20:04
अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस जाळून मारावे अशी कोणत्या चित्रपटाने प्रेरणा दिलिय ते सांगाल का? रिंकुपाटील जळीत प्रकरण किंवा अशीच एकतर्फी प्रेमप्रकरणांतून प्रेयसीची हत्या करणे हे पुरुषी मनोवॄत्तीचे निदर्शक आहे की चित्रपटाचे परिणाम ह्यात तुमची गल्लत होत नाही ना?

In reply to by तर्राट जोकर

बबन ताम्बे Wed, 05/04/2016 - 20:22
मला आठवते त्याप्रमाणे या घटनेतील गुन्हेगारांवर हिंदी चित्रपटांचा देखील प्रभाव होता. एक चोरी त्यांनी हिंदी पिक्चर स्टाईलने केली होती असे बहुतेक मुनावर शहाच्या आत्मचरीत्रात वाचल्याचे आठवते.

In reply to by बबन ताम्बे

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 20:39
असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव होण्याची वाट बघतोय एका सदस्यावर... पण ते फक्त नकारात्मक प्रभाव बघतात बहुतेक. =))

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 05/04/2016 - 21:39
तजो, जेव्हा प्रेक्षक एखादी कलाकृती बघतो तेव्हा सकारात्मक की नकारात्मक असा विचार करंत नसतो. जे दिसेल ते स्वीकारतच जातो. त्याचे उचित वा अनुचित परिणाम कालांतराने दृग्गोचर होत जातात. डरसारख्या चित्रपटांमुळे खलनायकी वृत्तीस एक प्रकारची आंतरिक वैधता लाभते. जी बरोबर नाही. सैराट आजून बघितला नाहीये. त्यात उलट संदेश नसेल अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 21:57
तेच ना, स्वदेस किंवा तत्सम उत्तम संदेश, वैधता देणारे चित्रपटांनी घडवलेले परिणाम दृग्गोचर व्हायची वाट बघत आहे.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 05/04/2016 - 23:31
तजो, मीसुद्धा तुमच्यासारखीच वाट बघतोय. पण लोकं नेमकी नको तो संदेश का घेतात ते कळंत नाही. :-( आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 05/04/2016 - 23:41
तजो, दावा बरोबर आहेच. पण त्यामागचा कार्यकारणभाव उलगडत नाहीये. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बोका-ए-आझम गुरुवार, 05/05/2016 - 16:49
जगात कोणीही चित्रपट पाहून बिघडत नाही किंवा सुधरत नाही. तुमच्या म्हणण्याचा एक अर्थ असा होतोय की समाजातले प्रश्न चित्रपटांनी हाताळूच नयेत, कारण लोक त्यावरून वाईट संदेश घेऊन दुष्कृत्य करतील. लोक एवढे बावळट नसतात. कुणी माणूस जर चित्रपट बघून त्यावरुन गुन्हेगार बनायचं ठरवत असेल तर त्याच्यात मूळ गुन्हेगारी वृत्ती असते आणि म्हणूनच त्याने असा अर्थ काढला असं म्हणता येईल. वीरप्पन, ओसामा, रामन राघव, जोशी-अभ्यंकर हत्याकांडातले गुन्हेगार, यांनी जे चित्रपट पाहिले असतील-नसतील, तेच चित्रपट हजारो लोकांनी पाहिले असतील. सगळेच गुन्हेगार झाले की काय? काहीही बोलता राव! अपेक्षा नव्हती खरं सांगायचं तर तुमच्याकडून!

In reply to by गामा पैलवान

सोत्रि गुरुवार, 05/05/2016 - 17:03
है शब्बास! दावा करायचा, तो बरोब्बर असल्याचाही दावा करायचा पण तो सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र जाणकारांची! मज्जाच आहे! :) असो, लगेहात जाणकार कोण कोण आहेत तेही कळेल ;) - (अजाण) सोकाजी

In reply to by तर्राट जोकर

कानडाऊ योगेशु गुरुवार, 05/05/2016 - 16:21
स्वदेश नाही पण जुन्या काळी बहुदा व्ही.शांताराम यांचा सख्खे शेजारी चित्रपटा नंतर हिंदु मुस्लीम दंगे थांबले होते असे ऐकले आहे.

बोका-ए-आझम गुरुवार, 05/05/2016 - 12:23
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. लोक चित्रपटांमधल्या फक्त वाईट गोष्टी उचलतात आणि नंतर पकडले गेले की त्यांच्यावर बिल फाडतात. मनुष्यस्वभाव! उद्या मला कुणी काही बोललं तर मी मिपाचं नाव घ्यावं काब्रे?

गामा पैलवान Sat, 05/07/2016 - 11:47
बोका-ए-आझम,
>> कुणी माणूस जर चित्रपट बघून त्यावरुन गुन्हेगार बनायचं ठरवत असेल तर त्याच्यात मूळ गुन्हेगारी >> वृत्ती असते आणि म्हणूनच त्याने असा अर्थ काढला असं म्हणता येईल.
मीही नेमकं हेच म्हणतोय. चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे. गुन्ह्यांची जबाबदारी चित्रपटांवर ढकलणे हा माझ्या चर्चेचा हेतू नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अंतरा आनंद Sat, 05/07/2016 - 12:38
चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे
अगदी पटतय. मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा. हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला. हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.

In reply to by अंतरा आनंद

बोका-ए-आझम Sun, 05/08/2016 - 03:05
कुंभकर्ण, मेघनाद, शूर्पणखा वगैरे सगळे काढा. उगाचच टेन्शन नको. दादासाहेब फाळके चुकलेच. उगाचच चित्रपटसृष्टीची सुरुवात केली.

पूर्वाविवेक Sat, 05/07/2016 - 12:44
सैराट आवडलाय , गारुड केलंय मनावर पण एके ठिकाणी सैराट च्या निमित्ताने जुन्या आठवणी लिहिल्या आहेत त्या वाचल्या. ती बाजूही पटली. त्यासाठी पुढील लिंक पहा. https://www.facebook.com/priya.prabhudesai.9/posts/1066214120115948

In reply to by पूर्वाविवेक

तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 12:54
चित्रपट न पाहताच केलेले परिक्षण, भन्नाट आहे. ह्या ताइंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते नाही कळले.

In reply to by पूर्वाविवेक

तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 13:26
तुम्हीच लिंक दिलीय ना फेबुवरची. ते समग्र लिखाण म्हणजे चित्रपट न पाहता अंदाजे पंचे आपली मते, आठवणींच्या स्वरुपात मांडली आहेत. आता प्रेमप्रकरणांबद्दल प्रत्येकाला आपली मते असण्याचा अधिकार आहे. ज्याच्या नशिबी जसे आयुष्य येते तसे त्याचे विचार होतात. पण त्याला न पाहिलेल्या चित्रपटाशी जोडून नकारात्मक, हिणवल्यासारखे लिहिणे पटले नाही. हिणवणं हा ही विरोधाचाच एक प्रकार असतो. ट्रेलरमधे ताईंना हिरोईनचे उन्नत उरोज दिसले, जे आम्हाला पुरुष असून आख्खा पिच्चर पाहतांना कधी जाणवले नाही.

In reply to by तर्राट जोकर

पूर्वाविवेक Sat, 05/07/2016 - 14:14
ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई', मी तिला अनेक दिवसापासून फोलो करते. ती जे लिहिते ते मला आवडत, पटत. तिने आजवर अनेक नव्या -जुन्या हिंदी, इग्रजी सिनेमाची परीक्षणे लिहिली आहेत. तिच्यामुळे मी अनेक जुने सिनेमे शोधून शोधून पहिले. हे माझे व्ययक्तिक मत आहे. असो...... आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'सैराट' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का? मलाही सैराट अत्यंत आवडला. प्रोमो पण आवडले, पहिल्याच दिवशी बघितला आम्ही. गाणी अजूनही सतत ऐकत आहे. पण म्हणून या निमित्ताने जर दुसरी बाजू कुणी मांडत असेल तर ती समजवूनही घ्यायची नाही का? इथेही मिपा वर 'सैराट : माझीही एक भर' या लेखावर अंतरा आनंद यांनी लिहिलंय........ 'नक्की बघा. मुलांनाही दाखवा. मुलगी पसंत, सासू हवी, आणि लाडकी सून या मालिकांमधल्या किंवा नुस्त्या पाठांतरावरल्या संस्कारांपेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं सुद्धा.' हे पण पटलं. कारण सैराट हा मला सिनेमा म्हणून खूप आवडला असला तरी मी दोन मुलींची आई पण आहे. माझ्या आई असलेल्या मनाला दुसऱ्या बाजू विचार करायला भाग पडतात. ही काळजी सैराट बघितला आणि मनात अचानक निर्माण झाली असे नाही, ती असतेच कायम. सैराटच्या निमित्ताने लोक लिहू लागलीत. वेगवेगळे पैलू समोर आले. वाचून ज्या गोष्टी पटल्या त्या मान्य करणे म्हणजे गुन्हा आहे कि काय?

In reply to by पूर्वाविवेक

तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 14:34
त्यांनी जे लिहिले तो लिहिण्याचा अधिकार मी कुठे अमान्य केलाय का? त्यावर मीही त्यांचे लेखन 'माझे न आवडल्याचे मत मांडले' तर जो तुम्ही त्यांच्या "न आवडण्याच्या अधिकारा"साठी पवित्रा घेत आहात तोच माझ्यासाठी का नाही? आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'प्रिया प्रभुदेसाई' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का?

In reply to by पूर्वाविवेक

अंतरा आनंद Sat, 05/07/2016 - 17:18
माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे मला म्हणायचे आहे त्याचा चुकीचा अर्थ घेतलात आपण. हा पॅरा मला असा लिहायला आवडेल बेगडी संस्कार शिकवण्यापेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेत किती सुंदर होऊ शकतं हेसुध्दा (आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे आपणही बघावं) . मला वाटतं हे जास्त स्पष्ट आहे.

गामा पैलवान Sat, 05/07/2016 - 20:00
अंतरा आनंद, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
>> मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे >> करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा.
उत्तम कल्पना आहे. फक्त व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची. हाय काय नाय काय! २.
>> हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला.
एकदा का प्रतिभेचा दुष्काळ संपला की अशा अडचणी चुटकीसरशी दूर होतील. चिंता नसावी. ३.
>> हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.
अफगाण मॉडेल? हे कशाशी खातात? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 20:21
अहो, व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची काय गरज आहे, तयारच आहे ना रामायण म्हाभारत? तालिबान्यांसारखे सर्व च्यानेल्वरुन, सर्व थेटरात, सर्व भारतात तेच ८०च्या दशकातल्या रामायण म्हाभारत शिरेली दाखवायच्या

गामा पैलवान Wed, 05/25/2016 - 17:18
लोकहो, आज एक बातमी वाचण्यात आली : बीड जिल्ह्यातून १३ अल्पवयीन आणि अंबड (जिल्हा जालना) येथून १० प्रेमीयुगुल यांचे पलायन ! थोडक्यात काय की, सैराट पिक्चर चांगलं आहे. फक्त पळून जाणाऱ्यांत आपलं मूल नसेल तरंच. आ.न., -गा.पै.