मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली.... या प्रकरणातील काही शीर्षके
  • सुरवात कोठे झाली?
    • मुलींवर दमबाजी
    गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
    • दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
    गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
    • विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
    समितीची पोकळ कारणे
    • अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
    कडेगावचा प्रकार भानामतीचाच
      • गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
      संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

वाचने 35590 वाचनखूण प्रतिक्रिया 63

अरुण मनोहर 17/01/2012 - 07:30
लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख मुळीच पटण्यासारखा नाही. अनिसला बदनाम करण्याचे राजकारण ह्यामगे असावे असे वाटत आहे.

In reply to by अरुण मनोहर

मित्रांनो, भानामती हा नेहमीच विचित्र व अघटित प्रकार म्हणून अंनिसच्या साठी आव्हानाचा भाग आहे. त्यात दरवेळी यांचा यशस्वीपणे पर्दापाश केल्याचा दावा केला जातो. पुर्वीपासून असे दावे केले गेले आहेत त्यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. सत्यशोधनाला आडकाठी नसावी. मात्र ते करताना सत्याऐवजी वैचारिक मते आधी ठरवून त्याला साजेल असे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.म्हणून अगदी नुकत्याच घडलेल्या एका केसची बातमी वाचनात आल्यावर वर मला सुचलेले काही विचार, दै लोकमतला वा.प.मधे लिहिले. त्याची कितपत दखल घेतली जाईल कल्पना नाही. शिवाय, इथे पुर्वी अशाच एका भानामतीच्या घटनांवर चर्चा झाली असल्याने या धाग्याला संपादकीय कात्री लागू नये अशी अपेक्षा. अनेक नवे वाचक आजकाल पाहतो त्यांना पुन्ःप्रत्ययाचा आनद मिळावा व काही विचारांना उजाळा मिळावा म्हणून हे पत्र सादर देत आहे. पेपर मधील बातमी

'भानामती'मागे सावत्र मुलांचा हात!

8.11.2014 लोकमत. 1 प्रयोगानंतर अंनिस टीमने गावकऱ्यांशी बोलून सर्व शंकांचे निरसन केले. विनोद जाधव■ लासूर स्टेशन (औरंगाबाद) घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती 'लोकमत स्टिंग ऑपरेशन'मधून शुक्रवारी उघड झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या सहकार्याने 'लोकमत'ने हे कथित भानामतीचे 'भूत' उतरविले. गंगापूर तालुक्यातील टोकी गाव एका अनामिक भीतीने काही दिवसांपासून हादरून गेले होते. घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा घटना घडत असल्याने कथित भानामतीचे भूत गावकर्यां च्या मानगुटीवर बसले होते. सखाहरी शेजवळ यांच्या घरातील या विचित्र प्रकारांमुळे संपूर्ण गाव दीड महिना त्रस्त होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने ५ नोव्हेंबर रोजी पसिद्ध केले होते. बातमी प्रसिद्ध करून न थांबता 'लोकमत'ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकासह टोकी गावातील शेजवळ यांच्या घरात शुक्रवारी 'स्टिंग ऑपरेशन' करून भानामतीच्या नावाखाली चालणार्याी घटनेचा पर्दाफाश केला. मांत्रिक म्हणून केली एन्ट्री अंनिसच्या टीमने शेजवळ यांच्या घरात मांत्रिक म्हणून एन्ट्री केली. त्यांनी सुरुवातीला घरात कलशावर नारळ ठेवून पूजा मांडली. निर्मला सखाहरी शेजवळ यांना पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी सर्वांना पाणी प्यायला दिले. ग्लासातील शिल्लक पाणी कलशावर ठेवलेल्या नारळावर टाकल्यानंतर नारळाने पेट घेतला. नारळावर सोडियम मेटल टाकलेले होते. (सोडियम मेटल हे नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. ते पाण्याच्या संपर्कात आले, की पेट घेते.) हाताच्या बोटांना सॅक्रिन लावले होते. ती बोटे पाण्यात मिसळल्याने पाणी गोड झाले. हेच पाणी सर्वांना पुन्हा प्यायला दिल्यावर त्यांना ते गोड लागले. अंनिसचा हा प्रयोग सर्वांना पटला. हे पाणी गोड लागल्यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होणार, असेही त्यांना पटवून देण्यात आले. पहिला 'मांत्रिक' प्रयोग यशस्वी झाल्यावर एकाला बोलावून अंनिसच्या टीमने इन कॅमेरा चौकशी केली. यातून त्यांच्या नात्याचे दोर बाहेर पडले. सखाहरी शेजवळ यांच्या पहिल्या पत्नी हयात नाहीत. त्यांचीच ही ११ व १२ वर्षीय दोन मुले आहेत. निर्मला ही या मुलांची सावत्र आई. शेजवळ यांच्या घरात घडणार्याी विचित्र घटनांमागे हेच नाते कारणीभूत असल्याचे या स्टिंगदरम्यान उघड झाले. आपल्या आईला घाबरविण्यासाठी आकाश आणि लखन ही मुलेच हा सर्व प्रकार करीत होती. शहाजी भोसले यांनी या दोन्ही मुलांची वडिलांसमोर चौकशी केली तेव्हा हे सारे उघड झाले. या ऑपरेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अजित खोसरे, सदस्य गीता कोल्हटकर, सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, गणेश लोखंडे हे सहभागी झाले होते. माझे पत्र पर्दा फाश केल्याचा आव... वरील बातमी माझ्या वाचनात आली व त्यातील मजकुरावरून अंनिसचा खोटेपणा लक्षात आला. व अंनिचे काम धूमधडाक्यात चालू आहे असा आभास निर्माण करायला लोकमतने यात प्रमुख भूमिका घेतल्याचे साभिनाम उद्धृत केल्याने काही खुलासे आपल्या वार्ताहराकडून अपेक्षित... 1. अंनिस वाले मांत्रिकांचे सोग घेऊन संबंधितांना गंगापुर तालुक्यातील टोकी खेड्यात घडलेल्या घटनांच्या सत्यतेला जनतेसमोर आणायच्या उद्देशाने ग्रामस्थांना व संबंधितांना भेटले. म्हणजे मांत्रिक बनलेल्या शहाजी भोसल्यांनी सखाहरी व त्यांच्या पत्नी निर्मला शेजवल यांना विश्वासात घेऊन काही नेहमीचेच हातचलाखीचे प्रयोग करून कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. व त्यांचा विश्वास संपादला. मात्र ते करताना त्यानी भानामती म्हणून घडणाऱ्या घटना उदा. विष्ठा पडणे, अचानक कप़डे जळणे आदि घटना कशा होतात किंवा त्यांना प्रत्यक्षात करावे लागले तर काय काय हात चलाखी करावी लागते याचे प्रात्यक्षिक वा स्पष्टीकरण सादर करून दाखवले असे बातमीत म्हटलेले नाही. 2. या प्रकरणात त्यांचीच दोन (सावत्र) मुले सामील असल्याचे त्या मुलांना वेगवेगळे बोलावून त्यांच्यावर मानसिक वा शारीरिक दबाव आणून तसे कबूल करायला लावले की हे कृत्य ते करत आहेत... कदाचित ते त्यांनी लेखीही नोंदवले असेल. पण त्याला प्रत्यक्षात काही महत्व नाही. कारण भानामतीच्या केसेसमधे या वयातील मुले माध्यम म्हणून उपयोगात आणली जातात. असा पुर्वानुभ आहे. 3. भानामतीत घडणाऱ्या घटना ह्या ज्या व्यक्तींच्या अवती भवती घडतात म्हणून साहजिक त्यांच्या वर आळ यावा असे भानामती करणाऱ्या शक्तीचा होरा असतो. ते बदनाम होतात. मार वा अन्य यातना व बोलणी ही खायला लागतात. ( जसे 1988च्या सुमारास कराडपासून जवळच्या कडेगावमधे अचानक काही मुलींच्या डोळ्यातून खडे येणाऱ्या घटनेच्या संदर्भात ती भानामती त्या शाळकरी मुलीं करत असा त्यांच्या वर तसा आळ येत असे.) 4. अशी मुले वा माध्यमे आपली बाजू कितीही समजाऊन सांगू लागली तरी ती प्रत्यक्षातील घटनांमुळे मान्य होण्यासारखी नसल्याने प्रथम दर्शनी तेच या मागचे हात वा आरोपी दिसतात. काही वेळा मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे कृत्य ह्या मुली- मुले करत नाहीत अशी खात्री असल्याने अनेकदा त्या मुलांवर मारहाणीचा वा तेच हे करत आहेत याचा ठपका ठेवला जात नाही. (जसे कडेगावच्या केसमधे मुलींचे पालक अंनिस वाल्यांनी या मुलांना अभ्यास वा घरकाम टाळायचा होता म्हणून त्या अशी युक्ती करत होत्या असे दणकून म्हटले तरी मानायला तयार नव्हते. कारण त्यांना त्यांच्या मुला-मुलींच्या वागणुकीचा प्रत्यय दररोज येत होता. तसे गावकऱ्यांनी अंनिसवाल्यांना प्रत्यक्षात म्हटले व नंतर वर्तमान पत्रातून लेखी निवेदन देऊन सिद्ध केले). 5. अशा लहान वयातील मुलांनी काही कारणाने रागावून जाऊन बदला म्हणून आपल्याच घरातील कपड्यांना आगी लावून आईवडिलांच्या विरुद्ध भीती व आतंकी कृत्ये करून घाबरवायसाठी केले होते असे घटकाभर मानले तर घरातील कपडे कसे पेटवायचे, प्राण्याची वा मानवाची विष्ठा आधीच कशी गोळा ठेवायची व ऐन वेळी एकदम प्रकट करायची आदी कृत्यांची पूर्व तयारी त्यांना किती व कशी करावी लागली असेल याचा कोणालाही अंदाज करता येईल. मुलांना कपडे पेटवायचे असतील तर अंनिसनें केलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे कपडे,साड्या, चादरी वा अन्य कापडी सामान सोडियम मेटल मिसळलेल्या रॉकेलमधे आधी बुचकळून ठेवावे लागेल व ऐन वेळी ते पाण्याटाकून किंवा कपड्यांवर पाणी टाकून अचानक जाळ करावा लागेल. आता अंनिसवाल्यांना ते सोडियम मेंटल बाजारात कुठे मिळते, काय किंमत, जर असे महिनाभर करामती घडवायच्या तर किती किलो आणावे याची खूप माहिती असेल. पण या मुलांना ते नाव, त्याचे गुणधर्म, ते कुठे मिळतात व त्याला लागणारा पैसे कसा मिळवता येईल याचा खटाटोप करावा लागेल. सारासार विचार केला तर अशी तयारी करायला त्या मुलांना टोकी खेड्यातून शहरात येऊन माल खरेदी करून परत जाऊन, कसे कसे घडवले त्याचे प्रात्यक्षिक त्या आरोपी मुलांकडून अंनिसने केले असेलच किंवा निदान अंनिसच्या निष्णात मांत्रिकाने तरी अगदी सहजासहजी करून दाखवून आईवडिलांना व अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर करून वाहवाही मिळवली असेलच. मात्र तसे केल्याचा बातमी उल्लेख का नाही हे गूढ आहे. असे मानू या की समजा त्या शाळकरी व्रात्य मुलांना भानामती करायला सुरसुरी आली तर काय तजवीज करावी लागेल ? अंनिस जसे हातचलाखीचे प्रयोग करताना लागणारे सामान आधी खरेदी करून मग सर्व तयारीने भांडाफोड करायला गावात जाते तसे पण उघडपणे न जाता चोरून किंवा गावकऱ्यांच्या नकळत मागवायला किवा त्यांना परगावी जाऊन खरेदी करायला त्या मुलांना लागेल विष्ठेसाठी पायखान्यातील आडजागी चोरून जाऊन पिशवीतून साठवून ठेवावी लागेल. या सामानातील काही पदार्थांचा उग्र वा घाण वास तो पसरवायच्या आधी अशा रितीने बंद करून ठेवला पाहिजे की त्याची अजिबात कुणकुण वा गंध आला नाही पाहिजे. आता वरील मुलांच्या वयोगटाचा विचार करता अशी धमक त्यांच्यात अचानक कशी निर्माण झाली असेल याचा खुलासा अंनिसवाल्यांनी केला असेल. तो काय होता ते बातमीत प्रकर्षाने नमूद केले जायला हवे ते नेमके वाचायला मिळत नाही. म्हणूनही अशी अघोरी कृत्ये या वयोगटातील मुलांकडून घडतील का असे सामान्यतः विचारांती वाटत नाही. आतंकवादी कारवाया करायला प्रवृत्त विदेशी तरुणांना देखील दहशतीची कृत्ये करायला मोठी यंत्रणा मदत करत असते, नव्हे मागे लागून करवून घेते. असे आपल्याला बातम्यातून वाचायला वा पहायला मिळते. इथे मात्र असा आतंकी प्रकार करायला कोणाची मदत नसताना गुपचुप या शाळकरी मुलांना शक्य कसे व्हावे यावर विचार व्हायला पाहिजे. त्या दोन मुलांनी ती कृत्ये केली असे जाहीर करायच्या शिवाय अशी कोणती यंत्रणा त्यांच्या मागे उभी होती याचा कसून तपास लागेपर्यंत या प्रकरणाचा शेवट झाला असे मानले जाऊ नये. असो. 6. एक जागृत वाचक म्हणून या विषयातील सखोल माहिती व स्पष्टीकरण आपल्या प्रतिष्ठित पेपर मधे मोठ्या मथळ्यात सादर जावे ही विनंती केले.

In reply to by शशिकांत ओक

आनन्दा 14/11/2014 - 10:10
एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे म्हटले की ते सिद्ध करणे सोपे असते. व्यक्तिशः माझी वय ११-१२ च्या काळातली समज पाहता अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ वर्षाची मुलं करतील असे मला वाटत नाही. बाकी या सगळ्यातून त्या मुलांचे उर्वरित आयुष्य अधिक खडतर जाणार याची मात्र खात्री पटली.

In reply to by आनन्दा

प्रकाश घाटपांडे 16/11/2014 - 21:01
अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ वर्षाची मुलं करतील असे मला वाटत नाही.
११-१२ वर्षांची मुल चलाख असू शकतात. केस मधे अन्य बाजूही असू शकते.बातमीत सगळच येईल अस नाही

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 16/11/2014 - 21:30
मित्रा, आपण अंनिस चळवळीला सहानुभूति दर्शवणारे आहात. आपले म्हणणे मला मान्य आहे की 11-12 वर्षांची मुलेच काय त्याहून ही कमी वयाची मुले देखील खोडकर, व्रात्य मुले असतात. त्यांनी ते काम केले आहे असे मानूनच वरील लिखाण केले आहे. जर अशा व्रात्य व खुनशी मुलांना असे भानामती सदृष्य कृत्य करायचे असेल तर काय काय तयारी करावी लागेल याचा अंदाज घेतला तर प्रात्यक्षिक करणाऱ्या महाभागांनी ते कसे केले असेल याची माहिती तेथील गावकऱ्यांना आवर्जून दिली असेल. शिवाय त्यांनी त्या मुलांकडून जिथून जिथून आग लावायला लागणारे साहित्य मिळवले व विष्ठा गोळा करायला जावे लागले त्या त्या ठिकाणी जायला लावून ते कसे घडवण्याचे प्रात्यक्षिक करवून घेतले असेल वगैरे गोष्टी ह्या त्या दुसऱ्या बाजू असव्यात असे वाटते. यावर आपले काय मत आहे ते कळले तर बरे. आपल्या घसटीतील तज्ज्ञ अंनिस मंडळींकडून यावर प्रकाश पाडायला विनंती आपण करावी ही मी आपल्याला विनंती करतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 22/11/2014 - 00:53
मित्रा,
असू शकतात. केस मधे अन्य बाजूही .असू शकतेबातमीत सगळच येईल अस नाही>
जर त्या बातमीतील मजकुरातून घटनेची सत्य माहिती दिली गेली नसेल तर त्या बाबत मी मांडलेल्ल्या मुद्यांवर विचार केला गेला नव्हता किंवा करून ही काही सिद्ध करता येत नाही याची खात्री झाल्याने त्या बाबी झाकून ठेवल्या गेल्या आहेत. दोन्ही तऱ्हेने "असू शकते" असे नुसते पकाकांनी म्हणणे अंनिस साठी गैर नाही काय?

In reply to by शशिकांत ओक

प्रकाश घाटपांडे 22/11/2014 - 18:32
असू शकते म्हणजे खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो ( या ठिकाणी चिकित्सा करु पहाणारा) असे मला म्हणायचे आहे. त्यामुळे अन्य काही शक्यता आहेत का हे तपासणे गैर नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मित्रा, ज्यांनी समाजजीवनातून अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हावे असा वसा घेतला आहे त्यांच्या लेखी आपल्या सुखीजीवनातील आरामाची जिंदगी महत्वाची नसून, खऱ्या अर्थाने समाजमनाला ढवळून काढायला खचता खायचे आनंदाने स्वीकारले आहे. ते करताना भले आपल्या जिवाला बरे वाईट-झाले तरी त्याची तमा ना बाळगता काम करीन असे म्हणणाऱ्यांच्या कडूनच भानामतीच्या सारख्या पॅरा नॉर्मल घटनातील सत्यता शोधली जाईल. म्हणून हातचलाखीचे प्रयोगकरून पुढे मूळ मुद्याला हात त्यांनी घालावा असे मी लोकमतच्या माध्यमातून सुचवले आहे. आजच्या झी न्यूजमधे रात्री ८.३० नंतर तासाभराच्या कार्यक्रमात मेरठ कँट मधील एका सूनसान घरात जाऊन "पॅरा नॉर्मलवर काम करणाऱ्या भारतीय संस्थेने विविध आधुनिक उपकरणांच्या मदतीने त्या वास्तूत काहीतरी अ‍ॅबनॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी असल्याचे म्हटले आहे. हा शोध घ्यायला अमेरिकेतील एका तज्ज्ञाला पाचारण करून त्याने ही ते मान्य केल्याचे म्हटले गेले... एका बाजूला या कार्यक्रमातून भूत वगैरे सब झूठ आहे, तसे काही नसते. वगैरे म्हटले जात होते. ( असे कार्यक्रम आधी ही पाहण्यात आले होते त्यानंतर रॅशनॅलिस्टांनी त्यांच्या पॅरा नॉर्मल कामगिरीला खिल्ली उडवून, नाटके करतात लेकाचे, पॅरा नॉर्मल असे काहींनी नवे खूळ काढले आहे असे हिणवल्याचे वाचले व पाहिले होते आपण काही करायचे नाही व इतरांनी काही केले तर त्याला नाके मुरडायची, असे किती दिवस हे बुद्धिवादी करणार... म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा सल्ला अनेक देतात) पुर्वीपासून अशा अतार्किक घटनांना आपण सुटसुटीत 'भूत' अशी संज्ञा दिली आहे. त्यात कल्पना, सांगोवांगी, गाव गप्पा, अनेकांच्या मनातील भितीचेी विविध रुपे, चित्रकारांनी व सिनेमावाल्यांनी साकार करून आपापल्या परीने त्यात भर घालत भूत कसे असते किंवा असावे असे तर्क वितर्क करून एक असे भीषण रुप ढोबळ मानाने निर्माण झाले असे म्हटले गेले तर ते अधिक तार्किक नाही काय? अतार्किक घटनांना वा भूत ही संज्ञा दिलेल्याला उद्देशून इंडिया पॅरानार्मल सोसायटीचे तज्ज्ञ त्यांच्या वैज्ञानिक भाषेत अनएक्सप्लेन्ड फिऩॉमिनल म्हणजेच सध्याच्या विज्ञानाला न सुटलेले कोडे आहे असे म्हणत होते. ज्याचे सध्याच्या विज्ञानाला ठामपणे उत्तर देता येत नाही. घोस्ट हंटर संस्थेने अमेरिकेत जे काम करतात ते ही अमेरिकेतून आले होते. आपण कदाचित इथल्या अनेकांनी पाहिले असेल. माझ्या उल्लेखात काही त्रुटी आढळल्यास त्या जरूर सुचवाव्यात कारण मी हा कार्यक्रम घरच्या अन्य सदस्यांच्या आवडींचा मान राखून पाहिला होता. आम्हाला सगळे विज्ञान कळले आहे आता माहिती करायसारखे काही उरलेले नाही असा दंभ करून आपण निसर्गाच्या अनेक चमत्कृतींना "असे असू शकत नाही" असे लेबल लाऊन आपली आपण तरफदारी करण्या ऐवजी खरेच काय आहे याचा शोध विनम्रपणे घेत राहावे असे माझ्या आत्तापर्यंतच्या विचारानी वाटते मग ते नाडीभविष्य कथन ही का असेना... माझ्या विचारांवर प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या विज्ञानवादी व सत्यशोधकाच्या वृत्तीचा प्रभाव आहे.सत्य कि तत्व यावर बाजू घ्यायची वेळ आली तर मी सत्याच्या बाजून उभा राहीन. माझ्या तत्वात ते बसत नाही म्हणून मी सत्याला अव्हेरू शकत नाही... असे त्यांचे म्हणणे कोणाही विचारी व्यक्तीला समजण्यासारखे आहे. म्हणून कदाचित बुद्धिवादीलोकांच्या हटवादी भूमिकेला त्यांचा कडाडून विरोध आहे. हे ओघाने आलेच...

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 25/11/2014 - 21:45
अन्य एके ठिकाणी आपण या घोषवाक्याचा अर्थ समजावून दिलेला वाचला.
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टीला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. मलाही वरील विचार मान्य. या धाग्याच्या संदर्भात अरविंद कोल्हटकरांनी सर्व शक्यतांचा विचार करावा यासाठी दार किलकिले करून नाही तर सताड ठेवून पहावे असे सुचवले आहे. वैचारिक किलकिल्या दरवाज्याने सर्व बाजूंचा विचार कारयला आडकाठी होऊ नये म्हणून तशी विनम्र विनंती होती. त्यात तरी प्रत्यावाद नसावा.

गवि 17/01/2012 - 07:51
एक तर 1988 ची घटना आहे ही ..म्हणजे तेवीस वर्षं होऊन गेली. त्यात अंनिसवाले समजा चूक आहेत. पण तुम्हालाही ही "भानामती"च आहे असं वाटतं..? धन्य..

पुण्याचे वटवाघूळ 17/01/2012 - 08:05
गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते.
डोळ्यातून नक्की काय निघत असल्याचे? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

धन्या 17/01/2012 - 10:32
त्या लेखात वर्णन केलेला मंतरलेला आणि तांबडया फडक्यात बांधलेला नारळ कुठे मिळतो? आणि काका अजून एक समस्या आहे माझी. कदाचित तुम्ही सोडवू शकाल असे वाटते. माझा लेनोवो कंपनीचा आयडीयापॅड ४५० हा मेक असलेला लॅपटॉप पंधरा वीस मिनिटे वापरल्यानंतर खुप गरम होतो आणि लगेच बंद पडतो. कुणालातरी माझा तो नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप पाहवला न गेल्याने माझ्या लॅपटॉपवर भानामती केली आहे असे मला राहून राहून वाटतंय. (मागच्या जंबो कट्टयाच्या एक दिवशी आम्ही लोहगड ट्रेकला गेलो तेव्हा आधीच्या रात्री किसन शिंदे आणि वपाडाव पर्भणीकर माझ्याकडे रात्री वस्तीला होते तेव्हा त्यांना मी लॅपटॉप पाहायला दिला होता. मला तर त्या दोघांचीच शंका येत आहे. ) तुमच्या ओळखीत कुणी ईलेक्ट्रॉनिक वस्तूंवर केलेली भानामती उतरणारा/काढून टाकणारा आहे का?

In reply to by इरसाल

धन्या 17/01/2012 - 12:36
नारिंगी म्हणजे ते डंब एंड डंबरचं जिम क्यारी का काय ते बगा दिसू ऱ्हायला.
इरसाल साहेब. झेपलं नाही हो. आम्हाला इंग्रजी चित्रपट झेपत नाहीतआम्ही त्यामुळे सहसा पाहतही नाही. आम्ही फक्त अमेरिकन बर्गर* खाल्लेत. जंक फुड** असल्यामुळे ते चव न कळताही आवडले ;) * आणि ** हे तुम्हाला कळेलच. न कळल्यास वव्यनि करा.

In reply to by धन्या

अरुण मनोहर 17/01/2012 - 11:20
नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप >>> नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप असेल. अशी दुसर्‍याला पहायला दिल्यावर आणखी काय अपेक्षित असणार?

In reply to by अरुण मनोहर

नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप असेल. अशी दुसर्‍याला पहायला दिल्यावर आणखी काय अपेक्षित असणार?
दुसर्‍याला पाहायला देता येतील अशा गोष्टी मी एक्स्टर्नल हार्ड डीस्क मध्ये ठेवतो. हार्ड डीस्क कुणाला दयायची आणि कुणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. ;)

In reply to by धन्या

प्रचेतस 17/01/2012 - 11:28
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं नेमकं काय दाखवलंस रे त्या दोघांना की अशी भानामती झाली मग. हेम्याचंच भूत कुठून तरी आत शिरलं असावं असं राहून राहून वाटतय, नाही का हो ५० राव?

In reply to by प्रचेतस

धन्या 17/01/2012 - 11:50
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं नेमकं काय दाखवलंस रे त्या दोघांना की अशी भानामती झाली मग.
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं मी नेमकं काय दाखवलं यापेक्षा त्यांनी त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमध्ये काय पाहीलं हे तू किस्नालाच विचार. ;) उगाच माझ्यावर दोषारोप व्हायला नकोत की पूर्वग्रहदुषित नजरेने मला जे हवं ते मी किस्नाला दमबाजी करुन वदवून घेतलं. :)

In reply to by धन्या

शशिकांत ओक 17/01/2012 - 12:00
धनाजी राव
भानामती उतरणारा/काढून टाकणारा आहे का?
इच्छा तेथे मार्ग .... या चालीवर... गळतगे म्हणतात तशी भानामती असेल तर नजर लागते असे मानावे लागेल तर मग नजर लागली की दृष्ट काढतात. मिठ-मोहोऱ्या घेऊन पहा काही फरक पडतोय का ते...

In reply to by शशिकांत ओक

धन्या 17/01/2012 - 12:14
गळतगे म्हणतात तशी भानामती असेल तर नजर लागते असे मानावे लागेल तर मग नजर लागली की दृष्ट काढतात. ____________/\_______________ काका धन्य आहात तुम्ही. तुम्हीच इथे त्या लेखाची जाहीरात करताय आणि तुम्हीच नेस्टेड इफ एल्स सारखं बोलताय. हे म्हणजे "मी नाही त्यातली आणि लो वेस्ट घातली" असा प्रकार आहे. :)

In reply to by धन्या

गवि 17/01/2012 - 12:25
हेच म्हणणार होतो. नाडीवर श्रद्धा असणं मतभेद असूनही समजून गेलं. तो अभ्यासविषय असेलही म्हणून. ..नंतर बाबा, गुरु, हेही समजलं. व्यक्तिगत गुरु कोणी असू शकतील असं समजून. .. आता भानामती.. आता मात्र मला असं नक्की वाटायला लागलंय की जेन्युईन मतापेक्षा किंवा ठोस मुद्द्यापेक्षा केवळ सेन्सेशनल आणि खमंग चर्चेसाठी काका विषय काढत आहेत. म्हणजे एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना अंधश्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि सपोर्ट करायचा असा उपक्रम वाटतो. आता नारायण नागबळी, मूठकरणी, वशीकरण.. आने दो..

In reply to by गवि

मूकवाचक 17/01/2012 - 12:36
म्हणजे एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना अंधश्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि सपोर्ट करायचा असा उपक्रम वाटतो. - हे उपक्रम या विचारप्रणालिचे 'व्यवच्छेदक लक्षण' की काय म्हणतात ते असावे. एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच. असो.

In reply to by मूकवाचक

एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच. असो.
यू सेड इट सर. :) दोन्ही विचारधारांची माणसे एकदम टोकाला जाऊन बोलतात. एकमेकांचे म्हणणे खोडून काढायचं एव्हढाच त्यांचा उद्देश असतो. कुठेतरी समतो साधला जावा असे कुणालाच वाटत नाही. अर्थात हे आमचं मत श्रद्धेच्या संदर्भात आहे. भानामतीसारख्या अंधश्रद्धेबद्दल नाही. :)

In reply to by धन्या

एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच.
चोक्कस..

In reply to by गवि

पक्या 17/01/2012 - 12:45
गवि, मला वाटतं की हे सर्व अंधश्रध्दा आहे हे सिध्द करण्यासाठी अनिसवाले योग्य त्या शास्त्रीय कसोट्या न वापरता बळजबरीचा वापर करतात हे सांगण्याचा लेखकाचा उद्देश आहे .

In reply to by पक्या

गवि 17/01/2012 - 12:49
ते पटलं हो.. अंनिसचं चुकत असेल हे मान्यच केलंय पहिल्याच प्रतिसादात. अंनिसची काहीही लागेबांधे नसल्याने हे मान्य करायला काहीच अडचण नाही. पण त्यासाठी आणि त्यासोबत "ही भानामतीच आहे" असं स्पष्ट मत व्यक्त करणार्‍या त्या जुन्या लेखाची पाठराखणही होतेय ना.

In reply to by गवि

पक्या 17/01/2012 - 13:09
तस काही वाटत नाहिये. ती भानामती आहे अस सिध्द झालय असं लेखकाने म्हटलेले दिसत नाहीये असं वाटतय. किंवा मी लेख घाईत वाचल्याने मला तसं वाटलं की काय माहित नाही.

In reply to by धन्या

मालोजीराव 18/01/2012 - 19:03
होय होय होय....बरोबर आहे...भानामतीसाठी लागणारं लिंबू किसन कडे नव्हत त्यामुळे त्यानी ते "बनियान ट्री" मधून घेतलेला मी पाहिलंय !!!

In reply to by इरसाल

शशिकांत ओक 17/01/2012 - 12:33
मित्र हो, प्राचार्य गळतगे सरांनी, कडेगावच्या प्रकरणात उल्लेख केल्याशी जुळणारा 'वाकिया' पाकिस्तानातही घडलेला असल्याचे 'मिसळपाव' मुळे कळले. इरसाल, आपण मुलीच्या डोळ्यातून खडे निघायची घटना व निघालेले खडे वगैरे दाखवणारी घटना पाकिस्तानातील त्याची व्हीडिओ फिल्मची लिक देऊन कळवली आहेत. धन्यवाद. त्यातील निवेदक म्हणतो की स्थानिक लोक हा प्रकार जिंन्न किंवा भूत करत आहे असे मानतायत असे म्हटले जात आहे. पण तेथील अंनिस चे काय म्हणणे आहे ते मात्र कळलेले नाही. भानामतीवर विश्वास ठेवायचा का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण खरी कसोटी मिळणारे पुरावे तपासणे गरजेचे आहे. त्यातून पळवाट काढता कामा नये असे गळतगे म्हणत असावेत.

कॉमन मॅन 17/01/2012 - 11:57
अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या अशा भंपक धाग्यांना येथे प्रकाशित करू नये अशी मिसळपाव व्यवस्थापनाला कळकळीची विनंती..

In reply to by कॉमन मॅन

सहमत .. शास्त्राला सगळं काही उमजले नसले आणि अनिस या संस्थेची कार्याची पद्धती कधी कधी चुकीची किंवा एकांगी वाटत असली तरी ,,माझ्या पृथ्वीवर त्यांचे योग्य कार्य हे स्वागतार्हच आहे ( या आधी काही प्रतिक्रियांतून मी त्यांवर टीका केली आहे, त्यांचं बद्दल आदर कमी झाला आहे ते आहेच .. त्यात बदल नाही परंतु ) निर्सगाने, किंवा देव मानीत असाल तर देवाने अप्लाय मनुष्यप्राण्याचाच जन्म दिला आहे बुद्धी दिली आहे , विचार करून चांगले आयुष्य जगावे उगाच या गोष्टींचा मागे लागू नये असे प्रामाणिक मत आहे , जरी वयक्तिक स्वातंत्र्य हे महत्वाचे असले तरी जरत या गोंष्टींमुळे समाजाचे नुकसान होत असेल तर त्याला विरोध मात्र केलंआ पाहिजे उदा भोंदू बाबा आणि अतिशय हुशार "टॉप लेवल" गुरु गिरी करणारे जेट सेट गुरु सुद्धा
कोणी केला.......???? Posted by Wg Cdr Shashikant Oak at 16:58 Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook Labels: अंनिस, करणी, दाभोळकर, नारळीकर, नि.र. वऱ्हाडपांडे, भानामती, वि.स. पागे .. हे त्या ब्लॉग वरून घेतले आहे... मला वाटतं इतकं पुरेसं आहे....

रामपुरी 17/01/2012 - 23:22
ब्लॉगच्या हिटस वाढविण्याची हि युक्ती जुनी झाली भानामतीवाले... काही दुसरी कल्पना लढवा बाकरवडीवाल्यांनंतर आता गळतग्यांचा नंबर लागला वाटतं? पुढचा नंबर ( आणि ब्लॉग) कोणाचा काढणार??? (अर्थातच लेख वाचला नाही. फालतू असणार याची खात्री आहेच)

In reply to by रामपुरी

मित्र हो,
बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा

In reply to by शशिकांत ओक

धन्या 18/01/2012 - 08:49
बाकीच्यांचं सोड हो काका. तुमचं बोला. उगाच दोन दगडांवर पाय ठेऊन मजा बघू नका. :) जमलं तर इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया.

अत्रुप्त आत्मा 18/01/2012 - 09:39
ओक-काय हो ही प्रकरण मांडण्याची पद्धत तुमची... ? लोकांचा गोंधळ उडवुन द्यायचा हा एक डाव आहे. अं.नि.स.च्या काम करण्याच्या पद्धतीतल्या चुका प्रबोधनवादी विचार मानणारे अनेकजण दाखवून देत असतात...(मी ही दाखवू शकतो..)पण आपण ज्या पद्धतीने अंनि.स.वर इथे परस्पर चिखलफेक करण्याचा प्रकार करत आहात,,,हे पाहिल्यावर तुमच्या विषयी किवही कराविशी वाटत नाही,,,ठिक आहे,तुमच्या संपूर्ण प्रकरणाचा इत्यर्थ...अंनि.स. ही समाजाची दिशाभूल करणारी संघटना आहे,असा मी या प्रकरणापुर्ता घेतो.(का यालाही तुमची हरकत आहे..?) पण यामुळे मला भानामतीच्या नावाखाली चालणारा गाढवपणा/मूर्खपणा नैसर्गिक आहे,असं कधिही मानता येणार नाही.(तो तसा तुंम्ही स्वतः मानता काय..? हेही सांगा कधितरी..!) तुंम्हा धर्मवादाचा/परंपरावादाचा/मानवी मनाच्या श्रद्धा या सवयीचा--- चलाख उपयोग करुन घेणार्‍या सर्व लबाडांना-माझ्यासारखा माणुस अनेकदा अं.नि.स.च्या जाहिर आव्हानांचा तितक्याच जाहिरपणे स्विकार करा आणी हरवा त्यांना...असं प्रतिआव्हान देत असतो... संपादित. कृपया इतर सदस्यांवर व्यक्तिगत टिपण्या करू नयेत. संपादक मंडळ.

In reply to by किसन शिंदे

अत्रुप्त आत्मा 18/01/2012 - 11:27
@भटजीबुवा तुमची अ‍ॅक्टिवा फुल्ल स्पीडने पळतेय कि ओ... :- >>> कारण तिच्यात भारत-पेट्रोलियमचे पेट्रोल भरलेले आहे ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा 18/01/2012 - 21:56
@संपादित. कृपया इतर सदस्यांवर व्यक्तिगत टिपण्या करू नयेत. संपादक मंडळ. भावनेच्या भरात काही वावगं लिहुन गेलेलो आहे,,, हे जाणवल्यामुळे क्षमस्व :-(
मित्र हो, आपले विचार मला समजले. भानामती व अन्य काही प्रकरणातील कथने पुढील पोस्टमधे वाचकांच्या माथी मारायचा माझा डाव आहे, असे नाही. मला गळतग्यांच्या प्रखर विज्ञानवादी विचारसरणीचा आदर आहे. त्याच्या निर्भीड लेखनातून वाद निर्माण होणार हे अपेक्षित आहे. म्हणून मी त्यांची असे लेखन करायच्या मागची भूमिका काय हे सादर करत आहे. अं नि व्हायला हवे यात दुमत असाचये कारण नाही असे मी व प्रा. गळतगे मानतो. तेंव्हा दाभोलकर आणि अन्य अंनिवादीचे कार्य चांगले किंवा वाईट आहे असे तागडीत तोलायला मी लेखन सादर केलेले नाही. खेडूत यांनी मांडलेले विचार - त्याचे खंडन वा मंडन करायची माझी भुमिका नाही. कारण माझा त्या करिताचा भानामतीचा वा अन्य प्रकरणातील घटनांचा अभ्यास नाही. म्हणून त्याच्या प्रश्नांना मी बगल देत आहे असेही नव्हे. प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा मिपाशी थेट संपर्क होत नाही. त्यांना कॉम्युटरवरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.

शशिकांत ओक 21/01/2012 - 00:33
यात नविन ते काय?
मित्र हो, कडेगावच्या शाळकरी मुलींच्या डोळ्यातून खडे येऊ लागल्याची भानामतीची केस विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या पुस्तकात प्रकरण एक वर दिलेली आहे. त्यासंबंधी गळतग्यांच्या ब्लॉगवरील विचार मिसळपाव सादर झाल्यावर शेकड्याने प्रतिक्रिया आल्या. गळतग्यांचे पुस्तक एकदम डोळ्यासमोर आले. त्यातील ते प्रकरण जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक सदस्यांनी धुंडाळून वाचले. असे ब्लॉगच्या व्हिजिट्समधून निदर्शनास आले. त्यावर ‘कडेगावची भानामती दुसरी बाजू’ असा धागा उघडला गेला व त्यात ‘खेडूत’ यांनी ते त्याच गावातील रहिवासी असल्याचे नमूद करून अंनिसच्या कारवाईचे समर्थन करणारे विचार सादर केले. त्यानंतर ‘अतृप्त आत्मा’ने डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांच्या पुस्तकातील याच प्रकरणात काय म्हटले आहे ते सादर केले. त्यामुळे अनेकांना ती बाजू कळली. आणि आता ओक या धाग्याला कसे उत्तर देणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. नेहमी प्रमाणे ते पळ काढणार असा संकेतही दिला. त्याला अनुलक्षुन सोबतचे लिखाण सादर करत आहे. अतृप्त आत्म्या यांनी कष्टपुर्वक लेखन कार्य करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकातील मजकूर सादर करून दुसरी बाजू मांडली. त्याबद्दल त्यांचे आभार. असे दिसते की श्री. गळतग्यांच्या पुस्तकातील प्रकरणातून ते डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या म्हणण्याला आक्षेप घेतलेला वाटत नाहीत. कारण गळतगेही तेच म्हणताना दिसतात. 'प्रत्येक मुलीशी एकटी करून तिच्याशी अंनिसचे लोक लाडीगोडीने वा धाक दाखवून त्या सर्व मुलींच्याकडून त्या घटनेला आम्हीच जबाबदार होतो कारण घरच्या कष्टाच्या कामांना आम्हाला जुंपले जाई. तो जाच नको म्हणून ही शक्कल आम्ही काढली होती. असे वदवून घेतले होते.' प्रश्न होता तो गळतग्यांनी या कथनाच्यापुढे जाऊन कडेगावच्या ग्रामस्थांनी दै. पुढारीतील दि 23 मार्चच्या अंकात वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्र. ज्याचे शीर्षकच “वस्तुस्थिती नेमकी काय?” असे आहे ते सादर केले.आणि ज्या पत्राला गुलाबराव देशमुख, डॉ. अशोक काळे, दत्तात्रय कुलकर्णी (मुख्याध्यापक – मुलींची शाळा, कडेगाव.) आदि तेथील जेष्ठ ग्रामस्थांनी दि. 16मार्चच्या दै. पुढारी पेपरमधे अंनिसने प्रसिद्ध केलेल्या प्रचाराच्या मजकुराला उद्देशून लिहिले गेलेल्या खुलाशा बाबत, त्या पत्रात जे वस्तूस्थिती काय म्हणून जे म्हटले आहे,की ‘अंनिस व विज्ञान प्रबोधिनीने लोक आले आणि त्यांनी बळजबरीने मुलींच्याकडून लिहून घेतले, फोटो काढले, मात्र मुली जर डोळ्यात आपणहून खडे घालत असतील तर त्यांच्याप्रमाणे समितीच्या लोकांनी त्यांच्या (आपल्या) डोळ्यात असेच खडे घालून (व मग ते काढून) दाखवण्याचा प्रयोग गावकऱ्यांसमोर का केला नाही?, ग्रामसभेत मुलींनी खडे डोळ्यात घालून ते काढून दाखवण्याचा प्रकार झाला नाही आणि अद्यापि डोळ्यातून खडे यायचे बंद झालेले नाही”. ग्रामसभेत तेथील जिल्हा परिषदचे सदस्य श्री. डांगे यांच्या मुलीच्याही डोळ्यातून खडे येत होते. गावाची अब्रू जाईल असा विचार करणाऱ्या सूज्ञ मंडळींनी त्यांची व इतरांची समजूत घातल्याने त्यांनी आपला राग आवरला व सभा कशीबशी संपली. आदि. जे लेखन प्रस्तूत केले आहे त्याचा. ते छापून आलेले पत्र काही गळतग्यांनी लिहिलेले नव्हते. आता प्रश्न आहे तो अंनिसच्या या मान्यवरांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवली काय त्याचा. काय विचाराने त्यांनी त्या प्रकाशित पत्रावर काही भाष्य केले किंवा नाही. नसेल तर का नाही? कारण डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्या प्रकरणाच्या नंतर काही काळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांना उद्देशून केलेल्या सार्वजनिक पत्रातील त्या विधानांवर अंनिसतर्फे खुलासा करायची जबाबदारी त्यांच्यावर येते. ती त्यांनी पार पाडली का किंवा नाही हे महत्वाचे आहे. विशेषतः दै. पुढारीतील स्थानिक घटनेवर ताबडतोब छापलेल्या गेलेल्या प्रतिक्रियेच्या लेखनावर ‘आम्हाला ते लिखाण माहित नव्हते’ असे त्यांना म्हणता येणार नाही असे वाटते. असो, खेडूत म्हणतात की ते त्या गावचे रहिवासी आहे आणि प्रत्यक्ष नसेल पण त्यानंतर गावात काय बोलले गेले याचे ते साक्षी आहे. त्यांनी आपले त्यावेळचे मत नोंदवले. छान आहे. पण त्याच गावात वा पेठेत ते राहात होते म्हणून त्यांचे मत ग्राह्य व्हावे असे नाही. अगदी आत्तासुद्धा त्याच शहरात, गावात राहून देखील एखादी घटना पेपरमधून कळली तेंव्हा माहिती झाली असे अनेकवेळा होते. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले याची नोंद होतेच असे नाही. हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. याचा अर्थ मला खेडूत ना खोट्यात पाडायचे नाही. पण सामान्यतः पेपर मधील लेखन अंनिस पुरक केलेले असते. त्यामुळे ते सत्यच असणार असा ग्रह होतो. गळतगे यांचा रोख अशा छापील कथनामागील सत्यता काय आहे हे शोधायचा आहे. म्हणून अंनिसच्या लेखनात छापील सत्य व घडलेले सत्य असा फरक पडणार. त्यामुळे गळतगे यांच्यासारखे कोणीही सत्याग्रही राहूनही केलेल्या त्यांच्या लेखनावर प्रत्येकदा प्रश्न चिन्ह ठोकले जाणार हे गृहित आहे. तरीही त्यांनी त्यांना अनुभवायला आलेले जे सत्य आहे ते मांडण्याचे साहस प्रत्येक प्रकरणात केले आहे. ते पुढील प्रकरणातील नोंदीवरून लक्षात येईल. अंनिसचे विचार ऐकून ऐकून ज्यांची मते टोकाची झाली आहेत त्यांना असे विरोधी लिखाण आले की प्रतिक्रिया रागावलेल्या येणार हे ओघाने येते. आता यापुढील विविध प्रकरणात देखील असेच दिसेल की त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही विरोधी प्रतिसादांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही प्रतिउत्तर त्यांच्या पुस्तकात नमूद आहेत किंवा नाहीत. नाही तर अंनिसला सोईचे तेवढे सादर करून त्याला सत्यकथन म्हणायचे असे होणार नाही काय? मिपावरील काहीं प्रतिसादातून भानामतीत सांगितल्या जाणाऱ्या विचित्र व बीभत्स घटना घडलेल्याच नसतात किंवा घडत नाहीत असे मत नोंदवले गेले आहे. त्या खऱ्याच असतात किंवा नाही यावर अंनिसचे काय मत आहे? उदा. या प्रकरणातील कोवळ्या मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते, का येत नसताना ही ते येत आहेत असे खोटेच सांगितले जात होते याची शहानिशा करावी. सध्या इतकेच.

शशिकांत ओक 16/02/2012 - 02:46
मित्र हो, एके ठिकाणी एक मित्र म्हणतात,
डोळ्यातून खडे बाहेर येणे हा १०१ टक्के हातचलाखीचाच प्रकार असणार. यात भानामती, जादूटोणा, देवीचा कोप इ. चा काहीही संबंध नाही.
मित्रा, आपले मत की "हा प्रकार हातचलाखीचाच असणार" तर्काने निर्माण केलेले आहे. गावकऱयांनी दै. पुढारीला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की जर त्या शाळकरी मुली(एक नव्हे दहा) असे हातचलाखीचे प्रकार लीलया करत होत्या तर अशा या प्रकरणातील भांडाफोडमधे पारंगत असलेल्या अंनिसवाल्या लोकांनी त्याच्याप्रमाणे तशीच हातचलाखी करून डोळ्यात खडे घालून व नंतर ते काढून दाखवावेत. त्यांनी तसे प्रयोग करून दाखवले नाहीत. ही गावकऱ्यांची प्रमुख तक्रार होती. या विधानावर विचार करावा.

प्रसाद गोडबोले 28/11/2014 - 14:57
भानामती आणि इतर काळ्याजादु कशा कराव्यात ह्यावर स्खोल आणि शास्त्रीय माही देणारे पुस्तक कोठे मिळेल ? अभिनव गुप्त ह्याचे एक पुस्तक प्रसिध्द आहे पण ते नेटवर उपलब्द नाहीये . कोठे मिळेल ? बाकी आपल्याला काळी जादु येते हे लोकांना कसे पटवुन द्यायचे ? म्हणजे मला चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत , लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

शशिकांत ओक 06/10/2019 - 12:32
भानामती आणि इतर काळ्याजादु कशा कराव्यात ह्यावर स्खोल आणि शास्त्रीय माही देणारे पुस्तक कोठे मिळेल ? अभिनव गुप्त ह्याचे एक पुस्तक प्रसिध्द आहे पण ते नेटवर उपलब्द नाहीये . कोठे मिळेल ? बाकी आपल्याला काळी जादु येते हे लोकांना कसे पटवुन द्यायचे ? म्हणजे मला चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत , लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का ;)

लोक म्हणतील ओकांनी पुन्हा काय म्हणून हे लफडे उकरून काढलयं? आश्चर्य असे की मी हा धागा विसरून गेलो होतो. दिवाळी अंकासाठी रसग्रहणात्मक काही सादर करावे म्हणून कॉम्प उघडला व मिपा उघडले ते नेमके हा धागा उपटला... कोणा मार्कस ऑलेरियस यांची विचारणा दिसली आता हे महाशय मिपावर सक्रीय आहेत कि नाही माहित नाही... पण त्यांच्या विचारणेचे कौतुक वाटले... लोकांना कन्व्हिंस कसे करावे हा पेच त्यांना पडला आहे... अहो सोप्प आहे... ज्यांनी ज्यांनी या धाग्यावर नकारात्मक विचार करून मत प्रदर्शन केले आहे त्यांच्यावर प्रयोग करून मग त्यांना कसा 'अनुभव' आला याची माहिती सादर करायला भाग पाडायचे काम काळ्याविद्येला सांगावे... म्हणजे तुम्हालाही सराव घडेल व इथल्या लोकांना त्याची प्रचिती आल्याचे समाधान वाटेल...

शशिकांत ओक 06/12/2014 - 01:06
मित्रा, लेखकाचे नावच जर गुप्त तर ते पुस्तक ही असेत पटकन न सापडणारे असावे...
चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत, लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का
लोकांना समजावण्याचे प्रयत्न अंनिसचे प्रवीण कार्यकर्ते विविध हातचलाखी विद्येचे प्रयोग करून करून इतकी वर्षे तेच करून राहिलेत की पण ज्यांच्यावर तशी जीव घेणी वेळ येते ते कोणी मानायला तयार होत नाहीत...
भानामती हा प्रकार भारताखेरीज अन्य देशांमधे आढळतो का ? असल्यास त्याला काय काय नावे आहेत वगैरे विशद करावे. भानामति आणि 'चेटूक' हे एकच का? की वेगळाले ?