कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---
- सुरवात कोठे झाली?
- मुलींवर दमबाजी
- दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
- विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
- अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
- गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
In reply to लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख by अरुण मनोहर
In reply to लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख by अरुण मनोहर
'भानामती'मागे सावत्र मुलांचा हात!
8.11.2014 लोकमत.
प्रयोगानंतर अंनिस टीमने गावकऱ्यांशी बोलून सर्व शंकांचे निरसन केले. विनोद जाधव■ लासूर स्टेशन (औरंगाबाद)
घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती 'लोकमत स्टिंग ऑपरेशन'मधून शुक्रवारी उघड झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या सहकार्याने 'लोकमत'ने हे कथित भानामतीचे 'भूत' उतरविले.
गंगापूर तालुक्यातील टोकी गाव एका अनामिक भीतीने काही दिवसांपासून हादरून गेले होते. घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा घटना घडत असल्याने कथित भानामतीचे भूत गावकर्यां च्या मानगुटीवर बसले होते. सखाहरी शेजवळ यांच्या घरातील या विचित्र प्रकारांमुळे संपूर्ण गाव दीड महिना त्रस्त होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने ५ नोव्हेंबर रोजी पसिद्ध केले होते. बातमी प्रसिद्ध करून न थांबता 'लोकमत'ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकासह टोकी गावातील शेजवळ यांच्या घरात शुक्रवारी 'स्टिंग ऑपरेशन' करून भानामतीच्या नावाखाली चालणार्याी घटनेचा पर्दाफाश केला.
मांत्रिक म्हणून केली एन्ट्री
अंनिसच्या टीमने शेजवळ यांच्या घरात मांत्रिक म्हणून एन्ट्री केली. त्यांनी सुरुवातीला घरात कलशावर नारळ ठेवून पूजा मांडली. निर्मला सखाहरी शेजवळ यांना पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी सर्वांना पाणी प्यायला दिले. ग्लासातील शिल्लक पाणी कलशावर ठेवलेल्या नारळावर टाकल्यानंतर नारळाने पेट घेतला. नारळावर सोडियम मेटल टाकलेले होते. (सोडियम मेटल हे नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. ते पाण्याच्या संपर्कात आले, की पेट घेते.) हाताच्या बोटांना सॅक्रिन लावले होते. ती बोटे पाण्यात मिसळल्याने पाणी गोड झाले. हेच पाणी सर्वांना पुन्हा प्यायला दिल्यावर त्यांना ते गोड लागले. अंनिसचा हा प्रयोग सर्वांना पटला. हे पाणी गोड लागल्यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होणार, असेही त्यांना पटवून देण्यात आले.
पहिला 'मांत्रिक' प्रयोग यशस्वी झाल्यावर एकाला बोलावून अंनिसच्या टीमने इन कॅमेरा चौकशी केली. यातून त्यांच्या नात्याचे दोर बाहेर पडले. सखाहरी शेजवळ यांच्या पहिल्या पत्नी हयात नाहीत. त्यांचीच ही ११ व १२ वर्षीय दोन मुले आहेत. निर्मला ही या मुलांची सावत्र आई. शेजवळ यांच्या घरात घडणार्याी विचित्र घटनांमागे हेच नाते कारणीभूत असल्याचे या स्टिंगदरम्यान उघड झाले. आपल्या आईला घाबरविण्यासाठी आकाश आणि लखन ही मुलेच हा सर्व प्रकार करीत होती. शहाजी भोसले यांनी या दोन्ही मुलांची वडिलांसमोर चौकशी केली तेव्हा हे सारे उघड झाले. या ऑपरेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अजित खोसरे, सदस्य गीता कोल्हटकर, सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, गणेश लोखंडे हे सहभागी झाले होते.
माझे पत्र
पर्दा फाश केल्याचा आव...
वरील बातमी माझ्या वाचनात आली व त्यातील मजकुरावरून अंनिसचा खोटेपणा लक्षात आला. व अंनिचे काम धूमधडाक्यात चालू आहे असा आभास निर्माण करायला लोकमतने यात प्रमुख भूमिका घेतल्याचे साभिनाम उद्धृत केल्याने काही खुलासे आपल्या वार्ताहराकडून अपेक्षित...
1. अंनिस वाले मांत्रिकांचे सोग घेऊन संबंधितांना गंगापुर तालुक्यातील टोकी खेड्यात घडलेल्या घटनांच्या सत्यतेला जनतेसमोर आणायच्या उद्देशाने ग्रामस्थांना व संबंधितांना भेटले. म्हणजे मांत्रिक बनलेल्या शहाजी भोसल्यांनी सखाहरी व त्यांच्या पत्नी निर्मला शेजवल यांना विश्वासात घेऊन काही नेहमीचेच हातचलाखीचे प्रयोग करून कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. व त्यांचा विश्वास संपादला. मात्र ते करताना त्यानी भानामती म्हणून घडणाऱ्या घटना उदा. विष्ठा पडणे, अचानक कप़डे जळणे आदि घटना कशा होतात किंवा त्यांना प्रत्यक्षात करावे लागले तर काय काय हात चलाखी करावी लागते याचे प्रात्यक्षिक वा स्पष्टीकरण सादर करून दाखवले असे बातमीत म्हटलेले नाही.
2. या प्रकरणात त्यांचीच दोन (सावत्र) मुले सामील असल्याचे त्या मुलांना वेगवेगळे बोलावून त्यांच्यावर मानसिक वा शारीरिक दबाव आणून तसे कबूल करायला लावले की हे कृत्य ते करत आहेत... कदाचित ते त्यांनी लेखीही नोंदवले असेल. पण त्याला प्रत्यक्षात काही महत्व नाही. कारण भानामतीच्या केसेसमधे या वयातील मुले माध्यम म्हणून उपयोगात आणली जातात. असा पुर्वानुभ आहे.
3. भानामतीत घडणाऱ्या घटना ह्या ज्या व्यक्तींच्या अवती भवती घडतात म्हणून साहजिक त्यांच्या वर आळ यावा असे भानामती करणाऱ्या शक्तीचा होरा असतो. ते बदनाम होतात. मार वा अन्य यातना व बोलणी ही खायला लागतात. ( जसे 1988च्या सुमारास कराडपासून जवळच्या कडेगावमधे अचानक काही मुलींच्या डोळ्यातून खडे येणाऱ्या घटनेच्या संदर्भात ती भानामती त्या शाळकरी मुलीं करत असा त्यांच्या वर तसा आळ येत असे.)
4. अशी मुले वा माध्यमे आपली बाजू कितीही समजाऊन सांगू लागली तरी ती प्रत्यक्षातील घटनांमुळे मान्य होण्यासारखी नसल्याने प्रथम दर्शनी तेच या मागचे हात वा आरोपी दिसतात. काही वेळा मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे कृत्य ह्या मुली- मुले करत नाहीत अशी खात्री असल्याने अनेकदा त्या मुलांवर मारहाणीचा वा तेच हे करत आहेत याचा ठपका ठेवला जात नाही. (जसे कडेगावच्या केसमधे मुलींचे पालक अंनिस वाल्यांनी या मुलांना अभ्यास वा घरकाम टाळायचा होता म्हणून त्या अशी युक्ती करत होत्या असे दणकून म्हटले तरी मानायला तयार नव्हते. कारण त्यांना त्यांच्या मुला-मुलींच्या वागणुकीचा प्रत्यय दररोज येत होता. तसे गावकऱ्यांनी अंनिसवाल्यांना प्रत्यक्षात म्हटले व नंतर वर्तमान पत्रातून लेखी निवेदन देऊन सिद्ध केले).
5. अशा लहान वयातील मुलांनी काही कारणाने रागावून जाऊन बदला म्हणून आपल्याच घरातील कपड्यांना आगी लावून आईवडिलांच्या विरुद्ध भीती व आतंकी कृत्ये करून घाबरवायसाठी केले होते असे घटकाभर मानले तर घरातील कपडे कसे पेटवायचे, प्राण्याची वा मानवाची विष्ठा आधीच कशी गोळा ठेवायची व ऐन वेळी एकदम प्रकट करायची आदी कृत्यांची पूर्व तयारी त्यांना किती व कशी करावी लागली असेल याचा कोणालाही अंदाज करता येईल. मुलांना कपडे पेटवायचे असतील तर अंनिसनें केलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे कपडे,साड्या, चादरी वा अन्य कापडी सामान सोडियम मेटल मिसळलेल्या रॉकेलमधे आधी बुचकळून ठेवावे लागेल व ऐन वेळी ते पाण्याटाकून किंवा कपड्यांवर पाणी टाकून अचानक जाळ करावा लागेल. आता अंनिसवाल्यांना ते सोडियम मेंटल बाजारात कुठे मिळते, काय किंमत, जर असे महिनाभर करामती घडवायच्या तर किती किलो आणावे याची खूप माहिती असेल. पण या मुलांना ते नाव, त्याचे गुणधर्म, ते कुठे मिळतात व त्याला लागणारा पैसे कसा मिळवता येईल याचा खटाटोप करावा लागेल. सारासार विचार केला तर अशी तयारी करायला त्या मुलांना टोकी खेड्यातून शहरात येऊन माल खरेदी करून परत जाऊन, कसे कसे घडवले त्याचे प्रात्यक्षिक त्या आरोपी मुलांकडून अंनिसने केले असेलच किंवा निदान अंनिसच्या निष्णात मांत्रिकाने तरी अगदी सहजासहजी करून दाखवून आईवडिलांना व अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर करून वाहवाही मिळवली असेलच. मात्र तसे केल्याचा बातमी उल्लेख का नाही हे गूढ आहे. असे मानू या की समजा त्या शाळकरी व्रात्य मुलांना भानामती करायला सुरसुरी आली तर काय तजवीज करावी लागेल ? अंनिस जसे हातचलाखीचे प्रयोग करताना लागणारे सामान आधी खरेदी करून मग सर्व तयारीने भांडाफोड करायला गावात जाते तसे पण उघडपणे न जाता चोरून किंवा गावकऱ्यांच्या नकळत मागवायला किवा त्यांना परगावी जाऊन खरेदी करायला त्या मुलांना लागेल विष्ठेसाठी पायखान्यातील आडजागी चोरून जाऊन पिशवीतून साठवून ठेवावी लागेल. या सामानातील काही पदार्थांचा उग्र वा घाण वास तो पसरवायच्या आधी अशा रितीने बंद करून ठेवला पाहिजे की त्याची अजिबात कुणकुण वा गंध आला नाही पाहिजे. आता वरील मुलांच्या वयोगटाचा विचार करता अशी धमक त्यांच्यात अचानक कशी निर्माण झाली असेल याचा खुलासा अंनिसवाल्यांनी केला असेल. तो काय होता ते बातमीत प्रकर्षाने नमूद केले जायला हवे ते नेमके वाचायला मिळत नाही. म्हणूनही अशी अघोरी कृत्ये या वयोगटातील मुलांकडून घडतील का असे सामान्यतः विचारांती वाटत नाही. आतंकवादी कारवाया करायला प्रवृत्त विदेशी तरुणांना देखील दहशतीची कृत्ये करायला मोठी यंत्रणा मदत करत असते, नव्हे मागे लागून करवून घेते. असे आपल्याला बातम्यातून वाचायला वा पहायला मिळते. इथे मात्र असा आतंकी प्रकार करायला कोणाची मदत नसताना गुपचुप या शाळकरी मुलांना शक्य कसे व्हावे यावर विचार व्हायला पाहिजे. त्या दोन मुलांनी ती कृत्ये केली असे जाहीर करायच्या शिवाय अशी कोणती यंत्रणा त्यांच्या मागे उभी होती याचा कसून तपास लागेपर्यंत या प्रकरणाचा शेवट झाला असे मानले जाऊ नये. असो.
6. एक जागृत वाचक म्हणून या विषयातील सखोल माहिती व स्पष्टीकरण आपल्या प्रतिष्ठित पेपर मधे मोठ्या मथळ्यात सादर जावे ही विनंती केले.
In reply to दै. लोकमतला टोकीच्या भानामतीवरून पाठवलेले पत्र by शशिकांत ओक
In reply to एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे by आनन्दा
In reply to एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे by आनन्दा
अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ वर्षाची मुलं करतील असे मला वाटत नाही.११-१२ वर्षांची मुल चलाख असू शकतात. केस मधे अन्य बाजूही असू शकते.बातमीत सगळच येईल अस नाही
In reply to अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ by प्रकाश घाटपांडे
In reply to अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ by प्रकाश घाटपांडे
असू शकतात. केस मधे अन्य बाजूही .असू शकतेबातमीत सगळच येईल अस नाही>जर त्या बातमीतील मजकुरातून घटनेची सत्य माहिती दिली गेली नसेल तर त्या बाबत मी मांडलेल्ल्या मुद्यांवर विचार केला गेला नव्हता किंवा करून ही काही सिद्ध करता येत नाही याची खात्री झाल्याने त्या बाबी झाकून ठेवल्या गेल्या आहेत. दोन्ही तऱ्हेने "असू शकते" असे नुसते पकाकांनी म्हणणे अंनिस साठी गैर नाही काय?
In reply to लंगडे मत प्रदर्शन ... असू शकते... by शशिकांत ओक
In reply to असू शकते म्हणजे खरा by प्रकाश घाटपांडे
In reply to असू शकते म्हणजे खरा by प्रकाश घाटपांडे
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टीला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. मलाही वरील विचार मान्य. या धाग्याच्या संदर्भात अरविंद कोल्हटकरांनी सर्व शक्यतांचा विचार करावा यासाठी दार किलकिले करून नाही तर सताड ठेवून पहावे असे सुचवले आहे. वैचारिक किलकिल्या दरवाज्याने सर्व बाजूंचा विचार कारयला आडकाठी होऊ नये म्हणून तशी विनम्र विनंती होती. त्यात तरी प्रत्यावाद नसावा.
गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते.डोळ्यातून नक्की काय निघत असल्याचे? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
In reply to बद्दू नॉर्मल छे..? by मोदक
बद्दू नॉर्मल छे..?ऑरेंज कलरचा आहे रे. कदाचित तो नारींगी शब्द चुकीचा वापरला असेल मी. :)
In reply to बद्दू नॉर्मल छे..? ऑरेंज by धन्या
In reply to अगगागा !!!!!! by इरसाल
नारिंगी म्हणजे ते डंब एंड डंबरचं जिम क्यारी का काय ते बगा दिसू ऱ्हायला.इरसाल साहेब. झेपलं नाही हो. आम्हाला इंग्रजी चित्रपट झेपत नाहीतआम्ही त्यामुळे सहसा पाहतही नाही. आम्ही फक्त अमेरिकन बर्गर* खाल्लेत. जंक फुड** असल्यामुळे ते चव न कळताही आवडले ;) * आणि ** हे तुम्हाला कळेलच. न कळल्यास वव्यनि करा.
In reply to नारिंगी म्हणजे ते डंब एंड by धन्या
आन्तर्जाल साभारIn reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
In reply to नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप by अरुण मनोहर
नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप असेल. अशी दुसर्याला पहायला दिल्यावर आणखी काय अपेक्षित असणार?दुसर्याला पाहायला देता येतील अशा गोष्टी मी एक्स्टर्नल हार्ड डीस्क मध्ये ठेवतो. हार्ड डीस्क कुणाला दयायची आणि कुणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. ;)
In reply to नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप by धन्या
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
In reply to त्या नारिंगी रंगाच्या by प्रचेतस
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं नेमकं काय दाखवलंस रे त्या दोघांना की अशी भानामती झाली मग.त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं मी नेमकं काय दाखवलं यापेक्षा त्यांनी त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमध्ये काय पाहीलं हे तू किस्नालाच विचार. ;) उगाच माझ्यावर दोषारोप व्हायला नकोत की पूर्वग्रहदुषित नजरेने मला जे हवं ते मी किस्नाला दमबाजी करुन वदवून घेतलं. :)
In reply to त्या नारिंगी रंगाच्या by धन्या
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
भानामती उतरणारा/काढून टाकणारा आहे का?इच्छा तेथे मार्ग .... या चालीवर... गळतगे म्हणतात तशी भानामती असेल तर नजर लागते असे मानावे लागेल तर मग नजर लागली की दृष्ट काढतात. मिठ-मोहोऱ्या घेऊन पहा काही फरक पडतोय का ते...
In reply to शोधा म्हणजे सापडेल by शशिकांत ओक
In reply to गळतगे म्हणतात तशी भानामती by धन्या
In reply to हेच म्हणणार होतो. नाडीवर by गवि
In reply to एक निरीक्षण by मूकवाचक
एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच. असो.यू सेड इट सर. :) दोन्ही विचारधारांची माणसे एकदम टोकाला जाऊन बोलतात. एकमेकांचे म्हणणे खोडून काढायचं एव्हढाच त्यांचा उद्देश असतो. कुठेतरी समतो साधला जावा असे कुणालाच वाटत नाही. अर्थात हे आमचं मत श्रद्धेच्या संदर्भात आहे. भानामतीसारख्या अंधश्रद्धेबद्दल नाही. :)
In reply to एका विषयाला धरुन नसून निव्वळ by धन्या
एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच.चोक्कस..
In reply to हेच म्हणणार होतो. नाडीवर by गवि
In reply to गवि, मला वाटतं की हे सर्व by पक्या
In reply to ते पटलं हो.. अंनिसचं चुकत by गवि
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
In reply to ही भानामती पाकिस्तानातपण झाली by इरसाल
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.तिथे जाउन पाहीले, काहीच दिसत नाही
In reply to संपुर्ण प्रकरण इथे by मराठी_माणूस
In reply to दुव्यात दुवा शोधून पहावा by अरुण मनोहर
In reply to तिथेही पाहीले, फक्त रिकामे by मराठी_माणूस
In reply to तिथेही पाहीले, फक्त रिकामे by मराठी_माणूस
In reply to अंधश्रद्धेला खतपाणी by कॉमन मॅन
In reply to ब्लॉग by रामपुरी
बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा
In reply to पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... by शशिकांत ओक
In reply to ओक-काय हो ही प्रकरण by अत्रुप्त आत्मा
In reply to भटजीबुवा तुमची अॅक्टिवा by किसन शिंदे
कारण तिच्यात भारत-पेट्रोलियमचे पेट्रोल भरलेले आहे ;-)In reply to ओक-काय हो ही प्रकरण by अत्रुप्त आत्मा
डोळ्यातून खडे बाहेर येणे हा १०१ टक्के हातचलाखीचाच प्रकार असणार. यात भानामती, जादूटोणा, देवीचा कोप इ. चा काहीही संबंध नाही.मित्रा, आपले मत की "हा प्रकार हातचलाखीचाच असणार" तर्काने निर्माण केलेले आहे. गावकऱयांनी दै. पुढारीला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की जर त्या शाळकरी मुली(एक नव्हे दहा) असे हातचलाखीचे प्रकार लीलया करत होत्या तर अशा या प्रकरणातील भांडाफोडमधे पारंगत असलेल्या अंनिसवाल्या लोकांनी त्याच्याप्रमाणे तशीच हातचलाखी करून डोळ्यात खडे घालून व नंतर ते काढून दाखवावेत. त्यांनी तसे प्रयोग करून दाखवले नाहीत. ही गावकऱ्यांची प्रमुख तक्रार होती. या विधानावर विचार करावा.
In reply to भानामती by प्रसाद गोडबोले
भानामती आणि इतर काळ्याजादु कशा कराव्यात ह्यावर स्खोल आणि शास्त्रीय माही देणारे पुस्तक कोठे मिळेल ? अभिनव गुप्त ह्याचे एक पुस्तक प्रसिध्द आहे पण ते नेटवर उपलब्द नाहीये . कोठे मिळेल ? बाकी आपल्याला काळी जादु येते हे लोकांना कसे पटवुन द्यायचे ? म्हणजे मला चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत , लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का ;)
लोक म्हणतील ओकांनी पुन्हा काय म्हणून हे लफडे उकरून काढलयं? आश्चर्य असे की मी हा धागा विसरून गेलो होतो. दिवाळी अंकासाठी रसग्रहणात्मक काही सादर करावे म्हणून कॉम्प उघडला व मिपा उघडले ते नेमके हा धागा उपटला... कोणा मार्कस ऑलेरियस यांची विचारणा दिसली आता हे महाशय मिपावर सक्रीय आहेत कि नाही माहित नाही... पण त्यांच्या विचारणेचे कौतुक वाटले... लोकांना कन्व्हिंस कसे करावे हा पेच त्यांना पडला आहे... अहो सोप्प आहे... ज्यांनी ज्यांनी या धाग्यावर नकारात्मक विचार करून मत प्रदर्शन केले आहे त्यांच्यावर प्रयोग करून मग त्यांना कसा 'अनुभव' आला याची माहिती सादर करायला भाग पाडायचे काम काळ्याविद्येला सांगावे... म्हणजे तुम्हालाही सराव घडेल व इथल्या लोकांना त्याची प्रचिती आल्याचे समाधान वाटेल...
चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत, लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे कालोकांना समजावण्याचे प्रयत्न अंनिसचे प्रवीण कार्यकर्ते विविध हातचलाखी विद्येचे प्रयोग करून करून इतकी वर्षे तेच करून राहिलेत की पण ज्यांच्यावर तशी जीव घेणी वेळ येते ते कोणी मानायला तयार होत नाहीत...
In reply to भानामति आणि 'चेटूक' हे एकच का ? की वेगळाले ? by चित्रगुप्त
लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख