मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फेर..

आनंद कांबीकर · · जनातलं, मनातलं
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची. पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते. शेवटी डाक्टरच म्हणाला, भाइरलं बघा. शेजाच्या साखरा आजिचं तेच म्हाणनं आलं. बुढगांव च्या पीराखाली एक देवलसी बसतो. त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी त्याची महतारी मागं लागली. तिन दिवस झाले पोरिला झोप नव्हती. म्हातारीची कुरकुर वाढली. शेवटी टपरीवाल्यां पप्याकडून पाचशे उधार घेऊन तो मुकाम्या गाडीन् गावातुन निघाला. पोरीचे रडने चालूच होते. पिराला वहायला म्हातारिन् घरातून सात लिम्बं दिली होती ती त्यानं एस टी तुन फेकून दिली आणि सरळ शाहरातला दवाखाना गाठलेला. तिथेच रात झाली, मुकामी गाडी हुकलि म्हणून दुसऱ्या गाडींन याव लागलं. वाट काढत दोघ टेकडीवर आले. तो खड़काळ भाग, गांव चा मसनवटा. पोरगी शांत झोपलेली. अंतरावर मढं जळत होतं, त्याच्या उजेडांत झपझप पाय उचलत दोघेही गांवच्या वेशीतून आंत शिरले.

वाचने 3035 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चांदणे संदीप 23/10/2015 - 06:37
सुंदर लिहिलय. यात सातत्य राखता यायला हवे!

पद्मावति 27/10/2015 - 01:33
सुरेख लिहिलंय. पिर बाबा कडे न जाता मुलीला शहरात दवाखान्यात घेऊन गेले त्यामुळे मुलीचा जीव वाचला. सुखांत असलेली कथा आवडली.