आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.
२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.
आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्हाइकच वाईट.
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.
मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
72621
प्रतिक्रिया
233
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्यारे बुवा
In reply to ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना by प्यारे१
कसं बोललात !!!!
In reply to प्यारे बुवा by सुबोध खरे
अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत
In reply to प्यारे बुवा by सुबोध खरे
आमचे एक नातेवाईक दादरला
In reply to अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत by प्यारे१
:-)
In reply to आमचे एक नातेवाईक दादरला by सुबोध खरे
सोळा आणे!
In reply to ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना by प्यारे१
ह्या ह्या ह्या. हिटलरकडे
In reply to सोळा आणे! by पैसा
तुम्हाला कोण पायजे?
In reply to ह्या ह्या ह्या. हिटलरकडे by प्यारे१
हिटलरकड़े गोबेल असतोच.
In reply to तुम्हाला कोण पायजे? by पैसा
गणपतीची पावती २५,००० ची फाडा
येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी
मेत्कुटला गेलो नाही पण २००
डॉक्टर या की सांच्याला एकदा
In reply to मेत्कुटला गेलो नाही पण २०० by सुबोध खरे
केंव्हा जायचं बोला.
In reply to डॉक्टर या की सांच्याला एकदा by किसन शिंदे
एक ऑक्टोबरला जमेल का?
In reply to केंव्हा जायचं बोला. by सुबोध खरे
कट्टा
In reply to एक ऑक्टोबरला जमेल का? by किसन शिंदे
जमेल की. रात्रि २०.३० नन्तर
In reply to कट्टा by सुनील
फक्त मला हॉटेलच्या बाहेर
In reply to जमेल की. रात्रि २०.३० नन्तर by सुबोध खरे
दुसरा अनुभव
आमचा पण थोडा प्रतिसाद भार....
भयानक
कधी?
In reply to भयानक by प्रणवजोशी
कोण ते धागा वर काढतय?