Skip to main content

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 11/01/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72621
प्रतिक्रिया 233

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

प्यारे बुवा आपण मराठी लोक म्हणजे झैरातीतच मागे पडतो बघा. ते कोथिम्बिरवडी म्हणायचं आणि पस्तीस रुपयाला मोठ्या दोन वड्या द्यायच्या. त्यापेक्षा धनिया कबाब अलोंग विथ मिंट चटनी chutney म्हणायचं, (पुदिना चटणी नव्हे) आणि सहासात लहान पण गोल वळलेल्या कोथिम्बिरवड्याच द्यायच्या पण १२५ रुपये( अधिक कर) म्हणून लावायचे हे आपल्याला केव्हा जमायचं?

In reply to by सुबोध खरे

कसं बोललात !!!! हेच्च्च्च्च इथेच्च्च्च्च मार खातंय राव ते तुमचं मराठी माणूस...

In reply to by सुबोध खरे

अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत होतो महाराज. एकदा नेल्यानंतर कोणी पाय ठेवील काय हाटीलात? बाकी दणक्या जेवतो बरे आम्ही. मराठी पदार्थास नावे ठेवीत नाही हो. फ़क्त घरी सुग्रास भोजन मिळत असता बाहेर काय म्हणून खावे? असा यांचा प्रश्न.

In reply to by प्यारे१

आमचे एक नातेवाईक दादरला प्लाझा समोर मराठी हॉटेल चालवतात. तेथे १४-१५ वर्षपूर्वी गेलो असताना त्याच्या यादीत( मेनू कार्ड) पदार्थ पाहत असताना एक जाणवले कि बटाटा वडा एक प्लेट १० रुपये आणि ब्रेड बटर २० रुपये. मी त्याला विचारले हे काय रे बाबा? त्यावर तो म्हणाला दादरला मराठी माणूस डोंबिवली कल्याण पासून येतो घरी जेवायला जाण्यासाठी एक ते दीड तास लागणार तोवर पोटाची सोय म्हणून एक प्लेट वडा फक्त १० रुपये. मी विचारले मग ब्रेड बटर २० रुपये कसे? त्यावर तो हसत म्हणाला आमच्या मुलाला ब्रेड बटरच लागते म्हणणाऱ्या हुच्चभ्रू लोकांना पैसे देऊ दे कि!

In reply to by प्यारे१

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं.
सोळा आणे सही! प्याकिंग उघडलं की आत खरपूड आहे ते कळतंच! आमच्या फो.भा. ची कल्जी क्रू नये बर्का! तो फो.भा. च असेल. आणि लोक जरूर घेतील २०० रुपये मोजून. आजकालच्या लोकांना फो. भा. आवडत असेल तर खाऊ देत बापडे. नसीब अपना अपना!

In reply to by प्यारे१

हिटलर की गोबेल? आपल्याकडे सगळे आहेत. शिळ्या भाकरीचा कट्टा कधी करताय ते सांगा. फो.भा. आणि पेश्शल खरपुड्या मी स्पॉन्सर करते! =))

एवढे चालत असेल हे हॉटेल तर ह्यावेळेस मेतकुट वाल्याची, गणपतीची पावती २५,००० ची फाडायला काही हरकत नाही!

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर या की सांच्याला एकदा क्लिनिक बंद झाल्यावर.. एक कट्टा करून टाकू..हाकानाका! :) उकडीचे मोदक फार भारी मिळतात इथे..हां पारी थोडी जाड असते, पण तेवढं चालून जातेय.

In reply to by सुबोध खरे

फक्त मला हॉटेलच्या बाहेर आशाळभूतासारखे वाट पाहायला आवडत नाही. लोक उठतात कधी आणि आम्ही बसतो कधी हे मला पटत नाही. ( वैयक्तिक दुर्गुण समजा)

मेतकूट नव्या जागी स्थलांतरीत झाल्यावरही एकदा गेलो होतो. बाहेर लोक इभे पाहिले आणि पदार्थ बांधुन नेले. चविच्या बाबतीत अपेक्षाभंग झाला. वांग्याचे भरीत म्हणजे मिरच्यांचे बारीक तुकडे मुक्तहस्ते पेरलेले शिजवलेले वांगे निघाले. ना दही ना चिंंचगूळ ना चमचमईत उत्तरे कडील मसालेदार बैंगन भरता. कदाचित ही त्यांची स्वतंत्र नवी पाककृती असेल. झुणका सुद्धा अगदीच सुमार होता. अर्थात हा माझा अनुभव. कदाचित लोकांना तेथील पदार्थ आवडत असतील. मेतकूट समोरच्या गल्लीत 'कोल्हापूर' शेजारी मी मराठी' सुरू झाले आहे, मी अजुन गलो नाही. कुणी अनुभवले आहे का?

"मेतकूट"ला जाण्यापेक्षा. आमचे ३८, बँकॉक स्ट्रीट, बरे आहे. आणि साग्रसंगीत हवे असेल तर, "नंदी पॅलेस."

मला सुद्धा असाच वाईट अनुभव आला.